☆ संत वेणास्वामी – भाग – 6 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
(सूर्याच्या लेकी या महाग्रंथासाठी निवड झालेला सौ.पुष्पा प्रभूदेसाई यांचा संत वेणास्वामी हा लेख क्रमशः ई-अभिव्यक्ती च्या वाचकांसाठी:)
रामनवमीच्या उत्सवासाठी वेणास्वामी चाफळला आल्या. आल्यानंतर दोन-चार दिवसातच त्यांना ताप भरला. थंडी तापाने गाठले. तशाच अवस्थेत नदीवर जाऊन, त्या स्नान करून आल्या. त्यामुळे तब्येत आणखीच बिघडली. औषधे घेतली ,पण औषधांचा काहीही परिणाम होईनासा झाला. त्यांना आता काळजी लागली. रामाचा उत्सव कसा होणार! मनाची तळमळ सुरू झाली. काय करावे काही सुचत नव्हते. रामनवमीचा उत्सव होणार याची मात्र खात्री होती. तरीही काळजी लागून राहिली होती .शेवटी त्या खुरडत, खुरडत रामाच्या मंदिरात गेल्या. अशक्तपणामुळे उभे राहणेही कठीण जात होते. खांबाला धरून उभे राहायला येते का, ते पहात होत्या. पण तेही कठीण झाले. शेवटी स्वतःला त्यांनी आपल्याच लुगड्याच्या पदराने, खांबाला बांधून घेतले. अश्रू गळत होते. श्रीरामाची प्रार्थना करायला लागल्या .अंतकरण भरून आले. श्रीरामाच्या मूर्तीकडे पाहिले, आणि त्यांना दिसले की, श्रीरामाच्या डोळ्यातून पाणी यायला लागले आहे. माझ्या भक्तवत्सल रामाला माझ्यामुळे किती दुःख सोसावे लागले, असे म्हणून त्या दुःखी झाल्या .रामभक्त आणि राम यांचे नाते जुळले .अत्यंत हृदयस्पर्शी असे काव्य त्यांना सुचभले. पतित पावना जानकी जीवना। अरविंद नयना रामराया। ——- आता पुन्हा पुन्हा उत्सवाचे कसे होणार याची काळजी लागली .
रमाबाई नावाची एक बाई, “मला उत्सवाची कामे करण्यास,आक्कास्वामींनी पाठविले आहे”, असे सांगून वेणा स्वामींकडे आली. तिने वेणा स्वामींना औषधोपचार केले. तापही उतरला. त्यांच्या देखरेखीखाली रमाबाई सर्व कामे भराभर करू लागली. उत्सवाचा दिवस उजाडला .समर्थ, आक्का स्वामी आणि दूरदूरचे लोक उत्सवासाठी यायला लागले. वेणास्वामीनी अक्का स्वामी व समर्थांना, रमाबाईंनी केलेल्या कामाचा तपशील सांगितला. आक्का स्वामी म्हणाल्या, “मी तर कोणालाच पाठवले नव्हते”. रमाबाईंचा शोध घेतला. पण रमाबाई गायब झाली होती. भक्तांच्या आनंदोत्सवाच्या निमित्ताने, श्री रामप्रभूनीच काम केले,अशी खात्री झाली.
आजारपण, उत्सवाची जबाबदारी, कामे यामुळे वेणा स्वामींना अशक्तपणा जाणवत होता .बरेच दिवसात त्या माहेरी कोल्हापूरला गेल्या नव्हत्या. समर्थांकडे तशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. पण समर्थांनी सांगितले की,” उद्या आपल्याला सज्जनगडावर जायचे आहे. तुमचा थकवा कमी झाला ,बरे वाटू लागले की ,मग बघू “.दुसरे दिवशी अक्कास्वामी आणि प्रभू रामचंद्राचा निरोप घेऊन सर्वजण सज्जनगडावर जायला निघाले. अशक्तपणामुळे वेणास्वामींची पावले हळूहळू पडत होती. थांबून, थांबून चालावे लागत होते. वर पोहोचल्यानंतर कल्याण स्वामींनी आपल्या गुरु भगिनीची औषध पाणी ,खाण्यापिण्याची खूप काळजी घेतली. आठ दहा दिवसात त्यांना बरेही वाटू लागले. समर्थांनी घोषणा केली .”चैत्र वद्य चतुर्दशीला, दुपारी चार वाजता वेणा स्वामींचे कीर्तन होईल. आणि मग त्या माहेरी जातील. स्वतः वेणास्वामींना खूप आनंद झाला. त्याचबरोबर आजूबाजूचे लोकही आनंदित झाले .कारण बरेच दिवसात त्यांनी वेणा स्वामींचे कीर्तन ऐकले नव्हते. आज आपण आपल्या गुरुं समोर कीर्तन करणार ,त्याचा त्यांना अभिमान आणि धन्य धन्य वाटत होते.
☆ हृदय मिलन – भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆क्रमश:….
मंगेश जे काही सांगत होता त्यामुळे रजनी विचारात पडली. आधी फक्त आभार मानायचे होते आणि आता खरोखरचे एक काम आहे. जे काही मंगेश सांगत होता ते काही तिला कळत नव्हते. ” हॅलो….. तुम्ही… तुम्ही काय बोलत आहात काही कळत नाही. आपली आधी काहीच ओळख नसतांना तुम्ही माझे का म्हणून आभार मानणार होतात आणि आता भेटल्यावर काय काम आहे? तुम्ही जरा स्पष्ट बोलाल तर बरे होईल माझ्याकडे जास्त वेळ नाही. मला माझ्या ड्युटीवर परत जायला लागणार आहे तरी कृपा करून जे काही असेल ते स्पष्ट सांगून टाका. ” रजनीने लांबड न लावता त्याला स्पष्ट बोलायला सांगितले.
मंगेशने जरा आवंढा घेतला आणि बोलायला सुरवात केली, “तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. मी जरा स्पष्टच बोलतो. माझ्याशी तुम्ही लग्न कराल का ? मी तुम्हाला माझ्याशी लग्न करण्यासाठी मागणी घालत आहे. विचार करा, माझी पूर्ण माहिती काढा आणि नंतरच तुमचा निर्णय कळवा. तुमचा होकार असेल तर मी आणि माझे आई वडील तुमच्या आईला भेटायला येऊन पद्धतशीर मागणी घालू. ” रजनी आता मात्र खरंच गोंधळून गेली होती. काय चाललंय तिला काहीही कळत नव्हते. कोण कुठचा रोज फोन करून भेटायला काय बोलवतो आणि भेटल्यावर कळते की तो मोठा बिझनेसमन आहे आणि आता तर काय डायरेक्ट लग्नाची मागणी.
“हॅलो …. तुम्ही शुद्धीवर आहात ना. काय बोलत आहात? ना आपली ओळख ना पाळख. जरा काय मी आज भेटायला तयार झाले तर डायरेक्ट तुम्ही लग्नाची मागणी घालताय. जरा वास्तवात या. लग्न अशी एका भेटीत ठरत नसतात आणि हो मुख्य म्हणजे माझ्यात असे काय आहे, मी काही सौंदर्यवती नाही, माझी उंची….. शरीराची म्हणा किंवा स्टेटसची म्हणा तुमच्याशी जुळत नाही आणि महत्वाचे म्हणजे काहीतरी वेगळे असे माझ्यात काही नसतांना तुम्ही मलाच का निवडत आहात ?” रजनीचा जो काही तोंडाचा पट्टा चालू झाला त्याला मंगेशनेच लगाम लावला. “अहो …. जरा ऐकून घ्या. मी काही तुमचा निर्णय आत्ता मागत नाही. तुम्ही पूर्ण एक आठवडा घ्या. माझी चौकशी करा. माझ्याबद्दल माहिती काढा. जमल्यास आमच्या ऑफिसला भेट द्या. तुमची तयारी असेल तर मी एक आठवडा रोज येथे २ वाजता येऊन तुमची भेट घेईन. जे काही प्रश्न तुमच्या मनात असतील ते तुम्ही मला विचारत जा. महत्वाचे म्हणजे मी माणूस म्हणून कसा आहे ह्याची तुम्ही पारख करा आणि नंतरच तुमचा काय निर्णय असेल तो सांगा”. मंगेशने रजनीला शांत करून समजावले. रजनीला एक कळून चुकले होते की तो जे काही बोलत होता त्यात कुठेही घाई आणि आक्रस्ताळेपणा नव्हता. त्याने जसा शांतपणे त्याचा निर्णय घेतला आहे तसाच तो तिलाही घ्यायला वेळ देत होता. सगळे ऐकल्यावर रजनीने एक आठवडा रोज दोन वाजता ह्याच ठिकाणी स्टारबक्समध्ये भेटायचे ठरविले.
घरी गेल्यावर तिने त्याची गुगलवरून खूपशी माहिती जमा केली. प्रथम त्याचा गुगलवरील फोटो आणि तो एकच आहे ह्याची खात्री केली. त्यांच्या पराडकर आणि पराडकर कंपनीचे मागील रेकॉर्ड चेक केले. त्यांच्या कंपनीचा खूप मोठा पसारा होता. महत्वाचे त्याच्या वडिलांनी उभा केलेल्या आणि मंगेशने तो वाढविलेल्या साम्राज्याचा तो एकुलता एक वारीस होता. रजनीला अशी एकही गोष्ट मिळत नव्हती त्यामुळे तिने मंगेशला नकार द्यावा. आता फक्त नी फक्त एकच प्रश्न रजनी समोर उभा होता तो म्हणजे मंगेशने काहीही ओळख नसतांना तिची निवड का केली आणि जो माणूस फक्त आभार मानायला आला होता ते पण कशाबद्दल ते न सांगता तडक त्याने एकदम ल्ग्नाचीच मागणी घातली. का? का?
☆ पेडगावचे शहाणे की वेडे..? ☆ संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर ☆
वेड पांघरून पेडगावला जाणे किंवा पेडगावचे शहाणे हे वाक् प्रचार कसे आले???
६ जून १६७४, शिवराज्याभिषेक संपन्न. एकूण साधारण १ कोटी रुपये खर्च लागला ह्या अद्वितीय सोहळ्याला. आता हा खर्च मुघलांकडून वसूल कसा केला आपल्या राजाने, त्याची गमतीशीर हकीगत आणि गनिमीकाव्याचे उत्कृष्ट उदाहरण ऐका.
अहमदनगर जिल्ह्यात पेडगाव नावाचं गाव आहे. तिथे बहादुरखान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा सुभेदार; महा मुजोर. आपल्या शिवाजी महाराजांना खबर मिळाली की २०० उच्च प्रतीचे अरबी घोडे आणि साधारण १ कोटी रुपये (तेव्हा होन ही मुद्रा असत, रुपये नव्हते) बहादुरगडावर आले आहेत. पण तिथे आरक्षणास तैनात फौजही मोठी होती. ही सगळी मालमत्ता दिल्लीस रवाना होणार होती. महाराजांनी आज्ञा दिली की २००० चं सैन्य चढाई करेल बहादुरगडावर आणि लुटून आणेल ते बलाढ्य ऐवज आणि ते २०० उमदा अरबी घोडे ही.
कोणासठाऊक कशी पण खानाला ही बातमी मिळाली, आणि चेष्टेने हसत मजूर्डा म्हणाला,
“सिर्फ २००० मराठा मावळे! उनके लिये तो किले के दरवाजे खोल ही दो. अगर आ जाए पास भी तो खदेड देंगे, काट देंगे.”
तारीख १६ जुलै १६७४, पेडगावच्या त्या बहादुरगडातून मुघल सैनिकीला दूरवर धूळ उडताना दिसली. घोडदौड येत आहे हे लक्षात आलेच. धोक्याच्या तुताऱ्या वाजल्या गडावर, आणि आधीच तयार बसलेली खानाची प्रचंड सेना सज्ज झाली. त्या किल्ल्याचे दरवाजेही उघडले. जसे गाफील मावळे जवळ आले, तोच खानाच्या सेनापतीने चढाईचा हुकूम दिला. २००० मावळे बिथरले, अनपेक्षित झालेलं ना हे सगळं! जीव वाचवायला ते मागे फिरले पण त्यांचे घोडे जोर पकडत नव्हते. खानाची संपूर्ण फौज जवळ येऊ लागली, खूप जवळ आली त्यांच्या. नशीब बलवत्तर म्हणून घोड्यांनी वेग पकडला आणि मावळ्यांनी पाठ दाखवून धूम ठोकली. बहादुरखान स्वतः त्यांना आडवायला, नव्हे छाटायला, मुघल सैन्याच्या पुढे होता. अनेक अनेक कोस ही घोडदौड चालत राहिली, कारण माजूर्ड्या बहादूरखान कोकलताशला मावळ्यांच्या घोडदौडीतली भीती चेव आणीत होती. मावळे पसार झाले, संपूर्ण २००० ची फौज वाचली खरी, पण आपले शिवबा हरले रे!
शेवटी खानाची फौज थांबली, आणि एकच जल्लोष झाला. मग सगळे परतू लागले. ही जीत औरंगजेबास कळाली की काय इनाम असेल ह्या आनंदाने बहादूरखान छाती फुगवून घोड्यावर डौलात होता. का नसावं त्याने, शेवटी शिवाजीच्या फौजेला पळायला लावलं हे काही छोट काम नाहीच. शिवबांची फौज हरली, पळ काढला! आणि तितक्यात सगळ सैन्य शांत झालं आणि डोळे विस्फारून दूरवर असलेल्या बहादुगडाकडे बघू लागलं. धुराचे मोठे लोट किल्ल्यातून येत होते.
खानाने भीतीने आवंढा गिळत किल्लेदाराला विचारलं,
“अगर हम सब यहाँ हैं, तो किलेपर कौन है?”
“कोई नही जहांपन्हा. आपका हुकुम था सबने चढ़ाई करनी है शिवाजी के उन २००० मावलो पर”, किल्लेदार, सेनापती, आणि स्वतः खानाचे धाबे दणाणले. कारण काय आक्रित झालं असणार ह्याचा अंदाज त्यांना आला, आणि त्याच सोबत छत्रपती शिवाजीराजे ही काय चीज आहे हे ही ध्यानात आलं. आणि ज्याची भीती होती तेच बोंबलत एक घोडेस्वार आला,
“हुज़ूर, गज़ब हो गया, हम लुट गए, बर्बाद हो गए. आप सब वहां २००० मराठाओं के पीछे दौड़े, और यहाँ किलेपर ७००० मराठाओं ने धावा बोल दिया. सब लूट के चले गए हुज़ूर!”?
१ कोटी राज्याभिषेकाचा खर्च ही वसूल, शिवाय २०० उच्चप्रतीचे अरबी घोडे छत्रपतींच्या ताफ्यात भरती.
आणि हे सगळ नाट्य घडलं एकही मावळा न गमावता, कदाचित रक्ताचा एक थेंबही सांडला नसेल.
खानाला दोन गोष्टीचं श्रेय त्यामुळे नक्की जातं. लक्षात आलं का, की हे सगळं नाट्य घडलं कुठे, तर पेडगावला. खानाला वेड बनवलं ते त्या पेडगावात. आणि म्हणूनच पेडगावचे शहाणे किंवा
वेड पांघरून पेडगावला जाणे वरील सत्य हकीकती वरूनच हे वाक् प्रचार आले.
वेद व पुराण काळातील महत्वाच्या स्त्रिया : पतिव्रता सुलोचना
रामायणातील बरेच प्रसंग नैमिषारण्यात घडले आहेत. नैमिषारण्य सुरम्य कथा या माझ्या पुस्तकासाठी मला बरेच ग्रंथ वाचायला मिळाले. त्यात मला सगळ्यात आवडलेली व्यक्ती म्हणजे मेघनाद ची पतिव्रता पत्नी सुलोचना. ती वासुकी नागाची कन्या व रावणाची स्नुषा होती. मेघनाद चे तिच्यावर अत्यंत प्रेम होते. तो एक पत्नी व्रती होता. मेघनाद महापराक्रमी होता. त्याने दैत्य गुरु शुक्राचार्य यांच्याकडून मायावी विद्या शिकून घेतली होती. त्याने इंद्राशी युद्ध करून इंद्राला जिंकले होते म्हणून त्याचे नाव इंद्रजीत असे पडले होते. राम रावण युद्धा मध्ये फक्त लक्ष्मणच त्याचा वध करू शकत होता. लक्ष्मणाने तशी प्रतिज्ञा केली . त्यावेळी रामाने त्याला सांगितले की तू नक्की त्याचा वध करशील पण त्याचे मस्तक जमिनीवर पडू देऊ नको कारण सुलोचना सारख्या साध्वी च्या पतीचे मस्तक जमिनीवर पडले तर आपल्या संपूर्ण सेनेचा नाश होईल. लक्ष्मणाने ते लक्षात ठेवले व त्याचे शीर उडवले ते हनुमंताच्या हाती पडले. हनुमंताने ते रामाजवळ आणले. त्याच वेळेस मेघनाद चा एक हात उडाला व सुलोचना जवळ ये ऊन पडला. सुलोचना ला खूप दुःख झालं पण तिला त्या हाताला स्पर्श करण्याचे धैर्य होईना कारण कदाचित जर परपुरुषाचा हात असेल तर आपण पापिणी ठरू. सुलोचनाने त्या हाताला विचारलं ” प्राणप्रिय स्वामी हा हात तुमचा असेल तर आणि जर मी खरी पतीव्रता असेन तर तुम्ही या हाताने युद्धाचा सारा वृत्तांत मला लिहून दाखवा.” आणि तिने एक लेखणी त्या हातात दिली. तो हात लिहू लागला” प्रिये सुलोचने, हा माझाच हात आहे. लक्ष्मणा बरोबर माझं तुंबळ युद्ध झालं. लक्ष्मणा सारखा अत्यंत तेजस्वी व दैवी गुणसंपन्न प्रतिस्पर्धी मला मिळाला. त्याने गेली 14 वर्षे पत्नी निद्रा आणि अन्न यांचा त्याग करून फक्त श्रीरामांची सेवा केली आहे. त्यामुळे त्याच्या अंगात अमोघ शक्ती निर्माण झाली त्यापुढे मी हरलो. हा माझा हात आणि माझे मस्तक मात्र प्रभु श्रीरामांच्या जवळ आहे.” सुलोचना ने सती जायचं ठरवलं पण त्यासाठी मांडीवर पतीचे मस्तक हवे होते. तिने रावणाला सांगितले माझ्या पतीचे मस्तक आणा. तेव्हा रावण म्हणाला,
सुलोचना त्यासाठी तुलाच रामा कडे जावे लागेल. तू बिनधास्त जा कारण तिथे बालब्रह्मचारी हनुमान जितेंद्रिय लक्ष्मण आणि एक पत्नी व्रती प्रभू रामचंद्र आहेत. तुला कसलीही भीति नाही. ते तुझा उचित सन्मान करतील. श्वशुरांची आज्ञा शिरसावंद्य मानून ती पतिव्रता रामाकडे गेली. सर्वांना प्रश्न पडला मेघनाद चं मस्तक रामा कडे आहे हे तिला कसं कळलं? ती एवढी ताकदवान असेल तर हे मस्तक सुद्धा हसेल. सुलोचना ला अंतर्ज्ञानाने हे भाव कळले आणि हात जोडून तिने विनंती केली,” पती देवा मी कायावाचामने तुम्हाला परमेश्वर मानत आहे हे तुम्हाला मान्य असेल तर हसून दाखवा”. आणि अहो आश्चर्यम! मेघनाद च्या निर्जीव मस्तकातून हास्याचे फवारे उडू लागले. श्रीरामाने ते मस्तक तिच्या हाती सोपवले. तिने रामाला विनंती केली आज माझ्या पतीचे अंतिम संस्कार आहेत म्हणून आज युद्ध बंद ठेवाल का? रामाने हो सांगितले. जाता जाता ती लक्ष्मणा समोर आली व म्हणाली” माझे पती अजिंक्य होते. पण त्यांची बाजू सत्याची नव्हती. ज्या सीतेचे अपहरण आपल्या पित्यान केलं त्यांच्या बाजून ते लढले. उर्मिला आणि मी दोघी पतिव्रता आहोत. तुम्हा उभयतांची बाजू सत्याने चालणारी आहे. म्हणून तू जिंकलास.”
पतीचं मस्तक घेऊन ती पतिव्रता लंकेला परत गेली आणि समुद्र किनाऱ्यावर चंदनाच्या चितेवर आपल्या पतीचे मस्तक मांडीवर घेऊन सती गेली.
अशी ही महापतिव्रता सुलोचना. तिच्या तेजाला, धैर्याला, आत्मसमर्पणाला कोटी कोटी प्रणाम.
(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा “रात का चौकीदार” महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है एक समसामयिक विषय पर आधारित विचारणीय कविता “बैठे-ठाले – चुनावी चहलकदमी….”।)
(डा. सलमा जमाल जी का ई-अभिव्यक्ति में हार्दिक स्वागत है। रानी दुर्गावती विश्विद्यालय जबलपुर से एम. ए. (हिन्दी, इतिहास, समाज शास्त्र), बी.एड., पी एच डी (मानद), डी लिट (मानद), एल. एल.बी. की शिक्षा प्राप्त । 15 वर्षों का शिक्षण कार्य का अनुभव एवं विगत 22 वर्षों से समाज सेवारत ।आकाशवाणी छतरपुर/जबलपुर एवं दूरदर्शन भोपाल में काव्यांजलि में लगभग प्रतिवर्ष रचनाओं का प्रसारण। कवि सम्मेलनों, साहित्यिक एवं सांस्कृतिक संस्थाओं में सक्रिय भागीदारी । विभिन्न पत्र पत्रिकाओं जिनमें भारत सरकार की पत्रिका “पर्यावरण” दिल्ली प्रमुख हैं में रचनाएँ सतत प्रकाशित।अब तक लगभग 72 राष्ट्रीय एवं 3 अंतर्राष्ट्रीय पुरस्कार/अलंकरण। वर्तमान में अध्यक्ष, अखिल भारतीय हिंदी सेवा समिति, पाँच संस्थाओं की संरक्षिका एवं विभिन्न संस्थाओं में महत्वपूर्ण पदों पर आसीन। )
आपके द्वारा रचित अमृत का सागर (गीता-चिन्तन) और बुन्देली हनुमान चालीसा (आल्हा शैली) हमारी साँझा विरासत के प्रतीक है।
आप प्रत्येक बुधवार को आपका साप्ताहिक स्तम्भ ‘सलमा की कलम से’ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है एक विचारणीय नज़्म “नफ़रत के बीज–”।
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
संजय दृष्टि – लघुकथा- सोंध
इन्सेन्स- परफ्यूमर्स ग्लोबल एक्जीबिशन’.., इत्र बनानेवालों की यह यह दुनिया की सबसे बड़ी प्रदर्शनी थी। लाखों स्क्वेयर फीट के मैदान में हज़ारों दुकानें। हर दुकान में इत्र की सैकड़ों बोतलें। हर बोतल की अलग चमक, हर इत्र की अलग महक। हर तरफ इत्र ही इत्र।
अपेक्षा के अनुसार प्रदर्शनी में भीड़ टूट पड़ी थी। मदहोश थे लोग। निर्णय करना कठिन था कि कौनसे इत्र की महक सबसे अच्छी है।
तभी एकाएक न जाने कहाँ से बादलों का रेला आसमान में आ धमका। गड़गड़ाहट के साथ मोटी-मोटी बूँदें धरती पर गिरने लगीं। धरती और आसमान के मिलन से वातावरण महकने लगा।
दुनिया के सारे इत्रों की महक अब अपना असर खोने लगी थीं। माटी से उठी सोंध सारी सृष्टि पर छा चुकी थी।
☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
(श्री अरुण श्रीवास्तव जी भारतीय स्टेट बैंक से वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी हैं। बैंक की सेवाओं में अक्सर हमें सार्वजनिक एवं कार्यालयीन जीवन में कई लोगों से मिलना जुलना होता है। ऐसे में कोई संवेदनशील साहित्यकार ही उन चरित्रों को लेखनी से साकार कर सकता है। श्री अरुण श्रीवास्तव जी ने संभवतः अपने जीवन में ऐसे कई चरित्रों में से कुछ पात्र अपनी साहित्यिक रचनाओं में चुने होंगे। उन्होंने ऐसे ही कुछ पात्रों के इर्द गिर्द अपनी कथाओं का ताना बाना बुना है। आपने ‘असहमत’ के किस्से तो पढ़े ही हैं। अब उनके एक और पात्र ‘परम संतोषी’ के किस्सों का भी आनंद लीजिये। आप प्रत्येक बुधवार साप्ताहिक स्तम्भ– परम संतोषी के किस्से आत्मसात कर सकेंगे।)
☆ कथा – कहानी # 20 – परम संतोषी भाग – 6 ☆ श्री अरुण श्रीवास्तव ☆
शाखा में निरीक्षण के दौरान बहुत से परिवर्तन आते हैं जिनसे संकेत मिल जाता है कि ब्रांच इज़ अंडर इंस्पेक्शन.
नीली, काली और लाल इंक के साथ नज़र आने लगती है हरियाली याने ग्रीन इंक. ये ग्रीन इंक अनुशासन, टाइमिंग, वेश विन्यास, कर्मठता, शांत वातावरण जो सिर्फ और सिर्फ कस्टमर की आवाजों का व्यवधान पाता है, की द्योतक होती है. आने वाले नियमित और अनुभवी, नटखट या चालाक कस्टमर समझ जाते हैं कि उनके अटके काम, इंस्पेक्शन के दौरान पूरे होने की संभावना बन गई है. हालांकि स्टाफ उनके काम इंस्पेक्शन के बाद करने का आश्वासन देकर और उनकी समझदारी की तारीफ कर उनको विदा करता रहता है.
इंस्पेक्शन के दौरान बुक्स तो बैलेंस हो जाती हैं पर स्टाफ की दिनचर्या अनबेलेंस हो जाती है. घर के लिये जरूरी किराना और सब्जियां लाने का काम, इंस्पेक्शन के बाद करने के आश्वासन के साथ मुल्तवी कर दिया जाता है. अगर शहर से पहचान और दोस्तो का दायरा बड़ा हो या फिर संतानें इतनी बड़ी हों कि सब्जी की खरीददारी कर सकें तो बैंक के लंच बॉक्स में सब्जी नज़र आ जाती है वरना कभी कभी तड़केदार दाल का सामना भी करना पड़ जाता है. इंस्पेक्शन के दौरान चाय कॉफी, उंगलियों के इशारे पर करने की व्यवस्था किया जाना भी स्टाफ के मॉरल को बूस्ट करने के काम आता है.
निरीक्षण में बेलेसिंग और पिछली तारीख की केशबुक के एक एक वाउचर को ग्रीन इंक से टिक करते हुये बेलेंस करना और चेक करने की परंपरा, बैंक मास्टर से पहले अस्तित्व में थी जिसके लिये बैलेसिंग एक्सपर्ट और अतिरिक्त स्टाफ की सहायता और छुट्टी के दिनों का भरपूर उपयोग किया जाता था. आसपास की छोटी व आश्रित शाखाओं के समझदार और दुनियादार शाखा प्रबंधक भी अवकाश के दिनों में या शाखा से लौटने के बाद इस काम में पुण्य अर्जित करने का प्रयास करते थे ताकि वक्त आने पर रिलीफ अरेंजमेंट के लिये वो इस कारसेवा का नकदीकरण कर सकें.
निरीक्षण में ऋण विभाग महत्वपूर्ण होता है. समझदार और कुशल फील्ड ऑफीसर, पद ग्रहण करते ही पिछली इंस्पेक्शन रिपोर्ट पढ़ पढ़कर अपनी डेस्क चमकाना शुरु कर देते हैं. अनुभवी अधिकारी सारे बड़े ऋण खातों की फाइल और दस्तावेज सिलसिलेवार जमा लेते हैं. आवेदन, विश्लेषण और अनुशंसा, स्वीकृति, अनुमोदित कंट्रोल रिटर्न, इंश्योरेंस, वाहनों के प्रकरणों में रजिस्ट्रेशन, केश क्रेडिट खातों में अद्यतन रिव्यू रिन्यूअल, रिवाइवल, हर दस्तावेज अपने निरीक्षण के हिसाब से इस तरह पेश किया जाता है कि निरीक्षण अधिकारी भी खुश होकर कह देते हैं “बहुत अच्छा,कितने इंस्पेक्शन फेस कर चुके हैं. जवाब शब्दों से नहीं बल्कि विनम्रता में पगी हल्की मुस्कान से दिया जाना ही व्यवहारिक होता है. अग्रिम के क्षेत्र में काम करने वाले अधिकारियों का मितभाषी होना हमेशा फायदेमन्द होता है. जो पूछा जाय सिर्फ वही कम से कम शब्दों में प्रगट किया जाये. बड़बोले अक्सर गच्चा खा जाते हैं और चापलूसी हमेशा इंस्पेक्शन अधिकारी को शंकित करती है.
निरीक्षण अधिकारी भी मानवीय आवश्यकताओं और दुर्बलताओं से बंधे होते हैं सुबह नौ बजे से लगातार बैठकर काम करते रहने पर शाम 6 बजे के करीब संतोषी साहब आगे बढ़कर संक्षिप्त सांयकालीन वॉक प्रस्तावित करते थे और सहायक महाप्रबंधक के साथ शहर भ्रमण पर निकल जाते थे. लगभग 30-40 मिनट का यह वॉक, और बैंक के बाहर बह रही शुद्ध शीतल हवा, दिनभर की थकान और बोरियत को उड़न छू कर देती थी. इस दौरान नगर से संबंधित ऐतिहासिक और वर्तमान की जानकारियों पर ही चर्चा की जाती थी. शाखा के संबंध में कोई बात उठने पर संतोषी जी बड़ी चतुराई से विषय परिवर्तन कर देते थे. सहा. महाप्रबंधक महोदय समझते हुये हल्के से मुस्कुरा देते थे. अंत में कुछ दिनों की इस सायंकालीन समीपता के जरिये सहायक महाप्रबंधक महोदय, संतोषी जी के परिवार के बारे में काफी कुछ जान गये. नियमित संतुलित दक्षिण भारतीय भोजन, परिवार की पहचान पहले से दे रहा था और सहायक महाप्रबंधक ने संतोषी जी को आश्वास्त किया कि निरीक्षण समाप्ति के एक दिन पूर्व वे अवश्य ही उनके घर पर उनके परिवार के साथ बैठकर, अपनी पसंदीदा फिल्टर कॉफी का आनंद लेंगे. शाखा का निरीक्षण अपनी सामान्य गति से भी ज्यादा तेज गति से चलता रहा और धीरे धीरे अनुमानित क्लोसिंग डेट भी पास आ गई.
अपने आश्वासन के अनुरूप सहायक महाप्रबंधक महोदय, संतोषी जी के निवास पर पधारे. शाखा के मुख्य प्रबंधक वयस्त थे तो चाहने के बावजूद वे नहीं आ सके. पर सहायक महाप्रबंधक महोदय अकेले नहीं आये थे, वे अपने साथ चांदी के लक्ष्मी गणेश जी भी लेकर आये थे जो संतोषी जी के परिवार को उपहार स्वरूप दिये जाने थे. फिल्टर कॉफी की रिफ्रेशिंग सुगंध के बीच उस मेहमान का बड़े सम्मान और आत्मीयता के साथ स्वागत किया गया, जो अपनी निरीक्षणीय शुष्कता के बीच अपनी मानवीय स्निग्धता को अक्षुण्ण रखने में कामयाब थे. संतोषी जी की बेटियाँ की रौनक से घर प्रकाशित था और यह प्रकाश अलौकिक था. सुस्वादु भोजन से प्रारंभ निकटता, फिल्टर कॉफी की खुशबू के बीच ऐसी आत्मीयता में बदल गई कि सहायक महाप्रबंधक महोदय कब सर से अंकल बन गये, पता ही नहीं चला. इंस्पेक्शन के कारण अपनी संतानों से दूरी, इस परिवार से मिलकर अद्भुत शांति प्रदान कर रही थी. संतोषी जी के परिवार में बह रही स्निग्धता और आपसी स्नेह, संतोषी जी के संतुष्ट होने का स्त्रोत घोषित कर रहा था और सहायक महाप्रबंधक महोदय को भी रेट रेस याने चूहा दौड़ और टंगड़ीमार प्रतियोगिता की निर्थकता का संदेश दे रही थी. बैंक में कई वर्कोहलिक प्राणी पाये जाते हैं जिनकी घड़ी चौबीसों घंटे टिक टिक की जगह काम काम की ध्वनियों गुंजायमान करती रहती है. असंतुलित व्यक्तित्व, असंतुष्ट परिवार और कैरियर की हिमालयीन अपेक्षा, अक्सर अनुपयुक्त लक्ष्यों की जगह मानसिक शांति और प्रसन्नता छीन लेती है और मानव रुपी ये रोबोट, बड़ी आसानी से यूज़ किये जाते हैं. काम करना,दक्षतापूर्वक काम करना बुरा नहीं है पर अगर रेट रेस में जीतने की अतृप्त लालसा परिवार का संतुलन भंग कर रही है तो ऐसे प्राणियों को स्वयं विचार करने की आवश्यकता है. जीवन पर बैंक के साथ साथ परिवार का भी अधिकार और अपेक्षाएं होती हैं और परिवार के मुखिया होने के नाते दायित्व भी, कि परिवार और नियोक्ता के बीच में संतुलन बनाकर रखे.
यह कथा मैं अपने अमरीका प्रवास के दौर में लिख रहा हूँ और यहाँ के वर्क कल्चर में नियोक्ता संस्था द्वारा अपने इंप्लाइज की व्यक्तिगत और पारिवारिक जरूरतों को भी उतनी ही महत्ता दिये जाने की संस्कृति से परिचित हो रहा हूँ. विकासशील भारत और विकसित अमरीका के वर्क कल्चर की यह अनुभवित भिन्नता, बहुत कुछ समझाती है.
परम संतोषी कथा जारी रहेगी भले ही असंतुष्ट जीव इसे पसंद करें या न करें ….