मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “बड्डे… बिड्डे…. अन् रिटर्न गिफ्ट…!” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “बड्डे… बिड्डे…. अन् रिटर्न गिफ्ट…!” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(ती मला स्वतःच्या तराजूत तोलते… स्वतः ज्या पायरीवर उभी आहे त्याच पायरीवर ती मला पाहते…

ती मला सुद्धा भिक्षेकरी समजते… स्वतःला जी दुःख आहेत तीच दुसऱ्याला असतील हे ती समजते… 

दुसऱ्याशी  ती एकरूप होऊन जाते… अद्वैत म्हणजे आणखी काय असतं ???) इथून पुढे — 

 

स्वतःला ठेच लागली की, आपल्या डोळ्यातून पाणी येतं, हि असते ती वेदना…. 

दुसऱ्याला ठेच लागल्यावर मात्र आपल्या डोळ्यातून पाणी येतं, तेव्हा होते ती संवेदना… ! 

आपण स्वतःच्या वेदना कुरवाळतो… 

ती दुसऱ्याच्या संवेदना जपते…

गरीब कोण …. श्रीमंत कोण.. ? 

इथे माझे डोळे दगा देतात…

भर उन्हाळ्यात डोळ्यातून मग पाऊस कोसळतो… ? 

तिच्याच पदराला मग मी डोळे पुसायला खाली वाकतो… 

‘का रडतो रं…?’ ती माऊली विचारते

‘कुठे काय ?  मी कुठे रडतोय ?  घाम पुसत होतो…’ हुंदका आवरून मी तिला स्पष्टीकरण देतो. 

‘डोळ्याला कुठे घाम येतो बाळा…?’ कातरलेल्या आवाजात ती बोलते… 

तीच्या पदराला डोळे पुसायला वाकलेला मी…. 

आता माझ्या पाठीवर अश्रूंच्या धारा बरसतात… 

‘मावशी आता तु का रडते ?’ मी मान वर करून विचारतो

‘तुज्यागत माज्या बी डोळ्यांना घाम आला बाळा ….’ ती पदराने डोळे पुसत हसत बोलते. 

फसवा फसवीच्या या खेळात आम्ही रोज फसतो…. रोज रोज फसतो… आणि आपण फसलोच नाही असं दाखवत पुन्हा हसतो पुन्हा पुन्हा हसतो ! 

तर, इतक्या महागाचा हार आणला, पेढे आणले… 

अच्छा, मघाची गहन चर्चा वर्गणीसाठी चालू होती, या वर्गणी मधून हार पेढे आणि इतर साहित्य आणले गेले …

मी माझ्या लोकांना म्हणालो, ‘हा खर्च करायची काय गरज होती ? ऋण काढून सण करणे मला पसंत नाही… ‘ मी माझी नाराजी मोठ्या आवाजात बोलून दाखवली. 

ए आव्वाज खाली… 

शांत बसायचं गप गुमान…  

सांगटले तेवडंच करायचं… 

आज लय शान पना करायचा नाय… 

माझ्या वेगवेगळ्या माणसांकडून, वेगवेगळ्या धमकी वजा प्रेमळ सूचना येत राहिल्या… 

भिजलेल्या मांजरागत, भेदरून मी सर्व ऐकत राहिलो… ते सांगतील ते करत राहिलो.

यानंतर माझ्या लोकांनी रस्त्यावर माझं औक्षण केलं… 

एकाच वेळी उसाचा रस, लस्सी, पाणी, ताक, नीरा , लिंबू सरबत, गुलाबजाम (पाकातले आणि कोरडे), पेढे (खव्याचे/  कंदी /साखरेचे /कमी साखरेचे) केक, वडापाव, समोसा, प्रसादाची खिचडी, शिरा (पायनॅपल/ साधा शिरा /कमी साखरेचा शिरा) या सर्व बाबी पोटात घेऊन मी दिवसभर गर्भार बाईसारखा कमरेवर हात ठेवून मिरवत आहे. 

माझ्यासाठी जे पार्ले बिस्कीट, गुड डे बिस्कीट, शिरा, केळी गिफ्ट म्हणून मिळाली होती, ती सर्व एका बॅगेमध्ये माहेरी आलेल्या मुलीला, सासरी जाताना आई पिशवीत घालून देईल तशा पद्धतीने भरून दिलं. 

आज खूप लोकांनी विचारलं डॉक्टर आज काय विशेष ? 

हो… आज एक हात आणि पाय निसर्गात विलीन झालेली नवरा बायकोची मूर्ती भेटली. 

त्यांची नऊ वर्षांची मुलगी धडधाकट आहे, सुदृढ आहे, गोड बाळ आहे, शिकायची इच्छा आहे. 

मी या दिव्यांग मूर्तीला विचारलं मी काय करू शकतो ? 

ते म्हणाले आमचे आयुष्य संपले आहे, मुलीला शिकवा… 

आज वाढदिवसाच्या निमित्ताने मी या दिव्यांग मूर्तींना वचन दिले आहे, ‘आज पासून ही पोरगी माझी, जोपर्यंत तिची इच्छा आहे तोपर्यंत मी तिला शिकवेन. मी जर जिवंत असेन, तर बाप म्हणून कन्यादान करून, तिचे लग्न सुद्धा लावून देईन.’

या वेळी आई बापाच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहिले…. 

माझ्यासारख्या पन्नास वर्षाच्या माणसाच्या पदरात, निसर्गाने वाढदिवसाच्या निमित्ताने एक पोरगी घातली…. 

यार, वाढदिवस वाढदिवस…. सेलिब्रेशन सेलिब्रेशन म्हणजे अजून दुसरं काय असतं ? 

आपल्या वाढदिवशी आपलं अपत्य जन्माला यावं…. 

आपला आणि तिचा बड्डे सेम टु सेम दिवशी असावा, याहून भाग्य ते काय… ?? 

एका मुलीचा बाप होऊन आज माझा वाढदिवस साजरा झाला !!! 

साला आज मैं तो बाप बन गया…. ! 

मी आता निघालो. 

पारले, गुड डे, खिचडी, शिरा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींची माझी बॅग तयार होती. 

बॅगेचे वजन असेल अर्धा ते एक किलो… ! 

एक आजी मध्येच आली आणि म्हणाली, हे पैसे ठेव आणि जीवाला वाटेल ते घेऊन खा…

ती वीस रुपयांची नोट होती… ! 

नाईलाजाने उचलला जातो तो बोजा…  .

दुसरे डोक्यावर टाकतात तो भार…  

आपणहून आपल्या माणसांचं उचलतो ते वजन… ! 

रोज शंभर ते सव्वाशे किलो वजनाचं साहित्य घेऊन या कडक उन्हाळ्यात मी रस्त्यावर फिरतोय… 

मला दिलेल्या गिफ्ट ने ही भरलेली बॅग मात्र उचलताना, आज ती मला अनेक पटींनी वजनदार जाणवली… !  

या बॅगेचे वजन तरी कसं करावं ? 

फुलांचं वजन होतं माऊली, सुगंधाचं वजन कसं करायचं ??? 

गिफ्टच्या बॅगेचं वजन होईल सुद्धा, पण प्रेमाच्या या भावनांचं वजन करण्यासाठी मी कुठला वजन काटा आणू  ? 

आंतरराष्ट्रीय संस्थेत काम करताना दरमहा पाच लाख रुपये पगार घेत होतो, बँकेतून पैसे काढून, पाच लाख रुपये एका खिशात सहज मावायचे…. 

“जीवाला वाटेल ते घेऊन खा”… म्हणणारी वीस रुपयांची नोट मात्र आता खिशात बसेल, एवढा मोठा खिसाच आता माझ्याकडे नाही, माऊली… !!!

काय करावं ? कसं करावं ? माझ्याकडे उत्तर नाही… ! 

आज ती किलोभर बॅग आणि ती वीस रुपयांची नोट खूप खूप वजनदार भासली… !

रिटर्न गिफ्ट द्यायची हल्ली प्रथा सुरू झाली आहे… 

मला जे माझ्या माणसांकडून गिफ्ट मिळाले त्या बदल्यात मी त्यांना रिटर्न गिफ्ट काय देऊ ? 

काय देऊ…  काय देऊ…. 

अं… काय देऊ… ??? 

Ok… 

ठरलं….

17 एप्रिल 2025 नंतर माझं जे काही आयुष्य उर्वरित आहे, ते माझ्या भीक मागणाऱ्या लोकांना माणसात आणण्यासाठी, जे काही मला करावे लागेल, ते करण्यासाठी माझं संपूर्ण आयुष्य त्यांना समर्पित…!!! 

यापेक्षा वेगळं माझ्याकडे रिटर्न गिफ्ट नाही…!!! 

आपले स्नेहांकित,

डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे 

— समाप्त —

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “नाते संबंधांची शाल…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “नाते संबंधांची शाल…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आज तिने ठरवलचं… ते काम करायचचं… किती दिवस झाले… उगीच मागे पडत होते…

मनातून तिला माहित होतं.. खरतरं ती ते टाळतं होती.. ते करणं भागच आहे.. हे तिच्या लक्षात आलं मग मात्र ती नातेसंबंधांची शाल घेऊन बसली…. दुरुस्त करण्यासाठी..

खोटे आरोप प्रत्यारोप.. रुसवे फुगवे.. याचे त्याला त्याचे याला.. कागाळ्या कानपिचक्या.. बतावणी.. गाॅसीप..

अशा अनेक गोष्टींनी शाल कुठे कुठे उसवली होती.. कुठे फाटली होती.. तर काही ठिकाणी विरली पण होती.. अगदी दुरुस्त होण्याच्या पलीकडची.. आता ही शिवायची कशी.. तिला मोठा प्रश्नच पडला शिवताना चुकून धागे जरा जास्त ओढले गेले तर फाटायची भीती काय करावं बाई.. काही सुचेना… ही शाल कपाटात बंद करून ठेवता येत नाही.. ती अंगावर घ्यावी लागते 

आज ती थोडी हताश झाली.. ही शाल टाकून देऊन दुसरी नवीन घेताच येत नाही.. तशी सोय नाही जन्म झाला तेव्हा एकदा जी मिळते ती आयुष्यभर वापरावी लागते तिने अलगद धक्का न लावता ती शाल अंगाभोवती लपेटली आणि निघाली बाहेर..

मनातून शंकीत होती.. कोण काय म्हणेल ही भीती पण होती.

आजवर तिने इतरांच्या शालीकडे निरखून नीट पाहिलं नव्हतं.. पण आज तिने लक्षपूर्वक पाहिलं त्यांच्याही शालीला अशी बरीच भोकं उघडपणे दिसत होती.. पण त्याबद्दल त्यांना खेद खंत दु:ख नव्हतं नवीन वस्त्र घालावं तशी ती शाल ते सहजपणे मिरवीत होते.. अभिमानानी आनंदाने.. ती आश्चर्यचकित झाली.. मग हळूहळू विचार करता करता तिचं तिला उमगलं…

हे वर्षानुवर्ष नाही तर युगानंयुगे असंच चाललं आहे.. असंच चालत राहणार आहे ही शाल अशीच असते.. तशीच ती वापरायची असते.. ती मनाशी म्हणाली…

…. असू दे वरची शाल फाटकी.. कोणाला न दिसणारं माझं अंतर्मन मात्र मी स्वच्छ ठेवीन.

ते निश्चितच माझ्या हातात आहे.. त्याच्याशी प्रामाणिक राहीन. त्याची सावध साथ असली की इतर कोणी असले काय नसले काय….

आपल्या विचारांनी तिला आत्मविश्वास आला. तिने आज शालीकडे नीट निरखून पाहिले तर काही सोनेरी धागे चमकले….

आपुलकी, माया, प्रेम, स्नेह, मैत्री.. यांचे काही मजबूत धागे तिला दिसले.. ती स्वतःशीच हसली तिचा सन्मार्ग तिला दिसला..

…. ती निघाली.. मनोनिग्रहाने.. सबल मनाने

…. जीवन शांतपणे जगण्याच्या वाटेने

एकटीच…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “जिथे जाहला तुझा जीवनान्त!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“जिथे जाहला तुझा जीवनान्त! ☆ श्री संभाजी बबन गायके 

…. शत्रूच्या मातीत चिरनिद्रा घेत असलेला वायूवीर!

पाकिस्तानातल्या पिंडी भटीया तहसीलमधल्या कोट नाका नावाच्या कोणत्या एका गावातल्या कोण्या एका शेतात आपला एक वीर वायुवीर चिरनिद्रा घेत पहुडला आहे… त्याचा देह मातीच्या स्वाधीन झाला ती जागाही आता विस्मृतीत गेली आहे.. पण त्याच्या स्मृती गेल्या काही वर्षांत पुन्हा स्मरणाच्या पटलावर आल्या! हा वीर मातीच्या कुशीत विसावला त्या घटनेला आज सुमारे साडे एकोणसाठ वर्षे होत आहेत. पण भारताला त्याचे बलिदान समजायला दुर्दैवाने खूप कालावधी लागला… ७ सप्टेंबर, १९६५ रोजी वायूवीर अज्जामदा बोपय्या देवय्या (Squadron Leader A B ‘Tubby’ Devayya) हे जग सोडून गेले.. हे आपल्याला कळायला १९८५ वर्ष उजाडले.. म्हणजे सुमारे वीस वर्षे! तोवर युद्धात बेपत्ता झालेले पायलट एवढीच त्यांची ओळख होती!

१९६५ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध लढले गेले. इथपर्यंत विमानांचा युद्धातला सहभाग तसा कमी होता, असे म्हणता येईल. पण पुढे पाकिस्तानला अमेरिकची अत्याधुनिक लढाऊ विमाने लाभली आणि त्यांची उड्डाणे वाढली… इतकी की त्यांनी ६ सप्टेंबर, १९६५ रोजी भारतीय वायूसेना तळांवर बेफाम हल्ला चढवला. आधी हल्ला न करण्याचे भारताचे धोरण त्यांनी त्यांच्या लाभासाठी अशाप्रकारे वापरून घेतले. याचा करारा जबाब देणे भारतीय वायूसेनेसाठी अनिवार्य होते. भारताकडे फ्रांसमध्ये बनलेली Dassault Mystere नावाची अमेरिकेच्या विमानांच्या अर्थात supersonic F-104 Star-Fightersच्या तुलनेत कमी ताकदीची लढाऊ विमाने होती. आपल्या विमानांच्या कमाल वेगात आणि त्यांच्या विमानांच्या कमाल वेगात १००० कि. मी. प्रतितास इतके मोठे अंतर होते. पण शस्त्रापेक्षा ते शस्त्र धारण करणारे मनगट बलशाली असावे लागते… आणि भारतीय सैन्य यासाठी तर जगभरात प्रसिद्ध आहे! ठरले… दुस-याच दिवशी पाकिस्तानी विमानतळावर मोठा हल्ला करण्याची योजना आखली गेली. Group Captain Om Prakash Taneja (Veer Chakra) यांच्या नेतृत्वात आपली 12 विमाने पहाटेच्या काळोखात पाकिस्तानात अगदी त्या देशाच्या मध्यभागी (आणि त्यामुळे भारतीय सीमेपासून खूपच दूर) असलेल्या सरगोधा विमानतळाकडे झेपावली. इथपर्यंत पोहोचायचे, हल्ला करायचा आणि सुरक्षित परत यायचे यात खूप इंधन खर्च होणार होते. Dassault Mystere विमानांची इंधनसाठवण क्षमता तशी जेमतेमच होती. थोडा वेळ जरी अधिक पाकिस्तानी सीमेत राहिले तर भारतात परतणे अशक्य होणार होते… कारण पाकिस्तानी वायुसेना तोपर्यंत जागी होणार होती… पण धोका पत्करणे आवश्यक होते… कारण त्याशिवाय युद्धात काही हाती लागत नाही!

ठरल्यानुसार बारा विमाने सज्ज झाली.. पहाटेच्या अंधारात ५. २८ मिनिटांनी विमाने झेपावणार होती…. सुमारे पावणेपाचशे किलोमीटर्सचे अंतर कापायचे होते. ठरवलेल्या लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी एकच संधी मिळणार होती. योजनेचा एक भाग म्हणून या 12 विमानांच्या जोडीला दोन आणखी विमाने राखीव म्हणून ठेवण्यात आली होती…. आणि नेमक्या या दोन पैकी एकाचे वैमानिक होते…. युद्धाची प्रचंड जिगीषा असलेले आपले देवय्या साहेब! त्यांना हे राखीवपण चांगलेच डाचत असावे. हे मूळचे वैमानिक विद्या शिकवणारे शिक्षक. पण ऐन युद्धाच्या धामधुमीत एक कुशल वैमानिक हाताशी असावा म्हणून त्यांना ऐनवेळी बोलावून घेतले गेले होते.

अंधार होताच. त्यात धुके पसरले. आधीच्या दिवशी झालेल्या हवाई हल्ल्याने धावपट्टी तशी चांगल्या स्थितीत नव्हती. आपली विमाने दिवसाउजेडी उडण्याच्या क्षमतेची होती… रात्री अंधारात त्यांना उड्डाण करणे म्हणजे अंधा-या विहिरीत उडी घेण्यासारखे होते. चार चारच्या गटांनी उड्डाणे करण्याची योजना होती. मोहिमेच्या गुप्ततेसाठी काही वेळ एकमेकांशी रेडीओ संपर्क न ठेवण्याचे ठरले होते… पहिला गट व्यवस्थित हवाई मार्गस्थ झाला. दुसरा गटही बहुधा त्याच मार्गावर असावा. पण काहीतरी गडबड झाली म्हणा किंवा अन्य काही.. पण देवय्या साहेबांनी आपले विमान चक्क या दुस-या तुकडीच्या पुढे काढले… आणि जवळजवळ दुस-या विमानाला धडकले असते अशा अंतरावरून ते आभाळात झेपावले…. शत्रूला नेस्तनाबूत करायला! तोपर्यंत पहिली तुकडी लक्ष्यावर पोहोचली होती. त्यांनी अचूक हल्ला केला आणि पाकिस्तानची धांदल उडाली. इतक्या लांब भारतीय विमाने पोहोचणार नाही, या त्यांच्या समजुतीला हा मोठा धक्का होता. दुस-या तुकडीला तनेजा साहेबांनी लक्ष्य सांगितले… पण अंधारच इतका होता की त्यांना ते लक्ष्य दिसलेच नाही…. पाकिस्तानची बरीच अमेरिकन विमाने यामुळे बचावली. पण आपल्या या दुस-या तुकडीने मग लक्ष्य बदलले आणि तुफान हल्ला चढवला… आणि त्यांचे भरपूर नुकसान करीत आपली विमाने भारतीय हद्दीकडे माघारी वळाली… पण या तुकडीच्या मागे असलेले देवय्या साहेब आता येताना सर्वांत मागे राहिले… तोवर पाकिस्तानचे एक supersonic F-104 Star-Fighter आपल्या विमानांच्या पाठलागावर निघाले होते. देवय्या साहेबांकडे जेमतेम परत येण्याएवढे इंधन शिल्लक होते. त्यांना माघारी येणे शक्य असतानाही ते या पाकिस्तानी विमानाला सामोरे गेले… अन्यथा पाकिस्तानी विमानाने आपल्या माघारी फिरणा-या विमानांचा जीवघेणा पाठलाग केला असता आणि आपले भरपूर नुकसान झाले असते… कारण पाकिस्तानी विमान आपल्यापेक्षा अधिक वेगवान आणि आधुनिक हत्यारांनी सज्ज होते…. त्याचा वैमानिक होता.. फ्लाईट लेफ्टनंट अहमद हुसैन… त्यांचा उत्तम पायलट…. त्याने पाहिले की एक साधारण विमान आपल्या रोखाने येते आहे… त्याने देवय्या यांच्या विमानावर त्याचे अग्निअस्त्र डागले…. उष्णतेचा मागोवा घेत विमानाचा पाठलाग करीत त्याला उध्वस्त करणारे ते अस्त्र… ते कधीच अपयशी ठरले नव्हते तो पर्यंत… त्यामुळे हुसेन निश्चिंत होता… त्याला वाटले की हे विमान पाडले की भारतीय हद्दीकडे जाणा-या विमानांचा फडशा पाडू! पण देवय्या साहेबांचे इरादे हिमालयाएवढे उंच. त्यांनी अशी काही शक्कल लढवली की ते अग्निअस्त्र ब भरकटले…. भारतीय वैमानिकाच्या कौशल्यापुढे अमेरिकन तंत्रज्ञान उघडे पडले होते….. पुढे वेगाने येत हुसेन ने देवय्या साहेबांच्या विमानावर जोरदार गोळीबार केला… विमान जोरात हादरले… पण तरीही देवय्या साहेबांनी विमानावर ताबा मिळवला… त्यांचे उड्डाण कौशल्य अतिशय उच्च दर्जाचे होते… जो अभ्यासक्रम हुसेन शिकला असेल त्या अभ्यासक्रमाचे देवय्या साहेब म्हणजे जणू हेडमास्तरच होते! ते अजिबात डगमगले नाहीत… पाकिस्तानच्या आकाशात आता एक प्रचंड उत्कंठावर्धक हवाई युद्ध आरंभले गेले होते… खरं तर पाकिस्तानी विमान क्षणार्धात जिंकायला हवे होते… पण देवय्या साहेब त्याला भारी पडले. हुसेनने सात हजार फुटांची उंची गाठली… देवय्या साहेबांनी तोही धोका पत्करला आणि ते सुद्धा तेवढ्याच उंचीवर जाण्याच्या प्रयत्नात राहिले… हुसेन वेगाने त्यांच्या रोखाने आला… साहेबांनी अलगद हुलकावणी दिली… एखादे रानडुक्कर कसे थांबता न आल्याने पुढे धावत राहते… तशी हुसेनची गत झाली…. त्यांनी हुसेन याला आभाळभर फिरव फिरव फिरवले… एका बेसावध क्षणी हुसेनला गाठून त्याच्या विमानावर होत्या तेवढ्या शस्त्रांनी हल्ला चढवला… आता देवय्या माघारी जाण्याच्या स्थितीत अजिबात नव्हते… आणि त्यांना माघारी जायचेही नव्हते! पण एका क्षणी या दोन्हे विमानांची आभाळातच धडक झाली…. दोघेही वेगाने जमिनीकडे कोसळू लागले…. हुसेनच्या विमानात उत्तम दर्जाची बाहेर पडण्याची यंत्रणा होती… तो यशस्वीरीत्या विमानातून eject झाला… आणि जमिनीवर सुखारूप उतरला…. देवय्या साहेब मात्र याबाबत कमनशीबी ठरले… त्यांनीही विमानातून बाहेर उडी ठोकली होती… पण.. त्यांचा देह विमानापासून काही अंतरावर सापडला…. पण ते फारसे जखमी झालेले नव्हते! पण त्यांचे प्राण भारतमातेच्या संरक्षणार्थ खर्ची पडले होते.. आणि त्याचा त्यांना अभिमान होता. आपली पत्नी आणि दोन मुली यांना ते कायमचे पोरके करून त्यांच्या आत्म्याने परलोकी उड्डाण केले होते.

वायुसेनेच्या भाषेत दोन लढाऊ विमानांच्या अशा प्रकारच्या संघर्षाला Dog Fight अशी संज्ञा आहे… पाकिस्तानी पायलटचे माहीत नाही… मात्र लढणारा आपला वैमानिक वाघ होता… वाघासारखा लढला आणि धारातीर्थी पडला!

सरगोधा मोहिमेवर गेलेली सर्व विमाने सुखरूप भारतीय हद्दीत परतली… पण देवय्या साहेबांविषयी तनेजा साहेबांना ते त्यांच्या विमानातून खाली उतरल्यावरच समजले! देवय्या साहेबांची काहीच खबर मिळाली नाही… कालांतराने त्यांना युद्धात बेपत्ता झालेले सैनिक असा दर्जा दिला गेला. साहेबांच्या पत्नी श्रीमती सुंदरी देवय्या आणि कन्या स्मिता आणि प्रीता यांचा पुढे प्रचंड मोठा झालेला प्रतीक्षा कालावधी सुरु झाला… त्यांना सुमारे तेरा वर्षांनी देवय्या साहेबांची खबर समजणार होती…. ते हयात नाहीत ही ती खबर!

भारत पाक युद्ध थांबले. पाकिस्तानचा पराभव झाला होता… पण ते उताणे पडले तर नाक वरच आहे असे म्हणत राहतात नेहमी. त्यांनी त्यांच्या वायुदलाच्या तथाकथित पराक्रमाबाबत लेखन करण्यासाठी एक इंग्रजी माणूस नेमला…. John Fricker त्याचे नाव. त्याने Battle for Pakistan: The Air War of 1965 ही एक प्रकारची बखरच लिहिली… त्यात अर्थात पाकिस्तानची स्तुती पानोपानी होती. पण कसे कोणास ठाऊक त्याने देवय्य्या साहेब आणि हुसेनच्या लढाईचा उल्लेख केला… देवय्या साहेबांचे नाव तोपर्यंत त्यालाही ठाऊक नव्हते… जिथे देवय्या साहेब धारातीर्थी पडले होते.. त्याच शेतात त्यांना तिथल्या लोकांनी दफन केले होते. ही बाब पाकिस्तान सैन्याने खरे तर भारताला कळवायला हवी होती! असो.

तर हे पाकिस्तान धार्जिणे पुस्तक कालांतराने म्हणजे ते प्रकाशित झाल्यानंतर तब्बल सात आठ वर्षांनी भारतात पोहोचले… आणि त्यातील मजकूर तनेजा साहेबांच्या नजरेस पडला…. आणि सुरु झाला एक शोध…. एका हुतात्मा वायूवीराचा शोध. त्याला न्याय देण्यासाठीचा संघर्ष… कारण सरगोधा मोहिमेत भाग घेतलेल्या सर्व वैमानिकांना पदके मिळाली होती… पण आपला कथानायक पाकिस्तानातल्या मातीत हरवून गेला होता… आपण जणू त्यांना विसरलो होतो! पण दैवयोगाने तपासाची चक्रे फिरत राहिली… तेवीस वर्षे… आणि १९८८ मध्ये Squadron Leader Ajjamada Boppayya Devayya No. 1 Squadron IAF यांना मरणोत्तर महावीर चक्र देण्याची घोषणा करण्यात आली. भारतीय वायूसेनेतल्या लढाऊ वैमानिकास प्रदान केले गेलेले हे आजपर्यंतचे एकमेव महावीर चक्र ठरले आहे. देवय्या साहेबांच्या पत्नी यांनी मोठ्या कष्टाने आपल्या दोन्ही मुलींना वाढवले… साहेब कधी न कधी तरी परत येईल या आशेवर त्यांनी दिवस काढले… त्यांच्या पराक्रमाची योग्य कदर केली गेल्यानंतरच त्यांच्या कष्टी काळजाला थोडा दिलासा लाभला. त्या आता नव्वद वर्षांच्या आहेत. देवय्या साहेबांना दफन केलेली जागा स्वत: हुसेन यांनीच शोधून काढली असे बोलले जाते. परंतु आता ती नेमकी जागा विस्मरणात गेली आहे… खरे तर देवय्या साहेबांचे अवशेष भारतात परत आणण्याचे प्रयत्न व्हायला हवे होती… पण अनाम वीरांच्या नशिबी …

‘स्तंभ तिथे न कुणी बांधला… पेटली न वात! ‘ अशी स्थिती असते.

धगधगता समराच्या ज्वाला.. या देशाकाशी…

जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी…

– – हे शब्द किती खरे ठरतात ना?

देवय्या साहेब देशासाठी हुतात्मा झाले हे आता सिद्ध झाले आहे. पण त्यांच्याविषयी बरीच माहिती तशी सर्वसामान्य जनतेपासून लांबच राहिली, असे दिसते. जानेवारी, २०२५ मध्ये अक्षय कुमार यांची भूमिका असलेला स्काय फोर्स नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. या मध्ये ही कथा सांगण्याचा प्रयत्न केला गेला… पण नावे, कथा, तपशील यात कमालीचा बदल करण्यात आला आहे…. हे मात्र अत्यंत दुर्दैवाचे आहे! एका ख-या वीराची कथा आपण त्याच्या ख-या नावासह सांगू शकत नाही… याला काय म्हणावे.. कारणे काहीही असोत. पण ही कथा पडद्यावर आणल्याबद्दल संबंधित निर्माता, दिग्दर्शक, लेखक, कलाकार यांचे आभारही मानावेत तेवढे कमी आहेत.. कारण हल्ली वाचन नाही केले जात. सैन्यविषयक पुस्तके बरीचशी इंग्रजीमध्ये असतात… आणि जनता हल्ली चित्रपटात इतिहास शोधते आहे.. त्यामुळे चित्रपट त्यांच्या दोषांसह स्वीकारावे लागतात, हेही खरे आहे. खरे आभार मानले पाहिजेत ते ग्रुप कॅप्टन ओम प्रकाश तनेजा या वीर चक्र विजेत्या जिगरबाज वायुसेना अधिकारी वीराचे. देवय्या साहेबांचे शौर्य प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट खूप कौतुकास्पद आहेत.

मी आज संध्याकाळी स्काय फोर्स हा चित्रपट पाहिला. दर रविवारी एक सैन्य कथा प्रकाशित करण्यचा प्रयत्न करीत असतो. निवृत्त वायूसैनिक श्री. मेघश्याम सोनावणे साहेब माझ्या या प्रयत्नांना प्रोत्साहन देत असतात. यानिमित्ताने आपल्याच वीरांच्या आपल्या विस्मृतीत गेलेल्या कथा पुन्हा सांगितल्या जातील.. जय हिंद.

  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मी मोर्चा नेला नाही…”  लेखक : डॉ. सुरेश पाटील  ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “मी मोर्चा नेला नाही…”  लेखक : डॉ. सुरेश पाटील  ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

(एका निष्क्रिय डॉक्टर समाजाचं मौनभंग. आत्मपरीक्षणाचे बोल.)

मी मोर्चा नेला नाही,

मी रस्त्यावर उतरलो नाही,

हॉस्पिटल पेटली तरी

आमच्या आवाजाच्या ज्वाळा भडकल्या नाही…


मी संपाचं शंखनाद केलं नाही,

मी एकजुटीचं ढोल वाजवलं नाही,

मी व्यथेवर भाष्य केलं नाही,

फक्त म्हणालो, “आपलं काही चुकलं नाही…”


डॉक्टर मित्राला मारहाण झाली 

त्याच्या कपाळावर जखम दिसली,

माझ्या अंतःकरणावर पडली छाया,

पण हललो मात्र नाही, कारण मोह माया…


मी त्याच्यासोबत ड्युटीवर झिजलो होतो,

मी भीतीतही निश्चल थांबलो होतो,

पण जेव्हा तो जमिनीवर पडला होता,

तेव्हा मी “वेळेवर ओपीडी सुरू होईल का?”

याचाच हिशोब करतो होतो…


मी मोबाईल हातात घेतला,

डोळ्यांत दोन अश्रू होते दाटले,

पण स्टेटसचा टाकून उसासा,

“Doctors deserve respect!” 

एवढंच मला वाटले…


मी त्याला ओळखायचो,

पण आज अनोखळीपणाचे कारण शोधत राहिलो,

मी एकटाच काय करणार? असं म्हणत,

मी सगळ्यांनाच एकटं करून टाकलं…


मी नाही उभा राहिलो,

मी नाही काही बोललो,

मी नाही प्रश्न विचारला,

…आणि म्हणूनच तो डॉक्टर गेला कोलमडला…

 

त्याचं रक्त… माझ्या काळजात थेंब थेंब साठलं,

पण माझं मौन… त्याच्या हत्येचं साक्षीदार ठरलं…


म्हणूनच आता……


उभा राहा तू आज,

अन्यायाविरुद्ध आवाज बनून,

नाहीतर उद्या,

तुझ्याच व्यथा जातील विसरून.


आज तू गप्प राहिलास,

उद्या कोण बोलणार?

तुझ्यासाठीच कुणी,

पुन्हा मोर्चा काढणार?


आणि आता आजपासून म्हण…


मी मोर्चा नेणार आहे 🚩

संप ही करणार आहे 🚩

निषेद सुद्धा जोरदार नोंदवणार आहे… 🚩🚩

(कविता आवडू, नाही आवडू पण आपल्या झोपलेल्या डॉक्टर मित्रांसोबत share करा… कदाचित काहीजण जागे होतील आणि चळवळीचे धागे होतील.. 🚩)

कवी : डॉ सुरेश पाटील 

मनोविकार तज्ञ, वसई नालासोपारा विरार, मो. 9987230222

प्रस्तुती : सुनील देशपांडे

ईमेल : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ साई…  – कवयित्री : सुश्री अर्चना दिनकर फडके  ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ साई…  – कवयित्री : सुश्री अर्चना दिनकर फडके  ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी 

साई

कवयित्री: श्रीमती अर्चना दिनकर फडके

प्रस्तुती: श्रीमती शीतल कुलकर्णी

 

नवीन सुनेचा गृहप्रवेश झाला, सून म्हणाली सासूला

“काय हाक मारु आजपासुन मी तुम्हाला? “

सासू संभ्रमात, का हिला असा प्रश्न पडला?

वाटलं, पटकन म्हणावं, ” अगं, आईच म्हण मला”

पण हे नातं आहे, कुठला कागद नाही चिकटायला

वेळ द्यावा लागेल नातं आकार घ्यायला

सावरून स्वतःला म्हणाली सुनेला

“मनापासून जे वाटेल ती साद घाल मला

जे नातं जोडशील ते निभावून न्यायचंय तुला आणि मला”.

 

नव्या नवलाईचे दिवस सुरु झाले

मुलगा सून संसारात रमले

रोज नवीन बेत आखले गेले

कधी नाटक कधी सिनेमे बघितले

रोज नवनवीन पदार्थ होऊ लागले

कधी सासूने कधी सुनेने केले

वर्षाचे सण मजेत साजरे झाले

पण सासूच्या एक लक्षात आले

सुनेने तिला प्रेमाने साद घालायचे टाळले

मन खट्टू झाले पण वेळीच स्वतःला सावरले

 

ओठात एक नि पोटात एक, सून नाही अशी आपली

साद घालेल ती कायमची, ही सासूची खात्री पटली

 

दिवस सरले नवीन पाहुण्याची चाहुल लागली

गोड बातमी सर्वत्र पसरली

सासरी माहेरी कौतुकाला उधाण आले

सुनेचे मोठ्या प्रेमाने लाडकोड सुरु झाले

प्रसंगी मुलाला दटावले सुनेला पाठीशी घातले

सासूची लगबग सून डोळे भरुन पाहू लागली

सुनेचं दिवसागणिक बदलतं रूप सासू डोळ्यात साठवू लागली

 

दिवस काही सरले आणि सुनेने प्रेमाने साद घातली

” साई”

सासू गोंधळली. सुनेकडे पाहून विचारती झाली

“मला हाक मारली? “

सून प्रेमाने हसली आणि म्हणाली,

“सासू तुम्ही आहात पण आई माझी झालात

दोन नात्यांची सांगड घालून ‘साई’ म्हणायला केली सुरुवात”

सासू आनंदली, सून तिला बिलगली

दोघींच्या मनातली किल्मिषं दूर झाली

मग सासू म्हणाली सुनेला, “मानलं आहेस मला आई

तर आईसारखं कधी रागवले तर चालेल ना तुला बाई? “

सून म्हणाली, ” मानलं आहे तुम्हाला आई

मुलीसारखी रुसले तर सावराल ना हो साई? “

एक नातं आकार घ्यायला लागलं

सासू-सुनेचं चांगलच सूत जमलं!

 

दोघींनी मिळून मग निर्णय घेतला काही

घरातल्या पुरुषांना वादात कधी गुंतवायचं नाही

पुरुष याबाबत असतात अलिप्त

मोडू नये त्यांची ही शिस्त

दोघींनी करायची एक एक वही

लिहायचं त्यात सर्व काही

हेवेदावे, रुसवेफुगवे सगळं काही

कैद करायला वापरायची ती वही

आठवड्यातून एकदा करायची वहीची अदलाबदल

वाचून करायचा त्यानुसार स्वभावात थोडा बदल

 

वहीत लिहायला सुरुवात केली

मनातली अढी कमी होत गेली

एकमेकींच्या चुकांची दोघींना गम्मत वाटू लागली

क्षमाशील मनाची नव्याने ओळख पटली

 

मुलांच्या संसारवेलीवर फुले उमलली

मुलगा सून आता कर्तीसवरती झाली

नात्यांची वीण आता अधिक घट्ट झाली

तशी दोघींची वही आता कोरीच राहू लागली

वही आता कोरीच राहू लागली!

 

नवीन नात्याच्या उंबरठ्यावर उभी एक आई

येईल ना तिला पण होता कुणाची तरी “साई”?

 

कवयित्री: श्रीमती अर्चना दिनकर फडके

प्रस्तुती: श्रीमती शीतल कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ नवा परीघ…  लेखिका : सुश्री आश्लेषा महाजन ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही ?

☆ नवा परीघ…  लेखिका : सुश्री आश्लेषा महाजन ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

पुस्तक : नवा परीघ

लेखिका : आश्लेषा महाजन 

प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन

कवयित्री, लेखिका आश्लेषा महाजन यांचा दिलीपराज प्रकाशन यांनी प्रकाशित केलेला ‘नवा परीघ’ हा कथासंग्रह नुकताच वाचला. यापूर्वी त्यांच्या कविता, आणि त्यांनी लहानांसाठी लिहिलेली-अनुवादित केलेली पुस्तकं, कादंबरी हे साहित्यप्रकार मी वाचले होते. १२ जुलै १९६१, पानशेच्या पुरावर आधारित असलेल्या कादंबरीवर मी पुस्तक परिचयदेखील लिहिलेला आहे. पण काही किरकोळ अपवाद वगळता त्यांचा ‘कथा’ हा साहित्यप्रकार मात्र माझ्या वाचनात आलेला नव्हता. आणि त्यामुळेच हा नवा कथासंग्रह नक्की कसा असेल हे जाणून घेण्याची मला उत्सुकता होती.

‘नवा परिघ’ या कथासंग्रहात सुरुवातीलाच मनोगतामध्ये आश्लेषा महाजन यांनी त्या कथासंग्रहाकडे का वळल्या किंवा कथा हा साहित्य प्रकार त्या कशा दृष्टीने पाहतात याचं उत्तम आणि प्रामाणिक कथन केलं आहे. एक वाचक म्हणून ते मनाला सहज स्पर्शून जातं. आपण एखादा साहित्यप्रकार का लिहितो आहोत, त्याची नक्की गरज काय आहे, हे एखाद्या लेखकाला/लेखिकेला समजणं हे किती महत्त्वाचं आहे हे त्यांच्या या मनोगतातून मला जाणवलं.

आणि पुढेही तोच प्रामाणिकपणा, तिच वैचारिक समज त्यांच्या प्रत्येक कथेतून दिसून येते. सद्यस्थितीतल्या वातावरणाशी मिळत्याजुळत्या अशा या कथा आहेत. मुखपृष्ठावर दाखवल्याप्रमाणे स्त्री आणि पुरुष यांच्या नात्याची विशिष्ट चौकट कुठेतरी नव्याने साधायला हवी, त्यात थोडी मोकळीक असायला हवी किंवा आजकालच्या भाषेत जरा स्पेस असायला हवी हा दृष्टिकोन यातल्या काही कथांमधून प्रकर्षाने जाणवतो. लेखिका मूलतः कवी मनाच्या आहेत किंबहुना कविता हा त्यांचा व्यक्त होण्याचा स्वाभाविक कलाप्रकार आहे त्यामुळे कथेमध्ये येणारी तरलता, काही प्रसंगांना विशिष्ट प्रकारे उद्धृत करणं, प्रत्येक गोष्टीचा शेवट ठराविक साच्यातून न करता तो वाचकाच्या दृष्टिकोनातून त्याला ठरवू देणं असेही काही प्रयोग या कथांमध्ये केल्याचं आढळतं. पण विशेष म्हणजे कथेमध्ये कुठल्याही स्वरूपात दोन ओळींची का होईना कविता घालण्याचा मोह प्रकर्षाने टाळलेला आहे. सुरुवातीच्या मनोगतातच त्यांनी सांगितलं कविता हा अतिशय उत्कट आणि हृदयस्थ प्रकार जरी असला तरी काही विचार, काही गोष्टी यांच्यासाठी मोठा परिघ असणं आवश्यक ठरतं आणि म्हणूनच त्या विषयांना त्यांनी कथा रूपात मांडलेलं आहे. या दृष्टिकोनातूनसुद्धा ‘नवा परीघ’ हे नाव या संग्रहाला साजेसं आहे असं म्हणता येईल.

यातल्या कथा निरनिराळ्या मासिकांमध्ये, दिवाळी अंकांमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत. आणि त्यांचं एकत्रिकरणं केलेलं आहे. त्यामुळेच काळाच्या वेगवेगळ्या तुकड्यात लेखिका स्वतःच्याच वेगवेगळ्या दृष्टिकोनातून एखाद्या नात्याकडे किंवा स्त्री-पुरुष सहजीवनाकडे कशी विविध दृष्टीतून पाहते हे स्पष्टपणे दिसून येतं. तसंच या कथासंग्रहाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कथेला थेट सुरुवात होते. प्रास्ताविक आढळत नाही. आणि कुठलाही प्रकारचा पाल्हाळीकपणा न जाणवता घट्ट आकृतीबंध असलेला कथाऐवज आपल्याला वाचायला मिळतो. मोजकी पात्रं, त्यांच्यातले संवाद आणि गरजेपुरती येणारी त्यांच्या अवतीभवतीची पात्रं, त्यांची पार्श्वभूमी असे या कथांचे सर्वसाधारण स्वरूप आहे.

सुख आणि दुःख या आपल्या आयुष्यातल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. छाप आणि काटा या सारख्याच त्या आपल्या आयुष्याला चिकटलेल्या असतात. आणि अनेकदा सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये त्यांचं प्रमाण हे बऱ्यापैकी समसमान असतं. क्वचित प्रसंगी एखाद्याचं कमी जास्त असू शकतं, पण पूर्णविरोधाभास किंवा पूर्ण एकांगी असं आयुष्य सामान्य व्यक्तींच्या पदरी खूप कमी वेळा येतं. हा सुखदुःखाचा ‘तोल’ अतिशय उत्तमरीत्या या कथांमधून साधला आहे‌.

सर्वच कथा वाचनीय आहेत. पण विशेष परिणाम करतात त्या म्हणजे मेकअप, प्लाझ्मा, गादी, लेप, जीवन है अगर जहर, व्हेंचर पायलट, एकतानता. यातली प्लासिबो आणि श्रद्धा या कथांचा अजूनही विस्तार झाला असता तर चालला असता हे ही खरं. पण कदाचित मासिक किंवा अंकातल्या शब्द मर्यादेमुळे हे बंधन आलं असावं असं वाटतं. प्रत्येक कथा साधारणपणे ८ ते १० पानांची आहे आणि एकूण १६ कथांचा यामध्ये समावेश आहे. यातल्या बऱ्याच कथांवर उत्तम प्रकारच्या लघु फिल्म होऊ शकतील. याबाबत लेखिकेने खरंच विचार करायला हवा. साध्या सोप्या भाषेत लिहिलेल्या, जीवनातल्या अनेक प्रसंगांना सहजपणे, प्रामाणिकपणे सामोरे जाणाऱ्या, कुठलाही विशिष्ट प्रकारचा सूर न लावणाऱ्या या कथा सर्वसाधारण व्यक्तीला आपल्या जिव्हाळ्याच्या वाटतील अशाच आहेत.

एकूणच या कथांमध्ये मानवी नातेसंबंधांवर जास्त भर दिलेला आहे. मुळात मानवी नातेसंबंध ही गोष्टच अतिशय गुंतागुंतीची, समजायला क्लिष्ट, हाताळताना हळुवार आणि तितकीच पारंपारिक ओझ्यात जखडलेली बाब आहे हे नक्की. तंत्रज्ञानाच्या किती सुविधा उपलब्ध झाल्या, आर्थिक स्थितीचा एकूण स्तर जरी उंचावला तरीदेखील मानवी मनाच्या काही गरजा आणि काही क्षमता-अक्षमता देखील आपल्या आयुष्याला व्यापून उरतात त्यांची बीजं रुजतात आणि नकळत विचारप्रवृत्तही करतात. या कथांमध्ये ती तळाशी रुजलेली बीजं स्पष्टपणे दिसून येतात. त्यांच्यावरच या कथांची निर्मिती झाली आहे हे स्पष्टपणे जाणवण्या इतक्या या कथा नितळ आणि निर्मळ आहेत. त्यामुळे त्या जास्त भावतात.

नव्या परिघातल्या या कथा एकदा तरी आवर्जून वाचाव्यात अशाच आहेत.

परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # 98 – मुक्तक – चिंतन के चौपाल – 4 ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकें गे। 

इस सप्ताह से प्रस्तुत हैं “चिंतन के चौपाल” के विचारणीय मुक्तक।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 98 – मुक्तक – चिंतन के चौपाल – 4 ☆ आचार्य भगवत दुबे ✍

कहीं से लौटकर हारे-थके जब अपने घर आये। 

तो देखा माँ के चेहरे पर समंदर की लहर आये। 

वहाँ आशीष की हरदम घटाएँ छायी रहती हैं, 

मुझे माता के चरणों में सभी तीरथ नजर आये।

0

ठान ले तू अगर उड़ानों की, 

रूह काँपेगी आसमानों की, 

जलजलों से नहीं डरा करते, 

नींव पक्की है जिन मकानों की।

0

माँ के बिना दुलार कहाँ है, 

पत्नी के बिन प्यार कहाँ है, 

बच्चों की किलकारी के बिन 

सपनों का संसार कहाँ है।

0

बेटी को उसका अधिकार समान मिले, 

पूरा करने उसको भी अरमान मिले, 

अगर सुशिक्षित और स्वावलंबी हो जाये 

तो पीहर में क्यों उसको अपमान मिले।

https://www.bhagwatdubey.com

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 347 ☆ “22 अप्रैल – पृथ्वी दिवस विशेष – हरियाली और जल संरक्षण” ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 347 ☆

? 22 अप्रैल – पृथ्वी दिवस विशेष – हरियाली और जल संरक्षण ? श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

प्रतिवर्ष 22 अप्रैल को मनाया जाने वाला अंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस हमें प्रकृति के साथ सामंजस्य बनाकर जीवन जीने की प्रेरणा देता है। इस वर्ष की थीम “पृथ्वी बचाओ” (Planet vs. Plastics) के साथ-साथ पर्यावरण के दो मूलभूत आधार हरियाली और जल संरक्षण पर विचार करना अत्यंत आवश्यक है। ये दोनों ही तत्व न केवल मानव जीवन, बल्कि समस्त जैव विविधता के अस्तित्व की कुंजी हैं।

हरियाली, प्रकृति का हरा सोना कही जा सकती है।

वृक्ष और वनस्पतियाँ पृथ्वी के फेफड़े हैं। समुद्र पृथ्वी के सारे अपशिष्ट नैसर्गिक रूप से साफ करने का सबसे बड़ा संयत्र कहा जा सकता है। वायुमंडल से कार्बन डाइऑक्साइड अवशोषित कर ऑक्सीजन प्रदान करने के साथ-साथ वृक्ष मिट्टी के कटाव को रोकते हैं, जलवायु को संतुलित करते हैं, और जीव-जंतुओं को आश्रय देते हैं।

भारत में वनों का क्षेत्रफल लगभग 21.71%, भारतीय वन सर्वेक्षण 2021के अनुसार है, जो विश्व स्वास्थ्य संगठन के अनुसार आवश्यक 33% से कम है। शहरीकरण, अंधाधुंध निर्माण, और औद्योगिकीकरण के कारण हरियाली का ह्रास एक गंभीर समस्या बन चुका है।

– वनों की कटाई से मरुस्थलीकरण बढ़ रहा है।

– प्रदूषण के कारण पेड़ों का जीवनकाल घटा है।

– जैव विविधता पर संकट।

समाधान:

– सामुदायिक स्तर पर वृक्षारोपण अभियान चलाना।

– सरकारी योजनाओं जैसे ग्रीन इंडिया मिशन को सक्रियता से लागू करना।

– शहरी क्षेत्रों में छतों पर बगीचे (टेरेस गार्डनिंग) को बढ़ावा देना।

– – – जल संरक्षण:

जल ही जीवन है, यह वाक्य भारत जैसे देश में और भी प्रासंगिक है,NITI आयोग, 2018 के अनुसार 60 करोड़ लोग पानी की किल्लत से जूझ रहे हैं । नदियों का प्रदूषण, भूजल स्तर का गिरना, और वर्षा जल का अपव्यय जल संकट को गहरा कर रहे हैं।

चुनौतियाँ:

– कृषि और उद्योगों में जल की अत्यधिक खपत।

– वर्षा जल संचयन की पारंपरिक प्रणालियों (जैसे कुएँ, तालाब) का विलोपन।

– नदियों में प्लास्टिक और रासायनिक कचरे के निपटान को रोकना।

समाधान:

– वर्षा जल संचयन (रेनवाटर हार्वेस्टिंग) को अनिवार्य बनाना।

– नदियों की सफाई के लिए नमामि गंगे जैसे अभियानों को व्यापक स्तर पर लागू करना।

– किसानों को ड्रिप सिंचाई और फसल चक्र अपनाने के लिए प्रोत्साहित करना।

हरियाली और जल संरक्षण: दोनों का अटूट नाता है। ये दोनों पहलू एक-दूसरे के पूरक हैं। वृक्ष भूजल स्तर बढ़ाने में मदद करते हैं, जबकि जल के बिना हरियाली संभव नहीं। हरियाली के बिना शुद्ध वातावरण संभव नहीं होता। उदाहरण के लिए, राजस्थान के तरुण भारत संघ ने जल संरक्षण और वनीकरण के माध्यम से अलवर क्षेत्र को हरा-भरा बनाने का वृहद कार्य किया है। इसी प्रकार, केरल की “हरित क्रांति” ने वर्षा जल प्रबंधन को प्राथमिकता देकर कृषि उत्पादन बढ़ाया।

हम क्या कर सकते हैं?

1. व्यक्तिगत स्तर पर:

– घर में पौधे लगाएँ और पानी की बर्बादी रोकें।

– प्लास्टिक का उपयोग कम करके मिट्टी और जल को प्रदूषण से बचाएँ।

– वर्षा जल संग्रह प्रारंभ करें।

2. सामुदायिक स्तर पर:

– गली-मोहल्ले में जागरूकता अभियान चलाएँ।

– स्कूलों और कॉलेजों में “इको-क्लब” बनाएँ।

3. राष्ट्रीय स्तर पर:

– सरकार को जल शक्ति अभियान और राष्ट्रीय हरित न्यायालय के निर्देशों को कड़ाई से लागू करना चाहिए।

पृथ्वी दिवस केवल एक दिन का आयोजन नहीं, बल्कि प्रकृति के प्रति हमारी सतत प्रतिबद्धता दोहराने का प्रतीक है। हरियाली और जल संरक्षण के बिना, मानवता का भविष्य अंधकारमय है। हम सब को”थिंक ग्लोबली, एक्ट लोकली” के सिद्धांत पर चलते हुए, अपनी धरती को सुरक्षित रखने की शपथ लेने का समय है।

© श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

म प्र साहित्य अकादमी से सम्मानित वरिष्ठ व्यंग्यकार

संपर्क – ए 233, ओल्ड मिनाल रेजीडेंसी भोपाल 462023

मोब 7000375798, ईमेल [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – कहन ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – कहन ? ?

तुमसे कुछ कहना था..,

आदि-अंत,

सुख-दुख,

जीवन-मृत्यु,

दिवस-रात्रि,

पूर्व-पश्चिम,

आँसू-हँसी,

प्रशंसा-निंदा,

न्यून-अधिक,

सहज-असहज,

सरल-जटिल,

सत्य-असत्य,

अँधकार-प्रकाश,

और विपरीत ध्रुवों पर बसे

ऐसे असंख्य शब्द,

ये सब केवल विलोम नहीं हैं,

ये सब युगल भी हैं,

बस इतना ही कहना था…!

?

© संजय भारद्वाज  

7:11 बजे संध्या, 16 अप्रैल 2025

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 12 अप्रैल 2025 से 19 मई 2025 तक श्री महावीर साधना सम्पन्न होगी 💥  

🕉️ प्रतिदिन हनुमान चालीसा एवं संकटमोचन हनुमन्नाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें, आत्मपरिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – संस्मरण ☆ दस्तावेज़ # 26 – आत्म-परिवर्तन की यात्रा – ☆ श्री जगत सिंह बिष्ट ☆

श्री जगत सिंह बिष्ट

(Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker.)

(ई-अभिव्यक्ति के “दस्तावेज़” श्रृंखला के माध्यम से पुरानी अमूल्य और ऐतिहासिक यादें सहेजने का प्रयास है। श्री जगत सिंह बिष्ट जी (Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker) के शब्दों में  “वर्तमान तो किसी न किसी रूप में इंटरनेट पर दर्ज हो रहा है। लेकिन कुछ पहले की बातें, माता पिता, दादा दादी, नाना नानी, उनके जीवनकाल से जुड़ी बातें धीमे धीमे लुप्त और विस्मृत होती जा रही हैं। इनका दस्तावेज़ समय रहते तैयार करने का दायित्व हमारा है। हमारी पीढ़ी यह कर सकती है। फिर किसी को कुछ पता नहीं होगा। सब कुछ भूल जाएंगे।”

दस्तावेज़ में ऐसी ऐतिहासिक दास्तानों को स्थान देने में आप सभी का सहयोग अपेक्षित है। इस शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है श्री जगत सिंह बिष्ट जी का एक ऐतिहासिक दस्तावेज़ आत्म-परिवर्तन की यात्रा।) 

☆  दस्तावेज़ # 25 – आत्म-परिवर्तन की यात्रा ☆ श्री जगत सिंह बिष्ट ☆ 

आज जब मैं ठहरकर, थोड़ा पीछे मुड़कर देखता हूं, तो जीवन एक सरल रेखा जैसा नहीं, बल्कि एक नदी जैसा लगता है—कभी शांत, कभी उफनती हुई—हमेशा प्रवाहित होती हुई। दूर से देखने पर यह एक अनवरत प्रवाह जैसा लगता है, लेकिन यदि ध्यान से उसमें उतरें, तो उसमें किनारे, चट्टान, भंवर और संगम—सब दिखते हैं जो उसकी धारा को आकार देते हैं। मेरा जीवन भी गंगा मैया की तरह प्रवाहमान रहा, जिसमें अनेक मोड़ और आंतरिक रूपांतरण की यात्राएं शामिल हैं।

जिस तरह गंगा का उद्गम गंगोत्री से भागीरथी के रूप में होता है, मेरा जन्म जबलपुर के एक छोटे से उपनगर रांझी में हुआ। मेरे जीवन की शुरुआती धारा शांत थी, सीमित दुनिया में बहती हुई—बिलकुल वैसी जैसे एक छोटी नदी, जिसे ज़्यादा आगे का अंदाज़ा नहीं।

जैसे भागीरथी और अलकनंदा देवप्रयाग में मिलकर गंगा बनती है, वैसे ही जब मैं सोलह वर्ष का हुआ तो जीवन में एक अनोखा मोड़ आया। मेरी मुलाकात ब्रदर फ्रेडरिक से हुई जो स्कूल में मेरे रसायन विज्ञान के शिक्षक थे और मेरे मार्गदर्शक बने। उन्होंने मेरे भीतर की चिंगारी को पहचाना और मुझे प्रेरित किया, “तुम राष्ट्रीय विज्ञान प्रतिभा खोज परीक्षा की तैयारी करो।” यह वाक्य मेरे जीवन का निर्णायक मोड़ बन गया। मुझे राष्ट्रीय स्तर पर स्थान प्राप्त हुआ और जीवन की धारा ने एक नया रुख ले लिया।

इस उपलब्धि ने मुझे ऐसे स्थानों पर पहुँचाया, जिनकी मैंने कल्पना भी नहीं की थी—जयपुर, चेन्नई और मुंबई में आयोजित ग्रीष्मकालीन  विज्ञान आयोजनों में भाग लेने का मुझे अवसर मिला। प्रतिभाशाली साथियों जैसे अरुनावा गुप्ता, प्रदीप मित्रा और राजीव जोशी के साथ मिलकर मैंने न केवल विज्ञान की गहन समझ विकसित की, बल्कि जीवन को देखने का एक नया नजरिया भी पाया। मेरा एक नया परिचय बन चुका था—एक जिज्ञासु और प्रतिभाशाली विद्यार्थी के रूप में।

परंतु जीवन की धारा हमेशा हमारे हिसाब से नहीं बहती। जीविका की आवश्यकता ने मुझे बैंकिंग की दिशा में मोड़ा। लेकिन यहाँ भी जीवन के पास मेरे लिए कुछ विशेष था। कुछ वर्ष बीत जाने पर, मुझे एक व्यवहार विज्ञान प्रशिक्षक के रूप में चुना गया। यह केवल एक कार्यालयीन उत्तरदायित्व नहीं था, यह एक आमूलचूल परिवर्तन का शंखनाद था। हैदराबाद के स्टेट बैंक स्टाफ कॉलेज में रवि मोहंती, श्रीनिवासन रघुनाथ और शांतनु बनर्जी जैसे गुरुजन हमारे मार्गदर्शक बने।

अगर मेरे शुरुआती वर्ष एक शांत नदी जैसे थे, तो यह जीवन का “ब्लास्ट फर्नेस” चरण था। मैं कच्चा लोहा था—अनगढ़, पर संभावनाओं से भरा हुआ—और उन्होंने मुझे तपाया, ढाला, और मजबूत किया। मेरे साथी– रघु शेट्टी और प्रकाश दिवेकर के साथ मिलकर, हम सबने खुद को एक नए रूप में देखा—जैसे इस्पात में बदलते हुए।

मैंने बैंक कर्मचारियों के लिए आत्म-चेतना,  मानवीय संबंध, और भावनात्मक बुद्धिमत्ता पर सत्र लिए—ताकि वे ग्राहकों की सेवा केवल नियमों के आधार पर नहीं, बल्कि संवेदना में डूबकर करें। लेकिन इन सत्रों में दूसरों को सिखाते-सिखाते मैंने अपने आप को गहराई से समझा और जाना। मेरे भीतर की नदी अब किसी हिमगंगा की तरह शीतल नहीं, बल्कि जीवन के ताप में तपती हुई बह रही थी।

यह परिवर्तन मुझे उस पुल की ओर ले गया जिसने मुझे पॉज़िटिव साइकोलॉजी की ओर अग्रसर किया—एक ऐसा विज्ञान जो जीवन को सुख, संतोष और सार्थकता की दृष्टि से देखता है। इससे मेरा जीवन-दर्शन ही बदल गया।

सेवानिवृत्ति के पास आते-आते, जब बहुत से लोग जीवन को धीमा पड़ता मानते हैं, मेरी धारा ने गति पकड़ी। मैंने और मेरी पत्नी ने लाफ्टर योगा (हास्ययोग) में मास्टर ट्रेनर बनने की योग्यता प्राप्त की, डॉ. मदन और माधुरी कटारिया के सान्निध्य में, जो इस विधा के प्रवर्तक हैं। हमने जाना कि हास्य और योग केवल एक व्यायाम नहीं, बल्कि एक आध्यात्मिक अनुभव है। यह एक संगम था—गंगा, यमुना और अदृश्य सरस्वती का संगम। हम संपूर्णता की ओर अभिमुख हुए।

हमने अपनी दिनचर्या में योग और ध्यान को भी जोड़ा, और अब हमारी धारा केवल बह नहीं रही थी—वह सागर की ओर बढ़ रही थी, अपने साथ अनुभवों की समृद्धि और दूसरों के जीवन को छूने की शक्ति लेकर, उन्हें खुशी और खुशहाली का मार्ग दिखाते हुए।

अब जब पीछे देखता हूं, तो साफ़ दिखाई देता है—कोई भी उपलब्धि अलग-थलग नहीं होती। हर एक उपलब्धि, एक लहर है, जो अगली लहर को जन्म देती है, और धीरे-धीरे जीवन को एक पूर्ण अर्थ देती है। रांझी का एक जिज्ञासु बालक, जो विज्ञान का विद्यार्थी बना, फिर प्रशिक्षक और अंततः एक मार्गदर्शक—मेरी जीवन-गंगा अनेक भूमिकाओं और भूमियों से होकर बहती रही।

मुझे पक्का विश्वास है कि मैंने अपनी धारा से लोगों को कुछ आध्यात्मिक पोषण दिया है, और उस “ब्लास्ट फर्नेस” की आंच से स्वयं कुछ शुद्धता भी प्राप्त की है।

जीवन अच्छा है। जीवन सार्थक है। और यदि सजगता से जिया जाए, तो उसकी छोटी-छोटी उपलब्धियाँ भी एक विशालता का रूप ले लेती हैं।

♥♥♥♥

© जगत सिंह बिष्ट

Laughter Yoga Master Trainer

LifeSkills

A Pathway to Authentic Happiness, Well-Being & A Fulfilling Life! We teach skills to lead a healthy, happy and meaningful life.

The Science of Happiness (Positive Psychology), Meditation, Yoga, Spirituality and Laughter Yoga. We conduct talks, seminars, workshops, retreats and training.

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares