मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #184 ☆ रूप सावळे सुंदर… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 184 – विजय साहित्य ?

रूप सावळे सुंदर… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

रूपं सावळे सुंदर

उभे आहे विटेवरी

पांडुरंग हरी रूप

ठेवी कर कटेवरी….!

 

नाम संकीर्तनी हरी

माळ तुळशीची गळा

वैष्णवांचा मायबाप

लावी पंढरीचा लळा…!

 

अष्टगंध अबीराने

दिसे खुलूनीया रुप

मत्स्य कुंडले किरीट

मोहवीते निजरूप…!

 

राजा पंढरीचा माझा

मागे रखुमाई राणी

पितांबर आणि शेला

गाई कैवल्याची गाणी….!

 

रूप सावळे सुंदर

कंठी वैजयंती माला

संकटात धावे विठू

सखा वैष्णवांचा झाला..!

 

संत साहित्यात शोभे

विविधांगी पांडुरंग

पहा आषाढीची वारी

विठू दर्शनात दंग….!

 

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ टोमॕटोची जादू… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ टोमॕटोची जादू… ☆ श्रीशैल चौगुले ☆

सुखी संसारात

टोमॕटोची भर

समृध्दीच नांदे

भोजनाने घर.

 

पत्नीचा रुसवा

टोमॕटोचा हार

नको जवाहिरे

आवडिचा सार.

 

काय सांगू बाई

टोमॕटोची किर्ती

गावदेश तृप्त

सत्वस्वाद स्फूर्ती.

 

नाचतच आले

पतीराज एक

वाढदिन शुभ

टोमॕटोचा केक.

 

मस्त-मस्त चीज

अस्वास्थ्य भरुन

टोमॕटोचा चट्टा

दुष्काळ सरुन.

 

शेतकरी खुश

टोमॕटोचा मळा

जावई नवखा

सोनेमुल्य तोळा.

 

पैकी वरदान

मंथनाचे यत्न

टोमॕटोचा कुंभ

नवरस  रत्न.

 

भांडाभांडी खत्म

सांबार रसाळ

शत्रु मित्र झाला

टोमॕटो मिसळ.

                

आता म्हणे धरा

तोच भक्त जाण

टोमॕटोची शेती

घेतलीया आण.

 

सत्तेची पालट

टोमॕटोची जादू

चंचलात राजा

राजकिय साधू.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ साठवणीतल्या आठवणी ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

?विविधा ?

☆ साठवणीतल्या आठवणी ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

माणूस जन्माला यायच्या आधी पासून साठा त्याच्याशी निगडीत आहे. मुलं जन्माला यायच्या आधी पासूनच आई त्याच्या साठी कपड्यांचा साठा करते. जन्मानंतर जसे वय वाढते आपण वेगवेगळ्या गोष्टीचा साठा करत जातो.

लहानपणी रेल्वेची तिकिटे, शंख शिंपले, बाटल्यांची झाकणे, रंगीत कागद, टरफले, काचांचे तुकडे अश्या विविध गोष्टी आपण साठवतो.

जसे वय वाढते साठवण्याचे प्रकार बदलत जातात.

शाळेत जायला लागलो की झाडाची पाने, वर्तमान पत्रातील व मासिकातील आवडीची कात्रणे, रंगीत सागरगोटे, स्टिकर्स, पत्ते, खोडरबर, पेन्सिली अश्या अनेक गोषटींबाबत आवड निर्माण होते.

तरुणपणी सौंदर्य सामुग्रिंचा साठा, कानातली, बांगड्या, टिकल्या, अत्तर, रुमाल, काही आवडत्या व्यक्ती चे फोटो, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, चपला व पुस्तकांचा आपण साठा करत असतो.

मधल्या वयात ह्यात आणखी बदल आढळतो जसे की सासरी गेलेल्या मुलीकडे नवीन कपडे, दागिने, भांडी, पर्स  सारेच नवे नवे आणि हवे हवे असे असते.

पन्नाशीच्या आसपास हा साठा अजून बदलतो. पूर्वी बायका धान्याचा साठा करायच्या, तळणीच्या पदार्थांचा साठा नाहीतर मसाल्यांचा साठा करायच्या. स्वयंपाक घरात डब्यात पैस्यांचा साठा असायचा.

पन्नाशीच्या बायकांचा तर साड्या, दागिने, घरातील भांडी ह्यांचा साठा आपोआप झालेलाच असतो. त्यात अजून नाविन्य पूर्ण वस्तूंचा भर पडतो. पुरुषांच्या बाबतीत जसे की कपडे, चपला, पुस्तके, पेन व पाकिटं ह्या वस्तूंचा साठा आढळतो.

जसे जसे वय वाढते तसे तर आपण आपल्याकडचा साठा कमी करायला पाहिजे पण तो वाढतच जातो मग तो पैश्याचा असो नाहीतर आणखी काही.

वृद्ध व्यक्ती औषधांचा साठा करतात. त्यातील काही पुस्तकांचा, छायाचित्रांचा  तर काही वर्तमान पत्राच्या कात्रणांचासंग्रह करतात. काहिंकडे पिशव्या, टॉवेल आणि पैष्यांचा साठा असतो.

नवीन पिढीला वस्तु साठवायला आवडत नाही. ते जुन्या वस्तू काढून नव्या घेत असतात. म्हणजे जुना साठा संपतो आणि नवीन वस्तूंचा साठा सुरू होतो.

असा सर्व गोष्टींचा साठा करत एक दिवस जेव्हा आपल्याला हे जग सोडून जायची वेळ येते तेव्हा आपण आयुष्यभर जपलेल्या ह्या वस्तू दुसऱ्यांसाठी निरुपयोगी ठरतात.

कधी कधी विचार येतो माणसाला सर्व वस्तू वर घेवून जाता आले असते तर त्याने किती वस्तु साठवल्या असत्या.

खरं तर आपण चांगल्या विचारांचा, कृतींचा आणि आरोग्याचा साठा केला तर आपण आपले आयुष्य अधिक सुखकारक रित्या जगू शकू……

माणूस करत जातो साठवणी

कालांतरी फक्त राहतात आठवणी

जेव्हा त्याची होते जगातून पाठवणी.

© सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी , कोंढवा पुणे

संपर्क :  सन युनिव्हर्स फेज २, एम ५०३, नवले ब्रिज जवळ, नऱ्हे, पुणे.

फोन   : ७५०६२४३०५०

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जिव्हाळा… ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ जिव्हाळा… ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

आईला ऑपरेशनसाठी आत नेलं, तसा प्रसन्न बाहेर रिसेप्शन काउंटर जवळच्या सोफ्यावर येऊन बसला. विशाखा सासूबाईंची फाईल घेऊन तिथेच बसली होती.

आज पहाटे साडेपाचला आई बाथरुमला जायला म्हणून उठली आणि चादरीत पाय अडकून पडली. कमरेचं हाड मोडलं होतं. तो आणि विशाखा तिला घेऊन करूणा आर्थोपेडिक हाॅस्पिटलमध्ये घेऊन आले. एक्स-रे बघून ऑपरेशन शिवाय गत्यंतर नाही असं डाॅक्टर म्हणाले. तेही लगेच करायला हवं होतं. सुदैवाने आईला इतर काही व्याधी नसल्याने बाकी रिपोर्ट्स चांगले आले. आणि आता नऊ वाजता ऑपरेशन सुरू झालं होतं.

या सगळ्या गोंधळात दोघांना चहा घ्यायला देखील सवड मिळाली नव्हती. हाॅस्पिटलच्या कँटिनचा मुलगा चहा घेऊन आला, तसं प्रसन्न आणि विशाखा, दोघांनी चहा घेतला.

चहा पिऊन प्रसन्नाने त्याच्या बाॅसला फोन करून आज ऑफिसला येऊ शकत नसल्याचं कळवलं. विशाखानं तीन दिवस रजाच टाकलेली होती. उद्या तिच्या भावाच्या मुलीचं लग्न होतं बोरीवलीला. आज घरातलं आवरून दुपारी ती आणि सई, तिची लेक, मालाडला जाणार होत्या, तिच्या माहेरी. आणि आज सकाळी हे सगळं झालं होतं.

तिनं ठाण्यातच राहणाऱ्या तिच्या मोठ्या जाऊबाईंना फोन लावला. सासूबाईंबद्दल कळवलं. ती पुढे काही बोलायच्या आधीच त्या म्हणाल्या, “अरे देवा ! अग आम्ही आलो असतो ग, पण काल घरी येताना हे पावसात भिजले ना, त्यांना रात्री थंडी वाजून ताप भरलाय. रात्री १०३ होता, अजूनही पूर्ण उतरलेला नाही. बघते दुपारी उतरला ताप तर संध्याकाळी मी येऊन जाईन. “

‘यांच्या तब्येतीच्या तक्रारी म्हणजे गोड बोलून नाही म्हणणं आहे. इकडे तिकडे भटकताना बरे टुणटुणीत असतात. कायम कुठल्या न कुठल्या टूरवर जात असतात आठ-पंधरा दिवस !’ विशाखा मनात म्हणाली.

“अहो, राजूभावजींना फोन करायला हवा ना?” तिनं प्रसन्नला विचारलं. राजू म्हणजे प्रसन्नचा दोन नंबरचा भाऊ ! प्रसन्न सगळ्यात धाकटा.

“करू सावकाश ऑपरेशन झाल्यावर ! तो आणि त्याची बायको काही इथे यायचे नाहीत. नुसत्या उंटावरून शेळ्या हाकतील. शंभर चौकश्या करतील. असं कसं झालं? तुम्ही काळजी घ्यायला हवी होती. यांव करा नि त्यांव ! तू आणि सई ठरल्याप्रमाणे जा बोरीवलीला. मी करतो मॅनेज इथे. तसंही पेशंटचं जेवणखाण इथेच मिळणार आहे. “

“अहो, तुम्ही एकटे कसं कराल? मी आज काही जात नाही. उद्याचं उद्या बघू. आईंना असं ठेवून जाऊन माझं काही तिथे लक्ष लागणार नाही. मीराताईंना विचारायचं का? पण नकोच, त्यांच्या घरी आधीच एवढं खटलं आहे. तरी त्या बिचार्‍या येतात धावून मदतीला !”

मीरा प्रसन्नची बहिण, लांबच्या नात्यातली. ती मुलुंडला राहायला होती. तिच्या घरी तिचे सासू-सासरे दोघंही ऐंशीच्या पुढचे. त्यामुळे विशाखाला तिची मदत मागायला संकोच वाटायचा.

असाच थोडा वेळ गेला आणि ऑपरेशन थिएटरमधून त्यांना बोलावणं आलं. ऑपरेशन व्यवस्थित झाल्याचं सांगून डाॅक्टर गेले. पाच-सहा दिवस तरी आईला हाॅस्पिटलमध्ये राहावं लागणार होतं. तिला सेमी डिलक्स रूममध्ये हलवण्यात आलं. एका रूममध्ये दोन पेशंट असणार होते.

आईला रूममध्ये ठेवून वाॅर्डबाॅय बाहेर गेल्यावर प्रसन्न आणि विशाखा आत गेले. आई अजून जरा गुंगीतच होती. रूम तशी बऱ्यापैकी मोठी होती. बाजूच्या काॅटवर एक साधारण साठीच्या बाई झोपल्या होत्या. त्यांच्याही पायाचं ऑपरेशन झालेलं दिसत होतं.

त्यांच्या बाजूला बहुतेक त्यांचा नातू बसलेला होता. पण तो आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होता. त्याने फक्त कोण आहे ते बघण्यासाठी एकदा मान वर करून बाजूला बघितलं आणि पुन्हा मोबाईलकडे नजर वळवली.

सईचा फोन आला होता, ‘ मी येऊ का आजीजवळ बसायला? ‘ उद्या लग्नाला कसं जायचं आपण, या विचाराने थोडी नाराजही झाली होती ती ! पण विशाखानं तिला घरीच थांब म्हटलं. कामवाली यायची होती. शिवाय कुकर लावून, बाहेरून पोळी-भाजी आणून /मागवून ठेवायलाही सांगितलं. मग तिनं  प्रसन्नला घरी पाठवलं. तो स्वतःचं आवरून आणि जेवून आला की विशाखा घरी जाणार होती.

विशाखा सासूबाईंच्या काॅटजवळ येऊन बसली आणि तिचा फोन वाजला. ‘जिव्हाळा’ च्या कुलकर्णी काकू बोलत होत्या. “अग, सुधाताईंचं ‘सुप्रभात’ आलं नाही ग्रुपवर सकाळी, म्हणून मी फोन केला, तर तो पण उचलला नाही त्यांनी. म्हणून मी आणि सानेबाई तुमच्या घरी गेलो. सईकडून हा सगळा प्रकार कळला. झालं का सुधाताईंचं ऑपरेशन?”

“हो काकू, ऑपरेशन झालं व्यवस्थित. अजून एक-दीड तासांनी त्या शुद्धीवर येतील, म्हणाले डॉक्टर. “

“बरं, तुला आज बोरिवलीला जायचंय ना भाचीच्या लग्नासाठी? ते तू ठरल्याप्रमाणे जा. सई बोलली मला, मग ग्रुपवर कळवलं मी ! आम्ही सगळी जबाबदारी वाटून घेतली आहे दोन दिवसांसाठी. रात्री माटेवहिनी येणार आहेत सुधाताईंजवळ झोपायला. त्यांना सकाळचा चहा नाश्ता आमची सुरभी देईल, ऑफिसला जाता जाता ! मग काळेबाई, निशा, देशपांडे काकू आणि मी उद्याचा दिवसभर आळीपाळीने थांबू. रात्री सरोजाताई येतील झोपायला. त्यामुळे प्रसन्नलाही लग्न अटेंड करता येईल उद्या. बाकी काही मदत लागली तर शहाणे, कुलकर्णी वगैरे पुरूष मंडळी आहेतच. ” असं म्हणून काकूंनी फोन ठेवला सुद्धा ! 

‘जिव्हाळा’, हा खरं तर सासऱ्यांच्या पेंशनर्स मित्रांचा ग्रुप. ठाण्यात राहणाऱ्या या पंधरा जणांनी हा ‘जिव्हाळा’ ग्रुप बनवला होता. या ग्रुपपैकी कोणाच्याही घरी काही अडचण असेल तर, बाकीचे जाऊन शक्य ती सगळी मदत करायचे. मग ती मदत आर्थिक असो, सोबत करण्याची असो की इतर काही.

कोणाची मुलं परदेशी, कोणाची असून नसल्यासारखी, तर कोणी एकेकटेच. शिवाय नोकरी व्यवसायामुळेही मुलं-सुना दिवसभर बाहेर असायची. वेळ – प्रसंग काही सांगून येत नाही. पण अडचणीवर मात करण्यासाठी या सगळ्यांनी हा सोपा मार्ग शोधला होता. विशाखाचे सासरे गेले तेव्हा या मदतीचा अनुभव त्यांनी घेतला होता.

सासऱ्यांनंतर सासूबाई आता या ग्रुपवर होत्या. प्रत्येकाने सकाळी ‘सुप्रभात’, चा मेसेज टाकला म्हणजे, ‘All is well’ समजायचं. इतर वेळी फोन, मेसेज करायचाच गरज असेल तर. त्यानंतर विशाखा, प्रसन्न आणि इतर काही जणांची मुलं-सुनादेखील या ग्रुपला मदत करण्यात सामील होऊ लागले होते.

विशाखाला अगदी भरून आलं होतं. इथे रक्ताच्या नात्याची माणसं सबबी सांगत होती आणि ही  जिव्हाळ्यानं जोडलेली माणसं मात्र खंबीरपणे पाठीशी उभी राहिली होती. आता ती निश्चिंत मनाने भाचीच्या लग्नाला जाऊ शकणार होती.

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “इच्छामरण…” – भाग-२ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “इच्छामरण…” – भाग-२ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

( फार मोठी चूक करत होतो मी–आणि त्यासाठी त्या सगळ्या थोर पुरुषश्रेष्ठांची अगदी मनापासून क्षमा मागतो मी ताई…) -इथून पुढे.

‘ पण मग, धर्माचा आधार न घेताही, आपल्याला असणा-या असाध्य, असह्य अशा शारिरीक व्याधींपासून सुटका करणारा दुसरा कोणताच मार्ग शिल्लक नाही म्हणून कुणी मरणाची इच्छा केली तर त्यात फार काही वावगे आहे असे नाही, असे माझे म्हणणे आहे. ’  

‘ अर्थात् अशा इच्छामरणासाठी काही अटी असाव्यात, जसे की, त्या व्यक्तीला खरोखरच दुर्धर असा आजार आहे, जो औषधोपचारांना दाद देत नाही आहे, आणि कधीच देणार नाहीये, पुरेसा काळ त्या व्यक्तीवर योग्य ते व जास्तीत जास्त शक्य ते सर्व उपचार करून झालेले आहेत आणि आता केवळ मरणाची वाट पहात सहनशक्ती पणाला लावणे एवढेच करण्यासारखे आहे. या सर्व गोष्टी पडताळून पाहून त्यांची खातरजमा करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची अधिकृत समिती सरकारने स्थापन केलेली असावी, ज्यांनी अशा व्यक्तीच्या प्रकृतीची त्रयस्थपणे पूर्ण तपासणी करून, आजारपणाच्या दुर्धरतेबद्दल खात्रीपूर्वक दुजोरा दिलेला असावा. आजारी माणसाने पूर्ण शुद्धीवर असतांना, त्रयस्थ साक्षीदारांसमोर आपली मरणेच्छा आपणहून मनापासून जाहीर केलेली असावी. किंवा आजारी माणूस पूर्ण बेशुध्दावस्थेत बराच काळपर्यंत असेल, आणि त्यातून बाहेर येऊन तो काही बोलेल याची डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अजिबात शक्यता नसेल, तर त्याच्या अगदी निकटच्या अशा मुला-माणसांनीही केवळ त्या व्यक्तीवरील प्रेमापोटी याबाबत विचार करण्यास हरकत नसावी. पण त्यांच्या या विचारामागे कोणतेही आथिक किंवा इतर व्यवहार गुंतलेले नाहीत याची स्वतंत्रपणे, अगदी  व अधिकृतपणे शहानिशा करण्याची तजवीज कायद्याने केलेली असावी.’

‘ सर्वात महत्त्वाचे म्हणजे, इच्छामरणाला परवानगी देण्यापूर्वी, ज्याला मरायचे आहे, त्याचीच फक्त तशी इच्छा आहे, इतर कोणाचीही नाही, याची पूर्ण खात्री करून घेणे सर्वात जास्त आवश्यक आहे. अर्थात् मरणासन्न अवस्थेत नेऊन पोहोचविणा-या ‘असाध्य’ शारीरिक व्याधीतून सुटण्यासाठीच केवळ ‘इच्छामरण’ हा पर्याय मान्य करता येण्याजोगा आहे. म्हणजेच कोणत्याही कारणामुळे आलेल्या मानसिक वैफल्यातून केलेल्या आत्महत्येला कधीही इच्छामरण म्हणता येणार नाही हे सर्वप्रथम स्पष्ट असावे…‘

बोलता बोलता हा भाऊ जरा थांबल्यावर दुसरा भाऊ लगेच बोलायला लागला. पहिल्याचे बोलणे एकदम खोडून काढत तो म्हणाला की …. ‘ कारण कोणतेही असले आणि कितीही नियमांमध्ये व अटींमध्ये बसत असले, तरी इच्छामरण म्हणजे शेवटी आत्महत्याच, जी अजिबात समर्थनीय नाही. जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी माणसाच्या हातात नाहीत. जन्माबद्दल तर काही प्रश्नच नाही, पण मृत्यूसुध्दा माणसाने असा ठरवून मागून घेणे, जरी शक्य असले तरी, अजिबात बरोबर नाही. कारण जन्माला येतांना जेवढ्या श्वासांची शिदोरी त्याने बरोबर आणली होती तेवढे श्वास घेऊन झाल्याशिवाय मरणे म्हणजे आत्म्याला अगदी ठरवून अतृप्त भरकटत ठेवण्यासारखे आहे. जे भोग भोगण्यासाठी हा जन्म मिळाला आहे, ते सर्व भोगल्याशिवाय मरण येऊच नये. ईश्वरी इच्छा नसतांना, स्वत:च्या इच्छेने मरण यावे यासाठी प्रयत्न करणे हे मोठे पापच आहे. म्हणून कुणालाही इच्छामरणाची मुभा नसावी. मरणासन्न असणा-या आजा-यालाही मरणाचा योग येईपर्यंत मरणयातना सोसण्याचा भोग भोगायलाच हवा, आणि हो, त्याची सेवा करणा-यांनीही, अशी सेवा करणे हा त्यांचा भोग आहे असे समजून शांतपणे सेवा करीत रहावे. इच्छामरण हा विचारही नको. ’ 

दोन सख्ख्या भावांच्या  या दोन टोकाच्या विचारांवर विचार करता करता माझे मन मात्र तिसरीकडेच भरकटत होते. आपल्या आजूबाजूचे आजकालचे भीषण वास्तव पहाता, सर्व जीवनावश्यक वस्तूंमधली सर्वात स्वस्त व सहजपणे उपलब्ध होणारी वस्तू म्हणजे ‘माणसाचा जीव’…. असे माझ्यासारख्या सर्वांनाच  जाणवत असेल. कितीही काळजीपूर्वक आणि पूर्ण सुरक्षित वाटणारी कायदेशीर तरतूद करून, सर्वसमावेशक अटी घालून, इच्छामरणाला अधिकृत परवानगी जरी दिली, तरी, हे नियम पाळले असे भासवण्यासाठी आवश्यक तो भ्रष्टाचार करून, एखाद्या व्यक्तीने इच्छामरण स्वीकारले असल्याचा देखावा निर्माण करून, आपल्या स्वार्थासाठी त्याला जिवे मारायचे आणि स्वत:च छाती पिटत त्याची अंत्ययात्रा काढायची, अशी नवीच कायदेशीर पळवाट तर गुंडांना मिळणार नाही ना, हीच भीती माझ्या मनात सर्वप्रथम आली. आणि इच्छामरणाला परवानगी म्हणजे एखाद्या असहाय्य जीवाला आपल्या असाध्य दुखण्याच्या यातनांमधून सोडविण्याची मुभा, एवढाच अर्थ न रहाता, ‘ नको असणा-या कोणालाही खात्रीशीर ‘संपविण्याचा’ कायदेसंमत राजमार्ग ‘ असा त्याचा सोयीस्कर वापर होण्याचा फार मोठा धोका त्यात आहे हे मला प्रकर्षाने जाणवून गेले. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ म्हणतात ते असं ! पण तरीही, माझ्या आईसारखी प्रकृतीची अवस्था असणा-यांना, माणुसकीच्या नात्याने, निव्वळ प्रेमापोटी – दयेपोटी इच्छामरणाची परवानगी असायला हवी हा विचार आधी वाटला तेवढा क्रूरपणाचा नाही, या विचाराकडे मात्र माझे मन नकळतच झुकू लागले होते.

आईबद्दल हा असा विचार मनात येताच, बोलणे तिथेच थांबवून मी झटकन् उठून खोलीकडे निघाले, तर नर्स आम्हाला बोलवायलाच येत होती. डॉक्टर आधीच आईजवळ पोहोचले होते. आम्हाला पाहताच डॉक्टरांनी नजरेनेच आम्हाला सत्य सांगितले. आमची आई आम्हाला कायमची सोडून गेली होती. तिच्या मरणेच्छेवर आम्ही विचारांचा खल करत बसलो होतो, पण देवाने मात्र तिची ती मनापासूनची इच्छा अखेर पूर्ण केली होती.

मनाच्या त्या अतीव दु:खी आणि हतबल अवस्थेतही मला प्रकर्षाने वाटून गेले की खरंच, मुलांना कधीही कोणताही त्रास व्हायला नको यासाठी आयुष्यभर दक्ष असणा-या आईने, आत्ताही ती काळजी घेतली होती. डॉक्टरांनी आमच्यासमोर टाकलेला जीवघेणा पेच, आम्ही त्यात अडकून गेलोय् हे पाहून, तिनेच नेहेमीसारखा सहजपणे सोडवून टाकला होता. आता आम्हाला करण्यासारखे काहीच उरले नव्हते…….

… तरीही मनात एका प्रश्नाचा भुंगा फिरायला लागलाच होता…… आईच्या मृत्यूला ‘ नैसर्गिक मृत्यू ‘ म्हणायचे, की …. तिच्या अंतर्मनात ठामपणे घर करून राहिलेल्या मरणाच्या विचाराचा विजय झाल्याने आलेले हे प्रामाणिक आणि अगदी मनापासूनचे “ इच्छामरण “ म्हणायचे हा ?????

– समाप्त –

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २९ (इंद्रसूक्त): ऋचा ५ ते ७ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २९ (इंद्रसूक्त): ऋचा ५ ते ७ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २९ (इंद्रसूक्त) – ऋचा ५ ते ७ 

ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : देवता – इंद्र 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील एकोणतिसाव्या  सूक्तात शुनःशेप आजीगर्ती  या ऋषींनी इंद्र देवतेला आवाहन केलेले  असल्याने हे इंद्रसूक्त म्हणून ज्ञात आहे. आज मी आपल्यासाठी इंद्र देवतेला उद्देशून रचलेल्या पाच ते सात या  ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.

मराठी भावानुवाद :

समि॑न्द्र गर्द॒भं मृ॑ण नु॒वन्तं॑ पा॒पया॑मु॒या ।

आ तू न॑ इंद्र शंसय॒ गोष्वश्वे॑षु शु॒भ्रिषु॑ स॒हस्रे॑षु तुवीमघ ॥ ५ ॥

कुत्सित बोलत अमुच्याविषयी अभद्र जे भाषा  

अशा रासभा निर्दालुनिया जागृत ठेवी आशा 

यांच्या संगे असंख्य भोग्य साधने आम्हा द्यावी

जगतामध्ये ऐपत अमुची सर्वश्रेष्ठ व्हावी ||५||

पताति कुण्डृणाच्या दूरं वातः वनात् अधि ।

आ तु नः इंद्र शंसय गोषु अश्वेषु शुभ्रिषु सहस्रेषु तुवीऽमघ ॥ ६ ॥

वावटळीसी कोसो कोसो दूर घेऊनि जाई 

काननाचिया पार नेऊनि पतन करोनी टाकी

यांच्या संगे असंख्य भोग्य साधने आम्हा द्यावी

जगतामध्ये ऐपत अमुची सर्वश्रेष्ठ व्हावी ||६||

सर्वं॑ परिक्रो॒शं ज॑हि ज॒म्भया॑ कृकदा॒श्वम् ।

आ तू न॑ इंद्र शंसय॒ गोष्वश्वे॑षु शु॒भ्रिषु॑ स॒हस्रे॑षु तुवीमघ ॥ ७ ॥

समस्त दुःखांचा शोकांचा करुनी परिहार

अमुचा वैरी नाश करी त्याचा करी संहार 

यांच्या संगे असंख्य भोग्य साधने आम्हा द्यावी

जगतामध्ये ऐपत अमुची सर्वश्रेष्ठ व्हावी ||७||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)

https://youtu. be/ZBdJ2NoTlrA

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1, Sukta 29, Rucha 5 – 7

Rugved Mandal 1, Sukta 29, Rucha 5 – 7

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ डोळा… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ डोळा… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

डोळा लागणे (झोप लागणे)

डोळा मारणे (इशारा करणे)

डोळा चुकवणे (गुपचूप जाणे)

डोळे येणे (नेत्रविकार होणे)

डोळे जाणे (दृष्टी गमावणे)

डोळे उघडणे (सत्य उलगडणे)

डोळे मिटणे (मृत्यू पावणे)

डोळे खिळणे (एकटक पाहणे)

डोळे फिरणे (बुद्धी भ्रष्ट होणे)

डोळे दिपणे (थक्क होणे)

डोळे वटारणे (नजरेने धाक दाखवणे)

डोळे विस्फारणे (आश्चर्याने पाहणे)

डोळे पांढरे होणे (भयभीत होणे)

डोळे भरून येणे (रडू येणे)

डोळे भरून पाहणे (समाधान होईपर्यंत पाहणे)

डोळे फाडून पाहणे (आश्चर्याने निरखून पाहणे)

डोळे लावून बसणे (वाट पाहात राहणे)

डोळेझाक करणे (दुर्लक्ष करणे)

डोळ्यांचे पारणे फिटणे (पूर्ण समाधान होणे)

डोळ्यात प्राण आणणे (आतुरतेने वाट पाहणे)

डोळ्यात धूळ फेकणे (फसवणूक करणे)

डोळ्यात तेल घालून बघणे (लक्षपूर्वक पाहणे)

डोळ्यात डोळे घालून पाहणे (एकमेकांकडे प्रेमाने बघणे)

डोळ्यात सलणे/खुपणे (दुसऱ्याचं चांगलं न बघवणे)

डोळ्यात अंजन घालणे (दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवून देणे)

डोळ्यांवर कातडे ओढणे (जाणूनबुजून दुर्लक्ष करणे)

डोळ्याला डोळा नसणे (काळजीमुळे झोप न लागणे)

डोळ्याला डोळा भिडवणे (नजरेतून राग व्यक्त करणे)

डोळ्याला डोळा न देणे (अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे)

दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणे ; पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न दिसणे (दुसऱ्याची छोटीशी चूक दिसणे ; पण स्वतःची मोठी चूक न दिसणे)

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ मृगतृष्णा… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ मृगतृष्णा… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

 “अरं  ढवळ्या लेका! का असं गठुळ्यागत अंग मुडपूनशान खाली बसलास? मळ्याकडं जोताला जायचं नव्हं का आपुल्याला? धाकलं मालक आता वाड्यातून दहीभाकरचा तुकडा खाऊन बाहीर येतील कि मर्दा! आनी तु असा बसलेला बघितल्यावर खवळायचं न्हाई व्हयं?… आरं ह्यो आळस सोड नि गपगुमान उभा राहा बघू!.. “

“… पवळ्या दादा, म्या आता जो हथं बसलोय ना त्ये काय लवकर उठायचं नावं घेनार नायं… आवं दादा आता कालच दिव्याची आवस उलाटली.. अन सारवण सुरू झाला तरी पाउसाचा टिपुस काय गळाया तयार न्हाई… पार उन्हाळ्यातल्यावानी उनाचा कडाका तसाच पडतोय कि… आजवर चार बाऱ्या झाल्या नांगरटणीला खेटं घालून.. वळीवानं तोंड वळविलं, म्रिगानं तर तोंड दावलचं न्हाई, ती मधली दोनी बी लबाड नक्षत्रं पाठ दाखवूनच गायब… आरं जित्राबं सुध्दा बिळं सोडून गेली तत मानसांची नि  आपली काय गत झालीया, तुला कायं येगळं सांगाय हवं काय? ढेकळांचा चोक शोष पडल्यावानी उताणी पडलेली रानं… हिरीचं, ओढयाचं खरवडून निघालेलं  पानं.. रोज मैल मैल धुरळा उडवीत जाऊन एक कळशीभर पाणीची उसाभर करून आपला तर जीव पार धायकुतीला आला बघं… दादा आता अवसान गळाठयला बघं… चार पावलं उचलून टाकाया न्हाई जमायचं… ते धाकलं मालक येऊ देत न्हाई तर मोठ्ठं… मला  इथचं पडून राहावंसं वाटतया… दादा आता माझा राम राम करायची येळ झाली बघा… तुम्ही वाईट वाटूनशान घेऊ नका… तुमचा  आमचा संबंध इथवर छान जुळला… मला तुमी लै सांभाळून घेतलसा…. आता दादा तुम्ही सोताला सांभाळा… म्या जरा आता निवांत पडून राहतो… मालकानां माझा राम राम सांगा.. “

” अरं ढवळ्या, असं काय येड्यावानी बरळतूया! आरं ते बघं काळं निबारं ढग दाटून आल्याती… पावसाची झड येऊ लागली… गार वारं सुटलं लेका.. आला आला बघ पाऊस सुरू झाला कि येड्या! आरं उठं चटदिशी उभा राहा… पावसाच्ं पाणी पिऊन घे बघं कशी तरतरी येती ते… उठं कि रे गब्रु… अरं उठं.. उठं.. “

ढगांच्या गडगडाटात, विजेच्या लखलखाटात पावसाच्या रूपेरी धारा बरसू लागल्या… संजीवनी घेऊन आलेला पाऊस मात्र ढवळयाची तहान भागवू शकला नाही…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 221 ☆ आलेख – नाद शंख का… ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है।आज प्रस्तुत है एक आलेखनाद शंख का

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 221 ☆  

? आलेख – नाद शंख का?

हिंदू धर्म और संस्कृति विज्ञान संमत है. हमारी संस्कृति में पूजा, जन्म, विवाह, युद्ध, आदि अवसरों पर शंख नाद किये जाने की परम्परा आज भी बनी हुई है. भारतवर्ष के पूर्व से पश्चिम, उत्तर से दक्षिण हर घर मंदिर में पूजा स्थल पर शंख मिल जाता है. भारतीय डायस्पोरा के विश्व व्यापक होने एवं अक्षरधाम, इस्कान तथा अन्य वैश्विक समूहों के माध्यम से शंख विश्व व्यापी हो गया है.

दरअसल शंख मूल रूप से एक समुद्री जीव का कवच ढांचा होता है. पौराणिक रूप से शंख की उत्पत्ति समुद्र से मानी जाती है. चूंकि समुद्र मंथन से ही लक्ष्मी जी का प्रादुर्भाव कल्पित है अतः शंख को को लक्ष्मी जी का भाई भी कहा जाता है. बंगाल की देवी पूजा में शंखनाद का विशेष महत्व होता है, वहां महिलायें भी सहज ही दीर्घ शंखनाद करती मिल जाती हैं.

शंख बजाने का स्पष्ट लाभ शारीरिक स्वास्थ्य पर दिखता है. मुंह की मसल्स का सर्वोत्तम व्यायाम हो जाता है जो किसी भी फेशियल से बेहतर है. शंख बजाने से गैस की समस्या (Gastric Problem) दूर होती है. इससे शरीर के श्वसन अंगों की एक्सरसाइज होती है जिससे हृदय रोग की संभावनायें नगण्य हो जाती हैं. शंख की ध्वनि की फ्रीक्वेंसी ऐसी कही गई है जिससे कई कीड़े मकोड़े वह स्थान छोड़ देते हैं जहां नियमित शंख की आवाज की जाती है. शंख के प्रक्षालित जल के पीने से मुंहासे, झाइयां, काले धब्‍बे दूर होने लगते हैं, हड्डियां मजबूत होती हैं और दांत भी स्वस्थ रहते हैं. संभवतः ऐसा इसलिये होता है क्योंकि इस तरह हमारे शरीर में कैल्शियम का वह प्रकार पहुंचता है जो इस तरह के रोगों के उपचार में प्रयुक्त होता है.

पौराणिक काल से शंख को शौर्य का द्योतक भी माना जाता था. प्रत्येक योद्धा के पास अपना शंख होता था. जैसे योद्धाओ के घोड़ो के नाम सुप्रसिद्ध हैं उसी तरह महाभारत के योद्धाओ के शंखों के नाम भगवत गीता में वर्णित हैं और विश्वप्रसिद्ध हैं. श्रीमद्भगवतगीता के पहले अध्याय में अनेक महारथियों के शंखों का वर्णन है. “पांचजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः। पौण्ड्रं दध्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदर।। अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिर। नकुल सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ।। “

भगवान श्रीकृष्ण का प्रसिद्ध शंख पाञ्चजन्य था. जब श्रीकृष्ण और बलराम ने महर्षि सांदीपनि के आश्रम में उज्जैयनी में शिक्षा समाप्त की, तब महर्षि सांदीपनि ने गुरुदक्षिणा के रूप में भगवान कृष्ण से अपने मृत पुत्र को मांगा था. तब गुरु इच्छा की पूर्ति के लिये श्रीकृष्ण ने समुद्र में जाकर शंखासुर नामक असुर का वध किया था. शंखासुर की मृत्यु उपरांत उसका कवच शंख अर्थात खोल शेष रह गया जिसे श्रीकृष्ण ने पाञ्चजन्य नाम दिया था.

गंगापुत्र भीष्म का प्रसिद्ध शंख था जो उन्हें उनकी माता गंगा से प्राप्त हुआ था. गंगनाभ का अर्थ होता है ‘गंगा की ध्वनि’. जब भीष्म इस शंख को बजाते थे, तब उसकी भयानक ध्वनि शत्रुओं के हृदय में भय उत्पन्न कर देती थी. महाभारत युद्ध का आरंभ पांडवों की ओर से श्रीकृष्ण ने पाञ्चजन्य और कौरवों की ओर से भीष्म ने गंगनाभ को बजा कर ही किया था.

“अनंतविजय” युधिष्ठिर का शंख था जिसकी ध्वनि अनंत तक जाती थी. इस शंख को साक्षी मान कर चारों पांडवों ने दिग्विजय किया और युधिष्ठिर के साम्राज्य को अनंत तक फैलाया. इस शंख को धर्मराज ने युधिष्ठिर को प्रदान किया था.

“हिरण्यगर्भ” सूर्यपुत्र कर्ण का शंख था. ये शंख उन्हें उनके पिता सूर्यदेव से प्राप्त हुआ था. हिरण्यगर्भ का अर्थ सृष्टि का आरंभ होता है और इसका एक संदर्भ ज्येष्ठ के रूप में भी है. कर्ण भी कुंती के ज्येष्ठ पुत्र थे.

“विदारक” दुर्योधन का शंख था. विदारक का अर्थ होता है विदीर्ण करने वाला या अत्यंत दुःख पहुंचाने वाला. इस शंख को दुर्योधन ने गांधार की सीमा से प्राप्त किया था.

भीम का प्रसिद्ध शंख “पौंड्र” था. इसका आकार बहुत विशाल था और इसे बजाना तो दूर, भीमसेन के अतिरिक्त कोई अन्य इसे उठा भी नहीं सकता था. इसकी ध्वनि इतनी भीषण थी कि उसके कम्पन्न से मनुष्यों की तो क्या बात है, अश्व और यहां तक कि गजों का भी मल-मूत्र निकल जाया करता था. ये शंख भीम को नागलोक से प्राप्त हुआ था.

अर्जुन का प्रसिद्ध शंख “देवदत्त ” था जो पाञ्चजन्य के समान ही शक्तिशाली था. इस शंख को स्वयं वरुणदेव ने अर्जुन को वरदान स्वरूप दिया था. जब कुरुक्षेत्र के मैदान में पाञ्चजन्य और देवदत्त एक साथ बजते थे तो दुश्मन पलायन करने लगते थे.

“सुघोष” माद्रीपुत्र नकुल का शंख था. अपने नाम के अनुरूप ही ये शंख किसी भी नकारात्मक शक्ति का नाश कर देता था.

“मणिपुष्पक” सहदेव का शंख था. ये शंख मणि, मणिकों से ज्यादा दुर्लभ था. वर्णन है कि नकुल और सहदेव को उनके शंख अश्विनीकुमारों से प्राप्त हुए थे.

“यञघोष” द्रौपदी के भाई धृष्टद्युम्न का शंख था जो उसी के साथ अग्नि से उत्पन्न हुआ था और तेज में अग्नि के समान ही था. इसी शंख के उद्घोष के साथ वे पांडव सेना की व्यूह रचना और सञ्चालन करते थे.

आज भी किसी महति कार्य के शुभारम्भ को शंखनाद लिखा जाता है. उदाहरण के लिये चुनाव प्रचार का शंखनाद, अर्थात शंखनाद हमारी संस्कृति में रचा बसा हुआ है.

© विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

ए 233, ओल्ड मिनाल रेजीडेंसी भोपाल 462023

मोब 7000375798

ईमेल [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 104 ⇒ नाम की महिमा… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “नाम की महिमा”।)  

? अभी अभी # 104 ⇒ नाम की महिमा? श्री प्रदीप शर्मा  ? 

संज्ञा हो या सर्वनाम, हमारा नाम के बिना काम नहीं चलता। नाम में ही ईश्वर का वास है, नाम में ही भगवान भी हैं और नारायण भी, फिर भी हमें हमारे मनमंदिर के राम के दर्शन नहीं होते।

बचपन से ही मैं राम के करीब भी रहा हूं, और ईश्वर के करीब भी! नारायण तो मेरा पक्का दोस्त था, कल के भगवान को हम आज भगवान भाई कहकर पुकारते हैं, बड़े अच्छे मिलनसार व्यक्ति हैं। ।

अपने इष्ट और आराध्य को हम जिस भी नाम से स्मरण करते हैं, पुकारते हैं और भजते हैं, वे सभी तो सूक्ष्म रूप में हमारे आसपास मौजूद हैं, लेकिन इस नश्वर जीव पर माया का ऐसा पर्दा पड़ा है, कि वह सिर्फ नाम में ही नहीं, रूप और स्वरूप में भी उलझा है। मंदिर में विराजमान मर्यादा पुरुषोत्तम राम अलग है और मेरा मित्र राम अलग। दोनों की आपस में कोई तुलना नहीं हो सकती।

ईश्वर, परमेश्वर, भगवान अथवा अपने इष्ट को हम जानते, पहचानते और मानते हैं, उनकी जप, पूजा, आराधना, प्रार्थना और सेवा सुश्रुषा करने में जो भक्ति भाव और परमानंद की अनुभूति होती है, वह किसी परिचित गिरीश और जगदीश से मिलने अथवा स्मरण मात्र से संभव नहीं। कहां राजा भोज …. ?

आदर्श अलग होता है और वास्तविकता और हकीकत उससे बहुत अलग होती है। गरीबों, दीन हीन की सेवा ही ईश्वर की सेवा है, माता पिता के चरणों में स्वर्ग है और गौ माता की तो बस पूछिए ही मत। फिर भी मंदिर मंदिर है और गुरुद्वारा गुरुद्वारा। अयोध्या के राम ही वास्तविक राम हैं और मथुरा द्वारका के कृष्ण ही तो कृष्ण कन्हैया हैं।

क्या सिर्फ नाम लेने, स्मरण करने अथवा अपने इष्ट को भजने से ही जीव का कल्याण हो सकता है। कहने को तो कहा भी गया है, कलियुग नाम आधारा! और शायद इसीलिए किसी अपने मित्र नारायण को पुकारते पुकारते आपको भी साक्षात नारायण के दर्शन हो जाएं। ।

हमारे आसपास कितने स्त्री पुरुष के ऐसे नाम मंडरा रहे हैं, जिनके नाम मात्र से ही किसी देवी देवता का स्मरण हो आता है। सीता, सावित्री,

सरस्वती, मंगला, गायत्री और लक्ष्मी जैसे नाम पहले रखे ही जाते थे, आज भी रखे जाते हैं, बस उनकी दशा मत पूछिए, क्योंकि आज सरस्वती काम पर नहीं आने वाली, बेचारी बीमार है।

यह इंसान बहुत चतुर और चालाक है। वह एक तीर से दो शिकार करना चाहता है, रमेश, दिनेश, सुरेश, महेश, अविनाश, अरविंद और कई शैलेष उसके परिचित स्नेही, मित्र, रिश्तेदार और करीबी हैं, आम के आम और गुठलियों के दाम, यानी उनके नाम के बहाने अपने इष्ट का भी नाम लेने में आ जाएगा और पहचान के लिए उनके नाम के आगे वर्मा, सक्सेना, अवस्थी और श्रीवास्तव सुशोभित हो जाएगा। ।

नाम से ही हमारी पहचान है, प्रसिद्धि है। एक राम नाम ही तो हमारे सभी बिगाड़े काम बनाता है।

कहीं खाटू श्याम तो कहीं सांवरिया सेठ, किसी के महाकाल तो किसी के ओंकार। पुणे में अगर दगड़ू सेठ के गणपति की महिमा है तो पूरे महाराष्ट्र में अष्ट विनायक विराजमान हैं। एक और मेरा परम मित्र गणेश मुझे नैनीताल बुला रहा है, तो दूसरी ओर अभिन्न हृदय नारायण जी का प्रयाग राज का आग्रहपूर्ण आमंत्रण लंबित है।

नाम में ही रस और रूप है। महाराष्ट्र के संत गोंदवलेकर महाराज ने नाम के माहात्म्य पर एक पुस्तक लिखी है, प्रवचन पारिजात, जिसमें नाम की महिमा पर उनके ३६५ प्रवचन संकलित हैं। १ जनवरी से ३१ जनवरी तक। रोज एक पृष्ठ पढ़िए, नाम में खो जाइए। राम तेरे कितने नाम। ।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares