मराठी साहित्य – विविधा ☆ वळीव ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ वळीव ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

खिडकीतून बाहेर आकाशाकडे पाहताना दुपारच्या उन्हाच्या झळा अंगाला जाणवत होत्या. मार्च, एप्रिल महिना म्हणजे उन्हाळ्याची तीव्रता जास्त! आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर ढगांचे पांढरे शुभ्र पुंजके विखुरलेले दिसत होते आणि माझं मनही  असंच विचारांच्या आवर्तात भरकटत  होते!

लहानपण डोळ्यासमोर आले! परीक्षा संपण्याच्या आनंदा बरोबरच मोठ्या उन्हाळी सुट्टीची चाहूल लागलेली असे. ही सुट्टी कशी घालवायची याची स्वप्नं रंगवत दिवस जायचे. आता सारखे टीव्ही, मोबाईल, मोबाईल गेम, सिनेमा हे विश्व आमच्या समोर नव्हतं! फार तर परीक्षा झाल्यावर एखादा सिनेमा बघायला मिळायचा! कोकणात तर सुट्टीत दुपारी पत्ते खेळणे, संध्याकाळी समुद्रावर फिरायला जाणे, डबा ऐसपैस सारखे खेळ खेळणे,घरी आले की परवचा म्हणणे, गाण्याच्या भेंड्या लावणे   हीच करमणूक होती. सकाळी आठवण भाताचा नाश्ता झाला की दुपारच्या जेवणापर्यंत आम्ही घरात फिरकत नसू. आंबे बाजारात सुरू झाले की रोज आमरसावर ताव मारणे, फणस, काजूचा आस्वाद घेणे यात दुपार कधी सरायची कळत नसे. घामाच्या धारा वाहत असायच्या पण संध्याकाळी ऊन उतरले की समुद्रावरचा वारा ‘शीतल विंझण वाऱ्यासारखा वाटायचा!

बालपण कोकणचा मेवा खात कधी संपलं कळलं नाही आणि कॉलेज साठी देशावर आले. देशावरचे उन्हाळी वातावरण खूपच वेगळे! ऊन खूप असे पण घामाच्या धारा कमी! संध्याकाळी चार-पाच नंतर हवा एकदम बदलत असे या दिवसात! अभ्यासाच्या वाऱ्याबरोबरच बाहेरची हवा ही बदलती असे! दुपारचे कडक ऊन संध्याकाळी वाऱ्या वावटळीत कमी तीव्र वाटायचे. हॉस्टेलवर राहत असताना जानेवारीनंतर हवेतला गारवा कमी होऊन वातावरण तापत असे. आमच्या कॉलेजच्या परिसरातील झाडांची पाने पिवळी, करड्या रंगाची  दिसू लागत. अधून मधून वावटळ सुटे आणि दूरवर फुफाटा उधळत असे. वसंत ऋतुच्या चाहुलीने निसर्गात सूजनाची निर्मिती दिसायला सुरुवात होई. झाडावर पालवी फुटलेली दिसे. कोकिळेचे कूजन ऐकायला येई तर कुठेतरी निष्पर्ण  पांढऱ्या, गुलाबी रंगाचे वस्त्र पांघरून दिसे तर कुठे पिवळ्या जांभळ्या फुलांची शाल पांघरलेला कॅशिया असे! आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर गुलमोहराचे केशरी तुरे खुलून दिसत! मोगरा, मदनबाणाची छोटी छोटी झुडपे पांढऱ्या कळ्यांनी भरून गेलेली दिसत. संध्याकाळी त्यांचा सुगंध सगळा परिसर गंधमयी करत असे!

अशा या वातावरणात आकाशात ढगांची बदलाबदली कधी सुरू होई कळत नसे. पांढरे शुभ्र ढग हळूहळू 9करडे बनत, बघता बघता आकाश काळ्या ढगांनी भरून जाई. ढगांचा कडकडाट आणि विजेच्या गडगडाटासह हवा आपलं रुपच पालटून टाकत असे. जोराचा वारा सुटला की पाखरे लगबगीने आपल्या घराकडे परतू लागत. आणि मग जी वळवाची सर येई ती मृदगंध उधळीत जीवाला शांत करत येई! तो पाऊस अंगावर झेलू की टप टप पडलेल्या गारा वेचू असे होऊन जाई! छपरावर, रस्त्यावर सगळीकडे गारांचा सडा पसरलेला दिसे! डोळ्यासमोर तो वळीव असा उभा राहिला की मनमोराचा पिसारा किती फुलून जाई ते वर्णनच करता येत नाही!

  पावसाची पहिली सर अंगावर घेतली की तो वळीव प्राशन करून घ्यावासा वाटतो! पावसाची सर थांबता थांबता आकाशात इंद्रधनुष्याची कमान बघायचं सुख अनुभवायला मिळते! पांढऱ्या शुभ्र ढगातून बदलत जाणारा तो काळा ढग असा ओथंबून येतो की त्याची होणारी बरसात मनाचे शांतवन करते! कधी कधी मनाला प्रश्न पडतो की ते पांढरे ढग पांढरे ढग काळयामध्ये परावर्तित झाले तरी कधी? विजेच्या संगतीने कडकडाट करीत हे भाव व्याकुळ ढग पृथ्वीवर रिते कसे बरं होत असतील? पांढरे ढग श्रेष्ठ की काळे ढग? अशा आशयाचा वि.स. खांडेकरांचा धडा आठवून गेला! दोन्हीही ढग तितकेच महत्त्वाचे! करड्या ढगांचे अस्तित्वच मुळे पांढऱ्या ढगांवर अवलंबून असते.विचारांच्या आवर्तात ही ढगाळलेली अवस्था येते. कधीकधी विचारांचे पांढरे ढग जेव्हा परिपक्व होतात तेव्हा ते हळूहळू करडे बनतात.  पुढे मनाचे आभाळ दाटून येते आणि योग्य वेळ आली की डोळ्यातून सरीवर सरी बरसत राहतात. मनावरचे अभ्राचे पटल नष्ट करून स्वच्छ मनाने पुन्हा नाविन्याचा  आस्वाद घेतात! अशा नवनिर्मिती करणाऱ्या त्या बरसणाऱ्या ढगांची माझे मन आतुरतेने वाट पाहत राहते!

  अशावेळी आठवते माझीच कविता….

  ढगाळलेली हवा,

  हातात कप हवा,

 वाफाळलेल्या चहाचा,

 प्रत्येक घोट नवा !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘भय…’ – भाग – 4 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘भय…’ – भाग – 4 ☆ श्री आनंदहरी  

“ अगं, तो म्हणतोय ना? मग आणू दे की त्याला हवं ते गिफ्ट… तू का नाही म्हणतेयस ? “

बाबा सूनबाईंच्या साधेपणावर, विचारीपणावर खुश होऊन म्हणाले.

“ बाबा, तुम्हीपण ऐकत नाही माझे .. मग आईतरी ऐकणार आहेत थोड्याच ? त्या तुमच्याच सुरात सूर मिसळणार…”

ती आत जाता जाता म्हणाली , त्यावर बाबा फक्त हसले. तो दिगमूढ होऊन हे सारे पाहत होता.

‘ किती नाटकी आणि पाताळयंत्री बाई आहे ही… आई बाबांना कसे  सांगू ? कसे समजावू ?’ तो मनात म्हणाला खरं..पण ‘ हिच्यापुढे आपला काय निभाव लागणार?’ या विचाराने आणि तिचे वागणं पाहून खरेतर तो मनातून गर्भगळीत झाला होता. ‘ तिचे हे असले वागणे आता कुठंल्या टोकापर्यंत जाणार आहे ? किती काळ चालणार आहे ? आणि या साऱ्याचा शेवट नेमका काय होणार आहे? ’  या विचाराने तो खूप अस्वस्थ झाला होता. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्याची अवस्था झाली होती.. या साऱ्यात आपले काहीही झालं तरी चालेल पण आपले सरळसाधे आईबाबा भरडून निघता कामा नयेत..असे त्याला वाटत होतं पण ती कधी कशी वागेल याचा त्याला काहीच अंदाज येत नव्हता..

मध्यमवर्गीय मानसिकतेने मनात असणारी बदनामीची भीती.. लोक काय म्हणतील ? याची प्रत्येकक्षणी मनात  दाटणारी भीती. अशा भीतीची सावली आयुष्यभर पाठलाग करीत राहत असते. त्याच्याबाबतीतही तेच घडत होतं. त्याला ऑफिसातले, बाहेर असतानाचे क्षण  हे त्याच्या मनावरती तिच्या या असल्या वागण्याचा कितीही ताण असला तरी ,काहीसे बरे, काहीसे मुक्त झाल्यासारखे, काहीसे सुटकेचे आणि हवेहवेसे वाटू लागले होते..  लवकरात लवकर काम आटोपून ऑफिसमधून घरी परतायची, तिला भेटायची ओढ उरली नव्हती. त्याचं मन  ऑफिसमध्ये जास्तच वेळ रेंगाळू  पाहत होते. घरी आले की मनावरचा ताण अधिकच वाढत होता. दिवसेंदिवस तो मनानं अधिकाधिक खचत होता. तो तिच्यापासून, त्या भयापासून दूर पळण्याचा प्रयत्न करीत होता पण भय त्याची पाठ सोडत नव्हते. तिच्या वागण्या- बोलण्याने मनात रुजलेलं भय त्याला गिळंकृत करू लागले होते..

तो स्वतःच्याच विचारात राहू लागला.. मित्रांसोबत राहण्याचं टाळू लागला. मित्रांच्यात असला तरी गप्पागोष्टीत त्याचे फारसे लक्ष नसते हे त्याच्या जवळच्या मित्रांनाही जाणवू लागलं होतं.

“ काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे काय?”

त्याच्यातील बदल जाणवून मित्रानं त्याला एके दिवशी एकट्याला गाठून विचारले. तो आपल्याच विचारात होता. मित्राने पुन्हा तोच प्रश्न विचारला तेव्हा तो भानावर आला.

“ नाही.. काहीच प्रॉब्लेम नाही.”

“ हे बघ .. गेले काही दिवस पाहतोय, तू खूप विचारात असतोस..एकतर सर्वांना टाळत असतोस.. आणि भेटलास तरी कुठल्यातरी दुसऱ्या जगात असल्यासारखा स्वतःतच गुरफटलेला असतोस, आमच्यामध्ये, गप्पांमध्ये सामील नसतोसच. एकतर तू नसतोस आणि असलास तरी नसल्यासारखाच असतोस. आपल्याचं विचारात असतोस.. कशातच सहभागी होत नाहीस.. मलाच नव्हे तर आपल्या ग्रुपमधल्या प्रत्येकाला जाणवतंय ते.. बोललास तर बरं होईल.. काही अडचण असेल सांग. त्यातून काहीतरी मार्ग काढता येईल..”

“ नाही रे खरंच काही नाही. “

“ काहीच अडचण , समस्या नसेल तर चांगलंच आहे.. पण मग पूर्वीसारखा मिसळत का नाहीस सर्वांत ? लग्न झालंय तुझे.. पू्र्वीसारखं नियमित भेटणं तुला जमणार नाही हे जाणून आहोत आम्ही… पण भेटल्यावर ही वेगळाच राहतोस.. असं वेगळं राहणं, अलिप्त असणं हा तुझा स्वभावच नाही हे आम्हांला ठाऊक आहे .. त्यामुळे मग आम्हाला प्रश्न पडतो.. तू काहीतरी अडचणीत, समस्येत  आहेस असं वाटू लागलंय.. मला एकट्याला नाही तर आम्हां सगळ्यांनाच तसं वाटू लागलंय.. अगदी काहीही अडचण असेल, समस्या असेल तरी बोल. “

“ नाही रे तुम्हाला वाटतंय तसे काहीच नाही… आणि असते तसं काही तर तुमच्याशी नाही का बोलणार मी ? बराच वेळ झालाय.. भेटू पुन्हा.. चल, निघतो मी आता..”

तो घड्याळात पहात म्हणाला आणि झटकन उठून निरोप घेऊन निघून गेला.

तो बोलणे टाळण्यासाठी निघालाय हे मित्राच्या लक्षात आलं होतं. तो निघून गेला तरी ‘ काय झालं असेल? हा प्रश्न मित्राच्या मनात बराच वेळ रेंगाळत राहिला होता.

तो घरी आला दारावरची बेल वाजवली.. तिने हसतमुखाने दार उघडलं.. तिला समोर पाहताच , ‘आता ती काय बोलेल ? कशी वागेल ? ‘ हा विचार मनात आला आणि  इतका वेळ त्याच्या मनात झोपलेल्या भयाच्या अजगराने, जागं होऊन त्याच्या तन-मनाला विळखा घालायला सुरुवात केली.

 – समाप्त –

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गुढीपाडवा… कवयित्री : सुश्री विपाशा रवींद्र ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ गुढीपाडवा… – कवयित्री : सुश्री विपाशा रवींद्र ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

अर्वाचिन संपदेला हिंदु संस्कृतीच जपती !

हिंदुकुशाते हिंदुसागरी वर्धिली हिंदु संस्कृती ! १-

 

आसेतु हिमाचल भ्रमण साधु संतांनी केले !

समृध्दी निर्मितीकरितां हजारो वर्ष ते झटले ! २-

 

हीनं दुष्यति इति हिंदु ! ऋग्वेदचि ठरे आपद्धर्म !

हीन त्यागतो !शत्रूस नमवितो तोच खरा हिंदु धर्म ! ३-

 

एक पत्नी एक वचनी कौसल्येचा राजा राम !

पितृवचन पालन करण्या वनवासी जाला राम ! ४-

 

चौदा वर्षे दंडकारण्ये ऋषिमुनींना अभय देई राम !

जनकल्याणास्तव खलनिर्दालन करितो राम ! ५-

 

राजधर्म पालन करणे प्रथमकर्तव्य रामाकरता !

पतिव्रता सीता करिते अग्निदिव्य रामाकरता ! ६-

 

रामासंगे सीता येतां धन्य जाले अयोध्याजन !

गुढ्या तोरणे उंच उभारतां जणु भासले आनंदवन ! ७-

 

कळक दावितो साधेपणा कलश तो समृध्दी वैभव !

काठपदरी घरपण बत्तासे कडुनिंब दावि आगळा भाव ! ८-

 

नरेंद्र लढतो सकल जनकल्याणार्थ !

नेणिवेने जाणिला जपला हाच असे परमार्थ ! ९-

 

अयोध्या मंदिर काशी विश्वेश्वर मुक्ती करती !

जाणवली दिव्यत्वाची येथ प्रचिती ! १०-

 

आठवे विनायकी विचार ! शस्रसिध्द राष्ट्रनिर्माण !

नरेंद्र दावितो सिध्दचि करितो साधुनि जनकल्याण ! ११-

 

तत्व स्वत्व नि स्वधर्म रक्षिण्या लढा देऊ या एकदिलाने !

उभवू या पुन्हा गुढ्यातोरणे ! जरिपटका तो सन्मानाने !

       …… जरिपटका तो सन्मानाने ! १२— 

 

कवयित्री : सुश्री विपाशा रवींद्र

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “शब्दांचे जीवनचक्र…” लेखक – डाॅ. श्रीकांत तारे  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “शब्दांचे जीवनचक्र…” लेखक – डाॅ. श्रीकांत तारे  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

माणसांप्रमाणे शब्दांचेही जीवनचक्र असते. शब्द जन्माला येतात,जगतात व शेवटी मरुन जातात. काही शब्द शतायुषी माणसाप्रमाणे पिढ्‌यान पिढ्‌या सन्मानाने जगतात. काही शब्द अल्पायुषी ठरतात, तर काही शब्द उगाचच श्वास चालला आहे म्हणून जिवंत म्हणवले जातात, एरवी त्या शब्दांकडे सहसा कुणी लक्षही देत नाही.

‘वरवंटा’ हा शब्द असाच काही दिवसांपूर्वी वारला. त्यापूर्वी तो बरेच वर्ष मरणपंथाला लागला होता सुरुवातीला लोक त्याची विचारपूस करायचे. वीज नसल्यामुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे मिक्सर आजारी पडलं की लोक वरवंट्‌याकडे वळायचे. तोही बिचारा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यासारखा जबर दुखण्यातून उठून लोकांना मदत करायचा. ‘वरवंटा’ हा शब्द लोकांना अधून मधून का होईना, आठवायचा. 

महिन्यापूर्वीच, मराठीत एम फिल केलेल्या माझ्या भाचीला मी वरवंटा शब्दाबद्दल विचारल्यावर तिने  ‘पांडोबा भिकाजी धावडे’ अश्या तद्दन अनोळखी नावाच्या माणसाच्या गडचिरोली येथे निधनाची बातमी ऐकून आपण जसा चेहरा करु तसा चेहरा केला तेव्हाच या शब्दाचं आयुष्य संपल्याची जाणीव मला झाली.  

असं कितीतरी शब्दांच्या बाबतीत झालं. ‘आपला खल दिसत नाही आजकाल कुठे?’ असं मी बायकोला विचारलं तर तिनं ‘खल गेला आटाळ्यात आणि खलनायक माझ्यासमोर उभा आहे’ असं शेलक्या शब्दांत उत्तर दिलं. काहीही कमेंट्‌स न करता मी मनातल्या मनांत खल या शब्दाला श्रध्दांजली देऊन टाकली.

कोट हा मराठी शब्द कुठल्यातरी शेवटल्या राजाबरोबर सती गेला असावा. क्ल्ल्यिांभोवतीचे कोट जाऊन तिथे भिंती उभ्या राहिल्या आणि त्या किल्ल्यांचे म्यूझियम झाले. तसेच ‘बाराबंदी’ तुकोबांसह सदेह स्वर्गात गेली, ती पुन्हा परतलीच नाही. बुवांच्या जाण्याबद्दल वादविवाद झडताहेत पण बाराबंदी निश्चितच कायमची स्वर्गवासी झाली याबद्दल मार्क्सवाद्यांपासून ते संघवाल्यांपर्यंत सर्वांचंच एकमत झालेलं दिसून येतं.

‘उमाळा’ या शब्दाची कालपरवाच हत्या झाली असं कळलं. एका, प्रथमच सासरी जाणाऱ्या मुलीनं, टीपं गाळणाऱ्या आपल्या आईला, ‘रडतेस काय असं गांवढळासारखं?’ असं कडक शब्दांत विचारलं, तेव्हाच उमाळयाचं ब्रेन हॅमरेज झालं. टीव्हीवरच्या उसनं रडं आणणाऱ्या मराठी हिंदी मालिका बघून भावनांची धार गेलेल्या माणसांनी हळू हळू उमाळयाचा ऑक्सिजन पुरवठा तोडला आणि त्याला सपशेल मारून टाकलं. खरं तर प्रेमाचा उमाळा जाऊन प्रेमाचं प्रदर्शन आलं तेव्हाच त्याने प्राण सोडायला हवा होता, पण तोही बेटा एका पिढीला साथ  देण्याचे वचन  निभावत असावा. आता राजे, ती पिढीही गेली आणि तो उमाळाही न जाणे कुठल्या अनंतात विलीन झाला. 

माझ्या आजोबांकडे एक जुनी चंची होती. त्यात ते पान, सुपारी वगैरे ठेवायचे. आजोबा जाऊनही आता तीस बत्तीस वर्षे झाली असावीत. माझा आतेभाऊ आठवड्‌यापूर्वी कुठल्याश्या लग्नांत भेटला, तेव्हा मी त्याला, ‘नानांची एक नक्षीदार चंची होती, आठवतंय?’ असं विचारल्यावर त्याने माझ्याकडे, जणू मी त्याला न्यूक्लीयर बॉम्बबद्दल विचारतो आहे अश्या नजरेनं बघितलं. चंची हा शब्दच त्याच्या मेंदूतून पार धुवून निघालेला दिसत होता. कहर म्हणजे लगेचच माझ्या बायकोनं माझा दंड धरला आणि मला बाजूला घेत ‘नानांच्या लफड्‌यांबद्दल असं चार लोकांसमोर काय बोलता?’ म्हणत मला झापलं. मी मनातल्या मनांत लागलीच ‘चंचीच्या दुखःद देहावसनाबद्दल शोक बैठक दिनांक…’ वगैरे शब्दांची जुळवणी करु लागलो. 

असाच एक शब्द काही दिवसांपूर्वी नैसर्गिक मृत्यू पावला. ‘फुलपात्र’  हा तो शब्द. ही वस्तू अजून शिल्लक आहे, पण हा शब्द मेला. हे म्हणजे एखाद्या मेलेल्या प्राण्याला पेंढा भरून दिवाणखान्यात सजवून ठेवल्यासारखं वाटतं. मग तो नुसता ‘प्राणी’ न राहता, ‘पेंढा भरलेला प्राणी ‘ होतो. फुलपात्र या शब्दाचं असंच झालं. याला सुटसुटीत नाव ‘पेला’ किंवा सर्वनाम ‘भांडं’ असं मिळालं. फुलपात्र या नावाच्या अंत्ययात्रेला या दोन्ही शब्दांनी त्याला उत्तराधिकारी म्हणून खांदा दिला असावा. तसंच आपल्या आवडीचा पदार्थ त्याच्या नावासकट नेस्तनाबूत होताना पहाणे हाही एक शोकानुभव असतो.

 मी लहानपणी कल्याणला शिकत असताना छाया थियेटर जवळच्या एका म्हाताऱ्या वाण्याकडून जरदाळू घेऊन खायचा. जरदाळू खाल्ल्यावर त्यातली बी फोडून त्याच्याही आतला गर खाण्यात गंमत वाटायची. नेमानं मी सात आठ वर्ष त्याच्याकडून घेऊन जरदाळू खात होतो. कल्याण सोडल्यानंतर मी तीसेक वर्षाने सहज म्हणून आमची जुनी चाळ बघायला गेलो, तेव्हा सगळंच बदललं होतं. वाण्याचं दुकानही बऱ्यापैकी पॉश  झालेलं होतं, गल्ल्यावर चिरंजीव वाणी बसले असावे. मी त्याच्याकडे जरदाळू मागितला, आणि वाणीपुत्राला घाम फुटला. ‘ऐसा माल हम नही बेचते’ असं जेव्हा तो बोलला, तेव्हा हा शब्दच त्याने ऐकलेला नसल्याचं मला जाणवलं. मी जरा जोर दिल्यावर तो घाबरलाच, तो मला सीबीआय चा माणूस समजला असावा. त्याने मला आंत बसवून मागवलेलं कोल्ड्रींक पीत मी जरदाळू या शब्दाच्या आणि या सर्वांगसुंदर सुकामेव्याच्या आठवणी दोन अश्रू ढाळले. 

ग्रूपमध्ये असंच गप्पा मारीत असता कुणीतरी ‘भारतीय हॉकीचं विंधाणं झालं’ असं म्हटलं आणि मला जुना मित्र भेटल्याचा आनंद झाला. ‘विंधाणं’ हा शब्द गेले कित्येक वर्ष गहाळ झाला होता. उलट सुलट चर्चा चालू असतां अचानक तो मला गवसला. या नकारात्मक शब्दाच्या शोधात मी पणती घेवून फिरत होतो अश्यातला भाग नाही, पण नकारात्मक असला तरी तो एक शब्द होता, टिपिकल मराठी शब्द. वर्षानुवर्षे आपल्याला साथ देणारा, आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोचवणारा चपखल शब्द. आणि एखादा शब्द मेल्याचं दुखः त्याच अर्थाच्या दुसऱ्या शब्दाच्या जन्माने भरुन नाही निघत. 

एक शब्द नाहीसा झाल्याने मात्र मी खरंच बेचैन झालो. तो शब्द माझ्या फारश्या जवळचा नव्हता, किंबहुना त्याची माझी भेट माझ्या प्राथमिक शिक्षणानंतर पडलेली मला आठवत नाही, पण तो शब्द वारल्याचं कळलं,आणि आपली संस्कृती बदलत चालली आहे हे मला प्रकर्षाने जाणवलं. तो शब्द म्हणजे ‘औत’. लहानपणापासून तो माझा आवडता शब्द होता. आजकाल त्याचा भाऊ नांगर त्याचे काम पहातो, पण औत म्हटल्यावर जो सुखी समाधानी शेतकरी डोळयासमोर यायचा, तोच शेतकरी नांगर धरल्यावर न जाणे का, केविलवाणा दिसू लागतो. काही काळापासून, द्रॅक्टर नांवचा नवीन शब्द आलाय, पण तो ‘कर्ज’ या शब्दाला आपल्याबरोबर घेऊन आलाय.

कितीतरी शब्द माझ्या डोळ्यादेखत नाहीसे झाले. काही कायमचे गेले तर काही, आयुष्य संपण्याची वाट पहात पडलेले आहेत. फळा आणि खडू या दोघांनी तर बरोबरच जीव दिला. त्यांच्या प्रॉपटीवर बोर्ड आणि चॉक यांनी हक्क मांडल्यावर त्यांना दुसरा इलाजच राहिला नाही. तुळई गेली, रोळी गेली, किरमिजी नावाचा रंग गेला, लिंगोरचा गेला, पाचे गेले, दांडपट्टा गेला, गेलेल्या शब्दांची यादी एखाद्या गावांत वारलेल्या माणसांच्या नांवच्या यादीएवढी लांब असू शकते, याला अंत नाही. यांच्या जागेवर नवनवे शब्द येतातही, पण त्यांना म्हणावी तशी लोकमान्यता मिळत नाही. संगणक हा शब्द गेल्या काही दिवसांपासून स्थापित होण्याचा प्रयत्न करतोय, पण एखाद्या नवरीचे नाव लग्नानंतर बदलले गेले तरी तिला माहेरच्याच नावाने ओळखले जावे, तसं काहीसं संगणक या शब्दाच्या बाबतीत घडलंय.

इंग्रजी शब्द तणांसारखे माजू लागल्यावर आणि त्यांचा मराठीत मुक्त संचार सुरु झाल्यावर तर पुढे पुढे आपण मराठी व्याकरणांतून इंग्रजी बोलत आहोत असा देखावा निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘माझे फोर्टी फाईव्हचे अंकल मॉर्निंग वॉक घेत होते तर त्यांची  हार्टफेलने डेथ  झाली.’  हे वाक्य एका पुण्याच्या मराठी मुलीच्या तोंडून ऐकल्यावर मी जाम गोंधळलो होतो. या वाक्याची नेमकी भाषा कुठली हेच मला कळेना. ‘सांगणाऱ्याला सांगता येते आणि ऐकणाऱ्याला कळते ती खरी भाषा’ अशी भाषेची नवीन व्याख्या जरी मी निर्माण केली, तरी वरील वाक्य निश्चित कुठल्या वर्गात ठेवायचं, हा प्रश्न माझ्याकडून  आजतागायत सुटलेला नाही. 

शब्द माझे सखा आहेत, बंधू आहेत, आई आणि वडील देखील आहे. शब्दांवर मी प्रेम केलं आणि मोबदल्यांत शब्दांनी मला त्यांचे सर्वस्व दिलं. मी शब्दांनी घडलो, वाढलो. त्यांचे मरण उघड्‌या डोळयांनी पहाण्याचे दुखः मी आज सोशित आहे.

लेखक : -प्रा डॉ श्रीकांत तारे

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माझ्या दूर गेलेल्या प्रिय चिमणीसाठी…  – लेखिका : सुश्री योगिनी पाळंदे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ माझ्या दूर गेलेल्या प्रिय चिमणीसाठी…  – लेखिका : सुश्री योगिनी पाळंदे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

(20 मार्च…जागतिक चिमणी दीन — दिन नव्हे दीनच—) 

माझी आवडती, कष्टकरी चिमणी बघता बघता निर्घर झाली, दिसेनाशी झाली— वळचणी रिकाम्या करून,अदृश्य झाली —  मोबाईल टॉवरवाल्यांसाठी आता फक्त अस्थमॅटीक कबुतरं उरली…….

माझ्या दूर गेलेल्या प्रिय चिमणीसाठी —- 

टुण टुणी चिमणी

टुण टुणी चिमणी

कुळ कुळ करडी

मणी मणी डोळ्यांनी

लुक लुक बघुनी

वण वण फिरुनी

कण कण वेचूनी

इलु इलु चोचीनी

टिप टिप टिपुनी 

काडी काडी जोडुनी

खपू खपू लागुनी 

मऊ खोपा बांधुनी

घर घर सजुनी

लुसलुशी पिल्लांना 

मऊ किडा भरवी

टुण टुणी चिमणी

टुण टुणी चिमणी

रोज रोज दिसली

चिव चिव ऐकली

दाणे दाणे टाकुनी

घरी दारी नाचली 

आणि काही वर्षांनी …

टॉवरल्या अंबरी

धूर धूर गगनी

रण रण पेटूनी 

उष्ण उष्ण वाफुनी

जीर्ण जीर्ण झाडूली 

शीर्ण शीर्ण पानुली

शीण शीण होऊनी

पळ पळ पळाली

दम दम दमली

झीज झीज झिजली

थक थक थकली

रित्या रित्या घरटी

तिळ तिळ रडली

पुन्हा घर शोधूनी

लांब लांब उडाली

सुन्न झाली बेघरी

नाही आली माघारी

टुण टुणी चिमणी

गुणी गुणी चिमणी

शोध शोध शोधली

पुन्हा नाहीं दिसली

सुन्यासुन्या वळचणी 

सुकलेल्या आठवणी …

 

लेखिका : सुश्री योगिनी पाळंदे

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ भगव्या वाटा… सुश्री अरुणा ढेरे ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही ?

☆ भगव्या वाटा… सुश्री अरुणा ढेरे ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

पुस्तकाचे नाव : “भगव्या वाटा “

लेखिका :  अरुणा ढेरे 

प्रकाशक : सुरेश एजन्सी 

 

स्त्री म्हणजे पाश

स्त्री म्हणजे भावनिक गुंतागुंत 

स्त्री म्हणजे आसक्ती 

हे समीकरण मानणाऱ्या प्रत्येकाला 

‘स्त्री म्हणजे विरक्ती’

हे गणित पटकन सुटेल असं वाटत नाही.

कारण खरंच स्त्रीला संसाराच्या पाशात इतकं गुरफटवून ठेवलं आहे आपण की, ती ‘मुक्तीसाठी अधिकारी असू शकते’, संसाराच्या पाशातून मुक्त होणं हे तिचं ‘स्वप्न’ असू शकतं असा आपण विचारदेखील करत नाही. 

वास्तविक पाहता स्त्री इतकं सहज डिटॅचेबल होणं पुरुषाला जमणं जरा अवघडच. 

अख्खं बालपण म्हणजे वयाची पंधरा-वीस वर्षें वडिलांच्या घराला आपलं घर मानून काढल्यानंतर परत पतीच्या घरात जाऊन तिथे आपलं स्थान निर्माण करणं, नऊ महिने पोटात जपलेल्या जीवाला जन्माला घातल्यानंतर देखील क्षणार्धात त्याची नाळ आपल्यापासून तोडून त्याचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करणं, हे वाटतं तितकं सोपं नाही. स्वतःला रुजवणं तिथून बाहेर पडणं आणि परत दुसऱ्या ठिकाणी रुजवणं, फुलणं यामध्ये तिच्या सगळ्या स्त्रीत्वाचा, व्यक्तित्वाचा कस पणाला लागतो. पण या प्रत्येक वेळी ती अत्यंत सहजतेने या सर्व प्रसंगांना सामोरी जाते. आणि संसारातला सर्व जबाबदाऱ्या उत्तमरीत्या पार पाडते.

अशी स्त्री आसक्ती, पाश, मोह यात खरंच गुंतून राहू शकते? खरंच फक्त हेच तिचं अस्तित्व असू शकतं?

किती मर्यादित करून ठेवलं आहे आपण ‘स्त्रीत्वा’ला… 

पण ज्या वेळेला अरुणा ढेरे यांचं ‘भगव्या वाटा’सारखं पुस्तक हाती येतं तेव्हा स्त्रीत्व म्हणजे काय? स्त्री म्हणजे काय? हे जास्त चांगलं समजतं. स्त्रीत्वाचा आत्तापर्यंत अप्रकाशित राहिलेला विरक्तीचा पैलू मोठ्या ताकदीने आपल्यासमोर येतो आणि अक्षरशः अचंबित करतो. 

भारतीय इतिहासाला संत परंपरेचं प्रदीर्घकाळाचं वरदान लाभलेलं आहे. या संत परंपरेत पुरुषांइतकंच अनेक स्त्रियांचं देखील योगदान आहे हे आपल्यापैकी किती जणांना माहित आहे? काही ठराविक संत स्त्रिया सोडल्या तर बाकी अन्य संत स्त्रिया, वैराग्य पत्करणाऱ्या स्त्रिया यांबाबत आपण तसे अनभिज्ञच आहोत. याचं  कारण म्हणजे आपल्याला या स्त्रियांची माहिती सहजासहजी सापडत नाही. स्त्रियांच्या या पैलूबाबत विचार करावा, शोध घ्यावा, चर्चा करावी असा प्रयत्न मोठ्या प्रमाणात झालेला दिसत नाही. पण याचा अर्थ तशा स्त्रिया झाल्याच नाहीत, असा होत नाही. इतिहासामध्ये अशा स्त्रियांची नोंद मोठ्या प्रमाणात लक्षात येण्याजोग्या रीतीने केलेली नसली तरी थोड्याफार प्रमाणात का होईना केलेली आहे. 

गौतम बुद्धांच्या काळात अशा कितीतरी स्त्रिया बौद्ध भिक्षुणी झालेल्या आहेत. त्यात अगदी सामान्य स्त्रियांपासून ते राजघराण्यातील स्त्रियांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. इतकंच नव्हे तर केवळ उतारवयातल्याच नव्हे तर तरुण वयातल्या स्त्रियादेखील बुद्धाच्या सांगण्याने प्रभावित होऊन मुक्तीच्या मार्गावर जाण्यासाठी आनंदाने भिक्षुणी झालेल्या आढळतात. 

अशा स्त्रियांच्या कथा थेरी गाथा,  या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. थेरी गाथा म्हणजे स्थविरींच्या गाथा. स्थविरी म्हणजे बौद्ध भिक्षुणी. एकूण ३७ जणींच्या गाथा यात आपल्याला वाचायला मिळतात. या गाथांमध्ये त्या त्या बौद्ध भिक्षुणींचा पूर्वेतिहास आणि त्यांचा बौद्ध भिक्षुणी होण्याचा प्रवास आणि त्या प्रवासाची पुढील वाटचाल अगदी थोडक्यात पण अतिशय उत्कंठावर्धक रीतीने दिलेली आहे.  

मुक्ती म्हणजे काय? ती कशी प्राप्त होते? त्यासाठी काय मर्यादा असतात? त्याची बलस्थानं काय असतात? हे देखील आपल्याला या गाथांमधून समजतं. एकेका भिक्षुणीची कथा वाचताना आपण रंगून जातो. विषय वैराग्य असला तरी वाचताना किंचितही कंटाळा येत नाही. एखाद्या आजीने आपल्या मांडीवरील नातवंडांना गोष्ट सांगावी अशा पद्धतीने अतिशय आपुलकीने, सहज-सोप्या शब्दांत या गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत. 

यातला मला भावलेल्या काही कथांचा उल्लेख : वासिष्ठी आणि सुजात, एका रूप गर्वितेची कथा, अक्कमहादेवी, प्रणयशरण शिवसुंदर, तिलकवती, भयचकित नमावे तुज रमणी, लल्लेश्वरी, धर्म रक्षति रक्षित:, विद्रोहाची शोकांन्तिका, भद्रा कुंडलकेशा, महादाईसा इ. आहेत. 

आज जागतिक महिला दिन साजरा करताना निरनिराळ्या कार्यक्षेत्रात उत्तुंग भरारी मारणाऱ्या महिलांचे कौतुक केलं जातं, त्यांचे दाखले दिले जातात. त्याबरोबरच मुक्ती आणि वैराग्य यासारख्या विषयांमध्ये देखील स्त्रियांचं कर्तृत्व काही कमी नाही हे सांगणार हे पुस्तक सर्वांनीच आवर्जून एकदा तरी वाचायला हवं. त्यानिमित्ताने भारतीय परंपरेमध्ये मानाचे स्थान मिळवलेल्या मुक्ततेचा विचार कृतीत अमलात आणणाऱ्या स्त्रीशक्तीची दखल घेतली जाईल.

अभिमान आहे स्त्री शक्तीचा! 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #176 ☆ ज़िन्दगी का सफ़र ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं  माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं।  साप्ताहिक स्तम्भ  “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का  मानवीय जीवन पर आधारित एक अत्यंत विचारणीय आलेख ज़िन्दगी का सफ़र। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 176 ☆

☆ ज़िन्दगी का सफ़र 

‘पा लेने की बेचैनी/ और खो देने का डर / बस इतना ही है/ ज़िन्दगी का सफ़र’ यह वह भंवर है, जिसमें फंसा मानव लाख चाहने पर भी सुक़ून नहीं प्राप्त कर सकता। इंसान की फ़ितरत है कि वह किसी भी स्थिति में शांत नहीं रह सकता। यदि किसी कारण-वश उसे मनचाहा प्राप्त नहीं होता, तो वह आकुल-व्याकुल व क्लान्त हो जाता है। उसके हृदय की भाव-लहरियां उसे पल भर के लिए भी चैन से नहीं बैठने देतीं। वह हताश-निराश स्थिति में रहने लगता है और लंबे समय तक असामान्य वातावरण में रहने के कारण अवसाद-ग्रस्त हो जाता है, जिसकी परिणति अक्सर आत्महत्या के रूप में परिलक्षित होती है।

इतना ही नहीं, मनचाहा प्राप्त होने के पश्चात् उसे खो देने के प्रति मानव-मन आशंकित रहता है। इस स्थिति में बावरा मन भूल जाता है कि जो आज है, कल नहीं रहेगा, क्योंकि समय व प्रकृति परिवर्तनशील है और प्रकृति पल-पल रंग बदलती है, जिसका उदाहरण हैं…दिन-रात, अमावस-पूनम, ऋतु-परिवर्तन, फूलों का सूर्योदय होते खिलना व सूर्यास्त के समय मुरझा जाना… यह सिलसिला आजीवन अनवरत चलता रहता है और प्राकृतिक आपदाओं का समय-असमय दस्तक देना मानव-मन को आशंकित कर देता है। फलतः वह इसी ऊहापोह में फंसकर रह जाता है कि ‘कल क्या होगा? यदि स्थिति में परिवर्तन हुआ तो वह कैसे जी पाएगा और उन विषम परिस्थितियों से समझौता कैसे कर सकेगा? परंतु वह इस तथ्य को भुला देता है कि अगली सांस लेने के पहले मानव के लिए पहली सांस को बाहर निकाल फेंकना अनिवार्य होता है…और जब इस प्रक्रिया में व्यवधान उत्पन्न होता है, तो वह हृदय-रोग अथवा मस्तिष्काघात का रूप धारण कर लेता है।

सो! मानव को सदैव हर परिस्थिति में सम रहना चाहिए। व्यर्थ की चिंता, व्यग्रता, आवेश व आक्रोश उसके जीवन के संतुलन को बिगाड़ देते हैं; जीवन-धारा को बदल देते हैं और उस स्थिति में वह स्व-पर, राग-द्वेष अर्थात् तेरा-मेरा के विषाक्त चक्र में फंसकर रह जाता है। संशय, अनिश्चय व अनिर्णय की स्थिति बहुत घातक होती है, जिसमें उसकी जीवन-नौका डूबती- उतराती रहती है। वैसे ज़िंदगी सुखों व दु:खों का झरोखा है, आईना है। उसमें कभी दु:ख दस्तक देते हैं, तो कभी सुखों का सहसा पदार्पण होता है; कभी मन प्रसन्न होता है, तो कभी ग़मों के सागर में अवग़ाहन करता है। इस मन:स्थिति में वह भूल जाता है कि सुख-दु:ख दोनों अतिथि हैं… एक मंच पर इकट्ठे नहीं दिखाई पड़ सकते। एक के जाने के पश्चात् दूसरा दस्तक देता है और यह सिलसिला अनवरत चलता रहता है। अमावस के पश्चात् पूनम, गर्मी के पश्चात् सर्दी आदि विभिन्न ऋतुओं का आगमन क्रमशः निश्चित है, अवश्यंभावी है। सो! मानव को कभी भी निराशा का दामन नहीं थामना चाहिये।

दुनिया एक मुसाफ़िरखाना है, जहां अतिथि आते हैं और कुछ समय ठहरने के पश्चात् लौट जाते हैं। इसलिए मानव को कभी भी, किसी से अपेक्षा नहीं करनी चाहिए। अपेक्षा व इच्छाएं दु:खों का मूल कारण हैं। दूसरे शब्दों में सुख का लालच व उनके खो जाने की आशंका में डूबा मानव सदैव संशय की स्थिति में रहता है, जिससे उबर पाना मानव के वश में नहीं होता। सो! ज़िंदगी एक सफ़र है, जहां हर दिन नए क़िरदारों से मुलाकात होती है, नए साथी मिलते हैं; जो कुछ समय साथ रहते हैं और उसके पश्चात् बीच राह छोड़ कर चल देते हैं। कई बार मोह-वश हम उनकी जुदाई की आशंका को महसूस कर हैरान- परेशान व उद्वेलित हो उठते हैं और निराशा के भंवर में डूबते-उतराते, हिचकोले खाते रह जाते हैं, जो सर्वथा अनुचित है।

इंसान मिट्टी का खिलौना है..पानी के बुलबुले के  समान उसका अस्तित्व क्षणिक है, जो पल-भर में नष्ट हो जाने वाला है। बुलबुला जल से उपजता है और पुन: जल में समा जाता है। उसी प्रकार मनुष्य का जीवन भी पंच-तत्वों से निर्मित है, जो अंत में उनमें ही विलीन हो जाता है। अक्सर परिवार-जन व संबंधी हमारे जीवन में हलचल उत्पन्न करते हैं, उद्वेलित करते हैं और वास्तव में वे समय-समय पर आने वाले भूकंप की भांति हैं, जो ज्वालामुखी के लावे की भांति समय-समय पर फूटते रहते हैं और कुछ समय पश्चात् शांत हो जाते हैं। परंतु कई बार मानव इन विषम परिस्थितियों में विचलित हो जाता है और स्वयं को कोसने लगता है, जो अनुचित है, क्योंकि समय सदैव एक-सा नहीं रहता। समय के साथ-साथ प्रकृति में परिवर्तन होते रहते हैं। इसलिए हमें हर परिस्थिति को जीवन में सहर्ष स्वीकारना चाहिए।

आइए! इन असामान्य परिस्थितियों की विवेचना करें… यह तीन प्रकार की होती हैं। प्राकृतिक आपदाएं व जन्म-जात संबंध..जिन पर मानव का वश नहीं होता। उन्हें स्वीकारने में ही मानव का हित होता है, क्योंकि उन्हें बदलना संभव नहीं होता। दूसरी हैं– मानवीय आपदाएं, जो हमारे परिवार-जन व संबंधियों के रूप में हमारे जीवन में पदार्पण करती हैं, भले ही वे स्वयं को हमारा हितैषी कहते हैं। उन्हें हम सुधार सकते हैं, उनमें परिवर्तन ला सकते हैं… जैसे क्रोधित व्यक्ति से कन्नी काट लेना; प्रतिक्रिया देने की अपेक्षा उस स्थान को छोड़ देना; आक्षेप सत्य होने पर भी स्पष्टीकरण न देना आदि…क्योंकि क्षणिक आवेग, संचारी भावों की भांति पलक झपकते विलीन हो जाते हैं और निराशा रूपी बादल छँट जाते हैं। तीसरी आपदाओं के अंतर्गत सचेत रह कर उन परिस्थितियों व आपदाओं का सामना करना अर्थात् कोई अन्य समाधान निकाल कर दूसरों के अनुभव से सीख लेकर, उनका सहर्ष सामना करना। इस प्रकार हम अप्रत्याशित हादसों को रोक सकते हैं।

आइए! ज़िंदगी के सफ़र को सुहाना बनाने का प्रयास करें। ज़िंदगी की ऊहापोह से ऊपर उठ कर सुक़ून पाएं और हर परिस्थिति में सम रहें। सामंजस्यता ही जीवन है। परेशानियां आती हैं; जीवन में उथल-पुथल मचाती हैं और कुछ समय पश्चात् स्वयंमेव शांत हो जाती हैं; समाप्त हो जाती हैं। इसलिए इनसे भयभीत व त्रस्त होकर निराशा का दामन कभी नहीं थामना चाहिए। यदि हम में सामर्थ्य है, तो हमें उनका डट कर सामना करना चाहिए। यदि हम स्वयं को विषम परिस्थितियों का सामना करने में अक्षम पाते हैं, तो हमें अपना रास्ता बदल लेना चाहिए और उनसे अकारण सींग नहीं लड़ाने चाहियें।

आप सोते हुए मनुष्य को तो जगा सकते हैं, परंतु जागते हुए को जगाना सम्भव नहीं है। उसे सत्य से अवगत कराने का प्रयास, तो भैंस के सम्मुख बीन बजाने जैसा होगा। इस परिस्थिति में अपना रास्ता बदल लेना ही कारग़र उपाय है। सो! जो भी आपके पास है, उसे संजोकर रखिए। जो अपना नहीं है, कभी मिलेगा नहीं …यदि मिल भी गया, तो टिकेगा नहीं और जो भाग्य में है, वह अवश्य मिल कर रहेगा। इसलिए मानव को किसी वस्तु या प्रिय-जन के खो जाने की आशंका से स्वयं को विमुक्त कर अपना जीवन बसर करना चाहिए…’न किसी के मिलने की खुशी, न उससे बिछुड़ने अथवा खो जाने के भय व ग़म, अर्थात् हमें अपने मन को ग़ुलाम बना कर नहीं रखना चाहिए और न ही उसके अभाव में विचलित होना चाहिए।’ यह अलौकिक आनंद की स्थिति मानव को समरसता प्रदान करती है।

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ दो कविताएं ☆ श्री हरभगवान चावला ☆

श्री हरभगवान चावला

(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री हरभगवान चावला जी की अब तक पांच कविता संग्रह प्रकाशित। कई स्तरीय पत्र पत्रिकाओं  में रचनाएँ प्रकाशित। कथादेश द्वारा  लघुकथा एवं कहानी के लिए पुरस्कृत । हरियाणा साहित्य अकादमी द्वारा श्रेष्ठ कृति सम्मान। प्राचार्य पद से सेवानिवृत्ति के पश्चात स्वतंत्र लेखन।) 

आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण एवं विचारणीय कविताएं – दो कविताएं)

☆ कविता ☆ कविताएं ☆ श्री हरभगवान चावला ☆

☆ – एक – लिपि और कविता

जहाँ लिपि नहीं होती

वहाँ भी कविता होती है

उस भाषा की कविता से

कहीं बेहतर, कहीं अर्थपूर्ण

जिसके पास समृद्ध लिपि है

कविता लिपि से नहीं

जीवन से संभव होती है।

☆ – दो – कविता की जगह  ☆

सभ्यता में जब नहीं रहती

कविता की कोई जगह

मौत प्रवेश कर जाती है

चुपके से

सभ्यता की देह में

प्रेत की तरह।

©  हरभगवान चावला

सम्पर्क – 406, सेक्टर-20, हुडा,  सिरसा- 125055 (हरियाणा) फोन : 9354545440

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – मैं ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – मैं ??

मैं जो हूँ,

मैं जो नहीं हूँ,

इस होने और

न होने के बीच ही

मैं कहीं हूँ..!

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 आपदां अपहर्तारं साधना श्रीरामनवमी अर्थात 30 मार्च को संपन्न हुई। अगली साधना की जानकारी शीघ्र सूचित की जावेगी ।💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ “रामनवमी – एक आत्मीय पत्र…” ☆ डॉक्टर मीना श्रीवास्तव ☆

डॉक्टर मीना श्रीवास्तव

☆ आलेख ☆ “रामनवमी – एक आत्मीय पत्र…” ☆ डॉक्टर मीना श्रीवास्तव ☆

प्रिय पाठकगण,

आप सबको मेरा सादर प्रणिपात!

रामनवमी के इस मंगलमय पर्व के अवसर पर आप सबको अनेकानेक शुभकामनाएं!

‘चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती,

दोन प्रहरी कां ग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखी राम जन्मला’

(अर्थात, चैत्र महीने की नवमी तिथी है, सुगन्धित परन्तु गर्म हवा बह रही है, ऐसे में दूसरे प्रहर को सूर्य माथेपर आकर क्यों रुका है? क्योंकि राम का जन्म हुआ है!)

प्रतिभासम्पन्न कवि ग दि माडगूळकर द्वारा रचे हुए और महान संगीतकार और गायक सुधीर फडके द्वारा गाये हुए ‘गीतरामायण’ के इस इस चिरंतन रामजन्म के गीत का एक एक शब्द चैत्र महीने के नवोल्लास को लेकर प्रकट हुआ है ऐसा लगता है| गुड़ीपाडवा को नववर्ष का जन्म हुआ, तथा पृथ्वी को प्रतीक्षा थी रामजन्म की| नूतन वासंतिक पल्लवी का गुलाबी महीन वस्त्र पहनकर तथा अभी अभी अंकुरित पीतवर्ण सुगन्धित आम्रमंजरी के गजरोंसे सजकर वह तैयार हुई| धुप में खेलकर बालकों के अंग जिस तरह लाल होते हैं वैसे ही उष्ण समीर के झोंके आज जाकर सूर्य का प्रदीप्त साथ पाकर तप्त हुए हैं| उनके कानों तक एक सुन्दर वार्ता पहुंची और वे तत्काल निकल पडे मनू द्वारा निर्मित अयोध्या नगरी को|

मोक्षदायिनी सप्तपुरियों में प्रथम पुरी (नगरी) यानि अयोध्या! सरयू नदी के किनारे पर बसी यह स्वर्ग से सुन्दर नगरी| अब यहाँ आनन्द की कोई सीमा नहीं है| सारे सुखों के आगार रही इस नगर में बस एक अभाव था, महाराज दशरथ पुत्रसुख से वंचित थे| परन्तु अब यह दुःख समाप्ति के मार्ग पर है| दशरथ की तीनों रानियां गर्भवती हैं और अब समय आ गया है उनकी अपत्य प्राप्ति का. यह उत्सुकता अब चरम सीमा पर पहुँच गयी है| प्रकृति भी इस उत्सुकता में शामिल हो गई है| पेडों पर कोमल कोंपल खिले हैं| बसंत ऋतु की बहार कोने कोने में दृष्टिगत हो रही है, तथा नदियोंका हृदय आनंद से अभिभूत हो रहा था| उनके पात्र प्रसन्नता से पूर्ण हो कर बह रहे थे| मर्यादापुरुषोत्तम का जन्म होगा, केवल इसी विचार से उन्होंने अपनी मर्यादा पार नहीं की थी| अयोध्या वासियोंके मानों पिछले सात जन्मों के पुण्य एकत्रित होने से उज्वल हो उठे थे| श्रीराम के मधुरतम बाल्यकाल का वे अनुभव करने वाले थे| राजमहल में भागदौड़ और गडबड देखते ही बनती थी| राजस्त्रियाँ, दास दासियाँ, दाइयां तो बस तीनों महलोंमें से यहाँ वहां दौड़ रही हैं| महाराज दशरथ, उनके परम मित्र महामंत्री सुमंत, मंत्रीगण, इनको तो चिंता ने व्याकुल कर दिया है| सूर्य माथेपर आने लगा है, तीनों रानियों की प्रसव वेदनाएं चरम सीमा पर पहुंची हैं|

अब यहाँ सबके साथ सूर्यदेव भी तनिक ठहर गए हैं, अयोध्या के माथेपर| ‘सूर्यवंश की नयी पीढी का जन्म होने में बस थोडा सा अवधि बाकी है, अब रुक ही जाऊँ क्षणके लिए|’ ऐसा सोचकर सूर्य आसमान के मध्य में थम गया है| ‘अब उसे कितनी देर तक प्रतीक्षा करवाऊं? ले ही लूँ जन्म इस ठीक मध्यान्ह समयपर, यहीं वह समय और यहीं वह घडी’ यह विचार करते हुए कौसल्या के बालक ने जन्म लिया। फिर कैकेयी के भरत को कैसे धीरज होगा? उसे भी पुत्र हुआ| सुमित्रा के गोद में तो जुड़वाँ बालक थे, एक को राम के सेवा में तो दूसरे को भरत की सेवा में उपस्थित होना था| दो बडे भैया तो पहले ही जगत में आ चुके थे| सो अब समय गँवाना ठीक नहीं था| सुमित्रा के दोनों बालकों ने भी जन्म लिया| इन बालकों के जन्म के अवसर पर ग्रह और नक्षत्र मानों आप ही अत्युच्च स्थान पर विराजमान हो गए थे| इक्ष्वाकुकुलभूषण श्रीराम का वर्ण नीलकमल के समान था, उसके नेत्रकमल किंचित आरक्तवर्णी थे, हाथ थे ‘आजानुबाहू’ और स्वर दुन्दुभिसमान था|

दिन ब दिन बालक बडे हो रहे थे| राजा दशरथ, उसकी तीनों रानियाँ, दास दासियाँ और अयोध्या के जन, ये समस्त लोग रामलला के लाड प्यार करने में मगन हैं| इस सांवले सलोने बालक ने पहला कदम रखा, तो उसे देखने का दैवी परमानंद जिसने अनुभव किया, उसे स्वर्गसुख की प्राप्ति हुई, यहीं समझ लें| इस दृश्य का वर्णन करते हुए चारों वेद मूक हो गए, सरस्वती को तनिक भी शब्द सूझ नहीं रहे थे, शेषनाग अपने सहस्त्र मुखों से यह वर्णन नहीं कर पाया, परन्तु, तुलसीदास तो हैं श्रीराम के परम भक्त, उन्होंने रामप्रभु के मनोरम शैशव का ऐसा रसमय वर्णन किया है कि, मानों हम दशरथ महाराज के राजमहल का दृश्य देख रहे हैं इतना पारदर्शी है मित्रों! यह वर्णन यानि शब्द तथा अर्थ का मधुशर्करा ऐसा मधुर योग! श्रीरामचंद्र के गिरते उठते शिशु चरण, उनके शरीर पर लगी धूल पोंछती रानियां, उनके पैंजनियों की झंकार और नासिका में हिलती डुलती लटकन! रामजी के इस शैशव रूप पर सब बलिहारी हैं|

“ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजनियां,

किलकि-किलकि उठत धाय, गिरत भूमि लटपटाय,

धाय मात गोद लेत, दशरथ की रनियां |

अंचल रज अंग झारि, विविध भांति सो दुलारि,

तन मन धन वारि-वारि, कहत मृदु बचनियां |

विद्रुम से अरुण अधर, बोलत मुख मधुर-मधुर,

सुभग नासिका में चारु, लटकत लटकनियां |

तुलसीदास अति आनंद, देख के मुखारविंद,

रघुवर छबि के समान, रघुवर छबि बनियां |”

मित्रों, आइए, आज के परमपवित्र दिन रामजन्म का आनंद पूरी तरह मनाऐं! 

‘मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सु दसरथ अचर बिहारी

राम सिया राम सिया राम जय जय राम!’

पाठकों, अगली बार हमारी भेंट होगी परम पवित्र अयोध्या पुरी में!

डॉक्टर मीना श्रीवास्तव

दिनांक – ३० मार्च २०२३

फोन नंबर: ९९२०१६७२११

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares