मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी… लेखिका – सुश्री प्राची पेंडसे ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी… लेखिका – सुश्री प्राची पेंडसे ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆ 

सरला स्मशानातील एका कोपर्‍यात असलेल्या बाकावर बसून हे सर्व पाहात होती. खरंतर खानापूर सारख्या छोट्याशा खेड्यात हे प्रथमच घडत होते. ती मोठ्या हट्टाने कोणाचे न ऐकता इकडे आली होती. तिला शेवटपर्यंत “श्री” ला सोबत करायची होती.

सरणावर लाकडे रचली. त्यावर फुलांनी सजवलेला श्री चा निष्प्राण देह ठेवला. भटजींनी मंत्रघोष म्हटल्यावर राघवने चितेला अग्नी दिला. चितेच्या ज्वाळा जशा आकाशाला भिडू पाहात होत्या, तसतसे सरला आणि श्री मधील ऋणानुबंधाचे धागे तटातटा तुटत होते. आतून पार मोडून गेलेली ती तशीच निश्चल बसून होती. एका नव्हे तर दोन जन्मांचे ऋणानुबंध होते ते..

सगळे सोपस्कार पूर्ण करून राघव आणि सुदीप तिच्यापाशी आले. सुदीप म्हणाला, “चल काकू, तू सगळे निभावलेस. आता आपण मुंबईला परत जाऊ.” त्यावर राघव म्हणाला, “असं कसं काकू, आधी तुम्ही घरी चला.”

क्षणभर विचार करून सरला सुदीपला म्हणाली, “मी काय म्हणते, ईथवर साथ दिलीच तर दिवसवार करूनच परत फिरेन. तू घरी परत जा. पण दिवसांना मात्र ये हो.”

मोठ्या जड अंतःकरणाने माझा निरोप घेऊन सुदीप ‘दिवसांना येतो’ म्हणून सांगून परत फिरला..

धूळ ऊडवित त्याची गाडी गेली त्याच दिशेने बघत सरलाचे मनही पार भूतकाळात गेले.

त्या काळानुसार अगदी बघून सवरून सरला आणि श्री चे लग्न ठरले. सरला पेठेची सौ. सरला श्रीधर सहस्रबुद्धे झाली. सरला फिजिक्स ची प्रोफेसर तर श्री चार्टर्ड अकाऊंटंट. कोणालाही हेवा वाटावा अशी जोडी.

तसे म्हणायला गेले तर एकत्र पण सगळे शेजारी शेजारीच राहात. त्यांची शिवाजीपार्क ला स्वतःची पिढीजात बिल्डिंग होती.. सगळं चांगलंच होतं. पण काहीतरी कमी असल्याशिवाय माणसाला वरच्याची कशी आठवण राहाणार? लग्नाला खूप वर्ष झाली तरी त्यांची संसारवेल फुलली नव्हती. पण तरीही खाली वर भाचे पुतणे जीवाला जीव देणारे होते. ‘सुदीप’ हा तर सगळ्यात आवडता पुतण्या..

चाके लावल्यागत दिवस पळत होते. दोघांचीही रिटायरमेंट जवळ येत होती आणि अचानक करकचून ब्रेक लागावा तसेच झाले. एका छोट्याच अपघाताचे निमित्त झाले आणि श्री ची शुद्धच हरपली. सेमी कोमाची स्टेज.. सर्व डाॅक्टरी तपासण्या झाल्या. सर्व व्यवहार थांबले होते पण ब्रेन डेड नव्हता. एक क्लाॅट होता..

सरलाने कंबर कसली.. मदतीला आणि श्री चे करायला एक अर्धा दिवस माणूस ठेवला. तिची रोजची सगुणा होतीच, शिवाय जाऊन येऊन मुलं असायचीच. सुदीपचा खूप मोठा आधार वाटायचा तिला.

श्री चे सगळे ती करायची. त्याच्या आवडीचे पदार्थ बनवून नळीद्वारे खाऊ घालायची. सगळे घडलेले त्याच्याशी बोलायची. स्वतःचे आयुष्य त्याच्याशीच बांधून घेतले. दुसरे विश्व नाही. त्याला यातून बाहेर काढणार हाच आत्मविश्वास आणि आत्मनिर्धार..

सहा महिने झाले.. आणि एक दिवस रस्त्यावर काहीतरी झाले. कानठळ्या बसतील असा मोठा आवाज झाला.. आणि त्या आवाजाने की आणखी कशाने कोण जाणे, श्री झोपेतून जागे व्हावे तसा जागा झाला. सरलाचा आनंद गगनात मावत नव्हता. पण तो क्षणिकच ठरला.

श्री डोळे ऊघडून सगळेच अनोळखी असल्यागत पाहात होता. ओरडत होता.. पण त्यातले अक्षरही सरलाला कळत नव्हते.

“ना यल्ले इद्रत्ती ? ना यल्ले ईद्रत्ती ?”

आवाज ऐकून आमची सगुणा धावत आली.. आणि एकदम म्हणाली, “अय्यो, साहेब कानडीतून विचारत आहेत, ‘मी कुठे आहे?मी कुठे आहे?”

सरलाने तर तिला वेड्यातच काढले. त्याचा आणि कानडीचा काडीमात्र संबंध नव्हता.. पण गडबड खासच होती.

सरलाला, सुदीपला किंवा कोणालाच श्री ओळखत नव्हता. जसा काही तो इथला कधी नव्हताच. सगुणा कानडी होती म्हणून तिला समजले तरी..

मी एक प्रयोग म्हणून तिला त्याच्याशी बोलायला सांगितले.. तर तो खूष होऊन आपणहून बोलू लागला.. नन्ने होसरू रामभट्ट (माझे नाव रामभटजी आहे.) अर्धांगिनी हेसरू जानकी (बायकोचे नाव जानकी) इवनु नम्म् मगा राघव (मुलाचे नाव राघव) नावु खानापूर दाग भटगल्ली (खानापूरच्या भटगल्लीत घर). सगुणा आमची दुभाषी बनली.

माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली होती.. त्याच्याशी आमचा ओळखदेख असा काही संबंधच नव्हता.. त्याची काळजी आम्ही घेत होतोच, नाईलाजास्तव तो ही बिनबोलता करून घेत होता. सगुणा आली की एकच धोशा तिच्याकडे करायचा की ‘मला घरी नेऊन सोड’. ती ही बिचारी त्याची कशीबशी समजून काढायची..

प्युअर सायन्स ची प्रोफेसर मी हतबल होऊन जो कोणी काही सांगेल ते ऊपाय करायला लागले होते. बाहेरची बाधा काय, भूत पिशाच्च काय आणि काय काय.

शेवटी एकदा सगुणा च्या आणि सुदीपच्या डोक्यात आले की तो जो पत्ता सांगतोय तिकडे तरी एकदा जाऊन पाहावे.

मी आणि सुदीप शोध घेत थेट कर्नाटकातील धारवाड जवळील खानापूरला भटगल्लीत जाऊन थडकलो.. राघवची चौकशी केली. त्याच्या घरी पोचलो तर धरणी या क्षणी मला पोटात घेईल तर बरे असे मला झाले.

त्यांचा मोठा वाडा होता. बाहेरच्या ओटीवरच पंचेचाळीशीच्या श्री चा फोटो टांगलेला होता. शेजारचा फोटो जानकी वहिनींचा होता.. राघवकडे अधिक चौकशी करता कळले की तो पंधराच्या आसपास असताना त्याचे वडील रामभटजी, जे दशग्रंथी ब्राह्मण होते, ते गेले आणि वर्षभरातच आई गेली.

आम्ही त्याला आत्ताचा श्री चा फोटो दाखवला. तेव्हा त्याने तो चट्कन ओळखला.. बापरे कधी कुठे घडलेले ऐकले नव्हते ते आम्ही याची देही याची डोळा अनुभवत होतो. हा श्री अपघातानंतर थेट आपल्या पहिल्या जन्मात जाऊन पोचला होता..

पुढे काय, मोठ्ठे प्रश्नचिन्ह ऊभे होते. राघव आणि त्याची बायको राधा खूपच सालस होते.. त्यानेच एक ऊपाय सुचवला. “जे झाले ते अजबच आहे. केमिकल लोच्या म्हणूया हवंतर. आमच्या वाड्यात एक घर (खोली) आहे. त्यांना अशा अवस्थेत अधिक त्रास न देता काही दिवस तुम्ही येऊन राहा. पुढचं पुढे पाहू”.

या विचित्र परिस्थितीत अन्य काही मार्गच नव्हता. राघव आणि सुदीपच्या मदतीने आमचे बस्तान आम्ही थेट खानापूरला हलवले.. दैवगती ने आम्हाला कुठून कुठे आणून सोडले होते.. सुरवातीला काही दिवस सगुणाही आमच्यासोबत राहिली. तिच्याकडून मी कितीतरी कानडी शब्द शिकले..

हाच का तो श्री हेच कळत नव्हते. जेमतेम रामरक्षा येणारा श्री स्त्रीसुक्त, पुरुषसूक्त आणि कित्येक संस्कृत श्लोक मुखोद्गत म्हणायचा. एक मात्र होते, सर्वांनाच सांगायचा “ई अम्मा बहळ ओल्ले. यवरू नन्न बहळ छंद सेवा माडतारे.. (म्हणजेच ‘या बाई (मी) माझी चांगलीच काळजी घेतात..) चला एवढी त्या जन्मातली पोचपावती या जन्मातही मिळाली होती.. जन्मोजन्मीचा ऋणानुबंध ….

राघवला आपले वडील आणि राधाला आपले सासरे मिळाल्याचा आनंद होता.. गावातले जुने जाणतेही लोक श्री ला की त्यांच्या रामभटजीःना येऊन गप्पा मारून जात. विशेष म्हणजे हे या जन्माचे गेल्या जन्मातले आक्रित सर्वांनीच स्वीकारले होते. कारण संशयाला कुठे जागाच नव्हती. अगदी बारीक सारीक तपशिलासह सर्व संदर्भ जसेच्या तसेच होते..

साधारण सहा महिन्यात आम्ही पूर्ण खानापूरवासी झालो. अगदी क्षुल्लक आजाराचे निमित्त होऊन राघवाच्या मांडीवर त्याने शेवटचा

श्वास घेतला. योगायोगाची गोष्ट ही की नेमका सुदीपही जवळ हजर होता. जबरदस्त ऋणानुबंध. …

“काकू, गरम चहा केलाय. थोडा घ्या. बरं वाटेल.” सरला भानावर आली. वर्तमानात आली.. समोर राघव होता. “आता तुम्ही ईथेच राहायचे..”

याला काय म्हणायचे???जन्मोजन्मीचे ऋणानुबंध…….. या ऋणानुबंधाची साधी नव्हे तर बसलेली घट्ट निरगाठ अशी सुटली होती.. देवाची आणि दैवाची लीला अगाध होती…

लेखिका –  सुश्री प्राची पेंडसे

मो 9820330014

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ जटायू शौर्यम् स्तोत्र ॥ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

॥ जटायू शौर्यम् स्तोत्र ॥ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

 ☆मराठी भावानुवाद – रामायणम् अरण्यकांड : आदिकवी वाल्मिकी

सा गृहीता विचुक्रोश रावणेन यशस्स्विनी।

रामेति सीता दुःखार्ता रामं दूरगतंवने ।।१।। 

हरण करता दशाननाने प्रख्यात जानकी सीतेचे

दुःख आर्त ती साद घातते दूर वनीच्या रामाते |। १ |]

सा तदा करुणा वाचो विलपन्ती सुदु:खिता ।

वनस्पतिगतं गृध्रं ददर्शायतलोचना ॥२॥

रडताना कारुण्याने विशालाक्षी दुःखी सीतेने

वृक्षस्थ पहिले गृधराजाला अश्रू भरल्या नजरेने ||२||

जटायो ! पश्य मामार्य !ह्रियमाणामनाथवत् ।

अनेन राक्षसेन्द्रेण करुणं पापकर्मणा ।।३॥

आर्य गृधेन्द्रा जटायू, पाही कारुण्याच्या दृष्टीने 

कष्टी अनाथ सीतेला पळवून आणिले दशानने ||३||

तं शब्दमवसुप्तस्तु जटायुरथ शुश्रुवे ।

निरीक्ष्य रावणं क्षिप्रं वैदेहीं च ददर्श स: ॥४॥

निद्रिस्त जटायू कानी पडता आर्त बोल ते दुःखाचे

नेत्र उघडता दर्शन झाले दशाननाचे वैदेहीचे ||४||

तत: पर्वतशृङ्गाभस्तीक्ष्णतुण्ड: खगोत्तम: ।

वनस्पतिगत: श्रीमान् व्याजहार शुभां गिरम् ॥५॥

नग शिखरासम तीक्ष्ण चोच ती देई शोभा ज्याला

श्रेष्ठ खगेंद्र जटायू गृध सुंदर वाणी वदिता झाला  ||५||

निवर्तय मतिं नीचां परदाराभिमर्शनात् ।

न तत्समाचरेद्धीरो यत्परोऽस्य विगर्हयेत् ॥६॥

परनिंदेचे कारण ऐसे धैर्यवीरा तू न आचरी 

परदारेच्या अभिलाषेची नीच बुद्धी ना मनी धरी ||६ |।

वृद्धोऽहं त्वं युवा धन्वी सरथ: कवची शरी |

न चाप्यादाय कुशली वैदेहीं मे गमिष्यसि ॥७॥

कवचसिद्ध  चापबाण घेउनी रथारूढ तू जरी 

सीताहरणापासुनी तुजला रोखीन वृद्ध जरी ||७||

तस्य तीक्ष्णनखाभ्यां तु चरणाभ्यां महाबल: ।

चकार बहुधा गात्रे व्रणान् पतगसत्तम: ॥८॥

द्विजश्रेष्ठ त्या गृधराजाने महाबली पक्षाने

रावण देहा जर्जर केले तीक्ष्ण नखांनी पायाने ||८||

ततोऽस्य सशरं चापं मुक्तामणिविभूषितम् ।

चरणाभ्यां महातेजा बभञ्जास्य महद्धनु |।९|।

तेजोमय मग  जटायुने मौक्तिकरत्नांच्या  शस्त्रांना  

चापबाण भंगून  लीलया केले जर्जर दशानना ॥९॥

ततः क्रोधाद्दशग्रीवो गृध्रराजमपोथयत् |

पक्षौ पार्श्वौ च पादौ च खड्गमुद्धृत्य सोच्छिनत् ||१०||

क्रोधित होऊनी चढाई केली जटायूवरी दशग्रीवाने 

उभय पंख अन् चरण छाटले तीक्ष्ण अशा तलवारीने ||१०|| 

स छिन्नपक्षः सहसा रक्षसा रौद्रकर्मणा । 

निपपात हतो गृध्रो धरण्यामल्पजीवितः ॥११॥ 

दुष्ट राक्षसे पंख कापता पक्षीराज झाला छिन्न  

कोसळला झणी धरणीवरती होऊनिया मरणासन्न ||११||

स भग्नधन्वा विरथो हताश्वो हतसारथि: ।

अङ्केनादाय वैदेहीं पपात भुवि रावण: ॥१२॥

भग्न चाप रथ विहीन रावण अश्व सारथी मृत ज्याचे

सीतेसह भूमीवर पडला त्राण जाउनी देहाचे  ||१२||

संपरिष्वज्य वैदेहीं वामेनाङ्केन रावण: ।

तलेनाभिजघानाशु जटायुं क्रोधमूर्च्छित: ॥१३॥

संतापाने धरून जानकी मुठीनेच तलवारीच्या

अखेरचा तो घाव घातला मुर्च्छित देही जटायुच्या  ||१३||

जटायुस्तमतिक्रम्य तुण्डेनास्य खगाधिप: ।

वामबाहून् दश तदा व्यपाहरदरिन्दम: ॥१४॥

वाम भुजांवर हल्ला करुनी अरिभंजक निज चोचीने

जर्जर केले दशबाहूंना दशाननाच्या त्वेषाने ||१४||

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ …मी  मध्यम वर्गीय… – लेखिका – सुश्री नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ …मी  मध्यम वर्गीय… – लेखिका – सुश्री नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

” नेहा, मी  आज दुपारी दादरला जाऊन येणारे. ” 

माझं  वाक्य पूर्ण व्हायच्या  आत नेहा म्हणाली, “आई, ओला,  उबेर किंवा टॅक्सीने  जा हं .. “

सोफ्यावर पेपर  वाचत बसलेला नवरा हसून  लगेच  म्हणाला. 

” नेहा,  ती मध्यम वर्गीय आहे. ती  ट्रेन किंवा बसनेच जाणार”

” अरे, साठी उलटून गेली तरी ट्रेन, बसने फिरू शकते  याचं  खरं  तर कौतुक करायला हवं  तुम्ही. माझी काटकसर  कसली बघता. ” मी  पण हसण्यावारी  नेलं  ते . 

” काहीतरी खायला करून ठेवीन. म्हणजे अथर्व शाळेतून आल्यावर  त्याची पंचाईत नको व्हायला. “

” आई, अहो  एक दिवस आणेल की काहीतरी पार्सल.. बाबाही  enjoy करतील. Burger किंवा  वडापाव पाव. “

” नेहा, अबब  एवढाले  पैसे  खर्च करायचे ते junk फूड खायला ? तुझ्या मध्यमवर्गीय सासूला पटणार 

का ? “

नवऱ्याने  मला बोलायची संधी  नाहीच सोडली. 

” बरं  चालेल “असं  म्हणून मी  विषय संपवला. मुलगा  त्याच्या बेडरूम मधे अजूनही लॅपटॉपवर  काम करत होता.

” सुजीत, आज ऑफिसला नाही जायचं का ? “

” अगं आज गाडी गॅरेजमध्ये दिलीय. कुठे ते टॅक्सी शोधत  बसा. “वर्क फ्रॉम होम “करतोय. by the  way तू आज दादरला कशासाठी जातेयस? .” – आता याला का जातेय हे सांगितलं  तर परत माझ्या  मध्यम वर्गाचा  उद्धार  होईल. म्हणून मी  ” काम आहे जरा ” एवढं  मोघम उत्तर दिलं.

पूर्वीच्या आमच्या दादरच्या घराशेजारी, मालतीकाकू घराला हातभार लावायला त्यांच्या  भावाने कोकणातून पाठवलेले पदार्थ  विकतात. दुकानातून  घ्यायचं  तर मी त्यांच्याकडे जाऊन आणते. तेवढीच त्या भावंडाना मदत. पण हे आमच्या घरच्यांच्या पचनी पडणं  जरा कठीणच. म्हणून मी  सुजीतला काही बोलले नाही..

दुपारी गर्दीची वेळ टळून गेल्यामुळे आरामात ट्रेनने दादर ला गेले. इकडची तिकडची विचारपूस केली.   गप्पा टप्पा केल्या. आणि चहा पिऊन बस स्टॉपवर आले. 

याच्यासाठी घे, त्याच्यासाठी  घे (टिपिकल मध्यम वर्गीय !!!) असं करताना सामान अंमळ  जडच  झालं. 

कष्ट उपसायचेच  असा काही हव्यास नव्हता माझा. मी टॅक्सी करायचं ठरवलं

स्टॉपवर उभ्या असलेल्या दोघी तिघीना  नकळत विचारलं, ” पार्ल्यापर्यंत जातेय. कोणाला वाटेत सोडू का ?  “

“टिपिकल मध्यमवर्गीय “– हा मीच  मला taunt  मारला बरं का. अरे एवीतेवी  दोनशे रुपये खर्चच  करायचे तर एकटीसाठी कशाला.. नाही का .. ! माझं मलाच हसू आलं. घरी जर  हे सांगितलं  तर 

सुजीतचा तर स्फोटच  होईल. माझं  फुटकळ  समाजकार्य  कसं  अंगलट  येऊ शकतं  याच्यावर  हिरीरीने चर्चा होईल—  ” काळ  बदललाय,  पण तरीही सतत अविश्वासाचे  चष्मे घालून का रे वावरता ?  चांगुलपणा अजूनही येतो अनुभवायला. ” — हे माझं  म्हणणं  मोडीत काढलं  जाईल  किंवा मध्यम वर्गीय विचारात त्याची गणना  होईल हे मला माहित होतं . 

मी  घरी आले तर मस्त MacD च्या पार्सलवर तिघांनी ताव मारल्याची वर्दी ओट्यावरच्या  पसाऱ्याने  दिली… सवयीनुसार  take away चे  कंटेनर  धुऊन  पुसुन   कपाटात ठेवले. कामवाल्या  बाईंना , मावशींना, पदार्थ घालून द्यायला उपयोगी  पडतात. , ” टिपिकल  मध्यमवर्गीय ” वागणं. !!! “

सोफ्यावर जराशी टेकले. आणि मनात विचार आला —- 

“मध्यमवर्ग ” हा  स्तर जरी  ‘ पैशाची आवक ‘ यावरून  पडला असेल तरी मध्यमवर्गीयांचे  विचार,  वागणूक,  संस्कार  यात खूप श्रीमंती आहे. आज पैशाची थोडी उब मिळाली,  सुबत्ता आली म्हणून हे संस्कार पाळायचे नाहीत हे कितपत  योग्य आहे.? — चालत जाता येण्यासारखं  अंतर असेल , किंवा बस ट्रेननी  जाणं  सोयीचं  असेल, तर परवडतंय  म्हणून टॅक्सीने जाणं  जर मला चैन वाटत  असेल तर त्यात  मध्यमवर्ग  कुठे आला.? काटकसर कुठे आली? पैशाची नाहक उधळमाधळ  नको ह्या  संस्काराची  जपणूक आहे यात. —-

सहजपणे  कोणाला  मदत करणं, वस्तू जपून वापरणं, आपुलकीने  कोणाशी  वागणं, गरजा मर्यादित  ठेवणं, उच्च  राहणीमान  ठेवूनही  दिखाऊपणा न  करणं — या वागण्याचा संबंध आजची पिढी पैशाशी  का जोडू पहाते ? हे वागणं  टिपिकल  मध्यमवर्गीय  म्हणून त्याची खिल्ली का उडवते ?– हे आकलनाच्या पलीकडे आहे आणि न पटणारे आहे. आजकालच्या  आत्मकेंद्रित  पिढीला या कशातही रस  वाटत नाही .  

एकमेकांच्या  संपर्कात  राहणं, जुडलेलं  राहणं, “थेट ” भेटणं,  हे  मध्यमवर्गीय  का वाटावं  या पिढीला? . “आई, आजकाल असं  नाही आवडत  लोकांना. त्यांना त्यांची अशी space  हवी असते ” असं  म्हणत आपसातलं अंतर वाढवणं हे ‘उच्चभ्रू ‘??  

माझ्या मध्यम वर्गीय विचारात न बसणारं आहे हे !!!  आपल्याला हवं  तसं  वागायची  मोकळीक आहे ना आपल्याला…..  मग मनातल्या मनात तरी कशाला चर्चा करायची…. ‘ मी  मध्यमवर्गीय आहे ‘  याचा मला  अभिमान आहे ना….  मग झालं की !! 

— असं  म्हणून मी सगळ्यांसाठी फक्कड चहा करायला स्वयंपाक घरात  घुसले. 

लेखिका : नीलिमा जोशी

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मला आवडलेली बोधकथा… भाग -2 ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? वाचताना वेचलेले ?

मला आवडलेली बोधकथा… भाग -2 ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

(आणि मला विचारून एका पाकिटावर माझे नाव टाकले, आणि दुसऱ्यावर माझ्या पत्नीचे. माझ्या हातात ते सुपूर्द करून औषधी घेण्याची विधी आपण समजावलीत.” )

इथून पुढे —

“मी ताबडतोब ती औषधी घेतली. कारण त्याच्यामागे फक्त आपल्याला काही पैसे देणे हा उद्देश होता. परंतु आपण पैसे घेण्याला नकार दिला. ‘बस, ठीक आहे’ म्हणालात. जेव्हा मी आग्रह केला तेव्हा आपण म्हणालात की ‘ आजचे खाते बंद झाले आहे.’  मला काहीच समजले नाही. परंतू  या दरम्यान आपल्याकडे एक व्यक्ती आला. त्याने आपली चर्चा ऐकून मला सांगितले की, “ आजचे खाते बंद झाले म्हणजे वैद्य महाराजांना आजच्या दिवसाची घरेलू खर्चासाठी लागणारी राशी, जी त्यांनी भगवंताला मागितली होती, तेवढी भगवंताने त्यांना रोग्यांमार्फत दिली आहे. त्याशिवाय ते अधिक पैसे कुणाकडूनही घेत नाही. “ 

मी काहीसा परेशान झालो कारण मी माझ्या मनानेच लज्जित झालो. माझे विचार किती निम्न होते आणि हा सरलचित्त वैद्य किती महान आहे. मी जेव्हा घरी जाऊन पत्नीला औषधि दाखवली आणि सारा प्रसंग तिच्यासमोर उभा केला तेव्हा तिला भगवतदर्शनाचा आनंद झाला, तिच्या डोळ्यातून पाणी आले, मन भरून आले, आणि ती म्हणाली “ ते वैद्य म्हणजे कुणी व्यक्ती-माणूस नसून माझ्यासाठी तो देवतारूप माध्यम बनून आला आहे. आजवर एवढी सारी औषधी घेतली, एवढे वैद्य, हकीम, डॉक्टर झाले, आज मला माझ्या मनीची इच्छा पूर्ण करणारा भगवंत या वैद्याच्या रूपाने, या औषधी स्वरूपाने भेटला आहे. हे औषध माझ्या संततीसुखाचे कारण आहे, आपण दोघेही श्रद्धेने हे औषध घेऊ यात. “

कृष्णलाल वैद्याला पुढे सांगू लागला, “ आज माझ्या घरी दोन फूले उमलली आहेत. आम्ही दोघे पति-पत्नी हरघडीला आपल्यासाठी प्रार्थना करत असतो. इतक्या वर्षात व्यवसायामुळे मला वेळच मिळत नव्हता की  स्वतः येऊन आपल्याला धन्यवादाचे  दोन शब्द बोलावे म्हणून. इतक्या वर्षांनी आज भारतात आलो आहे आणि कार केवळ आणि मुद्दाम इथेच थांबवली आहे.” 

“ वैद्यजी आमचा सारा परिवार इंग्लंडमध्ये सेटल झाला आहे. केवळ माझी एक विधवा बहीण आणि तिची मुलगी इथे भारतात असते. आमच्या त्या भाच्चीचे लग्न या महिन्याच्या २१ तारखेला होणार आहे. का कोण जाणे जेव्हा-जेव्हा मी आपल्या भाच्चीसाठी काही सामान खरेदी केले तेव्हा माझ्या डोळ्यासमोर आपली ती छोटीशी मुलगी यायची, आणि मग प्रत्येक सामान मी डबल खरेदी करायचो. मी आपल्या विचारांना, तत्वाला, मूल्यांना जाणत होतो, की संभवतः आपण हे सामान न घेवोत, परंतू असे वाटत होते की माझ्या सख्ख्या भाच्चीच्याबरोबर मला नेहमी जो चेहरा दिसत आहे, ती पण माझी भाच्चीच तर आहे. माझे तिच्याशी एक नाते त्या भगवंताने असे जोडले आहे, आणि म्हणून आपण त्या नात्याला नकार देणार नाही, कारण माझ्या भाच्चीबरोबर या भाच्चीचा ‘भात भरण्याची’ माझी ज़िम्मेदारी त्याने मला दिली आहे.”

वैद्याचे डोळे आश्चर्याने उघडेच्या उघडेच राहिले आणि सौम्य आवाजात म्हणाले, ” कृष्णलालजी, आपण जे काही म्हणत आहात ते मला काहीच समजेनासे झाले आहे, ईश्वराची काय माया आहे हे त्याचे तोच जाणे. आपण माझ्या ‘श्रीमती’च्या हाताने लिहिलेली ही चिठ्ठीबघा ” असे म्हणून वैद्यांनी ती चिठ्ठी कृष्णलालजींना दिली. —– तिथे उपस्थित सारे ती चिठ्ठी बघून हैराण झाले, कारण ” लग्नाचे सामान” याच्यासमोर लिहिले होते ”हे काम परमेश्वराचे आहे, त्याचे तोच जाणे “

कंपित आवाजात वैद्य म्हणतात, ” कृष्णलालजी, विश्वास करा की, आजपावेतो कधीही असे झाले नाही की  पत्नीने चिठ्ठीवर आवश्यकता लिहिली आहे आणि भगवंताने त्याची व्यवस्था केली नाही. आपण सांगितलेली  संपूर्ण हकीकत ऐकून असे वाटते की भगवंताला माहित होते की, कोणत्या दिवशी माझी श्रीमती काय लिहिणार आहे. अन्यथा आपल्याकडून इतक्या दिवस आधीपासून या सामान खरेदीचा आरंभ परमात्म्याने कसा करवून घेतला असता?–वाह रे भगवंता, तू महान आहेस, तू दयावान आहेस. मी खरंच हैराण आहे की, तो कसे आपले रंग दाखवतो आहे.”

चातकाची तहान किती | तृप्ति करूनि निववी क्षिती ||१||

धेनु वत्सातें वोरसे | घरीं दुभतें पुरवी जैसें ||२||

पक्कान्न सेवुं नेणती बाळें | माता मुखीं घालीं बळें ||३||

एका जनार्दनीं बोले | एकपण माझें नेलें ||४||

वैद्यजी पुढे म्हणतात, ” जेव्हापासून मला समजू लागले, केवळ एकच पाठ मी वाचला आहे. सकाळी उठून तुझी भक्ती करण्यासाठी मी अजून जिवंत आहे, म्हणून त्या परमात्म्याचे आभार मानायचे, संध्याकाळी आजचा दिवस चांगला गेला म्हणून त्याचे आभार मानायचे, खाताना, झोपताना, श्वास घेताना, असा हरघडीला त्याचे स्मरण करायचे, त्याचे आभार मानायचे. 

दळिता कांडिता | तुज गाईन अनंता ||१||

न विसंबे क्षणभरी | तुझे नाम गा मुरारी ||२||

नित्य हाचि कारभार | मुखी हरि निरंतर ||३|| 

मायबाप बंधुबहिणी | तू बा सखा चक्रपाणि ||४|| 

*लक्ष लागले चरणासी | म्हणे नामयाची दासी |५||

— समाप्त —

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 134 – दरपन दरपन रूप तुम्हारा… ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं  आपकी एक भावप्रवण रचना– दरपन दरपन रूप तुम्हारा…।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 134 – दरपन दरपन रूप तुम्हारा…  ✍

दरपन दरपन रूप तुम्हारा

मुखड़ा देखूँ किस दरपन में

एक बूँद धरती पर आई

दो दिन करने पहुनाई

कटा एक दिन शूलवनों में

और एक दिन अमराई

होंठ आचमन कैसे करलें

टँकी बदरिया नीलगगन में।

 

सागर से गागर शरमाई

माँग रहा है भरपाई

जीवन था रामायन लेकिन

बँची न बाँचे चौपाई।

राम रूप में रत्ना ही तो

बैठी थी तुलसी के मन मे।

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 133 – “कितनी कठिन तपस्या…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है।  आज प्रस्तुत है  आपका एक अभिनव गीत  कितनी कठिन तपस्या)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 133 ☆।। अभिनव गीत ।। ☆

☆ कितनी कठिन तपस्या… ☆

जब चाची उस आरक्षक

को गाली दे  हारी

तभी बीच में बोल पड़ी

थी उस की महतारी

 

मेरा बेटा भृष्ट नहीं है

सभी जानते हैं

सत्य भाषियो की श्रेणी

का उसे मानते हैं

 

कठिनाई से भरी हुई

सेवा घंटो घंटो

करता आया बिना थके

जो ना थी लाचारी

 

ब्रत, त्योहार, दिवाली, होली

ना जाना कब  से

खडा बिताता रात और दिन

बरदी कसे कसे

 

कभी बहू के मुख पर

छाया इंतजार देखा

दोनों आंखों में रहती

पति की मूरत प्यारी

 

कितनी कठिन तपस्या,

तुम इसको गाली दे लो

लेकिन इस के समर्पणों

भावों से मत खेलो

 

भले राज्य के आरक्षक

की सेवा के ढंग से

लोग न हों खुश पर

इन की सेवा है सरकारी

©  श्री राघवेन्द्र तिवारी

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – जिजीविषा ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – जिजीविषा ??

संकट, कठिनाई,

अनिष्ट, पीड़ादायी,

आपदा, अवसाद,

विपदा, विषाद,

अरिष्ट, यातना,

पीड़ा, यंत्रणा,

टूटन, संताप,

घुटन, प्रलाप,

इन सबमें सामान्य क्या है?

क्या है जो हरेक में समाता है,

उत्कंठा ने प्रश्न किया..,

मुझे इन सबमें चुनौती

और जूझकर परास्त

करने का अवसर दिखता है,

जिजीविषा ने उत्तर दिया..!

© संजय भारद्वाज 

दोपहर 3: 24 बजे, 9 मार्च 2020

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ श्री हनुमान साधना 🕉️

अवधि – 6 अप्रैल 2023 से 19 मई 2023 तक।

💥 इस साधना में हनुमान चालीसा एवं संकटमोचन हनुमनाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें। आत्म-परिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ लघुकथा – अदला बदली ☆ सुश्री अनघा जोगलेकर ☆

सुश्री अनघा जोगलेकर 

(सुश्री अनघा जोगलेकर जी का ई-अभिव्यक्ति में स्वागत। आप इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियर, उपन्यासकार, लघुकथाकार, स्क्रीनप्ले /कांसेप्ट /संवाद लेखिका, अनुवादक, चित्रकार, हिंदी और मराठी दोनों भाषाओं की जानकार, ‘शीघ्र लेखिका’ के रूप में हिंदी में आपकी अपनी पहचान स्थापित है। आपकी कथाओं एवं लघुकथाओं का राष्ट्रीय एवं अंतरराष्ट्रीय स्तर पर विशिष्ट स्थान है। आपके उपन्यास ‘यशोधरा’ को राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हुआ है। राम का जीवन या जीवन में राम, यशोधरा, बाजीराव बल्लाळ एक अद्वितीय योद्धा, अश्वत्थामा एवं देवकी शीर्षक से पांच उपन्यास प्रकाशित। प्रादेशिक व राष्ट्रीय स्तर पर उपन्यासकार के रूप में सम्मानित। लघुफिल्म,वेबसीरीज, स्क्रीन प्ले लेखन में दक्ष। सामाजिक, राष्ट्रीय, धार्मिक और आध्यात्मिक क्षेत्र में उत्तम कोटि के लेखन कार्य हेतु आपकी एक विशिष्ट पहचान है। हम अपने पाठको से आपकी विशिष्ट रचनाएँ समय समय पर साझा करते रहेंगे।आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण एवं विचारणीय लघुकथा ‘अदला बदली’।)

☆ लघुकथा – अदला बदली ☆ सुश्री अनघा जोगलेकर

आसमान से मोतियों की झड़ी लगी थी। बड़े-बड़े सफेद मोती जो नीचे आते ही जमीन पर बिखर जाते।

आकाश निहारता उसका अबोध मन खिड़की पर ही टँगा था। भीगा-भीगा, सर्द-सा फिर भी खिला-खिला। उसकी हिरणी जैसी आँखें एकटक उन मोतियों को देख रही थीं।

उसकी उत्सुक नज़रे कह रही थीं कि आसमान में जरूर ही कोई खज़ाना है जिसका दरवाजा गलती से खुला रह गया है और सारे मोती नीचे गिर रहे हैं।

वह चहकते हुए बोली, “भगवान! इस तरह तो आपका पूरा खज़ाना ही खाली हो जायेगा!”

उसकी बात सुन मैं मुस्कुरा दिया और फिर उसकी मासूमियत देखने लगा।

वह घर में दिन भर अकेली रहती। उसी खिड़की पर बैठी। लेकिन शाम होते तक घर मे चहल-पहल बढ़ जाती। आगंतुकों में से कोई उससे पानी मांगता तो कोई खाना। कोई कुछ तो कोई कुछ। और वह दौड़-दौड़कर सबके काम करती।

देर रात जब सब अपने कमरों में चले जाते तो वह भी सारे काम निपटा, खिड़की पर आ बैठती और तारे गिनती। कई बार तारे गिनते-गिनते उसकी आँखों से आँसू बहते जैसे उन तारों में किसी अपने को ढूंढ रही हो तो कभी खिलखिलाकर हँस देती जैसे जिसे ढूंढ रही थी वह मिल गया हो। कभी हल्के-हल्के गुनगुनाती, “ये चाँद खिला ये तारे हँसे…..”

….उसका यूँ गुनगुनाना सुन अंदर बैठी मानव आकृतियाँ फुसफुसातीं, “लगता है इस AI (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) रोबोट की प्रोग्रामिंग करते समय EQ (इमोशनल कोशेंट) का परसेंट कुछ ज्यादा ही फीड हो गया है।”

भावशून्य मशीन बन चुकी उन इंसानी आकृतियों के बीच वह AI (आर्टिफिशिएल इंटेलिजेंस) रोबोट हर पल अपना EQ (इमोशनल कोशेंट) बढ़ाने की कोशिश कर रही थी और मैं… मैं उन मशीन बन चुके इंसानों के बीच… उस रोबोट का… मशीन से इंसान बनने का इंतज़ार।

🔥 🔥 🔥

© अनघा जोगलेकर

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – व्यंग्य ☆ अभी अभी ⇒ व्यंग्य देखो, व्यंग्य की धार देखो… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “व्यंग्य देखो, व्यंग्य की धार देखो।)  

? अभी अभी ⇒ व्यंग्य देखो, व्यंग्य की धार देखो? श्री प्रदीप शर्मा  ? 

व्यंग्य कोई बच्चों का खेल नहीं ! बच्चों के हँसने खेलने के दिन होते हैं, उन्हें व्यंग्य जैसी धारदार वस्तुओं से दूर रखना चाहिए। हमने बचपन में बहुत तेल देखा है और तेल की धार भी देखी है।

तब हमारे पंसारी के पास तेल भी दो तरह के होते थे। एक मिट्टी का तेल, जिसे बाद में घासलेट यानी केरोसिन कहा जाने लगा और दूसरा मूंगफली का तेल, जिसे हम मीठा तेल कहते थे। हमारा पंसारी एक सिंधी था, जिसे हम साईं कहते थे। उसके पास तेल के दो कनस्तर होते थे, एक मिट्टी के तेल का और एक मीठे तेल का। दोनों में ही तेल निकालने का एक यंत्र लगा रहता था, जो तेल को कनस्तर से हमारी लाई गई कांच की बोतल में, साइफन विधि से, पहुंचाता था। हम बड़े ध्यान से तेल और तेल की धार को देखते रहते थे।

बॉटल भरने के पहले ही धार रुक जाती थी। जितना पैसा, उतनी बड़ी धार। कभी नकद, कभी उधार। ।

आज मिट्टी के तेल की यह हालत है कि वह बाजार से गधे के सिर के सींग की तरह गायब है। जिस चीज का अभाव होता है, अथवा जो वस्तु महंगी होती है, उस पर तो सॉलिड व्यंग्य लिखा जा सकता है। प्याज और टमाटर इस विषय में बड़े नसीब वाले हैं। थोड़ा भाव बढ़ा, तो बाजार से गायब ! और उनके इतने भाव बढ़ जाते हैं कि उन पर व्यंग्य पर व्यंग्य और अधबीच पर अधबीच लिखे जाने लगते हैं। लेकिन जो मिट्टी का तेल काला बाजार में भी उपलब्ध नहीं, उस पर धारदार तो छोड़िए, बूंद बराबर भी व्यंग्य नहीं।

चलिए, मिट्टी के तेल को मारिए गोली, खाने के तेल को ही ले लीजिए। सरसों, सोयाबीन, सनफ्लॉवर हो अथवा मीठा तेल, जब इनके भाव आसमान छूते हैं, तब कोई भी व्यंग्यकार को न तो यह तेल दिखाई देता है और न ही इसकी धार, और बातें करते हैं धारदार व्यंग्य की। क्या राजनीति पर किया गया व्यंग्य, तेल पर किए व्यंग्य से अधिक धारदार होता है। ।

हमारे घर में हथियार के नाम पर सिर्फ चाकू, छुरी ही होते हैं। उससे केवल सब्जियां और कभी कभी हमारे हाथ ही कटते हैं, लेकिन कभी किसी का गला नहीं। लेकिन आजकल हमारे चाकू छुरी भी व्यंग्य की तरह ही अपनी धार खो बैठे हैं।

एक समय था, जब चाकू छुरियां तेज करने वाला आदमी घर घर और मोहल्ले मोहल्ले आवाज लगाता था, एक पहियानुमा यंत्र से चिंगारी निकलती थी, और हमारे घरेलू औजार धारदार हो जाते थे।

आज की गंभीर समस्या न तो महंगाई है और न ही भ्रष्टाचार। जिसे राज करना है, राज करे, और जिसे नाराज करना है नाराज करे, कहने को फिर भी यह जनता का ही राज है। लेकिन जब व्यंग्य में ही धार नहीं, तो कैसी सर्जिकल स्ट्राइक। नाई के उस्तरे में भी धार नहीं, और चले हैं हजामत करने। ।

हमने तो खैर हमारे घर के औजार धारदार कर लिए, बस आजकल के व्यंग्य में धार अभी बाकी है। पहले सोचा धार जिले में ही जाकर बसा जाए, लेकिन हमारे एक मित्र धारकर स्वयं इंदौर पधारकर यहां बस गए।

काश, यह पता चल जाता परसाई अपने व्यंग्य लेखों पर धार कहां करवाते थे, तो उन ज्ञानियों की भी यह शिकायत दूर हो जाती कि आजकल व्यंग्य में धार नहीं है।

शब्द ही धार है, कटार है, व्यंग्य का हथियार है।

जब जरूरत से अधिक पैना हो जाता है तो शासन, प्रशासन और सत्ता को चुभने लगता है। पद्म पुरस्कार जैसे अन्य प्रलोभनों के लिए इनका सही उपयोग बहुत जरूरी है। व्यंग्य वह लाठी है जो सिर्फ सांप को ही मारती है, किसी दुधारू गाय को नहीं। ।

लेकिन वक्त वह लाठी है, जो कबीर जैसे खरी और कड़वी बात कहने वाले के मुंह से भी यह लाख टके की बात कहलवा दे ;

बालू जैसी करकरी

उजल जैसी धूप।

ऐसी मीठी कछु नहीं

जैसी मीठी चुप। ।

लो जी, यह भी कह गए,

दास कबीर। और लाइए धार अपने व्यंग्य में…!!

    ♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – लघुकथा ☆ संपादक का घर ☆ डॉ कुंवर प्रेमिल ☆

डॉ कुंवर प्रेमिल

(संस्कारधानी जबलपुर के वरिष्ठतम साहित्यकार डॉ कुंवर प्रेमिल जी को  विगत 50 वर्षों से लघुकथा, कहानी, व्यंग्य में सतत लेखन का अनुभव हैं। अब तक 450 से अधिक लघुकथाएं रचित एवं बारह पुस्तकें प्रकाशित। 2009 से प्रतिनिधि लघुकथाएं (वार्षिक) का सम्पादन एवं ककुभ पत्रिका का प्रकाशन और सम्पादन। आपने लघु कथा को लेकर कई  प्रयोग किये हैं।  आपकी लघुकथा ‘पूर्वाभ्यास’ को उत्तर महाराष्ट्र विश्वविद्यालय, जलगांव के द्वितीय वर्ष स्नातक पाठ्यक्रम सत्र 2019-20 में शामिल किया गया है। वरिष्ठतम  साहित्यकारों  की पीढ़ी ने  उम्र के इस पड़ाव पर आने तक जीवन की कई  सामाजिक समस्याओं से स्वयं की पीढ़ी  एवं आने वाली पीढ़ियों को बचाकर वर्तमान तक का लम्बा सफर तय किया है, जो कदाचित उनकी रचनाओं में झलकता है। हम लोग इस पीढ़ी का आशीर्वाद पाकर कृतज्ञ हैं। आज प्रस्तुत है आपका  एक विचारणीय लघुकथा  ‘‘संपादक का घर।)

☆ लघुकथा – संपादक का घर ☆ डॉ कुंवर प्रेमिल

मोहल्ले में जहां-तहां बिखरी कागज की चिंदिया, कतरनें देखकर कोई समझदार बोला-जरूर यहां कोई संपादक जैसा जीव रहता होगा।

‘तुम्हें कैसे मालूम’-साथी का प्रश्न उभरा।

‘यह उड़ता फिरता कचरा ही तो इसका सबूत है मियां। किसी पत्रिका के संपादक के घर जाकर माजरा देखिएगा, बैठने की जगह तक मयस्सर नहीं होगी।’

‘पर उसके बाल बच्चे ऐसे में कहां ठौर पाते होंगे भला।’

‘इसी कचरे के दरम्यां, बेचारे अपनी जगह बनाने के लिए बाध्य होते होंगे।’

साथी हक्का-बक्का था। कभी उड़ते कागज की चिंदियां, कतरनें देखकर तो कभी अपने साथी का चेहरा देखकर। किसी संपादक का घर देखने की जिज्ञासा जरूर उसके जेहन में बलवती हो रही होगी।

🔥 🔥 🔥

© डॉ कुँवर प्रेमिल

संपादक प्रतिनिधि लघुकथाएं

संपर्क – एम आई जी -8, विजय नगर, जबलपुर – 482 002 मध्यप्रदेश मोबाइल 9301822782

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares