मराठी साहित्य – विविधा ☆ वयाने तरुण व विचारांनी म्हातारा भारत… ☆ श्री हेमंत तांबे ☆

श्री हेमंत तांबे 

🔅 विविधा 🔅

☆ वयाने तरुण व विचारांनी म्हातारा भारत… ☆ श्री हेमंत तांबे 

🌹 *वयानं तरुण व विचारांनी म्हातारा भारत हे चित्र आपण बदलू शकतो 🌹

🌷 गोष्ट अशी आहे, चीनमध्ये एक कृतिशील विचारवंत लाओत्से ऐंशी वर्षांचा म्हाताराच जन्माला आला. डोक्याचे केस चक्क पिकलेले आणि चेहऱ्यावर सुरकुत्या ! हा लाओत्से म्हणजे आपल्या कडील बुध्द म्हणू शकता ! पण लाओत्सेचे विचार आजही मार्गदर्शक आहेत !! तरूण आहेत !!! त्याच्या जन्माची गोष्ट अविश्वसनीय आहे, कोणीही विश्वास ठेवणार नाही, माझाही नाही……. पण आपण प्रतिकात्मक रित्या असा विचार करू शकतो……… कारण भारतीयांची मानसिकता तपासली तर या चीनी गोष्टीवर विश्वास ठेवावा लागतो.

🌷 बहुतांश भारतीय म्हातारेच जन्माला येतात, मी वयानं म्हणत नाही, तर दृष्टीनं विचारानं आचारानं ! माणसाचं शरीर जवान मर्द असू शकतं, पण मन भूतकाळात रमुन म्हातारं झालेलं असू शकतं !

🌷 आपल्याला सर्वत्र तरुण दृष्टिस पडतील, पण तरुणाईसाठी मुलभूत गोष्टींची वानवा तुम्हाला दिसेल. मी युवक त्यालाच म्हणेन ज्याची ओढ भविष्याकडे असेल. Young is that one, who is future oriented and old is that one who is past orinted ! कोणत्याही वयस्कर व्यक्तीला भेटा, तो भूतकाळातील आठवणीत रमलेला दिसेल. तो पुढे म्हणजे भविष्यात पाहणार नाही, कारण त्याला मृत्यू दिसत असतो. जवान मात्र भविष्यात पाहील, कारण त्याला मृत्युची भिती नसते, काही अदम्य करण्याची इच्छा असते ! आपण रशिया, अमेरिका किंवा इतर प्रगत राष्ट्रांतील युवक पाहा. ते अंतरिक्षात यात्रा करण्याची इच्छा ठेवतात. आकाशाला गवसणी घालण्याची इच्छा बाळगून आहेत आणि भारतीय तरुण पहा भविष्याची कोणती कल्पना, योजना, Utopia नाही….. गेल्या दहा वर्षात चित्र बदलू लागलंय मात्र तरुणांची संख्या आणि त्यांची भविष्या बाबत वास्तव स्वप्नं यांचं प्रमाण अत्यंत व्यस्त आहे ! आपण भविष्यासाठी जगतो, भविष्यासाठी स्वप्नं रंगवतो….. पण जर भविष्यासाठी स्वप्न नसेल तर भविष्य अंधकारमय आहे, निश्चित समजा !

🌷 आपण भुतकाळात फार रमतो, भुतकाळ संपन्न होता हे सांगणारी पुस्तकं वाचतो, भुतकाळातील हिरो आपले आदर्श असतात. थोडक्यात आपला इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहावा इतका सुंदर होता, या आठवणीतच रममाण आपण असतो. आणि यात अयोग्य काहीच नाही……… पण त्यातील समृद्ध वारशाची चर्चाच करायची, की तो अंगिकारून पुढं जायचं ? यावर आपण गप्प असतो !

🌷 लक्षात घ्या. आपण कार चालवत आहात, कारला तीन आरसे पाठी दिसायला असतात. आता जर कार पुढं न्यायची असेल, तर तुम्ही पूर्णवेळ आरशात पाहू शकत नाही, त्यानं अपघात होईल ! भुतकाळात झालेल्या चुका पाहायच्या व त्या पुन्हा होऊ नये म्हणून बोध घेऊन पुढंच जायचं, त्या चुकांचा कोळसा उगाळत बसलात तर हात काळे होतील !….. भारताचा दोन हजार वर्षांचा इतिहास असा पाठी पाहून पुढं चालण्याचा आहे, म्हणून अपघात जास्त झाले. गेल्या दोन हजार वर्षांत आपण अनेक खड्ड्यात पडलो. यशाची उत्तुंग शिखरं आपण पादाक्रांत केली नाहीत ! गुलामी, गरिबी, हीनता, कुरुपता, दिनता, अस्वस्थता पाहिली आहे !….. आजही आपल्यातील अत्यल्प तरुण भविष्यातील उत्तुंग शिखरं चढण्याची आकांक्षा बाळगतात….. मी भुतकाळ व भविष्या बद्दल फार लिहित नाही, पण एक धारणा आपण मनाशी पक्की केली आहे……… सत्ययुग होऊन गेलंय आता कलियुग आहे, कोणतीही चांगली गोष्ट घडू शकणार नाही !…. *ही महामुर्खांची मानसिकता आहे !!*

🌷 राम, कृष्ण, नानक, महावीर, बुध्द, कबिर, छ शिवाजी, म राणा जे चांगले होते ते होऊन गेले, आता होणार नाहीत. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण भविष्यात चांगले महानुभाव तयार करत नाही, तोपर्यंत भुतकाळात असे महानुभाव होऊन गेले हे पटवून देणं कठीण जाईल. जोपर्यंत आपण भविष्यात नवनवीन श्रेष्ठता निर्माण करू शकत नाही, तोपर्यंत भुतकाळातील श्रेष्ठता काल्पनिकच वाटणार कारण, आपली चांगल्याच्या निर्मितीची परंपरा आपण खंडित केली !

🌷 जोपर्यंत आपण भविष्यातील कृष्ण राम तयार करत नाही, तोपर्यंत राम कृष्ण हे काल्पनिकच वाटणार….. कारण चांगला मुलगाच साक्ष देऊ शकतो, की माझा बाप चांगला होता ! जर आपण भविष्यात लाचार, दरिद्री, कंगाल, भिक्षांदेही असू तर कोणीही मान्य करणार नाही, भारतात सोन्याचा धूर निघत होता !………… आपण फक्त गुंड, बदमाश, चोर, लुटारू निर्माण केले तर छ शिवाजी, छ संभाजी, महाराणा प्रताप वगैरे विभुती इथं निर्माण झाल्या यावर कोण विश्वास ठेवील ? सद्यस्थितीतील तरुणाईनं दररोज नवनवीन प्रगतीची शिखरं काबिज केली नाहीत, तर आपण या महान विभुतींचे वारसदार आहोत, यावर कोण विश्वास ठेवील ?……. आपल्यातूनच जर बाबा आमटे, प्रकाश आमटे, विकास आमटे, अभय बंग, आंबेडकर, फुले, शाहू, धोंडो कर्वे, आगरकर, कर्मयोगी पाटील, विनोबा, स्वातंत्र्यवीर, विठ्ठल रामजी शिंदे, स्वामीनाथन, विलासराव साळुंखे वगैरे वगैरे कर्मयोगी तयार झाले, हे कशाच्या आधारावर आपण म्हणू शकतो ?

🌷 आज परिस्थिती बदलतेय, ध्येय धोरणं inclusive केली जात आहेत. विश्वगुरूची स्वप्नं आपल्याला दाखवली जाताहेत. प्रगतीचे मार्ग निष्कंटक केले जात आहेत, अशावेळी दूरदृष्टीनं भविष्याचा वेध घेऊन तरुणाईनं श्रेष्ठ ध्येयाप्रत पोचण्यासाठी सर्वस्व डावावर लावणं आवश्यक आहे ! टाचणी ते विमान निर्मितीसाठी आपण दुसऱ्यावर अवलंबून होतो….. आज परिस्थिती आमुलाग्र बदलली आहे, या बदललेल्या ecosystem चा फायदा जर तरुणांनी घेतला नाही, तर या तरुणांच्या ह्रासाला तरुणच जबाबदार आहेत, दुसरं कोणी नव्हे !

🌷 आज नाही तर उद्या संपूर्ण जग आपली खिल्ली उडवणार आहे, या जगद्गुरु विषयावरून….. जेव्हा कोणी म्हणेल मी श्रीमंत होतो, तेव्हा समजून जा तो गरीब आहे, जेव्हा कोणी म्हणेल मी ज्ञानी होतो, तेव्हा समजून जा, तो अज्ञानाच्या खाईत लोटला गेला आहे, जेव्हा कोणी म्हणेल आमची शान होती, तेव्हा समजून जायचं, ती शान आता मातीमोल झाली आहे !

🌷 भुतकाळात डोकावून पाहणं योग्य असलं, तरी भुतकाळ डोक्यात साठवणं धोकादायक आहे. कारण जगणं वर्तमानात असतं !

🌷 एका गोष्टीत आपण most productive आहोत आणि ती गोष्ट म्हणजे reproduction ! आपली लोकसंख्या आपण अमर्याद वाढवली. अमेरिकेला फक्त ४०० वर्षांचा इतिहास आहे आणि भारताला किमान १२–१५ हजार वर्षांचा इतिहास आहे. मग अमेरिका एवढी समृद्ध कशी झाली ? दुनियेतील अनेक देशांमध्ये भिकारी आहेत, पण एक पूर्ण देश भिकारी म्हणून १९७२ साली जगापुढे उभा कसा राहिला ?

🌷 मी युवा त्याला म्हणतो, जो भविष्याकडे उन्मुक्त आहे आणि वयस्कर म्हातारा म्हणजे ज्याला भुतकाळाप्रती प्रेम आहे, याला वयाचं बंधन नाही. आपण एक हजार वर्षे गुलाम होतो आणि केव्हाही परत गुलाम होऊ शकतो. म्हातारा मृत्यूला घाबरतो, तर जवान मृत्युला अंगावर घेतो. म्हातारा म्हणतो जे होतं ते माझ्या भाग्यात आहे, युवा किंवा जवान म्हणेल मी माझ्या मनगटाच्या जोरावर भाग्य लिहिन. म्हातारा म्हणतो जे होतंय ते देव करतोय, जवान म्हणेल मी जे करीन त्याला ईश्वरीय आशीर्वाद असेल. जवान संघर्ष तर म्हातारा अल्पसंतुष्ट……. ही अल्पसंतुष्टता आपण घालवली नाही, तर दुष्काळ, बेरोजगारी, महामारी, परावलंबित्व यांचीच पूजा आपण करत असतो ! यालाच म्हातारपण म्हणतात !!…… भविष्यासाठी योजना बनवा, अल्पसंतुष्टता सोडून द्या, एक निर्माणाची असंतोषकारी अभिप्सा आवश्यक आहे, एक सृजनाची आस पाहिजे…. *जेव्हा आपण दुःख, अज्ञान, रोगराई, दिनता, दरिद्रता, दास्यता संपवण्याची शपथ घेतो, तेव्हा भविष्य निर्मितीला सुरूवात होते !*
एक छोटीशी गोष्ट सांगून हे प्रबोधन थांबवतो.

🌷 एकदा जपान मध्ये एका छोट्या राज्यावर एका मोठ्या शत्रूनं आक्रमण केलं. ते सैन्य हद्दीवर येऊन उभं राहिलं… या छोट्या राजाचा सेनापती तरूण, साहसी, लढवय्या होता. तो जाऊन शत्रू सैन्य पाहून आला आणि राजाला म्हणाला महाराज, आपण या शत्रूशी लढून जिंकू शकत नाही, त्यांची खूप मोठी फौज आहे, आपले शिपाई कापले जातील व परत हरणं नशिबात येईल !… राजा सेनापतीला म्हणाला, तु तर जवान आहेस आणि असा म्हाताऱ्या सारखा वागतोस ?… आणि राजा नगरातील एका साधूकडे गेला आणि सर्व परिस्थिती सांगितली. अनेक वेळा राजा त्या साधूचा सल्ला घेत असे……. साधूनं राजाला सल्ला दिला, ताबडतोब त्या सेनापतीला तुरुंगात टाक. त्याची चुक झाल्येय. सेनापती मनानं हरलाय, त्यानं हार मानली आहे. आणि ज्यानं मनानं हार मानली, त्यानं प्रत्यक्षातील हार निश्चित केली !… मी युद्धासाठी निघत आहे!… राजानं सेनापतीला तुरुंगात टाकलं, पण विचार करत होता, या साधूला तर तलवार कशी धरायची हे सुध्दा माहीत नाही आणि हा युध्द कसं करणार ?

🌷 साधूनं तलवार घेतली व सर्व सैनिकांना आदेश देऊन युध्दावर निघाला. सैनिक साशंक होते. वाटेत एक देऊळ होतं. तिथं थांबून तो साधू सैनिकांना म्हणाला, मी देवाला विचारून येतो, युद्ध जिंकणार की नाही ?…. सैनिक म्हणतात, साधू महाराज, आपल्याला देवाची भाषा तर येत नाही….. साधू म्हणतो, मी हे नाणं देवाच्या पायावर ठेऊन वर उडवणार आहे. जर आपल्या राजाचा छाप वर आला, तर आपण युद्ध जिंकणार !…… आणि त्यानं तसं केलं. छाप वर आला…… साधूनं सांगितलं, आपण प्राणपणानं लढलो तर युद्ध जिंकणार आहोत, देवानं कौल दिला आहे !! आता आपण हरायचं असं ठरवलं तरी हरू शकत नाही, चला युद्ध सुरू करा, विजय आपलाच होणार आहे !!!

🌷 युध्द झालं. साधूची सेना प्राणपणानं लढली आणि जिंकली.

युध्दावरून परत येताना वाटेत ते देऊळ लागलं. साधू आपला नगराकडे निघालाय, सैनिक म्हणतात साधू महाराज, देवाचे आभार मानून पुढं जाऊया……..
साधू सांगतो, त्याची काहीच आवश्यकता नाही. नाण्याच्या दोन्ही बाजूला आपल्या राजाचाच शिक्का आहे !

🌷 ते सैनिक जिंकले होते, कारण विचार अंततः वस्तूत रुपांतरीत होतात. विचार घटना बनून जातात.

Sir Arthur Eddington – (Philosopher of science) says, “Things are thoughts and thoughts are things!

🌷 मी भारतीय मनाला युवा, तरूण, रसरशीत, उत्फुल्ल, कृतिशील पाहू इच्छितो. कारण आपण दोन हजार वर्षे म्हाताऱ्या सारखा विचार केला. हे भारतीय जनमानसातील म्हातारपण घालवलं पाहिजे ! विचार वय विसरायला लावतात, चांगला विचार करा, आचार सुधारेल, काम तयार आहे, आपल्या काम करणाऱ्या हातांची आवश्यकता आहे !

 🙏🌹शुभेच्छा ! 🌹🙏

© श्री हेमंत तांबे

पाटगाव. 

मो – 9403461688

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ धक्के पे धक्का… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ धक्के पे धक्का… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(“थांबा डॉक्टर, शांता.. “ मी हाक मारली. शांता कॉफीचे मग घेऊन आली. कॉफी घेता घेता मी म्हणाले

“डॉक्टर, तुमच्या मुलाचा फोन नंबर द्या आणि त्याला केंव्हा वेळ असतो? मी बोलेन त्याच्याशी. ”) इथून पुढे..

डॉ. कुमार गेले आणि तासानंतर लीना आली. मी तिला म्हटलं 

“काय एकदम यायचं नाही काय? कुमार एक तासापूर्वी गेले..

“हो ग. मला माहित आहे.. मीच त्याला चार वाजता तुझ्याकडे जायला सांगितलं होत.. मी मुद्दाम नाही आहे.. कारण म्हंटल त्याला स्पष्ट बोलूदे.. मी असताना त्याला अवघडायला नको. कसा वाटला तुला कुमार?

शांता मध्येच म्हणाली “एकदम क्यूट.. मस्त माणूस आहे लीना..

“हो ग.. किती मस्त.. कुठे दडून बसला होता.. मला आधी भेटला असता तर मी बिनलग्नाची राहिली नसते.

“पण मला भेटला ना..

“नशीबवान आहेस लीना.. आयुष्यात उशिरा का असेना पण अस्सल हिरा मिळाला.. मी बोलले त्याच्याशी.. त्याला लिव्ह इन मध्ये राहायचे आहे.. लग्न नाही करायचे.

“तोच तर प्रॉब्लेम आहे ग विजू.. मला असं लग्न केल्याशिवाय कुणाबरोबर राहणे अनैतिक वाटते.. मला एक वेळ चालेल पण माझी मुलगी महिमा.

. तिला अजिबात चालायचं नाही.

“तू बोललीस मुलीशी.. महिमाशी..

“हो.. ती कॅनडात रहात असली तरी आपल्या देशातील चालीरीती, धर्म याबद्दल तिला अभिमान आहे.. तिचे म्हणणे डॉ. ना म्हणावे.. करायचे तर लग्न करा.. हॆ असले लिव्ह इन नको.

“बापरे.. दोघांच्या मुलांच्या वेगळ्या तऱ्हा.. कुमारच्या मुलाचे म्हणणे.. लग्न नको लिव्ह इन चा विचार करा. तुझी मुलगी म्हणते.. लिव्ह इन नको लग्न करा..

“म्हणून तर तुझा सल्ला हवा ना विजू…. काय योग्य?

“लिव्ह इन म्हणजे तुम्ही एकत्र राहणार.. जे नवरा बायको करतात तेच सर्व.. एकमेकांची काळजी घेणार पण त्या दोघांनाही नवरा बायकोचे अधिकार नसणार.. म्हणजे नवरा मयत झाल्यानंतर पत्नीला त्याची पेन्शन मिळते.. किंवा त्याची संपत्ती, प्रॉपर्टी मिळते किंवा पत्नी मयत झाल्यानंतर नवऱ्याला तिची पेन्शन किंवा प्रॉपर्टी मिळते.. तसें इथे होत नाही. कारण त्याला किंवा तिला कायदेशीर पतीपत्नीचे अधिकार नसतात.

“मग ग… महिमा हॆ कधीच मान्य करणार नाही.. काही दिवसांनी त्याने आता आपण वेगळे राहू, असे म्हंटले तर?

“लिव्ह इनचे फायदे हेच आहेत.. बऱ्याच ठिकाणी आपण पहातो.. एखादा पुरुष किंवा स्त्री नाईलाजाने लग्न टिकवत असते.. भारतात विशेषतः स्त्रिया मरण येत नाही म्हणून नवऱ्या बरोबर नांदतात.. अनेकवेळा घटसफोटसाठी अर्ज करतात… तो मिळणे बऱ्याच वेळा कठीण असते.. अशा वेळी वाटते.. कायदेशीर लग्न नसतं तर सहज वेगळं व्हायला आलं असत. लिव्ह इन चे असे फायदे पण आहेत.

“मग काय करायचा ग विजू.. शांते तु सांग..

“मी असते ना तर तुझ्यासारखी विचार करत राहिले नसते.. असा पुरुष दिसतो का कुठे? शांता हसत हसत म्हणाली.

“तस करता येत नाही ना शांते… मुलीला दुखवून कस चालेल… उद्या कुमार बरोबर नाही जमलं तर आपली मुलगीच जवळ करणार ना.. ?

‘काही तरी मार्ग काढ विजू..

“तूझ्या मुलीचा फोन नंबर दे… मी तिला फोन करते.. मी कुमारच्या मुलाचा पण नंबर घेतलाय.. त्याच्याशी पण बोलणार आहे मी..

कॉफी घेउंन लीना गेली.

मी त्याच रात्री कुमारच्या मुलाशी फोनवर बोलले. पण तो आपल्या मताशी ठाम राहिला. दुसऱ्या दिवशी लीनाच्या मुलीशी बोलले.. ती पण आपल्या मताशी ठाम राहिली.

 पुढील रविवारी कुमार आणि लीना एकदम माझ्याकडे आली.. मग पाचजणांनी ग्रुप चर्चा केली. पण यातून काहीच सोल्युशन मिळेना.

 असेच काही दिवस गेले. एका सायंकाळी कुमार माझ्याकडे आला. मला खुप आनंद झाला.. माझ्या मनात आले बहुतेक काही मार्ग मिळाला असेल.

“या डॉक्टर.. खुप दिवसांनी आलात.. लीना पण आली नाही… फोन पण नाही केला तिने.

“लीना मला पण फोन करत नाही अलीकडे.. बहुतेक ती नोकरीं सोडून मुलीकडे जात्येय कॅनडाला..

“काय? आणि तुम्ही? तुमचा काही विचार केला नाही तिने?

“नाही ना.. पुन्हा मी एकटा..

डॉ. कुमार मान खाली घालून गप्प बसला. मी शांताकडे पाहिलं.. ती पटकन उठून कॉफी आणायला गेली.

“सांभाळा कुमार.. स्वतःला सांभाळा.

‘आता सांभाळत रहायचं.. दुसरं काय.. मनात काही असलं तरी आपण आपल्या मुलांना दुखवू शकत नाही.. आपला अंश असतो त्यांच्यात.. मुलं पण आईबाबाच्या मनाचा विचार करत नाहीत.. तीन वर्षांपूर्वी पत्नी गेली त्यानंतर लीना भेटली. ती मला योग्य वाटली.. सुस्वभावी.. सुसंस्कृत.. माझ्या मनातील पत्नीची जागा घेणारी होती ती… पण. पण.. पण त्यानिमित्ताने तुझी भेट झाली.. तिचीच मैत्रीण.. तशीच सुस्वभावी.. सुसंस्कृत पण प्रॅक्टिकल विचार करणारी.. फारश्या जबाबदाऱ्या नसणारी.. एकटी, लग्न न केलेली.. विजू.. आपण एकत्र राहू शकतो काय?

मला एकदम धक्का बसला.. अगदी अनपेक्षित प्रश्न.

“मी.. मी… मला समजले नाही. डॉक्टर.

त्याच वेळी कॉफी घेऊन आत येणारी शांता ओरडली..

“अग ते तुला विचारत आहेत विजू… हो म्हण.. हो म्हण..

मी रुमाल काढला आणि घाम पुसू लागले.

“मी तुला विचारतो विजू.. आपण… एकत्र राहू अखेरपर्यत.

“मला वेळ द्या डॉक्टर.. मला वेळ द्या.. मी भाबवून गेले आहे.

“ठीक आहे.. मी वाट पहातो..

डॉक्टर गेले. शांताने माझे अभिनंदन केले.

“ही संधी सोडू नकोस विजू.. तो भला माणूस आहे.. मला त्याने विचारलं असत तर मी आत्ताच त्याच्या गाडीतून गेले असते.

शांती हसत हसत माझी चेष्ठा करत होती.

पुढील गोष्टी जलद जलद झाल्या. मी लीनाला फोन करून डॉक्टरनी लिव्ह इन साठी आग्रह केल्याचे सांगितलं. ती कॅनडाला जायची होती.. तिने शुभेच्छा दिल्या. मी मग डॉक्टरच्या मुलाला. सुनेला फोन लावला आणि त्याना कल्पना दिली. त्याना सुद्धा त्यान्च्या ‘पपासाठी जोडीदारीण हवीच होती.

एका दिवशी मी डॉक्टरच्या घरी रहायला गेले. डॉक्टरने आठ दिवस सुट्टी घेतली आणि आम्ही सिमला मनाली फिरून आलो.

पुन्हा मी माझ्या ऑफिसमध्ये बसू लागले. शांता येत होतीच. मला पहाताच शांता म्हणाली..

“आयुष्यभर एकटी राहणार.. म्हातारपणी पेन्शन घेऊन वृद्धाश्रमात राहणार म्हणणाऱ्या विजू..

कसला धक्का दिलास सर्वाना..

“होय बाई, डॉक्टर भेटला म्हणूंन दिला धक्का..

“आता माझ्यासाठी शोध असा एखादा डॉक्टर नाहीतर प्रोफेसर..

मग देऊ” धक्के पे धक्का’… मिठी मारत शांती ओरडली.

“ होय होय.. देऊया – धक्के पे धक्का…”

– समाप्त –  

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रेमाचे झाड… ☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ प्रेमाचे झाड… ☆ सुश्री नीता कुलकर्णी

आमच्या सोसायटीच्या दारातच चिंचेचे झाड आहे. हळूहळू मोठे होत होत ते आमच्या गॅलरीपर्यंत आले. कोवळी पोपटी मऊशार पानं दिसायला लागली. त्यावरून अलगद हात फिरवावा असं वाटे.

हळूहळू पान मोठी होत जाताना बघणं फार आनंदाच वाटत होत. अगदी गॅलरीतल्या कठड्या जवळच फांद्या होत्या. काही फांद्या आतही आल्या…

एके दिवशी बघितलं तर गुलाबी पिवळसर रंगाची फुलं दिसली..

“अरे म्हणजे आता चिंचा येणार “

मी अगदी आतुरतेनी वाट पाहायला लागले. कोवळी नाजूक चिंच दिसली….

हळूहळू मोठी होत गेली… निसर्गाचा तो सोहळा बघताना फार मजा येत होती. रोज उत्सुकतेनी मी बघत होते.

होता होता चिंच चांगलीच मोठी झाली. चिंचेचे आकडे तयार झाले.

ते बघून शाळेच्या दारात चिंचा विकणाऱ्या मावशी आठवल्या… तेव्हा चिमणीच्या दाताने तोडलेला तुकडा आठवला. मैत्रिणी, शाळा, बाई आठवल्या……..

आणि नंतर या झाडाची गंमतच सुरू झाली.

घरी कोणी आलं की आधी त्यांना घेऊन गॅलरीत जायचं आणि हे झाड दाखवायचं..

एकदा मैत्रिण व तिची जाऊ आली. तिच्या जावेने तर फांदी हातात घेऊन अगदी गालाजवळ नेली… तिचे डोळे भरूनच आले होते. ती म्हणाली

“अग नीता आमचं घर म्हणजे फक्त दोन छोट्या खोल्या होत्या. पण दारात एक भलं मोठं चिंचेचे झाड होतं. त्याच्या सावलीतच आम्ही अभ्यास केला तिथेच मैत्रिणींशी गप्पा मारल्या. बाबा आणि आजोबा त्याच्या सावलीत झोपायचे. या झाडाला आज स्पर्श करून खूप समाधान वाटलं बघ.. त्याच झाडाची आठवण आली. “

विलक्षण प्रेमाने ती बोलत होती.

झाडाला बघून तिचा हळवा कोपरा उघडला होता…. निघताना पण तिने हलकेच फांदीवरून हात फिरवला…

झाड मोठं व्हायला लागलं. चिंचा आता छान वाळल्या होत्या.

एक मध्यम वयाच जोडपं आलं. झाड झोडपून देतो म्हणाले.

“आम्हाला थोड्या चिंचा द्या बाकी तुम्ही घेऊन जा “म्हणून सांगितलं.

त्यांनी चिंचा पाडल्या. पोती भरली. आम्हाला दिल्या. खुश होऊन निघाले. निघताना त्या बाईं झाडाजवळ गेल्या झाडाला डोकं टेकवलं….. कवटाळलं नमस्कार केला… देवाला करावा तसा..

मी बघत होते 

“फार झोडपल बघा झाडाला… पण चिंचा पाडण्यासाठी असं करावंच लागतंय बघा… “

त्या म्हणाल्या.

झाडाबद्दल तेवढी कृतज्ञता..

पुढे सांगत होत्या..

“आम्ही शेतकरीच आहोत भाऊकी सुरू झाली…. छोटा तुकडा वाट्याला आला.. मग शेती विकली. पैसा घेतला आणि आता शहरात आलो जगायला… “

काय बोलावं मला पण काही सूचेना…. डोळे भरून आले..

” बरं ताई येतो आम्ही परत पुढच्या वर्षी” असं म्हणून दोघं निघाले.

निघताना दादांनीही झाडाला डोकं टेकवलं…

हाडाचे शेतकरीच होते ते…

काही दिवसांनी लक्षात आलं की झाडावर दोन पक्षी येऊन बसत होते. त्यांचे विभ्रम चालायचे..

मैत्रीण आली होती तिला सहज सांगितले.

“हेच दोघे येऊन वेगळे बसतात बघ. प्रेमात पडलेले असतील बहुतेक” 

ती बघायला लागली..

” चल ये आत कॉफी करते”

म्हटलं तर ती तिथेच उभी…

लक्ष त्या पक्षांकडेच म्हणाली “पक्षांमध्ये जात, धर्म, पंथ नसतात हे किती बरं आहे ना… सुखात राहू दे यांची जोडी… “

पक्षांना बघून तीच खूप जुनं दुःख नकळत वर आलं होतं…

अशावेळी काही बोलूच नये..

शांतपणे मी आत आले.

नंतर पण घरी आली की गॅलरीत जाऊन झाड बघून यायची…

का… अजून काही आठवायची…………

खारूताईच चिंच खाणं बघत राहावं असं असायचं. बाईसाहेब मजेत दोन पायांच्या मध्ये चिंच धरायच्या आणि खात बसायच्या…

ह्या झाडाच्या तर मी प्रेमातच पडले होते.

री डेव्हलपमेंट होणार म्हणून काही दिवस घर सोडायचे होते. झाडाला सोडायचे वाईट वाटत होते.

दोन्ही नातवंड साहिल शर्वरी आले. चिंचा काढल्या. त्यांनाही झाडाबद्दल विलक्षण प्रेम वाटत होतं. ममत्व होतं….

“आता खाली पार्किंग येणार मग आपला फ्लॅट अजूनच वर जाणार आपल्या गॅलरीत हे झाड नसणार रे” साहिलला मी म्हणाले.

तर तो म्हणाला 

“अग आजी तोपर्यंत झाड पण वाढणार नाही का? मग ते आपल्या गॅलरीत येणार… “

“अरे हो खरंच की”

त्याच्या बोलण्याने मन आनंदुन गेलं.

येताना झाडाचाही निरोप घेतला.

भेटू काही वर्षांनी…

आणि मधुन मधुन येत जाईन रे तुला बघायला… झाडाला सांगितलं.

वारा आला.. फांद्या हलल्या…

माझं मलाच छान वाटलं…

असा जीव जडला की लांब जाताना त्रासच होतो…

मग तो झाडावर जडलेला असला तरी…

© सुश्री नीता कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ केव्हा शिकू आपण हे ??—  मूळ हिन्दी लेखिका – सुश्री सुधा मूर्ती ☆ अनुवाद व प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ केव्हा शिकू आपण हे ??—  मूळ हिन्दी लेखिका – सुश्री सुधा मूर्ती ☆ अनुवाद व प्रस्तुती  –  सुश्री प्रभा हर्षे

काही दिवसांपूर्वीची गोष्ट !

त्यावेळी मी रशियातील मॉस्को इथे होते. एका रविवारी मी बागेत गेले होते. उन्हाळ्याचे दिवस होते पण हलका रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता. हवेत सुखद गारवा आला होता. बाग अतिशय सुंदर होती. एका चबुतऱ्याखाली बसून मी त्या सुंदर वातावरणाचा आस्वाद घेत होते.

अचानक माझी नजर एका युवक युवतीच्या जोडीवर पडली. अगदी थोड्या वेळापूर्वीच लग्न झाले असावे त्यांचे !

ती नववधू अगदी सुंदर होती ! पंचवीस एक वर्षांची, सोनेरी केसांची आणि निळ्या चमकत्या डोळ्यांची ! जणू बाहुलीच ! नवरा मुलगाही साधारण त्याच वयाचा वाटत होता ! तडफदार आणि आकर्षक ! त्याने सैन्याचा पोशाख घातला होता. नववधूच्या अंगावर सॅटिनचा पांढराशुभ्र, मोती आणि नाजूक लेसने सजवलेला पोशाख होता. तिच्या दोन मैत्रिणीही तिच्यामागे उभ्या होत्या. नववधूचा पोशाख मळू नये म्हणून त्यांनी तो हातांनी उचलून धरला होता. एका मुलाने त्यांच्या डोक्यावर छत्री धरली होती. पाऊस पडत होता ना ! नववधूच्या हातात फुलांचा सुंदर गुच्छ होता. दोघांची जोडी अगदी साजेशी आणि सुरेख दिसत होती.

मी विचार करु लागले, ‘ बाहेर पाऊस पडत असताना इतके छान कपडे घालून हे दोघं लगेच असे बागेत का बरं आले असावेत ? लग्न लागल्यावर त्यांच्याकडेही एखादा काही समारंभ वगैरे असेलच की !’ 

मी आता त्यांच्याकडे लक्षपूर्वक पहात होते. ते दोघेही बागेत असलेल्या युद्ध-स्मारकाकडे गेले. हातातला गुच्छ त्यांनी त्या स्मारकावर अर्पण केला. तिथे दोन मिनिटे शांत उभे राहून त्यांनी मनोमन श्रद्धांजली वाहिली व ते हळूहळू परत फिरले.

आता मात्र माझी उत्सुकता मला स्वस्थ बसू देईना !

या जोडीबरोबर एक वृद्ध गृहस्थही आलेले होते. मी त्यांच्या जवळ जाताच त्यांनी माझी साडी पाहून विचारलं 

“ आपण भारतीय आहात का ?”

“ हो, मी भारतीय आहे. “

मग नकळत आमच्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. मी त्यांना विचारलं, “ आपल्याला इंग्रजी कसं येतं ?” 

“ मी काही दिवस परदेशात काम करत होतो.”

“ मला एक गोष्ट सांगता का ? हे नवविवाहित जोडपं लग्नानंतर लगेचच या युध्दस्मारकाला भेट द्यायला का आलं आहे ? “ न राहवून मी लगेच माझी शंका एकदाची विचारून टाकली.

ते म्हणाले, “ ही रशियातली परंपरा आहे. इथे कोणाचाही विवाह नेहमी रविवारीच होतो, मग ऋतू कोणताही असू दे ! विवाह-नोंदणीच्या रजिस्टरवर सह्या केल्यानंतर त्या जोडप्याने तिथल्या जवळच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन तिथे श्रध्दांजली अर्पण करणं बंधनकारकच आहे असं म्हणता येईल. काय आहे.. ह्या देशात प्रत्येक युवकाला कमीत कमी दोन वर्षे सैन्यात नोकरी करावीच लागते. लग्नाच्या दिवशी आपला सैनिकी पोशाख घालूनच लग्नाला उभं रहावं लागतं.. मग तो कोणत्याही पदावर वा कुठल्याही खात्यात असू दे.” 

“ आणि याचं कारण काय ? “ मी विचारलं.

ते जरासे सरसावून बसले आणि सांगू लागले……

– – “ हे कृतज्ञतेचं प्रतीक समजलं जातं. आपल्या कितीतरी पूर्वजांनी आपल्या देशासाठी कितीतरी युद्धांमध्ये भाग घेतला होता. किती जणांनी प्राणांची आहुती दिली होती.. काही युद्धं जिंकली, काही हरली ! पण त्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं होतं ते फक्त आमच्या या देशासाठी… त्यांच्या त्यागाचं मोल फार मोठं आहे. आणि प्रत्येक नवविवाहित जोडप्याला ह्याची जाणीव असणं फार आवश्यक आहे. ज्या शांत स्वतंत्र राष्ट्रात ते दोघं आता आनंदाने राहणार आहेत ते राष्ट्र आज ह्या लोकांच्या बलिदानावर उभं आहे… ही जाणीव. आम्ही वयस्कर लोक ही परंपरा जपण्याचा आग्रह धरतो. विवाहाच्या दिवशी युद्ध-स्मारकावर जाऊन श्रद्धांजली वाहणं ही गोष्ट प्रत्येक नवविवाहित जोडप्यासाठी जणू अनिवार्यच आहे. मग लग्न कुठेही असो, मॉस्को, पिटर्सबर्ग अथवा रशियातल्या कोणत्याही शहरात !” 

मी विचारात पडले… ‘आता हे दोघं लग्न करताहेत’ म्हणून काय शिकवतो आपण आपल्या मुलांना ? महाग महाग साड्या आणि उंची कपडे, किंमती दागदागिने, महागडे जेवणाचे मेनू, अनावश्यक डेकोरेशन, आणि डिस्को पार्टी.. बस्.. फक्त एवढंच तर शिकवतो. एक भारतीय म्हणून आनंदाने आणि शांतपणे जगण्यास आतुर झालेल्या त्या जोडप्याला.. त्यांच्या आयुष्यातल्या त्या महत्वाच्या दिवशी आपल्या शहिदांची आठवण ठेवायला का शिकवत नाही आपण ? का त्यांचे महत्त्व आपण पटवून देऊ शकत नाही आपल्या पुढच्या पिढीला…. आणि खरं तर स्वत:लाही ?

माझे डोळे भरून आले ! मन दाटून आले !

खरंच !आपण भारतीयांनी रशियाकडून ही महान परंपरा आणि ही कृतज्ञतेची जाणीव शिकलीच पाहिजे. देशासाठी आणि पर्यायाने आपणा सर्वांसाठी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले आहे त्यांचा योग्य तो सन्मान आपणही केलाच पाहिजे… आपल्या आनंदाच्या प्रत्येक क्षणी त्यांचे स्मरण तर केलेच पाहिजे.

– – पण केव्हा शिकू आपण हे ????

 

मूळ हिन्दी लेखिका : सुश्री सुधा मूर्ती

अनुवाद व प्रस्तुती  –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नोंदी…” भाग – ३ – लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई ☆ प्रस्तुती – सौ. प्रतिभा कुळकर्णी ☆

सौ. प्रतिभा कुळकर्णी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “नोंदी…” भाग – ३ – लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई ☆ प्रस्तुती – सौ. प्रतिभा कुळकर्णी 

(हा रिव्ह्यू नाही)

(पैसे देणे हा एक भाग झाला. वेळ दिल्याने तुमच्यात एक बंध निर्माण होतो. जबाबदारीचा आणि विश्वासाचा.. तो जर नाहीसा झाला तर आलेल्या अडचणींची उत्तरे सोडवायला मूल तुमच्याकडे येतच नाही. त्यांना माहित असते ते प्रॉब्लेम सॉल्विंग सुद्धा outsourse केलं जाणार आहे.) – इथून पुढे —

Adolescence मध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असे समीकरण होते. पाच एक वर्षापूर्वी मुंबई उपनगरात एक घटना झाली होती, ज्यात अठरा मुले (बारा ते तेरा वयोगट) आणि दोन मुलगे असे समीकरण होतेब. दोन महिने या मुलांनी शाळा संपल्यावर दुपारी, एक मुलाच्या इमारतीच्या गच्चीत दोन मुलांना sodomise केले होते.

सुरुवातीला कुतूहल, नंतर व्हिडिओ करून ब्लॅकमेल.

एक मुलगा आत्महत्या करून सुटला.. दुसऱ्याने प्रयत्न केला तो वाचला आणि हे बाहेर आले.

सगळ्यांचे पालक उच्च शिक्षित आणि उच्च मध्यमवर्गीय.

ते दोषी होते का? त्यांचे संस्कार या बाबतीत मला माहीत नाही पण नवल आहे, दोन महिने ही अठरा मुले अनैसर्गिक कृत्ये करत आहेत. त्यांच्या मनात काही तरी असेल, अपराधीपण, भीती, excitement, आपण पकडले जाऊ ह्याची धास्ती, अनैसर्गिक आनंद, ज्या मुलांवर अत्याचार झाले त्यांच्या मनातली खळबळ, वेदना.. दोन महिन्यात ही लक्षात सुद्धा येऊ नये! एका ही कुटुंबात.. ही गोष्ट मला जास्त अस्वस्थ करून गेली. आपल्या मुलांचे मार्क्स, रूप रंग, भविष्यातही त्याची प्रगती, खेळ कला यातील यश अपयश हे सगळे आपण आवर्जून पाहतो, त्यासाठी पैसे खर्च करतो, यशस्वी होण्यासाठी दबाव घालतो पण आपल्याला मुलांचे मन वाचता येत नाही, आणि मुलांना आपला आधार वाटत नाही! 

मग आपण आई वडील का होत आहोत असा विचार करायची वेळ आली आहे.

Adolescence मध्ये त्या मुलावर sexually तो attractive आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आहे.. आताचे जग हे क्रूड आहे. त्यामुळे ते डायरेक्ट मुद्द्यावर येते.

आमच्यावेळी शाळेत पहिला दुसरा नंबर, आकर्षक व्यक्तिमत्व, कला किंवा खेळ यात प्राधान्य असणाऱ्या मुलांकडे/ मुलींकडे, मुलींचे/ मुलांचे लक्ष असायचे. जोड्या तेव्हाही जमायच्या आणि ज्यांच्याकडे कुणाचेच लक्ष नाही अशी मुलं मुली तेव्हाही असायची. नकार, दुर्लक्ष, स्वतःच्या आयुष्याची काळजी, आपण कुणालाही आवडत नाही म्हणून येणारा एकाकीपणा, न्यूनगंड यातून अनेक जण जात असतील.

अशा लोकांच्या मनातले नैराश्य आणि त्यातून स्वतःला सावरणे, यात कोण पूल बनत असेल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जर याचे उत्तर मिळाले तर कदाचित ह्या मुलांच्या समस्यांच्या गुंत्याचे टोक आपल्याला सापडू शकते.

ही सिरीज बघत असताना मला माझा भाऊ आठवला. अभ्यासात हुशार पण रंगाने सावळा. त्यात बाहेर उनाडायचा खूप. त्यामुळे काळा दिसायचा. आपल्याकडे अनेकांना बोलण्याची पद्धत नसते.. त्याच्यावर प्रेम असणारी अम्माच म्हणायची, अरे रामोशी कसा दिसतो.

पुढे जसजसा मोठा झाला तसा बाहेरच्या जगात सुद्धा वजनावरून वरून टर, रंगावरून चेष्टा सुरू झाल्या.. मुले खूप vicious असतात. बिल्डिंग च्या भिंतीवर त्याचे कार्टून काढणे, त्याला हसणे, काहीही नावे ठेवणे असायचे.

पुढे वयात आल्यावर सुद्धा नकोसे वाटणारे अनेक अनुभव आले असतील, असणार.

तेव्हाचा रागीट स्वभाव, उर्मट वर्तन. नको असलेल्या घटकांशी सामना करण्याचे ते मार्ग होते.

आयुष्य त्याचे सोपे नव्हते.

घरात उगाच बाजू घेणे नव्हतेच. चुकले असेल तर ओरडा खायचा तो पण अनेकदा तो down असेल तर त्याच्या केसातून हात फिरवत ” एका तळ्यात होती ” म्हणणारी आई मला अजून आठवते. राजहंस एक असे म्हणताना आमचे आवाज सुद्धा त्यात मिसळायचे आणि मग आम्ही हसायचो… तो ही हसायचा.

आता exactly आम्ही त्याला कसे समजून घेतले हे नाही सांगता येणार पण त्याच्या मागे आम्ही होतो. We all shared a very close bond he knew we would be there for him always.

त्यामुळे असेल, बाह्य जगात वावरताना सुद्धा आपल्यासाठी कुणी आहे ही जाणीव त्याला सावरत होती.

त्याच्याबद्दल लिहावे असे खूप आहे आणि ते अत्यंत प्रेरणादायक आहे. अनपेक्षित भोग त्यानेही अंगावर घेऊन जिरवले. FB वर तो नाही आणि स्वतःबद्दल लिहिलेले त्याला आवडत नाही पण 

पुढे शिक्षण, नोकरी… उत्तम भविष्य घडवले त्याने, खूप लहान वयात. मोठ्या कंपनीत डायरेक्टर, स्वतःचे मोठे फ्लॅट्स, मर्सिडीज.. आणि बरेच. त्याच्या कंपनीतून गेली अकरा वर्षे उत्कृष्ट परफॉर्मर म्हणून अठ्ठावीस देशातून त्याची निवड केली जात आहे. या सारखी अनेक जण माहिती आहेत. घरातील तणाव, व्यसने, रूप रंग, व्यंग यामुळे झालेला मानसिक त्रास, आर्थिक परिस्थिती मुळे झालेला अपमान आणि या साऱ्यातून तावून सुलाखून वर आलेले अनेकजण.

सूड घेण्याकडे अनेकांकडे कारणे असतील पण त्यांनी ते केलेले नाही.

या सर्वांच्या मध्ये एक महत्त्वाचे साम्य आहे. पाठीशी असलेला हात आणि विश्वासाची माणसे आणि त्याला समजून घेण्यासाठी दिलेला वेळ.

“मी राजहंस आहे” हे पटवून द्यायला त्यांच्याकडे त्यांची माणसे होती आणि ती आहेत ह्याचा त्यांना विश्वास होता.

हा सिरीजचा रिव्ह्यू नाही. असे काही घडण्याची शक्यता असू शकते म्हणून सिरीज पहायला हरकत नाही 

पण नव्वद टक्के गोष्टी या खरेतर हातात असतात आणि आईवडील, आजीआजोबा यांनी आपल्याला घडवले असल्याने अंगात सुद्धा मुरलेल्या असतात.

आपल्यासाठी भरपूर माणसे आहेत असा भास सोशल मिडिया मुळे होऊ शकतो. इथे खरच तुमच्यावर प्रेम करणारी माणसे असतात.. ती प्रेम करतात ते ही निखळ असू शकते कारण तुमची कायदेशीर आणि सामाजिक जबाबदारी त्यांच्यावर नसते. You don’t owe anything to them nor they owe to you.. त्यामुळे असेल, त्या मर्यादित वेळेत ते तुमचे कौतुक करतात. अनेकवेळा ते खरे असते. ह्यात आपली माणसे, ज्यांच्याशी आपली आर्थिक, सामाजिक, कायदेशीर बांधिलकी असू शकते ती रुक्ष वाटू शकतात. होते असे म्हणून तर सोशल मिडिया लोकप्रिय आहे. काहीही प्रत्यक्ष न करता केल्याचा आभास इथे निर्माण होतो. आपली माणसे नक्की कोण असतात? 

माझ्या सासूबाई आजारी होत्या. माझ्या लग्नाला जेमतेम एक वर्ष झाले होते. कधीतरी लक्षात आले असावे त्यांच्या की हे आपले शेवटचे दिवस आहेत. माझा हात धरून त्या म्हणाल्या, जगू आणि बाबांना जप. खरेतर दोन्ही माझेही. नवरा, सासरे पण त्यांच्या प्रति आईंची जी जबाबदारी होती ती त्यांनी माझ्याकडे सुपूर्त केली.

गेल्या आठवड्यात अचानक हॉस्पिटल मध्ये मला जावे लागले. खरेतर सगळे पूर्ववत होत असताना अचानक श्वासाचा त्रास सुरू झाला आणि झाले ते काही तासांत, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये emergency मध्ये दाखल झाल्यावर ना मला नीट बसता येत होते, ना बोलता, जीभ जड आणि ऐकू येत असलेले नीट पोचत नाही अशा स्थितीत मी जवळ उभ्या असलेल्या नवऱ्याला म्हटले, take care of Amarjeet.. मुलगा लांब उभा होता म्हणून मनातल्या मनात त्याला पपाला पाहायला सांगितले. खरेतर काही तासापूर्वी किती काय काय करायचे होते, कुणाकुणाशी बोलायचे होते, pending कामे आठवत होती.. पण त्या क्षणाला लक्षात आले…let go असे करता येत नाही.

माझ्या जबाबदाऱ्या अशा टाकून कशी जाणार.. I have to handover..

आतापर्यंत माझा जो बांधिलकीचा वाटा होता तो दुसरे कोण घेणार! 

वारसा म्हणजे फक्त पैसे घर, मालमत्ता याहीपेक्षा असतो ते आपण स्वतः..

आपली ओळख ज्या व्यक्ती मार्फत उरणार ती आपला वारसदार असते. आपल्याला हवी असलेली आपली ओळख, आपल्या नंतर रहावी असे वाटत असेल तर आपल्या मुलाला तसे बनवणे हेच आपल्या हातात असते. तेवढा प्रयत्न जरी प्रत्येकाने स्वतःपुरता केला तर adolescence ही सिरीज प्रत्यक्षात न येता एक फिक्शन म्हणून उरेल.

— समाप्त —

लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई 

प्रस्तुती : सौ. प्रतिभा कुळकर्णी

संपर्क – ६, हीरु नाईक बिल्डिंग, धुलेर, म्हापसा, गोवा – ४०३५०७. मोबाईल – ९९२३१४८९०४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘लायकी…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘लायकी…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆3

“गवार वीस रुपये…

कलिंगडं शंभरला तीन!”

सूर्यही नीट उगवला नव्हता. रस्त्यावरून असा खणखणीत आवाज आला आणि डोळे चोळत उठलो. गॅलरीतून खाली पाहिलं. सोसायटीच्या खालीच तेरा चौदा वर्षाचा पोरगा येऊन थांबला होता. कपाळाचा घाम पुसत उभा. सोसायटीचा वॉचमन त्याला लांब थांबायला सांगत होता. तसा तो पोऱ्या वॉचमनला हात जोडत थांबू देण्याची विनंती करत होता. मी आवाज दिला आणि त्या पोऱ्याला थांबायला सांगितलं. पोऱ्यानं मान डोलवली. तोंडाला रुमाल बांधून खाली गेलो. दोन चार बाया आणि काही पुरुषही त्याच्याभोवती येऊन थांबले होते. सोशल डिस्टन्सिंग पाळत आम्ही सगळे गवार, कलिंगड घेऊ लागलो.

इतक्‍यात तो पोऱ्या एकाला म्हणाला,

‘दादा, तांब्याभर पाणी मिळंल का?’ दादानं तोंड वाकडं करत, ‘समोरच्या चौकात पाण्याची टाकी आहे. तिथं पी’ असा सल्ला दिला.

‘एवढ्या सकाळी तहान कशी लागतीरे तुला?’दुसऱ्या दादानं असं विचारत स्मित केलं.

तसा तो पोऱ्या म्हणाला, ‘पहाटं पाचला निघलोय साहेब घरातून. सात किलोमीटर चालत आलोय. पाण्याची बाटली होती. पण, तीबी संपली. म्हणून म्हणालो.’

तशी एक ताई लॉजिक लावत म्हणाली, ‘वाह रे वाह शहाणा! म्हणजे आम्ही तुला तांब्याभर पाणी देणार. तू ते पाणी पेणार आणि तुला कोरोना असेल, तर तो आम्हाला देऊन जाणार.’ ताईंच्या या वाक्‍यावर पोऱ्या काही बोलला नाही. आवंढा गिळत त्यानं शांत राहणं पसंत केलं.

आम्ही सो कॉल्ड व्हाईट कॉलरवाली माणसं होतो. रस्त्यावरच्या अशा कोण्या एैऱ्यागैऱ्याला पाणी देऊन आम्हाला आमची इमेज खराब करायची नव्हती. आज ह्याला पाणी दिलं की, उद्या वॉचमन पाणी मागेल, परवा कचरा उचलणारी बाई पाणी मागेल, परवा पेपर टाकणारा पोऱ्याही पाणी मागेल. त्यांनी त्यांच्या औकातीत रहायचं आणि आम्ही आमच्या रुबाबात, अशी काहीशी अव्यक्त भावना आम्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती.

आम्ही सगळेजण स्वत:ला उच्च विद्याभूषित, सुशिक्षित आणि श्रीमंत समजत खरेदी करत होतो. तितक्‍यात तिथे एक स्कॉर्पिओ आली आणि थोड्या अंतरावर थांबली. त्यातून एक दाढी मिशीवाला रांगडा माणूस उतरला. त्याच्या हातात पिशवी होती. तो चालत आला आणि ती पिशवी त्यानं पोऱ्याच्या हातगाडीवर ठेवली. ‘उन्हाच्या आत घरी ये रे भैय्या,’ असं म्हणत तो माणूस पुन्हा स्कॉर्पिओत बसला आणि निघून गेला.

आमच्यातला एक दादा हसत म्हणाला, ‘त्यांच्याकडं कामालाहे कारे तू भैय्या?’ पिशवीतून बिसलेरी काढत भैयानं पाणी तोंडावर ओतलं. नंतर चार घोट घशात ढकलले आणि तोंड पुसत म्हणाला, ‘वडील होते माझे.’

त्याच्या वाक्‍यावर आम्ही सगळ्यांनी एकाचवेळी आवंढा गिळला. तरीही रुबाब कमी न करता भुवयांचा आकडा करत एक ताई म्हणाली, ‘घरी स्कॉर्पिओ असून तू हातगाडीवर भाजी विकण्यासाठी इतकं हिंडतोय व्हय?’ गवार तोलत भैय्या म्हणाला, ‘घरी एक नाय चार गाड्याहेत ताई. तेवीस एकराची बागायतबीहे. पुण्यातल्या मार्केटयार्डात तीन गाळेहेत. पण तात्या म्हणत्यात, आपल्यासारख्या शेतकऱ्यांना लोकांची नियत समजून घ्यायची असेल, तर हाच भारी चान्स आहे. आत्ताच्या काळात गरिबांबरोबर लोक जेवढं वाईट वागत्यात, तेवढं याच्याआधी कधीच वागले नाय. आमच्या धंद्याला ते लय गरजेच असतंय ताई. म्हणून रोज हातगाडी घेऊन पाठवत्यात मला. आज ना उद्या सगळा धंदा मलाच सांभाळावा लागणारे. रोजचा दोन अडीच लाखाचा माल निघतोय. तेवढा सांभाळण्यासाठी लोकांची लायकी समजून घ्यायला पाहिजेच ना.’

त्याचं वाक्‍य संपलं, तशे पटापट त्याच्या हातावर पैशे टेकवत सोसायटीतले आम्ही सगळे ताई, दादा पटापट आपापल्या फ्लॅटकडं निघालो. मी गॅलरीतून गुपचूप पाहत होतो. आम्हाला आमची लायकी दाखवणारा तो गरीब माणूस पुढच्या श्रीमंताना त्यांची लायकी दाखवण्यासाठी निघाला होता.

 लेखक :अज्ञात

प्रस्तुती : श्री. ब्रह्मानंद पै 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासीनी ☆ सुखद सफर अंदमानची… द्वीपसखी – भाग – ५ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

? मी प्रवासीनी ?

☆ सुखद सफर अंदमानची… द्वीपसखी –  भाग – ५ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

आपल्या आजूबाजूला आपण काही निसर्गप्रेमी बघतो. हे लोक तसे आपल्या सारखे व्यस्त असतात. तरीही त्यांच्या व्यस्ततेतून सवड काढून ते झाडांची, पशुपक्ष्यांची काळजी घेताना दिसतात. अगदी स्वतःच्या जीवावर उदार होऊन हे काम ते करत असतात. खिशाला खार लावून निसर्ग संवर्धन करताना आढळतात. यातील काहींना तर त्यांची भाषाही कळते असं वाटतं. आपण त्यांचं हे सौहार्द बघून स्तिमित होतो. माझ्यासाठी म्हणाल तर हे निसर्गमित्र वंदनीय आहेत.

एका कुत्र्याच्या किंवा मांजराच्या विषयी माया वाटणं हे तसं थोडंसं सोपं आहे. परंतु एखाद्या अधिवासात राहणाऱ्या सर्वच प्राणीमात्रांविषयी, तिथल्या वनस्पतींविषयी, प्रेम वाटणं थक्कं करणारं आहे, हो ना? मला अशी एक व्यक्ती माहिती आहे, जिला शेकडो प्राणी ओळखतात. जिला त्यांची भाषाही कळते. आपण जशी रोज संध्याकाळी घरी परतणाऱ्या आपल्या आप्तेष्टांची वाट पाहतो ना, अगदी तशीच वाट हे सगळे या ताईची पाहतात. अगदी आतुरतेनं. तिची चाहूल लागताच हरणांचे कळपच्या कळप तिच्या भोवती जमा होतात. सुंदर पिवळ्या सोनेरी रंगाचे, ठिपक्या ठिपक्यांची वस्त्रं चमचम करत तिच्या भोवती जमा होतात. थुईथुई करणाऱ्या मोरांची नाचरी चाल तिच्याकडं धाव घेते. सोनेरी रंगांमध्ये निळ्या मोरपिशी रंगांचे थवे डोलत उभे राहतात. निळे हिरवे पिसारे, वेड लावेल अशी गर्द निळ्या रंगाच्या ऐटदार मानेला अधिकच तोऱ्यात उभी करत ते शेकडो मोरोपंत दाटीवाटी करतात. मागं दिसणारा समुद्र अधिक निळाशार की समोरचा मोहक मयुरसंच अधिक निळा? आकाशाचा निळा रंग बघू, सागराची निळी गहराई शोधू कि या मयुरपंखांची निळीहिरवी जादू डोळ्यात साठवू. त्यातच तो निळाई छेदून आरपार जाणारा पिवळा सोनेरी रंग घायाळ करता होतो. तितक्यात एक इटुकली, धिटुकली खारुताई तिच्या खिशातून बाहेर येते आणि घाईघाईने, तुरुतुरु कुठंतरी जाते.

मी अचंबित होऊन बघत होते. जेमतेम साडेचार पाच फुटांची ती ताई, या सगळ्यांची जणू आई होती. आईच म्हणायला हवं. ही आहे एक आदिवासी महिला, अनुराधा, अनुराधा ताई, दिदी, माई कोणतीही हाक मारा. रॉस आयलंड, म्हणजेच सध्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावर तुम्ही गेलात तर हे दृश्य तुम्हाला नक्की दिसेल. त्सुनामी नंतर हे बेट विराण खंडहर झालंय. पूर्वी इथं सेल्युलर जेल मध्ये काम करणारे इंग्रज अधिकारी रहात होते. त्यांचे बंगले होते. आता फक्त अवशेष दिसतात. तो सगळा इतिहास अम्मा सांगतातच, पण या सगळ्या प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, झाडांच्या गोष्टी त्या सांगतात. वादळानंतर या बेटावर फक्त तीन प्राणी उरले होते. आता त्यांची संख्या हजारोत आहे. या प्राण्यांना त्यांच्याच अधिवासात तिनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल परिस्थितीत आणलंय. प्रसंगी वेडी अनुराधा हा शिक्का मारुन घेऊन. कधी वेडीला मारलेले दगड झेलून, तिनं या विराण खंडहर झालेल्या मातीत पुन्हा नंदनवन उभं केलं आहे. तिनं तिचे आईवडील, भावंड या सर्वांना गमावलंय. पण मुक्या प्राण्यांवर प्रेम करण्याची वडिलांनी दिलेली शिकवण ती विसरली नाहीय. इथल्या आदिवासी जमातीची अनुराधा या निसर्गावर भरभरून प्रेम करते. या मातीचं क्षण फेडण्यासाठी अविरत धडपडते. आज तिची दखल भारतीय नौदलानं घेतली आहे. तिला मानाचा किताब दिला आहे. पण पुरस्कार मिळाला तरी तिचं काम सुरू आहे.

अम्माला या सजीवांचं बोलणं समजतं, त्यांच्या डोळ्यातले भाव ओळखता येतात. तिच्याशी बोलायला सगळे प्राणी उत्सुक असतात. एक आंधळं हरीण तिच्या सगळ्या आज्ञा पाळतं. (अर्थात बाकीचे सगळे तिला देवासमान मानतात हे तर आहेच.) ताई सांगत होती, ती आमच्याशी बोलतेय हे त्या हरणाला आवडलं नाहीय. म्हणून ते रुसून बसलंय. बघा बघा, ते चाललंय निघून. तिनं त्याला सांगितलं की बघ बरं आपल्या कडं पाहुणे आले आहेत. त्यांच्याशी बोलते. मग भेटते तुला. त्याला पटलं असावं. लांब जाऊ लागलेलं ते थांबलं. बेटावरचे सर्व रहिवासी, (माणसं तिथं रहात नाहीत आता) तिला मनातलं सांगतात, तिला आपल्या भावविश्वात घेऊन जातात. त्यांना तिची भाषा समजते यापेक्षा, तिला त्यांची, त्यांच्यातल्या प्रत्येकाच्या मनात काय आहे हे कळतं. केवढं मोठं वरदान लाभलंय तिला. आपल्याशी बोलता बोलता ती स्वातंत्र्याच्या इतिहासाची पानं उलटते. आपल्याला स्वातंत्र्यवीरांच्या कथा सांगते, अंदमानच्या तुरुंगाविषयी त्वेषानं बोलते. तिच्या अंगात जणू वीरश्री संचारते. सावरकरांच्या विषयी तिला वाटणारा आदर तिच्या शब्दांत, तिच्या डोळ्यात, सहज दिसतो. सावरकरांच्या बाबतीतल्या काही गोष्टी ज्या सहजतेनं वाचायला मिळणार नाहीत, अशा कथा ऐकायला, आपल्या देशाविषयी, आपल्या वीर सैनिकांना खरीखुरी आदरांजली द्यायला, नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीपाला भेट द्यायलाच हवी. जाज्वल्य अभिमान कसा असतो हे अम्माच सांगू शकते. बाकी कुणी नाही.

मोबाईल संस्कृती, मोबाईल पर्वात वावरणारे आपण. आपली छटाकभर बुद्धी चंगळवादी राहणीमानाला दान करून टाकणारे आपण, तिच्या समोर खूप खुजे ठरतो. कृत्रिम जगात वावरताना आपण संवाद विसरलोय. आपल्या आईवडिलांशी, घरातल्या लोकांशी, आपण बोलायला कचरतो. शेजारपाजाऱ्यांशी तर आपण ओळख ठेवायला तयार नसतो. त्यांची नावंच काय पण चेहरे ही माहित नसतात आपल्याला. मग भावबंध कुठले? पण ही ताई लौकिक दृष्ट्या एकटी असून एकटी नाही. एकटेपणा तिच्या वाऱ्याला उभा रहातच नाही. तिला अगणित नाती आहेत. अस़ंख्य भावबंधांनी ती निसर्गाशी जोडली गेलीय. तिचा तसा साधाच पण आनंदी चेहरा मनात घर करून राहतो. अम्माचं साधंसुधं मोठेपण सोबत बांधून घेण्याचा प्रयत्न करत आपण परतीचा प्रवास सुरु करतो.

– क्रमशः भाग पाचवा 

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ विश्वास… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? विश्वास  ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

काडी काडी जमवून तिने

गाडीवरती घरटे केले

विश्वासाने घरट्यामध्ये

उबवण्यास्तव अंडे ठेवले

*
पाहून मी या विश्वासाला

मनोमनी चकितची जाहले

जपण्यासाठी विश्वासाला

किल्लीला मी अडकवून ठेवले

*
पंख फुटूनी पिल्ले उडतील 

तदनंतर ही हलेल गाडी

माणूस म्हणूनी पक्षासाठी

कृती करू शकते एवढी – – – 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ लघुकथा – “सहानुभूति” ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी , बी एड , प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । यादों की धरोहर हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह -एक संवाददाता की डायरी को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह-महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ लघुकथा – “सहानुभूति” ☆ श्री कमलेश भारतीय ☆

वे विकलांगों की सेवा में जुटे हुए थे। इस कारण नगर में उनका नाम था। मुझे उन्होंने आमंत्रण दिया कि आकर उनका काम व सेवा संस्थान देखूं। फिर अखबार में कुछ शब्द चित्र खीच सकूं।

वे मुझे अपनी चमचमाती गाड़ी में ले जा रहे थे। उस दिन विकलांगों के लिए कोई समारोह था संस्था की ओर से।

राह में बैसाखियों के सहारे धीमे-धीमे चल रहा था एक वृद्ध।

उनकी आंखों में चमक आई। मेरी आंखों में भी।

उन्होंने कहा कि यह वृद्ध हमारे समारोह में ही आ रहा है।

मैंने सोचा कि वे गाड़ी रोकेंगे और वृदध विकलांग को बिठा लेंगे पर वे गाड़ी भगा ले गये ताकि मुख्यातिथि  का स्वागत् कर सकें।

मेरी आंखों में उदासी तैर आई उनकी सहानुभूति देखकर।

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

संपर्क :   1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Memoir ☆ दस्तावेज़ # 27 – The Days That Sang Like Ragas ☆ Shri Jagat Singh Bisht ☆ 

Shri Jagat Singh Bisht

(Master Teacher: Happiness & Well-Being, Laughter Yoga Master Trainer, Author, Blogger, Educator, and Speaker.)

(This is an effort to preserve old invaluable and historical memories through e-abhivyakti’s “दस्तावेज़” series. In the words of Shri Jagat Singh Bisht Ji – “The present is being recorded on the Internet in some form or the other. But some earlier memories related to parents, grandparents, their lifetime achievements are slowly fading and getting forgotten. It is our responsibility to document them in time. Our generation can do this else nobody will know the history and everything will be forgotten.”

In the next part of this series, we present a memoir by Shri Jagat Singh Bisht Ji The Days That Sang Like Ragas.“)

☆ दस्तावेज़ # 27 – The Days That Sang Like Ragas ☆ Shri Jagat Singh Bisht ☆

There was a time when life moved not by the clock, but by cadence. A time when days began like a gentle alap, slowly, soulfully, with no rush, no resistance—just a quiet invocation of the divine. Those were good times. Soothing. Relaxing. They came and went like an Indian classical recital, flowing gracefully from vilambit to drut, from stillness to spirited celebration.

In those golden mornings of yesteryears, I had the rare privilege of waking up to the serenity of Raga Ahir Bhairav and Nat Bhairav, rendered masterfully on the sarod by the legendary Ustad Ali Akbar Khan. His notes didn’t merely enter the ears; they seeped into the soul like the morning sun melting the mist.

As the day unfolded, so did my musical canvas. The sitar strings of Pandit Ravi Shankar would strike a soft yet intricate tapestry of Raga Mishra Pilu, weaving its magic across late morning hours. It was as if the day itself bowed in reverence, surrendering to the grace of the raga.

Come evening, it was the flute—bansuri—of Pannalal Ghosh that carried me into the dusk with Raga Darbari. Deep, solemn, and majestic, it spoke not just to the intellect, but to something primal and profound. And then, just when the world slept, Raga Sohini arrived on the santoor of Pandit Shivkumar Sharma, shimmering with mystery, like moonlight dancing on still water.

Ah, what a time it was—to choose your concert, your raga, your maestro, with just the turn of a gramophone dial. My world was a curated sabha, where Vilayat Khan’s sitar, Bismillah Khan’s shehnai, V G Jog’s violin, Imrat Hussain Khan’s surbahar, Abdul Halim Jaffar Khan’s mastery, Amjad Ali Khan’s youthful vigour, Hari Prasad Chaurasia’s flute, and Brijbhushan Kabra’s guitar performed tirelessly, endlessly, for me alone.

A Treasure Trove of Indian Classical Music – 1

My gramophone collection was no less than a temple. Each record was a relic. Running fingers through those cardboard jackets, selecting the evening’s invocation, watching the black disc spin its magic—this was not a task, it was a ritual. And in those moments, time itself bowed down to listen.

Yes, I still have that treasure trove with me, tucked safely in shelves and memory. But the times—they have changed. The world outside runs on speed. The world within craves for pause. I find myself dreaming, often, of turning back the pages of time.

How I long to hear again the thumris of Nirmala Devi, Hira Devi Mishra, Girija Devi, Parveen Sultana, Lakshmi Shanker and Shobha Gurtu—each voice a world of emotion, each phrase a stroke of delicate pain and beauty.

Evenings would bloom again if I could lose myself in the luminous voices of Pandit Jasraj, Pandit Bhimsen Joshi, Kishori Amonkar, Prabha Atre, and the deep, meditative dhrupad of Ustad Nasir Aminuddin Dagar.

And then, the weekend mehfil—friends gathered, hearts opened, and the air filled with the velvet ghazals of Mehdi Hassan, Begum Akhtar, Ghulam Ali, Munni Begum, Bhupinder, Pankaj Udhas, Salma Agha, and the soul-touching duets of Jagjit and Chitra Singh.

Some memories sing of nirguna bhajans by Kumar Gandharva—ethereal, abstract, and eternal. Others echo Meera bhajans, sung with such innocence and longing by Vani Jairam, composed divinely by Pandit Ravi Shankar. And then, the trance-like spell of Damadam Mast Kalandar, as rendered by Noor Jehan, Runa Laila, Reshma, Ghulam Nabi, and Saeen Akhtar.

Where did it all go? The Drums of India by J P Ghosh, the Fantasy of Indian Drums by Pandit Vijay Raghav Rao, Nayyara Sings Faiz, Jaam o Meena by Iqbal Siddiqi and Vandana Bajpai—where do such treasures reside now, if not in fading memories?

I wish, once more, to hear Bachchan’s Madhushala sung by Manna De, Sunderkand from Tulsi Ramayan by Mukesh, Soor Padavali by Pandit Jasraj, the qawwali of Ghungroo Toot Gaye by Maqbool Ahmed Sabri, and even Fun Time Rhymes by Preeti Sagar, which I played joyfully for my little son.

And sometimes, when nostalgia wears the perfume of romance, the songs from Sangam and Umrao Jaan return to whisper of love and longing.

Two records have etched themselves on my soul—West Meets East by Yehudi Menuhin and Ravi Shankar, and South Meets North by Lalgudi G Jayaraman and Amjad Ali Khan. East and West, South and North—what sublime confluences they were!

Would it be too much to ask the cosmos to return Savan Bhadon – Melody of the Rains to me? To bring back Bade Ghulam Ali Khan’s aching thumri “Aaye Na Balam”, to let me sway again with Sitara Devi to Kathak Dance of India, or be mesmerised by Vyjayanthimala’s grace on Bharat Natya?

Is there, I ask, anything more structured, more rhythmic, more perfect, more healing than Indian classical music? Is there anything more divine?

The soul of this music still breathes—it is we who must pause, and listen. For somewhere, beneath the clutter of digital noise, it still waits. The sarod still sighs. The flute still yearns. The tabla still celebrates. The tanpura still hums the eternal Om.

Let us, once again, tune our lives like an old tanpura—soft, steady, sacred. Let us reclaim that raga of existence, where each note is a prayer, and each silence, a sanctuary.

And maybe then, the music shall return.

♥♥♥♥

© Jagat Singh Bisht 

Laughter Yoga Master Trainer

LifeSkills

A Pathway to Authentic Happiness, Well-Being & A Fulfilling Life! We teach skills to lead a healthy, happy and meaningful life.

The Science of Happiness (Positive Psychology), Meditation, Yoga, Spirituality and Laughter Yoga. We conduct talks, seminars, workshops, retreats and training.

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares