☆ क्रिकेटपटू व्हावे की सैनिक?☆ श्री संभाजी बबन गायके☆
माझ्या सैनिकी कारकीर्दीत माझा सहपाठी असलेल्या एकाने मला एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली! तो त्याच्या तरुणपणी सेनादलाच्या संघाकडून रणजी ट्रॉफी स्पर्धेत क्रिकेट खेळला होता. त्याचा लहान भाऊही क्रिकेट खेळायचा. आणि त्याला भारतीय संघाकडून एक कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली होती. आणि हे दोघेही माजी क्रिकेटपटू असल्याने त्यांना बी .सी.सी.आय. अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून मासिक निवृत्तीवेतन दिले जात होते! हा माझा मित्र तब्बल पंचवीस रणजी सामने खेळला होता आणि त्याला महिन्याला पंधरा हजार रुपये निवृत्तीवेतन मिळत होते आणि….केवळ एकाच कसोटीत खेळलेल्या त्याच्या धाकट्या भावाला पंचाहत्तर हजार! शिवाय बी.सी.सी.आय. च्या एका योजनेनुसार निवृत्त माजी कसोटीपटू मंडळींना त्यांच्या उर्वरीत आयुष्यात आर्थिक साहाय्य म्हणून जवळपास एक कोटी इतकी रक्कम दिली गेली होती. आणि यात वावगे असे काही नव्हते!
पण रकमांमधील फरकामुळे मी विचारात पडलो….आपण भारतीय कसे विचार करतो? आपली मूल्ये काय आहेत? हा तो विचार होता. मी भारतीय फौजेत एकोणतीस वर्षे सेवा केली. १९७१ च्या भारत पाक लढाईत शौर्य गाजवल्याबद्दल मला वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते! परमवीर चक्र, महावीर चक्र यानंतर वीर चक्र हा तिसरा मोठा सन्मान समजला जातो! याबद्दल सेवेत असताना सैनिकास विशेष भत्ता आणि निवृत्तिवेतनातही काही रक्कम दिली जाते…सुरुवातीला एक छोटी रक्कम असते…मग पे कमिशन नुसार ही रक्कम थोडी थोडी वाढत जाते…मला आता पस्तीसशे रुपये मिळतात…वीर चक्र मिळवल्याबद्दल! महावीर चक्र विजेत्यांना पाच हजार आणि परमवीर चक्र विजेत्यांना दहा हजार दिले जातात!
एका सैनिकाच्या जीविताची ही एवढी किंमत पाहून मी पुन्हा विचारमग्न झालो! बहुतांश सैन्य शौर्य पुरस्कार हे मरणोत्तर दिले जातात. मृत सैनिकांचे वारस ही रक्कम मिळवण्यास पात्र ठरतात. मृत सैनिकाच्या कुटुंबास ग्रुप इन्शुरन्स फंड आणि पेन्शन अशी काही रक्कम दिली जाते…जी काही लाख रुपयांत असते. बी.सी.सी.आय. माजी क्रिकेटपटू मंडळींना देत असलेल्या रकमेच्या तुलनेत ही रक्कम अगदीच किरकोळ दिसते! मला शौर्य पुरस्कार मिळाला तेंव्हा पंजाब सरकारने मला पाच एकर जमिनीच्या बदल्यात पंचवीस हजार रुपये दिले होते. ही रक्कम ऑलीम्पिक्स,आशियाई स्पर्धा, कॉमनवेल्थ गेम्स यांत पदके मिळवणा-या खेळाडूस मिळणा-या पुरस्कार राशीशी तुलना करता कितीतरी पट अधिक भरेल! याचा एक अर्थ आहे…सैनिकांचे जीवित तसे स्वस्त आहे!
क्रिकेट खेळत असलेला खेळाडू आणि युद्धात किंवा सैनिकी कर्तव्य करीत असलेला सैनिक…यांच्यात तुलना करून पाहू. क्रिकेटपटूकडे लाल,पांढरा चेंडू फार तर दीडशेच्या वेगाने येतो. सैनिकावर गोळी,बॉम्ब यांनी हल्ला होऊ शकतो आणि या विनाशकारी वस्तूंचा वेग काहीवेळा प्रकाशाच्या वेगापेक्षाही अधिक असतो! क्रिकेटपटू त्याच्याकडे आलेला चेंडू लाकडी फळीने टोलवू शकतो..अवघड असेल तर चेंडू सोडून देऊ शकतो…फार फार तर तो चेंडू त्याच्या शरीरावर आदळू शकतो….आणि त्याच्या शरीरावर ठिकठीकाणी संरक्षक कवचे लावलेली असतात…पण सैनिक फक्त एवढेच करू शकतो…त्याच्या दिशेने येणारी गोळी..तिचा नेम चुकावा!
क्रिकेटपटू आणि सैनिक…दोघेही देशासाठी काहीतरी करीत असतात. सामना हरला तर ‘ हा एक खेळ तर आहे ..हारजीत होतेच..’ असे म्हटले जाते. पण सैनिकाला पराभूत होऊन चालणार नसते! क्रिकेटपटू ‘भारतरत्न’ होऊ शकतो…पण प्रचंड पराक्रम गाजवलेले फिल्ड मार्शल माणेकशा साहेबांपासून हा सन्मान दूरच राहतो.
पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामना हरणे आणि पाकिस्तान करीत असलेल्या छुप्या युद्धात नुकसान होणे यांपैकी भारतीय मानसिकता नक्की कशामुळे जास्त दुखावली जात असेल असा प्रश्न मला पडतो. त्यामुळेच असे वाटते की सैनिक व्हावे की क्रिकेटपटू?
(हे फेसबुकवरील एका लेखाचे स्वैर भाषांतर आहे. लेखकांचे नाव मला अज्ञात आहे…माहित झाल्यास सांगेन. हे सैन्यात अधिकारी होते असे लेखातील संदर्भातून समजते. त्यांनी मांडलेले मुद्दे विचार करण्यासारखे आहेत, असे वाटल्याने परवानगी न घेता मी हे भाषांतर केले आहे. क्रिकेट खेळात खेळाडू भरपूर पैसे मिळवतात यात काही नवीन आणि वावगे नाही प्रथमदर्शनी. मात्र या तुलनेत, जे आपल्या जीविताचे संरक्षण त्यांचे प्राण पणाला लावून करतात..त्यांना देश किती आर्थिक सहाय्य देतो याचाही विचार करायला पाहिजे. सैनिकी अधिकारी प्रशिक्षण काळात मृत्यू झाल्यास त्या मृत सैनिक,अधिका-याच्या कुटुंबियाना एक पैसा नुकसान भरपाई दिली जात नाही,तसा नियमच आहे. आणि या बाजूला मात्र एक षटकार,एक झेल, एक विकेट (याला बळी असे नाव आहे मराठीत.) एक धावचीत…यासाठी किती रक्कम द्यावी याला काही धरबंद? असो. या लेखामुळे काही यात बदल होईल लगेच असे नाही…मात्र विचार करायला काय हरकत आहे…आपल्याला कुठे काही द्यायचे आणि घ्यायचे आहे? पैसा आपला थोडाच आहे?
(लेखकांचे नाव कुणाला ज्ञात असल्यास जरूर कळवावे.) (९८८१२९८२६०)
मनोज उठून बेडरुम मधून बाहेर आला तेव्हा सकाळचे साडेसात वाजले होते.समोरच अण्णांना पेपर वाचतांना पाहून त्याला थोडं आश्चर्यच वाटलं.
” अण्णा आज लवकर फिरुन आलात?रोज तर तुम्ही आठसाडेआठपर्यंत घरी येता.आणि हे काय तुमची तर अंघोळही झालेली दिसतेय?” त्यानं वडिलांना विचारलं.
” अरे आज गुढीपाडवा ना! म्हणून आजचा माॅर्निंग वाॅक थोडा लवकर आटोपता घेतला.येतांना कडूनिंबाचा पाला आणि फुलंही तोडून आणली आहेत बघ पुजेला.आज मीच पुजा करणार आहे.सुनबाई उठली का?”
“नाही अजून.आज सुटी आहे ना शाळेला म्हणून थोडी उशीरा उठेल”
“बरं.झोपू दे “
अण्णा पुजेला गेले.एरवी ते पाटावर बसणं जमत नाही म्हणून पुजा करायचे नाहीत.आज मात्र का कुणास ठाऊक त्यांना ती अडचण वाटत नव्हती. मनोज बेडरुममध्ये गेला.विद्या आणि मुलं गाढ झोपली होती.सणासुदीला माणसानं लवकर उठावं,त्यानं घरात उत्साह जाणवत रहातो असं अण्णाचं म्हणणं होतं आणि ते योग्यच आहे असं मनोजलाही वाटायचं.त्यानं विद्याला हाक मारली.विद्यानं डोळे किलकले केले आणि म्हणाली.
” झोपू द्यानं थोडावेळ.रोज तर मेलं असतंच लवकर उठणं ” तिचंही म्हणणं बरोबर होतं.रोज सकाळी पाच वाजता तिला उठावं लागायचं.मुलांचे डबे,मनोजचा डबा करुन पावणेसातला ती शाळेत जायला निघायची.शाळेतून आल्यावर घरची कामं,शाळेची कामं,मुलांचा अभ्यास असं सगळं करता करता रात्रीचे अकरा वाजायचे.सुटीच्या दिवशीच काय ती तिची थोडीफार झोप व्हायची. मनोजने काही न बोलता बेडरुमचं दार बंद केलं आणि तो हाॅलमध्ये आला.
नऊ वाजता सगळेजण नाश्त्याला बसले असतांना विद्यानं विचारलं.
“आज काय करायचं जेवायला?”
कोणी काही बोलायच्या आधीच अण्णांनी विचारलं
” सुनबाई बटाटेवडे करतेस?”
बटाटावडा म्हणजे अण्णांचा विक पाॅईंट!प्रत्येक सणाला अण्णांना बटाटावडा हवा असे.त्यात विद्या फार छान बटाटेवडे करायची.जगातले सर्वात छान बटाटेवडे माझी सुनबाई करते असं अण्णा सर्वाना अभिमानाने सांगायचे.
“अण्णा मागच्या आठवड्यात एका लग्नात तुम्ही बटाटेवडे खाल्ले तेव्हा तुम्हाला किती त्रास झाला होता हे विसरलात वाटतं! दवाखान्यात ॲडमीट करायची वेळ आली होती तुम्हाला!”
विद्या काकुळतीने म्हणाली
अण्णांनी संकोचाने मान खाली घातली.ते मुकाट्याने चहा पित राहीले.
“अण्णा अहो मागच्या आठवड्यात तुमची शुगर तीनशेपर्यंत पोहचली होती.डाॅक्टरांनी तुम्हाला गोड खायला स्ट्रिक्टली मना केलंय माहितेयं ना? तुम्ही असं पथ्यपाणी सांभाळत नाही आणि मग त्याचा त्रास तुमच्यासोबत आम्हांलाही होतो.डाॅक्टर वरुन आम्हालाच दोष देतात “
मनोज थोडा वैतागानेच बोलला
अण्णा परत एकदा चुप बसले.एकमत न झाल्याने शेवटी काय स्वयंपाक करावा हे न ठरवताच सगळे उठले.
मग मनोजने गुढी उभारायची तयारी केली.
” मनू यावेळी मी गुढी उभारु?”अण्णांनी विचारलं.
“अहो उभारा ना ! त्यात काय विचारायचं?नेहमी तुम्ही मलाच सांगता म्हणून मी चाललो होतो उभारायला”
बोलता बोलता मनोजने गुढी अण्णांच्या हातात दिली.अण्णांनी ती आनंदाने दारावर लावली.ती लावून झाल्यावर मात्र अण्णांच्या डोळे भरुन आल्याचं मनोजला जाणवलं.
” काहो काय झालं?डोळ्यात पाणी का आलं?”
” काही नाही रे!डोळ्यांचा कोरडेपणा वाढलाय. त्यामुळे असं सारखं डोळ्यात पाणी येतं असं डाॅक्टर म्हणत होते “
” अच्छा अच्छा.पण मग त्यांनी दिलेले ड्राॅप्सही तुम्ही डोळ्यात टाकत नाही “
अण्णा काही बोलले नाही.
बरोबर अकरा वाजता मनोज भाजी आणायला निघाला.त्याला पाहून अण्णा म्हणाले.
“मनू बाहेरच जातोय तर सुनबाईला साडी घेऊन ये माझ्यातर्फे”
ते ऐकून विद्या बाहेर येत म्हणाली.
“अण्णा अहो हे काय आता नवीन?अहो ढीग पडलाय माझ्याकडे साड्यांचा!”
“अगं आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर काही नवीन खरेदी नको करायला?ते काही नाही,साडी नको तर एखादी पर्स नाहीतर घड्याळ तरी घे”
“ठिक आहे तुमची इच्छाच आहे तर पर्स घेऊन या”विद्या बोलून आत निघून गेली.अण्णांनी नातवांना हाक मारली.ती दोघं आल्यावर त्यांना विचारलं
“मुलांनो तुम्हाला तुमचे आईबाबा घेऊन देत नाहीत अशा वस्तू सांगा.आज माझ्याकडून मी तुम्हाला घेऊन देईन “
“मला मोबाईल “अंकिता म्हणाली
“मला हेडफोन”आदित्य म्हणाला.
“ओक्के! मनू तुला काय हवंय?” अण्णांनी मनोजला विचारलं
” अण्णा एवढी करोडोची प्राॅपर्टी तुम्ही मला दिलीत.आता मला तुमच्याकडून काही नको आणि माझ्याहीकडे सगळं काही आहे”
” असं कसं तुझे बुट बघ किती खराब झालेत!अरे एवढा मोठा ऑफिसर तू आणि इतके खराब बुट घालतोस?जा नवीन चांगले बुट घेऊन ये “
” एवढे काही खराब नाही झालेत ते अण्णा.बरं पण तुम्ही म्हणता म्हणून आणतो.तुम्हांला काय आणू?”
” अरे या वयात आता काय लागणार मला?जे लागतं ते सगळं आहे माझ्याकडे!तुमच्यासाठीच घेऊन या.तुमचा आनंद तो माझा आनंद!”
मनोज हसला.कष्टात आयुष्य काढलेल्या अण्णांना साधी रहाणीच पसंत होती हे तो जाणून होता.
अण्णांनी आत जाऊन पैसे आणून मनोजला दिले.
मनोजला निघतांना काय वाटलं कुणास ठाऊक पण तो किचनमध्ये गेला.विद्याला म्हणाला
“कर बटाटेवडे आणि मी श्रीखंडही घेऊन येतो.आज अण्णा आनंदात आहेत.होऊन जाऊ दे त्यांच्या मनासारखं.त्यांची इच्छा अपूर्ण ठेवायला मन तयार होत नाही बघ!त्यांची काही इच्छा अपूर्ण राहिली असं नको व्हायला “
“अहो पण त्यांना त्रास…..”
“होऊ दे.आहे आपल्या शेजारी डाॅक्टर.बोलावून घेऊ त्याला”
“ठीक आहे.माझे सासरे असले तरी अगोदर ते तुमचे वडिल आहेत.मला काही अडचण नाही.मी करते “
मनोजने सगळ्या वस्तू बाजारातून आणल्या आणि अण्णांच्या हातात दिल्या.अण्णांनी स्वतःच्या हातांनी सगळ्यांना गिफ्ट्स दिल्या.घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याच्या चेहऱ्यावर जास्त आनंद दिसत होता.
जेवतांना बटाटेवडे आणि श्रीखंड पाहून अण्णा एकदम खुष झाले.
“मस्करी करता कारे पोरांनो तुम्ही म्हाताऱ्याची?”
सगळे हसू लागले.अण्णांनी बटाटावड्याची चव घेतली.
“सुनबाई या बटाटावड्याच्या बदल्यात तुम्ही शंभर गिफ्ट मागितले तरी मी देईन.व्वा काय टेस्ट आहे!गजब!”
मनोजने श्रीखंडाची वाटी अण्णांच्या ताटात ठेवली.
अण्णा मनसोक्त जेवले.मनोज,विद्यानंही त्यांना अडवलं नाही.
दुपारी सगळे झोपले असतांना अण्णांनी टिव्हीवर जुनी गाणी पाहिली.सगळे उठल्यावर त्यांनी जुने फोटो अल्बम काढले.मुलगा,सून आणि नातवांना फोटो दाखवता दाखवता आणि त्यांना जुन्या आठवणी उत्साहाने सांगतांना ते सारखे हसत होते.
संध्याकाळी अण्णा विद्याला म्हणाले.
” सुनबाई आज रात्री मी जेवणार नाही”
“का हो अण्णा?काही त्रास होतोय का?”
“नाही नाही.एकतर सकाळचं जेवण फार मस्त झालं.दुसरं आज आम्ही मित्र पिक्चरला जाणार आहोत.परत येतांना भेळ आणि पाणीपुरी खायचा बेत आहे.”
“चालेल.पण लवकर या हं घरी.सकाळी माॅर्निंग वाॅकला जायचंय ना?”
अण्णा थोडे शांत बसले मग म्हणाले.
” ते बघू पुढचं पुढे”
दुसऱ्या दिवशी सकाळी मनोज उठला तेव्हा विद्या सगळ्यांच्या डब्यासाठी स्वयंपाक करत होती.मुलांची शाळा काॅलेजची तयारी सुरु होती.बाहेरचं दार बंद पाहून त्याने विद्याला विचारलं
“आज अण्णा फिरायला गेले नाहीत वाटतं?”
“काल रात्री उशीरा आले होते घरी म्हणून झोपले असतील”
का कुणास ठाऊक मनोज थोडा अस्वस्थ झाला.
” पण रात्री कितीही उशीर झाला तरी सकाळचं फिरणं ते चुकवत नाहीत.काही त्रास तर होत नाही ना त्यांना?”त्याने विचारलं
विद्याने खांदे उडवले.मग म्हणाली.
“काय माहीत!बघा तरी जाऊन त्यांच्या रुममध्ये “
मनोज त्यांच्या रुममध्ये गेला.अण्णा शांत झोपले होते.तृप्ती आणि समाधानाचं स्मित त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होतं.मनोजला हायसं वाटलं.त्याने बाहेर जाण्यासाठी बेडरुमचं दार उघडलं.अचानक काहीतरी शंका येऊन त्याने मागे वळून त्यांच्या छातीकडे पाहिलं.तिथं काहीच हालचाल दिसत नव्हती.घाबरुन तो त्यांच्याजवळ आला.त्यांचा हात उचलून त्याने नाडी बघितली.नाडी हाताला लागत नव्हती.पटकन मोबाईल काढून तो शेजारच्या डाॅक्टरशी बोलला.त्याला ताबडतोब यायला सागितलं.दोनच मिनिटांत डाॅक्टर आला.त्याच्यासोबत विद्याही आत आली.डाॅक्टरने अण्णांना तपासलं.मग मनोजकडे पाहिलं.त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पहाताच मनोजला समजलं.अण्णांनी या जगातून एक्झिट घेतलीये.या एक्झिटबद्दल अण्णांना कालच कळलं असेल का?म्हणून तर त्यांनी कालचा गुढीपाडवा खुप आनंदात घालवला तर नसेल?विचार करता करता मनोजला एकदम भडभडून आलं आणि अण्णांच्या पार्थिवाला मिठी मारुन तो हमसून हमसून रडू लागला.
” कधी ठरवलंस? मला विचारायचं तरी . ..मी पण आले असते”
ती रागवलीच ….
“अग सकाळी मनात आलं आणि जाऊन आले .”
“म्हणजे इथेच होय.. मग ठीक आहे. मला वाटलं अयोध्येला गेलीस का काय?”
सध्या सगळ्यांना राम म्हटलं की अयोध्याच आठवत आहे…
तीला म्हटल
” कधीतरी इथल्याही रामाला जायचं”
यावर ती म्हणाली
“मी किती दिवसात इथल्या रामाच्या देवळात गेलेच नाहीये .जाईन एकदा”
” तुळशीबागेत जातेस ना ?मग जाऊन यायचं की”
” अगं तिथं गेलं की खरेदीच्या नादात लक्षातच येत नाही “
“असू दे ..जा कधीतरी …”अस म्हणून मी फोन ठेवला.
मी बघितलं आहे..खूप जणी अयोध्येला जायला मिळालं नाही म्हणून दुःखीकष्टी.. आहेत.
खरतर ईथल्या देवळातल्या रामातही रामच आहे… कधीतरी जावं त्याच्या दर्शनाला.
त्या मूर्तीतही तेच प्राणतत्त्व आहे.पण
आपण मूर्तीच्या सौंदर्याकडे मंदिराच्या शिल्पातच दंग होत आहोत का?असे वाटते आहे.
आपण टीव्हीवर मोबाईलवर अयोध्येचं मंदिर बघितलेलं आहे. जेव्हा जमेल तेव्हा जाऊ नाही जमलं तर जाणारही नाही.
आपण जाऊ शकलो नाही अशी कित्येक ठिकाण आहेतच की ….
त्यासाठी वाईट कशाला वाटून घ्यायचं?
आता पंढरीची वारी जवळ आलेली आहे. वारीला जायला वेळ नाही. इतकं चालणं जमणार नाही. रात्री वेगळ्या जागी झोप येणार नाही. हे आपलं आपल्याला माहित आहे. मग असं करा ना..
जेव्हा जमेल तेव्हा तुमच्या सोयीनुसार तुमच्या घराजवळ पांडुरंगाचे देऊळ आहे त्याला पायी जाऊन या .आपली आपण वारी करा. जाताना वारीचा भाव आपल्या मनात ठेवा …तो महत्त्वाचा आहे…
मनातल्या मनात विठुचा गजर करा,आरत्या, अष्टकं, चार अभंग म्हणा…
बघा तुमचा तुम्हाला आनंद मिळेल.
लाखों वारकरी पायी जात आहेत. त्यांनाही टीव्हीवर ,व्हिडिओतून बघुया….त्यात समाधान मानू या..
आपला सख्याहरी फक्त पंढरपुरातच नाहीये .तो इथल्या देवळातल्या मूर्तीतही आपण पाहूया…
त्यासाठी शांतपणे बसू या…
डोळे बंद केले आणि मनोभावे त्याची आठवण केली की तो दिसतोच ..
जमेल तेव्हा अयोध्येला पंढरपूरला जरूर जा.
एक लक्षात ठेवा अमुक एक देवळात जाणं हेच आपलं साध्य आहे का ? तिथे गेल तरच देव भेटणार आहे का? याचाही विचार करा.
☆ डॉ. आनंदीबाई जोशी… भाग – १ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
३१ मार्च… भारताच्या पहिल्या एम. बी. बी. एस. महिला वैद्य अर्थात लेडी डॉक्टर म्हणून प्रचंड गाजलेल्या मराठमोळ्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा जन्मदिन
जन्म: ३१ मार्च १८६५, पारनाका, कल्याण.
मंडळी, काय एकेक रत्ने होऊन गेली या मराठी मातीत. भक्ती, शक्ती, स्वातंत्र्य, कला, नाट्य, चित्रपट, उद्योग, शिक्षण असे कोणतेही क्षेत्र असो मराठी माणसाने कायम आपले पहिले पाऊल टाकले आहे. पण हल्लीचे नास्तिक आणि तथाकथित पुरोगामी नतद्रष्ट राजकारणी या सर्व उच्च व महान व्यक्तींना समाजात जातीपातीचे विष पेरत सामान्य जनतेच्या मनात विशिष्ट जातीत टाकून संपवण्याचे काम करत आहेत. आजच्या उत्सवमूर्ती आनंदीबाई जोशी या त्यापैकीच एक महान व्यक्तीमत्व आहे. कल्याण तालुक्यातील पारनाका गावात सरकारी खात्यात काम करणारे गणपतराव अमृतेश्वर जोशी आणि गृहिणी गंगाबाई जोशी या मध्यमवर्गीय को. ब्रा. दांपत्याच्या पोटी ज्येष्ठ अपत्य म्हणून आनंदी हे कन्यारत्न जन्मले. आनंदीबाईंचे पाळण्यातले नाव यमुना होते. पुढे वयाच्या ९व्या वर्षी २० वर्षांनी मोठे आणि पुण्यातील मुख्य टपाल कचेरीत (सिटी पोस्ट) कारकून असलेले गोपाळराव जोशी या बिजवराशी आनंदीबाई विवाहबद्ध झाल्या. लग्नानंतर गोपाळरावांनी पत्नीचे नाव आनंदी ठेवले. आनंदीबाई १४व्या वर्षी गरोदर राहील्या आणि पोटी एक मुलगा जन्मला. पण दुर्दैवाने पुरेशा वैद्यकीय सोयी उपलब्ध नसल्याने केवळ १० दिवसातच आनंदीबाईंचे बाळ दगावले. या घटनेने प्रचंड व्यथित झालेल्या आनंदीबाई खूप व्यथित झाल्या. हीच खंत आनंदीबाईंना वैद्यकीय शिक्षण घेण्यास कारणीभूत ठरली. पत्नीला शिक्षणाची आवड आहे हे गोपाळरावांनी बरोबर ताडले. त्याकाळी विविध विषयांवर लोकहितवादींची शतपत्रे हे मासिक प्रकाशित व्हायचे. गोपाळराव शतपत्रे नियमित वाचत असत. शतपत्रात आलेल्या एका सदरावरून गोपाळरावांनी प्रेरणा मिळाली आणि त्यांनी पत्नीस इंग्रजीचे शिक्षण देण्याचा निश्चय केला. गोपाळरावांची टपाल खात्यात नोकरी असल्यामुळे त्यांची सतत बदली होत असे. कोल्हापूर, मुंबई, भूज, कलकत्ता, बराकपूर, श्रीरामपूर (बंगाल) इ. ठिकाणी गोपाळरावांच्या बदल्या झाल्या. प्रत्येक वेळी आनंदीबाई पतीसोबत गेल्या. गोपाळराव आनंदीबाईंना शिकवित असत. कोल्हापूरात असताना गोपाळरावांची ख्रिस्ती मिशनऱ्यांशी ओळख झाली. मिशनऱ्यांच्या लोकांशी चर्चा केल्यावर गोपाळरावांच्या मनात आनंदीबाईंना अमेरिकेत पाठवून प्रगत शिक्षण द्यावं असं आलं. तसे तर गोपाळरावांना स्वतःलाही अमेरिकेला जायची इच्छा होती, परंतु त्यांना जमू शकलं नाही. आनंदीबाई अतिशय बुद्धिमान होत्या आणि त्या एकपाठी होत्या. आनंदीबाईंनी इंग्रजीसह अन्य विषय पटकन आत्मसात केले. पण आनंदीबाईंना अमेरिकेत शिकायला जाण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे तशी व्यवस्था करण्यात आणि आनंदीबाईंच्याबरोबर कोणीतरी सोबत जायला शोधण्यात गोपाळरावांची २-४ वर्षे गेली. याचा सुगावा समाजात लागला त्यामुळे आनंदीबाईंना समाजात, शेजाऱ्यापाजाऱ्यांत विचित्र आणि विपरीत अनुभव आले. त्याकाळी नवरा बायको असे फिरायला सहसा जात नसत त्यामुळे आनंदीबाई गोपाळरावांबरोबर फिरायला जातात, इंग्रजी शिक्षण घेतात याचे कुतूहल म्हणून या जोडप्याला पाहायला लोक गर्दी करत असत. लोक गोपाळरावांना ठीक ठिकाणी गाठून विचारत असत की तुम्ही ही ठेवलेली बाई आहे का? या सर्व प्रकाराने आनंदीबाईंना खूपच मनस्ताप होत असे आणि अपमानास्पद वाटत असे. परंतु तिकडे दुर्लक्ष करून आनंदीबाई आपला अभ्यास निष्ठेने करत असत. पुढे श्रीरामपूर (बंगालमधलं) येथे असताना गोपाळरावांनी आनंदीबाईना अमेरिकेला पाठवायचं नक्की केले. आनंदीबाईंनी अमेरिकेत जाऊन वैद्यक शास्त्र शिकायचं अस ठरवलं. पण या आधीची घटना विस्मयकारक होती. ते साल होतं १८८०. न्यूजर्सीतल्या रोशेल या गावातील श्रीमती कार्पेंटर या एकदा त्यांच्या दातांच्या डॉक्टरांकडे गेल्या होत्या. तिथे पडलेलं मिशनरी रिव्ह्यू नावाचं मासिक त्यांनी सहज चाळायला घेतलं. त्यात गोपाळराव जोशी व आर.जी. वाईल्डर यांची पत्रं छापून आली होती. त्यावरून कार्पेंटरबाईंना समजलं की गोपाळ जोशी हे आपल्या पत्नीला अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवायच्या प्रयत्नात आहेत. कार्पेंटरबाईंच्या मनात न पाहिलेल्या आनंदीबद्दल अतीव स्नेहभाव जागृत झाला. त्यावेळी अजून एक विस्मयकारक घटना घडली. कार्पेंटरबाईंना एक नऊ वर्षांची आमी नावाची मुलगी होती. आमी आईला म्हणाली आई, मला स्वप्न पडलं की तू हिंदुस्थानात कुणाला तरी पत्र पाठवत आहेस. कार्पेंटरबाई चकित झाल्या. गोपाळराव जोशी यांना पत्र पाठवण्यापूर्वी कार्पेंटरबाई नकाशात कोल्हापूर शोधत होत्या. (कारण मासिकातलं गोपाळ जोशींचं पत्र कोल्हापूरहून पाठवलेलं होतं). तेव्हा कार्पेंटरबाईच्या मनात भारतातील शहरं असा विचार होता. परंतु मुलीने येऊन हिंदुस्थान हा शब्द उच्चारला हे कसं? तिला तर काहीच ठाऊक नव्हतं. सर्वच आक्रित होतं. पुढे कार्पेटरबाईनी पत्रव्यवहार करून आनंदीबाईंशी स्नेहसंबंध जोडले. आनंदीबाई कार्पेंटरबाईना मावशी म्हणून संबोधत असत. कार्पेंटरबाईच्या आधारामुळे आनंदीबाईंना अमेरिकेत पाऊल टाकता आलं. कार्पेटरबाई आनंदीबाईना आनंदाचा झरा म्हणत. अमेरिकेत जाण्यापूर्वी श्रीरामपूरच्या (बंगाल) बॅप्टिस्ट महाविद्यालयाच्या सभागृहात आनंदीबाई जोशींनी मी अमेरिकेत का जाते या विषयावर सुमारे ५०० श्रोत्यांपुढे अगदी अस्सल मराठी ब्राह्मणी पेहरावात (नऊवारी पात्तळ) उभे ठाकून अस्खलित इंग्रजीत व्याख्यान दिलं. आनंदीबाईंचं हे भाषण खूप वाचण्यासारखं होतं. पृथ्वीच्या पाठीवर हिदुस्थानाइतका मागासलेला देश दुसरा नाही. देशातील लोकांना आपल्या गरजा पूर्ण करताना स्वावलंबन करता येत नाहीत. वैद्यकशास्त्र स्त्रियांची हिंदुस्थानच्या प्रत्येक भागात खूप जरुरी आहे. सभ्य स्त्रिया पुरुष वैद्याकडून चिकित्सा करून घेण्यास इच्छुक नसतात. असे महत्त्वाचे मुद्दे आनंदीबाईनी श्रोत्यांसमोर मांडले. त्यामुळे भारतात महिला डॉक्टरांची किती नितांत गरज आहे हे ओळखून आनंदीबाई डॉक्टरची पदवी घेण्यासाठी अमेरिकेत गेल्या. पण अमेरिकेत जाताना प्रत्येक ठिकाणी आनंदीबाईना सतत संघर्ष करावा लागला. १८८३ साली १८व्या वर्षी एका अमेरिकन बाईच्या सोबतीने आनंदीबाईंनी दोन महिने जहाजाने प्रवास करत एकाकी प्रवास केला.
– क्रमशः भाग पहिला
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
☆ आनंद… – लेखक : डॉ. अशोक माळी ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
काल एक मुलगा आला होता पेढे घेऊन. माझा जुना पेशंट असावा. सोबत त्याचे वडीलही होते. मुलाच्या हातात खव्याचे पेढे तर बापाच्या हातात मलई पेढे. मुलानं माझ्या हातात पेढे दिले आणि वाकून नमस्कार केला. बापानंही त्याचं अनुकरण केलं.
“मुलगा दहावी पास झाला.” बाप बोलला.
“अरे वा, छानच की!….किती मार्क मिळाले?” मी विचारलं.
“मग काय तर?….गेल्या वर्षी पन्नास टक्के होते. एका वर्षात बारा टक्क्यांची प्रगती म्हणजे चेष्टा नाही.”
“खूपच छान….आता पुढं काय करायचं ठरवलंय?” मी विचारलं.
“अजून ठरलं नाही. निकाल आलाय तेव्हापासून पेढेच वाटतोय….आम्हांला सगळ्यांना एवढा आनंद झालाय की बस्स….हा आनंद साजरा केला की बघू पुढं काय करायचं ते.”
आमचं बोलणं चाललंय तोपर्यंत अप्पूची एक मैत्रीण आली पेढे द्यायला.
“किती मार्क पडले गं?” मी तिला विचारलं.
“नाईनटीफाईव्ह परसेंट.”
“अभिनंदन.” मी म्हटलं. मला वाटलं होतं की तिचे मार्क ऐकून तो मुलगा किंवा त्याचे वडील थोडे खजिल होतील. पण तसं काहीच झालं नाही. त्यांनी त्या मुलीलाही पेढे दिले आणि अभिनंदन केलं. “खूप छान मार्क मिळवलेस पोरी, बापाचं नाव केलंस बघ.” मुलाचे वडील बोलले.
ती मुलगी निघून गेली आणि मुलगाही बाहेर गेला.
“याच्या बऱ्याच दोस्तांनाही नव्वद पंचाण्णव टक्के मार्क आहेत. बासष्ट टक्के मार्क मिळवूनही आम्ही पेढे वाटतोय याचं त्यांना आश्चर्य वाटतंय.तुम्ही पहिल्या व्यक्ती आहात चांगले मार्क मिळालेत म्हणणाऱ्या…..बाकी सगळे ‘फक्त बासष्ट टक्के मार्क?’ या नजरेनं पाहत असतात.”
“हो ना?”
“खरं सांगू डॉक्टर?….प्रत्येक मुलाची एक कुवत असते….एक आवड असते. त्या मुलीला पंचाण्णव टक्के मार्क मिळाले म्हणून माझ्या मुलाला तितकेच मार्क मिळायला पाहिजेत असं म्हणणं म्हणजे शुद्ध गाढवपणा आहे. प्रत्येकजण आपापल्या कुवतीप्रमाणे जगत असतो. आमच्या दृष्टीनं आनंदाची बाब म्हणजे त्याला गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी बारा टक्के मार्क जास्त मिळालेत….. हा तर आनंदसोहळाच आहे की आमच्यासाठी.”
“खरं आहे. आपण आपली तुलना इतरांशी करून स्वतःच्या आनंदात विरजण टाकत असतो…..तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला आवडला.” मी म्हटलं.
“हे सगळं अनुभवातून शिकलो डॉक्टर. मी दहावीत असताना मला चाळीस टक्के मार्क पडलेले. त्यामानानं माझ्या मुलाला खूपच चांगले मार्क आहेत. मला चाळीस टक्के मार्क असताना मी त्याला बासष्टच टक्के मार्क का मिळाले म्हणून का रागवावं?”
“ग्रेट.”
“मला चाळीस टक्के मिळाले म्हणून माझे वडील मला लाख टक्क्याने बोलले होते…. माझ्या मोठ्या भावांना सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त होते ना?”
“ते भाऊ आता काय करतात?”
“एक शिक्षक आहे आणि एक खाजगी नोकरीत आहे.”
“तुम्ही शेतीच करता ना?”
“हो ! वडिलार्जित दोन एकर होती आता वीस एकर आहे. मी स्वतः अठरा एकर घेतलीय. स्वतःची डेअरी आहे. खताची एजन्सी आहे. गेल्या वर्षी नुसता टोमॅटो चाळीस लाखांचा झाला….शंभर रुपये दर होता बघा तेव्हा टोमॅटोचा.”
आमचं बोलणं चाललंय तोपर्यंत मुलगा आत आला आणि वडिलांना हाताला धरून घेऊन गेला.
माझ्या डोक्यात विचार आला की ही माणसं खरी प्रॅक्टिकल. जे आहे त्यात समाधान मानणारी. आनंद उधळणारी आणि आनंद वेचणारी…..आणि जीवनातलं यश अपयश हे केवळ दहावीच्या मार्कांवर अवलंबून नसतं हेही त्यानं सिद्ध करून दाखवलं होतं!
पुस्तक अगदी छोटसं आहे. एकूण नऊ कथा आहेत. त्याआधी लेखिका अरुणा ढेरे यांच्या विषयी थोडक्यात- कथा, कादंबरी, ललित लेख, अनुवाद, समीक्षा, लोकसाहित्य, सामाजिक, इतिहास पर, कुमारांसाठी, किशोरांसाठी इतका व्यासंग लाभलेल्या कवियीत्री अरुणा ढेरे. ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध साहित्य डॉ. राची ढेरे यांचीही सुकन्या .यांना बाळकडूच मिळाले साहित्यरसाच .मराठी साहित्यातील दांडग्या अभ्यासक म्हणून नावारूपाला आल्या. त्यांचे अतिशय गाजलेलं पुस्तक कृष्ण किनार आहे तर ते आपल्या अगदी हृदयाजवळ आहे.
पावसानंतरच ऊन हे पुस्तक देखील तितकच सुंदर आणि छोट्या स्वरूपात आहे प्रत्येक कथा मनाला भावणारी आणि विचार करायला लावणारी आहे .काही कथा नव्या विचारांच्या आहेत तर काही कथा या जुन्यातूनच नवं जगणं कसं शोधावे हे शिकवणारया आहेत. पावसानंतरच ऊन म्हणजे मनाला मिळालेला गारवा जसं की रात्री बराच पाऊस पडून गेलेला गॅलरीतील कुंड्यांवर छान शिडकाव झालेला सकाळचा ताज होऊन मनाबरोबर शरीरालाही निवांत करत आणि चहाचा मंद सुवास आणि अचानक कोणीतरी हातात तो आणून द्यावा बस आता आयुष्यात काही नको अशीच काहीशी जीवन कहाणी आहे या कथा नकांची *एखादा पावसाचा शिडका व्हावा आणि आणि कोवळं ऊन सुखावून जावं अगदी तसं
पहिली कथा- ओळख- स्वतःची ओळख शोधणारी, नात्यांच्या पलीकडे जाऊन स्वीकारणं, समजून घेणं, सोसण, सावरणं, कसलं दुःख आपल्या वाट्याला आलं आहे? उमग नाही ,अंत नाही, आकार नाही, रंग नाही वास नाही,चव नाही. एक अवाढव्य काळ ओझं, चिनूस टाकणार, घुसमटून टाकणार, त्याबरोबर एक सत्य आणि आपण स्वतः त्यातून निर्माण झालेली ओळख आणि तिची ती कथा.
दुसरी कथा- नवरात्र कथा एक सून, नव अंकुर बीज पोटी फुलतोय जणू ही घटस्थापनेच्या स्वरूपात सांगितले आहे. एक स्त्री तशीच ही पृथ्वी तिची गर्भधारणा म्हणजे नऊ दिवसाचे व्रत तिच्या कुशीतून जन्म घेणारे धान्य बीज पेरायचं ते वाढतं नऊ महिन्याचं ते प्रतीक म्हणून नऊ दिवस आपण ते वाढवायचं व्रतासारखं ते सांभाळायचं मग शेवटी पूर्णत्वाला गेले की आनंद उत्सव साजरा करायचा. दसऱ्यासारखा सुनेच्या पोटीही ते बीज अंकुरते. आणि ती ते अनुभवते.
तिसरी कथा- नवीन. कथेत नव्या दमाची तरुणाई आणि जुन्या विचारांची पिढी. त्यांनी ह्या पिढींशी एकरूप व्हावं आणि इतर जाती पंथांच्या सुना-मुलींची जुळवून घ्यावे ही सांगणारी नवी पिढी. आता काळ आला आहे की दोन्ही पिढ्या आपले हात एकमेकांच्या हातात गुंफून आनंदाने राहावे.
अशा प्रकारे प्रत्येक कथा वेगळी आहे. आशावाद आणि जगणं यामधील दुवा कसा शोधावा आणि स्वतःला शोधून आपलं जग कसं निर्माण करावं हे समजतं.
पावसानंतरच पडणार कोळवून कसं हवं असं वाटतं अगदी तसंच जीवनात येणाऱ्या चढ उतारा नंतर येणारा आनंदी क्षण देखील लोभस वाटतो गजबजलेल्या ढगांमधून एखादी उन्हाची तिरप चेहऱ्यावर घेताना रोमांचिक होतं अगदी तसंच असतं हे पावसानंतर ऊन म्हणून प्रत्येकानं एकदा तरी वाचावं असं आहे
परिचय : सुश्री अर्चना माने
सांगली.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(डा. मुक्ता जीहरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से हम आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का मानवीय जीवन पर आधारित एक विचारणीय आलेख मोहे चिन्ता न होय… । यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की लेखनी को इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य # 240 ☆
☆ मोहे चिन्ता न होय… ☆
‘उम्र भर ग़ालिब, यही भूल करता रहा/ धूल चेहरे पर थी, आईना साफ करता रहा’– ‘इंसान घर बदलता है, लिबास बदलता है, रिश्ते बदलता है, दोस्त बदलता है– फिर भी परेशान रहता है, क्योंकि वह ख़ुद को नहीं बदलता।’ यही है ज़िंदगी का सत्य व हमारे दु:खों का मूल कारण, जहां तक पहुंचने का इंसान प्रयास ही नहीं करता। वह सदैव इसी भ्रम में रहता है कि वह जो भी सोचता व करता है, केवल वही ठीक है और उसके अतिरिक्त सब ग़लत है और वे लोग दोषी हैं, अपराधी हैं, जो आत्मकेंद्रितता के कारण अपने से इतर कुछ देख ही नहीं पाते। वह चेहरे पर लगी धूल को तो साफ करना चाहता है, परंतु आईने पर दिखाई पड़ती धूल को साफ करने में व्यस्त रहता है… ग़ालिब का यह शेयर हमें हक़ीक़त से रूबरू कराता है। जब तक हम आत्मावलोकन कर अपनी गलती को स्वीकार नहीं करते; हमारी भटकन पर विराम नहीं लगता। वास्तव में हम ऐसा करना ही नहीं चाहते। हमारा अहम् हम पर अंकुश लगाता है; जिसके कारण हमारी सोच पर ज़ंग लग जाता है और हम कूपमंडूक बनकर रह जाते हैं। हम जीवन में अपनी इच्छाओं की पूर्ति तो करना चाहते हैं, परंतु उचित राह का ज्ञान न होने के कारण अपनी मंज़िल पर नहीं पहुंच पाते। हम चेहरे की धूल को आईना साफ करके मिटाना चाहते हैं। सो! हम आजीवन आशंकाओं से घिरे रहते हैं और उसी चक्रव्यूह में फंसे, सदैव चीखते -चिल्लाते रहते हैं, क्योंकि हममें आत्मविश्वास का अभाव होता है। यह सत्य ही है कि जिन्हें स्वयं पर भरोसा होता है, वे शांत रहते हैं तथा उनके हृदय में संदेह, संशय, शक़ व दुविधा का स्थान नहीं होता। वे अंतर्मन की शक्तियों को संचित कर निरंतर आगे बढ़ते रहते हैं; कभी पीछे मुड़कर नहीं देखते। वास्तव में उनका व्यवहार युद्धक्षेत्र में तैनात सैनिक के समान होता है, जो सीने पर गोली खाकर शहीद होने में विश्वास रखता है और आधे रास्ते से लौट आने में भी उसकी आस्था नहीं होती।
परंतु संदेह-ग्रस्त इंसान सदैव उधेड़बुन में खोया रहता है; सपनों के महल तोड़ता व बनाता रहता है। वह अंधेरे में ग़लत दिशा में तीर चलाता रहता है। इसके निमित्त वह घर को वास्तु की दृष्टि से शुभ न मानकर उस घर को बदलता है; नये-नये लोगों से संपर्क साधता है; रिश्तों व परिवारजनों तक को नकार देता है; मित्रों से दूरी बना लेता है… परंतु उसकी समस्याओं का अंत नहीं होता। वास्तव में हमारी समस्याओं का समाधान दूसरों के पास नहीं; हमारे ही पास होता है। दूसरा व्यक्ति आपकी परेशानियों को समझ तो सकता है; आपकी मन:स्थिति को अनुभव कर सकता है, परंतु उस द्वारा उचित व सही मार्गदर्शन व समस्याओं का समाधान करना कैसे संभव हो सकता है?
रिश्ते, दोस्त, घर आदि बदलने से आपके व्यवहार व दृष्टिकोण में परिवर्तन नहीं आता; न ही लिबास बदलने से आपकी चाल-ढाल व व्यक्तित्व में परिवर्तन होता है। सो! आवश्यकता है– सोच बदलने की; नकारात्मकता को त्याग सकारात्मकता अपनाने की; हक़ीक़त से रू-ब-रू होने की; सत्य को स्वीकारने की। जब तक हम उन्हें दिल से स्वीकार नहीं करते; हमारे कार्य-व्यवहार व जीवन-शैली में लेशमात्र भी परिवर्तन नहीं आता।
‘कुछ हंसकर बोल दो/ कुछ हंस कर टाल दो/ परेशानियां बहुत हैं/ कुछ वक्त पर डाल दो’ में सुंदर व उपयोगी संदेश निहित है। जीवन में सुख-दु:ख, खशी-ग़म आते-जाते रहते हैं। सो! निराशा का दामन थाम कर बैठने से उनका समाधान नहीं हो सकता। इस प्रकार वे समय के अनुसार विलुप्त तो हो सकते हैं, परंतु समाप्त नहीं हो सकते। इस संदर्भ में महात्मा बुद्ध के विचार बहुत सार्थक प्रतीत होते हैं। जीवन में सामंजस्य स्थापित करने के लिए आवश्यक है कि हम सबसे हंस कर बात करें और अपनी परेशानियों को हंस कर टाल दें, क्योंकि समय परिवर्तनशील है और यथासमय दिन-रात व ऋतु-परिवर्तन अवश्यंभावी है। कबीरदास जी के अनुसार ‘ऋतु आय फल होय’ अर्थात् समय आने पर ही फल की प्राप्ति होती है। लगातार भूमि में सौ घड़े जल उंडेलने का कोई लाभ नहीं होता, क्योंकि समय से पहले व भाग्य से अधिक किसी को संसार में कुछ भी प्राप्त नहीं होता। इसी संदर्भ में मुझे याद आ रही हैं स्वरचित मुक्तक संग्रह ‘अहसास चंद लम्हों का’ की पंक्तियां ‘दिन रात बदलते हैं/ हालात बदलते हैं/ मौसम के साथ-साथ/ फूल और पात बदलते हैं।’ इसी के साथ मैं कहना चाहूंगी, ‘ग़र साथ हो सुरों का/ नग़मात बदलते हैं’ अर्थात् समय व स्थान परिवर्तन से मन:स्थिति व मनोभाव भी बदल जाते हैं; जीवन में नई उमंग-तरंग का पदार्पण हो जाता है और ज़िंदगी उसी रफ़्तार से पुन: दौड़ने लगती है।
चेहरा मन का आईना है, दर्पण है। जब हमारा मन प्रसन्न होता है, तो ओस की बूंदे भी हमें मोतियों सम भासती हैं और मन रूपी अश्व तीव्र गति से भागने लगते हैं। वैसे भी चंचल मन तो पल भर में तीन लोगों की यात्रा कर लौट आता है। परंतु इससे विपरीत स्थिति में हमें प्रकृति आंसू बहाती प्रतीत होती है; समुद्र की लहरें चीत्कार करने भासती हैं और मंदिर की घंटियों के अनहद स्वर के स्थान पर चिंघाड़ें सुनाई पड़ती हैं। इतना ही नहीं, गुलाब की महक के स्थान पर कांटो का ख्याल मन में आता है और अंतर्मन में सदैव यही प्रश्न उठता है, ‘यह सब कुछ मेरे हिस्से में क्यों? क्या है मेरा कसूर और मैंने तो कभी बुरे कर्म किए ही नहीं।’ परंतु बावरा मन भूल जाता है कि इंसान को पूर्व-जन्मों के कर्मों का फल भी भुगतना पड़ता है। आखिर कौन बच पाया है…कालचक्र की गति से? भगवान राम व कृष्ण को आजीवन आपदाओं का सामना करना पड़ा। कृष्ण का जन्म जेल में हुआ, पालन ब्रज में हुआ और वे बचपन से ही जीवन-भर मुसीबतों का सामना करते रहे। राम को देखिए, विवाह के पश्चात् चौदह वर्ष का वनवास; सीता-हरण; रावण को मारने के पश्चात् अयोध्या में राम का राजतिलक; धोबी के आक्षेप करने पर सीता का त्याग; विश्वामित्र के आश्रम में आश्रय ग्रहण; सीता का अपने बेटों को अश्वमेध यज्ञ का घोड़ा पकड़ने पर उस सत्य से अवगत कराना; राम की सीता से मुलाकात; अग्नि-परीक्षा और अयोध्या की ओर गमन। पुनः अग्नि परीक्षा हेतु अनुरोध करने पर सीता का धरती में समा जाना’ क्या उन्होंने कभी अपने भाग्य को कोसा? क्या वे आजीवन आंसू बहाते रहे? नहीं, वे तो आपदाओं को खुशी से गले से लगाते रहे। यदि आप भी खुशी से कठिनाइयों का सामना करते हैं, तो ज़िंदगी कैसे गुज़र जाती है– पता ही नहीं चलता, अन्यथा हर पल जानलेवा हो जाता है।
इन विषम परिस्थितियों में दूसरों के दु:ख को सदैव महसूसना चाहिए, क्योंकि यह इंसान होने का प्रमाण है। अपने दर्द का अनुभव तो हर इंसान करता है और वह जीवित कहलाता है। आइए! समस्त ऊर्जा को दु:ख निवारण में लगाएं। ख़ुद भी हंसें और संसार के प्राणी-मात्र के प्रति संवेदनशील बनें; आत्मावलोकन कर अपने दोषों को स्वीकारें। समस्याओं में उलझें नहीं, समाधान निकालें। अहम् का त्याग कर अपनी दुष्प्रवृत्तियों को सत्प्रवृत्तियों में परिवर्तित करने की चेष्टा करें। ग़लत लोगों की संगति से बचें। केवल दु:ख में ही सिमरन न करें, सुख में भी उस सृष्टि-नियंता को भूलाएं नहीं… यही है दु:खों से मुक्ति पाने का मार्ग, जहां मानव अनहद-नाद में अपनी सुध-बुध खोकर, अलौकिक आनंद में अवगाहन कर राग-द्वेष से ऊपर उठ जाता है। इस स्थिति में वह प्राणी-मात्र में परमात्मा-सत्ता की झलक पाता है और बड़ी से बड़ी मुसीबत में परेशानियां उसका बाल भी बांका नहीं कर पाती। अंत में कबीर दास जी की पंक्तियों को उद्धृत कर अपनी लेखनी को विराम देना चाहूंगी, ‘कबिरा चिंता क्या करे, चिंता से क्या होय/ मेरी चिंता हरि करे, मोहे चिंता ना होय।’ चिंता किसी रोग का निदान नहीं है। इसलिए चिंता करना व्यर्थ है। परमात्मा हमारे हित के बारे में हम से बेहतर जानते हैं, तो हम चिंता क्यों करें? सो! हमें सृष्टि-नियंता पर अटूट विश्वास रखना चाहिए, क्योंकि वह हमारे हित में हमसे बेहतर निर्णय लेगा।