मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कुणाच्या खांद्यावर… — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

कुणाच्या खांद्यावर… — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(आधीच आजी सतत म्हणत असते, “ बघ, तुझी आई तुला टाकून गेली. मी सांभाळलं नसतं तर काय केलं असतंस रे तू? कठीणच होतं बरं बाबा तुझं.”) – इथून पुढे — 

“मावशी, हे सतत ऐकून माझा कॉन्फिडन्स शून्यावर आलाय. सगळा खर्च हल्ली आजी माझ्यावरच लादते. अगं नुसत्या स्वयंपाकीण बाईना आठ हजार पगार देते आजी. मला हे दिसतं पण मला बोलता येत नाही ग. पण मी जर या वयात आजीला सोडून गेलो तर तो कृतघ्नपणा होईल. तीही म्हातारी होत चाललीय ना?”

“चिन्मय, असा वेडेपणा करू नकोस राजा. आजी ही तुझी जबाबदारी नाही. आम्ही तिच्या तीन मुली आहोत. जरी तुझ्या आईने टाळले तरी मी आणि अमला मावशी तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. तुला तुझं आयुष्य आहे ना? हक्क आहे तुला ते आनंदात जगायचा. तू असा आजीत गुंतून राहू नकोस. सरळ बँकेचे कर्ज काढून छानसा फ्लॅट घे. मिळेल ना तुला कर्ज? ”.. आरती त्याला समजावत म्हणाली.

“हो मिळेल मावशी. पण मग आजीचं काय? “

“ते मी बघते. बोलते आईशी दोन दिवसात. ” … पण आरती विचारात पडली. हा गुंता कसा सोडवावा याचा तिने खूप विचार केला.

दुसऱ्या दिवशी तिने रजनी ताईंजवळ हा विषय काढला… “ आई, चिन्मयच्या लग्नाचं काय करायचं आपण?”

रजनीताई म्हणाल्या, “ करू दे की खुशाल. आहे का हिम्मत वेगळं घर घ्यायची? मी म्हणून दिलाय बरं थारा. ”

आरतीला हे ऐकून अत्यंत चीड आली.

“आई, अग काय बोलते आहेस हे तू? त्या बिचाऱ्या चिन्मयचे आयुष्य तू स्वतःला जखडून टाकलं आहेस. पार घरगडी करून टाकला आहेस तू त्याला. किती करतोय तो तुझ्यासाठी हे समजत नाही का तुला? सतत हुकूम करत असतेस त्याला आणि राबवून घेत असतेस. आणि खुशाल म्हणतेस हो ग, आहे का हिम्मत त्याच्यात ? हे बघ.. नक्कीच आहे त्याच्यात हिम्मत. तो बँकेचे कर्ज काढून फ्लॅट घेऊ शकतो. लग्न करू शकतो. तू त्याला अशी जखडून ठेवू नकोस. गुणी मुलगा आहे ग तो. आई, आम्ही तीन मुली आहोत तुला. तू ही आमची जबाबदारी आहेस, त्या चिन्मयची नाही. अशी स्वार्थीपणाने वागू नकोस ग. हे बघ. मी सांगते ते ऐक. बघ पटतं का. मी आणि अमला सुदैवाने उत्तम आर्थिक परिस्थितीत आहोत. अलका तर एक नंबरची स्वार्थी आणि अप्पलपोटी निघाली. तिला आम्ही आमची बहीण मानतच नाही. तर, हा तुझा फ्लॅट तू एकट्या चिन्मयच्या नावावर कर. तू इच्छापत्र कर आणि हे घर चिन्मयला दे. तो तर हे न घेता सुद्धा कायम तुझ्याजवळ राहील.. पण त्याच्या चांगुलपणाचा आपण किती फायदा घ्यायचा? मी आणि अमला तुझी सेवा, देखभाल करायला येणं अशक्य आहे ग. आणि आम्हाला तुझ्या इस्टेटीतलं खरोखर काहीही नको. पण हा आपला चिन्मय सज्जन आहे, तुझ्याबद्दल किती माया आहे त्याच्या पोटात. तू आता त्याचाही विचार कर. उद्या त्याचं लग्न होईल. त्याची बायको का म्हणून तुझ्या घरात नोकरासारखी राहील? तू तिलाही असे वागवायला कमी करणार नाहीस. मी ओळखून आहे तुला. तर हे पटतंय का बघ. दोन दिवस विचार कर. पण मी चिन्मयचं आयुष्य मार्गी लावल्याशिवाय यावेळी जाणार नाही हे नक्की. त्याला आधार नको का? उद्या तू त्याला हाकलून दिलंस तर तो कुठे जाईल? नीट विचार कर. शेवटी तरी तू हे घर आम्हा मुलींना देणार. पण जर ते आम्हालाच नकोय तर ते तू चिन्मयला द्यावेस. तो तुला कधीही अंतर देणार नाही ही मला खात्री आहे. ” अतिशय गुणी गरीब मुलगा आहे तो. हे मी अमलाशीही फोनवर बोलले आहे. तिलाही हे अगदी मान्य आहे. उद्या मला विचार करून सांग. आणि मी आत्ता म्हणतच नाहीये की तू त्याला आत्ताच हा फ्लॅट देऊन टाक… मला कळतंय, तुलाही नक्की वाटत असणारच, की जर चिन्मयने नाही विचारलं तर आपलं काय होईल? म्हातारपण वाईट असतं बरं. हे मलाही माहीत आहेच ग. पण हे तू तुझ्या पश्चात करायचे आहे. आत्ता कोणालाच हा फ्लॅट द्यायचा नाही. बघ पटतंय का… आणि हो… आणखी एक. चिन्मय ठराविकच रक्कम तुला देईल. तू वाटेल तसा खर्च करायचा नाहीस. तुझ्या डॉक्टरचा खर्च, औषधपाणी सर्व खर्च यापुढे तूच करायचा. चिन्मय करणार नाही. किती ओरबाडून घेशील ग त्याला आई? कमाल आहे तुझी. तुझा खर्च तूच करायला हवास. त्याचा अंत बघू नकोस. नाही तर चिन्मय स्वतःचा फ्लॅट घेईल आणि निघून जाईल. आम्ही दोघी सतत अजिबात येऊ शकणार नाही तुझ्यासाठी. मग नाईलाजाने वृद्धाश्रम हाच पर्याय उरतो आमच्याजवळ. बघ…. विचार कर आणि सांग मला. त्याप्रमाणे निर्णय घेऊन मगच मी लंडनला जाईन. ”

… अत्यंत परखडपणे आरती हे रजनीताईंशी बोलली. कोणीतरी हे बोलायला हवंच होतं.

दुसऱ्या दिवशी रजनीताई म्हणाल्या, ”आरती, तू म्हणतेस ते बरोबर आहे. मी खूप स्वार्थीपणे वागले सगळ्यांशी. पण पटलं मला तुझं. मी चिन्मयच्या नावावर हा फ्लॅट माझ्या मृत्युपत्राद्वारे करते. तू चांगला वकील शोध. आपण माझं मृत्युपत्र रजिस्टर करू म्हणजे चिन्मयला माझ्या पश्चात अडचणी येणार नाहीत. शिवाय मी माझ्या अकाउंटमधून सगळा खर्च करत जाईन. ठेवून तरी काय करायचा तो पैसा? माझं खरंच चुकलं ग वागायला चिन्मयशी. करू दे लग्न तो एखाद्या चांगल्या मुलीशी आणि दोघेही इथेच आनंदात राहू देत. मी सगळ्या कामाला बाई ठेवीन म्हणजे कोणालाच त्रास होणार नाही. ”

आपल्या आईचे हे बोलणे ऐकून आरतीच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं रजनीताईंना मिठी मारली.

“आई, किती चांगली आहेस तू. वेळेवर स्वतःची चूक कबूल करायलाही मोठं मन लागतं ग. मी मुलगी आहे तुझी. तुझ्यावरही अन्याय होऊ देणार नाही आणि चिन्मयवरही नाही. ”

आरतीने चार दिवसात वकील बोलावले आणि रजनीताईंचं मृत्युपत्र रजिस्टर केलं सुद्धा. याही गोष्टीला बरेच दिवस होऊन गेले. चिन्मय – विदिशाचं लग्न झालं. दोघे आजीच्या घरात आजीबरोबर सुखात राहू लागले. रजनीताई विदिशाशी अतिशय छान वागू लागल्या.

हा त्यांच्यात झालेला बदल किती सुखावह होता. ! विदिशा तर लाघवी होतीच. तिनेही आजी आजी करत त्यांना जिंकून घेतलं.

आरतीचा निर्णय अगदी शंभर टक्के खरा ठरला.

आज रजनीताई या जगात नाहीत. पण आरतीच्या सल्ल्याप्रमाणे ते रहातं घर, बँकेतली शिल्लकही चिन्मयला देऊन आणि चिन्मय आणि विदिशाचा सुखी संसार बघूनच त्यांनी डोळे मिटले.

– समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रंग मनाचे… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? मनमंजुषेतून ?

☆ रंग मनाचे… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

कोकणांतील एक गावात गायत्रीचा जन्म झाला. पु. ल देशपांडे यांनी ‘अंतु बरवा ‘चे केलेलं वर्णन आणि गायत्रीच्या बाबांचे केलेले वर्णन यात फार फरक नसावा. एक काळ होता, तेव्हा अर्धी अधिक घरे पेंढ्यांनी शाकारलेली, एखादं दुसरे घर कौलारू असायचे. गावात एखाद दुसरा श्रीमंत असायचा, बाकीचे सर्व गरीब. त्यामुळे गरिबीची कोणाला लाज वाटतं नव्हती. कोकण आणि गरिबी या एकाच नाण्याच्या दोन बाजू समजल्या जायच्या.

गायत्रीच्या कुटुंबात ६ जण. आई वडील आणि चार भावंडे. ही सर्वात मोठी, मग दोन बहिणी आणि दोन भाऊ. वडिलांची शेती/वाडी. काटकसरीने संसार करुन त्यांनी चारी मुलांना शिकविले. उपवर झाल्यावर गायत्रीच्या लग्नाचा विचार सुरू झाला. बरेच प्रयत्न केल्यानंतर तिचे लग्न ठरले. सासर शहरात होते. शहरात कधीही न राहिलेली मुलगी आता कायम शहरात राहण्यासाठी जाणार होती..

लग्न झालं, संसार सुरू झाला. मग सामान्य घरात ज्या गोष्टी घडतात त्या घडू लागल्या. सासू आणि सून…. हे एक न उलगडणारं कोडं आहे. दोघींची बाजू ऐकली तर आपल्याला दोघींचे म्हणणे पटते, बाजू कोणाची घ्यायची? समजूत कशी काढायची आणि सल्ला काय द्यायचा ? तिची घुसमट व्हायला लागली. गाव दूर, संपर्काचे साधन नाही. पत्र टाकले तर घरात सर्वांना कळणार. त्यामुळे तिने ‘मौन’ राहायचे ठरवले.

एकदा तिचा भाऊ आला तिला भेटायला. भावाशी तिचं नातं एकदम घट्ट होतं. भाऊ वयाने तिच्यापेक्षा लहान होता, पण तिची समजूत काढण्याइतपत विचारी होता. त्याने सर्व ऐकून घेतले आणि एकच वाक्य बोलला, “ ताई !! प्रत्येक जण आपल्या कुवतीनुसार बोलत असतो…. कुत्रा भुंकणार, मांजर म्याव म्याव करणार….. “ 

… या एका वाक्याने गायत्रीला उभारी आली…. मग गायत्री कधीच दुःखी झाली नाही.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “‘हो ची मिन्ह‘ च्या विमानतळावरची दिवाळी…” ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

??

हो ची मिन्ह‘ च्या विमानतळावरची दिवाळी…☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

मोठी सुट्टी लागली की एखादी परदेशात सहल करावी असे बरेच दिवसापासून मनात होते. माझी आणि मुलीची सुट्टी अगदी दिवाळीच्या दिवसातच होती, त्यामुळे दिवाळी घरी साजरी न करता सहलीला जायचे ठरवले.

खूप विचारपूस व चौकशी केल्यावर आम्ही एक आठवड्याची व्हिएटनामची सहल ठरवली. दिवाळीचे कुठलेच दिवस घरी नसल्यामुळे दिवे पणत्या, आकाशकंदील रांगोळी, फराळ बनवणे ह्या सगळ्या गोष्टी सोडून फिरायला जावे लागत होते त्यामुळे मनात थोडी खंत होते. पण सुट्टी कमी असल्यामुळे तसे करणे भाग होते.

मुंबईहून आम्ही सकाळी हो ची मिन्ह ला पोचल्यावर जेवण कुठे करता येईल ह्याचा शोध घेत आम्ही खूप फिरलो. शुद्ध शाकाहारी जेवणाच्या शोधात खूप वेळ गेला व शेवटी दमल्यामुळे राहत्या हॉटेलमध्येच अननसाचा भात व बटाट्याच्या चिप्स यावर जेवण भागवावे लागले. एकूण काय तर जेवणाची आबाळच झाली. हे जेवतांना घरच्या भाजी भाकरीची निश्चितच आठवण आली. यापुढे प्रवासात जेवण कसे मिळेल ह्याची मनात पाल चुकचुकली.

रात्री मात्र केळीच्या पानात छान जेवण जेवायला मिळाले. दुसऱ्या दिवशी रात्रीच्या जेवणात भारतीय भोजनालय शोधून गूगलची मदत घेवून आम्ही तंदूर नावाच्या हॉटेलमध्ये पोहचलो. दारातच शिवलिंग व त्याचा अभिषेक आणि दुसऱ्या बाजूला गणपती, लक्ष्मी, बाळकृष्ण अशा अनेक देवदेवतांच्या मोहक मुर्त्या मांडल्या होत्या. त्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न वाटले. जगजितसिंहची गझल कानावर पडली आणि आनंदात अजून भर पडली. मेनू कार्ड बघून तर आनंद अगदी द्विगुणित झाला. कांदा भजीपासून खिचडी पर्यंत सगळे पदार्थ तिथे उपलब्ध होते. तृप्तीची ढेकर देत आम्ही आमच्या राहत्या स्थळी पोहोचलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजताच आम्हाला ‘ मॅकाँग डेल्टा ‘ बघायला जायचे होते. नाश्ता करायला गेलो आणि जरा हिरमुडच झाली. उकडलेले रताळे, कणीस, कच्च्या भाज्या आणि फळे ह्या पुढे फारसे काही शाकाहारी तिथे नव्हते. जे काही एक दोन भाताचे प्रकार होते त्यालाही फार काही चव नव्हती. तिथले लोक एवढे तंदुरुस्त ह्या जेवणामुळेच असावेत. मग भाज्या व फळे आणि ब्रेड खाऊन आम्ही गाडीची वाट पाहत बसलो. आम्हाला मॅकाँग डेल्टा बघायला जायचे होते व दुपारी तिथेच आमच्या जेवणाची सोय केली होती.

आम्ही जेवायला पोहोचलो तेव्हा काही स्टार्टर्स आमच्या टेबल वर आधीच ठेवले होते ते पाहून जरा बरे वाटले. नंतर खूप मोठ्या मोठ्या भाज्यांचे तुकडे असलेली पाणीदार भाजी आणि कोरडा पांढरा भात असे आम्हाला जेवायला आणून दिले गेले. एकूण काय बाहेर कितीही सृष्टी सौंदर्य असले तरी जेवण स्वादिष्ट मिळाले नाही तर चिडचिड होतेच. एकूणच हो ची मिन्ह ला फळं, फुलं आणि आत्ता ह्या भाज्या सगळे आकाराने खूप मोठे मोठे होते. दुसरा काही पर्याय नसल्यामुळे आम्हाला मिळालेल्या जेवणामधेच समाधान मानावे लागले. रात्रीच्या जेवणासाठी आम्ही भारतीय हॉटेल शोधले. इथल्या हॉटेलमध्ये चक्क मसाला डोसा, मेदू वडा व पावभाजी मिळाली व खूप छान वाटले.

दुसऱ्या दिवशी आम्हाला ‘दनांग’ ला जायचे होते म्हणून आम्ही परत त्या उकडलेल्या भाज्या व फळे खाऊन विमानतळावर आलो. विमानतळावर आल्यावर समजले की दनांगला जायचे विमान जवळ जवळ दोन तास उशीराने येणार आहे. त्यामुळें विमानतळावरच खूप वेळ घालवावा लागणार होता. अचानक तिथे एक चाळीस जणांचा घोळका आला. चौकशी केल्यावर समजले की ते मुंबईहून शाह कंपनीतर्फे व्हिएतनाम फिरायला आले आहेत. आम्ही आमच्या जवळचे फराळाचे पदार्थ खात वेळ घालवत होतो. त्यांच्यातील एकाने सगळ्यांना जेवणाची पॅक ताटे दिली. सगळेजण अगदी हसत खेळत आवडीने जेवू लागले. खूप दिवसांनीं ओळखीच्या अन्नाचा सुवास अगदी हवाहवासा वाटला. अचानक एक व्यक्ती तीन ताटे घेऊन आमच्याकडे आली आणि आम्हाला जेवायचा आग्रह करू लागली. तिथे भारतीय आम्हीच होतो म्हणून त्यांनी त्यांच्याकडे जास्ती असलेली ताटे आम्हाला दिली व ते आम्हाला जेवायचा आग्रह करू लागले.

त्यांनी खूपच आग्रह केल्यावर आम्ही त्याच्यातील एक जेवणाचे ताट घेतले. जेवण खूपच स्वादिष्ट होते. त्यानंतर एकजण आमच्यासाठी गुलाबजाम घेऊन आला व आग्रहाने आम्हाला त्यांनी ते खाऊ घातले. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपल्या पद्धतीचे अगदी स्वादिष्ट जेवण मिळाले त्यामुळे मन अगदी तृप्त झाले.

ह्या सर्व प्रवासात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे.. बाहेर कितीही सृष्टी सौंदर्य असेल, झगमगाट असेल, तरी घरची भाजी भाकरी किंवा भारतीय जेवण करून आम्हाला जे समाधान मिळाले ते खूप जास्त होते.

धनत्रयोदशीच्या दिवशी भारतीय जेवणाचा आस्वाद घेता आला.

…. ‘ हो ची मिन्ह ‘ ला विमानतळावर दिवाळीच्या दिवशी जे स्वादिष्ट जेवण मिळाले त्यामुळे दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी झाल्यासारखे वाटले.

© सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी , कोंढवा पुणे

संपर्क :  सन युनिव्हर्स फेज २, एम ५०३, नवले ब्रिज जवळ, नऱ्हे, पुणे.

फोन   : ७५०६२४३०५०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अलेक… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ अलेक… ☆ श्री सुनील शिरवाडकर

अलेक पद्मसी

त्या दिवशी ‘लिंटास’ मध्ये मिटींग होती. ‘युनीलिव्हर’ चं एक प्रॉडक्ट ‘रिन डिटर्जंट बार’ भारतामध्ये लॉंच करायचं होतं. तसं हे प्रॉडक्ट इतर देशात फेल गेलेलं.. ‘लिव्हर्स’ चा आग्रह होता की जाहिराती मध्ये ‘हा बार स्वस्त आहे’ यावर भर द्यावा पण अलेक आणि त्याच्या टिमचं म्हणणं.. शुभ्रतेवर भर द्यावा.

बऱ्याच चर्चेनंतर अखेर भर शुभ्रतेवरच द्यावा हे म्हणणं मान्य झालं. आणि मग अलेक पद्मसी आणि त्याच्या सहकार्यांनी ‘ती’ जाहिरात बनवली आसमंतातुन येणारा विजेचा झोत.. आणि मग त्यामागे येणारे शब्द..

Whitening strikes again and again with RIN

आणि मग त्यानंतर इतिहास घडला. रिन आणि भारताचे अतूट नाते निर्माण झाले. रिनच्या विक्रीचे आकडे छप्पर फाडून वर गेले.

अगदी याउलट झाले ते काहीवर्षांनंतर. ‘निरमा’ पावडरचा खप प्रचंड वाढला होता. ‘सर्फ’ ची विक्री खूपच घसरलेली. ‘सर्फ’ साठी नवीन जाहिरात बनवायची होती. पुन्हा एकदा अलेक पदमसी आणि त्याची टीम कामाला लागली. यावेळी ‘लिव्हर्स’ चं म्हणणं जाहीरातीत शुभ्रतेवर भर द्यावा. वास्तविक ‘निरमा’ च्या तुलनेत ‘सर्फ’ खूपच महाग होता. यावेळी अलेकचं म्हणणं वेगळं होतं. अर्धा किलो सर्फ एक किलो निरमाच्या बरोबरीचा आहे हे त्याला गिऱ्हाईकांना पटवून द्यायचं होतं. अंतिमतः सर्फच घेणं फायदेशीर कसं आहे हे दाखवण्यासाठी त्याने एक भारतीय गृहिणी उभी केली.. ‘ललिताजी’ तिचं नाव. वेगवेगळ्या जाहिरातीतुन ललिताजी मग पटवुन देऊ लागली…

” भाई साब, सस्ती चीज और अच्छी चीज में फर्क होता है”… ती प्रत्येक गोष्ट विचार करुनच खरेदी करते.. आणि शेवटी म्हणते..

 “ सर्फ की खरीददारी में ही समझदारी है “

आणि मग तिथुन सर्फने पुन्हा एकदा मोठी झेप घेतली.

अश्या अनेक जाहिरातींमागे अलेकचं कल्पक डोकं होतं. मग ‘चेरी ब्लॉसम’ चा चार्ली असो.. की धबधब्याखाली आंघोळ करणारी ‘लिरील गर्ल’ असो.. ‘कामसुत्र’ची पूजा बेदी असो की ‘एमआरएफ’ चा मसलमॅन… अलेक पद्मसीने भारतीय समाजमन अचुक जाणलं होतं. प्रत्येक जाहिरात तो विचारपूर्वक बनवायचा.

अलेक पद्मसी.. एक खरा भारतीय. दक्षिण मुंबईत कुलाबा कॉजवेवर त्यांची अलिशान हवेली होती. वडिलांचा काचेचा व्यवसाय. घरात पाश्चात्य वळण.. पाश्चिमात्य वस्तूंची रेलचेल.. हंड्या.. झुंबरं.. भव्य पेंटिंग्ज.. इटालियन फर्निचर.. रविवारी सगळं कुटुंब ‘मेट्रो’ ला जायचं…. इंग्लिश फिल्मस् पहायला.

पण अलेक आणि त्याच्या भावंडांना मात्र नाटकाचं वेड. रात्र रात्र त्यांच्या दिवाणखान्यात तालमी चालायच्या. आणि मग त्यातुनच अलेकमधला अभिनेता घडत गेला.

रिचर्ड अँटनबरो ‘गांधी’ बनवत होते. महंमद अली जिनांच्या भुमिकेसाठी त्यांनी अलेकची निवड केली.

‘गांधी’ च्या संपुर्ण निर्मिती प्रक्रियेत तो अँटनबरो सोबत होता. गांधींच्या अंत्ययात्रेचं शुटींग करायचं होतं. त्यासाठी दिल्लीतल्या राजपथावर सुमारे पाच लाख लोकांची आवश्यकता होती. 31 जानेवारी 1981 या दिवशी हे शुटींग करण्याचं ठरलं. लोकांनी यात सहभागी व्हावं म्हणून वर्तमानपत्रात जाहिरात द्यायची होती.

रिचर्ड अँटनबरो अलेकला म्हणाले.. “ तू जाहिरात क्षेत्रातला आहेस.. लोकांनी शूटींगसाठी यावं यासाठी तू एक जाहिरात बनवशील? “…. आणि मग 30 जानेवारीच्या हिंदुस्थान टाईम्समध्ये अलेक पदमसीने बनवलेली एक ओळीची जाहिरात प्रसिद्ध झाली…. ३१ जानेवारीला इतिहासाची पुनर्निर्मिती होणार आहे. त्यावेळी तुम्ही तिथे असाल ?

… आणि खरंच त्या जाहिरातीला मिळालेला प्रतिसाद अपूर्व होता. अँटनबरोंच्या मनातील कल्पना ते जशीच्या तशी साकारु शकले ते केवळ आलेकमुळे.

अलेक पद्मसीच्या आत्मकथेचं नाव आहे.. “ अ डबल लाईफ. ”

खरंच तो दुहेरी आयुष्य जगला. चित्रपट.. दूरदर्शन.. वर्तमानपत्र.. यासाठी त्याने शेकडो जाहिराती बनवल्या.. पण तो एक उत्तम अभिनेता होता, दिग्दर्शक होता आणि एक रत्नपारखी सुध्दा.

अलेकनं अनेक जणांना घडवलं. त्यात श्याम बेनेगल होते.. कबीर बेदी होता.. डान्स डायरेक्टर शामक दावर.. अलीशा चिनॉय होती.. पॉपसिंगर शेरॉन प्रभाकर तर त्याची बायकोच. तिच्यामधले गुण हेरुन …. त्याच्याच मार्गदर्शनाने ती पॉप म्युझिकमध्ये टॉपला पोहोचली.

भारतीय समाजमन अचूक जाणणारा.. आपल्या जाहिरातींमधून त्यांच्या भावनेला हात घालणारा इंग्रजी रंगभूमीवर पन्नास नाटकांची निर्मिती आणि दिग्दर्शन करणारा अलेक पद्मसी…. उच्च कोटीची प्रतिभा. कलात्मकता.. सर्जनशीलता.. आणि अपूर्व संघटन कौशल्य.. नाटकातून पैसा कमावणं हे त्याचं उद्दिष्ट कधीच नव्हतं. म्हणूनच तो म्हणतो ….

“रंगभूमी रोजीरोटी मिळवून देऊ शकत नाही, हे खरं आहे…. पण तो माझा श्वास आहे. जाहिरात क्षेत्रात मात्र असं नाही. कॉपी लिहा…. शब्दांशी खेळ करा.. चित्रिकरण करा.. सुंदर कल्पना प्रत्यक्षात आणा.. आणि भरपूर पैसे खिशात टाका. “

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चुकून घडलेले अपघात… – लेखिका : सौ. माधुरी म. इनामदार ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ चुकून घडलेले अपघात… – लेखिका : सौ. माधुरी म. इनामदार ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

माझी मुलगी कायम माझ्यावर, स्वयंपाक घर आणि माझे काम यावर चिडलेली असते. दररोज कशाला सगळ्यांच्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ करत बसतेस?आणि सगळ्यांच्या हातात देत बसतेस? त्यांच्या वेळा सांभाळत बसतेस?तुझा तुला किती वेळ मिळतो सांग, असं म्हणते.

माझी लेकही सगळेच पदार्थ खूप छान करते. पुरणपोळी ते तांदळाचे मोदक. अगदी नवीन पदार्थही. तिचा स्वतःचा फूड ब्लॉग पण आहे. पण त्यावेळी जावई इतर कामे करतो. एकूणच सगळीच कामे ते मिळून करतात. खरे सहजीवन कसे असते, हे मला कॅनडामध्ये गेल्यावरच समजले. आता इकडेही काही पुरुष सगळी कामे करतात, हे मी बघतेय. (अलीअलीकडे आमच्या घरातील पुरुषही काही बाबतीत तरी छान मदत करत आहेत.)

हे सगळे आठवायचे कारण.. काल सकाळी नाश्त्यासाठी मी भरपूर भाज्या घातलेले आप्पे, चटणी करायची ठरवली.. बाकी सगळे तयार होते. पण चटणीला फोडणी घालायला गेले आणि कसे काय कोण जाणे, हातातून फोडणीचा डबा निसटला आणि तो मायक्रोवेव्ह, मिक्सर आणि ओटा यांच्यावर पडल्याने सगळ्या रंगाची रंगपंचमी झाली.. त्यांचे शुभ्र रंग हळद, तिखट, मसाला इत्यादी रंगात माखून गेले. (इकडे आल्यावर मी डबा घासून पूर्ण भरला होता.) ओटाही सगळा भरून गेला. हे नाष्टा करून बाहेर जायच्या तयारीत बसले होते. सून माहेरी. मुलाने नुकताच लॅपटॉप उघडला होता. (वर्क फ्रॉम होम). पण माझा झालेला गोंधळ बघून लगेच मुलगा आला. बाबा आणि त्याने मिळून बाहेर घेऊन जाऊन मायक्रोवेव्ह आणि मिक्सर स्वच्छ एरियल लावून पुसून उन्हांत ठेवले. तोपर्यंत मी कट्टा आवरला. या सगळ्या गोष्टींमुळे नाश्त्याला वेळ लागला, तो वेगळाच. पण सगळ्यांनी मिळून, समजून केल्याने मला कसलाच त्रास वाटला नाही.

या घटनेमुळे सहजच एक जुनी आठवण जागी झाली. मिरजेत असताना एकदा कोणीतरी खास पाहुणे आले, म्हणून मी माझ्या ठेवणीतील क्रोकरी काढली होती. त्या वेळी मी नोकरीही करत होते. सासूबाईंची तब्येत बिघडली होती, म्हणून त्या झोपल्या होत्या. सिंक कपबश्या, क्रोकरीने भरले होते. आम्हा सगळ्यांना रोज ताक लागतेच. तर मी घाईघाईत ताक केले. त्यावेळी घरी फिल्टर नव्हता. स्टीलचे मोठे पिंप. आणि त्यावर पाण्याने भरलेली कळशी होती.. (पिण्याचे पाणी भरून ठेवण्यासाठी). पिंपात पाणी भरणे घाईत विसरले होते. त्यामुळे ते खाली गेले होते. मी ताकाच्या गुंडीत तसाच पिंप वाकवून पाणी घ्यायला गेले.. आणि वरची कळशी गुंडीवर पडून ताक तर सगळीकडे उडालेच आणि माझी काचेची क्रोकरी बहुतेक सगळी फुटली. एक, दोन बाऊल तेवढे वाचले. त्या वेळी आर्थिक चणचणही जास्त होती आणि त्यात हे अती घाईने झालेले नुकसान. त्यामुळे माझे डोळे लगेच भरून आले. मुले कॉलेजला जाण्याच्या तयारीत होती.. जोरात झालेला आवाज ऐकून दोघं आत पळत आली. माझ्या अंगभर ताक उडून अगदी अवतार झाला होता. दोघांनी लगेच हसत हसत मला आरसा दाखविला. “होतं आई असे कधी कधी. त्यात रडण्यासारखे काय आहे?” म्हणून राहिलेले दोन बाऊल माझ्या हातात देऊन त्यांनी काचा गोळा करून टाकल्या.

असे चुकून झालेले अपघात थोड्या वेगवेगळ्या फरकाने आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात. पण त्यातील नकळत राहिलेल्या पक्क्या रंगाकडे बघायचे की पुसून शुभ्र झालेल्या रंगाकडे बघायचे?तसेच तुटलेले आठवायचे की त्यातूनही सही सलामत वाचलेले बघायचे?हे तर नक्कीच आपल्या हातात असते ना?

लेखिका:सौ. माधुरी म. इनामदार

प्रस्तुती: सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “स्वामी विवेकानंद समग्र चरित्र – ३ खंड” – लेखक : प्रा. एस. एन धर – अनुवाद : डॉ. सुरुची पांडे / सौ. संगीता तपस्वी /प्रा. सुषमा कर्णिक ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “स्वामी विवेकानंद समग्र चरित्र – ३ खंड” – लेखक : प्रा. एस. एन धर – अनुवाद : डॉ. सुरुची पांडे / सौ. संगीता तपस्वी /प्रा. सुषमा कर्णिक ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

(स्वामी विवेकानंद यांचे विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या प्रकाशनाने प्रकाशित केलेलं समग्र चरित्र !)

पुस्तक : स्वामी विवेकानंद समग्र चरित्र (खंड एक, दोन आणि तीन)

(कॉम्प्रेशन बायोग्राफी ऑफ स्वामी विवेकानंद या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद.)

लेखक : प्रा. एस. एन धर

अनुवाद : डॉ. सुरुची पांडे / सौ. संगीता तपस्वी /प्रा. सुषमा कर्णिक ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली

(तिन्ही ग्रंथाची एकत्रित) पृष्ठे : २११२

मूल्य : २५००₹ 

स्वामी विवेकानंद यांच्या नावाची भुरळ आजही भारतीयांच्या मनावर आहे. आणि ती तसूभरही कमी झालेली नाही. त्यांचे विचार, त्यांचा संदेश पौर्वात्य जगतातच नव्हे, तर पश्चिमात्य विश्वातही सगळ्यांना आकर्षून घेत आहे.

स्वामी विवेकानंद एक महायोगी होते. हिमनगाचा पाण्याखालील अदृश्य भाग असतो, तसे त्यांचे जीवन आपल्या मानवी जाणिवांच्या पलीकडचे होते. स्वामीजींचे जीवन आणि कार्य सर्व जगतकल्याणासाठीच होते. इतर सत्पुरुषांसारखे त्यांचे जीवन नव्हते. शिकागोमध्ये १८९३ साली भरलेल्या जागतिक धर्मपरिषदेपासून, जगाच्या पटलावर त्यांना एक थोर ऐतिहासिक विभूती अशी ओळख मिळाली होती. आधुनिक भारताचे ते कित्येकांच्या मते एक सर्वश्रेष्ठ निर्माते होते, ज्यांचे ध्येय जागतिक होते. जगाला भौतिक प्रगती प्रदान करण्याबरोबरच, नवीन जीवनमूल्ये किंवा जुन्या जीवनमूल्यांची पुनर्स्थापना करण्यासाठी ते अखंड झिजले. दुसरे म्हणजे, त्यांच्या जीवनाविषयी आणि कार्याविषयी उदंड साहित्य जमा होत गेले आणि भारताबरोबरच जगातही त्यावर खूप संशोधन सुरू आहे.

 हे पुस्तक लिहिण्यामागे स्वामी विवेकानंदाच्या जीवन आणि कार्याचा एक सरळ आणि तटस्थ आढावा घेणे हा लेखकाचा हेतू आहे. उपलब्ध असलेले सर्व प्रकाशित आणि अप्रकाशित साहित्याचा संदर्भ घेऊन केलेले हे लेखन कुठल्याही सिद्धांताचा/ तत्त्वाचा अथवा विचारपद्धतीच्या प्रसारासाठी अथवा छापील गोष्टीचा अपभ्रंश करण्यासाठी केलेले नाही. या चरित्रातील व्यक्ती आणि प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे पारखून आणि निरखून घेतलेले आहेत. ज्यायोगे वाचकांना एक समग्र चरित्र उपलब्ध होईल. या अभ्यासात पार्श्वभूमीवरचे आणि अग्रस्थानी असलेले अनेक प्रसंग, आणि त्याकाळची सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक परिस्थिती समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच स्वामी विवेकानंदांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे श्रीरामकृष्ण यास अभ्यासात अध्याहृत आहेत.

या खंडात्रयीचा पहिला भाग १८६३ ते १८९३ हा स्वामीजींच्या आयुष्यातील पहिल्या तीस वर्षाच्या कालावधीवर आधारलेला आहे. हा टप्पा आहे त्यांचा जन्म ते भारत परिक्रमा आणि त्यानंतर अमेरिकेतील शिकागो शहरात भरलेल्या जागतिक धर्मपरिषदेला त्यांनी केलेले संबोधन, या घटनाक्रमावर आधारलेला. स्वाभाविकपणेच त्यात स्वामीजींचे बालपण, शाळा – कॉलेजातील दिवस, श्रीरामकृष्णांशी झालेली भेट, गुरु म्हणून त्यांचा केलेला स्वीकार, त्यांच्याकडून घेतलेली संन्यासदीक्षा, श्रीरामकृष्णांनी घेतलेली महासमाधी, वराहनगर मठाची स्थापना आणि ध्येयमार्गाच्या दिशेने वाटचाल सुरू करण्यापूर्वी गुरू आज्ञेनुसार केलेले भारत भ्रमण, इतक्या घटनांचे विस्तृत तपशील आले आहेत. स्वामीजी जागतिक धर्म परिषदेला गेले, तिथे प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना आलेल्या अडचणी, यावर त्यांनी केलेली मात, स्वामीजींच्या अचाट व्यासंगाची अनुभूती घेतल्यानंतर या परिषदेत स्वामीजींना प्रवेश मिळावा यासाठी काही अमेरिकन नागरिकांनीच केलेले प्रयत्न आणि अखेरीस त्या महापरिषदेसमोर स्वामीजींनी केलेले उदबोधन हा सगळाच रोमांचित करणारा कालखंड पहिल्या खंडात प्रा. धार यांनी उलगडला आहे. हे लेखन रोचक आहेच, परंतु अंत:करणाला भिडणारे आहे, नितांत सुंदर वाचनानंद देणारे आहे. श्रीरामकृष्णांच्या महासमाधीनंतरही स्वामीजींना जे दैवी संकेत मिळत गेले, जे दृष्टांत घडले त्यांचे वर्णन वाचणे हा एक अनमोल आनंदाचा ठेवा ठरावा.

या खंड त्रयीचा दुसरा भाग आधारला आहे तो ११ सप्टेंबर १८९३ ते १६ डिसेंबर १८९६ या तशा तीनच वर्षांच्या कालावधीतील घटनांवर. या घटना बहुतांशी अमेरिका आणि इंग्लंडमधील आहेत. स्वामीजींनी या देशांच्या दौऱ्यात भारतीय संस्कृतीचा केवळ पायाच रचला नाही, तर त्याचे मजबुतीकरणही केले. या सर्वच घटना स्वामीजींच्या व्यक्तिमत्त्वाला आंतरराष्ट्रीय महती प्राप्त करून देणाऱ्या असल्याने, त्याचे तपशील वाचकांना प्रेरणादायक असेच वाटतील यात शंका नाही. अमेरिका आणि इंग्लंडचा हा दौरा सुरू असताना आणि तिथल्या शिष्यांना स्वामीजी अधिक काळ रहावेत असे वाटत असताना, स्वामीजींना मात्र भारतात परतण्याची विलक्षण होऊ लागली होती.

स्वामीजी ३० डिसेंबर १८९६ ला परतीच्या प्रवासाला निघाले. कोलंबोपासून कोलकात्यापर्यंत ठीकठिकाणी स्वामीजींचे उत्स्फूर्त स्वागत झाले, त्याचे वर्णन मुळातूनच वाचण्यासारखे आहे.

खंडत्रयीचा तिसरा भाग फेब्रुवारी १८९७ ते जुलै १९०२ असा सुमारे साडेपाच वर्षाचा आहे. हा कालखंड स्वामीजींच्या जीवनातील अनेक विविध प्रसंगांनी आणि घटनांनी भरलेला आहे. त्याचे शब्दांकन अंगावर रोमांच उभे करणारे ठरले आहे. २० जून १८९९ ते ९ डिसेंबर १९०१ या कालखंडातील स्वामीजींनी पुन्हा एकदा पश्चिमेचा दौरा केला; परंतु या दौऱ्याचा हेतूच प्रकृतीस उतार पडावा हा होता. काही प्रमाणात स्वामीजींची प्रकृती सुधारलीही, त्यामुळेच बेलूर मठासाठी निधीसंकलन करून पाश्चात्त्य जगात सुरु झालेल्या कार्याचं मजबुतीकरण करण्यासाठीही त्यांना वेळ काढता आला. तिथल्या कामाचा व्यवस्थापन मार्गी लावता आलं, हेही महत्त्वाचं.

या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वामीजींची अत्यंत दुर्मिळ आणि पूर्वी कधीही प्रसिद्ध न झालेली छायाचित्रे समाविष्ट करण्यात आलेली आहेत.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार # 268 ☆ व्यंग्य – तलाश बकरों की ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपका एक अप्रतिम व्यंग्य – ‘तलाश बकरों की’। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 268 ☆

☆ व्यंग्य ☆ तलाश बकरों की

सरकार के सब विभागों ने ज़ोर-शोर से विज्ञापन निकाले हैं। विज्ञापन बकरों के लिए है, ऐसे लोगों के लिए जो हर विभाग में किसी बड़े लफड़े के लिए ज़िम्मेदारी लेंगे। दे विल टेक द ब्लेम फ़ाॅर एवरी बिग स्कैम ऑर मिसडूइंग।

दरअसल कई दिनों से विभागों में यह चर्चा चल रही थी कि सरकारी विभागों में कोई न कोई लफड़ा, कोई न कोई भ्रष्टाचार होता ही रहता है, जिससे बच पाना बहुत मुश्किल है। कौटिल्य के शब्द अक्सर दुहराए जाते रहे कि ‘जैसे जीभ पर रखा रस इच्छा हो या न हो, चखने में आ ही जाता है, इसी प्रकार राज्य के आर्थिक कार्यों में नियुक्त अधिकारी, इच्छा हो या न हो, राजकोष का कुछ न कुछ तो अपहरण करते ही हैं।’ आर्थिक भ्रष्टाचार के अलावा रेल दुर्घटनाएं, पुलों का ध्वस्त होना, परीक्षा- पेपर लीकेज जैसी घटनाएं होती हैं जिससे मंत्री-अफसर संकट में पड़ते हैं और ज़िम्मेदारी थोपने के लिए बकरे की तलाश की जाती है।

यह बात भी चलती थी कि जब लफड़ा  उजागर होता है तो आखिरी छोर पर बैठे सबसे जूनियर और सबसे निर्बल कर्मचारी के ऊपर ठीकरा फोड़ दिया जाता है और ऊपर के लोग चैन की सांस लेते हैं। कारण यह है कि नेताओं-मंत्रियों पर तो हाथ डाला नहीं जा सकता क्योंकि पार्टी की छवि खराब होगी और वोट खतरे में पड़ेंगे। अफसरों को पकड़ेंगे तो शासन चलाना मुश्किल हो जाएगा। इसलिए जूनियरमोस्ट को बलि का बकरा बना देना ही सबसे सुरक्षित होता है। इसी झंझट से मुक्ति पाने के लिए बकरों की सीधी भर्ती का निर्णय लिया गया।

अंग्रेज़ी में बलि के बकरे के लिए ‘स्केपगोट’ शब्द है जिसमें ‘गोट’ यानी ‘बकरा’ शब्द निहित है। ‘स्केपगोट’ शब्द की उत्पत्ति प्राचीन इज़राइल में हुई जहां पवित्र दिन पर एक बकरे के सिर पर समाज के सारे पाप आरोपित कर दिये जाते थे और फिर उसे जंगल में छोड़ दिया जाता था। इस तरह समाज साल भर के लिए पापमुक्त हो जाता था। यानी, ‘स्केपगोट’ वहां वही काम करता था जो हमारे यहां गंगाजी करती हैं।

गरीब, निर्बल लोग हमेशा रसूखदारों की गर्दन बचाने के लिए ‘स्केपगोट’ बनते रहे हैं। जैसे देवताओं को प्रसन्न करने के लिए बकरे की बलि दी जाती थी, ऐसे ही किसी दुर्घटना के बाद जनता के गुस्से को शान्त करने के लिए किसी मरे- गिरे बकरे को सूली पर चढ़ा दिया जाता है। कहीं पढ़ा था कि रसूखदार लोग मजबूर लोगों को अपनी जगह जेल में सज़ा काटने के लिए स्थापित करवा देते हैं।

अंग्रेज़ी में एक और दिलचस्प शब्द ‘व्हिपिंग बाॅय’ आता है जो कई देशों में उन लड़कों के लिए प्रयोग होता था जो राजकुमारों और रसूखदार लोगों के बालकों के साथ स्कूल भेजे जाते थे और जिन्हें रसूखदार बच्चों की गलतियों की सज़ा दी जाती थी। कारण यह था कि मास्टर साहब की हैसियत रसूखदारों के बच्चों को सज़ा देने की नहीं होती थी।

विज्ञापन में लिखा गया कि बकरा सिर्फ बारहवीं पास हो ताकि दस्तखत  वस्तखत कर सके। उसे दफ्तर के बाबू के बराबर तनख्वाह मिलेगी। उसे दफ्तर आने-जाने से छूट मिलेगी, दो-चार दिन में कभी भी आकर हाज़िरी रजिस्टर में दस्तखत कर सकेगा।

उसकी ड्यूटी सिर्फ इतनी होगी कि जब विभाग में कोई बड़ा लफड़ा हो जिसमें अफसर और दूसरे कर्मचारियों के फंसने का डर हो तो वह बहादुरी से अपनी गर्दन आगे बढ़ाये और कहे, ‘सर, आई एम द कलप्रिट। आई टेक द ब्लेम।’

विज्ञापन में यह ज़िक्र किया गया कि नियुक्ति से पहले बकरे की मनोवैज्ञानिक जांच होगी ताकि वह ऐन मौके पर डर कर ज़िम्मेदारी लेने से पीछे न हट जाए।

विज्ञापन में यह भी बयान किया गया कि बकरे के सस्पेंड होने पर उसकी पगार में कोई कटौती नहीं की जाएगी और जेल जाने की नौबत आने पर पूरी तनख्वाह उसकी फेमिली को पहुंचायी जाएगी। इसके अलावा उसके फंसने पर उसे बचाने के लिए महकमे की तरफ से कोई कसर नहीं छोड़ी जाएगी।

इस नीति के बारे में पूछे जाने पर आला अफसर भारतेन्दु हरिश्चंद्र के नाटक ‘अंधेर नगरी’ का हवाला देते हैं जिसमें फांसी का फन्दा उसी के गले में डाला जाता था जिसके गले में वह अंट सकता था।

ताज़ा ख़बर यह है कि सिंधुदुर्ग में शिवाजी की 35 फीट ऊंची प्रतिमा स्थापित होने के एक साल के भीतर ज़मींदोज़ हो गयी है और उसके लिए मूर्तिकार की गिरफ्तारी हो गयी है। अब मूर्ति का प्रसाद पाने वाले ऊपर बैठे लोग निश्चिन्त हो सकते हैं। अब 60 फीट ऊंची नयी मूर्ति का टेंडर ज़ारी हो गया है। टेंडर में यह शर्त है कि मूर्ति 100 साल खड़ी रहनी चाहिए। उम्मीद है कि नये मूर्तिकार इस शर्त को खुशी-खुशी मान लेंगे क्योंकि 100 साल में वे खुद मूर्ति बनने लायक हो जाएंगे। बकौल  ‘ग़ालिब’, ‘ख़ाक हो जाएंगे हम तुमको ख़बर होने तक।’

उधर बिहार में पुल जितनी तेज़ी से बन रहे हैं उससे ज़्यादा तेज़ी से गिर रहे हैं। नतीजतन छोटे-मोटे बकरों को पकड़ कर लाज बचायी जा रही है, और जनता मजबूरी में नावों पर सवार होकर उनके पलटने से मर रही है। जब तक ज़िम्मेदारी ओढ़ने के लिए बकरे उपलब्ध हैं तब तक कोई चिन्ता की बात नहीं है।

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ ≈ मॉरिशस से ≈ – प्रतिवाद – ☆ श्री रामदेव धुरंधर ☆

श्री रामदेव धुरंधर

(ई-अभिव्यक्ति में मॉरीशस के सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री रामदेव धुरंधर जी का हार्दिक स्वागत। आपकी रचनाओं में गिरमिटया बन कर गए भारतीय श्रमिकों की बदलती पीढ़ी और उनकी पीड़ा का जीवंत चित्रण होता हैं। आपकी कुछ चर्चित रचनाएँ – उपन्यास – चेहरों का आदमी, छोटी मछली बड़ी मछली, पूछो इस माटी से, बनते बिगड़ते रिश्ते, पथरीला सोना। कहानी संग्रह – विष-मंथन, जन्म की एक भूल, व्यंग्य संग्रह – कलजुगी धरम, चेहरों के झमेले, पापी स्वर्ग, बंदे आगे भी देख, लघुकथा संग्रह – चेहरे मेरे तुम्हारे, यात्रा साथ-साथ, एक धरती एक आकाश, आते-जाते लोग। आपको हिंदी सेवा के लिए सातवें विश्व हिंदी सम्मेलन सूरीनाम (2003) में सम्मानित किया गया। इसके अलावा आपको विश्व भाषा हिंदी सम्मान (विश्व हिंदी सचिवालय, 2013), साहित्य शिरोमणि सम्मान (मॉरिशस भारत अंतरराष्ट्रीय संगोष्ठी 2015), हिंदी विदेश प्रसार सम्मान (उ.प. हिंदी संस्थान लखनऊ, 2015), श्रीलाल शुक्ल इफको साहित्य सम्मान (जनवरी 2017) सहित कई सम्मान व पुरस्कार मिले हैं। हम श्री रामदेव  जी के चुनिन्दा साहित्य को ई अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों से समय समय पर साझा करने का प्रयास करेंगे। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय एवं मनोवैज्ञानिक लघुकथा “– प्रतिवाद –” ।

~ मॉरिशस से ~

☆ कथा कहानी ☆ — प्रतिवाद — ☆ श्री रामदेव धुरंधर ☆

मेरे गाँव के वयोवृद्ध बालकिसुन दादा अपने दिल से विद्वान थे। वही विद्वता उनके ओठों से प्रस्फुटित होती थी। वे मुझसे बोले थे अमेरिका ने गिन लिया आकाश में कितने तारे हैं। दादा एक दिन तो बोले भारत अब इतना बलवान हो गया है कि सब देशों को नचा नचा कर मार सकता है। उनकी मृत्यु होने पर मैं सोच रहा था क्या मैंने कभी उनसे प्रतिवाद किया होगा? मैं उनके सामने पल कर बड़ा हुआ था।

***

© श्री रामदेव धुरंधर
09 – 12 – 2024

संपर्क : रायल रोड, कारोलीन बेल एर, रिविएर सेचे, मोरिशस फोन : +230 5753 7057   ईमेल : [email protected]

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 269 – मढ़ी न होती चामड़ी…! ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है। साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली कड़ी। ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

☆  संजय उवाच # 269 मढ़ी न होती चामड़ी…! ?

संध्या भ्रमण के लिए मुझे सूनी सड़क के सूने फुटपाथ पसंद हैं। यद्यपि महानगर में यह पसंद स्वप्न से अधिक कुछ नहीं होती। तथापि भाग्यवश कैंटोन्मेंट प्रभाग में निवास होने के कारण ऐसी एकाध सड़कें बची हुई हैं। ऐसी ही तुलनात्मक रूप से सूनी एक सड़क के कम भीड़भाड़ वाले फुटपाथ पर भ्रमण कर रहा हूँ।

सूर्यास्त का समय है। डूबते सूरज के धुँधलके में  मनुष्य साये में बदलता दिखता है। साँझ और साया..! जीवन की साँझ और साया रह जाना! यूँ दिन भर साथ चलती परछाई भी साया होने के सत्य को इंगित कर रही होती है। सूर्योदय से सूर्यास्त की परिक्रमा दैनिक रूप से मनुष्य को नश्वरता का शाश्वत स्मरण कराती है।

अस्तु! भ्रमण जारी है। भ्रमण के साथ अवलोकन भी जारी है। मुझसे कुछ आगे एक युवक चल रहा है। वह सिगरेट का कश लेकर धुआँ आसमान की ओर छोड़ रहा है। देखता हूँ कि यह धुआँ एक आकार लेकर धीरे-धीरे ऊपर उठ रहा है। धुएँ का  आकार देखकर अवाक हूँ। यह कंकाल का आकार है। मनुष्य द्वारा फूँका जाता धुआँ, मनुष्य को फूँकता धुआँ। कंकाल पर देह ओढ़ता मनुष्य, देह का ओढ़ना खींचकर मनुष्य को कंकाल करता धुआँ।

यूँ देखें तो देह का भौतिक अस्तित्व कंकाल पर ही टिका है। कंकाल आधार है, माँस-मज्जा  आधार पर चढ़ी सज्जा है। चमड़ी की सज्जा न होती तो क्या मनुष्य दैहिक आकर्षण में बंध पाता?

दृष्टांत  है कि एक गाँव में एक रूपसी अकेली रहती थी। गाँव के जमींदार का उसके रूप पर मन डोल गया। वासना से पीड़ित जमींदार उस स्त्री के घर पहुँचा। महिला ने प्राकृतिक चक्र की दुहाई देकर चार दिन बाद आने के लिए कहा। जमींदार के लौट जाने के बाद उस रूपसी ने  रेचक का बड़ी मात्रा में सेवन कर लिया। रेचक के प्रभाव के चलते उसे पुन:- पुन: शौच के लिए जाना पड़ा। स्थिति यह हुई कि सारा का सारा माँस शरीर से उतर गया और वह कंकाल मात्र रह गई। चार दिन बाद आया जमींदार उल्टे पैर लौट गया।

लोकोक्ति है,

सुंदर देह देखकर उपजत मन अनुराग।

मढ़ी न होती चामड़ी तो जीवित खाते काग।

प्रकृति सुंदर है। दैहिक सौंदर्य का आकर्षण भी स्वाभाविक है। तथापि आत्मिक सौंदर्य न हो तो दैहिक सौंदर्य व्यर्थ हो जाता है। सहज रूप से उगे गुलाब पुष्प की सुगंध नथुनों में गहरे तक समाती है। वहीं बड़े करीने से तैयार किए हाईब्रीड गुलाब दिखते तो सुंदर हैं पर सुगंध के नाम पर शून्य। सुगंध आत्मिकता है, शेष सब धुआँ है।

दूर श्मशान से धुआँ उठता देख रहा हूँ। किसी देह का ओढ़ना धुआँ-धुआँ हो रहा है। सबके लिए समान रूप से लागू इस नियम में बिरले ही होते हैं जो धुआँ होने के बाद भी अपनी आत्मिकता के कारण चिर स्मरणीय हो जाते हैं। दैहिक सौंदर्य के साथ मनुष्य आत्मिक सौंदर्य के प्रति भी सजग हो जाए तो धुआँ होने से पहले जग को सुवासित करेगा और आगे धुआँ इस सुवास को अनंत में प्रसरित करेगा।

हर मनुष्य आत्मिक सौंदर्य का धनी हो।…  तथास्तु!

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆ सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर ☆ संपादक– हम लोग ☆ पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥  मार्गशीर्ष साधना 16 नवम्बर से 15 दिसम्बर तक चलेगी। साथ ही आत्म-परिष्कार एवं ध्यान-साधना भी चलेंगी💥

 🕉️ इस माह के संदर्भ में गीता में स्वयं भगवान ने कहा है, मासानां मार्गशीर्षो अहम्! अर्थात मासों में मैं मार्गशीर्ष हूँ। इस साधना के लिए मंत्र होगा-

ॐ नमो भगवते वासुदेवाय

  इस माह की शुक्ल पक्ष की एकादशी को गीता जयंती मनाई जाती है। मार्गशीर्ष पूर्णिमा को दत्त जयंती मनाई जाती है। 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Anonymous litterateur of social media # 215 ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain (IN) Pravin Raghuvanshi, NM

 

? Anonymous Litterateur of social media # 215 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 215) ?

Captain Pravin Raghuvanshi NM—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad was involved in various Artificial and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’. He is also the English Editor for the web magazine www.e-abhivyakti.com

Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc.

Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi. He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper. The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.

हिंदी साहित्य – आलेख ☆ अंतर्राष्ट्रीय हिंदी सम्मेलन ☆ कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम्

In his Naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Awards and C-in-C Commendation. He has won many national and international awards.

He is also an IIM Ahmedabad alumnus.

His latest quest involves writing various books and translation work including over 100 Bollywood songs for various international forums as a mission for the enjoyment of the global viewers. Published various books and over 3000 poems, stories, blogs and other literary work at national and international level. Felicitated by numerous literary bodies..! 

? English translation of Urdu poetry couplets of Anonymous litterateur of Social Media # 215 ?

☆☆☆☆☆

ख़ुद का दर्द महसूस होना

ज़िंदा होने का एक सबूत है..!

मग़र औरों के दर्द का अहसास होना 

ज़िंदादिल इंसान होने का सबूत है..!

☆☆

 To feel your own pain

Is a proof of being alive but

Proof of compassionate human

Is to feel the pain of others!

☆☆☆☆☆

काश एक ख्वाहिश पूरी हो

इबादत के बगैर

वो आके गले लगा ले

मेरी इजाजत के बगैर…

☆☆

If only one  wish could be fulfilled

Without offering the prayers

That she came and hugged me

Without my  permission…!

☆☆☆☆☆

दर्द की तुरपाइयों की 

नज़ाकत तो देखिये

एक धागा छेड़ते ही 

ज़ख्म पूरा खुल गया…

☆☆

Look at the tenderness of

the hemstitch of the pain…

Just disturbing one thread was

enough to open the whole wound!

☆☆☆☆☆

सूरज ढला तो कद से

ऊँचे हो गए साये

कभी पैरों से रौंदी थी

यहीं परछाइयां हमने..!

☆☆

Setting sun elong☆☆☆☆☆ated the

Shadows bigger than the stature,

Thes’re the shadows which once

were trampled under my feet..!

☆☆☆☆☆

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares