मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भाजी मंडई – क्रमश: भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ भाजी मंडई – क्रमश: भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

मोहिनी देववंशीची प्रतीक्षा पूर्ण झाली. अखेर तो दिवस आलाच. टोरॅंटो शहरात देशोदेशींच्या साहित्यिकांची गर्दी जमली. त्यांना एयरपोर्टहून घेऊन येऊन, हॉटेलमध्ये पोचवण्यापर्यंतचा सगळा बंदोबस्त केलेला होता. सगळं काही शांतपणे होत होतं. नाही म्हणायला एकच चिंता होती.  “नंदन पुरी” नावाचा नाग, मोहिनी आयोजित करत असलेला सगळा कार्यक्रम उधळून न देवो. दोघांची दुश्मनी जगजाहीर होती. शहरातल्या सगळ्या शत्रुत्व असलेल्या गटांमध्ये, पहिल्या नंबरावर होती. आपल्या विश्वस्त सूत्रांनुसार तिला ही बातमी कळली होती की बहुधा नंदनजी एकांतवासात आहेत. तिथे फोनही लागत नाही आणि नेटवर्कही मिळत नाही. शहरापासून गाडीने तीन तास अंतरावर असलेल्या झोपडीत राहायला गेले आहेत. हेतू असा की तिथे त्यांना काही ऐकता येऊ नये आणि मत्सराने जीव जळू नये.   

  दिवसभरच्या प्रारंभिक भेटी-गाठीनंतर हिंदीवर भाषणं होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सन्मान समारंभ होता. भारतातून आलेल्या लोकांमध्ये खूप उत्साह होता. स्थानिक लोकांचीही चांगली गर्दी होती. हे लोक म्हणजे तर कार्यक्रमाचा प्राण होता. विदेशातून सन्मान घेऊन घरी परतणं, यापेक्षा दुसरी मोठी कुठली गोष्ट असू शकेल? सगळं काही योजनेनुसार चाललं होतं. मोहिनीचा उजवा हात असलेले ‘अशांतजी’ शांत दिसत होते. त्यांच्या खांद्यावरच समारंभाचा सारा भार होता. सुटा-बुटात, हातात  वॉकी-टॉकी घेऊन झुकलेल्या खांद्याने ते इकडे-तिकडे धावपळ करत होते. त्यांना पाहून वाटत होतं की तेच समारंभाचे मुख्य आयोजक आहेत. साडी नेसलेली मोहिनी अगदी आकर्षक दिसत होती. तिच्या शालीनतेमुळे तिचं व्यक्तिमत्व कसं झळाळून दिसत होतं. सगळ्या स्थानिक लोकांची उपस्थिती, एक सुनियोजित कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडण्याची जाणीव करून देत होती. समारंभाच्या भव्यतेची अनुभूती मोहिनीचा चेहरा तजेलदार बनवत होती. यानंतर तिच्या नावापुढे “सफल अंतरराष्ट्रीय सेमिनार आयोजक” अशी मोठीच पदवी लागली असती.

  दुसर्‍या दिवशीच्या सन्मान समारंभासाठी सर्टिफिकेटस तयार केलेली नव्हती. न जाणे कोण येतील… न येतील…विदेशी आणि स्थानिक, निमंत्रण नसलेल्या पण तिथे उपस्थित असलेल्यांची निश्चित संख्या लक्षात येताच लगेच व्यवस्था करण्याची योजना केली होती. त्याच दिवशी चार लोक एकत्र बसून सर्टिफिकेटस तयार करतील, असे ठरवण्यात आले.  योजना यशस्वी झाली. कार्यक्रमाच्या जागी सकाळी सात वाजल्यापासून गाड्या लागू लागल्या. चहा -कॉफीच्या कपाबरोबर काम सुरू झालं

लॅपटॉपला  कनेक्ट करून लेज़र कलर प्रिंटर, टेबलावर ठेवलला होता. धड़ाधड़ प्रिंट होऊन  प्रमाणपत्र बाहेर पडत होती. ‘डॉलर स्टोअर’ मधून विकत घेतलेल्या सजावटीच्या सामानातून प्रमाणपत्र सजवले जात होते. सोनेरी गोल स्टीकर लागताच तो सामान्यसा कागद प्रमाणपत्राचं रूप घेऊ लागायचा. कुठल्या कोपर्‍यात चादण्या लागायच्या, तर कुठे कुठे चमकत्या धारा… जसजशी सजावट वाढत गेली; तसतसं, प्रमाणपत्र, पूर्णपणे सन्मानाचं द्योतक सन्मानपत्र बनलं.  त्यानंतर तयार फ्रेममध्ये घातल्यावर ते अधीकच सुसाज्जित, अधिकारिक सन्मानपत्र बनलं. असं सन्मानपत्र, जे बघता बघता, व्यक्ती आपलं सारं आयुष्य समाधानाने घालवू शकेल. ती असा विचार करील की आपल्या कार्याचं आपल्याला योग्य असं पारितोषिक मिळालय. अशा समाधान देणार्‍या कागदांची फॅक्टरीच बनला होता हा कलर प्रिंटर. छापखानाच बनला होता तों म्हणा ना! प्रत्येकाचे नाव लिस्टमधून घेऊन, व्यवस्थित टाईप करून ‘प्रिंट’ क्लिक करत राह्यचं. दोन चार वेळा चुकीची नाव पडली. नाव चुकीचं पडलय, हे लक्षात येताच, तत्काळ तो कागद फाडला जात होता. क्षणभर वाटायचं, कागद नाही, सन्मानच फाटलाय. पण तत्काल त्याचा पुनर्जन्म व्हायचा. दोन रमा होत्या. दोघी शर्मा होत्या. दोघींना एकच सन्मान दिला जाणार होता. त्यामुळे कुणीही मंचावर यावं, काही फरक पडणार नव्हता.     

क्रमश:…….

मूळ कथा – भिंडी बाजार    मूळ लेखिका – डॉ  हंसा दीप

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ☆ अल्लड अवखळ मन ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

 ?  मनमंजुषेतून  ?

☆ अल्लड अवखळ मन ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

मायेच्या हळव्या स्पर्शाने फुलते

नात्याच्या गंधात धुंद मोहरते

मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे

का होते बेभान कधी गहिवरते—-

मन…कधीच न उलगडणारे कोडे… शब्दात न मांडता येणारे मन वेडे.. आकाशासारखे अथांग… सागरासारखे गहिरे.. क्षणात फुलणारे… क्षणात कोमेजणारे .. सावरणारे …अडखळणारे,

तर कधी आशेच्या हिंदोळ्यावर झुलणारे हे मन….

किती  सांगावी महती या मनाची.. मन चंगा तो कटोती  मे गंगा असे म्हणतात म्हणूनच उत्तम शरीराबरोबरच मनही निरोगी असणे तितकेच गरजेचे आहे. रिकामे मन हे सैतानाचे घर असते. यासाठी मनाला नेहमी चांगल्या गोष्टीत गुंतवायला हवे.

आपण इतरांची मने जपण्यासाठी खूप काही करतो. स्वतःच्या आशा अपेक्षांना मुरड घालतो पण या सर्वांची मने जिंकताना आपल्यालाही एक मन आहे हे साफ विसरून जातो. कधीतरी आपलेच मन आपल्याला विचारेल की, माझ्यासाठी तू काय केलेस? आहे उत्तर?….

योग्य आहार ,विहार, व्यायाम याने जसे शरीर चांगले राहते तसेच छंदाची जपणूक, चांगले मित्र, छान पुस्तक वाचन, गायन, वादन, बागकाम … मनापासून आवडणारे कोणतेही काम हे भरभरून आणि आनंदाने करायला हवे. थकलेल्या शरीराला जसे स्फूर्ती येण्यासाठी टॉनिक देतात तसेच आपले छंद आपल्या मनासाठी टॉनिक म्हणून काम करतात…

स्वतःचे ही मन जपा. त्याला काय हवे-नको ते बघा. त्याचेही कोड कौतुक करा.सकारात्मक विचारांनी त्याला फुलवा.आनंदी क्षणात भुलवा ..मग बघा जीवनाचे इंद्रधनुष्य कसे सप्तरंगानी बहरून येते…

    नजर को बदलो

नजारे बदल जायेंगे

    मन को बदलो

धूप मे भी छांवको पाओगे—–

 

© सौ. स्वाती रामचंद्र कोरे

खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शुभ्र नभासम….स्वप्नाली देशपांडे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ शुभ्र नभासम….स्वप्नाली देशपांडे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

शुभ्र नभासम कोरा कागद

नवी लेखणी हळवी मोहक

कसे न ठावे कातरवेळी

 भेट तयांची घडे अचानक 

 

   झाल ओढूनि तीही सजली 

   शब्दझुला ती गुंफित गेली

   लेवून शेला तोही सजला 

   शब्दझुल्यावर पुरता रमला

 

स्पर्श पहिला तिचा कोवळा 

निळा-जांभळा किंचित ओला 

स्पर्शाने त्या उत्कट पहिल्या

कागद भिजला जरा लाजला 

 

    आरस्पानी शब्दफुलांनी 

    कवितेचा अंकुर बहरला

    अद्वैताच्या अनुभूतीने 

    कागद सर्वांगी मोहरला. 

 

शेवट येता त्या कवितेचा 

नीलघनासम कागद ओला 

झुलून किंचित शब्द झुल्यावर

आत स्वत:च्या दुमडून गेला

–स्वप्नाली अतुल देशपांडे (मुंबई)

प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ Not At Home…. ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

 ☆ Not At Home…. ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆ 

खरंतर Not at Home हा परफेक्ट शब्द.

पण लहानपणी मे महिन्यात सगळी भावंडं एकत्र जमलो कि पत्त्यात हा डाव रंगायचा. पण तेव्हा विंग्रजी फार यायचं नाही मग जो तो ज्याला जसं ऐकू आला उच्चार तसं म्हणायचा. नाॅटॅट होम, नाॅटॅ-ठोम काय वाट्टेल ते !! तसंही आपण आपल्याच घरात तरी कुठे असायचो? ते ही Not At Home च. कधीही मित्र मैत्रिणीच्या घरी जाऊन हुंदडायला मिळायचं. येऊ का? वगैरे विचारण्याच्या formalities नव्हत्या. 

“Challenge” ला पण चायलेन्ज, चाॅलेन्ज काय वाटेल ते म्हणायचो.

“लॅडीज” नावाचा खेळ फक्त लेडीजनीच खेळायचा असं आपलं उगीच वाटायचं मला. त्यात एक वख्खई बोलली जायची. लाडूची म्हणजे ३२ कळ्या किंवा अर्धा लाडू १६ कळ्या वगैरे. झब्बू पण असाच एक डाव. झब्बू देताना एक पानी आणि गड्डेरी. मजाच सगळी.

हे सगळे शब्द कुठून आले ?देव जाणे?

काचापाणी, पट, सागरगोटे हे अजून काही प्रकार बैठ्या खेळातले. काचापाणीसाठी भांड्यांच्या काचा जमवायला अगदी कचराकुंडी पण गाठलीय.

सगळेच खेळ आपल्याला जिवंत ठेवायचे. वेगळा असा “स्पोर्टस् डे” नसायचा. रोजच खेळ. शाळा दुपारची असली की दप्तर फेकून ?‍♀️?‍♂️ धावत सुटायचं! कारण उशीरा पोहचलं खेळायला तर “कटाप” करायचे (actually cut off) खेळातून.

तळहातावर थोडसं चाटून “टॅम्प्लीज” (टाईम प्लीज खरा शब्द) करणं, लपंडावात “धप्पा” म्हणणे, “रडीचा डाव खडी”असं चिडवणे, मग समोरच्यानी आपल्याला “जो म्हणतो तोच” असं बोट आपल्यापुढे नाचवत म्हणणे या सगळ्याची मजा काही औरच.

आजच्या मुलांना काय कळणार ती??

लगोरीsss असं सात ठिक-या एकमेकांवर ठेवून त्यावर पाय फिरवणे, तो नाही फिरवला तर लगोरी लागली असं धरत नसत. तसेच “डब्बा ऐसपैस”. पत्र्याचा एक फालतू डबा पण अनन्यसाधारण महत्व मिळालेला.

डालडाचा वनस्पती तुपाचा हिरवं नारळाचं झाड असणारा डबा पण फार महत्त्वाचा. तो कमरेला बांधून विहीरीत धपाधप उड्या मारणे हा रविवार सकाळचा कार्यक्रम. 

“लपंडाव” खेळताना मुलं मुद्दाम एकमेकांचे शर्ट, टी शर्ट बदलून गंडवायचे आणि शर्टाची बाही दिसेल असे लपायचे. मग चुकीचं नाव घेतलं कि धप्पा मिळायचा “राज्य असणा-याला … ?

राज्य असणा-यालाच पकडायला लावायचं हा काय न्याय!! पण अशा नियमांवर अपील नसायचंच.

“जोडसाखळी, रस्सीखेच” म्हणजे नुसती ओढाओढी.

“दगड का माती” म्हटले की जे म्हणेल त्यावर उभं रहायचं. दगडावर उभं रहायचं असेल तर तो सापडेपर्यंत फक्त धावायचं.

“विषामृत”मधे विष म्हणुन स्पर्श करायचा मग विष मिळाले कि स्तब्ध उभं रहायचं. मग कुणी तरी येऊन अमृत द्यायचं…काय एकेक मज्जा !!

पावसाळ्यात घरी बसू असं तर मुळीच नाही. पावसाळ्यात “रूतवणी” हा खेळ. 

एक लोखंडी सळई घेऊन चिखलात रुतवत जायचे. त्याचे पाॅईन्ट्स मोडायचा. सळई पडली की दुसरा खेळायचा. पहिला औट. 

“आबाधूबी” (अप्पा-रप्पी) लई भारी गेम. पाठ शेकुन काढणारा. यात शक्यतो प्लास्टीकच्या बाॅल घेतला जायचा. रबरी ट्यूब कच-यातून, भंगारातून शोधून तिचे तुकडे करून त्याचाही बाॅल केला जायचा.

साबणाचे फुगे करायला कागदाची बारीक सुरनळी करणे, करवंटीचे फोन, काडेपेटीत वाळू भरून टिचकीनी ती उगडून अंगावर उडवणे… what a creativity !!! काही नाही तर बाॅल घेऊन “टप्पा- टप्पा” हा खेळ तरी व्हायचाच. ते मोजले जायचे ते ही सार्वजनिकरित्या, मोठ्याने बोंबलत.

क्रिकेट खेळताना फळकूट पण चालायचं. एखादी बोळ पण चालायची. टीम पाडायच्या. आपणच अनेक नियम बनवायचे. या कंपाउंड बाहेर गेला बाॅल की फोर, तिकडे सिक्स, एक टप्पा औट, रन आऊट चे नियम वेगळे. कुणाच्या खिडकीची काच फोडली तर सार्वजनिक धूम ठोकणे हा अलिखित नियम. मुली, मुलगे एकत्र खेळायचो तेव्हा. सगळेच मुलींचे “दादा”. क्रिकेट; कबड्डी साठी टीम मेंबर कमी असले की  मुलींना डिमांड. 

“टीपी टीपी टीप टॉप”, व्हॉट कलर डू यू वाँट”? काहीतरी भारी रंग सांगायचा. मग नसेल तर औट करायचे. यातही धावायचंच. “ढप, गोट्या” रिंगण आखून जो सांगितला जाई तो ढप किंवा गोटी रिंगणाबाहेर नेम धरून उडवायची–ऑलिंपिक लेव्हलची नेमबाजी.!! मग यात चंदेरी, पाणेरी, काळी, घारी अशी गोट्यांची वर्णनं. 

एक जबराट खेळ होता. टायर्स फिरवणे. जुने टायर्स घेऊन ते काठीने बडवत पळवत नेऊन त्याची शर्यत लावायची. खूप धमाल यायची टायर्स पळवायला! 

”ठिक्कर पाणी” हा फक्त मुलींचा खेळ समजला जायचा. एखादा मुलगा जरी यात आला तर “मुलीत मुलगा लांबोडा, भाजून खातो कोंबडा” ? म्हणुन चिडवायचे. फरशीची खपटी घेऊन त्याला थुंकी लावुन ती रकान्यात फेकायची आणि एका बाजुने लंगडी खेळत जाऊन ती पायानेच सरकावुन चौकटीच्या बाहेर जाईल अशा रितीने फेकायची. रेषेवर पडली तर औट. 

कांदाफोडी, डोंगराला आग लागली पळा पळा पळा, खांब खांब खांबोळी, शिवाजी म्हणतो, दोरीवरच्या उड्या, मामाचं पत्रं हरवलं, शिरा-पूरी भातुकली हे तर सगळे गर्ल्स स्पेशल खेळ. मुलींची monopoly. 

नाव, गाव, फळ, फूल, नाटक/सिनेमा, रंग, प्राणी, पक्षी, वस्तू काय वाटेल ते. वह्याच्या वह्या भरायच्या. 

भातुकली, दो-या बांधून घर घर खेळणं, दाण्याचे लाडू आणि चुरमु-याचा भात एवढाच कायम स्वैपाक असायचा भातुकलीत.

व्यापार, सापशिडी, सागरगोटे, काचापाणी हे दुपारचे खेळ. 

वारा पडलेला असेल तर बॅडमिंटन. 

पण तो श्रीमंती खेळ. जिच्या हाती रॅकेट ती/तो फार भाव खायचे. मग रॅकेट नसणारे एकत्र यायचे आणि बॅडमिंटन पेक्षा बाकी खेळ कसे भारी यावर वादावादी.

कॅरम पण तसाच श्रीमंती खेळ. 

ते नको असायचे. त्यात धांगडधिंगा करता यायचा नाही ना !! 

“पतंग बदवणे” यात जो माहिर, तो सगळ्यात भारी. ?

मुली आपल्या ही काट, ती काट सांगायच्या आणि फिरकी धरायच्या. मग ती काटताना ढील देणे वगैरे प्रकार करावे लागायचे. काटता आली नाही पतंग की मग मांजा नीट नाही, कन्नी नीट बांधली नाही या तक्रारी. 

दिवेलागणी झाली की परवचा म्हणून रात्री जेवणं झाली की अंताक्षरी आणि  भुताच्या गोष्टी.

निव्वळ Nostalgic !!!

समृद्ध, श्रीमंत बालपण होतं आपलं.

करता येईल का तसं आजच्या लहान मुलांचं???

काहीतरी जादू घडावी आणि होऊन जावं आपल्यागत.

नाही का ???

संग्राहक : श्री अनंत केळकर   

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन-यात्रा ☆ आत्मसंवाद – लेखक हा आधी वाचक असावा लागतो…. – भाग 1 ☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी

? आत्मसंवाद ? 

☆ लेखक हा आधी वाचक असावा लागतो…. – भाग 1 ☆ श्री आनंदहरी

ज्येष्ठ साहित्यिका, संपादिका  सौ. उज्वलाताई केळकर यांनी ई अभिव्यक्ती आत्मसाक्षात्कार साठी स्वतःच स्वतःची मुलाखत घेण्याबाबत सांगितलं तेंव्हा पहिल्यादा नाही म्हणलं तरी दडपण आले कारण ज्येष्ठतम साहित्यिका तारा भवाळकर यांचा आत्मसाक्षात्कार वाचला होता..त्यानंतरही काही मान्यवरांनी स्वतःच घेतलेली स्वतःची मुलाखत वाचली होती. आणि खरेतर  मुलाखत घेणं आणि देणं याचा फारसा काही अनुभव नसताना ही मुलाखत घ्यायची होती. उज्वलाताईंचा आदेश ..

मग मीच माझे आयुष्य त्रयस्थपणे पाहण्याचा , स्वतःच्याच अंतरंगाशी , वर्तमानासह भूतकाळाशी जोडून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. तेंव्हा एकच प्रश्न पडला…

‘नाहीतरी, ‘ मी पणा’ वगळून, स्वतःत त्रयस्थभाव आणून आपण स्वतःशी असा कितीसा संवाद करत असतो ? ‘  ‘मी’ ला टाळता येत नसलं तरी ‘मी पणाला’ टाळण्याचा प्रयत्न करीत आत्मसंवाद साधण्याचा केलेला छोटासा प्रयत्न म्हणजे हा आत्मसाक्षात्कार..

मी :- नमस्कार!

आनंदहरी :- नमस्कार !

मी :-  प्रत्येकालाच स्वतःचा जीवनप्रवास हा काहीसा वेगळा आहे असे वाटत असते. तुमचा आजवरचा जीवन प्रवास कसा झाला ?

आनंदहरी :-   आपण जेव्हा मागे वळून पाहतो तेंव्हा वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर भूतकाळ पाहत असतो. आणि म्हणून प्रत्येक पिढीच्या तोंडी ‘आमच्यावेळी असे होते.. तसे नव्हते ‘ असे शब्द असतातच. बदलत जाणाऱ्या काळाबरोबर सुखाच्या, संपन्नतेच्या व्याख्या, परिभाषा बदलत जातात ही जाणीव आपल्याला भूतकाळ आठवताना नसते असे मला वाटते. त्यामुळे भूतकाळ पाहताना त्या काळाचा, स्थिती-परिस्थितीचा आणि भवतालाचे विचार असणे अत्यंत महत्वाचे आहे. आपण स्वतःला इतरांहून कुणीतरी वेगळे मानत असतो म्हणून आपला भूतकाळ वेगळा आहे, कष्टप्रद आहे असे वाटत असते. खरेतर अपवाद वगळता समाजजीवन हे तसेच असते. त्यात ‘आपले ‘ म्हणून फारसे वेगळेपण असतेच असे नाही.

माझा जन्म आणि बालपण पेठ सारख्या छोट्या गावात गेले. वडील न्यू इंग्लिश स्कुल, पेठ जि. सांगली या माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक होते. स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाची गंगा खेडोपाडी वहायला सुरवात झाली होती. तो, तो काळ होता. आजूबाजूच्या दशक्रोशीतील खेड्यातील मुले चालत शाळेत येत होती. विद्यार्थ्यांकडे (आणि शिक्षकांकडेही ) सायकल असणे ही अपवादात्मक बाब होती. त्याकाळात आजच्यासारखी वैज्ञानिक प्रगती नव्हती. माणसाच्या गरजा कमी होत्या. साधी राहणी हा विचार मनामनात रुजलेला होता. बालपणापासूनचा जीवनाचा काळ हा सर्वार्थाने सुखद आणि संपन्नतेत गेला. नोकरी हीच उपजीविकेचे साधन असल्यामुळे नंतर विद्युत अभियांत्रिकीतील पदविका मिळवली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विद्युत अभियंता म्हणून नोकरी करून, कौटुंबिक जबाबदाऱ्या फारशा उरल्या नाहीत, पेन्शन नसली तरी मिळणाऱ्या उपदानातून आपण उर्वरित आयुष्य आत्तासारखेच साधेपणाने, सुखाने जगू शकतो असा विचार मनात येताच वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली. असे कोणत्याही वळणवाटा न येता आजवरचे संपूर्ण आयुष्य हे सरळ रेषेसारखे व्यतीत झाले आहे.

मी :-  तुम्ही साधेपणाचा उल्लेख केला आहे.. साधेपणा म्हणजे तुम्हांला नेमके काय म्हणायचंय ?

आनंदहरी :- सुख, संपन्नता या गोष्टी त्या काळी पैशाशी जोडल्या गेलेल्या नव्हत्या, खरे तर आजही त्या तशा जोडल्या गेलेल्या नाहीत पण अनेकांना तसे वाटते हे मात्र खरे आहे. माणसाच्या गरजा मर्यादित होत्या.  स्वतःबरोबरच इतरांचा विचार जास्त केला जायचा. सुख आणि संपन्नता ही मनाची स्थिती आहे असे मला वाटते. माणूस जे आहे त्यात सुखी होता. माणूस माणसाशी आंतरिक भावाने जोडला गेलेला होता असा तो काळ होता. माणसाच्या अपेक्षा कमी होत्या. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे ‘ पोटापूरते देई देवा…’ हाच भाव बहुतेकांच्या मनात असायचा. अडी-नडीला माणूस माणसासाठी उभा असायचा. पैशापाठी पळणे नव्हते. बोरकरांच्या शब्दात सांगायचे तर सारे ‘सुशेगात’ होते. कालौघात जीवन आणि जीवनधारणा बदलत गेलीय आणि जात राहणारच तो निसर्ग नियमच आहे.

मी :- तुम्हांला साहित्य लेखनाची आवड  कशी निर्माण झाली ?

आनंदहरी :- गायक हा आधी उत्तम श्रोता असावा लागतो तद्वत लेखक हा आधी वाचक असावा लागतो असे मला वाटते. लहानपणी गोष्टी ऐकण्याची आवड निर्माण झाली ती आईमुळे. त्याकाळी चातुर्मासात घरात आणि घराजवळ असणाऱ्या सिद्धस्वामी मठात ग्रंथवाचन चालायचं. श्रावणात ‘ खुलभर दुधाची कहाणी ‘ सारख्या अनेक गोष्टी आई वाचायची त्यामुळे गोष्टी ऐकण्याची आवड निर्माण झाली होती. वडील काही कामानिमित्त इस्लामपूर, सांगली, कोल्हापूरला गेले की आवर्जून गोष्टीची पुस्तके आणत  त्यामुळे शाळेत जायला लागण्याआधीपासूनच चांदोबा, छान छान गोष्टी., बिरबलाच्या गोष्टी यासारखी गोष्टीची पुस्तके घरात होती. ती वाचण्यासाठी आम्हा बहीण भावात भांडणेही लागत. नंतरच्या कालखंडात या पुस्तकांबरोबरच बाबुराव अर्नाळकर, एस.एम काशीकर, गुरुनाथ नाईक यांच्या रहस्यकथा वाचण्याचा छंदच लागला. दिवाळीची सुट्टी म्हणजे दीपावली अंक वाचण्याची दिवाळीच असायचीव अजूनही आहे. उन्हाळी सुट्टी म्हणजेही वाचनाचीच दिवाळी. तेंव्हापासून वाचनाची आवड निर्माण झाली. माध्यमिक शालेय जीवनात शाळेच्या समृद्ध ग्रंथालयातून ययाती, अमृतवेल, मृत्युंजय, स्वामी सारखी अनेक पुस्तके वाचायला मिळाली.

नंतर वयोपरत्वे वाचन बदलत गेले. गुलशन नंदा सारख्या लेखकांच्या पुस्तकांसह जे जे हाती पडेल ते ते वाचायची सवय जडली. वृत्तपत्र नियमित घरी येत असे त्यामुळे ते नियमित वाचायची सवय लहानपणापासूनच लागली.

वाचायला सुरुवात केली तसे व्यक्त व्हायलाही सुरवात झाली होती, कविता, गीते ऐकायची आवडही निर्माण झाली होती. त्यामुळे बालपणातच तत्कालीन भावविश्वाच्या कविता.. यमक साधून लिहिलेल्या / रचलेल्या ओळी म्हणूया फारतर .. लिहायची सवय लागली. आठवीत असताना रहस्यकथा लिहिली होती. शालेय नियतकालिकातही लेख, कविता, कथा लिहिल्या होत्या. त्यावेळी कदाचित या नादात माझे अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय हे जाणवून एकदा वडिलांनी सांगितले होते, ‘ मराठीत साहित्य लेखन हे चरितार्थाचे साधन होऊ शकत नाही. उपजीविकेसाठी नोकरी आणि नोकरीसाठी शिक्षण महत्वाचे आहे. साहित्यादी कला या छंद, आवड म्हणूनच ठीक आहेत. ते मनाच्या, विचारांच्या समृद्ध पोषणासाठी हवेतच पण पोट भरणे हेही महत्वाचे आहे.’ मग मात्र शिक्षण पूर्ण होऊन नोकरीत स्थिरसावर होईपर्यंत अभ्यासाकडे लक्ष राहिले. वाचन चालू राहिले तरी लेखन तसे कमीच झाले. नाही म्हणायला कविता,  क्वचित कथा लिहीत होतो.. मित्रपरिवारात त्या वाचल्या जात होत्या पण प्रसिद्धीला कुठं पाठवल्या नाहीत.जेव्हा जमेल तेंव्हा एखाद्या साहित्यिक कार्यक्रमात श्रोता म्हणून उपस्थित रहात होतो.

क्रमशः ….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – संस्मरण ☆ व्यंग्य ☆ क्यों नहीं आते लेखक अच्छे अच्छे….. ☆ श्री कमलेश भारतीय

श्री कमलेश भारतीय

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी , बी एड , प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । यादों की धरोहर हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह -एक संवाददाता की डायरी को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह-महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ व्यंग्य ☆ क्यों नहीं आते लेखक अच्छे अच्छे…..☆ श्री कमलेश भारतीय ☆ 

अपने देश के विश्वविद्यालयों में अभी तक सिर खफा रहे हैं शोधार्थी कि सूरदास वगैरह प्राचीन कवियों के जन्मस्थान कहां हैं ?बेचारे शोध छात्र क्या करें ? सूरदास और तुलसीदास के काव्य सौंदर्य का आनंद लेने की बजाय उनके जन्म मरण के रहस्य में फंसे हैं ।

दूसरी तरफ हालत संत कवियों की भी अच्छी नहीं । कोई उन्हें कहीं विराजमान करता है तो कोई दूसरा कहीं और शोभायमान कर देता है । बेचारे संत कवि । इतिहास में भी एक जगह टिक कर बैठ नहीं सकते ।भक्ति में , काव्य में , लेखन में गले गले तक यानी आकंठ डूबे रहे और साहित्य रचते रहे । अपने शिष्यों को अपने बारे में कुछ भी नहीं बताया ।बस , काव्य ग्रंथ हाज़िर कर दिये कि लो , इनमें हमें ढूंढो रे बंदे । उन संत कवियों की नज़र में जन्म स्थान, जन्म तिथि व दूसरी किस्म के निजी ब्यौरे गैर-जरूरी थे । उनकी नज़र में मंगल की भावना ही प्रमुख थी ।

जहां प्राचीन कवि अपने लेखन से आज तक जाने पहचाने जाते हैं , वहीं आज लेखक तो मौजूद है लेकिन उसका लेखन गायब है । आज लेखक की साक्षात मूर्ति के दर्शन तो हो सकते है पर उसके लेखकीय दर्शन व विचार क्या हैं , इसे शोध का विषय बनाना पड़ेगा । आज का लेखक आत्मकथा और गर्दिश के दिन जैसी आत्मरचनाएं पहले लिखता है और असली लेखन बाद में करता है । यह है मैनेजमेंट फंडा । शायद वह हिन्दुस्तानी फिल्मों की हीरोइन की तरह आंसू अधिक बहाता है और मतलब की बात कम ही करता है ।

आधुनिक हिंदी साहित्य के पितामह भारतेंदु माने जाते हैं । सब जानते हैं कि भारतेंदु इनका नाम नहीं बल्कि उपाधि है -प्यार से दी हुई उपाधि । इन्होंने सितारे हिंद बनने की बजाय भारतेंदु बनना पसंद किया । अंग्रेज सरकार की बजाय जनता से मिली उपाधि स्वीकार की । पुरस्कार की दौड़ में शामिल न होकर हिंदी सेवा की दौड़ में शामिल होना पसंद किया । एक पूरा युग भारतेंदु के नाम हो गया । आज लेखक पुरस्कारों के पीछे इतने दीवाने हो चुके हैं कि जैसे तैसे पुरस्कार पा लेना चाहते हैं और पुरस्कृत होने का गौरव पा लेना चाहते हैं । इसीलिए पुरस्कारों की  अहमियत गौण होती जा रही है और राशि महत्त्वपूर्ण होती जा रही है । ऐसा लगता है कि ये पुरस्कार लेखन पर न होकर किसी ताश या लाॅटरी के रूप में निकाले जाते हों । या किसी औघड़ बाबा के आशीर्वाद का फल । सही लेखक की पहचान लेखन से होती है न कि पुरस्कारों से ।

भारतेंदु के पास बाप दादा का इतना धन था कि उसके बारे में खुद भारतेंदु कहते थे कि इस धन ने मेरे बाप दादा को खाया , मैं इसे खाकर ही जाऊंगा । भारतेंदु ने धन खाया नहीं बल्कि हिंदी की सेवा में अधिक लगाया । लेखक मंडली बनाई और लेखकों की जरूरत पड़ने पर आर्थिक सहायता की । आज हालत यह है कि लेखक मंडली नहीं बनाते बल्कि अपना अपना मठ बनाते हैं , माफिया बनाते हैं और भारतेंदु नहीं बल्कि मठाधीश कहलाते हैं । आजकल के लेखकों का एक ही नारा है :

हम तुम्हें

तुम हमें छापो ।

हम तुम्हें

तुम हमें उछालो ।

जो हमारे मठ का नहीं

उसे गिराओ ।

हिंदी साहित्य में से

उसका नाम मिटाओ …..

हालांकि हम सब जानते हैं कि साहित्य में नाम लिखना मठाधीशों के साथ में नहीं बल्कि पाठक के साथ में है ।

हिंदी साहित्य में एक पूरा युग दरबारी युग रहा है । दरबारी युग यानी रीतिकाल । इस युग के कवि राजाओं को खुश करने के लिए दोहे रचते थे । इन सबमें बाजी मार ले गये बिहारी बाबा जिनके एक दोहे पर सोने की अशर्फी मिलती थी । दरबारियों की वाह वाही अलग । वैसे इसी काल में कवि भूषण भी हुए जिनकी पालकी को खुद छत्रसाल ने कंधा दिया था :

शिवा को सराहों

 के सराहों छत्रसाल को ।

अब हम इसी तर्ज पर पूछ सकते हैं कि

बिहारी को सराहों

 के सराहों छत्रसाल को ?

इसीलिए तो स्वर्गीय डाॅ इंद्रनाथ मदान ने एक इंटरव्यू में चुटकी ली थी कि साधन तो बढ़ रहे हैं लेकिन साधना घट रही है । लेखक का उद्देश्य बड़ी पत्रिका से ज्यादा पैसा कमाना हो गया है । जबकि लेखक का उद्देश्य पैसे कमाना नहीं बल्कि रहती दुनिया तक नाम कमाना होता है ।

मुंशी प्रेमचंद लेखन और मजदूरी को एक ही समान समझते थे । एक बार एक आदमी उनसे मिलने आया । वे उस समय लिखने मे अर्थात् मजदूरी करने में व्यस्त थे । कुछ देर बात कर उन्होंने उस आदमी से पूछा कि यदि एक मजदूर मजदूरी नहीं करेगा तो खायेगा क्या ?

इस पर वह अतिथि बोला कि भूखा मरेगा और क्या होगा?

मुंशी प्रेमचंद ने कहा -एक लेखक लिखेगा नहीं तो खायेगा क्या ?

 मुंशी प्रेमचंद के मजदूरी शब्द को अनेक लेखकों ने अपनाया जरूर लेकिन बड़े  गलत तरीके से । आज बुक स्टाल ऐसी पत्रिकायें से भरे पड़े हैं जो युवा वर्ग को गुमराह कर रहा है । वे बड़ी शान से कहते हैं कि हम मुंशी प्रेमचंद की तर्ज पर मजदूरी कर रहे हैं । कम पैसे के लिए अश्लील साहित्य धड़ाधड़ लिखते चले जा रहे हैं । उरोजों चुम्बकों की बात करते रहते हैं । तब मुझे ऐसे एक लेखक महोदय को याद दिलाना पड़ा कि मुंशी प्रेमचंद जहां कलम के मजदूर थे वहीं वे कलम के सिपाही भी थे । उन्होंने मुम्बई की फिल्मी दुनिया को भी ठोकर मार दी थी । वे फिल्म निर्माताओं की कहानी बदलने की मांग को पचा नही पाये और वापस आ गये । कुछेक सिक्कों के लिए मुंशी प्रेमचंद ने समाज पर अपने पहले में कोई ढील नहीं दी थी । इसीलिए वे कहते थे कि साहित्य समाज को सुलाने के लिए नहीं बल्कि जगाने के लिए है ।

दूर क्या जाना । जैसे कल की बात हो । मोहन राकेश ने जब अनिता राकेश को कहा कि देखो , मेरी ज़िंदगी में पहले स्थान पर मेरा लेखन, दूसरे पर दोस्त और तीसरे पर तुम्हारी जगह है । अगर तुम इसमें कुछ उलट पुलट करोगी तो मुसीबत में पड़ जाओगी ।

इस बात की खूब आलोचना हो रही है और हुई भी । मोहन राकेश को खानों में ब॔टा आदमी तक कहा गया । जो भी हो , वे लेखक के तौर पर ईमानदार आदमी थे । लेखक के लिए लेखन सबसे पहले स्थान पर नहीं होगा तो क्या किसी बनिए के बही खाते में होगा ? आज कितने लेखक हैं जो लेखन के लिए उचित माहौल न पाकर मोहन राकेश की तरह इस्तीफे दर इस्तीफे दे सकते हैं ? कितने लेखक हैं जो सुविधाओं के पीछे न भाग कर लेखन के लिए और लेखक बन कर बंटे रह सकते हैं ? शब्द का मोल चुकाने वाले कितने लेखक हैं ?

अर्नेस्ट हेमिंग्वे ने भी द ओल्ड मैन एंड द सी उपन्यास लिखने के लिए मछुआरों के बीच समय गुजारा था । उस उपन्यास को नोबेल पुरस्कार मिला । तोल्सटाय ने वार एंड पीस उपन्यास को बी  बार से ऊपर लिखा या निरंतर संशोधित किया । ऐसा धैर्य और ऐसा त्याग किस लेखक में है या कितने लेखकों में है ?

कहा जाता है कि विदेशों में लेखक की असली लेखन यात्रा चालीस साल के बाद शुरु होती है क्योंकि वह जीवन के अनुभव से भरपूर हो जाता है जबकि हमारे दे  में एकदम उलट हैं हालात । बहुत सारे लेखक चालीस तक पहुंचते पहुंचते मठाधीश या परामर्शदाता बन चुके होते हैं ।

एक अखबार के संपादक के पास एक नवोदित कवि आया और अपनी रचना देकर कहा कि मुझे भी कवियों की लाइन में लगा दीजिए ।

इस पर संपादक महोदय ने बहुत शानदार जवाब दिया कि बरखुरदार , लाइन तो पहले ही बहुत लम्बी लगी है  लेकिन कोई इस लाइन का नेता बन सके , उसकी इंतजार है । हो सके तो आप ही आगे आइए न ।

वे कविता बगल में दबाये दुम दुम दफा कर भाग निकले ।

कुम्हारी अपना ही भांडा सलाह तो है । लेखक अपनी ही बिरादरी की आलोचना करने को मजबूर है । और यही पूछ रहा है – क्यों नहीं आते, लेखक अच्छे अच्छे …..?

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष, हरियाणा ग्रंथ अकादमी

1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – संपदा ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज 

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि – संपदा ? ?

उनके लिए

धन ही संपदा थी,

उसके लिए

सम्बंध ही धन था,

वे सम्बंधों से भी

धन कमाते रहे,

उसे जिनसे कमाना था;

उनसे भी रिश्ते बनाते रहा,

समय का लेखा-जोखा

प्रमाणित करता है;

सम्बंध कमाने वाले,

आत्मीयता से

आजीवन सिंचित रहे,

केवल अकूत सम्पत्ति भर

जुटा सकने वाले पर

सच्ची संपदा से वंचित रहे!

भाईदूज की हार्दिक शुभकामनाएँ

©  संजय भारद्वाज

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ काव्य धारा # 53 ☆ गजल ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ 

(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी  द्वारा रचित एक भावप्रवण  “गजल”। हमारे प्रबुद्ध पाठक गण  प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी  काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे। ) 

☆ काव्य धारा # 53 ☆ गजल ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध ☆

निगाहों में जो करूणा की सुखद आभा तुम्हारी है

मधुरता ओर कोमलता लिये वह सबसे न्यारी है।।

 

मुझे दिन रात जीवन में कहीं कुछ भी नहीं भाता

तुम्हारी छवि को जबसे मेरे नयनों ने निहारी है।।

 

सलोना और मनभावन तुम्हारा रूप ऐसा है

सरोवर में मुदित अरविन्द-छवि पर भी जो भारी है।।

 

झलक पाने ललक मन की कभी भी कम नहीं होती

बतायें क्या कि उलझे मन को कितनी बेकरारी है।।

 

लगन औ’ चाह दर्शन की निरंतर बढ़ती जाती है

विकलता की सघनता है, विवशता ये हमारी है।।

 

तुम्हारी कृपा की आशा औ’ अभिलाषा लिये यह मन

रंगा है तुम्हारे रॅंग में, औ’ ऑखों में खुमारी है।।

 

सुहानी चाँदनी में जब महकती रात रानी है

गगन में औ’ धरा मैं हर दिशा में खोज जारी है।।

 

उभरते ’चित्र’ मन भाये मनोगत कल्पना में नित

अनेकों रूप रख आती तुम्हारी मूर्ति प्यारी है।।    

 

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ 

ए २३३ , ओल्ड मीनाल रेजीडेंसी  भोपाल ४६२०२३

मो. 9425484452

[email protected]

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आतिश का तरकश – ग़ज़ल # 2 – “इश्क़ हो गया” ☆ श्री सुरेश पटवा

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी  ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं । आज प्रस्तुत है आपके साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकश के अंतर्गत आपकी अगली ग़ज़ल “इश्क़ हो गया”। )

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ आतिश का तरकश – ग़ज़ल # 2 – “इश्क़ हो गया” ☆ श्री सुरेश पटवा ☆

उनकी पुरज़ोर तैयारियों से उसे इश्क़ हो गया है,

अपने अरमानों के लुटेरों से उसे इश्क़ हो गया है।   

 

अब तो दुश्वारियों की  लत सी पड़ गयी है उसे,

बर्बादियों की लगातार आमद से इश्क़ हो गया है।

 

बहुत ख़ौफ़ज़दा है वह मुहब्बत जताने वालों से,

उन की बेपनाह मेहरबानियों से इश्क़ हो गया है।  

 

ग़म का लहराता समुंदर लुभाता है ख़ूब उसे,

ऊँची उठती तूफ़ानी लहरों से इश्क़ हो गया है। 

 

कौन किसके साथ चलता है ख़ुदगर्ज़ ज़माने में,

कुछ काम जब आन पड़ा तो इश्क़ हो गया है। 

 

पहाड़ों पर चढ़ने पर साँस फूल जाती है उसकी,

उसे उतरती उम्र की फिसलन से इश्क़ गया है।

 

दो झटके खा चुका है उसका नादान सा दिल,

धीमी पड़ती दिल की धड़कन से इश्क़ हो गया।

 

कब आएगी कभी न छोड़कर जाने वाली महबूबा,

“आतिश” को उसी नाज़नीन से इश्क़ हो गया है।

© श्री सुरेश पटवा

भोपाल, मध्य प्रदेश

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ आशीष का कथा संसार #65 – अपनी रोटी मिल बाँट कर खाओ ☆ श्री आशीष कुमार

श्री आशीष कुमार

(युवा साहित्यकार श्री आशीष कुमार ने जीवन में  साहित्यिक यात्रा के साथ एक लंबी रहस्यमयी यात्रा तय की है। उन्होंने भारतीय दर्शन से परे हिंदू दर्शन, विज्ञान और भौतिक क्षेत्रों से परे सफलता की खोज और उस पर गहन शोध किया है। 

अस्सी-नब्बे के दशक तक जन्मी पीढ़ी दादा-दादी और नाना-नानी की कहानियां सुन कर बड़ी हुई हैं। इसके बाद की पीढ़ी में भी कुछ सौभाग्यशाली हैं जिन्हें उन कहानियों को बचपन से  सुनने का अवसर मिला है। वास्तव में वे कहानियां हमें और हमारी पीढ़ियों को विरासत में मिली हैं। आशीष का कथा संसार ऐसी ही कहानियों का संग्रह है। उनके ही शब्दों में – “कुछ कहानियां मेरी अपनी रचनाएं है एवम कुछ वो है जिन्हें मैं अपने बड़ों से  बचपन से सुनता आया हूं और उन्हें अपने शब्दो मे लिखा (अर्थात उनका मूल रचियता मैं नहीं हूँ।”)

☆ कथा कहानी ☆ आशीष का कथा संसार #65 – अपनी रोटी मिल बाँट कर खाओ ☆ श्री आशीष कुमार

एक राजा था। उसका मंत्री बहुत बुद्धिमान था। एक बार राजा ने अपने मंत्री से प्रश्न किया – मंत्री जी! भेड़ों और कुत्तों की पैदा होने कि दर में तो कुत्ते भेड़ों से बहुत आगे हैं, लेकिन भेड़ों के झुंड के झुंड देखने में आते हैं और कुत्ते कहीं-कहीं एक आध ही नजर आते है। इसका क्या कारण हो सकता है?

मंत्री बोला – “महाराज! इस प्रश्न का उत्तर आपको कल सुबह मिल जायेगा।”

राजा के सामने उसी दिन शाम को मंत्री ने एक कोठे में बिस कुत्ते बंद करवा दिये और उनके बीच रोटियों से भरी एक टोकरी रखवा दी।”

दूसरे कोठे में बीस भेड़े बंद करवा दी और चारे की एक टोकरी उनके बीच में रखवा दी। दोनों कोठों को बाहर से बंद करवाकर,वे दोनों लौट गये।

सुबह होने पर मंत्री राजा को साथ लेकर वहां आया। उसने पहले कुत्तों वाला कोठा खुलवाया। राजा को यह देखकर बड़ा आश्चर्य हुआ कि बीसो कुत्ते आपस में लड़-लड़कर अपनी जान दे चुके हैं और रोटियों की टोकरी ज्यों की त्यों रखी है। कोई कुत्ता एक भी रोटी नहीं खा सका था।

इसके पश्चात मंत्री राजा के साथ भेड़ों वाले कोठे में पहुंचा। कोठा खोलने के पश्चात राजा ने देखा कि बीसो भेड़े एक दूसरे के गले पर मुंह रखकर बड़े ही आराम से सो रही थी और उनकी चारे की टोकरी एकदम खाली थी।

वास्तव में अपनी रोटी मिल बाँट कर ही खानी चाहिए और एकता में रहना चाहिए।

सदैव प्रसन्न रहिये।
जो प्राप्त है, पर्याप्त है।।

© आशीष कुमार 

नई दिल्ली

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares