मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन कथा — (१) रिल / (२) क्रोसिन ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

 

🔆 जीवनरंग 🔆

☆ दोन कथा — (१) रिल / (२) क्रोसिन ☆ श्री मंगेश मधुकर ☆

(१) रिल”

रुटीनमध्ये गुरफटलेल्या शहरी लोकांना पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की निसर्गाच्या भेटीची ओढ लागते. जूनपासून पावसाळी सहली सुरू होतात. अशाच एका निसर्गरम्य ठिकाणी गर्दी झालेली. त्यात जोरदार पावसाच्या हजेरीनं सगळ्यांचा उत्साह वाढलेला. नेहमी ट्राफिक जाम, प्रदूषण, माणसांची, गाड्यांच्या गर्दीची सवय असलेल्यांना हिरवाईनं सजलेल्या डोंगरावरून पडणारे धबधबे, दरीत खोल खोल कोसळणारं पाणी, झाडांवरून टपकणारे थेंब, आसमंतात पसरलेला सुगंध, मोकळी स्वच्छ हवा अशा मनमोहित वातावरणानं काय करू अन काय नको अशी अवस्था झाली. नेहमीच्या सेलिब्रेशनच्या सवयीनं मोठ्या आवाजात स्पीकर लावून नाचगाणं सुरू झालं सोबत आरडा-ओरडा, हसणं-खिदळणं, सेल्फी, फोटो सेशन होतंच. रिलसाठी कुणी चिखलात लोळत होतं, कुणी नाचत होतं तर कुणी पावसात समाधी लावून बसलेलं. अतिउत्साही दरीच्या टोकावर उभं राहून सेल्फी काढत होते, फोन उंच धरून शूट करत होते. वाट्टेल ते प्रकार सुरू होते. सगळ्यानांच अत्यानंदाचा कैफ चढलेला असताना दूर उभे असलेले अरुण, मनोरमा मात्र गर्दीच्या धांगडधिंग्याकडे निर्विकारपणे पाहत होते.

“पब्लिक कसलं एंजॉय करतयं ना”अरुण म्हणाला पण मनोरमानं काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

“तुझ्याशी बोलतोय. बघ ना कसली धमाल चाललीय. रिल्ससाठी कसल्या भन्नाट आयडिया काढतायेत. भारी!!”

“हंsssम”

“चल”

“कुठं”

“आपणही रिल करू”

“नको”

“असं कसं”

“चल ना”अरुण चिडला.

“आता मला काहीच करायचं नाहीये”

“कालपर्यंत तर रील्ससाठी पागल होतीस. दिवसभर सेल्फी आणि रिल्स तर काढत होतीस. आता का नाही म्हणतीयेस” 

“काल वेगळा होता आणि आज???तो विषय नको. प्लीज”मनोरमा हात जोडत काकुळतीनं म्हणाली.

“बघ कसा धो धो पाऊस पडतोय. जोडीला वीजांचा कडकडाट, रील्ससाठी एकदम परफेक्ट वातावरण आहे. ”अरुण मनोरमाला हाताला धरून ओढू लागला.

“कशाला त्रास देताय. सोडा. ”हात झटकत मनोरमा किंचाळली. अरुण गप्प झाला. अस्वस्थपणे येरझारा मारायला लागला. मनोरमा रडायला लागली.

“असं काय करतेस. आज दोघांचे सोबत रील्स करू. तू म्हणशील तसं मी करेल. ”अरुणनं पुन्हा आग्रह सुरू झाला.

“नको”

“दरीच्या कडेला टायटॅनिक पोजमध्ये शूट करू. बॅकग्राऊंडला ‘टीप टीप बरसा पाणी’ गाणं. एकदम कडक!!!सुपरहिट रिल”

“माझ्याकडून चूक झाली. ”मनोरमानं हात जोडले.

“नुसती चूक नाही तर घोडचूक” अरुणच्या डोळ्यात विखार होता.

“काय करू”

“आता विचारून काय उपयोग?जे करायचं ते कालच करून बसलीस. ” 

“मुद्दाम नाही केलं”.

“तरी सारखं बजावत होतो की काळजी घे. नको तो आगाऊपणा करू नकोस. पण…. तुझ्या बेजबाबदारपणामुळे सगळं घडलं. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. तुझ्याबरोबर माझीही फरफट झाली. हे म्हणजे एकावर एक फ्री सारखं. आपलं घर उद्ध्वस्त झालं. ”

“असं का बोलता. सहन होत नाहीये. ”

“खरं तेच बोलतोय ना. हा त्रास आता कायमच राहील. आताही तू स्वतःचाच विचार करतेयेस. माझं काय?? तुझ्या हौसेपोटी माझं आयुष्य ???. ”

“आता मरेपर्यंत हेच ऐकवणार का?” एकदम मनोरमानं गप्प झाली.

“विसरली असशील तर आठवण करून देतो. काल याच ठिकाणी दरीच्या टोकाजवळ हटके रिलच्या नादात तोल जाऊन तू दरीत पडली. तुला वाचवताना मीही घसरलो आणि दोघंही……. ”

“खूप पश्चाताप होतोय. ” 

“आता तेवढंच करायचंयं. अट्टल दारुड्याला जसं दारूशिवाय सुचत नाही तसंच तुझी अवस्था. घरीदारी सेल्फी नाहीतर रील्स. शेवटी त्यानचं घात केला. आता आपल्या मुलांचं कसं होणार?त्यांना कोणाचाच आधार नाही. ”अरुण ढसाढसा रडायला लागला. दुर्दैवानं त्याचा आकांत मनोरमा सोडून इतर कोणापर्यंतच पोचत नव्हता.

बऱ्याच प्रयत्नानंतर दरीत पडलेल्या दोन्ही बॉडीज सापडल्या. स्ट्रेचरवर पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या ममी-पपाला पाहून एकमेकांचा हात घट्ट पकडलेल्या समर आणि सिद्धीनं हंबरडा फोडला. तेव्हा अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. मुलांची अवस्था पाहून मनोरमाचा बांध फुटला. असहाय्य अरुण स्वतःच्या तोंडात मारायला लागला. दोन्ही मुलांना कुशीत घेण्याचा प्रयत्न अरुण -मनोरमानं केला. एकदा, दोनदा पुन्हा पुन्हा पण स्पर्श मुलांपर्यंत पोचतच नव्हता. नियतीच्या अजब खेळात अरुण, मनोरमा हतबल होते.

“रील्सच्या नादात नवरा-बायकोचा दरीत पडून मृत्यू. ”चॅनलवर ब्रेकिंग न्यूज झळकत होती. दरीत पडतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले. दु:खाचा बाजार मांडण्याची विकृती आता जगण्याचाच भाग झालीये. कोणत्या क्षणी कसं वागायचं याच भान सुटत चाललंय कारण माणसं मनानं दगड होतायेत. जिथून अरुण, मनोरमा पडले ती जागा ‘हॉट स्पॉट’ झाली. तिथले फोटो, सेल्फी सोशल मिडियावर RIP च्या मेसेज सोबत फिरत होते. समर, सिद्धीचा आक्रोशाचा रिल कोरडी सहानुभूती दाखवत जो तो फॉरवर्ड करत होता.

(२) क्रोसिन ”

सकाळची वेळ, क्लिनिकमध्ये पेशंटही नव्हते. तितक्यात मित्र आला. निवांत गप्पा चालल्या होत्या. इतक्यात रिसेप्शनिस्ट धावत आली.

“सर, अर्जंट आहे”

“बोल”

“ते आलेत”

“कोण”

“क्रोसिन” रिसेप्शनिस्ट बोलल्यावर मित्रानं एकदम माझ्याकडं पाहीलं.

“अरे बाप रे, नंतर यायला सांग”

“सांगितलं पण ऐकत नाहीत. भेटायचंच असं म्हणतात. ”

“जरा वेळ बसू देत. मी सांगितल्यावर आत पाठव. ”

“काही अर्जंट असेल मी जातो. तू पेशंट चेक कर”मित्र म्हणाला.

“तू बस रे!!हा पेशंट म्हणजे नमुनायं. नुसता डोक्याला ताप म्हणूनच आम्ही त्यांना क्रोसिन म्हणतो. ”

“दुखण्याला कंटाळलेले असतील. ”

“दुखणं नाही अतिहुशारी”

“म्हणजे”

“स्वतःचं बघ” रिसेप्शनिस्टला पेशंटला पाठवायला सांगितल्यावर पन्नाशीचे काका आत आले.

“नमस्कार डॉक्टर!!कसे आहात. तब्येत वैगरे ठिक ना” डॉक्टरांचीच विचारपूस करणारा पेशंट बघून मित्राला आश्चर्य वाटलं.

“मी मस्त, तुम्ही कसे आहात!!”

“थोडा डिस्टर्बय. रोज नवीन नवीन त्रास…. ”

“अरे बाप रे, नक्की काय होतंय”

“तीन दिवस वाट पाहिली. स्टडीपण केला आणि शेवटी तुमच्याकडे आलो. ”

“शेवटी म्हणजे?समजलं नाही”

“गैरसमज नको. तुम्हांला तर माझा स्वभाव माहितेय”

“चांगलाच”माझं खऊटपणे बोललेलं काकांच्या डोक्यावरून गेलं.

“थॅंकयू, मी लहानपणापासूनच अभ्यासू आहे. ” 

“हो, हे तुम्ही नेहमी सांगता. ”

“खरं तर मला डॉक्टरच व्हायचं होतं पण मार्क कमी पडले आणि सरकारी नोकरी मिळाली म्हणून मग.. ”

“अरेरे!!समाज एका हुशार डॉक्टरला मुकला”

“तुम्ही चेष्टा करत नाही ना”

“छे, काहीतरीच काय!!तुमच्या त्रासाविषयी सांगा ना. ”

“अरे हो, तीन दिवसांपूर्वी माझा हात दुखत होता नंतर पोटदुखी सुरू झाली. एकदोनदा छातीत कळ आली आणि कालपासून डोकं दुखंतय. ”

“आपण चेक करू” 

“एकच मिनिट” काका म्हणाले म्हणून मी पुन्हा खुर्चीत बसलो.

“प्लीज पटकन सांगा. अजून पेशंट आहेत. ”

“ऐका ना. त्रास सुरू झाल्या झाल्या लगेच इंटरनेटवर सर्च केलं. तेव्हा हा त्रास म्हणजे अनेक गंभीर आजरांची प्राथमिक अवस्था आहे असं कळलं म्हणून जरा टेंशन आलं. दुसऱ्या दिवशी पोटदुखी सुरू झाल्यावर पुन्हा सर्च केलं तर तिथं अजून वेगळी माहिती सापडली आणि आता आजाराविषयी कंफ्यूजन झालंयं. ”

“चेक करतो. या”

“फक्त अर्धा मिनिट. इंटरनेटवरच्या माहितीवरून घरच्याघरी ट्रीटमेंट सुरू केली आणि केमिस्टकडून आणलेल्या दोन गोळ्या घेतल्या पण फरक पडला नाही. नाईलाजानं तुमच्याकडं आलो. ”

“ओके, सगळं सांगून झालं. आता चेक करू” जराशा चढया आवाजात मी बोललो पण काकांवर काहीही परिणाम नाही. त्यांची बडबड चालूच. ब्लड प्रेशर तपासताना देखील संभाव्य आजार आणि त्यावरची औषधं याविषयी सांगत होते. तपासणी झाल्यावर खुर्चीत बसताना काका म्हणाले “माझा अंदाज बरोबर ना. ”

“काही प्रमाणात”

“म्हणजे”

“काळजी करण्यासारखं काही नाहीये. ब्लड प्रेशर नॉर्मल आहे. डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम दिसतोय. दोन दिवस पोटाला आराम द्या. सगळं ठिक होईल. ” 

“वाटलचं असं काही असेल तरीही काही टेस्ट करून घेतो. इंटरनेटवर तसं सांगितलयं. प्रिकोशन इज बेटर दन क्युअर”

“जशी तुमची इच्छा!!, ”म्हणत काकांना दोन टेस्ट लिहून दिल्या.

“अजून एक”

“बोला”

“काही पथ्य”

“महिनाभर इंटरनेट वापरू नका. ”इतका वेळ शांत बसलेला मित्र बोलून गेला. त्याच्याकडं विचित्र नजरेनं पाहत काका बाहेर गेले आणि मी हुsssश केलं.

“आता कळलं क्रोसिन नाव का ठेवलं. ”

“हो रे, फुल पकाऊ आणि पार डोकं आऊट झालं. असे दोनचारजण भेटले तर रोजची क्रोसिन नक्की!!”

“पूर्वी डॉक्टरांनी सांगितलेलं निमूटपणे ऐकणारे पेशंट होते. आता इंटरनेटवरची माहिती वाचून शहानिशा न करता असे स्वतःलाच चतकोर डॉक्टर समजणारे फार वाढलेत. ”

“चतकोर डॉक्टर!!हे भारीये”

“खरंतर फार काही कळत नाही परंतु अशांचा कॉन्फिडन्स जबरदस्त असतो. काहीही झालं तरी आपलं घोडं दामटत असतात. सोशल मिडियावर आलेल्या खऱ्या-खोट्या माहितीवर विश्वास ठेवून प्रॉब्लेम काय असेल आणि काय ट्रीटमेंट द्यावी असं डॉक्टरांनाच सुचवतात. ”

“अशांना हँडल कसं करतोस”

“शक्यतो वाद घालत नाही. आत्ताच बघ. बाहेरचं खाणं झालं म्हणून पोट बिघडलं पण त्यांना टेस्ट करायच्यात म्हणून मग लिहून दिलं. विनाकारण खर्च पण अनुभवानं शहाणपण आलयं की चतकोर ज्ञानापुढं डोकं चालवायचं नाही. ते जाऊ दे, चहा घेणार!!”

“एकदम कडक मागव. खरंच डोकं दुखायला लागलं. ”मित्र.

चहासाठी रिसेपशनीस्टला फोन केला तर ती म्हणाली “सर, एक पेशंट आलेत. ” 

“आता कोण?”

“अजून एक क्रोसिन” मी कपाळावर हात मारला.

—- 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ श्रीखंड, पाडवा आणि फटक्याची गोष्ट… – भाग-२ ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ श्रीखंड, पाडवा आणि फटक्याची गोष्ट… – भाग-१ ☆ सुश्री शीला पतकी 

(शिक्षा सुनावल्यावर हे दोघे मोठ्याने घोषणा देत राहिले, ” वंदे मातरम जय श्रीराम भारतमाता कि जय”त्यांना ओढत शिपायाने बांधण्यासाठी नेले त्यांचे हात बांधून ठेवले आणि पाठीवरती वीस फटके मारायला सुरुवात केली.) – इथून पुढे — 

कोवळी वीस वर्षाची पोरं त्यांच्या उघड्या पाठीवरती फटाफट फटकारे मारले जात होते वेदना होत होत्या पण ओठ दाताखाली दाबून ते घोषणा देत होते, ” वंदे मातरम भारत माता की जय” आणि हा जयघोष त्यांना वेदना सोसण्याचे बळ देत होता… शेवटी पाठीतून रक्त यायला लागले फटके देणारा खाली बसला संध्याकाळी पाच वाजता त्या दोघांना खाली उतरवण्यात आले हात खाली करता येत नव्हते कारण काखेत गोळे आलेले होते चार दिवस त्यांना पडून राहावे लागले वेदनाने जीव कळवळत होता पण चेहऱ्यावर ते दाखवत नव्हते त्यांना आनंद या गोष्टीचा होता की आमचा सण पाडवा वर्षाची सुरुवात आम्ही साजरी केली आणि इंग्रजांना एक प्रकारचा शह दिला

ही गोष्ट सांगताना मी अनेक गोष्टी त्यांना समजून सांगत होते.. की या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अशा छोट्या छोट्या व्यक्तींनीही खूप काम केले आहे श्रीखंड खाऊन दाखवणे हा त्यांच्या त्या वयातला इंग्रजांच्या विरुद्ध करावयाचा कट होता त्या सत्तेला त्यांना डिवचायचे होते पण त्याची त्यांना खूप मोठी किंमत मोजावी लागली पण देशासाठी ती आनंदाने त्यांनी मोजली

हे सर्व कथन करत असताना मुलीही गंभीर झाल्या होत्या माझे डोळे पाणावले होते मी मुलींना शेवटी एवढेच म्हणाले मुलींनो इतक्या अनेक गोष्टींनी ज्यांनी त्याग केला आहे त्यामुळे आपल्याला हे स्वातंत्र्य आज उपभोक्ता येत आहे आपल्याला आपल्या देशाचा अभिमान वाटला पाहिजे की आपल्या देशातली तरुणाई स्वातंत्र्य मिळावे म्हणून किती झटली आहे आपण फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीला येऊन त्यांचे स्मरण करतो आणि झेंड्याला मानवंदना देताना त्यांच्या प्रती ही कृतज्ञता व्यक्त करत असतो म्हणून त्या दिवशी सर्वांनी हजर व्हायचे असते अर्थात ज्याना या घटनेशी काही देणंघेणं नाही ती मंडळी ती सुट्टी एन्जॉय करतात हे दुर्दैव आहे आणि मुलींनो तुम्ही तरी सगळ्या हुशार मुलींचा वर्ग डिस्टिंक्शन मध्ये येणारा वर्ग… तुमच्यापुढे अभ्यासाव्यतिरिक्त काही दिसत नाही त्यामुळे तुम्हाला 15 ऑगस्ट ला उपस्थित राहण्याची गरज वाटत नाही कारण देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या अनेक लोकांबरोबर हे चार तरुण जे होते त्यात दोन तरुणातला एक माझा “बाप” होता भगवान मुकुंद पत्की आणि दुसरे होते माझे काका मोहोळचे डॉक्टर श्रीनिवास जोशी! त्यात तुमचे वडिल नव्हते या दोन तरुणांनी हे भोगलं होतं तुम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं? तेव्हा तुम्ही उद्याला येण्याची काहीच गरज वाटत नाही. स्वातंत्र्य दिनाचे नातं माझ्याशी आहे मला त्याची जाण आहे माझ्या वडिलांनी सोसलेल्या हाल अपेष्टा मला ठाऊक आहेत मुलींनो झेंडा जेव्हा वर जातो ना तेव्हा माझे डोळे भरून येतात उर अभिमानाने भरून येतो आणि वाटतं की हा झेंडा फडकवण्याच भाग्य आपल्याला लाभतंय त्याचं कारण अनेकांचा त्याग आणि त्या त्यागामध्ये ज्या व्यक्तीचा सहभाग आहे अशा व्यक्तीची मी मुलगी आहे याचा मला अभिमान वाटतो…. तुम्हाला तसं काही वाटण्याचं कारण नाहीये तेव्हा कोणीही 15 ऑगस्टला उपस्थित राहावयाचे नाही आणि मी वर्गातून धाडकन निघून आले….. ! शेवटचे वाक्य बोलताना मी आवंढे गिळत होते माझे डोळे पाण्याने भरले होते मुली चिडीचूप होत्या त्यांचे डोळे ओलावले होते दुसऱ्या दिवशी आठवीच्या ओळीवर सगळ्या मुली हजर होत्या. वाचक हो हे लिहिताना आजही माझे डोळे भरून येतात मी वर्गातल्या एकाही मुलीशी बोलत नव्हते झेंडावंदन झाल्यावर सगळा वर्ग थांबला मॉनिटर ने मला आजची हजेरी घेतली आहे आणि ती मध्ये सर्व वर्ग हजर आहे असे सांगितले आणि आम्ही जे परवा वागलो त्याबद्दल आम्हाला क्षमा करा असे म्हणत मुली हात जोडून माझ्यासमोर उभ्या होत्या मी मॉनिटरला जवळ घेतल आणि म्हणाले, ” कशा ग तुम्ही अशा.. कस समजत नाही तुम्हाला… तुम्ही वेड्याही आहात आणि शहाण्या हि आहात.. माझे डोळे आनंदाने पाणावले होते माझा राग मावळला हे पाहून सर्वांनी टाळ्या वाजवल्या.. तो 15 ऑगस्ट चा दिवस मी कधीच विसरत नाही पुढे 14 साली आमचा माजी विद्यार्थिनी मेळावा झाला त्यात एका मुलीने उठून आठवण सांगितली बाई तुम्ही तुमच्या बाबांची आम्हाला गोष्ट सांगितली होती.. श्रीखंडाची… आजही मी आमच्या कॉलनीमध्ये झेंडावंदनाला उपस्थित राहणारी पहिली असते आणि मुंबई सारख्या ठिकाणी मी माझ्या मुलांना शाळेत पाठवते त्यांना झेंडावंदन चुकवू देत नाही त्यांनाही मी तुमच्या बाबांची गोष्ट सांगितली आहे हे म्हणजे रुजलेल्या संस्काराची परत पावती होती तरुण पिढीला हे सतत सांगायला हवे… सांगणारी माणसं कमी पडत आहेत.. म्हणून पुढच्या पिढीवर संस्कार कमी झाला आहे हे सगळं समजून सांगणारे भेटले तर आजही आपली येणारी पिढी नक्कीच सुजाण असेल देशभक्ती आणि देश प्रेम हे त्यांच्या नसानसात बिंबवलं पाहिजे सोनार बांगला लिहिणाऱ्या रवींद्रनाथ टागोरांच्या मूर्तीचा भंग हे ज्याने पाहिलं आणि बांगलादेशी च्या तरुणाचा नंगानाच ज्यांनी पाहिला त्या सर्वांना या गोष्टीची तीव्रतेने जाणीव होईल कि हे आपल्या मुलांनी असे करायला नको आहे राष्ट्रप्रेम आणि सुसंस्कार हे दोन्ही देण्याची गरज आहे राष्ट्र नुसते समृद्ध असून चालत नाही ते सुसंस्कारित पाहिजे आणि प्रत्येकाचे आपल्या राष्ट्रावर प्रेम पाहिजे… जय हिंद!!!

वंदेमातरम !!!

– समाप्त –

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सैनिकांसाठी श्वास… ध्यास आमुचा ! – भाग-१ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ सैनिकांसाठी श्वास… ध्यास आमुचा ! – भाग-१ ☆ श्री संभाजी बबन गायके 

सैनिकांसाठी श्वास… ध्यास आमुचा !

… अर्थात गिरीशिखरांच्या भाळी श्वासगंध रेखताना…! 

श्री. योगेश चिथडे आणि सौ. सुमेधा चिथडे यांनी सियाचीन मधील सैनिकांसाठी ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारून देण्यासाठी केलेल्या भगीरथ प्रयत्नांची कहाणी!

सियाचीन या जगातील सर्वाधिक उंचावर असलेल्या युद्धभूमीमध्ये आणि लगतच्या शेकडो किलोमीटर्स परिसरात श्वास दुर्लभ आहे. सपाटीवर मुबलकतेचा अंगरखा पांघरून वा-यासवे पिंगा घालणारा प्राणवायू शिखरावर चढता-चढता अगदी मलूल झालेला असतो. खोल डोहात बुडी मारून तळावर पहुडलेला एखादा शिंपला वर आणावा तसा प्रत्येक श्वास सैनिकांना आसमंतातून कुडीत ओढून घ्यावा लागतो…. शिंपल्यातून मोती मिळवावा तसा! 

सैनिक देहाच्या माळावर श्वासांचं शिंपण करतात ते सीमांचं रक्षण करण्यासाठी…. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत! ह्या श्वासांचं आयुष्य वाढवायला हवं हा विचार छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा पुण्य-प्रभाव असलेल्या एका सहृदय दांमप्त्याच्या हृदयावर कोरला गेला तो परमवीर चक्र विजेते ऑनररी कॅप्टन श्री. बानासिंग यांच्या एका वाक्यामुळे!

श्री. योगेशजी चिथडे भारतीय हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर बँकिंग क्षेत्रात तर सौ. सुमेधाताई चिथडे या त्यांच्या सहधर्मचारीणी पुणे शहरात शिक्षिका म्हणून कार्यरत. चिथडे दांम्पत्याचे एकुलते एक चिरंजीव देशाच्या सीमेवर भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. प्रवाहपतिताप्रमाणे जीवन जगणे योगेशजींना आणि सुमेधाताईंना पसंत नाही. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे ‘देहातून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो आणि आपण या देशाचे काही देणे लागतो’ हे सुमेधाताईंच्या मनात रूजलेले वाक्य! अंगावर लष्करी गणवेश नसला तरी देशसेवा बजावता येते हे सुमेधाताईंनी योगेशरावांच्या साथीने अंगिकारलेल्या कार्यातून दाखवून दिले. हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचे, वीरपत्नींचे अश्रू पुसण्याचा वसा या दोघांनी घेतला आणि प्रत्यक्षात गावा-गावात जाऊन काम सुरू केले. सणावाराला या वीरपत्नींना, वीरमातांना आपल्या घरी माहेरपणाला आणणे, त्यांच्या घरी सणासुदीचे खाद्यपदार्थ पोहोचवणे, आर्थिक नियोजन करण्यात जमेल ते मार्गदर्शन करणे इत्यादी कार्य हे दांमप्त्य केवळ स्वबळावर आणि स्वयंस्फूर्तीने करीत होतेच. यानिमित्ताने त्यांचा सैनिकीसेवेमधील अनेकांशी निकटचा संबंध आला. शूरवीरांचा सन्मान करण्याच्या अशाच एका उपक्रमात परमवीर चक्र विजेते ऑनररी कॅपन बानासिंग साहेब यांचे चिथडे कुटुंबात येणे झाले आणि ‘आम्ही सैनिकांसाठी आणखी काय करू शकतो?’ या सुमेधाताईंच्या प्रश्नावर बानासिंग साहेबांनी उत्तर दिले होते… जवानों की सांसों के लिए कुछ कर सकते है तो किजिए…. सैनिकांच्या श्वासांसाठी काही करता आले तर करा!” 

ह्या एका वाक्याने चिथडे पती-पत्नींना एक वेगळीच दिशा दाखवली. त्यांनी तत्परतेने या दिशेला आपला मोर्चा वळवला. सियाचीन आणि आसपासचा परिसर ऑक्सिजनच्या कमतरतेसाठी कुप्रसिद्ध आहे. सीमांचे रक्षण करण्यासाठी भारतीय सैन्याला सियाचीन आणि परिसरात मोठ्या प्रमाणात जवान तैनात ठेवावे लागतातच. एका आकडेवारीनुसार सियाचीन या जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या युद्धभूमीवर आणि परिसरात आज पर्यंत सुमारे अकराशे सैनिक देशरक्षणाच्या कर्तव्यावर असताना हुतात्मा झालेले असून यातील सर्वाधिक बळी हिमप्रपात, हिमस्खलन आणि विशेषत: श्वसनासंबंधींच्या आजारांनी घेतलेले आहेत! म्हणजे येथील सर्वांत मोठा शत्रू म्हणजे हवामान… इथल्या वातावरणातील ऑक्सिजनचा कमालीचा तुटवडा आणि जीवघेणी थंडी! 

High Altitude Pulmonary Oedema, Acute Mountain Sickness, Frost Bite Chilblains, Hypothermia, Snow Blindness हे सियाचीन मध्ये तैनात सैनिकांना आणि परिसरातील नागरीकांना भेडसावणारे जीवघेणे आजार. या आजारांवरील सर्वांत महत्त्वाचा उपचार म्हणजे रूग्णाला कृत्रिम ऑक्सिजन देणे! 

सियाचीन जवळ परतापूर येथे भारतीय लष्कराचे विशेष रूग्णालय कार्यरत आहे… याला सार्थ नाव आहे… Siachen Healer… to heal म्हणजे बरे करणे! या रूग्णालयात केवळ सैनिकच नव्हेत तर आसपासचे नागरीक, पर्यटक, गिर्यारोहक यांनाही आरोग्यसेवा पुरविल्या जातात. इतर ठिकाणांहून ऑक्सिजनचा पुरवठा नियमितपणे करणे सियाचीनमधील लहरी हवामानामुळे कठीण असते. म्हणून या ठिकाणी कृत्रिमरित्या ऑक्सिजन निर्मितीची गरज असते आणि तशी सुविधाही भारतीय लष्कराने उपलब्ध करून दिली आहे. बाणासिंग साहेबांच्या सोबत झालेल्या संभाषणातून ह्या यंत्रणेला अत्याधुनिकतेची जोड देण्याची गरज आहे हे चिथडे दांम्पत्याने ओळखले आणि चिकित्सक अभ्यास सुरू केला. १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय सैन्याने मोठा पराक्रम गाजवला होता, पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांना दाती तृण धरून शरण येण्यास भाग पाडले होते. या अलौकीक पराक्रमाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष जवळ येऊन ठेपले होते. यानिमित्त भारतीय सैनिकांना अभिवादन म्हणून भारतीय जनतेच्या स्वयंस्फूर्त आर्थिक सहभागातून ‘ऑक्सिजन निर्मितीचा अत्याधुनिक, सुसज्ज प्लांट भेट म्हणून देण्याची कल्पना श्री. योगेश चिथडे आणि सौ. सुमेधाताई योगेश चिथडे यांना सुचली! ही एक खरोखर अभूतपूर्व कल्पना होती! सरकार, सैन्य तर आपल्या सैनिकांच्या कल्याणाची तजवीज कायमच करीत असते, पण नागरीकांचाही यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग महत्त्वाचा असतो. देश आपल्यासाठी काय करतो, यापेक्षा आपण देशासाठी काय करतो असा प्रश्न प्रत्येकाला खरा तर पडलाच पाहिजे!

 खरं तर हे काम म्हणजे स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणण्यासारखे मोठे काम होते. भरपूर संशोधन केल्यानंतर चिथडे साहेबांनी जर्मनीतील एक कंपनी ऑक्सिजन यंत्रणा पुरवू शकेल हे शोधून काढले. पण ही यंत्रणा विकत घेणे, वाहतूक करणे, यंत्रणा प्रत्यक्ष कार्यांन्वयित करणे यासाठी सुमारे अडीच कोटी इतका मोठा खर्च येणार हेही दिसले! शिवाय विविध प्रशासकीय परवानग्या मिळवणे, विविध यंत्रणांशी संपर्क साधणे, त्यांना योजना समजावणे इत्यादी आव्हाने तर होतीच. पण चिथडे पती-पत्नींनी हे शिवधनुष्य स्वत: पुढाकार घेऊन पेलण्याचा प्रण केला! पैशांचं सोंग आणणे अशक्यच असते. देशप्रेमी लोकांकडून आर्थिक सहाय्य मिळवणे हा एकमेव मार्ग होता. गरज अडीच कोटी रूपयांची होती! सुमेधाताईंनी आपल्या अंगावर असलेले सुवर्णालंकार विकले आणि त्यातून आलेले एक लाख पंचवीस हजार आठशे पंधरा रूपये ‘सिर्फ’ मध्ये जमा केले आणि ऑक्सिजन प्लांट साठी निधी संकलनाच्या कार्याचा सुवर्ण-शुभारंभ केला! ‘सिर्फ’ म्हणजे आकड्यांनंतर लिहिला जाणारा ‘फक्त’ या अर्थाचा शब्द नव्हे! योगेशराव आणि सुमेधाताई खूप आधी पासूनच सैनिकांसाठी, वीरपत्नींसाठी, त्यांच्या मुलांसाठी, वीरमाता-पित्यांसाठी अगदी ग्रामीण भागात जाऊन काम केलेले आहे! त्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन ‘Soldiers’ Independent Rehabilitation Foundation(SIRF) अर्थात ‘सिर्फ’ ही सामाजिक संस्था स्थापन केली आहे. आधी केले आणि मग सांगितले या उक्तीनुसार कार्यास सुरूवात केल्यामुळे योगेशराव आणि सुमेधाताईंना या अभूतपूर्व उपक्रमासाठी निधी देण्याचे आवाहन इतरांना करण्याचे नैतिक बळ प्राप्त झाले. योगेशजी आणि सुमेधाजी आपापल्या नोक-या सांभाळून निधी-संकलनाच्या कार्याला लागले. सियाचीनची, तिथल्या भौगोलीक, हवामान-विषयक, आरोग्यविषयक बाबींची माहिती मिळवली, मूळ समस्या, तिच्यावरील उपाय याचा सविस्तर विचार केला. यावर आधारीत पीपीटी प्रेझेंटेशन तयार केले आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातील हजारो लोकांना दाखवले आणि सैनिकांच्या श्वासांसाठी सामान्य जनतेच्या भावनांना साद घातली. निधी-संकलनाच्या यानिमित्ताने चिथडे पती-पत्नींना आलेल्या ब-या-वाईट अनुभवांचे तर एक पुस्तकच तयार होईल! वृद्धाश्रमात राहणारी आणि तिच्या लेकाने खाऊसाठी दिलेले वीस रूपये सैनिकांसाठी देणारी एक माता, माझा वर्षभराचा पगार घ्या असे म्हणणारी एक मोलकरीण भगिनी, बोहनी झालेली नसतानाही गल्ल्यातील एकावन्न रूपये काढून देणारा गरीब भाजी विक्रेता, आमच्या काही महिन्यांच्या पेन्शनची रक्कम या कार्यासाठी घ्या असे म्हणणा-या वीरपत्नी, आपले खाऊचे पैसे देणारी एक आठ-नऊ वर्षांची बालिका असे ‘नाही रे’ गटातील एका बाजूला आणि ‘आहे रे’ गटातील काही कंजुष श्रीमंत एका बाजूला! आपल्या विचाराच्या प्रचारासाठी सुमेधाताईंनी तेरा दिवस तेरा घरांमध्ये जाऊन प्रबोधन करण्याचे व्रतही पार पाडले! योगेशजींच्या समवेत चार हजारांहून अधिक कुटुंबांशी, अनेक संस्था, व्यक्ती यांचेशी संपर्क साधला. स्वत:चे वैय्यक्तिक आयुष्य, सणसमारंभ, कौटुंबिक समारंभ दूर ठेवले. तरीही पुरेशी रक्कम जमा होत नाहीये असे पाहून स्वत:चे राहते घरही विकण्याची तयारी केली. पण सत्य संकल्पाचा दाता नारायण या उक्तीनुसार जनता-जनार्दनाने मदतीचे अनेक हात पुढे केले. आणि अथक प्रयत्नांतून आवश्यक रक्कम उभी राहिली.

– क्रमशः भाग पहिला.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘शब्दकळा…’ – लेखिका : श्रीमती अरुंधती ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘शब्दकळा…’ – लेखिका : श्रीमती अरुंधती ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

सूनबाईंनी घासून ठेवलेली देवाची उपकरणे सासूबाई पुसून ठेवत होत्या. मधेच म्हणाल्या, “ अगबाई ! आज निरांजन नुसतंच कुरवाळलेलं दिसतंय ! “ बी. ए. मराठी असलेल्या सूनबाईंना वाक्याचा अर्थ कळायला अंमळ वेळच लागला. अर्थ लागला तेव्हा हसू आणि राग या दोन्हीचं मिश्रण असलेला एक वेगळाच भाव चेह-यावर उमटला. सासूच्या उत्कृष्ट मराठीला दाद द्यावी की चूक काढली म्हणून फणकारा दाखवावा हे तिला कळेचना !

मराठी भाषा फार मजेशीर आणि संपन्न – समृद्ध आहे. तिचा वापर पूर्वीच्या न शिकलेल्या, कमी शिकलेल्या स्त्रिया फार चतुराईने करत. ‘ शर्करा अवगुंठित’ शब्दांचा वापर लीलया होत असे.

आमचे एक परिचित होते. घर म्हणजे नांदतं गोकुळ. मुलांच्या दंग्यानं अन् पसा-यानं तिथल्या आजी कावलेल्या असत. ‘ आवरलेलं घर ‘ हे दृष्य फक्त सणावारी किंवा कोणी पाहुणा येणार असेल तरच. कधी त्यांच्या घरी डोकावलं तर आजी नातवंडांना ओरडताना दिसत. पसा-यात बुडालेल्या आजी सहज बोलून जात, “ कार्टी बसतील तिथे * ठेवतात ! “ हे वाक्य तेव्हा मला मजेशीर वाटायचं. आजवर ते लक्षात असूनही वापरायचा धीर मात्र होत नाही.

माझी एक धष्टपुष्ट मैत्रीण कामावरुन येताना जिमला जाऊन येत असे. त्या दिवशी तिच्याशी जरा बोलायचं होतं म्हणून साधारण ती येण्याच्या जरा आधीच मी तिच्या घरी गेले. तिच्याकडे सासूबाई आणि आजेसासूबाई अशा दोघीही होत्या. सासूबाई साधारण सत्तरीच्या. मैत्रिणीला यायला थोडा उशीर होणार होता. त्यामुळे सासूबाई भराभर कामं उरकत होत्या. मी आपलं सहज म्हटलं “ काकू, तुम्ही अजूनही फिट आहात अगदी !” लगेच आजी उद्गारल्या “ काय करणार बाई, तरण्या झाल्या बरण्या अन् म्हाता-या झाल्या हरण्या! “ मी उगीच अंग चोरुन अन् सावरून बसले.

म्हणी अन् वाक्प्रचारांचा वापर करावा तर तो मागच्या पिढीनेच. फारशा शिकलेल्या नसूनही या स्त्रिया सुसंस्कृत आणि प्रसंगी असंस्कृत भाषाही वापरत असत !

वेगळ्या अर्थानं गाजलेल्या एका ओळखीतल्या मुलीचं लग्न तशाच अर्थानं गाजलेल्या मुलाशी झालं, तेव्हा माझी आजी सहज बोलून गेली “ हडळीला नव्हता नवरा अन् झोटिंगाला नव्हती बायको ! आता जोडी छान जमली. “

आजोळी पूर्ण सुट्टी घालवल्यानंतर ( तेव्हा उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत कुठले टूर किंवा ट्रीप्स नसायच्या. कधी वडिलांच्या मूळ गावी, कधी आईच्या माहेरी मुक्काम. हाच बदल. ) जूनमधे शाळेत गेले. पहिला दिवस, मराठीच्या बाई वर्गात आल्या. गप्पा टप्पा सुरु झाल्या. मधेच हसत हसत माझ्याकडे बघून म्हणाल्या “ वा ! गालांवर अगदी रुई फुललीय ! “ क्षणभर मी गोंधळले आणि मग अर्थ कळून रुईतच खुद्कन हसले होते.

अगदी शेलक्या शब्दात उल्लेख करायला मराठी भाषेत उदंड शब्दसमूह आहेत. आमच्या नात्यातल्या एका मुलीचं लग्न जमायला जरा अवघड जात होतं कारण काय ? तर म्हणे “ म्हशीनं पाय दिलाय ना नाकावर !” गोरीपान मुलगी असेल आणि तिचा नक्षा जर कुठलं वाक्य उतरवत असेल तर “ पांढरी पाल तर आहे, रंग काय चाटायचाय ! “ अत्यंत आळशी पुरुषाचा उल्लेख सहजपणे “ दिवसभर शेणाच्या पो सारखा पडलेला असतो, “ असा होई. खरं तर वरची वाक्यं मनं दुखावणारी नाहीत का ? पण आमच्या आसपासचा स्त्रीवर्ग सहजपणे हे बोलून जाई. ऐकणा-याला पण फार खेद खंत वाटत नसे.

चांगलं पण बोललं जाई बरं का ! एखादी मुलगी सुदृढ असेल तर “ अहो, दहा जणांचं कुटुंब हसत सांभाळेल “ एखादीसाठी “इतकी रूपवान आहे की वाटेवरचा चोरसुद्धा उचलून नेईल “ (म्हणजे काय म्हणायचे असेल? ) कोणी सुग्रण असेल तर “ अहो, पुरणपोळी विरघळते तोंडात, पाण्याला फोडणी दिली ना तरी ओरपत बसाल !”

आताच्या काळात एखादी स्त्री ‘ब्युटीफुल, गॉर्जियस ‘ दिसत असेल. तेव्हा ‘चारचौघींसारखी ‘, ‘ दहाजणीत उठून दिसेल अशी ‘, ‘ लाखात एक’ असे उल्लेख असत आणि त्यावरून रूपाचा अचूक अंदाज येई.

अर्थात पुरुषवर्गही यातून सुटत नसे. शेलकी विशेषणं त्यांच्यासाठीही असत. ‘आग्यावेताळ’, ‘जमदग्नीचा अवतार’, ‘दुर्वास मुनी’, ‘पिंपळावरचा मुंजा’, ‘पाप्याचं पितर’, ‘लुंग्यासुंग्या’ वगैरे वगैरे ! बरं शब्दकोषात याचे अर्थ शोधायची गरजच नव्हती. आपलं ऐकणं आणि निरीक्षण यातून अचूक अर्थ कळे. ‘ फाटका इसम ‘ मात्र मी बरेच दिवस शोधत होते ! ‘मदनाचा पुतळा ‘ बापकमाईवर जगत असेल तर त्याला शून्य किंमत होती. अचूक शब्दांचा अचूक जागी उपयोग करायला तीक्ष्ण बुद्धी लागते. शाळा कॉलेज फारसं न पाहिलेल्या त्या पिढीकडे ती होती.

गॉसिपिंग त्याही काळात होतंच. घरातल्या ज्येष्ठा व्हरांड्यात, ओट्यावर, अंगणातल्या बाजांवर निवडण टिपण करत मस्त वेळ घालवत. “ हातपाय लुळे अन् जीभ चुरुचुरु वळे “ असं माझी आजी म्हणे. अशा गप्पांचा उल्लेख कोणी उखाळ्या पाखाळ्या काढणे असाही करे !

ही अशी खमंग, लज्जतदार, मर्मभेदी, वर्मभेदी, कधी सभ्य असूनही असभ्य भासणारी मराठी भाषा आमच्या पिढीतच लुप्त होऊ लागली होती. आता तर ती परोठे, ठेपले, पिझ्झा, बर्गरच्या संस्कृतीत विलीन झाली आहे. आंग्लाळलेल्या मराठीत तो ठसकाच नाही, ती मज्जा नाही ! पिढीगणिक भाषा बदलत जाते. ‘ ती व्यक्ती’ चा ‘ तो व्यक्ती ‘ कधी झाला समजलं तरी का ? आज प्रसिद्धीमाध्यमांवर जे मराठी बोललं जातं, ते ब-याचदा अनाकलनीय असतं. “ ** पण नांदा “ ! भाषा जिवंत राहायलाच हवी ! सगळ्याचं मिश्रण असलेली भेळ नाही का आपण आवडीनं खातो. तसंच, ही मराठी पण आपलीच आहे, नाही का ?  

लेखिका: श्रीमती अरुंधती

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ शतजन्म शोधतांना – (नाट्यपद) – स्वा. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – प्रा. भारती जोगी ☆

प्रा. भारती जोगी

 काव्यानंद

☆  शतजन्म शोधतांना – (नाट्यपद) – स्वा. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – प्रा. भारती जोगी ☆

संगीत नाटकांच्या वैभवशाली परंपरेत सुवर्णाक्षरांनी कोरलेलं नाव म्हणजे सावरकरांनी, मा. दीनानाथ मंगेशकर यांच्यासाठी लिहिलेली अजरामर नाट्यकृती “ संन्यस्त खड्ग ! “ १८ सप्टेंबर १९३१ या दिवशी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. आता शतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे याची! 

या नाट्यकृतीतल्या… वैश्विक अनुभूती आणि एका वेगळ्याच विरहानुभूतीचा स्पर्श लाभलेल्या, भैरवी रागातल्या अवीट आणि अमीट सुरांची झालर असलेल्या एका नाट्य पदाचे रसग्रहण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. खरंतर सावरकरांच्या भावना, कल्पना आणि विचारांचं… उदात्त, उन्नत आकाश दोन बोटांच्या चिमटीत धरणं, सामावणं शक्यच नाही. पण तरीही हे शिवधनुष्य… काही क्षणांपुरतं का असेना… पेलून बघणार आहे…

नाट्यपद…

शत जन्म शोधितांना। शत आर्ति व्यर्थ झाल्या। 

शत सूर्य मालिकांच्या। दीपावली विझाल्या |

*

तेव्हा पडे प्रियासी| क्षण एक आज गांठी |

सुख साधना युगांची| सिद्धीस अंती गाठी। 

*

हा हाय जो न जाई| मिठी घालू मी उठोनी |

क्षण तो क्षणात गेला | सखी हातचा सुटोनी |

हे नाटक गौतम बुद्धांच्या काळाशी संबंधित आहे. बुद्धांच्या सांगण्यावरुन ‘शाक्य’ सेनापती विक्रमसिंह आणि शाक्य जनता, शस्त्र त्याग करून संन्यास घेतात. काही काळ जातो. दरम्यान विक्रमाचा मुलगा वल्लभ सुलोचना नावाच्या युवतीशी प्रेमविवाह करतो. लग्नाला वर्ष उलटल्यानंतर वल्लभ आणि सुलोचना यांच्या मिलनाचा / भेटीचा योग येतो. आणि… तो बहुप्रतिक्षित मधुर मिलनाचा क्षण येतो… पण हाय रे दैव! 

त्याचवेळी, कोसल देशाचा राजा… विद्युतगर्भ याने आक्रमण केल्याची वार्ता येते आणि शाक्य राष्ट्राला वाचवण्यासाठी, वल्लभालाही पाचारण केले जाते. कपिलवस्तुचा पाडाव टळावा म्हणून संन्यस्त खड्गाला आवाहन केले जाते. वल्लभही मग संन्यास धर्माचा संन्यास घेत… युद्धात उतरतो. म्हणून नाटकाचं नाव.. “संन्यस्त खड्ग!!”

मिलनाच्या क्षणीच झालेली ताटातूट, त्यामुळे सुलोचनेच्या मनाची झालेली अवस्था, विरह वेदनेचे, हतोत्साहित, विकल, असहाय असे मनोभाव… सगळ्याच… विभाव, अनुभाव आणि संचारी भावांसह, रस निष्पत्ती पर्यंत पोहोचविणारं हे नाट्यपद!! 

 सुलोचना आपल्या प्रिय सखीला… नलिनीला, वल्लभाच्या ऐनवेळी असं निघून जाण्याने, तिच्या मनात उठलेलं भावनांचं वादळ, विचारांचा कल्लोळ… कथन करते आहे…. ते शब्दांकन म्हणजे हे पद! 

सुलोचना अगतिक होते आणि म्हणते… असा पती लाभावा म्हणून मी शत जन्म शोधत राहिले गं! त्यासाठी मी शत-शत/अगणित, आरती केल्या. परमेश्वराच्या आळवण्या केल्या. तो भेटावा म्हणून शतजन्म वाट पाहिली. पण सखी, बघ ना, काय झालं…

‘शत आर्ति व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या! ‘

… या ओळींमध्ये शब्द.. शत सूर्य मालिका…. सावरकरांचं विश्वाच्या भव्यतेचं आकर्षण आणि विराटतेची ओढ व्यक्त झाली आहे. उत्तुंग कल्पना शक्ती, आशयातील भावोत्कटता जाणवते आहे. त्यातूनच सुलोचनेची मनोवस्था डोळ्यासमोर येते. ‘ दीपावली विझाल्या ‘ यातला विझाल्या हा अगदी अनवट असा शब्द प्रयोग…. तिच्या मनातले, मिलनोत्सुक आशेचे… शत-शत दीप विझले.. हे सूचित करतो… अगदी प्रत्यक्षानुभूतीच दिलीयं!

पुढील ओळीत सुलोचना म्हणतीये…

‘ तेव्हा पडे प्रियासी, क्षण एक आज गांठी!

सुख साधना युगाची, सिद्धीस अंति गाठी!‘

… या ओळी म्हणजे… यमक आणि श्लेष या दोन्ही अलंकाराच्या गाठभेटीचा उत्तुंग आणि उत्कट क्षण!! 

प्रिय मिलनाचा, शत जन्म वाट पाहिलेला क्षण, आज गांठी आला, गाठला एकदाचा, प्राप्त झाला, मिळाला…. असं वाटतंय! आणि मनात एकच विचार येतोयं की… शतजन्माच्या माझ्या साधनेने, सिध्दी गाठली. साधना आणि सिद्धीची गाठ पडली!! प्रिय आराधना, तपस्या, साधना सफल झाली.

 गाठी या शब्दांत, यमक आणि श्लेष या भाषालंकारांचा उपयोग करून… या पदातल्या, सुलोचनेच्या भावनांची अगदी… ये हृदयीचे, ते हृदयी…. म्हणजे प्रेक्षक वृंद हृदयी… गाठी घातली अंती… हीच भावना येते.

शेवटच्या दोन ओळी तर… कल्पनेची उत्तुंगता, आशयघनता, शब्दकळा, आणि भावनोत्कटता या सगळ्याचाच परिपूर्ण, परिपक्व, परिणाम म्हणावा ! 

सुलोचना सांगतीये… अगदी सजीव, सगुण, साकार दर्शन… त्या एका कृतीची साक्षात्कारी अनुभूती देत की…

हा हाय जो न जाई, मिठी घालू मी उठोनी

क्षण तो क्षणात गेला, सखी हातचा सुटोनी!! 

… सखी, बघ ना, तो मधुर मिलनाचा क्षण आला… मी उठून माझ्या वल्लभाला मिठी घालायला गेले… आणि… आणि, निमिषार्धात्.. तो क्षण.. क्षणात निसटून गेला गं माझ्या हातून.. अगदी काही कळायच्या आत!… किती ही वैश्विक अनुभूती! आध्यात्मिक किनार लाभलेली! कुठेतरी याच ओळी आठवतात… ‘ पाया पडू गेले तव, पाऊलचि ना दिसे!!! ‘ 

विरहाची काळ हा प्रदीर्घ भासतो, मात्र मिलनाचा काळ अत्यल्प भासतो.. असंही सुचवलयं ! ‘ क्षण तो क्षणात गेला…. ’ या सावरकरांच्या ओळीचं खरं मोल जाणून, भाषाप्रभू पु. ल. म्हणतात… ‘ या एका ओळीसाठी सावरकरांना नोबेल द्यायला हवं. ‘ 

हा खरा गौरव आहे त्या… ओळी सुचलेल्या क्षणांचा, सुलोचनेच्या हातून निसटलेल्या त्या हुरहुर लागलेल्या क्षणांचा ! 

या पदाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे… हे मिलनाच्या आधीचं नाही तर नंतरचं विरह गीत आहे. हे गाणं आपण ऐकतो तेव्हा एक विचित्र हुरहुर लागते. भैरवी रागातल्या सुरांची झालर असलेलं हे नाट्यपद… ‘आर्ति व्यर्थ झाल्या’ मधली आर्तता आणि ‘ क्षण तो क्षणात गेला ’ मधली क्षणभंगुरता स्पष्ट करतं… प्रेक्षकांच्या हाती मात्र खूप काही, मनाच्या गाभाऱ्यात स्थिरावून गेलं… असंच म्हणावसं वाटतं.

© प्रा. भारती जोगी

पुणे.                            

९४२३९४१०२४.📚📖🖋️

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 204 – रेखाएँ मिटा दो !… ☆ स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र”

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं  आपका भावप्रवण कविता – रेखाएँ मिटा दो !।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 204 – रेखाएँ मिटा दो !… ✍

मिटा दो

रेखाएँ मिटा दो।

जमीन, आसमान या

समुंदर की सतह पर

खींची गई रेखाएँ

मिटा दो।

जमीन सबकी है।

आसमान सबका है। 

समुंदर सबका है।

और रेखाएँ?

वे किसी की नहीं हैं,

मगर सब कहीं हैं।

 

और –

रेखाओं के पार जो है

वो आसानी से

नहीं लिया जा सकता,

इसलिए

रेखाएँ खींचने का ‘श्रेय’

किसी को नहीं दिया जा सकता।

 

जरा सोचिए –

कृपणता के परिवेश में

क्या हो सकता है?

क्या आदमी

अपनी परछाईं धो सकता है?

 

मैं जानता हूँ

दुनिया नकारेगी,

वो यहीं हारेगी।

 

रेखाएँ विस्तार पा रही हैं,

वे गहरा रही हैं।

और आदमी

दिन ब दिन

छोटा होता जा रहा है।

सोचता हूँ-

ये क्या होता जा रहा है।

 

अरे, कोई है

जो रोक दे इस मनमानी को,

आखिर कोई कब तक बाँधेगा

हवा, धूप, पानी को!

इसीलिए काहता हूँ

जमीन, आसमान या

समुंदर कि सतह

पर खींची गई

रेखाएँ मिटा दो।

© डॉ राजकुमार “सुमित्र” 

साभार : डॉ भावना शुक्ल 

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष – कृष्णनीति ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष – कृष्णनीति ? ?

जरासंध ने कृष्ण के वध के लिए कालयवन को भेजा। विशिष्ट वरदान के चलते कालयवन को परास्त करना सहज संभव न था। शूर द्वारकाधीश युद्ध के क्षेत्र से कुछ यों निकले कि कालयवन को लगा, वे पलायन कर रहे हैं। उसने भगवान का पीछा करना शुरू किया।

कालयवन को दौड़ाते-छकाते कृष्ण उसे उस गुफा तक ले गए जिसमें ऋषि मुचुकुंद तपस्या कर रहे थे। अपनी पीताम्बरी ऋषि पर डाल दी। उन्माद में कालयवन ने ऋषिवर को ही लात मार दी। ऋषि को विवश हो चक्षु खोलने पड़े और कालयवन भस्म हो गया। ज्ञान के सम्मुख योगेश्वर की साक्षी में अहंकार को भस्म तो होना ही था।

कृष्ण स्वार्थ के लिए नहीं सर्वार्थ के लिए लड़ रहे थे। यह ‘सर्व’ समष्टि से तात्पर्य रखता है। यही कारण था कि रणकर्कश ने समष्टि के हित में रणछोड़ होना स्वीकार किया।

भगवान भलीभाँति जानते थे कि आज तो येन केन प्रकारेण वे असुरी शक्ति से लोहा ले लेंगे पर कालांतर में जब वे नहीं होंगे और प्रजा पर इस तरह के आक्रमण होंगे तब क्या होगा? ऋषि मुचुकुंद को जगाकर कृष्ण आमजन में अंतर्निहित सद्प्रवृत्तियों को जगा रहे थे, किसी कृष्ण की प्रतीक्षा की अपेक्षा सद्प्रवृत्तियों की असीम शक्ति का दर्शन उसे करवा रहे थे।

स्मरण रहे, दुर्जनों की सक्रियता नहीं अपितु सज्जनों की निष्क्रियता समाज के लिए अधिक घातक सिद्ध होती है। कृष्ण ने सद्शक्ति की लौ समाज में जागृत की।

प्रश्न है कि कृष्णनीति की इस लौ को अखंड रखनेवाले के लिए हम क्या कर रहे हैं? हमारी आहुति स्वार्थ के लिए है या सर्वार्थ के लिए? विवेचन अपना-अपना है, निष्कर्ष भी अपना-अपना ही होगा।

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ श्रवण मास साधना सम्पन्न हुई। अगली साधना की जानकारी आपको शीघ्र दी जाएगी 💥 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 204 – “मौन रह कर हर तरफ…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत मौन रह कर हर तरफ...)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 205 ☆।। अभिनव गीत ।। ☆

☆ “मौन रह कर हर तरफ...” ☆ श्री राघवेंद्र तिवारी 

 सालते है बहुत

हर दिन दर्द घुटनो के

टूटते रिश्ते लगें

जैसे कि अपनों के

 *

सुबह उठ कर खाट

से चलते नही बनता

है जगत व्यवहार जो

कहते नहीं बनता

 *

पीर जो उतरी पिंड –

लियों से यहाँ तक

आ लगी है सालने

कमजोर टखनों के

 *

इस मोहल्ले में सभी

के दर्द पहचाने

तैरते हैं सभी शक्लों

पर न जाने

 *

क्यों लिये परछा –

इयाँ हैं चले आते

बताकर हम आ गये

हैं शहर सपनो के

 *

मौन रह कर हर तरफ

है बेबसी पसरी

लगा करता समस्या

की हर परत उघरी

 *

कसमसाहट है मगर

कुछ कर नहीं पाते

हम बचे हैं क्षीण से

परिमाप .नपनों के

©  श्री राघवेन्द्र तिवारी

25-8-2024

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष – सौ पंखुरी वाले कमल हैं, कृष्ण… ☆ श्री प्रभाशंकर उपाध्याय ☆

श्री प्रभाशंकर उपाध्याय

(श्री प्रभाशंकर उपाध्याय जी व्यंग्य विधा के सशक्त हस्ताक्षर हैं। हम श्री प्रभाशंकर उपाध्याय जी के हृदय से आभारी हैं जिन्होने ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के साथ अपनी रचनाओं को साझा करने के हमारे आग्रह को स्वीकार किया। आप कई पुरस्कारों /अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपकी विशिष्ट साहित्यिक सेवाओं पर राजस्थान साहित्य अकादमी का कन्हैयालाल सहल पुरस्कार प्रदत्त।

आज प्रस्तुत है श्रीकृष्ण जन्माष्टमी पर विशेष आलेख सौ पंखुरी वाले कमल हैं, कृष्ण।)

 ☆ आलेख ☆ श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष – सौ पंखुरी वाले कमल हैं, कृष्ण… ☆ श्री प्रभाशंकर उपाध्याय ☆ 

 

यदि कृष्ण के बारे में सोचें तो एक ऐसे शिशु के बारे में विचारें जिसके जन्म से पूर्व ही उसकी हत्या कर डालने को सत्ता कृत संकल्प है। सत्ताधारी इतना व्यग्र्र है कि उसके जन्म की सूचना मिलते ही, वह वध कर देने को आतुर हो उठता है। कृष्ण के बारे में सोचने से पूर्व उस नवजात अबोध के बारे में विचार करें जिसे जन्मते ही मां से विलग होना पड़ा। झूला झूलने की उम्र में पालने से उसका अपहरण करके मारने का प्रयास किया गया था। कृष्ण एक ऐसा बालक था जिसे काले रंग का तंज बार बार सुनना पड़ा। जिसे बालपन में चोर और महाशरारती करार दिया गया और उसकी सजा उसे दसियों दफा पड़ी थी।

उसी उपेक्षित कान्हा ने जब जीवन के उन सारे नकारात्मक पहलुओं को ध्वत करते हुए स्वयं का ऐसा उत्कर्ष किया कि गोकुल तो मंत्र मुग्ध हुआ ही, शनैः शनैः समूचा विश्व उसके व्यक्तित्व की आभा से चकाचौंध हो गया। कृष्ण एक त्याज्य शिशु से महानायक हो गए। संसार के सारे मिथक, इतिहास और सभी लोक गाथाएं खंगाल लें तो अवसादग्रस्त और अकर्णमण्य की दशा भुगत रहे लोगों को बाहर लाने तथा घबराए, हताश हुए जीव को प्रेरणा देने वाली गोविंद-गाथा के अतिरिक्त ऐसी और कोई गाथा नहीं मिलेगी। कान्हा से श्रीकृष्ण हो जाने की प्रेरक कथा बहुतेरे निहितार्थ सामने लाती है। जीवन से हारे हुओं हेतु आशा का मार्ग प्रशस्त करती है।  

गोकुल में ग्वाल-बालों के संग गाय चराते, खिलंदड़ी करते, माखन चुराते, मटकी फोड़ते, गोपिकाओं को छकाते, वस्त्रहरण करते, नटखट कन्हैया सबका मन मोह कर, मोहन हो जाते हैं। आयु बढने पर राधा और सखियों के संग रास रचाते, रसेश्वर होते हैं तो उलटबांसी यह कि बावजूद इसके वे योगेश्वर(योगीराज) भी हैं।

अनूठा और अप्रतिम चरित है कृष्ण का। जब, मुरलीधर होकर मुरली की तान छेड़ी तो जड़ और चेतन सब कुछ सम्मोहित हो गया। दिक्-दिगांत में अनहद गूंज उठा। समस्तराग-रागनियां ब्रज मंडल में प्रवेश कर समाहित हो गयीं।

श्याम-श्यामा का प्रेम और गोपियों का सखी भाव ऐसा कि वे भाव, विश्व व्यापी हो गए।

और जब उस लीलाधर ने प्राणियों की रक्षार्थ गिरिवर को अपनी अंगुली पर उठाकर, देवेंद्र को चुनौती देते हुए जता दिया कि ये तो उनकी चिटकी अंगुली का खेल है तो वे गिरधारी कहाए।

तदुपरांत, राधारमण बांके बिहारी ब्रज में विरह-वेदना का संचार कर, रसेश्वर से योगेश्वर हो गए। एक ऐसा निर्मोही योगी जो एक बार मथुरा गया तो फिर न लौटा क्योंकि यदि वह विराग न होता तो बांसुरी छोड़ सुदर्शन कैसे थामते? अन्याय और अनाचार का प्रतिकार कैसे करते? ऐसे वियोग के बाद भी कृष्ण ब्रज में न होकर भी वहां के कण कण में आज भी रचे बसे हैं।

आततायी मामा के वध के उपरांत वे द्वारिकाधीश हुए। राजा होकर सुदामा सरीखे निर्धन सखा को विस्मृत नहीं किया। यही मैत्री-भाव अर्जुन के प्रति रखा और उसके दिगभ्रमित होने पर दिग्दर्शन देते हुए कहा- ‘‘जब जब धर्म की हानि होती है और अधर्म का अभ्युदय होता है, तब तब मैं स्वयं का सृजन करता हूं।’’ और अपना विराट स्वरूप प्रदर्शित कर वे कोटिसूर्य समप्रभा कहाए।’’

© प्रभाशंकर उपाध्याय

सम्पर्क : 193, महाराणा प्रताप कॉलोनी, सवाईमाधोपुर (राज.) पिन- 322001

मो. 9414045857, 8178295268

 

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २६ – “यादों में रहते हैं सुपरिचित कवि स्व चंद्रकांत देवताले” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

श्री जय प्रकाश पाण्डेय

(श्री जयप्रकाश पाण्डेय जी की पहचान भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी के अतिरिक्त एक वरिष्ठ साहित्यकार की है। वे साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। उनके  व्यंग्य रचनाओं पर स्व. हरीशंकर परसाईं जी के साहित्य का असर देखने को मिलता है। परसाईं जी का सानिध्य उनके जीवन के अविस्मरणीय अनमोल क्षणों में से हैं, जिन्हें उन्होने अपने हृदय एवं साहित्य में  सँजो रखा है।

ई-अभिव्यक्ति में प्रत्येक सोमवार प्रस्तुत है एक नया साप्ताहिक स्तम्भ कहाँ गए वे लोग के अंतर्गत इतिहास में गुम हो गई विशिष्ट विभूतियों के बारे में अविस्मरणीय एवं ऐतिहासिक जानकारियाँ । इस कड़ी में आज प्रस्तुत है  – “यादों में रहते हैं सुपरिचित कवि स्व चंद्रकांत देवताले)

आप गत अंकों में प्रकाशित विभूतियों की जानकारियों के बारे में निम्न लिंक पर क्लिक कर पढ़ सकते हैं –

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २ ☆ डॉ. राजकुमार तिवारी ‘सुमित्र’ ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ३ ☆ यादों में सुमित्र जी ☆ श्री यशोवर्धन पाठक ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ४ ☆ गुरुभक्त: कालीबाई ☆ सुश्री बसन्ती पवांर ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ५ ☆ व्यंग्यकार श्रीबाल पाण्डेय ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ६ ☆ “जन संत : विद्यासागर” ☆ श्री अभिमन्यु जैन ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ७ ☆ “स्व गणेश प्रसाद नायक” – लेखक – श्री मनोहर नायक ☆ प्रस्तुति  – श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ८ ☆ “बुंदेली की पाठशाला- डॉ. पूरनचंद श्रीवास्तव” ☆ डॉ.वंदना पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ९ ☆ “आदर्श पत्रकार व चिंतक थे अजित वर्मा” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ११ – “स्व. रामानुज लाल श्रीवास्तव उर्फ़ ऊँट बिलहरीवी” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १२ ☆ डॉ. रामदयाल कोष्टा “श्रीकांत” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆   

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १३ ☆ स्वतंत्रता संग्राम सेनानी, लोकप्रिय नेता – नाट्य शिल्पी सेठ गोविन्द दास ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १४ ☆ “गुंजन” के संस्थापक ओंकार श्रीवास्तव “संत” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १५ ☆ स्वतंत्रता संग्राम सेनानी, कविवर – पंडित गोविंद प्रसाद तिवारी ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १६ – “औघड़ स्वाभाव वाले प्यारे भगवती प्रसाद पाठक” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆ 

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १७ – “डॉ. श्री राम ठाकुर दादा- समाज सुधारक” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १८ – “राजकुमार सुमित्र : मित्रता का सगुण स्वरुप” – लेखक : श्री राजेंद्र चन्द्रकान्त राय ☆ साभार – श्री जय प्रकाश पाण्डेय☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १९ – “गेंड़ी नृत्य से दुनिया भर में पहचान – बनाने वाले पद्मश्री शेख गुलाब” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २० – “सच्चे मानव थे हरिशंकर परसाई जी” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २१ – “ज्ञान और साधना की आभा से चमकता चेहरा – स्व. डॉ कृष्णकांत चतुर्वेदी” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २२ – “साहित्य, कला, संस्कृति के विनम्र पुजारी  स्व. राजेन्द्र “रतन”” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २३ – “मेरी यादों में, मेरी मुंह बोली नानी – सुभद्रा कुमारी चौहान” – डॉ. गीता पुष्प शॉ ☆ प्रस्तुती – श्री जय प्रकाश पांडे ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २४ – “संस्कारधानी के सिद्धहस्त साहित्यकार -पं. हरिकृष्ण त्रिपाठी” – लेखक : श्री अजय कुमार मिश्रा ☆ संकलन – श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २५ – “कलम के सिपाही – मुंशी प्रेमचंद” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

स्व चंद्रकांत देवताले

☆ कहाँ गए वे लोग # २६ ☆

☆ यादों में रहते हैं सुपरिचित कवि स्व चंद्रकांत देवताले☆ श्री जय प्रकाश पाण्डेय

म.प्र.के बैतूल जिले के  एक गांव में 07.11.1936 को चंद्रकांत देवताले का जन्म हुआ था। वे जितने उम्दा कवि-लेखक, समीक्षक थे, उतने ही सरल और फक्कड़ इंसान थे। अस्सी बरस की आयु पूरी कर वे 14 अगस्त 2017 को वे इस दुनिया को अलविदा कह कर चले गए।

      मैं आता रहूंगा 

      उजली रातों में 

      चन्द्रमा को गिटार सा बजाऊंगा 

       तुम्हारे लिए 

वे आधुनिक जीवन की विविधताओं और विडम्बनाओं  के ऐसे कवि हैं जिनकी जड़ें गांव कस्बों के निम्न मध्यवर्गीय जीवन में थीं। उनके काव्य संग्रह के नाम कुछ तरह के हैं ‘हड्डियों में छिपा ज्वर,’ ‘लकड़बघ्घा हंस रहा है,’ ‘भूखंड तप रहा है,’ ‘रौशनी के मैदान की तरफ़,’ ‘आग हर चीज़ में बताई गयी थी,’ ‘पत्थर की बेंच,’ ‘इतनी पत्थर रौशनी,’ ‘उजाड़ में संग्रहालय,’ ‘बदला बेहद मंहगा सौदा’ …. वे ऐसे तो वर्ष 1954 से कविता लिख रहे थे; पर उनकी पहचान साठोत्तरी पीढ़ी के कवियों के साथ जुड़ी थी| विभिन्न भारतीय भाषाओं के साथ-साथ विदेशी भाषाओं में भी देवताले की कविताएं अनूदित हुईं हैं। वे लम्बे समय तक प्रेमचंद सृजनपीठ’ उज्जैन के निदेशक भी रहे। मध्य प्रदेश शासन के ‘शिखर सम्मान,’ ‘मैथिलीशरण गुप्त सम्मान के साथ-साथ ‘पहल सम्मान’ और ‘सृजन भारती’ सम्मान से सम्मानित देवताले जी ने दिलीप चित्रे की प्रतिनिधि  कविताओं का मराठी से अनुवाद भी किया था। उन्होंने कविताओं में अपनी बात बहुत आत्मीयता के साथ,लेकिन सीधे और मारक तरीके से कही है, उनकी एक कविता ‘अन्तिम प्रेम’ की चार पंक्तियां…

“ऐसे ज़िंदा रहने से नफ़रत  है मुझे

जिसमें हर कोई आए और मुझे  अच्छा कहे

मैं हर किसी की तारीफ़  करते भटकते रहूँ

मेरे दुश्मन न हों

और इसे मैं अपने हक़ में बड़ी  बात मानूं”

श्री जय प्रकाश पाण्डेय 

416 – एच, जय नगर, आई बी एम आफिस के पास जबलपुर – 482002  मोबाइल 9977318765

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares