(संस्कारधानी जबलपुर की श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’ जी की लघुकथाओं, कविता /गीत का अपना संसार है। साप्ताहिक स्तम्भ – श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य शृंखला में आज प्रस्तुत है सामाजिक विमर्श पर आधारित हृदयस्पर्शी लघुकथा “डोर बेल”।)
☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य # 210 ☆
🌻लघुकथा🌻 डोर बेल🌻
बचपन सभी का बहुत प्यारा होता है। बचपन की यादें सारी जिंदगी जीने का मकसद बन जाती है।
किसी का बचपन संवर कर अच्छा किसी का बहुत अच्छा और किसी का स्वर्णिम बन जाता है। परन्तु कुछ का बचपन एक किस्सा बन जाता है।
मिट्टी का घरौंदा धीरे- धीरे घर बना। और रहने लगा एक परिवार। मासूम सी बिटिया अपने छोटे भाई और माँ पिताजी के साथ।
पिता जी बड़े प्यार से बिटिया को डोरबेल बुलाते थे, क्योंकि बाहर से आने के पहले ही वह दरवाजे पर खड़ी मिलती थी।
ठंड अपने पूर्ण जोश से दस्तक दे रही थी। रात पाली काम करके आज पिता जी लौटे। उनके हाथ एक खुबसुरत रंगबिरंगा कंबल था।
आज डोर बेल दरवाजे पर नही आई। माँ ने कहा शायद ठंड की वजह से सिमटी पडी सो रही है। पिताजी डोरबेल के पास पहुंचे। पर यह क्या???
डोर बेल तो ठंड से अकड गई थी। तुरंत दौड़ कर सरकारी अस्पताल ले जाया गया। जहाँ डा. ने कहा कि देर हो गई।
पिता जी कंबल में लपेटे डोरबेल को ले जा रहे थे। कानों में उसकी घंटी बजी – – – पिता जी डोर बेल टूट गई।
चौक के पास एनाउंसमेंट नेताओं का हो रहा था। सभी को कंबल बाँटा जा रहा है। अपना आधार कार्ड दिखा कर कंबल लेते जाए।
(श्री राकेश कुमार जी भारतीय स्टेट बैंक से 37 वर्ष सेवा के उपरांत वरिष्ठ अधिकारी के पद पर मुंबई से 2016 में सेवानिवृत। बैंक की सेवा में मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, राजस्थान के विभिन्न शहरों और वहाँ की संस्कृति को करीब से देखने का अवसर मिला। उनके आत्मकथ्य स्वरुप – “संभवतः मेरी रचनाएँ मेरी स्मृतियों और अनुभवों का लेखा जोखा है।” आज प्रस्तुत है आलेख की शृंखला – “देश -परदेश ” की अगली कड़ी।)
☆ आलेख # 109 ☆ देश-परदेश – क से कार ☆ श्री राकेश कुमार ☆
हिंदी भाषा जितनी सरल है, हमने अंग्रेजी का चोला पहनकर उसके साथ खूब खिलवाड़ करते हैं। हमने तो बचपन में क से कबूतर ही पढ़ा और जाना था। घर के आसपास तो क्या दूर तक कोई कार नहीं दिखती थी। कबूतर खूब देखे हैं। वैसे कबूतर भी उड़ तक फुर से आंखों से ओझल हो जाता है, आजकल की कार भी तो हवा में ही उड़ती हैं।
सत्तर के दशक में एक चर्चा राजनीति गलियारों में भी कार को लेकर खूब चली थी। “बेटा कार बनाता! मां सरकार चलाती!! उसका जवाब भी कुछ ऐसा ही था” बेटा कार बनाता! मां बेकार बनाती!!
हमारे अनुसार तो आज का दिन “कार दिवस” घोषित कर दिया जाना चाहिए। प्रातः काल ही समाचार पत्र में एक खबर थी, कि गूगल के कहने पर एक अर्ध निर्मित पुल से कार नीचे नदी में गिर गई, तीन युवा की मृत्यु भी हो गई हैं।
कुछ दिन पूर्व गुजरात में एक व्यक्ति ने मात्र दस वर्ष पुरानी अच्छी हालत वाली कार को अपने खेत की मिट्टी में दफना कर सैंकड़ों लोगों को भोज भी खिलाया। हमे तो आज तक ऐसे किसी भोज का निमंत्रण नहीं मिला, जहां शगुन का लिफाफा ना देना पड़ा हो।
एक अमरीकी न्यूज चैनल के वीडियो में हमारे देश की एक खबर के खूब चटकारे लिए हैं। नई बी एम डब्लू को बिगड़ैल औलाद ने नदी में डूबो दिया, उसको पिता से जगुआर ब्रांड की कार चाहिए थी। इस वीडियो को हमारे युवा, अपने अपने पिता को भेजकर अपनी बात मनवाने के हथियार के रूप में उपयोग कर सकते हैं।
आज सुबह से सोशल मीडिया पर कार ही छाई हुई हैं। एक साथी ने फोन पर बताया उनके घर के बाहर कोई अनजान अपनी कार खड़ी कर पांच दिन बाद उठाने के लिए आया था। जब मित्र ने इस बाबत उससे प्रश्न किया, तो विनम्रता पूर्वक कहने लगा आप ने घर के बाहर सी सी टीवी लगा रखें है। इसलिए कार की सुरक्षा सुनिश्चित करते हुए, आपके घर के बाहर कार पार्क कर दी थी।
मित्र को हमने भी ज्ञान दे दिया, बहुत बड़े वाले गमले रख कर उसको लोहे की पत्ती से कसवा देवें, कोई कार आपके घर के बाहर नहीं लगाएगा। मित्र भी हाज़िर जवाब था, बोला इतना गमले आदि पर खर्च करने से तो बाहर लगे सी सी टीवी के कैमरे ही उतरवा कर कुछ पैसे बना लूंगा।
📖 दि. २८/११/२४ ते रविवार दि. १/१२/२४ अंक बंद – सूचना 📖
काही अपरिहार्य कारणामुळे गुरुवार दि. २८/११/२४ ते रविवार दि. १/१२/२४ असे चार दिवस आपला दैनिक अंक प्रकाशित केला जाणार नाही. सोमवार दि. २/१२/२४ पासून अंक पुन्हा नियमित प्रकाशित केला जाईल.
— कृपया सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती.
– संपादक मंडळ
ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सर्व जगावर अधिराज्य करत हाहाकार माजवत होता. माणसे मरत होती, माणसं जगत होती, माणसं धडपडत होती, माणसांचं जे काही व्हायचं ते होत होतं. पण त्यालाही अंत होताच. येणार येणार म्हणून येत असलेली आणि टोचणार टोचणार म्हणून टोचणीला सुरुवात झालेली लस आली. जिच्या आगमनाकडे आपण डोळे लावून बसलो होतो ती, होय तीच आली. आणखी एखादा विषाणू अजून येईल, झुंडीच्या झुंडी येतील. माणसांना टोचून जातील आणि संपून जाईल तो विषाणू. भविष्यात, उद्या, परवा कधीतरी. नक्कीच जाईल.
पण
असा एक विषाणू आपल्याला लक्षातही येत नाहीये. तो शिरतोय सगळीकडे. प्रसार माध्यमातून, प्रचार माध्यमातून, निवडणूक प्रचारातून, शिमग्याच्या बोंबाबोंबीतून. कुणातरी दोघांच्या संभाषणातून, पुढाऱ्यांच्या भाषणातून, कोणत्याही धर्माच्या धर्म प्रचारातून, उपदेशातून, निवडणुकीतून, राजकारणातून, गुंडगिरीतून आणि तथाकथित सभ्य माणसांच्या अंतर्मनाच्या गाभार्यातून. तो पसरतोय माणसा-माणसांच्या गप्पातून, छापील माध्यमातून, व्हाट्सअप मधून, फेसबुक मधून, किंवा जी जी काही समाज माध्यमे आहेत त्या सर्व माध्यमातून. तो फिरतोय, पसरतोय, झिरपतोय आणि माणसाचे जीवन कठिण करतोय. शांततेनं जगण्याच्या सर्व सोयी नष्ट करतोय.
यावर औषध नाही. लस नाही. एवढच नाही तर, यावर संशोधन करणाऱ्या संशोधकांचे खून होतायत. दिवसाढवळ्या खून होतायत.
मग नवीन महामानव तरी जन्माला यावेत. परंतु त्यांच्याही भ्रूणहत्या होत आहेत. महामानव जन्मालाच येऊ नये म्हणून गर्भसंस्कारा पासूनच त्यांचं महात्म्य मारून टाकायचे प्रयत्न चालू असतात.
यावर उपाय शोधायला हवा, संशोधक निर्माण व्हावेत त्यांना संरक्षण मिळावे. अशी इच्छा धरण्याशिवाय आपल्या हातात काय आहे ? परंतु आशा करूया यासाठी कोणतीही लस आणि औषध नसलं तरी लोकांची नैसर्गिक सहनशक्ती प्रचंड मोठी आहे. ते वाट पाहतील कितीतरी वाट पाहतील त्यावरील उपायाची
किंवा
एका नव्या प्रेषिताची.
खरंच तो जन्म घेईल ? की या मानवजातीचा अंतच जवळ आला आहे ? मानवाचं नष्टचर्य हे या नव्या विषाणूतच दडलं आहे का?
☆ ४९८ – अ… – भाग – २ – हिन्दी लेखक : श्री हेमन्त बावनकर ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆
श्री हेमन्त बावनकर
(‘‘साहेब, आपण अगदी खरं बोलताय. जावयाच्या बाबतीत आम्ही खरंच नशीबवान आहोत. पण साहेब, हे सुख पदरात टाकण्यासाठी देवीआईने आमची अगदी कठोर परीक्षा घेतली होती. ”) – इथून पुढे —
राजेश काहीसा चमकला. रामजी हे काय बोलताहेत?
सरोजदेखील रामजींकडे उत्सुकतेने बघू लागली. रामजी थोडा वेळ गप्प बसले. जसा काही विचार करत होते की आपली व्यथा, दु:ख बोलावं की न बोलावं? त्यांच्या चेहे-यावरचे भाव भराभरा बदलू लागले. ते बघता बघता राजेश पुन्हा म्हणाला, ‘‘अखेर, देवीआईने आपली कोणती परीक्षा घेतली?”
रामजीची पत्नी जया हिला आपल्या पतीचं बोलणं मुळीच पसंत नव्हतं. तिला वाटायचं, आपलं दु:ख आपल्यापाशी आपल्यापुरतं. ते जाहीर कशाला करायचं? पण रामजींचं मत मात्र वेगळं होतं. त्यांना वाटायचं, ‘दु:ख वाटल्याने कमी होतं आणि सुख वाटल्याने वाढतं. ’ राजेशने पुन्हा एकदा विषय उकरून काढायचा प्रयत्न केला. ‘‘काय झालं रामजी? आपण कोणत्या विचारात पडलात?”
रामजींनी एक दिर्घ श्वास घेतला. आपले डोळे बंद केले. देवाला हात जोडले. आणि आपला माथा झुकवून त्याला नमस्कार करत, आपल्या विनम्र शैलीत बोलायला सुरूवात केली. ‘‘देवीआईची कृपा आहे. आणि तिचं बोलावणं आलं म्हणून आम्ही आपल्या सोबत यात्रेला निघालो. एरवी, आमचं आयुष्य बरबादच होत होतं. तसंही सध्या भलेपणाचे दिवस राहिले नाहीत. ”
रामजी काही वेळ स्तब्ध राहिले आणि नंतर सुरूवातीपासूनच सगळं सांगू लागले.
‘‘राजेश साहेब, मला तीन मुले. मोठी मुलगी सविता. आणि तिच्या पाठीवरची दोन मुले, भरत आणि लखन. मुलीचा विवाह तसा लवकरच झाला. आमचे जावई सुरेश किती चांगले आहेत, हे आपण बघीतलंच. त्यांचा बु-हाणपूरला मोठा व्यापार आहे. मी स्वत: अतिशय धार्मिक स्वभावाचा, श्रध्दाळू आणि देवीआईचा भक्त आहे. देवीच्या कृपेने माझ्याकडे सगळे आहे. एक मोठं दुकान आहे. गोदाम आहे. शेत आहे. एक ऍम्बॅसेडर गाडी आहे. माझा किराणा मालाचा ठोक व्यवसाय आहे. आसपासच्या छोट्या गावातील दुकानदारांना किरकोळ भावाने माल सप्लाय करतो. गेल्याच वर्षी सिमेंटची एजन्सी घेतली. तेही काम चांगलं चाललय. ”
आता रामजी थोडा वेळ थांबले. दोन्ही बर्थच्या मध्ये असलेल्या ट्रेमधून पाण्याची बाटली उचलून पाणी पिऊ लागले. बोगीत आता पहिल्यापेक्षा शांतता होती. आसपासच्या बर्थवरील लोक झोपू लागले होते. ट्रेनने नर्मदा नदी पार केली होती. बाहेर चांगलाच काळोख झाला होता. रामजींनी पाण्याची बाटली ट्रेमध्ये ठेवली आणि आपलं बोलणं पुढे चालू केलं.
‘‘सगळं काही ठाक-ठीक चालू होतं, पण दैवाच्या मनात काही वेगळंच होतं. काम-व्यापार करता करता समाजसेवा करण्याचं व्यसन मला जडलं. त्या कामामुळे समाजातली माझी प्रतिष्ठा वाढली. काही मोठे लोक, राजकारणी पुढारीसुध्दा मला ओळखू लागले होते. मनात इच्छा होती, समाजातील गरीब, तळा-गाळातील लोकांसाठी काही करावं, त्यामुळे मान-सन्मान वाढेलच, पण मनाला शांतीही मिळेल. पण या समाजसेवेनेच मला बरबाद केलं. ”
‘‘समाजसेवा तर पुण्याचं काम आहे. ”
‘‘बस्स! काही पुण्य कमवावं, गरीबांना काही मदत व्हावी, म्हणून एक दिवस आवेशात येऊन सामूहिक विवाहाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. सर्वांनी मनापासून कौतुक केलं. मोठ्या लोकांनी सर्व त-हेच्या मदतीचं आश्वासन दिलं. काहींनी ते निभावलं पण बहुतेक जण पैसे देऊन मोकळे झाले. हिंडून-फिरून सगळी व्यवस्था करण्याची जबाबदारी केवळ माझ्यावर येऊन पडली. देवीआईच्या कृपेने सगळं व्यवस्थित पार पडलं. पण तेव्हा लक्षात आलं नाही, की त्यावेळी माझी बुध्दीच भ्रष्ट झाली होती. विवाहापूर्वी वधु-वर मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी मला काय सुचलं, कुणास ठाऊक? जीवनातला एक महत्त्वाचा निर्णय मी कोणताच विचार न करता घेतला. ”
आता रामजी पुन्हा थोडा वेळ गप्प बसले. आणि खिडकीबाहेर बघू लागले. रामजींची पत्नी जया गुपचुप आपल्या पतीचं बोलणं ऐकत होती. आता सरोजलाही रामजींच्या कथेत रस वाटू लागला होता. रामजींना खिडकीबाहेर दूरवर नजर टाकताना बघून, बोलणे पुढे वाढवावे, या दृष्टीने राजेशने म्हंटले, ‘‘आपण केलेली समाजसेवा, म्हणजे खरोखर वाखाणण्यासारखं काम आहे. सामूदायिक विवाहाचा निर्णय खरोखरच मोठे पुण्याचे काम आहे. यात कसली आलीय चूक?”
‘‘काय आहे, समाजातील प्रतिष्ठित लोक आपल्या मुलांचा विवाह सामूदायिक विवाह सोहळ्यात करत नाहीत. मला वाटलं, माझ्या मुलाचा विवाह मी असा सामूदायिक विवाह सोहळ्यात केला, तर लोकांना, समाजाला ते उत्तम उदाहरण घालून दिल्यासारखं होईल. त्याच भावनेच्या आवेशात मी वधू-वर मेळाव्यात सरिता नावाच्या मुलीला माझ्या भरतसाठी पसंत केलं. पत्नी, मुलगी, जावई, मुले सगळ्यांशीच बोलून मग त्यांच्यासह सरितेच्या घरच्यांशी बोलणी केली. त्यांनी तत्काळ संमती दिली. बोला-चालायला, व्यवहाराला माणसं बरी वाटली. मग मी जास्त काही जाणून न घेता, सार्वजनिक मंचावरून भरत आणि सरिता यांच्या विवाहाचा निर्णय जाहीर केला. एक पैसाही हुंडा न घेता, हा विवाह होईल, असेही तेव्हा सांगितले. अनेकांनी टाळ्या वाजवून माझ्या या निर्णयाचे स्वागत केले. स्तुती केली. नाही म्हणायला, माझा अगदी लहानपणापासूनचा दोस्त मला म्हणाला, ‘तू जरा घाईच करतो आहेस, असं नाही तुला वाटत? हा भरतच्या आयुष्यभराचा प्रश्न आहे. ’ परंतु माझा निर्णय घेऊन झाला होता.”
‘‘मग? तुम्ही तुमच्या मुलाचा विवाह केलात?”
‘‘होय राजेश साहेब. तुम्ही विश्वास ठेवा. देवीआईच्या कृपेने अजूनही मुले माझ्यापुढे तोंड उघडत नाहीत. मोठं हसत-खेळत इतर सामुदायिक जोड्यांबरोबर भरत आणि सरिताचंही लग्न झालं. समाजात आमची प्रतिष्ठा वाढली. घरातील सगळ्यांनी सरिताला मुलीचीच माया दिली. सरिताने देखील, सगळ्यांचीच मने जिंकून घेतली. ‘माँजी-माँजी’ म्हणत ती सतत जयाच्या मागे असायची. मी कामावरून आलो, की ‘बाबूजी-बाबूजी’ म्हणत मागे यायची. माझा नाश्ता, जेवण याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायची. भरतच्या चेह-यावरसुध्दा एक प्रकारचं तेज आलं होतं. एका नव्या-नवेल्या सुनेकडून आमची तरी यापेक्षा काय जास्त अपेक्षा असणार? मला वाटलं, माझा निर्णय अगदी शंभर टक्के बरोबर आहे. पण दैवाला मात्र काही वेगळंच मंजूर होतं. ”
राजेशला आश्चर्य वाटलं. ‘‘मग काय झालं?”
‘‘राजेश साहेब, इथूनच आमचे वाईट दिवस सुरु झाले. तीन-चार महिने गेले असतील, एक दिवस सरिताचे वडील सीताराम घरी आले. हात जोडून अतिशय विनम्रतेने म्हणाले, ‘मुलीची खूप आठवण येतेय. काही दिवस पाठवलंत तर मोठी मेहेरबानी होईल. ’ मी त्यांना म्हंटलं, ‘सरिताचा तो हक्कच आहे. मीदेखील मुलीचा बाप आहे. ’ खरं म्हणजे सरिता आमच्या घरात इतकी रमून गेली होती की तिने एकही दिवस माहेरची आठवण काढली नव्हती. मी सीतारामना म्हंटलं, ‘सरिता प्रथमच माहेरी चाललीय. भरत तुम्हाला पोचवायला येईल. ’ सीतारामनी मान हलवली आणि आपल्या मुलीशी एकांतात बोलण्याची इच्छा व्यक्त केली. मला त्यात काहीच अडचण वाटली नाही. आम्ही सरिता आणि सीताराम यांना बैठकीच्या खोलीतच एकांतात बोलण्याची संधी दिली. त्यानंतर भोजन करून त्यांना निरोप दिला. ”
राजेश सहजपणे म्हणून गेला, ‘‘इथपर्यंत सगळं ठीक वाटतंय. ’
‘‘इथपर्यंत सगळं ठीकच होतं राजेश साहेब! सरिताला निरोप देण्याची वेळ आली, तेव्हा सगळं घर उदास झालं. सरिताच्या चेह-यावर मात्र माहेरी जात असल्याची खुषी होती. आम्हाला वाटत होतं, सरिता नाही, जशी काही आमची मुलगीच काही दिवसांसाठी जात आहे. तिच्या बरोबर देण्यासाठी अनेक खाण्या-पिण्याचे जिन्नस पॅक केले. ”
यावेळी प्रथमच जया सरोजकडे बघत म्हणाली, ‘‘ताई, खरोखरच काजू, बदाम, आक्रोड, बेदाणे आणि सरिताला आवडणारी मिठाई मी सगळं माझ्या हाताने बांधून दिलं. ”
बहुधा रामजींना जयाचं हे मधे बोलणं योग्य वाटलं नाही. त्यांनी नजरेने इशारा केला आणि जया गप्प बसली.
सरिताने बॅग भरताना मोठ्या प्रेमाने जयाला विचारलं, ‘‘माँजी मी या साड्या नेऊ? हे दागिने घेऊन जाऊ?” असं म्हणत जवळ जवळ सगळेच दागिने बॅगेत भरले. ते चार-पाच लाखांचे सहज असतील. त्याच प्रमाणे सगळ्या किमती, महाग-मोलाच्या साड्या ठेवल्या. मी भरतला माझ्या ऍम्बॅसेडर गाडीत त्यांचे सगळे सामान ठेवायला सांगितले आणि जड मनाने त्यांना निरोप दिला. मला त्यावेळी काय माहीत होतं की ती सरिताची शेवटची पाठवणी असेल. ”
‘‘शेवटचा निरोप?”
‘‘नाही. आपल्याला वाटतय, तसं काही नाही. असं झालं की सरिता माहेरी गेली, त्याला तीन महिने झाले, पण ती काही परत येण्याचे नाव घेईना. मी सीतारामांना निरोप पाठवला की त्यांनी सरिताला आता परत पाठवावे. त्यांचा निरोप आला की तिला आणखी काही दिवस माहेरी राहू दे. मी विचार केला, ठीक आहे. सगळ्यांनाच तसं वाटतय, तर तसं होऊ दे. होता होता सहा महिने झाले. दोन वेळा भरत आणायला गेला, तर त्यालाही असंच सांगून परत पाठवलं. असं करता करता नऊ-दहा महिने होऊन गेले. आता मला वाटलं, मी स्वत:च जायला हवं. मग मी आणि भरत दोघेही सरिताला आणायला गेलो. मी प्रथमच त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांचं एकूण घर, रहाणी पाहून मला माझा मित्र कन्हैयालालचं बोलणं आठवलं. मग पुन्हा मनात आलं, सरिताच्या माहेरचं घर, रहाणी याच्याशी आपला काय संबंध? आपला संबंध फक्त सरिताशी. ती खूश, तर आम्ही खूश. सीतारामांनी आमचं आदरातिथ्य केलं. सरितादेखील चहा-नाश्ता घेऊन आली. आम्हाला नमस्कार केला. पण तिला बरोबर चलण्याविषयी बोललो, तेव्हा सीताराम गप्प बसले. त्यांनी सरिताकडे पाहिले. सरिता मान खाली घालून म्हणाली, ‘बाबूजी मी नंतर येते. ’ आणि ती आत निघून गेली. सीतारामही दोन्ही हात जोडून म्हणाले, ‘रामजी आपण काळजी करू नका. आम्ही तिला पाठवतो. ’ मी म्हंटलं, ‘सीतारामजी दहा महिने होत आले. ’ ते पुन्हा हात जोडून म्हणाले, ‘रामजी आम्ही पाठवतो म्हंटलं नं!’ मी भरतकडे पाहिले, तो उदास झाला होता.
आपलं बोलणं पुढे चालू ठेवत रामजी म्हणाले, ‘‘आम्ही आमच्या कारमध्ये बसून घरी आलो. मला रात्रभर झोप आली नाही. दुस-या दिवशी सकाळी उठल्या उठल्या मी कन्हैयालालकडे गेलो. त्याला सगळं सांगितलं. तो म्हणाला, ‘तरी मी तुला सांगत होतो, इतकी घाई करू नको. असो. जे झालं ते झालं. आता आपण याबाबतीत हरीभाईंचा सल्ला घेऊ या. ’ हरीभाई आमचे लहानपासूनचे मित्र. ते सध्या वकिली करतात. हरिभाईंचा सल्ला घेऊन मी घरी आलो आणि त्यांनी सुचवलेल्या योजनेसंबंधी जया आणि भरतशी चर्चा करू लागलो.
भरत केवळ हो ला हो करत होता. गेले कित्येक दिवस तो गप्प गप्पसाच होता. आणि ते स्वाभाविकही होतं. त्याचं खाणं-पिणं कमी झालं होतं. मन लावून कामही करू शकत नव्हता. ”
नंतर मी, जया, भरत आणि कन्हैयालाल पोलीस ठाण्याला लागून असलेल्या कुटुंब कल्याण केंद्रात पोचलो. हरिभाईंकडून आधी अर्ज लिहून घेतलेला होताच. आम्ही जेव्हा कुटुंब कल्याण केंद्राच्या इनचार्जला सगळी हकिकत सांगितली, तेव्हा त्यांना प्रथम खूप आश्चर्य वाटलं. त्या म्हणाल्या, ‘मुलाकडच्यांनी, मुलगी नांदायला येत नाही, अशा प्रकारची तक्रार करणारी, तुमची पहिलीच केस आमच्याकडे आली आहे. ’
मी त्यांच्यासमोर भरत-सरिताच्या विवाहा संबंधीची सगळी कागदपत्रं ठेवली. योगायोगाने माझ्याजवळ त्या वेळच्या वर्तमानपत्रातून सामूदायिक विवाहासंबंधी आलेल्या बातम्यांची कात्रणेही होती. त्याच्या झेरॉक्स प्रतीदेखील मी अर्जासोबत जोडल्या. माझा अर्ज आणि अन्य कागदपत्रे पाहिल्यावर त्या म्हणाल्या, ‘आपली काय इच्छा आहे?’ मी म्हंटलं, ‘सरिता आपल्या घरी पुन्हा नांदायला यावी, एवढीच इच्छा आहे. ’
इनचार्ज मॅडमनी केंद्रातील अन्य लोकांशी चर्चा केली. मग त्या म्हणाल्या, ‘पुढच्या सोमवारी मुलीकडच्यांना केंद्रात उपस्थित रहाण्यासाठी आम्ही नोटीस पाठवतो. आपण आपली नोटीस थोड्या वेळात घेऊन जा. आणि पुढल्या सोमवारी आपणही इथे या. त्यावेळी बोलू या. ”
आता आमची उत्सुकता वाढली होती.
– क्रमशः भाग पहिला
☆☆☆☆☆
मूळ हिंदी कथा – ४९८ -अ
मूळ लेखक – हेमंत बावनकर, मो. – 9833727628
अनुवादिका –सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
माझं आणि सायकलचं नातं अतूट आहे. आजही मला काळ्याभोर डांबरी मोकळ्या रस्त्यावरून मस्त “बनके पंछी गाये प्यारका तराना… “असे नूतन फेम गीत गात बेभान सायकल चालवायला आवडेल. मस्त गार हवा, आजुबाजूची हिरवळ, निळे डोंगर… वाह! क्या बात है !!असो ! पण सध्या मी जीम मधेच सायकल चालवण्याचा आनंद घेत असते !
ठाण्याचा कळवा पूल, पुलाखालून वाहणारी खाडी, जवळचे सेंट्रल मैदान, मैदानाच्या बाजूला प्रतिष्ठित लोकांसाठी असलेला क्लब जिथे टेबल टेनीस, बुद्धीबळ, पत्त्यातले रमी, ब्रिज असे खेळ, शिवाय क्लबची क्रिकेट टीमही होती जे मैदानात प्रोफेशनल क्रिकेट खेळत.. (आमच्यासारखं गल्ली क्रिकेट नव्हतं ते) ठाण्यातला एक उच्चभ्रू वर्ग ज्यात श्रीमान श्रीमती सदस्य असत. त्या क्लबविषयी मला खूपच कुतुहल असायचं. पण आम्ही वाढत असलेल्या बाळबोध संस्कृतीपासून तो वेगळा होता. तरीपण चुकारपणे मनात यायचं आयुष्यात कधीतरी आपण अशा हायफाय क्लबचे सदस्य होऊ.
क्लबला लागून असलेलं तळं, तळ्याजवळचा सदैव सळसळणारा, गर्द हिरव्या पानांचा, भला मोठा पिंपळवृक्ष आणि बाजूचं शांत मंदिर. ( मंदिर बहुदा हनुमानाचं असावं. आता स्पष्टपणे आठवत नाही) पण ही सारी ठाण्यातली विशेषतः आमच्या घराजवळची ठळक ठिकाणे होती ज्यांच्याशी आमचं बालपण बांधलेलं होतं आणि आताही आहे. आता क्वचित कधी त्या परिसरात जायचा योग आला तरी मी त्या वातावरणातले माझे बालपणीचे क्षण नकळतपणे वेचत राहते. खूप काही तिथे बदललेलं असलं तरी आठवणींच्या खुणा मी शोधत राहते.
धोबी गल्ली ते सेंट्रल मैदान दरम्यानचा रस्ताही मला चांगला आठवतोय. पहिल्या टप्प्यावर टेंभी नाका, डाव्या हाताला घुले यांचं मोठं चहा भजीचं काहीसं इराणी टाईप हॉटेल. तिथून पुढे चालत गेलं की आमची बारा नंबरची शाळा, पुढे डाव्या बाजूला गुरुद्वार, त्यानंतर जिल्हा न्यायालय आणि नंतरचा खारकर आळीकडे जाणारा चौक आणि मैदानाकडचा रस्ता. कितीतरी वेळा त्या रस्त्यावरून आम्ही सारे हातात हात घालून मजेत एकमेकांची टिंगल टवाळी करत चालत गेलेलो आहोत. थंडीच्या दिवसात वाटेवरच्या बुचाच्या झाडाखाली पडलेली असंख्य लांब देठाची, चार पाच पांढऱ्या पाकळ्यांची सुवासिक फुलं वेचून त्याचे गुच्छ करायचे आणि कुणाचा गुच्छ मोठा, कुणाचा लहान यावरूनही मस्करी चालायची.
मैदानाच्या बाजूच्या त्या पिंपळवृक्षावर संध्याकाळच्या वेळी शेकडो वटवाघुळे उलटी लटकलेली असत आणि त्यांचे अविरत चिं चिं चित्कारणे चालू असायचे. तो नाद, मंदिरातली शांतता, मधूनच वाजणारी समोरच्या चर्चमधली घंटा आणि तळ्यातलं हिरवट, काळं, संथ पाणी.. या साऱ्यांमुळे एक गूढता त्या वातावरणात दाटलेली असायची. मैदानात भरपूर खेळून दमून गेल्यानंतर आम्ही सारे सवंगडी हळूहळू सरत चाललेल्या त्या संध्यासमयी मस्त पाय पसरून मैदानातल्या खुरट्या गवतावर आरामशीर बसलो की डोक्यावरचं ते मोकळं आभाळ आणि आभाळातल्या हळुहळू काळोखात बुडणाऱ्या निळ्या, जांभळ्या, केशरी, रंगाशी आमचा एक अनामिक संवाद चालायचा. चुकारपणे उगवलेल्या एकुलत्या एक चांदणीकडे पाहताना खूप पॉझिटिव्ह वाटायचं. त्यावेळी wishing star ही संकल्पना अवगत नव्हती पण त्या गूढतेत कसलीतरी शाश्वती वाटायची. खरं म्हणजे बालपणी शरीराच्या अंतःप्रवाहात त्यावेळी डचमळणारा हा भावनांचा डोह काय होता हे कळत नव्हतं पण खुरट्या गवतावर —खेळातली भरपूर मस्ती संपल्यानंतर पाय पसरून बसल्या नंतरची परस्परांमधली ही शांतता मला आठवते. मात्र नक्की या शांततेशी जुळलेलं नातं, त्याचं नाव हे काही कळत नव्हतं. बिनरंगाचं, बिनरेषांचं एक अनामिक चित्र मात्र असावं ते जे अजूनही मनातून पुसलेलं नाही म्हणून पुन्हा जेव्हा त्या आठवणीत मी रमते तेव्हा याच चित्राचे तेव्हा न कळलेले अर्थ आता उलगडत जातात.
लिहिता लिहिता मी थोडी भरकटले पण खरा मुद्दा होता तो “मे” महिन्याच्या सुट्टीचा आणि सुट्टीतल्या खेळांच्या मुक्त आनंदाचा आणि माझ्या सायकल चालवण्याच्या भन्नाट छंदाचा. या सायकल सफारीशी माझ्या काही गमतीदार आठवणी जुडलेल्या आहेत.
मे महिन्याची सुट्टी लागली की आम्ही गल्लीतली सगळी मुलं मुली सेंट्रल मैदानात भाड्याची सायकल फिरवत असू. एका तासाचे दोन आणे भाडं! पण तेही सहजासहजी मिळायचे नाहीत, त्यासाठी वडिलांना अडीचक्याचा पाढा तोंडपाठ म्हणून दाखवावा लागायचा… आता मुलांचे तीस पर्यंत तरी पाढे पाठ असतात की नाही कोण जाणे! तेव्हां कुठे होते कॅलक्युलेटर्स.. संगणक.. ?
तर माझ्या सायकल शिकण्याची गोष्ट अशी अडीचक्यापासून सुरु होते.. गल्लीतल्या मुलांनीच मला सायकल शिकवली. एक सवंगडी फार शहाणा होता. मला चिडवत म्हणाला, “तुला कधीही सायकल चालवता येणार नाही… तुला बॅलन्सींगचं तंत्रच कळत नाही. आणि तू भित्री भागुबाई आहेस. ” माझा इगो प्रचंड तुटला. मला भित्री म्हणतो? (आजही मला कुणी “भित्री” म्हटलेलं आवडत नाही. ) मग त्याला दाखवण्यासाठी मी मस्त डाव्या पेडलवर पाय ठेवून, थोडी गती घेऊन, उजवा पाय उचलून, त्याची मदत न घेता सायकलवर बसले आणि सुसाट निघाले. जिथे मैदान संपत होते. तिथे खड्डा होता. तो माझ्या मागून पळत येत होता, ओरडत होता.. ” मूर्ख !! ब्रेक्स लाव.. ब्रेक्स लाव… आपटशील ”.
सायकलसकट मी खड्ड्यात आपटले. भरपूर लागले. गुडघे फुटले. सायकलची चेन तुटली. मात्र माझ्या त्या सो काॅल्ड मित्राने मला काही फिल्म स्टाईल उचलून वगैरे खड्यातून बाहेर आणले नाही बरं का? तो मस्त खिदळतच राहिला. माझ्या डोळ्यातलं पाणी, संताप, अंगावरच्या जखमा या सार्यांनी कोलमडून गेलेली मी मित्राशी भांडत घरी आले. सायकल दुकानात परत करण्याचे काम तेव्हढे त्याने केले.
सायकल आणि ही आठवण सतत हातात हात घालून असतात. मात्र या घटनेनेने मला दोन गोष्टी शिकवल्या. एक, मी सायकल चालवायला शिकले आणि दुसरी महत्वाची जी आयुष्याला उपयोगी पडली. योग्य बॅलन्सींग आणि योग्य वेळी अपघात टाळण्यासाठी ब्रेक्स लावणे. आयुष्य जगत असताना या “ब्रेक्स”चे महत्त्व फार जाणवले. असो.
नंतरच्या आयुष्यात इंजीनवाली दोन चाकी चारचाकी वाहने अनेक वर्षे चालवली. पण त्याहीवेळी जेव्हा, जिथे संधी मिळाली तेव्हा तिथे मनसोक्त सायकल चालवली. आजही मला ही इको फ्रेंडली सायकल रपेट करायला आवडेल.
पण या सगळ्यात महत्त्वाचे काय?… ब्रेक्स… हे विसरले नाही
परमेश्वर संकटं अशाच व्यक्तीना देतो ज्यांच्यात त्या संकटांचा सामना करायची ताकत आहे.. त्याला खात्री आहे की कितीही वाईट परिस्थिती आली तरी तुम्ही त्यावर मात करू शकता, कोणत्याही बिकट प्रसंगातून ही स्वतःला सावरून योग्य मार्ग निवडू शकता ह्याची त्या ईश्वराला खात्री असते आणि म्हणूनच तो तुमच्या सोबत संकटांची मालिका सुरु करतो.. कोळशाला पैलू पाडले जात नाहीत तर तावून सुलाखून निघतो तो हिरा.. हिऱ्यावर पैलू पाडले जातात त्यालाच घाव सोसावे लागतात पण तरीही तो चमकतोच…! तसच आपलं ही आहे कितीही वाईट प्रसंग, संकट का येईना आपली नीतिमत्ता, स्वतःवरील विश्वास, परमेश्वरावरील श्रद्धा ह्याच्या जोरावर आपण मात करुच ही खात्री त्या विधात्याला ही असतेच आणि म्हणूनच तो आपली परिक्षा घेत असतो… सभोवती कितीही चिखल असला तरी कमळ निर्लेप, बेदाग राहतं, नाजूक राहतं.. गुलाबाला ही काटे सहन करावे लागतात, मोगरा, जाई, जुई, प्राजक्त ह्याना ही अल्प आयुष्य लाभतं पण त्यातही ते सभोवती सुगंधच पसरवतात.. ईश्वरचरणी अर्पित केली जातात…कागदी फुलं कितीही आकर्षक दिसली तरी ती ईश्वर चरणी नाही अर्पिली जाऊ शकतं.. संकटांचा सामना करणारे, त्यातून योग्य मार्ग काढणारेच ईश्वराचे खास असतात तो भलेही कठीण कठीण प्रसंग आणतं असेल तुमच्यावर पण तुमची साथ कधी सोडत नाही तो कोणत्या ना कोणत्या रुपात आपल्या पाठीशी असतोच असतो.. यश भलेही उशिरा मिळेल पण ते मिळवताना झालेल्या चुकांमधून आपण बरचं काही नकळत शिकत असतो.. होऊ देत चुका पण लढणं थांबवून परिक्षा अर्धवट सोडून देण्यापेक्षा चुका घडून त्यातून धडा घेणं महत्वाचं.. तेंव्हा संकटांची मालिका सुरु झाली की समजून जा आपण कोणी ऐरे गैरे नथु खैरे नाही आहोत तर आपण त्या ईश्वराचे खास आहोत तो आपल्या सदैव सोबत आहे आणि वादळ जरी त्यानेच आणलं असलं तरी आपल्याला पैलतीरी पण तोच नेणार आहे.. जो खुद्द परमेश्वराचा खास आहे त्याला संकटांची तमा बाळगण्याची गरजच काय ना…