मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आमचे तात्या … ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ आमचे तात्या … ☆ श्री सुनील देशपांडे

श्री. विनायक दामोदर सावरकर  , आज आपल्या पश्चात जवळपास साडेपाच दशकांचा कालावधी उलटून गेला, पण आपण स्वातंत्र्यवीर की माफी वीर, हा वाद काही मिटता मिटत नाही. परवाच रणदीप हुडाने तयार केलेला आपल्या जीवनी वर आधारीत नवनिर्मित सिनेमा पाहिला आणि माझ्या मनात या द्वंद्वाने पुन्हा उचल खाल्ली. तुमच्या विषयींचे मनोगत, हे तुम्हाला सांगणेच योग्य म्हणून हा प्रपंच…..

प्रथमदर्शनी तर हेच दिसते आहे की चूक नव्हे प्रचंड मोठा अपराध हा तुमच्याकडूनच झाला आहे. संपूर्ण आयुष्यात तुम्ही लहानमोठ्या इतक्या चूका केलेल्या लक्षात येते की त्यामुळेच तुमच्या कार्यकर्तृत्वाची ही जी काही आजही उपेक्षा सुरू आहे, हे योग्यच आहे, असे खेदाने म्हणावेसे वाटते. मी जरा जास्त स्पष्टपणे माझे मत मांडतो आहे, कृपया राग मानू नये. काय करणार…‌ तुमचाच स्पष्टवक्तेपणा कणभर का होईना झिरपला आहे… अर्थात हा दोषही तुमचाच.असो.

खरं पाहता छान शिष्यवृत्ती मिळालेली, त्या काळात विलायतेत राहून अभ्यास पूर्ण करून , बॅरिस्टरची पदवी पदरात पाडून, तिथेच सेटल व्हायचे , अथवा भारतात परतून तत्कालीन इतर बॅरिस्टर मंडळींप्रमाणे छान प्रॅक्टीस करत गडगंज पैसा कमवत ऐषोआरामाचे जीवन जगत केवळ एक छंद, टाईमपास म्हणून सवडी नुसार राजकारण करायचं, ही पद-पैसा-प्रतिष्ठा मिळवून देणारी त्रिसूत्री अवलंबायची सोडून नको ते डोहाळे तुम्ही स्वताचे पुरवत बसलात. यात सर्वस्वी दोष तुमचाच आहे, हे तुम्हाला मान्य करावेच लागेल. नेहरू, गांधी, जिन्ना यांची जीवनशैली, यशस्वीता , प्रसिद्धी पाहून सुद्धा तुम्हाला कधी आपला मार्ग तसूभरही बदलावा वाटला नाही हे एक महद् आश्चर्यच !!!!

अहो, तुम्ही शिक्षणासाठी विलायतेला गेलात आणि शिक्षणासोबत नको नको त्या गोष्टी करत राहिलात.स्वत: तर भरकटलातच पण सोबतच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासा पासून विचलीत करण्यात यशस्वी झालात. काय गरज होती १८५७ चे स्वातंत्र्य समर , सहा सोनेरी पाने अशी पुस्तके लिहिण्याची ? तुम्ही अभ्यास करत होता वकिलीचा आणि इकडे इतिहास संशोधन व दुरुस्ती. काय साधलं त्यातून ?? म्हणे दृष्टीकोन बदलायचा आहे. तुम्ही काय मानसशास्त्रज्ञ झाला होता ? अहो, जिथे गीता-ज्ञानेश्वरी वाचून काही फरक पडला नाही, राजा हरिश्चंद्र, श्रीराम, श्रीकृष्ण, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज प्रभृतींनी आपल्या जीवाचं रान केलं तरी ज्यांचा दृष्टीकोन बदलला नाही , असे आम्ही दगड , आणि तुम्ही अशा दगडांना घडवायला निघालात !!!!

१८५७ साली जे काही झालं , त्याला शिपायांचे बंड म्हणा किंवा भारताच्या स्वातंत्र्याकरता लढले गेलेले सशस्त्र युद्ध म्हणा , त्याने काय मोठा फरक पडणार आहे ? सर्वसामान्य जनता तेव्हाही उदासीन होती व आजही उदासीनच आहे. कारण त्यातून भाकरी मिळत नाही तात्या. पोटाची भूक नाही भागत. राजकीय स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी जुन्या पिढीतली मंडळी अजूनही इंग्रजी राज्य होतं तेच बरं होतं अशी हळहळ व्यक्त करताना दिसतात. काय आहे ना , की आम्हाला तुमच्या सारखे स्वताच्या सुखी संसाराला स्वताच्या हाताने चूड लावणे नाही पटत. तुमच्या हट्टापायी, देशप्रेमापायी तुम्हा दोघा भावांना काळा पाण्याची शिक्षा झाली, संपूर्ण घराची अन्नान्न दशा झाली. तुमच्या वंशाच्या अस्तित्वावरच संकट आले…. क्षमा करा पण हा पूर्णपणे अव्यवहारी वेडाचार आहे. अहो, शिवाजी जन्माला यावा , त्याने रामराज्य निर्माण करावं , हे सगळे आदर्श वाचायला बोलायला ठीक आहेत.

….  पण हे सगळं शेजारच्या घरात, आम्ही त्याचे फायदे घेण्यात , सुखात भागीदार होण्यात नक्कीच धन्यता मानू , पण आम्हाला काही त्रास होता कामा नये, असेच धोरण असायला नको का ? जेणेकरुन आमच्या जीवनाची शांती, सुरक्षितता, आमची लाईफस्टाईल कुठेही बाधीत होणार नाही, आणि याची काळजी मलाच कुटुंब प्रमुख म्हणून घ्यायला हवी ,    ” माझे कुटुंब, माझी जबाबदारी “

आपण मात्र प्रत्येक क्षणी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वताच्या व सावरकर कुटुंबाच्या , तसेच तुम्हाला मानणाऱ्या इतर तरुण क्रांतिकारकांच्या आयुष्याचा होम करत होतात. तुम्ही एवढे भारावले होता की, ज्यांच्या साठी एवढा आटापिटा तुम्ही आयुष्यभर चालवला होता, त्यांना ते हवे आहे का ? याचा किंचितही विचार करण्याची तुम्हाला गरज सुद्धा वाटली नाही….

चिखलात लोळणाऱ्या आम्हा डुकरांना, उकिरड्यातच स्वर्ग उपभोगणाऱ्या गाढवांना तुम्ही आलिशान महालात नेवू पाहण्याचा हा तुमचा अट्टाहासच आजच्या तुमच्या या अवस्थेला जबाबदार आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे.

लक्षात घ्या, छत्रपतींना स्वराज्य स्थापनेपासूनच सर्वात जास्त संघर्ष वा विरोध कुणाचा सहन करावा लागला ?? सो कॉल्ड, खानदानी मराठ्यांचा, त्यांच्याच जातभाईंचा .

क्रांतिकारकांच्या लपण्याच्या जागांची माहिती इंग्रज अधिकाऱ्यांना कोण पुरवत होते, भारतीयच ना….

तुम्ही तुरूंगवासातून बाहेर पडल्यानंतर तुमच्या स्वागताला किती जण होते, हे जनतेने तेव्हाच तुम्हाला दाखवून दिले होते. तुमच्या त्यागाची, भावनांची , संघर्षाची , कष्टाची किंमत त्यांना किती आहे ते. तुमचे विचार म्हणजे वाघिणीचे दूध, ते वाघाचा बछडाच पचवू शकतो. आमच्या सारख्या मेंढरांचे ते कामच नाही. तेव्हा ही ते शक्य नव्हते व आजही नाहीच.

अजून एक सांगायचं राहून गेलं. आजकालचा फण्डा आहे, ” जो दिखता है , वही बिकता है ” पण अशी आपली दिखावा करण्याची मानसिकताच नाही, मग समाजमान्यता तुम्हाला मिळणार तरी कशी ?? तुम्ही अंदमानात सहन केलेल्या यमयातनांची, अमानवीय छळाची मार्केटिंग करावी असा तुमचा पिंडच नसल्याने तिथला तुमचा जाच , शारीरिक पिडा , उपासमार, बौद्धिक, भावनिक कोंडमारा यापेक्षा आम्हाला सूत कताई सोबत केलेल्या प्रतिकात्मक उपोषणाचे महत्त्व जास्त वाटलं तर यात आमचा दोष कसा काय असू शकतो ??

वर्गात जो विद्यार्थी प्रत्येक वेळी पहिला असतो, शिवाय खेळात , नाटकात ….तो इतर विद्यार्थ्यांच्या रोषालाच पात्र ठरतो. कारण तो सर्व शिक्षकांचा आवडता असतो. प्रत्येक शिक्षक त्याचच कौतुक करत असतात, त्याचच उदाहरण सर्वांना आदर्श म्हणून घालून देत असतात. आपण भारतमातेचे लाडके सुपुत्र आहात , तिच्या गळ्यातील रत्नहार आहात, पण आपलं अनेकांगी व्यक्तिमत्त्व, आपली नैतिक, वैचारिक, बौद्धिक उंची आमच्या कल्पनेच्याही खूप खूप पलिकडची. तुमची बरोबरी आम्ही नाही करू शकत. मग निर्माण होणाऱ्या द्वेषाचे, असूयेचे काय करायचे ? तुमच्या छोट्या बंधूंना १९४८ साली दगडांनी ठेचून ठेचून मारण्याच्या महापराक्रमाने आम्ही हे दाखवून दिलेलेच आहे.

शेवटचं पुन्हा सांगतो, तात्याराव सर्व आयुष्य भर तुम्ही या  देश, धर्म अन् समाजा करता केलेले सर्वस्व समर्पण. तुमची ओजस्विता , तेजस्विता , सर्व सर्व काही आमच्या दृष्टीने मातीमोल . आकाशातील सुर्य आकाशीच शोभून दिसतो. आम्ही तुम्हाला आमच्या रंगाने नाही रंगवू शकत… तुमचं तेजही नाही सहन करू शकत. म्हणूनच तुमच्या वर थुंकण्याचा आमच्या लायकी प्रमाणे आम्ही प्रयत्न करत राहणार. कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी ते वाकडच राहणार , आमची ही अगतिकता तुम्हीच समजून घ्याल अशी अपेक्षा करून आता आपला निरोप घेतो. 

लेखक :  प्रविण शिंदे.

प्रस्तुती : सुनील देशपांडे 

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एका शूरवीराचे शब्द !  ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

एका शूरवीराचे शब्द ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

एका शूरवीराचे शब्द ! 

अर्थात… शूर नायक…कर्नल वसंथा वेणुगोपाल ! 

आसमंतात धुकं नुसतं भरून राहिलंय. माझ्या जवानांनी मस्तपैकी शेकोटी पेटवून ठेवलीये माझ्या खोलीतल्या शेकोटीच्या जागेत….छान ऊब मिळतीये काश्मिरातल्या त्या नाजूक लाकडांतून उठणा-या सडपातळ ज्वाळांची. मी अंगावर रजई पांघरूण पडलो आहे निवांत भिंतीला गुडघे टेकवून. सारं कसं धुंद आहे….आपण प्रेमात असतो ना तेंव्हा वाटतं तसं…सगळं मधाळ. केनेथ ब्रुस गोरलिक ज्याला सर्वजण केनी जी म्हणतात…त्याचं स्मूद जॅझ सॅक्सोफोन कानांवर हलकेच पडतं आहे….द मोमेंट वाजवतो आहे केनी. 

पण खोलीच्या बाहेर रात्रीच्या अंधारात इकडून तिकडे सतत येरझारा घालणारा प्रकाशझोत आहे आणि त्याचा उजेड थोड्याथोड्या वेळाने खोलीत येऊन जातोय…..हा प्रकाश डोंगरावर काहीतरी शोधतो आहे डोळ्यांत तेल घालून. माझी एके-४७ माझ्या हाताशीच आहे….या शस्त्राचा तो थंड स्पर्श! यातून सुटणारा आगीचा लोळ क्षणार्धात समोरचा देह कायमचा थंड करणारा…..आणि म्हणूनच या सुंदर वातावरणात वास्तवाचं भान सुटता सुटत नाही. आणि ते सोडून चालणार नाही. मी इथं जीवनाचा आनंद घेण्यासाठी, सुट्टीवर आलेलो नाहीये. आपल्या सीमेत कुणीतरी घुसण्याच्या प्रयत्नांत आहे….शत्रू! आणि त्याला थोपवण्यासाठी,संपवण्यासाठी या जीवघेण्या थंडीतही अंगात ऊब टिकवून ठेवायला पाहिजे…..मी जागाच आहे. 

आज पहाटे दोन वाजताच आम्ही शत्रूच्या मागावर निघालो होतो….सात वाजेपर्यंत चालू होता आजचा खेळ. आम्ही दबा धरून बसलो होतो….प्रचंड साचलेल्या बर्फात….अंगातील हाड न हाड गोठून चाललेलं….सर्वांच्या हातातील एके-४७ रायफल्स….एखाद्या बाळाला जसं हातांवर अलगद झुलवत रहावं तसं या रायफल्स खेळवत,सांभाळत सर्व सज्ज होतो! आम्ही त्यांची वाट पहात होतो….शिकार रायफल्सच्या टप्प्यात येण्याची वाट पहात बर्फात निजलेलो होतो….कसलाही आवाज न करता…आमच्या श्वासांचाही आवाज बहुदा होत नसावा…श्वासांना वेळकाळ समजते! 

पण आज त्यांची शंभरी भरलेली नसावी बहुदा….आम्ही आयोजित केलेल्या या स्वागतसमारंभाकडे मंडळी फिरकलीच नाहीत….त्यांना बहुदा आमचा अंदाज आलेला असावा. किंवा मिळालेली गुप्त माहिती अपुरी असावी! असं होतं कित्येकदा. पण बेसावध राहून चालत नाही! आम्ही परत आलो आहोत! पण लवकरच त्या आगंतुक पाहुण्यांची गाठ पडणार हे निश्चित! 

हे शब्द आहेत एका नीडर आणि तरीही मनाने अत्यंत कोवळ्या असलेल्या एका सैन्याधिका-याचे….आपल्या प्रिय पत्नीला सुभाषिणीला लिहिलेल्या एका पत्रातील. अशी चारशेपेक्षा अधिक पत्रं संग्रही आहेत वीरनारी सुभाषिणी वेणुगोपाल यांच्याकडे. आणि या पत्रांचे लेखक आहेत कर्नल वसंथा वेणुगोपाल. 

वेणुगोपाल साहेब १९८९ मध्ये मराठा लाईट इन्फंट्रीच्या ‘घातक नववी’ म्हणून ख्यातकीर्त असलेल्या नवव्या बटालियनमध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झाले होते. त्यांची सैन्य कारकीर्द तब्बल १८ वर्षे बहरत राहिली. २००६ मध्ये वेणुगोपाल साहेबांना याच नवव्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर म्हणून जबाबदारी मिळाली….कर्नल वसंथा वेणुगोपाल यांच्या नेतृत्वात यावेळी ही बटालियन जम्मू-काश्मिरातील उरी येथे कर्तव्यावर होती. आणि बटालियनच्या प्रत्येक अतिरेकी विरोधी अभियानात कर्नल साहेब जातीने पुढे असत. एकदा त्यांच्या आईसाहेबांनी त्यांना विचारले होते….कर्नल दर्जाच्या अधिका-यास असं प्रत्येक वेळी प्रत्येक कामात पुढं असावंच लागतं का? त्यावर साहेबांनी मातोश्रींना हसत हसत सांगितलं होतं…अम्मा….माझी माणसं जिथं तिथं मी! जवानाचं नेतृत्व असं अग्रभागी राहूनच करावं असं मला वाटतं! 

आजही असंच केलं साहेबांनी. ३०  जुलै २००७…पाकिस्तानातून अतिरेक्यांचा एक मोठा गट उरीमध्ये घुसण्याच्या तयारीने सीमा पार करून आपल्याकडे घुसलेला आहे….ही खबर पक्की होती. साहेबांनी आपले कमांडो सज्ज केले आणि स्वत: पुढे निघाले. अतिरेक्यांसाठी भरभक्कम सापळा रचला. अतिरेकी रात्रभर बर्फाच्या कड्यांच्या आडोशाने लपत छ्पत पुढे येत होते….गुहांमध्ये लपत होते. पण आपल्या जवानांनी त्यांना नजरेने टिपलेच… 

कर्नल साहेबांनी आता मात्र त्यांना चारी बाजूंनी घेरलं…त्यांना आपल्याकडे घुसू तर द्यायचेच नाही पण परत पाकिस्तानी सीमेत जिवंतही पळून जाऊ द्यायचे नाही….हा प्रत्येकाचाच निर्धार होता. प्रचंड बर्फ होतं…..वीस-तीस फुटांच्या घळी होत्या वाटेत. त्यांच्या निमुळत्या जागांमध्ये आडवे झोपून अतिरेक्यांच्यावर लक्ष ठेवून रहावे लागत होतं. वेणुगोपाल साहेबांना आपला वेढा करकचून आवळत आणला. साहेबांसोबत रेडिओ ऑपरेटर लान्स नायक शशिकांत गणपत बच्छाव नावाचा मर्दमराठा शूर गडी सावलीसारखा होता. 

३१ जुलै,२००७ची सकाळ उजाडली होती…काही तासांपूर्वी तुफान गोळीबार करीत राहणारे अतिरेकी आता एकाएकी शांत झाल्याचे वाटले. म्हणून शशिकांत यांनी अर्धवट उभे राहून गुहेच्या दिशेने पाहिले तर तिकडून एके-४७ ची मोठी फैर शशिकांत साहेबांच्या छातीत घुसली….पण कोसळता कोसळता या पठ्ठ्याने समोरच्या अतिरेक्याला अचूक टिपून वरती पाठवले. आता मात्र वेणुगोपाल साहेब चवताळून पुढे सरसावले. अतिरेक्यांसमोर त्यांचा साक्षात मृत्यूच उभा ठाकला होता..

साहेबांनी एकाला तर अगदी समोरासमोर उडवला….पण इतर अतिरेक्यांनीही नेम साधले आणि साहेब गंभीर जखमी झाले आणि वीस फूट खाली कोसळले…जवानांनी त्यांना पुन्हा वर आणले व सुरक्षित जागी निजवले…पण तशाही स्थितीत साहेबांनी सूचना,नेतृत्व आणि स्वत: गोळीबार जारी ठेवला…रक्तस्राव सुरू असतानाही. वैद्यकीय मदत मिळायला अवकाश होता….! साहेबांनी अशाही स्थितीत आणखी दोन शत्रू टिपले….घातक नववी मराठा बटालियन आता अतिरेक्यांवर आवेशाने तुटून पडली….एकूण आठ अतिरेकी होते….कर्नल साहेब, शशिकांत साहेब आणि उर्वरीत कमांडोज यांनी मिळून हे आठ राक्षस निर्दाळले होते. 

पण लान्स नायक शशिकांत गणपत बच्छाव जागीच वीरगतीस प्राप्त झाले होते तर कर्नल वसंथा वेणुगोपाल साहेब रूग्णालयात उपचार मिळेपर्यंत स्वत:चे प्राण राखू शकले नाही….प्रचंड जखमी झाल्याने त्यांच्या श्वासांचाही नाईलाज होता! 

कर्नल साहेबांना मरणोत्तर अशोक चक्र सन्मान दिला गेला. लान्स नायक शशिकांत बच्छाव यांना मरणोत्तर वीरचक्राने सन्मानित करण्यात आले. २५ मार्च ही कर्नल साहेबांची जन्मतिथी. आज ते ५५ वर्षांचे असते आणि त्यांच्या आंतरीक इच्छेनुसार निवांत जीवन जगत असलेले असते…पण…असो. भावपूर्ण श्रद्धांजली…साहेब. 

शहीद कर्नल वसंथा वेणुगोपाल यांच्या पत्नी श्रीमती सुभाषिणी वेणुगोपाल पती गमावल्यानंतरच्या अवघ्या तीनच महिन्यांत निश्चयाने उभ्या राहिल्या…त्यांनी सैनिकांसाठी काम सुरू केले आणि हे काम अतिशय उत्तम सुरू आहे. 

कर्नल साहेबांच्या दोन्ही मुलींनी मिळून फॉरएव्हर फोर्टी नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यात कर्नल साहेबांनी कुटुंबियांना लिहिलेल्या चारशेच्या वर पत्रांचा उल्लेख,संदर्भ आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्याची माझी इच्छा आहे. पुस्तक मागवले आहे. लवकरच त्याबाबतीत कार्यवाही सुरू करीन. कारण ही शूर आयुष्यं आणि त्यांच्या धीरोदात्त कुटुंबियांचा संघर्ष सर्वांपर्यंत पोहोचायला पाहिजेत…असं वाटत राहतं. 

(वरील छायाचित्रात डाव्या बाजूला कर्नल साहेब आणि उभे असलेले लान्स नायक शशिकांत साहेब दिसत आहेत.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ परफेक्ट… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ परफेक्ट… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

सध्या ओ टी टी मुळे सगळं जग हातात आलं आहे. मला हव्या त्या देशातील, हव्या त्या भाषेतील सिनेमे आणि सिरियल बघता येतात. आणि मला आवडतं निरनिराळ्या देशातले लोक, तिथल्या पद्धती, तिथला निसर्ग बघायला. त्यामुळे इंग्लिश मध्ये भाषांतर केलेल्या सिरीयल मी बघते.

अशीच एक सिरीयल बघत होते. त्यात आजकालच्या स्त्रियांना किती ताण असतो, घरचं सगळं करून, नोकरी करून, मुलं सांभाळून, शिवाय पुन्हा स्वतःच्या आवडीचं काही करायला कसा वेळ मिळत नाहीये यावर त्यातली पात्रं चर्चा करत होती.

मला ही चर्चा पाहताना पटकन असं वाटलं की ही गोष्ट किती ग्लोबल आहे. हाच संवाद आत्ता मुंबईत एखाद्या लोकलच्या डब्यातपण चालू असेल, जपानच्या बुलेट ट्रेन मध्ये किंवा अमेरिकेत एखाद्या कॅफेतसुद्धा सुरू असेल.

तेवढ्यात त्या चर्चेत सहभागी नसलेली, पण शेजारच्या खोलीतून सरबत घेऊन आलेली एक आज्जी असते, तिला त्या सगळ्या जणी विचारतात की, “ए, तू कसं मॅनेज केलंस गं सगळं? तूही कॅफे चालवत होतीस, तूही घरी येऊन पुन्हा सगळं काम करत होतीस, मुलांची शाळा, अभ्यास, मोठ्यांचे आजार सगळं छान मॅनेज करत होतीस. तुला आम्ही कधीही थकलेलं पाहिलं नाही.”

यावर ती आज्जीबाई छान गोड हसते आणि म्हणते, “मी थकत असे कधीकधी, पण मला ताण मात्र कधीही आला नाही. कारण मला पर्फेक्ट व्हायची भूक नव्हती. किंबहुना आमच्या काळी असं ‘पर्फेक्ट असं काही नसतं’ असं लोकांना मान्यच होतं.

आई म्हटल्यावर ती चुरगळलेल्या ड्रेसमध्ये केस विस्कटलेली असू शकते. मुलांनी भरलेलं घर हे पसारायुक्तच असणार. चाळीशी पार केलेला मुलांचा बाबा, टक्कल असणारच त्याला. पर्फेक्ट असं काही नव्हतं आणि ते असावं असा अट्टाहाससुद्धा नव्हता. त्यामुळे सोप्पं गेलं जरा तुमच्यापेक्षा.”

पुष्कळ आत्मपरीक्षण करायला लावणारा प्रसंग आहे हा.

का अट्टाहास करतोय आपण पर्फेक्ट असण्याचा आणि कुणासाठी?

जाहिरातीत दाखवतात तशी संध्याकाळीसुद्धा तरतरीत आणि केससुद्धा वाकडा न झालेली आई प्रत्यक्षात नसते, कारण प्रत्यक्षातल्या आईला संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर गॅसजवळ उष्णतेची धग सोसत पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक करायचा असतो. सणाच्या दिवशी 12 माणसांचा स्वयंपाक आणि आदरातिथ्य करताना मेकअप आणि भरजरी साडी नाही सांभाळू शकत सगळ्या, त्याऐवजी कुर्ता घातला असेल तर सरसर कामे करता येतात.

ऑफिसला प्रेझेंटेशन असेल त्यादिवशी घरी काम जरा बाजूला ठेवावेच लागणार आहे.मुलांच्या परीक्षा असतील तर आईनेच अभ्यास घ्यायचा असं कुठल्याही ग्रंथात सांगितलेले नाही. चित्रातल्यासारखं आवरलेलं घर हे फक्त चित्रात नाहीतर नाटक सिनेमातच असतं.

स्वतःहून अभ्यास करणारी आणि पहिले नंबर वगैरे आणणारी मुलं तर मला वाटतं बहुधा फक्त स्वप्नातच असतात. कुणाचा तरी पहिला नंबर येणार म्हणजे इतरांचा दुसरा तिसरा चवथा पाचवा येणारच. अभ्यास छान करून घ्या, पण नंबर येऊ दे की पंचविसावा. नोकरी देताना शाळेतला चवथी ब मधला नंबर कोण विचारतो?.

तब्येत सांभाळावी हे ठीक, पण पन्नाशीच्या बाईने पंचविशीतील दिसण्याचा अट्टाहास कशासाठी?वजनाचा काटा आटोक्यात असावा जे ठीक, पण ‘साइझ झिरो’ चा हट्ट कशाला? सगळ्यांना वन पीस चांगलाच दिसला पाहिजे, हा हट्ट कशासाठी ? काहींची वळणे साडीमध्ये काय सुरेख दिसतात. टाचा मोडून पडतात की काय असं वाटेपर्यंत दुखावणार्‍या हाय हील कशासाठी. टाच महत्वाची आहे की फोटो?

मुळात या पर्फेक्शनच्या व्याख्या कोण ठरवते आहे?

ऑफिसला काय घालावे, घरी काय घालावे, कसे रहावे, कसे चालावे, कसे बोलावे, कसे दिसावे, कुठे फिरायला जावे, काय आणि कधी खावे, अगदी कुठल्या गादीवर आणि कसे झोपावे, सगळं काही ठरवण्याचे हक्क आपण मिडियाला नेमके का आणि कधी दिले?

एक माणूस दुसर्‍या सारखं कधीही नसतं मग सगळ्यांना एकच व्याख्या कशी लागू होईल?

करा की मस्त भिंतीला तंगड्या लावून आराम. होऊ देत घराचं गोकुळ. अघळपघळ गप्पा मारा मुलांशी, नवर्‍याशी. मस्त मोठमोठ्याने गाणी म्हणत फिरा घरभर गबाळ्या अवतारात. आणि तेवढ्यात पाहुणा आलाच तर त्यालाही आग्रह करा गोष्ट सांगायचा. सध्या दुर्मिळ होत चाललेली कला आहे ती.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गं सखे चैत्रपालवी… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ गं सखे चैत्रपालवी… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

गं सखे चैत्रपालवी! 

केलीस चैतन्याची उधळण  

तुझ्या केवळ चाहुलीने 

जर्जरतेला मिळे संजीवन  

*

तुझ्या स्वागता सज्ज जाहली 

हिरव्या मखमलीची पखरण 

आमराईच्या छायेखाली 

होई सोनकवडश्यांचे नर्तन  

*

इवली इवली रानफुलेही 

पाखरांसवे करिती गुंजन  

गुलमोहर ही फुलून येतो 

देऊ पाहतो तुला आलिंगन  

*

मोगऱ्याचा फाया  करतो 

भोवताली सुंगंधी पखरण 

सृष्टीचे हे रूप विलोभनीय 

पाहण्या ते रेंगाळे दिनकर  

*

तुझ्या स्पर्शाने खुलतो, फुलतो 

हर प्रहर अन् हर एक क्षण क्षण  

*

गं सखे चैत्रपालवी, 

केलीस चैतन्याची उधळण  

तुझ्या केवळ चाहुलीने 

जर्जरतेला मिळे संजीवन  

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #226 – कविता – ☆ आदमी सूरजमुखी सा… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का चौकीदार”   महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कविता आदमी सूरजमुखी सा” ।)

☆ तन्मय साहित्य  #226 ☆

☆ आदमी सूरजमुखी सा… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

हवाओं के साथ, रुख बदला नया है

आदमी, सूरजमुखी  सा हो गया है।

*

दोष देने में लगे हैं,  खेत को ही

घून खाए बीज, कोई  बो  गया है।

*

सोचना, नीति-अनीति व्यर्थ है अब

संस्कृति संस्कार घर में खो गया है।

*

संयमित हो कर, घरों  में  ही  रहें

खिड़कियों के काँच मौसम धो गया है।

*

सियासत का फेर, कारागार में

बढ़ गई बेशर्मियाँ, जो भी गया है।

*

फेन, फ्रिज, कूलर, सभी  चालु तो है

कौन सा भय फिर कमीज भिगो गया है।

*

अब बचा नहीं पाएँगे, मन्तर  उसे

रात उसकी छत पे उल्लू रो गया है।

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश के नवगीत # 49 ☆ नभ उड़ानों पर लिया… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

श्री जय प्रकाश श्रीवास्तव

(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी  के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ  “जय  प्रकाश के नवगीत ”  के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं।  आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “नभ उड़ानों पर लिया…” ।

✍ जय प्रकाश के नवगीत # 49 ☆ नभ उड़ानों पर लिया… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

 साधकर पर पाखियों ने

 नभ उड़ानों पर लिया।

 

 क्या करें आखिर

 कटे जो पेड़ थे

 चल पड़े कुछ लोग

 जो बस भेड़ थे

 पिया अमृत घट जिन्होंने

 कंठ भर कर विष दिया।

 

 डालियों पर बाँध

 अपनी हर व्यथा

 लिख वनस्पतियों में

 जीवन की कथा

 स्वर मिलाकर स्वरों से

 दर्द सारा पी लिया।

 

 चोंच में भरकर

 आशा की किरन

 पाँव में भटके

 ठिकानों की चुभन

 फड़फड़ाते रास्तों पर

 गीत कोई गा लिया।

***

© श्री जय प्रकाश श्रीवास्तव

सम्पर्क : आई.सी. 5, सैनिक सोसायटी शक्ति नगर, जबलपुर, (म.प्र.)

मो.07869193927,

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – हरापन ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

रमते कणे कणे, इति राम:.. जो कण-कण में रमता है, वह (श्री) राम है। श्रीरामनवमी की हार्दिक बधाई। 

? संजय दृष्टि – हरापन ? ?

शादीब्याह में

हरी साड़ी

हरी चूड़ियाँ

यहाँ तक कि

अंतिम प्रयाण में भी

हरे वस्त्र,

महत्वपूर्ण है

स्त्री का हरा होना

हरा रहना..,

 

हरी घास

हरी पत्तियाँ

हरे पेड़

हरी काई

प्रकृति की

अक्षत सौंध है

हरा होना..,

 

पेड़-पत्तियाँ

निर्दय संहार के

शिकार हैं

पानी के अभाव में

काई पर

भ्रूण हत्या की मार है..,

 

मखमली घास पर

बलात लाद दी गई हैं

हजारों टन की इमारतें..,

 

चैनल बता रहे हैं

तलाक में

साढ़े तीन सौ

प्रतिशत की वृद्धि

लिव-इन

सिंगल पेरेंट

बलात्कार

विकृत यौन अत्याचार

और भी बहुत कुछ वीभत्स..,

 

दम जैसे

घुट-सा रहा है

हरापन हमसे

छूट-सा रहा है।

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 मर्यादापुरुषोत्तम श्रीराम को समर्पित साधना मंगलवार (गुढी पाडवा) 9 अप्रैल से आरम्भ होगी और श्रीरामनवमी अर्थात 17 अप्रैल को विराम लेगी 💥

🕉️ इसमें श्रीरामरक्षास्तोत्रम् का पाठ होगा, गोस्वामी तुलसीदास जी रचित श्रीराम स्तुति भी करें। आत्म-परिष्कार और ध्यानसाधना भी साथ चलेंगी 🕉️

 अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ घोषणा पत्र – आचार्य भगवत दुबे ☆ दृष्ट-श्रव्यांकन एवं प्रस्तुति श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

आचार्य भगवत दुबे

(आज प्रस्तुत है संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी की एक समसामयिक विषय पर आधारित व्यंग्य कविता “घोषणा पत्र”श्री जयप्रकाश पाण्डेय जी ने उनकी कविता को अपने मोबाईल में डिजिटल रूप से दृष्ट-श्रव्यांकित कर हमें प्रेषित किया है।)    

आप आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व पर विस्तृत आलेख निम्न लिंक पर पढ़ सकते हैं :

हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆

श्री जय प्रकाश पाण्डेय जी के ही शब्दों में  

संस्कारधानी के ख्यातिलब्ध महाकवि आचार्य भगवत दुबे जी अस्सी पार होने के बाद भी सक्रियता के साथ निरन्तर साहित्य सेवा में लगे रहते हैं । अभी तक उनकी पचास से ज्यादा किताबें प्रकाशित हो चुकी है। बचपन से ही उनका सानिध्य मिला है। यहाँ यह उल्लेखनीय है कि आपके व्यक्तित्व एवं कृतित्व पर तीन पी एच डी ( चौथी पी एच डी पर कार्य चल रहा है) तथा दो एम फिल  किए गए हैं। स्व. डॉ राज कुमार तिवारी ‘सुमित्र’ जी के साथ रुस यात्रा के दौरान आपकी अध्यक्षता में एक पुस्तकालय का लोकार्पण एवं आपके कर कमलों द्वारा कई अंतरराष्ट्रीय सम्मान प्रदान किए गए। आपकी पर्यावरण विषय पर कविता ‘कर लो पर्यावरण सुधार’ को तमिलनाडू के शिक्षा पाठ्यक्रम में शामिल किया गया है। प्राथमिक कक्षा की मधुर हिन्दी पाठमाला में प्रकाशित आचार्य जी की कविता में छात्रों को सीखने-समझने के लिए शब्दार्थ दिए गए हैं।

ई-अभिव्यक्ति में प्रस्तुत है चुनाव के माहौल में आचार्य भगवत दुबे जी की बहुचर्चित एवं लोकप्रिय व्यंग्य रचना घोषणा पत्र –

✍  व्यंग्य कविता – घोषणा पत्र ☆ आचार्य भगवत दुबे ✍

आचार्य भगवत दुबे 

संपर्क – शिवार्थ रेसिडेंसी, जसूजा सिटी, पो गढ़ा, जबलपुर ( म प्र) – 482003 मो 9691784464

दृष्ट-श्रव्यांकन एवं प्रस्तुति – श्री जय प्रकाश पाण्डेय

संपर्क – 416 – एच, जय नगर, आई बी एम आफिस के पास जबलपुर – 482002  मोबाइल 9977318765

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – पुस्तक चर्चा ☆‘नारी नयी–व्यथा वही’ – डॉ मुक्ता ☆ समीक्षा – सुश्री आभा कुलश्रेष्ठ ☆

सुश्री आभा कुलश्रेष्ठ

☆ पुस्तक चर्चा ☆ ‘नारी नयी–व्यथा वही’ – डॉ मुक्ता ☆ समीक्षा – सुश्री आभा कुलश्रेष्ठ

पुस्तक   : नारी नयी–व्यथा वही

कवयित्री : डॉ• मुक्ता

प्रकाशन : वर्डज़ विग्गल पब्लिकेशन, सगुना मोर, दानापुर, पटना

पृष्ठ संख्या : 150

मूल्य     : 299 रुपए

समीक्षक – सुश्री आभा कुलश्रेष्ठ 

☆ समीक्षा – मानवीय संवेदनाओं व जीवन मूल्यों की कसौटी पर नारी – “नारी नयी–व्यथा वही” ☆

विभिन्न विरोधाभासों, विषमताओं व विसंगतियों से भरे संसार में सामाजिक, नैतिक और मानवीय मूल्यों का पतन निरंतर होता रहा है और जहाँ कभी भी, कहीं भी अन्याय हुआ है,  उसका प्रभाव नारी मन पर गहराई से पड़ता है–चाहे लोगों की ग़लत सोच व मानसिकता हो या युद्ध का मैदान हो; नारी हमेशा कठोर दंश झेलती रही है, जो नासूर बन आजीवन रिसते रहे हैं। नारी नयी हो या प्राचीन– पुरुष मानसिकता उसे निरंतर झकझोर कर रखती रही है–चाहे वह द्वापर की पंच भागों में विभाजित द्रौपदी हो या आधुनिक युग की निर्भया, नारी सदैव तिरस्कृत व प्रताड़ित रही है।

डॉ. मुक्ता – माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

डॉ• मुक्ता ने अपने सोलहवें काव्य-संग्रह ‘नारी नयी–व्यथा वही‘ में उपरोक्त विषय पर चिंतन-मनन किया है। वैसे तो नारी के प्रति संवेदनाशीलता से उनका रचना संसार अत्यंत समृद्ध है, क्योंकि यह उनका प्रिय विषय है। उन्होंने समाज में व्याप्त असत्य, अन्याय व प्रचलित कुरीतियों के साथ-साथ, विशेष रूप से नारी पर बेख़ौफ़ लेखनी चलाई है। स्पष्ट है, कमज़ोर समझे जाने के कारण नारी पर अत्याचार करना सुगम प्रतीत होता है। नारी व्यथा पर उन्होंने अत्यंत सरल और सहज शब्दों में स्त्री की बेबसी, विवशता व निरीहता को ढाला है। ‘अंतहीन मौन’,’ज़िन्दगी का सच’ जैसी कविताएं इसका उत्कृष्ट उदाहरण हैं। वे औरत के अन्तर्मन की तुलना जलती व धुंधुआती लकड़ी से करती हैं और कठपुतली के समान आदेशों का पालन करते हुए वेबस, विवश, पराश्रिता व लाचार मानतीं हैं। परन्तु क्या आज की नारी वास्तव में अबला है ? ये विचार भी उसके मनोमस्तिष्क को उद्वेलित व आहत ही नहीं करते; सोचने पर विवश भी करते हैं।

जद्दोज़ेहद से भरी दुनिया में अपवाद हर जगह होते हैं। नारी भले ही अबला है, परंतु सबला बनने की अंधी दौड़ में कुछ नारियों के लड़खड़ाते कदम हृदय को झकझोरते हैं। आज के वातावरण में कवयित्री नारी के बदलते रूप को देख कर चिंतित है कि उसके कदम किस दिशा की ओर अग्रसर  हैं। वह उसके ग़लत दिशा में अग्रसर कदमों को रोकना चाहती है। उसके अबला रूप से जहाँ उन्हें हमदर्दी है, वहीं दूसरी ओर उसके मर्यादाहीन और संस्कारविहीन रूप पर चिंतित होने के साथ नारी के आदर्श रूप की परिकल्पना भी कवयित्री ने बखूबी की है। ’मूल्यहीनता’ जैसी कविताओं में आज के वस्तुवाद, भौतिकवाद, दम तोड़ती संस्कृति, नैतिक व सामाजिक मूल्यों के पतन से दूषित होते विकृत समाज के प्रति चिंता व्यक्त की है। समस्याएं अत्यंत गम्भीर हैं और उनका निदान होना असम्भव नहीं, तो कठिन अवश्य है। क्या प्रेम में कभी विश्वासघात समाप्त हो पायेगा? क्या नारी के प्रति अत्याचार, दुष्कर्म व हत्या के हादसों पर अंकुश लग  पायेगा? स्वयं को सबला प्रदर्शित करने की धुन और आधुनिकता की दौड़ में उछृंखल, अमर्यादित व संस्कारहीन होती नारी को रोक पाना क्या सम्भव हो पाएगा? समाज में विभिन्न शाश्वत् समस्याएं सदा से रही हैं और भविष्य में भी रहेंगी। ये सामाजिक विसंगतियाँ व विद्रूपताएं संवेदनशील मन पर गहरा प्रभाव डालती हैं और उद्वेलित व व्यथित करतीं हैं।

‘नया दृष्टिकोण ‘में वे अपने मन से वादा करना चाहती हैं कि वे अब औरत के बारे में नहीं लिखेंगी, उसकी व्यथा-कथा का बयान नहीं करेंगी, लेकिन वे उसकी दशा पर लेखनी चलाए बग़ैर रह नहीं पातीं। सतयुग की अहिल्या हो या त्रेतायुग की सीता या द्वापर की द्रौपदी व गांधारी–कवयित्री ने ऐसी प्राचीन नारियों की बेबसी का जहाँ स्मरण किया है, वहीं अपने लिए नवीन राह खोजती ‘खाओ,पीओ और मौज उड़ाओ’ को आधुनिकता और स्वतंत्रता का रूप स्वीकारने वाली निरंकुश नारी का चित्रण भी किया है। परन्तु नारी का अमुक रूप डॉ• मुक्ता को हेय, त्याज्य व निंदनीय भासता है। कवयित्री उन्हें संस्कारित व मर्यादित रूप में देखना चाहती है। अबला नारी के प्रति जहाँ उन्होंने अस्तित्व की रक्षा हित उठ खड़े होने और अबला का लबादा उतार फेंकने का आह्वान किया है, वहीं मर्यादा की सीमाएँ लाँघती स्त्रियों के प्रति रोष भी प्रकट किया है। ‘टूटते संबंध‘ व ’दोषी कौन’ कविता में वे इस प्रश्न का उत्तर तलाशती हैं। ‘निर्भया‘ के प्रसंग पर इस पुस्तक में दो रचनाएँ उपलब्ध हैं, जिनमें अपराधियों को उचित व शीघ्र सज़ा दिलाने के कानून को प्रभावी बनाने और उसकी उचित अनुपालना पर ज़ोर दिया है।

नारी ईश्वर की सुंदर व प्रेम करने वाली सर्वश्रेष्ठ व अप्रतिम रचना है। उसका शरीर खिलौना या उपभोग की वस्तु नहीं, बल्कि ईश्वर के रचना संसार में सहयोग देने वाला ममतामयी सर्वोत्तम रूप है । नारी में माँ व बहिन का अक्स क्यों नहीं देखा जाता– विचारणीय है। ‘एसिड अटैक‘ जैसी कविताएँ घृणित ज़ुल्मों की शिकार नारी जाति के प्रति संवेदनाएं उकेरती हैं तथा अपने देश में इस तरह की घटनाओं की सज़ा ‘जैसे को तैसा’ पर अमल करने की पैरवी करती हैं। दूसरी ओर ‘तुम शक्ति हो’,’ऐ नारी!’ जैसी कविताएं उसे साहसी बन विषम परिस्थितियों का सामना करने को प्रेरित करती हैं। अपनी कविताओं के माध्यम से वे नारी को अंतर्मन में झाँकने व आत्मावलोकन करने का सुझाव भी प्रदान करती हैं।

‘पहचाना मैम’ और ‘मर्मान्तक व्यथा’ में उन सभी उपेक्षित, तिरस्कृत व प्रताड़ित पात्रों के विषय में अवगत कराया गया है, जिन्हें देख व पढ़-सुनकर लोग क्षण भर में भूल जाते हैं। अपनी कविताओं के माध्यम से वे समाज के हर वर्ग की पीड़ा को उजागर करना चाहती हैं। यही नहीं ‘दर्द का दस्तावेज़’ में कश्मीर के बारे में लिखा है, जो कश्मीरी पंडितों व वहाँ की महिलाओं के दु:ख-दर्द का दस्तावेज़ है क्योंकि उन पर होने वाले ज़ुल्म व अत्याचारों की दास्तान के बारे में जानकर रूह़ काँप जाती है। अपने ही देश में बेघर होना और वर्षों तक शरणार्थियों का जीवन बसर करना मानव की सबसे बड़ी त्रासदी है और उन विकराल समस्याओं का एक लम्बे अंतराल तक समाधान न निकल पाना अत्यंत गम्भीर व विचारणीय है? परंतु धारा 370 के हटने पर कवयित्री का आशावादी दृष्टिकोण विशेष रूप से द्रष्टव्य है। उनका चिंतन संसार इतना विशद है कि उनकी पैनी दृष्टि चहुँओर पहुँचती है।

अंत में मैं यही कहूंगी कि डॉ• मुक्ता ने जिस तरह से अधिकांश रचनाओं में नारी व्यथा को संवेदना की पराकाष्ठा तक उकेरा है, शायद ही किसी अन्य कवि ने केवल नारी से जुड़े मार्मिक प्रसंगों पर लेखनी चलाई हो। अपने इस भगीरथ प्रयास के लिए वे वंदनीय हैं और विशेष सम्मान की अधिकारिणी हैं।

समीक्षक : आभा कुलश्रेष्ठ, गुरुग्राम।

आधुनिक युग की निर्भया, प्रियंका व गुड़िया

©  सुश्री शकुंतला मित्तल

शिक्षाविद् एवं साहित्यकार, गुरुग्राम

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ खूँ ज़िगर का निचोड़ ले लिखने… ☆ श्री अरुण कुमार दुबे ☆

श्री अरुण कुमार दुबे

(वरिष्ठ साहित्यकार श्री अरुण कुमार दुबे जी, उप पुलिस अधीक्षक पद से मध्य प्रदेश पुलिस विभाग से सेवा निवृत्त हुए हैं । संक्षिप्त परिचय ->> शिक्षा – एम. एस .सी. प्राणी शास्त्र। साहित्य – काव्य विधा गीत, ग़ज़ल, छंद लेखन में विशेष अभिरुचि। आज प्रस्तुत है, आपकी एक भाव प्रवण रचना “खूँ ज़िगर का निचोड़ ले लिखने “) 

✍ खूँ ज़िगर का निचोड़ ले लिखने… ☆ श्री अरुण कुमार दुबे 

एक लट्टू सा ये घुमाती हैं

ज़िन्दगीं कितना आज़माती है

 *

फिर न अंजाम सोचा है मैंने

बात जब दोस्ती की आती है

 *

हिचकियाँ फिर नहीं रुकी उसकी

याद जब जब मुझे सताती है

 *

आबरू घर की ढांप लेती माँ

मुफ़लिसी रंग जब दिखाती है

 *

सोचकर तुम हो दिल धड़क जाता

जब हवा द्वार खटखटाती है

 *

गर्दिशों में न साथ दे कोई

आस दुनिया से क्यों लगाती है

 *

बद्गुमानी न पाल सोच अरुण

ये बुलंदी से बस गिराती है

 *

ये है मेहमान इसकी कर खातिर

बेटी डोली में चढ़के जाती है

 *

कैसे भी पेट सारे घर का भरे

सब्र खा भूख माँ मिटाती है

 *

वश चले मेरा तो मैं बन जाऊँ

लट तेरे रुख पे आती जाती है

 *

वो है नादां गरीब की बेटी

ख्वाब युवराज के सजाती है

 *

खूँ ज़िगर का निचोड़ ले लिखने

शायरी रंग तब ही लाती है

 *

अय अरुण तुझसे है कपूत कई

सिर्फ़ नागिन ही बच्चे खाती है

© श्री अरुण कुमार दुबे

सम्पर्क : 5, सिविल लाइन्स सागर मध्य प्रदेश

सिरThanks मोबाइल : 9425172009 Email : arunkdubeynidhi@gmail. com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares