मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रंगछटा… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆

सुश्री नीला महाबळ गोडबोले

??

☆ रंगछटा… ☆ प्रस्तुती – सुश्री नीला महाबळ गोडबोले

“बाबा, किती जुनं दिसतय आपलं घर..! ! बदलून टाकायचं का? “

लेकीनं एखादा कपडा किंवा चपला बदलून टाकायच्या सहजतेनं विचारलं..

आम्हाला ते सहज पचणारं नसलं तरी तिचं वय आणि तिची पिढी विचारता घेता ते फारसं अयोग्य नव्हतं.

मधला मार्ग म्हणून आम्ही घर रंगवायचं ठरवलं..

रंगाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली.

 

लेकीनं जांभळा, पिवळा, हिरवा असे व्हायब्रंट रंग निवडले..

मी पांढरा, आकाशी, क्रीम अशा मंद रंगांना पसंती दिली..

नव-याला रंगाशी देणंघेणं नव्हतं..

“मला रंगातलं काही कळत नाही ” म्हणत तो मोकळा झाला..

त्याला फक्त काम लवकर नि चांगलं व्हायला हवं होतं..

“घर रंगवायचय की वृद्धाश्रम.. का मंदिर..? ” म्हणत लेकीनं पांढरा रंग निकालात काढला..

“संपूर्ण घराला एकच रंग लावूया म्हणजे घर मोठं दिसतं नि घराला कंटिन्युटी येते.. “

या पेंटरच्या सल्ल्यावर कशी कुणास ठाऊक पण आम्हा दोघींत एकवाक्यता झाली..

नि एक फिकटसा रंग आम्ही फायनल केला..

 

एका शुभदिनी रंगकामाला सुरुवात केली..

घरातल्या सा-या सामानानं आपापल्या जागा सोडून एखाद्या सभेला हजेरी लावावी त्याप्रमाणे दिवाणखान्यात गर्दी केली..

उड्या मारत, धडपडत, ठेचाकाळत चालावं लागू लागलं..

आमचा एककक्षीय (एका खोलीतला) संसार सुरू झाला..

 

“तुम्ही दोघी खाटेवर झोपा, मी खाली झोपतो.. ” म्हणत नव-याने जमिनीवर पथारी पसरली..

 

घरातल्या समस्त उशा, पांघरुणे, बेडशीट्स खाटेवर मुक्कामाला आल्याने आम्ही दोघी अंग चोरून कशाबशा झोपलो होतो..

मध्यरात्री लेक सरळ झाली नि तिची मला धडक बसली..

मी थेट खाली कोसळले ते नव-याच्या अंगावर..

त्याच्या किंचाळण्याने गल्ली जागी झाली..

पण वाचला बिचारा..

अडचण एवढी की मला उठता येईना.. ना त्याला..

शेवटी लेकीनं मला ओढून कसंबसं वर काढलं..

या प्रकरणाचा तिने एवढा धसका घेतला की 

“आता इंटर्नशिप करायला हवी ” म्हणत रंगकामाची पुरस्कर्ती लेक सुट्टीतही काढत्या पायाने पुण्यास रवाना झाली..! !

टुथपेस्ट सापडली तर ब्रश न सापडणं, पावडर सापडेपर्यंत कंगवा गायब होणं..

वरणभात आणि पिठलंभाकरी सोडून इतरही पदार्थ असतात, याचा विसर पडणं..

कधीही घराकडे ढंकुनही न पहाणारी पाहुणे मंडळी नेमकी या काळात टपकणं..

पेंटरबाबुंची रोजची पैशाची मागणी..

मालाच्या एस्टिमेटची पानफुटीप्रमाणे होणारी अखंड वाढ आणि पैशाचा बाहेरच्या दिशेने वाहणारा अखंड झरा…

यामुळे आम्ही दोघे नवरा-बायको रोज

“कुठून या नस्त्या फंदात पडलो.. नि सुखातला जीव दु:खात घातला.. “

या मंत्राचा अखंड जप करू लागलो..

मला तर स्वप्नंही रंगकामाची पडू लागली होती..

एखाद्या भिंतीचा रंग सगळा खराब झालाय…

असलं काहीतरी बेकार स्वप्न पडून मी ओरडत उठत असे नि झोपमोड केल्याबद्दल नव-याच्या शिव्याही खात असे..

याच काळात पेंटरमामांची आजी वारली, वडिलांना दवाखान्यात अॅडमिट करावं लागलं, त्यांचे किती दोस्त आणि शेजारी मयत झाले.. याला तर गणतीच नाही..

” आता तुम्ही स्वत: मयत व्हायच्या आधी आमचं काम पूर्ण करा.. “.

अशी आम्ही त्यांना विनंती केली..

तेंव्हा कुठे दहा दिवसात पूर्ण होणारं आमचं रंगकाम दीड महिन्यांंनी पूर्ण झालं..! !

रंगकामाचं घोडं एकदाचं गंगेत जाऊन न्हालं…!!

रोडावलेल्या बॅंकबॅलन्समुळे नव-याचं वजन चार-पाच किलोंनी घटलं असलं तरी मी मात्रं खुशीत होते..

नवीन फर्निचरचे, शोपिसेसचे बेत डोक्यात घोळत होते..

पैसे कमी झाले असले तरी उगीचच शेजारणींपेक्षा आपण श्रीमंत झाल्यासारखं वाटत होतं..

“संक्रांतीचं हळदीकुंकु करून सगळ्या शेजारणींना बोलवायचं नि त्यांना जळवायचं. “.

अशी कल्पना जेंव्हा मनात जन्मली तेंव्हा झालेला सगळा त्रास विरून गेला आणि मनमोर. नुसता थुईथुई. नाचू लागला..! !

याच आनंदात मी नवीन रंग पहायला खोल्याखोल्यांतून हिंडू लागले..

आणि लक्षात आलं की प्रत्येक खोलीतला रंग वेगवेगळा दिसतोय…

नव-याला बोलावलं..

“प्रत्येक खोलीतला रंग वेगळा दिसतोय.. बघ नां..! ! “

“सुरू झाली का तुझी किरकिर.. कितीही पैसा खर्च करा.. त्रास सहन करा.. या बाईला समाधान म्हणून नाही.. रंग वेगळा कसा दिसेल?” माझ्यावरच करवादत घालवलेले पैसे मिळवायला नवरोबा तडक निघून गेले.

“तुला प्रत्येक खोलीतले रंग वेगळे दिसतायत का बघ गं.. ” कामवाल्या सुमनला मी विचारलं..

“बाई, तुम्ही इथं लाल न्हाईतर पिवळाजर्द रंग द्यायला पायजे हुता.. आमच्या जावेच्या भैनीकडं तसलाच दिलाय.. कसला भारी दिसतुय.. तुमास्नी रंगातलं कळत न्हाई बगा..”

सुमननं नेहमीप्रमाणे ती कशी हुशार… आणि मला कसं काही कळत नाही.. हे दाखवायची नि मला डिप्रेस करायची, हिही संधी सोडली नाही..

दुपारी पुन्हा एकदा पाहणी केली..

आता तर रंग आणखी वेगळा वाटत होता..

अन् रात्री दिव्यांच्या प्रकाशात अजूनच वेगळा..

स्वयंपाकघरातला डार्क, हॉलमधला फिकट, बेडरूम्समधला थोडासा डल्…

आता मात्रं मी चक्रावून गेले.

सकाळी उठल्याबरोबर पेंटरकाकांना फोन केला..

“पैसे घेऊन जायला लगेच या.. “

पैशाच्या लालचेने पेंटरकाका दहा मिनिटांत हजर झाले..

“काका, आपण सगळीकडे एकच रंग वापरायचं ठरवलं होतं नं.. मग प्रत्येक खोलीतला रंग वेगळा कसा दिसतोय?”

पेंटरकाका थोडं गूढंसं हसले..

“ताई, रंग एकच आहे सगळीकडं..

पण प्रत्येक खोलीचा आकार वेगळा आहे. भिंतीच्या पोतात फरक आहे..

आणि मुख्य म्हणजे प्रत्येक खोलीत येणारा प्रकाश वेगवेगळा आहे..

स्वयंपाकघरात एकच खिडकी आहे.. हॉलमधे चार खिडक्या आहेत..

शिवाय स्वयंपाकघर लहान आहे.. हॉल मोठा आहे.. म्हणून हॉलमधे रंग फिकट आणि ब्राईट वाटतोय.. तर स्वयंपाकघरात डार्क..

बेडरूमच्या बाहेर झाडं आहेत.. प्रकाशच येत नाही.. म्हणून तिथला रंग डल् वाटतोय..

शिवाय खोलीतल्या फर्नीचरच्या रंगाच्या रिफ्लेक्शननं भिंतीचा रंग वेगळा दिसतो..

ताई, रंगाच्या छटा त्याच्या मुळच्या रंगावर अवलंबून असतातच पण त्यापेक्षाही इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असतात..

या सा-या गोष्टी सारख्या करा.. मग रंगही समान दिसेल..!!

अजून काही महिन्यांनी बघा.. रंग अजूनच वेगळा दिसेल..

शिवाय पहाणा-याच्या नजरेवरसुद्धा रंगाचं आकलन अवलंबून असतं..

साहेबांना नाही वेगळेपणा जाणवला..

तुम्हाला जाणवला.. कारण तुमचा जीव या भिंतीत आहे.. या घरात आहे..! !

मी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते..

त्या अशिक्षीत माणसाकडून केवढं मोठं तत्त्वज्ञान मला समजलं होतं.. रंगाच्या निमित्ताने..!!

माणसाचंही असच आहे नाही..

खरंतर प्रत्येक माणूस सारखाच…

पंचमहाभुतापासूनच बनलेला..

पण प्रत्येकाचा रंग.. म्हणजे स्वभाव, वागणूक, मन, बुद्धी, आचार, विचार किती वेगळं..

मग आपण. लावून टाकतो..

हा चांगला..

ती वाईट

ती उदार

तो कंजुष

तो दुष्ट

ती दयाळु

ती हुशार

तो मठ्ठ

तो कोरडा

ती प्रेमळ

अशी अनंत लेबलं..

 

तो माणुस जन्मत:च असा आहे, असं आपण ठरवूनच टाकतो..

आणि तो असा बनायला सभोवतालच्या कितीतरी गोष्टी जबाबदार आहेत, याचा आपल्याला विसर पडतो..

तो उद्या बदलेल.. हे मानायला आपण तयारच होत नाही..

निसर्गाकडून मिळालेलं शरीर, बुद्धी, बालपणीचे संस्कार, मिळालेलं प्रेम किंवा तिरस्कार, वाट्याला आलेली गरिबी किंवा लाभलेली श्रीमंती, लाड किंवा भोगावे लागलेले अत्याचार..

किती किती गोष्टींच्या प्रभावामुळे बनलेली अनंत छटांची अनंत व्यक्तीमत्त्वे…

काळी, पांढरी, करडी, हिरवट, पिवळी, निळी नि गुलाबी…!!

यातल्या कुणाला चांगलं म्हणत कौतुक करणं.. नि कुणाला वाईट म्हणत हेटाळण्यापेक्षा..

जाणीवेच्या शोभादर्शकातून पाहिलं तर रंगीबेरंगी नक्षीचं नयनसुख मिळेल..

नि सारं जग सप्तरंगी इंद्रधनुष्यासारखं सुरेख होऊन जाईल…!!

 

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ – देशात विदेशी??? – ☆ सुश्री अश्विनी अभ्यंकर ☆

सुश्री अश्विनी अभ्यंकर

??

☆ – देशात विदेशी??? – ☆ सुश्री अश्विनी अभ्यंकर ☆

परदेशात गेलं ना, की त्यांच्या चलनातील नाणी किंवा नोटा पटापट उलगडत नाहीत. रक्कमेची जुळवाजुळव करायला वेळ लागतो. डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतीमुळे आपल्या देशातील नागरिकांना देखील स्वतःच्या देशात हा अनुभव मिळेल, असं वाटतं. माझ्यासारखीला, जिला याची फारशी सवय नाही, तिला तर हे अजबच वाटतं.

हैदराबादमध्ये मला, याचा प्रकर्षाने अनुभव आला. पण, मला याची खात्री आहे की, देशातील सर्वच महानगरांमध्ये हेच चित्र असणार.

हैदराबादला मागच्या वेळेस गेले, तेव्हा मला झटकाच बसला होता. मी रडकुंडीला आले होते. एक टॅक्सी चालक तर म्हणाला, “पाच रुपयांचं नाणं चालत नाही इथे. महाराष्ट्रातून आल्या आहात वाटतं. मी ठाण्यात काम करत असतानाची काही नाणी माझ्याजवळ आहेत. ती तुम्हालाच देतो.” 🙉

या वेळेस मात्र, मी तयारीनिशी गेले होते. पोरीनेही मुद्दामहून फ़ोन करून आठवण करून दिली होती. सुटे पैसे घेऊन गेले होते. मनाची तयारी ही करून गेले होते कि, वरचे २-४ रुपये सोडून द्यावे लागतील. झालं ही तसंच.

पुन्हा एकदा कसोटीचा क्षण आला. एका प्रख्यात कॉफ़ीशॉपमधे मी पाच रुपयांचं नाणं पुढे केलं. काऊंटरच्या पलीकडच्या मुलीने एखादी अज्ञात वस्तू असावी तसं ते नाणं उलट सुलट करून पाहिलं. परदेशात गेल्यावर त्यांच्या नाण्यांकडे पाहताना जो कावराबावरा भाव माझ्या चेहऱ्यावर येत असावा ना, अगदी तसाच तिच्या चेहऱ्यावर होता. आधी, मनातल्या मनात मी कपाळावर हात मारला आणि मग, मला हसूच फुटलं. एक क्षण वाटलं, आपला उद्धार करून (पुन्हा) नाणं परत करेल. पण, घेतलं तिने ते. त्यावरून असा विचार आला, उद्या हिला पन्नासची नोट कोणती, शंभरची कोणती, हे पण कळेनासं होईल कदाचित.

पुण्यामुंबईकडे याचं लोण आज इतकं पसरलेलं दिसत नसलं तरी, उद्या येईलच की. हम कहाँ किसीसे कम है?

मग, कामाच्या ठिकाणी नोटांचा एक तक्ता लावायला लागेल. माझ्यासारखा एखादा ग्राहक तिकडची वाट चुकला तर आणि, माझ्याकडून नगद पैसे घ्यायची वेळ आली तर…

 © सुश्री अश्विनी अभ्यंकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मध्यरात्रीचे सूर्य…” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? इंद्रधनुष्य ?

-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मध्यरात्रीचे सूर्य…” – भाग – १  ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(भिक्षेकर्‍यांच्या पुनर्वसनासाठी वाहिलेले पहिले “प्रशिक्षण व रोजगार केंद्र”)

ज्या स्वप्नाचा गेली दहा वर्षे जीव खाऊन पाठलाग केला, जे स्वप्न पाहताना कधी झोप आलीच नाही, ज्याने गेल्या दहा वर्षात खूप रडवले, थकवले, हरवले अशा नुकत्याच साकार होऊ पाहणाऱ्या त्या स्वप्नाची हि कथा… माऊली आपल्या सर्वांसमोर सादर… कारण हे स्वप्न पाहण्याची शक्ती तुमच्याच मुळे मिळाली आहे… फक्त तुमच्यामुळे!!!

तर, आयुष्याच्या सुरुवातीला भीक मागणाऱ्या आजोबांनी मदत केली होती; त्यांच्या मदतीमधून उतराई व्हायचे, त्यांच्या उपकाराचे कर्ज डोक्यावर होते त्यातून उतराई व्हायचे, या भावनेतून, भिक्षेकर्‍यांच्या पुनर्वसनासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेतील महाराष्ट्र प्रमुख म्हणून असलेली नोकरी 2015 साली सोडून काम सुरू केले.

आमच्या या भीक मागणाऱ्या समाजाला वैद्यकीय सेवा, स्वयंरोजगार आणि पुनर्वसन तसेच भिक मागणाऱ्या मुलांचे शिक्षण असे एका मागोमाग एक अनेक प्रकल्प सुरू झाले. हे सर्व काम भीक मागणारे लोक जिथे असतात, तिथेच म्हणजे रस्त्यावर, उकिरडा किंवा गटारा जवळ, भर गर्दीतल्या फुटपाथ वर चालते.

दीडशे किलोचे साहित्य मोटर सायकल गाडीवर आणि बॉडीवर वागवताना या दहा वर्षात अनेक छोटे-मोठे एक्सीडेंट झाले. वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळी हाडे मोडून घेतली. हरकत नाही, चूल पेटवायची म्हटल्यानंतर लाकडं जाळावीच लागतात…! भिक्षेकर्‍यांच्या घरात चूल पेटावी, म्हणून मी हाडं घातली..!

तर, याचना करणाऱ्या लोकांनी स्वयंरोजगार करावा, सन्मानाने नागरिक म्हणून जगावे यासाठी त्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या मार्गांनी काम करण्यासाठी प्रवृत्त करायला सुरुवात केली. हळूहळू तुम्ही सर्वजण मला भेटत गेलात… माझा हूरूप वाढला… तुम्हीच माझे आई बाप झालात…!

माझ्या आई बापाने जन्म दिला, तुम्ही कर्म दिले!

तर, हे सर्व करत असताना लक्षात आले; की जन्मल्यापासून ते आतापर्यंत शिक्षण किंवा कोणत्याही स्किल्स भिक्षेकरी वर्गाकडे नाहीत. आणि म्हणून नोकरी, धंदा – व्यवसाय यांच्यापासून हे लोक खूप दूर आहेत. यांनी नोकरी धंदा व्यवसाय करावा म्हणून, यांना काहीतरी शिकवायचे म्हटले तर, कुठेतरी बसवून यांना काहीतरी प्रशिक्षण द्यावे लागेल याची जाणीव झाली.

यानंतर भीक मागणाऱ्या लोकांसाठी एखादे प्रशिक्षण आणि रोजगार केंद्र उभे करून तिथे व्यवसायाभिमुख स्किल्स देऊन यांना यांच्या पायावर उभे करावे हा विचार डोक्यात आला, परंतु त्यासाठी एखादी जागा ताब्यात असणं गरजेचं होतं मग सरकारी, निमसरकारी, बिगर सरकारी अशा सर्व यंत्रणांना “आम्हाला जागा देता का? जागा…?” म्हणत झोळी घेऊन फिरलो. “अनेक माणसं भिंती वाचून, छपरापासून, इतरांच्या माये वाचून, माणूस होण्याचा प्रयत्न करत, रस्त्या रस्त्यात भीक मागत आहेत… यांना माणूस बनवण्याचा प्रयत्न करत आहे… जिथून कोणी उठवणार नाही; अशी भाड्याने का होईना पण जागा देता का? जागा….?” गावकरी होण्यासाठी झटणाऱ्या, या “सम्राटांसाठी मी नट झालो… ” 

मी जिथे जायचो त्या सर्व ठिकाणी माझ्या कामाचे कौतुक व्हायचे…. परंतु जागा द्यायचा विषय आल्यानंतर, आमच्या जागेत हे गलिच्छ लोक येणार? किती घाण करतील हे लोक? असा विचार होऊन आम्हाला कायम नकार मिळत गेले. पुण्यातील अनेक बिल्डिंग मधल्या सोसायटी मधील चेअरमन साहेबांचे पाय धरून त्यांचा हॉल रीतसर भाड्याने मागितला, पण अत्यंत प्रेमाने, प्रत्येकाने ‘शेजारच्या बिल्डिंगमध्ये विचारा’, असा सल्ला दिला. शेजारच्या बिल्डिंग वाल्यांनी, त्यांच्या शेजारच्या बिल्डिंगचा रस्ता दाखवला…. आम्ही रस्त्यावरचे, शेवटी रस्त्यावरच राहीलो, यांच्यासाठी प्रशिक्षण आणि रोजगार केंद्र काढण्याचे स्वप्न दरवेळी भंगत गेले…!

ज्यांना भीक मागणे सोडायचं आहे, ज्यांना आमच्या केंद्रात काम करायचे आहे, असा वर्ग, दरवेळी मला भेटला; की विचारायचा, ‘सर मिळाली का जागा आपल्याला?’ अनेक हितचिंतक विचारायचे, ‘डॉक्टर तुम्हाला जागा मिळत नाही म्हणजे काय? समाजाचे काम करणाऱ्याला, दानशूर लोक दोन-चार एकर जागा सहज देतात… तुम्हाला चार-पाचशे स्क्वेअर फुटाची जागा मिळेना? अहो काय हे…??’ ”इतके पुरस्कार आणि सत्कार होतात, पण तुम्हाला कोणी जागा का देत नाही???’ या

सर्वांच्या प्रश्नामुळे माझ्या जखमेवर आपोआप मीठ पडायचे… डोकंच चालायचं नाही…!

खूप वेळा काम झाल्यानंतर, अंगावरचा apron काढून भिक्षेकऱ्यांमध्येच बसून मी काय करावं, कोणाशी बोलावं, कसा मार्ग काढावा? याचा डोक्याला हात लावून विचार करत असे… असा भिक्षेकऱ्यांमध्ये बसलेलो असताना, सहानुभूतीने, भिकारी समजून, माझ्या पुढ्यात भीक म्हणून खूप लोक पैसे टाकायचे… ‘धडधाकट आहे, अंगावर कपडे पण चांगले आहेत; तरी भीक मागतोय बघ कसा नालायक… ‘ अशी माझ्या माघारी, माझ्याच विषयी झालेली कुजबुज सुद्धा मी कितीतरी वेळा ऐकली. हे ऐकून, डोळ्याच्या वाटेने अश्रू ओघळायचे… प्रचंड राग यायचा… खूप वेळा वाटायचं, शासनाला किंवा इतर कोणालाच या कामाची गरज वाटत नाही… तर मला तरी ती गरज का वाटावी? मरू दे…. सोडून देतो उद्यापासून हे सर्व…! मी पूर्णतः हरून फ्रस्ट्रेट होऊन जायचो…

मी उठणार इतक्यात, मामा मामा, म्हणत चार-पाच वर्षाचं मूल मांडीवर येऊन बसतं… ‘तु का ललतो मामा, तुला भूक लागली?’ महिनाभर आंघोळ न केलेलं, काळकुट्ट एक बाळ माझ्या गालाचा मुका घेत विचारतं…. भीक मागण्यात व्यस्त असलेली त्याची आई मागून बोलते, ‘हा मामाला भूक लागली आसंल, म्हणून मामा रडतो…! ‘ 

भूक हेच आमच्या लोकांसाठी अंतिम सत्य…! भुकेच्या पलीकडे काही नाहीच…! भुकेसाठी लढायचं…. भुकेसाठी मरायचं…! जन्माला येऊन एवढं एकच करायचं…! ! ! या भुकेची शिसारी आली आहे आता मला…! “भूक”… मग ती कसलीही असो…. माणसाला वाकायलाच लावते…!

यानंतर ते बाळ त्याच्याकडे एकमेव शिल्लक असलेला वडापाव माझ्या तोंडापुढे धरतो आणि म्हणतो, ‘तू खा मामा, माजं पोट भरलंय… ‘ ज्याच्याकडे खूप काही आहे, त्याने देणं आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याने देणं… यात खूप फरक आहे. प्रश्न एकच, खरा श्रीमंत कोण??? 

आत्तापर्यंत सावकाशपणे वाहणारे अश्रू नकळतपणे मग महापूर होतात… भावनेच्या भरात, त्या नागड्या पोराला मी घट्ट मिठी मारतो… तेवढ्यातूनही तो ‘मामा मामा’ म्हणत मला घास भरवतो… माहित नाही कसा, पण तो बाळकृष्ण होतो आणि मी सुदामा होऊन जातो…!

यानंतर मला माझीच लाज वाटायला लागते… हि नागडी पोरं अशीच नागडी जगणार, मोठी होणार, भूक भूक करत नागडी आणि बेवारस म्हणूनच मरणार… स्वतःकडे काही नसताना ज्याने तुला वडापाव खाऊ घातला, त्याला तू आयुष्यभर उपाशी ठेवणार? ज्यांनी तुला मामा म्हटलं, काका म्हटलं, बाळा, सोन्या म्हणत नातू, मुलगा मानलं, ज्यांनी तुझ्याकडे आशेने डोळे लावले… त्यांना असंच रस्त्यावर बेवारस मरायला सोडून देणार? ‘सोडून देतो सर्व म्हणताना, लाज वाटत नाही का रे तुला?’ मीच हा माझा मलाच प्रश्न विचारायचो…

डोक्यात प्रचंड गदारोळ उठायचा… पण या आणि अशा प्रकारच्या अनेक प्रसंगांनी मला फ्रस्ट्रेशन मधून बाहेर काढलं, लढण्याचं सामर्थ्य दिलं. यानंतर हात वर करून शरणागती पत्करलेला मी, पुन्हा पुन्हा सज्ज व्हायचो…! हे असं…. एक नाही, दोन नाही, पाच नाही, तर तब्बल दहा वर्षे, म्हणजे आजपर्यंत सुरूच आहे. दहा वर्षे मी या गोष्टीची दाहकता भोगतो आहे…

मधल्या काळात तुम्हा सर्वांसारखाच… एक मोठ्या मनाचा… मनाची गडगंज श्रीमंती असणारा भला माणूस निसर्गाने माझ्या झोळीत टाकला. त्यांचे नाव दानिशभाई शहा! ! ‘हातात पुरस्कार आणि कपाळावर नकार’ अशा माझ्यासारख्याच्या पाठीवर त्यांनी हात ठेवला.

बिबवेवाडी परिसरात त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याच्या सोयी करता त्यांची मालकी हक्काची बिल्डिंग आहे. त्यापुढील साधारण दोन हजार स्क्वेअर फुट जागा पार्किंग साठी त्यांनी शिल्लक ठेवली होती. ही मोकळी जागा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी त्यांनी मोफत वापरण्यास आपल्याला देऊ केली आहे. त्यांनी पाठीवर ठेवलेल्या हातामुळे माझी दहा वर्षाची घुसमट एका क्षणात थांबली.

काही माणसं असे दैवी हात घेऊन जन्माला येतात आणि एखाद्याच्या आयुष्याचं भलं करून जातात… वर ‘आपण काहीच केलं नाही’ या अविर्भावात नामा निराळे होतात…!

मला या माणसाचा हेवा वाटतो…! ! ! ते फक्त जागा देऊन थांबले नाहीत, स्वतःच्या घरचं कार्य आहे असं समजून चारही बाजूंनी पत्र्याचे शेड आणि डोक्यावर छप्पर करून दिले… दरवेळी मला ते या जागेवर बोलावून विचारायचे ‘डॉक्टरसाहेब आणखी काय करूया?’ दरवेळी मी घुम्यागत त्यांच्या पायांकडे पाहत राहायचो… काही मागायला माझी जीभ उचलायची नाही…

मी बोलत नाही असे पाहून… ते इकडे तिकडे, जागेकडे पाहत, मागे हात बांधून फिरत राहायचे… फिरता फिरता स्वतःशीच बोलत राहायचे, ‘ उन्हाळ्यात उकडणार… मोठे पंखे लागतील… थंडीच्या दिवसात लवकर रात्र होते, लवकर अंधार होईल…. चांगल्या लाईट इथे लागतील… ‘ प्रत्येक वाक्यानंतर लाईट आणि पंख्यांची ऑर्डर दिली जायची.

पुढच्या वेळी असंच हात मागे बांधून फिरता फिरता मला विचारायचे, ‘डॉक्टर साहेब, तुम्ही काहीतरी बोला ना, तुम्ही काहीच बोलत नाही… ‘ 

त्यांच्या इतक्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला मी…. भिजलेल्या मांजरागत भेदरून जायचो… मी काय बोलणार? 

पुन्हा स्वगत म्हणायचे, ‘आपल्या कडे आपल्या जागेत आता रोज पाहुणे येणार, त्यांचे सामान ते कुठे ठेवणार…?’ डाव्या तळहातावर उजव्या हाताच्या बोटांनी ताल धरत, गाणं म्हणाल्यागत ते बोलत राहायचे… ‘काय करूया…? अजुन काय करूया…? काय काय करूया….???’ म्हणत पुन्हा ते कोणालातरी फोन लावायचे, यापुढे लोखंडी कपाट आणि लॉकरची ऑर्डर, सीसीटीव्हीची ऑर्डर, रेडीमेड टॉयलेट ची ऑर्डर जायची… त्यांनी तळ हातावर धरलेला तो ताल होता; की माझ्या हृदयाची धडधड… हे मात्र मला कधी समजलं नाही…!

माझ्या या लोकांना, इतर लोक भिकारी म्हणतात, मी त्यापुढे जाऊन त्यांना भिक्षेकरी किंवा याचक म्हणतो… हा देव माणूस याही पुढे जाऊन माझ्या लोकांना “पाहुणे” म्हणतो…!

भीक मागणाऱ्या समाजात मी उठतो बसतो, त्यांच्याबरोबर माझं नातं तयार झालंय, म्हणून मला त्यांच्याविषयी जिव्हाळा आणि प्रेम वाटणे स्वाभाविक आहे, पण दानिश भाईंचं काय? त्यांना या लोकांबद्दल का जिव्हाळा वाटत असावा? मी यावर खूप विचार करत असे.

पाऊस पडून गेल्यानंतर मागे एक आल्हाददायक वातावरण तयार होते… मातीतून एक सुगंध यायला लागतो… पाऊस पडून गेला तरी मागे त्या पावसाच्या पाऊलखुणा उरतात…!

दया, क्षमा, शांती, सहानुभूती, करुणा, माया, प्रेम या सर्वांचं मिश्रण असणारे अनेक महापुरुष आपल्याकडे होऊन गेले… या महापुरुषांनी आपले अवतार संपवताना आपल्या पाऊलखुणा मागे ठेवल्या…. यातलीच एक पाऊलखुण म्हणजे दानिश भाई शहा असावेत!

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वजनकाटा ठेवला झाकून… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ वजनकाटा ठेवला झाकून – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

उन्हाळ्याच्या सुरुवातीला खायची ओल्या काजूची उसळ….

चव बदलायला कधी तरी लागते मग मिसळ….

रसरशीत बिटक्या चोखताना तोंड जातंय माखून…

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..

 

कैरीची डाळ आणि झकास पन्हं थंडगार….

रात्री पण आइस्क्रीमचा मारा चाललाय फार…..

व्यायाम करायचा निश्चय केलाय सोमवार पासून…

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..

 

करवंद जांभळे कलिंगड

खावी ताव मारून….

फणसाचे गरे आणि सांदण जरा थोडी जपून…

रिचवावा पायरीचा रस आणि हापूस थोडा कापून…

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..

 

आमरस पुरीचं जेवून करतो थोडा आराम…

वजन कमी करण्यासाठी

कोणते करू मी व्यायाम…

हाताची बोटं पायांच्या बोटाला टेकतात अजून वाकून..

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..

कवी: अज्ञात

प्रस्तुती: सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “द कारगिल गर्ल” – लेखिका : सुश्री गुंजन सक्सेना – अनुवाद :सुश्री शुचिता नांदापूरकर-फडके ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “द कारगिल गर्ल” – लेखिका : सुश्री गुंजन सक्सेना – अनुवाद :सुश्री शुचिता नांदापूरकर-फडके ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक :  द कारगिल गर्ल 

लेखक : गुंजन सक्सेना 

अनुवाद : शुचिता नांदापूरकर-फडके 

मुखपृष्ठ फोटोग्राफ – लेफ्टनंट कर्नल अनुपकुमार सक्सेना आणि अगंग गुणवान, अनस्प्लॅश

मुखपृष्ठ रचना – नीरज नाथ

पृष्ठे:२१६

मूल्य : ३६०₹ 

फ्लाइट लेफ्टनंट गुंजन सक्सेना (निवृत्त) फ्लाइंग ब्रँचमध्ये कमिशन प्राप्त करणाऱ्या पहिल्या मोजक्या स्त्री अधिकाऱ्यांपैकी त्या एक असून, भारतीय स्त्रीवर पडलेला छाप पुसून टाकण्यासाठी त्यांनी नेटाने लढा दिला आहे. हेलिकॉप्टर उड्डाणासाठी निवडण्यात येणाऱ्या स्त्री अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या प्रशिक्षणसत्रासाठी त्यांची निवड होऊन त्यांना चित्ता/चेतक (ऑलवीट III) या युनिटमध्ये उधमपूर इथे पाठवण्यात आलं. फॉरवर्ड एअरकंट्रोल हे त्यांचं मुख्य काम होतं. युद्धाच्या धामधुमीत त्या हेलिकॉप्टरमधून हवाई मदत (बॅटलफिल्ड एअर स्ट्राइक – युद्धभूमीवर हवाई हल्ला) आणि निकट हवाई साह्य देत होत्या. तसंच, युद्ध करणाऱ्या विमानांना आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन करणं, हा त्यांच्या कामाचा भाग होता.

भारतीय वायुसेनेत (इंडियन एअरफोर्स) अधिकारी होण्यासाठी काय करावं लागतं, हे गुंजन यांनी या पुस्तकात अतिशय उत्तम प्रकारे समजावून सांगितलं आहे. कारगिल युद्धात क्लासिक बीएएस पद्धतीने हल्ला करण्याऐवजी, जीपीएसच्या आधारे बॉम्बहल्ला करण्याची मुख्य पद्धत अमलात आली असताना, बॉम्ब लक्ष्यावर नेमके कुठे पडत आहेत, या संदर्भात गुंजनच्या युनिटने अत्यंत महत्त्वाची माहिती पुरवली होती.

सीझफायर झाल्यानंतर १०८ स्क्वॉड्रनच्या अधिकाऱ्यांना टार्गेट भागापर्यंत नेणं, तसंच जिथे ३ आणि ८ डिव्हिजन हेडक्वार्टर्सचं काम सुरू होतं तिथे भेट देणं, ही कामगिरी गुंजनवर सोपवण्यात आली होती.

गुंजन यांना ‘द कारगिल गर्ल’ ही यथायोग्य उपाधी प्राप्त झाली. युद्धभूमीवर प्रत्यक्ष सेवा देणाऱ्या त्या भारतीय सेनेच्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या. त्यांच्यासारख्या स्त्री अधिकाऱ्यांची भारतीय वायुसेनेला आवश्यकता आहे. इतर तरुण स्त्रियांना प्रत्यक्ष युद्धात भाग घेऊन आपल्या देशाची सेवा करण्याचं स्वप्न पाहण्याची प्रेरणा अशा अधिकारी स्त्रिया नक्कीच देऊ शकतात.

“पूर्ण भरलेली ‘इन्सास’ असॉल्ट रायफल आणि एक रिव्हॉल्वर माझ्या हेलिकॉप्टरमध्ये नेहमी असे. माझं हेलिकॉप्टर जर शत्रूच्या सीमेत कोसळलं, तर मला युद्धबंदी केलं जाईल, या शक्यतेची जाणीव मला सतत होई. तरीसुद्धा, मी जे करायला हवं, ते मी करत राहिले. युद्धाचा गोंधळ तुम्हाला अति विचार करूच देत नाही.” – – गुंजन सक्सेना

सन १९९४ मध्ये वीस वर्षांची गुंजन सक्सेना म्हैसूर इथे जाणाऱ्या रेल्वेत बसली. चौथ्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (स्त्रियांकरता) पायलट कोर्सच्या निवडप्रक्रियेकरता उपस्थित राहण्यासाठी ती निघाली होती. प्रशिक्षणाचे खडतर चौऱ्याहत्तर आठवडे पार पाडल्यानंतर गुंजन सक्सेना दुन्डिगल इथल्या एअरफोर्स अॅकॅडमीतून उत्तीर्ण होऊन पायलट ऑफिसर म्हणून बाहेर पडली.

दि. ३ मे १९९९ रोजी कारगिल भागात पाकिस्तान्यांनी शिरकाव केल्याची बातमी स्थानिक धनगरांनी आणली. मे महिन्याच्या मध्यापर्यंत हजारो भारतीय तुकड्या त्या घुसखोरांना घालवून देण्याच्या उद्दिष्टाने पर्वतांवरच्या भीषण युद्धात गुंतल्या. भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन सफेद सागर’चा पुकारा केला. प्रत्येक पायलट त्यासाठी हजर होता. तोवर युद्ध सुरू असलेल्या भागात स्त्री पायलटला कधी पाठवण्यात आलं नसलं तरी वैद्यकीय स्तरावर जखमींना उचलून आणणं, रसद पुरवठा आणि इतर कामांसाठी त्यांना तैनात केलं जाई.

सक्सेनासाठी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याची हीच वेळ होती. द्रास आणि बटालिक प्रांतात लष्करी उतारू घेऊन जाणं, सुरू असलेल्या युद्धातून जखमींना उचलून आणणं, ही कामं ती करत होतीच. शत्रूच्या स्थानाबद्दल आपल्या वरिष्ठांना ती अतिशय तंतोतंत माहितीही देत होती. तिच्या एका उड्डाणादरम्यान पाकिस्तानी रॉकेट मिसाइलपासून ती अगदी काही इंचांनी वाचली होती. या सर्वांतून निडरपणे आपलं कर्तव्य पार पाडत सक्सेनाने ‘द कारगिल गर्ल’ ही उपाधी प्राप्त केली.

तिची ही प्रेरणादायक कथा तिच्याच शब्दांत…

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #272 ☆ चुनौतियाँ व प्रतिकूल परिस्थितियाँ… ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी की मानवीय जीवन पर आधारित एक विचारणीय आलेख चुनौतियाँ व प्रतिकूल परिस्थितियाँ। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 272 ☆

चुनौतियाँ व प्रतिकूल परिस्थितियाँ… ☆

‘चुनौतियाँ व प्रतिकूल परिस्थितियाँ हमें आत्म-साक्षात्कार कराने आती हैं कि हम कहाँ हैं? तूफ़ान हमारी कमज़ोरियों पर प्रहार करते हैं। फलत: हमें अपनी असल शक्ति का आभास होता है’ उपरोक्त पंक्तियाँ रोय टी बेनेट की प्रेरक पुस्तक ‘दी लाइट इन दी हार्ट’ से उद्धृत है। जीवन में चुनौतियाँ हमें अपनी सुप्त शक्तियों से अवगत कराती हैं कि हम में कितना साहस व उत्साह संचित है? हम उस स्थिति में प्रतिकूल परिस्थितियों का सामना करने में कितने सक्षम हैं? जब हमारी कश्ती तूफ़ान में फंस जाती व हिचकोले खाती है; वह हमें भंवर से मुक्ति पाने की राह भी दर्शाती है। वास्तव में भीषण आपदाओं के समय हम वे सब कर गुज़रते हैं, जिसकी हमने कल्पना भी नहीं की होती।

सो! चुनौतियाँ, प्रतिकूल परिस्थितियाँ, तूफ़ान व सुनामी की विपरीत व गगनचुंबी लहरें हमें अपनी अंतर्निहित शक्तियों प्रबल इच्छा-शक्ति, दृढ़-संकल्प व आत्मविश्वास का एहसास दिलाती हैं; जो सहसा प्रकट होकर हमें उस परिस्थिति व मन:स्थिति से मुक्त कराने में रामबाण सिद्ध होती हैं। परिणामतः हमारी डूबती नैया साहिल तक पहुंच जाती है। इस प्रकार चिंता नहीं, सतर्कता इसका समाधान है। नकारात्मक सोच हमारे मन में भय व शंका का भाव उत्पन्न करती है, जो तनाव व अवसाद की जनक है। यह हमें हतोत्साहित कर नाउम्मीद करती है, जिससे हमारी सकारात्मक ऊर्जा नष्ट हो जाती है और हम अपनी मंज़िल पर नहीं पहुंच सकते।

दक्षिण अफ्रीका के पूर्व राष्ट्रपति नेल्सन मंडेला के अनुसार ‘हिम्मतवाला वह नहीं होता, जिसे डर नहीं लगता, बल्कि वह है; जिसने डर को जीत लिया है। सो! भय, डर व शंकाओं से मुक्त प्राणी ही वास्तव में वीर है; साहसी है, क्योंकि वह भय पर विजय प्राप्त कर लेता है।’ इस संदर्भ में सोहनलाल द्विवेदी जी की यह पंक्तियां सटीक भासती हैं ‘लहरों से डर कर नौका पार नहीं होती/ कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।’ यदि मानव अपनी नौका को सागर के गहरे जल में नहीं उतारेगा तो वह साहिल तक कैसे पहुंच पायेगा? मुझे स्मरण हो रही हैं वैज्ञानिक मेरी क्यूरी की वे पंक्तियां ‘जीवन देखने के लिए नहीं; समझने के लिए है। सकारात्मक संकल्प से ही हम मुश्किलों से बाहर निकल सकते हैं’– अद्भुत् व प्रेरक है कि हमें प्रतिकूल परिस्थितियों व चुनौतियों से डरने की आवश्यकता नहीं है; उन्हें समझने की दरक़ार है। यदि हम उन्हें समझ लेंगे तथा उनका विश्लेषण करेंगे तो हम उन आपदाओं पर विजय अवश्य प्राप्त कर लेंगे। सकारात्मक सोच व दृढ़-संकल्प से हम पथ-विचलित नहीं हो सकते और मुश्किलों से आसानी से बाहर निकल सकते हैं। यदि हम उन्हें समझ कर, सूझबूझ से उनका सांगोपांग विश्लेशण करेंगे; हम उन भीषण आपदाओं पर विजय प्राप्त कर सकेंगे।

यदि हमारे अंतर्मन में सकारात्मकता व दृढ़-संकल्प निहित है तो हम विषम परिस्थितियों में भी विचलित नहीं हो सकते। इसके लिए आवश्यकता है सुसंस्कारों की, घर-परिवार की, स्वस्थ रिश्तों की, स्नेह-सौहार्द की, समन्वय व सामंजस्य की और यही जीवन का मूलाधार है। समाजसेवी नवीन गुलिया के मतानुसार ‘सागर की हवाएं एवं संसार का कालचक्र हमारी इच्छानुसार नहीं चलते, किंतु अपने समुद्री जहाज रूपी जीवन के पलों का बहती हवा के अनुसार उचित उपयोग करके हम जीवन में सदैव अपनी इच्छित दिशा की ओर बढ़ सकते हैं।’ नियति का लिखा अटल होता है; उसे कोई नहीं टाल सकता और हवाओं के रुख को बदलना भी असंभव है। परंतु हम बहती हवा के झोंकों के अनुसार कार्य करके अपना मनचाहा प्राप्त कर सकते हैं। सो! हमें पारस्परिक फ़ासलों व मन-मुटाव को बढ़ने नहीं देना चाहिए। परिवार व दोस्त हमारे मार्गदर्शक ही नहीं; सहायक व प्रेरक के दायित्व का वहन करते हैं। परिवार वटवृक्ष है। यदि परिवार साथ है तो हम विषम परिस्थितियों का सामना कर सकते हैं। इसलिए उसका मज़बूत होना आवश्यक है। समाजशास्त्री कुमार सुरेश के अनुसार ‘परिवार हमारे मनोबल को बढ़ाता है; हर संकट का सामना करने की शक्ति प्रदान करता है; हमारे विश्वास व सामर्थ्य को कभी डिगने नहीं देता।’ जीवन शैली विशेषज्ञ रचना खन्ना सिंह कहती हैं कि ‘परिवार को मज़बूत बनाने के लिए हमें पारस्परिक मतभेदों को भूलना होगा; सकारात्मक चीज़ों पर फोक़स करना होगा तथा नकारात्मक बातों से दूर रहने का प्रयास करना होगा। यदि हम संबंधों को महत्व देंगे तो हमारा हर पल ख़ुशनुमा होगा। यदि बाहर युद्ध का वातावरण है, तनाव है और उन परिस्थितियों में नाव डूब रही है, तो सभी को परिवार की जीवन-रक्षक जैकेट पहनकर एक साथ बाहर निकालना होगा।’ पद्मश्री निवेदिता सिंह के विचार इस तथ्य पर प्रकाश डालते हैं कि संकल्प के साथ प्रार्थना करें ताकि वातावरण में सकारात्मक तरंगें आती रहें, क्योंकि इससे माहौल में नकारात्मकता के स्थान पर सकारात्मक ऊर्जा प्रवेश पाती है और सभी दु:खों का स्वत: निवारण हो जाता है।

जीवन में यदि हम आसन्न तूफ़ानों के लिए पहले से सचेत रहते हैं; तो हम शांत, सुखी व सुरक्षित जीवन जी पाते हैं। स्वामी विवेकानंद जी के शब्दों में ‘यदि तुम ख़ुद को कमज़ोर समझते हो तो कमज़ोर हो जाओगे। यदि ख़ुद को ताकतवर सोचते हो, ताकतवर हो जाओगे।’ सो हमारी सोच ही हमारे भाग्य को निधारित करती है। परंतु इसके लिए हमें वक्त की कीमत को पहचानना आवश्यक है। योगवशिष्ठ के अनुसार ‘संसार की कोई ऐसी वस्तु नहीं है, जिसे सत्कर्म एवं शुद्ध पुरुषार्थ द्वारा प्राप्त नहीं किया जा सकता।’

हमारा मस्तिष्क बचपन से ही चुनौतियों को समस्याएं मानना प्रारंभ करने लग जाता है और बड़े होने तक वे अवचेतन मन में इस प्रकार घर कर जाती हैं कि हम यह विचार ही नहीं कर पाते कि ‘यदि समस्याओं का अस्तित्व न होगा तो हमारी प्रगति कैसे संभव होगी? उस स्थिति में आय के स्रोत भी नहीं बढ़ेंगे।’ परंतु समस्या के साथ उसके समाधान भी जन्म ले चुके होते हैं। यदि सतही तौर पर सूझबूझ से समस्याओं से उलझा जाए; उन्हें सुलझाने से न केवल आनंद प्राप्त होगा, बल्कि गहन अनुभव भी प्राप्त होगा। नैपोलियन बोनापार्ट के शब्दों में ‘समस्याएं भय व डर से उत्पन्न होती हैं। यदि डर का स्थान विश्वास ले ले; तो वही समस्याएं अवसर बन जाती हैं। वे स्वयं समस्याओं का सामना विश्वास के साथ करते थे और उन्हें अवसर में बदल डालते थे। यदि कोई उनके सम्मुख समस्या का ज़िक्र करता था तो वे उसे बधाई देते हुए कहते थे कि आपके पास समस्या है; तो बड़ा अवसर आ पहुंचा है। अब इस अवसर को हाथों-हाथ लो और समस्या की कालिमा में सुनहरी लीक खींच दो।’ समस्या का हल हो जाने के पश्चात् व्यक्ति को मानसिक शांति, अर्थ व उपहार की प्राप्ति होती है और समस्या से भय समाप्त हो जाता है। वास्तव में ऐसा उपहार अर्थ व अवसर हैं, जो मानव की उन्नति में सहायक सिद्ध होते हैं।

चुनौतियाँ व प्रतिकूल परिस्थितियाँ हमें कमज़ोर बनाने नहीं; हमारा मनोबल बढ़ाने व सुप्त शक्तियों को जाग्रत करने को आती हैं। सो! उनका सहर्ष स्वागत-सत्कार करो; उनसे डर कर घबराओ नहीं, बल्कि उन्हें अवसर में बदल डालो और  डटकर सामना करो। इस संदर्भ में मदन मोहन मालवीय जी का यह कथन द्रष्टव्य है–’जब तक असफलता बिल्कुल छाती पर सवार न हो बैठे; दम न घोंट डाले; असफलता को स्वीकार मत करो।’ अरस्तु के शब्दों में ‘श्रेष्ठ व्यक्ति वही बन सकता है, जो दु:ख और चुनौतियों को ईश्वर की आज्ञा स्वीकार कर आगे बढ़ता है।’ जॉर्ज बर्नार्ड शॉ का मत भी कुछ इसी प्रकार का है कि ‘यदि आप इस प्रतीक्षा में रहे कि लोग आकर आपकी मदद करेंगे, तो सदैव प्रतीक्षा करते रह जाओगे।’ भगवद्गीता में ‘कोई भी दु:ख संसार में इतना बड़ा नहीं है, जिसका कोई उपाय नहीं है।’  यदि मनुष्य जल्दी से पराजय स्वीकार न करके अपनी ओर से प्रयत्न करे, तो वह दु:खों पर आसानी से विजय प्राप्त कर सकता है। जब मन कमज़ोर होता है, परिस्थितियाँ समस्याएं बन जाती हैं; जब मन स्थिर होता है, चुनौती बन जाती हैं और जब मन मज़बूत होता है; वे अवसर बन जाती हैं। ‘हालात सिखाते हैं बातें सुनना/ वरना हर शख़्स फ़ितरत से/ बादशाह होता है।’ इन्हीं शब्दों के साथ अपनी लेखनी को विराम देती हूं।

●●●●

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ पुरस्कृत लघुकथा – पाप… ☆ श्री हरभगवान चावला ☆

श्री हरभगवान चावला

(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री हरभगवान चावला जी की अब तक पांच कविता संग्रह प्रकाशित। कई स्तरीय पत्र पत्रिकाओं  में रचनाएँ प्रकाशित। कथादेश द्वारा  लघुकथा एवं कहानी के लिए पुरस्कृत । हरियाणा साहित्य अकादमी द्वारा श्रेष्ठ कृति सम्मान। प्राचार्य पद से सेवानिवृत्ति के पश्चात स्वतंत्र लेखन।) 

आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा – पाप)

☆ पुरस्कृत लघुकथा – पाप… ☆ श्री हरभगवान चावला ☆

(कथादेश अखिल भारतीय लघुकथा प्रतियोगिता-2024 में प्रथम पुरस्कार प्राप्त लघुकथा)

कन्या पैदा हुई। घर के सब लोग एकदम ख़ामोश थे। कन्या के गले में तम्बाकू रख दिया गया, कन्या हिचकी भी नहीं ले पाई। दो मर्दों ने, जिनमें से एक कन्या का पिता था, गड्ढा खोदा और निरासक्त भाव से उसे धरती के अँधेरे में पहुँचा दिया। दफ़न के वक्त कन्या के पिता ने कन्या से कहा, “जा, जहाँ से आई थी, आगे अब भैया को भेजना।”

कन्या का पिता कन्या को दफ़न करने और पुजारी जी को सीधा पहुँचाने के बाद कन्या की माँ के पास आ बैठा। वह रो रही थी। कन्या के पिता ने कहा, “रोती क्यों हो? वंश तो बेटे से ही चलेगा न!”

“हमारा अंश थी वह! दुनिया मे आई और आँख खोलने से पहले चली भी गई। भारी पाप लगेगा हमें।”

“पाप क्यों लगेगा, हमने कौन सी गऊ हत्या की है?

©  हरभगवान चावला

सम्पर्क – 406, सेक्टर-20, हुडा,  सिरसा- 125055 (हरियाणा) फोन : 9354545440

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – सैडिस्ट ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – सैडिस्ट ? ?

रास्ते का वह जिन्न,

भीड़ की राह रोकता

परेशानी का सबब बनता,

शिकार पैर पटकता,

बाल नोंचता,

जिन्न को सुकून मिलता,

जिन्न हँसता..,

पुराने लोग कहते हैं-

साया जिस पर पड़ता है

लम्बा असर छोड़ता है..,

 

रास्ता अब वीरान हो चुका,

इंतज़ार करते-करते

जिन्न बौरा चुका,

पगला चुका,

सुना है-

अपने बाल नोंचता है,

सर पटकता है,

अब भीड़ को सकून मिलता है..,

झुंड अब हँसता है,

पुराने लोग सच कहते थे-

साया जिस पर पड़ता है

लम्बा असर छोड़ता है..।

?

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 12 अप्रैल 2025 से 19 मई 2025 तक श्री महावीर साधना सम्पन्न होगी 💥  

🕉️ प्रतिदिन हनुमान चालीसा एवं संकटमोचन हनुमन्नाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें, आत्मपरिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – संस्मरण ☆ दस्तावेज़ # 24 – खजुराहो नृत्य उत्सव/KHAJURAHO DANCE FESTIVAL – ☆ श्री जगत सिंह बिष्ट ☆

श्री जगत सिंह बिष्ट

(Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker.)

(ई-अभिव्यक्ति के “दस्तावेज़” श्रृंखला के माध्यम से पुरानी अमूल्य और ऐतिहासिक यादें सहेजने का प्रयास है। श्री जगत सिंह बिष्ट जी (Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker) के शब्दों में  “वर्तमान तो किसी न किसी रूप में इंटरनेट पर दर्ज हो रहा है। लेकिन कुछ पहले की बातें, माता पिता, दादा दादी, नाना नानी, उनके जीवनकाल से जुड़ी बातें धीमे धीमे लुप्त और विस्मृत होती जा रही हैं। इनका दस्तावेज़ समय रहते तैयार करने का दायित्व हमारा है। हमारी पीढ़ी यह कर सकती है। फिर किसी को कुछ पता नहीं होगा। सब कुछ भूल जाएंगे।”

दस्तावेज़ में ऐसी ऐतिहासिक दास्तानों को स्थान देने में आप सभी का सहयोग अपेक्षित है। इस शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है श्री जगत सिंह बिष्ट जी का एक ऐतिहासिक दस्तावेज़ खजुराहो नृत्य उत्सव/KHAJURAHO DANCE FESTIVAL।) 

☆  दस्तावेज़ # 24 – खजुराहो नृत्य उत्सव ☆ श्री जगत सिंह बिष्ट ☆ 

कुछ स्मृतियाँ ओस की बूंदों की तरह होती हैं — चुपचाप मन के किसी कोने में झिलमिलाती रहती हैं, जब समय बहुत दूर निकल चुका होता है। वर्ष था 1986। मेरी पदस्थी पन्ना में थी — वह नगर जो अपने हीरों के लिए प्रसिद्ध है, जहां लोग पूरी ज़िंदगी बिता देते हैं धरती के नीचे कुछ चमकते कणों की तलाश में, पर जिनके हिस्से वह आता है, वे वाक़ई किस्मत वाले होते हैं। लेकिन उस वसंत ऋतु में, मेरी पत्नी और मैंने एक अलग ही किस्म का हीरा खोजा — जो न मिट्टी में था, न आकाश में, बल्कि खजुराहो की खुली हवा, मंदिरों की पृष्ठभूमि और नृत्य की थापों में दमक रहा था।

हम दोपहिया वाहन पर निकले थे — पन्ना से खजुराहो की ओर, हवा हमारे चेहरे को सहला रही थी और मन में एक अजीब सी उत्सुकता थी। रास्ते में मड़ला में — जो आज पन्ना नेशनल पार्क का प्रवेश द्वार है — एक ढाबे पर रुके। ढाबे के मालिक ने चाय परोसी और बड़ी नम्रता से बताया कि इलाके में एक बाघ घूम रहा है, और इस रास्ते पर दोपहिया वाहन से जाना सुरक्षित नहीं है। हम मुस्कुरा दिए — थोड़े चिंतित, पर ज्यादा रोमांचित। जैसे जंगल ने हमारी यात्रा को एक रहस्यमयी प्रस्तावना दे दी हो।

खजुराहो — मध्य प्रदेश के छतरपुर ज़िले का वह नगर, जहां पत्थर भी कविताएं कहते हैं। हिंदू और जैन मंदिरों का यह समूह, जो अब विश्व धरोहर घोषित हो चुका है, उस वर्ष पहली बार यूनेस्को की सूची में शामिल हुआ था। और उसी वर्ष मार्च में, इन मंदिरों की गोद में आयोजित खजुराहो नृत्य महोत्सव का आंनद लेने हम पहुंचे। यह एक ऐसा उत्सव था जहां दुनिया भर के शास्त्रीय नृत्यकला के साधक इकट्ठा हुए थे।

यह मेरे सहकर्मी राम विलास कटारे की कृपा थी, जो उस समय खजुराहो में ही पदस्थ थे, कि हमें वहां तीन दिन रुकने और महोत्सव में भाग लेने का सौभाग्य मिला। राम विलास ने बाद में बैंक की नौकरी छोड़कर ग्वालियर में उद्योग की दुनिया में अपनी पहचान बनाई, लेकिन उन दिनों हम सब बस कला प्रेमी थे — मंच के सामने बैठे, मंत्रमुग्ध दर्शक।

महोत्सव की प्रथम संध्या में मंच पर थीं — संजुक्ता पाणिग्रही। ओडिसी नृत्य की यह नृत्यांगना अपने संगीतकार पति के साथ मंच पर आईं। उनकी प्रस्तुति जादुई थी — नृत्य और अभिनय का ऐसा संगम कि हर भाव, हर मुद्रा, हर अभिनय एक प्रार्थना लगने लगे। गीत गोविंद की भक्ति से लेकर सूरदास की पदावली, तुलसी के चौपाई, विद्यापति की सौंदर्यरस और रवीन्द्रनाथ ठाकुर की सूक्ष्मता — सब कुछ जैसे सजीव हो उठा। संजुक्ता जी की भंगिमा में कहीं लोकनाट्य ‘जात्रा’ की झलक थी, तो कहीं आत्मा की पुकार।

दूसरे दिन सुबह दूरदर्शन की टीम ने मंदिर परिसर में पिछली रात की प्रस्तुति का पुनः फिल्मांकन किया। संजुक्ता जी का साक्षात्कार लिया गया, जिसमें साधना श्रीवास्तव ने ओडिसी नृत्य के भाव और सौंदर्य को सुलझे हुए प्रश्नों से उद्घाटित किया। हम सौभाग्यशाली थे कि इतने निकट से इस अनुभव के साक्षी बन पाए।

दोपहर को होटल चंदेला में भोजन का आयोजन था। वहां परोसे गए व्यंजनों की सुगंध — मसालों की वह गंध — आज भी स्मृति में बसी हुई है। स्वाद, जो सिर्फ जीभ पर नहीं, मन में बस गया।

दूसरे दिन शाम को आधुनिक नृत्य की एक नई लहर देखने को मिली — प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना चंद्रलेखा द्वारा निर्देशित ‘नवग्रह’। भरतनाट्यम, कलारिपयट्टु और योग की त्रिवेणी से रचा गया यह प्रदर्शन केवल दृश्य नहीं, विचार का भी अनुभव था। उन्होंने नृत्य की एक नई भाषा रची — ऐसी जो परंपरा में जड़ें रखते हुए भी समकालीनता की बात करती थी।

तीसरी संध्या — मलविका सरुक्कई का भरतनाट्यम प्रदर्शन। उन्होंने प्रस्तुत किया ‘रास’ — वह क्षण जब गोपियाँ कृष्ण की बांसुरी सुनकर अपने भीतर की खोज में निकलती हैं। यह यात्रा केवल भौगोलिक नहीं, आत्मिक थी। एक नई अनुभूति की तलाश। मलविका की प्रस्तुति में वह झलक थी — वह क्षणिक जादू — जिसे पकड़ना कठिन है, पर महसूस करना सरल।

इन तीन दिनों ने हमें केवल नृत्य नहीं, जीवन का दर्शन दिया। मंदिरों की छाया, चांदनी की आभा, नूपुरों की झंकार, और कलाकारों की साधना — सब कुछ मिलकर एक ऐसी ऊर्जा बना रहे थे जो मन को स्थिर और आत्मा को उद्दीप्त कर देती थी।

नौकरी की दुनिया में जब जीवन यांत्रिक हो उठता है, तब कला वह खिड़की बनती है जिससे रोशनी भीतर आती है। नृत्य, संगीत, साहित्य, रंगमंच — इन सबका सान्निध्य मेरे जीवन की निधि रहा है। वे क्षण जब कलाकार और दर्शक दोनों एक ऊर्जा में विलीन हो जाते हैं — वे पल जैसे आकाश में उगे तारे — दुर्लभ, दिव्य और अमर।

खजुराहो नृत्य महोत्सव उन्हीं दिव्य पलों का संधान है। एक संवाद — नर्तक और देवता के बीच। और आज भी, जब आँखें मूंदता हूँ, तो वह स्वर, वह छवि, वह रस — सब लौट आता है। वह अनुभव, जिसमें कलाकार अपने अस्तित्व से परे जाकर उन तारों की छाया में नृत्य करता है — और उसी में विलीन हो जाता है।

♥♥♥♥

☆ KHAJURAHO DANCE FESTIVAL ☆

Some memories, like dew on a lotus petal, glisten quietly in the heart long after time has moved on. The year was 1986. I was posted in Panna, a quiet town known for its diamond mines where people spend lifetimes in pursuit of something that gleams only for the chosen few. But that spring, my wife and I discovered a different kind of gem — one that shimmered not beneath the earth but under the open skies of Khajuraho, set against the sacred silhouettes of temples and the rhythm of anklets on stone.

We had set out one breezy afternoon, the wind brushing against our faces as our two-wheeler cruised through the ghat section between Panna and Khajuraho. Somewhere near Madla — now the gateway to the Panna National Park — we halted at a modest roadside dhaba. The dhaba owner, a wiry old man with kindness in his eyes, poured us steaming cups of tea and cautioned us in hushed tones: a tiger was said to be prowling nearby. We smiled nervously, half-amused, half-intrigued — the wilderness lending a thrilling prelude to what lay ahead.

Khajuraho, in the Chhatarpur district of Madhya Pradesh, is a town where stone whispers stories — of gods and mortals, of yearning and transcendence. In March that year, it became the stage for the Khajuraho Dance Festival, where artists from across India gathered to breathe life into ancient dance forms under the timeless gaze of sculpted deities. The festival coincided with a significant moment in history: the temples had just been inscribed on the UNESCO World Heritage list, a fitting honour for the marvels that would form the sacred backdrop to the celebration of classical Indian dance.

It was thanks to my affable colleague Ram Vilas Katare, then posted at Khajuraho, that we were able to attend. He arranged our stay and ensured we had the best seats for the opening performances. Ram Vilas would later go on to leave banking and find his fortune in industry, but that evening, we sat side by side as mere rasiks — lovers of art — in quiet reverence.

The festival began with a performance that remains etched in golden memory — Sanjukta Panigrahi, the reigning queen of Odissi, took the stage. With her was her musician husband, who carried the music like a prayer. Sanjukta’s dance was a revelation — a confluence of nritta and abhinaya, where each movement became an invocation, each expression a verse. From Jayadeva’s Gita Govinda to Surdas’s padavali, from the rustic poetry of Vidyapati to the soulfulness of Tagore, she traversed the spiritual spectrum with grace that was almost otherworldly. The effect was so powerful that even the intricate carvings behind her seemed to pause and listen.

Doordarshan was there too, recording the performances. The next morning, we found ourselves privileged spectators at the temple complex where the shoot continued. The gracious Sadhna Shrivastava interviewed Sanjukta Panigrahi, her questions drawing out the essence of Odissi, while we watched the unfolding of art at close quarters. It felt less like an interview and more like a satsang — a sacred communion.

The afternoons were gentle, the sun warm, the heart warmer. We lunched at Hotel Chandela, where the grilled delicacies teased the senses. Even today, the memory of those spices — smoky, tangy, aromatic — is enough to make the mouth water.

Day two brought with it the bold strokes of modernity — a performance by the inimitable Chandralekha. Her Navagraha was unlike anything we had seen. Using Bharatanatyam, Kalaripayattu and Yoga, she gave us a new vocabulary of movement. It was not merely a dance; it was an introspective journey, a cosmic choreography that expanded the definition of tradition.

The final evening of our stay introduced us to Malavika Sarukkai and her sublime Bharatanatyam recital. Her piece, Raas, was a poetic meditation — the gopis enchanted by Krishna’s flute, venturing into the unknown woods and, in the process, awakening to their own divine selves. There was a certain hush in the air as she danced, a silence not of absence but of awe. In that moment, it felt as though time itself had stepped aside to watch.

These three days in Khajuraho gave us not just performances, but moments of transcendence. As the temple stones glowed in the evening light and the air reverberated with the taal and the thumri, it became clear — this was no ordinary festival. It was sadhana in motion, a spiritual offering wrapped in rhythm, gesture and song.

Over the years, I have been fortunate to meet and witness the brilliance of many great artists — from literature to theatre, from painting to sculpture. In the humdrum of a job, it is these windows into beauty that give breath to the soul. The arts, for me, have been more than pastimes. They are life’s quiet conversations with the sublime, a nourishment of the spirit.

The Khajuraho Dance Festival was, and remains, one such conversation — a dialogue between the eternal and the ephemeral, between the dancer and the divine. And sometimes, when I close my eyes, I can still hear the tinkle of anklets, still see the moonlight casting shadows on the sandstone, still feel that inexplicable joy of watching an artist step into the starlight — and become one with it.

♥♥♥♥

© Jagat Singh Bisht 

Laughter Yoga Master Trainer

LifeSkills

A Pathway to Authentic Happiness, Well-Being & A Fulfilling Life! We teach skills to lead a healthy, happy and meaningful life.

The Science of Happiness (Positive Psychology), Meditation, Yoga, Spirituality and Laughter Yoga. We conduct talks, seminars, workshops, retreats and training.

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – पुस्तक चर्चा ☆ पत्थर पर बुवाई – लेखक – श्री विजय सिंह चौहान ☆ समीक्षक – सुश्री शशि पुरवार ☆

सुश्री शशि पुरवार

(सुश्री शशि पुरवार जी का ई-अभिव्यक्ति में स्वागत। आप 100 Women Achievers of India की सूची में शामिल हैं। आप स्वतंत्र लेखन, स्तंभकार, व्यंग्यकार, कहानीकार, गीतकार एवं संपादन कार्य संपादित कर रहीं हैं। साथ ही दिल्ली प्रेस पत्रिका के लिए लेखन कार्य भी कर रहीं हैं। आज प्रस्तुत है आपके द्वारा श्री विजय सिंह चौहान जी के लघु कथा संग्रह ‘पत्थर पर बुवाई’ की समीक्षा।)

? पुस्तक चर्चा –  पत्थर पर बुवाई – लेखक – श्री विजय सिंह चौहान  ? समीक्षक – सुश्री शशि पुरवार ?

पुस्तक  – पत्थर पर बुवाई

लेखक – श्री विजय सिंह चौहान

प्रकाशक –  शिवना प्रकाशन 

पृष्ठ १३२   

मूल्य १७५  रु

समीक्षक – सुश्री शशि पुरवार

विजय सिंह चौहान का लघुकथा संग्रह  पत्थर पर बुवाई शीर्षक से ही आकर्षित करता है। पत्थरों की बुवाई करके समाज की कई संवेदनाओं और कुरीतियों  पर उन्होंने अपनी क़लम चलाने का बेहतरीन प्रयास किया है।

लघुकथा कम शब्दों में तीव्र प्रहार कर अपनी बात पाठकों तक पहुँचाने में सक्षम होती है। विजय सिंह की लघु कथाएँ उनके मानक मैं फ़िट बैठती है। फिर भी कहीं कहीं लघु कथाएं परिमार्जन चाहती है ।

कुछ लघु कथाओं में स्त्री विमर्श के तीव्र स्वर भी नज़र आते हैं।  वर्तमान परिपेक्ष में लिव इन संबंधों से जन्मी वेदना अनगिनत प्रश्न पीछे छोड़ देती है। स्त्री  पुरुष समागम से उत्पन्न परिस्थिति में सिर्फ़ इस स्त्री को ही मानसिक भावनात्मक और ज़िम्मेदारियों से जूझना पड़ता है यह समाज की कुरीति  पर एक  करारा तमाचा है। आख़िर स्त्री की क्यों छली जाती है।  पुरुष आत्मसंतुष्टि के बाद हर बंधन से आज़ाद हो जाता है और पीछे छूट जाती है उसके द्वारा दी गई जिम्मेदारियां।  कृत्य करने में स्वीकृति पुरुष की भी होती हैं लेकिन उसका फल अकेली स्त्री ही ढोती है। स्त्री स्वाभिमान , स्त्री अस्मिता के स्वर वेदना को पाठकों तक पहुँचाने में वे सक्षम रहे हैं।

बड़ी रोटी के माध्यम से संयुक्त परिवार के महत्व को बताया गया है। उसकी यादें ताजा हो जाती है  जो वर्तमान परिपेक्ष में अस्तित्वहीन हो  गया है। कई लघु कथाएं टूटी पगडंडी, तपता बदन, कटी बाज़ू ,गृहस्वामिनी, ब्लू टिक , निर्जला, बाँझ , शकुन , मौन प्रश्न, अनगिनत संवेदनाओं को व्यक्त करने में सफल रहे हैं। कथ्य अपने पीछे प्रश्न छोड़ ते है। मुहर में सार्थक संदेश है आज के समय में हो रही बर्बादी के लिए चेतना की आवश्यकता है।

मेरे ख्याल से लघुकथा और वन लाइनर दोनों अलग है उसे इस विधा में शामिल नहीं करना चाहिए हालाँकि विजय जी अपने नपे तुले शब्दों में समाज की वास्तविकता को उकेरने में सक्षम है। लेकिन कभी कभी पंक्तियां अपनी पूर्णता चाहती है। गद्य हो  या पद्य उसकी रवानगी पाठकों को जोड़ती है शब्दों का अकारण आना बिम्बो को उकेरना कभी कभी कथ्य में स्पीड ब्रेकर का काम करता है।

मुहावरों का प्रयोग करने का अच्छा प्रयास है लेकिन कहीं कहीं वे अनावश्यक प्रतीत हुए।

कुछ लघुकथाओं में शब्दों व शीर्षक का दुहराव हुआ है ।  इस तरह के शब्दों पर ध्यान देने की आवश्यकता है।

निर्जला, सुगंधित पुष्प दोनों ही एक ही तथ्य हैं लेकिन अलग शीर्षक के नाम से लिखी गई है हालाँकि इसकी संवेदना  सकारात्मक संदेश देती है। कई लघु कथाओं में व्यंग्य का तड़का भी है जो आज के राजनीतिक माहौल की पोल खोलता है।

तपता बदन  वर्तमान परिपेक्ष में विवशता का आइना है।उसी तरह मालकिन और स्वामी दोनों के कथ्य समान है किन्तु आवरण अलग। सहभागिता मित्रों के रिश्ते में पड़ी अवांछित सच्चई को बयां करती है।  लघुकथा का सुन्दर संग्रह है।

इस बात को इंगित करना चाहूंगी कि बिम्बो में कहना अच्छी बात है  लेकिन कई बार अकारण जन्मे बिम्ब या शब्द किरकिरी का काम भी करते है। कई बार ऐसे वास्तविक परिपेक्ष से भिन्न नजर आते हैं। इस तरह की शब्द की रवानगी में अकारण  बाधा उत्पन्न करते हैं। भाषा का सौंदर्य और उसके अलंकार  ही  किसी भी प्रस्तुति में चार चाँद लगाते हैं लेकिन भाषा की अशुद्धियां उसके सौंदर्य को कम करती  हैं।

कुछ शब्दों का कई लघु कथाओं में कई बार प्रयोग हुआ है जैसे खारापन, यह दोहराव कहीं कहीं पैबंद सा प्रतीत हुआ है।  उसकी आवश्यकता नहीं थी।इसी तरह  बात का हल लहलहाने लगा , भूख से लथपथपत्र की सिलवटें, सिलवटों का समंदर ,  इसमें विरोधाभास है इस तरह के शब्दों का प्रयोग करने से बचना चाहिए क्योंकि सिलवटों का समुन्दर नहीं होता है। भाषा अलंकार की त्रुटियों से  पठनीय गेयता में बिखराव नज़र आता है।  लेखक को टंकण त्रुटि  और उसके प्रस्तुतिकरण पर ध्यान देना चाहिए।

पत्थर पर बुवाई लघुकथा संग्रह वाक़ई में समाज की कुरीतियों पर जड़ से उखाड़ने में बुवाई का काम करेगा।सभी लघुकथाएं अपना संदेश देने में सफल रही है।विजय जी अधिवक्ता भी है।  उसकी छाप उनके लेखन में भी नजर आती है। यह संग्रह पाठको को जरूर पसंद आएगा। विजय सिंह चौहान को पत्थर पर बुवाई के लिए बहुत बहुत शुभकामनाएं।  आपकी कलम यूँ ही अनवरत चलती रहे।   नए संग्रह के लिए बहुत बहुत बधाई।

शुभकामनाओं सहित

♥ ♥ ♥ ♥ ♥

© सुश्री शशि पुरवार

ईमेल – [email protected] मो 9420519803

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares