ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २२ मार्च – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  २२ मार्च -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

जयंत बेंद्रे

जयंत बेंद्रे (23 डिसेंबर 1951 -22 मार्च 2015) हे मराठी अभिनेते, नेपथ्यकार, सूत्रसंचालक व लेखक होते.

अहमदनगर येथे त्यांनी एम. ए. पर्यंत शिक्षण घेतले. कॉलेजमध्ये असताना सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर, तसेच किर्लोस्कर ऑइल इंजिन्समध्ये नोकरी करताना मोहन जोशी यांच्याबरोबर कामं करण्याची संधी त्यांना मिळाली.

बेंद्रेनी ‘मोरूची मावशी ‘मध्ये काम केले होते. ते विविध नाट्यसंस्थांशी जोडलेले होते. प्रायोगिक, व्यावसायिक नाटकं, तसेच मराठी चित्रपट व चित्रवाणी मालिकांतून त्यांनी भूमिका केल्या.

‘नटखट नट -खट’ या मोहन जोशींच्या 500 पानी आत्मचरित्राचे शब्दांकन बेंद्रे यांनी केले. वेगळ्या आकृतिबंधामुळे या पुस्तकाचे कौतुक झाले.

याशिवाय त्यांनी सात एकांकिका, इंग्रजी एकांकिका व तीन कथासंग्रह लिहिले.

त्यांच्या ‘अभिनय सम्राट’ या लघुकथेस जी. ए. कुलकर्णी पुरस्कार, ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे ‘ या लघुकथेला ‘कथा दिल्ली’चा राष्ट्रीय पुरस्कार, ‘शेवटी काय वर घेऊन जायचंय?’ या कथेला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट कथा पुरस्कार तर ‘माणसं आणि माणसं’ या कथासंग्रहाला जयवंत दळवी स्मृती पुरस्कार मिळाला.

‘मैत्री’ या संस्थेद्वारे ते सामाजिक क्षेत्रातही कार्यरत होते.

प्रभाकर आत्माराम पाध्ये

प्रभाकर आत्माराम पाध्ये(4 जानेवारी 1909-22 मार्च 1984) यांनी पन्नास वर्षे वृत्तपत्रीय लेखनाबरोबर कथात्म साहित्य, प्रवासवर्णने, व्यक्तिचित्रे, ललित गद्य, समीक्षा व सौंदर्यमीमांसा अशी निर्मिती अखंडपणे केली.

त्यांचा जन्म रत्नागिरीत झाला. शालेय शिक्षण रत्नागिरी, पुणे, मुंबई येथे झाले. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. केलं.

सुरुवातीला ते ‘प्रतिभा’ पाक्षिकात लेखन करत असत. नंतर त्यांनी श्री. रा. टिकेकर यांच्या सहकार्याने ‘आजकालचा महाराष्ट्र -वैचारिक प्रगती’ हा ग्रंथ लिहिला. ग्रंथाच्या अखेरीस 1799 ते 1934 या प्रदीर्घ कालखंडातील प्रमुख घटनांचा कालपट दिला आहे. मराठी ग्रंथांमध्ये कालपट देण्याची सुरुवात या ग्रंथापासून झाली.

नंतर पाध्ये ‘चित्रा’,’धनुर्धारी’मध्ये पत्रकार होते.पुढे ‘नवशक्ती’चे संपादक झाल्यावर त्यांनी त्याचा खप प्रचंड वाढवला.

मार्च 1953मध्ये ‘नवशक्ती’ हे वृत्तपत्र सोडून ते ‘द इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रीडम’ या संस्थेचे चिटणीस झाले. जून 1955मध्ये ‘काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचे आशिया खंडाचे सेक्रेटरी जनरल म्हणून ते दिल्लीला गेले.त्यायोगे एक तप ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक घटना व मोठमोठ्या व्यक्ती यांच्याशी निगडित होते. यामुळे पाध्येंच्या व्यक्तिमत्त्वाला नवेनवे पैलू पडले.

पाध्ये यांनी पाच कथासंग्रह,एक कादंबरिका, पाच प्रवासवर्णनपर पुस्तके, चार व्यक्तिचित्रसंग्रह, स्फूट लेखांचे तीन संग्रह, राजकारणावरील चार पुस्तके, सौंदर्यशास्त्रविषयक तीन पुस्तके व सहा समीक्षा पुस्तके असे त्यांचे अफाट लेखन आहे.

त्यांच्या ‘सौंदर्यानुभव’ला साहित्य अकॅडमीचे पारितोषिक मिळाले.

जयंत बेंद्रे व प्रभाकर आत्माराम पाध्ये यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त सादर अभिवादन. 🙏🏻

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना कऱ्हाड, शताब्दी दैनंदिनी. विकिपीडिया,

प्रभाकर पाध्ये, प्रा. डॉ. विलास खोले, महाराष्ट्र नायक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रीत बरसते… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

प्रीत बरसते… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

शुभ्र चांदणे शुभ्र चमेली

त्यात आपुली दोन मने

 

धुंद होऊनी तुझ्या संगती

जाग जागलो कितेक राती

त्या रातींच्या आठवणीनी

फुलतील आणिक नवस्वप्ने

त्यात आपुली दोन मने

 

         कर देता तू माझ्या हाती

         स्वर्ग उतरला धरणीवरती

         त्या स्वर्गाच्या बागेमधूनी

         गात फिरूया प्रीत कवने

         त्यात आपुली दोन मने

 

अशीच राहो शांत निशा ही

समीप आणिक माझ्या तू ही

सुख स्वप्नांच्या नंदनवनी या

प्रीत बरसते,नव्हे चांदणे

त्यात आपुली दोन मने

 

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 130 ☆ फाळणी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 130 ?

☆ फाळणी ☆

फक्त देहाची नको रे मागणी

भावनांची त्यात व्हावी पेरणी

 

लावणी ही सांगते आध्यात्म पण

का तरी बदनाम केली लावणी ?

 

अब्रु नाही राखता आली तिला

फास झाली तीच माझी ओढणी

 

प्राण तू मातीत आहे ओतला

का तरीही मोडतातच खेळणी ?

 

पाठिवर नागीन काळी डोलते

अन् फण्यावरती सुगंधी चांदणी

 

ना सुखाने नांदता आले तुम्हा

व्यर्थ केली का उगाचच फाळणी

 

जीवनाचे सार झालेले सपक

त्यास दे तू छान आता फोडणी

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बार्बरीक – (महाभारतातील अनभिज्ञ योद्धा) ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

?विविधा ?

 ☆ बार्बरीक – (महाभारतातील अनभिज्ञ योद्धा) ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

रामायण महाभारत ही अजरामर महाकाव्ये! आजही महाभारताचा विचार केला तर, गीतेचा उपदेश… श्रीकृष्णाचे चरित्र… कौरवांची कारस्थानं… पांडवांनी दिलेले प्रत्युत्तर… द्रौपदीचं वस्त्रहरण… ते हाणून पाडणारा श्रीकृष्ण …भीष्माची प्रतिज्ञा… अठरा दिवस चाललेले महायुद्ध ….या आणि अशा कितीतरी गोष्टी डोळ्यासमोर येतात. त्यामुळे त्या सर्वांचा समावेश असलेलं महाभारत हा अभ्यासाचा विषय आहे असं वाटू लागतं.

महाभारत ही अतिशय चित्रविचित्र गोष्टींनी भरलेली कुरु वंशाची कहाणी आहे. त्यात त्याग आहे ….प्रेम आहे…. सुड आहे… भांडण आहे… भाऊबंदकी आहे… धर्म आहे… आणि अधर्म ही आहे.

या कहाणीत अनेक कथानके, उपकथानके…. बहुसंख्य लोक कथा जोडल्या गेल्याआहेत. कर्णाची दुर्योधनाशी असलेली अभंग मैत्री, कर्णाचं दानशूर असणं, अर्जुनाचं शौर्य, भीमाचा पराक्रम, हे सगळं जगासमोर आलेलं आहे. पण त्याच बरोबर काही लोक पराक्रमी असून ही कधीच लोकांना माहित झालेले नाहीत .अशाच एका अनभिज्ञ पराक्रमी वीर योध्याचं नाव आहे बार्बरीक ….घटोत्कच पुत्र.. बार्बरीक… आणि त्याची ज्ञात असलेली ही कथा!

बार्बरीकानं श्री कृष्णाच्या सल्ल्यानुसार महीसागर संगमावरील गुप्त देवी चण्डिकेला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तप केले होते व तेथे तंत्र मार्गाने साधना करणाऱ्या विजय नावाच्या मुनींना गुरु मानून त्याने त्यांनाही सहाय्य केले होते.महाजिव्हा  राक्षसी ,रेपलेंद्र ,पलाशी इत्यादी राक्षसांचा जे त्यांच्या साधनेत विघ्न आणत होते त्यांचा त्याने बिमोड केला होता. त्याचा सेवाभाव पराक्रमआणि भक्ती मुळे प्रसन्न होऊनचंडीकादेवीने त्याला वरदान म्हणून तीन अमोघ बाण दिले होते.त्यातला पहिला बाण सोडून ज्याचा वेध घ्यायचा ते कितीही मोठे सैन्यबळ असले तरी त्याने लक्ष्य साधता यायचे. दुसऱ्या बाणाने ते बांधले जायचे.व तिसऱ्या बाणाने ते पूर्णपणे नष्ट व्हायचे.शिवाय या बाणांचा पुनःप्रयोगही करता यायचा.

बार्बरीक हा अर्जुनाच्या तोडीचा धनुर्विद्यापटू होता. त्याला जेव्हा महाभारताच्या युद्धाची वार्ता कळली तेव्हा युद्धभूमीवर मधेच असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली उभा राहून बार्बरीकानं घोषणा केली की जो पक्ष हरणार असेल मी त्याच्या बाजूने लढणार .

त्याच्या वीरतेची परीक्षा घेण्यासाठी कृष्णाने त्याला सांगितले की केवळ तीन बाण मारून या पिंपळाची सगळी पाने तोडून दाखव. बार्बरीकाने आपल्या बाणांचा प्रयोग सुरू केला. पहिल्या बाणाने लक्षवेध केला.दुसरा बाण सर्व पानांना बांधू लागला आणि तिसरा बाण पिंपळाचे एकन्एक पान चिरत चालला होता. त्याच वेळी एक पान कृष्णाच्या पायापाशी पडले. ते कृष्णाने हळूच पायाखाली घेतले.

बार्बरीकाच्या तिसऱ्या बाणाने  साऱ्या पानांना कापून टाकले व शेवटचे पान जे कृष्णाच्या पायाखाली होते तेथे येऊन तो थांबला.

बार्बरीक म्हणाला,”प्रभू, तुमचा पाय बाजूला घ्या. मी बाणाला पिंपळाची सर्व पाने कापायची आज्ञा दिली आहे, तुमचा पाय नाही .”

कृष्ण थक्क झाला. पण त्याला आपले वचन आठवले- ‘यतो धर्मस्ततो जयः ‘कौरवांनी आपल्या वागण्यातून, व्यवहारातून अनेक वेळा दाखवून दिले होते की ते कपटी आणि अधर्मी वृत्तीचे द्योतक आहेत… आणि या युद्धात पांडवांचा… पर्यायाने…. धर्माचा जय होणे अत्यावश्यक आहे.

पण बार्बरीक  जर हारणाऱ्या कौरवांच्या बाजूने लढला तर ही गोष्ट शक्य होणार नाही. हे लक्षात येताच कृष्णाने आपली कूटनीती  वापरली.

तो दुसर्‍या दिवशी सकाळी ब्राह्मणाचा वेष धारण करून बार्बरीकाच्या शिबिरात गेला. बार्बरीकानं विचारलं,” हे ब्राह्मणदेवा तुम्हाला काय हवे आहे?” ब्राह्मणाच्या रुपातील कृष्ण म्हणाला,” मला हवं आहे ते तू देऊ शकणार नाहीस.” त्याच्या जाळ्यात बार्बरीक बरोबर अडकला. कृष्णाने त्याच्याकडे त्याचे मस्तक मागितले आणि आपल्या वडिलांच्या- घटोत्कचाच्या- बाजूने यशश्री मिळावी म्हणून बार्बरीकाने आपले मस्तक कृष्णाला अर्पण केले.

त्याच्या या बलिदानाने कृष्ण पण हेलावून गेला आणि त्याने त्याला वरदान दिले की यानंतर कलियुगात त्याच्याबरोबर बार्बरीकाची पूजा केली जाईल .

ज्या ठिकाणी कृष्णाने बार्बरीकाचे मस्तक ठेवले त्या जागेचे नाव ‘खाटू’ असे असून राजस्थानमधले हे मुख्य मंदिर आहे ….आणि तेथे बार्बरीकाची पूजा होते. खाटू श्याम… असं त्या देवाचं नाव आहे.  राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश अशा विविध प्रांतात तो पूजला जातो.

नेपाळमध्ये किरात राज, यालांबर अथवा आकाश भैरव म्हणून याची आराधना केली जाते.

अशी ही बार्बरीकाची कथा! कदाचित ही लोककथा पणअसेल पण खाटू श्याम या नावाने तो जनमानसातअमर झालेला आहे. आणि पूजला ही जात आहे.

*  समाप्त *

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ☆ हार्मोनिअमचे सूर – भाग 3 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ हार्मोनिअमचे  सूर  – भाग 3 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

मुलगा कामावर निघाला की सुनबाईच्या हातावर काही पैसे ठेवतो आणि मी ही तयार होऊन गळयात पेटी घालून आमच्या जवळच्या झोपडपट्टीत जातो. तिकडच्या काही मुलांना मी हार्मोनिअम वाजवायला शिकवतो. त्यांच्या बरोबरच माझ्या पैशाने त्यांना जेवायला घालतो आणि ट्रेनचा प्रवास करून ठाण्याला येतो. पाच तास येथे हार्मोनिअम वाजवतो. इथे जे पैसे मिळतात, त्यातले काही सुनेला घरासाठी देतो आणि काही माझ्या शिष्यांसाठी ठेवतो. यात माझी हार्मोनिअम वाजवण्याची खाज ही भागते.     

नालासोपाऱ्यावरून ठाण्याला येण्याचे कारण म्हणजे मला कोणी ओळखीचं भेटू नये. तसे मी जे काही करतोय त्याची मला लाज वाटत नाही पण माझ्या मुलाला जर हे कळले तर त्याला खूप वाईट वाटेल. कोणी ओळखीचे भेटू नये यासाठीच मी कायम डोक्यावर कॅप आणि गॉगल घालून एवढ्या लांबचा प्रवास करून येतो. “

आजोबांनी सांगितलेला त्यांचा जीवनप्रवास विलक्षण वाटला.

आयुष्यात आलेल्या अडचणींवर त्यांनी त्यांना योग्य वाटेल असा मार्ग शोधला होता. त्यांच्या झोपडपट्टीतल्या मुलांसाठी आपलाही काही हातभार लावावा म्हणून मी खूप विचार करून माझ्या सेवानिवृत्तीची भेट आलेली ती नवीन हार्मोनिअम दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे घेऊन गेलो. त्यांना ती माझ्याकडून भेट दिली आणि त्यांच्या चांगल्या कार्याला हातभार लावला. त्यांना तुमची जुनी हार्मोनिअम तुम्ही झोपडपट्टीत कायमची ठेवा आणि ही नवीन हार्मोनिअम तुम्ही कायम वापरत जा असे सांगितले. त्यांनी त्या नवीन हार्मोनिअमवर बोटे चालविली  आणि खरंच जादुई सूर त्यामधून बाहेर पडले. आजोबांनी माझा हात हातात घेऊन मला धन्यवाद दिले. त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी माझ्या हृदयापर्यंत पोचली होती. ती हार्मोनिअम चांगल्या कामाकरिता वापरली जाणार ह्याचे मला समाधान मिळाले.

दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या ऑफिसमधल्या त्या रुपेश काळेचा फोन आला. ” सर, आम्ही तुम्हाला त्या दिवशी दिलेली हार्मोनिअम चोरीला गेली आहे ना ? सर त्या चोराने तुमची हार्मोनिअम माझ्या अंध वडिलांना विकली आहे. त्यांनी एका अज्ञात माणसाकडून ती विकत घेतली आहे. मी ती उद्या तुम्हाला परत घेऊन येतो. “. मी त्याला कसेबसे समजावून सांगितले की, ” अरे माझ्याकडे माझी एक हार्मोनिअम आहे आणि त्या नवीन चांगल्या हार्मोनियमवर देवानेच तुझ्या वडिलांचे नाव लिहिले असेल म्हणून ती चोरावाटे त्यांच्याकडे पोचली असेल. कृपया करून ती परत आणू नकोस. ती त्यांच्याकडेच असू दे. तुझे वडील डोळ्याने अंध असले तरी त्यांच्यासारखी दृष्टी तुला मला डोळे असूनही नाही. ते महान आहेत. फक्त त्यांना कधीही सांगू नकोस त्या हार्मोनिअमच्या मालकाला तू ओळखत आहेस. ते जर त्यांना कळले तर एक महान कार्य चालू आहे त्याच्यात खंड पडेल. हो आणि एक,  रुपेश, तू कायम तुझे नाव लिहिताना रुपेश शांताराम काळे असे संपूर्ण नाव लिहीत जा. त्या शांताराम नावाशिवाय तुझ्या नावाला पूर्णत्व येणार नाही. “

रुपेशला माझ्या शेवटच्या वाक्याचा अर्थ नाही कळला पण मी त्याच्या वडिलांची प्रशंसा करत आहे हे मात्र कळले.

समाप्त

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रश्न ?? # 3 ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रश्न ?? # 3 ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

  1. नाती का जपायची ?

रेशमाच्या धाग्याचा गुंता सोडवून पहा एकदा…

 

  1. आठवणींची एक गंमत आहे.

त्याच्यात गुंतून राहिलात तर नवीन निर्माण नाही होत !!

 

  1. माणूस देवाला म्हणाला “माझा तुझ्यावर विश्वासच नाही.”

देव म्हणाला “वा !!  श्रद्धेच्या खूप जवळ पोहोचला आहेस तू. प्रयत्न सुरु ठेव.”

 

  1. गवई एकदा तानपुऱ्याला म्हणाला,”तू नसलास तर कसं होईल माझं?”

तानपुरा म्हणाला ,”अरे वेड्या ! माझी गरज लागू नये हेच तर ध्येय आहे.”

 

  1. विठुमाऊली एकदा एकादशीला दमून खाली बसली. मी विचारलं,”काय झालं ?”

विठुराय म्हणाले, “पुंडलिकाचा गजर करतात लेकाचे पण मायपित्यांना एकटं सोडून अजून माझ्याच पायाशी येऊन झोंबतात वेडे कुठले. !”

 

  1. एकटं वाटलं म्हणून समुद्रावर गेलो एकदा. त्याला विचारलं “कसा एकटा राहतोस वर्षानुवर्ष ?”

तो म्हणाला “एकटा कुठला, मीच माझ्यात रमावं म्हणून ईश्वराने लाटा दिल्या आहेत ना मला.”

मी विचारलं “माझं काय?”

तो हसून म्हणाला

 “नामस्मरण आणि माझ्या लाटांमध्ये काहीच साम्य दिसत नाही का तुला?”

 

संग्राहिका : सुश्री मंजिरी गोरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आयुष्याला द्यावे उत्तर….गुरू ठाकूर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ आयुष्याला द्यावे उत्तर….गुरू ठाकूर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

संध्याकाळी सहजच चॅनल सर्फिंग करत होतो. डिस्कव्हरी चॅनलवर जीवघेण्या अपघातातून वाचलेल्या नंतर आलेल्या अपंगत्वावर जिद्दीने मात करून पुन्हा यशाचे शिखर गाठणाऱ्या काही मंडळींवर ती डॉक्युमेंटरी होती… त्यात काही पाय गमावलेले, हात गमावलेले किंवा अन्य एखादा अवयव गामावलेले, तरीही कृत्रिम अवयव लावून पुन्हा तीच कला सादर करणारेही होते. मग त्यात काही नर्तक होते, चित्रकार होते, मॅरेथॉन धावणारे होते, ते सारं पाहून थक्क झालो आणि त्याचबरोबर माझ्यातला कवी गलबलला … आणि त्या क्षणी एक कविता कागदावर उतरली. ते शब्द होते ….

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर

नजर रोखूनी नजरेमध्ये

आयुष्याला द्यावे उत्तर …

त्या साऱ्या मंडळींची जिद्द, त्यांचा तो बाणा पाहून ते शब्द आले होते. ती संपूर्ण डॉक्युमेंटरी पाहून होईपर्यंत कविताही पूर्ण झाली होती.

नेमका दोन चार दिवसांनी मला ‘ इंद्रधनू पुरस्कार ‘ जाहीर झाला. ठाण्यातल्या एका मोठ्या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक शं. ना. नवरे यांच्या हस्ते तो पुरस्कार मला देण्यात आला. त्या पुरस्काराला उत्तर देताना मी नुकतीच लिहिलेली ती कविता सादर केली. लोकांची छान दाद मिळली. कार्यक्रम संपताच शं. ना. नवरे मंचावर आले आणि मला म्हणाले, ‘ एक गोष्ट मागितली तर मिळेल का ?’ मी म्हटलं, ‘ बोला काय आज्ञा आहे ?’ तर म्हणाले, ‘ आत्ता जी कविता ऐकवलीत, तीच हवी आहे. काय शब्द लिहीले आहेत हो ! अप्रतिम ! जीवनावर याहून उत्तम भाष्य मी याआधी कधीच ऐकलं नव्हतं.’ माझ्याकरता ही मोठी दाद होती. मग लगेच एका कागदावर उतरवून ती त्यांच्या हवाली केली आणि म्हटलं, ‘ आज पहिल्यांदाच सादर केली ही कविता …’ ते म्हणाले, ‘ का ? अहो, ही कविता तुम्ही सादर करणं गरजेचं आहे. हे शब्द जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. तेव्हा ही सादर करत चला यापुढे..’

माझ्या आजवरच्या लोकप्रिय गाण्यांच्या जन्मकथा उलगडणाऱ्या माझ्या ‘ कसे गीत झाले ‘ या कार्यक्रमातही ती कविता मी आवर्जून सादर करतो आणि रसिकही या कवितेला भरभरून दाद देतात.

परवाच्या कार्यक्रमात मात्र निवेदिका गायिका योगिता चितळे हिने ठरल्याप्रमाणे त्या कवितेच्या संदर्भातला प्रश्न मला विचारला. कविता सुरू करणार तोच मी गोंधळलो. ‘ नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर ‘ कसं म्हणू ? कारण कार्यक्रम अंधशाळेत होता. माझ्या प्रत्येक शब्दाला दाद देणारे ते रसिक दृष्टीहीन होते. त्यांच्या भावना दुखावल्या तर ?

मी भलतीच कविता म्हटली. योगिताचा गोंधळ उडाला होता. मी ती कविता विसरतोय, असं वाटून ती दर दोन गाण्यांनंतर त्या कवितेचा विषय काढत होती. अन मी भलतीच कविता म्हणून वेळ मारून नेत होतो. अखेर संधी पाहून मी हळूच तिच्या कानात माझा मुद्दा सांगितला. तिलाही तो पटला. हुशारीने सावरून घेत ती म्हणाली, ‘ आता वळूया कार्यक्रमाच्या शेवटच्या गीताकडे !’ इतक्यात एक अंध विद्यार्थिनी उठली आणि तिने फर्माईश केली, ‘ गुरू ठाकुरांना विनंती आहे की, त्यांनी त्यांची ‘ नजर रोखूनी नजरेमध्ये ‘ ही आयुष्यावरची कविता सादर करावी. मला फक्त दोनच ओळी पाठ आहेत. खूप प्रोत्साहन देतात. मला पूर्ण कविता ऐकायची आहे.’ माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. क्षणाचाही अवलंब न करता मी सुरुवात केली …

पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना

हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना

संकटासही ठणकावूनी सांगावे ये आता बेहत्तर

नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर ………!!

असे जगावे

 

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर

नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

 

नको गुलामी नक्षत्रांची भिती आंधळी ता-यांची

आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची

असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर

नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

 

पाय असावे जमीनीवरती कवेत अंबर घेताना

हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना

संकटासही ठणकावुनी सांगावे ये आता बेहत्तर

नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

 

करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना

गहिवर यावा जगास सा-या निरोप शेवट घेताना

स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर

नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

 – श्री गुरू ठाकूर

संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ प्रिय सावित्रीबाई… ☆ श्री गजानन घोंगडे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ प्रिय सावित्रीबाई… ☆ श्री गजानन घोंगडे ☆

प्रिय सावित्रीबाई

नमस्कार ! सकाळीच रेडिओवर ऐकलं

की आज तुझी पुण्यतिथी

बायकोला सांगितलं,

अगं, आज सावित्रीबाईंची पुण्यतिथी.

मग स्वतःलाच विचारलं

सावित्रीबाईंची पुण्यतिथी ?

कसं शक्य आहे ?

अगं, माझ्या गावातली, शहरातली,

देशातली प्रत्येक मुलगी

जेव्हा शिक्षण घेऊन

एखाद्या मोठ्या पदावर जाते,

शिक्षणाच्या भरोशावर एखादा

सन्मान प्राप्त करते

तेव्हा – तेव्हा तूच तर

जन्माला आलेली असतेस

यंदा माझी पुतणी पदवी घेईल

म्हणजे यंदा तू माझ्या घरातही

जन्माला येणार आहेस

सुरुवातीला प्रश्न पडला

तुला काय म्हणावं ?

बाई म्हणावं की आई म्हणावं ?

आमच्याकडे गावात

मोठ्या बहिणीला बाई म्हणतात

मग विचार केला

माझी आई शिकलेली,

थोरली बहीण शिकलेली,

मावशी शिकलेली,

माझी पुतणी शिकतेय

म्हणजे तू तर प्रत्येकच रूपात

माझ्याभोवती आहेस,

सरकारचं घोषवाक्य आहे

‘मुलगी शिकली, प्रगती झाली !

मला वाटतं त्यात आणखी एक जोडावं ‘सावित्रीबाई जन्माला आली’.

आजही वाटतं तुला

भारतरत्न मिळायला हवं होतं

मग लक्षात येतं की

या देशातले अनेक भारतरत्न जे आहेत

ते तुझ्या शिक्षण यज्ञामुळे झालेले आहेत

जेव्हा कुठल्या महिलेला

भारतरत्न मिळत असेल तेव्हा तू

ज्योतिबांना सांगत असशील

‘अहो ऐकलं का आपल्या लेकीला

भारतरत्न मिळालं’

तुझ्या बद्दलचा मुळातच असलेला आदर

सहस्त्र पटींनी वाढतो तो तुझ्या स्वभावामुळे

दगड, शेण, असभ्य शब्दांचा मार

सहन करीत तू तुझं काम करीत राहिली

म्हणजे आतून तू किती कणखर

असली पाहिजेस

ते जिब्राल्टर रॉक म्हणतात तशी.

तसूभरही ढळली नाही

आणि दुसरीकडे अत्यंत नम्र आणि प्रेमळ

कधी – कधी वाटतं टाईम मशिनने

काळाच्या मागे जावं,

लहान बनून तुमच्या घरात यावं

ज्योतीबांच्या कोटाच्या खिशातल्या गोळ्या त्यांच्याच मांडीवर बसून खाव्या

तुझ्याकडून लाड पुरवून घ्यावेत.

मला एक प्रश्न नेहमी पडतो

आपण करतो आहोत

ते काम क्रांतिकारी आहे याची तुला

जराशीही कल्पना नव्हती का ?

कारण नखभर ही अटीट्युड नव्हता तुझ्यामध्ये

नखभर सोडा, अणू – रेणू इतका

सूक्ष्म पण नाही

हे कसं साध्य करायचीस ?

नाहीतर आम्ही बघ

हीतभर करतो आणि हात भर

त्याचा हो हल्ला, कल्ला करत

ती दुखणी सांगत

ते यश सांगत गावभर हिंडतो

कदाचित म्हणूनच

तू त्यावेळच्या स्त्रियांना

शिक्षित करण्यासाठी म्हणून

जी अक्षरं पाटीवर गिरवलीत

ती काळाच्या पाठीवर गिरवला गेलीत

आणि या भारतात

जेव्हा – जेव्हा कोणी मुलगी, स्त्री

शिक्षित होत राहील

तेव्हा- तेव्हा ती अक्षरं गडद होत राहतील

पुन्हा – पुन्हा सावित्री जन्माला येत राहील.

 

–  श्री गजानन घोंगडे

9823087650

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 80 – दोहे ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपके अप्रतिम कालजयी दोहे।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 80 –  दोहे ✍

मन में उपजी कामना, कह सकते आसक्ति।

बिना किसी भी रूप के, क्या रह सकता व्यक्ति।।

 

मेरे मन की विकलता, माप सकेगा कौन?

अपनी गति, मति देखकर, रह जाते सब मौन।।

 

जिसको चाहो टूटकर, वही करे संदेह।

मन की कीमत कुछ नहीं, बहुत कीमती देह।।

 

प्रिया शरीरी तुम नहीं, रूप शिखा द्मुतिमान ।

रोम रोम में बस गए, अर्पित जीवन प्राण।।

 

बैरी हैं सब रूप के, चाह रहे अधिकार।

डाले बंसी प्रेम की, तकते रहे शिकार।।

 

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – विश्व कविता दिवस विशेष – ‘शिलालेख’ ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि – विश्व कविता दिवस विशेष – शिलालेख  ??

आज विश्व कविता दिवस है। यह बात अलग है कि स्वतः संभूत का कोई समय ही निश्चित नहीं होता तो दिन कैसे होगा? तथापि तथ्य है कि आज यूनेस्को द्वारा मान्य विश्व कविता दिवस है।

बीते कल गौरैया दिवस था, आते कल जल दिवस होगा। लुप्त होते आकाशी और घटते जीवनदानी के बीच टिकी कविता की सनातन बानी! जीवन का सत्य है कि पंछी कितना ही ऊँचा उड़ ले, पानी पीने के लिए उसे धरती पर उतरना ही पड़ता है। आदमी तकनीक, विज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजेंस के क्षेत्र में कितना ही आगे चला जाए, मनुष्यता बचाये रखने के लिए उसे लौटना पड़ता है बार-बार कविता की शरण में।

इसी संदर्भ में कविता की शाश्वत यात्रा का एक चित्र अपनी कविता ‘शिलालेख’ के माध्यम से प्रस्तुत है।

कविता नहीं मांगती समय,

न शिल्प विशेष,

न ही कोई साँचा,

जिसमें ढालकर

36-24-36

या ज़ीरो फिगर गढ़ी जा सके,

कविता मांग नहीं रखती

लम्बे चौड़े वक्तव्य

या भारी-भरकम थीसिस की,

कविता तो दौड़ी चली आती है,

नन्ही परी-सी रुनझुन करती,

आँखों में आविष्कारी कुतूहल,

चेहरे पर अबोध सर्वज्ञता के भाव,

एक हाथ में ज़रा-सी मिट्टी

और दूसरे में कल्पवृक्ष के बीज लिये,

कविता के ये क्षण

धुंधला जाएँ तो

विस्मृति हो जाते हैं,

मानसपटल पर उकेर लिये जाएँ तो

शिलालेख कहलाते हैं..!

 

 (कविता संग्रह ‘योंही’ से।)

कविता बनी रहेगी, मनुष्यता बची रहेगी।

 

©  संजय भारद्वाज

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆  ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares