मराठी साहित्य – जीवनरंग ☆ समन्वय ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ जीवनरंग ☆ — समन्वय — अलक ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

बागेतली रानजाई ‘एक्झोऱ्या’ ला बिलगली, तेव्हा पानोपानी खूप बहरली. तो आश्वस्त, ती बिनधास्त.त्याच्या लालभडक फुलांचे गुच्छेदार गेंद, तिच्या नाजुक, धवल, चिमुकल्या फुलांचा मंद, रोमांचक गंध. बाकीच्या वेली, सायली, जुई, मधुमालती तिच्या कडे बघून हसल्या फिदीफिदी. “कशाला घेतलास त्याचा आधार? आपण एकेकट्या आत्मनिर्भर होऊ शकतो.”

“तुम्ही तरी कसलातरी -भिंतीचा,काठीचा, गेटचा आधार घेतलाच आहे की. मी त्याचा घेतला. स्त्री मुक्ती, स्त्रीमुक्ती ऐकून कान विटले.  एकमेकांचे गुणावगुण आम्ही समजून घेतले नि आमचे  सूर छान जुळले.”

 

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रमोशन- भाग-1 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

 ☆ जीवनरंग ☆ प्रमोशन- भाग-1 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆ 

“ममा, ममा, आज ना मी पिट्टूला मेथीची भाजी भरवली.”

“खाल्ली त्याने की थुंकून टाकली?”

“अगं ममा, मिटक्या मारत खाल्ली. आणखीसुद्धा मागितली.”

“काय सांगतेस?”

“ममा, मी टू इअर्सची होते, तेव्हा मी खायचे का ग मेथीची भाजी?”

“दोन वर्षाची असताना तू दूधभाताचाच हट्ट करायचीस. आत्ताआत्ताशी कुठे सहावं वर्ष लागल्यापासून मॅडम स्वतःहून भाजी खायला लागल्याहेत.”

तेवढ्यात आरतीच्या लक्षात आलं -मघापासून आपण आणि जुईच तेवढ्या बोलतोय. समर, आई, बाबा तिघंही टेन्स दिसताहेत.

जुई उठून गेल्यावर आईंनी सहजच बोलल्यासारखं विचारलं, “मग काय ठरवलंयस तू, आरती?”

“कशाबद्दल म्हणताय, आई?”

“प्रमोशनबद्दल.”

“अप्लाय तर केलंय. आता अभ्यास करायला कसं जमतं, ते बघायचं. समर, तू असं कर ना. तू डिटेलमध्ये वाचशील ना, त्याच्या थोडक्यात नोट्स काढ. म्हणजे मला तेवढ्याच वाचल्या तरी पुरे. मला अभ्यासाला जास्त वेळ मिळेल असं वाटत नाही.”

“तुला वेळ मिळत नाही आणि तो रिकामटेकडा आहे?”सासू एकदम वाकड्यात का शिरली, तेच आरतीला कळेना.

ताटात होतं, तेवढंच बकाबका गिळून समर उठून गेला.

“बघितलंस? अर्ध्या जेवणावरून उठून गेला “-आईंनी आरतीलाच बोल लावला.

मग आरतीही काही न बोलता जेवत राहिली. बाबा तर निःसंग स्थितप्रज्ञासारखे कशातच पडायचे नाहीत.

आईंनी थोडा वेळ जाऊ दिला आणि परत एकदा मुद्द्याला हात घातला,”मी काय म्हणतेय आरती, तू तरी त्याला जरा समजून घे.”

“म्हणजे?”

“म्हणजे असं की, तो प्रमोशनच्या परीक्षेला बसतोय, तर त्यालाच बसू दे. म्हणजे त्याला एकट्यालाच बसू दे. तू कशाला बसतेस? आधीच तुझ्यावर मुलांची जबाबदारी आहे. आणि ह्या पोस्टवरच एवढं काम असतं. घरी यायला इतका उशीर होतो!मग आणखी वरची जागा मिळाली तर बघायलाच नको.”

बाबांनी जेवताजेवता मान वर करुन या सासूसुनेकडे बघितलं आणि पुन्हा खाली मान घालून जेवायला सुरुवात केली. कदाचित त्यांना कोणाची बाजू घ्यावी, ते कळलं नसेल किंवा हिंमत नसेल झाली.

समर आणि आरती दोघंही एकाच बँकेत होती. समरचं पहिलं प्रमोशन लग्नापूर्वीच झालं होतं. आरतीने मात्र जुई झाल्यावर प्रमोशन घेतलं होतं. खरं तर जुई तेव्हा खूप लहान होती. पण कोणालाही त्यात काही गैर वाटलं नव्हतं. मग आत्ताच ह्यांना आपलं प्रमोशनसाठी प्रयत्न करणं आक्षेपार्ह का वाटावं? आरती जेवताजेवता विचार करत होती.

“पुरुषाची गोष्ट वेगळी, बाईची गोष्ट वेगळी,”आई बोलतच होत्या,”त्याची बाहेरगावी कुठे बदली झाली, तर तो एकटा जाऊन राहील आणि दोघांचीही झाली तर सगळेच जाऊन राहाल. पण समजा, तुझी एकटीचीच बदली झाली, तर तू मुलांना घेऊन एकटी कुठे जाणार?”

आता मात्र आरतीला चीड आली. समरची बदली झाली, तर तो एकटा जाणार आणि माझी बदली झाली, तर मी मुलांना घेऊन जायचं? म्हणजे मुलांची जबाबदारी फक्त माझीच आहे? ती काय माझ्या एकटीचीच आहेत?

आरती काहीतरी सणसणीत बोलणार होती. तेवढ्यात जुई धावत आली.”ममा, ममा, मला आणि पिट्टूला झोप येत नाही आहे. तू लवकर चल आणि आम्हाला स्टोरी सांग. ”

मग वाद घालण्याच्या भानगडीत न पडता आरतीने पटापट मागचं आवरलं आणि ती मुलांना झोपवायला गेली.

                             क्रमश:….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जागतिक महिला दिन ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

 ☆ विविधा ☆ जागतिक महिला दिन ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

जागतिक महिला दिन अर्थात स्त्रीत्वाचा उत्सव… महिलांच्या सन्मानाचा त्यांच्या उत्कर्षाचा दिवस म्हणजे महिला दिन.. जगभरातून हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो कारण ८ मार्च या दिवशी महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो…

खरं तर रोजचा दिवस आपला. प्रत्येक स्त्रीचा…तिच्या आत्मसन्मानाचा आणि तिच्या कसोटीचाही… केवळ ती स्त्री आहे म्हणून भोगाव्या लागणाऱ्या वेदनेचा आणि ती स्त्री आहे म्हणूनच अनुभवता येणाऱ्या सर्जनत्वाचाही..

“जागतिक महिला दिन ” आजची सगळी वृतपत्रे यशस्वी महिलांच्या मुलाखती फोटोंनी भरगच्च भरले. ते वाचल्यावर आपल्याला समजते की किती तरी कठीण प्रसंगातून जाऊन त्यांनी आज वेगवेगळ्या स्तरावर यशाची शिखरे गाठली आहेत. हे सर्व वाचले की मनाला नवचैतन्य नवाहुरूप उभारी देऊन जातो. परंतु स्त्रीभृण हत्येचा किळसवाणा प्रकारही मनातून काही जात नाही. तसेच अजूनही या समाजात स्त्रीलिंग नाकारण्यात येत आहे. बरेचदा एक स्त्री दुसर्‍या स्त्रीची वैरी असल्याचे आजकाल आढळून येत आहे. मुलगी झाली की घरातील महिला वर्ग “दुसरी पण मुलगीच का? “… असे उद्दगार आपल्याला ऐकायला मिळतात. काही अपवादही आहे बरं का?..

खरं तर आजच्या या 21 व्या शतकात हे अपेक्षित आहे का? “बेटी बचाओ! बेटी पढाओ ” असे आजच्या या घडीला आपल्याला जाहिरात द्वारे पथनाट्याद्वारे सांगावे लागत आहे..

असे अनेक प्रश्न माझ्या मनात पिंगा घालायला लागले. विचार करता करता मला “ती “भेटली..

“ती “… आपल्याला अनेक नात्यातून भेटत असते..

आपल्या निसर्गदत्त सोशिक स्वभावानुसार..

सृष्टीच्या सृजनाचा आविष्कार…घडवून आणते आणि सहनही करते..वर्तमानावर चढावा नैराश्याचा झाकोळ भूतकाळ पोखरून काढणारा तर भविष्य अनेक प्रश्नचिन्ह घेऊन येणारा..तरीही शोधत असते उजेडवाटा “ती”

आपल्याच अस्तित्वाची पण स्वःसामर्थ्याने उजळत ठेऊन अंधाराला शह देत कणखरपणे उजेडाच्या बेटावर उभी असते. आपल्या अस्तित्वाचा ठसा बिनदिक्कत उमटवत असते “ती “..

आपल्या इच्छांना ध्यासांना आपलं सत्व सिद्ध करत आकार देण्याच्या धडपडीत किती -कितीकदा कोलमडून पडते. तरी पण एकेक पाऊल पुढे पुढे टाकत जाते. वाट शोधताना संवेदनांची पडझड, वाटेवरचे काटेकुटे दूर करत चालताना लागलेल्या क्षमतांचा कस, स्वाभिमानानं जगताना घरादारांशी झगडावं लागलेलं… तिने अनुभवलेलं तिचचं तिच्यातून तुटतं जाणं….तरीही.. चिकाटी आत्मविश्वास डळमळू न देणारी “ती”..

म्हणूनच म्हणावसं वाटतं की..

“ती ” ची कहाणी

“ती ” चं जगणं

अनेक प्रश्न घेऊन आयुष्याशी लढणं !

वर्तमानाची चिंता

भविष्याचे प्रश्न घेऊन

रोजचा दिवस ढकलणं!

“ती” च नाही महत्त्व

घराला नी समाजाला

तिच्या वेदना जाणून घ्याव्याशा

वाटत नाही कुणाला?

जीवनाच्या वाटचालीत धीर देत..

मार्गक्रमणा करित असते

अनपेक्षित घडले की

असहाय्य बनते?

जीवनाच्या भयानक भोवर्‍यात

अजाणता सापडते..!

जीवनाच्या वळणावर मात्र

“आयुष्य ” मोठं प्रश्नचिन्ह बनतं?

समस्येची उकल ही

करावीच लागणार!

आनंददायी तेजोमय यश

कि गडद काळोखी अपयश..!

हे प्रश्न मात्र क्षणाक्षणाला

विचलितचं करणार..!!

 

पुराणामध्ये स्त्री शक्तीला वंदन केले आहे.. स्त्री ही अनादीकाळापासून शक्ती स्वरूपात आहे. बदलत्या परिस्थितीत त्याची परिभाषा जरूर बदलली आहे.. कोणत्याही कठीण काळात स्त्री ही सर्वदाच अग्रणी असते  म्हणून “महिला” सशक्तीकरण हे आधुनिक नसून पौराणिकच आहे…

बदलत्या परिस्थितीत मात्र स्त्रीची भूमिका बदलली आहे. ती मुलगी, सून, पत्नी, माता ह्या भूमिकां  व्यतिरिक्त ती अधिकारी, वैज्ञानिक, शिक्षक, कर्मचारी, मालक, अशा अनेक रूपांनी नटलेली आहे. तिच्या जीवनाला अनेक पैलू लाभलेले आहेत. आणि त्यांना तिने  अधिक चमक आपल्या कर्तृत्वाने दिली आहे. आपल्या बुद्धीला, आत्मसन्मानाला तिने नवीन दिशा दिली आहे. आजच्या जगात असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे स्त्री नाही. प्रत्येक क्षेत्रात ती पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे तर काही ठिकाणी ती पुरूषांच्या देखील पुढे आहे.. ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर असे वाटते की आम्हाला आमची जागा मिळाली आहे. पण माझ्या मते अजून आम्हाला बरेच प्रयत्न करायचे आहेत…

जाता जाता मी म्हणेन की निरोगी हसतमुख आणि शांत स्त्री घराचे वैभव असते.तिचे स्वःताचे अस्तित्व परिपूर्ण असते.तू विधात्याची नवनिर्माणाची कलाकृती आहेस. एक दिवस तरी तू स्वःताच्या अस्तित्वाचा दिवस साजरा कर..

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जागतिक महिला दिन ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ विविधा ☆ जागतिक महिला दिन ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

आज जागतिक महिला दिन! ‘आजचा दिवस माझा’ असं म्हणत प्रत्येक महिलेनं स्वतःच्या हक्कासाठी लढायचा हा दिवस!! सध्या प्रत्येक गोष्टीला अधोरेखित करण्यासाठी एक दिवस ठरवण्याची पद्धत आहे. जागतिक महिला दिन हा सुद्धा एक असा दिवस! महिलांप्रती पुरुषांनी सजग करण्याचा दिवस!!

पदोपदी महिलांच्या आकांक्षांचा विचार करून आपल्या बरोबरीने समाजामध्ये त्यांना संधी मिळाली पाहिजे एवढी सजगता पुरुषांमध्ये यावी याची जाणीव करून देणारा हा दिवस!

पुरुषांची शारीरिक शक्ती जास्त असेल परंतु स्त्रीची मानसिक आणि आंतरिक शक्ती अतुलनीय आहे. शक्ती म्हणजे पाशवी शक्ती असेल तर ती पुरुषाकडे अधिक आहे परंतु नैतिक शक्ती अनंत परीनी स्त्रीजवळ जास्ती आहे हे विसरता कामा नये.या शक्तीला त्रिवार वंदन केलं पाहिजे.

जे जे उत्तम,उदात्त, उन्नत, महन्, मधुर ते ते सर्व स्त्री मध्ये आहे. तिच्याकडं जीवनाचं गांभीर्य आहे. स्त्री प्रेरणादायी आहे. तिच्या सर्व गुणांची कदर केली पाहिजे.

स्त्री विना अस्तित्व नाही. ती उद्याची माता आहे. ती स्वतः जन्म घेऊन नाते जोडते आणि जन्म देऊन नाते निर्मिते…. म्हणून ती विश्वाचा प्राण आहे असे म्हणायला हरकत नाही. तसा तिचा सन्मान व्हायला हवा.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं म्हटलं गेलं आहे. एक सुशिक्षित माता सुसंस्कृत समाज उभा करते म्हणून महिलांच्या साक्षरतेला प्राधान्य दिलं पाहिजे. स्त्रियांच्या शिक्षणासाठी घराचा उंबरठा ओलांडून जाणारी स्त्री ‘सावित्रीबाई’ हिची आठवण या दिवशी व्हावी असा हा दिवस!

स्त्री ही समाजाच्या नीतिमत्तेचा कणा आहे.त्यामुळे समाज तिला कसा वागवतो यावर समाजाचं आरोग्य अवलंबून आहे. सध्या स्त्रीला समाजाची वागणूक ‘बंदिनी… स्त्री ही हृदयी पान्हा नयनी पाणी’ अशी आहे. हे दुर्दैव आहे.हा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.

स्त्री जन्माच सार्थक मातृ रूपात आहे. शिवरायांच्या मातोश्री जिजाऊ,मुलाला पाठीला बांधून लढणाऱ्या ‘लक्ष्मीबाई’ यासारखा मातांचं स्मरण आजच्या दिवशी व्हायला हवं.

आज जगाच्या लोकसंख्येचा मोठा भाग महिलांनी व्यापलेला आहे.कर्तबगारी असूनही उपेक्षित असा हा महिला समाज… त्यांच्या सक्षमतेची जाणीव सर्वांना व्हावी हे या दिवसाचे प्रयोजन आहे आहे. महिलांच्या वाट्याला आलेलं अर्ध आभाळ अजून काळवंडलेलं आहे. हे मळभ घालवण्यासाठी तिचा निकराचा लढा चालू आहे. या तिच्या लढ्याला पुरुष वर्गाची उत्तम साथ हवी याची जाणीव आजच्या दिनी पुरुषांना झाली पाहिजे.

जगणं हे तिच्यासाठी एक आव्हान आहे.जगातल्या सर्वात सुरक्षित अशा जागी म्हणजेच आईच्या उदरात तिला नखं लागताहेत. त्यात दुर्दैवाने तिचे जन्मदाते आई-वडील सामील आहेत.

अर्थात आईला हे मान्य नाही. तिचं स्त्रीमन तिला साद घालतं, पण ती इथे अबला ठरते. तिच्या मनाविरुद्ध गोष्ट घडते.तिच्या वात्सल्याचया, प्रेमाच्या चिंधड्या होताहेत. हे दुर्दैवी आहे.

मुलीने या जगात प्रवेश केलाच तर…’ भय इथले संपत नाही’ अशा अवस्थेत ती जगते. अगदी अनोळख्या व्यक्ती पासून ते अगदी घरातल्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांची ती शिकार होते. शिवाय तोंड दाबून बुक्क्यांचा मार तो निराळाच…..

या सर्व संकटातून सहीसलामत सुटलेली पोर नशीब घेऊनच जन्माला येते म्हणायची…..खूप खबरदारीनं तळहातावरच्या फोडासारखं जपलेली ही पोर एक दिवस लग्न होऊन आपल्या घरी जाते. आईवडिलांची जबाबदारी कमी होते पण तिची वाढते.

सासू ही स्त्री असूनही तिच्याशी व्यवहारांनं वागते.संवेदना प्रेम यांची उणीव तिच्या वागण्यात जाणवते.सून आपल्या मुलीसारखी असं वारंवार म्हणते पण मुलगी म्हणायला तयार होत नाही.

ज्याच्या प्रेमाला ती आसुसलेली असते तो पुरुष…. नव्हे त्या पुरुषाची मानसिकता हा तिचा शत्रू आहे. आपल्या फायद्यासाठी तो तिला कशीही वापरतो. त्याचा पुरुषी अहंगंड त्याच्या भाषेत ही उतरला आहे. हेही ती पचवत आली आहे.

हा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. तिच्या वर होत असणाऱ्या अन्यायाची जाणीव होणं हे या दिवसाचं महत्त्व आहे.

तिच्या डोळ्यात अन्याया विरुध्द लढण्याचा अंगार आहे. फक्त त्याला कायद्याचे कवच हवं…. ते आहे पण ते आणखी सुरक्षित हवं.मग तो अंगार अगदी सगळी दुष्कृत्ये जाळून टाकेल.

महिलांच्या सबलीकरणापासून इतरही सर्व कायद्यात आज पर्यंत काहीच बदल झाले नाहीत असं माझं म्हणणं नाही पण त्याची गती कमी आहे. महिलांच्या बाबतीतले कायदे आणखी कडक व्हायला पाहिजेत जेणेकरून हे गुन्हे आटोक्यात येतील. आजच्या दिनी या गोष्टीचा परामर्श घेतला पाहिजे.

आजच्या या जागतिक महिला दिनी तिच्या या अर्धा आभाळात विश्वासाचा सूर्य कधी न मावळो ही इच्छा!

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 17 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 17 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

सौ.अंजली गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

ज्या प्रमाणे  कळीमधून कमळ हळू हळू उमलत जावे, त्याममाणे माझा सर्वांगीण विकास हळूहळू होत होता. माझ्या व्यक्तिमत्वातील सूप्त गुण फुलत होते. नवरत्न दिवाळी अंकाच्या माध्यमातून आमचा छोटासा महिला वाचन कट्टा तयार झाला. त्यामध्ये आम्ही कविता वाचन हिरीरीने करतो. त्यातीलच सौ.मुग्धा कानिटकर यांनी त्यांच्या घरी हॉल मध्ये माझ्या एकटीचा नृत्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्यांनी आपल्या अनेक मैत्रिणींना आमंत्रित केले होते. त्यामध्ये मी भरतनाट्यम चा नृत्याविष्कार सादर केला आणि कविताही सादर केल्या नाट्य सादर केले.त्या सर्वांनी माझे तोंड भरुन कौतुक केले.त्यांच्या शाब्बासकी मुळे मला खूप प्रोत्साहन मिळाले.

त्यापाठोपाठ तसाच कार्यक्रम मिरजेतील पाठक वृद्धाश्रमात मला आठ मार्च महिला दिनी कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली. सर्व आजी कंपनी मनापासून आनंद देऊन गेल्या आणि त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिले.

5 जानेवारी 2020 रोजी आमच्या नवरत्न दिवाळी अंकाच्या पुरस्कार वितरण सोहळा, सेलिब्रिटी श्रीयुत प्रसाद पंडित यांच्या उपस्थितीत साजरा झाला. त्याप्रसंगी मला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जयोस्तुते हे गीत नृत्य रुपात सादर करायला मिळाले.विशेष म्हणजे सुरवाती पासूनच सर्व प्रेक्षकांनी टाळ्यांचा ठेका धरला होता आणि नृत्य संपल्यावर सर्वांनी त्या गाण्याला आणि नृत्याला उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात अभिवादन केले. अर्थात हे मला नंतर सांगितल्या वर समजल. विशेष म्हणजे श्री प्रसाद पंडित यांनी कौतुकाची थाप दिली आणि मला म्हणाले, ” शिल्पाताई, आता आम्हाला तुमच्या बरोबर फोटो काढून घ्यायचाय.”

माझ्यातील वक्तृत्वकला ओळखून मी सूत्रसंचालन ही करू शकेनअसे वाटल्याने लागोपाठ तीन मोठ्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्याची संधी मला दिली गेली. एका नवरत्न दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचे सूत्रसंचालन गोखले काकू यांच्या मदतीने मी यशस्वी करून दाखवले.ते अध्यक्षांना नाही इतके भावले की त्यांनीच माझा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.त्यानंतर माझा भाऊ पंकज न्यायाधीश झाल्यानंतर आई-बाबांनी एक कौतुक सोहळा ठेवला होता. त्याचेही दमदार सुत्रसंचलन मीच केले ज्याचे सर्वांनी खूप कौतुक केले. दुसऱ्या दिवशी पंकज दादा मला म्हणाला, ” शिल्पू ने समोर कागद नसतानाही काल तोंडाचा पट्टा दाणदाण सोडला होता.” तसेच माझी मैत्रिण अनिता खाडिलकर हिच्या “मनपंख” पुस्तकाचे प्रकाशनझाले त्यावेळी त्या पुस्तकाच्या प्रकाशनाचे सूत्रसंचालन ही मी यशस्वी रित्या पार पाडले.

माझ्या डोळ्यासमोर कायमस्वरूपी फक्त आणि फक्त गडद काळोख असूनही मी माझ्या परिचितांच्या कार्यक्रमांमध्ये सुत्रसंचलन रुपी प्रकाशाची तिरीप आणू शकले याचे मला खूप समाधान आहे.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – उंच  तिचा  झोका ☆ तेजस्विनी डॉक्टर रखमाबाई राऊत ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

 ☆ उंच  तिचा  झोका ☆ तेजस्विनी डॉक्टर रखमाबाई राऊत ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

डॉक्टर रखमाबाई राऊत

ही गोष्ट आहे डॉक्टर रखमाबाई राऊत यांची.गोष्ट तशी जुनी, दीडशे वर्षांपूर्वीची. पण आजही भारतीयच नव्हे तर जगातील स्त्रियांसाठी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरली आहे. भारतातील पहिल्या स्त्री डॉक्टर हा मान निश्चितच डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा आहे. दुर्दैवाने डॉक्टर आनंदीबाई भारतात  परतल्यावर आजारी पडल्या व मृत्यू पावल्या. भारतातली पहिली प्रॅक्टिसिंग स्त्री डॉक्टर म्हणून डॉक्टर रखमा बाईंची इतिहासात नोंद आहे पण याहून खूप मोठा इतिहास त्यांनी स्वकर्तृत्वाने घडविला आहे. स्त्री शिक्षण,स्त्री-स्वातंत्र्य, स्त्री शक्ती, स्त्रीमुक्ती असे शब्द उच्चारणे हे ही पाप समजले जाई, त्याकाळात वीस वर्षांच्या कोवळ्या रखमाबाई संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधात उभ्या राहिल्या.अजाणत्या वयात लादलेल्या  लग्नापासून मुक्त होण्यासाठी,व्यक्ती स्वातंत्र्यासाठी त्या कायदेशीर लढाई लढल्या. आणि आणि स्वतःवरील  बालविवाहाचे संकट त्यांनी निग्रहाने परतवून लावले. 18 87 साली रखमाबाई कायदेशीरपणे विवाह बंधनातून मुक्त झाल्या. बॉम्बे हायकोर्टामध्ये चार वर्षे चाललेला हा खटला ‘विवाह प्रस्थापित करण्याकरीताचा खटला’ म्हणून जगभरात गाजला.

रखमाबाई चा जन्म 22 नोव्हेंबर 1864  साली झाला. त्यांच्या आईचे नाव जयंतीबाई व वडिलांचे नाव जनार्दन सावे होते. जनार्दन सावे हे व्यवसायाने कंत्राटदार होते. रखमाबाई यांचे आजोबा म्हणजे आईचे वडील हरिश्चंद्र यादव जी चौधरी हेही शिक्षित व आधुनिक विचारांचे होते.म्हणून मुलीचा विवाह त्यांनी उशिरा म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षी केला. रखमाबाई यांच्या जन्मानंतर अल्पावधीतच जनार्दन सावे यांचा काविळीने मृत्यू झाला. रखमाबाई यांचे आजोबा हरिश्चंद्र यांनी पुन्हा एकदा प्रथेविरोधात जाऊन जयंती बाईंचा पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला. हा त्या काळातील एक धाडसी निर्णय होता.

जयंती बाईंचे दुसरे पती म्हणजे डॉक्टर सखाराम अर्जुन राऊत. डॉक्टर सखाराम हे जे जे हॉस्पिटल मध्ये असिस्टंट सर्जन होते. अचाट बुद्धिमत्ता आणि संशोधक वृत्ती यामुळे वैद्यक शास्त्रावरील त्यांनी लिहिलेले ग्रंथ महत्त्वाचे मानले जातात. जयंती बाईबरोबर आलेली चिमुकली रखमाबाई डॉक्टर सखाराम अर्जुन यांच्या घरी वाढू लागली. हा रखमाबाई बाईंच्या आयुष्याला कलाटणी देणारा काळ होता. रखमाच्या जडण-घडणीत डॉक्टर सखाराम  या दुसऱ्या पित्याचा मौलिक वाटा आहे. प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत डॉक्टर बनण्याचे स्वप्न रखमा ने बघितले. हे धाडस त्या डॉक्टर सखाराम राऊत यांच्यामुळेच करू शकल्या. म्हणून तर रखमाबाईंनी जन्मदात्या ऐवजी डॉक्टर सखाराम राऊत यांचे नाव लावले. जन्मदात्यापेक्षा जन्‍म घडविणार्‍याला त्यांनी थोरपण दिले.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – उंच तिचा झोका ☆ गानगुरू डॉ. शोभा अभ्यंकर – भाग-1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 ☆ उंच  तिचा  झोका ☆ गानगुरू डॉ. शोभा अभ्यंकर – भाग-1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

डॉ. शोभा अभ्यंकर —- भारतीय शास्त्रीय संगीतविश्वात ‘गानगुरू’ म्हणून ख्यातनाम असलेले एक अतिशय उमदे आणि सतेज व्यक्तिमत्व.

प्रचंड जिद्द, आश्चर्य वाटावं अशी चिकाटी, आणि कौतुक वाटावं असा आत्मविश्वास यांची जन्मजात देणगी लाभलेल्या शोभाताईंबद्दल किती आणि काय काय लिहावं?

एका सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबात २० जानेवारी १९४६ रोजी शोभाताईंचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांचा समजूतदार, विचारी आणि अभ्यासू स्वभाव इतरांना प्रकर्षाने जाणवत होता. त्या वयातही राहण्या-बोलण्यातला, वागण्यातला पोच, नेमकेपणा,आणि स्वच्छतेची, नीटनेटकेपणाची आवड वेगळेपणाने उठून दिसावी अशीच. पुण्यातल्या हुजूरपागा शाळेत त्यांचे ११ वीपर्यंतचे शिक्षण झाले. तेव्हाही अभ्यासाइतकीच आवड होती ती गाण्याची. तेव्हाच्या हिंदी-मराठी चित्रपटातली बरीचशी गाणी शास्त्रीय संगीताशी नाते सांगणारी असायची,आणि शोभाताईंना ती बहुतेक सगळी गाणी त्यातल्या दोन कडव्यांच्या मधल्या म्युझिकसकट अगदी जशीच्या तशी म्हणता यायची याचे ऐकणाऱ्याला कमालीचे कौतुक वाटायचे. का कोण जाणे, पण त्या वयात शास्त्रीय संगीत शिकण्याचा म्हणावा तसा योग त्यांच्या आयुष्यात आला नाही. पण तरीही त्या संगीताशी त्यांची नाळ जन्मतःच जोडली गेलेली होती हे नक्की.

११वी उत्तम तऱ्हेने पास झाल्यावर त्यांनी स.प. कॉलेजमध्ये सायन्सला प्रवेश घेतला. कारण शास्त्र विषयात त्यांना गाण्याइतकीच गती होती. पुढे बायोकेमिस्ट्री या विषयात त्यांनी पुणे विद्यापीठाची एम.एस्सी. पदवी मिळवली.

तेव्हाच्या रीतीनुसार, आता पुरेसे शिक्षण झाले असे गृहीतच असल्याने, मग पुण्याच्याच श्री विजय अभ्यंकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. स्वतः श्री. विजय आणि त्यांचे सगळेच कुटुंबीय संपन्न-समजूतदार-प्रेमळ आणि शिक्षणाचा आदर व कदर करणारे होते. त्यात शोभाताईंचे व्यक्तिमत्त्वही असे होते की अगदी  लगेचच आपल्या वागण्याने त्यांनी तिथल्या सर्वांची मने जिंकून घेतली. बायोकेमिस्ट्रीतच पुढे पी.एचडी करावी या त्यांच्या विचाराला सगळ्यांनीच उचलून धरले, आणि अभ्यासही सुरु झाला. पण सासूसासरे, आजेसासूसासरे, लहान दीर-नणंदा अशा मोठ्या एकत्र कुटुंबात सगळ्यांसाठीची सगळी कामे उरकून दिवसभर विद्यापिठात जाणे फार कष्टप्रद होत होते. त्यात एका नव्या जीवाची चाहूल लागली,आणि त्यांनी आपणहून, अतिशय सारासार विचार करून तो अभ्यास थांबवण्याचा अवघड निर्णय घेतला.

पण फक्त उत्तम रीतीने संसार करणं ही आयुष्याची इतिकर्तव्यता नाही हे त्यांना, आणि विशेष म्हणजे श्री विजय यांनाही प्रकर्षाने जाणवत होतं. कारण शोभाताई खरोखरच सर्वगुणसंपन्न आहेत, जिद्दी आहेत, ध्यासवेड्या आहेत, हे त्यांना मनापासून पटलं होतं. आणि नेमक्या अशावेळी शोभाताईंची संगीताची आवड त्यांना वारंवार साद घालायला लागली…. इतकी आर्ततेने, की आता यापुढे शास्त्रीय संगीत हा एकच ध्यास घ्यायचा, हा निर्णय त्यांच्या मनाने,बहुदा त्यांच्याही नकळत घेऊन टाकला आणि मग त्यांचे शास्त्रीय-संगीत शिक्षण नियमितपणे सुरु झाले. पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडे जोमाने शिकायला सुरुवात झाली. आणि एकीकडे त्यांनी एस.एन.डी.टी. विद्यापिठात संगीत विषयात एम.ए चा अभ्यासही सुरू केला. अंतिम परिक्षेत त्या विद्यापिठाच्या भारतभरातल्या सर्व केंद्रांमधून त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला, आणि याच यशासाठी त्यांना विद्यापिठातर्फे सुवर्णपदक, “गानहिरा” पुरस्कार, आणि “वसंत देसाई पुरस्कार” हे मानाचे तीनही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पुढे संगीतमार्तंड पं. जसराजजी यांचे शिष्यत्व त्यांना लाभले. एकीकडे पं. वि. रा. आठवले यांच्याकडे अनवट, म्हणजे फारसे प्रचलित नसलेले, आडवाटेचे राग शिकण्यास जाणेही सुरु झाले होते. त्यांना अफाट स्मरणशक्तीचे केवढे मोठे वरदान लाभले होते, हे या सगळ्या शिक्षणादरम्यान, त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकाला प्रकर्षाने जाणवत होते.  कारण राग-स्वर-आरोह-अवरोह या सगळ्यांची, एकाही रागाच्याबाबतीत कुठेही लेखी नोंद करण्याची गरजच त्यांना कधीही पडत नसे.त्यांच्या डोक्यातच अशा प्रत्येक गोष्टीची कायमस्वरूपी तंतोतंत नोंद अशी घेतली जात असे की कित्येक वर्षांनी जरी त्यातला एखादा लहानसा संदर्भ जरी कुणी त्यांना विचारला तरी क्षणार्धात त्या योग्य उत्तर देत असत. “यांचा मेंदू आहे की कॉम्प्युटर “ अशीच विचारणाऱ्याची प्रतिक्रिया असायची.

 क्रमशः….

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार # 89 ☆ व्यंग्य – मेरे ग़मगुसार ☆ डॉ कुंदन सिंह परिहार

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज  प्रस्तुत है आपका एक  बेहद मजेदार व्यंग्य  ‘मेरे ग़मगुसार‘। इस अतिसुन्दर व्यंग्य रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 89 ☆

☆ व्यंग्य – मेरे ग़मगुसार

एक दिन ऐसा हुआ कि अचानक मेरी पत्नी का पाँव टूट गया। आजकल हाथ-पाँव टूटने का इलाज इतना मँहगा हो गया है कि दुख बाद में होता है, पहले खर्च की चिन्ता में दिमाग़ सुन्न हो जाता है। गिरने वाले पर सहानुभूति की जगह गुस्सा आता है कि इसने कहाँ से मुसीबत में डाल दिया। हमदर्दी के दो बोल बोलने के बजाय पतिदेव मुँह टेढ़ा करके पूछने लगते हैं, ‘पाँव संभाल कर नहीं रख सकती थीं?’ या ‘सीढ़ियों से उतरते में देख कर पाँव नहीं रख सकती थीं?’

कहने की ज़रूरत नहीं कि पत्नी की टाँग टूटने से मेरी कमर टूट गयी। करीब दो हज़ार की चोट लगी। पत्नी प्लास्टर चढ़वा कर आराम करने और सेवा कराने की स्थिति में आ गयीं। (नोट- पति से सेवा कराने पर पत्नी नर्क की अधिकारी बनती है। )

प्लास्टर वगैर से फुरसत पाकर उन सुखों का इंतज़ार करने लगा जो इस तरह की दुर्घटना के फलस्वरूप मिलते हैं, यानी पड़ोसियों और मुहल्लेवालों की सहानुभूति बटोरना। पत्नी से पूछ लिया कि सहानुभूति दिखाने के लिए आने वालों की ख़ातिर के लिए घर में पर्याप्त चाय-चीनी है या नहीं।

मुहल्ले के मल्होत्रा साहब के आने की तो उम्मीद नहीं थी क्योंकि पिछले साल जब उनकी पत्नी स्कूटर से लुढ़क कर ज़ख्मी हो गयी थीं, तब मैं उन्हें सहानुभूति दिखाने से चूक गया था। शहर में रिश्ते ऐसे ही काँटे की तौल पर होते हैं।

वर्मा जी के आने का सवाल इसलिए नहीं उठता था क्योंकि दो महीने पहले मैने उन्हें आधी रात को सक्सेना साहब के ईंटों के चट्टे से ईंटें चुराते हुए देखकर सक्सेना साहब को आवश्यक सूचना दे दी थी। तब से वे मुझसे बेहद ख़फ़ा थे।

बाकी लोगों के आने की उम्मीद थी और मैं उसी उम्मीद को लिये दरवाज़े की तरफ ताकता रहता था। कुछ रिश्तेदार आ चुके थे और श्रीमतीजी उन्हें अपना प्लास्टर इस तरह दिखा चुकी थीं जैसे कोई नयी साड़ी खरीद कर लायी हों।

जिस दिन प्लास्टर चढ़ा उस दिन शाम को बैरागी जी सपत्नीक आये। थोड़ा-बहुत दुख प्रकट करने के बाद वे आधा घंटा तक अपनी टाँग के बारे में बताते रहे जो पन्द्रह साल पहले टूटी थी। इस धूल-धूसरित इतिहास में भला मेरी क्या दिलचस्पी हो सकती थी, लेकिन वे अपनी पैंट ऊपर खिसकाकर मुझे मौका-मुआयना कराते रहे और मैं झूठी दिलचस्पी दिखाते हुए सिर हिलाता रहा।

जैसे ही उन्होंने थोड़ा दम लिया, मैंने पत्नी की टाँग को फिर फोकस में लाने की कोशिश की। लेकिन अफसोस, अब तक बैरागी जी टूटी टाँगों से ऊपर उठकर हमारे टीवी की तरफ मुखातिब हो गये थे, जिस पर ‘भाभीजी घर पर हैं’ सीरियल शुरू हो गया था। वे अपनी पत्नी से बोले, ‘अब यह प्रोग्राम देख कर ही चलेंगे। अभी चलने से मिस हो जाएगा। ’मैं खून के घूँट पीता शिष्टाचार दिखाता रहा। लगता था वे सहानुभूति दिखाने नहीं, सिर्फ चाय पीने, अपनी टाँग का पुराना किस्सा सुनाने और टीवी देखने आये थे। उनके जाने के बाद मैं बड़ी देर तक दाँत पीसता रहा।

पत्नी की टाँग तो टूटी ही थी, बैरागी जी ने मेरा दिल तोड़ दिया था। अब उम्मीद दूसरे पड़ोसियों से थी।

दूसरे दिन लल्लू भाई भाभी के साथ आये। उन्होंने पूरे विधि-विधान से सहानुभूति दिखायी। पत्नी का प्लास्टर इस तरह आँखें फाड़कर देखा जैसे ज़िन्दगी में पहली बार प्लास्टर देखा हो। पन्द्रह मिनट में पन्द्रह बार ‘बहुत अफसोस हुआ’ कहा। मेरा दिल खुश हुआ। लल्लू भाई ने सहानुभूति की रस्म पूरी करने के बाद ही चाय का प्याला ओठों से लगाया।

सहानुभूति के बाद लल्लू भाई चलने को हुए और हरे सिग्नल की तरह मैंने उनके सामने  सौंफ-सुपारी पेश कर दी। तभी टीवी पर ‘जीजाजी छत पर हैं’ सीरियल शुरू हो गया और लल्लू भाई दुनिया भूल कर उस तरफ मुड़ गये। उस दिन का एपिसोड भी ख़ासा दिलचस्प था। लल्लू भाई थोड़ी ही देर में ताली मार मार कर इस तरह हँस रहे थे जैसे अपने ही घर में बैठे हों। साफ था कि उन्होंने फिलहाल जाने का इरादा छोड़ दिया था।

थोड़ी देर में चोपड़ा जी सपत्नीक आ गये। आते ही उन्होंने ‘अफसोस हुआ’ वाला जुमला बोला। मैं आश्वस्त हुआ कि फिर मिजाज़पुर्सी का वातावरण बनेगा। चोपड़ा जी दुखी मुँह बनाये लल्लू भाई की बगल में बैठ गये। लेकिन दो मिनट बाद ही उनका मुखौटा गिर गया और वे भी लल्लू भाई की तरह ताली पीट पीट कर ठहाके लगाने लगे। मेरा दिल ख़ासा दुखी हो गया। एक तरफ मैं सहानुभूति की उम्मीद में उन्हें चाय पिला रहा था, दूसरी तरफ वे हँस हँस कर लोट-पोट हो रहे थे।

कार्यक्रम ख़त्म होने और लल्लू भाई के जाने के बाद चोपड़ा जी ने अपने मुँह को खींच-खाँच कर थोड़ा मातमी बनाया और हमदर्दी की बाकी रस्म पूरी की।

मैं समझ गया कि टीवी के रहते मेरे घर में हमदर्दी का सही वातावरण नहीं बनेगा। दूसरे दिन मैंने टीवी को दूसरे कमरे में रखवा दिया। सोचा, अब एकदम ठोस हमदर्दी का वातावरण रहेगा।

अगली शाम मेरे मुहल्ले के ठाकुर साहब सपत्नीक पधारे। मैंने सोच लिया कि अब हमदर्दी के सिवाय कुछ और नहीं होगा। ठाकुर साहब ने भी बाकायदा हमदर्दी की रस्में पूरी कीं। लेकिन चाय पीते वक्त लगा जैसे उनकी आँखें कुछ ढूँढ़ रही हों।

दो चार बार खाँसने के बाद उन्होंने पूछा, ‘आपका टीवी कहाँ गया?’

मैं तुरन्त सावधान हुआ, कहा, ‘खराब हो गया।’

उनके चेहरे पर अब असली दुख आ गया। बोले, ‘यह आपने बुरी खबर सुनायी। मेरा टीवी भी खराब है। अभी आठ बजे ‘मुगलेआज़म’ फिल्म आनी है। सोचा था आपको हमदर्दी दे देंगे और फिल्म भी देख लेंगे। यह तो बहुत गड़बड़ हो गया।’ सुनकर मुझे लगा वे मुझसे ज़्यादा हमदर्दी के काबिल हैं।

वे अपनी पत्नी से बोले, ‘जल्दी चलो, तिवारी जी के यहाँ चलते हैं।’ फिर वे हड़बड़ी में विदा लेकर चलते बने।

अगले दिन मुहल्ले की महिलाओं का जत्था आ गया। फिर उम्मीद बँधी। उन्होंने पत्नी का प्लास्टर देखकर खूब हल्लागुल्ला मचाया। मुझे भी अच्छा लगा। लेकिन इसके बाद वे सब ड्राइंगरूम में बैठ गयीं और चाय पीते हुए ऐसे बातें करने लगीं जैसे पिकनिक पर आयी हों। अब वे मेरी पत्नी की टाँग भूलकर चीख चीख कर यह बतला रही थीं कि किस सीरियल का हीरो बड़ा ‘क्यूट’ है और कौन सी हीरोइन पूरी बेशरम है। मुझे डर लगने लगा कि इन अहम मुद्दों पर यहाँ मारपीट हो जाएगी। मेरा जी फिर खिन्न हो गया।

घंटे भर तक मेरा घर सिर पर उठाने के बाद पत्नी को ‘बाय’ और ‘सी यू’ बोल कर वे विदा हुईं।

इन दुर्घटनाओं के बाद मेरा पड़ोसियों पर से भरोसा उठ गया है। असली हमदर्दी की उम्मीद जाती रही है और पत्नी की टाँग पर हुआ खर्च मुझे बुरी तरह साल रहा है।

 

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – जीवन यात्रा ☆ ‘हत्थ खिच्च के रखीं पुतर’…. स्व. शांतिरानी पॉल ☆ श्री अजीत सिंह, पूर्व समाचार निदेशक, दूरदर्शन

श्री अजीत सिंह

(हमारे आग्रह पर श्री अजीत सिंह जी (पूर्व समाचार निदेशक, दूरदर्शन) हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए विचारणीय आलेख, वार्ताएं, संस्मरण साझा करते रहते हैं।  इसके लिए हम उनके हृदय से आभारी हैं। आज  श्री अजीत सिंह जी द्वारा प्रस्तुत है ई-अभिव्यक्ति के जीवन-यात्रा स्तम्भ के अंतर्गत श्रद्धांजलि स्वरुप एक प्रेरक प्रसंग –  ‘’हत्थ खिच्च के रखीं पुतर’…. स्व. शांतिरानी पॉल’। हम आपकी अनुभवी कलम से ऐसे ही आलेख समय-समय पर साझा करते रहेंगे।)

श्रद्धांजलि
☆ जीवन यात्रा ☆ ‘हत्थ खिच्च के रखीं पुतर’…. स्व. शांतिरानी पॉल ☆

वे चली गईं यह कहकर…. “हत्थ खिच्च के रखीं पुतर”!

शांतिरानी पॉल का आशीर्वचन  हमेशा एक ही होता था, “हत्थ खिच्च के रखीं पुतर” यानि खर्चा संभल के करना।

जीवन में भारी उतार चढ़ाव देख चुकी वे अक्सर कहती थीं, “मुसीबतों को ज़्यादा याद नहीं करना चाहिए, नेमतों को याद रखो, और सबसे बड़ी बात यह कि किफायत से जीवन जीओ। बुरे वक़्त में सबसे पहले रुपया पैसा ही काम आता है। वक़्त कभी भी बदल सकता है”।

अपने पीछे एक भरा पूरा खुशहाल परिवार छोड़ 94-वर्ष  की आयु में वे गत दिवस अनन्त में विलीन हो गईं।  उम्र के हिसाब से वे अच्छी सेहत की मालिक थीं और  खानपान, टेलीविजन और क्रिकेट का मज़ा लेते हुए चिंतामुक्त मस्ती भरा जीवन बिता रही थीं पर 1947 के भारत-पाकिस्तान विभाजन के बाद उन्होंने बड़ा ही कष्टदायक जीवन देखा था।

विभाजन के वक़्त 6 महीने के पुत्र को लेकर लायलपुर से परिवार के साथ निकली शांतिरानी शिमला, हांसी और लुधियाना होते हुए आखिर हिसार में आकर बसी थी।

“पाकिस्तान से परिवार तो सही सलामत भारत आ गया था क्योंकि हम जुलाई 1947 में दंगे शुरू होने के तुरंत बाद ही निकल आए थे। सामान भी ट्रेन में बुक कराया था पर जब वो भारत पहुंचा तो ट्रकों और बोरियों में ईंट और पत्थर भरे मिले। कुछ गहने साथ ला सके थे, वहीं काम आए । शिमला में ननद के परिवार ने बड़ी मदद की, उन्हीं के कपड़े पहन कर 6 महीने गुजारे, फिर हांसी आ गए”।

“पति डॉ पाल की नौकरी कृषि विश्वविद्यालय लुधियाना में लगी तो वहां चले गए। हरियाणा बनने पर उनकी बदली हिसार हुई तो यहां आ गए और बस यहीं के हो कर रह गए। इस शहर और यहां के लोगों ने हमें बहुत कुछ दिया”।

हेलो हैलो’ और ‘आई लव यू’

शांतिरानी छोटे बेटे डॉ विनोद पॉल के साथ रहती थीं पर कई देशों में काम कर रहे पोते-पोतियों के पास भी घूम फिर आई थीं।

“विदेशों में अंग्रेज़ी बोलने की कुछ समस्या रहती है पर ‘हेलो हैलो’ और ‘आई लव यू’ से काम चल जाता है। फिर बेटा, बेटी या बहू मेरे ट्रांसलेटर बनकर साथ चलते थे। इंडिया में मेलजोल बड़ा है। अपने बंदों में रहने की बात ही अलग होती है”।

शांतिरानी की बहू कविता  कहती हैं कि आखिर तक वे अपना कमरा खुद ठीक करती थीं । “मेरी शादी ग्रेजुएशन के बाद ही हो गई थी। फिर बेटा पैदा हुआ और बेटे की देखभाल और घर-गृहस्थी में मुझे लगा कि अब मेरी आगे की पढ़ाई नहीं हो सकेगी। अम्मा ने मुझे पोस्ट ग्रेजुएशन के लिए भेजा और 6 महीने के मेरे बेटे की ऐसी देखभाल की कि वह कई साल तक अपनी दादी को ही मम्मी कहता रहा”।

सुख लेने में नहीं, देने में है

शांतिरानी को साढ़े तेरह हजार रूपए महीना फैमिली पेंशन मिलती थी। इसका वह पूरा हिसाब रखती थी। घर वालों को फिजूलखर्ची से रोकती थी।

“जब अम्मा को लगता  कि उसके खाते में चार लाख से ज़्यादा रुपए हो गए हैं तो वे  परिवार को इकट्ठा कर सब बेटे बेटियों में बराबर बांट देती थीं।

पर हमेशा इस नसीहत के साथ कि ‘हत्थ खिच्च के रखीं पुतर’, शांतिदेवी के पुत्र डॉ विनोद पॉल बताते हैं।

वानप्रस्थ संस्था में अपने सम्मान समारोह में पहुंची तो वहां भी 11 हजार की राशि दे आई और साथ में अपनी वही नसीहत भी, ‘हत्थ खिच्च के रखीं पुतर’।

अन्तिम समय तक अम्मा दिमागी तौर पर पूरी तरह अलर्ट थीं। चलने फिरने में तकलीफ होती थी। वे सादा भोजन करती थीं पर मिठाई और पकोड़े भी खाती थीं। नज़र भी सही थी। टेलीविजन स्क्रीन पर लिखे शब्द पढ़ लेती थीं।

लेडी-शो का मज़ा

अम्मा को सिनेमा का भी बड़ा शौक रहा। “पहले सिनेमा घरों में लेडी शो हुआ करते थे। बड़ी औरतें देखने जाती थी। राजेन्द्र कुमार मेरे प्रिय हीरो थे। ‘ससुराल’ और ‘आरज़ू’ फिल्में देखी थीं पर ‘मेरे महबूब’ नहीं देख सकी”, अम्मा ने पुरानी यादें खोजते हुए कहा था।

शांति रानी बाद में फिल्में कम और टेलीविजन सीरियल ज़्यादा देखती थीं, रोज़ाना करीबन 6 घंटे। क्रिकेट की भी बड़ी शौकीन थी। कोई खिलाड़ी ठीक न खेल रहा हो तो वे डांट लगाती थीं, “डुड्डा जेहा ना होवे ते”!

दिल बड़ा रखना चाहिए

बढ़ते पारिवारिक झगड़ों के बारे में सुन कर शांति रानी बड़ी हैरान होती थीं। “मुझे तो समझ ही नहीं आता कि लोग झगड़ते क्यूं हैं। चलो, छोटों ने कोई गलती करदी तो बड़ों को माफ कर देना चाहिए। बड़ों को हमेशा बड़ा दिल रखना चाहिए”।

उनकी यही सोच थी जिसने पूरे परिवार को बांधे रखा। सृजनात्मक सोच ही उनकी दीर्घ आयु का राज़ था।

नमन उनकी प्रेरणादायक स्मृति को।

©  श्री अजीत सिंह

पूर्व समाचार निदेशक, दूरदर्शन

संपर्क: 9466647037

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 88 ☆ अंतिम नींद ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।

श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली  कड़ी । ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)
☆ संजय उवाच # 88 ☆ अंतिम नींद ☆ 

दूसरे के जागने-सोने, खाने-पीने, उठने-बैठने, हँसने-बोलने, यहाँ तक की चुप रहने में भी मीन-मेख निकालना, आदमी को एक तरह का विकृत सुख देता है।तुलनात्मक रूप से एक भयंकर प्रयोग बता रहा हूँ, विचार करना।

रात को बिस्तर पर हो, आँखों में नींद गहराने लगे तो कल्पना करना कि इस लोक की यह अंतिम नींद है। सुबह नींद नहीं खुलने वाली।…यह विचार मत करना कि तुम्हारे कंधे क्या-क्या काम हैं। तुम नहीं उठोगे तो जगत का क्रियाकलाप कैसे बाधित होगा। जगत के दृश्य-अदृश्य असंख्य सजीवों में से एक हो तुम। तुम्हारा होना, तुम्हारे लिए महत्वपूर्ण हो सकता है पर जगत में तुम्हारी हैसियत दही में न दिखाई देनेवाले बैक्टीरिया से अधिक नहीं है। तुम नहीं उठोगे तो तुम्हारे सिवा किसी पर कोई दीर्घकालिक असर नहीं पड़ेगा।

तुम तो यह विचार करना कि क्या तुम्हारे होने से तुम्हारे सगे-सम्बंधी, तुम्हारे परिजन-कुटुंबीय, मित्र-परिचित, लेनदार-देनदार आनंदी और संतुष्ट हैं या नहीं। बिस्तर पर आने तक के समय का मन-ही-मन हिसाब करना। अपने शब्दों से किसी का मन दुखाया क्या, आचरण में सम्यकता का पालन हुआ क्या, लोभवश दूसरे के अधिकार का अतिक्रमण हुआ क्या, अहंकारवश ऊँच-नीच का भाव पनपा क्या..?… आदि-आदि..। हाँ आत्मा के आगे मन और आचरण को अनावृत्त कर अपने प्रश्नों की सूची तुम स्वयं तैयार कर सकते हो।

प्रश्नों की सूची टास्क नहीं है। प्रश्न तुम्हारे, उत्तर भी तुम्हारे। असली टास्क तो निष्कर्ष है। अपने उत्तर अपने ढंग व अपनी सुविधा से प्राप्त कर क्या तुम मुदित भाव से शांत और गहरी नींद लेने के लिए प्रस्तुत हो?

यदि हाँ तो यकीन मानना कि तुम इहलोक को पार कर गए हो।

सच बताना उठकर बैठ गए हो या निद्रा माई के आँचल में बेखटके सो रहे हो?

निष्कर्ष से अपनी स्थिति की मीमांसा स्वयं ही करना।

© संजय भारद्वाज

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares