आज सकाळी-सकाळी गणेशाचे नांव घेऊन घराच्या बाहेर पडले. अहो! पडले म्हणजे पडले नाही बरं का! म्हणजे सकाळी वॉक करायला निघाले. पडून राहणे किंवा पडणे हे दोन्हीच टाळायला ह्या वयात वॉक करणे गरजेचे आहे की नाही!
रस्त्यावर चालताना मागून ओळखीचा आवाज कानाच्या पडद्यावर पडताच जोराने कंपन व्हायला लागले. एवढ्या जोराने हाक मारायला काय झालं? जणू ट्रेनची हॉर्नच मागून सोडली असावी. रेलगाडी पण उगाच हॉर्न वाजवत येते. लोकं घरून उशिरा निघतील पण प्लेटफॉर्म क्रॉस करायला गाडीच्या रुळाचाच वापर करतील. अहो त्यांचा सिद्ध अधिकार आहे! तसेच रुळाच्या कडेला ढुंगण उंच करून बसणारे सुद्धा तसेच राहणार. रेल्वेने कितीही स्वच्छता मोहिमी चालवल्या तरीही त्यांच्या बुद्धीत प्रकाश पडणे शक्यच नाही. तिथे असलेल्या शेणाची सफाई कोण करणार!
“बाब्या काय रे कशाला ओरडून घसा कोरडा करतोयेस! हे पुण आहे. विसरला कां? सायकलीची हवा काढणारे बेशिस्त म्हणायला सोडणार नाही बरं का!”
“काकू तुला बधाई द्यायला आलो. ‘हॅपी हिंदी डे’. ”
“थैंक्यू रे! पण बाब्या तुला कसे माहीत की आज हिंदी दिवस आहेत? तुझा तर काहीच संबंध नाही हिंदीशी. खरं तर गोड तेल खाणाऱ्यांना कडू तेलाचा स्वाद कसा कळणार?”
“काकू सोशल मिडिया झिंदाबाद! जिकडे डोळे फिरवा तिकडे हिंदीच दिसतेय. आता हिंदी नस्ती भाषा राहिली कां? ब्रॅण्ड झालाये काकू! ब्रॅण्ड! माझ्या मित्राने आत्मनिर्भर भारतात नवा धंदा सुरू केला आहे. माहितीये काय नांव ठेवलंय त्याने! ‘जल’ हे त्याच्या कंपनीचे नांव आहे. त्याला कुठे हिंदी विंदी येते. सगळी कामे इंग्रजीत करतो पण ठसका पाहा त्याचा! एकदम बत्तीस कॅरेट सारखा चमकतोय त्याचा ब्रॅण्ड”.
“काय विकतो रे! पाणी?”
“अगं हे असले काम तो काय करणार! चाळीत टोळ्या राहतो न तोच आपल्या खडखड्या डंपर मधे पाणी आणतो. सद्याला हेच सगळं करायचं असतं तर एवढं शिकला कशाला असता? शिक्षणात केवढा पैसा इन्वेष्ट केलाय त्यानं! पाण्या सारखा वेष्ट करणार कां?”
“हो खरंय! मोफत मिळालेल्या वस्तुंना किंमत नसतेच. पाणी वायफळ घालवू शकतो. पैसा कसा घालवणार?”
“अगं काकू! सद्या वॉटर स्पोर्ट्स करवतो. त्या शिवाय शोकीनांना क्रूज, बोटी सगळं भाड्यावर देतो. मोठमोठे फिल्मस्टार पण येतात. हे सगळं ‘जल’ मुळे होतये. नावामुळे कष्टंबर मिळतात. मी पण असेच काही एडवेंचर करायला बघतोयं. पण करणार हिंदीतच. सध्याच्या काळाचा फॅशन आणि डिमांड आहे हिंदी!”
“मग शीक खरं!”
“शिकून काय करणार काकू! कष्टंबर हिंदीत कुठे बोलतात! आणि थोडी फार तर मला पण येतेच. आपल्या बिझनेसचे नांव मी हिंदीतच ठेवणार हे खरंय”.
“खरंय बाब्या! हिंदी गाजणार नाही पण तुम्हाला चमकावणार”.
“काकू तू परदेशात होती. तेथे फराटेदार इंग्रजी चालते न?”
“तेथे इंग्रजी खरच चालते. आपल्याकडे एक्स्प्रेसच्या स्पीडने धावते. किती माणसं तुटक बोलतात पण कोणी खाली पाहायला नाही दाखवत. तेथे अभिमानाची भाषा नाहीये ही. नुस्त ब्रिजचे काम करते. दोन माणसांना जोडते. आपल्या कडे उलट आहे. बाराखडी येत असे नसे पण अल्फाबेटस् सगळ्यांना येतात. नशीब पाहावे की बुलेट ट्रेन नसून आपल्या कडे त्या स्पीडने इंग्रजी धावते. आपलं सोडून पाळत्याच्या माघे धावणं हीच परंपरा आहे आपली. आपल्या कडे इंग्रेजी हाईक्लास आणि हिंदी विदाउट क्लास आहे”.
“काकू पुढं वाढायचं असेल तर इंग्रजी कम्पलसरी आहे”.
“माझा भाचा जपानला गेला तर तेथे त्याला जापानी शिकावी लागली. जेवढे वर्ष तेथे होता इंग्रजी घश्याबाहेर पडली नाही. तिची फास लागली नाही. तेंव्हाच मी समजले की भाषा मुळे आपले विचार आणि संस्कृती बदलते. इंग्रजी बोलता बोलता आपण त्यांचे संस्कार पण घेतलेच न”.
“तू एकदम बरोब्बर म्हणतेयेस काकू! चल आता मी निघतो. इंग्रजीच्या ट्यूशनाला जायची वेळ झाली आहे. बॉय!!”
☆ याद ना जाये… – लेखक – श्री श्रीनिवास बेलसरे☆ श्री सुहास रघुनाथ पंडित☆
काल संध्याकाळी सोसाट्याचा वारा सुटला होता. नंतर कितीतरी वेळ पाऊस नुसता कोसळत होता. सगळीकडे १५ मिनिटात पाणीच पाणी झाले. घराच्या उंच गॅलरीतून दिसणा-या रस्त्याच्या तुकड्यावर क्षणाधार्त रंगीबेरंगी छत्र्या फिरताना दिसू लागल्या. पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यावरील पाण्यात पडल्यावर वेडीवाकडी प्रतिबिंबे लक्ष वेधून घेत होती. कॉलनीच्या कंपाउंडमधील उंच वाढलेल्या झाडांच्या फांद्या आणि पाने अक्षरश: वेड्यासारखी हलत होती. गुंगीत घर सोडून चाललेल्या एखाद्याला कुणीतरी दंड धरून गदगदा हलवावे तसे! त्यावेळी शेंड्याजवळच्या पानामागे लपलेले एक कावळ्याचे घरटे दिसले. घरटे म्हणजे काय दोन फांद्या फुटत होत्या तिथे काड्याकाटक्यांचे तुकडे कसेबसे गोलगोल रचलेले. आता घरट्यात काहीच नसावे कारण पिल्ले असती तर कावळ्यांनी कोलाहल करून सगळा परिसर डोक्यावर घेतला असता. कावळेही कुठे दिसत नव्हते.
पावसाळ्यात हे ठरलेलेच असल्यासारखे चालू असते. अनेक पक्षांची पिले उडून गेलेली घरटी उध्वस्त होतात. पण त्याचे खुद्द त्या पक्षांनाही फारसे काही वाटत नाही. त्यांचे सगळे आयुष्य निसर्गाने कसे शिस्तीत बसविलेले असते. ठरलेल्या ऋतूतच जन्म, ठरलेल्या वेळीच प्रणयाराधन. ते झाल्यावर दिवसभर मनमुराद शृंगार. मग जेंव्हा दोनतीन नव्या पाहुण्याची चाहूल लागते तेंव्हा त्यांच्यासाठी तात्पुरता निवारा तयार करायची दोघांची लगबग. त्यासाठी दिवसभर आळीपाळीने कुठून कुठून काड्या, कापूस, तारा, काहीही जमा करत राहणे. मग पक्षीण अंडी देवून त्यावर दिवसदिवस बसून राहते. एका दिवशी अंड्यातून एकही पीस अंगावर नसलेले चिमुकले जीव बाहेर आले की काही दिवस डोळ्यात तेल घालून त्यांचे रक्षण. पिलांना मिळेल ते अन्न चोचीने भरवायची जबाबदारी मात्र आई-बाबा अशी दोघांचीही ! आणि पिले काही दिवसातच मोठी होऊन, उडून गेली की स्वत:ही त्या घराचा त्याग करून निघून जायचे. कसा अगदी संन्याशाचा संसार !
कालच्या त्या कावळ्यांच्या घरट्याचे अवशेष पाहताना सहज आठवले. लहानपणी कितीतरी गोष्टी अगदी वेगळ्या होत्या. मोठ्या शहरातील काही प्रशस्त बंगले, मोजकीच दुमजली घरे सोडली तर बहुतांश घरे बैठी आणि कौले किंवा पत्रे असलेली असायची. सिमेंटचे किंवा लोखंडी पत्रे लाकडी बल्ल्यांवर खिळ्यांनी ठोकून बसविलेले असत. सिमेंटचे पत्रे आणि पन्हाळीच्या उंचवटयाखालील एवढ्याश्या जागेत सायंकाळी एकेक चिमणी येऊन बसायची. रात्रभर तिचा मुक्काम घरात किंवा व्हरांड्यात असायचा. खाली जमिनीवर अंथरून टाकून झोपल्यावर आम्ही आज किती चिमण्या मुक्कामाला आहेत ते मोजायचो. रात्रीपुरत्या आमच्या पाहुण्या होणाऱ्या चिमण्या पहाट होताच बसल्या जागीच थोडी थोडी चिवचिव करून भुर्रकन उडून जात. चिमण्याशिवाय कोणताही पक्षी कधी घरात येत नसे.
चिमण्या कधीकधी छताजवळ घरटीही करत. मग अचानक अगदी बारीक आवाजात अधीर असे ‘चिवचिव’ ऐकू येऊ लागले की समजायचे चिमणीला पिल्ले झालीत. मग चिमणा चिमणी त्या पिल्लांना दिवसभर काही ना काही भरवत. पिल्ले अन्नासाठी फार अधीर होत. उतावीळपणे ती कधीकधी चिवचिवाट करून हळूहळू पुढे सरकत आणि त्यातले एखादे उंचावरून खाली पडे. ‘टप्प’ असा पिलू पडल्याचा अभद्र आवाज आला की जीव कळवळत असे. एवढासा जीव इतक्या उंचावरून जमिनीवर पडला की अर्धमेला होऊन जाई. पिकट लाल-पांढुरके लिबलिबीत अंग, पारदर्शक त्वचेतून दिसणा-या त्याच्या लाल निळ्या रक्तवाहिन्या, अंगापेक्षा बोंगा अशी डोनाल्ड डकसारखी पिवळी मोठी पसरट चोच, धपापणारे हृदय असा तो अगदी दयनीय गोळा असे. फार वाईट वाटायचे. लगेच आम्ही मुले दिवाळीतील पणती कुठून तरी शोधून आणायचो. तिच्यात पाणी भरून त्याच्याजवळ ठेवायचो. शेवटच्या घटका मोजत असलेले ते पिल्लू स्वत:ची मानसुद्धा उचलू शकत नसायचे. मात्र आम्हाला भूतदया दाखवायची फार घाई झालेली असल्याने वाटायचे त्याने घटाघटा पाणी प्यावे, ताजेतवाने व्हावे आणि उडून परत आपल्या घरट्यात जावून बसावे. अर्थात असे काही व्हायचे नाही. लहान मुले देवाघरची फुले असतात, म्हणे ! पण देव त्याच्या घरच्या अशा किती निरागस फुलांच्या प्रार्थना नाकारतो ना ! फार राग यायचा तेंव्हा देवाचा ! पिलू मरून जायचे. त्याच्या मृत्यूचे दृश्य मोठे करुण असायचे. सगळेच अवयव अप्रमाणबद्ध असल्याने विचित्र दिसणारे, मान आडवी टाकून मरून पडलेले पिल्लू, त्याच्या अवतीभवती आम्ही टाकलेले काही धान्याचे दाणे आणि आमच्या त्याला पाणी पाजायच्या प्रयत्नात जमा झालेले बिचा-याला भिजवून टाकणारे पाण्याचे थारोळे ! आम्ही अगदी खिन्न होऊन जायचो. मग आईकडून त्याच्या मृत्यूची खात्री करून घेतल्यावर आम्ही बागेत त्याचा दफनविधी पार पडीत असू. माणसाच्या पिलाच्या मनात जिवंत असलेले सा-या सृष्टीबद्दलचे ते निरागस प्रेम नंतर कुठे जाते कोणास ठावूक !
चाळीसमोर अशीच एक कुत्री होती. तिचे नाव चंपी. गडद चॉकलेटी रंगाची चंपी दुपारी बाराच्या सुमारास चाळीतल्या प्रत्येक घरासमोर जाई. घरातील बाई तिला आधल्या रात्रीच्या उरलेल्या भाकरीचा तुकडा टाकीत असे. तो खावून चंपी पुढचे घर गाठी. कधीकधी बायका आतूनच ओरडत, “काही नाहीये ग चंपे, आज. ” चंपी तशीच पुढे सरकत असे. चंपीला कसे कुणास ठावूक मराठी समजायचे. चंपीलाच काय, ३०/४० वर्षापूर्वीच्या त्या साध्यासरळ काळात गाय, बैल, घोडा, कुत्रीमांजरी, पोपट असे सगळ्यांनाच मराठी छान समजायचे. हल्लीसारखे त्यांच्यासाठी मराठी माणसाला इंग्रजी शिकावे लागत नसे.
पावसाळ्यात चंपीला हमखास पिले होत. त्यावर चाळीतील सगळ्या मुलांचा हक्क असे. पहिले काही दिवस पिलांचे डोळे बंद असल्याने चंपी पिलांजवळून हलायचीच नाही. मग चाळीतील बायका चंपी ज्या कुणाच्या बागेत, आडोसा बघून, माहेरपणाला गेली असेल तिथे जावून तिला भाकरी वाढीत. आम्ही मुले लांबूनच पिलांचे निरीक्षण करायचो. त्यातील पिले आम्ही बुकही करून टाकलेली असत. पांढ-याकाळ्या ठिपक्याचे माझे, काळे सत्याचे, चॉकलेटी न-याचे अशी वाटणी होई. पिले मोठी झाल्यावर, आम्ही त्यांचा ताबा घेत असू. अर्थात त्या काळच्या आईवडिलांच्या गळी असल्या फॅन्सी कल्पना लवकर उतरत नसत. तरीही एकदोन मुले त्यात यशस्वी होत. मग त्या पिलाला खाऊ घालणे, त्याच्यासाठी घरासमोरच्या अंगणात सातआठ विटांचे घर तयार करणे. त्यात त्याला जबरदस्तीने घुसवायचा प्रयत्न करणे अशा गोष्टी आम्हाला कराव्या लागत. अनेकदा पिलू रात्रभर रडे मग घरच्या दबावाने आम्हाला त्याची कायमची मुक्तता करावी लागे. आम्ही एकदोन दिवस तरी हिरमुसले होऊन जात असू.
कॉलेजला असताना एक फर्नांडीस नावाचा मित्र शेजारच्या दुस-या गावाहून येत असे. त्याच्या खिशात त्याने पाळलेली एक खार असायची. असा विचित्र प्राणी पाळणारा म्हणून फर्नांडीस आमच्या कॉलेजसाठी एक हिरोच होता. खार त्याचे ऐकून कॉलेजचे सर्व पिरीयडस होईपर्यंत खिशात गपचूप कशी काय बसून राहायची देवच जाणे. एक दिवस ती मेली. पण सगळ्या वर्गाला उदास वाटले.
तान्ह्या मुलांना पाळणाघरात आणि आईवडीलांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा आधुनिक ‘करीयरिस्ट’ काळ हा ! आता या असल्या पक्षी आणि प्राण्यांच्या लळ्याच्या गोष्टी तशा कालबाह्यच म्हणा ! पण जुन्या आठवणी आल्या की महंमद रफीच्या आवाजातले आठवणींबद्दलचे गाणेही आठवत राहते –
“दिन जो पखेरू होते, पिंजरे मे, मैं रख लेता,
पालता उनको जतन से, मोती के दाने देता,
सीने से रहता लगाये,
याद ना जाये, बीते दिनो की |”
*******
लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे
७२०८६ ३३००३
संकलन व प्रस्तुती : सुहास पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘चैतराम पवार…’ – लेखक श्री मिलिंद थत्ते ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
चैतराम पवार…
आपल्या अगदी जवळच्या माणसांचे, मित्रांचे जाहीर कौतुक करण्याचे निमित्त मिळाले की सोडू नये. चैत्राम पवार म्हणजे चैत्रामभाऊंना पद्मश्री जाहीर झाल्याचे काल वर्तमानपत्रात वाचून कळले. तसे त्यांना यापूर्वीही जे जे पुरस्कार मिळाले, ते त्यांच्याकडून कधीच कळले नव्हते. किंबहुना बारीपाड्यात त्यांच्या घरातल्या एका कोनाड्यात ते पुरस्कार गप-गुमान अंग चोरून बसलेले दिसत. मी २००० साली पहिल्यांदा बारीपाड्यात गेलो होतो. नंदुरबारच्या डॉ. गजानन डांग्यांनी साक्रीहून कोणाची तरी दुचाकी उधार घेतली आणि आम्ही दोघे बारीपाड्यात गेलो. गेलो म्हणजे ती दुचाकी अलिकडच्या एका गावात ठेवली आणि मग चिखल तुडवत पाऊस चुकवत बारीपाड्यात पोचलो. भाऊंच्या घरी चुलीजवळ बसून कोरडे झालो आणि घरच्या गुळाचा कोरा चहा प्यायलो. तिथपासून गेली २४ वर्षे मी चैत्रामभाऊंना ओळखतो-पाहतो आहे.
पहिल्या भेटीनंतर मी एका साप्ताहिकात त्यांच्या कामाबद्दल, बारीपाड्याबद्दल लेख लिहीला. तोच पहिला लेख होता, असं डॉ. फाटकांकडून नंतर मला कळलं. त्या वेळी ऑलरेडी बारीपाड्याच्या गावकऱ्यांनी श्रमदानाने शे-दोनशे बांध घातले होते, जंगल राखून पाणी अडवून गाव टँकरमुक्त केला होता, पाच ऐवजी चाळीस विहीरी झाल्या होत्या, स्थलांतर करण्याऐवजी गावातच राहून वर्षाला दोन पिके काढायला सुरूवात झाली होती. पुरूषांनी दोन मुले झाल्यानंतर नसबंदी करून घेतली होती. एकही कुटुंब दारिद्र्यरेषेखाली नव्हते. आणि वनव्यवस्थापनाच्या पुरस्काराच्या रकमेतून गूळ निर्मितीसाठी गुऱ्हाळ सुध्दा गावाने सुरू केले होते. हे सगळे होऊनही बारीपाड्याची कुठेही प्रसिद्धी नव्हती.
पुढच्या २४ वर्षात बारीपाड्याने विकासाचे अनेक पल्ले ओलांडले, नवे मापदंड निर्माण केले. भोवतालच्या ५०हून अधिक गावांना सामुदायिक वन हक्क मिळवून द्यायला मदत केली आणि तिथल्या वनसंवर्धनात मोठ्या भावाची भूमिका घेतली. अनेक पुरस्कार मिळाले. गावाची कीर्ती दुमदुमली. या सर्वांबद्दल आता गूगल वर शोधलंत तरी खूप काही वाचायला, पहायला मिळेल.
मला काही वेगळं या निमित्ताने सांगावंसं वाटतंय्… बारीपाड्याबद्दल नाही, या चैत्राम नावाच्या माणसाबद्दल.
तुम्ही त्यांच्या तोंडून बारीपाड्याचा विकास प्रवास ऐकलात, तर असं वाटतं की हा माणूस या प्रवासात फक्त साक्षीभावानंच होता. ज्या ज्या लोकांनी थोडीशी का होईना बारीपाड्याला मदत केली असेल, त्या प्रत्येकाचं नाव घेऊन हे श्रेय त्यांचे – असेच चैत्रामभाऊ सांगतात. आणि यात काहीही चतुराई वगैरे नसते, हे अतिशय प्रांजळपणे आणि निर्व्याज मनाने ते सांगत असतात. डॉ. आनंद फाटक, डॉ. श्री. य. दफ्तरदार यांची प्रचंड गुंतवणूक आणि मार्गदर्शन बारीपाड्याच्या प्रयोगांत होते. त्यांचे नाव चैत्रामभाऊ घेतातच, पण त्यापुढेही अशी कित्येक माणसांची नावे येतात, की ज्यांच्या हे गावीही नसेल की आपल्या किरकोळ भूमिकेलाही या माणसाने मोलाचं मानलं आहे. ‘मी तो हमाल भारवाही’ ही भूमिका इतक्या सच्चेपणाने जगताना मी कोणाला पाहिलेलं नाही.
एक उपजिल्हाधिकारी मला म्हणाले होते, हा माणूस इतका निरहंकारी आहे, हा खरंच नेता आहे का?
दुसरा गुण सांगावा तर असा की, गावातली इतर घरं आणि यांचं घर यात काहीही मोठा फरक नाही. मी अनेक आदर्श गावांचे नेते पाहिलेत, त्यांची घरं आणि त्यांच्याभोवतीचं वलय पाहिलं आहे. इथे असं काही वलय नाही. गावात वावरताना चैत्रामभाऊ आणि गावातले इतर कोणीही सारखेच वावरतात. वयाने वडील माणूस सहज चैत्या म्हणून हाक मारतो.
बारीपाड्यात आमच्या जव्हारच्या गावातल्या कार्यकर्त्यांची सहल घेऊन गेलो होतो. तेव्हाच्या गावात शिरल्यावर पहिल्या प्रतिक्रिया अशा होत्या – अरे यांची घरे तर आपल्यापेक्षा लहान आणि अगदीच साधी दिसतायत. इथे काय बघायला आलो आपण? आणि पुढच्या काही तासांत या प्रतिक्रिया बदलत गेल्या. अरे, यांच्याकडे वर्षभर शेतीला पाणी आहे, जंगलात वारेमाप साग आहे, इथून माणसं बाहेर कामाला जात नाहीत, पिकं तरी किती?
बारीपाड्याला विकासाची वेगळी दृष्टी आहे. अस्सल भारतीय, स्वतःत समाधान मिळवणारी दृष्टी. स्वयंपूर्ण, स्थिर, शांत जीवनाची दृष्टी. हीच विशेषणं चैत्रामभाऊंची आहेत.
जे अस्तित्वात असतं, ते सत्य – म्हणजे उलटं करून सांगायचं तर – ‘सत्य असतंच!’ ते सांगावं, घडवावं लागत नाही. चैत्रामभाऊंच्या जगण्यात, बारीपाड्याच्या विकासात – ते सत्य आहे.
आताच्या जगातला झगमगाटाचा पडदा दूर सारला, की ते सत्य दिसतं. ईशावास्योपनिषदातली हीच प्रार्थना आहे.
तसं सत्य सहज जगण्यात सापडलेला माणूस ते सांगायला, प्रचारायला धडपडत नाही. चैत्रामभाऊंचं कुठे भाषण ठेवायचं म्हटलं की पंचाईत असायची. कारण यांचं भाषण २-३ मिनिटात संपायचं. त्यामुळे मुलाखत ठेवायची, म्हणजे जितके प्रश्न येतील तितकी उत्तरं यायची. बरं त्यात एकदाही, चुकूनही ‘मी’ येत नाही, ‘आम्ही’ सुद्धा येत नाही, सतत ‘आपण’ असतो. ऐकणाऱ्यांना सुद्धा त्यांनी त्यात घेतलेलं असतं. तुम्ही काही केलं नसलंत, तरी तुमच्या सदिच्छा आम्हाला उपयोगी पडल्याच – अशी सच्ची भावना असते.
यापुढेही मला वाटतं की, एखाद्या जाहीर कार्यक्रमात त्यांच्या नावापुढे पद्मश्री लावून लोक बोलू लागले, की चैत्रामभाऊ बसल्या खूर्चीतच अवघडतील. आणि कधी एकदा मी खाली उतरतो आणि मातीवर पाय टेकतो अशी भावना स्पष्ट दिसेल.
“आपल्याला सगळ्यांना पद्मश्री मिळाली आहे” असं वाटून घेण्याचाच हा क्षण आहे! अभिनंदनाचे लेख-पोस्ट काही लिहीले तरी तो माणूस काही अंगाला लावून घेणार नाही!
☆ “पराधीन नाही पुत्र मानवाचा” ☆ श्री जगदीश काबरे ☆
अवैज्ञानिक सिद्धांत लादू पाहणाऱ्या धर्ममार्तंडांच्या विरोधात उभा राहिलेला पहिला वैज्ञानिक गॅलिलिओ यांची ३००वी पुण्यतिथी ठरलेला ८ जानेवारी हा स्टीफन हॉकिंग यांचा जन्मदिवस आणि १४ मार्च हा आधुनिक विज्ञानेश्वर अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्मदिन हाच स्टिफन हॉकिंग यांचा मृत्यूदिन!
हॉकिंग यांना ‘का’ या प्रश्नाने आयुष्यभर पछाडले. खरेतर सामान्यही अनेकदा या ‘का’ प्रश्नास सामोरे गेलेले असतात. परंतु या सर्वसामान्यांना आणि हॉकिंग यांना पडणाऱ्या ‘का’ या प्रश्नाचा फरक असा की, जनसामान्य आयुष्याच्या रेट्यात या ‘का’ प्रश्नाला शरण जातात; तर हॉकिंगसारखा प्रज्ञावंत त्या ‘का’स पुरून उरतो.
पृथ्वीचा जन्म मुळात झालाच का? झाला असेल तर तो कशामुळे झाला? ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ असतो. मग या पृथ्वीलाही मृत्यू आहे का? असल्यास तो कधी असेल? आणि मुख्य म्हणजे तो कशाने असेल? अशा अन्य काही पृथ्वीही आहेत का? त्यांना शोधायचे कसे? या आणि अशा प्रश्नांचा, काळाचा शोध घेणे हे हॉकिंग यांच्या जन्माचे श्रेयस आणि प्रेयसही होते.
स्टीफन हॉकिंग हा जगातला सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक म्हणून मान्यता पावलेला, आइन्स्टाइनच्या पंक्तीला बसू शकेल असा माणूस. त्याच्यावर अगदी विशीतच मोटर न्यूरॉन डिसीज झाल्यामुळे त्याला व्हीलचेअरला खिळण्याची पाळी त्याच्यावर आली. या रोगात एकेका अवयवावरचा मेंदूचा ताबा नष्ट होत जातो. शेवटची चाळीसेक वर्ष त्याच्या मानेखालच्या सर्व अवयवांवरचा ताबा गेलेला आणि बोलताही येत नसलेल्या अवस्थेत तो जगला. म्हणजे चालत्याबोलत्या सामान्य मनुष्यापासून ते जवळपास निव्वळ विचार करणारा मेंदू – अशा शारीर ते बौद्धिक अवस्थेपर्यंत त्याचा प्रवास झाला. अशा स्थित्यंतरातही त्याने देवाची करुणा न भाकता आपल्या वैचारिक वैभवाने विश्वरचनाशास्त्रातली, कृष्णविवरांची, काल-अवकाशाची कोडी सोडवली. त्याच्या अनेक नव्या उत्तरांनी नवीनच प्रश्नांची दालनं उघडली.
अत्यंत खडतर आयुष्य जगावे लागत असताना कोणत्याही टप्प्यांवर त्यांची विज्ञाननिष्ठा कमी झाली नाही की अन्य कोणा परमेश्वर नावाच्या ताकदीची आस त्यांना लागली नाही. ‘‘इतकी वर्षे पृथ्वीचा उगम आदीवर संशोधन केल्यावर माझी खात्री झाली आहे की, परमेश्वर अस्तित्वातच नाही. या विश्वाचा, आपला कोणी निर्माता नाही की भाग्यविधाता नाही. म्हणूनच स्वर्ग नाही आणि नरकही नाही. या विश्वाचे अस्तित्व समजून घेण्यासाठी हाती असलेला क्षण तेवढा आपला आहे आणि तो मिळाला यासाठी मी कृतज्ञ आहे,’’ असे हॉकिंग म्हणत. याच अर्थाने ते धर्म या संकल्पनेचे टीकाकार होते. ‘‘धर्म हा अधिकारकेंद्रित आहे, तर विज्ञानाच्या केंद्रस्थानी असतात ते निरीक्षण आणि तर्क. धर्म आणि विज्ञानाच्या या संघर्षांत अंतिम विजय हा विज्ञानाचा असेल, कारण ते जिवंत आणि प्रवाही आहे.’’ हे त्यांचे मत विचारी माणसाला मान्य होण्यासारखेच आहे.
☆ “गंध ओला मोगऱ्याचा” (गझलसंग्रह) – कवी : श्री. विनायक कुलकर्णी ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक : गंध ओला मोगऱ्याचा (गझलसंग्रह)
कवी : श्री. विनायक कुलकर्णी मो. 8600081092
प्रकाशक: न्यू अथर्व पब्लिकेशन, इचलकरंजी
मूल्य : रु. १४०/-
सांगली येथील गझलकार कवी श्री. विनायक कुलकर्णी यांचा ‘ गंध ओला मोग-याचा ‘ हा गझल संग्रह मोग-याच्या फुलाप्रमाणेच सर्वांगाने बहरून आला आहे. या संग्रहात एकूण अठ्ठावन गझला असून त्यात निसर्ग, प्रेम, नैराश्य, विरह अशा सर्व भावनांवरील गझला आहेत. पण गझल फक्त एवढ्या विषयांपुरतीच मर्यादित नसून तिने सामाजिक, राजकीय वास्तव देखील दुर्लक्षिलेले नाही हे दाखवून देणा-या गझला या संग्रहात वाचायला मिळतात. त्यामुळे गझल म्हणजे फक्त प्रेम आणि विरह नव्हे तर सामाजिक भान व्यक्त करण्याचेही माध्यम आहे हे श्री कुलकर्णी यांच्या संग्रहातून स्पष्ट होते. त्यामुळे सर्वच गझलांचा किंवा गझल काव्य प्रकाराविषयी लिहिण्यापेक्षा श्री. कुलकर्णी यांच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे काही शेर या ठिकाणी समजून घ्यावेसे वाटतात.
स्वार्थ कसा साधावा हे शिकवावे लागत नाही. पण स्वार्थ साधत असताना तो किती टोकाचा असावा याचा विचार मात्र व्हायलाच हवा. पण आजची परिस्थिती काय आहे ? कालची भूमिका आज नाही, कालचे विचार आज नाहीत, कालचा मित्र आज मित्र नसेल अशीच अवस्था समाजात सर्वत्र दिसते आहे. त्याचे नेमके रुप कविने या शेरातून केले आहे.
” पहात असतो अवतीभवती माणुसकीचे रंग नवे
स्वार्थासाठी कसे बदलती रोजरोजचे ढंग नवे “
काळाबरोबर बदलले पाहिजे. पण हा बदल स्विकारताना आपण सभ्य समाजात राहतो हे ही विसरता कामा नये. आधुनिकतेचा स्विकार करताना योग्य अयोग्य काय याचाही विचार व्हायला हवा. या शेरामध्ये कवीने पोषाखातील होत जाणा-या बदलाबद्दल सुनावले आहे. भोक पाडलेले कपडे ही फॅशन होऊ शकते का ? तंग कपडे आरोग्यासाठी तरी योग्य आहेत का ? आजच्या फॅशन व अंधानुकरणाच्या जमान्यात हे फारसे कुणाला पटणार नाही. पण स्वतःच्या मनाला जे पटत नाही ते बोलून दाखवणे हा कविचा बाणा आहे.
“झाकत होते देह आपले पुरुष असो वा ती नारी
पोषाखाची झाली चाळण आता कपडे तंग नवे “
स्वार्थ आणि फक्त व्यवहारवाद यामुळे आपली अशी समजूत झाली आहे की पैसा फेकला की काहीही विकत घेता येते. अगदी माणूससुद्धा! त्यामुळे कविला असा प्रश्न पडतो की स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहून इमान राखणारा माणूस असेल तरी का ? म्हणजे बजबजपुरी एवढी माजली आहे की माणसाचा चांगुलपणावरचा विश्वासच उडायला लागला आहे. माणूस प्रामाणिक, तत्त्वनिष्ठ असू शकतो यावरचा विश्वास कमी होत चालला आहे.
“प्रसंग येतो पुढे आपल्या तसाच आपण विचार करतो
असतिल का हो अशी माणसे इमान ज्यांचे मळले नाही “
बदलत्या पिढीबरोबर विचारही बदलतात. विचारातील हा बदल माणसाच्या प्रगतीला पोषक असेल तर अवश्य स्वीकारावा. पण आज जुन्याकडे पाठ फिरवून फक्त ‘ नवे ते सोने ‘ ही वृत्ती वाढीस लागली आहे. त्यामुळे संस्कार करणे, करुन घेणे, झालेले संस्कार टिकवणे हे कालबाह्य वाटू लागले आहे. याचा परिणाम म्हणूनच नीतीमत्तेचा -हास होत चालला आहे. सुसंस्कृत नसलेल्याला माणूस तरी कसे म्हणावे. राक्षसाच्या मनातील वासना आणि वृत्ती आता माणसात दिसू लागली आहे.
” संस्कार आणि नीती गेली निघून आता
ओळीत राक्षसांच्या बसतात लोक सारे “
बदलत्या सामाजिक आणि राजकीय वस्तुस्थितीवर कवीचे बारीक लक्ष आहे. निवडणुकीच्या आधीची आणि नंतरची गटबाजी आता संसर्गजन्य झाली आहे असे त्याला वाटते. कारण ती एका गटापुरती मर्यादित राहिलेली नाही. घोडेबाजार हा नित्याचाच होऊन बसला आहे. सत्ता आणि संपत्तीच्या मोहापायी तत्वशून्य तडजोडींनी कमाल केली आहे.
” गटबाजीच्या संसर्गाने कमाल भलती केली
काही इकडे आले घोडे काही तिकडे गेले “
क्रियेवीण वाचाळता हा आजच्या काळचा मंत्रच होऊन बसला आहे. समाजासाठी काय करावे, देशासाठी काय करावे हे सांगणे फार सोपे असते. समाजाचे कल्याण करण्याच्या गप्पा या निवडणूक होण्यापुरत्याच असतात. कारण गोड बोलून, आश्वासनांचा पाऊस पाडून निवडून येणे एवढेच त्यांचे ध्येय असते. त्यामुळे
” कोणी देतो भाषण फुसके कल्याणाचे
त्याचा तुमच्या मतदानावर डल्ला आहे “
असे कविचे निरीक्षण आहे.
समाजाच्या हितासाठी केलेली चळवळ ही किती वरवरची व दिखाऊ असते याचा समाचारही कविने घेतला आहे. त्यासाठी कवी पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधत आहे. पाण्याचे नियोजन न करता होणारा पाण्याचा वापर हा पाणीप्रश्न गंभीर होण्याचे मुख्य कारण आहे. पण त्याकडे लक्ष न देता पाण्याची उधळपट्टी चालुच आहे आणि दुसरीकडे पाणी वाचवा म्हणून चळवळही चालू आहे. हा विरोधाभास कविने दाखवून दिला आहे.
“खर्चुन गेले जल सारे या जमिनी मधले
भाषणबाजी मधून नकली चळवळ आहे “
परंतु या प्रश्नांकडे, समस्यांकडे, समाजातील दोषांकडे एक कवी म्हणून कविला दुर्लक्ष करता येत नाही. कारण समाजात सुधारणा होऊन त्याची प्रगती होण्यासाठी कुणालातरी लढावे लागेल हे त्याला माहित आहे. म्हणून कवी म्हणतो
” नाते माझे अखंड आहे संघर्षाशी
धारिष्टाचे शस्त्र लढाया मीच बनवतो “
या सर्व गुणदोषांसकट कवी समाजावर प्रेम करतो. म्हणून तो म्हणतो
” झाली सकाळ आहे गाऊ नवीन गाणे
ती रात्र क्लेशदायी पुरती सरुन गेली. “
कविच्या इच्छेप्रमाणे लवकरच क्लेशदायी रात्र संपावी आणि नव्या युगाची गाणी गाण्यासाठी भाग्याची सकाळ उजाडावी एवढीच सदिच्छा !
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆.आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – जानते हैं हम शराफत आपकी…।)
साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 93– जानते हैं हम शराफत आपकी… ☆ आचार्य भगवत दुबे
(वरिष्ठ साहित्यकार श्री राजेंद्र निगम जी ने बैंक ऑफ महाराष्ट्र में प्रबंधक के रूप में सेवाएँ देकर अगस्त 2002 में स्वैच्छिक सेवा निवृत्ति ली। उसके बाद लेखन के अतिरिक्त गुजराती से हिंदी व अँग्रेजी से हिन्दी के अनुवाद कार्य में प्रवृत्त हैं। विभिन्न लेखकों व विषयों का आपके द्वारा अनूदित 14 पुस्तकें प्रकाशित हैं। गुजराती से हिंदी में आपके द्वारा कई कहानियाँ देश की विभिन्न पत्र-पत्रिकाओं में प्रकाशित हुई हैं। आपके लेखों का गुजराती व उड़िया में अनुवाद हुआ है। आज प्रस्तुत है आपके द्वारा श्री यशवंत ठक्कर जी की कथा का हिन्दी भावानुवाद “मायका“।)
☆ कथा-कहानी – मायका – गुजराती लेखक – श्री यशवंत ठक्कर ☆ हिन्दी भावानुवाद – श्री राजेन्द्र निगम ☆
‘मेहुल, क्या आज ऑफिस से कुछ जल्दी आ सकते हो ?’ स्वाति ने पूछा |
‘क्यों ?’
‘आज रात आठ बजे टाउन-हाल में कवि सम्मलेन है | उसमें कई अच्छे-अच्छे कवि आनेवाले हैं | तुम यदि आओ तो चलते हैं |’
हर वक्त जब भी कविता, नाटक या साहित्य का जिक्र होता, तो मेहुल को हँसी आ जाती | इस वक्त भी वह आ गई | वह हँसते-हँसते बोला ; ‘कवि साले कल्पना की दुनिया से कभी बाहर ही नहीं आते | उन्हें कुछ दूसरा भी कुछ काम-धंधा है या नहीं |’
‘मेहुल, यदि न जाना हो, तो मुझे कुछ आपत्ति नहीं है | लेकिन ऐसे किसी का अपमान करना ठीक नहीं है |’
‘लो, तुम तो नाराज हो गई | तुम तो ऐसे बात कर रही हो, मानो मैंने तुम्हारे मायकों वालों की तौहीन कर दी हो |’
हर बार की तरह स्वाति चुप हो गई | लेकिन वह मन ही मन मेहुल से सवाल किए बगैर रह नहीं सकी | ‘मेहुल, यह मेरे मायके वालों के अपमान करने जैसा नहीं है | मायका अर्थात क्या सिर्फ मेरे माता-पिता, भाई-बहन, चाचा-चाची, मामा-मामी आदि ही ? जिन कवियों की कविताओं ने मुझे प्रेम करना सिखाया, सपने देखना सिखाया, अकेले-अकेले मुस्कराना सिखाया, अकेले-अकेले रोना सिखाया, वे कवि क्या मेरे मायके के नहीं हैं ? आज मैं जो भी हूँ, जैसी भी हूँ, उसमें मेरे माता-पिता व मेरे शिक्षकों के साथ इन कवियों का भी अहम योगदान है | यह मैं तुम्हें कैसे समझाऊँ ? इसे समझने के लिए जब तुम्हारे पास यदि हृदय ही नहीं हो तब !’
स्वाति मेहुल के लिए टिफिन तैयार करने के काम में व्यस्त हो गई | मेहुल ऑफिस जाने की तैयारी में लग गया | लेकिन वातावरण में उदासी का रंग छा गया |
ऑफिस जाते समय मेहुल ने वातावरण को हल्का बनाने के इरादे से कहा, ‘सॉरी स्वाति, तुम तो जानती ही हो कि मैं पहले से ही कुछ प्रेक्टिकल हूँ और मुझे ऐसे कल्पना के घोड़े दौड़ाना अच्छा नहीं लगता | मुझे काम भी बहुत रहता है | जवाबदारी भी बहुत है | हमें अंश के भविष्य के बारे में भी विचार करना है | उसे किसी अच्छे होस्टल में रखना है | अच्छी पढ़ाई के बाद उसे विदेश भेजना है | ऐसे में साहित्य का राग ही अलापना नहीं है |’
स्वाति का मौन टूटा नहीं |
मेहुल ने वातावरण को हलका बनाने का प्रयास जारी रखा | ‘स्वाति, तुम्हें कविता, नाटक व कहानियाँ आदि का शौक है, लेकिन ये सब तो टीवी में आते ही हैं न ? अब तो नेट पर भी यह सब मिल जाता है |’
‘मेहुल, नेट पर तो रोटी-सब्जी भी होती है, लेकिन उससे पेट तो नहीं भरता | टीवी में हरे-भरे पेड़ भी बहुत होते हैं, लेकिन हमें उनसे छाँह तो नहीं मिलती | टीवी की बरसात हमें भिगोती नहीं है | ठीक है, कोई बात नहीं | कवि-सम्मलेन कोई बहुत बड़ी बात नहीं है | न जाएँगे, तब भी चलेगा | हमारी जवाबदारियाँ पहले हैं |’
स्वाति ने हँसने की कोशिश की, लेकिन उसकी रुआँसी आँखें मेहुल की नजरों से छिप न सकीं |
‘तुम्हें खुश रखने के लिए मैं कितनी जी तोड़ मेहनत करता हूँ, फिर भी तुम्हारी आँखों में आँसू ! तुम्हें क्या चाहिए, यह मुझे समझ नहीं आता |’ मेहुल की आवाज कुछ तेज हो गई |
‘मुझे मेरा गुम हुआ मेहुल चाहिए | जो छोटी-छोटी बातों से खुश हो जाता था |’ स्वाति किसी तरह कुछ बोल सकी |
‘छोटी-छोटी बातें !’ मेहुल हँसा और ऑफिस जाने लिए निकल गया |
अकेली रह गई स्वाति और वह जी भर कर रोती रही | वह सोचने लगी | ‘ऐसी जिंदगी, अब जी नहीं सकते, लगता है यह तो अब रोज मानो कॉपी-पेस्ट होती जा रही है | इसमें से अब नया कुछ भी बनने से रहा | जो बनना था, वह बन गया | अब तो जो रोज बनता है, वह सब एक जैसा | कविता, नाटक, संगीत, प्रवास इन सब के बगैर जिंदगी रुक नहीं जाती है, लेकिन इन सब के होने से जिंदगी को एक गति मिलती है | लेकिन इन सब को समझने के लिए मेहुल के पास वक्त नहीं है | शयद उसकी जिंदगी तेजी से भाग रही ट्रेन जैसी है और मेरी जिंदगी यार्ड में पड़े किसी डिब्बे जैसी !’
काम पूरा कर वह बिस्तर पर लेटी और बिस्तर पर पड़े-पड़े यही सोचती रही | उसकी आँखें बोझिल होने लगीं |
जब मोबाईल की रिंग बजी, तब उसकी आँखें खुलीं | फोन मेहुल का था | बात शुरू करने के पहले स्वाति ने अपनी नजर घड़ी की ओर घुमाई | चार बजने वाले थे |
‘हलो, स्वाति, क्या कर रही हो ?’
‘बस अभी उठी हूँ |’
‘कह रहा हूँ कि तुम रिक्शा कर छह बजे शहर में आ जाना | मैं लेने आऊँगा, तो देर हो जाएगी | हम लक्ष्मी-हॉल पर इकट्ठे हो जाएँगे |’
‘लेकिन क्यों ? कुछ खरीदना है ? मेरे पास बहुत कपड़े हैं और अब…’
‘मैं इकट्ठे होने की बात कर रहा हूँ, खरीदी करने की नहीं | मैं फोन रख रहा हूँ | काम में हूँ | आने का भूलना नहीं |’
‘ठीक है |’ स्वाति ने जवाब दिया या देना पड़ा |
स्वाति सोचने लगी, ‘अब मुझे मनाने के इरादे से एकाध साड़ी या ड्रेस दिलाने की बात करेंगे | लेकिन उसका क्या अर्थ है ? छोटी-छोटी खुशियों में अब उसकी कोई दिलचस्पी नहीं | उसकी गणना अलग ही तरह की है | लेकिन आज तो इंकार ही कर देना है | मुझे कपड़े और गहने इकट्ठे नहीं करने हैं |’
वह लक्ष्मी-हॉल पहुँची और वहाँ मेहुल अपनी बाईक पार्क कर उसकी प्रतीक्षा करता हुआ खड़ा था |
‘मेहुल, कुछ खरीदी करना है ?’ स्वाति साड़ी की दुकान की ओर नजर घुमाते हुए बोली |
‘हाँ ‘
‘क्या खरीदना है ?’
‘यह’ फुटपाथ पर बैठी एक बाई सिर को सुशोभित करनेवाले बोर बेच रही थी, मेहुल ने उसकी ओर हाथ से इंगित किया |
‘ओह ! इसकी तो मुझे वास्तव में बहुत जरूरत है |’ स्वाति मानो उस ओर दौड़ गई | वह बोर पसंद करने में मशगूल हो गई |
मेहुल स्वाति को मानो समझ रहा हो, ऐसे उसकी ओर देखने लगा |
‘दस रूपए दो न |’ स्वाति मेहुल की ओर देख कर बोली |
‘क्रेडिट कार्ड नहीं चलेगा ?’ मेहुल ने मजाक में पूछा | मेहुल ने एक लंबे अरसे के बाद इस प्रकार की मजाक की थी | स्वाति को अच्छा लगा |
बोर खरीदने के बाद मेहुल ने स्वाति से कपड़े खरीदने की बात की, लेकिन स्वाति ने इंकार कर दिया |
‘तो चलो, बाजार का एक चक्कर लगाते हैं | शायद बोर जैसी ही कुछ और भी चीज मिल जाए |’ मेहुल ने मजाक की |
स्वाति याद करने की कोशिश करने लागी कि वह आखिर में इस बाजार में कब आई थी| निश्चित दिन तो याद नहीं आया, लेकिन करीब पंद्रह वर्ष पहले के दिन याद आ गए, जब मेहुल का धंधा कुछ-कुछ जमने लगा था | कमाई कम थी, इसलिए खरीदी करने के लिए इस बाजार में आना पड़ता था |
बाजार आज भी चीजों व लोगों से भरा हुआ था | गरीब व माध्यम वर्ग के लोग कपड़े, चप्पल, कटलरी, खिलौने जैसी वस्तुएँ खरीद रहे थे | व्यापारी अपनी चीजें बेचने के लिए जाजम आदि बिछा कर बैठे हुए थे | उनमें से तो कई के लिए चार-छह वर्ग फिट जगह भी कमाई के लिए पर्याप्त थी | वे ग्राहकों को आकर्षित करने के लिए उनमें जो भी कौशल थी, उसका वे उपयोग कर रहे थे | ग्राहक भाव लम करने के लिए रकझक कर रहे थे | व्यापारियों की चिल्लाहट, भोंपू व सीटियों का संगीत, जोर से बज रहे गीत, ‘जगह दो… जगह दो’ व ‘गाय आई… गाय आई’ जैसी चीखें, ये सब उस बाजार के वातावरण को जीवंत बना रहे थे |
स्वाति को एक लंबे समय के बाद ऐसे जीवंत वातावरण का अनुभव हो रहा था | उसे कोई पुराना सगा-संबंधी मिल गया हो, उस तरह का आनंद मिल रहा था | वस्तुएँ खरीद रहे ग्राहकों की आँखों में दिखाई दे रही आशा, उमंग, लाचारी जैसे भाव उसे अपने स्वयं के लगे | वर्षों पहले वह इसी प्रकार के भाव के साथ इस बाजर में अक्सर आती थी |
दोनों कपड़ों के एक ठेले से कुछ दूर खड़े रह गए | उन्होंने देखा कि एक बाई उसके बेटे के लिए कपड़े खरीदने के लिए आई थी | उसने ठेलेवाले के पास से लड़के के माप के एक जोड़ी कपडे लेकर लड़के को पहनाए | लड़का भी नए कपड़े पहन कर बहुत खुश था, अब मात्र रकम का भुगतान करना ही शेष था और इसलिए वह बाई भाव के लिए व्यापारी के साथ रकझक कर रही थी |
‘मेहुल, तुम्हें याद है ? अंश का पहला जन्मदिन था और तब हम उसके कपड़े लेने के लिए इसी बाजार में आए थे |’ स्वाति ने बालक की ओर प्रेम भरी नजरों से देखते हुए पूछा |
‘हाँ, लेकिन तब हमारी मजबूरी थी | कमाई कम थी न ?’
‘कमाई कम थी, लेकिन जिंदगी छोटी-छोटी खुशियों से छलकती रहती थी ! मैं भी इस बाई की तरह व्यापारियों के साथ रकझक करती थी और कीमत कम करवाने के बाद बहुत खुश हो जाती थी |’
लेकिन आज उस बाई और उसके लड़के के नसीब में शायद ऐसी खुशी नहीं थी | बहुत रकझक के बाद ठेलेवाले व्यापारी ने जो भाव कहा था, उस भाव का वहन करने की सामर्थ्य बाई में नहीं थी | उसके पास बीस रूपए कम थे | बीस रूपए कम लेकर वह कपड़ा देने के लिए गिडगिडा रही थी, लेकिन व्यापारी ने भी उसकी मजबूरी दर्शाई वह बोला, ‘बहनजी, इससे अब एक रुपया भी कम नहीं होगा | मेरे घर भी, मेरा परिवार है, मुझे वह भी देखना है न ?’
अंत में उस बाई के पास एक ही उपाय शेष रहा कि वह लड़के के शरीर पर से कपड़ा उतार कर व्यापारी को लौटा दे | वह जब वैसा करने लगी, तो लड़के ने बिलख कर रोना शुरू कर दिया | देखते-देखते बालक की आँखों से अश्रुधारा बहने लगी | बच्चा अपनी भाषा में दलील करने लगा कि, ‘माँ, तुम मुझे यहाँ नए कपड़े दिलाने लाई हो तो फिर क्यों नहीं दिला रही हो ?’ बाई ने उसे समझाया, ‘बेटे, मान जाओ, ये कपड़े अच्छे नहीं हैं, तुम्हारे लिए इससे भी अच्छे कपड़े लाएँगे |’ लेकिन लड़के को वह बात गले नहीं उतर रही थी | उसका झगड़ा चालू ही था | बालहठ के समक्ष बाई धर्म-संकट में आ चुकी थी | वह बालक के शरीर पर से जोर लगाकर कपड़े को उतारने की कोशिश कर रही थी और बालक के पास जितनी ताकत थी, उससे वह कपड़े को पकड़े हुए था |
अब मेहुल से नहीं रहा गया | वह तुरंत ठेलेवाले के पास पहुँचा | उसने व्यापारी से, बाई न सुन सके, उतनी धीमी आवाज में पूछा, “कितने कम पड़ रहे हैं ?’
‘साहब, बीस रूपए | मैं जितना कम कर सकता था, उतने कम किए, लेकिन अब कम नहीं कर सकता हूँ | नहीं तो मैं बालक को रोने नहीं देता |’
‘तुम उन्हें कपड़ा दे दो | वे जाए, उसके बाद मैं बीस रूपए देता हूँ | उन्हें कहना नहीं कि बाकी की रकम मैं दे रहा हूँ, नहीं तो खराब लगेगा |’ मेहुल ने यह धीमे से कहा और स्वाति के पास आ गया |
‘’रहने दो | ठीक है, पहने रहने दो |’ व्यापारी ने बाई को कहा | ‘लाओ, बीस रूपए कम हैं, तो ठीक है, चलेंगे |’
बाई ने उसके पास जो थी, वह रकम व्यापारी के हाथ पर रख दी |
‘अब खुश ?’ व्यापारी ने लड़के से प्रेम से पूछा | बालक ने निर्दोष नजर से अपनी प्रसन्नता व्यक्त की |
बाई व्यापारी को आशीर्वाद देती-देती और बच्चे के गालों पर से आँसू पोंछती-पोंछती गई |
बाई और उसका लड़का कुछ दूर पहुँचे और तब मेहुल ने उस व्यापारी को बीस रूपए का भुगतान कर दिया |
‘आज मुझे मेरा गुम हुआ मेहुल वापिस मिल गया है |’ खुश होते हुए स्वाति बोली |
‘स्वाति, आज मैंने ऑफिस में गुम हुए मेहुल को ढूँढने के सिवा और कुछ काम नहीं किया | चार बजे वह मुझे मिला और मैंने तुम्हें तुरंत फोन किया |’ मेहुल ने कहा |
स्वाति ने मेहुल का हाथ पकड़ लिया | ‘चलो, अब मुझे कुछ नहीं चाहिए, जो चाहिए था, वह मिल गया |’
‘अरे ! यहाँ तक आए हैं तो भला राजस्थानी कचोरी खाए बगैर कैसे जाएँगे ?’
राजस्थानी कचोरी खाने के बाद उन्होंने उस हॉटल में आइसक्रीम खाई, जिस हॉटल में उन्होंने अंश को पहली बार आइसक्रीम खिलाई थी |
बाजार में एक चक्कर लगाकर वे दोनों बाईक के पास फिर आए |
मेहुल ने स्वाति को बिठाया और बाईक को दौड़ाया | उसने घर की ओर का रास्ता नहीं लिया, इसलिए स्वाति ने पूछ ही लिया, ‘क्यों इस ओर ? घर नहीं चलना है ?’
‘नहीं, अभी एक ठिकाना और बाकी है |’ मेहुल ने जवाब दिया |
‘कहाँ ?’
‘नजदीक ही है ?’
उस नजदीक की जगह के बारे में स्वाति कुछ अनुमान लगाती रही | लेकिन उसके वे सब अनुमान गलत निकले, जब उस जगह पर मेहुल ने बाईक खड़ी की |
‘यहाँ जाना है |’ उसने जगह की ओर उंगली से इशारा करते हुए बताया |
काव्य-रसिकों का स्वागत करता हुआ टाउन-हॉल स्वाति को उसके मायके जैसा ही लगा |
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆ सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर ☆ संपादक– हम लोग ☆ पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
15 मार्च से आपदां अपहर्तारं साधना आरम्भ हो चुकी है
प्रतिदिन श्रीरामरक्षास्तोत्रम्, श्रीराम स्तुति, आत्मपरिष्कार मूल्याकंन एवं ध्यानसाधना कर साधना सम्पन्न करें
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈
(Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.
We present Capt. Pravin Raghuvanshi ji’s amazing poem “~ Echoes of Love… ~”. We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji (who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages) for this beautiful translation and his artwork.)