मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ३३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – ३३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

खजिना.

मी स्वतःला नेहमीच भाग्यवान समजते. त्याला तशी अनेक कारणे आहेत पण त्यातलं मुख्य कारण म्हणजे मला खूप मित्र आणि मैत्रिणी आजही आहेत. मी जिथे जाते तिथे माझी कोणाशी ना कोणाशी मैत्री होतेच आणि ती सहजपणे घट्ट होत जाते.

आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर माणसं भेटतात. काही कालपरत्वे स्मृतीआड होतात तर काही मात्र आपल्याबरोबर आयुष्यभर सोबत राहतात. घट्ट मैत्रीच्या रूपात. अगदी जीवाला जीव देणारे वाटावेत इतके जवळचे असतात ते!

मैत्रीचा पहिला टप्पा असतो तो बालपणीचा, शालेय जीवनातला.

अशी एक सर्वसाधारण भावना, समजूत आहे की बालपणी जी मैत्री होते तशी आयुष्याच्या पुढील जाणत्या टप्प्यात ती कुणाशीही होऊ शकत नाही. खोटं नसेल, खरंही असेल.

भूतकाळात रमताना अनेक चेहरे माझ्यावर आजही माया पाखडताना मला जाणवतात. पुरुषांच्या बाबतीत ‘लंगोटीयार’ असा घट्ट मैत्रीच्या बाबतीत वापरला जाणारा शब्द आहे. स्त्रियांच्या बाबतीत मी मैत्रीविषयी माझा स्वतःचाच शब्द योजिते. ‘चिंचाबोरांची मैत्री. ’ या रिंगणातल्या माझ्या सख्यांनी तर माझा बालपणीचा काळ अधिक रम्य केला आहे.

कुठलीही समस्या त्यावेळी गंभीरच असते ना? त्यावेळी गृहपाठ केला नाही म्हणून बाई रागावल्या, शाळेच्या पटांगणात खेळताना दाणकन् पडून जखमी झाले, कधी कुठल्यातरी कार्यक्रमातून डावललं गेलं, एखादं खूप कठीण गणित सुटलं नाही, परीक्षेच्या वेळी आजारी पडले, शालेय सहलीला जाण्यासाठी घरून परवानगी मिळाली नाही, स्पर्धेत नंबर आला नाही अशा आणि अशा तऱ्हेच्या अनेक भावनिक प्रसंगी माझ्या जिवलग सख्या माझ्यासोबत सदैव राहिल्या आहेत. खरं म्हणजे आता भेटीगाठी होत नाहीत. आयुष्याच्या वाटेवर मैत्रिणींची खूप पांगापांग झाली पण मनात जपून ठेवलेली मैत्री मात्र तशीच उरली. आता या वयात कधीतरी कुणाकडून तरी,

“ती गेली” अशा बातम्या कानावर येतात पुन्हा ती चिंचाबोरं, त्या लंगड्या, फुगड्या, कट्टी—बट्टी आठवते. आयुष्यात सगळं काही धरून ठेवता का येत नाही याची खंत वाटते.

त्यादिवशी वेस्टएन्ड मॉलमध्ये मी फिरत होते आणि दुरून एक हाक आली. “बिंबाsss” या नावाने इथे मला हाक मारणारं कोण असेल? मी मागे वळून पाहिले आणि मीही तितक्याच आनंदाने चक्क आरोळी ठोकली.

“ भारतीsss”

दुसऱ्या क्षणाला आम्ही एकमेकींच्या गळ्यात. हातातल्या पिशव्या, भोवतालची माणसं, आवाज, गोंगट कशाचेही भान आम्हाला राहिले नाही. वयाचेही नाही.

“किती वर्षांनी भेटतोय गं आपण आणि तुझ्यात काहीही बदल नाही..! ”

यालाच म्हणतात का जीवाभावाची मैत्री? मग पुढचे काही तास त्या रम्य भूतकाळात विहरत राहिले.

मी बँकेत नोकरी करत असताना माझा एक दोस्त होता. त्याला मी ‘मिस्टर दोस्त’ म्हणत असे. संसार सांभाळून नोकरी करणं हे कधीच सोप्पं नव्हतं. कालही नव्हतं आणि आजही नाही पण या माझ्या दोस्ताने मला त्या काळात, प्रत्येक आघाडीवर जी मदत केली ती मी कधीही विसरू शकणार नाही. एकदा तर मी कंटाळून माझा राजीनामाही तयार केला होता. त्या दिवशी याच माझ्या दोस्ताने मला जो मानसिक आधार दिला त्यामुळेच माझी नोकरी टिकून राहिली असे मी नक्कीच म्हणेन. कुठल्याही समस्येच्या वेळी त्याच्या नजरेत हेच निर्मळ भाव असायचे,

“मै हूँ ना!”

माझ्या या मित्र परिवाराच्या यादीत डॉक्टर सतीशचे नाव खूप ठळक आहे. दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनेक मानसिक, शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक समस्येत तो माझ्याबरोबर असायचाच पण एका प्रसंगामुळे ‘मला सतीश सारखा मित्र मिळाला’ याचे खूप समाधान वाटले होते.

कठीण समय येता कोण कामास येतो? अथवा फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इंडीड किंवा अमित्रस्य कुत: सुखम् यासारख्या उक्त्या आपण वाचतच असतो पण प्रत्यक्षात जेव्हा जीवनात त्याचा अनुभव येतो, तो क्षण असतो खरा भाग्याचा! अमेरिकेहून भारतात परत येण्याच्या काही दिवस अगोदरच मला किडनी स्टोनचा भयंकर मोठा अॅटॅक आला होता. सतीशला, माझ्या मिस्टरांनी कळवले. ते कळताक्षणी त्याने सांगितले, “तुम्ही ताबडतोब भारतात या. आपण इथेच ट्रीटमेंट घेऊ, सर्जरी करू. मी सगळी व्यवस्था करतो. काही काळजी करू नकोस. ”

जळगाव स्टेशनवर पहाटे तीन वाजता माझा मित्र आम्हाला घ्यायला आला होता. वास्तविक तो गाडी आणि ड्रायव्हर पाठवू शकत होता पण तो स्वतः आला. जळगाव शहरातला अत्यंत व्यस्त आणि नामांकित सर्जन अशी ख्याती असलेला हा माझा मित्र स्वतःच्या प्रतिमेचा विचार न करता केवळ मनातल्या तळमळीने, काळजीने, मैत्रीसाठी आम्हाला स्टेशनवर घ्यायला आला होता. तेही अशा अडनेड्या वेळी. गाडीतून उतरताच त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि त्या प्रेमळ स्पर्शाने माझा आजारी चेहरा क्षणात खुलला. ”आता मी बरी होईन” असा दिलासा मला मिळाला.

जीवाभावाचे मित्र मैत्रिणी यांचा विचार जेव्हा माझ्या मनात येतो तेव्हा आणि माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा डोकावून बघताना जाणवते की बाल्याचा उंबरठा ओलांडतानाच आई ही कधी मैत्रीण झाली ते कळलंच नाही आणि वडील तर फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड होतेच. हे सारे संस्कार मित्र! यांचे आयुष्यातले स्थान ते नसतानाही आबाधित आहे आणि खरं सांगू का? बाहेरच्या जगात तर खूप मोठा मित्रपरिवार होताच पण घरात आमचा पाच बहिणींचा समूह होता. आजही आम्ही तितक्याच घट्ट मैत्रिणी आहोत. बहिणींपेक्षा जास्त मैत्रिणी. जीवाला जीव देणाऱ्या. कुणाच्या आयुष्यात थोडं जरी खुट्टं झालं की आमचा मजबूत वेढा असतो एकमेकींसाठी.

माझ्या घरात बारा वर्षे काम करणारी माझी बाई माझ्यासाठी कधी मैत्रीण झाली ते कळलंच नाही. तिला मी मैत्रीण का म्हणू नये? कामाव्यतिरिक्त आम्ही दोघी एकमेकींच्या जीवन कहाण्या एकमेकींना कित्येकदा सांगत असू. आमच्यामध्ये एक निराळाच बंध विणला गेला होता. तो स्त्रीत्वाचा होता. मी तर तिला माझी कामवाली म्हणण्यापेक्षा मैत्रीणच म्हणेन.

तशी तोंडावर गोड बोलणारी, ’ओठात एक पोटात एक’ असणारी अनेक माणसं भेटली. ज्यांच्याशी मैत्री होऊ शकली नाही त्यांना मित्र/मैत्रीण तरी का म्हणायचे? ते मात्र फक्त संबधित होते.

माझ्यासाठी जीवाभावाच्या मैत्रीची आणखी एक व्याख्या आहे, नेहमीच काही संकटात मैत्रीची परीक्षा होत नाही. खरी मैत्री जी असते, ज्या व्यक्तीबरोबर आपण कम्फर्टेबल असतो, ज्या व्यक्तीबरोबर आपल्याला न्यूनगंड जाणवत नाही, सगळी बाह्य, ऐहिक अंतरे सहज पार होतात, जिला आपण अगदी मनाच्या तळातलं विश्वासाने सांगू शकतो आणि जिला आपलं ऐकून घ्यायचं असतं. भले तिच्याकडे आपल्या प्रश्नांची उत्तरे नसतील पण तिच्या खांद्यावर आपण डोकं टेकवू शकतो.

मी भाग्यवान आहे. मला असे मित्र-मैत्रिणी आजही आहेत आणि तोच माझा खजिना आहे, आनंदाचा ठेवा आहे.

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वसंत ऋतूतला रंगोत्सव… ☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ वसंत ऋतूतला रंगोत्सव… ☆ सुश्री नीता कुलकर्णी

वसंत ऋतु सुरू झाला की निसर्गाचे रूप पालटायला लागते. सध्या रस्त्यावरून जाताना सहज दिसणाऱ्या झाडांकडे बघा. पानगळं झालेली आहे.

आता नवीन.. नाजूक.. अलवार.. अशी पानं झाडांना अक्षरशः लगडलेली आहेत. हे दृष्टीसुख जाता जाता तुम्हाला मिळेल….

वसंत उत्सव सुरू झालेला आहे.

काहीं पानांचा रंग अजून लालसर आहे. पानं तलम नाजूक आहेत. हळूहळू रंग हिरवा होत जाईल. या हिरव्या रंगाच्या निसर्गात इतक्या असंख्य छटा दिसतात…. त्या बघून आपण थक्क होतो.

फुलं तर बघण्यासारखी असतातच. पण कोवळी पानं पण डोळ्यांना सुखावतात.

त्यावरून हळूच हात फिरवून बघा. लहान लेकराच्या जावळातून हात फिरवल्यासारखं वाटतं.

चाफा आता चहुअंगाने फुलून येतो. त्याच्या शुभ्र फुलांची कधी पिवळ्या धमक रंगांची तर कधी लालसर रंगाची उधळण हिरव्या रंगातून चालू असते. एखाद्या भल्या मोठ्या पुष्पगुच्छा सारखे हे झाड दिसत असते.

बोगनवेल बिचारी दुर्लक्षित.. तिचं व्हावं तेवढं कौतुक होत नाही. पण ती बघाच…

केशरी, लाल, पिवळ्या.. पांढऱ्या रंगात ती रस्तोरस्ती नटलेली दिसते.

संपूर्ण झाडाला लगटून वर वर जाते.

डेरेदार गुलमोहर त्याच्या नाना रंगात सजलेला आहे. त्याच्याकडे पाहून आपल्याच मस्तीत दंग असलेले हे झाड आहे असे मला वाटते…

आंब्याला मोहर लागलेला आहे.

त्याचा एक धुंद मधुर असा वास वातावरणात पसरलेला आहे. त्याची मऊसर पानं लक्ष वेधून घेतात. गुढीपाडव्यापर्यंत ती तयार होतात.. मग दाराला तोरण करण्यासाठी ती काढली जातात.

खरंतर अनेक वृक्षांची, फुलांची नावे पण आपल्याला माहीत नसतात. त्यांच सौंदर्य बघावं आणि निसर्ग राजाला सलाम करावा.

बहाव्याच्या पिवळ्या धमक सोनसळी रंगाचं फार सुंदर आणि समर्पक वर्णन श्रीयुत मंदार दातार यांनी केलेले आहे.

” इतके सारे सोने मजला

 अजून पाहणे झाले नाही

 अमलताशच्या जर्द फुलांनी

 असे नाहणे झाले नाही “

विशेष म्हणजे ऋग्वेदातही त्याचे वर्णन आले आहे. त्याला राज वृक्ष असे संबोधले आहे.

जांभळी, निळी, गुलाबी अशी अनेक छोटी-मोठी फुलं आसपास दिसतात.

खरतर इतक्या छोट्या लेखात त्यांचं वर्णन करणच अशक्य आहे….

प्रत्यक्षच बघा…

घंटेची फुलं पिवळ्या रंगाची असतात. अगदी सकाळी गेलं तर एखादा गालिचा अंथरावा तशी झाडाखाली पसरलेली असतात. गच्च हिरव्या पानांनी झाडही मोहक दिसत असते.

लाल फुलं असलेलं नागलिंगाचं झाड उंच उंच वाढते. त्याच्या खोडावर ही फुलं उगवतात. त्याचा सुवास झाडाखाली उभं राहिलं तरी येतो. बाहेरचा पांढरा भाग बाजूला केला की आत पिंडीचा आकार असलेलं लिंग दिसते.

झाडाखाली या फुलांचा सडा पडलेला असतो. त्यातील दोन उचलून बघा. मादक असा गंध त्या फुलांना आहे. कमला नेहरू पार्कच्या दारातच हे झाड आहे.

अनेक फांद्या.. पारंब्या यांनी लगडलेलं मोठ्ठं वडाचे झाड मला तर एखाद्या प्रेमळ मायाळू आजोबांच्या आणि त्यांच्या समस्त परिवाराचे चित्र आहे असंच वाटतं. वसंत ऋतूत त्यांच्या पानांना तजेलदारपणा आलेला असतो. अनेक पारंब्यांना खंबीरपणे आधार देऊन ठामपणे उभं असलेले हे झाड शांतपणे एकदा न्याहाळून बघा…. त्याचे अनेक अर्थ मनात उलगडत जातात….

ही झाडे एकटी नसतात. अनेक पक्षी त्यांच्यावर घरं करतात. त्यांचा किलबिलाट चालूअसतो. झाडाखाली उभं राहिलं की तो आपल्याला ऐकू येतो. चैतन्याची विलक्षण अशी अनुभूती अशावेळी येते.

फुलांनी, फळांनी लगडलेलं झाड बघुन मला तर.. सर्व अलंकार घालुन, जरतारी वस्त्र लेऊन एखाद्या वैभवसंपन्न घरंदाज स्त्रीच रूपच त्याच्यात दिसतं…

खरंच आपल्या डोळ्यांना, मनाला रिझवायला, शांत करायला निसर्ग राजा नाना रुपात अनेक रंगात आसपास सजला आहे.

आपण त्याच्याकडे पाहतच नाही.

उद्या एकमेकांवर रंग टाकून त्याची मजा घ्या…

तसाच निसर्ग विविध रंग आपल्यासाठी घेऊन आलेला आहे ते पण जरूर बघा

खूप लांब जाऊन हे पहा ते पहा असं करण्याच्या नादात जवळच असलेल्या या अलौकिक सौंदर्याकडे आपलं लक्षच जात नाही.

एक सांगु…. एकदा बघायला लागलं की ती नजर आपोआप तयार होते.

 बघायला सुरुवात तर करा…

 खरंच थांबावं थोडं झाडाजवळ..

बघाव त्यांच्याकडे.. निशब्द शांततेत…. ते बोलतात सांगतात ते ऐकू येत…

…. मायेनी स्पर्श करावा खडबडीत खोडाला.. वयस्कर माणसाच्या पायाला स्पर्श करतो तसा.

आशीर्वादच मिळेल…

आणि अखेर आपलं जीवनच त्यांच्यावर अवलंबून आहे हे कधी विसरायचं नाही.

फळा फुलांनी गच्च भरलेली झाडं बघून कृतज्ञता म्हणून तरी नमस्कार करायचा..

– – – निसर्ग रूपात अवतीर्ण झालेल्या प्रत्यक्ष परमेश्वराला…

© सुश्री नीता कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गेट टुगेदर…– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ गेट टुगेदर… – लेखक :  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

परवा, अचानक ओळखीचा आवाज आला खूप वर्षानंतर…

चेहऱ्यावर औदासीन्य पसरलेलं.. थरथर कापत काप-या आवाजात भयकंपीत झालेल्या एका मुलीने आवाज दिला, “ ए ओळखले का मला..? “ 

मी अंदाज घेऊन म्हणालो, “ अरे, तू तर ‘लोकशाही’ ना..! “

असे म्हणताच, तिच्या चेह-यावर मंद स्मित उगवले…. सूर्यासारखे….!

“ खूप वर्षे झाली ग, अंदाज चुकू शकतो… “

“ नाही रे, तू अगदी बरोबर ओळखले… “ ती म्हणाली…

मी.. “ पण तू तर जगातील सर्वात सुंदर व्यवस्था.. मग कोणी केली तुझी अशी ही अवस्था….

आणि कुठे गायब झाल्या तुझ्या मैत्रिणी.. मानवता, संवेदनशीलता अन् ती सहिष्णुता….? “

“ होय रे, ‘सहिष्णुता’ पुर्वी भेटायची, सर्वांची चौकशी करायची… पण हल्ली दिसत नाही रे.. सत्याची बाजू घेतली म्हणून तडीपार केले म्हणतात तिला.. ‘क्रांती’ सर वर्गशिक्षक होते…. तोपर्यंत सगळं ठिकठाक होते…

विद्रोह, प्रज्ञा व ‘संघर्ष’ हे सुद्धा होते.. बरं, ते जाऊ दे… “ – ‘लोकशाही’ म्हणाली.. “ माझी “मूल्ये” कशी आहेत रे….! . “न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता”… “

“ अगं, ते तरी कशी असणार..! पुर्वी “न्याय” भेटायचा कधीकधी, तो परमनंट नाही झाला अजूनही..

कॉन्ट्रॅक्चूअल वर काम करतो… “

“ बरं ‘समता’ आणि ‘बंधुता’ च काय..? “

“ ‘समता’ तर इतिहासात फेल झाली होती… पण मुळात ती विषमतेच्या मगरमिठीत आहे.. “

“ आणि बंधुता कशी आहे..? “

“ अॕज इट इज…! अगं, ‘संविधान’ अन् तुझी अॕडमिशन एकाचवेळी झाली न.. कसा आहे ग तो…..? “

“ काय सांगू तो तर जगातील सर्वात प्रज्ञावंत विद्यार्थी.. संविधानामुळेच तुझी माझी ‘अस्मिता’ आहे..

खरं आहे रे ‘संविधान’ सोबत असलेले ‘समंजस’, प्रगल्भता आणि ‘व्यापकता’ यांनीच तर आपल्या वर्गाला एका सूत्रात बांधून ठेवले.. म्हणून तर ‘मानवता’ निर्माण झाली होती… आपल्या वर्गात… पण ‘फॕसिझम’ ची अॕडमिशन झाली आणि त्याने वर्गात विभाजनाचा प्रयत्न केला.. पण तो ‘षडयंत्र’ त्याच्या आवडीचा विषय 

तुला ‘विद्वेष’ आठवतो का..? जो नेहमी अबसेंट असायचा.. तोच आज मेरीट आहे.. आज त्यालाच लौकिक प्राप्त झाला आहे.. अरे आणि तेव्हा ‘संवेदनशीलता’, ही होती… प्रत्येकाच्या मनात जिवंत… ‘विद्वेष’ ने केला तिचा एनकाऊंटर.. तीच तर आहे खरी खंत… “अभिव्यक्ती” कशी आहे रे…. आपण जिला “मिडिया” म्हणायचो…? “

“ तिचीही अवस्था खराब आहे अगं, तिच्या गळ्यातील स्वरयंत्रावर स्वार्थाची सूज आल्याने ती ‘सत्या’ ची बाजू न मांडता, ‘सत्ते’ चे गाणे गात असते.. ती आता तटस्थ नाही राहिली.. “

“ अरे आणि तुला आठवते का… आपल्या वर्गात एक होती ‘निष्ठा’, “

“ हो ग… तिच्यावरच तर अवलंबून होती सर्वांची ‘प्रतिष्ठा’…. पण सध्या… ‘निष्ठा’ सुध्दा “अर्थ ” शास्त्राला सरेंडर झाली.. आणि ‘एथिक्स’ मध्ये फेल झाली.. असे ऐकले.. “ मी म्हणालो.

“ आणि हा ‘फॅसिझम’ कोण ग…? “

लोकशाही म्हणाली, “ तो बघ ‘प्रतिक्रांती’ च्या टीममध्ये होता.. नेहमी अवैज्ञानिक, तर्कविसंगत.. गोष्टी करायचा.. दंतकथांना इतिहास मानायचा.. अन् खरं म्हणजे ‘अंधश्रद्धा’ ही त्याची पक्की मैत्रीण होती.. “

“ हो ग..! , ती काही बदलली का येवढ्या वर्षात..? “

“ नाही रे.. अजून तरी नाही.. मला वाटते, ती बदलली असती पण तिने ‘विवेका’ शी असलेली मैत्री तोडली

त्यामुळे ती नेहमी अविवेकी, अतार्किक वागते… बरं… , ‘मनु’ कसा आहे..? “

“ होता तसाच आहे… अग, तुला आठवते का..? आपल्या वर्गात ‘आपुलकी’ ‘नितिमत्ता’ होती…

 फार प्रेमळ तिची “भावना” होती. परस्परांच्या भावनांची कदर करायची.. त्यामुळे “प्रज्ञा” सुध्दा त्यांचा आदर करायची.. संघर्ष’ आणि ‘विद्रोह’ ते सातत्याने अन्यायाविरुद्ध पेटून उठायचे… ते दोघेही नेहमी ‘क्रांती’ च्या सोबत असायचे… पण आजकाल सगळे कव्हरेज क्षेत्राबाहेर आहेत.. फोन लागत नाही त्यांना.. ”

“ “करुणा” लाही फोन करून बघशील बरं… ‘विद्या, शिल’ आणि ‘मैत्री’ सुध्दा भेटले तर सांग त्यांना. ” 

“ अगं, मला ‘विकास’ भेटला होता… मी कुतूहलाने त्याला म्हणालो.. ”अरे, किती बदलला तू… अग, तो ‘वाढ’ लाच विकास समजत होता… तो अंगात खूप फुगला…. पण ती फक्त ‘वाढ’ होती… विकास “अंतर्बाह्य” असतो… तो गुणात्मक असतो ना.. “

“अरे, समजेल त्याला कधी ना कधी… “

“ पण तोपर्यंत…. काय….? ”

“ बरं, आणि ‘अहंकार’ कसा आहे. रे…? ‘अहंकार’ आणि ‘स्वाभिमान’ दोघेही दिसायला सारखेच दिसत होते रे.. माझे नेहमी कन्फ्युजन व्हायचे.. “

“ नाही ग… त्याच्या सोबत नेहमी ‘नम्रता’ असायची व “स्वाभिमान” सोबत ती एकाच बेंचवर बसायची….

तो ‘स्वाभिमान’…! ‘स्वाभिमान’ ला ही बोलावू म्हणतो… “

“ अर्थातच, तो तर कणा आहे.. आपल्या टिमचा… त्याच्या शिवाय ‘चळवळ’ येणार नाही… “

“ बरं ‘चळवळ’ कशी आहे रे…? “ 

“ कोणती चळवळ..? शोषकांची…! की, शोषणमुक्तीची…! की मानवमुक्तीची..! तुला खरं सांगु का.. जेव्हा आपल्या गृपमधून ‘निष्ठा’ गेली.. अन् “तृष्णे”‘ ची अॕडमिशन झाली… तेव्हा पासून ‘चळवळ’ कणाहीन झाली… तिची परवड सुरू झाली… बघ ना ‘त्याग’ व ‘समर्पण’ ची जोपर्यंत ‘निष्ठे’ सोबत मैत्री होती 

तोपर्यंत ‘चळवळ’ गतिमान होती.. खरं तर तीच तर आपल्या अभिमानाची खाण होती.. “

“ हं.. आणि “करुणा” बद्दल काय…? ”

“ करुणा म्हणाली, ‘समता’ आली तरच मी येईल.. तिच्याशिवाय..

निर्हेतूक मैत्री होती…. तेव्हाच तर खरी खात्री होती…. “

“ अरे आपल्या वर्गात ‘विश्वास’ होता… “

“ होय.. तोच तर जगण्याचा खरा ‘श्वास’ होता.. “

“ आणि काय रे.. अरे, ती प्रतिक्रांती काही बदलली का..? बरं, तिची मूल्ये विषमता, भीती, अविद्या

बरी आहेत ना..! “

मी म्हणालो, “ लोकशाही, तु सगळ्यांची चिंता करतेस.. “

“ नाही रे…. आपली ‘संस्कृती’ मानवतावादी आहे ना… विचारांचा फरक जरी असला, मतभेद असले तरी आपले त्यांच्यावर प्रेम आहेच.. शेवटी ते सर्व आपले वर्ग मित्र आहेत.. “

लोकशाही म्हणाली, “ होईल रे… सगळं बदलेल.! . तुला आठवतो का…. आपल्या वर्गातला ‘परिवर्तन’ 

तो पूर्वी ‘प्रस्थापित’ सरांची बाजू मांडायचा.. माझ्याशी जोरजोरात भांडायचा.. एक दिवस तो स्वतः ‘विस्थापित’ झाला… अन् त्याच्या विचारात, आचारात.. अचानक.. बदल झाला. आज तो प्रतिगामीत्व नाकारतो, विस्थापितांच्या समस्यांवर बोलतो.. लिहितो.. प्रहार करतो.. आता तर त्याने ‘पुरोगामी’ विषयात ‘पीएचडी’ केली.. अन्यायाविरुद्ध पेनाला धारधार करतो. “

“परिवर्तन होत असते रे… फक्त आपल्या सोबत ‘प्रबोधन’ असला पाहिजे… तोच एकमेव मार्ग मला दिसतो…. हे सगळे आपले वर्गमित्र भेटले तर सांग त्यांना “

मी म्हणालो, “ काय सांगू.. “

‘लोकशाही’ म्हणाली, “ गेट टुगेदर करू म्हणते.. “

“ कुठे..? “

“सेक्युलर” ग्राऊंडवर… “

“पण नियोजन कोण करणार.. ”

“भारतीय नागरिक सर…! “

“ अग,… पण गेट टुगेदर कशासाठी…? “

“ सर्वांच्या मनाची पुनर्रचना करून हे जग पुन्हा सुंदर करण्यासाठी रे..! ! “

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पूनम गुप्ता” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

पूनम गुप्ता ☆ श्री संभाजी बबन गायके 

पूनम गुप्ता 

कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत!

वर्ष होतं २०२३. दिवस होता भारताचा ७४वा प्रजासत्ताक दिन… २६ जानेवारी! राजधानी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर सेन्ट्रल रिझर्व पोलिस फोर्समधील महिलांची एक सुसज्ज तुकडी मोठ्या डौलात, दिमाखात आणि आत्मविश्वासाने मार्च करीत पुढे निघाली होती. ही जगातील पहिली सशस्त्र महिला पोलिस बटालियन…. CRPF…All Women Armed Police Battalion!

भारताच्या राष्ट्रपती महोदया आणि तीनही सेनादलांच्या सेनापती महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मू सलामी स्वीकारण्यासाठी उभ्या होत्या. पाहता पाहता ही तुकडी सलामी मंचासमोर आली. या तुकडीचे नेतृत्व करणा-या तरुण, रुबाबदार महिला प्रमुखाने उजव्या हातात समोर धरलेल्या तलवारीची मूठ आपल्या मुखासमोर नेली आणि आपल्या तुकडीला अत्यंत आवेशाने आदेश दिला…. दहिने देख! दुस-याच क्षणी आणि तिने आपल्या हातातल्या तलवारीचे टोक सेनापती महोदयांच्या सन्मानार्थ जमिनीच्या दिशेला केले. आपल्या सेनापतींना मानाची सलामी देत ही तुकडी पुढे मार्गस्थ झाली! या तुकडीचे नेतृत्व करीत होत्या असिस्टंट कोमांडंट पूनम गुप्ता. या तरुण, तडफदार अधिकारी मूळच्या ग्वाल्हेर (Gwalior) येथील शिवराम कॉलनी, शिवपुरी इतल्या निवासी आहेत. त्यांचे पिताश्री रघुवीर गुप्ता हे तिथल्या नवोदय विद्यालयात Office Superintendent पदावर कार्यरत आहेत. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या पूनम गुप्ता गणित विषयात पदवीधर असून सोबतीला इंग्रजी साहित्यातही त्यांनी पदव्यूत्तर पदवी प्राप्त केलेली आहे. शिवाय बी. एड. पदवी प्राप्त करून त्या शिक्षिका होण्याच्या बेतात होत्या. परंतु त्याच्या नशिबाने अचानक मार्ग बदलला… त्या २०१८ च्या UPSC CAPF परीक्षेस त्या प्रविष्ट झाल्या आणि त्यांनी ८१वा क्रमांक पटकावला… त्या आता Assistant Commandant झाल्या होत्या! त्यांना बिहार मधील नक्षल-प्रभावित भागात कर्तव्यावर पाठवण्यात आले. तेथे त्यांनी उत्तम कामगिरी बजावली. २०२३ च्या प्रजासत्ताक दिनाच्या सैनिकी संचालनात त्यावर्षी सर्व महिला सदस्य असलेली तुकडी समाविष्ट करण्यात आली होती. आणि या तुकडीचे नेतृत्व करण्याचा बहुमान पूनम गुप्ता यांना प्राप्त झाला!

योगायोगाने काहीच दिवसांत पूनम गुप्ता यांना राष्ट्रपती भवनात नेमणूक मिळाली ती राष्ट्रपती महोदयांची Personal Security Officer या मोठ्या जबाबदारीच्या पदावर. आपल्या अत्यंत कर्तव्यदक्ष परंतु मितभाषी स्वभावाने, सुसंस्कृत वागणुकीने आणि उच्च दर्जाच्या प्रशिक्षणातून प्राप्त केलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे संरक्षण करू शकण्याच्या क्षमतेमुळे पूनम यांनी सर्वांची मने जिंकून घेतली… विशेषता: महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या नजरेत त्या भरल्या! आपले कर्तव्य सांभाळून पूनमजी महिला सबलीकरण करण्याच्या कामांत आपला वाटा उचलीत आहेत. महिला, विद्यार्थी यांच्यासाठी त्या प्रेरक संदेश त्यांच्या सोशल मिडीया वरून नियमित देत असतात. त्या अनेक मुलींच्या प्रेरणास्रोत बनल्या आहेत.

आनंदाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच पूनम गुप्ता यांचा विवाह जुळला… त्यांचे नियोजित पती श्री. अवनीश कुमार हे सुद्धा सैनिक अधिकारी असून सध्या जम्मू-कश्मीरमध्ये CRPF Assistant Commandant पदावर नियुक्त आहेत. येत्या १२ फेब्रुवारीला हे लग्नबंधनात बांधले जाणार आहेत… पण खरी गोष्ट तर पुढेच आहे!

हा विवाह सोहळा चक्क राष्ट्रपती भवनात साजरा होणार आहे. आणि प्रमुख आयोजक आहेत महामहिम राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू! आजवरच्या इतिहासात राष्ट्रपती भवनात साजरा होणारा हा पहिलाच विवाह सोहळा ठरणार आहे! पूनम गुप्ता या खरोखरीच नशीबवान ठरल्या आहेत. आणि हा अलौकिक निर्णय घेणा-या महामहिम राष्ट्रपती महोदयांचे कौतुक करावे तेवढे अपुरेच ठरेल… जणू त्यांनी एका महिला सैनिक तरूणीला आपली कन्या मानले आहे… आणि त्यांच्याच प्रासादात त्या हा मंगल सोहळा घडवून आणणार आहेत. आपण केवळ राष्ट्रप्रमुखच नसून भारत देश नावाच्या एका विशाल कुटुंबाच्या प्रमुखच आहोत हेही त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे! जयहिंद, Madam President! अभिनंदन पूनम गुप्ताजी.. अभिनंदन अवनीशजी! नांदा सौख्यभरे!

  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उसी रंग में रहना रे बंदे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ उसी रंग में रहना रे बंदे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

अध्यात्मिक रंग होळीचा…

एक दिवस भगवान कृष्ण मथुरेमधील एका रंगाऱ्याकडे गेले आणि त्याला म्हणाले की “मलाही सर्वांचे कपडे रंगवायचे आहेत… मला ही एक रंगाची बादली देण्यात यावी…“

…. हा रंगारी कृष्णभक्तीत आधीच रंगला होता म्हणून त्याने एक बादली रंगाची भगवंताला दिली… ती बादली घेऊन भगवान कृष्ण मथुरेमधील एका चौकात उभे राहिले आणि जोरजोरात ओरडून म्हणू लागले की ….

“मी सर्वांची वस्त्रे रंगविण्याचे कार्य करीत आहे. ज्याला आपली वस्त्रे रंगवायची आहेत त्यांनी “फुकट” ही वस्त्रे रंगवुन घ्यावी. कोणताही मोबदला देण्याची गरज नाही… “ 

हळूहळू लोकांची गर्दी वाढू लागली. कोणी आपले धोतर… तर कोणी आपली साडी… कोणी आपले उपरणं… तर कोणी आपला सदरा देण्यास सुरवात केली. प्रत्येकाने आपला आवडता रंग निवडला. कोणी लाल… तर कोणी पिवळा… कोणी निळा तर कोणी गुलाबी… भगवंत प्रत्येकाची वस्त्रे बादलीत टाकत होता आणि ज्याला जो रंग हवा त्याच रंगात रंगवूनही देत होता.

असे करता करता संध्याकाळ झाली आणि लोकांची गर्दी कमी होण्यास सुरवात झाली. भगवान कृष्ण आपली बादली उचलून निघणारच होते तेवढ्यात एक अत्यंत साधा पोषाख केलेला माणूस भगवंतासमोर हात जोडून अत्यंत नम्रपणे उभा राहिला. तो म्हणाला “ माझेही एक वस्त्र रंगवून हवे आहे. ” 

भगवंताने पुन्हा रंगाची बादली खाली ठेवली आणि त्याला म्हणाले, “ दे तुझे वस्त्र… कोणत्या रंगात रंगवून हवे आहे…? ? “

तो साधा वाटणारा व्यक्ती म्हणाला… “ त्याच रंगात रंगवून दे जो रंग या बादलीत आहे. अरे कृष्णा… हे भगवंता… सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी बघतो आहे की तुझ्याजवळ बादली एकच आहे पण या बादलीमधून तू सर्व वेगवेगळे रंग काढतो आहेस. ज्याची जशी इच्छा तसा तुझा रंग… पण मला मात्र रंग तुझ्या इच्छेचा हवा आहे. कारण कदाचित माझा रंग हा स्वार्थाचा असेल.. पण तुझा रंग निःस्वार्थाचा आहे… माझा रंग अहंकाराच्या पूर्ततेचा असेल पण तुझा रंग समर्पणाचा आणि भक्तिचा आहे… माझा रंग व्यवहारिक आनंदाचा असेल.. पण तुझा रंग तर चैतन्याच्या अनुभूतीचा आहे…. म्हणून ” जशी तुझी मर्जी तशीच माझी इच्छा “… तुझ्याशिवाय माझे काय अस्तित्व… तू आहेस तरच मी आहे, तू नाही तर मी नाहीच… म्हणून संतांनी लिहिले की….

उसी रंग में रहना रे बंदे,

उसी रंग में रंगना….

जिस रंग में परमेश्वर राखे,

उसी रंग में रंगना….! ! !

होळी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा…! ! ! 

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “माझी विपुल शब्दांकित मराठी भाषा…” –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “माझी विपुल शब्दांकित मराठी भाषा…” –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित 

मायंदाळ म्हणजे काय? – बक्कळ 

बक्कळ म्हणजे काय? – पुष्कळ 

पुष्कळ म्हणजे काय? – लय 

लय म्हंजी काय? – भरघोस 

भरघोस म्हणजे काय? – जास्त 

जास्त म्हणजे काय? – भरपूर 

भरपूर म्हणजे काय? – खूप 

खूप म्हणजे काय? – मुबलक 

मुबलक म्हणजे काय? – विपुल 

विपुल म्हणजे काय? – चिक्कार

चिक्कार म्हणजे काय? – मोक्कार 

मोक्कार म्हणजे काय? – मोप 

मोप म्हणजे काय? – रग्गड 

रग्गड म्हणजे काय? – प्रचंड 

प्रचंड म्हणजे काय? – कायच्या काय 

कायच्या काय म्हणजे काय? — लय काय काय 


– आता तरी कळलं का.. काय ते…….

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ रंगले तुझ्याच रंगात… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष बिवलकर

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? रंगले तुझ्याच रंगात…  ? श्री आशिष बिवलकर 

रंगूनी रंगले,

तुझ्याच साऱ्या रंगात!

रंगवले हे मन माझे,

प्रेमळ सहवासाच्या ढंगात!

 

डोळ्यांच्या पापण्यांना,

तुझीच लागते रे आस!

उघडता तूच, मिटता तूच,

तुझाच होतोय भास!

 

गंध ही तूच, सुगंधही तूच,

दरवळे तुझाच सुवास!

माझे मी कुठे रे उरली आता,

तुझ्याच साठी घेतेय श्वास!

 

हरवले मी भान,

एकटीच गालात हसते!

गालावरच्या खळीत,

कळी तुझीच खुलते!

 

आरसाही कुठे राहिला माझा,

त्यात तूच मला रे दिसतोस!

माझे प्रतिबिंबही हरवले आता,

दर्पणातही हसतांना भासतोस!

 

लावलेस वेड तुझे तू मला,

देशील ना रे आयुष्यभराची साथ!

तुझ्या प्रेमाच्या समईतील,

प्रकाश देणारी असेल मी रे वात!

© श्री आशिष बिवलकर

बदलापूर 

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 229 – बुन्देली कविता – पूँछत हैं नाँव… ☆ स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र”

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे सदैव हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते थे। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं  आपकी भावप्रवण बुन्देली कविता – पूँछत हैं नाँव।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 229 – पूँछत हैं नाँव… ✍

(बढ़त जात उजयारो – (बुन्देली काव्य संकलन) से) 

बोलत में सरम लगे पूँछत हैं नाँद

पूँछत हैं गाँव, पूँछत हैं नाँव

बोलत में सरम लगे पूँछ दे नाँव गाँव।

 

बेर बेर टेरत हैं देर देर हेरत हैं

जानें का बुदबुदात माला सी फेरत हैं।

चौपर सी खेलें अर सोचत हैं दाँव। पूँछत हैं नाँव ।

 

प्रान प्रीत जागी है फेंकी आँग आगी है

नदिया-सी उफन रई रीत नीत त्यागी है।

गोरस की गगरी खों मिलो एक ठाँव। पूछत हैं गाँव।

 

पूँछ पूँछ हारे हैं लगें को तुमारे हैं ?

राधा सी गोरी के कही कौन कारे हैं ?

औचक मैं खड़ी रही पकर लये पाँव। पूँछें वे नाँव गाँव।

© डॉ. राजकुमार “सुमित्र” 

साभार : डॉ भावना शुक्ल 

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 229 – “आज आँगन के थके हाथों…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत “आज आँगन के थके हाथों...)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 229 ☆।। अभिनव गीत ।। ☆

☆ “आज आँगन के थके हाथों...” ☆ श्री राघवेंद्र तिवारी 

चुप रहो कि तनिक दूरी पर

रुकी घबराहटें

पास में आती हुई सहमी

सुरों की आहटें ॥

 

घर नहीं बोला यहाँ कुछ

सहन कर मजबूरियों को

पीठ पर लादे समय की

अनगिनत कुछ दूरियों को

 

कई मुखड़ों में बनी हैं

कष्ट की ताजा धुने क्यों

मुस्कराते इन कपोलों में

कहीं कुछ सलवटें  ॥

 

आज आँगन के थके हाथों

छपा इतिहास सारा

कहरहा भूगोल कैसे क्या

यहाँ पर हो गुजारा

 

कुटुम का मुखिया समाजों

की युगों से छानता है

गुम हुई परिवार की

ताजातरीं वो तलछटें ॥

 

अब बची परिपक्व होती

हुई केवल एक आशा

किन्तु ओढे हुये है

गृहस्वामिनी भीषण निराशा

 

देह जिसकी सहन न

कर पा रही थी जो उसीके

कठिन हिस्से आपड़ी

दुर्दांत गतिमय करवटें हैं ॥

©  श्री राघवेन्द्र तिवारी

14 – 03 – 2025 

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा- सोंध ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – लघुकथा- सोंध ? ?

इन्सेन्स- परफ्यूमर्स ग्लोबल एक्जीबिशन’.., इत्र बनानेवालों की यह यह दुनिया की सबसे बड़ी प्रदर्शनी थी। लाखों स्क्वेयर फीट के मैदान में हज़ारों दुकानें। हर दुकान में इत्र की सैकड़ों बोतलें। हर बोतल की अलग चमक, हर इत्र की अलग महक। हर तरफ इत्र ही इत्र।

अपेक्षा के अनुसार प्रदर्शनी में भीड़ टूट पड़ी थी। मदहोश थे लोग। निर्णय करना कठिन था कि कौनसे इत्र की महक सबसे अच्छी है।

तभी एकाएक न जाने कहाँ से बादलों का रेला आसमान में आ धमका। गड़गड़ाहट के साथ मोटी-मोटी बूँदें धरती पर गिरने लगीं। धरती और आसमान के मिलन से वातावरण महकने लगा।

दुनिया के सारे इत्रों की महक अब अपना असर खोने लगी थीं। माटी से उठी सोंध सारी सृष्टि पर छा चुकी थी।

?

© संजय भारद्वाज  

11:07 बजे , 3.2.2021

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️💥 श्री शिव महापुराण का पारायण सम्पन्न हुआ। अगले कुछ समय पटल पर छुट्टी रहेगी। जिन साधकों का पारायण पूरा नहीं हो सका है, उन्हें छुट्टी की अवधि में इसे पूरा करने का प्रयास करना चाहिए। 💥 🕉️ 

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares