मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ शेखर साहित्य # 11 – कविता ☆ श्री शेखर किसनराव पालखे

श्री शेखर किसनराव पालखे

☆ साप्ताहिक स्तम्भ – शेखर साहित्य # 11 ☆

☆ कविता ☆

आपण समजतो तेवढी सोपी नसते कविता

भावनांचा उद्रेक होतो तेव्हा जन्म घेते कविता

तुम्ही नाहीयेत तिचे जन्मदाते बाबांनो

उलट तिच्यामुळे तुमचा होतो जन्म  कवी म्हणून मित्रांनो

कविता म्हणजे असतं एखाद्याचं जिवंतपणे जळणं

कविता म्हणजे काळजातला खंजीर स्वतः ओढून मरणं

कविता असते बाणासारखी रुतणारी

छातीत घुसून पाठीतून आरपार निघणारी

कविता म्हणजे पायातला न दिसणारा काटा

कविता म्हणजे भावनांना हजार लाख वाटा

कविता म्हणजे असतो काळजावरला घाव

कविता म्हणजे असतो एक मोडलेला डाव

 

© शेखर किसनराव पालखे 

पुणे

17/05/20

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे – श्रीचामुण्डेश्वरी चरणावली – ७ ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

☆ केल्याने होतं आहे रे ☆

???श्रीचामुण्डेश्वरी चरणावली -७ ?

!!श्रीराम समर्थ!!

नवरात्री शुक्रवारी

सण आला मांगल्याचा

ओटी भरा सवाष्णींची

थाट माट सौभाग्याचा !!

 

घालू सवाष्ण भोजन

अहो शिजवू पुरण

पुरणाच्या दिव्यातुनी

करु देवीस औक्षण !!

 

मागू जोगवा अंबेचा

मांडू अष्टमी जागर

माता रेणुका भवानी

फुंकू भक्तीची घागर

 

अंबा प्रगट हो झाली

घटामध्ये विसावली

नवधान्ये समृद्धीची

आनंदाने उगवली !!

 

अंबा माय तू भवानी

कृपादृष्टी तुझी मोठी

षडरिपू केले चूर

भक्तांच्या कल्याणासाठी !!

 

बोध संबळ घेऊन

ज्ञानज्योती पाजळल्या

हाती ज्ञानाच्या दिवट्या

गोंधळाने जागवल्या

 

कामक्रोध हे राक्षस

सत्वगुण तलवार

केले अंबेने मर्दून

असुरांचे हो संहार !!

 

छत्रपती शिवरायांना

तलवार भेट दिली

धर्म रक्षणाच्या साठी

माय भवानी धावली !!

 

छत्रपती शिवरायांना

आशीर्वाद द्यावयाला

आली तुळजाभवानी

किल्ले प्रतापगडाला !

 

उदे गं अंबे उदे…

उदे गं अंबे उदे….

क्रमश:. ….

©️®️ साधक- उर्मिला इंगळे

सातारा

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्पंदन ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ कवितेचा उत्सव ☆ स्पंदन ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

असं एक अवकाश असावं जिच्यात उंच भरारी मारता यावी ।

असे एक ध्येयाचे शिखर असावे

जे गाठताना देहभान हरपून जावे ।

असा एक सूर मिळावा

ज्यामुळे जीवनाचे गाणच बनून जावं ।

असे सोबती भेटावेत

ज्यांच्या साथीनं सारी मैफिलच रंगून जावी ।

अशी एक मैत्री असाव जिचा हात हातात येताच,

काट्याकुट्यांची आणि भयानक वाटणारी वाट हिरव्यागार वनराईच्या गालीच्या प्रमाणे वाटावी ।

आयुष्य म्हणजे असा एक सामना असावा

की शेवटच्या बॉलमध्ये पण मॅच जिंकता यावी ।

एक विचार मनात यावा की ज्यामुळे जादुगाराने फिरवलेल्या काठी प्रमाणे सारे आयुष्यच बदलून जावे ।

असे एक संवेदनशील मन हवे , ज्याने मुंगीचेही मनोगत जाणता यावे । असा एक भूतकाळ असावा,

त्याच्या रम्य आठवणीत रमताना, रोमांचित होताना भविष्यातलया सगळ्या चिंता विसरून जाव्या ।

असा एक वर्तमानकाळ हवा, की ज्याच्यात भूतकाळ आणि भविष्य काळाचा सुंदर संगम साधता यावा ।

असे एक जिंकण्याचे स्वप्न हवे, की जे साकारताना

पराभवाचे आणि अपयशाचे बळ संपून जावे ।

असं एक कर्तृत्व हवं, की ज्याच्याकडे बघताना

आई वडिलांना अभिमान वाटावा ।

 

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ओळख ☆ सौ अंजली गोखले

☆ जीवनरंग ☆ ओळख ☆ सौ अंजली गोखले  ☆

बघता बघता लिली दिड वर्षाची झाली. ती सहा महिन्यांची झाली आणि आईचे ऑफिस सुरु झाले. त्यामुळे लिलीचा ताबा आजी कडेच. आताही आजीनं तिला छानसा फ्रॉक घातला, पावडर तीट लावली आणि दोघी देवा समोर आल्या. “हं’ म्हण, देवा, मला चांगली बुद्धी दे. “लिलीन आपले इवलेसे हात जोडले आणि म्हणाली, “देवा, आजीला च्यांग्ली बुदी दे.” आजीला हसू आवरल नाही. “सोनुली ग माझी म्हणत आजीनं तिच्या गालावरून हात फिरवला. हा रोजचाच कार्यक्रम झाला होता .

आज आजीनी एका ताटलीत पंधरा पणत्या लावल्या. लिलीला तो चमचमता प्रकाश दाखवत म्हणाल्या, “लिली, ही बघ गंमत ” लुटूलुटू चालत लिली आली. ताटलीतले ते दिवे बघून डोळे मोठ्ठाले करून पहायला लागली. आपले इटुकले हात गालावर धरून आजीकडे आणि त्या पणत्यांकडे पहायला लागली.

भिंतीवरील आजोबांच्या हार घातलेल्या फोटोकडे पहात आज देवाकडे बुद्धी मागायची विसरून गेल्या. त्या ज्योतींच्या प्रकाशात त्यांना आजोबां बरोबरच्या सहवासाच्या आठवणी आठवायला लागल्या . आजचा हा दिवस खास त्या आठवणींसाठीच होता. लिलीला मांडीवर घेऊन तिच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवीत त्या तिथेच बसल्या. आजोबांना छकुल्या नातीची ओळख करून दिली. आजोबा फोटोमधून समाधानानं हसले.

 

©️ सौ अंजली गोखले 

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडि

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ घट…. ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

 ☆ विविधा ☆ घट….. ☆ श्रीमती अनुराधा फाटक  ☆ 

नवरात्रातील महत्वाची गोष्ट घटस्थापना ! घटस्थापना म्हणजे आपण मांडलेली पंचमहाभूतांची पूजा !मातीचा घट आणि घटाभोवती नवधान्य पेरण्यासाठी वापरलेली माती हे पृथ्वीच्या सृजनाचे प्रतिक,घटातील पाणी म्हणजेच आप,सतत तेवणारा दिवा तेजाचे प्रतिक,त्यातून निर्माण होतो चैतन्याचा वायु जो सारा आसमंत( अवकाश) उजळून टाकतो.घटस्थापनेच्यावेळी केलेल्या या पंचमहाभूतांच्या पूजेने देवीचे दिवसेदिवस देवीचे तेज वाढते तेअष्टमीला पूर्णत्वाला जाते.त्या पूर्णत्वात घागर( घट)फुंकून आपण देवीला अंतर्मन अर्पण करण्याचा प्रयत्न करतो.घटाच्या अंतरात, पोकळीत जाण्याचा प्रयत्न करतो.तो करतानाजे समाधान मिळते हे समाधान म्हणजेच नवरात्रीचा घटाशी असणारा अन्यसाधारण संबंध!अलिकडे घटस्थापनेसाठी ऐश्वर्याप्रमाणे वेगवेगळ्या धातूचे घट वापरले जातात पण मातीच्या घटाचे ऐश्वर्य कशालाच नाही हे तितकेच खरे!

घट हा शब्द फार पुरातन असून तो आजही आपले अस्तीत्व टिकवून आहे.

आदिमानवाने शेती सुरु केली आणि त्याला मदत करणारे बलुतेदार तयार झाले कुंभार हा त्यापैकीच एक! मातीचे घट बनविणारा कुंभार ! फिरत्या चाकावर कुंभार कौशल्याने वेगवेगळ्या आकाराचे घट बनवितो.अगदी लहानशा बोळक्यापासून मोठ्या रांजणापर्यंत असे हे घट असतात.आकारमान आणि उपयोगाप्रमाणे यांची नावेबदललेली दिसतात.लहान मुलींच्या चूल बोळक्यापासून रांजणापर्यंतचा घटाचा हा प्रवास फार पूर्वीपासून चालू आहे.सुरवातीच्या काळात हेच घट सर्व कामासाठी वापरले जात.

घट म्हणजेच घडा!

मानवाच्या जन्मापासून त्याच्या मृत्युनंतरही ज्याची गरज लागते तो घट मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिला आहे. चूल बोळक्याचा खेळ खेळणारी लग्नमंडपात उभी रहते ती बोळक्यासहीतच फक्त तेथे असतो घट! नवरीने पुजावयाचा गौरीहर !लग्नानंतर संक्रांतीला सुवासिनी सुगड पूजतात ते घटाचेच वेगळे रूप.त्या पूजेतलेच एक रथसप्तमीला सूर्यपूजेसाठी वापरले जाते.असा घट,घडा माणसाने पुण्याचा साठा भरण्याकरिता म्हणजे परोपकाराकरिता वापरला तर योग्य नाहीतर पाप मार्गाने वागणाऱ्या वाल्ह्या कोळ्याप्रमाणे पापाचा घडा कधी ना कधी भरतोच!

पूर्वी ‘घट डोईवर, घट कमरेवर,’ म्हणत बायका नदीवरून पाणी आणत आता नळाचेपाणी घटात,माठात भरले जाते.अगदी घरात फ्रिज असला तरी माठातले पाणी पिणारे आजही आहेत.

पंचमहाभूतानी बनलेला आपला देहही एक घटच आहे.’ घटाघटाचे रूप आगळे,प्रत्येकाचे दैव निराळे’ असे कै.माडगूळकरांनी त्या अर्थाने म्हटले आहे.

आता लोकांना मातीच्या घटाचे पर्यावर्णीय महत्ल समजल्याने पुन्हा मातीचे घट स्वयंपाकघरात घरात अग्रस्थान मिळवू लागलेले दिसतात.कितीही निर्लेप आले तरी मातीच्या घटाचे स्थान शेवटपर्यंत अढळच रहाणार !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मंथन ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे 

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ☆ विविधा ☆ मंथन ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

नवरात्रोत्सवात ऑफिसला सुट्टी म्हणून मानसी,चित्रा,रेवती, स्वाती या मैत्रिणीं महालक्ष्मीच्या दर्शनाला गेल्या. यानिमित्ताने देवळातील पूजा-आरास पाहायला मिळे. निवांतपणे लोकांमध्ये मिसळून उत्सवाच्या वातावरणाची अनुभूती घेता येई.

देवळात खूप गर्दी होती. दर्शनासाठी मोठी रांग होती.प्रत्येकीच्या हातात पूजेची थाळी होती. रेवती,स्वातीने तेलाच्या पॅक पिशव्या आणलेल्या पाहून चित्रा म्हणाली,”स्वाती तेल पण आणलेस तू ?”

स्वाती– “होय बाई.अग नोकरीसाठी आपण घराबाहेर असतो.सतत तेलवात लावून ठेवणे शक्य होत नाही. मग म्हणलं, देवाच्या दारी तरी आपला दिवा जळू दे.”

“होय ग. आपण बाहेर असताना अखंड दिवा लावणे शक्य नसते आणि ते धोक्याचेही असते. म्हणून मग देवळातील दिव्यासाठी तेल आणले.”रेवतीने तिची ती ओढली.

“ते ठीक आहे,”मानसी म्हणाली,”खूपजण असाच विचार करतात आणि इथे नको इतके तेल जमा होते.तेलाची सांड-लवंड होते, काही तेल वाया जाते,घसरडे होते याचा कुणी गांभीर्याने विचारच करत नाही.”

“हो ना,मग काहीतरी दुर्घटना घडलीकी सगळे एकदम जागे होतात,” चित्रा म्हणाली.

“म्हणूनच आम्ही पॅक पिशवी आणली,”स्वाती.

“ते अगदी छान केलत तुम्ही. पण या गोष्टीचा काही वेगळा विचार नाही का करता येणार ? ज्यांना स्वयंपाकात तेलाचे दर्शन दुर्लभच असते त्यांच्या देवापुढे कधी तेलवात लागणार आहे का ?मग अशांना हे तेल आपण नाही का देऊ शकणार ,” मानसी.

“मानसी, अगदी खरं आहे तुझं. मी पण आता अशा गरजूंना देईन,” चित्रा.

“गेली चार-पाच वर्षे अशा लोकांना मी तेलाची पिशवी देते,” मानसी.

“छान छान” सगळ्या एकदम म्हणाल्या.

“आजकाल खूप गोष्टींचा नव्याने विचार करायला पाहिजे हे यावरून लक्षात आलं बरं का आमच्या,” रेवती.

दर्शनाची रांग पुढे सरकत होती.आत जाताना थोडी रेटारेटी झाली आणि हातातल्या ओटीच्या थाळ्या वेड्यावाकड्या झाल्या. कसल्यातरी आघाताने स्वातीच्या हातातील तेलाची पिशवी फुटून ते सांडू लागले.गडबडीत खूप तेल वाया गेले. स्वातीची साडी तर पुरती खराब झाली.पण इतरांच्या साड्यांना ही तेलाचा प्रसाद मिळाला.गडबड बघून पुढे आलेल्या देवस्थानातील कुणीतरी ते तेल पुसून घेतले.या मैत्रिणी कसेबसे दर्शन घेऊन बाहेर आल्या.आता अशा अवतारात बाहेर कुठे जाणे शक्यच नव्हते. सगळ्या घरी परतल्या.

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये तेल पिशवी वरून साग्रसंगीत चर्चा झाली.सणवार,परंपरा,दानमहात्म्य यावर गरमागरम चर्चा झाली.जुने रितीरिवाज जपायचे पण काळानुरूप त्यात बदल करणे खूप गरजेचे आहे.दान सत्पात्री असावे.गरजूंना मदत करावी.न सोसणारे उपवास न करता उपाशी लोकांना जेवू घालावे.यावर मात्र एकमत झाले.

परंपरेच्या मुशीत घडतो संस्कृतीचा दागिना

नवा उजाळा देण्या सोडा कालबाह्य कल्पना !!

हे अधोरेखित झाले.

या चर्चेच्या वेळी मानसी गप्पच होती.कुणीतरी तिला याबद्दल विचारले.ती म्हणाली,”मी माझे मत कालच सांगितले.पण यंदा मात्र माझा चांगलाच पोपट झालाय,”

“काय झालं मानसी ,”सार्वजनिक कुतूहल.

“यंदा मी माझ्या कामवालीला तेलाची पिशवी दिली.ती खूपच खुश झाली.म्हणाली,’ वहिनी तुम्ही माझं मोठं काम केलंसा. माझी खूप दिवसाची इच्छा होती का देवीला तेल द्यावं.आता हीच पिशवी मी उद्या देवीला देईन.’

“आता बोला”.

“काय ?” सर्वांनी एकच गजर केला.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सायकली उदंड होऊ देत! ☆ श्री विनय माधव गोखले

☆ विविधा ☆ सायकली उदंड होऊ देत! ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

खरे तर पुणे हे सायकलींचे शहर म्हणून एकेकाळी विख्यात होते. रस्त्यांवर, रस्त्यांच्या कडेला, गल्ल्यांमधून,वाडयांच्या बोळांमधून, इमारतीच्या पार्किंगमध्ये सायकलीच सायकली लावलेल्या असायच्या. शाळाकॉलेजांमधून, कार्यालयांमधून खास सायकलींचे स्टॅंड तैनात असायचे किंवा एकमेकांवर खेटून-रेलून लावलेल्या असायच्या. सायकलींचेच राज्य होते म्हणा ना! पण काळ काय बदलला आणि जीवनाच्या वाढत्या वेगाशी स्पर्धा न करता आल्याने ह्या दुचाकी वाहनप्रकाराची लोकप्रिय कमीकमी होत गेली.

सायकली गेल्या आणि मोटारसायकलींचा जमाना आला. कालांतराने “आजकाल की नाही सिटीत कुठेही जायचे म्हणजे कार ही इतकी नेसेसिटी झाली आहे ना!” अशी वाक्ये बोलून पुणेकर एकमेकांना कार घ्यायला भरीस पाडू लागले. मग त्यातून कार आणि मोटारसायकलींनी रस्ते तुडुंब भरून वहायला लागले आणि एका सीमेनंतर पावसाळ्याचे पाणी तुंबावे तसे तुंबून पडायला लागले. सिग्नलला उभे राहिले की वायुप्रदुषणाची भयानक जाणीव सर्वांना व्हायला लागली. मधल्यामधे सायकली मात्र पुण्याच्या रस्त्यांवरून पार पुसल्या गेल्या!

वरवर पाहिले तर सायकली गायब होण्यामागे पुणेकरच पूर्णपणे दोषी आहेत असे वाटेल. पण तसे नाहीये. शासनकर्त्यांकडून ’प्लास्टीक रीसायकलिंग’, ’कोरडा कचरा रीसायकलिंग’, ’ओला कचरा रीसायकलिंग’, ’पाणी रीसायकलिंग’ असा नानाविध गोष्टी रीसायकलिंग करण्याचा इतका भडिमार सर्वदिशांनी पुणेकरांच्या कानीकपाळी केला गेलाय की ह्या गदारोळात पुणेकर बिच्चारा ’सायकलिंग’ हा शब्दच विसरून गेला.

पण खर्‍या पुणेकराने घाबरून जायचे कारण नाही…परिस्थिती हळूहळू बदलत आहे.

पेट्रोल, डिझेलच्या किमती बेफाट वाढल्या आहेत. “हिंजवडीला कारने जायचे म्हणजे च्यायला ब्रेक-क्लच, ब्रेक-क्लच दाबून गुढगे पार दुखायला लागतात बुवा! शिवाय ट्रॅफिक जाममध्ये अडकून रोजचे तीन तास प्रवासात जातात ते वेगळेच…!” अशी हताश वाक्ये कानी पडायला लागली असून आयटी कर्मचार्‍यांचा कार पूलिंग करण्याचा किंवा कंपन्यांच्या बसनेच कामाला जाण्याचा ट्रेंड वाढला आहे. त्यास भरीला म्हणजे व्यायामाचा अभाव आणि त्यातून आरोग्य समस्या उग्र रूप धारण करायला लागल्या आहेत. वजनवाढ, ब्लड प्रेशर, गुडघेदुखी, पाठदुखी अशा आजारांनी लहान वयातच तरुण पिढीला ग्रासले आहे.

ह्यावर उत्तम उपाय म्हणजे, सायकल!  ह्या उपायाचे फायदे खालीलप्रमाणे –

  • सुलभ वापर – लहान मुला-मुलींपासून आजी-आजोबांपर्यंत सर्वजण सायकल चालवू शकतात. बरं पंक्चर झालीच तर हातात धरून ढकलत नेणे काही अवघड नाही. वजनाला एकदम हलकीफुलकी आणि पार्किंगसाठी सडपातळ. खूप लांब जायचे असेल किंवा काही तातडीचे काम असेल तर बाइक-कार जरूर वापरा. पण शाळेला, बाजाराला, व्यायामशाळेत, ऑफ़िसला जायचे असेल तर वेगाची काय गरज? सरळ सायकल काढा आणि सुटा.
  • पैशांची बचत – सायकलीची किंमत माफ़क शिवाय दुरुस्तीचा खर्चही परवडण्यासारखा. सायकल चालविताना ना कुठल्या इंधनाचा खर्च, ना वंगणाचा खर्च. आपला देश ह्या दोन्ही गोष्टी आयात करीत असल्याने सायकलींचा वापर मोठ्या प्रमाणात परकीय चलन वाचवू शकेल. शिवाय सायकली चालवता ना हेल्मेटची गरज, ना लायसन्स, ना इंशुरन्स, ना पीयुसी आवश्यक. कुठलाही सीट-बेल्ट बांधू नका वा हेल्मेटचा पट्टा ओढू नका. नुसती टांग टाका आणि चालू पडा.
  • शिक्षेची भीती नाही – सुधारीत मोटार वाहन कायद्यामध्ये वरील नियम न पाळल्यास कडक शिक्षांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची तसेच सीसी टीव्ही कॅमेर्‍याची करडी नजर सर्व दुचाकी-तिचाकी-चारचाकींवर असणार आहे. स्वयंचलित वाहनांना वेगाची मर्यादा पाळण्याची सक्ती असून ती तोडल्यास जबरी शिक्षेची तरतूद केली आहे. विशेषत: दारु पिऊन चालवणार्‍यांची तर काही खैरच नाही.

सायकलीला मात्र अलगदपणे सर्व नियमांच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. सायकलवाल्याने अगदी वाहतूक पोलिसाच्या अंगावरून सिग्नल तोडून जरी नेली तरी पोलिस त्या कृत्याकडे काणाडोळाच करेल. सायकलवाल्याला पकडणे त्याच्यादृष्टीने पूर्णपणे ’अर्थ’हीन असणार आहे. जास्तीतजास्त शिक्षा म्हणजे ’हवा सोडून देणे’ बस्स! J

  • उत्तम आरोग्यसायकल चालवणे हा फ़ुफ़्फ़ुसांची आणि ह्रदयाची कार्यक्षमता वाढवण्याचा उत्तम उपाय आहे. शिवाय घाम निघाल्याने शरीरातील जादा मेद वापरला जाऊन लठ्ठपणा नैसर्गिकरित्या कमी होतो. शरीरातील मांसपेशींचीही वाढ होते, हातापायांचे स्नायु बळकट होतात आणि संपूर्ण शरीराचा रक्तपुरवठा वाढतो.
  • सुधारीत तंत्रद्न्यान – नवीन सायकलींना गिअर आणि शॉकअब्सॉर्बर आल्याने सायकलवरून भन्नाट वेगाने जाण्याचीही सोय झाली आहे. शर्यतींसाठी अत्यंत कमी वजनाच्या पण तितक्याच बळकट सायकली जगभर तयार आणि सहज उपलब्ध झाल्या आहेत. त्याशिवाय सायकलींसाठी सोयीचे खास आकर्षक रंगांचे गणवेश तसेच हेल्मेट बाजारात आली आहेत. सायकलींना बॅग्ज, मोबाईल फोन तसेच पाण्याची बाटली अडकविण्य़ाचीही सोय पर्यटनाला जाणार्‍यांसाठी उपयुक्त ठरते.
  • सायकल म्हणजे कमीपणा नव्हे – युरोपियन देशांमध्ये विशेषत: नेदरलॅंडस वगैरे मध्ये सर्वचजण सायकलीवरून फिरतात आणि सायकलस्वारांना तिथे महत्व आणि प्रोत्साहनही दिले जाते. त्या देशांत जाऊन आलेल्या सर्वांनाच मग पुण्याच्या रस्त्यांवर सायकल चालविण्यात कमीपणा वाटायचे कारण उरत नाही.

अशा प्रकारे स्वयंचलित वाहनांचा वापर कमी होवो आणि सायकलींचा उदंड वाढो, हीच ह्या पुणेकराची इच्छा!

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रारब्ध ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ☆ मनमंजुषेतून ☆ प्रारब्ध ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

मोबाईल वरील मेसेजेस वाचत होते .पेडोंगी नावाचे खेचर आर्मीमधे रसद पुरवत होते. त्याला पाकिस्तानी सैनिकांनी पकडून आपल्याकडे कामाला लावले. संधी मिळताच पाठीवरच्या मशीन गन आणि बॉम्ब गोळ्या सहित 25 किलोमीटर चालून भारतीय हद्दीत आल. त्याचा सत्कार झाला. आणि गिनीज बुक मध्ये नाव पोचल . खरंच देशभक्त.

हे वाचत असताना आमच्या येथे घडलेल्या प्रसंगाची मला आठवण झाली. अनेक गाढवांचा घोळका निघाला होता. एक गाढव मात्र अगदी हळूहळू असहाय्यपणे लंगडत  चाललं होतं. माझ्यासारख्या प्राणी प्रेमिला गप्प बसवेना.  स्वप्नीलला हाक मारली. गाढव कोणाच का असेना पण त्यावर उपचार करायला हवेत. स्वप्नील एकटा काही करणे शक्य नव्हते. राहत संस्थेच्या किरण नाईक आणि पीपल फॉर ऍनिमल संस्थेच्या अशोक लकडे ना बोलावून घेतले. दोघांनी पकडून त्याला गॅरेजमध्ये ठेवलं. संपूर्ण पाय  सडला होता. त्यातून पाणी वहात होतं. त्यात किडे झाले होते. मालकाने काम करून घेऊन सोडून दिले होते .फोन करून डॉक्टरना  बोलावून घेतले. त्यांनी गाढवांचा पाय पाहिला मात्र आणि काय! यातून हे वाचणं शक्य नाही. इंजेक्शन देऊन सोडवायला हव असा सल्ला दिला.

जीव घेण दोन मिनिटाच काम  पण जीव वाचवायला काही दिवस लागतात .प्रयत्न तरी करून बघू. शेवटी त्याचं प्रारब्ध असं म्हणून प्रयत्न सुरू केले. गाढवाला खाण्याची सुद्धा  ताकत नव्हती. औषध लावलं तर जखमेवर रहात नव्हतं. जवळ जाणं शक्य नाही, इतका घाण वास येत होता .दोन दिवस पिचकारीने पाण्याने जखम धुवून काढली. दोन दिवसांनी औषध व बॅंडेज बांधले. पण तेही पायावर रहात नव्हते. शेवटी जखम उघडी ठेवली. एका वेळेला एक संपूर्ण ट्यूब लावावी लागायची. आता ते रोज ड्रेसिंग व्यवस्थित करून घ्यायला लागलं. किरण व अशोक गवताच्या  पेंड्या ,भरडा आणत होते .त्यांच्या गाडीचा आवाज त्याला कळायला लागला. आवाज आला की ते ओरडायला लागायचं. हळूहळू जखम भरून यायला लागली. आता गाढवाची सगळ्यांशी मैत्री झाली होती. किरणना तर आपण यशस्वी झाल्यासारखे वाटायचे. ते आले की पहिल्यांदा गाढवाला मिठी मारायचे. त्याच्याशी बोलायचे. जाता-येता कोणी कोणी विचारायचे “काय हो गाढव  पाळलंय काय ?”हसायला यायचे.

तीन आठवड्यांनी गाढवाची जखम  बरी झाली. एक दिवस गाढवाचा मालक  तणतणत आला.” माझं गाढव तुम्ही इथं ठेवलंय होय कधीचा हुडकतोय”. सगळ्यांनी त्यालाच  फैलावर घेतल. गाढवाच्या सडलेल्या पायाचे आणि बऱ्या झालेल्या पायाचे फोटो दाखवले.’ पावलावर दवाखाना असून त्याला उपचार न करता राबवून घेतलंस ,म्हणून सगळ्यांनी तोंडसुख घेतलं .आता त्याला बोलायला जागा नव्हती. त्याला तंबी दिली. औषधाचा खर्च 2000 आला म्हणून सांगितलं. शेवटी कसेबसे त्याने पाचशे रुपये काढून दिलेन .  त्याच पाचशे रुपयांची पुढील उपचारासाठी औषधे घेऊन त्याला दिली. गाढवही त्याच्या ताब्यात दिलं

दोन दिवसानी गाढव त्याच्या मित्रमंडळींबरोबर फिरायला जायला लागलं. जाताना पाच मिनिट गॅरेज जवळ थांबून सगळ्यांकडे पहायचं. जीवदान मिळाल्याबद्दल धन्यवाद देण्याचा अविर्भाव त्याच्या डोळ्यात दिसायचा. गाढवाचे प्रारब्ध, सगळ्यांचे प्रयत्न आणि सर्वात मोठी परमेश्वराची कृपा या. त्रयीतून गाढवाचा जीव वाचला.

काय म्हणावं गाढवाचा शहाणपणा की मालकाचा गाढवपणा!. वेडेपणाला गाढवाची उपमा का देतात हे मला अजूनही न उलगडलेलं कोड आहे.

© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

पत्ता- ‘पुष्पानंद’ बुधगावकर मळा रस्ता मिरज, जि. सांगली

फो नं. ०२३३-२२१२१५१ मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

अध्यात्म/Spiritual – श्रीमद् भगवत गीता ☆ पद्यानुवाद – अष्टदशोऽध्याय: अध्याय (25) ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

श्रीमद् भगवत गीता

हिंदी पद्यानुवाद – प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

अध्याय 18  

(सन्यास   योग)

(कर्मों के होने में सांख्यसिद्धांत का कथन)

(तीनों गुणों के अनुसार ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धि, धृति और सुख के पृथक-पृथक भेद)

अनुबन्धं क्षयं हिंसामनवेक्ष्य च पौरुषम्‌।

मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते॥

बिना विचारे हानि या हिंसा का परिणाम

उसे दिया जाता सदा ‘तामस कर्म‘ का नाम ।।25।।

भावार्थ :  जो कर्म परिणाम, हानि, हिंसा और सामर्थ्य को न विचारकर केवल अज्ञान से आरंभ किया जाता है, वह तामस कहा जाता है॥25॥

That action which is undertaken from delusion, without regard to the consequences of loss, injury and (one’s own) ability-that is declared to be Tamasic.

 

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

ए १, शिला कुंज, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, नयागांव,जबलपुर ४८२००८

[email protected] मो ७०००३७५७९८

 ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – ☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद # 49 ☆ लघुकथा – चिट्ठी लिखना बेटी ! ☆ डॉ. ऋचा शर्मा

डॉ. ऋचा शर्मा

(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में  अवश्य मिली है  किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं।  आप ई-अभिव्यक्ति में  प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है एक सत्य घटना पर आधारित  उनकी लघुकथा चिट्ठी लिखना बेटी ! डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को  संस्कृति एवं मानवीय दृष्टिकोण पर आधारित लघुकथा रचने के लिए सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद  # 49 ☆

☆  लघुकथा – चिट्ठी लिखना बेटी ! ☆

बहुत दिन हो गए तुम्हारी चिट्ठी  नहीं आई बेटी ! हाँ,जानती हूँ गृहस्थी में उलझ गई हो,समय नहीं मिलता होगा। गृहस्थी के छोटे –मोटे हजारों काम, बच्चे और तुम्हारी नौकरी भी,सब समझती हूँ, फोन पर तुमसे बात तो हो जाती है, पर  मन नहीं भरता। चिट्ठी आती है तो जब चाहो खोलकर इत्मीनान से पढ लो, जितनी बार पढो,  अच्छा ही लगता है। पुरानी चिट्ठियों की तो बात ही क्या, पढते समय बीता कल मानों फिर से जी उठता है। मैंने तुम्हारी सब चिट्ठियां संभालकर रखी हैं अभी तक।

तुम कह रहीं थी कि चिट्ठी  भेजे बहुत दिन हो गये? किस तारीख को भेजी थी? अच्छा दिन तो याद होगा? आठ –दस दिन हो गए?  तब तो आती ही होगी। डाक विभाग का भी कोई ठिकाना नहीं, देर – सबेर आ ही जाती हैं चिट्ठियां। बच्चों की फोटो भेजी है ना साथ में? बहुत दिन हो गए तुम्हारे बच्चे को देखे हुए। हमारे पास कब आ पाओगी – स्वर मानों उदास होता चला गया।

और ना जाने कितनी बातें, कितनी नसीहतें, माँ की चिट्ठी में हुआ करती थीं। धीरे- धीरे चिट्ठियों की जगह फोन ने ले ली। चिट्ठी में भावों में बहकर मन की सारी बातें उडेलना, जगह कम पडे तो अंतर्देशीय पत्र के कोने – कोने में छोटे अक्षरों में लिखना, उसका अलग ही सुख था। जगह कम पड जाती लेकिन मन की बातें मानों खत्म ही नहीं होती थी। लिखनेवाला भी अपनी लिखी हुई चिट्ठी को कई बार पढ लेता था, चाहे तो चुपके – चुपके रो भी लेता और फिर चिट्ठी चिपका दी जाती। फिर कुछ याद आता – ओह! अब तो चिपका दी चिट्ठी।

कितने बच्चे हैं, बेटा है? नहीं है, बेटियां ही हैं, ( माँ की याद्दाश्त खत्म होने लगी थी ) चलो कोई बात नहीं आजकल लडकी – लडके में कोई अंतर नहीं है। ये मुए लडके कौन सा सुख दे देते हैं? बीबी आई नहीं कि मुँह फेरकर चल देते हैं। तुम चिट्ठी लिखो हमें, साथ में बच्चों की फोटो भी भेजना, तुम्हारे  बच्चों को देखा ही नहीं हमने ( बार – बार वही बातें दोहराती है )।  फोन पर बात करते समय  हर बार वह यही कहती – बेटी ! फोन से दिल नहीं भरता, चिट्ठी लिखा करो।

कई बार कोशिश की, लिखने को पेन भी उठाया लेकिन कागज पर अक्षरों की जगह माँ का चेहरा उतर आता। अल्जाइमर पेशंट माँ को अपनी सुध नहीं है, सबके बीच रहकर भी वह मानों सबसे अन्जान, आँखों में सूनापन लिए जैसे कुछ तलाश रही हो। उसके हँसते –मुस्कुराते चेहरे पर अब आशंका और असुरक्षा  के भावों ने घर कर  लिया है। फोन पर अब वह मुझे नहीं पहचानती लेकिन जताती नहीं और बार –बार कहती ऐसा करो चिट्ठी  में सब बात लिख देना – कहाँ रहती हो, बच्चे क्या करते हैं? चिट्ठी  लिखना जरूर और यह कहकर फोन रख देती। मैं सोचती हूँ कि क्या वह अनुमान लगाती है कि मेरा कोई अपना है फोन पर? या चिट्ठियों से लगाव उससे यह बुलवाता है? पता नहीं —-उसके मन में क्या चल रहा है क्या पता, उसके चेहरे पर तो सिर्फ अपनों को खोजती आँखें, बेचारगी और झुंझलाहट है।

 

© डॉ. ऋचा शर्मा

अध्यक्ष – हिंदी विभाग, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर.

122/1 अ, सुखकर्ता कॉलोनी, (रेलवे ब्रिज के पास) कायनेटिक चौक, अहमदनगर (महा.) – 414005

e-mail – [email protected]  मोबाईल – 09370288414.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares