मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “काशा…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ काशा… ☆ प्रा. भरत खैरकर 

“मॅडम बाई नमस्कार.. ओळीखलसं कां मला? मी.. मी काशा.. ” एका भिकारीवजा तरुणाचा आवाज माझ्या कानावर पडला. ऑफिस सुटल्यामुळे मी घाईघाईने शंकरनगरच्या सिटी बस स्टॉप वर जात होते. मला बर्डी बस पकडायची होती. सोबत माझ्या ऑफिस मधल्या माझ्या मैत्रिणी होत्या. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आपली ‘पोझिशन’ मला राखायची होती. पण तो गडी पडल्यागत “मॅडम, मी काशा.. मला ओळखलं नाहीस.. मॅडम बाई म्या भेटलो नव्हतो कां तुम्हास्नी.. तुम्हीच नाही कां मला खाऊ पिऊ घातलं होतं.. उपदेश नव्हता कां दिला.. अरे, भिक मागू नकोस नव्हतं कां म्हटलं मला तुम्ही.. ऐकून तर घ्या मॅडम बाई, मी काय म्हणतो ते!!” मी सारखी त्याच्याकडे दुर्लक्ष करून जसं आपण त्याला ओळखतच नाही उगीचच गळी पडू इच्छितो.. असा भाव दाखवत मैत्रिणी सोबत चाललेली होती. सोबत त्याची तीच कॅसेटही चाललेली होती.. पण नाही.. बस स्टॉप वर पोहोचताच बस आली. मी भरकन

बस मध्ये बसले. तो खिडकीतून मला शोधीतच होता आणि सारखा ” मॅडम बाई.. मॅडम बाई ऐकून तर घ्या. ” असा ध्वनी मला माझा चिरत चालला होता.. बसच्या वेगासोबत… !

सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी बी. ए. फायनल ला होते. माझ्या अभ्यासिकेतून दूरवरची घरं.. आला गेला.. येणारे जाणारे दिसायचे. अभ्यासाचा कंटाळा आला तर मी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांची धावपळ बघायची.. किती वेळ मी असं बघत बसलेली असायची माझं मलाच कळायचं नाही..

अशीच एक दिवस अभ्यासिकेतून बाहेर डोकावले तर समोरच्या घरी “देवो मा भिकाऱ्याला एखादी भाकरं. ” असं म्हणून आपली ताटली सरकावून समोरच्या घराच्या दारा खेळत असलेलं एक भिकाऱ्याचा पोर मला दिसलं.. मी अभ्यास सोडून सारखी त्याच्या हालचालीकडे लक्ष देत होती. ” देवो मा भिका-याले.. ” त्याची लाचारयुक्त हाक पुन्हा पुन्हा ऐकायला येत होती.. नखान दारावरच्या पेन्टशी तो खेळत होता.. हे सगळं नकळत घडत होतं.. मी “शुक.. शुक.. इकडे ये.. ” करून त्याला हाक दिली. ही मुलगी आपल्याला कां बोलवेल ? असं समजून की काय त्यांना माझ्याकडे लक्ष देऊन.. पुन्हा ” देवो माय भिकाऱ्याला.. ” ची कॅसेट वाजवली. मी पुन्हा “शुक.. शुक.. अरे, तूच.. तूच.. तू इकडे ये.. ” म्हणून त्याच्याकडे पाहून हात हलविला. तो येऊन अभ्यासिकेच्या दारात उभा राहिला. मी त्याला आत बोलावलं. नुकताच वहिनींनी माझ्यासाठी आणून ठेवलेला नाश्ता टेबलवर तसंच होता.. मी ती प्लेट त्याच्याकडे देत माझ्यासाठी दुसरी प्लेट वहिनी कडून मागितली.. त्यानं ती घेतली आणि मी इशारा केलेल्या बाजूच्या खुर्चीत तो बसला.. त्यानं पायजामा फाडून तयार केलेली भीक मागायची मळकट झोळी खाली

ठेवली. त्यातलं पीठ जमिनीवर आपण आत असल्याची जणू आठवण त्याला देत होतं.. जमिनीवरच्या पिठानं पिशवीच्या आजूबाजूला पांढरं कुंपण तयार केलं होतं!

त्यानं “ताईसाहेब, तुम्ही घ्या की.. असं म्हणत प्लेट माझ्याकडं सरकवली.. तितक्यात माझी प्लेट सुद्धा वहिनीने आणली. आम्ही दोघेही नाश्ता करायला बसलो.. मी उत्सुकता म्हणून त्याला बोलत केलं कदाचित माझा उद्देशही तोच होता.

“नाव काय रे तुझं?”

“काशा”

” आई वडील काय करतात तुझे?”

” ते नाहीत. “

” कां रे काय झालं?”

” मेलीत दोगं बी”

“कशी रे? “माझा प्रश्न.

“ताईसाहेब, माझा ‘बा ‘सुदीक असाच भीक मागून पीठ आणायचा.. ते पीठ किराणा दुकानात नेऊन विकायचा.. मिळालेल्या पैशात दारू ढोसायचा.. उरलेला पैका मायला देऊन घर चालवायला सांगायचा.. “

” मग रे? ” माझी तंद्री लागली प्लेटमध्ये चमचा तसाच पडून राहिला.

“असाच एक दिवस बा घरी आला.. खूप खूप खोकलला.. एकाएकी आमची सगळ्यांची घाबरगुंडी उडाली.. पण काही उपाव नव्हता. बा चा ठसा नड्डयात अडकला.. अन् मेला तो.. असाच उभ्या उभ्या ! काही दिसानं लोक म्हणायचे डोमा भिकाऱ्याले टीबी. झालती म्हणून.. लोकांचं ते म्हणणं समजत नवतं मले.. “

“मग रे?”

” मग काय ? माझ्या माय वर आली जबाबदारी सगळी.. तिनं जमा केलेल्या पैशातून एक म्हैस विकत घेतली. माझी मोठी ताई लग्नाला आलेली.. ती दिसायला एकदम तुमच्यासारखीच सुंदर.. ताई, घरची गरीब परिस्थिती इकडे झाकलं तर तिकडे उघड पडायची.. मायच्या जीवाले तिची काळजी लागली होती एक दिवस म्हशीले पाणी पाजायला ताई शिवारातल्या आडावर गेली.. माय चारा कापत होती धुर्‍यावर.. पाणी काढता काढता ताईचा पाय घसरला.. ती पडली अडात.. बादलीसकट.. “धप्पक्कन “झालेल्या मोठ्या आवाजाने माय धावत आली.. तर पोरगी विहिरीत पडली.. तिला कां करावं काही सुचत नव्हतं.. तिनं आंगचं लुगडं सोडलं.. पाण्यात टाकलं.. आडात.. “पकड… पकड.. “म्हणून ती ताईला सांगू लागली. तीनही ते लुगडं धरलं.. आई खंगलेली ताकद नसलेली.. कशी काय वडणार ताईला वर.. !! उलट ताई चांगली अठरा-एकोणीस वर्षाची तुमच्या एवढीच.. तिचं वजन हे जरा जास्तच.. आईच ओडल्या गेली आत मध्ये.. आडात..

अर्ध्या तासाने कोणीतरी गडी माणूस बैलांना पाजायला म्हणून आडावर आला.. त्यांना पाहिलं आडात पडलेल्या माझ्या मायला.. बहिणीला.. त्यानं उडी टाकून ताईला वर काढली.. तिच्यात जीव होता.. आई आतच मेली होती.. तिलाही त्यानं बाहेर काढलं.. मग गावात निरोप धाडला.. मी माझ्या लहान भावासकट धावत गेलो.. तर अडावर माय मरून पडली होती.. त्या इसमाने तिचं शरीर आपल्या टाॅवेलनं झाकलेलं.. ताई ही वलीचीप झाली होती.. फुगलेली होती.. तिची छाती अजूनही खालीवर होत होती.. तेवढीच फक्त जिवंत असल्याची खूण! मला वाटत होतं एखाद्यानं ताईला खांद्यावर घेऊन गरगर फिरवावं अन काढावं सार पाणी नाकातोंडातून बाहेर.. पण मी लहान हाय.. माझं कोण ऐकल.. म्हणून मी चूप राहिलो.. पाच-सहा तासातच ताई सुद्धा आईबाच्या रस्त्याला गेली.. मेली..

झालं संपलं सारं.. काही उपाव राहिला नाही जगण्याचा आम्हां भावंडापुढं.. म्हणून आली ही ताटली आमच्या हातात.. ” असं म्हणत त्यानं नास्त्याची प्लेट दाखविली. तो सांगताना इतका रमला होता की आपण नाश्ता करीत आहोत.. हेही तो विसरला होता.. आणि ती प्लेट त्याला आपली ताटलीच वाटली होती.. माझा घास तोंडातल्या तोंडात फिरला.. काय हे अपार दुःख !!काय ही दैना भगवंता!! ह्या विचाराने मी चरकले. तू एखादी नोकरी कां करत नाहीस ? मी त्याला पुन्हा बोलतं केलं.

“कोण देतो ताईसाहेब नोकरी.. साऱ्यांना वाटतें मी लहान आहे.. काय करल हे इतकसं हुतकाड.. म्हणून कोणी बी कामाला घेत नाही.. दुसरी गोष्ट कमी मोबदल्यात जास्त काम करून घ्यायची सवय आहे आपल्या इथल्या लोकायले.. म्हणून कोणीच ठेवले पाहत नाही मायासारख्याले.. उपदेश मात्र सारेच देते..

मी समाजाचं खरं चित्र दाखविणाऱ्या त्या पोराकडे अवाक् होऊन पाहतच राहिली.

“मग कसं भागतं रे तुम्हां दोघांचं?” “कां भागणार नाही.. म्या उन्हाळ्यामंदी शहरात जातो भावाला घेऊन.. तिथे एसटी स्टँड.. रेल्वे स्टेशनमंदी कधी कधी १०० रुपये येते.. कधी कधी २०० रुपये.. कधीकधी तर ३०० रूपये बी.. भिक म्हणून मिळतात.. चांगल भागतं आम्हां दोघांचंबी त्याच्यात.. “त्याचं उत्तर आणि इन्कम ऐकून मी चाटच पडली.

“बरं ताई साहेब, निघालं पाहिजे मला! आता बाया वावरात जायच्या आधी चार-पाच घर मागून घेतो.. मंग झालं आजच्या पुरतं काम. ” असं म्हणून त्यानं खाली प्लेट माझ्याकडे देत, आपल्या पिशव्या घेतल्या अन निघालाही.. मी पाहतच राहिले.. तो दिसेनासा झाला तरी त्याची कहाणी आठवतच राहिले..

तोच ‘काशा’ आज मला भेटला होता.. एकेकाळी समाजसेवेच्या उद्देशाने भारावलेली मी. माझ्या पोझिशनला.. प्रेस्टीजला.. धक्का लागेल म्हणून.. त्याला ओळखत असूनसुद्धा ओळख दाखवली नव्हती.. माझ्यातल्या ह्या परिवर्तनाचा आणि काशात अजून न झालेल्या बदलाचा विचार करत मी घरी केव्हा येऊन पोहोचले, माझं मलाच कळलं नाही..

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मराठी गझल गायकीचा यथोचित सन्मान !!!! ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? मनमंजुषेतून ?

मराठी गझल गायकीचा यथोचित सन्मान !!!! ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

“गझलनवाज पंडित भीमरावजी पांचाळे यांना महाराष्ट्र शासनाचा गानसाम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर… “ 

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने दिला जाणारा अतिशय प्रतिष्ठेचा असा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५’ ज्येष्ठ गझल गायक गझल नवाज पंडित भीमराव पांचाळे उर्फ दादा यांना जाहीर झाला आहे. यानिमित्ताने दादांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा… ! 

तसेच मा. महेश मांजरेकर, अनुपम खेर, मुक्ता बर्वे आणि काजोल या मान्यवरांचेही विविध पुरस्काराबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा… !

गझल नवाज पंडित भीमराव पांचाळे यांनी गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ मराठी गझल गायकी रुजवण्याचा प्रयत्न अखंडपणे केला व आजही तो सुरू आहे. केवळ गझल गायकीच नव्हे तर मराठी हात मराठी गझलेकडे वळविण्याचे मोठेच काम दादांनी केले आहे आणि आजही ते करीत आहेत.

गझल सागर प्रतिष्ठान याची स्थापना करून, त्या अंतर्गत अखिल भारतीय मराठी गझल संमेलने भीमरावदादानी सर्वप्रथम सुरू केली. नुकतेच १० वे अखील भारतीय गझल संमेलन अकोला येथे मोठ्या दिमाखात पार पडले. एखाद्या काव्यप्रकाराचे स्वतंत्र दोन-तीन दिवसीय संमेलन हा एक अनोखा प्रयोग आहे.

गझल सागर प्रतिष्ठानच्या वतीने त्यांनी घेतलेली गझल संमेलने, गझल लेखन कार्यशाळा, पुस्तक प्रकाशने आणि इतर सर्वच काम फार महत्त्वाचे आणि मोलाचे आहे. मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक आणि सर्वेसर्वा गझलसम्राट सुरेश भट यांनी रुजवलेल्या मराठी गझल लेखनाचा सर्वांगीण विस्तार करण्यामध्ये गझल नवाज पंडित भीमराव पांचाळे यांचे योगदान अतिशय भरीव स्वरूपाचे आहे. ते गेल्या ३५ ते ४० वर्षांहून अधिक काळ माझे व्यक्तिगत जवळचे स्नेही आणि मोठ्या बंधूसम आहेत. हा माझ्या आनंदाचा व अभिमानाचा विषय आहे. शिवाय ते माझे भारतीय स्टेट बँकेचे सहकारी ही एक वेगळी ओळख आहे.

त्यांच्या उपक्रमात सहभागी होण्यात मला नेहमीच आनंद वाटत आलेला आहे. मी गझल सागर प्रतिष्ठानच्या अनेक गझल संमेलनात सहभागी झाले आहे. त्यातला एक प्रसंग सांगते. वाई येथे ” कृष्णा काठावर गणेश घाट आहे. ” अशा ठिकाणी ५वे अखिल भारतीय गझल संमेलन होते. नागपूरहून तिथे जाणं तसं मला कठीणच होतं. बँकेच्या नोकरीत सुट्टीचा प्रश्न होता. तरीही शुक्रवारी रातोरात प्रवास करून मी वाईला सकाळी १० ला पोचले. गेल्यागेल्याच दादांना भेटले. दादांनी मला सांगितलं की, एका ‘मुशायऱ्याचं ‘ आणि गझल मैफिलीचं सूत्रसंचालन मला करायचंय. माझ्यावर एवढा विश्वास दादांनी टाकला होता. मात्र प्रसंग बाका होता.

मुशायरा तर सहज केला मी. रात्रीच्या जेवणानंतर गझलेची मैफिल सुरू झाली. समोर श्रोत्यांमध्ये दस्तुरखुद्द राजदत्त साहेब बसलेले. श्रीगणेशाचं नाव घेऊन मी सूत्रसंचालनाला सुरुवात केली. हातातल्या कागदावर फक्त गायकांची नावे / आणि कुणाची गझल गाणार तेवढे नाव होते.. मला नोट्स काढायलाही वेळ मिळाला नाही. बाहेर कार्तिक पौर्णिमेचं चांदणं पसरलं होतं. पुढे सर्व दिग्गज बसलेले. खच्चून गर्दी झालेली. कदाचित माझ्यातही मंच संचारलं असावं. संगीताचा कान आणि गझलेची जाण यामुळे मी त्यावेळी निभावून गेले. अर्थातच मैफिल सर्वोत्तम झाली… आणि अनपेक्षित पणे राजदत्त साहेबांच्या हस्ते माझा विशेष सत्कार करण्यात आला. हे केवळ दादांचा माझ्यावरचा विश्वास यामुळे घडले. असे क्षण विसरता येत नाहीत. दादांनी असंच आजवर अनेक लोकांना घडवलंय !!!

दुसरा प्रसंग ! लोकव्रत पुणे प्रकाशनाने माझा “सावली अंबराची” हा गझलसंग्रह प्रकाशित केला. त्याचे प्रकाशन व्हायचे होते. मा. शिरीष कुलकर्णी सरांशी माझे बोलणे झाले ! चर्चा झाली की, प्रकाशन कुणाच्या हस्ते व्हावे ? मी म्हटलं “माझ्या गझल संग्रहाचे प्रकाशन करण्यासाठी दादांना विचारूया का? ” शिरीष सर म्हणाले, “पंडीतजी? ते येतील? ते खूप मोठे आहेत. व्यस्त असतात ते.” पण माझी खात्री होती. दादा हो म्हणतील याची. तसंच झालंही. दादांनी सहज होकार दिला प्रभाशनासाठी. भीमराव दादांच्या हस्ते माझ्या “सावली अंबराची” या गझलांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. शिवाय दादांनी त्याच पुस्तकातली एक गझलही म्हटली. अशा गोड आठवणी फक्त जपायच्या असतात. विशेष म्हणजे माझ्या “सावली अंबराची ” आणि “माझा विचार आहे ” या दोन्ही गझलसंग्रहांची पाठराखण – ब्लर्ब त्यांनीच केली आहे.

दादांनी गझल गायकीसाठी ऐन भरात असलेली भारतीय स्टेट बँकेची नोकरी सोडली. गझल गायकी त्यांना खुणावत होती. नोकरीमुळे “गाणं आणि नोकरी ” ही तारेवरची कसरत होती. कोणाला न्याय द्यायचा ? काय निवडायचं ? त्यांनी गझल गायन निवडलं ! कारण त्यांचा स्वतःवर विश्वास होता. विशेष म्हणजे गीता वहिनी तुमचंही हार्दिक अभिनंदन. कारण तुम्ही दादांची सहधर्मचारिणी. खूप छान सांभाळलंत सगळं ! दादांची लेक डॉ. भाग्यश्री ! आज वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून, नवनवी आव्हाने स्वीकारत नव्या पिढीची दमदार मराठी गझल गायिका आहे. तुझंही अभिनंदन बाळा !

मराठी गझल कशी गावी याचं जिवंत उदाहरण म्हणजे पंडीतजी. तीन तासांची बैठक / मैफल कशी संपते हे रसिकांना कळतच नाही. गझल ही शब्दप्रधान गायकी आहे. सुरांसोबत शब्दही तेवढेच महत्वाचे असतात. म्हणून गझलगायन वाटतं तेवढं सोपं नसतं. ते आव्हान दादांनी स्विकारलं. आज नव्या जुन्या अनेक गझलकारांचा गझल ते गातात. दादांनी गझल गायली की तो / ती गझलकारही प्रकाशात येतात.

गझले बरोबरच ख्याल, ठुमरी, भक्तिसंगीत, नाट्यसंगीत, भावगीत अशा सर्व शास्त्रीय-उपशास्त्रीय व सुगम संगीतामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक कुठलीही बंधने कलेच्या आड येत नाहीत हेच खरे. मात्र त्यासाठी योगदानही तेवढेच असावे लागते. वेळ येताच शासन, समाज यांना त्याची दखल घ्यावीच लागते. त्यांचं गायन केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारताच्या सीमा ओलांडून विदेशात गौरवलं गेलं आहे. अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी दादांना गौरवून स्वतः गौरवीत झाले आहेत.

हाही पुरस्कार त्याचं एक दृश्य रूप आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळालेला असताना ” मराठी गझल गायकीचा होणारा सन्मान म्हणजे ” दुधात साखरच नव्हे तर केशर वेलची सुद्धा आहे.

रुपये १० लाख रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मानपत्र व शाल श्रीफळ असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराचे वितरण २५ एप्रिल २०२५ रोजी एन. एस. सी. आय. डोम, मुंबई येथे एका भव्य समारंभात होणार आहे.

मराठी गझल गायकी सातासमुद्रापार पोचवणाऱ्या दादांना मानाचा मुजरा!!

दादांनी अजून खूप खूप गावं, अनेक सन्मान त्यांना मिळावेत हीच शुभेच्छा !!! दादा तुम्हाला लवकरच ” पद्मपुरस्कारानेही सन्मानीत केलं जाईल हा विश्वास आहे. ! त्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!

© प्रा.सुनंदा पाटील (गझलनंदा)

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२४ – तुळस नसलेली तुळशीबाग… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२४ – तुळस नसलेली तुळशीबाग… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

तुळस नसलेली तुळशीबाग… 

अक्कानी म्हणजे माझ्या आत्त्याने तुळशीबागेत रात्रीच्या आरतीला जाण्याचा नेम कधी चुकवला नाही. अधून मधून ती आम्हांलाही घेऊन जायची. सुरुवातीला वाटायचं एवढं काय आहे त्या तुळशीबागेत? पण नंतर लक्षात आलं, काय मिळत नाही ते विचारा तुळशीबागेत?. अहो पूर्वी म्हणे इथे खूप तुळशी होत्या. म्हणून तर नांव पडलं तुळशीबाग. पण गंमत म्हणजे आता तिथे नावालाही तुळशीचं रोपटं सुद्धा नाही. एकदा संध्याकाळी आम्ही तिथे पोहोचलो, आत्या म्हणाली, “मला माझा राम भेटलाय, तुम्हाला जायचं असेल तर जा भटकायला. आम्हाला काय तेच पाहिजे होतं, आम्हीं पूर्ण देऊळ परिसर पालथा घातला. अगदी अलीबाबाच्या गुहेत गेल्यासारखं वाटलं. कानातलं गळ्यातलं, नाकातलं बांगड्यांच्या मोहात आम्ही पडलो. गंमत म्हणून सांगते तुम्हाला, प्रेमाच्या राज्यातून बाहेर पडून लग्न झालेली जोडपी पण तिथे ‘हाजीर ‘होती. त्यातल्या काही नवऱ्याचं लग्ना आधी बायकोला गुलाबाचे फुल, गजरा, गुच्छ, सेंट, अत्तर बाटल्या देऊन झाल्या होत्या. पण हाय रे देवा! ते रोमँटिक क्षण मागे पडले. आणि ते मागे सारून नवरे आता पूर्णपणे संसाराच्या बेडीत अडकले होते. आणि केविलवाण्या चेहऱ्यांनी, ताट वाट्या तवा पोळपाट हा संसारातील पसारा घेण्यासाठी बायकोच्या मागे मागे अगदी धरून पकडून आणल्यासारखे चालले होते. आम्हाला तर बाई हंसूच झालं त्यांच्याकडे बघून. तुझ्यासाठी आकाशातील तारे तोडून आणीन असं म्हणणारे ते ‘हिरो’ उलथन, झारे, चिमटे असं काही बाही विकत घेत होते. कारण तुळशीबागेत मिळणाऱ्या चमचे, चहा गाळणी, कुंचे, पातेली, सतेली घेऊन त्यांना संसार चालवायचा होता आणि बायकोला खुश करायचं होतं. जुन्या पिढीचं लक्ष होतं रामाकडे, तर तरुणाईंचे डोळे हार, कानांतले, नाकांतले, गोंडे, रिबिनी इत्यादी नकली साज शृंगार वस्तूंकडे वळत होते. मारुतीच्या पायरीवर आत्याने आम्हाला जबरदस्तीने बसवलं आणि म्हणाली, ” पुरे झाले हं, आता भटकणं! मी सांगते ते ऐका! तुम्हालाही माहीत असायला पाहिजे. ” आम्हा भाचरांना खाली बसवत ती म्हणाली, ” ही जागा खाजगी वाल्यांची होती. मंदिराची बांधणी मजबूत असून शिखर 140 फूट उंच व कळसच मुळी चार फुटाचा आहे. श्रीराम लक्ष्मण सीतामाईच्या मूर्ती इतक्या देखण्या आहेत की डोळ्याचं पारणं फिटतं, उमाजी बाबा पंढरपूरकरांनी ह्या शुभ, सुंदर, रेखीव मूर्ती मजुरांकडून चाळीस रुपये म्हणजे त्या काळातली मोठी बिदागी देऊन तयार करून घेतल्या होत्या. आपले पूर्वज व्यवहार दक्ष होते नियमित आणि अचूक हिशोब नोंदणी असायची त्यांची. त्यांच्या नोंदणी वहीत ही नोंदआढळली. आमच्या मनात खूप खूप शंका होत्या मी विचारलं, “आत्या पुण्यात खूप रामाची देवळे आहेत का ग? आणि कुठे आहेत?कुणी आणि कधी बांधली गं ? आमच्या बाल सुलभ उत्सुकतेला आत्त्याने हंसून दाद दिली. राम म्हणजे तिचा अत्यंत प्राणप्रिय, आवडीचा विषय श्रोत्यांकडून दाद मिळाल्यावर ती सरसाऊन म्हणाली, “हो तर! ऐका हं!पुण्यात अनेक राम मंदिरे आहेत रास्ता पेठेतला रास्त्यांचा राम, सदाशिव पेठेतला गाय आळीचा राम, रहाळकरांचा राम, फुटक्या बुरुजाकडे जाताना जोशीराम. तर आपल्या आप्पा बळवन्त चौकाकडून केसरी वाड्यावरून लकडी पुलाकडे जातांना लागतो तो भाजीराम. 1762 मध्ये ते मंदिर बांधलं गेलं. “आत्याला मध्येच थांबवत आम्ही ओरडलो, “नक्कीच तिथे भाजीवाले बसत असतील म्हणून तो भाजीराम झाला असेल, बरोबर नागं आत्या? खळखळून हंसत आत्या म्हणाली, “अगदीबरोब्बर. शंभरापैकी शंभर मार्क तुम्हाला. पण अगं तुम्हीं मघाशी चोरखण आळी म्हणालात ना?ते मात्र चूक आहे हं! चोर नाही चोळखण आळीतला वैद्य राम तर टिळक स्मारक, मंदिरात पण बाबा महाराजांचे राम मंदिर आहे. लक्ष्मी रोडवरचं लिखिते मंदिर आणि शिवाजीनगरच्या रोकडोबा समोरचं राम मंदिर पण प्रसिद्ध होत. आत्याला थांबवत आमचे मोठे शिकलेले चुलत बंधुराज म्हणाले, “आत्या तू तर सगळ्या पुण्यातल्या राम मंदिरातून आम्हाला फिरवून आणलंस, हो नागं? आत्या म्हणाली, “मग आता दमलांत की काय? ऐकून दमलात आता चालून दमा. उठा बरं! रामाला प्रदक्षिणा घालायचीय बर का!मगाशी तुळशी बागेला काही बाही खरेदी करायला दुकानं धुंडाळत बाहेरून फेरा मारलात ना! पण आतल्या श्रीरामाला प्रदक्षिणा घालायला विसरलात. उठा बरं लवकर!आणि पळा आता. मला जप करायचाय जपमाळेकडे जाणारे तिचे हात पकडून आम्ही म्हणालो, “अगं आत्तू माळेशिवाय शंभर वेळा जप मगाशीच झालाय तुझा. “तो कसा काय? ह्या तिच्या प्रश्नाला बगल देऊन आम्ही ओरडलो, “आत्तापर्यंत हे राम मंदिर ते राम मंदिर अशी खूप साऱ्या राम मंदिराची ओळख करून देतांना तुझ्या तोंडून हजार वेळा रामाचं नाव निघालं. मग आता कसला वेगळा जप करतेस?” आत्याने पाठीवरून हात फिरवून किताब “दिला, हुशार आहात. ” पण काही म्हण हं आत्या! तुझ्याकडून खूप छान आणि नवीन माहिती आम्हाला मिळाली. आता रामायणातल्या रामाची छानशी गोष्ट सांग ना घरी जाताना. आणि बरं का मंडळी, गोष्टी वेल्हाळ आत्याची रामकथा ऐकता ऐकता आम्ही जोगेश्वरी जवळच्या आमच्या घरी केव्हां पोहोचलो हे आम्हा मुलांना कळलंच नाही..

– क्रमशः भाग २४  

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १/१  ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १/१  ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

आधी याविषयी काही..….

महर्षी नारद… यांना देवर्षी नारद असेही संबोधले जाते. उत्तम भक्त, तसेच ऋषी वाल्मिकी, महर्षी व्यास, भक्त प्रल्हाद आदि महान ऋषींचे, भक्तांचे गुरू असलेले नारद आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत. त्यांचा विशेष गुणांमुळे ते कळीचे नारद म्हणूनही प्रसिद्ध आहेत. आपण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांची #कळ# ही कळकळींची (जनहितार्थ) होती असे आपल्या लक्षात येईल. त्यांचा #कळी# मुळे कोणाचाही बळी न जाता सर्वसामान्य मनुष्याला जगण्याचे बळ मिळत असे….. !

त्यांनी भक्तीमार्गाचे अनुसरण करून भगवंताची प्राप्ती करून घेतली आणि अनेकांना भक्तिमार्गात आणले. “आपल्यासारखे करिती तात्काळ” असे संतांचे वर्णन केले जाते. नारदांसाठी हे वर्णन तंतोतंत लागू होते. पण त्यांची भक्ती सूत्रे सोडली तर महर्षी नारदांचे अन्य साहित्य उपलब्ध असल्याचे माझ्या माहितीत तरी नाही. त्यामुळे “ नारद भक्तिसूत्रे “ हीच त्यांची खरी ओळख आहे असे म्हणावेसे वाटते.

संत एकनाथ महाराज देवर्षी नारदांचा गौरव पुढील प्रमाणे करतात.

“धन्य धन्य तो नारदु, । ज्यासी सर्वा सर्वत्र गोविंदु ।

सर्वथा हरिनामाचा छंदु । तेणें परमानंदू सदोदित ॥

जो श्रीकृष्णाचा आवडता । ज्यासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा ।

ज्याचेनि संगे तत्त्वतां | नित्यमुक्ततां जडजीवा ॥

 – (संदर्भ: एकनाथी भागवत २-३७, ३८)

भक्ति हे एक शास्त्र आहे असे म्हटले जाते. शास्त्र म्हटले की त्याचे नियम असणे स्वाभाविकच आहे. महर्षी नारद आपल्याला या ८४ श्लोकांमध्ये भक्तीचे समर्पक दर्शन घडवतात… या लेखमालेच्या माध्यमातून आपण त्यातील काही प्रमुख सूत्रं पाहणार आहोत. भक्तीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला भक्त, भगवंत आणि भगवंताला प्राप्त करून घेण्याचे साधन समजून घ्यायचे आहे. त्याआधी नारदमुनीचे संक्षिप्त चरित्र आपण पाहू.

भागवत प्रथम स्कंध अध्याय पाचमध्ये स्वतः नारदांनी आपले चरित्र व्यासांना सांगितले आहे. नारद म्हणतात, “ हे महामुने ! मी पूर्वकाली एक दासीपुत्र होतो. एक वेळी वर्षाऋतूत चातुर्मासाच्या निमित्ताने आमच्या गावी बरेच योगी संतमहात्मे आले. त्यावेळी मी लहान बालक होतो. माझ्या मातेने मला त्या महापुरुषांच्या सेवेकडे सोपवून दिले. मी जरी लहान होतो तरी मी जितेंद्रिय होतो. त्या महात्म्यांपुढे मी मुळीच खोडकरपणा करीत नव्हतो. शांतीने, संयमाने मी त्यांच्याजवळ बसून राही व ते सांगतील ते काम करीत असे. यामुळे ते समदृष्टी होते तरी माझेवर विशेष प्रसन्न राहात होते, व कृपा करीत होते. त्या मुनींच्या आज्ञेने मी त्यांच्या पात्रातील उच्छिष्ट खात असे. त्या प्रभावाने माझे सर्व किल्मिष दूर झाले. असे करीत असता काही काळाने माझे चित्त शुद्ध झाले. ज्यामुळे त्यांनी कथन केलेल्या भागवत धर्मात मला गोडी निर्माण झाली. ते लोक नित्य श्रीकृष्णकथा गात होते व मी त्या संतांच्या अनुग्रहाने त्या मनोहर कथांचे श्रद्धेने श्रवण करीत होतो. यामुळे भगवंताचे ठिकाणी माझी बुद्धी जडली. “

सांगणारा कोण आहे यावर त्या सांगण्याचे मूल्य ठरत असते. इथे भक्तिशास्त्र सांगणारे देवर्षी नारद आहेत, त्यामुळे आपण अतिशय गांभीर्याने आणि पूर्ण श्रद्धेने या सूत्रांकडे पाहाल असा मला विश्वास आहे.

सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयाचें। परंतु येथें भगवंताचें। अधिष्ठान पाहिजे।।

– समर्थ रामदास (दासबोध 20. 04. 26)

*****

सूत्र क्रमांक ०१ / १ 

अथातो भक्तिं व्याख्यास्यामः

अर्थ : अथ (आता) अत: (यापुढे) भक्ति (भक्तीचे) व्याख्यास्यामः (आम्ही व्याख्या करीत आहोत)

विवरण 

आपण भक्ति सूत्रे अभ्यासणार आहोत, अर्थात भक्ति शास्त्राचा अभ्यास करणार आहोत. शास्त्राचा अभ्यास करताना काही गृहितके पाळणे गरजेचे ठरते, त्यामुळे विषय समजायला मदत होऊ शकते.

१. मी आहे.

२. जगत् आहे

३. ईश्वर आहे

४. माझा व जगाचा संबंध आहे.

५. ईश्वराचा जगाशी संबंध आहे.

६. ईश्वराचा माझ्याशीही संबंध आहे.

७. ईश्वर सर्व शक्तिमान आहे, तर मी अल्पशक्ती आहे.

८. ईश्वर ज्ञानी आहे तर मी अज्ञानी आहे.

९. ईश्वर सर्वशक्तिमान आहे तर मी अल्पकर्ता आहे.

१०. ईश्वराचा असलेला संबंध माझ्या बाजूने जिवंत ठेवण्यासाठी ईश्वराची इच्छा तीच माझी इच्छा झाली पाहिजे.

अथ म्हणजे आता… !

#आता# या शब्दात आधी काही तरी घडले आहे, काहीतरी कृती केली आहे असे भासते. आता या शब्दाचे अर्थ आपण अनेक प्रकारे लावू शकतो. “मागण्याचा अधिकार प्राप्त झाल्यावर”, “आता तू इतके कर* या अर्थाने, असे अनेक अर्थ काढता येतील, फक्त ते समष्टीच्या अर्थाने घ्यायला हवेत. पुढे अत: हा शब्द आहे. त्याचा अर्थ या पुढे असा आहे.

श्रीसमर्थांनी दासबोधात या नऊ भक्तींचे अत्यंत मार्मिकपणे वर्णन केलेले आढळते. भक्तिमार्गातील या नऊ वाटा आहेत असे म्हणता येईल. श्रीक्षेत्र पंढरपूर येथील कोणतीही वाट शेवटी चंद्रभागेला जाऊन मिळते. तसे या मार्गांपैकी कोणत्याही वाटेने गेले तरी भगवंतांच्या चरणाशी पोहोचणार यात बिल्कुल संदेह नसावा.

भक्तीचे नऊ प्रकार सांगण्यात आले आहेत. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. भक्तीच्या या प्रत्येक प्रकारामध्ये श्रेष्ठ भक्तही होऊन गेले आहेत. श्रवण-परीक्षित, कीर्तन-शुकाचार्य, स्मरण-प्रल्हाद, पादसेवन-लक्ष्मी, अर्चन-पृथू राजा, वंदन-अक्रूर, दास्य-हनुमान, सख्य-अर्जुन, आत्मनिवेदन-बली असे ते श्रेष्ठ भक्त होऊन गेले. या नऊ प्रकारांना नवविधा भक्ती म्हणतात. पहिले तीन प्रकार परमेश्वराच्या ठिकाणी श्रद्धा उत्पन्न करण्यास सहाय्यक ठरतात. पुढचे तीन हे भगवंताच्या सगुण रुपांशी संबंधित आहेत आणि शेवटचे तीन हे आंतरिक भाव आहेत. पहिल्या तिन्हीत नामाला विशेष महत्त्व आहे. भगवंताच्या यश, गुण, महात्म्य इत्यादी गोष्टी सश्रद्ध मनाने ऐकणे ही श्रवणभक्ती होय. श्रवणानंतर स्मरण आणि कीर्तन संभवते. कीर्तनात नृत्य, गीत व वाद्य या तिहींचाही समावेश होतो. संगीताच्या साथीवर होणाऱ्या कीर्तनात जे वातावरण निर्माण होते, त्यात भावविवशता आणि आनंदमयता आपोआप प्राप्त होते. बरेचसे भक्ती साहित्य गेय पदांच्या रुपानेच निर्माण झाले आहे. यात मग्न राहणे म्हणजेच स्मरणभक्ती होय. पादसेवन भक्ती ही मूर्तिपूजा, गुरुपूजा, भगवत् भक्तांची पूजा यास्वरुपात होऊ शकते. श्रद्धा आणि आदर यांनी युक्त अशी पूजा करणे याला अर्चनभक्ती म्हणतात. भक्तांचा असा विश्वास आहे की, मूर्ती, सद्गुरू आणि भक्त यांच्या ठिकाणी भगवान वास करतो. भगवंताच्या पुढे नतमस्तक होऊन त्याच्या अनंत महिम्याचे अंतरात ध्यान करीत, त्याची स्तुती करणे याला वंदनभक्ती म्हणतात. श्रीहरी हाच माझा मायबाप आहे, प्रभू सर्वकाही आहे आणि मी त्याचा सेवक आहे, अशा भावनेने भक्ती करणे हिला दास्यभक्ती म्हणतात. परमात्मा हा माझा मित्र आहे, साथी आहे, बंधू आहे, अशा भावनेने भक्ती करणे, याला सख्यभक्ती म्हणतात. आत्मनिवेदन ही भक्तीची सर्वोच्च पायरी आहे. यामध्ये सर्वस्वी शरण जाणे होय. आपला सर्व भार प्रभूवर टाकणे, याला आत्मनिवेदन असे म्हणतात. आत्मनिवेदन भक्ताला अशा अवस्थेत घेऊन जाते, की तेथून त्याला सर्व विश्व ईश्वरमय दिसू लागते.

ईश्वराच्या ठिकाणी पराकाष्टेचा अनुराग म्हणजे भक्ती अशी भक्तीची सुलभ व्याख्या करता येईल.

भगवंताच्या ठिकाणी अत्यंत अनुरक्ती ठेवणे आणि त्या अवस्थेत आनंदानुभव घेणे, ही भक्तीची साध्यविषयक बाजू आहे. भक्ती केल्याने मनुष्याचे मन आनंदी राहते, शांत राहते आणि असे अनेक लौकिक आणि अलौकिक लाभ होत असतात. सात्विक, राजस आणि तामस असे भक्तीचे तीन भेदही सांगण्यात आले आहेत. ‘सगुण भक्ती’ आणि ‘निर्गुण भक्ती’ असेही भक्तीचे मार्ग आहेत.

सध्या समाज खूप बदलला आहे. प्रत्येक गोष्टीचा वेग वाढला आहे. समाजात असुरक्षितता वाढली आहे. प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आहे. प्रत्येकाला कमी श्रमात मोठे यश मिळवावेसे वाटतं आहे. महागाई वाढत आहे. पैसा हेच सर्वस्व असल्याचे वाटू लागले आहे. भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनू पाहत आहे. अशा परिस्थितीत माणसाचा स्वत:च्या कर्तृत्वावरचा विश्वास कमी होऊ लागला आहे. शरीरसुखाच्या भौतिक साधनांत वाढ होत आहे. नवनवीन संशोधनामुळे निर्माण होणाऱ्या औषधांमुळे आयुर्मयादा वाढली आहे. असे असले तरी या विज्ञानयुगातही बरीच माणसे भगवंतांकडे /भक्तिमार्गाकडे झुकू लागली आहेत, स्वतःला समजेल तशी ईश्वरभक्ती करू लागली आहेत हे एक चांगले लक्षण आहे. परंतु मनुष्य करीत असलेली भक्ति ही शुद्ध असावी, यासाठी भक्तीमार्गांचा वस्तुनिष्ठ अभ्यास असणे अत्यावश्यक आहे. ‘भक्ती’ म्हणजे नेमके काय ? 

भक्तीची एक व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल….

‘दुसऱ्यावर अकारण, निरपेक्ष प्रेम करणे म्हणजे भक्ति.’

संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगात म्हणतात,

“तुका म्हणे धन्य संसार ती आलीं । हरीरंगीं रंगलीं सर्वभावें सर्वभावें ॥५॥”

(सार्थ तुकाराम गाथा अभंग क्रमांक १७५३, धार्मिक प्रकाशन संस्था)

मनात, अर्थात मनाच्या प्रत्येक भावात जर भगवंत सामावला गेला तर भगवंत दूर नाही असे सर्व संत तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत.

भक्ति सूत्रे अभ्यासण्यासाठी काहीतरी पात्रता असणे गरजेचे ठरते. (अर्थात कोणतेही शास्त्र/शस्त्र शिकण्यासाठी किमान अर्हता अपेक्षित असतेच)

इथे तर भक्ति शास्त्र शिकून मनुष्याला, साधकाला भगवतांची प्राप्ति करून घ्यायची आहे. त्यामुळे साधकाने साधन, आपण त्यास उपासना म्हणू शकतो, त्यासाठी काही नियम पाळले पाहिजेत. त्यास साधन चातुष्ट्य असे म्हटले जाते. त्याचा विचार आपण पुढील लेखात करू.

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः सूत्र १ / १ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नोंदी…” भाग – १ – लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई ☆ प्रस्तुती – सौ. प्रतिभा कुळकर्णी ☆

सौ. प्रतिभा कुळकर्णी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “नोंदी…” भाग – १ – लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई ☆ प्रस्तुती – सौ. प्रतिभा कुळकर्णी 

(हा रिव्ह्यू नाही)

वीस एक वर्ष झाली असतील.

तेव्हा माझी मैत्रीण एका एनजीओ साठी काम करत होती. प्रोजेक्टच्या अनुषंगाने रिमांड होम मधील मुलांना समुपदेशन हा तिच्या कामाचा भाग होता. माझ्या घराच्या जवळ ही शाळा असल्याने आठवड्यातून एक दिवस मुलांना गणित शिकवायला येशील का असे तिने विचारले. यातली तीन मुले अतिशय हुशार होती आणि स्कॉलरशिप परीक्षेला त्यांना बसवायचे ठरवले होते.

अर्थात हा सुद्धा एक प्रयोग होता. आठवड्यातून एकदाच असल्याने मी हो म्हटले.

मुलांशी बोलणे हा माझ्या कामाचा विषय नव्हता. त्यांना गणितातील काही विषय शिकवणे आणि पेपर सोडवून घेणे इथपर्यंत माझी सीमा होती.

इथल्या मुलांवर चोरीपासून खुनापर्यंत आरोप होते. बहुतेक मुलं अतिशय निम्नस्तरीय वर्गातून आलेली असल्याने घरातून प्रेम, संरक्षण हा मुद्दा गृहीत धरण्यासारखा नव्हता. अनेकजण त्यामुळे निर्ढावलेले असतात.

यातल्या एका मुलाने आपल्या वडिलांचे लिंग कापले होते. त्यांच्या रखेलीला (मला याच शब्दात त्याचा अपराध सांगितला होता) भाजून मारायचा प्रयत्न केला होता. आईला सतत मारहाण बघून आधीच डोके सरकलेले आणि त्यात एक दिवशी वडील या बाईला घरीच घेऊन आले म्हंटल्यावर त्याचा संयम संपला.

तेरा/ चौदा वर्षाचा होता तो. बऱ्यापैकी शार्प होता. समज होती आणि शिकण्याची आवड होती.

“त्याने जे काही केलेआणि का केले ते पाहता त्या बाबतीत वाईट वाटणे स्वाभाविक आहे पण ते तुझ्या वागण्यातून दिसता कामा नये. दोन गोष्टी आहेत. एक त्याचा चुकीचा भूतकाळ आणि एक त्याचा बरोबर होऊ शकेल असा भविष्यकाळ.

त्याने का केलं हे कितीही दुःखदायक असेल तरी ते चुकीचेच आहे आणि सहानुभूतीने तू त्याला वागवायला जाशील तर आपण केलं ते बरोबरच असे त्याच्या मनात राहील. हे नको व्हायला. आपण केलं ते चूक हे त्याला पटलच पाहिजे तर तो यातून काहीतरी शिकेल. महत्त्वाचे आहे ते मनावर संयम ठेवून, आपला भविष्यकाळ घडवणे. दुसऱ्यांना शिक्षा देणे, हा जगण्याचा हेतू नसावा. ”

ह्या सूचना मिळाल्याने असेल, आमचे संबंध शिक्षक आणि विद्यार्थी एवढेच मर्यादित असूनही, त्या मर्यादेत चांगले राहिले. त्याला स्कॉलरशिप मिळाली नाही पण बाहत्तर टक्के मिळून तो पास झाला. नंतर माझा संपर्क तुटला.

त्या मुलाची परिस्थिती आणि त्याचा सामाजिक वर्ग वेगळा होता तरीही “Adolescence” सिरीज बद्दल होणाऱ्या चर्चा आणि प्रतिक्रिया यामुळे हा मुलगा आठवला.

Adolescence सिरीज पाहिली. मुलगा आणि त्याच्याच वयाच्या काही मुलांबरोबर बसून पाहिली. सिरीज खूप आवडली. अभिनय उत्तम आणि जिथे पालक आणि मूल यात अंतर पडत जाणे हे अपरिहार्य होत जाणार आहे अशा काळात प्रत्येक पालकांनी पहावी.

पाहताना भीती वाटली, अस्वस्थ वाटले तर नाही…

हे प्रत्येक काळात घडत असते. मुलांचा अपमान करणे, चिडवणे, वाळीत टाकणं आणि त्या अनुषंगाने होणारे परिणाम सुद्धा प्रत्येक काळात तेवढेच वाईट असतात. मजा म्हणजे त्यांचे जे वर्तन असते ते आधीच्या पिढीसाठी आक्षेपार्ह, धक्काजनक असेच असते.

मुलगा तिशी ओलांडून गेला असल्याने, त्याला यातले काही शब्द माहिती आहेत, काही नाही पण त्याच्या काळात, ऑर्कुट हा प्लॅटफॉर्म होता. ओळखीची, अनोळखी सुद्धा मुले असायची आणि तेव्हा सुद्धा एक कोड language होती.

पुरुषार्थ काय याच्या चाचण्या होत्या, मुलींचे boobs कमी असतील तर मुलींना complex असायचा.. त्यावरून नावे ठेवली जायची आणि त्त्या वयात ते vicious असायचे/ वाटायचे.

मुलगा पाचवीत मी त्याची शाळा बदलली होती. नवीन शाळा, नवीन मुलं, त्यात हा स्कॉलरशिप मिळून गेलेला, शिवाय उत्तम तबला वाजवायचा, गायचा. दिसायला सुद्धा गोड. पटकन मित्र झाले.. आता हे खटकणारी मुले सुद्धा असतात. एक मुलगा त्याला सारखा कडकू, पडवळ.. आणि असलच काही, चिडवायचा. नेहेमी हसत जाणारा मुलगा गप्प गप्प असतो हे लक्षात लगेच आले पण हा काही सांगेना.

आता शाळेत जायचेच म्हणून मी ठरवले त्याच्याच आदल्या दिवशी घरी आला तर तोंड लाल, पायावर वळ.. रडून लाल झालेलं डोळे..

“अरे, काय झाले?” तर सांगेना.

शेवटी मित्राला फोन करते तर म्हणाला, “मी मारले त्याला. मला सारखा चिडवत होता म्हणून मी मारले. “

आता हा बेदम मार खाऊन आलाय ते कळत होते पण त्याचाही सेल्फ रिस्पेक्ट रहावा म्हणून म्हटले, “अरे, लागले नाही ना त्याला ? “ 

“He is thick skinned. He is hippo.. तुला त्याचीच दया.. वाईट आहेस.. (मुसमुसणे) 

त्याला काय लागणार. मी उद्या कंपास घेऊन हातात घुसवणार त्याच्या. (आता डोळे लाल आणि चमकायला लागले) 

पोटात धस झाले..

त्याला ओरडून उपयोग नव्हता. आई म्हणजे आधार असे त्या वयात वाटते त्याला तडा जायला नको म्हणून त्या मित्राच्या आईला फोन करून, मारामारी झाली त्याबद्दल विचारले. सॉरी म्हटले. त्या मुलाने आपले वर्जन दिलेले.. सुदैवाने ती सुद्धा मुलाला ओळखणारी आई होती.

दुसऱ्या दिवशी आम्ही शाळेत गेलो. दोघांना एकत्र बसून समजावले. माझ्या मुलाने वर्गातल्या वीस मुलांना वाढदिवसाला घरी बोलावून त्याला वगळले याचा राग होता, तो तुला मी आता बोलावेन पुढच्या वर्षी म्हणून काढून टाकला.

आता ही सिरीज पाहिल्यावर वाटले, एक पोटेन्शियल खून किंवा डोळे बिळे फुटणे टळले.

ही चेष्टा नाही.. it could have gone either way… खून वगैरे नाही पण काहीतरी भलत्या जागी लागणे सुद्धा ओरखडा उमटवून गेले असते. दोघांच्या आई सजग होत्या असे म्हणेन मी.

सिरीज मधले आईवडील सुद्धा अतिशय चांगले होते मग असे का घडले..

मुळात माझ्या मुलाला सुद्धा एकदम कंपास का आठवला.. आम्ही दोघेही हिंसक नाही..

तर मी आता डॉ स्वाती केळकर यांनी लिहिलेले “द ब्रेन” वाचते आहे. त्यात असे म्हटले आहे, मानवी मेंदू अनुभवांनी, परिस्थितीने बदलतो. तो अनुभव ग्रहण करतो आणि त्यानुसार स्वतःला adapt करतो.. आई वडील, शेजारचा भवताल, शाळेतील मित्र, बघितलेले सिनेमा, नाटक, कार्टून सगळ्याचा परिणाम तुमच्यावर होत असतो आणि आताच्या जगात ही गोष्ट टाळता येत नाही. फार तर मी असे म्हणू शकते, मुलात घडलेला बदल टिपण्याची नजर, वेळ आणि जाणीव माझ्यात होती.

मुलगा तरी आताचा. माझ्या वेळेला, म्हणजे चाळीस एक वर्षापूर्वी एक जाड्या मुलाला आम्ही आमच्या भाषेत पी स्क्वेअर म्हणायचो. पर्मनंट प्रेग्नंट.

ए, पी स्क्वेअर आला बघ. बिचारा चुपचाप जायचो.. बरे त्याची गरज नव्हती पण मजा. एक मुलगी खूपच उफाड्याची होती. ती ताठ उभी राहिली ना आम्हा किरकोळ मुलींना ते कायतरीच वाटायचे. त्या वरून असल्या वाह्यात कोट्या केल्या होत्या कधीतरी. आता हे आठवले आणि मलाच काटा आला अंगावर. अत्यंत अभ्यासू आणि शांत म्हणून ओळखायचे पण तुमच्या ग्रुप मध्ये अशा आगावू गोष्टी होतात.

तिने मला तेव्हाच भोस्कायला पाहिजे होते का असेही एक क्षण मला ही सिरिज बघून वाटले. हादरलेल्या लोकांनी आपल्या भूतकाळात डोकावून पाहिले तर अनेकांना victim दिसतील. कधी आपण, कधी दुसरे.

– क्रमशः भाग पहिला 

लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई 

प्रस्तुती : सौ. प्रतिभा कुळकर्णी

संपर्क – ६, हीरु नाईक बिल्डिंग, धुलेर, म्हापसा, गोवा – ४०३५०७. मोबाईल – ९९२३१४८९०४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ राम की कृष्ण ? – कवी – अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ राम की कृष्ण ? – कवी – अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

कोणीतरी विचारले, मला परवा,

तुला राम हवा की कृष्ण हवा?

मी म्हणाले, किती छान विचारला प्रश्न.

सांगते, कधी मला राम पाहिजे, कधी कृष्ण!

 

रामराया, पोटात घालेल माझी चूक

आणि कृष्ण भागवेल माझी भूक!

 

रात्रीची शांत झोप, रामरायाच देतो.

भूक लागली की कृष्णच आठवतो.

 

कशाचीही भीती वाटली की मला आठवतो, राम!

कष्ट झाले, दुःख झाले की कृष्णाकडेच मिळतो आराम.

 

रक्षण कर! सांगते रामरायालाच.

सुखी ठेव सांगते, मी श्रीकृष्णालाच.

 

बुध्दीचा विवेक रामाशिवाय कोणाकडे मागावा,

व्यवहारातील चतुरपणा कृष्णानीच शिकवावा.

 

सहनशक्ती दे रे, माझ्या रामराया.

कृष्ण बसलाय ना कर्माचे फळ द्यायला.

 

रामाला फक्त शरण जावे वाटते.

कृष्णाशी मात्र बोलावेसे, भांडावेसे वाटते.

 

रामाला क्षमा मागावी,

कृष्णाला भीक मागावी.

 

रामाला स्मरावे,

कृष्णाला जगावे.

 

अभ्यास करताना प्रार्थना राजमणी रामाला!

पायावर उभे राहताना विनवणी, विष्णूला.

 

एकाचे दोन होताना घ्यावे, रामाचे आशीर्वाद.

संसार करताना आवर्जून द्यावा नारायणाला प्रसाद.

 

आरोग्य देणारा राम,

सौंदर्य देणारा कृष्ण.

 

राज्य देणारा राम,

सेना देणारा कृष्ण.

 

बरोबर-चूक सांगतो राम,

चांगले-वाईट सांगणे कृष्णाचे काम.

 

रामाकडे मागावे आई वडिलांचे क्षेम,

कृष्णाकडे मागते मी मित्रांचे प्रेम!

 

पाळण्यात नाव ठेवताना गोविंद घ्या, गोपाळ घ्या.

अंतिम वेळी मात्र रामनाम घ्या.

 

दोघांकडे मागावे तरी काय काय?

ते दोघे हसत बघत आहेत माझ्याकडे,

म्हणत आहेत, अग आम्ही एकच!!

तू फसलीस की काय?

 

म्हणाले, कोण हवा? हा प्रश्नच नाही

मिळू दोघेही, नाहीतर कोणीच नाही.

 

मी रडले आणि म्हणाले, दोघेही रहा माझ्याबरोबर

परत नाही विचारणार हा प्रश्न.

राम का कृष्ण?

परत विचारले जरी

फक्त म्हणेन,

जय जय रामकृष्ण हरी,

जय जय रामकृष्ण हरी.

कवी: अज्ञात

प्रस्तुती :  श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ चुभते तीर # 49 – पेंशन, पकोड़े और पैंट में छेद ☆ डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ ☆

डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’

(डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ एक प्रसिद्ध व्यंग्यकार, बाल साहित्य लेखक, और कवि हैं। उन्होंने तेलंगाना सरकार के लिए प्राथमिक स्कूल, कॉलेज, और विश्वविद्यालय स्तर पर कुल 55 पुस्तकों को लिखने, संपादन करने, और समन्वय करने में महत्वपूर्ण कार्य किया है। उनके ऑनलाइन संपादन में आचार्य रामचंद्र शुक्ला के कामों के ऑनलाइन संस्करणों का संपादन शामिल है। व्यंग्यकार डॉ. सुरेश कुमार मिश्र ने शिक्षक की मौत पर साहित्य आजतक चैनल पर आठ लाख से अधिक पढ़े, देखे और सुने गई प्रसिद्ध व्यंग्यकार के रूप में अपनी पहचान स्थापित की है। तेलंगाना हिंदी अकादमी, तेलंगाना सरकार द्वारा श्रेष्ठ नवयुवा रचनाकार सम्मान, 2021 (तेलंगाना, भारत, के मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव के करकमलों से), व्यंग्य यात्रा रवींद्रनाथ त्यागी सोपान सम्मान (आदरणीय सूर्यबाला जी, प्रेम जनमेजय जी, प्रताप सहगल जी, कमल किशोर गोयनका जी के करकमलों से), साहित्य सृजन सम्मान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के करकमलों से और अन्य कई महत्वपूर्ण प्रतिष्ठात्मक सम्मान प्राप्त हुए हैं।

जीवन के कुछ अनमोल क्षण 

  1. तेलंगाना सरकार के पूर्व मुख्यमंत्री श्री के. चंद्रशेखर राव के करकमलों से  ‘श्रेष्ठ नवयुवा रचनाकार सम्मान’ से सम्मानित। 
  2. मुंबई में संपन्न साहित्य सुमन सम्मान के दौरान ऑस्कर, ग्रैमी, ज्ञानपीठ, साहित्य अकादमी, दादा साहब फाल्के, पद्म भूषण जैसे अनेकों सम्मानों से विभूषित, साहित्य और सिनेमा की दुनिया के प्रकाशस्तंभ, परम पूज्यनीय गुलज़ार साहब (संपूरण सिंह कालरा) के करकमलों से सम्मानित।
  3. ज्ञानपीठ सम्मान से अलंकृत प्रसिद्ध साहित्यकार श्री विनोद कुमार शुक्ल जी  से भेंट करते हुए। 
  4. बॉलीवुड के मिस्टर परफेक्शनिस्ट, अभिनेता आमिर खान से मिलने का सौभाग्य प्राप्त हुआ।
  5. विश्व कथा रंगमंच द्वारा सम्मानित होने के अवसर पर दमदार अभिनेता विक्की कौशल से भेंट करते हुए। 

आप प्रत्येक गुरुवार डॉ सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ जी के साप्ताहिक स्तम्भ – चुभते तीर में उनकी अप्रतिम व्यंग्य रचनाओं को आत्मसात कर सकेंगे। इस कड़ी में आज प्रस्तुत है आपकी विचारणीय व्यंग्य रचना पेंशन, पकोड़े और पैंट में छेद)  

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ चुभते तीर # 49 – पेंशन, पकोड़े और पैंट में छेद ☆ डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ 

 (तेलंगाना साहित्य अकादमी से सम्मानित नवयुवा व्यंग्यकार)

चौराहे पर बैठे रघुनाथ चाचा की जिंदगी अब अखबार के कोने में छपे राशिफल से ज्यादा भरोसेमंद नहीं रही थी। रिटायरमेंट के बाद जो पेंशन मिलने वाली थी, वो अब तक ‘प्रक्रिया में’ थी — मतलब कागज़ ऊपर से नीचे, नीचे से ऊपर जा रहा था, लेकिन चाचा वहीं के वहीं थे — हाफ पैंट में, जो अब फुल हो चुकी थी छेदों से। हर छेद एक सरकारी विभाग की आत्मकथा सुनाता था। चाचा कहा करते थे, “अब हमारे कपड़े भी मंत्रालयों की तरह हैं—सिलवटें ज़्यादा, जवाब कम।” मोहल्ले में सब उन्हें “पेंशन वाले चाचा” कहते थे, जैसे यह कोई सम्मानसूचक पद हो।

बेटा दिल्ली में था, पर माँगता हर बार यहीं से था — “पापा, ज़रा दस हज़ार भेज देना, EMI है।” चाचा मन ही मन बड़बड़ाते, “EMI का नाम सुनते ही मेरी धड़कन UPI की तरह फेल हो जाती है।” उन्हें लगता था, सरकार ने रिटायर किया, बेटा ने इस्तीफा। अब अकेली पत्नी और पेंशन की उम्मीद में जीते थे। पत्नी कहा करती थी, “तुम्हारे भरोसे नहीं, भगवान भरोसे चल रहा है घर।” चाचा बोलते, “भगवान भी शायद मेरी फाइल के साथ ही प्रक्रिया में है।”

हर सुबह चाचा दफ्तर जाते थे—जैसे जेल की बैरक में तारीख पर पेशी हो। बाबू लोग उन्हें देखकर चाय की चुस्की और मोबाइल की स्क्रॉलिंग दोनों तेज़ कर देते। चाचा मुस्कुराते हुए कहते, “पेंशन मांग रहा हूँ, जमानत नहीं।” बाबू बोलते, “अंकल जी, सिस्टम धीमा है।” चाचा जवाब देते, “सिस्टम नहीं बेटा, संवेदना स्लो है।” एक दिन बाबू ने कहा, “अब ऑनलाइन पोर्टल पर ट्रैक कीजिए।” चाचा बोले, “बेटा, हमारी उम्र ट्रैक्टर चलाने की थी, पोर्टल नहीं।” फिर भी रोज़ जाते रहे—मानो उम्मीद का एटीएम हो, कभी तो कुछ निकलेगा।

इसी चक्कर में उन्होंने एक पकोड़े वाला ठेला शुरू किया। नाम रखा—”पेंशन पकोड़ा पॉइंट”। स्लोगन लिखा—”यहाँ तली जाती है निराशा, परोसी जाती है आशा।” सरकारी बाबू भी वहीं पकोड़ा खाते थे, जिनसे चाचा पेंशन के लिए हर बार चाय पिलाकर विनती करते थे। पर जवाब वही—“अभी ऊपर फाइल है।” चाचा सोचते, “फाइल ऊपर है या ऊपरवाले के पास?” एक बार एक पत्रकार आया, बोला—“चाचा, बहुत प्रेरणादायक हो आप।” चाचा बोले—“प्रेरणा नहीं बेटा, ये पेंशन के इंतज़ार की तड़प है। तुम भी मत करना सरकारी नौकरी।”

सर्दियों में एक दिन चाचा का ठेला गायब मिला। पता चला, नगर निगम उठा ले गया। कारण—”अवैध अतिक्रमण”। चाचा ने कहा, “सरकारी सिस्टम तो मेरी जिंदगी पर कब का अतिक्रमण कर चुका है, अब ठेला भी चला गया।” मोहल्ले वालों ने कहा—“FIR कराओ।” चाचा बोले, “अरे बेटा, FIR तो मैंने खुद की किस्मत पर दर्ज करवा रखी है।” कुछ दिन भूखे-प्यासे रहने के बाद एक NGO ने चाचा के लिए राशन दिया। उसमें लिखा था—“सहयोग पेंशन से नहीं, संवेदना से।” चाचा की आँखें भर आईं। बोले—“काश, ये लाइन मेरी फाइल पर लिखी होती।”

और फिर एक सुबह, चाचा की लाश पकोड़े के ठेले के पीछे मिली। हाथ में वही फाइल थी, जिस पर “Pending” की मोहर थी। कोई आंसू बहा रहा था, कोई वीडियो बना रहा था। मोहल्ले की बहू बोली—“सरकार से तो नहीं मिली पेंशन, पर YouTube से मिल जाए कुछ।” रिपोर्टर बोला—“हम इसे ‘भ्रष्ट व्यवस्था की बलि’ कहकर चलाएंगे।” चाचा की पत्नी रोती हुई बोली—“अब पेंशन आएगी?” बाबू बोला—“मृत्यु प्रमाणपत्र लगाइए, प्रक्रिया शुरू करेंगे।” और फिर वही—फाइल ऊपर भेजी गई।

कुछ महीने बाद चाचा की फोटो अखबार में छपी—”पूर्व कर्मचारी, पेंशन की प्रतीक्षा में निधन”। नीचे टिप्पणी थी—”सरकारी दायित्वों का पालन किया गया।” मोहल्ले के बच्चों ने दीवार पर लिखा—”यहाँ पेंशन नहीं, पकोड़े बिकते हैं।” एक बूढ़ा आदमी बोला—“देशभक्ति कुर्सियों में है, पर चप्पलों में धूल है।” चाचा की आत्मा शायद मुस्करा रही थी—“अब कोई पूछेगा नहीं—फाइल कहाँ है?” और पीछे से हवा ने कहा—“फाइल वहीं है… प्रक्रिया में।”

© डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’

संपर्क : चरवाणीः +91 73 8657 8657, ई-मेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # 241 ☆ कर्म करते रहें… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना विस्तार है गगन में। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – आलेख  # 241 ☆ कर्म करते रहें

कहते हुए नित जा रहे सब, एकता के साथ में।

पूरे सपने होंगे उनके, हाथ थामे हाथ में।।

कोशिश करेंगे वक्त बदले, भावना हो नेक की।

सबसे आगे चलते जाना, ढाल बन हर एक की।।

कर्म से कुछ भी असंभव नहीं है भाग्य के भरोसे जो व्यक्ति बैठता है उसे वही मिलता है जो कर्मशील व्यक्ति छोड़ देते हैं।

एक बहुत पुरानी कहानी है एक गुरु के दो शिष्य थे एक तो बहुत मेहनत करता व दूसरा हमेशा ही इस आसरे रहता कि जैसे ही पहले वाला काम कर देगा तो वह तुरंत उसके साथ आगे आकर शामिल हो जायेगा। हमेशा वो मुस्कुराता हुआ गुरू जी के पास पहुँच कर कहता देखिए गुरुदेव ये कार्य सही हुआ है या नहीं। गुरु आखिर गुरु होते हैं उनसे कोई बात छुपी तो रह नहीं सकती।

एक दिन गुरू जी दोनों शिष्यों को बुलाया और कहा कि तुम दोनों में से कौन जाकर पहाड़ी से आवश्यक जड़ी बूटी ला सकता है।

पहले शिष्य ने कहा गुरू जी मैं लेकर आता हूँ दूसरे ने भी हाँ में हाँ मिलाते हुए कहा कि यही ठीक होगा तुमको जड़ी- बूटी की जानकारी भी है। पहला शिष्य तुरंत ही चलने लगा तो गुरू जी ने उसे रोकते हुए कहा कि पहाड़ी के पास एक आश्रम है हो सकता है वहाँ पर तुम्हें जड़ी बूटी महात्मा जी के पास ही मिल जाय तुम उनसे मेरा संदेश कह देना।

यहाँ दूसरा शिष्य मन ही मन मुस्कुराता हुआ जाने लगा तो गुरू जी ने उसे पुकारा बेटा तुम यहाँ आओ आज तुम गुरु माँ के साथ काम करो जो भी कार्य वो कहें कर देना मैं आज वेद पाठ करूँगा बीच में मुझे मत टोकना।

दूसरे शिष्य ने कहा जी गुरुदेव अब वो गुरु माँ के साथ उनकी मदद करने लगा उसे कोई काम करना अच्छा नहीं लग रहा था वो जो भी करता उससे गुरु माँ का काम बढ़ जाता इसलिए उन्होंने उससे कहा बेटा लकड़ी समाप्त होने वाली है तुम जंगल से काट कर ले आओ।

उसने कहा जी , मन ही मन बड़बड़ाता हुआ वो चल दिया उसे लकड़ी काट कर लाने में पूरा दिन लग गया जबकि पहला शिष्य जैसे ही पहाड़ी के पास पहुँचा तो वहीं पर उसे एक सुंदर ताल दिखाई दिया व पास ही एक कुटिया जिसमें लोगों का आना – जाना लगा हुआ था वो अंदर गया उसने उनको प्रणाम कर अपने गुरुजी का संदेश दिया। महात्मा जी ने कहा बेटा उसके लिए तुमको परेशान होने की आवश्यता नहीं है मैं तुम्हें जड़ी बूटी देता हूँ तुम ले जाओ पर इससे पहले तुम हाथ -मुँह धोकर भोजन करो तत्पश्चात ही जाना।

महात्मा जी ने अपने बाग के फल- फूल भी उसको दिए और कहा इसे अपने गुरू जी को मेरी ओर से भेंट कर देना।

संध्या के समय पहला शिष्य मुस्कुराता हुआ आश्रम पहुँचा वहीं दूसरे थका -हारा पहुँचा। गुरु जी ने दोनों शिष्यों को पास बुलाकर कहा बेटा कोई भी काम छोटा बड़ा नहीं होता कर्म को पूजा मान कर जो कार्य किया जायेगा वो मन को खुशी देगा वहीं जो उदास मन से किया जायेगा वो थकान।

भाग्य का निर्माता वही होता है जो कर्म करता है सतत् कर्म करने वाले का भाग्य भगवान स्वयं लिखते हैं जबकि भाग्य से उतना ही मिलता है जो पूर्वजन्मों का संचय होता है जैसे ही उसका फल समाप्त हो जाता है व्यक्ति भाग्यहीन होकर आसरा तलाश करने लगता है जबकि कर्मशील व्यक्ति किसी भी परिवर्तन में नहीं विचलित होता।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – प्रश्नोत्तर ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – प्रश्नोत्तर  ? ?

शब्दों में आकार लिए

तुम्हारे अनगिनत प्रश्न

और मेरा अकेला

पर निराकार मौन,

क्या और अधिक

विस्तृत उत्तर

अपेक्षित है तुम्हें?

?

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 12 अप्रैल 2025 से 19 मई 2025 तक श्री महावीर साधना सम्पन्न होगी 💥  

🕉️ प्रतिदिन हनुमान चालीसा एवं संकटमोचन हनुमन्नाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें, आत्मपरिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Wandering Fairy… ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

We present Capt. Pravin Raghuvanshi ji’s amazing poem “~ Wandering Fairy ~.  We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji (who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages) for this beautiful translation and his artwork.) 

? ~ Wandering Fairy??

 

Oh, fairest nomad angel

from  the  fairyland,

With eyes like sapphires,

shining bright and grand

 *

Her cosmic appearance glows,

like moon in the night,

Illuminating the surroundings,

with  her oozing  light

 *

Her  smile, like  a dawning

sunrise,  doth  impart

Soothing warmth to the heart,

and love’s pure, tender art

 *

Her lips,  curving like the

Cupid’s  gentle  bow,

Inviting  all, to quest for

her royal  mystic beau

 *

Her  tresses  flow,  like

dark and silky streams,

Framing her face, with

tender enigmatic dreams

 *

 Her, gilded alabaster skin

 fairer than the snow

An inviting touch, with tender,

loving  care  to show

 *

She wanderest, carefree,

with steps so captivating

A fairy of the wind, with

spirit wild but enchanting

 *

Her radiant beauty sparkles,

like stars in a dark night,

A celestial wonder, a pure

and lovely cosmic delight

~Pravin Raghuvanshi

 © Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares