मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 70 – मला वाटले भेटशील एकदा …. ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #70 ☆ 

☆ मला वाटले भेटशील एकदा …. ☆ 

मला वाटले, भेटशील एकदा नंतर नंतर

कळले नाही, कसले तूझे हे जंतरमंतर…!

 

येते म्हणाली, होतीस तेव्हा जाता जाता

किती वाढले, दोघांमधले अंतर अंतर…!

 

रोज वाचतो, तू दिलेली ती पत्रे बित्रे

भिजून जाते, पत्रांमधले अक्षर अक्षर…!

 

तूला शोधतो, अजून मी ही जिकडेतिकडे

मला वाटते, मिळेल एखादे उत्तर बित्तर…!

 

स्वप्नात माझ्या, येतेस एकटी रात्री रात्री

नको वाटते, पहाट कधी ही रात्री नंतर…!

 

उभा राहिलो, ज्या वाटेवर एकटा एकटा

त्या वाटेचाही, रस्ता झाला नंतर नंतर…!

 

विसरून जावे, म्हणतो आता सारे सारे

कुठून येते, तूझी आठवण नंतर नंतर…!

 

मला वाटले, भेटशील एकदा नंतर नंतर

कळले नाही, कसले तूझे हे जंतरमंतर…!

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एकुलती एक – भाग-4 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

 ☆ जीवनरंग ☆ एकुलती एक – भाग-4 ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

प्रतिक्षा हळूहळू मोठी होत होती. तिच्या बाळलीला बघत आम्ही दिवस काढत होतो.रक्षाबंधन आलं भाऊबीज आली की माझ्या एकट्या पडणा-या  प्रतिक्षाला बघून मला आमचं दोघांचं गोव्याच्या ट्रीप मधले गोकुळं बनवण्याचे स्वप्न,ह्यांनी आईला ‘पुढच्या वर्षी बहिणीला रक्षाबंधनाला भाऊ येईलच ‘असं मस्करीत दिलेलं आश्वासन सगळं सगळं आठवयाचं.शेवटी माझ्या प्रतिक्षाला पण नियतीने अशा रितीने माझ्याच सारखं  एकटं पाडलं.सासू सासरे,आई बाबा कधी उघडपणे,प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या दुस-या विवाहाचे सुचवू लागले.सासूबाई तर चक्क मला सांगू लागल्या,”बघ पोरी,आम्ही पिकली पानं कधी गळून पडू सांगता येत नाही.प्रतिक्षा एक दिवस लग्न करुन भुर्र्कन उडून जाईल.मग तू एकटी कशी रहाशील ” प्रतिक्षा सांगायची,” मी मुळी लग्न करणारच नाही.आईला सोडून कुठे जाणारच नाही”.मी पण तो विषय काहीतरी बोलून वेळ मारुन नेत असे.

प्रतिक्षा आता शाळा संपवून काॅलेजात जाऊ लागली.तशी तिला वयाच्या मानानं खूपच समज होती.मला जिवाभावाच्या मैत्रिणीसारखी साथ देऊ लागली.आम्ही एकमेकांकडे विचार शेअर करु लागलो.

काॅलेजमध्ये लहानसहान सगळ्या गोष्टी पण मला सांगू लागली.

काॅलेजात बारावीत  तिला नितीन भेटला.दोघांची चांगली गट्टी जमली. आमच्याकडे त्याचं जाणंयेणं वाढलं.

आईवेगळा पोर होता.वडील बिझनेसमध्ये व्यस्त म्हणून कि काय आईच्या प्रेमाला पारखा झालेला माझ्याकडे जास्त ओढला गेला.जवळपासच राहणारा होता. काॅलेजमध्ये  येता जाता प्रतिक्षाला पण सोबत असायची.

दरम्यान एकेक करुन चारही पिकली पानं गळून गेली.आता प्रतिक्षा मला आणि मी प्रतिक्षाला. आता मी तशी मनाने खंबीर झाले होते.ज्या मुलीवर तेव्हा ऐन तारूण्यात वैधव्याचा पहाड कोसळला. आता तर काय भरपूर पावसाळे, वादळ वारे अंगावर घेऊन तन,मन ठणठणीत झालं होतं.

हळूहळू लक्षात येऊ लागलं.प्रतिक्षा नितीनची मैत्री आता वाढली होती.तिचं प्रेमात रुपांतर झालं.दोघांची शिक्षणं पण पूर्ण झाली.आपापली क्षेत्र दोघांनी निवडली होती.त्यात प्रगती करुन दोघंही स्थिर झाली होती.एक दिवस मी प्रतिक्षाचा मूड बघून लग्नाचा विषय काढला.”बघ प्रतिक्षा आता तुम्ही दोघंही सेट्ल झालात आता पुढे विचार काय आहे?”

तर म्हणते कशी,”” कशाबद्दल ”

“अग तुझ्या आणि नितीनच्या लग्नाबद्दल”

“आई मी तुला एकटीला सोडून कुठेही जाणार नाही.आमची मैत्री आहे ती तशीच कायम राहील”

“ते काहीही चालणार नाही मी आजच नितीनच्या वडिलांशी  बोलून घेते.आणि नक्की करून टाकते.आणि कुठे लांब का जाणार आहेस?हांकेच्या अंतरावर तर आहे नितीनचे घर.”

ठरल्याप्रमाणे नितीनच्या वडिलांशी बोलून सगळं नक्की केले.आणि प्रतिक्षा आणि नितीनचा विवाह सुमुहुर्तावर दणक्यात पार पडला.

क्रमशः….

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आठवणीच्या जुन्या पुलावर (ललित लेख) भाग -2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ विविधा ☆ आठवणीच्या जुन्या पुलावर  (ललित लेख) भाग – 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

(मागील भागात आपण पाहिले

—-नंतर एकदा मला भेटायला तू वाट चुकवून आलीस आणि निराळीच होऊन गेलीस. तू मुळी तुझी उरलीच नाहीस. तू मला वेढलंस आणि थरथरत्या खोल जळी मला ओढलंस. त्यानंतरच्या किती भेटी… अंधार्‍या रात्री. चांदण्या रात्री. समुद्राकाठी. पुळणीवती. तळ्याकाठी …. किती तरी भेटी. कधी नि:शब्दशा. कधी अखंड वटवटणार्‍या या भेटी… आता इथून पुढे ——)

     `आठवते का सांज तुला ती पाऊसओली.

भिजलेल्या रंगात आपुली ओळख झाली.’

आणि ती रात्र आठवते तुला? समुद्र संथ होता. चुरगळल्यासारखा लाटा दिसत होत्या. आकाश उत्कट, अधिरे, झाल्यासारखे चुंबनोत्सुक वाटत होते. पिवळ्या चंद्राच्या झिरझिरित पुळणीवरची भुसभुशित रेती न्हाऊन निघाली होती. भुरा अंधार होता आणि होतो फक्त तू… आणि मी… आणि माझ्याजवळची तू… कशी?

`सर्वांगाने सुख भोगावे

कसे तुला ते पुरते ठाऊक

स्पर्शातुन भिनविसी फुलांचे

तू रंगी-बेरंगी कौतुक.’

त्यादिवशी मी तुला म्हंटलं होतं,

`असे मोकळे हसल्यावर तू, जे न तुझ्यातून दुजे वेगळे

दिल्या –घेतल्यावाचून काही तुला मलाही मिळते सगळे’

आणखी एक रात्र . प्रीतीच्या त्या गाढ क्षणी, तू आकाशच जसे पापण्यत मिटून घेतलेस आणि मी त्यात एक चांदणी होऊन लुकलुकलो. त्यावेळी असण्यामधली अथांगता मी अनुभवली.

हळूहळू तू धीट होत गेलीस. म्हणालीस,

‘आभाळ झुकले तळ्यात रे,

तुझे हात माझ्या गळ्यात रे

स्वप्न पाहू लागे दिठी,

तुझी माझी गाठ मिठी

जागी झाली फुले कळयात रे ,

तुझे हात माझ्या गळ्यात रे’

तर मी तुला म्हणालो,

`हा जीव तुझ्यावर जडला

मी मिटूनी घेतले डोळे

पाऊस फुलांचा पडला.’

खरंच! तू नुसतीच कुजबुजलीस त्या अंधारी आणि रहस्य कळले. शब्दांना नसला अर्थ तरीही कळले सारे कळण्याच्या पलिकडले.

पण हे खरंच होतं का? नसावं! नाहीचमुळी! तो मला झालेला आभास होता. एकदा मला मिठीत बुडवीत म्हणाली होतीस,

`तुझ्यासवे राहीन उपाशी नकोच वैभव  नको मला घर

फिरेन मीरानात मजेने तुझ्या संगती रानफुलांचे पिऊनी चांदणे

निजेन अन मी खडकावरती’

अन श्वासांचे शब्द माझिया, ‘वेडीकुठली…’

तू वेडी की मीवेडा? त्यावेळी तू आणि मी दोघेही म्हणालो होतो,

`प्रीत माझी तुझी एक गाणे

गात जाणे, गात जाणे, गात जाणे’

पण पुढे मात्र मला एकट्यालाच हे गाणे गात जावे लागले. तू अलगद निघून गेलीस पुढे… एकटीच … मिटून घेतले होते मी माझ्यात तुला. सर्वस्वाचा पहारा ठेवला होता. पण माझ्या या सर्वस्वाच्या पहार्‍यातून तू निसटून गेलीस. खुशीने? की नाईलाजाने?

एका रात्री मी तुला जाम पिडलं होतं. खूप चिडवलं होतं मी तेव्हा तुला. तू अगदी रडवेलीशी झालीस. म्हणालीस,

`छळून घे रे छळणार तेवढे… मी गेल्यावर स्मरशील का रे?’

तुझी – माझी वाट वेगळी होण्याची चाहूल तुला त्याचवेळी लागली होती का? नंतरच्या रात्री तू मला सांगूनच टाकलंस,

‘थांबणार नाही रात्र, आता होईल पहाट

आहे होणार वेगळी तुझी माझी वाट

तोवर हे स्वप्न बघू, रात्र सरायची आहे

नको सोडवूस मिठी, रात्र सरायचीआहे.’

तोच होता का निरोपाचा क्षण… ती निरोपाची मिठी होती का?

‘तू म्हटले थांब तरी, थांबली न रात्र मुळी’

त्यानंतर … दु:खाला वसतीला मी ऊर दिला. त्या निर्दय नियतीला सूर दिला.  मनात आलं,

`ही हार कुणाची, ही जीत कुणाची?

आसवात (ही) हसण्याची ही प्रीत कुणाची?’’

वाटेसारखे हे भागधेय समोर आले, तशी तुला म्हंटलं,

`त्याचे त्याला देऊन टाक, बाकी ठेवू नकोस काही.

मला देणार होतीस जे, त्याचा हिशेब होणार नाही.’

अभाळाने लाजावे, पृथ्वीने बघत रहावे, असे काही देणार होतीस. पण राहीलंच ते… राहू दे…

‘गाण्यामधून वहात राहील आभाळवेडी तुझी खूण…

वृत्ती-वृत्ती जपत राहील तुझ्या डोळ्यांमधले ऊन…

तू खरंच सांग एकदा … तुला आठवतय हे सारं? की काही बाही? की काहीच नाही? शेवटचा निरोप घेताना तू म्हणाली होतीस,

येईन एकदा पुन्हा

पल्याड काळोखाच्या जाण्याआधी

घेऊन अंगभर ओळख

सगळ्या फुलत्या खुणा

येईन एकदा पुन्हा

घुंगुरवाळ्या पाण्यापाशी…’

मी वाट बघतोय. आसासून वाट बघतोय. त्या क्षणाची …

समाप्त

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ब्रम्हवादी याज्ञवल्क्य मुनि ☆ डाॅ. व्यंकटेश जंबगी

डाॅ. व्यंकटेश जंबगी

 ☆ विविधा ☆ ब्रम्हवादी याज्ञवल्क्य मुनि ☆ डाॅ. व्यंकटेश जंबगी ☆ 

” याज्ञवल्क्य” या शब्दाचा अर्थ-ब्रम्हवादी ऋषी, जनक राजाचे गुरू, याज्ञवल्क्य स्मृतीचे रचणारे !

भारताच्या वैदिक काळात हे एक मोठे दार्शनिक होऊन गेले.ते कर्मकांडाचे पुरस्कर्ते होते.त्याना यज्ञ,याग,होय,हवन इ.चे विशेष ज्ञान होते.ते अत्यंत ब्रम्हनिष्ठ होते.श्रीमद् भागवत पुराणानुसार महर्षि व्यास यांनी वेदाचे विषयानुसार ४ भाग केले.म्हणून व्यास मुनिना “वेदव्यास”असेहि म्हणतात.व्यासांनी पैल मुनिना ऋग्वेद, वैशंपायन यांना यजुर्वेद, जैमिनीना सामवेद आणि अथर्ववेद सुमंतु या आपल्या शिष्यांना शिकविला.याज्ञवल्क्य हे वैशंपायन यांचे शिष्य होते.ते यजुर्वेदाचे अध्ययन करीत होते.एक दिवस वैशंपायनाना राग आला, त्यांनी याज्ञवल्क्याना शिकलेला भाग परत देण्याची आज्ञा केली.याज्ञवल्कांनी तो भाग ओकून परत दिला.काही मुनींनी तो “तित्तर”पक्ष्यांचे रुप घेऊन ग्रहण केला.तीच तैत्तरीय शाखा झाली.तेव्हा याज्ञवल्क्य यांनी “मी मानवाला गुरू करणार नाही”अशी प्रतिज्ञा केली.सूर्याची उपासना केली.सूर्यदेव प्रसन्न झाले.त्यांनी घोड्याच्या रूपाने प्रकट होऊन यजुर्वेदाचे ज्ञान दिले.हाच शुक्ल यजुर्वेद होय.(संदर्भ:भा.पु.१२वा स्कंध,६वा अध्याय, श्लोक ७३,७४)

याज्ञवल्क्य यांना दोन पत्न्या होत्या.एक मैत्रेयी आणि दुसरी भारद्वाज ऋषी कन्या कात्यायनी.मैत्रेयीने पतिकडून ब्रम्हविद्या ग्रहण केली.कात्यायनीला तीन पुत्र होते.

एकदा जनक राजाने ब्रम्हनिष्ठ गुरूच्या शोधासाठी,अशा मुनिना सोन्याने मढविलेल्या गायी देण्याची घोषणा केली.याज्ञवल्कांनी शिष्यांना गायी आपल्या आश्रमाकडे वळविण्यास सांगितल्या.एवढा त्यांचा आत्मविश्वास होता.परंतु गार्गी नावाच्या विदुषीने आधी त्यांना शास्त्रार्थ करण्याचे आवाहन केले.या दोघांचा प्रश्नोत्तराच्या रुपाने जो संवाद झाला,तेच”बृहदारण्यकोपनिषद” होय.यात अत्यंत जटील प्रश्नांची उत्तरे याज्ञवल्क्यांनी दिली आहेत.

याज्ञवल्क्य यांचे प्रसिद्ध ग्रंथ-

१)  शतपथ ब्राह्मण २) याज्ञवल्क्य स्मृती ३) याज्ञवल्क्य शिक्षा ४) प्रतिज्ञा सूत्र ५) योगी याज्ञवल्क्य.

त्यांच्या स्मृतीला वंदन करून येथे थांबतो.

© डॉ. व्यंकटेश जंबगी

एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४
मो ९९७५६००८८७

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग १२) – राग~ वसंत ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगीत राग गायन (भाग १२) – राग~वसंत ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

सूरसंगतराग~वसंत

ऋतुचक्रांतील वसंत ऋतूचे आगमन झाले की शिशीरांत निष्पर्ण झालेल्या सृष्टीत नवचैतन्य येते. वृक्ष वल्लरींना नवी पालवी फुटून सर्वत्र निसर्ग बहरास येतो. संगीतांतील वसंत रागाचे ह्या ऋतूशी फार जवळचे नाते आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वसंताचे अवरोही स्वर कानावर पडले की उत्साहाचे वातावरण निर्माण झालेच पाहीजे.असा हा राग वसंत!

ह्या रागासंबंधी फार मनोरंजक अशी आख्यायिका आहे. असे म्हणतात की बूढन मिश्र नावाच्या एका गायकाने पटमंजीरी हा राग गायला आणि त्याच्या प्रभावाने एक प्रचंड वृक्ष निष्पर्ण झाला. हा चमत्कार पाहून सर्व मंडळी आश्चर्यचकित झाली.  तत्कालीन राजाने त्याच्या या गायनकौशल्यावर खूष होऊन त्याला बक्षीशीही दिली,परंतु त्याचवेळी जयदेव या गायकाला ही बातमी समजल्यावर त्याने वसंत राग आळवून पर्णविरहीत वृक्षावर पुन्हा नवीन पालवी नार्माण केली. वसंत ऋतूतील नवी पालवी आणि हा राग याचे असे हे अतूट नाते आहे. गीत गोविंद या जयदेवाच्या अमर ग्रंथातील”ललित लवंगलता परिशीलन कोमल मलय समीरे” ही अष्टपदी म्हणजे वसंत ऋतूचे सुंदर वर्णन आहे, ती वसंत रागांत गायली तर अधिक मनभावन ठरते.

हा आल्हाददायक राग वसंत ऋतूत केव्हाही गावा, मात्र इतर वेळी तो मुख्यत्वेकरून रात्रीच्या अंतीम प्रहरी गाण्याची/वाजविण्याची प्रथा आहे.

चैत्र~ वैशाख हा वसंत ऋतूचा काळ असला तरी माघातल्या वसंत पंचमीपासून फाल्गुनी पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा केला जातो. या वसंतोत्सवाला फाग म्हणतात. त्यामुळे राधा~कृष्णाच्या रासक्रीडा नृत्य ~संगीतांतून सांगातली जाते.अब्दूलकरीमखाॅं साहेबांची “फगवा ब्रीज खेलनको चलोरी” ही वसंतातली बंदीश आजही पेश केली जाते.’नबी के दरबार’ हा वसंतांतील बडा ख्याल गंगूबाई हनगल, माणिक वर्मा यांच्याकडून रेडिओवर बर्‍याचदां ऐकल्याचे स्मरते.

वसंतच्या शास्त्रीय स्वरूपाबाबत प्राचीन काळापासून बरेच मतभेद आहेत. असे म्हणतात की गंधार व निषाद कोमल असलेला काफी थाटात गायला जात असे. कवी जयदेवाच्या गीतगौविंदमध्ये हा राग असा आहे. जग्गनाथपूरीच्या मंदीरांतही अजूनही काफी थाटातला वसंत गायला जातो. मात्र सध्या प्रचलित असलेला वसंत  पूर्वी थाटांतील आहे. यांतही दोन प्रकार आहेत. एका प्रकारात दोन मध्यम व शुद्ध धैवत घेऊन पंचम वर्ज्य केला जातो तर दुसरा प्रकार संपूर्ण मानला जातो. कितीही वाद असले तरी दोन्ही मध्यमांचा प्रयोग करणारा ललित अंगाचा वसंतच आज अधिक प्रचलित आहे.

वादी व संवादी स्वर अनुक्रमे तार षड्ज व पंचम असे आहेत, शुद्ध धैवताच्या प्रकारांत पंचम वर्ज्य असल्यामुळे शुद्ध मध्यम संवादी मानतात.

या रागाचे वैशिष्ट्य असे की षड्जापर्यंत अवरोह झाल्यावर लगेच शुद्ध मध्यम मुक्तपणे व स्वतंत्र घेतला जातो व नंतर मींडेच्या सहाय्याने ‘नी (ध)(म)(ध) नी सां’ असा आरोह केला जातो.राग ओळखण्याचे हे व्यवच्छेदक लक्षण आहे. उत्तरांगप्रधान असलेला हा राग स्वरसप्तकाच्या उत्तरांगांत अधिक खुलतो.

ह्या वसंत किंवा बसंत रागाबरोबर बसंतबहार, बसंतहिंडोल, बसंती~केदार असे बरेच जोड राग आहेत. कुमार गंधर्वांनी गौरी बसंत तर रातंजनकरबुवांनी बसंत मुखारी हे राग लोकप्रिय करून ठेवले आहेत.

“केतकी गुलाब जूही मन बसंत फूले” ही बसंत बहारची बंदीश प्रसिद्ध आहे. मंदारमाला नाटकांतील पं.राम मराठे आणि प्रसाद सावकार यांची “बसंतकी बहार आयी” ही जुगलबंदी न ऐकलेला श्रोता विरळाच! सर्व सामान्यांसाठी बसंतचे उदाहरण घ्यायचे झाले तर देवदास चित्रपटांतील माधुरी दिक्षित(चंद्रमुखी)हिचे “काहे छेड छेड मोहे गरवा लगाये हे वसंत रागांतील गाण्यावरील नृत्य.

वसंत ऋतूचे स्वागत करणारा आणि कलावंतांच्या विशेष पसंतीचा आणि अतिशय प्राचीन असा हा राग वसंत/बसंत!

क्रमशः ….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य # 87 – हम कुछ तो भी हैं……. ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(वरिष्ठ साहित्यकार एवं अग्रज श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी स्वास्थ्य की जटिल समस्याओं से  सफलतापूर्वक उबर रहे हैं। इस बीच आपकी अमूल्य रचनाएँ सकारात्मक शीतलता का आभास देती हैं। इस कड़ी में प्रस्तुत है आपकी होली के रंग की एक रचना हम कुछ तो भी हैं……. । )

☆  तन्मय साहित्य  #87 ☆

 ☆ हम कुछ तो भी हैं……. ☆

छद्मसिरी साहित्य शिरोमणि

ये भी, वो भी हैं

नीरज, निराला भले नहीं

पर हम कुछ तो भी हैं।

 

फोटो छपती है अपनी

प्रतिदिन अखबारों में

नाम हमारा चर्चित

साहित्यिक फ़नकारों में

पदम सिरी मिलने की

उम्मीदें हमको भी है।

दिनकर नीरज…….।।

 

सोशल मीडिया पर भी

तो हम ही हम छाएँ हैं

कितने ही सम्मान

यहाँ पर हमने पाएँ हैं,

मोबाईल ने सम्मानों की

फसलें बो दी है।

दिनकर नीरज…….।।

 

लाज शर्म संकोच छोड़

मुँह मिट्ठू स्वयं बनें

पाने को अमरत्व, सतत

जारी प्रयास अपने,

कविताई के विकट

संक्रमण के हम रोगी हैं

दिनकर नीरज…….।।

 

बात करो मत उसकी

वो हमसे ही सीखा है

क्या सरजन है उसका

रूखा, सूखा, फीका है,

हम तो कर देते अमान्य

लिखता वह जो भी है।

दिनकर नीरज……..।।

 

रोज रोज आते सुंदर

कविताओं के सपने

साधें शब्दजाल से

सब को, हो जाएँ अपने

लिखा, भूख – रोटी पर

खुद कविताएँ रो दी है।

दिनकर नीरज…….।।

 

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश0

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अपनी भाषा के खिलाफ खड़े हो रहे हैं हम ☆ श्री राजकुमार जैन राजन

श्री राजकुमार जैन राजन

(आज प्रस्तुत है सुप्रसिद्ध साहित्यकार श्री राजकुमार जैन राजन जी का एक सारगर्भित आलेख ‘अपनी भाषा के खिलाफ खड़े हो रहे हैं हम। हम भविष्य में भी ई-अभिव्यक्ति  के प्रबुद्ध पाठकों के लिए आपकी विशिष्ट रचनाओं को साझा करने का प्रयास करेंगे।)

जीवन परिचय के लिए कृपया यहाँ क्लिक करें — >> श्री राजकुमार जैन राजन

☆ आलेख ☆ अपनी भाषा के खिलाफ खड़े हो रहे हैं हम ☆ श्री राजकुमार जैन राजन ☆

हिंदी की अस्मिता, स्वीकृति और व्यवहारिक प्रतिष्ठा के लिए समय समय पर व्यक्त की जाने वाली चिंता सचमुच हमारे  चिंतन का विषय है। हिंदी भाषी प्रदेश हों या अहिन्दी भाषी, सभी जगह अंग्रेजी ने अपनी गिरफ्त मज़बूत कर ली है। एक खास बंदरबांट की भूमिका में अंग्रेजी समस्त भारतीय भाषाओं को परस्पर लड़वा कर एक छत्र शासन करने की मंजिल पर है। वह हमसे हमारी भाषा नहीं हमारी स्वाधीन चेतना, आत्मगौरव व सांस्कृतिक विरासत भी छीनने की तैयारी में है। आज हमारी मानसिक दासता चरम सीमा पर जा पहुंची है क्योंकि हमारी यह समझ तक गायब हो चुकी हैं कि हम अपनी ही भाषा में अपने ही खिलाफ खड़े हो गए हैं।

आज अंतरराष्ट्रीय परिदृश्य में देखा जाए तो हिंदी अपनी स्थिति मज़बूत बना रही है। पूरे विश्व में सबसे ज्यादा बोली जाने वाली भाषा हिंदी ही है किंतु हमारे ही देश में स्थिति दयनीय है। हमारी शैक्षणिक संस्थाओं में ऐसे मंदबुद्धि लोग बैठे हैं जो साँस तो हिंदी में लेते हैं, सोचते अंग्रेजी में हैं। खाते हिंदी में हैं, पचाते अंग्रेजी में हैं। वास्तव में हम अपना अधिकार ही खोते जा रहे हैं। संप्रेषण के इस जटिल युग में यदि अपनी भाषा की जड़ें स्वयं ही काटेंगे तो परिणाम विकट ही होंगे। जब हिंदी प्रेमी प्रधानमंत्री माननीय मोदी जी सत्ता में आए तो कुछ आशा बंधी थी कि हिंदी को जल्दी ही राष्ट्र भाषा का दर्ज़ा मिलेगा। पर भारत की राष्ट्रीय शिक्षानीति 2019 के प्रावधानों में हिंदी को ‘अनिवार्य भाषा’  की श्रेणी से ही हटाये जाने का प्रावधान किया है। यह कैसी मानसिकता है ? जो भाषा सहज रूप से प्राणवायु की तरह भारत के जन-जीवन में प्रवाहित है, उसको लेकर आशंकाएं और दुराव क्यों ? साहित्य, मीडिया, व्यवहार, पर्यटन,कॉरपोरेट जगत, व्यापार, नौकरी, प्रतियोगी परीक्षा आदि क्षेत्रों में बार-बार हिंदी को अपनी सामर्थ्य की अग्नि परीक्षा देनी पड़ती है। जिन लोगों पर इस भाषा की गरिमा कायम रखने की जिम्मेदारी है उनमें से कई दलगत, क्षेत्रगत,  स्वार्थगत, राजनीति की रोटियां सेंकने लगते हैं ।  साहित्यिक व्यक्तियों के लिए भी हिंदी केवल लेखन, प्रकाशन, सम्मान और गोष्ठियों- भाषणों की ही भाषा रह गई है। कुछ अपवाद को छोड़ दें तो उनके परिवार-परिवार में भी अंग्रेजियत छाई हुई है। हिंदी एक समूह या भाषा भर नहीं है, यह भारत की परिभाषा है।

साइबर दुनिया के बढ़ते प्रभाव एवं कोरोना त्रासदी ने भी हिंदी की बिंदी पौंछने का जबरदस्त काम किया है। कई लोग स्वयम्भू विशेषज्ञ बनकर अपनी मठाधीशी चलाने लगे। कुछ अपवाद छोड़ दें तो ऑनलाइन यू ट्यूब चैनल, व्हाट्सएप्प, फेसबुक व अन्य माध्यमों से हिंदी की दुर्दशा करने में कोई कमी नहीं रखी जा रही है। साहित्यकारों की एक नई जमात यहाँ पैदा हो गई जिसे न व्याकरण का ज्ञान है न भाषा का सौंदर्यबोध ही है। हिंदी भाषा को इस तरह विकृत रूप  में प्रस्तुत किये जाने के साथ ही रुपये देकर सम्मानित होने, रचनाएँ प्रकाशित करवाने का ‘व्यवसाय’ भी बड़ी तेजी से फल-फूल रहा है। पत्रिकाओं के संपादक राशि लेकर घोड़े और गधों का समान मूल्यांकन कर रहे है। हिंदी साहित्य जगत में यह स्थिति चिंतनीय है।

हिंदी को देश में राष्ट्र भाषा के रूप में प्रतिष्ठित कराने हेतु काफी प्रयास की आवश्यकता है तो केंद्र व राज्य सरकारों द्वारा भी दृढ़ इच्छा शक्ति की दरकार रहेगी। हिंदी को राष्ट्र भाषा कहने पर कुछ लोगों को न जानें क्यों बदहजमी सी होने लगती है। पाखंड और कुतर्क इस समय के विचित्र लक्षण हैं विशेषज्ञ वर्षों से रुदन कर रहे हैं कि हिंदी में उच्च कोटि का वैज्ञानिक चिंतन नहीं है। मनीषी विलापरत हैं कि हिंदी में विश्व स्तर का साहित्य नहीं है। इन सब महान आत्ममुग्धों से भारत के नागरिकों को पूछना चाहिए कि जो नहीं है उसे सम्भव कौन करेगा? आप आगे बढ़कर हिंदी को समृद्ध करने का दायित्व क्यों नहीं उठाते ? क्यों नहीं आप अपनी प्राचीन साहित्यिक विरासत से रूबरू होते ? आज विश्व में हिंदी पढ़ने, लिखने, बोलने वालों की तादात बढ़ रही है, वहीं हिंदी भारत की समस्त बोलियों और क्षेत्रीय भाषाओं की अगुवाई कर रही है, कहीं कमजोरी है तो हम हिंदी वालों में ही है…… ।

© श्री राजकुमार जैन राजन 

प्रधान संपादक: ‘सृजन महोत्सव’

सम्पर्क – चित्रा प्रकाशन , आकोला -312205 (चित्तौड़गढ़) राजस्थान

मोबाइल :  9828219919

ईमेल – [email protected]

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – मोक्ष ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – लघुकथा – मोक्ष ?

उसका जन्म मानो मोक्ष पाने के संकल्प के साथ ही हुआ था। जगत की नश्वरता देख बचपन से ही इस संकल्प को बल मिला। कम आयु में धर्मग्रंथों का अक्षर-अक्षर रट चुका था। फिर धर्मगुरुओं की शरण में गया। मोक्ष के मार्ग को लेकर संभ्रम तब भी बना रहा। कभी मार्ग की अनुभूति होती भी तो बेहद धुँधली। हाँ, धर्म के अध्ययन ने सम्यकता को जन्म दिया। अपने धर्म के साथ-साथ दुनिया के अनेक मतों के ग्रंथ भी उसने खंगाल डाले पर ‘मर्ज़ बढ़ता गया, ज्यों-ज्यों दवा की।’ … बचपन ने यौवन में कदम रखा, जिज्ञासु अब युवा संन्यासी हो चुका था।

मोक्ष, मोक्ष, मोक्ष! दिन-रात मस्तिष्क में एक ही विचार लिए सन्यासी कभी इस द्वार कभी उस द्वार भटकता रहा।… उस दिन भी मोक्ष के राजमार्ग की खोज में वह शहर के कस्बे की टूटी-फूटी सड़क से गुज़र रहा था। मस्तिष्क में कोलाहल था। एकाएक इस कोलाहल पर वातावरण में गूँजता किसी कुत्ते के रोने का स्वर भारी पड़ने लगा। उसने दृष्टि दौड़ाई। रुदन तो सुन रहा था पर कुत्ता कहीं दिखाई नहीं दे रहा था। कुत्ते के स्वर की पीड़ा संन्यासी के मन को व्यथित कर रही थी। तभी कोई कठोर वस्तु संन्यासी के पैरों से आकर टकराई। इस बार दैहिक पीड़ा से व्यथित हो उठा संन्यासी। यह एक गेंद थी। बच्चे सड़क के उस पार क्रिकेट खेल रहे थे। बल्ले से निकली गेंद संन्यासी के पैरों से टकराकर आगे खुले पड़े एक ड्रेनेज के पास जाकर ठहर गई थी।

देखता है कि आठ-दस साल का एक बच्चा दौड़ता हुआ आया। वह गेंद उठाता तभी कुत्ते का आर्तनाद फिर गूँजा। बच्चे ने झाँककर देखा। कुत्ते का एक पिल्ला ड्रेनेज में पड़ा था और मदद के लिए गुहार लगा रहा था। बच्चे ने गेंद निकर की जेब में ठूँसी। क्षण भर भी समय गँवाए बिना ड्रेनेज में लगभग आधा उतर गया। पिल्ले को बाहर निकाल कर ज़मीन पर रखा। भयाक्रांत पिल्ला मिट्टी छूते ही कृतज्ञता से पूँछ हिला-हिलाकर बच्चे के पैरों में लोटने लगा।

अवाक संन्यासी बच्चे से कुछ पूछता कि बच्चों की टोली में से किसीने आवाज़ लगाई, ‘ए मोक्ष, कहाँ रुक गया? जल्दी गेंद ला।’ बच्चा दौड़ता हुआ अपनी राह चला गया।

संभ्रम छँट चुका था। संन्यासी को मोक्ष की राह मिल चुकी थी‌।

धरती के मोक्ष का सम्मान करो, आकाश का मोक्षधाम तुम्हारा सम्मान करेगा।

 

©  संजय भारद्वाज

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

9890122603

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – यात्रा संस्मरण ☆ कुमायूं – 8 – बिनसर ☆ श्री अरुण कुमार डनायक

श्री अरुण कुमार डनायक

(श्री अरुण कुमार डनायक जी  महात्मा गांधी जी के विचारों केअध्येता हैं. आप का जन्म दमोह जिले के हटा में 15 फरवरी 1958 को हुआ. सागर  विश्वविद्यालय से रसायन शास्त्र में स्नातकोत्तर की उपाधि प्राप्त करने के उपरान्त वे भारतीय स्टेट बैंक में 1980 में भर्ती हुए. बैंक की सेवा से सहायक महाप्रबंधक के पद से सेवानिवृति पश्चात वे  सामाजिक सरोकारों से जुड़ गए और अनेक रचनात्मक गतिविधियों से संलग्न है. गांधी के विचारों के अध्येता श्री अरुण डनायक जी वर्तमान में गांधी दर्शन को जन जन तक पहुँचाने के  लिए कभी नर्मदा यात्रा पर निकल पड़ते हैं तो कभी विद्यालयों में छात्रों के बीच पहुँच जाते है. पर्यटन आपकी एक अभिरुचि है। इस सन्दर्भ में श्री अरुण डनायक जी हमारे  प्रबुद्ध पाठकों से अपनी कुमायूं यात्रा के संस्मरण साझा कर रहे हैं। आज प्रस्तुत है  “कुमायूं -8 – बिनसर ”)

☆ यात्रा संस्मरण ☆ कुमायूं -8 – बिनसर ☆ 

बिनसर एक छोटा सा गाँव है और यहीँ क्लब महिंद्रा के वैली रिसार्ट में हम तीन दिन रुके और प्रत्येक दिन सुबह सबेरे पहाड़ी क्षेत्र में सैर का आनन्द लिया । ऐसी ही सुबह की सैर करते समय दो पांडेय बंधु मिल गए। मेहुल पांचवीं में पढ़ते हैं तो उनके चचेरे भाई वैभव पांडे जवाहर नवोदय विद्यालय की सातवीं कक्षा में पढ़ते हैं। मेहुल वैज्ञानिक बनने का इच्छुक है और वैभव बड़ा होकर गणित का शिक्षक बनने का सपना संजोए हुए है। वैभव कहता है सफल जीवन के लिए गणित में प्रवीणता जरुरी है, वैज्ञानिक भी वही बन सकता है जिसकी गणित अच्छी हो। मुझे उसकी बातें अच्छी लगी और थोड़ी आत्मग्लानि भी हुई, कारण मुझे तो गणित से शुरू से, बचपन से ही डर लगता था। गणित की कमजोरी ने मुझे जीवन में मनोवांछित सफलता से दूर रखा और दुर्भाग्य देखिए मुझे रसायनशास्त्र में स्नातकोत्तर अध्ययन भी भौतिक रसायन में करना पड़ा जिसे गणित ज्ञान के बिना समझना मुश्किल है फिर नौकरी भी बैंक में की जहां गणित का गुणा-भाग बहुत जरुरी है।  मैंने भी अपने अनुभव के आधार पर उसकी बात का समर्थन किया। पर्यावरण के विषय में दोनों बच्चों से चर्चा हुई, पर जितना स्कूल की किताबों में उन्होंने पढ़ा वे उसे स्पष्ट तौर से बता तो न सके लेकिन मोटा मोटी-मोटी जानकारी उन्हें थी। शायद गांव के बच्चे ऐसे ही होते हैं, उनमें संवाद क्षमता का अभाव होता है। मैंने अपना थोड़ा सा ज्ञान उन्हें दिया। मैंने बताया कि कैसे हिरण आदि जंगली जानवर पर्यावरण की रक्षा करते हैं। उनके द्वारा खाई गई घांस के बीज दूर दूर तक फैलते हैं और  दौड़ने से खुर पत्थर को मुलायम कर देता है इससे जमीन की पानी सोखने की क्षमता बढ़ती है। बच्चों ने मुझे बिनसर वाइल्ड लाइफ सेंचुरी देखने की सलाह दी और अनेक जंगली जानवरों, बार्किंग डियर, जंगली बकरी आदि के बारे में बताया। उन्होंने बताया की देवदार का पेड़ काफी उपयोगी है। लकड़ी जलाने के काम आती है और फर्नीचर भी बनता है। बच्चों से मैंने सुंदर लाल बहुगुणा के बारे में पूंछा । उन्हें  एकाएक याद तो नहीं आया पर जब मैंने पेड़ों की कटाई रोकने के योगदान की बात छेड़ी तो मेहुल बोल पड़ा हां चिपको आन्दोलन के बारे में उसने सुना है।

बच्चों को गांधी जी के बारे में भी मालूम है।  गांधी जी के नाम से लेकर उनके माता पिता कानाम, जन्म तिथि, जन्म स्थान, भारत की स्वतंत्रता में उनका योगदान आदि सब वैभव ने एक सांस में सुना दिया। अब मेहुल की बारी थी, उसने गांधी जी की हत्या की कहानी सुनाई कि 30 जनवरी को उन्हें तीन गोलियां मारी गई थी। मैंने पूंछा गांधी जी के बारे में इतना कुछ कैसे जानते हो, वे बोले हम तो गांधीजी के बारे में पुस्तकों में तो पढ़ते ही हैं फिर हमारे   परदादा स्व.श्री हर प्रसाद पाण्डेय (1907-1978 ) स्वतंत्रता सेनानी थे और अल्मोड़ा जेल में भी बंद रहे। हालांकि बच्चों ने उन्हें गांधी जी के साथ जेल में बंद होना बताया पर शायद वे नेहरू जी के साथ बंद रहे। उनकी मूर्ति भी गांव में लगाई गई है। पर मूर्त्ति में लगा उनका नाम पट्ट  छोटा है और उद्घाटनकर्ताओं की पट्टिका बहुत लंबी चौड़ी है।

दोनों बच्चों से मिलकर मुझे बहुत प्रसन्नता हुई। वे सवर्ण समुदाय के हैं और तरक्की करना चाहते हैं। उनकी यह सोच मुझे सबसे अच्छी  लगी, अद्भुत व अद्वतीय लगी। ऐसी सोच का मुझे मध्य प्रदेश के सवर्ण छात्रों में अभाव दिखा है और उन्हें भी शनै शनै धार्मिक कट्टरवाद की ओर ढकेला जा रहा है। वैभव को जवाहर नवोदय विद्यालय में , प्रतियोगिता से प्रवेश मिला था, पूरे ब्लाक से उसका अकेला चयन हुआ। दोनों के पिता साधारण कर्मचारी हैं और उन्होंने अपने बच्चों के उज्जवल भविष्य का जो सपना संजोया है उसे पूरा करने में अपनी ओर से कोताही नहीं बरती है।अब सरकार की जिम्मेदारी है कि उनके सपने ध्वस्त न होने दें। अगर वैभव सरीखे बच्चे आगे बढ़ेंगे तो देश का भविष्य संवरेगा और यह बच्चे आगे बढ़ें, खूब पढ़ें , तरक्की करें इसकी जिम्मेदारी समाज की है, हम सबकी भी है।

©  श्री अरुण कुमार डनायक

42, रायल पाम, ग्रीन हाइट्स, त्रिलंगा, भोपाल- 39

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ – मृग तृष्णा # 38 ☆ रुखसत हो गयी जिंदगी ☆ श्री प्रह्लाद नारायण माथुर

श्री प्रहलाद नारायण माथुर

( श्री प्रह्लाद नारायण माथुर जी अजमेर राजस्थान के निवासी हैं तथा ओरिएंटल इंश्योरेंस कंपनी से उप प्रबंधक पद से सेवानिवृत्त हुए हैं। आपकी दो पुस्तकें  सफर रिश्तों का तथा  मृग तृष्णा  काव्य संग्रह प्रकाशित हो चुकी हैं तथा दो पुस्तकें शीघ्र प्रकाश्य । आज से प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ – मृग तृष्णा  जिसे आप प्रति बुधवार आत्मसात कर सकेंगे। इस कड़ी में आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता रुखसत हो गयी जिंदगी। ) 

 

Amazon India(paperback and Kindle) Link: >>>  मृग  तृष्णा  

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – मृग तृष्णा # 38 ☆

☆ रुखसत हो गयी जिंदगी 

 

रुखसत हो गयी जिंदगी बहार के इंतज़ार में,

मैं खुद ही खुद का मेहमान हो गया जिंदगी में ||

 

कैसे खिदमत करूं खुद की कुछ समझ नहीं आता,

जवाब देते नहीं बना,कैसे आना हुआ जब पूछ लिया जिंदगी ने ||

 

जवानी से तो बचपन अच्छा था हंसी-खुशी से बीता था,

हर कोई मुझसे खुश था खुशियों से झोलियाँ भरी थी जिंदगी में ||

 

होश संभाला तब असल जिंदगी से मुलाकात हुई,

हंसी-खुशी गायब थी रौनक सौ-कोस दूर थी असल जिंदगी में ||

 

जिन लोगों के चेहरे मुझे देख खिल उठते थे,

खुद के गुनाहों का कुसूरवार भी मुझे ही ठहराने लगे जिंदगी में ||

 

दुनिया में हर तरफ झूठ कपट का है बोलबाला,

बनावटी हंसी-मुस्कान और दिखावे का अपनापन भरा है जिंदगी में ||

 

© प्रह्लाद नारायण माथुर 

8949706002
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares