मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 174 ☆ अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 174 ? 

अभंग☆ महंत कवी राज शास्त्री ☆

माणूस पणाचा, प्रचार करावा

सत्संग साधावा, माणसाने.!!

*

मदिरा प्राशन, अभक्ष भक्षण

वाईट व्यसन, त्याज्य करा.!!

*

परम प्रीतीचा, धागा धरूनिया

प्रेम करुनिया, जिंका सर्वा.!!

*

कृष्ण प्रीत भक्ती, जडवा अंतरी

प्रवेश भितरी, करा तिच्या.!!

*

कवी राज म्हणे, संतांचे विचार

आणिक आचार, लक्ष करा.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆लेकीची पाठवणी ☆ सौ. सुरेखा कुलकर्णी ☆

 ☆ कवितेचा उत्सव ☆

☆ लेकीची पाठवणी ☆ सौ. सुरेखा कुलकर्णी ☆ 

माय बापाची लाडाची

कन्या निघाली सासरी

लग्न समारंभ झाला

दिली सासूच्या पदरी

*

लाड कोड पुरविले

संस्कारांनी घडविले

आहे त्या परिस्थितीत

छान तिला वाढविले

*

रोप तुळशीचे सान

दुजा अंगणी लावावे

गुण दोष समजूनी

तुम्ही तिला सांभाळावे

*

एका नयनी आसवे

तर दुजात आनंद

मिळे पती सुयोग्यसा

चाल तिची मंद मंद

*

सुखे राहावे सासरी

दोन घरांना जोडाया

प्रेम धागे गुंफावेत

लेक चालली नांदाया

© सौ. सुरेखा कुलकर्णी

सातारा 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्त्री सक्षमीकरणाचे उदाहरण….!!! ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

🔅 विविधा 🔅

स्त्री सक्षमीकरणाचे उदाहरण….!!! सुश्री शीला पतकी 

वीस बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मी सेवासदन शाळेमध्ये कार्यरत होते साधारण जून महिन्याच्या आसपास एक मध्यमवयीन महिला माझ्याकडे आली आणि म्हणाल्या बाई माझा मुलगा आपल्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता तो दोन महिन्यापूर्वी वारला मला जरा धक्काच बसला कारण मुलगा अगदी तरुण होता 23 24 वर्षांचा त्यावर त्या बाई म्हणाल्या त्याची बायको वीस वर्षाची आहे तिचे काय करावे मला समजत नाही मी म्हटलं किती शिकली आहे ?त्या म्हणाल्या आठवी नापास झालीय… कारण घरामध्ये सावत्र आईचा त्रास होता त्यामुळे शाळेत जाऊ शकत नव्हती मग भावाची मुलगी म्हणून मी माझ्या मुलाला करून घेतली पण दुर्दैवाने एका वर्षातच हे असे घडले पोरगी देखणी आहे वयाने लहान आहे मी कामाला जाते घरात माझा तरूण मुलगा आहे म्हणजे तिचा दीरआहे मला काही सुचत नाही मी काय करू मी म्हणाले बाई शिकवा मुलीला शिक्षण द्या शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही धुणेभांडे करत ही मुलगी गेली तर तिच्यावर अनेक आपत्ती येऊ शकतात… मुलगी खरोखरच दिसायला खूप सुंदर होती. गोरा पान रंग बोलके डोळे लांब केस छान उंची बांधा हे सगळं सौंदर्य आता बाधक ठरणार होते .मी म्हणाले हिला शिकवा त्या म्हणाल्या आता कुठे शाळेत पाठवणार …मी म्हणाले माझ्या शाळेत पाठवा..

नापास मुलांच्या ..तिथे तिला आपण दहावी करून घेऊ आणि मग पुढचा मार्ग हुडकू….. त्यावेळेला आठ हजार रुपये फी होती मी त्यांना सांगितले 8000 रुपये फी भरावी लागेल त्या म्हणाल्या माझ्याकडे एवढे पैसे नाहीत मी म्हणाले फुकट शिक्षणाची किंमत नसते मी तुम्हाला एक मार्ग सुचवते… त्यावेळेला माझ्याकडे बालवाडीला सेविका हवीच होती मी त्यांना एक मार्ग सांगितला की सकाळी  8 ते 11 बालवाडीला सेविका म्हणून तीने काम करावे साडेअकराला शाळेत बसावे साडेपाचला शाळा सुटते जाताना परत साफसफाई करून तिने घरी जावे मी महिना तिला पाचशे रुपये देईन आणि हे पाचशे रुपये फी म्हणून ते कट केले जातील याप्रमाणे तिची काही रक्कम होईल त्यामध्ये मी थोडीशी भर घालून तिची ही भरेन फॉर्म फी मात्र तुम्हाला भरावी लागेल त्यांना ते पटलं पण आठवी नापास झालेली मुलगी चार वर्षानंतर दहावी पास होईल याबद्दल मात्र त्या साशंक होत्या मी त्यांना दिलासा दिला ही माझी जबाबदारी आहे तुम्ही काळजी करू नका त्या म्हणाल्या.. तुमच्या पदरात लेक म्हणून टाकते आहे तुम्ही सांभाळा मी म्हणाले हरकत नाही आता ती माझी जबाबदारी आहे याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली मुलगी हुशार होती कामाला चपळ होती एकही दिवस शाळा बुडवायची नाही ठरलेलं होतं त्यामुळे शाळेला सुट्टी नाही काम उत्तम व नेटके करत होती अभ्यासाची गोडी वाढली अनेक शिक्षकांनी  आमच्या तिला प्रोत्साहन दिले त्यामुळे मुळात ती संस्थेत रमली थोडा वेळ मिळाला तरी अभ्यास करत बसायची परिस्थितीची जाणीव तिला उत्तम झाली होती या पद्धतीने तिचा अभ्यास सुरू झाला. पहिल्या चाचणीत तिला उत्तम गुण पडले तिचा उत्साह वाढला मुलगी खरंच हुशार होती पण खेडेगावात संधी मिळाली नव्हती हे सगळं ठरत असताना त्या बाईंनी मला सांगितले होते की हिच्या नवऱ्याचे दर महा मासिक घातलं जाते त्या दिवशी मात्र तिला दुपारच्या शाळेसाठी दोन तासाची सुट्टी द्यावी आणि ते कार्य दुपारी बाराला असते याप्रमाणे तिच्या नवऱ्याच्या मासिक घालण्याच्या दिवशी ती फक्त दोन तास उशिरा येत असे तिला पाहिल्यानंतर आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक हळहळ असायची.. तिला काहीच कळत नव्हते संसार म्हणजे काय कळण्यापूर्वीच तिच्यावर हा घाला झाला होता त्यामुळे सगळेजण तिच्याशी प्रेमाने वागत होते आणि त्या प्रेमाच्या ताकतीनेच तिला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळाले साधारण डिसेंबर महिन्यात तिची सासू माझ्याकडे आली जी तिची आत्या होती म्हणाली बाई एक विचार तुमच्याशी बोलायचाय.. मी म्हणाले बोला त्या म्हणाल्या माझ्या मुलाची एक लाखाची पॉलिसी होती ती हिच्या नावावर केलेले आहेत पण एवढ्याने तिचे आयुष्य संपणार नाही तेंव्हा तिचे दुसरे लग्न करण्याचा आम्ही विचार केला तर अन्य कुठला मुलगा बघून द्यावा तर पुन्हा त्यांच्या घरात काही प्रॉब्लेम निर्माण झाले तर पोरगी घरीयेईल  काही झालं तरी भावाची मुलगी आहे हो म्हणून ..अगदी खरे आहे मग काय विचार केलात त्या म्हणाल्या माझ्या धाकट्या मुलाला तिला करून घ्यावी म्हणते …खरंतर मला तिच्या या विचाराचे कौतुकच वाटले होते पण तरीही आईच्या सावध पणाने मी त्यांना म्हटलं का एक लाख रुपये आपल्या घरात राहावेत आणि तुमचा थोडासा अपंग असलेल्या मुलाला चांगली मुलगी मिळावी हा हेतू ठेवून हे लग्न करताय का त्या म्हणाल्या नाही हो बाई पोरीला सावत्र आई आहे बाप कुठवर बघणार माझ्या घरात तरी काय वेगळं आहे माझा नवरा आजारी पोरगा अपंग तिचा तो मुलगा झाडावरून पडून त्याचा हात आणि एक पाय याच्यामध्ये थोडास अपंगत्व आलं होतं बाकी मुलगा चांगला होता निर्व्यसनी होता एका दुकानात काम करत होता बाईच स्वतःचा घर अगदी भर पेठेत  होतं जुन्या चाळीत राहत असलेल्या घरालाच मालकाने त्यांना मालकी हक्क दिले होते त्यामुळे दोन खोल्यांच छप्पर डोक्यावर होतं बहिणीचा शेतीतला वाटा म्हणून भाऊ शेताचा माल आणून टाकत होता आता मुलीचा वाटा म्हणूनही थोडे अधिक देऊ शकला असता या सर्व दृष्टीने विचार करता अन्न वस्त्र निवारा आणि सुरक्षितता या सगळ्याच बाबतीत स्थळ वरचढ होतेच मी म्हणलं मुलीच्या वडिलांना बोलवून घ्या आमच्या संस्थेत ते मला भेटायला आले बरोबर त्यांच्या नात्यातले चार माणसही आली बोला चाली झाल्या लग्न ठरले पण मी त्यांना एकचअट घातली की लग्न रविवारी करायचं मुलगी शाळा बुडवणार नाही एका दिवसात फार खर्च न करता देवळात लग्न करायचे ठरले त्यांच्या गावाकडे म्हणजे त्यांचा जो देव होता तिथे जाऊन लग्न करायचे ठरले मग मुलीलाही चार गोष्टी समजून सांगितल्या अर्थात हे सगळे तिला एकटीला घेऊन समजून सांगितले तिला विचारले हे तुला चालणार आहे का दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू त्याच घरात राहणार आहेस तुझी आणि नवऱ्याची बेडरूम जी होती तिथेच तुझी आणि तुझ्या दिराची बेडरूम असणार आहे त्याच घरात तुला वावरावयाचे आहे हे सर्व तुला नव्याने जमवता येईल का? तिची मानसिक तयारी चांगली झाली होती ती म्हणाली हो मी हे करेन तो दीर सुद्धा चांगला आहे आणि सासू तर माझी आत्याचा आहे आणि ती माझी आई पण आहे तरीही आई आणि बाई या नात्याने मी तिला दोन सूचना दिल्याचं मी तिला सांगितले तुझा पहिला नवरा तुझ्या या नवऱ्याचा भाऊ असला तरी त्याच्याबद्दल कुठलीही गोष्ट त्याच्याशी बोलू नकोस पुरुषांना हे आवडत नसते त्याची थोडी पडती बाजू आहे म्हणून त्याने तुला स्वीकारले आहे पण त्याचा अहंभाव दुखावेल असे पहिल्या नवऱ्याबद्दलचे काहीही शब्द तू त्याच्याकडे बोलू नकोस आठवणी सांगू नकोस हे पथ्यपाळ म्हणजे तुझा संसार सुखाचा होईल हे खरंतर खूप अवघड होते पण तिला निभावणे भाग होते झाले मग काय लग्न झाले सोमवारी नवी नवरी जावई पाया पडायला आले शाळा सुरू झाली जेमतेम दोन महिने राहिले होते परीक्षेला त्यानंतर आमची अभ्यासिका परीक्षा सराव परीक्षा हे सगळं पार पडलं आणि मुलगी 75 टक्के गुणांनी पास झाली ….मग पुढचा विचार सुरू झाला तिच्या नवऱ्याला आणि सासूला मी बोलवून घेतले आणि सांगितल की आता हिच्या पायावर उभे राहील असेच काही शिक्षणाला दिले पाहिजे ते दोघेही माझ्या शब्द बाहेर नव्हते लगेचच मी आमच्या इथे असलेल्या मुळे हॉस्पिटल मधील नर्सिंग कोर्सला तिला प्रवेश घ्यायला सांगितला गुण उत्तम असल्यामुळे तिला तीन वर्षाच्या नर्सिंग कोर्स प्रवेश मिळाला आता या तिन्ही वर्षात मुल होण्याचा अडथळा येता कामा नये याची दक्षता घ्या इतके मी त्यांना सांगितले खरं तर इतक्या बारीक गोष्टी होत्या पण काय करणार इलाज नव्हता आणि त्यांनी हे सगळं वेळोवेळी ऐकल…अतिशय सद्भावनेने! त्यानंतर ती त्याही परीक्षेमध्ये अव्वल गुणाने पास झाली आणि लगेचच तिला तिची सासू ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती त्याच डॉक्टर महिलेने तिला आपल्याकडे जॉईन करून घेतले नोकरीतल्या सुरक्षिततेचा प्रश्न संपला नोकरी घराजवळच होती आणि मंडळी अत्यंत विश्वासू आणि खूप चांगली होती आज ती तिथे उत्तम काम करीत आहे दहा हजारहून चांगली प्राप्ती आहे दोन गोंडस मुले झाली आहेत संसार सुखाचा चालला आहे स्त्री सक्षमीकरणाचे उदाहरण यापेक्षा काय वेगळे असेल…! मी असा हात अनेकांना देण्याचे ठरवले तरी श्रद्धा ठेवून यांच्याकडून आपले काही भले होईल अशा विश्वासाने काही चार गोष्टी ऐकल्या तर खूप चांगले घडू शकते याचे हे उदाहरण आहे आज कधीतरी ती आपल्या मुलांना घेऊन माझ्या भेटीला येते तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि संसारामध्ये असलेले सुख समाधान हे मला वाचता येते आणि लक्षात येतं की हे केवळ शिक्षणाने घडले आहे दहावी परीक्षा पास होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण त्यानंतर तुम्हाला अनेक वाटा मिळू शकतात ज्या वाटांवर तुम्ही स्वतःचा उदरनिर्वाह करू शकाल अशा गोष्टी तुम्हाला सापडतात लक्षात ठेवा शिक्षणाशिवाय पर्याय नसतो न शिकलेली मोठी झालेली माणसंही आहेतच पण ते वेगळे शिक्षणाने येणारे सामंजस्य आणि विचार यांनी माणूस नुसता मोठा होत नाही तर सुखी होतो म्हणून माझे सगळ्यांना सांगणे आहे शिका आपल्या आसपास असणार्या व्यक्तींना शिकायला प्रोत्साहन द्या जमलं तर एखाद्याला लिहायला वाचायला शिकवा आणि त्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करा शिक्षणाने माणूस स्वतःच्या आयुष्याचा काही वेगळा विचार करू शकतो आणि सक्षम होऊ शकतो याचे हे सुंदर उदाहरण आहे…! मग काय करा सुरुवात जून मध्ये एखाद्या मुलीला शाळेत घालण्यासाठी मदत करा शिक्षणापासून वंचित असणाराना शिक्षणाची गोडी लावा त्याला प्रवाहात आणा इतके तरी आपण करू शकतो ना…….!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आय लव्ह यू पप्पा… भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ आय लव्ह यू पप्पा… भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(अरे मैत्रीत अहंकाराची भावना तर सोड, तरतम भाव देखील नसतो. अर्थात अशा गोष्टींवर तुझा विश्वासच नाहीये तर तुला अशा गोष्टी सांगूनही काही उपयोग नाही म्हणा. येतो गड्या, स्वत:ला सांभाळ.!’) इथून पुढे 

केशवची आणि माझी ती शेवटचीच भेट होती. त्यानंतर मनातून दुखावलेल्या केशवने माझ्याशी कधीच संपर्क साधला नाही. माझ्यातल्या अहंकारामुळे मीदेखील त्याच्याशी पुन्हा कधी संपर्क साधला नाही. मी केशवला दिनकरच्या लग्नातही बोलावले नाही. मी आपल्याच धुंदीत होतो.”

“काका, बाबांनीसुद्धा माझ्या लग्नात तुम्हाला कुठे निमंत्रण दिले होते? द्या सोडून तो विषय. आता दिनकर काय करतोय?”

“अरे मीच केशवशी संबंध तोडले होते, तर तो मला कशाला बोलवेल? माझ्या कर्तृत्वाने जर आमचे मालक एवढे कमावत असतील तर मी स्वत:चा व्यवसाय केला तर किती कमवीन असा विचार करून नोकरी करता करता मी स्वत:चा एक कारखाना सुरू केला. दिनकरला मध्येच शिक्षण सोडायला लावून त्याच्यावर मी कारखान्याची जबाबदारी सोपवली.

व्यवसायात गुंतवलेल्या तुटपुंज्या भांडवलीमुळे मी लवकरच अडचणीत आलो. कधीतरी चव चाखणाऱ्या केशवला मी व्यसनी म्हणवून हिणवले होते. एकेकाळी निर्व्यसनी असलेला मी दारूच्या व्यसनाच्या गर्तेत पुरता सापडलो. चांगल्या पगाराच्या नोकरीला मुकलो. लवकरच माझी भणंग अवस्था झाली. नियतीचे फासे उलटे पडत गेले. शनि महाराजांनी कधी माझा अहंकार तुडवून मला रसातळाला आणले होते ते कळलं देखील नाही. मला पाचही पुत्रच आहेत हा माझा अहंकार माझ्या मुलांना भोवला. विधात्याने माझ्या मुलांच्या पोटी केवळ कन्यारत्ने देऊन त्याची कसर भरून काढली.

माझ्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर वा चार्टर्ड अकाउंटट करीन अशी मी दर्पोक्ती केली होती, ते राहूनच गेले. पाचही बोटे एकत्रपणे एक मूठ बनून राहतील असे वाटत असतानाच माझी मुले वाट फुटेल तिकडे निघून गेली. मी त्यांना एकत्रही ठेवू शकलो नाही. माझ्या कर्माची फळे मला इथेच भोगावी लागली. असो.

आज केशवच्या वार्षिक श्राद्ध दिवशी तरी माझ्या मनात साठलेले हे दु:ख मोकळे करावे म्हणून मी आलोय. दिलदार मनाच्या केशवने मला कधीच माफ केले असेल.” असे म्हणत केशवांच्या तसबिरीला हात जोडून रामदास ह्यांनी नमस्कार केला.

“काका, बराच उशीर झाला आहे, आलाच आहात तर आता इथे जेवूनच जा.”

अविनाशच्या बोलण्याकडे काणाडोळा करीत ते एवढेच म्हणाले, “औक्षवंत हो बाळा.” आणि काही कळायच्या आतच पायऱ्या उतरून ते निमूटपणे बाहेर पडले.

अविनाश पप्पांच्या तसबिरीकडे पाहत राहिला. ‘मी नोकरीवर रूजू होताना पप्पांनी काडीचीही मदत केली नाही ही अढी किती वर्षे उराशी बाळगून होतो. त्यामागचा उद्देश्य आज कळला. खरंच, माझं पिलू माझं बोट सोडून दुडूदुडू चालताना मला कोण आनंद झाला होता. माझ्या पप्पांनी देखील, मी नोकरीला लागताना केलेल्या धडपडीत अगदी तोच आनंद अनुभवला असणार ! रामदास काकांनी सांगितलं नसतं तर माझ्या मनांत ती अढी कायम राहिली असती.’

अविनाशने सुस्कारा टाकला. आईकडे पाहत सहज म्हणाला, “आई, रामदास काका काय म्हणत होते ते ऐकलंस ना? लेकी असोत वा सून किंवा नातवंडांवर असलेले पप्पांचे प्रेम अगदी स्पष्टच दिसून यायचे. परंतु मी कधी पप्पांच्या तोंडून माझ्याविषयी कौतुकाचा शब्द ऐकल्याचे मला आठवत नाही. माझ्यावर ते कित्येकदा ओरडायचे. मी मोठा भाऊ असून देखील तिघी बहिणींना कधी एका शब्दाने बोलू द्यायचे नाहीत.”

सुमित्राबाई काहीशा गंभीर होत म्हणाल्या, “डेबू, तुला खरं सांगू? तुझ्या माघारी ते तुझा उल्लेख अविनाश किंवा डेबू असं केलेलं मी कधीच ऐकलं नाही. ‘साहेबांचं जेवण झालं का? साहेबांना हे सांगितलंस काय, ते सांगितलंस काय?’ असे विचारायचे. आपला डेबू साहेब आहे याचे त्यांना प्रचंड कौतुक होते. तुझ्याशी ते कोडगेपणाने वागायचे आणि तुझ्या बहिणींना मात्र लाडाने वागवायचे. हे आजवर तू कधी बोलून दाखवलं नाहीस परंतु ते त्यांच्या लक्षात आले होते. एकदा बोलता बोलता ते म्हणाले होते, ‘मुलगा आणि मुलगी यांच्यात मी भेदभाव करतो असं तुम्हा सगळ्यांना वाटत असेल. तसं मुळीच नाही. या उलट बहुतेक घरात वंशाचा दिवा म्हणून मुलाला ‘लाटसाहब’ सारखी वागणूक देतात आणि मुलगी परक्याचे घरचे धन आहे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करतात. याबाबत माझा दृष्टीकोन थोडासा वेगळा आहे. मुली उपवर झाल्या आहेत. त्यांची शिक्षणे होताच त्या कधी सासरी जातील याचा नेम नाही. मुलींना नवरा कसा मिळेल, सासर कसं मिळेल हे माहित नाही. जोवर कन्या आपल्या घरांत आहे तोवर आपल्या ऐपतीनुसार तिला एखाद्या राजकुमारीसारखे वागवावं. तिला काही कमी पडू देता कामा नये. तिचे करता येतील तेवढे लाड करावेत, असं मला वाटतं, या घरची लेक असल्याचा तिला अभिमान वाटला पाहिजे.

सुमित्रा, अगं ह्या चिमण्या कधी घरटं सोडून भुर्र्कन उडून जातील याचा नेम नाही म्हणून माझं बापाचं काळीज धडधडतं. हे मी कुणाला सांगू? पोरींना जप हो.’

भावुक होत गेलेले तुझे पप्पा लगेच स्वत:ला सावरत मला म्हणाले, “डेबू मोठा झाल्यावर त्याच्यात जोपासल्या गेलेल्या पुरूषी अहंकारामुळे त्याने स्त्रीला कधी दुय्यम लेखण्याची चूक करू नये म्हणून मी त्याच्याशी थोडा फटकळ वागतोय हे मला मान्य आहे. आपल्या मुलींनी जी घरकामे करावीत अशी तू अपेक्षा करतेस ना, ती सर्व कामे तू डेबूकडूनही करवून घे. ही तुला विनंती आहे.’ त्यांनी असं स्पष्टच सांगितल्यावर मी काय बोलणार सांग?

डेबू, तुला सांगते, २६ जुलै २००५ चा तो काळाकुट्ट दिवस मी विसरूच शकत नाही. मुंबईतल्या त्या प्रलयकारी पावसानंतर रस्ते पाण्याने भरून वाहतूक खोळंबली होती. माणसे जागच्या जागी अडकली होती. आम्ही टीव्हीवरच्या बातम्या पाहत होतो. तुझ्याशी संपर्क होत नव्हता. खूपच चिंता वाटत होती. अचानक फोन घणघणला. तुझे पप्पा लगेच ओरडले, ‘सुमित्रा, साहेबांचा फोन आला असेल बघ.’ मी फोनवर तुझ्याशी बोलले. त्यांनी देवाचे आभार मानले. पहाडासारख्या असणाऱ्या तुझ्या पप्पांच्या डोळ्यांत मी पहिल्यांदाच आसवं दाटलेली पाहिली. भीतीने हादरल्याचे आणि चिंतेतून सावरल्याचे असे ते ऊन पावसासारखे बरसणारे सुखदुःखाचे अश्रू होते. डेबू, आईबाबांना मुले आणि मुली सारखेच प्रिय असतात रे.”

अविनाश केशवच्या तसबिरीपुढे हात जोडून साश्रु नयनांने पुट्पुटला, “पप्पा, तुमच्या धाकामागे लपलेले तुमचे अपार प्रेम मी पाहू शकलो नाही. तुमच्या या पिलाला माफ करा. आय लव्ह यू पप्पा.”

— समाप्त —

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खजिना… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ खजिना… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

मी स्वतःला नेहमीच भाग्यवान समजते. त्याला तशी अनेक कारणे आहेत पण त्यातलं मुख्य कारण म्हणजे मला खूप मित्र आणि मैत्रिणी आजही आहेत.  मी जिथे जाते तिथे माझी कोणाशी ना कोणाशी मैत्री होतेच आणि ती सहजपणे घट्ट होत जाते.

आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर माणसं भेटतात.  काही कालपरत्वे  स्मृतीआड होतात तर काही मात्र आपल्याबरोबर आयुष्यभर सोबत राहतात.  घट्ट मैत्रीच्या रूपात. अगदी जीवाला जीव देणारे वाटावेत  इतके जवळचे असतात ते!

मैत्रीचा पहिला टप्पा असतो तो बालपणीचा, शालेय जीवनातला.

अशी एक सर्वसाधारण भावना,समजूत आहे की बालपणी जी मैत्री होते तशी आयुष्याच्या पुढील जाणत्या टप्प्यात ती कुणाशीही  होऊ शकत नाही. खोटं नसेल, खरंही असेल पण माझा मात्र अनुभव असा नाही.  सत्तरीनंतर माझी अनेक  परिवाराशी अॉनलाईन मैत्री झाली आणि काय सांगू? किती नावं घेऊ? प्रत्येक जण माझ्यासाठी जिवलग आहे. माझ्या हाकेला ‘ओ’ देणारी अनमोल रत्ना सारखी  माणसं मला इथे भेटली आणि याची जाणीवच मला खूप सुखद वाटते.

पण तरीही भूतकाळात रमताना अनेक चेहरे माझ्यावर आजही माया पाखडताना मला जाणवतात.  पुरुषांच्या बाबतीत ‘लंगोटीयार’ असा घट्ट मैत्रीच्या बाबतीत वापरला जाणारा शब्द आहे.  स्त्रियांच्या बाबतीत मी मैत्रीविषयी माझा स्वतःचाच  शब्द योजिते. ‘चिंचाबोरांची मैत्री.’ या रिंगणातल्या माझ्या सख्यांनी तर माझा बालपणीचा काळ अधिक रम्य केला आहे.

कुठलीही  समस्या त्यावेळी गंभीरच असते ना? त्यावेळी गृहपाठ केला नाही म्हणून बाई रागावल्या, शाळेच्या पटांगणात खेळताना दाणकन्  पडून जखमी झाले,  कधी कुठल्यातरी कार्यक्रमातून डावललं  गेलं, एखादं खूप कठीण गणित सुटलं नाही, परीक्षेच्या वेळी आजारी पडले, शालेय सहलीला जाण्यासाठी घरून परवानगी मिळाली नाही, स्पर्धेत नंबर आला नाही अशा आणि अशा तऱ्हेच्या अनेक भावनिक प्रसंगी माझ्या जिवलग सख्या माझ्यासोबत सदैव राहिल्या आहेत.  खरं म्हणजे आता भेटीगाठी होत नाहीत. आयुष्याच्या वाटेवर मैत्रिणींची खूप पांगापांग  झाली पण मनात जपून ठेवलेली मैत्री मात्र तशीच उरली.  आता या वयात कधीतरी कुणाकडून तरी,

“ती गेली” अशा बातम्या कानावर  येतात पुन्हा ती चिंचाबोरं,  त्या लंगड्या,  फुगड्या, कट्टी—बट्टी आठवते. आयुष्यात सगळं काही धरून ठेवता का येत नाही याची खंत वाटते.

त्यादिवशी वेस्टएन्ड मॉलमध्ये मी फिरत होते आणि दुरून एक हाक आली. “बिंबाsss”

या नावाने इथे मला हाक मारणारं  कोण असेल? मी मागे वळून पाहिले आणि मीही तितक्याच आनंदाने चक्क आरोळी ठोकली.

“भारतीsss”

दुसऱ्या क्षणाला आम्ही एकमेकींच्या गळ्यात. हातातल्या पिशव्या, भोवतालची माणसं, आवाज, गोंगट कशाचेही  भान आम्हाला राहिले नाही.  वयाचेही नाही.

“किती वर्षांनी भेटतोय गं आपण आणि तुझ्यात काहीही बदल नाही..!”

यालाच म्हणतात का जीवाभावाची मैत्री? मग पुढचे काही तास त्या रम्य भूतकाळात विहरत राहिले.

मी बँकेत नोकरी करत असताना माझा एक दोस्त होता. त्याला मी ‘मिस्टर दोस्त’ म्हणत असे. संसार सांभाळून नोकरी करणं हे कधीच सोप्पं नव्हतं. कालही नव्हतं  आणि आजही नाही पण या माझ्या दोस्ताने मला त्या काळात,  प्रत्येक आघाडीवर जी मदत केली ती मी कधीही विसरू शकणार नाही.  एकदा तर मी कंटाळून माझा राजीनामाही तयार केला होता.  त्या दिवशी याच माझ्या दोस्ताने मला जो मानसिक आधार दिला त्यामुळेच माझी नोकरी टिकून राहिली असे मी नक्कीच म्हणेन. कुठल्याही समस्येच्या वेळी त्याच्या नजरेत हेच निर्मळ भाव असायचे,

“मै हूँ ना!”

माझ्या या मित्र परिवाराच्या यादीत डॉक्टर सतीशचे नाव खूप ठळक आहे. दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनेक मानसिक, शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक समस्येत तो माझ्याबरोबर असायचाच पण एका प्रसंगामुळे  ‘मला सतीश सारखा मित्र मिळाला’ याचे खूप समाधान वाटले होते.

कठीण समय येता कोण कामास येतो? अथवा फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इंडीड किंवा अमित्रस्य कुत: सुखम्  यासारख्या उक्त्या आपण वाचतच असतो पण प्रत्यक्षात जेव्हा जीवनात त्याचा अनुभव येतो,  तो क्षण असतो खरा भाग्याचा! अमेरिकेहून भारतात परत येण्याच्या काही दिवस अगोदरच मला किडनी स्टोनचा भयंकर मोठा अॅटॅक आला होता. सतीशला,  माझ्या मिस्टरांनी कळवले. ते कळताक्षणी त्याने सांगितले, “तुम्ही ताबडतोब भारतात या. आपण इथेच ट्रीटमेंट घेऊ, सर्जरी करू. मी सगळी व्यवस्था करतो. काही काळजी करू नकोस.”

जळगाव स्टेशनवर पहाटे तीन वाजता माझा मित्र आम्हाला घ्यायला आला होता. वास्तविक तो गाडी आणि ड्रायव्हर पाठवू शकत होता पण तो स्वतः आला. जळगाव शहरातला अत्यंत व्यस्त आणि नामांकित सर्जन अशी ख्याती असलेला हा माझा मित्र स्वतःच्या प्रतिमेचा विचार न करता केवळ मनातल्या तळमळीने,काळजीने,  मैत्रीसाठी आम्हाला स्टेशनवर घ्यायला आला होता. तेही अशा अडनेड्या वेळी. गाडीतून उतरताच त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि त्या प्रेमळ स्पर्शाने माझा आजारी चेहरा क्षणात खुलला.”आता मी बरी होईन” असा दिलासा मला मिळाला.

जीवाभावाचे मित्र मैत्रिणी यांचा विचार जेव्हा माझ्या मनात येतो तेव्हा आणि माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा डोकावून बघताना जाणवते की बाल्याचा उंबरठा ओलांडतानाच आई ही कधी मैत्रीण झाली ते कळलंच नाही आणि वडील तर फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड  होतेच. हे सारे संस्कार मित्र!  यांचे आयुष्यातले स्थान ते नसतानाही आबाधित आहे आणि खरं सांगू का? बाहेरच्या जगात तर खूप मोठा मित्रपरिवार होताच पण घरात आमचा पाच बहिणींचा समूह होता. आजही आम्ही तितक्याच घट्ट मैत्रिणी आहोत. बहिणींपेक्षा जास्त मैत्रिणी. जीवाला जीव देणाऱ्या.  कुणाच्या आयुष्यात थोडं जरी खुट्टं  झालं की आमचा मजबूत वेढा असतो एकमेकींसाठी.

माझ्या घरात बारा वर्षे काम करणारी माझी बाई माझ्यासाठी कधी मैत्रीण झाली ते कळलंच नाही. तिला मी मैत्रीण का म्हणू नये? कामाव्यतिरिक्त आम्ही दोघी एकमेकींच्या जीवन कहाण्या एकमेकींना कित्येकदा सांगत असू. आमच्यामध्ये एक निराळाच बंध विणला गेला होता. तो स्त्रीत्वाचा होता. मी तर तिला माझी कामवाली म्हणण्यापेक्षा मैत्रीणच म्हणेन.

तशी तोंडावर गोड बोलणारी,’ओठात एक पोटात एक’ असणारी अनेक माणसं भेटली. ज्यांच्याशी मैत्री होऊ शकली नाही त्यांना मित्र/मैत्रीण तरी का म्हणायचे? ते मात्र फक्त संबधित होते.

माझ्यासाठी जीवाभावाच्या मैत्रीची आणखी एक व्याख्या आहे, नेहमीच काही संकटात मैत्रीची परीक्षा होत नाही. खरी मैत्री जी असते, ज्या व्यक्तीबरोबर आपण कम्फर्टेबल असतो, ज्या व्यक्तीबरोबर आपल्याला न्यूनगंड जाणवत नाही, सगळी बाह्य, ऐहिक  अंतरे सहज पार होतात, जिला आपण अगदी मनाच्या तळातलं विश्वासाने सांगू शकतो आणि जिला आपलं ऐकून घ्यायचं असतं.  भले तिच्याकडे आपल्या प्रश्नांची उत्तरे नसतील पण तिच्या खांद्यावर आपण डोकं टेकवू शकतो.

मी भाग्यवान आहे. मला असे मित्र-मैत्रिणी आजही आहेत आणि तोच माझा खजिना आहे, आनंदाचा ठेवा आहे.

हा विषय इतका व्यापक आहे की माझाच कागद अपुरा आहे.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ इडलीकुमारीची कहाणी !! – लेखिका : सौ. माधवी जोशी माहुलकर ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

इडलीकुमारीची कहाणी !! – लेखिका : सौ. माधवी जोशी माहुलकर ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

॥ अथश्री इडलीका कुमारी कथा आरंभस्य ॥ 

दक्षिण भारताचे मुख्य अन्न असलेली इडली ही आता संपूर्ण भारतातच नव्हे, तर पार सातासमुद्रापलीकडे आपल्या नावाचा डंका पिटते आहे. दक्षिण भारताची ही लाडकी इडली नावाची राजकुमारी भारतातील तमाम अन्नपदार्थांमध्ये आपल्या पौष्टिक घटकांमुळे मानाचे स्थान पटकावून बसली आहे. इडली हे नाव जितके नटखट आहे, तितकीच या इडलीकुमारीची कहाणी देखील  मनोरंजक आहे बरं का! तुम्हाला जर सांगितले की इडली ही दक्षिण भारतीय पदार्थ नाही, तर तुमचा यावर विश्वास बसेल? नाही ना? माझा पण नव्हता बसला. परंतु मी जेव्हा इडलीच्या इतिहासाचा मागोवा घेतला, तेव्हा या इडलीकुमारीच्या ब-याच रंजक कथा समोर आल्या. तुम्हालाही ऐकायला आवडेल का या इडलीकुमारीची कथा?  चला तर मग, सुरु करु या! 

भारतीय खाद्य इतिहासकार के.टी.अचैय्या यांच्या अभ्यासानुसार कर्नाटकातील काही कवितांमधे इडलीचा उल्लेख आढळतो. ‘इडलीगा वा इडरीका’ असं संस्कृतमधे त्यांना म्हटलं गेलं आहे. इडली, दोसा, वडा सांबार, अप्पे, उतप्पम् अशा विविध पदार्थांची नावे ऐकली की, आपल्या डोळ्यासमोर लुंगीवाला साऊथ इंडीयन अण्णा उभा राहतो. भारताच्या कानाकोप-यात सकाळी सकाळी कपाळाला पांढरे गंध लावलेले हे लुंगीवाले अण्णा इडली, दोसा विकतांना दिसतात. कोणी सायकलवर, तर कोणी हातगाडीवर, आपापली दुकाने घेऊन फिरतांना दिसतात. किती तरी अण्णा लोक या पदार्थांचे हाॅटेल्स टाकून श्रीमंत झालेले दिसतात. कारण साऊथ इंडीयन पदार्थांनी समस्त भारतीयांना  तशी भुरळच पाडलेली आहे. त्यातल्या त्यात पांढरी स्वच्छ, मऊ, लुसलुशीत इडली म्हणजे समस्त आबालवृद्ध लोकांच्या गळ्यातील ताईतच!                                          

तर अशी ही सर्वांची लाडकी इडली मूळ रुपात आपल्या येथील नाहीच आहे. ही इडलीकुमारी आली आहे इंडोनेशियामधून. तुम्ही म्हणाल की, काहीही सांगते. वर्षानुवर्षं आपल्या आहारात असलेली इडली इंडोनेशियाची कशी बरं असेल? परंतु हे खरं आहे. कन्नड खाद्य इतिहासकार श्री. के.टी.अचैय्या यांनी त्यांच्या पुस्तकात इडलीबद्दल लिहीतांना हे सांगितले आहे की, इडली ही दक्षिण भारतीय पदार्थ नाही, तर ती इंडोनेशियामधून भारतात आली आहे. वडा सांबार, दोसा यांना दोन हजार वर्षांपूर्वीचा भारी भक्कम इतिहास आहे. परंतु इडलीला इतका प्राचीन इतिहास नाही. फार पूर्वीपासूनच इंडोनेशिया, चीनमधे वाफवलेले पदार्थ तयार करण्याची परंपरा आहे. आपल्या देशात इडलीसारखा पदार्थ, जो आंबवून व वाफवून तयार केला जातो, हे त्या वेळेस कोणालाच माहीत नसावं आणि त्याच कारणामुळे जेव्हा सातव्या शतकामधे ह्युआन त्सांग नावाचा चीनी बौद्ध भिक्कू प्रवासाकरता भारतामधे आला होता, तेव्हा त्याला पदार्थ वाफवण्याचे भांडे आपल्या देशात कुठेही आढळले नव्हते, हे त्याने आपल्या प्रवास-वर्णनामधे नमूद करुन ठेवले आहे. अचैय्या यांच्या मतानुसार इंडोनेशियातील बल्लवाचार्यांनी पदार्थ वाफवून तयार करण्याची प्रक्रिया भारतात आणली असावी. इडली ही तांदूळ + उडीद डाळ यांना सात आठ तास भिजवून, नंतर रवाळ वाटून व परत सात आठ तास फर्मेंट करुन ज्याला ‘किण्वन’ही म्हटले जाते, अशा पद्धतीने तयार केली जाते.                                                                             

इ.स. ९२०च्या शतकातील शिवाकोटाचार्य यांच्या लेखामधे इडलीचा उल्लेख आढळतो. ते असे लिहीतात की, दक्षिण भारतातील एका स्त्रीकडे एकदा एक ब्रम्हचारी अतिथी म्हणून आला असतांना, तिने बनवलेल्या अठरा प्रकारच्या व्यंजनांमधे ही इडली होती.  इ.स. १०२० मधील एक कवी श्री चामुंडा राय यांच्या एका विवरणामधे इडली बनवण्याची प्रक्रिया अशा प्रकारे होती की, ज्यामधे तांदळाचा उपयोग नव्हता केला व ती किण्वन म्हणजे आंबवलेली सुद्धा नव्हती. तर ही इडली म्हणजे फक्त उडीद डाळ ताकामधे भिजवून, नंतर ती बारीक करुन त्यामधे दह्याचे वरचे ताजे पाणी, काळी मिरी पावडर, हिंग, मीठ व कोथींबीर एकत्र करुन हवा तसा आकार देऊन तयार केलेला पदार्थ होता, जो इडलीसारखा दिसत होता, परंतु ती इडली नव्हती.                                                 

तांदूळ व उडीद डाळीपासून इडली फक्त इंडोनेशियात बनवली जात होती. तिला त्या देशात ‘केडली’ या नावाने संबोधले जात होते. आहे की नाही मजेशीर? आपल्याला इडलीची जुळी बहीण केडली, जी कुंभमेळ्यात हरवली होती, हे माहितीच नव्हतं.                                                      

इ.स. ८०० ते १२०० च्या शतकांमधे काही इंडोनेशियन राजे आपल्या भारतातील नातेवाईंकाकडे  त्यांच्या गाठीभेटींकरता, लग्न समारंभांकरता, तसेच हे राजे वधू संशोधनाकरता देखील यायचे, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे मुदपाकखान्यातील भारतीय आचारीदेखील ते सोबत आणत असत, जे आपापल्या शाही परिवारांच्या जेवणाकरता त्यांचे पारंपरीक पदार्थ तयार करत असत. त्यामधे या तांदूळ व उडीद डाळीचा किण्वन  केलेला हा ‘इडली’ नावाचा पदार्थ होता.  किण्वन म्हणजे आंबवलेला किंवा इंग्रजीत फर्मेंट केलेला पदार्थ असा अर्थ होतो. पदार्थ आंबवून म्हणजे किण्वन करुन व वाफवून करण्याची कला ही चीन, इंडोनेशिया, थायलंड, म्यानमार या देशांमधे जास्त प्रचलित होती. कारण तांदूळ उत्पादनामधे हे देश पहिल्यापासून अग्रेसर आहेत व तांदळाच्या पिठापासून किंवा तांदळापासून अनेक वाफवलेले पदार्थ तयार करता येतात, हे त्यांना माहीत असावं. म्हणून वाफवलेल्या पदार्थांचा त्यांच्या आहारात जास्त समावेश असावा. इंडोनेशियातील राजपरिवारांच्या भारतीय मूळ असलेल्या आचा-यांनी तयार केलेला ‘केडली’ नावाचा हा पदार्थ भारतीय आचा-यांनी पण शिकून घेतला असावा.                                                  

हे आचारी जेव्हा भारतात राहिले, तेव्हा त्यांनीच तांदूळ व उडीद डाळ मिसळून लुसलुशीत पांढरी स्वच्छ इडली तयार करण्याचा आविष्कार केला असेल, जो संपूर्णपणे भारतीय असावा व केवळ त्यामुळेच इंडोनेशियाच्या केडलीच्या या जुळ्या बहीणीचा म्हणजे इडलीचा भारतीयांच्या मनात आदरयुक्त भाव निर्माण झाला असावा. इंडोनेशियाच्या केडलीने आपली जुळी बहीण इडलीला भारतीयांच्या मनामधे स्थान मिळवून दिले व स्वतः केडली इंडोनेशियातच राहिली. 

आपल्या भारतीय बल्लवाचार्यांनी या इडलीची अनेक बाळंतपणे करुन तिची नवनवीन रुपे जन्माला घातली. जुन्या इडलीकुमारीचा जन्म फक्त तांदूळ व उडीद डाळ यांचे मीलन झाले तरच शक्य होता, परंतु ही इडलीकुमारी भारतात आली व तिची अनेक रुपे तयार झाली. भारतामधे तांदळाचे लग्न फक्त उडीद डाळीसोबत न लावता – मूग डाळ, काळे उडीद यांचेसोबत लावून तिला नव्याने जन्माला घातले गेले. तिरुपती बालाजीला गेलात तर तिथे आजही काही ठिकाणी  काळे उडीद वापरुन तयार केलेली काळी इडली मिळते.                                         

आता तर या आधुनिक काळात इडलीची किती तरी रुपे पहायला मिळतात, जी इंडोनेशियातील लोकांनाही माहीत नसतील. यामधे दक्षिण भारत नेहमीच पुढे राहीला आहे. आता २१ व्या शतकामधे थट्टे इडली, मिनी इडली, पोडी इडली, रागी इडली, रवा इडली, मूग डाळ इडली, मिलेट्सची इडली, स्टफ इडली, बटर इडली, इत्यादी नवनवीन खानपानानुसार बनलेल्या इडलीने आपले जग व्यापून गेले आहे. मी तर असेही ऐकले आहे की आमच्या नागपूरमधे मिळणा-या काळ्या इडलीने खवयेगिरी करणा-या लोकांची उत्कंठा वाढीस लावली आहे. एम.टी.आर. व कांचीपूरम इडलीने तर आता लोकप्रियतेचा कळस गाठला आहे. आज इंडोनेशियाच्या केडलीपेक्षा तिच्या या भारतीय जुळ्या बहीणीचा, जिचे ‘नाव एक परंतु रुपे अनेक’ असे वैशिष्ट्य आहे, अशा इडलीचा दबदबा सर्व जगात पसरला आहे. तांदळापासून वाफवलेले इतके सारे पदार्थ बनू शकतात, हे आपण जगाला दाखवून दिले आहे. भारतामधे आजमितीला तांदळाचे दोन लाख वेगवेगळे प्रकार पहायला मिळतात, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

भारताच्या मध्य भागात जर आपण उभे राहीलो, तर उत्तरेकडे विविध प्रकारचे पराठे, छोले भटुरे, कुलछे असे पदार्थ आपले चित्त विचलीत करतात. तर दक्षिणेकडचे वडा सांबार, इडली सांबार, मसाला दोसा हे पदार्थ मुखामधे लाळेची त्सुनामी आणतात. आपल्या देशात विविध प्रांतांनुसार चटपटीत व्यंजनेसुद्धा आपापल्या रंगारुपाने, चवीने विविधतेत एकता साधून आहेत. आपल्या सहिष्णु वृत्तीमुळेच इंडोनेशियातील केडलीला आपण इडलीची नानाविध रुपे देऊन भारतीय खाद्यसंस्कृतीमधे मानाचे स्थान देऊन अजरामर केले आहे. इडलीसारखे असे किती तरी पदार्थ आज भारतीयांच्या आहारात “मिले सूर मेरा तु्म्हारा, तो सूर बने हमारा” असे म्हणत हिंदुस्थानच्या घराघरात विराजमान झाले असतील. कोणालाही “अतिथी देवो भव” म्हणण्याची परंपरा, मग ते परकीय पदार्थ का असेनात, भारतीय लोकांनी परकीय खाद्यसंस्कृतीचे स्वागत करुन व तिला आपलेसे करुन कायम जपलेली आढळते. अशी गरमागरम, मऊ, लुसलुशीत पांढरी स्वच्छ जाळीदार हलकी इडली जेव्हा सांबारच्या आंबटगोड वाटीरुपी तळ्यात डुबक्या मारुन आपल्या जिभेवर विराजमान होते ना, तेव्हा तो स्वर्गीय अनुभव काय वर्णावा? या इडली सांबारासोबत ओल्या नारळाची चटणी खाल्ली की, ब्रम्हानंदी टाळी लागलीच समजा!                                                        

 “अहाहा!!! क्या कहना इडली राजकुमारी, तुम्हारी तारीफ करते करते जबान थकती नही!”                            

आपली ही खाद्ययात्रा पुढेही अशीच चालू ठेवत, मी इथे इडलीकुमारीची कहाणी संपवते. खाद्यपरंपरेत अशीच एक नवीन पदार्थाची कथा मी तुम्हाला पुढील भागात सांगेन. तोपर्यंत अशी नवीन कथा वाचण्याची तुमची उत्कंठा वाढीस लागू द्या. 

॥ इतिश्री इडरीगा कहाणी सुफल संपूर्णम् ॥ 

© सौ. माधवी जोशी माहुलकर 

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आई…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “आई…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सुंदर, शिडशिडीत दिसणे ही स्त्रीसुलभ भावना बाजूला ठेवून आपल्या पोटात असलेल्या जिवाला वाढायला जागा देताना आपल्या पोटाच्या वाढत्या आकाराचा विचार बाजूला पडतो आणि आरशात वाढलेल्या पोटाच्या जागी आतला जीव दिसून समाधान वाटते, तेव्हा स्त्रीची आई होते.

नऊ महिने बाळाला काय योग्य आणि अयोग्य आहे, त्यानुसार आहार, व्यायाम, व्यवहार करून त्याच्या येण्याच्या आधीपासून स्त्रीचं आयुष्य त्याच्याभोवती फिरू लागतं, तेव्हा स्त्रीची आई होते.

नऊ महिने भरल्यावर जगातील सर्वांत जास्त वेदनांपैकी एक असलेली प्रसूतीची वेदना बाळाच्या आवाजाने,दर्शनाने क्षणात विसरते, तेव्हा स्त्रीची आई होते.

बाळाला आपल्या मायेने ओतप्रोत भरलेला जगातील सर्वांत सकस आहार, आईचे दूध पाजताना तिला परमोच्च दैवी  आनंदाची अनुभूती होते, तेव्हा स्त्रीची आई होते.

बाळाची शी, शू, लाळ, ओकाऱ्या असंख्यवेळा साफ करताना आणि आपल्या अंगावर झेलताना घाण वाटायच्याऐवजी शीचा रंग किंवा पोत बदलला की लगेच काळजी वाटते, तेव्हा स्त्रीची आई होते.

मुलांबरोबर खेळताना, त्यांचे सर्व करताना स्वतःचे छंद, आवडी, मित्रमैत्रिणी, नातेवाईक आणि अस्तित्वच विसरते, तेव्हा स्त्रीची आई होते.

जगापासून, त्यातील वाईट लोक आणि प्रवृत्तींपासून मुलाचा सांभाळ करताना हळवी, प्रेमळ, मितभाषी असलेली स्त्री देखील  प्रसंगी दुर्गा बनू शकते तेव्हा स्त्रीची आई होते.

अपत्यजन्म, संगोपन ह्या चक्रातून अनेकदा जावे लागले, तरी तिच्या मायेच्या डोहाचे पात्र प्रत्येक अपत्याला आधीच्या सर्वांबरोबर डुंबता येईल इतके विशाल होत जाते, तेव्हा स्त्रीची आई होते.

मुले मोठी झाली, आपापल्या मार्गी लागली की आयुष्याची इतिकर्तव्यता पूर्ण झाल्याचे समाधान मिळते, तेव्हा स्त्रीची आई होते.

मुलांनी उतारवयात विचारले नाही, आपल्या उभ्या आयुष्याची गुंतवणूक बोगस कंपनीत झाली, हे लक्षात आले तरी मुलांचे फक्त चांगले चिंतत त्यांची सतत काळजी करणारे ह्रदय बनते, तेव्हा स्त्रीचे आई होते.

स्त्री ही अनंत काळची माता आहे असे म्हणण्याचे कारण  कदाचित तिची आई म्हणून मुलांना असलेली गरज अनंतकाळ टिकणारी आहे!

आम्हा तमाम गरजवंत बाळांतर्फे तमाम मातांना  शुभेच्छा!

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार # 242 ☆ व्यंग्य – ‘नैतिकता का तक़ाज़ा’ ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपका एक अप्रतिम व्यंग्य  – नैतिकता का तक़ाज़ा। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 242 ☆

☆ व्यंग्य – नैतिकता का तक़ाज़ा

पार्टी दफ्तर में गहमागहमी है। पार्टी के द्वारा चुनाव के लिए उम्मीदवार की घोषणा होनी है। पिछली बार के उम्मीदवार नाहर सिंह को लेकर असमंजस है क्योंकि, अदालत के निर्णय के अनुसार, उनकी शूरवीरता के कारण उनके दो विरोधी स्वर्गलोक को प्रस्थान कर गये थे। परिणाम स्वरूप उन्हें दो साल कारागार में काटने पड़े,यद्यपि उनकी पार्टी और उनके भक्त उन्हें पूरी तरह दूध का धुला मानते हैं। फिलहाल वे ज़मानत पर हैं। नाहर सिंह अपने इलाके के बाहुबली के रूप में विख्यात रहे हैं और इलाके में उनकी छवि रॉबिन हुड की रही है।

अब नाहर सिंह का टिकट खटाई में है, लेकिन किसी अज्ञात कारण से वे मायूस नहीं हैं। पूछने वालों से हाथ जोड़कर कहते हैं, ‘हम पार्टी के अनुशासित सिपाही हैं। पार्टी का निर्णय हमारे सिर माथे। हम तो जनता के सेवक हैं, टिकट नहीं मिलेगा तब भी सेवा में लगे रहेंगे।’

पार्टी के प्रवक्ता कई बार कह चुके हैं कि उन्हें पार्टी की छवि की फिकर है। उम्मीदवार एकदम उज्ज्वल छवि वाला होना चाहिए,एकदम बेदाग। गड़बड़ छवि वाला बर्दाश्त नहीं किया जाएगा।

अब दफ्तर में नये उम्मीदवार की घोषणा की तैयारी है। कार्यकर्ताओं और मीडिया के द्वारा तरह-तरह के अनुमान लगाये जा रहे हैं। सस्पेंस चरम पर है। सब तरफ खुसुर-फुसुर है। पार्टी के नेता और प्रवक्ता रहस्य धारण किये हैं।

आखिरकार घोषणा होने का क्षण आ गया। नेता और प्रवक्ता स्टेज पर आ गये। कार्यकर्ताओं की टकटकी लगी है, कान खड़े हैं। प्रवक्ता कहते हैं, ‘भाइयो, आपको पता है कि हमारे पिछले उम्मीदवार नाहर सिंह को एक झूठे केस में फँसा कर उनकी छवि को धूमिल करने का प्रयास किया गया है। हमारी पार्टी नैतिकता के ऊँचे सिद्धान्त पर चलती है, हम नैतिकता के मामले में कोई समझौता नहीं करते, चाहे कितना नुकसान हो जाए। हमें भरोसा है कि भाई नाहर सिंह इस केस से बाइज्ज़त बरी होंगे। लेकिन अभी हम विरोधियों को आलोचना का मौका नहीं देना चाहते। इसलिए हम नाहर सिंह जी के स्थान पर पार्टी के नये उम्मीदवार की घोषणा करते हैं।’

फिर उन्होंने हाथ के इशारे से पीछे खड़े एक युवक को आगे बुलाया। युवक बिलकुल नाहर सिंह का युवा संस्करण लगता था। आगे आकर हाथ जोड़े खड़ा हो गया। प्रवक्ता जी उसके कंधे पर हाथ रख कर बोले, ‘ये भाई नाहर सिंह के सुपुत्र केहर सिंह हैं। अब यही पार्टी के उम्मीदवार होंगे। इनकी छवि एकदम उज्ज्वल है। दो चार मारपीट की घटनाओं में इनका नाम आया था, लेकिन वह सब ऊपर ऊपर निपट गया। रिकॉर्ड एकदम साफ-सुथरा है।’

केहर सिंह पब्लिक की तरफ हाथ जोड़कर माइक पर बोले, ‘हम पार्टी के बहुत आभारी हैं कि वह हमें जनता की सेवा का मौका दे रही है। हम आपको विश्वास दिलाते हैं कि हम आपकी सेवा उतनी ही लगन से करेंगे जैसे हमारे पिताजी करते रहे। हम उन्हीं के बताये रास्ते पर चलेंगे। आप हमें अपना आसिरबाद दें ताकि हम कभी आपकी सेवा से पीछे न हटें।’

सामने खड़ी जनता ने ‘नाहर भैया जिन्दाबाद’, ‘केहर भैया जिन्दाबाद’ के गगनभेदी नारे लगाये। स्टेज पर पीछे खड़े भैया नाहर सिंह ने प्रसन्न मुख से हाथ उठाकर जनता को धन्यवाद दिया।

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ ≈ मॉरिशस से ≈ – स्त्री – विमर्श – ☆ श्री रामदेव धुरंधर ☆

श्री रामदेव धुरंधर

(ई-अभिव्यक्ति में मॉरीशस के सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री रामदेव धुरंधर जी का हार्दिक स्वागत। आपकी रचनाओं में गिरमिटया बन कर गए भारतीय श्रमिकों की बदलती पीढ़ी और उनकी पीड़ा का जीवंत चित्रण होता हैं। आपकी कुछ चर्चित रचनाएँ – उपन्यास – चेहरों का आदमी, छोटी मछली बड़ी मछली, पूछो इस माटी से, बनते बिगड़ते रिश्ते, पथरीला सोना। कहानी संग्रह – विष-मंथन, जन्म की एक भूल, व्यंग्य संग्रह – कलजुगी धरम, चेहरों के झमेले, पापी स्वर्ग, बंदे आगे भी देख, लघुकथा संग्रह – चेहरे मेरे तुम्हारे, यात्रा साथ-साथ, एक धरती एक आकाश, आते-जाते लोग। आपको हिंदी सेवा के लिए सातवें विश्व हिंदी सम्मेलन सूरीनाम (2003) में सम्मानित किया गया। इसके अलावा आपको विश्व भाषा हिंदी सम्मान (विश्व हिंदी सचिवालय, 2013), साहित्य शिरोमणि सम्मान (मॉरिशस भारत अंतरराष्ट्रीय संगोष्ठी 2015), हिंदी विदेश प्रसार सम्मान (उ.प. हिंदी संस्थान लखनऊ, 2015), श्रीलाल शुक्ल इफको साहित्य सम्मान (जनवरी 2017) सहित कई सम्मान व पुरस्कार मिले हैं। हम श्री रामदेव  जी के चुनिन्दा साहित्य को ई अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों से समय समय पर साझा करने का प्रयास करेंगे। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा  – स्त्री – विमर्श –।) 

~ मॉरिशस से ~

☆  कथा कहानी ☆ — स्त्री – विमर्श — ☆ श्री रामदेव धुरंधर ☆

संभावी की शादी के दो महीने हुए। ससुराल के वातावरण की उसे आदत पड़ने लगी थी। उसके घर से थोड़ी दूर मनवा नदी बहती थी। वह कपड़े धोने नदी चली जाती थी। एक – दो स्त्रियाँ कपड़े धोते उसे मिल जाती थीं। यह ठौर कोई खास भयावह नहीं था। वह अकेली भी हो तो कोई फर्क नहीं पड़ता।

वह कपड़े लिये नदी पहुँची तो बहुत से लड़के झरने के पास तैर रहे थे। महिलाएँ कपड़े धो रही थीं। संभावी महिलाओं के पास पत्थर पर धोने के लिए कपड़े फैला रही थी कि देखा तैरने वाले लड़कों में से एक लड़का बहता चला आ रहा है। उसके मित्रों को यह पता नहीं था। पता होता तो वे उसे बचाते। लड़का शायद बहुत थक गया था। तैराक के रूप में हाथ – पाँव चला कर अपना बचाव करना उसके लिए शायद असंभव हो गया हो। वह बीच धारा में था। यह मनवा नदी थी जो गहरी थी। बहाव तेज़ था।

दूसरी महिलाओं ने भी लड़के को देखा। वे चीखने लगीं। बस संभावी चुप थी। उसे तैरना आता था। यही उसमें एक मंथन को जन्म दे रहा था। उसने अंदाजा लगा लिया था वह लड़के को बचा सकती है। पर वह औरत थी। लड़का उसकी पकड़ में होता। दोनों शरीर एक दूसरे के स्पर्श में होते। और फिर, वह साड़ी में थी। उसने साड़ी पहने नदी में कभी तैराकी नहीं की।

संभावी जिस गाँव की हुई उसके घर की कुछ ही दूरी में ‘हरैया’ नाम की एक विशाल नदी बहती थी। वह अपनी सहेलियों के साथ उस नदी में तैरती थी। ससुराल में मनवा नदी इतने पास हो कर भी उसने अब तक धारा से अपने हाथ – पाँव नहीं भिड़ाये। स्त्री की मर्यादा उसे बांधती थी। कपड़े उतारने पड़ते। मर्दों का संकोच उस पर हावी रहता।

पर अभी के लिए बात दूसरी हुई। एक लड़के की जान संकट में थी। संभावी ने साड़ी झट से उतारी और धारा में कूद गयी। उसने तैराकी की अपनी कुशलता से लड़के को बचा लिया। अब तक लड़के के मित्र दौड़े आ गए थे। संभावी के लिए मानो अग्नि परीक्षा की घड़ी आई। ऐसा नहीं कि वह नंगी थी। उसने लड़के को उसके मित्रों के हवाले किया और यथाशीघ्र पास में पड़ी हुई अपनी साड़ी में अपने को कैद करने लगी।

लड़के को होश में लाया गया। संभावी का जयकार होने लगा। कितना भाव प्रवण जयकार था। लड़के को जीवन दान देने का श्रेय बटोरते संभावी थक जाती तो भी उसे श्रेय देने वालों का भंडार खाली नहीं होता। पूरे गाँव में इस बात की धूम मच गयी एक औरत ने आज कितना बड़ा काम किया है। मनवा नदी की धारा और उसकी गहराई जानने वालों के लिए संभावी एक विशिष्ट औरत हो गयी।

उसका पति बसीस रास्ते की ओर गया तो लोगों ने उसे कंधों पर उठा लिया। लड़कों ने उसका जयकार किया। पुराना युग होता तो देवता आकाश से फूलों की वर्षा कर रहे होते। यह तो बाहरी माहात्म्य हुआ। रही बात घर की, यहाँ बसीस के लिए जैसे कुछ हुआ ही नहीं था। उसकी माँ अपनी बहू की वाह वाही कर रही थी और वह था कि एक क्रोध सा अपने मन में थोपे ऐसा जता रहा था इस तरह के सिनेमा के लिए उसके घर में स्थान हो नहीं सकता। उसने न कभी सुना न देखा घर की औरत कपड़ा खोल कर नदी में हड़ाक से कूदती है और मरने वाले को अपनी बाहों में फँसाये तट से आ लगती है।

संभावी के नाम गाँव में उत्सव रखे जाने की बात हो रही थी। डूबते हुए लड़के के माँ – बाप संभावी के पास पूजा भाव से आने वाले थे। लोगों के कंधों पर जयकारा का आनन्द लूटने वाला पति बसीस सोच रहा था जिसके नाम से इतना सम्मान पा रहा हूँ क्या अपनी ओर से उसे इतना सम्मान देने के लिए मेरे भीतर आत्मीय स्फुरण पैदा होना नहीं चाहिए था?

***

© श्री रामदेव धुरंधर

18 – 05 — 2024

संपर्क : रायल रोड, कारोलीन बेल एर, रिविएर सेचे, मोरिशस फोन : +230 5753 7057   ईमेल : [email protected]

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 241 – अपरिग्रह- ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली कड़ी। ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

☆  संजय उवाच # 241 – अपरिग्रह- ?

नववर्ष के आरंभिक दिनों में एक चित्र प्राय: देखने को मिलता है। कोई परिचित  डायरी दे जाता है। प्राप्त करनेवाले को याद आता है कि बीते वर्षों की कुछ डायरियाँ कोरी की कोरी पड़ी हैं। लपेटे रखे कुछ कैलेंडर भी हैं। डायरी, कैलेंडर जिनका कभी उपयोग ही नहीं हुआ।

मनुष्य से अपेक्षित है अपरिग्रह। मनुष्य ने ‘बाई डिफॉल्ट’ स्वीकार कर लिया अनावश्यक  संचय। जो अपने लिये भार बन जाए वह कैसा संचय? 

इसी संदर्भ में विपरीत ध्रुव की दो घटनाएँ स्मरण हो आईं। हाऊसिंग सोसायटी के सामने की सड़क पर रात दो बजे के लगभग दूध की थैलियाँ ले जा रहा ट्रक पेड़ से टकराकर दुर्घटनाग्रस्त हो गया। भय से ड्राइवर भाग खड़ा हुआ। आवाज़ इतनी प्रचंड थी कि आसपास के 500 मीटर के दायरे में रहनेवाले लोग जाग गए। आवाज़ से उपजे भय के वश कुत्ते भौंकने लगे। देखते-देखते इतनी रात गए भी भीड़ लग गई।  सड़क दूध की फटी थैलियों से पट गई थी। दूध बह रहा था। कुछ समय पूर्व भौंकने वाले चौपाये अब दूध का आस्वाद लेने में व्यस्त थे और दोपाये साबुत बची दूध की थैलियाँ हासिल करने की होड़ में लगे थे। जिन घरों में रोज़ाना आधा लीटर दूध ख़रीदा जाता था, वे भी चार, छह, आठ जितना लीटर हाथ लग जाए, बटोर लेना चाहते थे। जानते थे कि दूध नाशवान है, टिकेगा नहीं पर भीतर टिक कर बैठा लोभ, अनावश्यक संचय से मुक्त होने दे, तब तो हाथ रुकें! 

खिन्न मन दूसरे ध्रुव पर चला आता है। सर्दी के दिन हैं। देर रात फुटपाथ पर घूम-घूमकर ज़रूरतमंदों को यथाशक्ति कंबल बाँटने का काम अपनी संस्था के माध्यम से हम करते आ रहे हैं। उस रात भी मित्र की गाड़ी में कंबल भरकर निकले थे। लगभग आधी रात का समय था।  अस्पताल की सामने की गली में दाहिने ओर के फुटपाथ पर एक माई बैठी दिखीं। एक स्वयंसेवक से उन्हें एक कंबल देकर आने के लिए कहा। आश्चर्य ! माई ने कंबल लेने से इंकार कर दिया। आश्चर्य के निराकरण की इच्छा ने मुझे सड़क का डिवाइडर पार कर उनके सामने खड़ा कर दिया। ध्यान से देखा। लगभग सत्तर वर्ष की अवस्था। संभवत: किसी मध्यमवर्गीय परिवार से संबंधित जिन्होंने जाने किस विवशता में फुटपाथ की शरण ले रखी है।… ‘माई ! आपने कंबल नहीं लिया?’ उनके चेहरे पर स्मित उभर आया। अपने सामान की ओर इशारा करते हुए साफ़ भाषा में स्नेह से बोलीं, “बेटा! मेरे पास दो कंबल हैं। मेरा जीवन इनसे कट जाएगा। ज़्यादा किसलिये रखूँ? इसी सामान का बोझ मुझसे नहीं उठता, एक कंबल का बोझ और क्यों बढ़ाऊँ? किसी ज़रूरतमंद को दे देना। उसके काम आएगा!”

ग्रंथों के माध्यम से जिसे समझने-बूझने की चेष्टा करता रहा, वही अपरिग्रह साक्षात सामने खड़ा था। नतमस्तक हो गया मैं! 

कबीर ने लिखा है,

कबीर औंधि खोपड़ी, कबहुँ धापै नाहि।

तीन लोक की सम्पदा, कब आवै घर माहि।

पेट भरा होने पर भी धापा हुआ अथवा तृप्त अनुभव न करो तो यकीन मानना कि अभी सच्ची यात्रा का पहला कदम भी नहीं बढ़ाया है। यात्रा में कंबल ठुकराना है या दूध की थैलियाँ बटोरनी हैं, यह स्वयं तय करो।

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 श्री हनुमान साधना – अवधि- मंगलवार दि. 23 अप्रैल से गुरुवार 23 मई तक 💥

🕉️ श्री हनुमान साधना में हनुमान चालीसा के पाठ होंगे। संकटमोचन हनुमनाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें। आत्म-परिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही। मंगल भव 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares