मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ माझे आजोळ… भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझे आजोळ… भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

का. रा. केदारी.

ईश्वरदास मॅन्शन, बी ब्लॉक, पहिला मजला, नाना चौक, ग्रँट रोड, मुंबई.

हे माझे आजोळ.

वास्तविक आजोळ हा शब्द उच्चारला की नजरेसमोर येतं एक लहानसं, टुमदार  गाव.  झुळझुळणारी नदी, दूरवर पसरलेले डोंगर,  हिरवे माळरान,  कौलारू,  चौसोपी,  ओसरी असलेलं घर. ओटीवरचा पितळी कड्यांचा,  शिसवी पाटाचा झोपाळा, अंगणातलं पार असलेलं बकुळीचं किंवा छान सावली देणार झाड.  सुट्टीत आजोळी जमलेली सारी नातवंडं.  प्रचंड दंगामस्ती,  सूर पारंब्यासारखे खेळ आणि स्वयंपाक घरात शिजणारा  सुगंधी पारंपारिक स्वयंपाक.

हो की नाही?

पण माझे आजोळ असे नव्हते. ते मुंबई सारख्या महानगरीत, धनवान लोकांच्या वस्तीत, अद्ययावत पारसी पद्धतीच्या सदनिका असलेल्या देखण्या प्रशस्त सहा मजली इमारतीत होतं.  गुळगुळीत डांबरी रस्त्यांवर बसेस, काळ्या—पिवळ्या टॅक्स्या, ट्राम्स अविरत धावत असत. अंगण नव्हतं. सदनिकेच्या मागच्या बाजूला फरशी लावलेली मोकळी जागा होती.  तिथेच काही आऊट हाऊसेस, आणि सदनिकेत राहणाऱ्या धनवान लोकांच्या गाड्या ठेवण्यासाठी गॅरेजेस होती. 

त्या मोकळ्या जागेत ईश्वरदास मॅन्शन मधली मुलं मात्र थप्पा, आंधळी कोशिंबीर,डबा ऐसपैस, लगोरी,  लंगडी, खो खो असे दमदार खेळ खेळत. यात काही मराठी मुलं होती पण बरीचशी मारवाडी आणि गुजराथी होती. ही सारी मुलं मुंबईसारख्या महानगरीत शहरी वातावरणात वाढत होती.  विचार करा. त्यावेळी ही मुलं सेंट  कोलंबस अथवा डॉन बॉस्को सारख्या इंग्रजी माध्यम असलेल्या नामांकित शाळेत शिकत होती. फाडफाड इंग्लिशमध्ये  बोलायचे सारे.

मी ठाण्याची. माझा घरचा  पत्ता – धोबी आळी, शा.मा. रोड, टेंभी नाका ठाणे.

पत्त्यावरूनच कुटुंब ओळखावे. साधे, बाळबोध पण साहित्यिक वातावरणात वाढत असलेली, नगरपालिकेच्या बारा नंबर शाळेत,  मराठी माध्यमातून शिक्षण घेत असलेली मी.  सुट्टीत आईबरोबर आईच्या वडिलांकडे म्हणजे आजोबांकडे त्यांच्या पाश्चिमात्य थाटाच्या घरी जायला आम्ही उत्सुक असायचो.

माझ्या आजोळीच्या आठवणी वयाच्या पाच सहा वर्षापासूनच्या अजून पक्क्या आहेत. आजोळ  म्हणजे आजी आजोबांचं घर. आजीचा सहवास फार लाभला नाही. तरीही कपाळी ठसठशीत कुंकू लावणारी, कानात हिऱ्याच्या कुड्या आणि गळ्यात हिऱ्याचं मंगळसूत्र मिरवणारी,  इंदुरी काठ पदराची साडी नेसणारी,प्रसन्नमुखी  मम्मी अंधुक आठवते. ती मला “बाबुराव” म्हणायची तेही आठवतं. पण ती लवकर गेली.

वयाच्या पस्तीस—चाळीस  वर्षांपर्यंत म्हणजे आजोबा असेपर्यंत मी आजोळी जात होते.  खूप आठवणी आहेत.  माझ्या आठवणीतलं आजोळ, खरं सांगू का? दोन भागात विभागलेलं  आहे. बाळपणीचं आजोळ आणि नंतर मोठी झाल्यावरचं, जाणतेपणातलं आजोळ.

वार्षिक परीक्षा संपली की निकाल लागेपर्यंत आई आम्हाला आजोबांकडे घेऊन जायची. मी, माझ्या बहिणी आणि आई.  वडील आम्हाला व्हिक्टोरिया टर्मिनसला सोडायचे. आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानक. तेव्हा व्हीटी म्हणून प्रसिद्ध होतं. ठाणा स्टेशन ते व्हीटी हा प्रवासही मजेदार असायचा. व्हीटीला उतरलं  की सारा भव्यपणा सुरू व्हायचा. समोर महानगरपालिकेची इमारत.  तिथे आम्हाला घ्यायला आलेली आजोबांची मरून कलरची, रुबाबदार रोव्हर गाडी उभी असायची  पण त्यापूर्वीचा, व्हीटीला उतरल्यावर पप्पांच्या आग्रहास्तव प्राशन केलेल्या थंडगार निरेचा अनुभवही  फारच आनंददायी असायचा. 

आजोबांकडे मावशी आणि माझी मावस भावंडंही आलेली असायची, रंजन, अशोक,  अतुल आणि संध्या.  संध्या मात्र जन्मल्यापासून आजी-आजोबांजवळच राहायची.  सेंट कोलंबस मधली विद्यार्थिनी म्हणून तिच्याबद्दल मला खूपच आकर्षण होतं.  आम्ही सुट्टीत तिथे गेलो की तिलाही खूप आनंद व्हायचा. महिनाभर एकत्र राहायचं, खेळायचं, उंडरायचं, खायचं,  मज्जा करायची. धम्माल! 

धमाल तर होतीच.  पण?  हा पण जरा मोठा होता बरं का. माझे आजोबा गोरेपान, उंचताड, सडसडीत बांध्याचे. अतिशय शिस्तप्रिय. बँक ऑफ इंडियात  ते मोठ्या हुद्द्यावर होते. त्यावेळी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले नव्हते. ब्रिटिशकालीन शिस्तीत त्यावेळी कार्यालयीन कामं चालत. आणि त्या संस्कृतीत माझ्या आजोबांची कर्मचारी म्हणून जडणघडण झाली होती. त्यांची राहणी, आचार विचार सारेच पाश्चिमात्य पद्धतीचे  होते. त्यावेळी आजोबांकडे वेस्टर्न टॉयलेट्स, बॉम्बे पाईप गॅस, टेलिफोन, फ्रिज वगैरे होते. घर म्हणाल तर अत्यंत टापटीप,  स्वच्छ.  फर्निचरवर धुळीचा कण दिसणार नाही.  दिवाणखान्यात सुंदर काश्मिरी गालिचा अंथरलेला,  वॉशबेसीनवरचा  पांढरा स्वच्छ नॅपकिन टोकाला टोक जुळवून टांगलेला. निरनिराळ्या खोलीत असलेल्या काचेच्या कपाटात  सुरेख रचून ठेवलेल्या जगभरातल्या अनेक वस्तू. खिडक्यादारांना सुंदर पडदे,शयनगृहात गादीवर अंथरलेल्या विनासुरकुतीच्या स्वच्छ चादरी आणि असं बरंच काही. असं माझं आजोळ  सुंदरच होतं.

आता आठवत नाही पण आम्ही इतके सगळे जमल्यावरही आजोबांचं घर विस्कटायचं नाही का?

आम्ही कुणीच नसताना आणि आजी गेल्यानंतर त्या घरात आजोबा आणि त्यांची  निराधार बहीण म्हणजे आईची आत्या असे दोघेच राहायचे.. आत्याही तशीच शिस्तकठोर आणि टापटीपीची पण अतिशय चविष्ट स्वयंपाक करायची. आम्ही सारी भावंडं जमलो की तिलाही आनंद व्हायचा. सखाराम नावाचा एक रामागडी होता. दिवसभर तो आजोबा— आत्या साठी त्यांच्या शिस्तीत राबायचा. आमच्या येण्याने  त्यालाही खूप आनंद व्हायचा. तो आम्हा बहिणींसाठी गुलाबाची आणि चाफ्याची फुले आणायचा. 

आजोबा सकाळी दहा वाजता बँकेत जायचे. रामजी नावाचा ड्रायव्हर होता तो त्यांची बॅग घ्यायला वर यायचा. आजोबा संध्याकाळी सात वाजता समुद्रावर फेरफटका मारून  घरी परतायचे. म्हणजे दहा ते सात हा संपूर्ण वेळ आम्हा मुलांचा.  पत्ते, कॅरम! सागर गोटे आणि असे अनेक खेळ आम्ही खेळायचो. एकमेकांशी भांडणं, मारामाऱ्या एकी-बेकी सगळं असायचं.  आत्या रागवायची पण आजोबांना..ज्यांना आम्ही  भाई म्हणायचो, त्यांना जितके आम्ही घाबरायचो तितके तिला नव्हतो घाबरत. सात वाजेपर्यंत  विस्कटलेलं घर आम्ही अगदी युद्ध पातळीवर पुन्हा तसंच नीटनेटकं करून ठेवायचो.

एकदा एका  सुट्टीत मला आठवतंय, भाईंची शिवण्याची सुई माझ्या हातून तुटली.  तुम्हाला खोटं वाटेल पण तीस वर्षं भाई ती सुई वापरत होते. पेन्सिल, सुई यासारख्या किरकोळ वस्तू सुद्धा त्यांना इकडच्या तिकडे झालेल्या, हरवलेल्या,  मोडलेल्या चालत नसत. या पार्श्वभूमीवर सुई तुटण्याची ही बाब फार गंभीर होती.  पण रंजनने खाली वाण्याकडे जाऊन एक तशीच सुई आणली आणि त्याच जागी ठेवून दिली. सात वाजता भाईंची दारावर बेल वाजली आणि माझ्याच काय सगळ्या भावंडांच्या छातीत धडधड सुरू झाली. जो तो एकेका कोपऱ्यात जाऊन वाचन नाही तर काही करण्याचं नाटक करत होता. सुदैवाने भाईंच्या लक्षात न आल्यामुळे ते सुई प्रकरण तसंच मिटलं. पण आज जेव्हा मी विचार करते तेव्हा ‘आपण काहीतरी चुकीचे केले’ याची मला खूप रुखरुख वाटते.आपण आजोबांपासून हे लपवायला नको होतं.

 – क्रमशः भाग पहिला 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एका सैनिकाची एकहाती लढाई ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ एका सैनिकाची एकहाती लढाई ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

आज आठ एप्रिल,२०२०….उजवा हात कोपरापासून कापून काढला गेला त्या घटनेला एक वर्ष झालंय जवळपास. कुण्या सम्राटानं कारागीरांना एक सुंदर वास्तू निर्मायला लावली आणि तशी वास्तू पुन्हा कुणीही उभारू नये म्हणून त्या कारागीरांचे हातच कापून टाकल्याचं ऐकलं होतं….त्या कारागीरांच्या आत्म्यांना काय क्लेश झाले असतील नाही? मी सुद्धा एक कारागीरच की. फक्त मी काही घडवत नव्हतो..तर काही राखीत होतो….होय, देशाच्या सीमा! ११ ऑक्टोबर,१९८० रोजी मी या जगात आलो आणि समजू लागल्याच्या वयापासून अंगावर सैन्य गणवेश चढवण्याचंच स्वप्न पाहिलं. वयाच्या अठराव्या वर्षी खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षणार्थी सैन्य अधिकारी म्हणून रुजू झालो आणि २००२ मध्ये वडीलांच्या पावलावर पाऊल टाकीत सैन्यात अधिकारी झालो. मनात सतत काहीतरी धाडसी करण्याची उर्मी होतीच म्हणून स्पेशल फोर्सेस मध्ये स्वत:हून दाखल झालो…..आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर पॅरा कमांडो म्हणून यशस्वीरीत्या प्रशिक्षित झालो आणि २,पॅरा एस.एफ. या भारतीय सैन्यातल्या अतिशय महत्त्वाच्या दलात सामील झालो….एक स्वप्न पूर्णत्वास गेले होते. रक्तच सैनिकी होतं…सैन्यातलं सगळंच आवडायचं. त्यामुळे प्रत्येक बाबतीत पुढे असायचोच. माझी कामगिरी बघून सैन्याने मला भूतान या आपल्या शेजारी मित्र देशाच्या सैनिकांना प्रशिक्षित करण्याच्या कामगिरीवर धाडले. भूतान मधील मिशन पूर्ण करून भारतात परत येताच मला जम्मू-कश्मिर येथे पाठवण्यात आले. इथं तर काय माझ्या उत्साहाला पूर्णत: वाव होता. किती तरी अतिरेकी-विरोधी कारवायांत मी अग्रभागी असायचो. २००८ मध्ये अशाच एका कारवाईत मी दोन अतिरेक्यांचा पाठलाग करून त्यांना अगदी जवळून गोळ्या घालून यमसदनी पाठवलं…..याबद्दल मला शौर्य चक्र बहाल करण्यात आलं. खरं तर ते माझं कामच होतं…किंबहुना स्पेशल फोर्सेस कमांडोजचं तर हे काम असतंच असतं. माझं हे काम पाहून सैन्याने मला आणखी एक जबाबदारी सोपवली….परदेशात जाऊन आंतरराष्ट्रीय शांतिसेनेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची…कोंगो या आफ्रिकी देशात संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिसेनेत मिलिटरी ऑपरेशन्स ऑफिसर म्हणून मी काही काळ काम केले. 

तुम्हांला आठवत असेलच….२०१६ मध्ये आपल्या सैन्याने शत्रूच्या हद्दीत घुसून अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते…..सर्जिकल स्ट्राईक! यावेळीही मी याच भागात कर्तव्यावर होतो! आणि आता तर मी २ पॅरा एसएफ चा कमांडिंग ऑफिसर बनलो होतो…जबाबदारी आणि अर्थातच कामेही वाढली होती. माझ्या जवानांना मला सदोदित सज्ज ठेवायचं होतं,सक्षम ठेवायचं होतं आणि यासाठी मी स्वत: सक्षम होतो! एके दिवशी मी एकवीस किलोमीटर्सच्या मॅरेथॉन स्पर्धेत धावलो. उजवा हात खूप दुखू लागला. हातावर एक मोठी गाठ आल्यासारखं झालं. रीतसर तपासण्या झाल्या आणि माझ्यावर एक हातगोळा येऊन पडला…खराखुरा नव्हे…आजाराचा! सहकारी,मित्र मला म्हणायचे..तु फार वेगळा आहेस…अगदी दुर्मिळातला दुर्मिळ प्रकारचा माणूस आहेस! मग मला आजार तरी सामान्य कसा होईल? काय नाव होतं आजाराचं माहित आहे? telangiectatic osteosarcoma! आनंद चित्रपटात राजेश खन्नाला असाच काहीसा वेगळा आजार होता..आठवत असेल तुम्हांला! चित्रपटातला हा आनंदही इतका जीवघेणा आजार होऊनही शेवटपर्यंत हसतमुख राहतो….मी तसंच रहायचं ठरवून टाकलं मनोमनी. माझ्यावर उपचार करणारे एक डॉक्टर तर म्हणाले सुद्धा…कॅन्सर सारख्या दुर्धर आजारातही एवढा हसतमुख रुग्ण मी आजवर पाहिला नाही! मी म्हणायचो…का भ्यायचं मरणाला? मी सैनिक आहे हाडामांसाचा. रोज एक नवी लढाई असते…जिंकायची असते सर्वस्व पणाला लावून.  

केमोथेरपी सुरू झाली. एक वर्ष उलटून गेलं आणि शेवटी नाईलाज म्हणून माझा उजवा हात कोपरापासून कापून टाकण्याचा निर्णय डॉक्टरांना घ्यावा लागला! हे ऑपरेशन होण्याच्या आठ दिवस आधीपर्यंत मी कमांडिंग ऑफिसर म्हणून जबाबदारी पार पाडत होतो. शेवटी एकदाचा उजवा हात माझ्या शरीरापासून विलग करण्यात आला! सैनिकाचा उजवा हात म्हणजे त्याचा जीव की प्राण. उजव्या हातानेच तर फायरींग करायचं असतं रायफलीतून….आणि माझा नेम तर अगदीच अचूक असायचा! 

या राईट हॅन्ड अ‍ॅम्प्युटेशन ऑपरेशन नंतर मी लगेचच कर्तव्यावर रुजू झालो….सदैव सैनिका पुढेच जायचे…न मागुती तुला कधी फिरायचे! मी रुग्णालयातून घरी म्हणजे माझ्या सैन्य तुकडीत परत आल्या आल्या पहिली गोष्ट केली ती म्हणजे माझी सायकल मला हवी तशी सुधारून घेतली…एका हाताने सायकल धरून चालवता आली पाहिजे अशी. स्वत:चं स्वत: आवरायला शिकलो, युनिफॉर्म घालणे, बुटाच्या लेस बांधणे….जखमेची मलमपट्टी करणे आणि हो डाव्या हाताने अचूक फायरींग करणे! माझ्या आडनावातच बल हा शब्द…बल म्हणजे सामर्थ्य! डाव्या हाताच्या सामर्थ्यावर सर्व जमू लागले..इतकंच नव्हे…जीपही चालवायला लागलो….एक हाती! आणि हो…पुन्हा पार्ट्यांमध्ये नाचूही लागलो….आधीसारखा. “Never give in, never give in, never, never, never, never – in nothing, great or small, large or petty – never give in except to convictions of honor and good sense” – Sir Winston Churchill. विन्स्टन चर्चिल यांनी म्हणून ठेवलंय…काहीही झालं तरी माघार घेऊ नका….स्वाभिमान आणि सदसदविवेकबुद्धीचं रक्षण यासाठी काहीही करा! 

सौ.आरती…माझ्या सौभाग्यवती…अर्धांगिनी. एखाद्या पर्वतशिखरासारख्या… अतिशय खंबीर. त्यांनीच मला धीर द्यावा,माझी काळजी घ्यावी एखाद्या लहान बाळासारखी. मी पंजाबी जाट तर त्या दाक्षिणात्य. शाळेत असल्यापासून आमचा परिचय. त्यातून प्रेम आणि पुढे त्यातून विवाह. दोन गोंडस मुलगे दिलेत आम्हांला देवाने. आम्ही यावेळी बंगळुरू मध्ये आहोत. आई-बाबा दूर तिकडे एकवीसशे किलोमीटर्स अंतरावर असलेल्या  दिल्लीला असतात. एक भाऊही आहे. 

सारे काही आलबेल आहे असं वाटत असताना समजलं…कॅन्सर खांद्यापाशी संपला नव्हता….सा-या शरीरभर त्याने हातपाय पसरले होते! आता निघावं लागणार…..जावं लागणार…इथली कामगिरी आता संपलीये! मी या रूग्णशय्येवर…नव्हे मृत्यू शय्येवर नेमका दिसतो तरी कसा? पहावं तरी. म्हणून माझ्याच डाव्या हातानं मोबाईल कॅमेरा वापरून सेल्फी घेतला…स्वत:कडे स्मित हास्य करीत!

ते क्षण आता फार दूर नसावेत असं दिसतंय. 

मी कागद लेखणी मागून घेतली…आणि लिहिलं…मी मरणाच्या भीतीला भीक न घालता…चांगल्या वाईट दैवाचा नेटाने सामना केला! विल्यम अर्नेस्ट हेनले या कवीने जेंव्हा त्याचा स्वत:चा एक पाय,तो अवघ्या सतरा वर्षांचा असताना गमावला होता, तेंव्हा Invictus means ‘unconquerable  नावाचा काव्य लिहिलं होतं. त्यातील शेवटच्या ओळी होत्या. …..I am the master of my fate: I am the captain of my soul. ती मीच माझ्या नशिबाचा मालक आणि माझ्या आत्म्याचा कर्ताधर्ता!

यापुढे माझे दोन्ही मुलगे माझा अभिमानाचा वारसा चालवतील…

आरती, प्रिये..माझे प्राण तुझ्यातच तर श्वास घेतात…

आज माझ्या शरीरात चैतन्य आहे आणि मी 

आपला तिरंगा अभिमानानं फडकवतोय आभाळात….

भारत माते…तुझ्या चरणाशी हा माझा अखेरचा प्रणाम!  

हे मृत्यो….उगाच गमजा करू नकोस…मी जिंकलो आहे आणि अमर झालो आहे! 

माझे अंत्यविधी इथेच,माझ्याच जवानांच्या उपस्थितीत करावेत….ही माझी अंतिम इच्छा राहील. 

आई-बाबा,भाऊ दिल्लीहून बंगळुरूला यायला निघालेत…कारण माझ्या अंतिम इच्छेचा मान राखून सैन्याने माझा अंत्यविधी इथंच करायचं ठरवलं आहे…दिल्ली ते बंगळुरू….प्रवासाचा पल्ला मोठा आहे. त्यात कोरोनाची महामारी सुरू आहे…विमानसेवा उपलब्ध नाही.त्यांना यायला आणखी तीन दिवस तरी लागतील सहज…म्हणजे १३ एप्रिल…२०२०..बैसाखीच्या जवळचा पवित्र दिवस! याच दिवशी माझ्यावर अंत्यसंस्कार होतील…काय योगायोग आहे ना? जय हिंद ! 

(कर्नल नवज्योतसिंह बल, शौर्य चक्र विजेते. कमांडिंग ऑफिसर, २,पॅरा एस.एफ. यांचं हे मी माझ्या शब्दांत मांडलेलं मनोगत. कॅन्सरसारख्या भयावह आजारात उजवा हात कोपरापासून कापला गेल्यानंतरही नवज्योतसिंह बल साहेबांनी आपली सैन्य सेवा अव्याहतपणे आणि अतिशय दर्जेदाररीत्या सुरू ठेवली….ती अगदी रुग्णालयात मृत्यूशय्येवर जाऊन नीजेपर्यंत. ९ एप्रिल,२०२० या दिवशी कर्नल साहेबांनी या जगाचा हसतमुखाने निरोप घेतला. आज त्यांचा चौथा स्मृतिदिन. कर्नल साहेबांना भावपूर्ण आदरांजली ! जय हिंद.)  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अरे , लग्न झालं वाटतं !… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अरे, लग्न झालं वाटतं ! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

जोपर्यंत गाव छोटं होतं

प्रत्येकजण प्रत्येकाला ओळखत होतं 

परकं , अपरिचित कुणीच नव्हतं , कोणीही असो ” आपलं ” होतं !

 

एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जायला कुठलंही वाहन लागायचं नाही.

आम्ही येउ का ? तुम्ही घरीच आहात का ? असं विचारावं लागायचं नाही .

माणसं सतत एकमेकाला भेटत रहायची , बोलत राहायची , सारं काही सांगत रहायची .

कुठल्यातरी निमित्याने भांडण झाल्या शिवाय संवाद खुंटतच नव्हता .

भांडण म्हणजे उगी थोडीशी कुरबुर , अर्थात दोन दिवसात ” दो ” व्हायची आणि पुन्हा बोलणं सुरू व्हायचं !

म्हणजे लहानपणी , गावाकडे , ” न करमन्याला वावच नव्हता .”

बरं सगळ्या गोष्टी जवळ होत्या 

दुकान , शाळा , राम मंदिर , मारुतीचा पार , बस स्टॅण्ड सगळं हाकेच्या अंतरावर , त्यामुळे चालणं व्हायचं आणि ओळखीचं माणूस दिसलं की बोलणं व्हायचं !

पुन्हा भजन , पूजन , रामायण , भागवत , हरिपाठ , देवळातल्या पंक्ती , दिंडी , पालखी , गुरवारची पंचपदी माणसाला रिकामपणच नव्हतं .

 

माणसं busy होती , पण income नव्हतं , त्याच्यामुळे स्पर्धा , आसूया , चिंता , काळजी या गोष्टींना थाराच नव्हता .

(मोठा टीव्ही, चार चाकी, मोठा बंगला.. इंग्रजी शाळा याचा विचार शिवायचा नाही…)

आणि बायांना तर भलतेच कामं होते .त्यांच्या वाट्याच्या कामाची नुसती यादी जरी नवीन पिढीने केली तरी त्यांच्या छातीत कळ येईल .

 

अजून एक गोष्ट ….

इंग्रजीचं फॅड अजिबात नव्हतं 

ABCD …….XYZ याचा संबंध फक्त शाळेत गेल्यावर , ते ही इंग्रजीच्या तासालाच !

आणि आता 

ABP माझा , CID , MRI , X-ray , Z-TV विचारूच नका .

आमच्या लहानपणी , 

This is Gopal . अन That is Seeta .हे दोन वाक्य पाचवीत गेल्यावर वाचता यायचे तरी जबरदस्त कौतुक व्हायचं !

आई लाडानं जवळ घ्यायची आणि मायेनं मुका घ्यायची आई लेकराकडे इतक्या कौतुकाने पहायची की त्या पोराला एकदम कंडक्टर झाल्या सारखंच वाटायचं !

 

अहो कंडक्टर याच्यामुळे की …..आमच्या लहानपणी एखाद्या पोराला मोठ्या माणसाने , 

हं sss काय रे बाळ मोठेपणी तू काय होणार ?

असा प्रश्न विचारला की ते पोट्ट हमखास म्हणायचं …..

मी मोठेपणी कंडक्टर होणार किंवा पोलीस होणार !

तुम्हाला खोटं वाटेल मॅट्रिकचा निकाल लागल्यावर तुला किती परसेंटेज मिळालं असा प्रश्न कोणीही कुणाला विचारत नव्हतं 

फक्त एवढंच विचारायचे ….

पहिल्या झटक्यात पास झालास न ?

आणि आपण हो म्हणताच अख्ख्या गावाला आनंद व्हायचा !

म्हणजे पहा सुखाच्या , आनंदाच्या , मोठं होण्याच्या कल्पना किती छोट्या होत्या !

लक्षात घ्या ज्या ज्या गोष्टीचा विस्तार होतो , त्या त्या गोष्टीतून दुःखच होतं .

तुम्ही बघा पूर्वी ….

गाव छोटं , घर छोटं , घरात वस्तू कमी , पगार कमी , त्याच्यामुळे शेवटचा आठवडा हमखास तंगी 

उसनपासन केल्या शिवाय प्रपंच होऊच शकत नव्हता , तरीही मजा खूप होती!

 

तुम्ही आठवून पहा गल्लीतली एकही बाई किंवा माणूस हिरमुसलेलं किंवा आंबट चेहऱ्याचं नव्हतं !

उसनपासन करावंच लागायचं ……

साखऱ्या , पत्ती , गोडेतेल , कणिक या गोष्टी गल्लीत एकमेकांना उसन्या मागणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्कच होता 

त्यामुळे कोणाकडे ” हात पसरणे ” म्हणजे काहीतरी गैर आहे असं आम्हाला कधी वाटलंच नाही .

उलट या गोष्टींची इतकी सवय होती की कोणत्याच गोष्टीचा ” कमीपणा ” वाटत नव्हता !

डोकं दुखल्यावर शेजाऱ्याकडे अमृत अंजनच एक बोटं उसन मागायला सुद्धा अजिबात लाज वाटली नाही .

घरातल्या वडील माणसासाठी 10 पैश्याच्या तीन मजूर बिड्या किंवा 15 पैशाचा सूरज छाप तंबाखूचा तोटा आणतानाही मान कशी ताठ असायची !

 

कोणतीच गोष्ट कोणापासून लपून रहातही नव्हती आणि तसा प्रयत्नही फारसा कुणी करत नव्हतं !

गल्लीत एखाद्या पोरीला पाहुणे पहायला येणार ही बातमी लपून राहूच शकत नव्हती , कारण शेजाऱ्या-पाजाऱ्या कडून पोह्याच्या प्लेट , चमचे , बेडशीट ,

 तक्के , उषा , दांडी असलेले कपं आदी साहित्य मागून आणल्या शिवाय ” पोरगी दाखवायचा  कार्यक्रम ” होऊच शकत नव्हता !

आणि मित्र हो हीच खरी श्रीमंती होती , ते आत्ता कळतंय !

आणि हल्ली शेजाऱ्याच्या मुलीचं लग्न होऊन जातं तरीही कळत नाही !

जेंव्हा Status वर डान्सचा व्हिडीओ येतो तेंव्हा कळतं , अरे लग्न झालं वाटतं !

 

हे सगळं लिहिण्या मागचा एकच उद्देश आहे

भेटत रहा , बोलत रहा , जाणे-येणे ठेवा , विचारपूस करा …..

जेवलास का ?

झोपलास का ?

सुकलास का ?

काही दुखतंय का ? असे प्रश्न विचारतांना लागलेला मायेचा , काळजीचा , आपुलकीचा कोमल     स्वरच जगण्याचं बळ देत असतो !

 

माणसाशिवाय ,गाठीभेटीशिवाय , संवादाशिवाय काssssही खरं नाही !

कवी :अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ज्याचे त्याचे श्रद्धास्थान… – चित्र एक काव्ये दोन ☆ सुश्री नीलांबरी शिर्के आणि श्री आशीष ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ज्याचे त्याचे श्रद्धास्थान… – चित्र एक काव्ये दोन ? सुश्री नीलांबरी शिर्के आणि श्री आशिष बिवलकर 

सुश्री नीलांबरी शिर्के

( १ )

ज्याचे त्याचे श्रद्धास्थान

ज्याला त्याला प्रिय असते

दारूची बाटली म्हणूनच

दारुड्याला प्रिय असते

*

रिकामी  झाली तरीही

तिनेच नभात उंच नेले

दिवसाढवळ्या मनाला

एक वेगळे जग दिले

*

अशी ही रिक्त बाटली

त्याचे श्रद्धास्थान बनते

भक्तिभावे म्हणून तिची

मनोभावे पूजा होते

*

दारूच्या बाटली बाई

नेहमीच तू प्रसन्न रहा

वेगवेगळ्या रूपामधे

मला तू भेटत रहा

*

नित्य तुझी पुजा करीन

भरलेली असो वा रिकामी

सेवेत खंड पडणार नाही

शपथ घेऊन देतो हमी

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

( २ )

श्री आशिष बिवलकर

चषक मदिरेचे रिचवून,

रिक्त केली बाटली |

श्रद्धेने फुल पान अर्पून,

श्रद्धा मनात दाटली |

*

 नशा दारूत असती,

तर ती ही नाचली असती |

नशेबाज माणूस असतो,

उगाच बदनाम झालीय ती |

*

भरलेली असताना,

तळीरामांना खुणावत असते |

अप्सराही फिकी वाटावी,

इतकी ती मादक भासते |

*

कृतघ्नतेच्या दुनियेत,

दुर्मिळ एक श्रद्धावान असतो |

पान फूल वाहून,

मिळाल्या तृप्तीला जागतो |

*

छोटा रिचार्ज, क्वार्टर , खंबा,

तिची विविध परिमाण आहेत |

ज्याची त्याची रिचवायची ताकद,

आरोग्यावर तिचे परिणाम आहेत |

*

कितीही समाजवा त्याला,

दारू ही सर्वात वाईट आहे |

फरक नाही पडत त्याला,

तळीराम मोहात टाईट आहे |

© श्री आशिष बिवलकर

बदलापूर 

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संस्मरण – मेरी यादों में जालंधर – भाग-17 – क्या मोहन राकेश ही कालिदास तो नहीं थे? ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ संस्मरण – मेरी यादों में जालंधर – भाग-17 – क्या मोहन राकेश ही कालिदास तो नहीं थे? ☆ श्री कमलेश भारतीय ☆

(प्रत्येक शनिवार प्रस्तुत है – साप्ताहिक स्तम्भ – “मेरी यादों में जालंधर”)

पता नहीं, किधर से किधर , यादों की गलियों में निकल जाता हूँ और बहुत बार यादों में खोया-खोया, किसी एक में पूरी तरह खो जाता हूँ। आज जालंधर के बहाने पंजाब के ही नहीं, देश के प्रसिद्ध नाटककार मोहन राकेश की ओर वापस आ रहा हूँ। उनके ठहाके आज भी जालंधर के पुराने लेखकों को याद हैं, उन ठहाकों के पीछे का दर्द कम ही लोग जानते हैं! जगजीत सिंह की गायी ग़ज़ल जैसी हालत है :

तुम इतना जो मुस्कुरा रहे हो

क्या गम है, जिसको छुपा रहे हो!.

मोहन राकेश के हाथों में शादी की सही लकीर नहीं थी! तीन तीन शादियों के बावजूद वे ठहाकों के पीछे अपना दर्द छिपाते रहे! पर उनके नाटकों की ओर आता हूँ।

मोहन राकेश ने जीवन में तीन नाटक लिखे-आषाढ़ का एक दिन, लहरों के राजहंस और‌ आधे अधूरे। चौथा नाटक  पूरा नहीं कर पाये, जिसे बाद में उनके कथाकार  त्रयी में से एक मित्र कमलेश्वर ने ‘पैर तले की ज़मीन’ के रूप में पूरा किया। ‘आषाढ़ का एक दिन’ से ‘आधे अधूरे’ तक तीनों नाटक खूब पढ़े ही नहीं देश भर में खूब मंचित किये जा रहे हैं ! आषाढ़ का एक दिन पंजाब विश्वविद्यालय के थियेटर विभाग में दैनिक ट्रिब्यून के शुरुआती दिनों में देखा था ओर संयोग देखिये कि मल्लिका के रूप में भावपूर्ण अभिनय करने वाली छात्रा को आज भी जानता हूँ ओर वे हैं वंदना राजीव भाटिया! हिसार के ही ऱगकर्मी राजीव भाटिया की पत्नी। इस नाटक में कालिदास की प्रेमिका की भूमिका बहुत ही भावनाओ में बहकर निभाने वाली वंदना को कैसे भूल सकता हूँ! वह भी राजीव भाटिया के साथ मुम्बई रहती हैं और कुछेक विज्ञापनों में अचानक देखा है वंदना को! मुम्बई सबकी कला का सही इस्तेमाल कहाँ करती है! यह बात प्रसिद्ध अभिनेत्री दीप्ति नवल ने मेरे साथ फोन पर हुई इंटरव्यू में कही थी कि मैं बाकायदा कत्थक नृत्य प्रशिक्षित थी लेकिन किसी भी निर्देशक ने किसी भी फिल्म में मेरी इस कला का कोई उपयोग नहीं किया! मुझे यह खुशी है कि दीप्ति नवल के पिता हमारे नवांशहर के ही थे और‌ दीप्ति नवल कभी भी नवांशहर आ सकती हैं, अपने पिता के शोरियां मोहल्ले में! खैर, हम बात कर रहे थे, मोहन राकेश के नाटकों की ! आषाढ़ का एक दिन का आखिरी संवाद है कि क्योंकि समय किसी की प्रतीक्षा नहीं करता ! कालिदास राजा के आमंत्रण पर राज दरबार में जाना नहीं चाहता लेकिन मल्लिका जैसे कैसै मना कर कालिदास को भेजती है लेकिन उसकी माँ कहती है कि वह तुम्हें साथ क्यों नहीं लेकर गया तब मल्लिका कहती है कि भावनाओं को आप नही समझोगी, मां! मैने भावना में भावना का वरन किया है और मल्लिका कालिदास से खामोश प्यार करती रहती है जबकि उसकी शादी विलोम से हो जाती है। जब सब कुछ गंवा कर कालिदास वापस मल्लिका के पास आता है तब मल्लिका उसे भोजपत्रों का पुलिंदा यह कहकर सौ़पती है कि सोचा था, यह आपको दूंगी ताकि इस पर कोई ग्रंथ लिख सको! कालिदास उन भोजपत्रों को यह कह कर लौटा देता है कि इन पर तो पहले ही एक ग्र्ंथ की रचना हो चुकी है यानी उन पन्नों पर मल्लिका के कालिदास के वियोग के बहाये आंसू दिखते हैं ! यह नाटक एन एस डी से लेकर न जाने देश के किस किस कोने में मंचित नहीं किया गया! यही हाल लहरों के राज हंस का रहा और आधे अधूरे का भी! लहरों के राजहंस में संवाद देखिये जो ऩंद की पत्नी कहती है कि नारी का आकर्षण पुरुष को पुरुष बनाता है तो नारी का अपकर्षण उसे महात्मा बुद्ध बना देता है ! आखिर मे़ ऩंद लहरों के राज़हंस की तरह पत्नी सु़दरी को कहता है कि मैं जाकर बुद्ध से पूछूँगा कि उसने मेरे बालों का क्या किया? यह है इंसान‌ जो लहरों के राजहंसो़ की तरह अपने ही फैसले बदलता रहता है !

अंतिम नाटक आधे अधूरे आज के समाज को आइना दिखाने के लिए काफी है कि हम सब आधी अधूरी ख्वाहिशों के साथ जीते हैं! इस नाटक का आइडिया मोहन राकेश को उनकी पत्नी अनिता राकेश ने ही दिया था और इसकी भावभूमि उनकी ससुराल ही थी!

आज काफी हो गया! कल फिर मिलते हैं! कभी कभी बता दिया कीजिये कुछ तो!

क्रमशः…. 

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आतिश का तरकश #236 – 121 – “मुहब्बत का  दस्तूर कुछ ऐसा है…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी  ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं ।प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकशआज प्रस्तुत है आपकी भावप्रवण ग़ज़ल मुहब्बत का  दस्तूर कुछ ऐसा है…” ।)

? ग़ज़ल # 121 – “मुहब्बत का  दस्तूर कुछ ऐसा है…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ?

मैं तुम्हें  कुछ बताना चाहता हूँ,

मैं तुमसे कुछ छुपाना चाहता हूँ।

*

पशोपेश इस कदर दिमाग़ में है,

मुझे मालूम नहीं क्या चाहता हूँ।

*

मुहब्बत का  दस्तूर कुछ ऐसा है,

न हूँ मैं जो  जताना  चाहता हूँ।

*

जिसे  दुनिया  सरेआम  लूटती है,

मैं तेरे हुस्न को सजाना चाहता हूँ।

*

मुझे  आप  कह लें सौदाई आतिश,

तुझे  झूठ सच  बताना  चाहता हूँ।

© श्री सुरेश पटवा ‘आतिश’

भोपाल, मध्य प्रदेश

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – औरत कभी बूढ़ी नहीं होती ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – औरत कभी बूढ़ी नहीं होती ? ?

छुटपन से

पानी पकड़ाना,

चाय बनाना,

खाना पकाना,

खाना खिलाना,

बरतना माँजना,

चूल्हा-चौका

साफ-सफाई

झाड़ू-पोछा

कपड़े धुलाई,

सुबह आँख खुलने से

रात आँख लगने तक,

उम्र के हर मोड़ पर

अविराम और हमेशा

खटती रहती है औरत..,

 

खेल-पढ़ाई

मस्ती-हाथापाई

नौकरी-कमाई

लड़कपन

पुरुष में बदलता है

दाम्पत्य से

बुढ़ापे तक

यात्रा करता है,

निरंतर अविराम

थकता और थकता है..,

 

साठ के बाद

पुरुष के भीतर का

बचपना लौटता है

पर बचपन से

समझदार हुई

औरत का दिन-रात

जस का तस

बना रहता है..,

 

पति के काँधे

जाए न जाए

ढलती उम्र के बावज़ूद

उसी ढर्रे पर चलता रहता है..,

 

रिटायर होता है पुरुष

औरत रिटायर नहीं होती

बूढ़ा होता जाता है पुरुष

औरत कभी बूढ़ी नहीं होती..!

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 श्री हनुमान साधना – अवधि- मंगलवार दि. 23 अप्रैल से गुरुवार 23 मई तक 💥

🕉️ श्री हनुमान साधना में हनुमान चालीसा के पाठ होंगे। संकटमोचन हनुमनाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें। आत्म-परिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही। मंगल भव 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 357 ⇒ पसंद अपनी अपनी… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “पसंद अपनी अपनी।)

?अभी अभी # 357 ⇒ पसंद अपनी अपनी? श्री प्रदीप शर्मा  ?

तेरी पसंद क्या है,

ये मुझको खबर नहीं।

मेरी पसंद ये है कि

मुझको है तू पसंद।।

हमने कब किसी की पसंद की परवाह की है, बस जो खुद को पसंद आया, उसी की चिंता की है। जब भी रिश्ते तय होते थे, पहले लड़की देखी जाती थी, वह भी ठोक बजाकर, अगर बुजुर्गों को पसंद आई, तो फिर आपकी बारी आती थी। पति के पहले आप सिर्फ राष्ट्रपति होते थे, आपको तो सिर्फ मोहर लगानी होती थी।

यह तो हुई लड़कों की बात। लड़कियों पर तो बड़े बूढ़ों की बचपन से ही निगाह होती थी। खुद उनकी शादी बचपन में इसी तरह तय जो हुई थी, तेरह, पंद्रह और सत्रह वर्ष बहुत हुए। गुड्डे गुड़ियाओं से खेलने की उम्र में, उनके हाथ भी को पीले कर दिए गए थे।।

समय बदला, युग बदला, परिस्थिति बदली। नौकरी वाले लड़कों की मांग बढ़ने लगी। मास्टरों की तो लॉटरी लग गई। गांव में एक मास्टर की बहुत इज्जत होती थी। उसकी पत्नी भी मास्टरानी कहलाती थी। उधर शहरों में दफ्तर के बाबू तक दहेज मांगने लग गए। लड़की सुखी रहेगी। बाबू की ऊपरी कमाई भी बहुत है। अब तुझे कलेट्टर मिलने से तो रहा। राज करेगी। तब लड़कियों की पसंद कौन पूछता था।

फिर आया सह शिक्षा यानी कोएजूकेशन और कॉन्वेंट/पब्लिक स्कूल का जमाना। लड़कियां भी अंग्रेजी में गिटर पिटर करने लगी। कॉलेज में पांव रखते ही उनके भी पर लग गए। उनकी भी पसंद और नापसंद का खयाल रखा जाने लगा। अच्छे संस्कारी लड़कों की तलाश की जाने लगी। पढ़ लिखकर वे भी अपने पांवों पर खड़ी होने लगी।।

चार युग हमने नहीं देखे, सिर्फ कलयुग देखा है। यहां हर २५ वर्ष में युग बदलता है। पसंद के रिश्ते हों, अथवा तय किए हुए, हमारे समय के रिश्ते आज तक टिके हुए हैं। आर्थिक अभाव, पारिवारिक संघर्ष, आपसी मनमुटाव और लड़ाई झगड़े भी, अगर विवाह की बुनियाद को हिला नहीं पाए तो कैसी पसंद, नापसंद और गिला शिकवा।

७५ वर्ष की उम्र में हमने मानो तीनों युग देख लिए, लेकिन इस कलयुग में सिर्फ मियां बीवी का राजी होना जरूरी है, काहे का काजी और काहे के फेरे, बिन फेरे हम तेरे वाला लिव इन रिलेशन अगर दोनों की पसंद हों, तो फिर आप किसको दोष देंगे।।

हम कौन होते हैं किसी पर अपनी पसंद थौंपने वाले, फिर भी सामाजिक और नैतिक मूल्यों का महत्व ना कभी घटा है और ना कभी घटेगा। विवाह एक पवित्र सामाजिक संस्था है एवं पति पत्नी का संबंध एक आत्मिक और धार्मिक गठबंधन। समय की नाजुकता के मद्दे नजर एक दूसरे की पसंद नापसंद इसमें बहुत माने रखती है ;

जो तुमको हो पसंद

वही बात कहेंगे।

तुम दिन को अगर

रात कहो, रात कहेंगे।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ “श्री हंस” साहित्य # 114 ☆ गीत – ।। मेरी आपकी सबकी एक जैसी कहानी है ।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस” ☆

श्री एस के कपूर “श्री हंस”

☆ “श्री हंस” साहित्य # 114 ☆

☆ गीत – ।। मेरी आपकी सबकी एक जैसी कहानी है ।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस” ☆

मेरी   आपकी  सबकी  एक  जैसी  कहानी  है।

हम सब के लिए उनकी आंख में आता पानी है।।

*

पत्नी  बहु भाभी मामी बनके जीवन में आती है।

आकर घर के हर कोने कोने में वह बस जाती है।।

आने से किलकारी गूंजती कोई बनता दादी नानी है।

मेरी   आपकी  सबकी  एक  जैसी  कहानी  है।

*

अन्नपूर्णा पूजन अर्चन भी जीवन का हिस्सा बनते हैं।

तू तू मैं मैं भी अब  जीवन   का एक किस्सा बनते हैं।।

उसके साथ ही बीतता सारा बुढ़ापा और जवानी है।

मेरी   आपकी  सबकी  एक  जैसी  कहानी  है।

*

आहार उपचार उपहार उसके बिन लगता अधूरा है।

उसके वाम अंग में आने पर ही युगल होता पूरा है।।

पत्नी बिन हर कण–कण क्षण-क्षण सब बेमानी है।

मेरी   आपकी  सबकी  एक  जैसी  कहानी  है।

© एस के कपूर “श्री हंस”

बरेलीईमेल – Skkapoor5067@ gmail.com, मोब  – 9897071046, 8218685464

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ काव्य धारा # 176 ☆ “मतदान करो !” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी  द्वारा रचित एक प्रेरक रचना  – “मतदान करो !। हमारे प्रबुद्ध पाठकगण प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी  काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे।) 

☆ काव्य धारा # 176 ☆

☆ “मतदान करो !” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ 

जो कुछ जनहित कर सके , उसकी कर पहचान

मतदाता को चाहिये , निश्चित हो मतदान

 *

अगर है देश प्यारा तो , सुनो मत डालने वालों

सही प्रतिनिधि को चुनने के लिये ही अपना मत डालो

 *

सही व्यक्ति के गुण समझ , कर पूरी पहचान

मतदाताओ तुम करो , सार्थक निज मतदान

 *

सोच समझ कर , सही का करके इत्मिनान

भले आदमी के लिये , करो सदा मतदान

 *

जो अपने कर्तव्य  का , रखता पूरा ध्यान

मतदाता को चाहिये , करे उसे मतदान

 *

लोकतंत्र की व्यवस्था में , है मतदान प्रधान

चुनें उसे जो योग्य हो , समझदार इंसान

 

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

ए २३३ , ओल्ड मीनाल रेजीडेंसी  भोपाल ४६२०२३

मो. 9425484452

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares