मराठी साहित्य – विविधा ☆ एका कथानायिकेचं दुसऱ्या कथानायिकेला पत्र… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?विविधा ?

☆ एका कथानायिकेचं दुसऱ्या कथानायिकेला पत्र… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

(एका पुस्तकातल्या कथानायिकेनं दुसऱ्या पुस्तकातल्या कथानायिकेला लिहिलेलं पत्र…)

‘पारुल‘ या हर्ष देहेजिया यांच्या अनुवादित पुस्तकातली *पारुल* ही कथानायिका आणि पु. शी. रेगे यांच्या ‘ सावित्री ‘ या पुस्तकातली *सावित्री* ही कथानायिका )

प्रिय सावित्री,

जितक्या सहजपणे मी तुला एकेरी प्रिय संबोधते तितक्याच सहजतेनं मी तुला आलिंगनही देते. आश्चर्य वाटलं असेल ना तुला? मी कोण, कुठली, तुला माहितही नाही तरीही तुला पत्र लिहिते, अनोळखी असूनही प्रेमानं आलिंगन देते. खरंय ते! अगं तुलाच काय, मलाही आश्चर्य वाटलं की, मी अशी काय वागतेय. जरी माझा स्वभाव मनमोकळा असला तरीही मी इतकी आपलेपणानं पहिल्यांदा कुणाशीच बोलत नाही. पण ही किमया मात्र तुझी आहे. तुझ्या स्वभावाची, तुझ्या व्यक्तिमत्त्वाची. आता माझी ओळख करून देते हं. अगं ही ओळख म्हणजे तरी काय? निव्वळ आपल्या सगुण अस्तित्वाचे दाखले देणं इतकंच. माणूस माणसाला ओळखायच्या आधी त्याला समजावा लागतो अन मग त्या समजण्याचं सवयीत रूपांतर झालं की तो ओळखता येतो. अशी ओळख आपली बहुदा या पत्र व्यवहारातूनच होईल.

अगं, हे सगळं बोलण्याच्या नादात तुला सांगायला विसरलेच की, मी कोण ते. मी पारुल. उत्तर भारतात राहते. एकटीच असते. हा एकटेपणा हीच खरंतर माझी मोठी ओळख. माझी कथा तुला सांगेनच नंतर कधी पण तुझी कथा जशी मला समजली तसं न राहवून मी तुला हे पत्रं लिहलं. खरंतर तुझं-माझं आयुष्य खूप वेगळं आहे. जणूकाही एका नदीचे आपण दोन काठ आहोत, समांतर असूनही कधीच न भेटणारे. खळाळणारी जीवनदायिनी नदी हीच काय ती आपल्याला जोडणारी आणि म्हणलं तर अलगही करणारी. त्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सुखदुःखात सुद्धा फरक आहे. अगं, इतकंच काय आपल्या विचारांत, जगण्यातदेखील फरक आहे. आपण दोघी वेगवेगळ्या स्वभावधर्माच्या आहोत. तू अत्यंत संयमी, प्रसंगी विरक्त आणि अत्यंत बुद्धिप्रामाण्यवादी आहेस. प्रवाहात ओली झालीस तरी तुझा काठ विरघळू देत नाहीस. तर मी काठाचं भान विसरत अधिकाधिक नदीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. तुझ्या घरात शिक्षणाचा वारसा आहे. वाचन संस्कार आहे. याउलट माझं घर साधं आहे, जीवनही साधं आहे. पतीच्या मृत्यू पश्चातलं एकाकीपण आहे. तुझ्याइतका काही शिक्षणाचा, बुद्धिप्रामाण्यवादाचा माझ्याशी संबंध आला नाही. सावित्री, तू ठरवून एखाद्या दिशेने प्रवास करणारी आहेस, तीरावर येणाऱ्या लाटांना सजगपणे सामोर जाणं तुझं ध्येय आहे. तुझ्या काठांवर उमटणारी पावलं किती खोल उमटु द्यावीत… हे तू ठरवतेस. माझं तसं नाही माझ्या काठावरची पाऊलं पाण्याच्या स्पर्शाने काठोकाठ भरतात आणि धडकणाऱ्या लाटांनी चिंब झाली की त्यातल्या ओलाव्यानं थोडी विरघळतात. माझं अस्तित्व विलीन होण्यात मी धन्यता मानते.

तुझं प्रेम… तुझा त्याग हा खरंच विशाल आहे. तुझ्या विचारांची अमर्याद ताकद हे स्त्रीत्वही जपते. तू निर्गुण निराकार प्रेमाला स्वतःत मुरवून घेतलंस तू अद्वैत साधलंस. मी सगुण प्रेमाच्या सहाय्याने निर्गुणाला शोधलं. जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा उपभाग घेऊन विलासिनी स्वरूपात मी स्वतःला साकारलं. अद्वैत साधण्यासाठी मला संघर्ष करावा लागला. मला बुद्धीशी झगडा करावा लागला. मला स्पर्शाचा आधार घ्यावासा वाटला. जीवनाचं उद्दिष्ट जसं मला कळलं तसं मला निर्गुणाचा महत्त्व कळलं. तू तर हे पहिल्यापासून जाणूनच होतीस. विचारांच्या सहाय्याने तू दोन पावलं पुढं होतीस. तरीही एक जाणवतं… तुझ्या-माझ्यात एकचं साम्य आहे, कदाचित तो जीवनदायीनीचा संगत असर असावा. नितळ, तरलता मिळवण्याची आशा. प्रेम हे जगण्याचं कारण असणं तरीही कर्तव्यपूर्तीची ओढ असणं.

अजून काय सांगू, एकाच भेटीत किती बोलावं. जे बोललेय ते तरी तर्कसंगत आहे की नाही, तेही माहित नाही. पण दोन्ही काठाचं प्रतिबिंब सामावणारी ती जीवनदायीनी आपला संवाद घडवून आणेल हे नक्की. म्हणजे निदान आता एकमेकांवर आदळणाऱ्या लाटा तरी परिचयाच्या असतील.

तुझी पारुल.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शून्याच्या आत… – भाग 1 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? जीवनरंग ?

शून्याच्या आत… – भाग 1 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

डॉ हंसा दीप

शहराजवळ एक पशु-पक्षी विहार होता, ज्याची स्तुती अनेकांकडून ऐकली होती. भारतातून एक मित्र आले होते, तेंव्हा विचार केला, की त्यांना आधी तिथेच घेऊन जावं दाखवायला. सकाळी नाश्ता करून आम्ही तिथे पोचलो, तर गेटवरच एक मोठी पाटी दिसली. तिथे लिहिलं होतं, की “पशु पक्ष्यांना काहीही खायला घालू नये. प्रवेशासाठी काही तिकीट नाही. आपण देणगी देण्यास उत्सुक असाल, तर देऊ शकता, पण या विहाराची कथा जरूर ऐका किंवा वाचा”

आम्ही आत जाऊन पुढे चालू लागलो. मधे बनवलेल्या लांब-लांब गोलाकार रस्त्यांवरून जाताना कित्येक प्राण्यांची एक वेगळीच दुनिया दिसत होती. उजवीकडे तारांच्या कुंपणापलीकडे वेगवेगळ्या जातींचे प्राणी समूह आपापल्या सीमांमध्ये विहरताना दिसत होते. आणि डाव्या बाजूला कित्येक वृक्षांवर अगणित पक्षी बसलेले दिसत होते. त्यांच्यासाठीच खास बनवलेल्या त्या जंगलात ते त्यांचं नैसर्गिक जीवन जगत होते. या पक्ष्यांचा कलकलाट, शिवाय आणखीही वेगवेगळे आवाज मिळून एक वेगळंच वातावरण निर्माण झालेलं होतं

पक्ष्यांची, प्राण्यांची मस्ती बघून असं वाटत होतं, की इथे त्यांची चांगली काळजी घेतली जात असणार. प्रत्येक प्रकारच्या प्राण्यांसाठी वेगवेगळी घरे केलेली होती. मांजरांसाठी वेगळी, कुत्र्यांसाठी वेगळी आणि रॅकून या प्राण्यांसाठी वेगळी घरे होती. या अतिशय सुंदर अशा नैसर्गिक ठिकाणी वेगवेगळ्या प्रजातीच्या इतक्या साऱ्या प्राण्यांना एकाच वेळी बघणं हा एक वेगळाच अनुभव होता.

चालून फिरून दमल्यावर मग एका ठिकाणी बसून आम्ही बरोबर आणलेले खाण्याचे पदार्थ खाऊन घेतले. इथे प्राणी बघत फिरणं हा फार आनंददायक अनुभव होता, पण फिरून फिरून आता आम्ही थकलो होतो. हे तर आधीच ठरवलं होतं, की या प्राणी संग्रहालयाची कथा वाचून मगच तिथून परत फिरायचं. काही लोक तिथे तो ऑडिओ ऐकत होते, तर काहीजण वाचत एकमेकांशी त्यावर बोलत होते. माझ्या मित्राने ऑडिओ ऐकायला सुरुवात केली आणि मी वाचू लागले.

तिला सर्वजण कुमुडी म्हणत असत. कुमुडी हे नाव ऐकायला विचित्रच वाटतं, पण आपल्याकडे चांगल्या नावांची तोडमोड करून, टोपणनावं कशी तयार होतात, याचं हे एक चांगलं उदाहरण होतं. ही कुमुडी श्रीलंकेत जन्मली होती. लहान असतानाच आई-वडिलांबरोबर न्यूझीलंडला जाऊन राहिली होती. आणि नोकरी लागल्यामुळे कॅनडामधल्या टोरांटो शहरात येऊन स्थिरावली होती.

कुठे उगवलेलं बी, कुठे जाऊन रुजलं आणि कुठे जाऊन त्याचा वृक्ष फोफावला, त्याचा विस्तार झाला पहा!

वेगवेगळ्या देशांच्या विविधतेला साजेशी रूपं तिच्या नावाने धारण केली. कौमुदी चं कोमुडी, आणि कोमुडीचं शेवटी कुमुडी! तिची मूळं श्रीलंकेशी जोडलेली होती त्यामुळे हे कळणं सोपं होतं, की तिच्या घरात तामिळ भाषा बोलली जात असणार. हे नाव संस्कृत, तामिळ किंवा हिंदी मधून आलेलं असणार, हे भाषा विज्ञान सांगेल. पण तिचं कुटुंब मूलतः तामिळभाषीच होतं. किती एक भाषा आणि संस्कृतींच्या मिलाफाने तयार झालेल्या या सुंदरशा नावाने अनेक देशांच्या सीमा पार करत हे नावाचं नवंच रूप धारण केलेलं होतं. हिंदी-तामिळ भाषिक लोकांची इंग्लिश बोलण्याची ढब थोडी वेगळी असते, त्याला हे लोक हसत असतात, त्यांची चेष्टा करतात. पण अशा सुंदर नावांचा कचरा करण्यात या लोकांचा कोणी हात धरु शकत नाही. तर, कौमुदीचं आता कुमुडी झालेलं होतं.

असो, तर या बदललेल्या नावाचं तिला स्वतःला काही फार वाईट वाटत नव्हतं. कारण, शाळेपासून तर करिअरच्या या उच्च शिक्षणापर्यंत तिला अशाच वेगवेगळ्या नावांनी बोलावलं जात होतं. आणि तसंही नावात एवढं काय ठेवलेलं होतं! ती तर नेहमीच तिच्या कामासाठीच ओळखली जात असे. तिचं व्यक्तिमत्व तिच्या कौमुदी नावाला साजेसं होतं. अत्यंत शालीन, सौम्य, साधा, सरळ स्वभाव तर होताच तिचा, शिवाय, ती एक समर्पित, निष्ठावान डॉक्टर होती. जे काही करायची, ते पूर्ण मनापासून करायची. आपल्या स्वतःच्या खास अशा पद्धतीने, दहा मिनिटांच्या कामासाठी अर्धा तास सुद्धा घालवत असे. मग पुढचं काम, मग त्याच्या पुढचं, अशा प्रकारे तिची अनेक कामं तिची वाट बघत असायची. एका पाठोपाठ एक उरत गेलेल्या कामांची यादी वाढतच जायची.

यात कोणी तिची चूक आहे, असे मानत नसे. कारण जेंव्हा ते काम संपायचं तेंव्हा ते परिपूर्ण झालेलं असायचं. तिचे सगळे पेशंट तिच्यावर खुश असायचे. ती नेहमीच आपलं सर्वोत्तम द्यायची आणि त्या बदल्यात तिला जी तृप्ती मिळायची, ती अनमोल असायची. वेळाच्या या मारामारीत तिला रात्री उशिरापर्यंत जागून कामं निपटावी लागत असत. शरीर थकून जात असे, आणि मेंदूची विचार करण्याची क्षमता नष्ट होण्याची वेळ येत असे, तेंव्हा कुठे ती जाऊन झोपत असे. यामुळे तिची तब्येत, शरीरातला प्रत्येक अवयव बंड करून उठत असे, पण तिची कामं काही संपायची नाहीत. तिच्या विभागात “आज कुमुडी आली नाही” “परत आली नाही” “अजबच आहे, इतकी कशी आजारी पडते?” “आजारी आहे, सांगितलं होतं की” असे संवाद नेहमी ऐकू येत असत.

हॉस्पिटलमधल्या एका समर्पित डॉक्टरसाठी हे असे प्रश्न विचारणाऱ्यांनाही त्यांचं उत्तर माहितीच असायचं. सगळे तिचे प्रशंसकच होते. तिची काम करण्याची मंद गती तिच्या सहकाऱ्यांना त्रासदायक वाटायची, तरीही त्या सगळ्यांना ती आवडत असे. तिचं समर्पण स्वतःच बोलत असे. एकदम निस्वार्थी आणि दृढ होतं ते समर्पण! सगळे तिच्यावर प्रेम करत असत. त्यांनी एक हात जर तिला मदतीचा दिला, तर ती दोन्ही हातांनी त्यांच्या मदतीस धावून जात असे. टेक्निक फार जलद गतीने बदलत होतं. तिला कित्येक वेळा आपल्या तरुण अशा दुय्यम सहकाऱ्यांना बरंच काही विचारावं लागत असे, पण नवं शिकताना तिला कधी संकोच वाटत नसे.

तिच्या सहकाऱ्यांना एकाच गोष्टीचं वाईट वाटत असे, की ती अगदी एकटी होती, तरी ती कधीच काही बोलत नसे. आपल्या पंचविसाव्या वर्षापासून पन्नासाव्या वर्षापर्यंत आपल्या खांद्यांवर सगळ्या कुटुंबाचा भार घेऊन वाटचाल करत राहिली होती ती. घरातली सगळ्यात मोठी मुलगी असल्यामुळे घराची सगळी जबाबदारी तिने स्वतःवर घेतलेली होती. वयस्क आई-वडिलांबरोबरच वाढत्या वयाच्या भावा बहिणींची पण काळजी घ्यायला लागत होती. टोरंटोहून न्यूझीलंडला कित्येकदा महिन्यातून दोन वेळा जावं लागत असे. खरं तर तिला न्यूझीलंड मधेही नोकरी मिळू शकली असती, पण तिला कॅनडा आणि तिथली कार्यपद्धती खूप आवडू लागली होती. या जमिनीत तिची मूळं जणू घट्ट रुजली होती, इतकी, की या देशाचा तिने आपली कर्मभूमी म्हणून जन्मभरासाठी स्वीकार केलेला होता. हा देश तिच्यासाठी जणू सोयी-सुविधांचा वर्षाव घेऊन आला होता. म्हणून तिला तो देश सोडायचा नव्हता. कुटुंबाबद्दलची तिची काळजी बघून सगळे थक्क होत असत. एक पाय टोरंटोमधे तर एक ऑकलंडमधे असायचा तिचा. एक वरिष्ठ डॉक्टर असल्याने चांगला पैसा कमवत असे ती, परंतु, तिला कायमच पैशांची तंगी जाणवत असे. कारण, तिच्या पगाराचा मोठा हिस्सा कॅनडा ते न्यूझीलंड या प्रवासातच खर्च होत असे. तिच्या खांद्यांवरचं हे शारीरिक व आर्थिक ओझं काही वेळा तिला पेलतही नसे. आपल्या क्षमतांकडे दुर्लक्ष करून ती एका पाठोपाठ एक जबाबदाऱ्या पार पाडत गेली आणि प्रत्येक पावलाबरोबर आपलं शरीर या भाराने दमत चाललं आहे, हे जाणवूनही त्याकडे दुर्लक्ष करत राहिली. आई-वडिलांच्या मृत्यू नंतरही दोन्ही बहिण भावांना स्थिर-स्थावर करून देण्यात पुढची पाच वर्षं गेली तिची. आता मात्र तेच भाऊ बहिण आपापल्या मुला-बाळात, आपल्या परिवारात गुन्तून गेले आहेत.

– क्रमशः भाग पहिला 

मूळ कथा : शून्य के भीतर – डॉ. हंसा दीप. कॅनडा

मराठी भावानुवाद  –  सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गळून पडलेली फुलं – लेखक : अज्ञात – संकलक : प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ गळून पडलेली फुलं – लेखक : अज्ञात – संकलक : प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

चालणे ही एक सामान्य क्रिया आहे. पण चालण्याचं सौंदर्य हे आहे की आपल्या आजूबाजूला घडत असलेले जीवन पाहता येते.

मी रोज सकाळी फिरायला जातो, तेव्हा मला एक वृद्ध गृहस्थ झाडाखाली पडलेली फुले उचलून मंदिरात दर्शनासाठी टोपलीत ठेवताना दिसतात. त्यांचा हा उपक्रम माझ्यात कुतूहल निर्माण करत होता.

एका सकाळी, मी त्यांना पुन्हा तेच करताना पाहिले आणि मी माझी उत्सुकता शांत करण्याचा निर्णय घेतला. मी त्यांना गळून पडलेल्या फुलांच्या ध्यासाबद्दल विचारले की इतर वृद्ध लोक तर ताजी फुले तोडतात.

मी त्याला विचारले, “सर, मी तुम्हाला नेहमी जमिनीवरून ही ताजी पडलेली फुले उचलताना पाहतो. तुम्ही त्यांचे काय करता?”

“मी ही फुले माझ्या पूजेच्या खोलीत देवतांच्या चरणी अर्पण करतो, ” त्याने अतिशय शांतपणे उत्तर दिले.

मी पहिल्यांदाच असं काही ऐकलं होतं. म्हणून, मी त्याला पुन्हा विचारले, “तुमची काही हरकत नसेल, तर मी तुम्हांला विचारू का की, झाडावर सहज तोडता येणारी फुले असताना तूम्ही ही पडलेली फुले देवाला का अर्पण करता ?”

त्याच्या उत्तराने मी थक्क झालो, “मी फुलांना त्यांचा उद्देश पूर्ण करण्यास मदत करतो – त्यांच्या शेवटच्या दिवसात देवासोबत राहण्याचा. त्यांनाही जीवन आहे; आमच्याप्रमाणे त्यांनाही त्यांच्या शेवटच्या दिवसात देवासोबत राहायचे आहे, नाही का? ” त्याने मला विचारले. मी सहमती दर्शविली.

मग तो म्हणाला, “काही लोक ज्या कळ्या अजून फुलल्या नाहीत अशा कळ्या खुडतात आणि काही फक्त नुकत्याच फुललेल्या कळ्या काढतात, त्यांना त्यांचा सुगंधही सोडू देत नाहीत किंवा त्यांचे जीवन जगू देत नाहीत. प्रत्येकजण जे सुंदर आहे ते ओरबाडतो आणि त्यातून वनस्पतीचे सौंदर्य काढून घेतो. मग पहा, ही झाडे कशी दिसतात – रंगहीन आणि निर्जन. “

तो पुढे म्हणाला, “प्रत्येक फुलाचा एक उद्देश असतो, देवासोबत राहण्याचा. प्रत्येकजण झाडांवर असलेली फुले घेतो, पण मी ती निवडत नाही. ती गळून पडणे हा फुलांचा दोष नाही. या म्हातारपणात मी कुणालाही साथ देऊ शकत नाही, पण किमान या फुलांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी मदत करू शकतो. “

मी फक्त होकार दिला, हसलो त्यांना शुभेच्छा दिल्या आणि चालू लागलो. मी चालत होतो तेव्हा माझे मन धावत होते. या नव्या प्रेरणेने आणि कल्पनेने मी निश्चय केला की यापुढे पूजेसाठी फक्त पडलेली फुले गोळा करावयाची.

दुसऱ्या दिवशी सकाळी फिरण्यासाठी गेलो असता एका झाडाखाली पडलेली फुलं मी फुलं उचलून तळहातावर ठेवली. फुले तळहातावर फुले ठेवताच, मला अंगावर रोमांच आले आणि माझे हृदय धडधडू लागले. माझ्या शरीरासाठी या फुलांबद्दल मला वाटणारा तो एक वेगळाच अनुभव होता. मी ती फुले घरी आणली, धुऊन ती कुठे असावीत तिथे म्हणजे परमेश्वराच्या चरणी ठेवली!

हा संपूर्ण अनुभव फक्त अप्रतिम होता. मला आतून खूप छान वाटलं. मला असे वाटले की मी कोणाचा तरी जीव वाचवला आहे किंवा एखाद्याला त्याच्या दुःखातून बाहेर येण्यास मदत केली आहे. फुलांचे असे समाधान मला यापूर्वी कधीच जाणवले नव्हते. आणि मला वाटते की मी असेच करत रहावं.

जे अकाली पडले आहेत त्यांना उचलून योग्य जागी ठेवा.

आयुष्यात आपल्याला नेहमी चांगल्या आणि सुंदर लोकांच्या आसपास राहायचे असते. आपल्या उंचीच्या लोकांबरोबर आपल्याला स्वतःला पहायचे असते आणि जे आपल्या उंचीच्या खाली आहेत, त्यांना आपल्यापेक्षा खाली बघायचे असते. पण, खरे समाधान तेव्हा मिळते जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो, त्यांचे जीवन चांगले बनवतो आणि त्यांना आनंद आणि आनंद साजरा करण्यास मदत करतो. – मग तो माणूस, प्राणी, पक्षी किंवा इतर कोणत्याही प्रकारचे जीवन असो. मग फुले का नाहीत? जे पडले आहेत पदभ्रष्ट आहेत त्यांना उचला मार्गी लावा” आणि पहा तुम्हाला स्वतःला उंचावल्यासारखे वाटेल.

लेखक : अज्ञात 

संकलन : प्रा. माधव सावळे 

संग्रहिका – सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सैनिकांसाठी श्वास… ध्यास आमुचा ! – भाग-२ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ सैनिकांसाठी श्वास… ध्यास आमुचा ! – भाग-२  ☆ श्री संभाजी बबन गायके 

सैनिकांसाठी श्वास… ध्यास आमुचा !

… अर्थात गिरीशिखरांच्या भाळी श्वासगंध रेखताना…! 

श्री. योगेश चिथडे आणि सौ. सुमेधा चिथडे यांनी सियाचीन मधील सैनिकांसाठी ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारून देण्यासाठी केलेल्या भगीरथ प्रयत्नांची कहाणी!

(पण सत्य संकल्पाचा दाता नारायण या उक्तीनुसार जनता-जनार्दनाने मदतीचे अनेक हात पुढे केले. आणि अथक प्रयत्नांतून आवश्यक रक्कम उभी राहिली. ) – इथून पुढे)

या कामासोबतच प्रशासन, सेनादल यांचेशी समन्वय साधणे, विविध परवानग्या मिळवणे इत्यादी कामे अतिशय चिकाटीने आणि ध्यासाने पूर्ण केली! हत्ती जाईल पण शेपूट जाणार नाही अशी लूप-होल्स सर्वच ठिकाणी अनुभवाला येतातच. यावर जिद्द आणि आपल्या कामावरील विश्वास हाच उपाय! 

ऑक्सिजन निर्मिती संयंत्र जर्मनीहून आणले. त्यासाठी सर्व सोपस्कार, औपचारीकता पूर्ण केल्या. यंत्रसामग्री सियाचीन परिसरात पोहोचवणे मोठे कठीण! विमानात चढवलेले साहित्य कैक वेळा खराब हवामानामुळे पुन्हा उतरवून खाली ठेवावे लागत होते. यात चिथडे साहेबांनी सियाचीन परिसरात अनेक वेळा प्रवास आणि मुक्काम केला. तेथील हवामानाचा प्रतिकुल परिणाम चिथडे साहेबांच्या प्रकृतीवर झालाच. पण चिथडे दांमप्त्य आपल्या वीर जवानांसारखे परिस्थितीला तोंड देत राहिले. मध्येच कोरानाचे संकट उभे ठाकले, आर्थिक गणिते जुळेनात, शिवाय देणगीतील रक्कम फक्त आणि फक्त यंत्रणा खरेदीच्याच कामासाठी वापरण्याचे, वेतनावर खर्च होईल म्हणून कोणीही पगारदार साहाय्यक न नेमण्याचे, कार्याची अंमलवजावणी करण्याचा खर्च कटाक्षाने स्वकमाईच्या पैशांनी करण्याचे तत्व अंगिकारलेले असल्याने सियाचीनवरील हवामानासारखीच अनेक आव्हाने चिथडे पती-पत्नी आणि त्यांचे सहकारी यांच्यासमोर होती पण ते डगमगले नाहीत! शिवाय स्वत:वर होणारा खर्च अत्यंत अत्यावश्यक गरजेपुरताच राहील असा यांचा कटाक्ष तर प्रारंभापासूनच आहे.

या त्यागाचे, नियोजनाचे, कार्यक्षमतेचे, चिकाटीचे, ध्यासाचे फळ म्हणूनच सियाचीन मध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट अर्थात प्राणवायू निर्मिती संयंत्र उभारले गेले आणि कार्यांन्वयितही झाले. ही तारीख होती ४ ऑक्टोबर, २०१९! सियाचीन परिसरातील सैनिक, नागरीक, पर्यटक, गिर्यारोहक अशा आजपर्यंत ३५ हजार लोकांसाठी प्राणरक्षक ठरलाय हा ऑक्सिजन प्लांट! हनुमंतरायाने जणू संजीवनी बुटीसाठी सबंध द्रोणागिरी पर्वत उचलून आणण्यासारखा हा प्रकार नव्हे काय? हा प्लांट आतापर्यंत एकदाही बंद पडलेला नाही आणि ऑक्सिजन निर्मिती क्षमता आहे मिनिटाला २२४ लिटर्स! यामुळे कितीतरी जवानांचे, नागरीकांचे प्राण वाचवले जाऊ शकले! कोरोना काळात तर या प्लांटचा सर्वांनाच खूप उपयोग झाला.

दुस-या महायुद्धाच्या काळात, १९४० मध्ये डंकर्क या ठिकाणी इंग्लंड आणि दोस्त राष्ट्रांचे सैन्य शत्रूसैन्याच्या वेढ्यात अडकून पडले असताना इंग्लंडच्या जनतेने सैन्यास उत्स्फूर्त साहाय्य करून सोडवून आणले होते! यापेक्षाही चिथडे दांमप्त्याने लोकसहभाग मिळवून भारतीय सैन्याला दिलेले हे साहाय्य मोठे म्हणावे लागेल! ही तर जनतेचे प्राण वाचवणा-या सैनिकांना जनतेकडून मिळालेली फार मोठी भेट म्हणता येईल. किंबहुना हा जागतिक पातळीवरील अलौकीक विक्रमच असावा! पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी योगेशजी आणि सुमेधाजी चिथडे यांच्या कामाची वैय्यक्तिक पातळीवर दखल घेऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटीत चर्चाही केली आणि कौतुकही केले! सैन्यदल प्रमुख जनरल दिवंगत हुतात्मा बिपिनजी रावतसाहेब, मधुलिका रावत मॅडम यांनी योगेशजी आणि सुमेधाजींच्या कार्याची प्रशंसा केली होती! सेनाध्यक्ष जनरल श्री. मुकुंद नरवणेसाहेब आणि अशा अनेक दिग्गजांनी या कार्याचे कौतुक केले आहे… मुख्य म्हणजे सीमेवर लढणा-या सैनिकांचे, सियाचिन परिसरातील हजारो नागरीकांचे आशीर्वाद या कार्याला लाभले आहेत!

पण एका ऑक्सिजन प्लांटने गरज भागलेली नाही… देशाच्या इतर सीमांवर असे अजून किमान दोन प्लांट उभारण्याची चिथडे दांमप्त्याची योजना आहे कारण तशी गरजही आहे… अर्थातच यासाठी अजून मोठा पैसा लागणार आहे! वैय्यक्तिक समस्या बाजूस सारून योगेशजी आणि सुमेधाजी आता दुसरा ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारून देण्याच्या कामात व्यग्र झालेले आहेत. आता जनतेने मागे राहून चालणार नाही. सुमारे १४० कोटी नागरीकांच्या या महाकाय देशात जनतेला काय अशक्य आहे? फक्त सहृदय लोकांनी पुढे आले पाहिजे. चिथडे साहेब, सुमेधाताई यांच्या मनात आणखी बरेच उपक्रम आहेत. कर्तव्यावर असताना जखमी झाल्याने अपंग झालेले, निवृत्त झालेले सैनिक यांच्यासाठी निवासी संकुल, वीरपत्नींसाठी रोजगाराभिमुख उपक्रम, त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक साहाय्य इत्यादी खूप योजना आहेत. कामात आर्थिक, प्रशासकीय पारदर्शकता हे चिथडे दांमप्त्याने स्थापन केलेल्या ‘सिर्फ’ संस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे! देणगीतील प्रत्येक पै ज्यासाठी देणगी दिली गेली आहे, त्याच कामासाठी खर्च केली जाते! 

पडद्यामागील हुतात्मे!

देशाचे रक्षण म्हणजे सैनिक, देशरक्षणासाठी युद्धभूमीवर मृत्यू पावणे म्हणजे हौतात्म्य असी सामान्यजनांची समजूत असते. परंतू काही देशप्रेमी नागरीकही आपल्या नागरी जीवनात राहून सैनिकाची भूमिका बजावत असतात आणि प्रसंगी आपल्या कर्तव्यासाठी आपल्या जीवाचीही पर्वा करीत नाहीत! 

पुण्यातील योगेश चिथडे हे असेच एक नागरीक-माजी सैनिक. योगेशजींनी काही वर्षे भारतीय हवाई दलात सेवा बजावली. त्यांना सैनिक जीवनातील समस्या, आव्हाने जवळून पाहता आली. सियाचिनसारख्या जगातील सर्वाधिक उंचावर असलेल्या युद्धभूमीवर लढताना सैनिकांना अक्षरश: श्वास कमी पडतो. या सैनिकांसाठी कृत्रिक श्वास अर्थात ऑक्सिजन प्लांंट उभारण्याची अलौकिक कल्पना योगेशजींना सुचली. यासाठीचा खर्च संपूर्णपणे जनतेतूनच उभारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांच्या पत्नी सुमेधाजींनी आपल्या पतीच्या या भगीरथ प्रयत्नांमध्ये तनमनधनाने साथ दिली. आणि देशात विविध ठिकाणी कोट्यवधी रूपये मूल्य असलेले ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प स्थापित झाले. कोरोनाच्या काळातही काम सुरू होते. निधी संकलनासाठी योगेशजी आणि सुमेधाजी यांनी शेकडो व्याख्याने दिली. आणि विशेष म्हणजे या सर्व कार्यासाठी स्वत:चा पैसा वापरला. जमा झालेल्या पैशांतून एकही पैसा त्यांनी कार्याच्या खर्चसाठी वापरला नाही. योगेशजींनी प्रत्यक्ष सियाचिन परिसरात कित्येक दिवस राहून ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी अभ्यास केला. प्रत्यक्ष प्लांट कार्यान्वित करण्यासाठी विविध संस्थांशी संपर्क साधला. या सर्व खटाटोपात सियाचिनमधील अतिथंड वातावरणाचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झालाच. पण त्याची पर्वा न करता या माजी सैनिकाने आपले कर्तव्य पार पाडले. वयाच्या अवघ्या ६१व्या वर्षी योगेशजींनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या भगीरथ प्रयत्नांची दखल देशाच्या पंतप्रधानांनीही घेतली होती आणि संरक्षणदलांनीही. योगशजींंच्या मनात सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठीच्या अनेक योजना होत्या आणि त्यापैकी काही त्यांनी प्रत्यक्षातही आणल्या. पण अजूनही खूप काही करायचे होते. आता यापुढे सुमेधाताईंवर सारा भार असेन. आपणही त्यांच्या कार्यात सहभागी होणे गरजेचे आहे. या पडद्यामागच्या सैनिकाला आणि त्यांच्या त्यागाला शतश: वंदन आणि भावपूर्ण श्रद्धांजली… जय हिंद योगेश साहेब! हा देश आपले योगदान कधीही विसरणार नाही. आपल्या आत्म्यास सद्गती लाभेलच कारण हुतात्मा सैनिकांच्या आत्म्यांना ती लाभतेच.

(… या कार्याला प्रत्येक भारतीय देशप्रेमी नागरीकाचा हातभार लागणे गरजेचे आहे… कारण आपल्या सैनिकांना श्वास देणे म्हणजे आपलेच श्वास जपण्यासारखे आहे ! संपर्कासाठी लॅन्डलाईन टेलिफोन क्रमांक (020-25656831) मोबाईल क्रमांक योगेशजी चिथडे (9764294291) सुमेधाजी चिथडे (9764294292) 

ईमेल:- cyogeshg@rediffmail. com, cnborole@gmail. com 

Bank of Maharashtra A/c 60273878996 (IFSC-MAHA0000243) (MICR:-411014034) 

… देशसेवेचे आव्हान आहे म्हणूनच हे आवाहन आहे. वाचकांनी निश्चितपणे विचार करावा, ही विनंती.) 

– समाप्त –

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पदर आईचा अन् आयुष्याचा… कवी : श्री.सुरेंद्र पाटणेकर ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ पदर आईचा अन् आयुष्याचा… कवी : श्री.सुरेंद्र पाटणेकर ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

खरं तर आईच्या पोटातच आधी आईची ओळख झाली

आणि मग नऊ महिन्यांनी तिच्या

पदराची ओळख झाली.

 

पाजताना तिनं

पदर माझ्यावरून झाकला,

आणि मी आश्वस्त झालो …

तेव्हापासून तो खूप

जवळचा वाटू लागला

 

आणि मग तो भेटतच राहिला …

आयुष्यभर

 

शाळेच्या पहिल्या दिवशी

तो रुमाल झाला

 

रणरणत्या उन्हात

तो टोपी झाला,

 

पावसात भिजून आल्यावर

तो टॉवेल झाला

 

घाईघाईत खाऊन खेळायला पळताना

तो नॅपकीन झाला

 

प्रवासात कधी

तो अंगावरची शाल झाला

 

बाजारात भर गर्दीत कधीतरी

आई दिसायची नाही

पण पदराचं टोक धरून

मी बिनधास्त चालत राहायचो …

मग त्या गर्दीत

तो माझा दीपस्तंभ झाला

 

गरम दूध ओतताना

तो चिमटा झाला

 

उन्हाळ्यात लाईट गेल्यावर

तो पंखा झाला

 

निकालाच्या दिवशी

तो माझी ढाल व्हायचा.

 

बाबा घरी आल्यावर,

चहा पाणी झाल्यावर,

तो पदरच प्रस्ताव करायचा ….

 

छोटूचा रिझल्ट लागला…

चांगले मार्क पडले आहेत

एक-दोन विषयात कमी आहेत,

पण …

पण आता अभ्यास करीन असं म्हणतोय..

 

बाबांच्या संतापाची धार बोथट होताना

मी पदराच्या आडून पाहायचो

हाताच्या मुठीत पदराचं टोक

घट्ट धरून !

 

त्या पदरानेच मला शिकवलं

कधी – काय – अन कसं बोलावं

 

तरुणपणी जेव्हा पदर

बोटाभोवती घट्ट गुंडाळला

तेव्हा त्याची खेच बघून

आईने विचारलंच,

“कोण आहे ती…

  नाव काय?”

 

लाजायलाही मला मग

पदरच चेहऱ्यापुढे घ्यावा लागला.

 

रात्री पार्टी करून आल्यावर …

जिन्यात पाऊल वाजताच, 

दार न वाजवता …

पदरानेच उघडलं दार.

कडीभोवती फडकं बनून …

कडीचा आवाज दाबून …

 

त्या दबलेल्या आवाजानेच 

नैतिकतेची शिकवण दिली

 

पदराकडूनच शिकलो सहजता

पदराकडूनच शिकलो सौजन्य

पदराकडूनच शिकलो सात्त्विकता

पदराकडूनच शिकलो सभ्यता

पदराकडूनच शिकलो सहिष्णुता

पदराकडूनच शिकलो सजगता

 

काळाच्या ओघात असेल,

अनुकरणाच्या सोसात असेल

किंवा

स्वतःच्या “स्व”च्या शोधात असेल,

 

साडी गेली…

ड्रेस आला

पँन्ट आली…

टाॅप आला

स्कर्ट आला…

आणि छोटा होत गेला

 

प्रश्न कपड्याचा नाहीच आहे ,

प्रश्न आहे तो, आक्रसत जाऊन ,

गायब होऊ घातलेल्या पदराचा !

 

कारण पदर हे पद नसून , जन्मभराची फक्त आणि फक्त  जबाबदारी आहे . आणि ती जाणीवपूर्वक व नि:स्वार्थपणे – पेलू शकते केवळ आई !

 

खरं तर – शर्टालाही  फुटायला हवा होता पदर …

पण खरं सांगू … शर्टाला तो झेपणार नाही!

कवी : श्री.सुरेंद्र पाटणेकर

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कोवळ्या कळ्यांना कसे समजावे ???? ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कोवळ्या कळ्यांना कसे समजावे ???? ☆ श्री आशिष बिवलकर ☆

कोवळ्या कळ्यांना कसे समजणार,

गुड टच बॅड टच कशाला ते म्हणतात |

विकृत मनोवृत्तीची शिकार होऊन,

क्रूर हैवानी वासनेला बळी पडतात |

*

वरकरणी माणसाच्या चेहऱ्याआड,

वासनाधुंद नराधम लपलेला असतो |

बिचारा गरजू आहे हेच समजून,

नकळत आपणच नको तिथे फसतो |

*

सरस्वती मंदिरात पाल्यास पाठवतांना,

पालकांच्या मनी असतो दृढ विश्वास |

सुरक्षित वातावरणात विद्यार्जन चालेल,

होणार नाही बालकास कुठला त्रास |

*

एक अशुभ दिवस उजाडतो, ,

माणसातला हैवान साधतो त्याचा डाव |

कोवळ्या जीवास असंख्य वेदना,

आयुष्यभरासाठी जिव्हारी बसतो घाव |

*

काय घडलंय तिच्या बाबतीत,

सांगायचे तिलाच माहित नसते |

सुसुच्या जागी खूप दुखतय,

इतकंच पालकांना दाखवत असते |

*

चिंताग्रस्त पालक तिला घेऊन,

डॉक्टर काकांकडे जातात |

प्रकार सारा लक्षात येताच,

मुळापासून पुरते हादरतात |

*

फिर्याद करायला आई मुलगी,

सरळ पोलीस स्टेशन गाठतात |

पोलीस बारा तास तिष्ठत ठेवत,

प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतात |

*

भ्रष्ट आणि असंवेदनशील अधिकारी,

तक्रार नोंदवायाला करते टाळाटाळ |

अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आता,

पेट घेते जनआक्रोशाचे आभाळ |

*

व्यवस्थेने दाबलेल्या एका ठिणगीचा,

रान पेटवणारा होतो तिचा वणवा |

जनतेच्या आंदोलनाची धग बसताच,

षंढ प्रशासनाला दिसतात उणीवा |

*

भडकते आंदोलन, पेटत सारं रान,

मुंबईच्या लाईफ लाईनला बसतो ब्रेक |

बडे अधिकारी, मंत्री, संत्री, कुत्री,

समजूत काढायला आले एकामागून एक |

*

नेतृत्वहीन आंदोलन आवरायाला,

पोलीस बळाचा झाला वापर |

न्यायाच्या मागणीसाठी झालेल्या,

जनआंदोलनावर फुटले खापर |

*

साठ वर्ष ज्ञानाची सावली धरणाऱ्या,

वट वृक्षावर अचानक वीज पडते |

इतक्या वर्षांच्या कडक तपश्चर्येला,

कुठेतरी गालबोट मात्र नक्कीच लागते |

*

जनआंदोलनाच्या तापलेल्या तव्यावर,

राजकारणी आपली पोळी भाजत आहे |

सुसंस्कृत ऐतिहासिक शहराला काळिमा 

लागला म्हणून बदलापूरकर लाजत आहे |

*

वासनाधुंद हैवानाच्या पापाची शिक्षा,

सर्वसामान्य नागरिक भोगत आहे |

कूर्मगतीने चालणाऱ्या व्यवस्थेकडे,

चिमुरडीसाठी जलद न्याय मागत आहे |

 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “भगतसिंगचा खटला” – मूळ लेखक : ए. जी. नुराणी – मराठी अनुवाद : सुश्री रेखा ढोले / डॉ. सदानंद बोरसे ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “भगतसिंगचा खटला” – मूळ लेखक : ए. जी. नुराणी – मराठी अनुवाद : सुश्री रेखा ढोले / डॉ. सदानंद बोरसे ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

पुस्तक : भगतसिंगचा खटला

“The trial of Bhagatsingh“ — ‘न्यायाच्या हत्येचे कारस्थान’

मूळ लेखक : ए. जी. नुराणी.

मराठी अनुवाद : रेखा ढोले / डॉ. सदानंद बोरसे 

प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे.

१७ डिसेंबर १९२८ ला भगतसिंगने सॉंडर्सची हत्या केली. खरे तर त्याला पोलीस अधिक्षक स्कॉटला मारायचे होते. पण चुकीच्या संदेशामुळे मारला गेला तो सॉंडर्स.

या घटनेनंतर थोड्याच दिवसांनी ८ एप्रिल१९२९ ला दिल्लीत विधीमंडळात भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी बॉंब टाकले.

एकापाठोपाठ घडलेल्या घटनांनी इंग्रज सरकार पेटून उठले यात नवल नाही. त्यांनी धरपकड सुरू केली. काही जण पकडले गेले.. पोलीसी छळाला कंटाळून त्यातील काही जण माफिचे साक्षीदार झाले आणि थोड्या दिवसातच भगतसिंग आणि त्याचे साथीदार यांना अटक झाली.

पुस्तकात हा सर्व घटनाक्रम तपशीलवार आला आहे. त्यानंतरच्या घटना… तुरुंगात घडत असलेल्या आणि बाहेर.. म्हणजे देशभर.. वाचताना एक नवीनच इतिहास माहीत होत जातो.

देशभरात भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल सहानभूती होतीच.. पण त्यातही विसंगती होती विधीमंडळात केलेली बॉम्बस्फोटाची कृती अनेकांना पसंत नव्हती. म. गांधी, जवाहरलाल नेहरू आणि एकूणच काँग्रेसची भूमिका काय होती? भगतसिंग आणि त्याचे सहकारी तुरुंगात गांधींचा मार्ग अनुसरतात. तुरुंगात त्यांना मिळणारी वागणूक.. दिला जाणारे अन्न.. पाणी याच्या निषेधार्थ ते अन्न सत्याग्रह सुरु करतात.

एकामागून एक घडणार्या घटनांमुळे देशभर आगडोंब ऊसळतो. आणि मग खटला उभा राहतो.

पुस्तकाचा हा मुख्य विषय. लाहोरच्या केंद्रिय तुरुंगात १० जुलै पासून खटल्याचे कामकाज सुरू झाले. भगतसिंग यांनी आपले कायदेशीर सल्लागार म्हणून लाला दुनीचंद यांची निवड केली. ते आणि इतर सात आठ जण या खटल्यात आरोपींचा बचाव करण्यासाठी उभे राहिले. खटल्याचे कामकाज सर्वसामान्य जनतेसाठी खुले नव्हते.

इथून पुढे जे घडत गेले त्यावर प्रकाश टाकणे हा या पुस्तकाचा मुळ उद्देश. या खटल्याची कठोर चिकित्सा कधीच झाली नाही आणि लाहोर कटाचा तपशीलवार अभ्यासही झाला नाही. या खटल्यातील काळी बाजू फारशी कुणाला माहीत नाही. हा खटला म्हणजे एक फार्सच होता. आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी इंग्रज सरकारने या खटल्याचा पुरेपूर वापर केला. खटल्याच्या काळातच इंग्रज सरकारने एक वटहुकूम काढला. त्या अन्वये एका खास न्यायाधिकरणाची स्थापना केली. त्याचा हेतू काय होता? तर या खटल्यातील आरोपींना उच्च न्यायालयात अपील करण्याची संधीच मिळू नये. त्यामुळे त्यांची फाशीची शिक्षा कायम राहील.

शालेय इतिहासात भगतसिंगबद्दल वाचले होते. त्यानंतर कधीच या विषयावर काहीच वाचनात आले नाही. मराठीत यावर काही पुस्तके असतीलही.. पण कधी वाचनात आली नाही. हे पुस्तक हातात घेतले आणि सगळा इतिहास नव्याने समजत गेला. भगतसिंगाचा पूर्व इतिहास काय होता.. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती यावर देखील एक प्रकरण पुस्तकात आहे. तसं पाहिलं तर हा विषय क्लिष्ट. पण तो कुठेही कंटाळवाणा होत नाही. ए. जी. नुराणी यांच्या ‘ The trial of Bhagatsing ‘ या इंग्रजी पुस्तकाचा सुबोध अनुवाद रेखा ढोले आणि डॉ. सदानंद बोरसे यांनी केला आहे. इतिहासाच्या अभ्यासकांसाठी तर हे पुस्तक मोलाचे आहेच, पण सामान्य वाचकांनी देखील नेमका इतिहास समजून घेण्यासाठी एकदा तरी हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

परिचय : श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # 69 – पता मुझे है जन्नत का… ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे।  आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – पता मुझे है जन्नत का।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 69 – पता मुझे है जन्नत का… ☆ आचार्य भगवत दुबे ✍

हूँ बीमार, मुहब्बत का 

पता, मुझे है जन्नत का

*

सूरत, भोली-भाली है 

दीवाना हूँ, सीरत का

*

याद करूँ, दिन-रात तुम्हें 

समय कहाँ है, फुर्सत का

*

कैसे भूलूँ तुम्हें भला 

तुम हो हिस्सा, फितरत का

*

तेरे दर पर, आ न सका

डर है, तेरी इज्जत का

*

दर से खाली गया, तो क्या 

होगा, तेरी शोहरत का

https://www.bhagwatdubey.com

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ दो लघुकथाएँ – (1) पानी कठौता भर लेई आवा (2) पत्नी के गुजर जाने के बाद ☆ डॉ कुंवर प्रेमिल ☆

डॉ कुंवर प्रेमिल

(संस्कारधानी जबलपुर के वरिष्ठतम साहित्यकार डॉ कुंवर प्रेमिल जी को  विगत 50 वर्षों से लघुकथा, कहानी, व्यंग्य में सतत लेखन का अनुभव हैं। क्षितिज लघुकथा रत्न सम्मान 2023 से सम्मानित। अब तक 500 से अधिक लघुकथाएं रचित एवं बारह पुस्तकें प्रकाशित। 2009 से प्रतिनिधि लघुकथाएं  (वार्षिक)  का  सम्पादन  एवं ककुभ पत्रिका का प्रकाशन और सम्पादन। आपने लघु कथा को लेकर कई  प्रयोग किये हैं।  आपकी लघुकथा ‘पूर्वाभ्यास’ को उत्तर महाराष्ट्र विश्वविद्यालय, जलगांव के द्वितीय वर्ष स्नातक पाठ्यक्रम सत्र 2019-20 में शामिल किया गया है। वरिष्ठतम  साहित्यकारों  की पीढ़ी ने  उम्र के इस पड़ाव पर आने तक जीवन की कई  सामाजिक समस्याओं से स्वयं की पीढ़ी  एवं आने वाली पीढ़ियों को बचाकर वर्तमान तक का लम्बा सफर तय किया है, जो कदाचित उनकी रचनाओं में झलकता है। हम लोग इस पीढ़ी का आशीर्वाद पाकर कृतज्ञ हैं। आज प्रस्तुत हैआपकी दो विचारणीय लघुकथाएँ – (1) पानी कठौता भर लेई आवा (2) पत्नी के गुजर जाने के बाद .)

☆ लघुकथाएँ – (1) पानी कठौता भर लेई आवा (2) पत्नी के गुजर जाने के बाद ☆ डॉ कुंवर प्रेमिल 

(डॉ कुँवर प्रेमिल जी द्वारा उनकी स्वर्गीय धर्मपत्नी जी को समर्पित लघुकथाएं। ई-अभिव्यक्ति परिवार की ओर से विनम्र श्रद्धांजलि🙏) 

पानी कठौता भर लेई आवा ☆

एक थे राम।

एक था केवट।

रामजी को अपनी भार्या सीता एवं अनुज लक्ष्मण के साथ सरिता पार करनी थी। वह केवट को बुला रहे थे परंतु केवट संज्ञान नहीं ले रहा था।

उसे भय था कहीं लकड़ी की नाव पत्थर की शिला बन गई तो!

‘तो उसकी रोजी रोटी पर संकट गहरा जाएगा’ – वह मन ही मन गुन्तारा बैठा रहा था।

उधर रामजी को नदी पार करने की जल्दी थी। कुछ वजह उन्हें समझ में नहीं आ रही थी।

एकाएक केवट में स्फूर्ति जागी। वह जैसे नींद से जागा – यह तो अच्छा ही होगा कि श्री राम उसकी नौका को सुंदर स्त्री बना देंगे। सुंदर स्त्री समाज परिवार में सम्मान पाती है। साथ ही साथ उसका पति भी सम्मान पाता है।

घर परिवार के लोग भी सम्मान पाते हैं। ऐसा मौका उसे कतई नहीं छोड़ना चाहिए।

नौका तो वह फिर भी बना लेगा। वह इस मधुर कल्पना लेकर कठौता में पानी भरकर ले आया।

♥ ♥ 

अद्भुत दृश्य था। वह श्रीराम जी के श्री चरणों को धोता हुआ मंद मंद मुस्कुरा रहा था। राम जी भी मुस्कुरा रहे थे। सीता मैया मुस्कुरा रही थी। लक्ष्मण भैया मुस्कुरा रहे थे।

कठौता में प्रभु राम की मुस्कुराती छवि केवट को आश्वस्त कर रही थी।

* * * *

☆ पत्नी के गुजर जाने के बाद

उसकी पत्नी क्या गुजर गयी, उसका सब कुछ छीन ले गयी। उसकी कलम की स्याही सूख गयी। उसके विचार भोंथरे हो गये।

उसके सगे संबंधी मुंह चुराने लगे। वह भूखा-प्यासा पड़ा रहता। नहाना धोना सब भूल गया वह।

जिनकी पत्नियां जीवित थीं, वे सोच रहे थे, क्या पत्नी इतनी जरूरी होती है? उसके वगैर क्या दुनिया रुक जाती है? वह घर की हीरोइन है क्या?

यह क्या, क्या है,जो पत्नियों के वश में रहता है और उनकी हर आज्ञा का पालन करता है।

* * * *

© डॉ कुँवर प्रेमिल

संपादक प्रतिनिधि लघुकथाएं

संपर्क – एम आई जी -8, विजय नगर, जबलपुर – 482 002 मध्यप्रदेश मोबाइल 9301822782

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – आत्ममुग्ध ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – आत्ममुग्ध ? ?

हवा से फूलकर

गुब्बारा  कुप्पा हुआ,

पिन चुभने भर की देर थी

किया धरा धराशायी हुआ,

आत्ममुग्धता की हवा भरती है

तब सच की पिन चुभती है,

फूटा गुब्बारा बिना दाम का

आत्मघाती मोह किस काम का?

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 27 अगस्त से 9 दिवसीय श्रीकृष्ण साधना होगी। इस साधना में ध्यान एवं आत्म-परिष्कार भी साथ साथ चलेंगे।💥

🕉️ इस साधना का मंत्र है ॐ कृष्णाय नमः 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares