(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “बच्चे झूठ क्यों बोलते हैं…“।)
अभी अभी # 418 ⇒ बच्चे झूठ क्यों बोलते हैं … श्री प्रदीप शर्मा
बच्चे, मन के सच्चे ! बच्चों में तो ईश्वर का वास होता है, वे कहां झूठ बोलते हैं।
लेकिन उनका सच झूठी दुनिया में कहां अधिक समय तक टिक पाता है। बच्चों के सच की उम्र सिर्फ तीन वर्ष की होती है।
तीन से तेरह वर्ष की उम्र के बीच उनके सच की उम्र का पता चल जाता है। वे वही सीखते हैं, जो देखते और सुनते हैं। वे जब बड़ों की नकल करते हैं, तो शुरू में तो अच्छा लगता है, क्योंकि वह आपका बंटी और पापा की परी है, लेकिन बढ़ती उम्र के साथ उसे रोकना, टोकना, समझाना, डांटना और फटकारना भी पड़ता है। बालहठ अगर चंद्रमा को घर की परात में उतार सकता है, तो रात को दो बजे कुछ ऐसी भी मांग कर सकता है, जो पूरी करना संभव ही नहीं हो। ।
तीन से तेरह वर्ष के बीच ही वह स्कूल जाना शुरू करता है, उसके भी अपने दोस्त होते हैं, सहेलियां होती हैं। अगर बच्चा स्कूल बस में जाता है, तो ड्राइवर और कंडक्टर का उसके जीवन में प्रवेश होता है, घर में भी काम वाली बाई और स्कूल में भी टीचर/केयरटेकर। अब २४ घंटे वह आपकी आंखों के सामने नहीं रह पाता।
बच्चे नाजुक होते हैं, मासूम होते हैं, अपना अच्छा बुरा नहीं समझते। बढ़ती उम्र के साथ वे सभी बातें घर के सदस्यों अथवा माता पिता से शेयर नहीं कर सकते, यार दोस्तों में उन्हें अच्छा लगता है, वे उन्मुक्त और अधिक खुला खुला महसूस करते हैं। ।
बढ़ती उम्र में बहुत से do’s and don’ts होते हैं, यह मत करो, वह मत करो।
धूप में मत खेलो, गंदे बच्चों की संगति मत करो। मन में ऐसे प्रश्न, जिज्ञासा और शंकाओं का अंबार जमा होता रहता है, जिसका जिक्र ना तो माता पिता से किया जा सकता है और ना ही स्कूल में टीचर से। एक मित्र ही ऐसे समय में सबसे करीबी नजर आता है। किसी बात को छुपाना, झूठ की पहली कमजोर कड़ी होती है।
कहां गए थे, और क्या कर रहे थे, का अगर संतोषजनक उत्तर नहीं मिला तो आपकी खैर नहीं। घर में अगर बच्चे से कोई टूट फूट हो जाती है, और अगर बदले में उसे डांट फटकार नसीब होती है, तो आगे से वह झूठ बोलना शुरू कर देगा। कभी कभी तो टीचर की डांट फटकार से घबराकर बच्चा स्कूल ही नहीं जाता, यहां वहां घूमा करता है। जब घर में पता चलता है तो वही डांट फटकार घर में भी दोहराई जाती है। ।
हमारे जमाने में तो सच उगलाया जाता था, मतलब हम भी झूठ ही बोलते थे।
मैया मोरी मैं नहीं माखन खायो! बच्चा ही तो झूठ बोलेगा। हम बड़े तो सब सत्यवादी हरिश्चंद्र हैं न।
बच्चों को एडवेंचर का शौक होता है। चोरी छिपे बहुमंजिला मकानों की छत पर चढ़ जाते है और हादसों के शिकार हो जाते हैं। कभी कभी कड़वा सच, झूठ पर भी भारी पड़ जाता है।।
तीन से तेरह तक की उम्र में ही इसका हल नहीं निकाला गया तो आगे तो पूरी teen age पड़ी है। बच्चा नादान है, इसलिए झूठ बोलता है। अगर उसके मन से सजा (punishment ) का डर निकाल दिया जाए, उससे दोस्ताना व्यवहार किया जाए, तो शायद झूठ उसके जीवन में पांव न जमा सके। बड़ा होकर तो वह भी समझ जाएगा, जीवन में सच और झूठ का महत्व।।
(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि। संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताह रविवार को “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है सॉनेट – प्रणामांजलि…।)
☆ उगवतीचे रंग – मी का लिहीतो ? ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
मध्यंतरी मला कोणीतरी हा प्रश्न विचारला होता की मी का लिहितो ? हा प्रश्न म्हणजे मी अन्न का खातो, मी पाणी का पितो, मी श्वास का घेतो असे विचारण्यासारखे आहे. मी का खातो, का पितो आणि का श्वास घेतो या तीनही प्रश्नांचे उत्तर एकच आहे. आणि ते म्हणजे जगण्यासाठी. जगण्यासाठी या तीन गोष्टी जर आवश्यक असतील तर माझ्या दृष्टीने आणखी काही गोष्टींची भर त्यात घातली पाहिजे. त्या म्हणजे वाचणे, लिहिणे, साहित्याचा आस्वाद घेणे, मनमुराद भटकंती करणे, संगीत ऐकणे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे समोरच्याशी संवाद साधणे . मला माहिती आहे की, या सगळ्या गोष्टी नाही केल्या तरी माणूस जगू शकेल. ‘ लेकिन ये जीना भी कोई जीना है ‘ अशी आपली अवस्था होईल. इतर प्राणी आणि माणसाच्या जगण्यात फरक राहणार नाही. ज्याला मन आहे तो माणूस. आणि आपण माणूस आहोत. एक चिनी म्हण आहे, ‘ तुम्हाला दोन पैसे सापडले तर, एक पैशाची भाकरी घ्या आणि एका पैशाचे गुलाबाचे फुल घ्या. भाकरी तुम्हाला जगवेल , आणि कसे आणि का जगायचे हे गुलाबाचं फुल शिकवेल.
काय शिकवतं बरं गुलाबाचं फुल आपल्याला ? गुलाब काट्यांवर फुलतो. काट्यांची पर्वा न करता. आतूनच कसा फुलून येतो. कसा खुलतो. आधी असणाऱ्या नाजूक, दिमाखदार कळीचं कसं फुल होतं हे सगळं बघण्यासारखं असतं . या साठी नजर हवी. त्याचं फुलणं तनामनात साठवून घेता यायला हवं. त्याच्या पाकळ्या बघा, किती तलम , रेशमी, मऊ, मुलायम. त्या पाकळ्यांवरचे रंग बघा. कुठे गडद,कुठे फिके तर कुठे एकमेकात मिसळलेले. कुठून आणलं त्यानं हे सौंदर्य ? तर हे आतून आलं. त्याच्यामध्ये जी फुलण्याची क्षमता आहे, त्या पूर्ण क्षमतेनिशी ते फुल फुलून आलंय . काट्यांची, वारा , वादळाची, पावसाची पर्वा न करता. टेनिसन नावाचा एक इंग्रजी कवी म्हणतो, ‘ एक फुल जाणणे म्हणजे सारे विश्व जाणणे .’ खरंच आहे. या फुलाच्या जन्माचे, फुलण्याचे रहस्य तुम्हाला समजले, तर जीवनाचे रहस्यही तुम्हाला उलगडेल.
ते गुलाबाचं फुल आपल्याला जणू सांगतंय की परिस्थितीची पर्वा करू नका. आपल्या अवतीभवती काटेकुटे असू द्या. अनंत संकटे असू द्या. आपल्या पूर्ण क्षमतेनिशी फुलून या. स्वतःला व्यक्त करा. व्यक्त व्हा. अव्यक्तातून व्यक्त व्हा. लिखाण करणे किंवा लिहिणे हे व्यक्त होण्याचे एक माध्यम आहे. समोरच्या व्यक्तीशी प्रभावी संवाद साधण्याचे एक माध्यम आहे. समर्थ रामदास म्हणतात, ‘ दिसामाजी काहीतरी लिहावे. ‘ कशासाठी लिहायचं ? लोकांसाठी ? त्यांना काही सांगण्यासाठी ? हा तर माझ्या लिखाणाचा नक्कीच उद्देश नाही. मी का लिहितो या प्रश्नाचं प्राथमिक उत्तर म्हणजे ‘ स्वान्तसुखाय ‘. मला आनंद होतो म्हणून मी लिहितो. माझ्या लिखाणातून मी व्यक्त होतो. कुठल्याही अभिव्यक्तीचं अगदी ताबडतोब आणि तात्काळ मिळणारं फळ म्हणजे आनंद, ती व्यक्त करण्याचे समाधान. ते समाधान माझ्या लिखाणातून मला मिळते.
एखाद्या चित्रकाराने खूप मेहनत करून एखादे चित्र काढावे, एखाद्या वास्तुविशारदाने दिवसरात्र खपून एखादी सुंदर वास्तू उभी करावी, एखाद्या मुर्तीकाराने मोठ्या परिश्रमपूर्वक एखादी मूर्ती घडवावी आणि आपल्या निर्मितीकडे बघावे. त्यावेळी त्याला जो आनंद असतो ना, तोच नवनिर्मितीचा आनंद एखाद्या लेखकाला आपल्या साहित्यकृतीच्या निर्मितीनंतर होत असतो. एखाद्या मातेने बाळाला जन्म दिल्यानंतर त्या बाळाकडे पाहताना जसे तिच्या सर्व श्रमाचे सार्थक होते, तसा आनंद ही नवनिर्मिती लेखकाला मिळवून देते.
ही नवनिर्मिती जर मनापासून केली असेल, म्हणजेच आतून आली असेल, आणि वर्डस्वर्थसच्या शब्दात सांगायचे तर ‘ Spontaneous overflow of powerful feelings recollected in tranquility ‘ असेल तर समोरच्याला ती नक्की आवडतेच. म्हणजेच त्या वेळी माझे लिखाण मला तर आनंद देतेच, पण समोरच्याला सुद्धा आनंद देण्याची क्षमता त्यात असते. मोर स्वतःच्या आनंदासाठी नाचतो पण त्याचा फुललेला मोरपिसारा कोणाला आवडत नाही ! मग माझे लिखाण दुसऱ्याला जर आनंद देणारे असेल तर मी का लिहू नये ? माझे लेखन माझ्या भावना, माझे विचार दुसऱ्यापर्यंत पोहचवण्याचे एक माध्यम आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचं तर ‘ ये हृदयीचे ते हृदयी घातले ‘ अशी ही गोष्ट असते. आणि जेव्हा मला लक्षात येते की माझे लिखाण लोकांना आवडते आहे, तेव्हा मला मग लिखाणासाठी आणखी उत्साह येतो. मग मी मला त्यांच्यासमोर व्यक्त करीत जातो.
मी पस्तीस वर्षे शिक्षक म्हणून काम केले. एखाद्या वर्गात जेव्हा मी मुलांना तल्लीन होऊन शिकवीत असे, त्या माध्यमातून पूर्ण व्यक्त होत असे त्या वेळी होणारा आनंद काही वेगळाच असायचा. मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, समाधान माझा आनंद द्विगुणित करीत असे. अशा वेळी मला वेळेचे भान राहत नसे. तास संपल्यानंतर तृप्त मनाने मी वर्गाबाहेर पडत असे. या समाधानाची सुवर्ण मौक्तिके मी माझ्या आनंदाच्या जीवनकोशात अनेकदा जमा केली आहेत. सेवेत असताना मला लिखाणासाठी फारसा वेळ मिळत नसे. निवृत्त्तीनंतर तो मिळू लागला. मी सहज माझ्या आनंदासाठी लिहू लागलो. अशा वेळी इंटरनेट आणि फेसबुक सारखा सोशल मीडिया माझ्या हाताशी उपलबध होता. त्याचा मी वापर करू लागलो. मलाही कुठे तरी व्यक्त व्हायला माध्यम हवे होते, ते या रूपाने अनायासे मिळाले. मग जवळपास वर्षभर ‘ प्रभातपुष्प ‘ नावाचे सादर नियमित लिहीत होतो. ते वाचकांना आवडू लागले. ते त्याची मागणी करू लागले, त्यावर प्रतिक्रिया देऊ लागले. एखादे दिवशी जर काही कारणाने लेखन झाले नाही, तर विचारणा करू लागले. मग पुढे त्यांच्याच आग्रह आणि सूचनेवरून या लेखांचे ‘ कवडसे सोनेरी..अंतरीचे ‘ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. आणि मग आजपर्यंत दहा पुस्तके ! आनंद घ्यावा आणि आनंद द्यावा, आनंद अवघा वाटावा. असे हे आनंदरूप होणे, म्हणजे लिहिणे. म्हणून मी लिहितो. माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा.
“आई, लता भेटली होती वाटेत. सांगत होती, साधना खूप बोलली तुम्हाला आज. खरंय ना ते?” रेवती ऑफिसमधून आल्या आल्या सासूबाईंना म्हणाली.
“लता भेटली म्हणजे तुला सगळं कळलंच असेल. आज दिवसभर लता हेच करत असेल. जे भेटेल त्याला सांगत सुटली असेल. पण खरंच आहे ते. साधना आज खूपच बोलली मला आणि तेही अगदी तार स्वरात. मला तर काय बोलावं ते सुचलंच नाही.” रीमाताई म्हणाल्या.
ते ऐकल्यावर रेवतीला थोडा धक्काच बसला. आईंना काय बोलावं ते सुचलं नाही म्हणजे साधनाने तोफच डागली असावी. नाहीतर आई बोलण्यात कधीच हार न मानणाऱ्या, ‘द आई’ आहेत. . माझ्यासारख्या नेभळट नाहीत काही ! रेवतीला फसकन हसूच आलं. कसंबसं तिने ते दाबलं पण तरी रीमाताईंना ते कळलंच.
त्या नुसत्याच रागाने तिच्याकडे बघत राहिल्या.
तर झालं असं होतं की, आज रीमाताईंच्या शाळेत मुख्याध्यापक सरांनी अर्जंट मीटींग बोलावल्याने रीमाताईंना तासभर लवकर शाळेत जायचं होतं. म्हणून त्यांनी त्यांच्याकडे पोळ्या करायला येणाऱ्या लताला आज लवकर बोलावून घेतलं. ज्यामुळे लता साधनाकडे उशीरा गेली आणि साधनाचं डोकं फिरलं.
लताने आज उशीर का झाला ह्याचं कारण सांगितल्यावर साधनाने रीमाताईंना फोन करून चागलंच सुनावलं. तुमच्यामुळे आज माझी ऑफिसची महत्वाची मीटिंग हुकणार आणि मला ऑफिसमधे बॉसची बोलणी ऐकावी लागणार.
असं कसं तुम्ही लताला अचानक लवकर ये म्हणून सांगता आणि तीही मला न कळवता परस्पर येते? फक्त स्वतःपुरता विचार करता असं म्हणून आमच्या पिढीला बोल लावणारे तुम्ही सिनिअर्स ! वगैरे.. वगैरे..बोलून तिने लताचीही चांगलीच खरडपट्टी काढली.
“आई जरा साधनाचा नंबर द्या मला. तिच्याशी बोलायला पाहिजे. तिचा मुद्दा बरोबर असला तरी ती ज्या पद्धतीने तुमच्याशी बोलली ते बरोबर नव्हतं. हे असं बोललेलं पुन्हा खपवून घेतलं जाणार नाही हे तिला कोणीतरी सांगायलाच पाहिजे.”
“कोणीतरी म्हणजे तू?” रीमाताईंच्या प्रश्नातला उपहास रेवतीला समजला.
“हो मी….देताय ना नंबर?”
रेवतीचा ठामपणा पाहून रीमाताईंनी तिला साधनाचा नंबर दिला. साधनापुढे हीचा काय निभाव लागणार ! पण बघू तरी काय उजेड पाडतेय ते.. या विचाराने त्या म्हणाल्या “फोन स्पीकरवरच टाक ग !”
रेवतीची होऊ घातलेली फजिती ऐकायला रीमाताईंचे प्राण कानात गोळा झाले.
“हॅलो साधना, मी रेवती, रीमाताईंची सून..”
रीमाताईंची सून म्हंटल्यावरच साधना परत तार सप्तकात जाऊन पोचली. “कशाला फोन केलास आता परत? सकाळी तुझ्या मदर इन लॉ शी बोललेय मी. आता तुलाही तेच सांगतेय परत.
मला आधी न सांगता लताला लवकर बोलवायचं नाही. आज तुझ्या मदर इन लॉ मुळे माझं सगळं शेड्यूल गडबडलं. परत असं होता कामा नये.” पुन्हा तोच आरडाओरडा सुरू झाला.
आता कळेल रेवतीच्या आवाजात किती दम आहे ते ! उगीच नाही नेभळट म्हणत मी तिला.. रीमाताईंच्या विचारांना धार आली.
“हे बघ साधना, तू सकाळी माझ्या सासूबाईंना काय सांगितलंस ते माझ्या कानावर आलंय. पण मी फोन त्यासाठी केलेलाच नाही. माझा मुद्दा तू काय सांगितलयस हा नसून तू ते कसं सांगितलंस हा आहे.” असं म्हणून रेवतीने मुद्दामच एक पॉज घेतला.
साधना काही बोलत नाहीये म्हंटल्यावर रेवती पुढे म्हणाली, “बघ आत्ताही तू मी रीमाताईंची सून बोलतेय म्हंटल्यावर मला काय म्हणायचंय ते ऐकून न घेताच परत आरडाओरड सुरू केलीस. मी तुला हे सांगायला फोन केलाय की माझ्या सासूबाईंशी परत असं ओरडून बोलायचं नाही. अगदी काहीही झालं असलं तरी. त्या तुझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत आणि त्यांचा असा अपमान मी खपवून घेणार नाही.
बास, माझा पॉईंट एवढाच आहे. बाकी तू कॉर्पोरेट वर्ल्ड मधे काम करणारी मॅनेजमेंट गुरू आहेस त्यामुळे लताला तू व्यवस्थित मॅनेज करशीलंच. पण तुझ्या भावनांच्या मॅनेजमेंटमधे मात्र मला थोडी गडबड वाटली म्हणून मी स्वतःहून तुला फोन केला. I hope you got my message and you will take it in the right spirit.”
रेवतीच्या बोलण्यातला ठामपणा आणि तिचा शांत स्वर ऐकून साधना वरमली. कदाचित आजपर्यंत तिच्या आक्रस्ताळेपणाला असा कमालीचा शांत रिस्पॉन्स याआधी तिला कधी मिळालाच नव्हता.
“Yes..I agree.. माझी बोलायची पद्धत चुकली. Sorry for that.. तुझ्या मदर इन लॉना पण सांग.” म्हणून साधनाने फोन ठेवून दिला.
फोन स्पीकरवर असल्याने साधनाचं सॉरी रीमाताईंपर्यंत आपोआपच पोचलं होतं. रेवतीला काही बोलायची गरजच नव्हती.
साधनाच्या प्रचंड आक्रस्ताळेपणाला रेवतीने तितक्याच शांतपणे थोपवलं होतं आणि वर्षानुवर्षे शाळेत मुलांना every action has equal and opposite reaction हा नियम शिकवणाऱ्या रीमाताईंना आज equal and opposite रिॲक्शनचा नवा अर्थ उलगडला होता.
लेखिका : सुश्री धनश्री दाबके.
प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ पूर्णविराम म्हणजे अंत कसा असेल ? – भाग – १☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
मागे एका आजोबांशी बोलत होतो त्यांच्या बोलण्यात आलं, आता राहिलंय काय ? आता पूर्णविराम देण्याची वेळ आली बाबा…
यावर माझी विचार चक्र सुरू झाली… पूर्णविराम म्हणजे खरंच अंत असतो का… ? पूर्णविराम दिल्यानंतरच नवीन वाक्याची सुरुवात होते… मग पूर्णविराम अंत कसा असेल ?
पूर्णविराम म्हणजे पुन्हा नवीन वाक्य सुरुवात करण्याची उमेद…!!!
ज्यांनी आपल्या आयुष्यांपुढे, थकून असे पूर्णविराम दिले आहेत, त्या पूर्णविरामानंतर आपण पुन्हा “श्री गणेशा” लिहून आयुष्याची सुरुवात त्यांना नव्याने करून देत आहोत.
आमच्यात ही पात्रता तुम्हामुळे आली आणि म्हणून भेटलेल्या लोकांचे पूर्णविराम, अल्पविराम, स्वल्पविराम, अवतरण चिन्ह, अनुस्वार, उकार, रूकार लेखाजोखाच्या स्वरूपात आपणास सविनय सादर !
एक जूनला कापडी पिशवी प्रकल्प सुरू झाला. भीक मागणाऱ्या पाच लोकांना नवीन शिलाई मशीन घेऊन दिले, मला मिळणाऱ्या जुन्या कपड्यांचा वापर करून, आपण कापडी पिशवी शिवत आहोत….
पुलाखाली / झोपडपट्टीत किंवा आणखी जिथे जमेल तिथे हे आमचे पाच लोक कापडी पिशवी शिवत आहेत आणि इतर पाच याचक लोक कापडी पिशवी विकत आहेत.
यातून प्रत्येकाला रोजचा पाचशे रुपयाचा व्यवसाय मिळत आहे. या एका प्रकल्पामुळे दहा कुटुंबं पोटाला लागली आहेत.
“प्लास्टिक पिशव्या वापरू नका, कापडी पिशव्या वापरा” या अर्थाचे आपण तयार केलेले पुणेरी टोमणे घेऊन; समाजामध्ये माझे याचक लोक प्लास्टिक पिशव्या न वापरण्याबाबत प्रबोधन करत आहेत.
रस्त्यावर भीक मागणाऱ्या आपल्या याचक मंडळींनी समाज प्रबोधन करावे, कापडी पिशव्या विकाव्या हा जगातील पहिलाच प्रकल्प असेल.
या महिन्यात काही अंध आणि अपंग याचकांना वजन काटा घेऊन दिला आहे. शनिवार वाड्याच्या भिंतीलगत आपले हे लोक वजन काटा घेऊन बसले आहेत. लोक येतात आणि वजन करून त्यांना पैसे देतात. भीक मागण्यापेक्षा हे केव्हाही चांगलं… !!!
लोकांनी केलेल्या “वजनामुळे” आपल्या लोकांच्या डोक्यावरचा “भार” हलका होईल हे निश्चित…!
शनिवार वाड्याच्या भिंतीलगत अनेक लोक अनेक प्रकारचा व्यवसाय करत आहेत….
पूर्वी हे कधीतरी भीक मागत होते…. आज आपलं बोट धरून ते स्वाभिमानाने जगत आहेत.
कुणी टॅटू काढतंय, कोणी पोस्टर विकतंय, कोणी चप्पल विकतंय, तर कोणी आणखी काय करतंय….!
कधी इकडे आलात तर…. गरज असो नसो… त्यांच्याकडून एखादी वस्तू घ्या…
यामुळे तुमचं फार काही जाणार नाही; परंतु त्यांना लाखमोलाचा आत्मसन्मान मात्र मिळेल !
पूर्व आयुष्याबद्दल विचारून त्यांना लाजिरवाणं मात्र नको करू या…!
कोणाचाही आधार नसलेल्या एका ताईला नवीन हातगाडी घेऊन दिली आहे. या हात गाडीच्या सहाय्याने व्यवसाय करून आपलं घर ती चालवत आहे.
वर वर्णन केलेले पंधरा-वीस लोक… प्रत्येकाची स्वतंत्र कहाणी आहे…
यांच्या हातातला कटोरा या महिन्यात सुटला आहे…
हे मला भेटायला येतात त्यावेळी रडतच येतात… !
त्यांना काहीतरी बोलायचं असतं, पण त्यांना बोलताच येत नाही…
आणि कान असून मी बहिरा होतो..
शब्द इथे थिटे पडतात पण अश्रू बोलू लागतात…. तेही ताठ मानेने…!!!
शब्दातूनच सर्व काही व्यक्त होत असतं तर अश्रूंची गरजच राहिली नसती…!!!
शब्दांच्या पलीकडचं मांडण्यासाठीच निसर्गाने अश्रू दिले आहेत…!!!
रडण्याचा आशीर्वाद निसर्गाने फक्त माणसाला दिला आहे…
ज्याच्या समोर रडावं… त्यानं आपल्या माथ्यावर प्रेमानं, मायेनं हात ठेवावे… आणि रडणं पूर्ण झालं की आपण त्याच्या चरणावर माथा ठेवावा…
हे चरण जिथे सापडतील ती आपली माणसं… तेवढीच आपली संपत्ती…. तोच खरा श्रीमंत… !!!
बाकी घरदार, प्रॉपर्टी, बँक बॅलन्स, पद पैसा प्रतिष्ठा सगळं झूट…!!!
शैक्षणिक
– माझ्या आयुष्यावर जे मी पुस्तक लिहिलं आहे…
वर्षभर ते विक्री करतो…. त्या पैशाला हात लावत नाही, परंतु एप्रिल मे जून जुलै या महिन्यात पुस्तक विक्रीतून मिळालेला सर्व पैसा भीक मागणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरतो.
जे या अगोदर कधीही शाळेत गेले नाहीत अशा सर्व मुलांना मॉडर्न मराठी मिडीयम, शिवाजीनगर येथे ऍडमिशन घेऊन दिले आहे.
जी मुलं या अगोदर कोणत्यातरी शाळेत शिकत होती, तिथल्या सर्वांच्या फिया भरून झाल्या आहेत.
सॉक्स युनिफॉर्म पासून दप्तरापर्यंत आणि दप्तरापासून कंपास पेटी पर्यंत सर्व बाबी मुलांना घेऊन दिल्या आहेत.
आमचा एक मुलगा कॉम्प्युटर सायन्स करत आहे, दुसरी मुलगी एमबीए करत आहे, तिसरी मुलगी आयएएस करत आहे, चौथ्या मुलाची पोलीस भरतीसाठी नुकतीच नोंद केली आहे.
याव्यतिरिक्त नुकताच बारावी पास झालेला मुलगा; त्याला स्पोर्ट्स टीचर व्हायचे आहे, समाजासाठी स्वतः घातक होता होता वाचलेला हा मुलगा त्याच्या मागील पिढीला घातक होण्यापासून वाचवत आहे. “घातक” या लेखामध्ये त्याच्याविषयी सविस्तर सर्व काही लिहिलं आहे…
आमच्या शैक्षणिक प्रकल्पात मदत करणाऱ्या अनेक घटकांपैकी एक घटक; चॉईस बुक शॉप चे मालक, श्री अजय कटारिया नुकतेच आपल्याला सोडून गेले… “अशी पाखरे येती”… या नावाने लेख लिहून त्यांना आदरांजली समर्पित केली आहे.
वैद्यकीय
अनेक वृद्ध लोकांना कानाला ऐकू येत नाही किंवा डोळ्यांना दिसत नाही, या कारणास्तव; रस्ता ओलांडताना किंवा इतर ठिकाणी त्यांचे रोड एक्सीडेंट होतात. यात कधी हात मोडतो कधी पाय मोडतो, कधी डोके फुटते, कधी इतर गंभीर दुखापत होते किंवा कधी कधी जीव सुद्धा जातो.
अशा अपघाताची कुठेही नोंद होत नाही… कोणालाही शिक्षा होत नाही… कारण त्यांना माणूसच समजलं जात नाही. असे लोक उपचाराविना रस्त्याकडेला तळमळत पडून राहतात. जखमांमध्ये अक्षरशः किडे पडतात.
अशा सर्वांना या महिन्यात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, त्यांच्यावर उपचार केले, ऑपरेशन केले. या सर्वाचा खर्च संस्थेने उचलला आहे.
बऱ्या झालेल्या लोकांना त्यांच्या मूळ गावी परत पाठवलं आहे, तिथे त्यांना झेपतील असे व्यवसाय उघडून दिले आहेत.
एक्सीडेंट टाळता यावेत यासाठी, ज्यांना दिसत नाही, अशा वृद्ध याचकांना आपण डोळ्याच्या दवाखान्यात नेऊन तपासणी करून चष्मे देत आहोत, मोतीबिंदूचे ऑपरेशन करत आहोत. आज पावतो 2000 पेक्षा जास्त रुग्णांना दृष्टी मिळवून दिली आहे.
यात अनेक रुग्ण असे आहेत ज्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे सुद्धा शक्य नाही, अशांसाठी आपण आता रस्त्यावरच डोळे तपासणी सुरू केली आहे.
ऐकू येत नसल्यामुळे होणारे एक्सीडेंट रोखता यावेत; यासाठी”मांडके हियरिंग सर्व्हिसेस, पुणे” यांच्याशी आपण करार केला आहे. वृद्ध याचकांची आपण कानाची तपासणी करून त्यांना कानाची मशीन सुद्धा देत आहोत.
कोणत्याही आजाराचे निदान करायचे झाल्यास रक्त – लघवी तपासणी, सोनोग्राफी एक्स-रे, सिटीस्कॅन यासारख्या बाबींची सुद्धा आवश्यकता असते. या तपासण्या न केल्यामुळे आजाराचे नेमके निदान कळत नाही आणि अचानकपणे मृत्यू होतात.
हे टाळण्यासाठी वरील सर्व तपासण्या आपण रस्त्यावरच करून घेत आहोत. ज्या तपासण्या रस्त्यावर होत नाहीत, त्या तपासण्या “रेड क्रॉस सोसायटी, पुणे” मधून आपण करून घेत आहोत.
संपूर्ण दवाखाना मोटरसायकलवर घेऊन भिक्षेकरी जिथे बसतात तिथेच उकिरडा फुटपाथ किंवा सुलभ शौचालय शेजारी दवाखाना रस्त्यातच मांडून बसतो. त्यांना रस्त्यावरच वैद्यकीय सेवा देतो. वैद्यकीय सेवा देता देता त्यांच्याच बरोबर जेवतो खातो, गप्पा मारतो … विनोद करतो, त्यांच्या सुखदुःखात समरस होतो.
ते काही काम करतील का ? याची चाचपणी करतो आणि त्यांना मग या आधारे आपण छोटे मोठे व्यवसाय टाकून देतो आहोत.
पुणे आणि चिंचवड मिळून भीक मागणाऱ्या लोकांचे असे 60 स्पॉट निश्चित केले आहेत, रोज चार याप्रमाणे पंधरा दिवसात हे सर्व स्पॉट आपण कव्हर करत आहोत.
“भिक्षेकरी” म्हणून न राहता; त्यांनी “कष्टकरी” व्हावे आणि कष्टकरी होऊन “गावकरी” म्हणून सन्मानाने जगावे… हा आपल्या कामाचा मूळ हेतू आणि गाभा आहे…!!!
☆ डॉ. आनंदीबाई जोशी… भाग – २ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
३१ मार्च… भारताच्या पहिल्या एम. बी. बी. एस. महिला वैद्य अर्थात लेडी डॉक्टर म्हणून प्रचंड गाजलेल्या मराठमोळ्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा जन्मदिन
जन्म: ३१ मार्च १८६५, पारनाका, कल्याण.
मंडळी, कल्पना करा आज आपण आपले अपत्य परदेशी जायला निघाले, विशेषतः मुलगी जात असेल तर किती चिंताक्रांत होतो? साधे पुण्याहून मुंबईलाही आज आपण मुलीला एकटे पाठवत नाही. १२५ वर्षापूर्वीचा हा इतिहास वाचा. मुलींना साधे प्राथमिक शाळेतही पाठवत नव्हते त्या काळी आनंदीबाईनी एवढे धाडस केले, काय सोपी गोष्ट आहे? त्यात आनंदीबाई पूर्ण शाकाहारी होत्या, नऊवारी पातळ हाच आनंदीबाईंचा पोशाख होता. जहाजावर देखिल आनंदीबाईची खूप उपासमार झाली. फक्त बटाटा वेफर्स आणि मिळाली तर फळे यावर आनंदीबाईनी दोन महिने काढले, कारण बाकी सर्व पदार्थात काहीना काहीतरी मांसाहारी पदार्थ मिसळल्याचा वास आनंदीबाईंना यायचा. यातच आनंदीबाईंना आजारपण आलं. पुढे अमेरिकेतसुद्धा ४ वर्षे आनंदीबाईंची उपासमारच झाली. भारतीय पद्धतीचं अन्न आनंदीबाईंना कधीच मिळालं नाही. परदेशी कपडे वापरायचे नाहीत म्हणून आनंदीबाई नऊवारी पातळ नेसून धाबळीचे जाड पोलकं घालत असत. अमेरिकेतली बर्फाळ थंडी आनंदीबाईचं शरीर चिरत होती. पुन्हा यात कठीण अभ्यास, स्वत:चा स्वयंपाक स्वत: करणे, समाज-नातलगांची दूषणं सहन करणे हे सर्व सोसून आनंदीबाई आपलं साध्य कार्य करत होत्या. अमेरिकेतही आनंदीबाईंना कुत्सित वागणूक मिळाली. तिथे फक्त कार्पेंटरबाई आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या अशा काही चांगल्या महिला सोडल्या तर बऱ्याच जणांनी आनंदीबाईना खूप त्रास दिला. प्रवासात सुद्धा जहाजावर पुरुषांच्या वासनेच्या नजरा आनंदीबाईना नकोसं करून टाकत असत. जिच्या सोबतीने आनंदीबाई हे सर्व साध्य करण्यास निघाल्या होत्या, त्या अमेरिकन बाईचं वागणंही ठीक नव्हतं. या सर्वाचा आनंदीबाईच्या मनावर व शरीरावरही दुष्परिणाम होत गेला. सतत अर्धपोटी राहिल्याने आजारपण आनंदीबाईंच्या पाठी लागलं. भारतातले कर्मठ लोक तर म्हणत असत की आता आनंदी ख्रिस्ती होऊनच येईल. हाडं चघळायला लागेल. अमेरिकेत आनंदीबाईच्या सहवासात येणाऱ्या मिशनरीज त्यांना ख्रिस्ती हो असा उपदेश करीत. पण स्वदेश, स्वपोशाख (नऊवारी पात्तळ-पोलकं), पूर्ण शाकाहारीपण, पूर्ण मराठी पद्धतीचं आचरण, उपास तापास याची घट्ट बांधिलकी हे सर्व आनंदीबाईंनी कधीच सोडलं नाही. हिंदू आणि मराठी संस्कृतीशी आनंदीबाईंनी कधीच प्रतरणा केली नाही. आज जे आनंदीबाईंचं छायाचित्र सर्वत्र प्रसिद्ध केलं जातं ते गुजराथी पद्धतीने नेसलेली साडी आणि दागिने घातलेलं चित्र दिसते. त्याबद्दल स्वत: डॉ. आनंदीबाईंनी लिहिलं आहे की इथल्या हवेत वारंवार फरक होत राहतो. नऊवारी कासोटा घातल्याने पाय थोडेसे उघडे पडतात. यासाठी पाचवारी गुजराथी पोशाख मी स्वीकारला. तो घातल्याने डोके व सर्व शरीर झाकले जाते. एकूणच पोशाखाबद्दल आनंदीबाईनी आपल्या पत्रात सविस्तर लिहिलं आहे. १६ नोव्हेंबर १८८६ दिवशी आनंदीबाई जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांना पहायला मुंबई बंदरात लोकांनी तुफान गर्दी केली होती. आनंदीबाईंचं स्वागत पुष्पवृष्टीनं करण्यात आलं. मुंबई बंदरात बोटीतून उतरण्यापूर्वीचं आनंदीबाईंच्या पोशाखाचं वर्णन असं आहेः नारायणपेठी काळी चंद्रकळा (नऊवारी), खणाचं पोलकं, कपाळावर चंद्रकळा, नाकात नथ, कानात कुडी, पायात बूट व स्टॉकिंग्ज असा थाट होता. आल्या तेव्हा आनंदीबाई आजारीच होत्या, परंतु हिंदुस्थानात घरी जायला मिळणार आणि घरचं मराठमोळं अन्न खायला मिळणार म्हणून आनंदीबाईची प्रकृती तात्पुरती सुधारली होती. आनंदीबाईंना अभिनंदनाच्या तारा, मानपत्रे येत होती. मानपत्रात आनंदीबाईंच्या उच्च शिक्षणाचा गौरव केला गेला. अमेरिकेत ११ मार्च १८८६ रोजी फिलाडेल्फिया येथे आनंदीबाईंना वैद्य विद्यापारंगत ही पदवी आणि पुरस्कार देण्यात आला. भारतातील पहिली महिला डॉक्टर म्हणून सर्व उपस्थितांनी आनंदीबाईंची उभे राहून जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात प्रशंसा केली होती. डॉक्टर होऊन आनंदीबाई स्वदेशी आल्या. पण एव्हाना आनंदीबाईंना क्षयाची बाधा झाली होती. बिगरगौरवर्णीय असल्यामुळे जहाजावर कुणाही परदेशी डॉक्टरने आनंदीबाईंना उपचारही दिले नाहीत. मायदेशी आल्यावर समुद्रोल्लंघन करून आलेली, त्यातून स्त्री डॉक्टर म्हणून इथले वैद्यही आनंदीबाईंचा दुस्वास करत होते,इथले डॉक्टर आनंदीबाईंना तपासूनही पाहात नव्हत. आनंदीबाईंना वयाच्या विशीतच क्षयरोग झाला. अमेरिकेत काॅर्पेंटर कुटूबियांनी आपल्या कुटुंबाच्या स्मशानात (ग्रेव्हयार्ड) आनंदीबाईंचे लहानसे थडगे बांधले. त्यावर आनंदी जोशी एक तरुण हिंदू ब्राह्मणकन्या, परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय स्त्री अशी अक्षरे कोरून तिचे स्मारक केले. हे सगळे वाचल्यावर डॉ. आनंदीबाई जोशी किती थोर होत्या असं आपल्या मनात निनादत राहतं. आजही ते थडगे पहायला मिळते. काही राष्ट्रभक्त मराठी मंडळी आनंदीबाईंच्या थडग्याला आवर्जून भेट देतात, आदरांजली वाहतात. वयाच्या केवळ १८व्या वर्षी बोटीनं परदेशी जाणारी पहिली स्त्री, हालअपेष्टा सहन करीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणारी पहिली स्त्री. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही कुचेष्टा, अवहेलना, अपमान सहन करीत हाती घेतलेले जीवित कार्य जिद्दीने पूर्ण करणारी स्त्री. भारतीय (मराठी) रीतिभाती, शुद्ध शाकाहारी आहार सांभाळणारी, तरीही इंग्रजी भाषा उत्तम आत्मसात करून वैद्यकीय शिक्षण प्रकृती स्वास्थ्य सांभाळीत अभ्यासक्रम पूर्ण करणारी तरुणी. या सर्वाबरोबर पती, नातेवाईक, सुहृद यांना सतत पत्र लिहून त्यांच्याशी संवाद साधणारी डॉ. आनंदीबाई यांच्यावर त्यांच्या समकालीन आणि लेखिका असलेल्या काशीबाई कानिटकर यांनी चरित्र लिहिले आहे. अंजली कीर्तने यांनी संशोधन करून आनंदीबाई या नावाचं एक चरित्र लिहिलं आहे. श्री.ज. जोशी यांनी आनंदीबाईंवर आनंदी गोपाळ ही कादंबरी लिहिली आहे. आनंदीबाईंवर आनंदीबाई हे नाटकही रंगभूमीवर आलं आहे १५०हून अधिक वर्षे झाली तरी डॉ. आनंदीबाई जोशींची वैचारिक संघर्षांच्या संदर्भात भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून आजही वाचकांना, अभ्यासकांना, स्त्रियांना भुरळ पडते.
आनंदीबाई जोशी यांचे २६ फेब्रुवारी १८८७ रोजी निधन झाले.
आनंदीबाई जोशी यांना विनम्र अभिवादन.
– समाप्त –
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
काळाप्रमाणे आपल्या आवडीनिवडी सोयी गैरसोयी बदलत जातात. आणि जे हौसेने सोसाने बदलले ते सुद्धा, काही दिवसानंतर पुन्हा बदलावे वाटते. कोणे एकेकाळी पितळेचे डबे रांगेने चकाचक घासून फळीवर मांडले की, घर कसे झळाळून उठायचे.
वय पुढे सरकले, मग प्रत्येक वेळी तो डबा जड खाली काढणे, आत काय आहे?ते बघणे, हे जड जाऊ लागते, अशावेळी ते डबे घासण्याची ताकदही राहिली नाही, तेव्हा भांडे गल्लीत मोडीत गेले ,काचेच्या बरण्या सोयीच्या वाटू लागल्या. त्या बरण्यांमधून साखर मीठ तांदूळ सगळे पारदर्शीपणाने दिसत असल्याने बरण्याच आवडीच्या, सफाईला सोयीच्या वाटू लागल्या,
मग काळ तोही बदलला. आता बरणी हाताळताना आत्मविश्वास कमी वाटतो, हाताळताना चुकून पडण्याची शक्यता वाटते ,हात थोडा थरथरतो, आणि त्या बरण्या पाठीमागच्या रांगेत जाऊन रिकाम्याच बसल्या. आता प्लास्टिकच्या बरण्या सोयीच्या वाटायला लागल्या, कारण पदार्थही दिसतो आणि पडली तरी धोका नाही आणि म्हणून त्या वापरताना बिनधास्त वाटतं.
एकूण काय आज जे मला सोयीचे ,आवडीचे, छान वाटते ते कायम तसेच नसते. हे जसे वस्तूचे तसेच माणसांचेही होत असावे ना असे वाटते. माणसेही सदैव पहिल्या रांगेत नसतात ,तर ती कधीतरी मागच्या रांगेत जातात, हे जीवनाचे सत्य परिवर्तन…..
लेखिका : सुश्री सुनेत्रा पंडित
संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈