मराठी साहित्य – विविधा ☆ रुद्र मंथन… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 विविधा 🌸

☆ रुद्र मंथन…  ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

आयुष्य हे एक, न उलगडणार गुपित! हा कोष्टकाचा खेळ! सारीपाटाचा डाव! प्रत्येकाला खेळ मांडण्याची मुभा आहे. फासे टाकणे त्याच्या हातात असले तरी, नियतीचा डाव वेगळाच असतो. भगवान शंकर पार्वतीने निर्माण केलेला खेळ, आजतागायत चालू आहे. फक्त खेळणारे भिडू  बदलत असतात. सारीपाट तोच आहे. हा खेळ ज्यांना जमला तो आणि ती रंगात गुंग होतात, रमुन जातात आणि येणाऱ्या पिढीला हा डाव सुपूर्द करतात.  प्रारब्धाचे फासे ठरलेले असतात. खेळणाऱ्याला वाटतं आपण चांगल खेळत असतो. सारीपाटाला कट्टी असते (फुली मारलेली जागा ) त्यात एखादी सोंगटी गेली की तिला मारता येत नाही! ती बिनधास्त राहते. तसेच काही खेळाडू,कट्टीत राहून आयुष्याचा खेळ खेळतात. तस नियतीने बुहतेक ठरवलं असावं. काहींना खेळात सुंदर फासे पडतात, तर काहींना उलटे फासे पडतात. काहींचा डाव रडीचा असतो तर, काही जण खिलाडू वृत्तीने घेतात. प्रत्येकाला डाव खेळावाच लागतो. त्याशिवाय सुटका नाही. हे एक प्रकारचे युद्ध कौशल्यच म्हणावे लागेल.

सोंगट्या कोणत्याही रंगाच्या असोत, खेळाचे कौशल्य आणि तंत्र मंत्र अंगी सात करावे लागतात. काहीजण हा खेळ अर्धवट सोडून उठतात! खेळ म्हटल्यावर हार जीत पण स्वीकारवी लागतेच. त्याचे कडू गोड घोट पचवावे लागतात. खेळातील परिस्थिती कशी असेल सांगता येत नाही. त्या परिस्थितीला अनुसरून नाईलाजाने, फासे टाकावे लागतात. खेळात बाहेरचे कमी पण आतलेच शत्रू जास्त असतात. त्यांना सदैव सोबत घेऊनच हा बुद्धिबलाचा डाव आखावा लागतो.

काहीवेळा  आयुष्य हे   “समुद्र मंथन “आहे असच वाटतं! काळाचा वासुकी ( दोरी ) आयुष्याच्या मेरू पर्वताला गुंडाळून समुद्राला ढवळून काढतात. वासुकीच्या तोंडा कडील भाग हा पुरुषाकडे तर, शेपटीचा भाग स्त्रिया कडे! आयुष्याचे रुद्र मंथन करण्यात किती पिढ्या गेल्या हे त्या जगतपित्यालाच माहित! प्रत्येक जण हा सुख दुःखाचा खेळ खेळत जीवनाच सार्थक करून घेत असतात.

पण ह्या समुद्र मन्थनातुन सुख आणि दुःख ह्या खेरीज कोणतेही रत्न सापडत नाही. वेदना व्यथा ह्या सुखातूनच उत्पन्न होत असव्यात का  ? हे न समजणारे कोडेच! प्रत्येक जण ह्या सुख दुःखाच्या विहिरीत उडी मारतोच! रुद्र मन्थनाचा हा खेळ अव्यांहत पणे चालू आहेच.

प्रकृती पुरुष हेच आदम ईव्ह  वाटू लागतात. येथूनच आनंदाचे सफरचंद खाण्यात  मशगुल होतात. भोग आणि उपभोग ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू  ! स्त्री पुरुष  म्हणजेच जग का ?

स्त्रियांच्या वाट्यालाच भोग आणि पुरुषांच्या वाट्याला उपभोग!  हा कसला न्याय!

ही अशीच का सृष्टी रचना.

स्त्रियांचे दुःख स्त्रियानाच माहित. मग तो पुरुष स्त्री रोग तज्ञ डॉक्टर असला तरीही त्याला त्या वेदना कश्या कळणार! भोग उपभोगचे खेळ हे आनादी काळापासून चालू आहेत. वेदना व्यथा आहेत, म्हणून त्याला काळाचे मलम आहेच. प्रकृतीचा सोशिक पणा निसर्ग सृष्टीला मान्य होता, असं म्हणावे लागेल.

आजच्या युगात स्त्री शक्ती जागृत झाली, स्त्री शक्ती खूप पुढे गेली. प्रत्येक क्षेत्रात ह्या शक्तीने आघाडी घेतली व समाजाचा मनाचा केंद्रबिंदू झाली. तरीपण तिच्या वाट्याला आलेल दुःख सहजपणे पचवून पुढे जात राहिली.

असं असलं तरी स्त्री व पुरुष हे घटक एकमेकांना पूरक होत, काळाच्या यज्ञात समिधा अर्पण करीत हा जगण्याचा यज्ञ अखंड सुरूच ठेवला. हाच भातुकलीचा खेळ, सारी पाटात केव्हा रूपांतरीत होऊन,  त्याच रुद्र मंथन कस झालं हे कळत पण नाही. आयुष्य हे असच असत का?  सुख दुःख , हार जीत कुणाचीही होवो. हा जगण्याचा मंत्र सारी पाट डाव असो वा रुद्र मंथन हे कुणास चुकले आहे का ?

भातुकलीचा खेळ कसा  मांडावा, सारी पाटात फासे कसे फेकावे, रुद्र मंथन हा आयुष्याचा आनंदाचा क्षण समुद्र मंथन नाही का वाटतं हा जगण्याचा यज्ञ त्यात पडणाऱ्या अहुत्या कळत न कळत  काळाच्या पडद्या आड होत राहतात! हेच तर समाजाचे जगणे आहे देणे आहे.

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “चित्राहुती…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ चित्राहुती…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर 

मुंज मुला रे मुंज मुला

     चल म्हण रे ओम भवती

          मंत्र जपावा गायत्री

              कर संध्या तू रोज परि……

असे मधुर आवाजात कोणीतरी मुंज म्हणत होते (मुंज म्हणजे मुंजीच्या वेळेस गायले जाणारे गीत) प्रशस्त असा गोखल्यांचा वाडा. चारी बाजूंनी सजावट केलेला वाडा खूपच रुबाबदार दिसत होता. वाड्याच्या मोठ्या दरवाजासमोर सुरेख रांगोळी काढली होती. वाड्याच्या मधोमध अंगणात राघवचे मौंजीबंधन 

म्हणजे आप्पासाहेब गोखल्यांच्या

नातवाचे मौंजीबंधन अगदी थाटात सुरू होते. आठ वर्षाचा छोटा बटू म्हणजे राघव खूप गोड दिसत होता.

भरपूर नातलग मंडळी जमली होती. आप्पासाहेबांचे चिरंजीव गोपाळराव आणि त्यांच्या पत्नी गायत्रीताई पुण्यवचन बसले होते.

होम सुरू असताना आप्पासाहेब गुरुजींना म्हणाले,

“गुरुजी, माझ्या नातवाला ( राघवाला) सगळे नियम नीट समजावून सांगा, म्हणजे रोज संध्या करताना किंवा सर्व नियमांचे पालन करताना तो मला सारखे प्रश्न विचारणार नाही.”असे म्हणून आप्पासाहेब हसू लागले. नातू राघव मात्र कावराबारा होऊन पाहत होता आता मला कसले नियम सांगतायत हे गुरुजी असे प्रश्नचिन्ह त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते.

सर्व विधी पार पाडत असताना गायत्री मंत्र सांगण्याचा विधी आला आणि गुरुजींनी गोपाळरावांना सांगितले,

“गोपाळराव, राघवाच्या कानात गायत्री मंत्र सांगा बरं आता”. तेव्हा गोपाळरावांनी मुलाच्या कानात गायत्री मंत्र सांगितला. भिक्षावळीचा विधी यथासांग पार पडला…… प्रत्येक जण भिक्षा घालत असताना राघव गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे “ओम भवती भिक्षाम देही” म्हणत होता.

यज्ञोपवीत घातलेला, डोक्याचे संजाब केलेला, हातात झोळी, एका हातात पळसाची काठी खूप गोड दिसत होता राघव. उपनयन सोहळा अगदी आनंदात पार पडला. चार दिवस सगळी पाहुणे मंडळी राहिली आणि मग आपापल्या घरी गेली. आता खरा दिनक्रम सुरू झाला होता राघवचा.

रोज सकाळ संध्याकाळ आप्पासाहेब राघवकडून संध्या करून घेत होते. एक दिवस राघवने आजोबांना विचारले,

“आजोबा यज्ञोपवीत का घालायचे”. तेव्हा आप्पासाहेब हसले आणि म्हणाले,

“सांगतो बर बाळा,आपल्या पूर्वजांनी जे काही सांगितले आहे त्या प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय आधार आहे बरं का? यज्ञोपवीत म्हणजे कापसाचे तीन धागे ते कायम छातीवर ठेवावेत कारण त्याचे घर्षण झाल्याने विद्युतभार निर्माण होतो,सर्व रक्तवाहिन्या प्रसरण पाहून जागृत होतात. आपली विचार क्षमता वृद्धिंगत होते आणि आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्यांवर बिनचूक उत्तरे आपली आपण शोधू शकतो. आता मी काय करू या चिंतेतून सुटण्याचा यज्ञोपवीत हा एक मार्ग आहे. राघवला जानव्याचे महत्व पटल्यामुळे तो जानव्याला खूपच जपत होता. गायत्री मंत्रही अगदी मन लावून म्हणत होता.

संध्या करून झाल्यानंतर आजोबांसोबत राघव जेवण करण्यासाठी स्वयंपाक घरात आला. आजोबांनी त्याला पाटावर बसण्यास सांगितले. आप्पासाहेब ही त्याच्या बाजूला जेवावयास बसले. राघव चे बाबा, काका सारी भावंड ही जेवावयास बसली होती. सर्वजण पाटावर बसले होते व समोर भोजनपात्र ठेवले होते. स्वच्छ शेणानी सारवलेल्या स्वयंपाक घरात जेवणाची पाने मांडली होती. आप्पासाहेबांनी भोजनपात्रावर बसल्यावर भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय म्हणावयास सुरुवात केली. त्यांच्या पाठोपाठ घरातील सर्वजण अध्याय म्हणू लागले. राघवलाही रोज ऐकून पंधरावा अध्याय पाठ झाला होता. तोही त्यांच्याबरोबर हात जोडून म्हणू लागला. अध्याय म्हणून झाल्यानंतर अप्पासाहेब राघव कडे पाहून म्हणू लागले,

“राघवा, जेवण करणे म्हणजे केवळ उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म. म्हणजे केवळ पोट भरण्यासाठी जेवण करावयाचे नाही तर तोही एक वैश्वानर अग्नीला शांत करण्यासाठी केलेला एक यज्ञ आहे, म्हणून तो करण्याच्या आधी म्हणजेच जेवण करण्याच्या आधी काही नियम आपल्याला पूर्वजांनी घालून दिलेले आहेत त्याचे आपण अगदी व्यवस्थित पालन केले पाहिजे.”असे म्हणून आप्पासाहेबांनी राघवला सांगितले,”जमिनीवर बारीक कीटक असतात व ते आपल्या ताटामध्ये येऊ नयेत म्हणून ताटा भोवती एक पाण्याची रेषा काढावयाची व नंतर ताटाच्या उजव्या बाजूला चित्राहुती ठेवावयाची. हे दोन्हीही कर्म करताना मंत्र म्हणावयाचे जेणेकरून आपण ठेवलेली चित्राहुती जमिनीवरचे कीटक खातील. त्यांचे पोट भरेल व ते आपल्या ताटातील अन्न खाणार नाहीत.”

असे म्हणून आप्पासाहेबांनी स्वतः उजव्या हातात पाणी घेतले व राघवलाही उजव्या हातात पाणी घ्यायला लावले व तोंडाने एक मंत्र म्हणावयास लावला.

“सत्यम् त्वर्तेन परिषिञ्चामि।अन्नम् ब्रह्म रसा विष्णुर्भोक्ता देवो महेश्वर:।”

असे म्हणून भोजनपात्रभोवती वर्तुळाकार रेषा काढावयास लावली व नंतर त्या रेषेवर उजव्या बाजूला चित्राहुती ठेवतानाही

परत मंत्र म्हणावयास लावला.

“चित्राय स्वाहा। चित्रगुप्ताय स्वाहा। यमाय स्वाहा। यमधर्माय स्वाहा। अमृत परस्तरण मसि।सर्वेभ्यो भूतेभ्य: स्वाहा।”

असे म्हणून आप्पासाहेबांनी चित्रहुती ठेवावयास सांगितल्या. आता आप्पासाहेबांना राघवच्या चेहऱ्यावर असंख्य प्रश्न दिसत होते. त्याला या मंत्राचा अर्थ हवा होता. त्याच्या चेहऱ्यावरची कुतूहल पाहून आप्पा हसले आणि विचारले, 

‘काय झाले राघवा.’ राघव म्हणाला,

“आजोबा, या मंत्राचा मला अर्थ सांगा”. आप्पासाहेब म्हणाले,

“काळजी करू नको, मी तुला अर्थ सांगणार आहे त्याशिवाय आज आपण जेवण करावयाचे नाही.”

आप्पा राघव सोबत सर्वांनाच सांगत होते,”आपल्या भोजनपात्राखाली मंडल केलेले असते. मंडल कशासाठी करतात तर आपल्या भोजनपात्राखाली मंडल करण्यामुळे पात्र स्थान निश्चित होते व मंडलावर सर्व देवांचा वास असतो म्हणून ताटा भोवती उजव्या हातात पाणी घेऊन, मंत्र म्हणून, वर्तुळाकार रेषा काढतात. चित्र आणि चित्रगुप्त हे आपल्या कर्माची नोंद ठेवणारे आणि यम आणि यम धर्म हे मानवी जग रहाटीवर नियंत्रण ठेवणारे असल्यामुळे त्यांना आहुती देऊन आदर व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे म्हणून चित्राहुती ठेवताना हे मंत्र म्हटले जातात.”

राघवचे समाधान झाले होते. त्याने आजोबांनी सांगितल्याप्रमाणे मंत्र म्हटला व भोजनपात्राभोवती पाण्याची वर्तुळाकार रेषा काढली व नंतर मंत्र म्हणतच चित्राहुतीही घातली. सर्वांनी प्रसन्न मनाने भोजन केले.

भोजन झाल्यानंतर आप्पा सागू लागले,

“आपली भारतीय संस्कृती इतकी आदर्श आहे की ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला आपल्या साऱ्या परंपरांची आणि त्या मागच्या शास्त्रीय दृष्टिकोनाची माहिती देत आली आहे. राघवा, आज मी जे सर्व काही तुला सांगितले ते तू आयुष्यभर लक्षात ठेव आणि तुझ्या पुढच्या पिढीला याचे महत्त्व पटवून दे तरच तिचे पालन केले जाईल आणि त्याचे फायदेही पुढच्या पिढीला देखील मिळतील”. राघवही हसत हसत हो म्हणाला.

आज इतक्या वर्षानंतर राघवला त्याच्या मुंजीची ही सारी घटना आठवत होती कारण आज आप्पा साहेबांच्या जागेवर राघव साहेब होते आणि त्यांच्या नातवाची मुंज झालेली असल्यामुळे त्याला संस्कृतीचा परिपाठ देण्याची वेळ आज राघववर आली होती. राघव गालातल्या गालात हसला कारण आज हयात नसलेल्या त्याच्या आजोबांची म्हणजेच आप्पासाहेबांची त्याला सारखी आठवण येत होती व त्यांनी सांगितलेले सर्व धडे राघव आता त्याच्या नातवाला देत होता. एक सुसंस्कृत आणि आदर्श नागरिक घडवण्याची कला जी त्याला त्याच्या आजोबांनी शिकवली होती तीच शिकवण आज नातवाला देताना राघवचा ऊर अभिमानाने भरून आला होता. राघव नातवाला चित्राहुती घालताना चा मंत्र शिकवत असताना पाहून स्वर्गातून आप्पासाहेबही तितक्याच समाधानानी हसत असतील नाही का?

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ पूर्णविराम म्हणजे अंत कसा असेल ? – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ पूर्णविराम म्हणजे अंत कसा असेल ? – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

6. डॉ मनीषा सोनवणे ही योगशिक्षक आहे. रस्त्यावर याचना करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात सुद्धा एक छान पहाट यावी, आनंद लहरी तरंगाव्या यासाठी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून रस्त्यावरील सर्व याचकांचा रस्त्यावरच योग अभ्यास घेतला.

हास्ययोगा घेऊन त्यांना थोडं हसवण्याचा प्रयत्न केला…!!! 

रस्त्यावर चालणाऱ्या या योग अभ्यासामध्ये घराबाहेर काढलेल्या अनेक “आईंचा” समावेश होता. 

मृत्यूचे अनेक पर्याय आहेत…. 

जन्म घ्यायचा तर आई शिवाय कोणताही पर्याय नाही… ! 

तुम्ही जगात कोणालाही भेटा….  आपल्याला नऊ महिने जास्त ओळखते, ती आपली आईच…!

या जगात सगळ्यात अडाणी कोण असतं तर ती आई… तिला हिशोब कळतच नाहीत..!

मुलांसाठी खाल्लेल्या खस्तांची नोंद ती कुठेही ठेवत नाही… 

पण हि नोंद दिसते तिच्या रापलेल्या हातावर…! चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांवर.. !! 

आईला हिशोब कळतच नाहीत.. तरीही जगातली सर्वात मोठी गणितज्ञ तीच असते. 

कायम पोरांच्या सुखाची बेरीज करत, पोरांच्या आनंदाचा गुणाकार करते. भेगा पडलेल्या टाचा घेऊन, पदरात कायम भागाकारच घेऊन फिरते. आयुष्याच्या एका टप्प्यावर तिला मुलांकडून वजा केलं जातं. या टप्प्यावर मग ती “शून्य” होऊन जाते. 

संकटाच्या काळात मूल जेव्हा “एकक” म्हणून जगत असतं; त्यावेळी आधीची चुकलेली सर्व समीकरणे पुसून, ती त्या “एकक” मुलाच्या मागे उभी राहते आणि त्याला दशक बनवते… शतक बनवते…. सहस्त्र बनवते…! 

आई, शेवटी स्वतः मात्र शून्यच राहते…!!!

रस्त्यात सापडलेली आई नावाची “शून्ये” आपण पदरात घेत आहोत…!!!

उकिरड्यावर पडलेली, हीच शून्ये गोळा करता करता…. मीच कधी श्रीमंत झालो… मलाच कळलं नाही…! 

अन्नपूर्णा प्रकल्प

पूर्वी भीक मागणारी काही दांपत्य… यांच्याकडून आपण जेवण तयार करून घेत आहोत… (पोळी भाजी वरण भात) 

या जेवणाचा एक डबा रु 50 प्रमाणे आपणच त्यांच्याकडून विकत घेत आहोत. 

विविध हॉस्पिटलमध्ये अनेक गरीब लोक विविध योजनांखाली उपचार घेत आहेत परंतु त्यांना डबा आणून देणारे कोणीही नाही. अशा निराधार आणि निराश्रीत लोकांपर्यंत हे डबे आपण पोचवत आहोत. 

(रस्त्यात दिसेल त्याला “दे जेवणाचा डबा” असं आम्ही करत नाही, यामुळे ज्याला गरज नाही त्याच्याही हातात अन्न जाते आणि तो नंतर हे नदीपात्रात फेकून देतो.. अन्नाची नासाडी होते)

जेवणासोबतच पाण्याची बाटली आणि विविध सणासुदीला लाडू, पेढे, शिरा किंवा इतर तत्सम गोड पदार्थ त्यांना देत आहोत. 

खराटा पलटण

माझ्याकडे अशा अनेक महिला आहेत ज्यांना भिक मागायची नाही, काम करायचे आहे परंतु अंगात कोणतेही कौशल्य नाही. 

मी आदरणीय संत श्री. गाडगे बाबांचा भक्त आहे. गाडगेबाबा पूर्वी हातात खराटा घेऊन गावेच्या गावे स्वतः स्वच्छ करून, इतरांनाही करायला लावत असत. 

हिच कल्पना कपाळी लावून आपण  “खराटा पलटण” या नावाने प्रकल्प सुरू केला आहे. 

यात याचक महिलांना हाताशी धरून दिसेल तो सार्वजनिक अस्वच्छ भाग आम्ही सर्वजण मिळून स्वच्छ करत आहोत. 

या बदल्यात त्यांना पगार किंवा पंधरा दिवस पुरेल इतका किराणा देत आहोत. 

आमच्या सोबत काम करणाऱ्या या 100 महिलांना आपण युनिफॉर्म दिले आहेत. 

आज आपले हे लोक काम करून सन्मानाने जगत आहेत. 

आपण आंबा खातो पण त्याची कोय कधीही जपून ठेवत नाही… 

काही लोकांचं आयुष्य सुद्धा तसंच असतं…. 

त्यांची मुलं बाळ सूना नातवंड त्यांचा गर काढून घेतात आणि आयुष्याच्या शेवटी कोय म्हणून फेकून उकिरड्यावर फेकून देतात…

लोकांनी फेकलेल्या अशा कोयी आपण उचलत आहोत आणि पुन्हा त्यांना जमिनीत रुजवण्याचा प्रयत्न करत आहोत… 

त्यांना खत पाणी घालून तुम्ही हापूसचं आंब्याचं झाड आहात… याची जाणीव करून देत आहोत ! 

मनातलं काही ….. 

टळटळीत दुपारी, कडाक्याच्या उन्हात तहानेनं जीव व्याकुळ झाला; की आपण दुकानातून वीस रुपयाची पाण्याची बाटली घेऊन तोंडाला लावतो. 

याच टळटळीत दुपारी आणि कडकडीत उन्हात तहानेनं जीव व्याकुळ झालेल्या रस्त्यावरील निराधार निराश्रित याचकांनी कुठे जायचं… ? पक्षी पाखरांनी कुठे जायचं…? 

याचसाठी मार्च एप्रिल मे आणि मध्य जून पर्यंत आपण रस्त्यावर ठिकठिकाणी माठ भरून ठेवले होते. 

पाणी भरण्याची जबाबदारी तिथल्याच एका याचकाला दिली होती. 

पक्ष्यांसाठी नारळाच्या करवंट्यांमध्ये पाणी भरून ठेवलं होतं. 

सुरुवातीला वाट्या घेऊन हे पाणी ठेवलं होतं… पण या वाट्या सुद्धा चोरीला गेल्या आणि नंतर माठही. 

मला गंमत वाटते चोरांची… या बिचाऱ्यांना काय चोरावं तेच कळत नाही. 

वाटी आणि माठ चोरून… ते विकून, किती पैसे मिळणार आहेत ? यातून किती आनंद मिळेल ?? 

चोरायचीच होती, तर एखाद्याची तहान चोरायची,  एखाद्या तहानलेल्या मुखात पाणी घातलं असतं, तर त्यातून आयुष्यभर पुरेल इतकं समाधान मिळालं असतं. 

स्वतःसाठी काही करून मिळवला जातो तो आनंद… परंतु दुसऱ्यासाठी काही करून मिळवलं जातात ते समाधान… !!! 

आनंद थोडा वेळ टिकतो…. समाधान चिरकाल…!!! 

माझ्या लेखांच्याही बाबतीत असंच होतं… माझ्या लेखांमध्ये काटछाट करून खाली स्वतःचे नाव टाकून अनेक लोक आपलाच लेख आहे, म्हणून बिनधास्त खपवतात, त्यावर नाटक काढतात, शॉर्ट फिल्म काढतात… त्यात माझ्या डोळ्यासमोर अनेकांना पुरस्कार मिळालेले मी स्वतः पाहिले आहेत, बातम्या वाचल्या आहेत. 

असो; हा झाला त्यांचा तात्पुरता आनंद…! 

पण माझे लेख चोरी करण्याऐवजी, माझं काम त्यांनी चोरी केलं असतं, एखाद्याची वेदना चोरी केली असती, तर मिळालं असतं ते आयुष्यभराचं समाधान…  त्यांनाही आणि मलाही…!!!  असो…,

मला अनेक वेळा विचारलं जातं, तुम्ही कोणत्या देवाची पूजा करता ?  कोणत्या मंदिरात जाता ?  की मशिदीत जाता ?  की चर्चमध्ये जाऊन कॅण्डल लावता ?? 

मी या जगातला सगळ्यात भाग्यवान माणूस आहे… 

माझ्या हाती स्टेथोस्कोप असतो, तीच माझी आरती…  मी तोच ओवाळतो…!!! 

दरिद्री नारायणाला, मी जी वैद्यकीय सेवा देतो तोच मी वाहिलेला नैवेद्य…

वेदनेनं तळमळणाऱ्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू हाच मला मिळालेला प्रसाद… 

रस्त्याकडेला, फुटपाथ वर गलिच्छ अवतारात पडून माझी परीक्षा घेणाऱ्या प्रभुजींना, मी रस्त्यातच अंघोळ घालतो, तोच मी केलेला अभिषेक… !

देवा, तुझ्यावर लाखो लिटर दुधाचा अभिषेक घालण्याची माझी पात्रता नाही, औकात नाही… 

पण ओंजळीत बसेल इतकं दूध घेऊन मी तहानलेल्या बाळांच्या मुखात नक्की घालतो…  या बाळांच्या बोबड्या बोलात मी इतका रमतो की मला मंदिरात यायची आठवणच राहत नाही…. मला माफ कर देवा…!!!

थंडीत कुडकुडणाऱ्या लहान पोरांच्या अंगावर आम्ही चादर चढवतो… आणि म्हणून या अल्लाह, मस्जिद मध्ये कधी यायला जमलंच नाही… मुझे माफ करिये…!!! 

प्रभू येशू, चर्चमध्ये लावायची कॅन्डल, आम्ही कोणाच्यातरी मनात लावून आलो आहोत… Kindly forgive me… !!!

गुरुद्वारामध्ये मांडायचा लंगर आम्ही रस्त्यावरच मांडला आहे …. वाहे गुरुजी…. मैनु माफ कर दो…

आणि म्हणून मंदिर, मस्जिद, चर्च आणि गुरुद्वारा यापैकी कुठेही जायला मला जमतच नाही…! 

ही जी पूजा मांडली आहे, या पूजेचा तुम्ही सर्वजण अविभाज्य घटक आहात आणि म्हणून हा लेखाजोखा आपणास सविनय सादर ! 

शेवटी एका सुप्रसिद्ध वचनाचा आधार घेऊन म्हणावेसे वाटते, “मी त्या “देवाची” पूजा करतो ज्याला लोक “माणूस” म्हणतात… !!!” 

नतमस्तक मी आपणा सर्वांसमोर…!!! 

प्रणाम  !!!

— समाप्त—  

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डार्क वेब : भाग – 7 ☆ श्री मिलिंद जोशी ☆

श्री मिलिंद जोशी

? इंद्रधनुष्य ?

 ☆ डार्क वेब : भाग – 7 ☆ श्री मिलिंद जोशी ☆ 

(ही अतिशय महत्वपूर्ण माहिती देणारी लेखमाला दर सोमवारी आणि मंगळवारी प्रकाशित होईल) 

मागील एका भागात मी म्हटले होते की, डार्कवेबला सगळ्यात जास्त फंडिंग अमेरिकन सरकार तसेच गुगल सारख्या काही कंपन्या करतात. आता अमेरिकन सरकार जर फंडिंग करत असेल तरी त्याचे नियंत्रण का नाही? याचे कारण आहे नेटवर्कची काम करण्याची पद्धत.

ज्यावेळी दोन किंवा त्यापेक्षा जास्त कॉम्प्युटर / मोबाईल किंवा इतर काही डिव्हाईस एकमेकांशी जोडले जात असतील तर त्याला नेटवर्क असे म्हणतात. अशा ठिकाणी एक कॉम्प्युटर हा माहिती मागवणारा आणि दुसरा माहिती पुरवणारा असतो. जो माहिती मागवतो त्याला क्लाइंट असे म्हणतात तर जो माहिती पुरवतो त्याला सर्व्हर असे म्हणतात. वेब कोणतेही असो, सर्फेस / डीप किंवा डार्क, त्याचे कामही असेच चालते.

सर्फेस वेबसाठी वापरले जाणारे सर्व्हर हे फिक्स असतात. ते कोणत्याही कंपनीचे असोत, त्याची नोंद डोमेन रजिस्टर करणाऱ्या ठिकाणी केलेली असते. म्हणून तर गुगलचे मेल याहूला जाऊ शकतात. किंवा रेडीफमेल वरून जीमेलवर मेल पाठवणे शक्य होऊ शकते. अशा ठिकाणी नियंत्रण ठेवणे शक्य असते. पण या उलट डार्कवेबचे असते. इथे निर्माण होणाऱ्या कोणत्याही सर्व्हरची नोंद कुठेही नसते. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही.

एक उदाहरण देतो. आजकाल आपण टीव्हीवर अपहरण कथा बघतो. त्यात अपहरण करणारे गुंड फोन करण्यासाठी एक साधा फोन घेतात, एक खोट्या नावाने सीम घेतात. त्यानंतर एखाद्या मुलाचे अपहरण करतात आणि त्या खोट्या नावाने विकत घेतलेल्या सीमवरून अपहरण केलेल्या मुलाच्या घरच्यांना फोन करतात. एकदा का त्यांना पैसे मिळाले की ते विकत घेतलेले सीम तोडून फेकून देतात. अशा वेळी पोलिसांना त्या गुंडांना पकडणे अवघड बनते. तीच गोष्ट इथेही असते. तिथे पोलीस गुंडांना पकडू शकतात कारण त्यात पैशाची देवाण घेवाण प्रत्यक्षपणे केली जाते. इथे तर व्यवहार देखील बीटकॉईन सारख्या क्रिप्टोकरन्सी मध्ये केले जातात. मग त्यावर नियंत्रण ठेवणार कसे?

अजून एक उदाहरण देतो. अनेकांनी नेटवर्किंगच्या LAN ( Local Area Network ) या प्रकाराबद्दल ऐकले असेल. मोठ्या कंपन्या किंवा ऑफिसमध्ये हा प्रकार अनेकांना बघायला मिळेल. तिथे एक सर्व्हर असतो त्यावर software install केलेले असते. त्याला इतर कॉम्प्युटर ( क्लाइंट ) जोडलेले असतात. क्लाइंटवर तुम्ही केलेले काम सर्व्हरवर सेव्ह होते. समजा अशा ठिकाणी तुम्ही एका क्लाइंटवरून दुसऱ्या क्लाइंटला काही संदेश पाठवला तर तो सरकारी यंत्रणेला माहिती होईल का? नाही होणार, कारण इथे इंटरनेटचा वापर झालेला नाही. LANचा वापर झालेला आहे. अशीच काहीशी गोष्ट डार्कवेब बाबतही लागू होते. उद्या समजा मी माझ्या कॉम्प्युटरवर एखादी .onion साईट बनवली आणि त्याची लिंक तुम्हाला पाठवली, आणि आपले कॉम्प्युटर इंटरनेटशी जोडलेले असतील तर तुम्ही त्या लिंकच्या आधारे माझ्या कॉम्प्युटरवरील ती साईट बघू शकाल. यावेळी तुमचा डिव्हाईस हा क्लाइंट असेल आणि माझा कॉम्प्युटर हा सर्व्हर. पण ज्यावेळी मी माझा कॉम्प्युटर बंद करेन, लिंक काम करणार नाही. इथे इंटरनेटचा वापर फक्त दोन डिव्हाईस जोडण्यासाठी केला आहे. अशा वेळी सरकारला आपल्यात काय संदेश दिले घेतले गेले हे आपल्या दोघांपैकी कुणा एकाच्या डिव्हाईसला hack केल्याशिवाय किंवा आपले डिव्हाईस त्यांच्या ताब्यात घेतल्याशिवाय समजू शकणार नाही. समजा माझा कॉम्प्युटर सरकारी यंत्रणेने hack केलाच आणि त्यावेळी मी VPN (Virtual Private Network) वापरत असेल तर जोपर्यंत सरकारी यंत्रणा माझ्यापर्यंत पोहोचतील, मी माझे स्थान बदललेले असेल. हीच गोष्ट आहे की डार्कवेबवर कोणतेही सरकार नियंत्रण ठेऊ शकत नाही.

आज आपण इथेच थांबू, पुढील भागात आपण डार्कनेटवरील ‘रेड रूम’ या प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत… तोपर्यंत रामराम…

 

क्रमशः भाग सातवा

©  श्री मिलिंद जोशी

वेब डेव्हलपर

नाशिक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ योग्य लेखन — लेखक : श्री अनिल विद्याधर आठलेकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

योग्य लेखन — लेखक : श्री अनिल विद्याधर आठलेकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

बोलत असताना किंवा लिहिताना केवळ शब्दच नाही तर अंकदेखील आपण चुकीचे उच्चारतो. नक्की कोणता आणि कसा उच्चार योग्य आहे हेच अनेकदा माहीत नसतं त्यामुळे असं होतं. 

उदाहरणार्थ –  

१९ = एकोणवीस ❎❎❎

        एकोणीस ✅✅✅ 

४४ = चौरेचाळीस  ❎❎❎

         चव्वेचाळीस  ✅✅✅

७८ = अष्टयाहत्तर/अष्टयात्तर ❎❎❎

          अठ्ठयाहत्तर ✅✅✅

८८ = अष्टयाऐंशी  ❎❎❎

          अठ्ठयाऐंशी  ✅✅✅

९५ = पंच्यांण्णव  ❎❎❎

          पंचाण्णव  ✅✅✅

(संदर्भ : महाराष्ट्र  शासन, ०६ नोव्हेंबर २००९ च्या आदेशानुसार )

क्रमवाचक संख्याविशेषणांच्या बाबतीत एक महत्त्वाचा उल्लेख –   

पहिली चार क्रमवाचक संख्याविशेषणे अनियमित आहेत – 

– पहिला/ली/ले/ल्या 

– दुसरा /री/रे/र्‍या 

– तिसरा/री/रे/र्‍या

– चौथा/थी/थे/थ्या  

पाच अंकापासून मात्र पुढील सर्व अंकांना ‘वा’ हा प्रत्यय लागतो. 

उदाहरणार्थ – पाचवा, सातवा, बारावा इ. 

#महत्त्वाचा उल्लेख – 

ज्या अंकात उपान्त्य ( सोप्या भाषेत – शेवटच्या अक्षराच्या आधीचं ) अक्षर दीर्घ (‘ई’) तर उपान्त्य अक्षर म्हणजेच ‘ई’ स्वर असणारे अक्षर र्‍हस्व होईल. 

उदाहरणार्थ – 

एकोणीस – एकोणिसावा 

वीस        – विसावा 

बावीस     – बाविसावा 

(संदर्भ – मराठी शब्दलेखनकोश, प्रा. यास्मिन शेख)

तसे साधेच नियम आहेत, पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 

मराठी आपली मातृभाषा आहे असं आपण म्हणतो. ती अभिजात भाषा म्हणून घोषित झाली पाहिजे अशीही आपली अपेक्षा असते, पण आपल्याच भाषेतील अशा छोट्या-छोट्या चुका टाळण्याच्या दृष्टीने आपण काही खास असे प्रयत्न करतो का? 

बघा, विचार करा. 

लेखक : श्री अनिल विद्याधर आठलेकर

प्रस्तुती :  श्री सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मित्र का असावेत ?… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ मित्र का असावेत … लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

एकदा एका माकडाला अति दु:खामुळे मरण्याची इच्छा झाल्यावर त्याने झोपलेल्या सिंहाचे कान ओढले. 

सिंहाने उठून रागाने गर्जना केली की हे धाडस कोणी केले? 

स्वतःच्या मृत्यूला कुणी बोलावले ?

माकड : मी कान ओढले महाराज सध्या मित्र नसल्यामुळे मी खूप उदास आहे. आणि मला मरण पाहिजे आहे, तुम्ही मला खाऊन टाका.

सिंहाने हसून विचारले : माझे कान ओढताना तुला कोणी पाहिले तरी नाही ना ?

माकड : नाही महाराज.

सिंह : मग ठीक आहे, आणखी एक दोन वेळा कान खेच, खूप छान वाटले.

माकडाने सिंहाचे दोन तीन वेळा कान ओढले. सिंहाला खुप बर वाटलं.

सिंह: आजपासून मिच तुझा मित्र आहे अस समज, आणि मरणाचा विचार सोडुन दे.

या कथेचे सार. 

एकटा राहून जंगलाचा राजाही कंटाळतो.

म्हणून आपण आपल्या मित्रांच्या सतत संपर्कात रहा, त्यांचे कान ओढत रहा, खुप मेसेज येणे भाग्याचे समजा कोणीतरी आपली आठवण काढतय. चांगल्या पोस्टला लाईक करा, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा देवाण घेवाण करा. आनंद देण्यात घेण्यात असतो. बडबड करा. कंटाळवाणे होऊ नका. वयाला विसरा मजा करत रहा.

विश्वास ठेवा की तुमचे मन जर नेहमी आनंदी असेल तरच आपण नेहमी निरोगी राहू.

 Dont worry 

 Be happy

मित्र श्रीमंत किंवा गरीब नसतो, मित्र शिकलेला असावा असे काही नसते.  मित्र अडाणी पण चालतो …..  

कारण मित्र हा मित्रच असतो। 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार # 250 ☆ कथा-कहानी ☆ मातमपुर्सी ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कहानी – मातमपुर्सी⇒⇒⇒। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 250 ☆

☆ कथा-कहानी ☆ मातमपुर्सी 

वह चौंका देने वाली खबर जब मुर्तज़ा ने मुझे सुनायी तब मैं तख़्त पर  पसरा, मुन्नी की जांच कराने मेडिकल कॉलेज जाने के लिए छुट्टी लेने की बात सोच रहा था।

घर में घुसते ही उसने बड़े संजीदा स्वर में कहा, ‘सुना तुमने? वर्मा की मौत हो गयी।’

सुनकर मैं हड़बड़ा कर उठ बैठा, पूछा, ‘क्या?’

उसने बताया कि वर्मा को आठ दस दिन पहले किसी पुराने तार की खराश लग गयी थी, उसी से उसको टेटनस हो गया था। कल रात से उसकी तबियत बिगड़ी और सवेरे पाँच बजे सब ख़त्म हो गया।

सुनते सुनते मेरा ‘शॉक’ घुलने लगा। शीघ्र ही मैं प्रकृतिस्थ हो गया। मन में कहीं सुखद अहसास दौड़ गया कि छुट्टी लेने से बच गया।

मैंने मुर्तज़ा से पूछा कि क्या वह वर्मा के घर पहुँच रहा है। मुर्तज़ा ने बताया कि वह देर से पहुँच पाएगा। अपने बच्चे के सरकारी स्कूल में एडमीशन के लिए उसे एक स्थानीय नेता से सिफारिश के सिलसिले में मिलना था।

मुर्तज़ा के जाने के बाद पत्नी ने पूछा, ‘कहाँ जा रहे हो?’

मैंने नाटकीय गंभीरता से कोट के  बटन बन्द करते-करते कहा, ‘वर्मा खत्म हो गया।’

फिर मैं उसके ‘हाय’ कहकर मुँह पर हाथ रखने और स्तंभित हो जाने का आनन्द लेता रहा।

‘कितने बच्चे हैं उनके?’, उसने पूछा।

‘दो छोटे बच्चे हैं’, मैंने उसी बनावटी गंभीरता से कहा।

उसने ‘च च’ किया।

‘तो अब दाह करके ही लौटोगे क्या?’, उसने पूछा।

मैंने कहा, ‘जल्दी आ जाऊँगा। श्मशान नहीं जाऊँगा। मेडिकल कॉलेज भी तो जाना है।’

बाहर निकला तो शरीर पर सवेरे की धूप का स्पर्श बड़ा सुखद लगा। वर्मा का मकान मेरे घर से ज़्यादा दूर नहीं है।

रास्ते में तिवारी दादा मिल गये। उनके प्रश्न के उत्तर में मैंने बताया कि मेरे सहयोगी वर्मा की मृत्यु हो गयी है।

‘अरे!’, दादा के मुँह से निकला। मृत्यु का कारण जान लेने के बाद उन्होंने कहा, ‘बहुत बुरा हुआ।’

मैं उनसे विदा लेकर आगे बढ़ा ही था कि लगा वे मुझे पुकार रहे हैं। मैंने घूमकर देखा तो वे सचमुच रुके हुए थे। मैं उनके पास गया।

वे परेशानी के स्वर में बोले, ‘सुनो, मुझे कभी अपने वैद्य जी के पास ले चलो न। तीन महीने से पेट में बहुत गैस बनती है। भूख नहीं लगती। मुँह में खट्टा पानी आता है। पेट भी साफ नहीं रहता। बड़ी तकलीफ रहती है।’

मैंने उन्हें आश्वस्त किया कि उन्हें ज़रूर ले जाऊँगा।

वर्मा के यहाँ पहुँच कर लगा कि अभी देर-दार है। सामान जुटाया जा रहा था। वर्मा के भाई से सहानुभूति जता कर मैं सामने वाले बंगले के गेट के पास धूप में खड़ा हो गया।

बंगले के निवासी एक सज्जन और उनकी पत्नी भी गेट के पास खड़े होकर सामने का दृश्य देख रहे थे। वे बोलचाल से पंजाबी लग रहे थे। महिला शिकायती लहज़े में पति से कह रही थी— ‘जाने किस बुरी घड़ी में इस मकान में आये थे। एक महीने में मोहल्ले में तीन-तीन मौतें देख चुकी हूँ। इससे तो सराफा वाला मकान अच्छा था। तुम्हीं तो नेपियर टाउन के लिए आफत किये रहते थे।’

दफ्तर के लोग एक-एक कर पहुँच रहे थे। उपाध्याय मेरे पास आकर खड़ा हो गया। ‘बहुत बुरा हुआ’, वह बोला। थोड़ी देर रुक कर चिन्तित स्वर में बोला, ‘कहना तो न चाहिए, लेकिन अब वर्मा साहब वाली पोस्ट पर प्रमोशन का मेरा चांस है। लेकिन साहब नाखुश रहते हैं। देखो करते हैं या नहीं। आपसे साहब की बात हो तो सपोर्ट करिएगा।’

थोड़ी देर में साहब की कार भी आ गयी। दफ्तर के सब लोगों ने उन्हें घेर लिया। साहब जब तक उपस्थित रहे, सब लोग उनके इर्द-गिर्द ही सिमटे रहे। उनकी प्रत्येक जिज्ञासा का समाधान करने में एक दूसरे से स्पर्धा  करते रहे। साहब के आने से सबके चेहरे पर चमक आ गयी थी। जब तक साहब वहाँ रुके, वर्मा के शव से ज़्यादा वे सब के ध्यान का केन्द्र बने रहे। वे आधे घंटे बाद कार में बैठकर चले गये।

इस बीच मुर्तज़ा भी वहाँ पहुँच गया था। उसके चेहरे पर संतोष और निश्चिंतता का भाव था, जिससे लगता था उसका काम हो गया था।

शव के उठने की तैयारी हो रही थी। मैं बगल की एक कुलिया में घुसकर चुपचाप वहाँ से फूट लिया। देखा तो आगे आगे शेवड़े जा रहा था। वह भी मेरी तरह खिसक आया था।

मैंने आवाज़ देकर उसे रोका। पहले तो मैंने अपनी शर्म को ढकने के लिए उसे सफाई दी कि मेडिकल कॉलेज जाना ज़रूरी है, फिर उसके चले आने का कारण पूछा।

वह बोला, ‘यार क्या बताऊँ। घर में अनाज खत्म हो रहा है और बहुत से व्यापारी बतलाते हैं कि कल बोरे पर पन्द्रह-बीस रुपये कीमत बढ़ जाएगी। इसलिए सोचता हूँ आज कुछ लेकर डाल दूँ। इतवार तक तो जाने क्या हालत होगी।’

घर पहुँचने पर देखा कि साले साहब पधारे हुए थे। पत्नी प्रमुदित घूम रही थी। साले साहब ने बताया कि छोटी बहन की शादी एक माह बाद होने वाली थी, इसलिए वे दीदी को लेने आये थे। मुझे भी बाद में पहुँचना था। सुनकर मूड एकदम ‘ऑफ’ हो गया।

‘जल्दी नहा कर खाना खा लो’, पत्नी ने कहा।

भोजन के लिए बैठने पर देखा भाई के सत्कार के लिए पत्नी ने कई चीज़ें बना डाली थीं। भोजन बड़ा स्वादिष्ट था। खाते-खाते पत्नी के जाने की बात की कड़वाहट भूलने लगा।

हाथ धोते समय अचानक याद आया कि वर्मा की मृत्यु हो गयी है।

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ ≈ मॉरिशस से ≈ – दुश्मनी से परे – ☆ श्री रामदेव धुरंधर ☆

श्री रामदेव धुरंधर

(ई-अभिव्यक्ति में मॉरीशस के सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री रामदेव धुरंधर जी का हार्दिक स्वागत। आपकी रचनाओं में गिरमिटया बन कर गए भारतीय श्रमिकों की बदलती पीढ़ी और उनकी पीड़ा का जीवंत चित्रण होता हैं। आपकी कुछ चर्चित रचनाएँ – उपन्यास – चेहरों का आदमी, छोटी मछली बड़ी मछली, पूछो इस माटी से, बनते बिगड़ते रिश्ते, पथरीला सोना। कहानी संग्रह – विष-मंथन, जन्म की एक भूल, व्यंग्य संग्रह – कलजुगी धरम, चेहरों के झमेले, पापी स्वर्ग, बंदे आगे भी देख, लघुकथा संग्रह – चेहरे मेरे तुम्हारे, यात्रा साथ-साथ, एक धरती एक आकाश, आते-जाते लोग। आपको हिंदी सेवा के लिए सातवें विश्व हिंदी सम्मेलन सूरीनाम (2003) में सम्मानित किया गया। इसके अलावा आपको विश्व भाषा हिंदी सम्मान (विश्व हिंदी सचिवालय, 2013), साहित्य शिरोमणि सम्मान (मॉरिशस भारत अंतरराष्ट्रीय संगोष्ठी 2015), हिंदी विदेश प्रसार सम्मान (उ.प. हिंदी संस्थान लखनऊ, 2015), श्रीलाल शुक्ल इफको साहित्य सम्मान (जनवरी 2017) सहित कई सम्मान व पुरस्कार मिले हैं। हम श्री रामदेव  जी के चुनिन्दा साहित्य को ई अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों से समय समय पर साझा करने का प्रयास करेंगे। आज प्रस्तुत है  मारीशस में गरीब परिवार  में बेटी की शादी और सामजिक विडम्बनाओं पर आधारित लघुकथा दुश्मनी से परे।) 

~ मॉरिशस से ~

☆ कथा कहानी ☆ — दुश्मनी से परे — ☆ श्री रामदेव धुरंधर ☆

दो भाइयों में एक कुल्हाड़ी के कारण झगड़ा हुआ था। बाप दादे के जमाने से चली आ रही कुल्हाड़ी दोनों पाना चाहते थे जो कि असंभव था। दोनों की नोक झोंक के बीच पता नहीं कुल्हाड़ी कहाँ खो गई। अब दोनों एक दूसरे पर दो रुपए में कहीं बेच देने की तोहमत लगाते रहते थे। इस झगड़े के कारण दोनों ने मरनी जीनी बंद होने की शपथ ले ली थी। एक ही पैत्रिक जमीन पर दोनों के घर आमने सामने थे। सुबह कोशिश की जाने लगी सामने वाले दुश्मन भाई का मुँह न देखा जाए। दोनों पत्नियों और बच्चों ने तना तनी में अपना पूरा सहयोग दिया। बच्चे लड़ भी लेते थे और बड़े उन्हें दाद देते थे।

दोनों भाई अधेड़ उम्र के हुए। उनके बच्चे बड़े और पढ़े लिखे थे, लेकिन उन्हें सरकारी नौकरी मिलती नहीं थी। दोनों भाइयों को संदेह था जरूर अपना ही दुश्मन भाई दुश्मनी की इतनी लंबी लकीर खींच रहा है। ‘यह भाई’ या ‘वह भाई’ जा कर किसी मंत्री से कह देता होगा विरोधी दल के एजेंट के बच्चे हैं। दोनों ओर की लड़कियाँ बड़ी हो गई थीं, लेकिन उनकी शादी के लिए वर मिलते नहीं थे। बेटियों के मामले में दोनों भाइयों का आरोप था झूठ की आग लगा कर शादी की बात काटने वाला अपना ही दुश्मन भाई है।

एक रोज हुआ यह कि सुबह एक भाई इधर के घर से निकल कर और एक भाई उधर के घर से सामने आया।

एक ने पूछा — कैसे हो?

दूसरे ने प्यार से उत्तर दिया — ठीक हूँ।

दोनों ने एक दूसरे से कहा — दुबले होते जा रहे हो अपने स्वास्थ्य का ख्याल रखना।

कुछेक और बातें होने की प्रक्रिया में दोनों के बीच बातचीत का सूत्र बंध गया। अब दोनों रोज बातें करने लगे। पत्नियों और बच्चों ने दोनों की मिलनसारी देखी तो उन्हें भी जुड़ने का संबल आया। एक दो रोज के बीच पूरी दुश्मनी खत्म हो गई।

मिलनसारी का यह वरदान ही था कि दोनों ओर के एक – एक लड़के को सरकार में नौकर मिल गई। यही नहीं, देखते – देखते एक भाई की बेटी के लिए वर मिल गया। वर वालों ने आने का दिन दिया तो दोनों ओर के परिवार खुशी के इस मौके पर एक घर में जुटे। वर का एक मित्र साथ आया था। उसने वहीं दूसरे भाई की लड़की को पसंद कर लिया। यह तो सोने में सुगंध वाली बात हुई। रिश्तेदारों के जाते ही दोनों भाइयों ने सलाह कर ली दोनों बेटियों की शादी एक ही दिन और एक ही विवाह मंडप में करेंगे।

© श्री रामदेव धुरंधर

13 – 07 — 2024

संपर्क : रायल रोड, कारोलीन बेल एर, रिविएर सेचे, मोरिशस फोन : +230 5753 7057   ईमेल : [email protected]

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 249 – मन एव मनुष्याणां ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली कड़ी। ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

☆  संजय उवाच # 249 मन एव मनुष्याणां ?

‘मेरे शुरुआती दिनों में उसने मेरे साथ बुरा किया था। अब मेरा समय है। ऐसी हालत की है कि ज़िंदगी भर याद रखेगा।’…’मेरी सास ने मुझे बहुत हैरान-परेशान किया था। बहुत दुखी रही मैं। अब घर मेरे मुताबिक चलता है। एकदम सीधा कर दिया है मैंने।’…’उसने दो बात कही तो मैंने भी चार सुना दीं।’…आदि-आदि। सामान्य जीवन में असंख्य बार प्रयुक्त होते हैं ऐसे वाक्य।

यद्यपि  पात्र और परिस्थिति के अनुरूप हर बार प्रतिक्रिया भिन्न हो सकती है पर मनुष्य के मूल में मनन न हो तो मनुष्यता को लेकर चिंता का कारण बनता है।

मनुष्यता का सम्बंध मन में उठनेवाले भावों से है। मन के भाव ही बंधन या मुक्ति का मार्ग दिखाते हैं। कहा गया है,

मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः ।

मन ही सभी मनुष्यों के बन्धन एवं मोक्ष का प्रमुख कारण है।

वस्तुत: भीतर ही बसा है मोक्ष का एक संस्करण, उसे पाने के लिए, उसमें समाने के लिए मन को मनुष्यता में रमाये रखो। मनुष्यता, मनुष्य का प्रकृतिगत लक्षण है।प्रकृतिगत की रक्षा करना मनुष्य का स्वभाव होना चाहिए।

एक साधु नदी किनारे स्नान कर रहे थे। डुबकी लगाकर ज्यों ही सिर बाहर निकाला, देखते हैं कि एक बिच्छू बहे जा रहा है। साधु ने समय लगाये बिना अपनी हथेली पर बिच्छू को लेकर जल से निकालकर भूमि की ओर फेंकने का प्रयास किया। फेंकना तो दूर जैसे ही उन्होंने बिच्छू को स्पर्श किया, बिच्छू ने डंक मारा। साधु वेदना से बिलबिला गये, हथेली थर्रा गई, बिच्छू फिर पानी में बहने लगा। अपनी वेदना पर उन्होंने बिच्छू के जीवन को प्रधानता दी। पुनश्च बिच्छू को हथेली पर उठाया और क्षणांश में ही फिर डंक भोगा। बिच्छू फिर पानी में।…तीसरी बार प्रयास किया, परिणाम वही ढाक के तीन पात। किनारे पर स्नान कर रहा एक व्यक्ति बड़ी देर से घटना का अवलोकन कर रहा था। वह साधु से बोला, ” महाराज! क्यों इस पातकी को बचाने का प्रयास कर रहे हैं। आप बचाते हैं और यह काटता है। इस दुष्ट का तो स्वभाव ही डंक मारना है।” साधु उन्मुक्त हँसे, फिर बोले, ” यह बिच्छू होकर अपना स्वभाव नहीं छोड़ सकता तो मैं मनुष्य होकर अपना स्वभाव कैसे छोड़ दूँ?”…

लाओत्से का कथन है, “मैं अच्छे के लिए अच्छा हूँ, मैं बुरे के लिए भी अच्छा हूँ।” यही मनुष्यता का स्वभाव है। मनन कीजिएगा क्योंकि ‘मन एव मनुष्याणां…।’

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ आषाढ़ मास साधना ज्येष्ठ पूर्णिमा तदनुसार 21 जून से आरम्भ होकर गुरु पूर्णिमा तदनुसार 21 जुलाई तक चलेगी 🕉️

🕉️ इस साधना में  – 💥ॐ नमो भगवते वासुदेवाय। 💥 मंत्र का जप करना है। साधना के अंतिम सप्ताह में गुरुमंत्र भी जोड़ेंगे 🕉️

💥 ध्यानसाधना एवं आत्म-परिष्कार साधना भी साथ चलेंगी 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Anonymous litterateur of Social Media # 196 ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain (IN) Pravin Raghuvanshi, NM

? Anonymous Litterateur of Social Media # 196 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 196) ?

Captain Pravin Raghuvanshi NM—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad was involved in various Artificial and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’. He is also the English Editor for the web magazine www.e-abhivyakti.com

Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc.

Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi. He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper. The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.

हिंदी साहित्य – आलेख ☆ अंतर्राष्ट्रीय हिंदी सम्मेलन ☆ कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम्

In his Naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Awards and C-in-C Commendation. He has won many national and international awards.

He is also an IIM Ahmedabad alumnus.

His latest quest involves writing various books and translation work including over 100 Bollywood songs for various international forums as a mission for the enjoyment of the global viewers. Published various books and over 3000 poems, stories, blogs and other literary work at national and international level. Felicitated by numerous literary bodies..!

? English translation of Urdu poetry couplets of Anonymous litterateur of Social Media # 196 ?

☆☆☆☆☆

क्यूँ  कर  आरजू  करूँ  कि

तुम  मुझे  चाहोगे  उम्र  भर

इतना ही ऐतबार काफी है कि

ताउम्र भूल नहीं पाओगे तुम मुझे

☆☆

Why  should  I  desire that  you

must love me throughout the life

The trust that you won’t be able

to forget me lifelong, is enough

☆☆☆☆☆

तुझको ही फुरसत न थी

किसी फसाने को पढ़ने की

मैं  तो  बिकता ही  रहा  तेरे

शहर में किताबों  की  तरह…!

☆☆

You only had no time to  

to  read  any  parables…

Though I kept on selling

like books in your city…!

☆☆☆☆☆

कभी  उल्फत, तो  कभी नियत बदल  गई

खुदगर्ज जब हुए, तो फिर सीरत बदल गई

अपना  कुसूर, दूसरों  के  सर  पे डाल  कर

कुछ लोग सोचते हैं  कि हकीकत बदल गई

☆☆

By attributing  own  guilt

on someone else’s head

Some people  think that

the reality has changed…

☆☆☆☆☆

 कभी चुभ  जाती  है  बात

तो कभी तल्ख़ लहज़े  मारते  हैं

ये ज़िंदगी है, साहब! यहाँ गैरों से

कम, अपनों से  ज्यादा हारते हैं!

☆☆

Sometimes  the  words hurt  you,

Sometimes the tone agonizes you

This is the life, dear! Here we lose

More  to loved  ones than  outsiders!

☆☆☆☆☆

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares