(ई-अभिव्यक्ति में श्रीमति उमा मिश्रा ‘प्रीति’ जी का स्वागत। पूर्व शिक्षिका – नेवी चिल्ड्रन स्कूल। वर्तमान में स्वतंत्र लेखन। विधा – गीत,कविता, लघु कथाएं, कहानी, संस्मरण, आलेख, संवाद, नाटक, निबंध आदि। भाषा ज्ञान – हिंदी,अंग्रेजी, संस्कृत। साहित्यिक सेवा हेतु। कई प्रादेशिक एवं राष्ट्रीय स्तर की साहित्यिक एवं सामाजिक संस्थाओं द्वारा अलंकृत / सम्मानित। ई-पत्रिका/ साझा संकलन/विभिन्न अखबारों /पत्रिकाओं में रचनाएँ प्रकाशित। पुस्तक – (1)उमा की काव्यांजली (काव्य संग्रह) (2) उड़ान (लघुकथा संग्रह), आहुति (ई पत्रिका)। शहर समता अखबार प्रयागराज की महिला विचार मंच की मध्य प्रदेश अध्यक्ष। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा – अनोखा रिश्ता।)
“रवि आज सुबह-सुबह कहां जा रहे हो इतनी जल्दी-जल्दी तैयार होकर?” पत्नी सुनंदा ने पूछा।
“तुम भी तैयार हो जाओ। आज हमें वृद्धा आश्रम चलना है। मां को घर लेकर आना है। विदेश से आए एक महीना हो गया है।”
“तुम जाओ मैं नहीं जाऊंगी?”
रवि ने वृद्धाश्रम पहुंचकर अपनी मां के बारे में पूछा तो पता चला कि उसकी मां यहां आई थी पर थोड़ी देर के बाद ही चली गई थी ?
“हमने आपके नंबर पर फोन करके आपको सूचित तो किया था। क्या आपको पता नहीं चला? आपने कभी कोई खबर भी नहीं की इन दो सालों में?”
“लेकिन मेरी पत्नी तो मां की खबर लेती थी और पैसे भी भेजती थी!”
“देखिए आप झूठ मत बोलिए ? हम लोगों को रखते हैं और सुविधा देते हैं तो पैसे लेते हैं। आप कोई रसीद हो तो दिखाइए? आप अपने मां-बाप को संभाल नहीं पाते हो और हमारे ऊपर इल्जाम लगा रहे”
वह अपने पुराने घर जाता है जिसे उसने बेच दिया था। वहां उसे अपनी मां नजर आती है और वह उसे घर में काफी खुश दिख रही थी।
उसे मकान मालिक (अजय) ने उसे अपने घर के अंदर घुसने से मना कर दिया और कहा कि- “जब तुम यह घर बेचकर चले गए तो यहाँ क्यों आए हो?”
उसने कहा “मां को लेने के लिए…।“
“बरसों बाद तुम्हें मां की कैसे याद आई? तुम्हारी मां अब तुम्हारी नहीं हैं? घर के साथ-साथ अब यह मेरी मां हो गई। हमें तो पता ही नहीं था कि आपकी मां है यह बेचारी इस घर के बाहर बैठे रो रही थी। पड़ोसियों से पता चला कि इस घर की मालकिन है। हमने अपने घर में रहने दिया। वे पूरे घर का काम कर देती थी और तरह-तरह के अचार पापड़ भी बना देती थी। हम इसे अपने रिश्तेदार और पड़ोसी को बेचने लगे। इतना मुनाफा कमाया जो कुछ भी है यह सब इनके कारण ही है। तुमने इन्हें बेसहारा कर दिया था और हम बेसहारों को मां मिल गई। अच्छा है कि मां को कुछ याद नहीं रहता। मुझे ही अपना बेटा मानती है। भगवान की कृपा से मुझे यह अटूट रिश्ता मिला है। तुम्हें सब कुछ मिला था पर तुमने खो दिया लालच में अब तुम जा सकते हो।”
जगातील प्रत्येक धर्म आईचा अपार महिमा सांगतो. प्रत्येक धर्मात आणि संस्कृतीत ‘ आई’च्या अलौकिक गुणांचे आणि रूपांचे विलक्षण वर्णन आहे. आई’ या दोन अक्षरी या शब्दाचा महिमा सारं विश्व व्यापून आहे. मराठी साहित्यात आईचे मोठेपण वर्णन करणाऱ्या साहित्यकृतींमध्ये ‘श्यामची आई’ ही सर्वश्रेष्ठ आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. सानेगुरुजींच्या सिद्धहस्त सृजनशील लेखणीतून साकारलेली ही साहित्यकृती रसिकवाचकांना अतिशय उत्कटतेने मातृमहिमा सांगून मंत्रमुग्ध करते
‘आई’ हा तो अलौकिक शब्द आहे, ज्याच्या नुसत्या स्मरणाने हृदय फुलून जाते, भावनांचा अंतहीन सागर हृदयात आपोआप साठवला जातो आणि मन आठवणींच्या समुद्रात बुडून जाते. ‘आई’ हा अगम्य मंत्र आहे, ज्याच्या केवळ पठणाने प्रत्येक वेदना नष्ट होतात. आई’चे प्रेम शब्दात वर्णन करता येत नाही, ते फक्त अनुभवता येते. बाळाला नऊ महिने पोटात ठेवणे, प्रसूती वेदना सहन करणे, स्तनपान करणे, बाळासाठी रात्रभर जागे राहणे, त्याच्याशी गोड गोड बोलणे, त्याच्यासोबत खेळणे, बोट धरून चालायला शिकवणे, प्रेमाने फटकारणे, त्याला सुसंस्कारित करणे, सर्वात मोठ्या आव्हानाला धैर्याने सामोरे जाणे या सगळ्या गोष्टी फक्त आईच करू शकते.
आपले वेद, पुराणे, तत्वज्ञान, स्मृती, महाकाव्ये, उपनिषदे इत्यादी सर्वच ‘आई’ च्या अगाध महात्म्याने आणि स्तुतीने परिपूर्ण आहेत. अनेक ऋषी, तपस्वी, पंडित, महात्मे, विद्वान, तत्त्वज्ञ, साहित्यिक या सर्वांनी आईविषयी निर्माण होणाऱ्या भावना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. इतकं सगळं असूनही ‘आई’ या शब्दाची संपूर्ण व्याख्या आणि त्याचा असीम महिमा आजपर्यंत कोणीही शब्दात मांडू शकलेलं नाही.
आपल्या भारत देशात आई हे ‘शक्ती’चे रूप मानले जाते आणि वेदांमध्येसुद्धा आई ही प्रथम पूजनीय आहे, असे म्हटले आहे.
पुढील श्लोकातही प्रमुख देवतेला प्रथम ‘ माता’ असे संबोधले आहे.
त्वमेव माताच, पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या, द्रविणम् त्वमेव, त्वमेव सर्वम मम देव देव।
ऋग्वेदात मातेचा महिमा अशाप्रकारे सांगितला आहे की, ‘ हे उषेसारख्या जीवाची माता! महान मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या. तुम्ही आम्हाला कायद्याचे पालन करणारे बनवा. आम्हाला कीर्ती आणि अथांग ऐश्वर्य द्या. ‘
सामवेदात एक प्रेरणादायी मंत्र सापडतो, ज्याचा अर्थ आहे, ‘हे जिज्ञासू पुत्रा! आईच्या आज्ञेचे पालन करा. तुमच्या गैरवर्तनाने आईला त्रास देऊ नका. आईला जवळ ठेवा. मन शुद्ध करून आचाराचा दिवा लावा.
प्राचीन ग्रंथांमध्ये अनेक औषधांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांची तुलना मातेशी करण्यात आलेली आहे. एका प्राचीन ग्रंथात, अमलाला ‘ शिव ‘ (कल्याणकारी), ‘ वैस्थ ‘ (राज्याचे रक्षणकर्ता) आणि ‘ धात्री ‘ (मातेप्रमाणे संरक्षक) म्हटले आहे. राजा बल्लभ निघंटू यांनीही ‘ हरितकी’ (हरडा) च्या गुणांची तुलना एके ठिकाणी आईशी केली आहे.
यस्य माता गृहे नास्ति, तस्य माता हरितकी ।
म्हणजे ज्या घरात आई नसते त्याठिकाणी हरितकी (हरडा) मानवाला त्याच्या आईसमान हितकारक असते.
श्रीमद् भागवत पुराणात नमूद केले आहे की, मातेच्या सेवेतून मिळालेले वरदान, सात जन्मांचे दु:ख आणि पाप दूर करते आणि तिची भावनिक शक्ती मुलांसाठी संरक्षणाची ढाल म्हणून काम करते. यासोबतच श्रीमद् भागवतात ‘आई ’ ही मुलाची पहिली गुरू आहे, असे सांगितले आहे.
रामायणात श्रीराम आई’ला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ मानतात. ते म्हणतात-
‘जननी जन्मभूमीश्च स्वर्गदपि गरियसी ।’,
(म्हणजे आई आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहेत.)
महाभारतात यक्ष धर्मराजा युधिष्ठिराला विचारतो, ‘जमिनीपेक्षा भारी कोण? ‘ तेव्हा युधिष्ठिर उत्तरतो- ‘माता गुरुतरा भूमे:’ म्हणजे, ‘आई या भूमीपेक्षा खूप भारी आहे. ‘
महाभारताच्या अनुशासन पर्वात पितामह भीष्म म्हणतात, ‘भूमीसारखे दान नाही, मातेसारखा गुरू नाही, सत्यासारखा धर्म नाही आणि दानासारखे पुण्य नाही. यासोबतच महाभारत महाकाव्याचे लेखक महर्षी वेद व्यास यांनी आई बद्दल लिहिले आहे-
‘नास्ति मातृसमा छाया, नास्ति मातृसमा गतिः।
नास्ति मातृसमं त्राण, नास्ति मातृसमा प्रिया।।’
(म्हणजे आईसारखी सावली नाही, आईसारखा आधार नाही. आईसारखा रक्षक नाही आणि आईसारखी प्रिय वस्तू नाही.)
तैत्तिरीय उपनिषदात ‘ आई ‘ बद्दल पुढीलप्रमाणे उल्लेख आहे-
‘मातृ देवो भवः।’
(अर्थात, आई देवासमान आहे.)
‘आई’च्या चरणी स्वर्ग आहे, असे संतांचेही स्पष्ट मत आहे. आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनी ‘सतपथ ब्राह्मण’ या स्तोत्राचा त्यांच्या ‘ सत्यार्थ प्रकाश’ या ग्रंथाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पुढीलप्रमाणे उल्लेख केला आहे-
अथ शिक्षण प्रक्रिया:
मातृमान् पितृमान आचार्यवान् पुरुषो वेद:
(म्हणजेच, जेव्हा तीन उत्तम शिक्षक असतील, म्हणजे एक आई, दुसरा पिता आणि तिसरा शिक्षक, तेव्हाच माणूस ज्ञानी होईल.)
‘चाणक्य नीती’मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, ‘ मातेसारखी कोणतीही देवता नाही. आई ही सर्वोच्च देवी आहे. ‘
मराठी वाड्मयामध्येसुद्धा माधव ज्युलियन, भास्कर दामोदर पाळंदे, कवी यशवंत आणि अलीकडील काळातील फ. मुं. शिंदे या आणि इतर कवींनी आपल्या कवितांमधून आईची महती सांगितली आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीतही आईवर आधारित अनेक चित्रपट आणि गाणी बनवली गेली आहेत. अनेक गाणी इतकी हृदयस्पर्शी झाली आहेत की, ती ऐकून माणूस पूर्णपणे भारावून जातो.
हिंदू धर्मात देवींना ‘माता’ असे संबोधले जाते. धार्मिक परंपरेनुसार, संपत्तीची देवी ‘ लक्ष्मी माँ’, विद्येची देवी ‘सरस्वती मां’ आणि शक्तीची देवी ‘ दुर्गा माँ’ आहे. नवरात्रात आईची नऊ वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते.
ख्रिश्चन धर्मातही आईला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे. ख्रिश्चनांच्या पवित्र ग्रंथात स्पष्टपणे लिहिले आहे की, आईशिवाय जीवन नाही. यासोबतच प्रभु येशूची आई मदर मेरी हिला सर्वोच्च मानले जाते. बौद्ध धर्मात, महात्मा बुद्धांच्या स्त्री रूपातील तारा देवीची स्तुती केली गेली आहे. ज्यू लोकही ‘ आई’ला सर्वोच्च स्थानी ठेवतात
थोडक्यात, देश कोणताही असो, संस्कृती किंवा सभ्यता कोणतीही असो आणि भाषा, बोली कोणतीही असो’ मातेबद्दल अतूट आणि अपार आदर आहे.
शालेय शिक्षण विदर्भामध्ये वाशिम येथे व इंजीनियरिंग भोपाळला झाले. एक वर्ष नाशिकला ओझर येथे विमान कंपनीत नोकरी. नंतर पुण्याला टाटा मोटर्स मध्ये. २००९ मध्ये निवृत्त . निवृत्तीनंतर अवांतर लिखाणाला नकळतच छान सुरुवात झाली आणि वाचकांकडून छान चालना मिळत गेली.
जीवनरंग
☆ “शाम दहावीला बसतो” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
दहावीच्या परीक्षा जवळ आल्या, की, मला शाम च्या १० वी ची जुनी आठवण हमखास होते. शाम हा माझा मित्र पुरोहित याचा मुलगा. त्यावेळेस पेपर ला बातमी असायची, की, कुणाच्या तरी आय कार्ड वर चुकून शाहरुख खान चा फोटो छापला होता, कुणाच्या आय डी कार्डवर ओबामा यांचा फोटो आला होता, वगैरे. अशा गोष्टींवर आपला सहसा, लगेच विश्वास बसत नाही, पण आमच्या श्यामच्या बाबतीत असेच काही घडले, त्यामुळे या गोष्टींवर विश्वास तर बसलाच, आणि ती घटना कायम मनात रुजली.
शाम पुरोहित त्यावर्षी वर्षी दहावीला बसला होता. शाळेतून फॉर्म मिळाला. शामनी फॉर्म भरला. काही चुकले नाही ना, हे बघायला, मित्रानी दोन वेळा फॉर्म तपासून पाहिला. आपल्या नवऱ्याचा स्वभाव वेंधळा आहे, हे माहीत असल्यामुळे, मित्राच्या बायकोने फॉर्म बरोबर भरल्याची पुन्हा खात्री केली. फॉर्म बरोबर फोटो पण पाठवायचा होता.
रिझल्ट लागल्यानंतर आपल्याकडे क्लासेस च्या जाहिराती आपण पेपरमध्ये बघतोच. आमच्या क्लासचा, अमित पुरंदरे बोर्डात पहिला आला, सीमा लांबे बोर्डात चौथी आली, सौरभ चोकटे ला तीन विषयात 98 मार्क, वगैरे वगैरे. त्या वर्षी परीक्षेचे फॉर्म भरायचे वेळेस, नव्यानेच फोटो स्टुडिओच्या जाहिराती सुरू झाल्या होत्या. गेल्या वर्षी परीक्षेच्या फॉर्म करता आमच्या स्टुडिओत फोटो काढलेला, कुणाल देशपांडे बोर्डात पहिला आला, शाम हिंगे पुण्यात पहिला आला, नेहा अवचटला गणितात १०० मार्कस, वगैरे वगैरे. मित्रानी सगळ्या जाहिराती बघून, फोटोकरता साई स्टुडिओ पसंत केला. चांगला मुहूर्त बघून सगळे शामला घेऊन स्टुडिओ मध्ये गेले. मित्राला डोळ्यासमोर पुढच्या वर्षीच्या पेपर मध्ये साई स्टुडिओची जाहिरात दिसायला लागली, फॉर्म करता साई स्टुडिओत फोटो काढणारा श्याम पुरोहित ठाण्यात पहिला.
फोटोग्राफर नी शाम कडे दोन-तीन अँगल्समधून बघितले, आणि स्टुडिओ मधला काळा कोट आणि लाल टाय घालून फोटो काढला.
शामनी शाळेत फॉर्म – फोटो जमा केले. बोर्डाकडून ऍडमिशन कार्ड आले. शामनी नाव वगैरे तपासून बघितले. आपला काळा कोट व लाल टाय बघितला.
म्हणता म्हणता परीक्षेचा दिवस उजाडला. देवाला, आई – वडिलांना नमस्कार करून, शाम शेजारच्या बाळू बरोबर सेंटरला गेला. बाळू यावर्षी पुनः परीक्षा देत होता. पर्यवेक्षकांनी बाळूचे कार्ड बघून त्याला आत सोडले. शामनी मनात देवाला नमस्कार केला आणि कार्ड पुढे केलं. पर्यवेक्षकांनी शामकडे बघितलं आणि कार्ड बघितलं, पुन्हा शामकडे बघितलं आणि कार्ड बघितलं. मग शाम ला विचारलं, ओबामा यांचे पूर्ण नाव काय आहे. शाम ला वाटलं, १० सारखी मोठी परीक्षा द्यायची आहे, म्हणजे जनरल नॉलेज आवश्यक आहेच. आत सोडण्यापूर्वी सर आपलं जी-के टेस्ट करत असतील. शाम नी लगेच उत्तर दिले ‘बराक ओबामा’. पुढचा प्रश्न आला – बराक ओबामा कुठे राहतात. शाम तयारच होता – व्हाईट हाऊस, वाशिंग्टन. मागच्या मुलांची चुळबुळ सुरु झाली, पण सरांशी पंगा नको, म्हणून सगळे चूप होते. पुढचा प्रश्न आला – बराक ओबामा आत्ता कुठे आहेत. या प्रश्नावर शाम गोंधळला.
त्यानी जी – के चा क्लास लावला होता. त्यामध्ये भारताचे आणि इतर देशांचे, राष्ट्रपती कोण आहेत, पंतप्रधान कोण आहेत, ते कुठे राहतात, त्यांनी देशाकरता काय महत्वाचे निर्णय घेतले, असे प्रश्न त्याचे झाले होते. पण अमुक व्यक्ती आता कुठे आहे, असा प्रश्न कधीच नव्हता. त्यामुळे शाम गोंधळला. लाईनमधला मागचा मुलगा स्मार्ट होता, तो म्हणाला सर, अमेरिकेचे अध्यक्ष केंव्हा कुठे असतील, हे गोपनीय असते. ते कुणीच सांगू शकणार नाही. सरांना उत्तर आवडले होते, पण लक्ष विचलित होऊ न देता, सर शाम ला म्हणाले, तुला उत्तर माहित नाही ना, मग चल हेडमास्तरांकडे.
चेंबरमध्ये गेल्यावर, पर्यवेक्षक हेडमास्तरांच्या कानाशी कुजबुजले – सर, याच्या कार्ड वर बराक ओबामा यांचा फोटो आहे. हेडमास्तरांनी आय – कार्ड बघितलं आणि शामकडे बघितलं, असं २-३ वेळा केल्यानंतर, कार्ड शाम ला दाखवत विचारलं, कार्डावर ओबामा यांचा फोटो आहे, ते आत्ता कुठे आहेत. शाम नी आय कार्ड बारकाईने बघितलं, तोच काळा कोट, तोच लाल टाय, पण आपला चेहेरा नाही, हे बघून शाम पण गोंधळला. हेडमास्तरांना वाटलं, की, ओबामा यांचं कार्ड आहे, म्हणजे, ते परीक्षेला नक्की येणार. कार्डावर नाव चुकू शकतं, पण फोटो चुकू शकत नाही, हा त्यांचा अनुभव. त्यांच्या वोटिंग कार्डवर फोटो त्यांचा होता, पण त्याचे नाव चुकीचे होते, तरी ते वोटिंग ला जायचे. त्यांच्या बायकोच्या एका कार्डावर, त्यांचे नाव वेगळेच आले होते. हेडमास्तरांच्या मनात मनसुबे सुरु झाले – ओबामा नक्की येणार, पेपर संपला की, त्यांच्या बरोबर फोटो काढू, आपला फोटो पेपरला येईल, वगैरे.
ओबामा यांना यायला उशीर होऊ शकतो, हे समजून सरांनी फर्मान काढले, की, ओबामा आल्यानंतरच पेपर सुरु होईल. त्यांनी शाम ला पुन्हा विचारले – ओबामा कुठे आहेत? ओबामा आत्ता कुठे असतील, या प्रश्नानी शाम परेशान झाला. शामला अमिताभ यांच्या कौन बनेगा करोडपती ची आठवण झाली. कुणाची मदत घेता आली, तर या प्रश्नाचे उत्तर कठीण नव्हते. कुठलीही अडचण आली, की, आपल्याला राम – कृष्ण – शंकर आठवतात. पण यांना सोडून, शाम नी अमिताभ यांचा धावा सुरु केला. असं म्हणतात, की, ज्या गोष्टीचा, आपण आतल्या मनापासून धावा करतो, सृष्टी ती गोष्ट आपल्यापुढे साकार करते.
झाले अगदी असेच. सगळे आपापल्या ‘खयालोंमें’ असतांना, अचानकच एक प्रोड्युसर, त्यांची टीम आणि स्वतः अमिताभ केबिन मध्ये अवतरले. प्रोड्युसरनी, आधी सूचना न देता आल्याबद्दल, सरांची आधी माफी मागितली. त्यांना डोक्याला लावायच्या लाल तेलाची ऍड करायची होती. पेपर संपल्यानंतर, अमिताभजी एका मुलाच्या डोक्याला लाल तेल लावतील, आणि एक डायलॉग म्हणतील. आम्ही शाळेला देणगी देऊ, अशी कल्पना सरांना प्रोड्युसरांनी दिली.
शामला वाटले, की, आपल्या हाकेला ऐकूनच अमिताभ आले आहेत. शामनी हिम्मत करून, अमिताभ यांना गळ घातली, की, त्यांच्या हेल्प लाईन च्या मदतीने, त्यांनी, बराक ओबामा आत्ता कुठे आहेत, याचे उत्तर सरांना द्यावे. अमिताभ म्हणजे एव्हर ग्रीन आणि रिसोर्सफूल पर्सन्यालिटी. अमिताभनी हा – हा जरूर, असे म्हणायचा अवकाश, आणि प्रोड्युसरनी लगेच, कौन बनेगा करोडपती चा मिनी सेट लावला. अमिताभनी करोडपती स्टाईलने सुरुवात केली – शामजी किसकी मदत लेना पसंद करेंगे. फोनाफ्रेंड या ऑडियन्स की? आपने आभितक किसीभी हेल्प लाईन का इस्तेमाल नही किया है. शाम नी विचार केला, कि ऑडियन्स ची मदत घेण्यात काही अर्थ नाही. हेडमास्तरांना आणि पर्यवेक्षकांनाच हा प्रश्न आहे, त्यामुळे ते दोघे कट. बरं, अमिताभ यांची टीम आत्ताच इथे आली आहे, त्यामुळे त्यांना पण ओबामा आत्ता कुठे आहेत, ही कल्पना नसणार. अमिताभ नी शाम च्या मनातली चलबिचल ओळखली, आणि म्हणाले, क्या आप फोनाफ्रेंड से पूछना पसंद करेंगे? शाम ला हा पर्याय आवडला.
अमिताभ : किससे पूछना चाहोगे?
शाम चे विचारचक्र सुरु झाले – बाबांना विचारावे का? नाही, नाही. आत्ता आई कुठे आहे, हे पण त्यांना माहित नसते, ओबामांचे ते काय सांगणार! ओबामा यांनाच फोन लावला तर काय हरकत आहे? पण सरकारी ऑफिस मध्ये फोन लागेल कां? बाबा बऱ्याच वेळेला काही माहिती विचारायला, एल आय सी ऑफिस ला फोन करतात, कधी पेन्शन ऑफिस ला फोन करतात, कधी कार्पोरेशन च्या ऑफिस ला फोन करतात, पण दिवस दिवस त्यांचा फोन लागत नाही. एकतर रिंग वाजत राहते आणि कुणी फोन घेत नाही, किंवा कायम एंगेज टोन येतो. पण कौन बनेगा मध्ये, कुठलाही फोन लावला, तरी २ किंवा ३ रिंग जातात आणि पलीकडचा फोन उचलतो. म्हणजे ओबामा यांना फोन लावायला काहीच हरकत नाही!
शाम : अमिताभ सर, मै ओबामाजी से पुछना चाहता हू
अमिताभ : पक्का, लॉक किया जाय?
शाम : हा, सर. पक्का
अमिताभ : कॉम्प्युटरजी, बराक ओबामा जी को फोन लगाया जाय.
टीम तयारच होती. लगेच रिंग चा आवाज आला आणि अहोआश्चर्यम म्हणजे पलीकडून आवाज आला, यस् ओबामा हियर
अमिताभ : सर, गुड मॉर्निंग, धिस इज अमिताभ बच्चन फ्रॉम इंडिया, ठाणे हायस्कुल
ओबामा : शाम, यु कॅन स्पिक इन मराठी, माय इंटरप्रिटर विल ऐनसर
शाम जाम खुश झाला.
शाम : सर, माझ्या आय कार्ड वर तुमचा फोटो आहे. तुम्ही परीक्षेला याल असे सरांना वाटते, तुम्ही सध्या कुठे आहात?
ओबामा (ऑफिस) : मी आत्ता ऑफिस मध्ये आहे. मला नुकतीच मुंबईच्या कॉन्स्युलेटकडून माहिती मिळाली, की, तुमच्या कडे काही जणांच्या आय कार्डवर माझा फोटो आला आहे. मी तिथल्या परीक्षेला नक्कीच बसत नाही, हे सरांना सांग. याला दोन कारणे आहेत, एक म्हणजे, तिथल्या प्रश्नपत्रिकेत बऱ्याच चुका असतात, त्यामुळे उत्तर लिहितांना गोंधळ होतो. आणि दुसरे म्हणजे, पेपर तपासायची वेळ आली, की, तिथले शिक्षक संपावर जातात, आणि मग कुणीही पेपर तपासतो.
सरांना सांग, की, जरी माझा फोटो आय कार्ड असला, तरी ज्याचे नाव कार्ड वर आहे, त्याला परीक्षेला बसू द्यावे.
फोन कट झाला.
ओबामा यांना आपल्या परीक्षेबद्दल इतकी इत्यंभूत माहिती आहे, याबद्दल सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले.
सरांनी शाम ला कार्ड परत केले, आणि पेपरला जायला सांगितले. पर्यवेक्षक म्हणाले, सर, परीक्षेची वेळ संपली आहे. आपण परीक्षा होल्ड वर ठेवली होती. इतर सेंटरची मुले पेपर संपवून बाहेर पण आली असतील. हेडमास्तरांनी लगेच निर्णय दिला, की, आजचा पेपर सगळ्यांनी दिला असे समजण्यात येईल. आणि बेस्ट ऑफ फाईव्ह चे ऍव्हरेज मार्क या पेपरला दिल्या जातील. शाळेतल्या मुलांनी टाळ्या वाजवत, आपापल्या घराकडे धूम ठोकली.
पेपर संपला, हे ऐकताच प्रोड्युसरची टीम पुढे आली. हेडमास्तरांची खुर्ची मध्ये ओढण्यात आली. शाम ला त्यावर बसवले. सायलेंस – लाईट्स ऑन – कॅमेरा रोलिंग, हे डायलॉग सुरु झाले. अमिताभनी लाल तेलाची बाटली उघडली आणि श्यामच्या डोक्यावर तेलाची धार सोडली. थंडा थंडा – कुल कुल असे म्हणत थोडे मॉलिश केले, आणि ‘सरको लाल तेल लगाओ और एक्झाम का टेन्शन खतम’, हा डायलॉग आपल्या शैलीत म्हटला. कट – कट अशी घोषणा झाली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.
प्रोड्युसर नी मुलांच्या ट्रिप करता सरांकडे १०, ००० रु चा चेक दिला. शाम ला १००० चा चेक दिला. आणि अमिताभला १ लाख चा चेक दिला
शाम नी फोनकडे बघून ओबामा यांना नमस्कार केला. अमिताभ यांना नमस्कार केला. सरांना आणि पर्यवेक्षकांना नमस्कार केला आणि लाल तेलाच्या नशेत, हवेत तरंगत घर गाठलं.
☆ या ‘ डे ‘ ची खरंच गरज आहे??… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
प्रेमासारख्या नाजुक विषयाचा बाजार मांडायला हया फिरंग्यांना सांगायला नको. ह्यांच्या व्हँलेंटाईन डे वरून मला गझलनवाज भाऊसाहेब पाटणकर यांचा एक शेरवजा किस्सा आठवला.
एकदा एक मूर्ख शायर सूर्यास म्हणतो की
“भास्करा, कीव मजला येऊ लागते कधी मधी,
रात्र प्रणयाची तू रे पाहिली आहे कधी?”
तेव्हा सूर्य उत्तर देतो,
“आम्हासही या शायराची कीव येऊ लागते,
याच्या म्हणे प्रणयास रात्र यावी लागते”.
प्रेम हे काय दिवस ठरवून व्यक्त करायची चीज आहे?
आपलं मराठी-हिंदी साहित्य एवढं समृद्ध आहे की प्रेम व्यक्त करायच्या किती विविध शैली आपणांस ठाऊक होतात. प्रेम ही खरं तर नजरा-नजरेची परिणती आहे.
गदिमा म्हणूनच गेलेयत
“प्रथम तुज पाहता,
जीव वेडावला… “
यांचं प्रेम सुद्धा एवढं हळुवार की गिरगांव चौपाटीवर भेटूया असे DIRECT न म्हणता ती खाली मान घालून शालीनतेने पी. सावळारामांच्या काव्यात म्हणते की
“जिथे सागरा धरणी मिळते
तेथे तुझी मी वाट पहाते”
मग एकदाची परतीच्या भेटीची वेळ ठरते. हा कावरा-बावरा झालाय, ती लाजेनं चूर झालीय. सगळं कसं शांत शांत!
ही कोंडी शेवटी तो फोडतो, (सोबतीला पाडगांवकर, खळे आणि हृदयनाथ या त्रयीला घेऊन.)
“लाजून हांसणे अन्
हांसून ते पहाणे,
मी ओळखून आहे,
सारे तुझे बहाणे! “
भेट झाल्यावर मात्र हृदयात एक अनाहूत हुरहुर सुरू होते. मग परत गदिमा मदतीला येतात,
“हृदयी प्रीत जागते, जाणता अजाणता”
तोही आपल्या विश्वात नसतोच!
“होशवालों को खबर,
बेखुदी क्या चीज है,
इश्क किजे, फिर समझिये,
बंदगी क्या चीज है! “
प्रेमात ती ठार वेडी झालीय,
म्हणतेय काय
“मी मनांत हंसता प्रीत हंसे,
हे गुपीत कुणाला सांगू कसे?”
त्याचे “बहाणे” ती सुद्धा “ओळखून” आहे. तिच्या पाठीशी अस्सल कोंकणी सारस्वत (आरती प्रभू) आहेत, ती म्हणते,
“नाही कशी म्हणू तुला विडा मी दुपारी,
परि थोरांच्या समोर घ्यायची सुपारी! “
ह्याचे बहाणे थांबायची चिन्हे नाहीत. मग तीच म्हणते,
“ये मुलाकात इक बहाना है,
प्यार का सिलसिला पुराना है! ”
शैलेंद्रच्या काव्यातच सांगायचे तर
“घडी घडी मेरा दिल धडके,
हाय धडके, क्यू धडके”
ह्याची खात्री पटलीय पण खुंटी हलवून घट्ट करू पाहतोय.
“कहना है, कहना है,
आज तुमसे ये पहली बार,
तुम ही तो लायी, हो जीवन में मेरे
प्यार, प्यार, प्यार… “
ती त्याच्या “हरकतीने” मोहरून गेलीय.
तृप्त झालीय.
“धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना,
शब्दरूप आले, मुक्या भावनांना “
आणि मग “झाडांची पाने हलतांत”. तो खूष.
“जेव्हां तिची नी माझी, चोरून भेट झाली,
झाली फुले कळ्यांची, झाडे भरांत आली”आणि तिनं चक्क “होय” म्हटलं!
हा गडाबडा लोळायचा बाकी!
“तुम क्या जानो, मुहब्बत क्या है… “
” कोकिळ कुहूकुहू बोले,
तू माझा तुझी मी झाले.. “
दोघांत एवढं अद्वैत निर्माण झालं की ती म्हणते
” तुज्ये पायान् रूपता काटां,
माज्ये काळजान् लागतां घांव “
आपण दोघांचे एक कधी झालो हे त्यांना कळलंच नाही. हृदये जरी दोन असली तरी अंतर्मन मात्र एकच होतं.
“दो लब्जों की है बस ये कहानी”
या हृदयीचे त्या हृदयी कधी झाले, ते ह्या युगुलाला कळलेच नाही.
” आज तू डोळ्यांत माझ्या,
मिसळूनी डोळे पहा,
तू असा जवळी रहा,
तू अशी जवळी रहा “
प्रेमाची भावना इतक्या हळुवारपणे व्यक्त करणा-या या कविता ज्या साहित्यात आहेत त्या मराठी भाषेला व्हॅलेन्टाईन डे च्या बाजारू आणि उथळ स्वरूपाकडे बघण्याची गरजच काय?
☆ “आनंद पेरीत जातांना…” – कवी : श्री दयानंद घोटकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
एका पालकांनी विचारले “काय सर आज तुम्ही सावरकरांचा पुतळा आणून शाळेत कार्यक्रम केला” मी म्हणालो होय 26 फेब्रुवारी म्हणजे सावरकरांची पुण्यतिथी, आणि मराठी राजभाषा दिन असतो 27 फेब्रुवारीला, आणि 28 फेब्रुवारीला असतो विज्ञान दिन, यावर दुसरे पालक म्हणाले “सावरकरांसारखे क्रांतिकारक तयार करायचा विचार दिसतोय तुमचा” का हिंदुत्ववादी विचार मुलांच्या माथी मारणार आहात??? “
त्यांना काय म्हणायचंय, हे मला नेमकं कळलं होतं मी म्हणालो, स्वातंत्र्यवीर सावरकर हा विषय आपण बाजूला ठेवूया एक समाजसेवक सावरकर आणि मराठी भाषेसाठी आपले योगदान देणारा मराठी प्रेमी हा विचार आपण लक्षात घेऊया
अहो, पुण्यातील शिक्षण तज्ञ डॉक्टर प्र. ल. गावडे यांनी सावरकर या विषयांमध्ये पीएचडी केली आणि त्यांनी आम्हा काही विद्यार्थ्यांना सावरकरांच्या प्रतिभेची ओळख करून दिली. जयस्तुते आणि ने मजसी ने याच्याही पलीकडे अनेक गीत रचना करणार हा महाकवी यांनी छत्रपती शिवाजी आणि बाजीप्रभू यांच्यावर पोवाडे लिहिले आहेत शिवरायांची आरती’ ही लिहिली आहे संन्यस्त खडग मध्ये नाट्यगीते लिहिली आहेत. हिंदू एकता गीत लिहिले आहे प्रबोधन पर लावण्याही लिहिले आहेत आणि रत्नागिरीला तर पतित पावन मंदिर स्थापन करून त्यांनी सामाजिक एकतेसाठी केलेले कार्य हे सारं पुढच्या पिढीला कळायला हवं ना!! जे आमच्यापाशी आहे ते आम्हाला माहित आहे ते सर्व विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे ना!! एक साहित्यिक सावरकर त्यांची प्रतिभा आणि प्रतिमा शक्ती आणि मायबोलीवर असलेलं त्यांचं प्रेम मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान अनेक इंग्रजी भाषेतील शब्दांना सावरकरांनी मराठी मध्ये प्रतिशब्द दिले आहेत याची माहिती घ्या असेही मी मुलांना सांगितले. एखादा देशभक्त देशसेवा करीत असतानाच समाजसेवा, स्वभाषा, स्वदेश, स्वधर्म, इत्यादींचा विचार किती वेगवेगळ्या पद्धतीने करतो आणि नुसता विचार नाही तर त्याप्रमाणे आचार आणि कृतीही करतो जसे लोकमान्य टिळकांनी मंडा लेच्या तुरुंगात गीतारहस्य सारखा ग्रंथ लिहिला, डॉक्टर आंबेडकर, साने गुरुजी, महात्मा फुले, सर्वच समाजसेवकांनी लेखन साहित्य केलेले आहे, ते सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांपर्यंत पोहोचवणं. हे आमचं काम आहे, आता ही नववी दहावीतली मुलं थोडी मोठी झाली आहेत. त्यांच्यामध्ये थोडी वैचारिक प्रगल्भता आली आहे, म्हणून त्यांच्यासाठी सावरकर हा विषय आहे. पाचवी सहावी मध्ये साने गुरुजी, आठवीमध्ये लोकमान्य टिळक, याप्रमाणे जशी इयत्ता वाढत जाते त्याप्रमाणे महापुरुषांचे विचार मुलांसमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांवर देश प्रेमाचे संस्कार करायचे असतील आणि मायबोलीची गोडी लावायची असेल मातृभाषेसाठी आपल्याला काही करायचं असेल तर अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमधूनच थोर कर्तृत्ववान माणसांचा इतिहास त्यांचा चरित्र सांगणं हे आमचं कर्तव्य आहे असं मी सर्व पालकांना सांगितलं आता सारे पालक शांत झाले एक जण हळूच मला म्हणाला “माफ करा सर जरा आमचा गैरसमज झाला” लगेच दुसरे पालक म्हणाले हो “जरा गैरसमज झाला” दुसरे म्हणाले “होय, जरा आधी माहीत करून घ्यायला हवी होती” मी म्हणालो घरी आल्यावर आपल्या मुलांची संवाद साधा, त्यांना विचारा आज काय काय झालं? ? शाळेत कोणता कार्यक्रम होता? ? आणि आता एक काम करा सावरकरांचे विज्ञान विषयक विचार त्यांचीही पुस्तक आहेत ही तुम्ही स्वतः वाचा आणि मग मुलांना वाचायला द्या घरामध्ये जसं कपड्यांचा कपाट आहे ना तसे एक पुस्तकांचेही कपाट तयार करा पुस्तकांची खरेदी करा आणि त्यामध्ये सावरकरांची ही पुस्तकं ठेवा लोकमान्य टिळकांचे पुस्तक ठेवा महात्मा फुलेंची पुस्तके ठेवा सुंदर सुंदर चरित्र जेव्हा मुलं वाचतील तेव्हाच त्यांना प्रेरणा मिळेल असे म्हणून मी माझे मनोगत संपवले. पालकांना माझे विचार पटले होते. एक चांगलं सत्कार्य केल्याचे समाधान मला मिळाले होते.
मराठी भाषेसाठी योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम!!!
लेखक : श्री दयानंद घोटकर, पुणे
(मराठी भाषा गौरव दिनानिमित्त)
मो. ९८२२२०७०६८
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
डॉ. राहुल मराठे हे कीटकतज्ज्ञ असून मित्रकिडा बायोसोलुशन्स आणि मित्रकिडा फौंडेशन या संस्थेचे संस्थापक आहेत. गेली ३० वर्षे ते कीटकांचा अभ्यास करत आहेत. निसर्गामध्ये असणाऱ्या कीटकांमधील सुप्त गुणांचा वापर करून आपल्यापुढील अनेक समस्या त्यांनी सोडवल्या आहेत. ते कीटकांविषयी शास्त्रीय सल्ले देतात, तसेच त्यांनी आतापर्यंत अनेक व्याखाने, कीटक माहिती शिबिरे घेतली आहेत आणि या विषयावर अनेक लेख लिहिले आहेत. आपल्या निसर्गामध्ये अतिशय महत्वाची भूमिका असणाऱ्या कीटकांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि कीटकांचे संरक्षण आणि संवर्धन करणे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्याची माहिती त्यांच्याच शब्दांत इथे देत आहे.
—–
स्फोटके शोधणारी झुरळे –
माझ्या संशोधनात मी झुरळांचा वापर या कामासाठी केला. झुरळांच्या जनुकांमध्ये पुनरावृत्ती करणारे घटक असतात. ती खूप लवकर नवीन गोष्टी शिकतात. त्यांच्याकडे घ्राणेंद्रिये आहेत, जी इतर कीटकांपेक्षा दुप्पट आहेत. त्यांच्याकडे गंधकण शोधणाऱ्या ग्रंथी आहेत, ज्या कडू पदार्थही शोधू शकतात. यावरून स्पष्ट होते की झुरळे अतिशय बुद्धिमान आहेत. या प्रयोगासाठी तीन ते चार झुरळांचे गट तयार केले. प्रत्येक गटाला त्या-त्या स्फोटकाचे प्रशिक्षण देण्यात आले. काही दिवसांतच ही झुरळे त्यांना शिकवलेली स्फोटके शोधू लागली. या झुरळांसाठी एक विशेष उपकरण तयार करण्यात आले. त्यामुळे झुरळांना कुठेही मोकळे सोडण्याची गरज नाही. ती एका जागी बसून आपले काम अचूकपणे पार पाडू शकतात.
दारुगोळ्याचे विघटन –
माझ्या प्रयोगशाळेत मी वॅक्स मॉथ (wax moth) नावाच्या पतंगवर्गीय कीटकांच्या अळ्यांचा वापर केला. त्यांनी अतिशय सहजपणे त्या टणक इंधनातून विशिष्ट घटक खाऊन टाकले आणि ते इंधन निरुपयोगी केले. या अळ्यांपासून प्रेरणा घेऊन मी एक यंत्र विकसित केले. या यंत्राद्वारे टणक प्रोपेलंटचे विघटन केले जाते. आजपर्यंत या यंत्राद्वारे मी सुमारे हजारो किलो प्रोपेलंटचे विघटन केले आहे, ज्यात तीन ब्रह्मोस रॉकेटचाही समावेश आहे. कीटकांच्या वापरामुळे अनेक फायदे होतात – प्रोपेलंट हाताळताना होणारे अपघात टाळता येतात, नैसर्गिक पद्धतीने विघटन होत असल्याने पर्यावरणीय धोका कमी होतो, आणि विघटन जलद होत असल्याने वेळेची व त्यानुसार पैशांचीही बचत होते.
विमान वाचवणारे मित्रकीटक –
विमानांना पक्ष्यांमुळे होणारे अपघात ही एक गंभीर समस्या आहे. पक्षी विमानतळावरील गवतात आढळणाऱ्या कीटकांना खाण्यासाठी येतात. पक्षी अनपेक्षितपणे विमानासमोर आल्यास होणारे परिणाम भीषण असू शकतात. पक्षी विमानांना धडकू नयेत यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. या उपायांवर लाखो रुपये खर्च होतात. तरीही पक्षी धडकण्याचे प्रमाण कमी होत नाही. हे सर्व यांत्रिक उपाय असल्याने पक्ष्यांना त्याची कालांतराने सवय होते. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी मी ट्रायकोग्रामा या मित्रकीटकाचा वापर केला. एक मिलिमीटरपेक्षा लहान असलेल्या या माशीची मादी इतर कीटकांच्या अंड्यांमध्ये स्वतःची अंडी घालते. यामुळे अळीवर्गीय कीटकांची संख्या कमी होते आणि खाद्याअभावी पक्ष्यांचे येणेही कमी होते. मी ही पद्धत अशा प्रकारे विकसित केली की स्थानिक परिसंस्था अजिबात विस्कळीत होत नाही आणि विमानेही सुरक्षित राहतात. हा यशस्वी प्रयोग आता अनेक विमानतळांवर नियमितपणे वापरला जातो. मी हे मित्रकीटक भारतीय वायुदल, भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि नागरी विमानतळांवर नियमितपणे पाठवतो आणि पक्षी नियंत्रणात आणतो.
प्लास्टिक खाणाऱ्या अळ्या –
जगभरात प्लास्टिकचे व्यवस्थापन आणि विघटन या समस्येवर संशोधन सुरू आहे. एक साधी कॅरी बॅग नैसर्गिकरित्या विघटित होण्यासाठी हजारो वर्षे लागतात, ही चिंताजनक बाब आहे. प्लास्टिकचे विविध प्रकार असतात, त्यापैकी सर्वांत मोठी समस्या म्हणजे २० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक – उदाहरणार्थ आपण दैनंदिन वापरात आणणाऱ्या कॅरी बॅग्ज. मी विविध प्रजातींच्या अळ्यांचा अभ्यास केला आणि शोधून काढले की वॅक्स मॉथ या पतंगाच्या अळ्या प्लास्टिक खाऊन पचवू शकतात. या अळ्या विशेषतः कमी जाडीच्या प्लास्टिकचे विघटन करू शकतात आणि त्या इतर पदार्थही खाऊ शकतात. प्लास्टिकव्यतिरिक्त थर्माकोल, लॉकडाउन काळातील पीपीई किट्स, फोम शीट अशा अनेक पदार्थांचे विघटन या कीटकांकडून होऊ शकते.
अन्नाचे जलद विघटन करणारे कीटक –
पुण्यातील बॉम्बे सॅपर्स या सैन्य तुकडीमध्ये माझ्या मार्गदर्शनाखाली एक नाविन्यपूर्ण प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पात ब्लॅक सोल्जर फ्लाय (मराठीत ‘काळा शिपाई’) या माशीच्या अळ्यांच्या मदतीने दररोज २०० किलो ओल्या कचऱ्याचे विघटन केले जाते. कचरा विघटन झाल्यानंतर या अळ्यांचा वापर मासे आणि कुक्कुटपालन व्यवसायात खाद्य म्हणून केला जातो. अशा प्रकारे एक चक्रीय अर्थव्यवस्था (circular economy) तिथे विकसित झाली आहे. याच ब्लॅक सोल्जर फ्लायचा वापर करून मी भारतीय सैन्यासाठी सियाचीनसारख्या दुर्गम प्रदेशांमध्येही प्रयोग करत आहे. तिथे या माशीच्या साहाय्याने अन्नाचे विघटन यशस्वीरीत्या करण्यात आले आहे. आता विविध ठिकाणी हे युनिट स्थापित करण्याचे काम सुरू आहे.
सियाचीनमधले किडोशौचालय–
सियाचीनसारख्या अतिशय थंड प्रदेशात, जिथे आपले सैन्य तैनात आहे, तेथे मलविघटन ही एक मोठी समस्या आहे. अत्यंत कमी तापमानात हे विघटन कसे शक्य होईल याचा विचार करून मी बर्फात जगणाऱ्या कीटकांचा अभ्यास केला आणि त्यातून एक नवीन किडोशौचालय विकसित केले.
कीटकांपासून प्रेरणा घेऊन तयार केलेले हे शौचालय उणे ४० अंश सेल्सिअस तापमानातही कार्यक्षम राहू शकते. कोणतीही महागडी साधने न वापरता, कमी वेळात उभारल्या जाणा-या या शौचालयांना विजेची आवश्यकता नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात बर्फ जमत नाही. मला सांगताना अतिशय आनंद होतो की सध्या सियाचीन बेस कॅम्पमध्ये आपले सैनिक हे शौचालय वापरत आहेत आणि अल्प कालावधीत मलविघटन होत आहे. आता आणखी एक किडोशौचालय आपल्या सैन्याच्या अशा एका चौकीवर बसवले जाणार आहे, जिथे तापमान नेहमीच शून्याखाली असते. पहिल्यांदाच असा अभिनव प्रयोग सैन्यदलात होत आहे.
—–
काळाप्रमाणे गरजा बदलत जातात. या बदलत्या गरजा ओळखून नव्या प्रकारच्या क्षेत्रात संशोधन करुन समाजपयोगी कार्य करणाऱ्या या ‘ चौकटीबाहेरच्या माणसा ‘ चं मनापासून कौतुक!
लेखक : श्री भूषण कटककर
प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘सुखांत…‘ ☆ माहिती प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले☆
(अंत्यसंस्कार केंद्र)
☆
जरा विचार करा, कुठे चालला आहे आपला समाज?
भारतातील मानवी मूल्यांना लाजवेल असे एक विशेष प्रदर्शन…
ही कंपनी अंतिम संस्कार करणार आहे. कंपनीचे सदस्यत्व शुल्क रु. 37500/- आहे. ज्यात सावकार, पुजारी, न्हावी, खांदा देणारा, तुमच्या सोबत चालणारा, रामाचे नाव घेऊन सत्य बोलणारा, हे सर्व संगतीचेच असतील. शिवाय, कंपनी स्वतःच अस्थिकलश विसर्जन करेल.
हा देशाचा एक नवीन स्टार्ट अप म्हणून देखील गणला जाऊ शकतो, ज्याने आधीच 50 लाख रुपये नफा कमावला आहे. परंतु भविष्यात त्याची उलाढाल 2000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कारण कंपनीला माहीत आहे की…
… भारतात संबंध टिकवायला आता कोणालाच वेळ नाही… ना त्याच्या मुलाशी, ना त्याच्या भावासोबत, ना इतर नातेवाईकांशी…
☆
माहिती प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈