मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कृतज्ञता… लेखिका – सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ कृतज्ञता… लेखिका – सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

टिना दिवसभर काम करून दमली होती. टेक्सासची अति गरम हवा, दिवसभरचा शीण आणि चालत घरी जाण्यास लागणारा वेळ या तिन्ही गोष्टी तिची दमणूक अजून वाढवत होत्या! 

खरतर ती घराजवळच्या मेकडॉनल्डस मध्ये नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात होती पण तिला तिथे नोकरी मिळाली नाही. पण त्याचाच भाऊ असलेल्या बर्गर किंग या बऱ्याच लांब असलेल्या रेस्टॉरंटमध्ये गाडीतून ड्राईव्ह थ्रु मधे येणाऱ्या गिर्हाईकांकडून ॲार्डर घेऊन ती भरून देण्याची नोकरी मिळाली होती.

तिशीच्या घरातील टिना, तिचा नवरा व तीन मुले टेक्सासमधील एका लहान गावात रहात होते. नवऱ्याला डायबेटिस होता. लहान मुले, नवऱ्याचा आजार व प्रपंचाचा खर्च चहू बाजूंनी वाढतच होता. काही ना काही करून घरखर्चाला मदत करावी म्हणून मिळेल ती नोकरी तिने पत्करली होती. बर्गर किंग हे रेस्टॉरंट मात्र तिच्या घरापासून खूप लांब असल्याने रोजच्या चालत येण्याजाण्यात बराच वेळ जात होता. गाडी विकत घ्यावी अशी परिस्थिती नव्हती. हळूहळू पैसे जमा करून प्रथम गाडी विकत घेण्याची जरूर होती.

टिनाबरोबर वाढलेली गावातील इतर मुले उत्तम पगाराच्या नोकऱ्या मिळवून बसली होती. तिच्या घरची परिस्थिती अगदी बेताची असल्याने टिनाला कॉलेजला जाता आले नव्हते. आपण लोकांना बर्गर आणि कॅाफी विकत बसतो आणि आपल्या बरोबरची मुलं केवढी पुढे जात आहेत याची खंत होती पण इलाज नव्हता.

एक दिवस सकाळी ती नेहमीप्रमाणे बर्गर किंग मधे पोचली. कमरेला अॅप्रन लावून तिनं बर्गर, सॅंडविचेस, चहा, कॅाफीची तयारी सुरू केली. ड्राईव्ह थ्रू मधून दिसलेला गाड्यांची लांब रांग बघून तिचे हात वेगाने हलू लागले. क्रसांट या लांबट फ्रेंच ब्रेडवर अंड्यांचं ॲाम्लेट व चीज बसवून त्यावर दुसरा क्रसांट ठेऊन ती क्रसांटविच भराभर तयार करत होती. गिऱ्हाईकाच्या ॲार्डर हसऱ्या चेहऱ्याने पुरी करत होती.

ड्राईव्ह थ्रू मधील पुढची गाडी माईक जवळ आली.

Welcome to Burger King. May I help you? तिने विचारले.

तिकडून काही आवाज आला नाही. समोरच्या कॅमेऱ्यात तिला गाडीत बसलेली बाई दिसत होती.

ती परत म्हणाली, ”M’am, can I help you ?”

“ Ya.. Yess.. “ ती बाई बोलतच नव्हती. मागे गाड्यांची रांग खोळंबली होती..

“M’am, are you okay?” टिनाने काळजी वाटून विचारलं.. What’s your name?”

“Rebecca… I have diabetes… I.. I want to … order…” असं काहीतरी बोलून ती बाई परत बोलेनाशी झाली.

डायबिटीस आहे हे ऐकताच टिनाच्या डोक्यात प्रकाश पडला. तिनं भरकन एका उंच कपात आईसक्रिम भरले. रेस्टॉरंट मधून बाहेर पडून सुसाट धावत.. पळत.. गाड्यांच्या रांगेतून मार्ग काढत ती त्या बाईच्या गाडीजवळ पोचली. तिने भराभर दोन तीन चमचे आईस्क्रीम त्या बाईला भरवले. ते खाताच त्या बाईच्या नजरेत थोडा सावधपणा दिसू लागला..

“रिबेका, गाडी साईडला बरोब्बर माझ्या खिडकीसमोर पार्क कर व हे सर्व आईस्क्रीम संपव. ते संपल्यावर मी जा म्हणेपर्यंत कुठेही जायचं नाही. गाडीतच बसून राहायचं. OK? मी जाते आत पुढच्या ॲार्डर घ्यायला. ” टिना धावत आत गेली.

ॲार्डर्स घेताना आणि त्या भरताना तिचं त्या बाईकडे सतत लक्ष होतं. जरूर पडल्यास 9-1-1 ला फोन करून ॲम्ब्युलन्स बोलवायचा विचार करत ती काम करत होती. आता त्या बाईला आईस्क्रीम खाऊन मधे चाळीस मिनिटे गेली होती.

ती बाई गाडीतून उतरली व चालत आत गेली. ती टिनाला म्हणाली, “मी रिबेका बोनिंग. ” व तिने टिनाला मिठी मारली.

ती म्हणाली, “ टिना, तू आज वाचवलस मला ! मी हायवेवर गाडी चालवत कामाच्या मिटिंगसाठी निघाले होते. अचानक मला कसंतरी व्हायला लागलं. माझी ब्लड शुगर नक्की ड्रॉप झाली असणार कारण माझे हात पाय थरथरू लागले.. दरदरून घाम येऊ लागला.. हृदयाची गती खूपच वाढली होती. या सर्व लो ब्लडशुगरच्या खुणा आहेत हे मला माहित होते. तेवढ्यात हे बर्गर किंग दिसलं म्हणून मी इथे आले. एकसष्ट वर्षं वय आहे माझं.. पुढे काय झाले फारसे आठवत नाही. मागे एकदा असं झालं होतं.. मी काही ॲार्डर केलं का?”

“नाही.. तुला बोलता येत नव्हतं.. माझ्या नवऱ्याला पण डायबिटीस आहे. त्याची ब्लडशुगर ड्रॉप झाली की त्याला पण धड वाक्य पूर्ण करता येत नाहीत.. अशा वेळी पटकन शुगर द्यावी लागते त्यामुळे मला हा प्रकार चांगलाच माहित आहे. तेवढच मी केले.. विशेष काही नाही. ” टिना मनापासून म्हणाली.

आपल्याला असणाऱ्या माहितीचा एका व्यक्तीला डायबेटिक कोमामधे न जाऊ देण्यास उपयोग झाला म्हणून टिना आनंदात घरी आली.. घरी नवरा नैराश्यात बसला होता.. आपला काही उपयोग नाही कुणाला ही भावना हल्ली त्याला सतावत होती.

टिनानं त्याचे हात पकडले व ती म्हणाली, “ हनी, तुला वाटतं ना आपला काही उपयोग नाही? मग ऐक. तुझ्यामुळे आज एक व्यक्ती जगली आहे !” तिने सारी हकिकत त्याला सांगितली..

“आपण पैसे जमवून नक्की गाडी घेऊ. मी तुला कामावर पोचवून मग माझ्या कामाला जाईन म्हणजे तुला चालत जावं लागणार नाही.. तू काळजी करू नको ” म्हणत तिने एक अगदी जुनी गाडी फेसबुक मार्केटप्लेस वरून त्याला दाखवली.

“ममा, तू आम्हाला गाडीतून शाळेत पोचवशील?” मुलांनी विचारले. त्यांना नक्की पोचवेन म्हणत ती स्वयंपाकाला लागली.

दोन आठवड्यांनी एक दिवस सकाळी टिना कामाला जाण्यास निघाली. घराबाहेर पडताच अंगणात रिबेकाला बघून ती थक्क झाली. रिबेका एका नव्या चकचकीत गाडीत बसून आली होती.. त्या गाडीवर लाल रिबनचा बो लावला होता. अगदी गाड्याच्या शोरूममधून थेट टिनाकडे ती गाडी आली होती.

रिबेकाने गाडीच्या किल्ल्या टिनाच्या हातात दिल्या..

“टिना, ही आहे तुझी नवी गाडी ! तू मला ज्या दिवशी डायबेटिक कोमामध्ये जाण्यापासून वाचवलंस त्या दिवशी मी सोशल मिडियावर हा अनुभव शेअर केला.. माझ्याजवळ तुझ्यासाठी नवी गाडी घेण्याएवढे पैसे नव्हते म्हणून मी वाचकांना, तुझ्यासारख्या व्यक्तीला आपण गाडी देऊ शकतो का, विचारले आणि त्यांनी भरभरून देणग्या दिल्या ! त्या पैशातून तुला गाडी घेतली. तुझे आभार कसे मानायचे कळत नव्हते.. या गाडीच्या रूपाने मी माझी कृतज्ञता व्यक्त करत आहे ! या माझ्या पोस्टला ४८८, ००० लाइक्स आणि २०७, ००० शेअर आले होते ! 

टिना, तिचा नवरा आणि तीन मुले अवाक होऊन त्या चकचकीत नव्या गाडीकडे बघत होते ! एक स्वप्न साकार झालं होतं ! 

स्वतःचा काहीही फायदा नसताना केले गेलेले सत्कर्म कधीही वाया जात नाही. अगदी साध्या नोकरीमध्ये सुद्धा आपण एखाद्याचे भले करू शकतो कारण No job is too small !

आपले जीवन समृद्ध करणारे असे अनेक जीव जगात आहेत.. त्यांना धन्यवाद देण्याचा हा आठवडा आहे !

Happy Thanksgiving to all my readers!

लेखिका – सुश्री ज्योती रानडे

(दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील शेवटच्या गुरुवारी अमेरिकेत “कृतज्ञता दिवस ” (Thanks-giving Day) साजरा केला जातो. आपले आयुष्य समृद्ध करणाऱ्या व्यक्ती, घटना, अन्न, पाणी, निवारा अशा अनेक गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आपल्या आयुष्यात असे काही लोक येतात जे आपल्या ओळखीचे नसतात पण ते आपले आयुष्य बदलून टाकतात. कोविड काळात ईश्वराच्या वेशात आलेले डॉक्टर, नर्स, ॲम्ब्युलन्स-चालक वगैरेना कोण विसरेल? टिना हार्डी ही एक सामान्य मुलगी आहे. तिची आजची गोष्ट ही खरी घडलेली गोष्ट आहे.) 

प्रस्तुती –  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – २१ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – २१ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

 चैतन्याचा दिवा 

पहाटेच्या प्रसन्न प्रहरी पप्पा ज्ञानेश्वरीतील ओव्या सुरेल स्वरात गात. सहजपणे साखर झोपेत असताना सुद्धा आमच्या कानावर त्या अलगद उतरत. नकळतपणे असं कितीतरी आमच्या अंतःप्रवाहात त्यावेळी ते मिसळलं आणि आजही ते तसंच वाहत आहे. पप्पांच्या खड्या आवाजातलं सुस्पष्ट, नादमय पसायदान आणि त्या नादलहरी अशाच मधून मधून आजही निनादतात.

।।दुरितांचे तिमिर जावो 

विश्व स्वधर्म सूर्ये पाहो 

जो जे वांछील तो ते लाहो

प्राणीजात।। 

खरोखरच माऊलीने मागितलेलं हे पसायदान किती अर्थपूर्ण आहे! यातला संदेश वैश्विक आहे. त्रिकालाबाधित आहे.

आज दिवाळी सारखा प्रकाशाचा सण साजरा करत असताना मनात असंखय विचारांचं जाळं विणलं जातं. दिवाळी म्हणजे उजळलेल्या पणत्या, रंगीत रांगोळ्या, वातावरणातला तम सारणारे कंदील, खमंग —मधुर फराळ, नवी वस्त्रे, गणगोतांच्या भेटी, आणि अनंत हार्दिक शुभेच्छा. आनंद, सुख समाधानाच्या या साऱ्या संकल्पना. पण या पलीकडे जाऊन विचार केला तर असं वाटतं कुठेतरी यात “मी” “ माझ्यातले अडकले पण” आहे फक्त. यात प्रवाहापासून लांब असलेल्या, वंचित, उपेक्षितांच्या जीवनातही आनंदाचा उजेड पडावा यासाठी काही केले जाते का आपल्याकडून ?अनोख्या चैतन्याने आणि मांगल्याने भारणारा हा सण आहे. पण या चैतन्य उत्सवाच्या तरंगात सर्वव्यापीपणा अनुभवास येतो का? आपण आपल्यातच मशगुल असतो. आपल्या पलीकडे काय चाललं आहे, इतर जन कोणत्या अवस्थेत आहेत याचा विचार सहसा आपल्या मनाला स्पर्श करत नाही. आपल्या पलीकडल्यांचा विचार करणे हे या निमित्ताने गरजेचे वाटायला नको का? केवळ आर्थिक विषमतेच्या पातळीवरच नव्हे, तर मानसिक आधाराच्या दृष्टीनेही ते गरजेचे आहे. आनंद सुख समाधानाचे भाव केवळ आपल्या आपल्यातच अनुभवण्यापेक्षा विवंचनेत असणाऱ्या, परिस्थितीने गाजलेल्या, वंचित, उपेक्षित कारणपरत्वे कुटुंबाने व समाजानेही नाकारलेल्या, टाकलेल्या व्यक्तींच्या जीवनातले काही क्षण या सणाच्या निमित्ताने आपण उजळण्याचा का प्रयत्न करू नये?

माझ्या मनात बालपणापासून जपलेली एक आठवण आहे. खरं म्हणजे आज त्या आठवणीला मी एक संस्कार म्हणेन. बाळपणीच्या त्या दिवाळ्या स्मरणातून जाणे ही अशक्य बाब आहे. एका गल्लीतलं एकमेकांसमोर असलेल्या एक खणी दोन खणी घरांच्या वस्तीतलंच आमचंही घर. तिथली माणसं, तिथलं वातावरण, तिथले खेळ, सण, विशेषता दिवाळीची रोषणाई, पायरीवरच्या मंद पणत्या, ओटीवरच्या रांगोळ्या आणि एकमेकांच्या घरी जाऊन केलेले फराळ हे सतत फुलबाजी सारखे मनात उसळत असतात. पण या साऱ्या आनंदाच्या उन्मादात एक आकृती मात्र विसरता येत नाही. वृद्ध, थकलेल्या गात्रांची, घरासमोरच्या काशीबाईच्या घराच्या बाहेरच्या ओसरीवर कधीतरी कुठून तरी आश्रयाला आलेली— नाव, गाव, स्थान, जात धर्म कशाचीच माहिती नसलेली एक उपेक्षित वृद्ध अनामिका. पण अभावितपणे ती या गल्लीची कधी होऊन गेली हे कळलेच नाही आणि कुठलाही सण असो सोहळा असो गल्लीतली सगळी माणसं प्रथम तिचा विचार करायचे. पहिला फराळ तिला पोहोचवला जायचा. आम्ही गल्लीतली मुलं तिच्या पायरीवर पणत्या लावायचो. रांगोळ्या काढायचो. काशीबाईंनीही तिला तिचा ओसरीवरचा आश्रय कधीही हलवायला सांगितले नाही. या ऋणानुबंधाचा अर्थ तेव्हा कळत नव्हता पण त्या सुरकुतलेल्या अनामिकेवरच्या चेहऱ्यावरची आनंदाची लकेर आम्हाला खरा सणाचा आनंद द्यायची. आणि ती लकेर तशीच आजही मनात जपून आहे.

या सणानिमित्ताने भावंडात होणारी वाटणी कशाचीही असू दे, फराळाची, नव्या कपड्यांची. फटाक्यांची पण त्या सर्वांमधून बाजूला काढलेला एक सहावा हिस्सा असायचा. तो घरातल्या मदतनीसांच्या मुलांचा, रोज रात्री “माई” म्हणून हाक मारणाऱ्या त्या भुकेल्या याचकाचा, जंगलातून डोक्यावर जळणासाठी सालप्याचा भार घेऊन येणाऱ्या आदिवासी कातकरणीचा आणि घटाण्याच्या मागच्या गल्लीत वस्ती असलेल्या तृतीयपंथी लोकांचाही. त्यावेळी सहजपणे, विना तक्रार, विना प्रश्न होणाऱ्या या क्रियांचा विचार करताना आता वाटतं, वास्तविक तेव्हा हे उपेक्षित, वंचित, प्रवाहापासून दूर गेलेले कुणीतरी बिच्चारे म्हणून मुद्दाम का आपण करत होतो ? तेव्हा या विषमतेचा भावही नव्हता. तो केवळ एक रुजलेला उपचार होता. पण तरीही नकळत “कुणास्तव कुणीतरी” हा संस्कार मात्र मनावर बिंबवला गेला. या एका जीवनावश्यक सामाजिक संवादाची गुणवत्ता, आवशक्याता जाणली गेली हे मात्र निश्चित आणि पुढे वाढत्या वयाबरोबर हे पेरलेले बीज अंकुरित गेलं. साजरीकरणाकडे डोळसपणे, अर्थ जाणून आणि मन घालून कृती करण्याची एक सवय लागली.

इनरव्हील क्लब ची प्रेसिडेंट या नात्याने आम्ही दिवाळी सणांचे काही उपक्रम राबवत असू. वृद्धाश्रमातील फराळ भेट हा एक अत्यंत हृद्य कार्यक्रमअसायचा. रिमांड होमच्या मुलांबरोबर तिथेच फराळ बनवण्याचा कार्यक्रम असायचा, तसेच रांगोळ्या फटाके वाजवणे अशी धम्माल त्या मुलांबरोबर करताना खरोखरच एक आत्मिक समाधान अनुभवले. तांबापुरा वस्तीत घरोघरी जाऊन पणत्यांची रोषणाई केली, फराळ वाटप केले, कपडे, शाली त्यांना दिल्या आणि हे संवेदनशील मनाने केले. केवळ पेपरात फोटो येण्यासाठी नक्कीच नव्हे. रोटरी, इनरव्हील तर्फे आजही या सणांचं हे भावनिक बांधिलकीच रूप पाहायला मिळतं. शिवाय समाजात “एक तरी करंजी” सारख्या तरुणांच्या संघटना आहेत, जे स्वतः आदिवासी पाड्यावर जाऊन त्यांच्या समवेत दिवाळी हा सण धुमधडाक्यात साजरा करतात. या दृष्टीने दिवाळी ही मला नेहमीच महत्वाची वाटत आली आहे.

कविवर्य ना. धो. महानोर एकदा सहज म्हणाले होते,

 मोडलेल्या माणसाचे

 दुःख ओले झेलताना

 त्या अनाथांच्या उशाला

 दीप लावू झोपताना

अमळनेरला माझ्या सासरी पाडव्याच्या दिवशी घरातले सर्व पुरुष प्रथम धोबीणी कडून दिवा उतरवून घेतात. तिला ओवाळणी देतात. खूप भावुक असतो हा कार्यक्रम. धोबीणी कडून दिवा उतरवून घेणे आजही शुभ मानले जाते. या प्रथा गावांमध्ये आजही टिकून आहेत. विचार केला तर असे वाटते, हर दिन त्योहार असलेल्यांसाठी हे सण नसतातच. ज्यांच्या घरी रोजची चूल पेटण्याची विवंचना असते त्यांच्यासाठीच या सणांचं महत्त्व असतं आणि म्हणून सण साजरा करताना त्यांची आठवण ठेवून काही करण्यात खरा आनंद असतो

दिवाळीच असं नव्हे तर कुठलाही सण साजरा करताना अगदी सहज आठवण येते ती निराधार, बेघर, रस्त्यावर झोपणाऱ्या असंख्य लोकांची. भविष्याचा अंधकार असणाऱ्या, उघड्या नागड्या उपासमारीत वाढणाऱ्या मुलांची, दुष्काळामुळे हातबल झालेल्या शेतकऱ्याची, जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची, शरीराचा बाजार मांडणार्‍या लालबत्ती भागातल्या असाहाय्य, पीडित, लाचार स्त्रियांची, कुटुंबाने नाकारलेल्या लोकांची, सीमेवर राष्ट्रासाठी स्व सुखाकडे पाठ फिरवून प्राणपणाने थंडी, वारा, ऊन पावसाची पर्वा न करता सीमेचं रक्षण करणार्‍या सैनिकांची, त्यांच्या कुटुंबीयांची, अनाथ —अपंगांची, सुधार गृहात डांबलेल्या, विस्कटलेल्या मुलांची. कोण आहे त्यांचं या जगात? त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची कोणाची जबाबदारी? या समाज देहाचा तोही एक अवयवच आहे ना मग एक तरी पणती त्यांच्या दारी आपण लावूया. स्नेहाची, अंधार उजळणारी.

एक तरी करंजी त्यांना देऊया. एक मधुर, भावबंध साधणारी.

एक फुलबाजी त्यांच्यासमवेत लावूया. ज्याने त्यांच्याही चेहऱ्यावर हास्याची कारंजी उसळतील.

नकारात्मक बाबींच्या अंधकारावर प्रकाशाचे असे चांदणे पेरूया.

आपल्या भोवती असंख्य अप्रिय घटनांचा काळोख पसरलेला असला तरी अवघे विश्व अंधकारमय नाही. सत्याचे, दातृत्वाचे, चांगुलपणाचे, सृजनशीलतेचे असंख्य हात समाजात कार्यरत आहेत. जे पणती म्हणून सभोवतालचा अंधकार छेडण्याचे कार्य करत आहेत. आपणही अशीच त्यांच्यातली एक मिणमिणती पणती होऊया. तिथे जाणीवांचा, संवेदनाचा उजेड पेरूया..

बाळपणी झालेल्या संस्काराच्या या ज्योतीला असेच अखंड तेवत राहू दे !

 नका मालवू अंतरीचा दिवा

 नैराश्य तम दूर करण्यासी हवा

 आपुला आपल्याशी जपलेला

 मनोगाभार्‍यात चैतन्याचा दिवा…..

क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कर्माचा सिद्धांत — लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

कर्माचा सिद्धांत — लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

कोणाचीही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात….. हाच असतो कर्माचा सिद्धांत. 

“जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥ 

क्षणिक सुखासाठीच आपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट “……  हेच केलेल्या कर्माचे फळ आहे

काही लोकांना नाही पटणार हा विषय, पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय आणि त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल,…!!! अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, … जसे की…!!!

1) शारिरीक, आर्थिक, फसवणूक करणे …

2) समाजात, समारंभात अपमानास्पद वागणुक, देणे…

3) कोणाचे जाणीवपूर्वक मन दुखावले असू शकते,…                  

 4) कोणावर जाणीवपूर्वक अन्याय केला गेलेला असतो,…

5) कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते,…

6) मानसिक, सामाजिक, राजकीय छळ केलेला असेल,…..

7) कोणाची हक्काची फसवूनक करून खोट्या कागद पत्रा मार्फत व पुरावे देऊन, दबावतंत्राचा वापर करून प्रॉपर्टी हडपली असेल…

8) कोणाला अनिती करायला बळ दिल असेल…

9) राजकीय, सामाजिक, शारीरिक दुखापत केलेली असेल, …

10)  विश्वासघात करून गद्दारी करून गैरफायदा घेतला गेलेला असेल…              

11) ज्याने आपल्यावर अनेक उपकार केले असतील आणि त्याच्याच पाठीत स्वतःच्या स्वार्थासाठी खोटे आरोप करून खंजीर खुपसुन गद्दारी केली असेल…

12) कोणाचे आपल्यावर उपकार असतील त्याचा त्याला जाणीवपूर्वक विसर पडणे किंवा त्याने आपल्यासाठी केलेला आकास्मित खर्चाचे पैसे बुडवणे, किंवा त्यांच्या उपकाराची जाणीव न ठेवणे, भ्रष्ट बुद्दीने वागणे.आणि बदला घेणे…

अश्या प्रकारच्या त्रासाचे कुठलेही कारण असो… वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास झालेला असतो व होत असतो, तो खुप दुःखी  होतो, त्याचे मनोबल कमकुवत होत मनस्ताप होत असतो, पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते, आणि त्या जाणुन-बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे जाणीवपूर्वक समजत नसेल. 

पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो, त्या व्यक्तीकडुन चमत्कार होत नाही, किंवा  देवदेखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही, अशी माणसे निर्दयी, निष्ठुर, व हरामखोर असतात.

….. पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडुन अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जाशक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते,  मग त्या समोरच्या व्यक्तीला हाय हाय लागते, त्यालाच जनता ‘ तळतळाट ‘ 

असे म्हटले जाते.

मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो, त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही,  सतत अपयश येणे,  घरात आजारपण येणे, अश्या अनेक प्रकारची काहीही घटना घडू शकतात,…

आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत हे फक्त त्या महाखोटारड्या व्यक्तीस व आपल्याला व आपल्या अंतर्मनालाच सर्व माहीत असते.

समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे. त्याची परतफेड शक्यतो त्यास याच जन्मात त्याला कुठल्यातरी मार्गाने करावीच लागते, तो जरी कितीही जोरात बोलत असेल अथवा हसून बोलत असेल परंतु ते सर्व लोकांना दाखवण्यासाठी असते.  मात्र तो अंतर्मनातून बेचैन व अस्वस्थ असतो. त्याला सहज शांत झोप व स्वास्थ मिळत नाही. अनेक आजारांनी त्रस्त असतो…

तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक, चांगल्या-वाईट गोष्टींचा हिशोब सव्याज परत करावाच लागतो.  मी एका पुस्तकात वाचले होते, राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या -शंभर पुत्र युध्दात मारले गेले, तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की “ असे का व्हावे ? माझ्या संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेलं नाही, की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या-सर्वच पुत्रांचा मृत्यु आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे?“  

तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पूर्व-जन्म पहाण्याची दिव्य-दृष्टि दिली.

धृतराष्ट्र राजाने दिव्य-दृष्टीद्वारा पाहिले की साधारण पन्नास जन्मापुर्वी तो एक पारधी होता, आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले. मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्षांची शंभरएक लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली.            

….. धृतराष्ट्र राजाची त्यावेळची ती क्रिया होती, त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युध्दात मारले गेले तेव्हाच ते पुर्ण झाले. कर्म हे त्याचे फळ देऊनच शांत होते.

प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच, हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे.  चांगले कर्म, चांगले फळ देऊनच शांत होते. वाईट कर्म, वाईट फळ देऊनच शांत होते. फक्त वेळ आणि काळ  मागे-पुढे होऊ शकतो. हाच कर्माचा सिद्धांत आहे.आता आपणच ठरवायचे आहे, आपले कर्म कसे हवे.

….. ” जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥ 

क्षणीक सुखासाठीच आपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट “….  हेच केलेल्या कर्माचे फळ आहे म्हणून ….. 

🌺 सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सूचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा. पण लोकशाही  व संविधान जिवंत ठेऊन वाचवा…!!!

🌺 एकमेकांना अडचणीत आणू  नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नको त्या उठाठेवी करू नका, वाद  वाढवू नका, दुसऱ्याच्या वहीवाट संपत्तीवर आपली समजून वागू नका, ते पाप आहे …!!!

🌺 समाजातील खोट्या, राजकारणी व स्वार्थी, मतलबी आणि विश्वास घातकी लोकांपासून नेहमीच दूर रहा, खोट्या अफवांवर विश्वास ठेवण्याआधी प्रत्यक्ष खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा…!!!

🌺 “प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे.  ते आनंदात जगा व दुसऱ्यांनाही आनंदी जगू द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी, केव्हा आणि कुठे कुणावर येईल हे कुणीही सांगूच  शकत नाही हे लक्षात ठेवा”…!!! 🙏

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कोणासोबत तरी मैत्री असावी … लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

कोणासोबत तरी मैत्री असावी … लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

एकदा एका माकडाला अति दु:खामुळं मरण्याची इच्छा झाल्यावर, त्यानं झोपलेल्या सिंहाचे कान ओढले…

सिंहानं उठून रागानं गर्जना केली, की हे धाडस कोणी केलं ? स्वतःच्या मृत्यूला कुणी बोलावलं ?

माकड : मी कान ओढले, – महाराज, सध्या मला मित्र नसल्यामुळे मी खूप उदास आहे आणि मला मरण पाहिजे आहे, तुम्ही मला खाऊन टाका…

सिंहानं हसून विचारलं, माझे कान ओढताना, तुला कोणी पाहिलं तर नाही ना.. ?

माकड : नाही महाराज…

सिंह : मग ठीक आहे, आणखी एक दोन वेळा कान खेच, खूप छान वाटतंय… !

या कथेचं सार :

एकटा राहून जंगलाचा राजादेखील कंटाळतो… यावरून स्पष्ट होतं की मैत्री ही हवीच.. !!

म्हणून आपण आपल्या मित्रांच्या सतत संपर्कात राहा…

त्यांचे कान ओढत राहा…

म्हणजे त्यांची चेष्टा मस्करी करीत रहा…

आपल्याला मेसेज येणं हे

भाग्याचं समजा. कारण या जगांत कोणीतरी आपली आठवण काढतंय, हे लक्षात ठेवा. …

वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, देवाणघेवाण करा. आनंद हा देण्यात- घेण्यात असतो…

कंटाळवाणे होऊ नका.

वयाला विसरा, मजा करीत रहा. …

संसार- प्रपंच तर सगळ्यांनाच आहे. …

विश्वास ठेवा, की तुमचं मन जर नेहमी आनंदी असेल, तरच आपण नेहमी निरोगी राहू शकतो….

मैत्री-श्रीमंत किंवा गरीब नसते, मैत्री शिकलेली वा अडाणी असावी, असंही काही नसतं. …

कारण –

मैत्री ही केवळ मैत्रीच असते. आणि ती निखळ राहू द्या.

लेखक :अज्ञात

प्रस्तुती: सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – ज्ञानराजा – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – ज्ञानराजा – ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

इंद्रायणी काठी ! विसावला ज्ञाना !

आत्मसमाधाना ! समाधिस्थ !!१!!

*

कृपाळू माऊली ! बुद्धीचा सागर !

मायेचे माहेर ! ज्ञानराजा !!२!!

*

कैसा चमत्कार ! रेड्या मुखी वेद!

गर्विष्ठांचा भेद ! वदवूनी !!३!!

*

बसुनी भावंडे ! चालवली भिंत !

चांगदेवा खंत ! पाहुनिया !!४!!

*

पाठीवरी मांडे ! मुक्ताई भाजती !

क्षुधा भागवती ! जठाराग्नी !!५!!

*

भावार्थ दीपिका ! या गीतेचा अर्थ !

ज्ञानी नाम सार्थ ! ज्ञानेश्वरी !!६!!

*

अमृताचा घडा ! एक एक ओवी !

स्व अनुभवावी ! वाचूनिया !!७!!

(चित्र – साभार श्री आशिष  बिवलकर)

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 217 – कथा क्रम (स्वगत)… ☆ स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र”

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे सदैव हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते थे। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं  आपका भावप्रवण कविता – कथा क्रम (स्वगत)।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 217 – कथा क्रम (स्वगत)… ✍

(नारी, नदी या पाषाणी हो माधवी (कथा काव्य) से )

क्रमशः आगे…

तुम्हारी सीमाएँ – मर्यादा?

ऋषिवर,

तुम भूल गये

साध्य और साधन की

पवित्रता ।

भूल गये

श्वेत केतु का संकल्प

उसकी व्यवस्था ।

सत्य मान बैठे

ऋषि का वरदान

अक्षत कौमार्य का विधान!

आवश्यक नहीं थी

गुरु दक्षिणा,

झेल लेते

गुरु का क्रोध,

उनका शाप ।

क्षमा करना

आपके द्वारा किये

कृत्य को

आज की भाषा में

‘दलाली’ कहते हैं

जिसका ध्येय

नारी की अस्मिता की मान रक्षा नहीं

मात्र धन होता है।

धिक्कार है तुम्हें।

उत्तर दे सको तो देना

अनुत्तरित है

मेरा प्रश्न !

© डॉ राजकुमार “सुमित्र” 

साभार : डॉ भावना शुक्ल 

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 217 – “उसकी कहीं मंसा…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत उसकी कहीं मंसा...)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 217 ☆।। अभिनव गीत ।। ☆

☆ “उसकी कहीं मंसा...” ☆ श्री राघवेंद्र तिवारी 

पानबाई

जलती अखण्ड

जोत तुम में

ढूँडो न अब

दिया सलाई

पान बाई

 

वह जो वासी

है घट-घट का

पता रही पूछ

भला पनघट का

 

धरी नही रह

जाये चतुराई

पानबाई

 

ढूंड रही है

यहाँ हर काया

तेरी ही तेरी

तो है माया

 

फिर क्या पर्वत

और क्या खाई

पानबाई

 

है तो यह

उसकी कहीं मंसा

उड़ गया किधर

को है वह हंसा

 

छोड़ छाड़ कर

अपनी ठकुराई

पानबाई

 

* पानबाई = प्राणवायु, मंसा= मंशा, जोत = ज्योति

©  श्री राघवेन्द्र तिवारी

01-12-2024

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – डिफॉल्टर ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – डिफॉल्टर ??

समय छाती पर

साहूकार-सा आ बैठा है,

अब तक निरर्थक बिताए

घटी-पल का ब्याज के साथ

सारा हिसाब मांग रहा है और

मैं निरुत्तर-सा खड़ा हूँ..,

सच बताना,

केवल मैं ही डिफॉल्टर हुआ हूँ

या तुम्हारा भी यही हश्र हुआ है…!

?

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥  मार्गशीर्ष साधना 16 नवम्बर से 15 दिसम्बर तक चलेगी। साथ ही आत्म-परिष्कार एवं ध्यान-साधना भी चलेंगी💥

 🕉️ इस माह के संदर्भ में गीता में स्वयं भगवान ने कहा है, मासानां मार्गशीर्षो अहम्! अर्थात मासों में मैं मार्गशीर्ष हूँ। इस साधना के लिए मंत्र होगा-

ॐ नमो भगवते वासुदेवाय

  इस माह की शुक्ल पक्ष की एकादशी को गीता जयंती मनाई जाती है। मार्गशीर्ष पूर्णिमा को दत्त जयंती मनाई जाती है। 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ३८ – “जिम्मेदार शिक्षक – स्व. कवि पं. दीनानाथ शुक्ल” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

श्री प्रतुल श्रीवास्तव 

वरिष्ठ पत्रकार, लेखक श्री प्रतुल श्रीवास्तव, भाषा विज्ञान एवं बुन्देली लोक साहित्य के मूर्धन्य विद्वान, शिक्षाविद् स्व.डॉ.पूरनचंद श्रीवास्तव के यशस्वी पुत्र हैं। हिंदी साहित्य एवं पत्रकारिता के क्षेत्र में प्रतुल श्रीवास्तव का नाम जाना पहचाना है। इन्होंने दैनिक हितवाद, ज्ञानयुग प्रभात, नवभारत, देशबंधु, स्वतंत्रमत, हरिभूमि एवं पीपुल्स समाचार पत्रों के संपादकीय विभाग में महत्वपूर्ण दायित्वों का निर्वहन किया। साहित्यिक पत्रिका “अनुमेहा” के प्रधान संपादक के रूप में इन्होंने उसे हिंदी साहित्य जगत में विशिष्ट पहचान दी। आपके सैकड़ों लेख एवं व्यंग्य देश की विभिन्न पत्र-पत्रिकाओं में प्रकाशित हो चुके हैं। आपके द्वारा रचित अनेक देवी स्तुतियाँ एवं प्रेम गीत भी चर्चित हैं। नागपुर, भोपाल एवं जबलपुर आकाशवाणी ने विभिन्न विषयों पर आपकी दर्जनों वार्ताओं का प्रसारण किया। प्रतुल जी ने भगवान रजनीश ‘ओशो’ एवं महर्षि महेश योगी सहित अनेक विभूतियों एवं समस्याओं पर डाक्यूमेंट्री फिल्मों का निर्माण भी किया। आपकी सहज-सरल चुटीली शैली पाठकों को उनकी रचनाएं एक ही बैठक में पढ़ने के लिए बाध्य करती हैं।

प्रकाशित पुस्तकें –ο यादों का मायाजाल ο अलसेट (हास्य-व्यंग्य) ο आखिरी कोना (हास्य-व्यंग्य) ο तिरछी नज़र (हास्य-व्यंग्य) ο मौन

(ई-अभिव्यक्ति में प्रत्येक सोमवार प्रस्तुत है नया साप्ताहिक स्तम्भ कहाँ गए वे लोग के अंतर्गत इतिहास में गुम हो गई विशिष्ट विभूतियों के बारे में अविस्मरणीय एवं ऐतिहासिक जानकारियाँ । इस कड़ी में आज प्रस्तुत है एक बहुआयामी व्यक्तित्व जिम्मेदार शिक्षक – स्व. कवि पं. दीनानाथ शुक्लके संदर्भ में अविस्मरणीय ऐतिहासिक जानकारियाँ।)

आप गत अंकों में प्रकाशित विभूतियों की जानकारियों के बारे में निम्न लिंक पर क्लिक कर पढ़ सकते हैं –

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १ ☆ कहाँ गए वे लोग – “पंडित भवानी प्रसाद तिवारी” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २ ☆ डॉ. राजकुमार तिवारी ‘सुमित्र’ ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ३ ☆ यादों में सुमित्र जी ☆ श्री यशोवर्धन पाठक ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ४ ☆ गुरुभक्त: कालीबाई ☆ सुश्री बसन्ती पवांर ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ५ ☆ व्यंग्यकार श्रीबाल पाण्डेय ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ६ ☆ “जन संत : विद्यासागर” ☆ श्री अभिमन्यु जैन ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ७ ☆ “स्व गणेश प्रसाद नायक” – लेखक – श्री मनोहर नायक ☆ प्रस्तुति  – श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ८ ☆ “बुंदेली की पाठशाला- डॉ. पूरनचंद श्रीवास्तव” ☆ डॉ.वंदना पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ९ ☆ “आदर्श पत्रकार व चिंतक थे अजित वर्मा” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ११ – “स्व. रामानुज लाल श्रीवास्तव उर्फ़ ऊँट बिलहरीवी” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १२ ☆ डॉ. रामदयाल कोष्टा “श्रीकांत” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆   

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १३ ☆ स्वतंत्रता संग्राम सेनानी, लोकप्रिय नेता – नाट्य शिल्पी सेठ गोविन्द दास ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १४ ☆ “गुंजन” के संस्थापक ओंकार श्रीवास्तव “संत” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १५ ☆ स्वतंत्रता संग्राम सेनानी, कविवर – पंडित गोविंद प्रसाद तिवारी ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १६ – “औघड़ स्वाभाव वाले प्यारे भगवती प्रसाद पाठक” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆ 

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १७ – “डॉ. श्री राम ठाकुर दादा- समाज सुधारक” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १८ – “राजकुमार सुमित्र : मित्रता का सगुण स्वरुप” – लेखक : श्री राजेंद्र चन्द्रकान्त राय ☆ साभार – श्री जय प्रकाश पाण्डेय☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १९ – “गेंड़ी नृत्य से दुनिया भर में पहचान – बनाने वाले पद्मश्री शेख गुलाब” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २० – “सच्चे मानव थे हरिशंकर परसाई जी” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २१ – “ज्ञान और साधना की आभा से चमकता चेहरा – स्व. डॉ कृष्णकांत चतुर्वेदी” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २२ – “साहित्य, कला, संस्कृति के विनम्र पुजारी  स्व. राजेन्द्र “रतन”” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २३ – “मेरी यादों में, मेरी मुंह बोली नानी – सुभद्रा कुमारी चौहान” – डॉ. गीता पुष्प शॉ ☆ प्रस्तुती – श्री जय प्रकाश पांडे ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २४ – “संस्कारधानी के सिद्धहस्त साहित्यकार -पं. हरिकृष्ण त्रिपाठी” – लेखक : श्री अजय कुमार मिश्रा ☆ संकलन – श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २५ – “कलम के सिपाही – मुंशी प्रेमचंद” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २६ – “यादों में रहते हैं सुपरिचित कवि स्व चंद्रकांत देवताले” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २७– “स्व. फ़िराक़ गोरखपुरी” ☆ श्री अनूप कुमार शुक्ल ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २८ – “पद्मश्री शरद जोशी” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २९ – “सहकारिता के पक्षधर विद्वान, चिंतक – डॉ. नंद किशोर पाण्डेय” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ३० – “रंगकर्मी स्व. वसंत काशीकर” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ३१ – “हिंदी, उर्दू, अंग्रेजी, फारसी के विद्वान — कवि- शायर पन्नालाल श्रीवास्तव “नूर”” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ३२ – “साइकिल पर चलने वाले महापौर – शिक्षाविद्, कवि पं. रामेश्वर प्रसाद गुरु” ☆ डॉ. वंदना पाण्डेय” ☆ डॉ.वंदना पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ३३ – “भारतीय स्वातंत्र्य समर में क्रांति की देवी : वीरांगना दुर्गा भाभी” ☆ डॉ. आनंद सिंह राणा ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ३४ –  “जिनके बिना कोर्ट रूम भी सूना है : महाधिवक्ता स्व. श्री राजेंद्र तिवारी” ☆ डॉ. वंदना पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ३५ – “सच्चे मानव – महेश भाई” – डॉ महेश दत्त मिश्रा” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ३६ – “महिलाओं और बच्चों के लिए समर्पित रहीं – विदुषी समाज सेविका श्रीमती चंद्रप्रभा पटेरिया” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ३७ – “प्यारी स्नेहमयी झाँसी वाली मामी – स्व. कुमुद रामकृष्ण देसाई” ☆ श्री सुधीरओखदे   ☆

स्व. कवि पं. दीनानाथ शुक्ल

☆ कहाँ गए वे लोग # ३७ ☆

☆ जिम्मेदार शिक्षक – स्व. कवि पं. दीनानाथ शुक्ल” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव

विविध विषयों का ज्ञान, धीर – गंभीर व्यक्तित्व और ओजस्वी वाणी, ज्ञान पिपासुओं को निःस्वार्थ मार्गदर्शन और अपने अनुभव देते रहना, पं. दीनानाथ शुक्ल के इन गुणों ने उन्हें जीवन काल में ही विशिष्ट बना दिया था। शुक्ल जी का जन्म 1 जुलाई 1932 को छतरपुर जिले में हुआ। कम आयु में ही वे शासकीय शिक्षक नियुक्त हो गए। दीनानाथ जी ज्ञान पिपासु थे। शिक्षक बनने के बाद उनकी ज्ञान पिपासा और बढ़ गई। उन्होंने रानी दुर्गावती विश्वविद्यालय, जबलपुर से राजनीति शास्त्र में एम. ए. किया। एम.एड. की परीक्षा में शुक्ल जी को स्वर्ण पदक प्राप्त हुआ। एक श्रेष्ठ शिक्षक के साथ ही अच्छे कवि, साहित्यकार के रूप में उनकी ख्याति सुदूर क्षेत्रों तक व्याप्त थी।

हिंदी और अंग्रेजी के विद्वान पं. दीनानाथ शुक्ल ने यद्यपि हिंदी में भी लिखा है तथापि साहित्य सृजन के लिए उन्होंने अपने जन्म स्थान छतरपुर की बोली – बानी “बुंदेली” को चुना। उनकी पांडित्य पूर्ण, हास – परिहास से युक्त, जागरण की प्रेरणा देती बुंदेली रचनाओं का साहित्य जगत में महत्वपूर्ण स्थान है।

“ईपै अधिक न सोचौ” पं. दीनानाथ शुक्ल का बुंदेली में रचा व्यंग्य कविताओं का संग्रह है। लोक रस – युक्त इन कविताओं में जीवन के विविध रंग हैं, किंतु मूल भाव जीवन को सुमार्ग पर अग्रसर करने – कराने का है।

“नओ उजेरो” कविता में वे कहते हैं –

कका दाउ जू संझले मंझले दद्दा, बब्बा नन्ना,

हलके बड़े मौसिया नन्ने जीजा फूफा मम्मा।

नाते भये अलोप सबई अब, लै लै नाम पुकारत,

अंकल डैडी ब्रदर कान के, पर्दा चीरें डारत।

सब हो गओ का सपनो,

गांव बदल गओ अपनों।

भाव अभिव्यक्ति के लिए शुक्ल जी के पास बुंदेली के इतने सटीक शब्द थे कि वे श्रोता – पाठक के समक्ष तत्काल उनका अर्थ प्रगट करते थे। उनकी बुंदेली भाषा – शैली अत्यंत सहज सरल थी।

 पं. दीनानाथ शुक्ल की भाषा की सहज ग्राह्यता देखिए –

यंत्री के मंत्री झल्लाने – इत्तो माल न खाओ,

सड़क बनी ती इतै कहां गइ, नक्शा मोय दिखाओ।

नक्शा मोय दिखाओ, पूरी कीके पेट समानी,

भ्रष्टाचार तकैया पूंछत, कैसें भइ नुकसानी।

हांत जोर कें यंत्री बोलो – डामल तौ मैं खा गओ,

गिट्टी मुरम बोल्डर प्रभु के, साले पेट समा गओ।

और इसे पढ़ें –

दंगा मैं पथरा सन्नाबै, दूरइ, सें जो लरका –

“गोला तवा फेंक” में भेजौ, पता लगा कें घर का।

चिरइ-चिरोंटा गिरदौना जो, तक गुलेल सें मारत –

चुन लो उन्हें “निशान लगाबे”, बाजी बे नइं हारत।

पं. दीनानाथ शुक्ल ने हमेशा कभी स्वयं के माध्यम से तो कभी अपने आसपास रहने वाले लोगों के माध्यम से अपनी बात कही है –

तानें हमें न मारौ, अपनो अपनो रूप निहारौ।

दई बनाओ तुमें ऊजरौ, हमें बना दऔ कारौ

ईमें का है दोष हमारौ, ताने हमें न‌‌‌ मारौ। ।

शुक्ल जी अपनी जो भी रचनाएं लोगों को स्वतः सुनते थे, उनके प्रभावशाली प्रस्तुतीकरण के कारण वे रचनाएं श्रोताओं के मन में अमित छाप छोड़ती थीं। पं. दीनानाथ जी ने सदा रचनाकारों को बुंदेली में लिखने प्रेरित किया और उन्हें मार्गदर्शन दिया। अनेक लोकभाषाई कवि सम्मेलनों में बुंदेली का प्रतिनिधित्व करके प्रशंसा अर्जित करने वाले पं. दीनानाथ शुक्ल जी को समय समय पर अनेक संस्थाओं – संगठनों द्वारा सम्मानित किया गया। अपने सहज – सरल उद्देश्यपूर्ण बुंदेली गीतों के कारण वे साहित्य जगत में सदा याद किए जाएंगे।

“दीनानाथ” अकल ताकत के, “ठेंगन” की बलिहारी –

जीने सीखो मंत्र, ओई सें, झुक रइ दुनिया सारी।

“दीनानाथ”कहते हैं, अक्ल की ताकत के ठेंगे की बलिहारी ! जिसने यह मंत्र सीखा उसके सामने सारी दुनिया झुक रही है।

© श्री प्रतुल श्रीवास्तव

संपर्क – 473, टीचर्स कालोनी, दीक्षितपुरा, जबलपुर – पिन – 482002 मो. 9425153629

संकलन –  जय प्रकाश पाण्डेय

संपर्क – 416 – एच, जय नगर, आई बी एम आफिस के पास जबलपुर – 482002  मोबाइल 9977318765

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Weekly Column ☆ Witful Warmth # 30 – The Lost Childhood… ☆ Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’ ☆

Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’

Dr. Suresh Kumar Mishra, known for his wit and wisdom, is a prolific writer, renowned satirist, children’s literature author, and poet. He has undertaken the monumental task of writing, editing, and coordinating a total of 55 books for the Telangana government at the primary school, college, and university levels. His editorial endeavors also include online editions of works by Acharya Ramchandra Shukla.

As a celebrated satirist, Dr. Suresh Kumar Mishra has carved a niche for himself, with over eight million viewers, readers, and listeners tuning in to his literary musings on the demise of a teacher on the Sahitya AajTak channel. His contributions have earned him prestigious accolades such as the Telangana Hindi Academy’s Shreshtha Navyuva Rachnakaar Samman in 2021, presented by the honorable Chief Minister of Telangana, Mr. Chandrashekhar Rao. He has also been honored with the Vyangya Yatra Ravindranath Tyagi Stairway Award and the Sahitya Srijan Samman, alongside recognition from Prime Minister Narendra Modi and various other esteemed institutions.

Dr. Suresh Kumar Mishra’s journey is not merely one of literary accomplishments but also a testament to his unwavering dedication, creativity, and profound impact on society. His story inspires us to strive for excellence, to use our talents for the betterment of others, and to leave an indelible mark on the world. Today we present his Satire The Lost Childhood...

☆ Witful Warmth # 30 ☆

☆ Satire ☆ The Lost Childhood…  ☆ Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’

In a quaint little town, where the chirping of birds once drowned out the noise of the mundane, a new deity arose, sleek and shiny, with a screen that glowed brighter than the morning sun. This was no ordinary deity; it was the Mobile Phone, the omnipotent ruler of modern life. Revered by adults and children alike, it demanded neither temples nor offerings—just their time, their sanity, and their souls. 

Among its devoted followers were children, tiny humans who once found joy in the rustling leaves and the melody of rain. Now, their playgrounds were mere backdrops to selfies, their laughter replaced by the clinking sounds of virtual coins in games like Free Fire. Gone were the days of scraped knees and shared secrets; instead, they embarked on epic battles in pixelated arenas, fighting for glory that mattered to no one but the algorithm. 

“Mom, I’m in the top 10!” little Arjun exclaimed one day, his face aglow—not with the warmth of childhood, but with the cold, blue light of his phone. His mother smiled weakly, her heart breaking silently. Arjun no longer cared for the toy train she had saved for months to buy. No, his heart now belonged to a digital avatar wielding a sniper rifle. 

The irony, of course, was deliciously cruel. These tiny warriors, so adept at maneuvering through the mazes of their games, couldn’t find their way back to the dinner table without Google Maps. They built empires in the virtual world while their real lives crumbled into piles of neglected homework and skipped meals. 

Social media was the Mobile Phone’s other masterpiece. Children who once giggled over silly jokes now wore serious expressions, perfecting their TikTok dances and Instagram poses. They chased likes and followers, trading their innocence for a fleeting moment of digital fame. “I’m a content creator!” declared 12-year-old Riya, her face adorned with filters that made her look like a porcelain doll. The irony? She was too busy creating “content” to notice the real content of life slipping through her fingers.  

Parents, too, were complicit in this tragedy, their hypocrisy shining brighter than their phone screens. “These kids are always glued to their phones!” they complained, while scrolling endlessly through WhatsApp forwards and YouTube tutorials. They handed over tablets to toddlers to keep them quiet, then lamented the loss of familial bonds. “When I was your age,” they began, only to be cut off by the ding of a notification. 

 The Mobile Phone, meanwhile, basked in its omnipresence. It watched as children became strangers to their own families, their heads bent not in prayer but in endless scrolling. Grandparents, once the keepers of bedtime stories, now sat in corners, ignored and forgotten, while their grandchildren watched strangers play video games on YouTube. 

Yet, the tears of this satire are not just for the children; they are for humanity itself. The Mobile Phone, this marvel of human ingenuity, was meant to connect us, yet it had severed the most vital connections. Children no longer ran to their parents with tales of their day; instead, they posted stories on Instagram. Friends no longer laughed together in sunlit parks; they exchanged emojis in WhatsApp groups. 

And then there was the dark underbelly of this addiction: the sleepless nights, the strained eyes, the anxiety over a game’s ranking or a post’s likes. A child’s world, once filled with endless possibilities, now revolved around a six-inch screen. The irony was bitter—these devices, designed to make life easier, had made childhood the most complicated it had ever been. 

But perhaps the cruelest satire of all lies in the dreams of these children. Ask them what they want to be, and the answers are as predictable as they are tragic: “A gamer,” “A YouTuber,” “A social media influencer.” They no longer aspire to be doctors or artists or astronauts; their dreams are confined to the boundaries of a Wi-Fi signal. 

And so, the Mobile Phone sat on its metaphorical throne, ruling over a kingdom of lost childhoods. It had given these children everything—entertainment, validation, distraction—yet taken away the one thing that mattered: their sense of wonder. 

One day, when the screens go dark, and the servers shut down, these children will look up and find a world they no longer recognize. They will see their parents, older and wearier, their siblings, strangers they never got to know, and their own reflections, unfiltered and unfamiliar. 

The question is, will it be too late? Will they mourn the playgrounds they never explored, the books they never read, the bonds they never formed? Or will they simply scroll on, looking for the next distraction, the next game, the next follower? 

Perhaps the only way to end this tale is with a plea—a tearful, satirical cry for the world to wake up. Let children be children again. Let them climb trees and scrape their knees. Let them write their own stories, not captions. Let them fight real battles, not virtual ones. 

For if we don’t, this satire will no longer be satire; it will be the reality we chose. A reality where the Mobile Phone is king, and childhood is its greatest casualty.

*

© Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’

Contact : Mo. +91 73 8657 8657, Email : [email protected]

≈ Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares