घरात भांडण असत का? होत का? हा वेगळा प्रश्न आहे. भांडण नकोच. पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात भांडण झालं, तर त्याच स्वरूप सुध्दा बदललं आहे. याला कारण असणारा आणि मिळणारा वेळ.
आजकाल क्रिकेटच्या खेळात जसं टी २०, वन डे, किंवा टेस्ट मॅच असते. तसंच भांडणाचही झाल आहे.
क्रिकेट मॅच कशा वेगवेगळ्या कारणांनी असतात, अगदी एखाद्या स्थानिक नेत्याच्या वाढदिवसापासून वर्ल्ड कप पर्यंत. तसंच करावसं वाटलं, तर भांडणाला कोणतही कारण चालतं, पण वेळेचं बंधन मात्र असत. कारण दोघांनाही कामावर वेळेवर जायचं असतं.
देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय असे सामने असतात. तशीच भांडणाची कारणं सुध्दा घरगुती, आणि बाहेरची अशी असू शकतात.
आता कारण काय….. अगदी सकाळी दुध ऊतू गेल्यापासून रात्री बाथरुमचा लाईट तसाच राहिला या पर्यंत, किंवा जागा सोडून ठेवलेली टुथपेस्ट, शेव्हिंग क्रीम, व आंघोळीनंतर हाॅलमध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या टाॅवेल पासून, रात्री पसरवून ठेवलेला पेपर. किंवा जागा दिसेल तिथे ठेवलेला रिमोट. किंवा वागण्यावरून, आपलं वय किती? मुलं मोठी झाली आहेत. चार लोकांत कसं राहिलं पाहिजे? या सारखं कोणतही, छोटं मोठ कारण पण चालतं. कारण कोणतं, आणि आपल्याला वेळ किती, यावर भांडण करायचं का? आणि कसं करायचं? हे ठरतं.
आणि वेळेनुसार हे भांडण टी २०, वन डे, किंवा टेस्ट मॅच सारखं स्वरूप धारण करतं.
सकाळचं भांडण हे टी २० सारखं असतं. थोडक्यात आटपायच. ती डबा करण्याच्या गडबडीत असेल तर माझ्या दृष्टीने तो पावर प्ले असतो. कारण पावर प्ले मध्ये जसं एका ठराविक कक्षेच्या आतच बरेच खेळाडू लागतात. तसंच या काळात ती स्वयंपाक घराच्या कक्षेतच असते. अगदी मनात आलं तरी ती वेळेअभावी स्वयंपाक घराच्या कक्षेबाहेर येत नाही. या काळात मी थोडी रिस्क घेऊन (तोंडाने) फटकेबाजी करुन घेतो. आणि तिची डब्याची तयारी झाली असेल, आणि मी दाढी करत असेल तर…… तर मात्र तिचा पावर प्ले असतो. कारण मी आरशासमोरच्या कक्षेत असतो. आणि ती मनसोक्त फटके मारण्याचा प्रयत्न करते, अगदी क्रिज सोडून बाहेर येत फटके मारतात, तस ती स्वयंपाक घर सोडून बाहेर येत फटकारते. आणि बऱ्याचदा यशस्वी पण होते.
संध्याकाळच असेल तर मात्र वन डे स्टाईल त्यातही डे नाईट असतं. म्हणजे वेळेनुसार संध्याकाळी सुरू झालेलं हे रात्री झोपण्याच्या वेळी पर्यंत चालतं. यात जेवणाच्या वेळी ब्रेक असतो. मग जेऊन ताजेतवाने होऊन परत आपला मोर्चा सांभाळतात.
पण विकेंड, किंवा त्याला जोडून सुट्टी आली तर मात्र ते टेस्ट मॅच सारखं लांबत जात. यात मग काही वेळा कोणीतरी वरचढ ठरल्यामुळे लिड सुध्दा घेतं, मग आपली पडती बाजू पाहून दुसऱ्याला सावध पवित्रा घेत मॅच निर्णायक होण्याऐवजी बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न होतो.
मॅचमध्ये जसे काही उत्साही प्रेक्षक वाजवण्याची साधनं आणतात आणि वाजवत बसतात. तसे प्रेक्षक प्रत्यक्ष भांडणाच्या वेळी नसले तरी आवाजाची भर मिळेल त्या साधनाने पूर्ण करतो. मग यात सोयीनुसार भांड्यांचा आवाज, कटाची दारं वाजवीपेक्षा जोरात लाऊन येणारा आवाज, पाॅलीशची डबी, किंवा ब्रश हे मुद्दाम पाडून केलेला आवाज, मी लावलेल्या रेडिओ चा आवाज यांनी ती थोडीफार भरून निघते.
मॅचमध्ये थर्ड अंपायर असतो. तो निरीक्षण करून कोणाच्या तरी एकाच्या बाजूने निर्णय देतो. पण या अशा आपल्या भांडणात मात्र असा अंपायर नसावा असं दोघांनाही वाटतं. (किती समजूतदार पणा…..)
‘साडेबाराची गाडी आत्ताच गेली. आता दुपारी तीन वाजता लागेल पुढची गाडी नाशिकची. त्याचं तिकीट हवंय का तुम्हाला?’. दादरला एशियाड तिकीट खिडकीमागचा माणूस निर्विकारपणे मला म्हणाला. मी चरफडतच रांग सोडली. दिवस मे महिन्याचे. त्यात टळटळीत दुपार. मुंबईच्या दमट हवेत घामाच्या नुसत्या धारा लागलेल्या. पाठीला अडकवलेल्या अजस्त्र रकसेकचं ओझं मिनिटागणिक वाढत होतं. त्यात संध्याकाळपर्यंत माझं नाशिकला पोचणंही गरजेचं होतं. ज्या साहस शिबिरासाठी मी नाशिकला निघाले होते, ते शिबीर दुसऱ्या दिवशी सकाळपासून सुरु होणार होतं त्यामुळे जमेल तितकं जुनं नाशिक मला त्यापूर्वी बघून घ्यायचं होतं.
आता तीनपर्यंतची वेळ कुठे आणि कशी काढावी ह्या विचारात असतानाच, रांगेत माझ्या मागे असलेल्या माणसाने उपाय सुचवला, ‘घाई आहे तर शेअर टेक्सीने का जात नाहीस मुली? स्टेशनच्या अलीकडे असतात उभ्या गाड्या नाशिकच्या’. त्या माणसाचे आभार मानून मी पाठीवरची पिशवी सावरत स्टेशनकडे जायला वळले, तोच एका बाईंना माझ्या पिशवीचा ओझरता धक्का बसला, मी ‘सॉरी सॉरी’ म्हणत ओशाळून सेक खाली घेतली. त्या बाई ओढून-ताणून हसल्या. ‘रेहने दो, कोई बात नही’, म्हणाल्या. वयस्कर होत्या. साधारण साठीच्या उंबऱ्यात असाव्या. एकदम हाडकुळा, उन्हाने रापलेला चेहेरा, त्यावर ताणून बसवलेली कातडी, खोल गेलेले डोळे, सुंभासारखे चरभरीत केस कसेतरी करकचून आवळून घातलेला इवला अंबाडा, कशीतरी गुंडाळलेली स्वस्त सिंथेटीक साडी, तिसऱ्याच रंगाचं, उन्हात विटलेलं, कडा उसवलेलं पोलकं आणि पायात साध्या रबरी चपला असा त्यांचा अवतार होता. खांद्याला फक्त एक साधी कापडी पिशवी लटकवलेली आणि हातात लाल कपड्यात बांधलेलं एक बोचकं.
‘मुझे नासिक जाना है, टेक्सी कहां मिलेगी बेटा’? त्यांनी विचारलं.
‘मेरे साथ चलिये, मै भी वही जा रही हुं’, मी म्हटलं आणि आम्ही दोघी स्टेशनच्या दिशेने चालायला लागलो. ‘ मै मिसेज पांडे’, त्या म्हणाल्या. उच्चार थेट उत्तरप्रदेशी. मीही माझं नाव सांगितलं. त्यांच्याबरोबर सामान काहीच नव्हतं. ‘क्या आप नासिक में रेहती है’? निव्वळ काहीतरी विचारायचं म्हणून मी विचारलं.
‘नही बेटा, रेहती तो बंबई में हुं, नासिक काम के लिये जा रही हुं’. थंड, भावशून्य स्वरात त्या म्हणाल्या.
‘आप अकेले जा रही है नासिक’? परत एकवार मी काहीतरी बोलायचं म्हणून विचारलं.
‘अकेले कहां? मेरे पती है ना मेरे साथ’, खिन्न, काहीसं विचित्र हसत त्या उद्गारल्या.
‘मतलब?’ काही न कळून मी विचारलं.
‘ये है मेरे पती’ हातातलं आलवणात बांधलेलं बोचकं दाखवत त्या म्हणाल्या. ‘कुछ दिन पेहले आफ़ हो गये. उन्ही की अस्थियां गंगाजी में बहाने जा रही हुं नासिक’.
मी जेमतेम एकवीस-बावीस वर्षांची होते तेव्हा. त्या काय बोलत होत्या हे कळायला मला वेळच लागला अमळ, पण जेव्हा समजलं तेव्हा माझ्या अंगावर सर्रकन काटाच आला एकदम. जरासं थांबून मी त्यांच्याकडे परत एकदा नीट बघून घेतलं. त्यांच्या त्या श्रांत, ओढलेल्या चेहेऱ्यामागची काटेरी वेदना आत्ता कुठे मला जाणवत होती. मांजा तुटलेल्या पतंगासारख्या भासल्या मला पांडेबाई त्या क्षणी, एकाकी, अधांतरी, सगळ्या आयुष्याचं अस्तरच फाटून गेल्यासारख्या जखमी.
‘आपके साथ और कोई नही आया’? न रहावून मी बोलून गेले.
‘कौन आयेगा बेटा? बच्चे तो भगवान ने दिये नही, और सगे संबंधी सब गांव में है’. विमनस्कपणे त्या बोलल्या.
मला काय सुचलं कुणास ठाऊक पण मी त्यांना म्हणाले, ‘अगर आप चाहे तो मै आपके साथ चल सकती हुं’.
‘चलेगी बेटा, बहुत अच्छा लगेगा मुझे और इन्हे भी’. हातातल्या त्या गाठोड्याकडे अंगुलीनिर्देश करत पांडेबाई म्हणाल्या.
एव्हाना आम्ही गाडीतळापाशी पोचलो होतो. पहिल्या गाडीत बसलो. चालक सरदारजी होते. नासिकचे अनुभवी असावेत कारण त्या बाईंच्या हातातलं बोचकं बघून त्यांनी खेदाने मान हलवली. आम्ही गाडीत बसलो. दोघे उतारू आधीच बसले होते. गाडी सुरु झाली. पांडेबाई आपल्याच विचारात हरवल्या होत्या. माझं लक्ष राहून राहून त्यांच्या हातातल्या गाठोड्याकडे जात होतं.
आम्ही नासिकला पोचलो तेव्हा जवळजवळ पाच वाजत आले होते. रिक्षा करून आम्ही दोघी रामकुंडावर गेलो. नाशिक क्षेत्राचं गांव. आम्ही कुंडाजवळच्या पायऱ्या उतरताच तिथल्या सराईत नजरांनी आमचा अंदाज घेतला आणि लगेच दहा-एक गुरुजींनी आम्हाला घेरावच घातला. ‘बोला, काय काय करायचंय’? गुरुजींनी विचारलं. आम्ही दोघीही पार कावऱ्याबावऱ्या झालो होतो. पांडेबाई त्यांच्या डोंगराएव्हढ्या दुःखाने सैरभैर झालेल्या आणि मी ह्या बाबतीतला कुठलाच पूर्वानुभव नसल्यामुळे बावरलेली. तरी त्यातल्या त्यात जरा शांत दिसणाऱ्या, वयस्कर गुरुजींशी आम्ही बोलणं सुरु केलं.
‘गुरुजी, बाराव्याचे विधी करायचेत’, मी म्हणाले.
‘करूया ना. साडेचारशे रुपये पडतील. सगळं सामान माझं. वर दान-दक्षिणा काय करायची असेल ते तुम्ही आपखुशीने समजून द्या’, गुरुजी म्हणाले.
मी पांडेबाईंकडे बघितलं. त्यांनी संमतीदर्शक मान डोलावली.
‘चला तर मग’, गुरुजींनी तुरुतुरु चालत आम्हाला घाटाच्या एका कोपऱ्यात नेलं आणि खांद्याची पडशी उघडून सगळं सामान मांडायला सुरवात केली. सभोवताली अनेक माणसं थोड्या-फार फरकाने तेच विधी करत होती. सगळीकडून मंत्रोच्चारांचे आवाज येत होते. संध्याकाळच्या सोनेरी ऊनात गोदावरीचं पाणी हलकेच चमचमत होतं. मागून देवळांचे उंच कळस डोकावत होते. फार सुंदर संध्याकाळ होती, तरी सगळीकडे एक भयाण सुतकीपणा भरून राहिलेला होता. इतर तीर्थक्षेत्रात असते तशी आनंदी, उत्साही गडबड रामकुंडावर नव्हती. मृत्यू जणू अजून चोरपावलाने तेथे वावरत होता.
गुरुजींनी लगोलग दोन पाट मांडले. फुलं, दर्भाच्या अंगठ्या, तांब्या, काळे तीळ, पिंड वगैरे सामान पडशीतून काढून व्यवस्थित रचून ठेवलं आणि नको तो प्रश्न विचारलाच,
‘बरोबर कुणी पुरुष माणूस नाहीये का? विधी कोण करणार’?
‘मै करूंगी. इनका अग्नीसंस्कार भी मैने किया था और ये संस्कार भी मै करूंगी’, ठाम स्वरात एकेक शब्द तोलून मापून उच्चारत पांडेबाई म्हणाल्या. गुरुजींनी एकवार डोळे रोखून आमच्याकडे बघितलं आणि म्हणाले, ‘ठीक आहे, या बसा’.
पांडेबाईनी गुरुजींनी सांगितलेल्या जागेवर अस्थिकलश ठेवला आणि त्या पाटावर बसल्या. मी त्यांच्या शेजारी उभी राहून सर्व बघत होते. मंत्रोच्चार सुरु झाले. गुरुजींनी सांगितलेले उपचार पांडेबाई मनोभावे करत होत्या. शेवटी अस्थिकलश उघडायची वेळ आली. ‘अपनी बेटी को बुलाईये, अस्थिकलश उसके हाथोंसे खुलवाना होगा’, माझ्याकडे दृष्टीक्षेप करत गुरुजी म्हणाले. मी चमकून त्यांच्याकडे पाहिलं. ‘अहो, मी त्यांची मुलगी नाहीये’, असं म्हणणार तेव्हढ्यात माझं लक्ष पांडेबाईंच्या चेहेऱ्याकडे गेलं. त्या माझ्याचकडे बघत होत्या. स्थिर नजरेने. त्या दृष्टीत कुठेही विनवणीचा वा दीनवाणेपणाचा भाग नव्हता, होता तो फक्त आपलेपणाचा अधिकार.
भारल्यासारखी मी पुढे झाले आणि त्या लाल कापडाची गाठ सोडली. उन्हाने तापलेल्या त्या तांब्याचा तप्त स्पर्श त्या कपड्यातूनही माझ्या कापऱ्या बोटांना जाणवत होता. हरवल्यागत मी गुरुजींच्या सुचनांचं पालन करत होते. माझ्या ओंजळीत मुठभर काळे तीळ देऊन गुरुजी म्हणाले, ‘आता गेलेल्या आत्म्याला तिलांजली द्या’, गंभीर आवाजात त्यांचे मंत्रोच्चार सुरु झाले, माझ्या बोटांमधून ओलसर काळे तीळ अस्थिकलशावर पडत होते. शेजारी पांडेबाई हात जोडून उभ्या होत्या. त्यांच्या मिटल्या डोळ्यातून घळघळ पाणी वहात होते.
गुरुजींचे मंत्र संपले. अस्थिकलश उचलून ते म्हणाले, ‘चला’, आणि कुंडाच्या दिशेने चालू लागले. त्यांच्या मागोमाग आम्ही दोघी निघालो. चिंचोळ्या, दगडी फरसबंद वाटेवरून आम्ही दोघी चालत होतो. सतत हिंदकळणाऱ्या लाटांमुळे वाट पार निसरडी झाली होती. पाय घसरेल म्हणून मी जपून पावले टाकत होते आणि माझ्या हाताचा आधार घेऊन पांडेबाई सावकाश चालत येत होत्या. स्वतःच्या पोटच्या मुलीच्या आधाराने चालावं इतक्या निःशंकपणे.
आम्ही कुंडापाशी आलो. गुरुजींनी कलश पांडेबाईंच्या हातात दिला. ‘अब आप मां-बेटी मिलकर इस कलश को गंगा में रिक्त किजीये’, गुरुजी बोलले आणि दोन पावले मागे सरकून उभे राहिले. आम्ही दोघींनी मिळून कलश हातात घेतला. माझ्या मऊ, मध्यमवर्गीय हातांना पांडेबाईंच्या आयुष्यभर काबाडकष्ट केलेल्या हातांचा राठ, खरबरीत स्पर्श जाणवत होता. एखाद्या जाड्याभरड्या गोधडीच्या स्पर्शासारखा होता त्यांचा स्पर्श, रखरखीत, तरीही उबदार. आम्ही दोघींनी पाण्याच्या काठावर जाऊन अस्थिकलश हळूच तिरका केला. अस्थी पाण्यात पडू लागल्या. राखेचे मऊ, पांढुरके कण क्षणभर वाऱ्यावर गिरकी घेऊन कुंडाच्या पाण्यावर किंचित रेंगाळले आणि दिसेनासे झाले. मी कधीही न पाहिलेल्या एका व्यक्तीची शेवटची शारीर खूण निसर्गात विलीन होत होती. माझ्याही नकळत मी हात जोडले आणि ज्या अनाम, अनोळखी माणसासाठी मी लेकीचं कर्तव्य पार पाडलं होतं त्याला सद्गती लाभो अशी मनापासून प्रार्थना केली.
गुरुजींना दक्षिणा देऊन आणि त्यांचा निरोप घेऊन आम्ही गोदातीरावरून निघालो. आता सूर्य मावळला होता, पण आकाश अजूनही लाल-केशरी रंगात माखलं होतं. काळोख एखाद्या मखमली शालीसारखा हळूहळू उलगडत होता. मी पांडेबाईना रिक्षापर्यंत सोडायला गेले. त्यांना लगेचच मुंबईला परत जायचं होतं. रिक्षात त्यांना बसवून दिल्यावर माझा हात हातात घेऊन त्या बोलल्या, आधीच्याच ठाम, आश्वस्त स्वरात, ‘तुम संतान रही होंगी उनकी किसी जनम में इसीलिये आज ये काम हुआ तुमसे’. माझ्या केसांवर एक मायेचा हात ओढून त्या सावरून बसल्या. रिक्षा सुरु झाली. रिक्षा दिसेनाशी होईपर्यंत मी त्या दिशेने बघत होते. माझ्या हातांना मघाशी जाणवलेला अस्थींचा, काळ्या तिळांचा थंडगार स्पर्श अजून विझला नव्हता.
लेखिका : सुश्री शेफाली वैद्य
संग्राहक : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एकदा सकाळ सकाळीसच गोरटेली गोल गरगरीत बाई दवाखान्यात आली. प्रस्थ श्रीमंतांकडचं दिसत होतं. गळा दागिन्यांनी भरलेला. गळाच काय जिथे जिथे दागिने असायला हवेत तिथे तिथे ते विराजमान असलेले. आल्या आल्या ती सरळ वजन काट्यावरच उभी राहिली. वजनकाटा नव्वदच्या वर सरकला, तशी ती किंचाळलीच. “अग्गो बाई नव्वदच्या वर गेलं की हो! बरेच दिवस अठ्ठ्यांशीवर रोखून धरले होते. डॉक्टर काहीतरी करा, मला वजन कमी करायचेय, त्यासाठी मी तुमच्याकडे आलीय.” मी तिला पुन्हा आपादमस्तक न्याहाळलं. मग सहजच बोललो, “यात दोन किलो वजन तुमच्या दागिन्यांचंच असेल.” तिला नेमकं ते वर्मावर बोट ठेवल्यासारखं वाटलं. आपले दागिने ठीकठाक करत, टेबलावर ठेवलेली पर्स पुन्हा ताब्यात घेत समोर खुर्चीवर बसली पसरट फैलावून, व म्हणाली, “नाही हो डॉक्टर, माझं वजन इतकं काही नाहीये. आमच्या घरी कुणीही काट्यावर उभं राहिलं की काटा शंभरी पार जातो. सगळ्यांच्या तब्येती मस्त, हे एक वजनाचं सोडलं तर! ” मग तिने अख्ख्या खानदानाचा वजनी लेखाजोखाच मांडला.
आता त्याचं (किंवा तिचं) असं होतं की ती पंजाबी होती. मेदस्वी असणं हे वंशपरंपरागत. त्यातही फॅमिली बिझनेस आलिशान दारूचं दुकान. सगळी उच्चकोटीची गिऱ्हाईकं. बिझनेस करता करता त्यांच्या बरोबर पिणं ही आलंच व आपसूक खाणंही. तेही प्रमाणाबाहेर. पुन्हा ते पंजाबी खाणं. मक्के की रोटी सरसों का साग, तेलतर्री व पनीरचा बोलबाला. शिवाय लस्सीचा मारा, मलई मार के. प्रकरण तसं गंभीरच होतं. म्हणजे वजन कमी करण्याबाबत. “मला हे सुटलेलं शरीर नकोसं झालंय. मी विशीत जशी शिडशिडीत होते तसं मला पुन्हा व्हायचंय.” चाळिशीची असूनही नव्वदीला टेकलेल्या स्थूलदेहधारिणीने निक्षून सांगितले.
“तुम्ही योग्य वेळी व योग्य ठिकाणी आलात. काळजी करू नका. मात्र तुमचा विशीतला एखादा फोटो असेल तर अवश्य दाखवा, म्हणजे शिडशिडीत असण्याची तुमची व्याख्या तरी कळेल!! ” असं मी म्हणताच तिने लागलीच मोबाईल काढून, दोन मिनिटे स्क्रोल करून एका सुंदर तरूणीचा फोटो मला दाखवला. कुणीही तिच्या प्रेमात पडावं असा!! मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना, तरीही विचारून घेतलं, “या तुम्हीच का?” यावर, “म्हणजे काय?” म्हणत, गोड लाजत तिने मान हलवली. आता आव्हान माझ्यापुढे होतं. गोल गरगरीत असण्यापेक्षा सुडौल असणं ही तिची प्रबळ इच्छा होती. वय फारसं उलटलेलं नव्हतं, तेव्हा तिला आश्वस्त करणं भाग होतं. तिची थोडक्यात हिस्ट्री घेतली तर तिने आयुष्याचा पटच रंगवला. नाशिक हे तिचं माहेर, इंदोर हे सासर. माहेराकडून मिळालेला वजनी वारसा सासरीही निभावला गेला. “खाना कंट्रोल ही नहीं होता हे पालुपद तिने कितीतरी वेळा उच्चारलेले. संयुक्त कुटुंबाचा गोतावळा, घरी पैपाहुण्यांचा राबता. खाणंपिणं याची रेलचेल. तरी “एवढ्यात पिणं मी कमी केलंय, वजन वाढत गेलं तसं, पण तेही थोडंफार सवयीचंच झालंय.” निर्विकारपणे तिने सांगितलं. “ ते अगोदर बंद करावं लागेल!” असं मी म्हटलं रे म्हटलं तिचा चेहेरा पडला. तरीही स्वतःला सावरत ती विशालकाय निश्चयाने उद्गारली, “ मैं कुछ भी करूंगी, मलाच हे ओझं सहन होत नाही. इतर तंदुरुस्त बायका पाहिल्या की माझा जळफळाट होतो, त्यांची डौलदार चाल, त्यांचे नखरे, फिगर मेंटेन केल्याचा अभिमान पाहून मी कष्टी होतेच होते. माझं वय काही फार नाही. इतक्या लवकर मी जाडगेलेसी कशी काय झाली याचं मलाच नवल वाटतं, तेव्हा इतर बायकांच्या बरोबरीने नव्हे पण त्यातल्यात्यात चांगलं दिसावं ही माझी तळमळ, मळमळ काय म्हणायचं असेल ते म्हणा, पण आहे.” तिने तिचा न्यूनगंड उघड केला. सहानुभूती वाटावी अशीच तिची जटिल समस्या! खरंतर तिचा विशीतला फोटो डोळ्यासमोरून हलत नव्हता. तसं असलं तर कुणीही सहज स्टेटस म्हणून ठेवला असता मोबाईलमधे. सिनेतारकांपेक्षाही ती उजवीच होती तेव्हा. तेव्हा तिला पुनश्च तिचं वैभव मिळवून द्यायचं याचा विडा मी उचललाच!
तिचा न्यूनगंड घालवणं आवश्यक होतं. मी म्हटलं, “देखो, गोल गरगरीत असणं हा काही गुन्हा नाही. राऊंड हाही एक शेपच आहे. त्यात बदल करणं एकदम सोपं नाही, तसेच अवघडही नाही. वेळ लागेल, काही तपासण्या, काही पथ्यपाणी, व्यायाम शिवाय औषधं याने तुम्ही बरंच काही मिळवू शकाल, आयमीन घालवू शकाल! तेव्हा काळजी करू नका. ”
आतापर्यंत चेहेऱ्यावर ताण घेऊन बसलेली ती एकेकाळची सौंदर्यवती आता थोडीफार प्रफुल्लित दिसायला लागली. वजन कमी होऊ शकतं असं म्हणणारा जणू मीच पहिला भेटलो असावा या आविर्भावात तिने सांगितलं, “माझा नवरा सहा महिन्यांसाठी कॅनेडात गेलाय, तो परत यायला आठ महिनेही लागू शकतील. मुलं ही बोर्डिंग स्कुलला शिकतात. तेव्हा सर्वांना सरप्राईज द्यायचा माझा इरादा आहे. तुम्ही सांगाल ते पथ्यपाणी, गोळ्या औषधं सगळं करेन पण मला पुन्हा पूर्वीसारखं व्हायचंय! ”
एक डॉक्टर म्हणून मला तिच्या कटात सामील होण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. तिचा विशीतला फोटो नजरे समोर ठेऊन !!
(४/३/२०२४ रोजी झालेल्या ‘ वर्ल्ड ओबेसिटी डे ‘ निमित्त.)
(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय डॉ कुन्दन सिंह परिहार जी का साहित्य विशेषकर व्यंग्य एवं लघुकथाएं ई-अभिव्यक्ति के माध्यम से काफी पढ़ी एवं सराही जाती रही हैं। हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहते हैं। डॉ कुंदन सिंह परिहार जी की रचनाओं के पात्र हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं। उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपकी एक अतिसुन्दर विचारणीय व्यंग्य – ‘जागी हुई अन्तरात्मा का उपद्रव‘। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार # 233 ☆
☆ व्यंग्य – जागी हुई अन्तरात्मा का उपद्रव ☆
एक रात लल्लूलाल लिपिक ने सपना देखा कि यमराज उससे कह रहे हैं, ‘बेटा लल्लूलाल, तुमने खूब रिश्वत खायी है, इसलिए नरक में तुम्हारे लिए कमरा रिज़र्व हो गया है।’ उन्होंने लल्लूलाल को नरक के दृश्य भी दिखाये जिन्हें देखकर लल्लूलाल की घिघ्घी बँध गयी। डर के मारे उसकी नींद खुल गयी और वह सारी रात लेटा लेटा रोता रहा, अपने कान पकड़ पकड़ कर ऐंठता रहा।
दूसरे दिन दफ्तर में भी लल्लूलाल काम करने की बजाय अपनी टेबल पर सिर रखकर रोता रहा। उसके सब साथी उसके चारों तरफ एकत्र हो गये।
छोटेलाल ने पूछा, ‘क्या बात है लल्ल्रू? कोई ठेकेदार कुछ देने का वादा करके मुकर गया क्या? ऐसा हो तो बताओ, हम एक मिनट में उसकी खाट खड़ी कर देंगे।’
लल्लूलाल विलाप करके बोला, ‘नहीं भइया, मैंने बहुत पाप किया है, बहुत रिश्वत खायी है। अपना परलोक बिगाड़ लिया। अब मेरी अन्तरात्मा जाग गयी है। मैं अपने पापों को धोना चाहता हूँ।’
मिश्रा बोला, ‘कैसे धोओगे’?
लल्लूलाल ने जवाब दिया, ‘मैं ऊपर अफसरों को लिखकर अपने अपराध स्वीकार करूँगा, अखबारों में छपवाऊँगा। छज्जूमल एण्ड कम्पनी और गिरधारीलाल एण्ड संस से जितना पैसा लिया है सबका हिसाब दूँगा।’
छोटेलाल बोला, ‘बेटा, डिसमिस हो जाओगे। जेल भोगोगे सो अलग।’
लल्लूलाल सिर हिलाकर बोला, ‘चाहे जो हो, अब मुझे परलोक बनाना है।’
मिश्रा बोला, ‘बाल बच्चे भीख मांगेंगे।’
लल्लूलाल हाथ हिला कर बोला, ‘माँगें तो माँगें। मैंने कोई सालों का ठेका ले रखा है?’
यह सुनकर दफ्तर में खलबली मच गयी। बड़ी भागदौड़ शुरू हो गयी। बड़े बाबू अपनी तोंद हिलाते तेज़ी से लल्लूलाल के पास आये, बोले, ‘लल्लू, यह क्या पागलपन है?’
लल्लूलाल ने जवाब दिया, ‘कोई पागलपन नहीं है दद्दा। अब तो बस परलोक की फिकर करना है। बहुत नुकसान कर लिया अपना।’
बड़े बाबू बोले, ‘लेकिन जब तुम छज्जूमल वाले केस को कबूल करोगे तो पूछा जाएगा कि और किस किस ने लिया था।’
लल्लूलाल ने जवाब दिया, ‘पूछेंगे तो बता देंगे।’
बड़े बाबू ने माथे का पसीना पोंछा, बोले, ‘उसमें तो साहब भी फँसेंगे।’
लल्लूलाल बोला, ‘फँसें तो फँसें। हम क्या करें? जो जैसा करेगा वैसा भोगेगा।’
बड़े बाबू बोले, ‘तुम्हें साहब की नाराजगी का डर नहीं है?’
लल्लूलाल बोला, ‘अरे, जब डिसमिसल और जेल का डर नहीं रहा तब साहब की नाराजगी की क्या फिक्र करें।’
बड़े बाबू तोंद हिलाते साहब के कमरे की तरफ भागे। जल्दी ही साहब के केबिन में लल्लूलाल का बुलावा हुआ। साहब ने उसे खूब फटकार लगायी, लेकिन लल्लूलाल सिर्फ रो रो कर सिर हिलाता रहा। साहब ने परेशान होकर बड़े बाबू से कहा कि वे उसे उसके घर छोड़ आएँ और उस पर खड़ी नज़र रखें।
बड़े बाबू, छोटेलाल और दो-तीन अन्य लोग लल्लूलाल को पकड़कर घर ले गये और उसे बिस्तर पर लिटा दिया।
बड़े बाबू ने उसकी बीवी और लड़कों को बुलाकर कहा, ‘देखो, यह पागल तुम लोगों से भीख मँगवाने का इन्तजाम कर रहा है। इसे सँभालो, नहीं तो तुम कहीं के नहीं रहोगे।’
लल्लूलाल के बीवी-बच्चों ने उस पर कड़ी निगरानी शुरू कर दी। साहब के हुक्म से दफ्तर का एक आदमी चौबीस घंटे वहाँ मौजूद रहता। बड़े बाबू बीच-बीच में चक्कर लगा जाते। लल्लूलाल बाथरूम भी जाता तो कोई दरवाजे पर चौकीदारी करता। उसके कमरे से कागज-कलम हटा लिए गये। कोई मिलने आता तो घर का एक आदमी उसकी बगल में बैठा रहता।
लल्लूलाल ने छुट्टी लेने से इनकार कर दिया तो बड़े बाबू ने उससे कह दिया कि छुट्टी लेने की कोई ज़रूरत नहीं है। वे हाजिरी- रजिस्टर लल्लूलाल के घर भेज देते और लल्लूलाल वहीं दस्तखत कर देता।
लल्लूलाल घर में दिन भर भजन- पूजा में लगा रहता था। सवेरे से वह नहा धोकर शरीर पर चन्दन पोत लेता और फिर दोपहर तक भगवान की मूर्ति के सामने बैठा रहता। बाकी समय वह रामायण पढ़ता रहता। घर के लोग उसके इस परिवर्तन से बहुत हैरान थे।
जब लल्लूलाल का चित्त कुछ शान्त हुआ तब साहब के इशारे पर बड़े बाबू ने उसके पास बैठकें करना शुरू किया। उन्होंने उसे बहुत ऊँच-नीच समझाया। कहा, ‘देखो लल्लूलाल, तुमने आगे के लिए रिश्वतखोरी छोड़ दी यह तो अच्छी बात है, लेकिन यह चिट्टियाँ लिखने वाला मामला ठीक नहीं है। इस बात की क्या गारंटी है कि ऊपर पहुँचने पर तुम्हें स्वर्ग मिल ही जाएगा? अगर वहाँ पहुँचने पर तुम्हें पिछले रिकॉर्ड के आधार पर ही नरक भेज दिया गया तब तुम्हारे दोनों लोक बिगड़ जाएँगे।’
लल्लूलाल सोच में पड़ गया।
बड़े बाबू उसे पुचकार कर बोले, ‘लल्लूलाल, तुम तो आजकल काफी पढ़ते हो। यह सब माया है। न कोई किसी से लेता है, न कोई किसी को देता है। सब अपनी प्रकृति से बँधे कर्म करते हैं। तुम बेकार भ्रम में पड़े हो।’
लल्लू लाल और गहरे सोच में पड़ गया, बोला, ‘लेकिन पुराने कर्मों का प्रायश्चित तो करना ही पड़ेगा दद्दा।’
बड़े बाबू बोले, ‘अरे, तो प्रायश्चित करने का यह तरीका थोड़े ही है जो तुम सोच रहे हो। इस तरीके से तो तुम्हारे साथ-साथ दस और लोगों को कष्ट होगा। दूसरों को कष्ट देना धर्म की बात नहीं है।’
लल्लूलाल चिन्तित होकर बोला, ‘तो फिर क्या करें?’
बड़े बाबू उसकी पीठ पर हाथ रख कर बोले, ‘मूरख! हमारे यहाँ तो पाप धोने का सीधा तरीका है। गंगा स्नान कर आओ।’
लल्लूलाल गंगा स्नान के लिए राजी हो गया। फटाफट उसकी तैयारी कर दी गयी। साहब का हुकुम हुआ कि छोटेलाल भी उसके साथ जाए, कहीं लल्लूलाल बीच में ही फिर पटरी से न उतर जाए।
छोटेलाल कुनमुनाया, बोला, ‘अभी से क्या गंगा स्नान करें?’
बड़े बाबू बोले, ‘बेटा, पिछला साफ कर आओ, फिर आगे की फिकर करो। ज्यादा एरियर एकत्र करना ठीक नहीं।’
उसने पूछा, ‘खर्च का इन्तजाम कहाँ से होगा?’
बड़े बाबू ने साहब से पूछा। साहब ने कहा, ‘छज्जूमल के यहांँ से पाँच हजार रुपया उठा लो। कह देना, धरम खाते में डाल देगा।’
और एक दिन लल्ल्रूलाल को उसकी बीवी और छोटेलाल के साथ ट्रेन में बैठा दिया गया। स्टेशन पर साहब भी उसे विदा करने आये। ट्रेन रवाना हो जाने पर उन्होंने लम्बी साँस छोड़ी।
दफ्तर लौटने पर बड़े बाबू जैसे थक कर कुर्सी पर पसर गये। मिश्रा से बोले, ‘भइया, यह अन्तरात्मा जब एक बार सो कर बीच में जाग जाती है तो बहुत गड़बड़ करने लगती है।’
(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के लेखक श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको पाठकों का आशातीत प्रतिसाद मिला है।”
हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है इस शृंखला की अगली कड़ी। ऐसे ही साप्ताहिक स्तंभों के माध्यम से हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)
☆ संजय उवाच # 231☆ दृश्य-अदृश्य
दृश्य और अदृश्य की बात अध्यात्म और मनोविज्ञान, दोनों करते हैं। यूँ देखा जाए तो मनोविज्ञान, अध्यात्म को समझने की भावभूमि तैयार करता है जबकि अध्यात्म, उदात्त मनोविज्ञान का विस्तार है। अदृश्य को देखने के लिए दर्शन, अध्यात्म और मनोविज्ञान को छोड़कर सीधे-सीधे आँखों से दिखते विज्ञान पर आते हैं।
जब कभी घर पर होते हैं या कहीं से थक कर घर पहुँचते हैं तो घर की स्त्री प्रायः सब्जी छील रही होती है। पति से बातें करते हुए कपड़ों की कॉलर पर जमे मैल को हटाने के लिए उस पर क्लिनर लगा रही होती है। टीवी देखते हुए वह खाना बनाती है। पति काम पर जा रहा हो या शहर से बाहर, उसके लिए टिफिन, पानी की बोतल, दवा, कपड़े सजा रही होती है। उसकी फुरसत का अर्थ हरी सब्जियाँ ठीक करना या कपड़े तह करना होता है।
पुरुष की थकावट का दृश्य, स्त्री के निरंतर श्रम को अदृश्य कर देता है। अदृश्य को देखने के लिए मनोभाव की पृष्ठभूमि तैयार करनी चाहिए। मनोभाव की भूमि के लिए अध्यात्म का आह्वान करना होगा। परम आत्मा के अंश आत्मा की प्रतीति जब अपनी देह के साथ हर देह में होगी तो ‘माताभूमि पुत्रोऽहम् पृथ्विया’ की अनुभूति होगी।
जगत में जो अदृश्य है, उसे देखने की प्रक्रिया शुरू हो गई तो भूत और भविष्य के रहस्य भी खुलने लगेंगे। मृत्यु और उसके दूत भी बालसखा-से प्रिय लगेंगे। आँख से विभाजन की रेखा मिट जाएगी और समानता तथा ‘लव बियाँड बॉर्डर्स’ का आनंद हिलोरे लेने लगेगा।
जिनके जीवन में यह आनंद है, वे ही सच्चे भाग्यवान हैं। जो इससे वंचित हैं, वे आज जब घर पहुँचें तो इस अदृश्य को देखने से आरंभ करें। यकीन मानिए, जीवन का दैदीप्यमान नया पर्व आपकी प्रतीक्षा कर रहा है।
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
💥 🕉️ श्रीमद्वाल्मीकीय रामायण का 51 दिन का प्रदीर्घ पारायण पूरा करने हेतु आप सबका अभिनंदन।🕉️
💥 साधको! कल महाशिवरात्रि है। शुक्रवार दि. 8 मार्च से आरंभ होनेवाली 15 दिवसीय यह साधना शुक्रवार 22 मार्च तक चलेगी। इस साधना में ॐ नमः शिवाय का मालाजप होगा। साथ ही गोस्वामी तुलसीदास रचित रुद्राष्टकम् का पाठ भी करेंगे।💥
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
Anonymous Litterateur of Social Media # 179 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 179)
Captain Pravin Raghuvanshi NM—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad was involved in various Artificial and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’. He is also the English Editor for the web magazine www.e-abhivyakti.com.
Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc.
Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi. He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper. The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.
In his Naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Awards and C-in-C Commendation. He has won many national and international awards.
He is also an IIM Ahmedabad alumnus.
His latest quest involves writing various books and translation work including over 100 Bollywood songs for various international forums as a mission for the enjoyment of the global viewers. Published various books and over 3000 poems, stories, blogs and other literary work at national and international level. Felicitated by numerous literary bodies..!
English translation of Urdu poetry couplets of Anonymous litterateur of Social Media # 179