मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विनवणी ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🙏 विनवणी ! 🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

खळ नाही तुझ्या आभाळा

अविरत धरलीस धार,

केलास इरशाळवाडीमधे

तूच भयंकर कहर !

 

घे उसंत आता जराशी

नदी नाल्या आले पूर,

ओल्या दुष्काळाचे सावट,

करू लागले मनी घर !

 

धीर सुटे बळीराजाचा

पाणी डोळ्याचे खळेना,

उघड्या डोळ्यांनी पाहे

पेरणीच्या शेताची दैना !

 

कर उपकार आम्हावर

पुन्हा एकदा विनवितो,

भाकर तुकडा लेकरांचा

सांग कशास पळवतो ?

सांग कशास पळवतो ?

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 192 ☆ आम्ही विद्याधामीय… ☆ सुश्री प्रभा सोनवणे… ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 192 ?

☆ आम्ही विद्याधामीय… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

दिवस विद्याधामचेआठवणीत ठेवायचे

वर्षे झाली पन्नासच हेच गाणे म्हणायचे

हेडसरांचा दराराआठवतोय आजही

प्रार्थना आणि प्रतिज्ञा, शोधतो आहे ती वही

काळ सुखाचा शाळेचा, तेव्हा नसते कळत

अभ्यासू ,हुषार ,मठ्ठ एका रांगेत पळत

 या शाळेच्या छायेतून गेलो जेव्हा खूप दूर

दोन्ही डोळ्यांच्या काठाशी दाटलेला महापूर

शाळा मात्र नेहमीच होती सदा धीर देत

सा-याच संकटातून पुढे पुढे पुढे नेत

भेटीची ही अपूर्वाई कैक वर्षानंतरची

लक्षात ठेऊ नेहमीआम्ही सारे विद्याधामी

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “वेगळा पाऊस…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “वेगळा पाऊस…” ☆ सौ राधिका भांडारकर 

आजचा पाऊस जरा वेगळा

काहीसा खट्याळ लडीवाळ

हळुच कानाशी कुजबुजणारा

फारच उनाड पण मधाळ..

 

आजचा पाऊस जरा वेगळा

हळुच जाऊन पानांवर बसला

गार वार्‍याशी बोलता बोलता

थेंबाथेंबाने धरणीला चुंबत राहला…

 

आजचा पाऊस जरा वेगळा

पडू की नको पडू भावनांचा

हळुहळु होता आरंभाला

नंतर झाला वर्षाव धारांचा…

 

आजचा पाऊस जरा वेगळा

रानावनात स्वैरपणे हिंडला

चातकाच्या  चोचीत ओघळला

अन् मोराचा पिसारा फुलवला..

 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झाडं… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ झाडं… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

वादळासोबत उडू न जाणारी झाडंच मातीत घट्ट पाय रोवून उभी रहातात सावधपणे. डवरतात.फळाफुलानी बहरतात. भुकेल्याची तहान भूक शमवण्यात स्वतः ला धन्यमानतात. पांथस्थाना देतात सावली. पाखरांना देतात आधार.मातीलाही आपल्या मुळाशी बांधून ठेवतात आपलीशी करून आपल्याशी. परिसराला नसती शोभाच  नाही तर ऐश्वर्यसंपन्न ही बनवतात आपल्या परीने . विश्वासाने त्यांच्या कडे बघणाराच्या मनातील आनंद , हर्षोल्लास द्विगुणित करतात .आपल्या जागेवर अटल राहून. ती असता स्थितप्रज्ञ. अबोल. तुम्हाला नसतं त्याच कसलंच निमंत्रण. गरजवंतालाच जावलागतं  त्यांच्या कडे .तुम्ही गेलात त्यांच्याकडे तर ती करतनाहीत तुमचा आव्हेर. कशालाच ती  विरोध नाहीत करत. तुम्हाला हव ते घ्याही म्हणत नाहीत आणि नाही ही म्हणत नाहीत. माणसान असलच झाड बनाव आपलं सर्वस्व दान करणार.

परोपकाराच प्रतीक बनाव. मार्गदर्शक बनाव. झाडाच्या जगण्याचा आदर्श घ्यावा. जन्मावं, वाढावं, तगावं, माणसांच्यासाठी. तेव्हा सगळा समाजच संपन्न होईल, निरागस, निर्मळ, परोपकारी. माग कळेल झाडांची ममता आणि महानता. पण त्यासाठी मातीशी अतूट नाळ जोडावी लागते. देण्यातला आनंद लूटण्यआलआ शिकावं लागतं.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘लिव्ह – इन…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ ‘लिव्ह – इन…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुमनमावशी बाहेर व्हरांड्यात मोबाईलवर बोलत होत्या. बेलचा आवाज आला, म्हणून त्या कुठल्या रूमची बेल वाजली हे बघायला वळल्या, तेवढ्यात ते काका त्यांच्याकडेच येताना दिसले. 

“पॉट द्यायचा होता जरा पेशंटला “, ते म्हणाले आणि व्हरांड्यात थांबले. 

“हो हो”, म्हणत मावशी लगबगीने तिकडे गेल्या. नंतर मावशी खोलीबाहेर आल्या आणि काकांना आत जायला त्यांनी खुणावलं. एवढ्यात बहुतेक त्यांचा मुलगा आणि नात आले. ” बाबा, आईचा नाश्ता झालाय ना? तुम्ही हा गरम गरम उपमा खाऊन घ्या. आज जरा उशीरच झाला मला. ही छकुली पण लवकर उठून बसली आज. मग तिच्यामुळे सविताला कामं आवरायला वेळ झाला थोडा.” तो म्हणाला. 

“अरे, असू दे. तुमची धावपळ मला कळत नाही का?;शिवाय सविता सकाळी सहाला उठून इथून घरी जाते. त्यानंतर सगळं करणार ना?” काका म्हणाले.   

आत्ताच ज्यांना पाॅट द्यायला त्या गेल्या होत्या, त्या सिंधुताईंचे हे मिस्टर आणि हा मुलगा असावा, असा सुमनताईंचा अंदाज ! सिंधुताईंना कंपवाताचा त्रास होता. मेंदूला रक्तपुरवठा नीट न झाल्याने, या आजारात स्नायू कडक, शिथील होतात. माणसाला शरीराचा तोल सांभाळता येत नाही. ‘डोपामाईन’, सारख्या गोळ्यांनी थोडा आजार नियंत्रित होतो. पण गोळीचा परिणाम पाच-सहा तासच टिकतो. आणि   गोळीचा प्रभाव कमी होऊ लागला की पेशंटचे हाता-पायाचे स्नायू आपली लवचिकता घालवून बसतात. 

पहाटे बाथरूमला जाताना सिंधूताईंच्या बाबतीत नेमकं हेच घडलं होतं. त्या तोल जाऊन पडल्या. कमरेच्या डाव्या बाजूचं हाड मोडलं. डोक्याला खोक पडल्यामुळे पाच टाके घालावे लागले. हातालाही मुकामार लागला होता. पण त्यांची घरची माणसं अगदी प्रेमानं करत होती त्यांचं. 

सुमनमावशी गेले चार – पाच दिवस हे सगळं ऐकत होत्या, पहात होत्या. ‘ म्हातारा – म्हातारी लई नशीबवान आहेत. नाहीतर एवढं प्रेमानं करणारी मुलं आता कुठं बघायला मिळतात. सविता म्हणजे सूनच असेल. पण मनापासून करतेय वाटतं सासूचं.’ 

मावशीची दिवसपाळी असल्याने त्यांनी सविताला पाहिलेलं नव्हतं. एक-दोनदा बाजूच्या दुसर्‍या पेशंटचं करत असताना त्यांची सहज नजर गेली, तेव्हा तो मुलगा आपल्या आईच्या अंगावरून हात फिरवत, तिला रात्री झोप नीट झाली का, विचारत होता. तीन-साडेतीन वर्षांची  नात, तिच्या आजीजवळ काॅटवर बसण्याचा हट्ट करत होती.

दुसर्‍या दिवशी दुपारी काका त्यांना म्हणाले, ” मावशी जरा खाली जाऊन मी हिची औषधं घेऊन येतो. तोवर जरा हिच्याजवळ थांबता का?”

मग सुमनमावशींना आयती संधीच मिळाली सिंधुताईंशी गप्पा मारायची. सुमनमावशी न राहवून सिंधुताईंना म्हणाल्या, ” बाई, लय नशीबवान आहात तुम्ही ! घरची सगळी लय प्रेमानं करतात तुमचं. अवो या करोनानंतर तर माणसं येकदम दूर दूरच राहायला लागलीत आजाऱ्यापास्नं. रोज बघतोय न्हवं का आम्ही हिथं !”

“खरंय, तुमचं ! पण मावशी एक सांगू का? या करोनानंतरच मला हे कुटुंब मिळालंय सगळं !”

 “आँ ! काय म्हन्तासा?”

“अहो खरंच सांगते. हे सुधीरराव आणि माझे मिस्टर सुधाकर लहानपणापासून घट्ट मित्र. मिस्टरांच्या पोर्ट ट्रस्टच्या नोकरीमुळे आम्ही मुंबईकर झालो आणि सुधीरराव प्रोफेसर होऊन नागपुरातच राहिले ! आम्ही ऑफिस क्वार्टर्समध्ये रहात होतो. आमची दोन्ही मुलं शिकून – सवरून संसारात स्थिरावली. त्यांना मुंबईत घर घ्यायला ह्यांनीच फंडातून पैसे काढून दिले. त्यामुळे रिटायर झाल्यावर आमच्याकडे फारशी पुंजी नव्हती आणि क्वार्टर सोडावं लागलं त्यामुळे घरही नाही. यांच्या पेंशनमध्ये आमचं दोघांचं भागलं असतं. पण मुलांना आता आमची अडगळ नको होती त्यांच्या संसारात !….  सुधीररावांना हे कळलं तसं त्यांनी यांना मनवून नागपुरात बोलावून घेतलं. त्यांचा मोठा बंगला होता सहा खोल्यांचा. शिवाय मागच्या बाजूला चाळटाईप वनरूम कीचन बांधून चार भाडेकरू ठेवले होते. त्यांनी स्वतःच्या बंगल्यातल्या दोन स्वतंत्र खोल्या आम्हाला वापरायला दिल्या. बाजूलाच त्यांच्याकडे चार खोल्या. मधला दरवाजा उघडला तर एकच मोठं घर. त्यांच्या बायकोशी माझी मैत्री आधीच झाली होती. त्यांना एकच मुलगा, तो अमेरिकेत स्थायिक झालाय. आई-वडिलांशी त्याचे चांगले संबंध ! पण इथलं राजकारण आणि भ्रष्टाचारी व्यवस्थेमुळे त्याला इकडे परत यायचं नाहिये. तो यांनाच तिकडे बोलावत होता पण यांना जायचं नव्हतं.”

“आम्ही इकडे राहायला आलो आणि तीनच वर्षांंनंतर सुधीररावांची बायको वारली, ब्रेन हॅमरेजनं. त्यानंतर मग आम्ही तिघे एकत्रच राहात होतो म्हणाना ! फक्त झोपायला वेगळ्या रूममध्ये. सात-आठ वर्षांपूर्वी मला पार्किन्सनचा त्रास सुरू झाला. पण घरातलं स्वैपाकपाणी मी करू शकत होते. बाकी कामाला बाई ठेवली होतीच.”

“२०२० उजाडलं आणि फेब्रुवारी २०२० मध्ये माझ्या मिस्टरांना कोरोनानं गाठलं. खरंतर त्यांना नक्की काय झालंय हे डॉक्टरना कळण्याआधीच ते गेले. एकाच घरात  राहणाऱ्या, मी आणि सुधीररावांची परिस्थिती फार विचित्र झाली होती… हा मुलगा दिनेश मागच्या चाळीत राहायला आला २०१८ मध्ये. प्रायव्हेट कंपनीत नोकरी करून एकीकडे शिकत होता काॅमर्सला ! अडल्या वेळी सगळ्यांना मदतीला तयार असायचा. याचे आई-वडील आणि मोठा भाऊ, लांब गोंदियाजवळ होते राहायला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत वडील गेले. तीनच महिन्यात भाऊही गेला. आणि त्या धक्क्याने आईचा हार्टफेल झाला. हा तर लाॅकडाऊनमुळे इकडेच अडकलेला. कामधंदाही बंद. अगदी वेडापिसा झाला होता. त्याचं सगळं कुटुंबच हरवलं ना ! त्याला माणसात आणायला आम्ही काय काय केलं ते आम्हालाच माहीत.”

“सविता, डी. एड. झालेली. सावत्र आईच्या जाचाला कंटाळून नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडण्याची संधी शोधत होती. इंटरव्ह्यूच्या निमित्ताने आमच्या चाळीत मैत्रिणीकडे नागपुरात आली आणि लाॅकडाऊनमुळे इकडेच अडकली. मैत्रिणीचा नवरा शिक्षक प्रायव्हेट स्कूलमध्ये. शाळा बंद झाल्या. पगार नाही, जागा लहान. ते तरी हिला किती दिवस ठेवून घेणार? पैसे तर हिच्याकडेही फारसे नव्हतेच. जेमतेम परतीच्या प्रवासाएवढे. ती दोघंही पाॅझिटिव म्हणून सरकारी केंद्रात भरती झाली. ही निगेटिव्ह पण होम क्वारंटाईन ! आम्हीच डबा देत होतो तिला. बंगल्यात वर्षभराचं धान्य भरलेलं होतं म्हणून निभावलं कसंतरी !

ही छोटी जुई, दीड वर्षांची आणि तिचे आई-वडील आणि आजी तिघेही कोरोनानं गिळले. तेही मागच्या चाळीतच राहणारे. तिला सवितानंच सांभाळलं. जुईचा एकच काका. तो दुबईत. मागच्या वर्षी तो भारतात आला. पैशाचा प्राॅब्लेम नसला तरी तो काही पुतणीची जबाबदारी घ्यायला तयार नव्हता. “

“माझी तब्येतही खूप बिघडली. महिनाभर बिछान्यावरून उठता येत नव्हतं. त्यावेळी सविताच आमचं जेवणखाण सांभाळत होती. दिनेश बाकीची मदत करत होता. पडेल ते काम करत होता. आमचं एक कुटुंबच तयार झालं म्हणाना ! आपण कायम असंच एकत्र राहावं असं आम्हां सगळ्यांना वाटायला लागलं. 

आम्ही खूप चर्चा करून निर्णय घेतला. मी आणि सुधीररावांनी सोय म्हणून रजिस्टर विवाह केला. अर्थात त्यांच्या मुलाला विश्वासात घेऊन. सविता आणि जुईला एकमेकींचा लळा लागला होताच. कोरोना काळात सविता आणि दिनेश एकमेकांना चांगले परिचित झाले होते. दिनेश बी. काॅम झाला आणि सुधीररावांच्या ओळखीनं त्याला एका सी. ए. कडे अकाउंट असिस्टंटची नोकरी पण  मिळाली. त्या दोघांच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला आणि त्यांनी तो स्वीकारला. सविताने तिच्या वडिलांना लग्नाविषयी कळवलं होतं, परंतु त्यांनी काहीच दखल घेतली नाही. जुईला त्यांनी दत्तक घ्यायचं ठरवलं आणि मग तिच्या काकांकडून सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून घेतल्या.”

“आता आम्ही सगळे एकत्र राहतो, एकमेकांसाठी जगतो. आजी-आजोबा, मुलगा-सून आणि नात, असं परिपूर्ण कुटुंब आहे आमचं ! अशी आहे आमची ‘लिव्ह-ईन  फॅमिली”, सुधीरराव म्हणाले.   

“अरेच्चा, तुम्ही कधी आलात, कळलंच नाही.” सिंधुताई म्हणाल्या. 

… सुमनमावशी ही सगळी कहाणी ऐकून निःशब्दच झाल्या होत्या.

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सामान्यांचे कंबरडे…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “सामान्यांचे कंबरडे…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

जगात सगळ्यात ताकदवान कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे सामान्यांचे कंबरडे. हे नेहमी मोडण्यासाठीच असतं.  पेट्रोल डिझेलची भाववाढ झाली की सामान्यांचे कंबरडे मोडते.

सिलेंडर चे भाव वाढले की सामान्यांचे कंबरडे मोडते.  दर वर्षी केंद्रात आणि राज्यात अशी दोनवेळा अंदाजपत्रके म्हणजेच बजेट येतात. त्या दोन्ही वेळेला विरोधी पक्षांच्या मते सामान्यांचे कंबरडे मोडलेले असते.  तसं पाहायला गेलं तर मी एक सर्वसामान्य माणूस आहे.  पण कंबरडे हा अवयव कुठे आहे हे मला अजून समजलं नाही.  कंबर आणि त्याच्या जवळपास कुठेतरी तो असला पाहिजे कारण त्याचं नाव कंबर या नावावरून तयार झालेलं आहे असा आपला माझा सर्वसामान्य माणसाचा बाळबोध अंदाज. तर हा कंबरडे नावाचा सर्वशक्तिमान अवयव मी सर्वसामान्य असून सुद्धा मला काही अजून सापडला नाही.  बहुधा तो शरीराच्या आत कोठेतरी दडला असावा.  कारण माझी कंबर दुखते हे माझ्या आई ग ! उई ग ! वरून सगळ्यांनाच समजतं.  परंतु कंबरडं मोडतं म्हणजे काय होतं हे काही अजून मला समजलं नाही. ते मोडत असून सुद्धा पुन्हा ते कसं जोडलं जातं तेही समजत नाही. कारण एकदा मोडल्यानंतर पुन्हा मोडण्यासाठी मध्यंतरीच्या काळात ते जोडलं जाणं आवश्यक आहे.  कारण न जोडता ते पुन्हा मोडणार कसं ? त्यामुळे हा कंबरडं नावाचा अवयव कुठे असतो, तो सतत मोडून सुद्धा कसा जोडला जातो, या साऱ्या चमत्काराची फोड कुणी करत असेल तर मला हवी आहे.  बघा तुम्हाला जमतय का –  हे कबरडं कुठे आहे आणि ते कसं मोडलं आणि जोडलं जातंय हे शोधून काढायला ?

मला कळवा हं तुम्हाला समजलं तर…

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “’रम डे’ ची  कथा” ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ “’रम डे’ ची  कथा” ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

एवढा धो धो पाऊस पडतोय. अशा वेळेस दोनच गोष्टींची निवड करणे शक्य असते – एक म्हणजे पुस्तक-वाचन आणि दुसरी म्हणजे अपेयपान !    

अशा पावसात अस्सल दर्दी माणसाला व्हिस्की, बीअर, व्होडका, वाईन यातील कुठलेच पेय लागत नाही. या अस्सल दर्दी माणसाची पसंती असते एकाच पेयाला – ते म्हणजे – रम ! हा परिचित ब्रँड तुमच्या जमान्यातला असेल, पण ही ‘रम’ ब्रिटिश जमान्यात मुंबईत बनत होती, हे तुम्हाला माहीत नसेल.  आज तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे. 

१८५३ साली पहिली आगगाडी व्हिक्टोरिया टर्मिनसवरून निघाली. तेव्हा पुढचं स्टेशन होतं – भायखळा. दादर नव्हतं, कुर्ला नव्हतं, मुलुंड नव्हतं, पण एक स्टेशन होतं, ते म्हणजे भांडुप ! आश्चर्याचा धक्का बसेल, पण बाकी कुठलंही स्टेशन नव्हतं. 

आता भांडुप स्टेशन असण्याचं कारण काय?  कारण फार गंमतीदार आहे. भांडुपला गाडी थांबली, तर बरेचसे गोरे भांडुपला उतरले आणि तिथे गावात जाऊन चार-पाच पेग रम मारली आणि परत गाडीत येऊन बसले.  तेव्हा भांडुपची लोकसंख्या असून असून किती असणार? तर तीनशे, चारशे… कारण १८८१ साली जेव्हा जनगणना झाली, तेव्हा भांडुपची लोकसंख्या होती – जेमतेम पाचशे चव्वेचाळीस ! आता एवढ्या छोट्या गावात तेव्हा रम कशी बनवली जायची? …. 

त्याचं झालं असं – मुंबई जेव्हा ब्रिटीशांच्या ताब्यात आली, तेव्हा त्यांनी ल्यूक ॲशबर्नर नावाच्या माणसाला भांडुप हे गाव नाममात्र भाड्याने दिले. हा ल्यूक ॲशबर्नर ‘ बॉम्बे कुरियर ‘ नावाच्या वर्तमानपत्राचा संपादक होता. त्याला सांगितलं गेलं की, ‘ तू वर्तमानपत्र पण सांभाळायचं आणि इथे रम पण बनवायची.’ तो काय करणार बिचारा? तो अग्रलेख लिहिणार की रम बनवणार? मग त्याने एक युक्ती केली. त्याचा कावसजी नावाचा मॅनेजर होता. त्यानं त्याच्या हाती कारभार सोपवला आणि त्याला सांगितलं की, ‘ रम बनवणे तुझं काम आहे.’                                                        

तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की, त्या काळी साडेचार लाख लिटर रम बनवली जायची आणि आख्ख्या भारतभर ब्रिटिश सैनिकांना पुरवली जायची. त्याच्यानंतर गंमत काय झाली की, मॉरिशसला स्वस्त रम तयार व्हायला लागली आणि मग भांडुपचा ‘रम’चा धंदा बंद करावा  लागला .  ‘बॉम्बे गॅझेटियर’च्या चव्वेचाळीसाव्या पानावर ल्यूक ॲशबर्नरच्या नावासकट ही माहिती उपलब्ध आहे.  

आता ही सगळी माहिती आम्हाला कुठून मिळाली? तर आमचे एक मित्र आहेत – श्री. माधव शिरवळकर. त्यांनी ” मुंबई ब्रिटिशांची होती तेव्हा…” या नावाचे पुस्तक लिहिले. त्यात अशा अनेक गंमतीजमती आम्हाला वाचायला मिळाल्या. तेव्हा आज आपल्याला माधव शिरवळकरांचेही आभार मानलेच पाहिजेत. त्यांचे हे पुस्तक आपण जरूर वाचा.

तोवर ….. “ चीअर्स ! “   

लेखक : अज्ञात. 

(https://www.instagram.com/p/Cuej5u-NBh-/) – या सूत्रधाग्यावरून (link) साभार.

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माफक अपेक्षा… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

माफक अपेक्षा ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

एका निवांत क्षणी भावुक होऊन तिला त्याने विचारलं…”काही हवंय का तुला?”

अशा अनपेक्षित प्रश्नाने ती दचकली.40 वर्षाच्या संसारात साधं पाणीही न विचारलेला माणूस आज का असं विचारतोय?

कारण आज त्याला जाणीव झाली…. आपल्या जीवनाची नौका किती सहजपणे पार झाली, या भ्रमातून सुटून त्या नौकेची नावाडी त्याची बायको होती, याची जाणीव.

डोळ्यावरचा चष्मा सुरकुतलेल्या कानामागे सरकवत ती म्हणाली,

“हो, खूप काही हवं होतं. पण योग्य वेळी.आता या वयात काय मागू मी?

लग्न झालं आणि या घरात आले, हक्काचा माणूस म्हणून फक्त तुम्ही जवळचे होता. पण तुम्हाला ना कधी बोलायला सवड,ना माझ्यासोबत वेळ घालवायची आवड.सतत आपले मित्र, नातेवाईक आणि भाऊ बहीण…आपल्याला एक बायको आहे.तिच्या काही मानसिक गरजा आहेत,हे तुम्ही ओळखून मला तुमच्याकडून मानसिक ऊब हवी होती.

घरातली कामं करून दमायचे, आल्या गेल्याचं जेवण, नाष्टा, पाणी, त्यांचा मुक्काम.. अंगावर ओढून घ्यायचे.कितीतरी स्वप्नं पाण्यावर सोडायचे, आजारपण अंगावर काढायचे, जीव नकोसा व्हायचा, पण संसाराचे नाव येताच त्राण परत आणून पुन्हा सज्ज व्हायचे.

त्यावेळी गरज होती मला. दोन शब्दांनी फक्त विचारपूस केली असती, तर पुढची चाळीस वर्षं जोमाने आणि आनंदाने  जबाबदाऱ्या पार पाडल्या असत्या.

तुमच्या घरात जेव्हा सर्वजण एका बाजूला राहून माझ्यावर खापर फोडायचे, मला एकटं पाडायचे, तेव्हा मला गरज होती ती तुमची. तुम्ही मात्र तटस्थ.तेव्हाची झालेली जखम आजतागायत मनावर ओली आहे. वेळ निघून गेली, आता कशी पुसणार ती जखम?

गर्भार असतांना माझ्या आई- वडिलांवर जबाबदारी टाकून मोकळे झालात, पण माझे डोहाळे पुरवायचे तुमच्याकडून राहून गेलेत..त्या नऊ महिन्यांत तुम्ही माझ्यासोबत वेळ घालवावा,आपल्या बाळाशी बोलावं…हे हवं होतं मला तेव्हा.आज काय मागू मी?

माझंही शिक्षण झालं होतं, मलाही काहीतरी करून दाखवायचं होतं. तेव्हा प्रेरणा हवी होती, आधार हवा होता तुमचा.आज सगळं संपून गेल्यावर काय मागू मी?

मुलांमागे धावताना, त्यांच्यासाठी आयुष्य ओवाळून टाकताना तुम्ही माझा भार जरा हलका करावा हे हवं होतं मला, तेव्हा शरीराची जी झीज झाली त्याचे व्रण अजूनही तसेच आहेत…आज ती वेळ निघून गेल्यावर कसे पुसणार ते व्रण?

संसाराच्या नावाखाली झालेला अन्याय मी पदराआड लपवला…तुम्हाला कसली शिक्षाही नाही मिळणार.मी कोण तुम्हाला शिक्षा देणारी? पण एका स्त्रीचं आयुष्य तुम्ही तुमच्या गरजेखाली पणाला लावत तिचं आयुष्य व्यर्थ घालवलं, याची नोंद मात्र त्या विधात्याकडे अबाधित असेल…

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “कालिंदी” – लेखिका : श्रीमती अनुराधा फाटक ☆ परिचय – सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

स्व-परिचय

मी सौ. मंजिरी येडूरकर, MSc, BEd  असून मिरज येथे माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत होते. त्या काळात रोजच्या सांगली – मिरज बस प्रवासात मिळणाऱ्या वेळेत काव्य निर्मिती सुरू झाली. पण त्या प्रसंगानुरूप! कुणाचा वाढदिवस, सहस्त्र चंद्र दर्शन, निरोप समारंभ, लग्न मुंज अशा समयोचित कविता करायला सुरुवात झाली. मी निवृत्ती जरा लवकरच घेतली. त्यामुळं वेळ मिळत होता. सुचलेलं लगेच लिहायला बसू शकत होते. मग कथा ललित लेख लिहायला सुरवात झाली. ‘जाहल्या तिन्हीसांजा’ हा कवितासंग्रह व ‘मर्म बंधातली ठेव ही’ हा कथा, ललित लेख यांचा संग्रह मुलाने प्रकाशित केला. अर्थात फक्त घरगुती वितरणासाठी. स्वरचित कवितांना चाली लावून, त्या  विविध कार्यक्रमात सादर करत होते. पण खरी सुरवात झाली ती कोविड मध्ये आम्ही भावंडांनी सुरू केलेल्या साहित्य कट्ट्या पासून. त्याच्या थोडं आधी महावीर वाचनालयाच्या साहित्य कट्ट्या मध्ये सहभाग घेत होते. त्यामुळेच साहित्यिक मैत्रिणी मिळाल्या. कांहीतरी लिहिण्याची उर्मी निर्माण झालीच होती, त्यात भावंडांनी भर घातली.आता थांबायचं नाही असं ठरवलंय. बघू!

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “कालिंदी” – लेखिका : श्रीमती अनुराधा फाटक ☆ परिचय – सौ. मंजिरी येडूरकर ☆ 

पुस्तक – कालिंदी (लघु कादंबरी)

लेखिका – सुश्री अनुराधा फाटक 

प्रकाशक – नवदुर्गा प्रकाशन 

पृष्ठ संख्या – 136

किंमत – 250 रु

परिचय – मंजिरी येडूरकर. 

मुखपृष्ठ खूपच बोलकं आहे. कालिंदी मातोश्री या वृद्धाश्रमाचा आधार घेण्याचा विचारात आहे.असं दृश्य चित्रित केलं आहे.

श्रीमती अनुराधा फाटक

या लघुकादंबरीत एका स्त्रीची विविध रूपं फुलवली आहेत. आपला मुलगा लहान असतांना रणांगणावर निघालेल्या पतीच्या मनातील चलबिचल पाहून, कठोर होऊन त्याला स्वतःचं कर्तव्य बजावण्याचा आग्रह धरणारी वीरांगना, पती निधनानंतर मुलाचं संगोपन करणारी, त्याच्या विकासासाठी, उन्नतीसाठी झटणारी आई, मुलानं न सांगता लग्न केल्यानंतर ही त्याला समजून घेणारी शांत आई, एका रात्रीत पूर्णपणे बदललेला मुलगा बघून कांही न बोलता त्याच्या आयुष्यातून बाजूला होऊन वृद्धाश्रमाचा आधार घेणारी संयमी आई, अर्थात तीच नंतर त्या वृद्धाश्रमाचा आधार बनते. आपला मुलगा अडचणीत आहे व त्याला अडचणीत आणणारी त्याची पत्नीच आहे हे माहीत असूनही त्याला त्याच्या नकळत मदत करणारी हळवी आई, मुलाला कफल्लक करून त्याची बायको सोडून गेली व तो पूर्णपणे दारूच्या आहारी गेला हे समजल्यावर आपली सर्व मिळकत त्याच्या नावावर करणारी वत्सल आई, मुलानं दिलेली हीन वागणूक  विसरू न शकलेली व त्यामुळे पुन्हा त्याच्या समोरही जायचं नाही असं ठरवणारी स्वाभिमानी आई, मुलाची वाताहात सहन न झाल्यामुळे प्राणत्याग करणारी आई! ही कालिंदीची सारी रूपं आपल्या काळजाला स्पर्श करून जातात.कालींदीचं भावविश्व, समाजासाठी झटण्याची वृत्ती, दुःखीताच्या हृदयात प्रवेश करून त्याचे डोळे पुसण्याची ताकद या गुणांनी या व्यक्तिरेखेला आणखीनच झळाळी आली आहे.  असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व उलगडत नेण्याचं शिवधनुष्य लेखिकेने लीलया पेलले आहे.निराधार झालेला मुलगा आईला शोधत येतो.तोपर्यंत आईनं वैकुंठाचा रस्ता धरलेला होता. तो विचारतो,” आई कुठे गेली?” याचं उत्तर डॉ सुनील देतात,” मुलाचं बालपण शोधायला गोकुळात गेली.” अशा सुरेख कल्पना तुम्हाला या लघुकादंबरीत वाचायला मिळतील. आवश्य वाचा.

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री

मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # 13 – वहाँ की दुनिया काली है… ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे।  आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – वहाँ की दुनिया काली है।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 13 – वहाँ की दुनिया काली है… ☆ आचार्य भगवत दुबे ✍

वहाँ की दुनिया काली है

जहाँ रोशनी दिखी

वहाँ की दुनिया काली है

 

वनस्थली वीरान

तभी तो सावन रूठा है

ज्याँ नेताओं का

आश्वासन रहता झूठा है

सत्ता के गलियारों की

हर बात निराली है

 

आदर्शों पर मंहगाई ने

कसा शिकंजा है

रिश्वतखोरी का

दफ्तर में खूनी पंजा है

कोर्ट-कचहरी में तक

चलती खूब दलाली है

 

काम नहीं होते दफ्तर में

बिना कमीशन के

रिश्वत ज्यादा प्यारी लगती

मासिक वेतन से

लाँच-घूस से ही प्रसन्‍न

रहती घरवाली है

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares