मराठी साहित्य – विविधा ☆ “कृष्ण स्वरूप…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “कृष्ण स्वरूप…” ☆ सौ राधिका भांडारकर 

खरं म्हणजे रामायण महाभारतातल्या कथा ऐकतच आम्ही लहानपणी रमलो. रामायणातला राम आणि महाभारतातला कृष्ण या दोन्ही व्यक्तिरेखा तेव्हापासूनच मनावर ठसलेल्या पण या दोन्ही व्यक्तींचा प्रभाव मात्र भिन्न होता— भिन्न आहे. राम म्हणजे एकनिष्ठ, एकपत्नीव्रती, प्रजाहितदक्ष, एकवचनी, पितृवचनी, माता बंधुप्रेमी असा आदर्शवादी म्हणून मनात रुजला. कृष्णामध्ये मात्र निराळीच भावनिक गुंतवणूक झाली. रामात आणि आपल्यात एक पारलौकिक अंतर जाणवलं. कृष्ण मात्र अगदी जवळचा सवंगडी, सखा, जिवलग झाला म्हणूनच बालपणीचा कृष्ण आणि त्याच्या खोड्या, मिस्कीलपणा सांगणाऱ्या कथेत मनापासून रमलो. आजही मनाला भावतो तो नटखट कन्हैया. यशोदेचा कान्हा. यमुनेच्या प्रवाहात कालियाच्या मस्तकावर नाचणारा कृष्ण, गवळणींची मटकी फोडणारा मिस्कील नंदलाल, टांगलेल्या हंडीतलं लोणी मित्रांसोबत चोरून खाणारा तो लबाड माखनचोर, रंग उडवणारा, रास खेळणारा, गोपींची वस्त्रे लपवणारा खोडकर पण तरीही प्रिय असा हा गोकुळवासी गोपीनंदन. कुंजवनात कदंब वृक्षातली, पाय दुमडून मंजुळ बासरी वाजवणारा, शामल वर्णी, शिरी मोरपीसधारी, राधेच्या सहवासातला दंग मुरारी. गाई राखणारा, आणि गोरक्षणार्थ पर्वत उचलणारा गोवर्धनधारी, वसुदेवसुत, देवकीनंदन, यशोदेचा कान्हा मनात कायमचं वास्तव्य करून राहिला.

बोबडा पेंद्या आणि कृष्णाची मैत्री तर फारच रंजक. अविस्मरणीय.

पेंद्या रुसलाय. दुखावलाय. म्हणतो कसा,

“कुत्ना थमाल ले थमाल आपल्या गाई आम्ही आपल्या घलाशी जातो भाई ।

कृष्ण मित्र म्हणून भोळा पेंद्या त्याच्याजवळ तक्रार करतो,

काल बलाचि ले बलाचि खलवस केला 

तुम्ही सल्वांनी फाल फाल घेतला

मी गलीब म्हणुनी थोलका दिला

तू म्हणशील ले याला कलतीच नाही ।

कृष्ण हा आपला सखा आहे आणि तो आपलं गार्‍हाणं, आपलं रागावणं, आपलं दुःख जाणून घेईलच याची पेंद्याला किती खात्री! म्हणूनच खऱ्या मित्राची खरी प्रतिमा कृष्णाच्या रूपातच मनावर ठसते.

जसा पेंद्या तसाच सुदामा. राजमहालातल्या पंचपक्वांनाना डावलून, फडक्यात बांधून आणलेल्या सुदामाच्या मूठभर पोह्यांचा तो मनापासून चट्टामट्टा करतो. या साऱ्याच कथांमधला कृष्णस्पर्श मनात अमरत्वाच्या भावनेनं बिलगलेला आहे…

देवाचा देव बाई ठकडा

एका पायाने लंगडा 

करी दही दुधाचा रबडा… असा हा मनात बसलेला लडीवाळ कान्हा, अचल असला तरी जसं वय वाढत गेलं, तसं महाभारतातला, अर्जुनाला गीतामृत पाजणारा, पार्थसारर्थी, हाती शस्त्र न धरता चार युक्तीच्या गोष्टी सांगणारा राजनीतीज्ञ, धर्मपरायण, धूर्त, धोरणी, युगंधर हळूहळू उलगडायला लागला. गोकुळातून, मथुरा, द्वारका आणि हस्तीनापुरातला कौरव पांडव यांच्यात समन्वय घडून आणण्यासाठी प्रयत्नशील पण त्यानंतर केवळ सत्य धर्माची बाजू सांभाळणारा, रथारुढ भगवान श्रीकृष्ण आणि भीष्मप्रतिज्ञेला आव्हान देत पितामह भीष्मांशी संवाद साधणाऱ्या कृष्णाची अध्यात्मिक प्रतिमा मनात साकारू लागली. त्या प्रतिमेपर्यंत पोहचणं ही एक तपस्या आहे हेही जाणवू लागलं.

बालपणीचा राधेत रमणारा, गोपींची वस्त्र पळवणारा कृष्ण एका निराळ्याच तत्त्वात दिसू लागला. रूपकात्मक भासू लागला. अंगावरची वस्त्रे ऐहिकतेच्या रूपकात पाहता आली. ती कृष्णभक्तीने पळवली गेली म्हणजेच देह परमात्मा स्वरूप झाला. हा भक्तीयोग असा कळू लागला. राधाकृष्ण प्रेमाचं स्वरूप भक्ती आणि प्रीतीच्या उदात्त अद्वैतात जाणवलं. ते अशरीरी, अंत:प्रवाहातलं प्रीतीचं अमर स्वरूप होतं. हा कृष्ण खूप वेगळा होता. तो सगुण होता, आकृतीबंधातला होता पण तरीही आकलनाच्या पलीकडला होता.

कुब्जेच्या कुबडाला त्याचा दिव्य स्पर्श होतो, एका चिंधीच्या बदल्यात बंधू, सख्याच्या नात्याने भर दरबारात लज्जित झालेल्या द्रौपदीला सहस्त्र वस्त्रे पुरवून तिची लाज राखतो, सत्यभामेच्या हट्टासाठी इंद्रदेवाशी युद्ध करून स्वर्गातून पारिजातकाचा वृक्ष पृथ्वीवर आणतो पण त्याचवेळी रुक्मिणीच्या “मला ती सुगंधी प्राजक्त फुले आणून द्या” या लडिवाळ हट्टाचाही मान राखून “बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी” अशी कमाल त्या दोघींच्या जीवनात घडवून आणतो, सोळा सहस्त्र स्त्रियांचा पती म्हणून मिरवतो असा हा स्त्रियांचा कैवारी माझ्या स्त्री मनावर एक रक्षक म्हणून भक्तिभावाने राज्य करतो.

रणभूमीवर कर्णाच्या रथाचे चाक भूमीत रुतले. कर्ण चाक काढण्यासाठी रथाखाली उतरला. धनुष्यबाण ठेवल्यामुळे तो नि:शस्त्र होता. कृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने त्याच्यावर बाणांचा वर्षाव सुरू केला असताना कर्ण म्हणतो अर्जुनाला, ” हे धर्मयुद्ध आहे. हाती शस्त्र नसलेल्या शत्रूवर घाव घालणे हा अधर्म आहे. ”

तेव्हा कृष्ण उत्तरतो,

“हे राधासुता! तेव्हा कोठे गेला होता तुझा धर्म ज्यावेळी द्रौपदीच्या पदराला भर सभेत हात घातला जात होता, एकट्या अभिमन्यूला चक्रव्यूहात कौरवांनी घेरले?”

एकाच वेळी धर्मपरायण आणि जशास तसे कृतीतून उत्तर देणारा कृष्ण, पृथ्वीतलावरच्या प्रत्येक पापभीरू मानवासाठी आधारभूत ठरतो. कणखरपणे प्रत्युत्तर देणारा हा महाभारतातला कृष्ण, मनातल्या देव्हाऱ्यात भगवंत म्हणून स्थित होतो आणि नकळत बालपणीचा खोडकर कन्हैया याच तत्वाशी अलगद जोडला जातो.

अशा या मनातल्या गाभार्‍यात जपलेल्या कृष्णाला मात्र सभोवतालच्या नकारात्मक आणि अनीतीत बुडालेल्या, धर्मसंज्ञेचा धिक्कार झालेल्या, विकृत समाजात भयग्रस्त होऊन जगताना एक प्रश्न विचारावासा वाटतो,

“संभवामी युगे युगे” म्हणून आश्वासन देणारा तू कुठे आहेस? तू कसा लोपलास? का दिसत नाहीस? का जाणवत नाहीस? जर तू विश्वाच्या अंशा अंशात सामावलेला आहेस मग तू प्रकट का होत नाहीस? विठ्ठलाच्या रूपात तू जनीची लुगडी धुतलीस, दळण दळलेस, गोऱ्या कुंभाराची मडकी भाजलीस मग आत्ताच कुठे दडी मारून बसला आहेस? असं तर नाही ना की आम्हीच करंटे तुला पाहू शकत नाही. कृष्णस्वरूपांशी आमचीच समर्पण भावना कमी पडत आहे का?माझ्यात मीरा नाही. माझ्यात राधा नाही. मग हे मीराके प्रभु! सांग मला माझे भरकटलेले तारू तुझ्याविना किनारी कसं लागेल?”

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माझं काय चुकलं ??? — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ माझं काय चुकलं ???  — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(सासूबाई हळूच म्हणाल्या, बाई ग. करणार का ही नीट सगळं?का पिठलं भात करायची वेळ येतेआपल्यावर?’हसून मोना म्हणाली बघूया. मलाही माहीत नाही हो तिला काय येतं ते’.) –इथून पुढे —

दीड तासाने सीमाने मोनाला आत बोलावलं. सगळं किचन नीट आवरलेलं, ओटा स्वच्छ, टेबलावर सगळी भांडी नीट मांडलेली. “ मोना, उघडून बघ ना! कमी नाही ना पडणार?” सीमाने विचारलं. मोनाने बघितलं, साधा पण खूप सुंदर स्वयंपाक केला होता सीमाने. पोळ्या डब्यात भरलेल्या, उसळ भात कोशिंबीर चटणी आणि खीर. मोना खूषच झाली. “ अरे वा. मस्त केला आहेस ग बेत सीमा. मस्तच झालंय सगळं. चव आहे तुझ्या हाताला. ” सीमाला शाबासकी देत मोना म्हणाली.

सीमा म्हणाली “ मोना, काय करणार ग. आई लवकर गेली माझी आणि लहान वयात खूप जबाबदारी पडली ग माझ्यावर संसाराची. वडील आणि भाऊ किती स्वार्थी आहेत ते तू बघतेसच. तू मला संतोषशी लग्न करायचा प्रस्ताव आणलास ना तर बाबा म्हणाले कशाला करतेस लग्न?इथं काय वाईट चाललंय तुझं?काही नको करू लग्न!’मी गेले की पगार गेला, घरात राबणारी मोलकरीण गेली ना. ‘सीमाच्या डोळ्यात पाणी आलं. सगळे जेवायला बसले. सासूबाई सासऱ्यानी सीमाला दाद दिली आणि तिचं कौतुक केलं. सीमाला खूप आनंद झाला. म्हणाली, माझं काही चुकलं तर मला संभाळून घ्या हं. मला माणसात राहायची सवय नाहीये. पण मी आपल्या घरच्या रीतिभाती मोना कडून घेईन समजून.

सासूबाईंना कौतुक वाटले सीमाचे. आता तिची शाळा सुटली की मोनाची मुलं तिच्याजवळ येऊन बसत आणि ती त्यांचा अभ्यास घेई. खूप सुधारल्या मुलांच्या ग्रेडस्! दर शनिवारी सीमा मुंबईला जाई आणि रविवारी रात्री परत पुण्याला येई. कधीकधी संतोष यायचा पुण्याला. पहिली संकोचलेली, जरा ढिली सीमा पूर्णपणे बदलून गेली. आणि रुळून गेली सासरी. बघता बघता दोन वर्षे झाली आणि सीमाला आता व्हॉलंटरी रिटायरमेंट घेता येणार होती.

मोनाला एक दिवस सीमा म्हणाली मोना, तुझ्या मुळे मला संसार मिळाला ग!नाहीतर माझ्या नशिबी कसला नवरा आणि स्वतःचे घर ग. इतके स्वार्थी असतात का ग आपलेच लोक?आणि तू ना नात्याची नातेवाईक पण किती माझं हित बघितलंस ग. किती चांगली माणसं आहात तुम्ही सगळी ग!’ सीमाच्या डोळ्यात पाणी आलं. आता माझ्या बरोबर मुंबईला येशील का?आपण दोघी मिळून घर लावूया आमचं. मोना, आणखी एक विनंती आहे बघ. मी आई अप्पा ना चार महिने मुंबईला नेऊ का. त्यांना जरा बदल होईल आणि तुलाही कुठे ट्रीपला जायचं असेल तर तसे ठरवता येईल. , तुम्हीही कुठे जाऊ शकत नाही मला माहीत आहे. माझेही ते सासूसासरे आहेत की. मागचं काय झालं आणि ते कधी मुंबईला गेले का नाही ते मी नाही विचारलं पण आता येऊ देत ना. चालेल का तुला?’ मोना म्हणाली अग त्यात काय!जरूर जरूर ने. , मला आनंदच होईल की. संतोषलाही वाटत असेल ना आपल्या आईवडिलांनी कधीतरी यावं आपल्या घरीही! जरूर ने त्यांना. मोना आणि सीमा पुढच्या शनिवारी रविवारी जाऊन घर आवरून आल्या. असं दोनतीन वेळा गेल्यावर सीमाच घर छान लागलं. सीमाच्या समोरच्या आणि शेजारच्या फ्लॅट मध्ये ओळखीही झाल्या. लग्नाला चार वर्षे झाली सीमाच्या आणि कधी नव्हे ते सुख डोकावू लागलं तिच्या आयुष्यात. , संतोष चे प्रेम होते तिच्यावर आणि सीमाचेही!

त्यादिवशी ऑफिस मधून संतोष घरी आला तो खूप डोकं दुखतंय म्हणूनच. फॅमिली डॉक्टरने औषधं दिली आणि बरे वाटले त्याला. पण हे वरचेवर होऊ लागल्यावर मात्र त्याला त्यांनी स्पेशास्लिस्ट कडे पाठवले. सगळ्या तपासण्या झाल्या आणि स्कॅन मध्ये लहानसा ट्यूमर दिसून आला.

नशिबाने तो कॅन्सरचा नव्हता पण तरीही ऑपरेशन करून तो काढायचे ठरले. पुण्याहून मोना तिचा नवरा सगळे आले. मोठे ऑपरेशन झाले आणि सर्व ठीक आहे असं डॉक्टर म्हणाले.

संतोषला उठवून बसवले तर तो पडलाच बेडवर. दुर्दैवाने त्याला पॅराप्लेजिआ झाला. कमरेखालचा भाग निकामी झाला आणि लाखात एखाद्यालाच होणारे कॉम्प्लिकेशन त्याच्या नशिबी आले. सगळ्याना अत्यंत वाईट वाटले. आता कायम व्हील चेअरला जखडून त्याचे आयुष्य जाणार हेही सगळ्यांच्या लक्षात आलेच!

फिजिओ थेरपी झाली, सर्व उपचार झाले पण काहीही सुधारणा झाली नाही. संतोषला कामातून निवृत्ती घ्यावी लागली आणि थोडेसेच पेन्शन मिळणार होते. सीमाचेच सगळ्याना वाईट वाटले. जरा कुठे सुखाचे दिवस तिच्या आयुष्यात येतात तर हे येऊन उभे राहिले समोर. असे सहा महिने गेले आणि सीमा सगळं जिवाच्या करारावर निभावत होती.

पैशाची थोडीफार मदत मोना तिचे सासरे जमेल तशी करत होतेच. एक दिवस सीमा मोनाच्या घरी येऊन थडकली आणि सासू सासऱ्यांना म्हणाली’ मला निम्मा वाटा द्या तुमच्या इस्टेटीतला. इकडे सगळे सुखात बसला आहात आणि मी तिकडे कसे दिवस काढतेय कधी विचारलंत का तरी?मला पैशाची गरज आहे आत्ता. आत्ताच वाटण्या करून टाका. मला सगळ्यातला निम्मा हिस्सा हवाय. मुंबईचा फ्लॅट अजूनही सासऱ्यांच्या नावावर आहे तो लगेच माझ्या नावावर करा. या मोनाला काय कमी आहे?सगळं तिला देऊन मोकळे व्हाल. मला लगेचच पैसे हवेत. पुढच्या दोन महिन्यात हे झालं पाहिजे. बेभान होऊन सीमा बोलत होती. कुठून लग्न केलं असं झालंय मला. बरी सुखात होते एकटी. आता जन्मभर हे संतोषला सांभाळणं आलं नशिबाला!

जणू देवाने यांची सेवा करायलाच माझी नेमणूक केलीय. माझा जीव थकून जातो याचं दिवसरात्र करताना. यातून सुटकाच नाही माझी. बघेन नाहीतर सरळ मी इथे आणून टाकेन त्याला. बघा तुम्ही मग. ‘ सीमाचे हे बोलणे ऐकून सगळे हादरूनच गेले.

मोना म्हणाली, ‘असं नको ग बोलू सीमा!असं होईल हे कोणाला वाटलं होतं का?पण तू अशी टोकाची भूमिका नको घेऊ. भावजीना किती वाईट वाटत असेल. हे बघ. तू म्हणतेस तशा वाटण्या आपले बापू नक्की करतील, थोडा वेळ दे. मला काही नकोय त्यांच्या इस्टेटीमधलं. ‘

सीमा म्हणाली ‘हो!नुसतं म्हणायचं असं. हवंय तर सगळं. नुसता तुझा मानभावीपणा घ्या बघून. मला लॉकर मधले दागिने उद्यादाखवा!. आणि निम्मे मी घेऊनच जाणारे. एक शब्द बोलू नकोस मोना!ज्याच्यावर वेळ येते त्यालाच कळतं बरं!कुठून ऐकलं तुझं आणि लग्न केलं असं झालंय मला. माझंच नशीब फुटकं आहे बाई. लहानपणा पासून हात धुवून मागे लागलंय त्यातून सुटका नाही माझी. सीमा तावातावाने बोलून निघून गेली.

सगळ्याना प्रश्न पडला आता काय करावे?म्हातारे बापू तर थरथरायला लागले. मोना आणि तिचा नवरा कुशलने त्याच आठवड्यात वकील बोलावून आणले आणि कायदेशीर वाटण्या केल्या. बापूंच्या सगळ्या पावत्या निम्म्या सीमाला दिल्या. मुंबईचा फ्लॅट तिच्या नावावर करून दिला. जाताना ती दागिने घेऊन गेली.

.. आज या गोष्टीला दहा वर्षे झाली. संतोष आहे तसाच आहे. सीमा त्याची उस्तवारी करून जख्ख म्हातारी आणि आणखीच तिरसट आणि माणूसघाणी झालीय. मध्यंतरी मोना आणि कुशल तिच्या घरी संतोषला भेटायला गेले तर ही त्यांना वाटेल ते टाकून बोलली आणि मोनाला म्हणाली माझं जन्माचं नुकसान तू केलंस. मला तुझं तोंडही बघायचं नाही.

अपमानित होऊन दोघे घरी परत आले. मोनाला अतिशय वाईट वाटते की आपलं काय चुकलं? माझ्याच हाताला यश कसं नाही?मैत्रिणीचं भलं व्हावं हीच इच्छा होती माझी. हे विपरीत घडेल हे स्वप्नात तरी होतं का माझ्या? पण याला तिचा इलाज नव्हता. भल्या हेतूने केलेलं कामही मोनाला वाईटपणा देऊन गेलं आणि एक चांगली मैत्री कोणतेही कारण नसताना मोनाला वाईटपणा देऊन संपूनच गेली.

– समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रिय कृष्णा… ☆ सुश्री राजसी जान्हवी संदीप सुंकले ☆

? मनमंजुषेतून ?

☆ प्रिय कृष्णा… ☆ सुश्री राजसी जान्हवी संदीप सुंकले 

“ प्रिय कृष्णा, आज जन्मदिन ना तुझा? खूप आनंदी असशील ना मग? “

“ नाही…. “

“.. का रे? तुझ्या सगळ्या भक्तांनी status ला फोटो टाकला नाही का तुझा? “

“ हो ठेवलं होत ना status त्यांनी. ”

“ मग? दहीहंडी फोडली नाही का त्यांनी? “

“ हो, ते ही केलं… “

“ अरे मग? अच्छा, लवकर आटपला का त्यांनी कार्यक्रम? खूप वेळ नाचले नाही का ते तुझ्यासाठी trending गाण्यांवर? “

“ हो. झालं ते ही करून झालं की …”

“मग? तरी तू का खूष नाहीस? नैवेद्य ( भोग ) आवडला नाही का? तरीही मी आईला सांगत होते की जरा बाहेरून मागव काहीतरी स्पेशल. कृष्ण पण तेच तेच खाऊन कंटाळत असेलच की, पण नाही. ऐकेल ती आई कुठली ? एक काम करते, तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल ऑर्डर करते. ” 

“अगं कशाला ? नको ग.. एवढं सगळं तरी कशाला करायचं आता तुम्ही माझ्यासाठी…. जो काही माझ्या जन्मदिनाचा इव्हेंट करून ठेवला आहात ना तुम्ही, त्यानेच पोट भरलं माझं….. दमला असाल ना तुम्ही माझ्या नावाचं निमित्त करून हा “ इव्हेंट “ एंजॉय करता करता…. मग आता तुमच्यासाठीच ऑर्डर करा…. स्पेशल काहीतरी… खरंतर तेही एव्हाना झालंच असेल म्हणा… असो.. सुखी रहा.. “ 

© सुश्री राजसी जान्हवी संदीप सुंकले 

मो 9028438769

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डोळ्यासंबंधी बरंच काही… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ डोळ्यासंबंधी बरंच काही ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे 

(25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर यादरम्यान आपल्या देशामध्ये नेत्रदान पंधरवडा पाळला जातो यानिमित्ताने नेत्रदान व डोळ्याचे आरोग्य याविषयी हा लेख अवश्य वाचा)

नेत्र, ज्याला आपण मराठीमध्ये डोळे म्हणतो हिंदीमध्ये आँख म्हणतो इंग्लिश मध्ये EYE म्हणतो संस्कृतमध्ये नेत्र किंवा चक्षू म्हणतो तेच ते डोळे.

शरीराचा प्रत्येक अवयव महत्वाचा आहे, पण डोळ्यांशिवाय माणूस नुसता अपूर्णच नाही तर शून्यवत होऊन जातो. डोळ्यां विना अस्तित्व या गोष्टीची कल्पना सुद्धा ज्यांना डोळे आहेत त्यांना करता येत नाही.

 

डोळ्याच्या बाहेरील भागात एक पारदर्शक पडदा असतो. त्यातून प्रकाश किरण आपल्या डोळ्यात शिरतात. या पडद्याला नेत्रपटल किंवा पारपटल तर इंग्लिश मध्ये व तांत्रिक भाषेत ‘कॉर्निया’ ( CORNEA ) असं म्हणतात. आपण सोयीसाठी कॉर्निया हाच शब्द वापरू. काही कारणामुळे जेव्हा कॉर्नियाचा पारदर्शकपणा नाहीसा होऊन तो पांढरट होतो, धुरकट होतो त्यावेळी डोळ्यातून प्रकाश किरण आत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे माणूस दृष्टिहीन बनतो. आंधळा म्हणण्यापेक्षा दृष्टिहीन म्हणणं हे जास्त योग्य. कारण कॉर्निया बदलल्या नंतर तो परत डोळस होऊ शकतो. पण हा कॉर्निया बदलायचा कसा ?

इसवी सन १९०५ पर्यंत याबाबतीत कुणी कल्पनाही करू शकलं नव्हतं.

सन १९०५ मध्ये झेक रिपब्लिक या देशात एडवर्ड जर्म व रॅमन कॅस्ट्रोविजो या दोघांनी जगातली पहिली नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी रीतीने पार पाडली. त्यानंतर अंधांना दृष्टी देण्यासाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला. परंतु दुर्दैवाने याबाबतची जनजागृती आज शंभर पेक्षाही जास्त वर्षे झाली तरी अपेक्षित प्रकारे झाली नाही. जनप्रबोधन ही प्रक्रिया अत्यंत धीम्या गतीने जाणारी आहे. परंतु गेल्या पंधरा वीस वर्षांमध्ये याला चांगली गती प्राप्त झाली आहे. सध्या अनेक मध्यम शहरांमध्ये सुद्धा नेत्रपेढ्या आहेत. त्यामुळे इच्छुकांचे नेत्रदान करणे सध्या सहज शक्य आहे. बहुतेक कोणत्याही गावापासून काही तासांच्या अंतरावर नेत्रपेढीची उपलब्धता असल्यामुळे तीन चार तासांमध्ये किंवा त्यापेक्षा कमी वेळात नेत्रपेढी ची टीम मृतदेहापर्यंत पोहोचू शकते आणि यशस्वीपणे कॉर्निया काढून घेता येतात. मृत्यूनंतर साधारणपणे सहा तासांच्या आत कॉर्निया काढून घेणे आवश्यक असते. म्हणजे ते चांगल्या स्थितीमध्ये राहू शकतात व त्याचे प्रत्यारोपण यशस्वीपणे करणे शक्य होते.

ज्यांना आपल्या घरी मृत झालेल्या नातेवाईकाच्या नेत्रांचे दान करायचे असेल त्यांनी काही गोष्टी करणे गरजेचे आहे. सर्वप्रथम ज्याचा मृत्यू झाला आहे आणि नेत्र काढून घ्यायचे आहेत अशा व्यक्तीचे स्थानिक डॉक्टर ने दिलेले मृत्यूचे वैद्यकीय प्रमाणपत्र त्वरित मिळवणे आवश्यक आहे, ज्यामध्ये मृत्यूचे कारण व वेळ नमूद केलेली असली पाहिजे. त्यानंतर त्वरित जवळच्या नेत्रपेढी ला फोन करावा, म्हणजे नेत्रपेढी ची टीम योग्य त्या वेळेत मृतदेहा पर्यंत पोहोचू शकेल. देह जमिनीवर झोपलेल्या स्थितीत असावा, पापण्या उघड्या असतील तर त्या बंद कराव्यात. डोक्याखाली उशी द्यावी ज्यायोगे डोके शरीरापासून साधारण सहा इंच वरच्या स्तरावर राहील. त्यानंतर डोळ्यावर ओल्या पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. पंखा चालू असेल तर तो बंद करावा. वातानुकूलन (A. C. ) चालू असेल तर मात्र ते चालूच ठेवावे. नेत्रपेढी ची टीम येईपर्यंत वरचेवर पाण्याच्या पट्ट्या बदलाव्यात. कॉर्निया सुकणार नाहीत याची काळजी घ्यावी.

नेत्र प्रत्यारोपण करीत असताना जमलेल्या व्यक्तींना बाहेर जाण्यास सांगावे. ज्यांना ते पाहता येणे असह्य होणार नाही अशा एखाद दुसऱ्या व्यक्तीला तेथे राहण्यास हरकत नाही. ही प्रक्रिया साधारणपणे अर्ध्या तासात पार पडते. ही टीम आल्यानंतर त्यांच्यासाठी कोमट पाणी आणि हात धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था आणि एकदे डस्टबिन जवळ असू द्यावे.

फक्त बुडून मृत्यू झाला असेल तर त्या मृतदेहाचे डोळे उपयोगी पडत नाहीत.

कॉर्नियामध्ये रक्तवाहिन्या नसतात त्यामुळे रक्तगट जुळण्याचा प्रश्न नसतो.. कोणाचाही कॉर्निया कोणालाही बसवता येतो. परंतु काही विशिष्ट संसर्गजन्य रोगग्रस्तांचे कॉर्निया बसवता येत नाही. उदाहरणार्थ कावीळ, एड्स, कॅन्सर आणि शरीरभर पसरलेले सेप्टिक अशा अनेक संसर्गजन्य रोगांमुळे मृत्यू झालेली व्यक्ती बाधित असेल तर अशा व्यक्तीच्या डोळ्यापासून ज्याला डोळे बसविले जातील त्याला त्या संसर्गाचा धोका असतो. म्हणून अशा रोगांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीचे नेत्रदान होऊ शकत नाही. नेत्र काढून घेतल्यानंतर मृतदेहातून थोडासा रक्ताचा नमुना काढून घेण्याची पद्धत असते, ज्यायोगे मृत शरीरामध्ये यापैकी कोणती लक्षणे नाहीत ना याची चाचणी करता येते. कोणत्याही वयाची व्यक्ती नेत्रदान करू शकते. परंतु कधीकधी अति वयस्कर व्यक्तींचे नेत्र रोपणाच्या उपयोगाचे नसू शकतात. अशा वेळेला अशा नेत्रांचा उपयोग मात्र संशोधनासाठी होऊ शकतो. त्यामुळे प्रत्यारोपणासाठी योग्य नसतील तर नेत्रदान करू नये अशा पद्धतीचा विचार मृत व्यक्तीचे नातेवाईक करतात. हे ही योग्य नाही. कारण संशोधन ही सुद्धा गरजेची गोष्ट आहे. संशोधनामुळे काय फायदा होतो याचं एक उदाहरण देता येईल. नेत्रा वरील संशोधनामध्ये अलीकडे असे आढळून आले आहे की कॉर्निया मध्ये दोन थर असतात. त्यामुळे एका कॉर्नियाचे दोन कॉर्नियामध्ये रूपांतर करता येते. त्यामुळे एका मृत व्यक्तीच्या नेत्रदानामुळे पूर्वी दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकत होती पण आता चार व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. याचा अर्थ नेत्रदानाची गरज निम्म्यावर आली आहे. त्यापुढेही या विषयावर संशोधन झाले आहे आणि आता अजून क्रांतिकारी संशोधन येण्याची शक्यता आहे. हा संशोधनाचा किती मोठा फायदा आहे ? त्यामुळे जरी प्रत्यारोपणासाठी नेत्र उपयुक्त नसतील तरी नातेवाइकांनी संशोधनासाठी असे नेत्र वापरण्याचा आग्रह धरून नेत्रदान नक्की करावे. डोळ्याची संरचना ही सगळ्यात गुंतागुंतीची आहे. मेंदूच्या रचने नंतर दुसरा नंबर डोळ्याच्या रचनेचा लागतो. डोळ्यावर खूप मोठे संशोधन करणे आवश्यक आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी परवानगी दिल्यास संपूर्ण डोळा म्हणजेच आयबॉल सुद्धा काढून घेऊन जाता येतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी संपूर्ण डोळा काढून घेण्याची परवानगी दिल्यास संशोधनासाठी आणि नेत्र प्रत्यारोपण प्रशिक्षणासाठी सुद्धा संपूर्ण डोळा म्हणजेच आयबॉल याची आवश्यकता असते. अजूनही रेटिना च्या अंधत्वावर उपाय सापडलेला नाही. ज्यावेळेस संपूर्ण डोळा म्हणजेच आयबॉल काढून घेतला जातो त्यावेळेस त्या खोबणी मध्ये दुसरा कृत्रिम आयबॉल बसवला जातो, आणी पापण्या बंद केल्या जातात. त्यामुळे चेहऱ्यावर कोणतीही भेसूरता किंवा विद्रूपपणा येत नाही. म्हणूनच संशोधनाच्या उपयुक्तते साठी संपूर्ण डोळा सुद्धा द्यावा अशी शिफारस करण्यास हरकत नाही. जगातील एकूण अंध व्यक्तींपैकी 25% अंध व्यक्ती भारतामध्ये आहेत. २०१८ च्या आकडेवारीनुसार भारतामध्ये एकूण ५२ लाख अंध व्यक्ती होत्या. (आणि दरवर्षी त्यात सूमारे ३५ हजार नवीन अंधांची भर पडतेच आहे. ) त्यातील ४६ लाख अंध व्यक्ती कॉर्निया मुळे अंध झालेल्या आढळल्या. त्यांचे अंधत्व नेत्रदानाने नक्कीच दूर होऊ शकते. परंतु दुर्दैवाने आपल्या देशात वर्षभरात साधारणपणे १० ते १५ हजार व्यक्तींचेच नेत्रदान होते.

नेत्र रोपण शस्त्रक्रिया ही अनेक वर्षांच्या यशस्वीतेने आणि अनुभवाने सिद्ध झालेली शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियांचा यशस्वीतेचा दर हा 90 टक्के आहे. त्यामुळे बहुतेक सर्व नेत्रदाने, यशस्वीरित्या इतरांना दृष्टी देण्यासाठी रोपण करता येतात.

नेत्रदानाचा संकल्प करणे म्हणजे नेत्रदानाच्या संकल्पपत्रावर सही करणे एवढाच अर्थ घेतला जातो. परंतु ही प्रक्रिया अपुरी आहे. नेत्रदान यशस्वी व्हायचे असेल तर संकल्प पत्रावर सही केल्यानंतर किंवा संकल्प पत्र न भरता सुद्धा आपण आपल्या मनात निश्चय केल्यानंतर आपल्या जवळच्या नातेवाईकांना, आपल्या वारसदारांना या गोष्टीबाबत पूर्णपणाने सजग करणे आवश्यक आहे. त्यांना नेत्रदानाची संपूर्ण माहिती देणे ही गरजेची गोष्ट आहे. त्यांचे संपूर्ण समाधान झाल्यानंतर, आपल्या मृत्यूनंतर नेत्रदान झाले पाहिजे याची जबाबदारी तुमची आहे आहे याची त्यांना जाणीव करून दिल्यानंतरच, नेत्रदान यशस्वी होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. त्यामुळे संकल्पपत्र भरण्या बरोबरच आपल्या कुटुंबातल्या सर्व व्यक्तींना याबद्दल माहिती देणे आणि त्यांना त्यासाठी तयार करणे हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.

आपल्या देशात नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्या एकूण व्यक्तींपैकी फक्त एक टक्के व्यक्तींचेच प्रत्यक्ष नेत्रदान होते. याचाच अर्थ संकल्पपत्र भरणे या कृती पेक्षा प्रत्यक्ष नेत्रदान घडवून आणण्यासाठी कुटुंबातल्या लोकांना जागृत करणे हीच सगळ्यात महत्वाची व आवश्यक गोष्ट आहे.

कोणत्याही वयाची व्यक्ती नेत्रदान करु शकते. कुठल्याही प्रकारचा डोळ्याचा नंबर असेल किंवा मोतीबिंदू वा काचबिंदू शस्त्रक्रिया झाली असेल किंवा मधुमेह आणि रक्तदाब असेल अशी कोणतीही व्यक्ती मृत्यूनंतर नेत्रदान नक्कीच करू शकते. अपघातात व्यक्ती मृत झाली असेल तर स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या परवानगीने कायदेशीरपणे नेत्रदान होऊ शकते, ते पोस्टमॉर्टेम करण्यापूर्वी करता येते. ज्यांचे कॉर्निया चांगले आहेत परंतु इतर काही दोषांमुळे ज्यांना अंधत्व आले आहे अशा अंध व्यक्ती सुद्धा नेत्रदान करु शकतात. जवळच्या नेत्रपेढीचे क्रमांक आपल्या घरात कॅलेंडरवर किंवा कुठेतरी लिहून ठेवणे आवश्यक आहे. या बाबतीत आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीच्या व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर तसेच बॅंका, पोस्ट ऑफिस वगैरे ठिकाणी खाजगी हॉस्पिटलच्या बाहेरच्या बाजूस जवळच्या नेत्र बँकेचे फोन नंबर एका बोर्डवर लिहून ठेवणे आवश्यक आहे. तसे झाल्यास नेत्रपेढीचा क्रमांक शोधण्यासाठी कोणाला ऐनवेळी धावपळ करायला लागणार नाही.

तसेच राष्ट्रीय क्रमांक १९१९ हा टोल फ्री क्रमांक असून या क्रमांकावर फोन केल्यास आणि आपले ठिकाण सांगितल्यास त्यांचेकडून आपल्या जवळच्या नेत्र बँकेचा क्रमांक आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे ऐन वेळेस नेत्र बँकेचा नंबर शोधण्याची धावपळ करावी लागणार नाही. नेत्रदान केल्यानंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना ते डोळे कुणाला बसले आहेत हे कधीही सांगितले जात नाही परंतु त्या डोळ्यांचा उपयोग रोपणासाठी झाला आहे किंवा नाही एवढीच माहिती मिळू शकते.

प्रत्येक व्यक्तीने जिवंतपणी आपल्या डोळ्याची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे, ज्यायोगे मृत्यूनंतर आपले डोळे एखाद्या नेत्रहीनाला उपयोगी पडतील.

डोळ्याचे महत्त्वाचे भाग म्हणजे बाहेरील भागात पारपटल म्हणजेच कॉर्निया (पारपटल) त्यानंतर नेत्रमणी म्हणजेच लेन्स, त्यानंतर महत्त्वाचा भाग हा नेत्रपटल म्हणजेच रेटिना. नेत्रमणी व नेत्रपटल याच्यामध्ये एक द्रवपदार्थ असतो. या द्रवपदार्थाचा दाब योग्य तऱ्हेने नियंत्रित केला गेलेला असतो. परंतु काही कारणामुळे तो दाब जर वाढला तर डोळ्याचे विकार होतात. त्यामुळे मुख्यत्वे काचबिंदू हा विकार उद्भवू शकतो. आजकाल मधुमेहाच्या रुग्णांमध्ये काचबिंदूचे प्रमाण जास्त आढळते. त्यासाठी तरुणांनी वर्षदोनवर्षातून एकदा आणि पन्नाशीनंतर दर सहा महिन्यातून एकदा डोळ्यांची संपूर्ण तपासणी करून घेणे आवश्यक आहे. म्हणजेच योग्य वेळेस जर एखाद्या व्याधीचे निदान झाले तर त्यावर उपचार करून त्या व्याधींपासून मुक्तता मिळू शकते. प्रत्येक जिवंत व्यक्तीने स्वतःच्या डोळ्यांची योग्य ती काळजी अवश्य घेतली पाहिजे.

नेत्रदानच नव्हे तर एकूणच अवयवदाना याविषयी विविध धर्मांचा विरोध नसल्याबद्दलचा उहापोह अवयवदान आणि धर्म याविषयीच्या लेखामध्ये मी केला आहे. त्यामुळे कोणत्याही धर्माचा विरोध नेत्रदानाला नाहीच हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे नेत्रदान हे एक पवित्र आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे या भावनेने प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प केला पाहिजे. नेत्रदान हे एक मानवतेचे कार्य आणि राष्ट्रकर्तव्य आहे.

© श्री सुनील देशपांडे

पाषाण, पुणे  मो – 9657709640 ईमेल  : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘कृष्णा…’ – लेखिका : सुश्री दुर्गा भागवत ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘कृष्णा…’ – लेखिका : सुश्री दुर्गा भागवत ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

तुला कसलं संबोधन लावायचं? तू आकाशासारखा वाटतोस मला, आकाश कसं सतत माथ्यावर असतं आपण जिथे जाऊ तिथे सोबत करतं पण त्याचा निळा रंग बोटावर नाही घेता येत… 

खरं म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात डोळ्यासमोर येतच नाहीस.. आधी येते ती आकाशाची गडद निळाई आणि मग त्यामागोमाग लहरत येतं एक मोरपीस… तुझं मोरपीस!

तुझ्याइतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही बघ! प्रत्येक नातं तू समरसून जगलास आणि वेळ येताच ते नातं त्यागून मोकळाही झालास! कधी परत वळून बघितलंस का रे मागे? तुझ्यामागे त्या माणसांचं काय झालं असेल तुझ्याशिवाय ?

तुझं सगळंच अतर्क्य! तू प्रचलित नियम मोडलेस. जन्म घेतलास वसुदेव देवकीच्या मथुरेत पण वाढलास नंद यशोदेकडे गोकुळात! दहीदुधाच्या चो-या केल्यास, भलत्या वयात गोपिकांची छेड काढलीस. सुदामा, अर्जुन, उद्धव यांचा मित्र तू होतासच पण द्रौपदीचा सुद्धा ‘सखा’ झालास. हे सुंदर नातं तू भारतीय स्त्रीला दिलंस. ‘बाईचा मित्र’ ही संकल्पनाच नव्हती तुझ्याआधी आपल्याकडे, ‘तो’ स्त्रीचा पिता, पती किंवा पुत्र असावा अशी आपली समाज रीत! विवाहित राधेचा प्रियकर झालास. अगदी प्रेमाचं प्रतिक म्हणून नाव घेताना राधेचं नाव तुझ्याआधी येतं.

पुढे अष्टनायिकांचा पती झालास तरी जरासंधाच्या तावडीतून सोडवलेल्या सोळा सहस्र स्त्रीयांना अभय दिलंस. तुझ्यानंतरही अनेक वर्षांनी सूरदासांनी तुझं बालपण त्यांच्या पदांतून मांडलं, मीरेने तुला ‘नटनागर गिरिधारी’ म्हणत साद घातली.

एक सांग, तू अनेक नाती निभावलीस पण जीव जडवलास तो फक्त राधेवर…! खरं ना? गोकूळ सोडल्यावर परत तू बासरी वाजवल्याचे उल्लेख कुठेच आढळत नाहीत.

गीतेत ‘यदा यदा हि धर्मस्य’ म्हणत तू परत येण्याचं वचन दिलं आहेस. पण आता युद्धासाठी नको रे येऊस, आम्ही माणसं म्हणजे एक एक बेट झालोय, यावर नात्यांचे पूल बांधायला ये! 

आणि हो, येताना रुक्मिणीला नाही आणलंस तरी चालेल पण राधिकेला सोबत घेऊन ये, म्हणजे तुझी बासरी ऐकायला मिळेल.

कृष्णा, पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये !

 लेखिका : सुश्री दुर्गा भागवत

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ धुंद करी सुगंध… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ धुंद करी सुगंध ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

फुल हिरवे पान हिरवे

हिरवाच त्यांचा गंध

कितीही लपला पानात

तरी सुग॔धच करी धुंद

*

 तीच धुंदी उद्युक्त करी

 शोध घेण्या गंधाचा

 कितीही लपला गर्द पानी

 परिमल सांगे पत्ता त्याचा

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – परिचर्चा ☆ “आंदोलनों और विमर्शों से कुछ लोग चर्चित जरूर हुए” – श्रीमति नासिरा शर्मा ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी , बी एड , प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित। कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4। यादों की धरोहर हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह -एक संवाददाता की डायरी को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार। हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह-महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष। दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ परिचर्चा ☆ “आंदोलनों और विमर्शों से कुछ लोग चर्चित जरूर हुए” – श्रीमति नासिरा शर्मा ☆ श्री कमलेश भारतीय  

-कमलेश भारतीय

आंदोलनों और विमर्शों से कुछ लोग चर्चित जरूर हुए

हरियाणा में साहित्य की बात बहुत ध्यान से सुनते हैं : नासिरा शर्मा

प्रसिद्ध लेखिका नासिरा शर्मा का कहना है कि चाहे कहानी आंदोलन रहे या फिर स्त्री या दलित जैसे विमर्श इनसे हिंदी साहित्य को तो फायदा नहीं हुआ लेकिन कुछ लोग इनके सहारे चर्चित जरूर हो गये। नासिरा शर्मा ने उपन्यास, कथा, रिपोर्ताज, बाल लेखन, संस्मरण और अनुवाद अनेक क्षेत्रों में महत्त्वपूर्ण योगदान दिया है। हाल ही में राजकमल प्रकाशन से इनका उपन्यास ‘अल्फा बीटा गामा’ आया है और चर्चित हो रहा है।

मूल रूप से नासिरा शर्मा जिला रायबरेली के मुस्तफ़ाबाद से हैं और उन्हें गर्व है कि ऊंचाहार रेल का नाम उनके गांव के कारण ही रखा गया। इनकी स्नातक की शिक्षा इलाहबाद में हुई। फिर शादी हो जाने पर वे अपने पति प्रो रामचंद्र शर्मा के साथ इंग्लैड चली गयीं और तीन वर्ष तक एडनबरा में बिताने के बाद वापिस आने पर जेएनयू में पाच वर्ष की पर्शियन में एमए की। इसके बाद स्वतंत्र लेखन शुरू किया और पत्रकारिता भी।

– साहित्य में रूचि कैसे?

– पूरा परिवार साहित्यिक रूचि रखता है और इसी के चलते मेरी रूचि भी साहित्य में होना स्वाभाविक था।

– शुरूआत किस विधा से की?

– कथा लेखन से। फिर अन्य विधाओं में रूचि बढ़ती गयी।

– कितनी पुस्तकें आ गयीं अब तक?

– पचास के आसपास। इनमें चौदह उपन्यास, दस कथा संग्रह, लेख, संस्मरण, रिपोर्ताज, बाल लेखन आदि भी हैं तो अनुवादित साहित्य भी है।

– जो प्रमुख सम्मान मिले उनके बारे में बताइए।

– सन् 2016 का साहित्य अकादमी सम्मान, सन् 2019 का व्यास सम्मान और महात्मा गांधी हिंदी संस्थान से सन् 2012 में सम्मान सहित अनेक सम्मान/पुरस्कार।

– आपने अनेक विधाओं में लिखा तो कौन सी विधा में सबसे ज्यादा सुकून मिलता है?

– सभी विधाओं में सुकून मिलता है क्योंकि मैं एक लेखक हूं और लेखक के अपने कई रंग होते हैं।

– कोई फिल्म या नाटक बना आपकी रचनाओं पर?

– हरियाणा के राजीव रंजन ने मेरी कहानी पर ‘अपनी कोख’ नाटक तैयार करवाया जिसे दिनेश खन्ना ने निर्देशित किया और बहुत बार खेला गया। अनेक टीवी फिल्में भी बनी मेरी रचनाओं पर। ‘अपनी कोख’ नाटक के हरियाणा में तीन सौ से ऊपर शोज हुए जो एक प्रकार से कीर्तिमान कहा जा सकता है। यह नाटक भ्रूण हत्या पर है और लोग इसे देखते रोये बिना न रहते थे।

– कथा आंदोलनों और स्त्री/दलित जैसे विमर्शों से क्या हुआ?

–  दलित व स्त्री हमेशा साहित्य के फोकस में रहे हैं लेकिन बाद में इन्हें विमर्शों का हिस्सा बना दिया गया जो दुखद है। कुछ लोगों को फोकस मिला। नारे की तरह रहे ये विमर्श। यह हमेशा होता है। कुछ लोगों का भला हुआ। आंदोलन से जुड़ने से चर्चा मिली।

– क्या महिला लेखन /पुरूष लेखन की बात सही है?

– नही। मैं हमेशा से इस तरह की खानाबंदी के खिलाफ रही हूं।

– हरियाणा के बारे में आपके क्या अनुभव हैं?

– मै हरियाणा बहुत घूमी और अनेक स्कूल कालेजों में जाने का अवसर मिला। मेवात में मेरे पति रामचंद्र शर्मा ने गांव गोद ले रखा था तो मेवात जाने का अवसर भी बहुत बार मिला। भगवान् दास मोरवाल व पारूथी जी सहित अनेक रचनाकारों से परिचय भी है। भगवान् दास मोरवाल ने न केवल उर्दू सीखी बल्कि बहुत मेहनत से उपन्यास लिखे। आपसे भी दिल्ली में रेणु हुसैन के कथा संग्रह के विमोचन पर परिचय हुआ। हरियाणा के लोग साहित्य के प्रति बहुत उत्सुकता रखते हैं और बहुत ध्यान से सुनते हैं। ‘हरिभूमि’ में मेरी अनेक रचनाओं को प्रमुखता से प्रकाशित किया जाता रहा।

– नयी पीढ़ी को क्या गुरुमंत्र देना चाहेंगीं?

– बस। लिखते रहो। अच्छे से अच्छा लिखने की कोशिश करते रहो।

– आगे क्या योजना है?

– अभी तो उपन्यास आया है – अल्फा बीटा गामा। आगे देखते हैं नया।

हमारी शुभकामनाएं नासिरा शर्मा को। आप इस नम्बर पर प्रतिक्रिया दे सकते हैं : 9811119489

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ कविता ☆ श्री अमरजीत कौंके की आठ मूल पंजाबी कविताएँ ☆ भावानुवाद – डॉ. जसप्रीत कौर फ़लक ☆

डॉ जसप्रीत कौर फ़लक

☆ कविता ☆ श्री अमरजीत कौंके की आठ मूल पंजाबी कविताएँ  ☆  भावानुवाद – डॉ. जसप्रीत कौर फ़लक 

डॉ. अमरजीत कौंके

(डॉ.अमरजीत कौंके  पंजाबी साहित्य के आकाश पर ध्रुव तारे की तरह चमकता हुआ नाम है जिसकी रोशनी में पंजाबी साहित्य मालामाल हुआ है। उनकी रचनाएँ प्रेम के सरोकारों को नए दृष्टिकोण से परिभाषित करती हैं। उनकी कविता की विशेषता  है कि यह पाठक से बड़ी ख़ामोशी से हम – कलाम होते  हुए उस की रूह में उतर जाती है ।पंजाबी भाषा में उनका विशेष पाठक वर्ग है।उनकी इन चुनिंदा पंजाबी कविताओं का अनुवाद हिंदी पाठकों को भी अनुभूति करेगा। उनके पास लेखन प्रक्रिया का जो अनुभव है उनकी रचनाओं में वो स्पष्ट देखा जा सकता है। साहित्य समाज का दर्पण होता है उनकी कविताएँ भी इस यथार्थ को सार्थक करती हैं- यह भावपूर्ण रचनायें संकलन में संकलित कर के गौरवान्वित हूँ।)

मूल पंजाबी कविता- डॉ. अमरजीत कौंके

अनुवादक- डॉ. जसप्रीत कौर फ़लक

(१) कविता की ऋतु

 जब भी कविता की ऋतु आई

 तेरी यादों के कितने मौसम

अपने साथ लाई

*

मैं कविता नहीं

जैसे तुझे ही लिखता हूँ

मेरे पोरों

मेरे नैनों

मेरे लहू में

तेरा अजब-सा नशा चढ़ता है

अजीब सा ख़याल

हैरान करने वाला

पता नहीं कहाँ से हो फूटता है

*

 तू अचानक से मेरे पास आप बैठती

तेरी नज़र

मेरी कविता का एक-एक शब्द

किसी पारखू की तरह

टनका के देखती

मेरी आँखों में

तेरा मुस्कुराता चेहरा आता

मेरे पास शब्दों की

बारिश करता

और मैं किसी बच्चे की तरह

शब्दों को उठा-उठा कर

पंक्ति में सजाता

*

कहीं भी हो चाहे

कितने ही दूर

असीम अनंत दूरी पर

*

परन्तु कविता की ऋतु में

तू सदैव

मेरे पास-पास होती।

*

(२) कैसे आऊँ

मेरी चेतना

हज़ार टुकड़ों में बँटी पड़ी हैं

मेरी स्मृतियों में

अतीत के कितने ग्रह

उपग्रह के

टुकड़े तैर रहे हैं

मेरे अन्दर

कितने जन्मों की धूल उड़ती

मेरे जंगलों में

कितनी डराती, आकर्षित करतीं

आवाज़े तैरती

मेरे समुन्दर में कितने ज्वार-भाटे

खौलते पानियों का संगीत

*

मैं चाहता हुआ भी

इन्हीं आवाज़ों

शोर संगीत बवण्डरों से

मुक्त नहीं हो सकता मैं

अपनी यादों की तख़्ती तो

कितनी लकीरों

कटी-बँटी शक्लें

*

मैं जानता हूँ

पर मेरी दोस्त!

मैं बचपन की कच्ची उम्र से

हज़ार टुकड़ों में बँटा

बिखरा

स्वयं ब्रहमण्ड में बिखरे

अपने टुकड़े

चुनने की कोशिश कर रहा हूँ

*

मैं पूरे का पूरा

तेरा

सिर्फ़ तेरा बन के

तेरे पास कैसे आऊँ…?

*

(३) मीलों तक अंधेरा

मैं जिस रोशनी में बैठा हूँ

मुझे यह रोशनी

मेरी नहीं लगती

इस बनावटी जैसी चाँदनी की

कोई भी किरण

पता नहीं क्यों

मेरी रूह में

नहीं जगती

*

जगमग करता

आँखों को चकाचौंध करता

यह जो चहु-ओर फैला प्रकाश है

अंदर झाँक के देखूं

तो मीलों तक अंधेरा है

कभी जब सोचता हूँ बैठ कर

तो महसूस यूँ होता

कि असल में

अंतर्मन  तक फैला

अंधेरा ही मेरा है

*

मेरे अंदर

अंधेरे में

मुझे सुनता

अक्सर होता विरलाप जैसा

मेरे सपनों को लिपटा

जो संताप जैसा

यह प्रकाश को बना देता

मेरे लिए एक पाप जैसा

*

 यह जगमगाती रोशनी

यह जो चहु-ओर प्रकाश है

अंदर झाँक के देखूं

तो मीलों तक अंधेरा है…।

*

(४) उदासी

छू कर नहीं देखा

उसे कभी

पर सदा रहती वह

मेरे नज़दीक – नज़दीक

उसकी परछाईं

*

सदा दिखती रहती मुझे

आस-पास

जब भी

मैं अपने गिर्द कसा हुआ  वस्त्र

थोड़ा ढीला करता

अपना पत्थर सा शरीर

थोड़ा सा नरम करता

*

वह अदृश्य सी

मेरे जिस्म में प्रवेश करती

मुझे कहती-

क्यों रहता है दूर मुझ से

क्यों भागता है डर के

मैं तो आदि-काल से तेरे साथ हूँ

मैं तो हमेशा तेरे साथ रहूँगी

वह मेरे जिस्म में फैलती

चलने लगती मेरे अंदर

*

मेरे भीतर

सोई हुई सुरों को जगाती

अतीत की धूल उठाती

मुझे अजीब संसार में

ले जाती

*

जहाँ से कितने-कितने दिन

लौटने के लिए

कोई राह न पाता

मैं फिर लौटता आख़िर

वर्तमान के

भूल-भुलैया में खोता

पर उसकी परछाईं

सदा दिखती रहती मुझे

क़रीब-क़रीब

सदा रहती वह

मेरे आस-पास…।

*

(५ ) पहला प्यार नहीं लौटता

पंछी उड़ते

जाते हैं दूर दिशाओं में

लौट आते हैं

आखिर शाम ढलने पर

फिर अपने

घोंसलों में

*

गाड़ियाँ जातीं

लौट आतीं

स्टेशनों पर

लंबी सीटी बजातीं

*

ऋतुएँ जातीं

फिर लौट आतीं

दिन चढ़ता

छिपता

फिर चढ़ता

*

बर्फ पिघलती

नदियों में जल बहता

समुद्रों से पानी

भाप बनकर उड़ता

बादल बनता

फिर पहाड़ों की

चोटियों पर

बर्फ बनकर चमकता

उड़ती आत्मा

अन्तरिक्ष में भटकती

फिर किसी शरीर में

प्रवेश करती

*

सब कुछ जाता

सब कुछ लौट आता

*

नहीं लौटता

इस ब्रह्मांड में

तो सिर्फ़

पहला प्यार नहीं लौटता

*

एक बार खो जाता

तो मनुष्य

जन्मों जन्म

कितने जन्म

उसके लिए

भटकता रहता…..।

*

(६) तब पूरी होगी दुनिया

मेरे बिना

अधूरी है दुनिया तेरी

*

तेरे हाथों में फूल हैं

माथे पर सूरज

तेरे सिर पर मुकुट है

तेरे पैरों के नीचे

सारी दुनिया की दौलत

तेरे चेहरे पर

चाँदनी नृत्य करती है

तेरे बालों में

सतरंगी चमकती हैं

पर तेरी आँखों में

भरे बादलों की

उदासी कहती है

कि मेरे बिना

अधूरी है दुनिया तेरी

*

पास कायनात है

भले ही मेरे भी

मेरे पोरों में थरथराते शब्द

होंठों पर महकता संगीत

मेरी भी आँखों में

कितनी धूप चमकती है

कितनी हवाएँ

चीर कर गुज़रती हैं मुझे

कितने समन्दर मेरे पैरों को

छू कर गुज़रते हैं

*

पर मेरे शब्दों से उदित होता

उदास संगीत बताता है

कि तेरे बिना

अधूरी है दुनिया मेरी

*

हम आदि-अनंत से

एक दूसरे बिना अधूरे

धरती ग्रहों-नक्षत्रों की तरह

घूमते एक दूसरे के लिए

एक होने के लिए

तरस रहे हैं

*

हम

जो अधूरे हैं

एक दूसरे बिना

*

हम मिलेंगे

तब पूरी होगी

दुनिया हमारी।

*

(७) बचपन-उम्र

स्कूल के एक कोने में

कुर्सी पर बैठा

आधी छुट्टी में

छोटे छोटे बच्चे भागते

देख रहा हूँ

*

नाचते कूदते

भागते दौड़ते

एक दूसरे को पकड़ते

फिर एक दूसरे से लड़ते

भगवान जैसे चेहरे इनके

बेफिक्र दुनियादारी से

अपनी अजब सी

दुनिया में

घूम रहे हैं

*

इनको देखकर

अचानक मैं

अपने अंदर खो जाऊं

छोटी उम्र वाले

भोले बचपन का

द्वार खटखटाऊं

*

पर मेरा बचपन

जैसे कोई काँटों वाली झाड़ी

जहां कहीं भी हाथ लगाऊं

काँटे ही काँटे

*

काँटों से

मासूम जैसे पत्ते बिंधते जाते

बचपन जैसे कोई डरावनी चीज़

डरते डरते लौट आऊं

सामने खेलते

नाचते कूदते

बच्चों को देखूं

*

पर मुझे कहीं भी

ऐसा बचपन मेरा

याद ना आए

बचपन की कोई याद मीठी

मेरे मन की तस्वीर पर

बन ना पाए

मेरा बचपन

जैसे कोई डरावनी चीज़

*

और लोग कहते हैं

कि बचपन की ये उम्रा

फिर कभी ना आए…..

*

(८) बस के सफर में

बस के सफर में

मेरे से अगली सीट पर

बैठी हुई थी एक औरत

साथ पति उसका

गोद में बच्चा खेलता

छोटा सा

ममता के साथ भरी वह औरत

उस छोटे से बच्चे को

बार-बार चूम रही थी

*

मासूम उसके चेहरे से

छुआ रही थी ठोड़ी अपनी

उसके अंदर से उभर रही थी

भरी-भरी ममता

उभर रहा था उसके अंदर से

ममता का प्यार

*

मेरे मन में

युगों-युगों से दबी हुई

जगी हसरत

मेरे मन में सदियों से सोया

आया ख़याल

काश कि इस औरत की

गोद में लेटा

छोटा सा बच्चा मैं होता

*

काश कि यह औरत

मेरी माँ होती।

कवि – डॉ. अमरजीत कौंके  

भावानुवाद –  डॉ. जसप्रीत कौर फ़लक

संपर्क – मकान न.-11 सैक्टर 1-A गुरू ग्यान विहार, डुगरी, लुधियाना, पंजाब – 141003 फोन नं – 9646863733 ई मेल – jaspreetkaurfalak@gmail.com

≈ संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आतिश का तरकश #251 – 136 – “ज़िन्दादिली से जीता हैं ज़िंदगी को…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी  ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं ।प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकशआज प्रस्तुत है आपकी भावप्रवण ग़ज़ल ज़िन्दादिली से जीता हैं ज़िंदगी को…” ।)

? ग़ज़ल # 136 – “ज़िन्दादिली से जीता हैं ज़िंदगी को…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ?

जिसके माथे पर चोट का निशान है,

यह आदमी एक मुकम्मल बयान है।

*

यायावरी उसकी गुल खिलाएगी ज़रूर,

उसके कदम बिजली नज़र में जहान है।

*

यह  दूसरों जैसा शख़्स दिखता तो है,

यारों पे मगर यह दिल से मेहरबान है।

*

ज़िन्दादिली से जीता हैं ज़िंदगी को,

ज़िंदगी जी लेना उसका अरमान है।

*

पुट्ठी इकलंगा धोबीपछाड़ मारता है,

वो मिट्टी से जुड़ा देशी पहलवान है।

*

उसके पास दिमाग़ तो दूसरों जैसा है,

परंतु ज़माने के हिसाब से शैतान है।

*

वो भी फिसला कठिन डगर पर कई दफ़ा,

मगर उसकी कामयाबी अजीमुश्शान  है।

*

दिखता भले ही आतिश होशियार चतुर,

ख़ुद को  जन्म से  समझता नादान है।

© श्री सुरेश पटवा ‘आतिश’

भोपाल, मध्य प्रदेश

*≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लेखन ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – लेखन ? ?

नित जागरण,

नित रचनाकर्म,

किस आकांक्षा से

इतना सब लिखा है?

उसकी नादानी हँसा गई

उहापोह याद दिला गई,

पग-पग पर, दुनियावी

सपनों से लड़ा है,

लेखक तो बस

लिखने के लिए बना है!

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 27 अगस्त से 9 दिवसीय श्रीकृष्ण साधना होगी। इस साधना में ध्यान एवं आत्म-परिष्कार भी साथ साथ चलेंगे।💥

🕉️ इस साधना का मंत्र है ॐ कृष्णाय नमः 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares