मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सब घोडे बारा टक्के ! ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? कवितेचा उत्सव ?

सब घोडे बारा टक्के ! ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे☆

जितके बोके, तितके खोके

जितके डोके, तितके मोके

कोणी कट्टर, कोणी पंटर

कोणी मठ्ठ, कोणी सेटर

कोणी पडले, कोणी मधले

कोणी आपटले, कोणी सावरले

कोणी पक्के, कोणी फिक्के

सब घोडे बारा टक्के —-

त्याच त्याच, जुन्या घोषणा

तुम्हीच लढा, तुम्हीच मरा

जुन्या आशा, नवा जोश

जुन्या स्वप्नांना, नवा कोष

तुम्ही आमचे, करता करवते

आम्ही फक्त, आदर्श नेते

त्याच आमच्या, भूल – थापा

तुमच्या चरणी, आम्ही वाहता

जुने विसरुनी, मारता शिक्के

सब घोडे बारा टक्के —-

जिकडे सत्ता, तिकडे सरशी

जिकडे पैका, तिकडे वळशी

तुमचा चंदा, त्यांचा धंदा

तुमच्या गळी, त्यांचाच फंदा

पुन्हा पुन्हा, जुनाच स्वर

निवडुनी आणा आम्हां बरं

मारतात ते, चौके छक्के

सब घोडे बारा टक्के !—-

भातुकलीचा खेळ मांडला

अर्ध्यावरती डाव सांडला

पांढऱ्या खादीला हिरवा काठ

भगव्या झेंड्याला जातीचा शाप

मोकळा झाला तो रामलल्ला

हाताच्या साथीला अकबर अल्ला

धनुष्य बाण वेगळे झाले

घड्याळाचे काटे तुटले

बोलक्या मशालीत धग नव्हती

मुक्या तुतारीत हवाच नव्हती

इंजिनाच्या धुराने प्रदूषण वाढले

कमळाच्या कर्माने चिखलच केले

भांडत राहिले राजा राणी

प्रजेची मात्र अधुरी कहाणी

देतील अजुनी धक्के बुक्के

सब घोडे बारा टक्के —-

सब घोडे बारा टक्के

आपणच हे, ठरवू पक्के

आपले काम, आपण बरे

नका मानू, त्यांचे खरे

करा निश्चयी, स्व मना

देशविकास, हाच कणा

घेऊनी रिकीब आणि लगाम

घोडे दौडवू आपणच बेभान

आपलेच घोडे आपलेच टक्के

देशहितासाठी हेच करू पक्के

सब घोडे बारा टक्के !!!

सब घोडे बारा टक्के !!!!

 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘शाळेचा पहिला दिवस’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ ‘शाळेचा पहिला दिवस’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार मैत्रांनो!

आजच्या लेखाचा विषय भूतकाळातील मंतरलेल्या मोरपिशी दिवसांच्या रम्य आठवणींत गुंतवून टाकणारा! आठवतेय, उन्हाळी सुट्टीच्या एक एक क्षणाचा आनंद लुटून झाला. कधी मित्रमैत्रिणींबरोबर खेळ, गप्पा टप्पा, तर कधी मामाच्या गावाला जाणाऱ्या आगगाडीत सफर, झालंच तर एखाद्या रम्य ठिकाणी घालवलेले आनंददायी दिवस, अगदीच कांही नसेल तर भावंडांबरोबर घरीच राहून केलेली मजा अन लुटीपुटीची भांडणे! एक ना दोन! एक मात्र खरे, यांत ‘अभ्यास’ नामक गनिमाला अजिबात एन्ट्री नव्हती. हेच तर उन्हाळ्याच्या सुट्टीच्या सुखसागरात मनसोक्त पोहण्याचे गमक आणि ‘गमभन’ होते.

बदलत्या काळानुसार या शाळेच्या उन्हाळी सुट्ट्यांचे तंत्र थोडे वेगळे झाले. अभ्यासक्रमानुसार (स्टेट, सी बी एस इ अथवा आय सी एस इ इत्यादी) सुट्यांचे वेळापत्रक अन शाळा सुरु होण्याची तारीख थोडीफार वेगळी झाली. मात्र त्यातला आत्मा अबाधितच राहिला आहे हे महत्वाचे! इयत्तेनुसार या पहिल्या दिवसाचे स्वागत करण्याचे मुलांचे अन पालकांचे वेगळे गणित असते. नर्सरी अन के जी वगैरेत जाणाऱ्या चिमुकल्या मुलांचे बहुदा रडणे जास्त कॉमन, शाळेत जातांना गोड हसत आईला निरोप देणारे गोजिरवाणे बाळ फक्त टी व्ही वर असते असे मला वाटते. आईच्या पदराला (किंवा ओढणीला) गच्च पकडत ‘मी नाही जात’ असा घोष करीत मूल शाळेच्या ‘मावशीबरोबर’ एकदाचे आत जाते. अशा वेळेस आत्तापर्यंत मुश्किलीने रोखलेले अश्रू माऊलीच्या डोळ्यातून घळ घळ वाहायला लागतात.

कांही शाळांत (फक्त) ‘पहिल्या दिवशी’ गेट पासून तर वर्गापर्यंत मुख्याध्यापिकेपासून तर शिक्षक अन शिक्षिका दुतर्फा गुलाबाची फुले घेऊन मुलांचे स्वागत करायला अटेन्शन मध्ये उभे असतात. त्यांचे चित्रीकरण बऱ्याचदा आपण बघतो. मला हे बघून पोलिसांच्या ‘सौजन्य सप्ताहाची’ आठवण येते. यातला छुपा अजेंडा जाणती अन हुशार मुले लगेच ओळखतात. गुलाबाचे काटे उद्यापासून कसे अन केव्हां बोचकारणार याचा ते अंदाज घेत असतात. (शारीरिक इजा नाही बरे का, आता नियमावली नुसार ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’ हे सर्व कालातीत विचार समजावेत!)

 मुले शाळेत पहिल्या दिवशी जायला बहुदा इतकी उदासीन का असतात? घरी मुक्तपणे खेळणे, बागडणे, खाणे पिणे अन झोपेच्या वेळा इच्छेनुसार ठरवणे, झालेच तर मोबाईल, टीव्ही, मॉल, चित्रपट बघणे असे विस्कळीत अन बहुदा अनियोजित टाइमटेबल, या सर्वांची सवय मुलांना जर सुट्टीत सवय लागली तर शाळेकरता अचानक घड्याळाचे काटे उलटे फिरायला लागणारच. पहिल्याच दिवशी उशीर नको म्हणून आईचा उठ रे बाळा/ उठ ग राणी असा (सुरुवातीला) मधाळ तगादा सुरु होतो. अन मग त्यापुढे सर्व रुटीन! ‘काय कटकट आहे!’ हा ऍटिट्यूड घेऊन शाळेच्या प्रथम दिवसाचे स्वागत कां होते मुलांकडून? हा विचार मला नेहमी व्यथित करतो. या उलट शाळेच्या प्रथम दिनाची मोजकी मुले वाट पाहत असतात. वरच्या इयत्तेत गेल्याचा अपरिमित आनंद असतो, चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले असल्यास हा आनंद अभिमानाने उजळून निघालेला असतो. सक्काळी सक्काळी लवकर शाळेचा नवा कोरा युनिफॉर्म (वयाबरोबर उंची वाढल्याने नवा युनिफॉर्म अत्यावश्यक असतोच), वर्षभर वापरून झालेले जोडे, दप्तर, कंपास, वॉटर बॅग इत्यादी नव्या दिवसाचे स्वागत करायला कसे चालतील? तेही नवे कोरेच हवेत! मंडळी या नव्या आयटम्सच्या गर्दीत कव्हर घातलेली नवथर सुगंधाने रसरसलेली नवीन वर्षाची पुस्तके यांच्याहून अधिक रोमांचक काय असू शकते बरे?

जर इयत्ता बदलली तर यासोबत अनोळखी वर्गमित्र, वर्गशिक्षिका, नवीन वर्ग आणि नवीन बसायची जागा! मुले हे सगळे हळू हळू अनुभवायला लागतात अन मग त्यातील ‘गंमत जंमत’ मजेने स्वीकारायला लागतात. सर्वात मुख्य म्हणजे शाळेचा पहिला दिवस सगळीकडे ‘ओरिएंटेशन’ (अभिमुखता) चा असतो. त्या दिवशी फक्त सर्व नवीन गोष्टींची पहिली ओळख करून देणे हे शिक्षकांचे महत्वाचे कार्य असते.

शाळेतील अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ‘मधल्या सुट्टीतील डब्बा’! प्रत्येक मुलाच्या डब्यात कांहीतरी वेगळे असते, मला वाटते मुलांच्या सर्वांगीण आरोग्याचा विचार केला तर ‘भाजी पोळी’ ला पर्याय नाही. रोज वेगवेगळ्या पौष्टिक भाज्या दिल्या तर मुलांना त्या खाण्याची सवय लागते. या बाबतीत एक आठवले, आमच्या लहानपणी डब्यात रोज सुक्की बटाटा भाजी असायची. इतर भाज्यांच्या आवडीबद्दल आम्हा भावंडांचे कधीच एकमत व्हायचे नाही. कधी काचऱ्या, कधी खूप कांदे घालून, तर कधी फक्त मिरचीची फोडणी देऊन उकडलेल्या बटाट्यांची भाजी इतकीच व्हेरायटी असायची. मात्र आई याची भरपाई रात्रीच्या जेवणात वेगवेगळ्या भाज्या खायला घालून करीत असे. गंमत अशी की बहुदा सर्वांच्या डब्ब्यात बटाटा असूनही प्रत्येक बट्टूची चव मात्र निराळी असे. आजकाल आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या मुलांच्या डब्यात काय काय व्हरायटी असते हा स्वतंत्र लेखनाचा विषय ठरावा. मात्र मुलांची शारीरिक आणि मानसिकरित्या जोमाने जोपासना करायची असेल तर आईने ‘मधल्या सुट्टीचा जेवणाचा डब्बा’ याविषयी आहारतज्ञाच्या भूमिकेत जाऊन ‘इष्ट भोजन’ रांधण्याची गरज नक्कीच आहे.

एक बदल निश्चितच जाणवतो, तो म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते! आमच्या लहानपणी प्रायमरी शाळेत एकच शिक्षक किंवा शिक्षिका वर्षभर सर्व विषय शिकवत असत. त्यांना अभ्यासाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांची समग्र माहिती असायची, एक सुंदर भावनिक नाते गुंफले जायचे. पुढील वर्षीच्या पहिल्या दिवशीच जर ते शिक्षक वर्गावर नसतील तर विद्यार्थ्यांना चुकल्या चुकल्यासारखे वाटायचे. आता मात्र विषयानुसार तेच शिक्षक पुढील वर्षी भेटत राहतात. इमोशनल बॉण्डिंगचे प्रमाण कमी झालेले वाटत असले तरी, मायेचा ओलावा अजूनही निश्चितच टिकून आहे असे मला वाटते. एक सुचवावेसे वाटते. पालकांनी आपल्या मुलाचा/ मुलीचा मागील वर्षीचा धडधाकट असलेला गणवेश, पुस्तके आणि शाळेला लागणाऱ्या इतर वस्तू नुसत्याच फेकून न देता गरजू मुलांना द्याव्यात. यासाठी डोळस नजरेने बघितले तर, ही गरजवंत मुले आपल्या आसपासच आढळतील, अथवा अशा कामात हातभार लावणाऱ्या समाजसेवी संस्था देखील उपलब्ध आहेत. हे समाधान आगळे वेगळे असते.

मंडळी, हा शाळेचा पहिला दिवस अगदी नवसंजीवनी दिल्यासारखा पालकांनाच नव्हे तर, प्रत्येकाला सुखदायी वाटतो. जून महिना असला तरी वसंत ऋतू असल्याचा भास होतो. वेगवेगळ्या वयाच्या अन विविध रंगांच्या नव्या कोऱ्या गणवेशात, नवे दप्तर, नवी पुस्तके, नवा कंपास, नवी वॉटरबॅग अन डबे यांच्या जामानिम्याने नवथर उत्साहाने सळसळत बागडणारी गोड गोजिरी मुले शाळेच्या बस मध्ये, रिक्षात किंवा पायी जात असतात. मित्र मैत्रिणींसोबत त्यांची ‘मन उधाण वाऱ्याचे’ अशी अवस्था होत असते. कधी तर जिवलग मैत्रिणीसोबत ‘गमाडि गंमत जमाडि जंमत ये ग ये सांगते कानांत’ असे प्रायव्हेट संभाषण सुरु असते. मग त्यांचे आल्हाददायी बोलणं अन किंचाळत केलेला कल्ला देखील पक्षांच्या कलरवासारखंच मधुर वाटत असतं. जणू कालपावेतो उन्हाने कोमेजून गेलेल्या बागेत आज अवचित नवचैतन्य आलंय, वृक्षवेलींना नवीन पालवी फुटलीय अन रंगीबेरंगी फुलांचे उमलले आहेत, त्यांच्या सुगंधाने अख्खी बाग मोहरून गेलीय असे जाणवते. मैत्रांनो, चला तर मग बिगी बिगी! आपण देखील ‘मातीला सुगंध फुलांचा’ या परिपाठाप्रमाणे या नवोन्मेषात ‘शाळेचा पहिला दिवस’ साजरा करीत आपल्या बालपणात हरवून जाऊ या!

धन्यवाद!

डॉ. मीना श्रीवास्तव

मोबाईल- ९९२०१६७२११

टीप- एका समूहगीताची लिंक जोडत आहे.

 

‘आनंदाची शाळा आमुची आनंदाची शाळा’ (स्वाध्याय)

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “अशीच श्यामल वेळ..सख्या रे…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“अशीच श्यामल वेळ..सख्या रे…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

.”.. तुमची काही हरकत नसेल तर इथे या बाकड्यावर थोडावेळ बसावं म्हणतो.!”..

..”. मगं बसा की!.. माझी कसली हरकत आली आहे.?. या बागेतला बाक तर सार्वजनिक आहे… कोणीपण बसू शकतो त्याला हवा तेवढा वेळ… मात्र बाक आधीच पूर्ण भरलेला असेल तर मग बसायला मिळायचं नाही बरं… आणि मी तर या बाकावर एकटीच बसलेली आहे.. तसा बाकीचा बाक मोकळाच आहे की!… “

.”..  एक विचारु,मी तुम्हांला रोज या वेळेला इथं असचं या बाकावरं एकटचं बसलेलं पाहत आलेलो आहे… त्यावेळी मी मागे तिकडे झाडाजवळ  उभा राहून संध्याकाळची शोभा पाहता पाहता या शोभेकडे कसे डोळे खिळले जातात तेच कळेनासं होतं… अगदी अंधार पडू लागला की तुम्ही उठून जाईपर्यंत हि नजर मागे पर्यंत वळत जाते… “

.”.. माझा काय पाठलाग करत असता कीञ काय या वयात देखील?… शोभतं का तुम्हाला असलं वागणं.?.. आणि माझं नावं शोभा आहे हे कसं शोधून काढलतं तुम्ही?… हेरगिरी वगेरे नोकरीपेशा तर करत नव्हता ना रिटायर्ड होण्याआधी… “

.”.. वा तुम्ही सुद्धा कमी हुशार नाहीत बरं.!.. मी पूर्वी काय करत होतो हे बरोबर ओळखलतं… बायका मुळीच जात्या हुशार असतात हे काही खोटं नाही.!.. “

..”. तुम्हाला ही  बाग फार आवडते असं दिसतयं… नेहमी संध्याकाळी इथं जेव्हा येता तेव्हा माझी आणि तुमची येण्याची वेळ कशी अगदी ठरवल्याप्रमाणे  जुळते… “

.”.. मला देखील ते लक्षात आलयं बरं.!. पण मी काही ते चेहऱ्यावर माझ्या दाखवून दिलं नाही!… उगाच परक्या माणसाला गैरसमज व्हायचा… आणि आणि… “

…” आणि आणि काय.?.. “

“.. न.. नको.. नाहीच ते!.. काय बोलून दाखवयाचं ते!…तुम्हाला म्हणून  सांगते या बागेशी माझं नातं खूप खूप जुनं आहे… ही  संबंध बाग माझ्या ओळखीची आहे… इथं खाली तळ्याजवळ गणपतीचं सुंदर मंदिर आहे… संध्याकाळच्या वेळी आरतीला वाजणारी किण किण झांज तो घंटानाद ऐकू येतो तेव्हा आपलं मन तल्लीन होऊन जातं… अगदी स्वतःला विसरून जायला होतं… . पण सात वाजले कि बागेचा रखवालदार कर्कश शिट्या मारून सगळ्यांना बाहेर जायला भाग पडतो… आणि तसं घरी आईनं पण ताकीद केलेली असायची कुठल्याही परिस्थितीत संध्याकाळी सात च्या आत घरात आलचं पाहिजे म्हणून… मग त्या भीतीनं पावलं झपझप टाकत घरी जाणं व्हायचं… जी लग्नाच्या आधी शिस्त तिनं लावली ती लग्नानंतरही तशीच पाळली गेली… तेव्हा आई होती आता सासूबाई आहेत.. एव्हढाच फरक… “

“… बस्स एव्हढाच फरक.!. आणखी काही फरक पडलाच नाही!

… त्यावेळी कुणाची तरी वाट पाहणे होत असेलच की.. मग कधीतरी नेहमीपेक्षा जास्त उशीर झाला असणारं की.. आईची बोलणी खावी लागली असतील… चवथीच्या चंद्राची कोर खिडकीतून डोकावून बघत असताना… आईला संशय आला असेल…  मग घरच्यांना त्या चंद्राचा शोध लागला… आणि ही चंद्राची शोभेची पाठवणी केली असचं ना! “

… ” माझ्या देखील अशाच आठवणी आहेत… आणि इथं आल्यावर त्या एकेक उलगडत जातात…”

… ” काय सांगतायं अगदी सेम टू सेम… म्हणजे पाडगांवकर म्हणतात तसं प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं.. अगदी तसचं की  हे…

बरं झालं बाई तुमची या निमित्ताने ओळख  झाली…अंधार पडायला लागला..आणि तो रखवालदार दुष्ट शिट्या मारतोय.. बाहेर निघा म्हणून… मग मी येऊ चंद्रशेखर… “

..” शोभा काय हे.. किती छान रंगला होता खेळ.. कशाला मधेच घाई केलीस खेळ थांबविण्याची.. .  तुझं नेहमीच असं असतं जरा म्हणून कल्पेनेत वावरायचं नाही.. सदानकदा वास्तवात राहणारी तू… “

” पूरे चंद्र शेखर.. घरी सुना नातवंड आहेत आपल्या.. त्यांना विसरून कसं चालेल… आपला आजचा खेळ परत उद्या यावेळेला पुढे सुरू करुया… “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन लघुकथा — रमा / मेसेज ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ दोन लघुकथा — रमा / मेसेज ☆ श्री मंगेश मधुकर 

(१) रमा

तीन महिन्यांपूर्वी दोघांची लग्न जमवणाऱ्या साइटवर ओळख झाली.प्रोफाइल आवडल्यानं तिनं पुढाकार घेतला.व्हरच्युल भेटी,मेसेजेस सुरू झाले.गप्पा मारताना इंटरेस्ट निर्माण झाला.हळूहळू एकमेकात गुंतत होते आणि प्रत्यक्ष भेटल्यावर प्रेमात पडले.त्यानंतर नियमित भेटीगाठीचं नवीन रुटीन सुरू झालं.दोघं नेहमीच्या हॉटेलमध्ये भेटले.

“एक दिवस भेटलो नाही तर करमत नाही.आता एकटं रहावत नाही.”

“पुढ बोलू नकोस.सेम हिअर”ती लाजली. 

“क्या बात है.लाजताना खूप सुंदर दिसतेस.”हनवटीवर हात ठेवून एकटक पाहत तो म्हणाला.

“असं का पाहतोयेस”

“जगातला सर्वात सुंदर लाजणारा चेहरा”

“बास,मुद्दयाचं बोल.”ती लाडीकपणे म्हणाली.

“थोडावेळ थांबायचं ना.मस्त स्वप्नांच्या दुनियेत होतो.धाडकन जमिनीवर आणलसं”

“बोल ना.पुढे काय” 

“माझ्याशी लग्न करशील”गुलाबाचं फुल पुढे करत तो म्हणाला तेव्हा ती पुन्हा लाजली. 

“जमाना कितीही मॉडर्न होऊ दे.‘लाजणं’ अजूनही वेड लावतचं.”

“आज आई-बाबांना आपल्या लग्नाविषयी सांगते.” 

“मी पण डॅडींशी बोलतो.तसंही आपले फोन सारखे चालू असतात यावरून सगळ्यांना कल्पना आलीय.”

“आमच्याकडेही तीच परिस्थिती आहे.जावई पसंत आहे.”

“तुझा फोटो दाखवला तेव्हाच ममीनं सूनबाईना पसंत केली.” 

पुन्हा भेटल्यावर तो म्हणाला “रविवारी पुढची बोलणी करायला घरी येतो.चालेल ना.”

“पळेल.”

“अजून एक महत्वाचं”

“रमा की रीमा”

“म्हणजे.समजलं नाही”ती गोंधळली. 

“तुला कोणतं नाव आवडतं”

“अर्थात माझंच”

“तसं नाही गं.रमा की रीमा”

“रमा,मस्तयं”

“ठरलं मग,‘रमा’ हेच लग्नानंतर तुझं नाव.” तो उत्साहानं म्हणाला पण तिचा चेहरा पडला.

“म्हणजे माझं नाव बदलणार” तिनं नाराजीनं  विचारलं.”

“हो.”

“का”

“सगळेच असं करतात.”

“माझंच का तुझं नाव बदल की..” 

“जोक करतेस”तो मोठमोठ्यानं हसायला लागला.

“सुरवात तू केलीस”

“लग्नानंतर मुलींची नाव बदलतात.तशी पद्धत आहे.”

“ऐक ना.एकतर अशी पद्धत बिद्धत काहीही नाहीये आणि जरी असलीच तरी माझं नाव बदलायचं नाही”

“असं कसं!!,उगीच नको तो हट्ट करू नकोस.”

“माझं नाव मला खूप आवडतं.काहीही झालं तरी ते बदलू देणार नाही”

“हे बघ.फालतू विषय ताणू नकोस.” 

“जन्मापासून सोबत असलेलं नाव बदलणं ही गोष्ट तुझ्यासाठी फालतू असेल पण माझ्यासाठी नाही.नाव बदलणं म्हणजे आतापर्यंतची ओळख पुसून टाकणं.यामागची वेदना तुला समजणार नाही आणि तसंही माझ्या परवानगी शिवाय हा निर्णय तू घेऊ शकत नाहीस.”तिच्या बोलण्यानं तो चिडला. 

“‘रमा’ हे नाव फायनल.आता यावर चर्चा नाही”

“मी नाव बदलणार नाही.”

“विनाकारण इश्यू करतीयेस.लग्नानंतर मुलींचं नाव बदलणं हे फार कॉमनयं.” 

“नाव न बदलणाऱ्यासुद्धा खूप जणी आहेत आणि हा निर्णय पूर्णपणे मुलीच्या इच्छेवर आहे. त्यासाठी जबरदस्ती नको.तसंही माझं नाव बदललं नाही तर काही फरक पडणार नाही.”

“लोक काय म्हणतील”

“लोकांपेक्षा तू माझ्या मनाचा विचार करावा असं वाटतं.”

“विनाकारण वाद नको.”

“एकमेकांचे स्वभाव,विचार आवडले म्हणून लग्नाचा निर्णय घेतला तर आता तू………”

“वा रे वा.म्हणजे माझीच चूक.अजूनही सांगतो,विषय ताणू नकोस.आमच्या घराण्यात असलं काही चालणार नाही.”

“सोयीस्कर भूमिका घेताना त्याला प्रथा,परंपराचं नाव द्यायचं अन आमच्या घराण्यात वगैरेच्या फुशारक्या मारायच्या ही टिपिकल मेंटॅलीटीयं.”

“माझ्या बायकोचं नाव ‘रमा’ असेल हे फायनल..” 

“मी पण पुन्हा सांगते काहीही झालं तरी नाव बदलणार नाही.मान्य असेल तरच रविवारी या.नाहीतर.. ”

“काय!!!”तो जोरात ओरडला.

“ओरडू नकोस.शांतपणे विचार कर मग पुढचा निर्णय घेऊ”डोळे पुसत ती म्हणाली.पुढचे काही दिवस  अजिबात संपर्क नसल्याने त्यामुळे दोघंही प्रचंड अस्वस्थ होते.घरी कळल्यावर वडीलधाऱ्यांनी दोघांना समजावलं आणि मान्य होईल असा तोडगा काढला.मनातली काजळी दूर झाली.मनापासून प्रेम असल्यानं दोघांनीही आपापला हट्ट सोडला अन तीन महिन्यांपूर्वी ‘लग्न’ थाटामाटात पार पडलं.प्रेमाच्या सारीपटात आपल्या माणसासाठी केलेली तडजोड प्रेमाची लज्जत वाढवते.ती जिंकली पण तो सुद्धा हरला नाही. तिनं नाव बदललं नाही पण तो मात्र बायकोला ‘रमा” म्हणतो अन तिलाही ते आवडतं.

लेखक : मंगेश मधुकर     

==========================================================

(२) मेसेज

रोजच्याप्रमाणे नाश्ता करत असताना रेणू केक घेऊन आली.ते पाहून बाळूनं विचारलं 

“हे काय गं”

“बाबा, रिक्षा ड्रायव्हिंगला आज पंचवीस वर्षे झाली म्हणून सेलिब्रेशन..”

“कशाला उगीच खर्च..”

“पोरीची हौस आहे तर करू द्यात की…..”बायको. 

“पै न पै महत्वाचीय.अजून लेकीचं लग्न करायचयं.”केक कापत असतानाच राईड बुकिंगचा मेसेज आला.जवळचं पिकअप असल्यानं  बुकिंग कन्फर्म करून बाळू रिक्षा घेऊन निघाला.पहिल्या कस्टमरला सोडल्यानंतर लगेचच बुकिंग मिळत गेली.बाळू सलग ड्रायव्हिंग करत होता नंतर लांबचं भाडं नसल्यानं थांबावं लागलं.जवळच्या ठिकाणची होती म्हणून तीन बुकिंग बाळूनं नाकारली.अखेर मनासारखं लांबच्या ठिकाणचं बुकिंग आलं.कन्फर्म केल्यावर लगेच कस्टमरचा फोन “दादा,कुठं आहात.रिक्षा बुकिंग केलंय.येताय ना”

“पाच मिनिटांत पोचतो.ट्राफिकमध्ये आहे.”बाळू. 

“लवकर या ”कस्टमरनं फोन कट केला.पोचल्यावर बाळूनं फोन केला “सर,बिल्डिंगच्या गेटसमोर उभायं”

“ओके,आम्ही खाली येतोय परंतु पाच मिनिटं थांबावं लागेल.मिसेस तयारी करतीये.झालं की येतो”

बाळू वाट पाहत थांबला.दहा मिनिटांनी पुन्हा कस्टमरचा फोन “सो,सॉरी!!आमच्यामुळे तुम्हांला थांबांव लागतेय”

“जरा लवकर.”

“असं करा.बुकिंगप्रमाणे एकशे ऐंशी होतात.मी तुम्हांला दोनशे ऑनलाइन ट्रान्सफर करतो”

“त्याची गरज नाही.तुम्ही या” बाळू.

“दादा,आमच्यामुळे तुमचा बराच वेळ वाया गेला.मिसेसची आवराआवर अजून किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. म्हणून मी दोनशे रुपये पाठवलेत ते जमा झाले का तेव्हढं चेक करा.”बाळूच्या मोबाईलवर दोन हजार जमा झाल्याचा मेसेज आला होता. एवढे पैशे कशाचे? असा विचार डोक्यात असताना पुन्हा कस्टमरचा फोन आला. 

“साहेब आलात का?कुठे आहात”बाळूनं विचारलं.  

“अजून थोडा वेळ लागेल”

“तुम्ही भाड्याचे पैसे आधीच दिलेत तेव्हा नाईलाजये.या!!”

“दादा,एक घोळ झालाय..”

“आता काय झालं??”बाळू वैतागला.

“मी चुकून तुम्हांला दोन हजार पाठवलेत.”

“चुकून म्हणजे”

“अहो,दोनशेच्याऐवजी दोन हजार ट्रान्सफर झालेत.”

“मग”

“आम्ही येईपर्यंत मी पाठवलेले जास्तीचे पैसे परत पाठवा.प्लीज..”

“हंssम,बघतो.”

“पैसे जमा झाल्याचा मेसेज बघून खात्री करा मगच ट्रान्सफर करा”

“हा,मेसेज आलाय”

“गुड,आधी आठशे पाठवा ते मिळाले की पुढचे हजार पाठवा आणि पुन्हा एकदा सॉरी.खूप त्रास देतोय”

“जाऊ द्या.नुसतं सॉरी म्हणू नका.लवकर या.पैसे पाठवतो”कस्टमरनं सांगीतल्याप्रमाणे बाळूनं आधी आठशे मग एक हजार ट्रान्सफर केले.पैसे ट्रान्सफर केल्याचे सांगण्यासाठी कस्टमरला बाळूनं फोन केला तर लागला नाही.पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पण फोन बंदच येत होता.चालू असलेला फोन अचानक बंद झाल्यानं बाळूच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.बँकेत फोन केला तेव्हा समजलं की खात्यात जमा काहीच नाही मात्र अठराशे रुपये वजा झाले होते.गोड गोड बोलून कस्टमरनं केलेली फसवणूक लक्षात आल्यावर संतापलेला बाळू बिल्डिंगच्या आत गेला पण शोधणार कोणाला??फक्त कस्टमरचा मोबाईल नंबर होता आणि तोही बंद.थोडावेळ बिल्डिंगच्या इथं घुटमळून निराश,हताश आणि चिडलेला बाळू कष्टाचे पैसे गेल्यानं प्रचंड अस्वस्थ होता.डबल खात्री करण्यासाठी बँकेत गेला.मेसेज दाखवला पण बँकवाल्यांनी कानावर हात ठेवले.घडलेला प्रकार कळल्यावर बायकोनं कस्टमरला शिव्यांची लाखोली वाहिली आणि बाळूलाही अतिशहाणपणाबद्दल सुनावलं.

संध्याकाळी कामावरून आल्यावर वडलांना घरात पाहून रेणूला आश्चर्य वाटलं.“बाबा.आत्ता यावेळेला चक्क घरी!!”बाळू काहीच बोलला नाही पण पडलेल्या चेहऱ्यावरून काहीतरी घडल्याचं रेणूच्या लक्षात आलं.सगळी हकीकत समजल्यावर ती म्हणाली 

“जे झालं ते झालं.सोडून द्या.जास्त विचार करू नका”

“पैशा परी पैशे गेले वर फालतूचा डोक्याला त्रास..”

“आपण पोलिसांकडे जाऊ”

“तक्रार कोणाविरुद्ध द्यायची”

“सायबर सेलची मदत घेऊ” 

“नको.उगीच नसती लफडी नकोत.अठराशे रुपये अक्कलखाती जमा करून गप्प बसू”

“ हा फसवण्याचा नवीन प्रकार आहे. तक्रार करायलाच पाहिजे.मोबाईल नंबर आणि ज्या अकाऊंटला पैसे गेले असतील तिथून काहीतरी मिळेल.पोलिस मदत करतील.”

“एक कळत नाहीये.भामट्यानं पैसे पाठवले नाहीत मग दोन हजार जमा झाल्याचा मेसेज कसा काय आला”

“एकदम सोप्पंयं”

“आ!!काय बोलातियेस” बाळूला रेणूकडून असं उत्तर अपेक्षित नव्हतं.  

“मेसेज आल्यावर तुम्ही काय पाहिलं ”

“दोन हजार जमा झाले एवढंच”

“सर्रासपणे लोक किती पैसे जमा झाले एवढचं बघतात.कधी आले,कोणत्या खात्यावर जमा झाले हे तपासत नाही”

“आता मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला म्हणजे माझ्याच खात्यावर पैसे आले ना”बाळू. 

“तिथंच तर भामट्यानं चलाखी केली”

“त्याच्याकडचा दोन हजार जमा झाल्याचा जुना मेसेज पाठवला अन तुम्हाला वाटलं की…..,”

“असं फसवलं होय.माझ्या मूर्खपणामुळे नुकसान झालं” 

“बहुतेकजण असंच वागतात.मेसेज आल्यावर बँकेत किती क्रेडिट आणि डेबिट झाले एवढंच बघितलं जाते.अकाऊंट नंबर पाहीला जात नाही.सवयीचा परिणाम!!.”

“आता काय करायचं”

“आधी तक्रार करू आणि इथून पुढे पैशाचे व्यवहार काळजी घ्यायची.एवढी एकच गोष्ट आपण करू शकतो.” 

“फुकटचा अठराशेला बांबू….”

“जाऊ दया.त्यावर आता जास्त विचार करून स्वतःला त्रास देऊ नका” बराच वेळ बायको आणि लेकीनं समजावल्यावर बाळूची उलघाल कमी झाली तरी शेवटचा ट्राय म्हणून त्यानं पुन्हा एकदा त्या कस्टमरला फोन केला पण नंबर स्वीच ऑफ होता. तितक्यात मोबाईलवर नवीन मेसेज आला “अभिनंदन!!तुम्हाला पन्नास हजाराची लॉटरी लागली आहे.पैसे पाठविण्यासाठी सोबत दिलेली लिंक ओपन करून माहिती द्या”मेसेज वाचून बाळूनं कपाळावर हात मारला

— (सत्यकथेवर आधारित) 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ होय फुला !! ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

??

होय फुला !! ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

तुझ्या वासाने, आणि तुझ्या रंगकांतीने मी इकडे आलो, ओढावलो गेलो,  तुझ्या त्या मनमोहक रूपानी माझ्या मनास भुरळ घातली .  काय तुझा तो सुवास, तुझा तो रंग आणि परिमळ …. विधात्याने नक्कीच खुबीने तुला निर्माण केले असेल बरं ! तुझ्या ह्या मुलायम अंगकांतीने म्हण की , विलोभनीय रंगाने म्हण, मी पुरता तुझ्या प्रांगणात शिरलो .. . मी आत कसा घुसलो ते कळलंच नाही ..  केवढी ही जादू .. जी तुझ्या फक्त दिसण्यात आहे, रूपात आहे.. . तर मग मी अंतरंगात शिरलो तर काय होईल हे कळणारच नाही !

सुगंधाने एवढं मोहित होता येतं का रे  ? ते भ्रमरांना विचारावे लागेल , त्यांची पण माझ्यासारखीच गत होणार. 

मनुष्य काय किंवा भृंग काय, निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची, आकृष्ट होण्याची ओढ ही जन्मजातच ! बहुतेक आपण आकर्षित व्हावे म्हणूनच विधात्याचा हा खटाटोप नाही का ? भ्रमराने तरी कोणत्या फुलावर यावे, बसावे !  चुंबन घ्यावे !  हे त्याच्या प्राक्तनातच लिहिले असेल का ? कोणत्या फुलावर बसावे, त्याचा  कोणता रंग असावा, ते कोणत्या जातीचे असावे,  सुगन्ध कोणता असावा  ह्याला बन्धन तर नाही ना ! कोणतेही फूल भ्रमरास प्रिय आहे, त्याला कश्याचेच बंधन नाही , जातिपात तो मानत नाही…  क्षुद्र, श्रेष्ठ , उच्च कनिष्ठ, असा भेदभाव तरी त्याच्या मनात येत असेल का ?  मग मी तर साधा मानव प्राणी , सुगंधाने मला भुरळ पडणारच.  मन हे असंच रसायन आहे, असं नाही का वाटतं ?  जिथे निसर्ग आहे तिथे ते ओढ  घेतच. निसर्गसौंदर्याचा आस्वाद घ्यायला वय आड येतं का ? नाही ना ? मग मी तर साधा जीव …. 

कठीण लाकूड  पोखरणारा  भृंग मृदु, नाजूक अश्या कमलदलात .. त्याच्या पाशात अडकून पडतो. कमलदलं केव्हा मिटतात व तो केव्हा मृत होतो, ते त्याला ही कळत नाही …. असा का बरं हा निसर्ग 

नियम ! असे म्हणतात की फुलपाखरांचं मिलन झाल्यावर नर मरून जातो !  मादी तेवढीच जिवंत राहते. .. का ?  तर पुढील पिढी वाढविण्यासाठी. मग नर फुलपाखरांच्या नशिबी मरणच  का? कोणता निसर्ग नियम विधात्याने लावला?  त्यासाठीच का नराचा जन्म आहे , नेहमीच शमा-परवानाचे नियम का बरं असावे, हे माहीत असून देखील  नर हे कसं काय धाडस करतो? तर केवळ आंतरिक ओढ, माया जिव्हाळा,  प्रेम ! 

प्रेम हे असंच असतं का हो ? का मग दरीत उडी टाकायची …. षड्रिपु  हे निसर्गतःच सगळीकडे वास करतात का ?  अगदी फुलांच्या-पानांच्या -वेलीच्या -सौंदर्याच्या -सुगंधाच्या  ठाई !  पण त्यांचे अस्तित्व  आहे का ?  की विधात्याने विश्वमोहिनीचे रूप चराचर निसर्गात भरून ठेवलं आहे ? काळ्या कपारीतून थंडगार गोड पाण्याचा स्रोत, कुंडातून सतत ओसंडून वाहणारे थंड गार जलप्रवाह ! काही ठिकाणी गरम पाण्याचे कुंड. भूगर्भात असणारा तप्त लाव्हारस ….  काय काय बघायचे हे ! आकाश व सागर निळेच का !  सागराचे पाणी खारट का ?  सागराला जर तहान लागली तर त्यानी कुठं जायचं ? सरितेला सागराची ओढ का ?  अश्या अनेक गूढ प्रश्नांनी मन सैरभैर होते.

देवा तू आमच्यासाठी काय काय निर्माण केलेस व हे मोहिनी-तंत्र कशासाठी वापरलेस? वर धर्म अर्थ काम करून मोक्ष मिळवण्यासाठी का भाग पाडलेस ? मोक्ष आहे की नाही मला माहित नाही  पण ….  

पुनरपि जननं पुनरपी मरणं 

पुनरपि जननी जठरे शयनं ।। 

… हाच सिद्धांत मला भावतो कारण तुझं निसर्गरूप मला सतत पहावे वाटते. म्हणूनच ययातीही  पण स्वतःच्या मुलाकडून तरुणपण मिळवण्यासाठी मोहाच्या आहारी गेलाच ना ! 

हे सखी ..  दे दे मला ..  आज सर्व काही हवं आहे, जे जे असेल ते ते दे ! उधळण कर तुझ्या मृदु मुलायम  हाताने तुझ्या नक्षत्रांची, तुझ्या सुगंधाने मी बेधुंद झालो.  तुझ्या दरबारात कसलीच कमतरता नाही ,  तुझी पखरण अशीच चालू ठेव.  मला आज मनमुराद अमृत लुटवायचं आहे, कोठेही कमतरता नको. आस्वाद घेवू दे मला …तुझ्या पवित्र नक्षत्रांचा , मुलायम पाकळ्यांचा वेडापिसा होवून मला भ्रमर होवू दे,  मग मी जन्मभर तुझ्या सानिध्यात मृत झालो तरी चालेल ! कर खुली तुझी कवाडे ! सुगंधाची किंमत एवढी तरी किमान द्यावीच लागेल ना ! जन्मभर तुझ्या महिरपी मेघडंबरित विसावा घेण्याची तयारी आहे माझी . 

मला तुझे एकतर्फी प्रेम नको, बलात्कार पण नको, मला तुझे सौंदर्य विद्रूप पण करावयाचे नाही. 

तुझ्यातील  प्रेमभावनेचं शिंपण कर. तू जशी असशील तशी तू मला प्रिय आहेस, तुझ्या सुगंधानी

माती पण भिजेल. ओला होईल गंधित वारा.  हाच तर खरा निसर्ग नियम आहे .

विचार ..  खुशाल विचार त्या सर्व लतावेलींना , फुलांना, पानांना, त्याच्या सुगंधाना,  त्या पारिजातकाला विचार , आम्रकुसुमांना विचार, गुलाबाला विचार,  गुलबकावलीला विचार ! निसर्गत: जे अव्याहत चालत आले आहे, त्या कालपुरुषाला विचार, त्या चंद्र सूर्य तारे ग्रह यांना विचार ..  निसर्ग नियम ते कधी विसरले आहेत का ?  मग मी तरी का विसरु ! 

असेच विचार त्या ययातीच्या मनात आले असतील का ?  क्षणभंगुर वासनेचा विरक्त सोहळा, हाच मनुष्याला प्रिय आहे का ?  हे निसर्गदेवते हेच तुला पण अपेक्षित आहे का ? ह्यालाच जीवन म्हणतात का ?  

ययाती व्हायचं की संन्यासी, की ऋषी मुनी,  की मानव धर्माचा उद्धार करायचा, हे ज्याचं त्यानेच ठरवायचं. 

होय फुला हेच इंगित आहे का जीवनाचं ? तुझ्या परिमळ एवढी  प्रचंड उलथापालथ करतो, तुझ्या मनमोहक रूपाने तो भ्रमर असो वा फुलपाखरू .. त्या दोघांचंही रुपडं तुला भावतं का रे ?  

… हे ज्या त्या विविधरंगी फुलांनीच ठरवावं . मानवाला ह्या गोष्टीत ढवळाढवळ करण्याचा अधिकार कोणी दिला ?  

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ९ — राज विद्या राज गुह्यः योग — (श्लोक २१ ते ३४) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ९ — राज विद्या राज गुह्यः योग — (श्लोक २१ ते ३४) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालंक्षीणे पुण्य मर्त्यलोकं विशन्ति ।

एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥२१॥

*

भोगत स्वर्गलोकासी जोवरी पुण्य संचयात

लय होताचि पुण्याचा  परतुनी भूवरी  येत 

सकामकर्मी पालनकर्ते आचरण त्रिवेदांचे

भोगलालसीयांच्या पदरी फल द्यु-मृत्युलोकाचे॥२१॥

*

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।

तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌ ॥२२॥

*

अनन्यभावे चिंतन करुनी  जो मजला भजतो

योगक्षेम त्याचा धुरा घेउनी मीच सांभाळतो ॥२२॥

*

येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः ।

तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम्‌ ॥२३॥

*

श्रद्धेने जे भजती पार्था अन्य देवतांना

नसेल जरी ती विधिपूर्वक ममही आराधना ॥२३॥

*

अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च ।

न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते ॥२४॥

*

मीच भोक्ता मीच दाता स्वामी सर्व यज्ञांचा

या तत्वा जाणे ना त्या ना लाभ मम प्राप्तीचा ॥२४॥

*

यान्ति देवव्रता देवान्पितृन्यान्ति पितृव्रताः ।

भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्‌ ॥२५॥

*

पितरांसी पूजिताती त्या प्राप्त पितृलोक

भूतांसी पूजिताती त्या प्राप्त भूतलोक

देवांना पूजिताती त्या प्राप्त देवलोक

मम पूजिता प्राप्त मम परमात्मस्वरूप ॥२५॥

*

पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।

तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥२६॥

*

भक्तीने अर्पिले पत्र सुमन जल जे ही मजला

समस्त अर्पण स्वीकारुन मी वृद्धिंगत मम तोषाला ॥२६॥

*

यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्‌ ।

यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्‌ ॥२७॥

*

भक्षण करिशी हवन करिशी कर्म तुझे नी दान

तपस्या तुझी हे कौंतेया करी रे मजला समर्पण ॥२७॥

*

शुभाशुभफलैरेवं मोक्ष्य से कर्मबंधनैः ।

सन्न्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥२८॥

*

आचरणासी अशा आचरी जीवनात सर्वदा

मुक्त होउनी कर्म बंधने शुभ अथवा अशुभा

कर्मफलांच्या सन्यासाने होशील तू युक्तात्मा

मुक्त होउनी पावशील मज होशील परमात्मा ॥२८॥

*

समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ।

ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्‌ ॥२९॥

*

प्रिय ना अप्रिय कोणी सारे समान मजला असती

त्यांच्या ठायी मी माझ्या हृदयी जे भक्ती अर्पिती ॥२९॥

*

अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक्‌ ।

साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥३०॥

*

दुराचारी मम भक्तीमध्ये अनन्य जर जाहला

साधु तयालाही जाणावे मम भक्तीते रमला ॥३०॥

*

क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति ।

कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति ॥३१॥

*

मम भक्ता ना अधोगती शाश्वत शांती प्राप्ती

धर्मात्मा होई तो सत्वर जाण माझी उक्ती ॥३१॥

*

मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्यु पापयोनयः ।

स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्‌ ॥३२॥

*

नारी वैश्य शूद्र अन्य नीचकुल तरी पावती परमपदाला

अनन्य भावे होतील समर्पण जर ते पावन मम पदाला ॥३२॥

*

किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा ।

अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम्‌ ॥३‌३॥

*

पुण्यशील द्विज वा राजर्षी मम भक्त

तयांसी सहजी होय सद्गती मोक्ष प्राप्त ॥३३॥

*

मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।

मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायण: ॥ ३४॥

*

भक्त होउनिया माझा  करी रे माझे पूजन  

निरुद्ध करुनी तव चित्ता मज करी रे नमन 

मजठायी होऊन परायण करिता योगक्षेम 

विलीन होशिल माझ्या ठायी मोक्षाचे वर्म  ॥३४॥

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्री कृष्णार्जुनसंवादे राजविद्यायोगो नाम नवमोऽध्यायः ॥९॥

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी राजविद्यायोग नामे निशिकान्त भावानुवादित नवमोऽध्याय संपूर्ण॥९॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ’गिली’ सूट ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

गिली’ सूट ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

त्या भयाण वाळवंटात नजर जाईल तिथवर फक्त क्षितिजाला स्पर्श करणारी तापली वाळूच दिसत होती. आणि याच वाळूत तो मागील सोळा तासांपासून पालथा पडून आहे. त्याचे डोळे मात्र त्याच्या रायफलच्या नळीवरल्या दुर्बिणीमधून सतत समोर काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करताहेत. पापणी लवण्याच्या दरम्यानचा काळही त्याला नकोसा आहे. त्याच्या समोर शंभरेक मीटर्स अंतरावर एक पडकी भिंत आहे. त्या भिंतीच्या पलीकडे काय याचा त्याला अंदाज नसला तरी भिंतीच्या शेजारी आडोशाला आपल्या सारखीच रायफल,आपल्यासारखीच दुर्बिण डोळ्यांना लावून कुणीतरी आपल्याकडेच पहात आहे गेल्या सोळा तासांपासून याची त्याला स्पष्ट जाणिव आहे. या सोळा तासांच्या मध्ये एक संपूर्ण रात्रही संपून गेली आहे. पण याला जराही हालचाल करण्याची परवानगी नाही…कारण जराशी हालचाल म्हणजे शरीराची हालचाल कायमची संपून जाण्याची नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव दशांश टक्के खात्री…बाकी एक दशांश म्हणजे नशीब! 

या गेल्या सोळा तासांमध्ये त्याच्या आजूबाजूला त्याचेच साथीदार असेच दूर कुठेतरी त्यांच्या त्यांच्या निशाण्यांकडे अक्षरश: डोळे लावून बसलेले असतीलही कदाचित. पण युद्धाच्या धुमश्चक्रीत इतकी चौकशी करीत बसायला वेळ आणि गरजही नव्हती म्हणा! याला एक लक्ष्य दिलं गेलं होतं…ते भेदायचं आणि पुन्हा शांतपणेच नव्हे तर अगदी पाषाणासारखं पडून रहायचं होतं..दुसरं लक्ष्य दिलं जाईल तोवर. 

भिंतीपाशी कुठलीही हालचाल नव्हती गेल्या सोळा तासांपासून. आणि हे तास आता वाढतच चालले होते बेटे! तसं त्याला प्रशिक्षण आणि सराव होता कित्येक तास खरं तर दिवस एकाच जागी लपून बसायचा..त्याला छद्मावरण म्हणतात. म्हणजे जिथे आपण आहोत तिथल्या जमिनीशी,मातीशी,झाडांशी पूर्णपणे एकरूप होऊन जायचं. झाडं तरी हलू डुलू शकतात….पण यांच्याबाबतीत हालचाल म्हणजे मृत्यूला मिठी…स्वत: होऊन मारलेली मिठी! 

असेच आणखी चार तास निघून गेले. कोण कशाला इतका वेळ लपून बसेल आपल्यावर गोळी डागायला? आणि तिकडून गोळी आलीच तर त्याचाच ठावठिकाणा नाही का लागणार आपल्या माणसांना? गोळी उडाली की ठिणगी उडतेच की…किमान धूर तरी दिसतोच दिसतो! शेवटी मनाचा खेळ! संयमाचा खेळ! जो हलला तो संपला या खेळात! आणखी साडेतीन तास गेले. एकूण साडेतेवीस तास उलटून गेलेत…हा खरा एलेव्हन्थ अवर सुरु आहे म्हणायचा. तो स्वत:शीच पुटपुटला आणि त्याने दुर्बिणीला लावलेले डोळे किंचित वर केले…त्याबरोबर त्याचे डोकेही अगदी एखाद्या इंचाने वर उचलले गेले…आणि…..थाड! एकच गोळी!…काम तमाम! 

हा आवाज ऐकून त्याच्या शेजारील वाळूतही हालचाली झाल्या….रायफली धडाडल्या…आता लपून राहण्यात काहीही हशील नव्हता! पण यावेळी समोरच्यांनी लढाई जिंकली होती…यांच्यापेक्षा जास्त वेळ स्तब्ध राहण्यात अंतिम यश मिळवून ! 

समोरासमोरची हातघाईची लढाई करण्याचे दिवस बंदुकांच्या शोधाने संपवून टाकले. लपून बसून अचानक गोळीबार करण्याचेही दिवस असताना छद्मावरण धारण करून प्रतिस्पर्ध्याला बेसावध गाठून यमसदनी धाडण्याची कला विकसित झाली….स्नायपर्स! या शब्दाचं स्पेलिंग स्निपर असा उच्चार करायला भाग पाडतं काहीजणांना. खरं तर इंग्रजी भाषेत एका अगदी लहान,चपळ पक्षाला स्नाईप हे नाव आहे. याची शिकार करणं खूपच अवघड. जरा कुठं हालचाल झाली का हा पक्षी प्रचंड वेगाने उडून जातो. आणि याची शिकार करणारे मग स्नायपर या नावाने ओळखले जाऊ लागले. 

युद्धात प्रतिस्पर्ध्याची अशा प्रकारे लपून शिकार करणा-यांना मग स्नायपर हे नाव पडले…१८२०च्या सुमाराचे हे वर्ष असावे. या प्रकारात अत्यंत दूर असलेल्या एकांड्या शत्रूला,त्याला दिसणार नाही अशा ठिकाणी लपून राहून गोळीने अचूक उडवणे हे स्नायपर्सचे काम. आणि इकडे स्नायपर असेल तर तो त्या विरुद्ध बाजूलाही असणारच. अशा स्थितीत जो आपले अस्तित्व शत्रूला जाणवू देणार नाही त्याची सरशी होणार,हे निश्चित. नव्या युद्धतंत्रात स्नायपरच्या जोडीला आणखी एकजण असतो..एकाने पहायचे…लक्ष्य निश्चित करायचे आणि दुस-याने रायफलचा ट्रिगर दाबायचा! हे तंत्र खूपच परिणामकारक आहे. सीमो हेह्या नावाचा फिनीश स्नायपर दुस-या महायुद्धात रशिया विरोधात लढला…याने पाचशेपेक्षा अधिक सैनिकांना एका एका गोळीत संपवून टाकल्याचा इतिहास आहे. 

आसपासच्या वातावरणाशी मेळ असणारे किंवा तसा भास करून देणारे छदमावरण तयार करणे,तशी वस्त्रे अंगावर घालणे याला कॅमॉफ्लॉज असा शब्द आहे..camouflage! 

 यात झाडांच्या फांद्या,पाने,गवत आणि तत्सम गोष्टी अंगावर घातल्या जातात आणि अंग झाकले जाते. तोंडाला विविध प्रकारचे रंग फासले जातात…जेणेकरून शरीर सभोवतालच्या वातावरणाशी एकरूप होऊन जावे. या प्रकारच्या वेशभूषेला “ गिली सूट (Ghillie Suit) “असे नाव आहे. गिली हे एका बहुदा काल्पनिक वन्य व्यक्तिरेखेचे नाव होते. तो अंगावर असेच गवत,पाने लेवून जंगलात फिरायचा…आणि त्याला लहान मुलांविषयी अत्यंत प्रेम असे. असो. 

तर भारतीय सैन्याने या कलेवर खूप आधीपासूनच पकड मिळवली आहे. कोणत्याही  वातावरणात,हवामानात आपले जवान एका जागी कित्येक तास आणि दिवसही स्थिर राहू शकतात. झाडांसारखे, दगडांसारखे निश्चल राहू शकतात आणि कित्येक मीटर्सवर असलेल्या दुश्मनाच्या मेंदूच्या चिंधड्या उडवू शकतात. महत्त्वाच्या व्यक्तींच्या हत्येसाठी जसा परदेशात असे स्नायपर कार्यरत असतात, तसे आपल्याकडे अशा व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठीही स्नायपर्स असतात…फक्त ते सामान्य लोकांच्या नजरेस पडत नाहीत! 

स्नायपर म्हणून प्रशिक्षण घेणं खूप अवघड. यात शारीरिक,मानसिक कसोटी लागते. एकांतात इतका वेळ,एकाच स्थितीत पडून,लपून राहणे काही खायचे काम नाही. यात पुरुष सैनिक आजवर मक्तेदारी राखून होते. पण मागील दोनच महिन्यांपूर्वी या स्न्यापर्समध्ये एक महिला सामील झाली…तिने आठ आठवड्यांचे अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक प्रशिक्षण प्राप्त केले आणि आज ही महिला सैनिक स्नायपर्सना प्रशिक्षण देणारी एकमेव महिला सैनिक बनली आहे. या आहेत सीमा सुरक्षा दलात अर्थात बी.एस.एफ.(बॉर्डर सिक्युरीटी फोर्स) मध्ये सब-इन्स्पेक्टर म्हणून सेवा करणाऱ्या सुमन कुमारी. त्यांच्या रायफलमधून ३२०० कि.मी.प्रति तास वेगाने लीलया गोळी सुटते आणि लक्ष्याचा अचूक वेध घेते…आणि गोळी चालवणारे हात जराही डळमळत नाहीत…गोळी कुठून आली हे कुणालाही समजत नाही. गिली सूट घालून या कुठे बसल्यातर अजिबात दिसून येत नाहीत…त्या स्वत: हलल्या तरच दिसतात! सुमनताईंचे वडील साधे इलेक्ट्रीशियन तर आई गृहिणी आहेत. हिमाचल प्रदेशातील मंडी या छोट्याशा खेड्यातून आलेल्या सुमन कुमारी २०२१ मध्ये बी.एस.एफ.मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाल्या आणि पंजाब मध्ये एका मोहिमेत एका तुकडीचे नेतृत्व करीत असताना त्यांना सीमेवरून अचूक गोळ्या डागणाऱ्या  शत्रूच्या स्नायपर्सच्या भेदक ताकदीचा अंदाज आणि अनुभव आला..आणि त्यांनी स्नायपर होण्याचा निश्चय केला. ५६ पुरुष सैनिकांच्या तुकडीत या एकट्या महिला होत्या. इंदोरच्या सेंट्रल स्कूल ऑफ वेपन्स अ‍ॅन्ड टॅक्टीक्स मध्ये त्यांनी आठ आठवड्याच्या प्रशिक्षणात अव्वल स्थान मिळवत इन्स्ट्रक्टर म्हणून दर्जा हासिल केला! 

सुमन कुमारींचा अभिमान वाटावा सर्वांना. इंग्रजीत असलेली ही माहिती जमेल तशी लिहून तुमच्यापर्यंत पोहोचवली..तुम्ही तुमच्या जवळच नका ठेवू. न जाणो आपल्यातल्या एखाद्या सुमनताईला स्फूर्ती मिळेल ! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वाचन नसलेली पिढी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ वाचन नसलेली पिढी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

(वाचन नसलेली पिढी म्हणजे आशा नसलेली पिढी  (भारतीय अभियंत्याच्या पत्राचा उतारा))

“शांघायला जाणाऱ्या फ्लाइटवर, झोपेच्या वेळी, केबिनचे दिवे बंद होते; मी लोकांना iPads वापरून जागे करताना पाहिले, मुख्यतः आशियाई; ते सर्व गेम खेळत होते किंवा चित्रपट पहात होते.” 

खरंतर मी तो पॅटर्न पहिल्यापासून पाहिला.

जेव्हा मी फ्रँकफर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळावर होतो तेव्हा माझ्या लक्षात आले की बहुतेक जर्मन प्रवासी शांतपणे वाचत होते किंवा काम करत होते, तर बहुतेक आशियाई प्रवासी खरेदी करत होते आणि किंमतींची तुलना करत हसत होते.

आजकाल अनेक आशियाई लोकांना बसून पुस्तके वाचण्याचा धीर नाही. 

एकदा, एक फ्रेंच मित्र आणि मी एका रेल्वे स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होतो आणि या मित्राने मला विचारले: “सर्व आशियाई चॅट किंवा इंटरनेट का सर्फ करतात, परंतु कोणीही पुस्तके का वाचत नाही?”.

मी आजूबाजूला पाहिले, आणि खरंच ते होते. 

लोक फोनवर बोलतात, मजकूर संदेश वाचतात, सोशल मीडियावर सर्फ करतात किंवा गेम खेळतात. 

ते मोठ्याने बोलण्यात किंवा सक्रिय असल्याचे ढोंग करण्यात व्यस्त आहेत; 

गहाळ असलेली एकमेव गोष्ट म्हणजे शांतता आणि विश्रांतीची भावना. 

ते नेहमी अधीर आणि चिडखोर, रागावलेले आणि तक्रार करणारे असतात…

प्रसारमाध्यमांच्या मते, चीनमध्ये सरासरी व्यक्ती प्रतिवर्षी केवळ ०.७ पुस्तके, व्हिएतनाममध्ये ०.८ पुस्तके, भारतात १.२ पुस्तके आणि कोरियामध्ये प्रतिवर्षी ७ पुस्तके वाचतात. 

केवळ जपान पाश्चात्य देशांशी तुलना करू शकतो ज्यात प्रति व्यक्ती प्रति वर्ष 40 पुस्तके आहेत; 

एकट्या रशियामध्ये प्रति व्यक्ती प्रति वर्ष 55 पुस्तके आहेत. 

2015 मध्ये, 44.6% जर्मन लोक आठवड्यातून किमान एक पुस्तक वाचतात – नॉर्डिक देशांसाठी समान संख्या.

आकडेवारी दर्शवते की वाचन नापसंत होण्याची तीन मुख्य कारणे आहेत.

📚 – एक म्हणजे लोकांची खालची संस्कृती (शिक्षण नव्हे). 

त्यामुळे लोक नेहमी भेटल्यावर खूप बोलतात आणि कंटाळा न येता दिवसभर गप्पा मारतात. 

ते नेहमी इतर लोकांच्या कथांबद्दल उत्सुक असतात, सतत सामाजिक नेटवर्क अद्यतनित करतात आणि संप्रेषणाच्या महत्त्वपूर्ण गरजा असतात.

📚 – दुसरे म्हणजे, त्यांना लहानपणापासून वाचनाची चांगली सवय लावली जात नाही. 

त्यांच्या पालकांना पुस्तके वाचण्याची सवय नसल्याने तरुणांना त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीपासूनच त्यांच्या संगोपनात तसे वातावरण मिळत नाही. 

लक्षात ठेवा, मुलाचे व्यक्तिमत्त्व प्रामुख्याने कुटुंबाद्वारे घडवले जाते.

📚 – तिसरे म्हणजे ‘परीक्षाभिमुख शिक्षण’, त्यामुळे लहान मुलांना बाहेरची पुस्तके वाचायला वेळ आणि ऊर्जा मिळत नाही. 

बहुतेक ते पुस्तके देखील वाचतात, म्हणून ते परीक्षांसाठी असतात. 

जुन्या अभ्यासपद्धतीच्या वातावरणामुळे अभ्यासाची सवय लागणे, पदवी मिळवणे आणि नंतर वाचन करणे बंद झाले.

इस्त्राईल आणि हंगेरी हे जगातील सर्वाधिक वाचले जाणारे दोन देश आहेत. 

इस्रायलमधील सरासरी व्यक्ती वर्षाला ६४ पुस्तके वाचते. 

मुलांना समजायला लागल्यापासून, जवळजवळ प्रत्येक आई आपल्या मुलांना शिकवते: “पुस्तके हे शहाणपणाचे भांडार आहेत, जे पैसे, खजिना आणि शहाणपणापेक्षा अधिक मौल्यवान आहेत जे कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.

हंगेरीमध्ये सुमारे 20,000 लायब्ररी आहेत आणि 500 लोकांमागे सरासरी एक लायब्ररी आहे; 

लायब्ररीत जाणे हे कॉफी शॉप किंवा सुपरमार्केटमध्ये जाण्याइतकेच चांगले आहे. 

हंगेरी हा जगातील सर्वात लक्षणीय पुस्तके वाचणारा देश आहे, ज्यात दरवर्षी 5 दशलक्ष लोक नियमितपणे वाचतात, देशाच्या लोकसंख्येच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त. 

ज्यू हे एकमेव लोक आहेत ज्यांना निरक्षर नाही; 

भिकाऱ्यांकडेही नेहमी पुस्तक असते. 

त्याच्या दृष्टीने पुस्तके वाचणे हा लोकांचा न्यायनिवाडा करण्याचा उत्कृष्ट गुण आहे.

जे लोक वाचतात त्यांची विचार करण्याची पद्धत खूप वेगळी असते आणि त्यांच्याकडे चमकदार कामगिरी नसली तरी त्यांची मानसिकता खूप चांगली असते. 

पुस्तकांचा केवळ व्यक्तीवर परिणाम होत नाही;त्याचा समाजावर परिणाम होतो.

ज्ञान ही शक्ती आहे आणि ज्ञान ही संपत्ती आहे.  जो देश किंवा व्यक्ती पुस्तके वाचणे आणि ज्ञान संपादन करणे याला महत्त्व देतो तो नेता असेल.

एक महान विद्वान एकदा म्हणाले: “एखाद्या व्यक्तीच्या विचारांच्या विकासाचा इतिहास हा त्याचा वाचन इतिहास आहे. किती लोक पुस्तके वाचतात आणि कोणत्या प्रकारची पुस्तके निवडतात हे ठरवते की समाजाचा विकास होईल की मागे राहील.”

लक्षात ठेवा: वाचनाशिवाय शर्यत ही आशा नसलेली शर्यत आहे.

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # 199 ☆ वन तपोवन सा प्रभु ने किया… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना “वन तपोवन सा प्रभु ने किया…। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – आलेख  # 199 ☆ वन तपोवन सा प्रभु ने किया

भगवान जो करते हैं अच्छे के लिए करते हैं। कठोर निर्णय भले ही हृदय विदारक  हों किंतु न जाने कितनों को शिक्षित करते जाते हैं।

जब सब कुछ सहजता से मिलने लगे तो व्यक्ति उसका महत्व नहीं समझता ,मजाक बनाकर रख देता है। सम्मानित लोगों को अपमानित करना उसके बाएँ हाथ का खेल होता है। इस हार ने न जाने कितनों को आत्म मूल्यांकन हेतु विवश किया है। जो इस क्षेत्र के नहीं हैं वे भी कहीं न कहीं मानसिक रूप से इससे जुड़ाव कर रहे थे। एक साथ इतनी उम्मीदों का टूटना जिसकी आवाज सदियों तक ब्रह्मांड में गूंजती रहेगी।

कोई एक तत्व इसके लिए जिम्मेदार हो तो कहें पूरा का पूरा कुनबा वैचारिक रूप से अहंकारी हो गया था। बड़ बोलापन, शक्ति का केंद्रीकरण, एकव्यक्ति पूरी दुनिया बदल देगा ये भ्रम टूटना आवश्यक है। लोकतंत्र में हर व्यक्ति एक बराबर मूल्यवान है। संख्या बल योग्यता को नहीं परखता। ये सही है कि एक तराजू में सबको तौलने से योग्यता की उपेक्षा होती है जिसका दुष्परिणाम कार्यों  में झलकता है।

जब भी अयोग्य लोगों ने चालबाजियों का सहारा लिया है तो उन्हें हारे का सहारा भी नहीं मिलता है क्योंकि सत्य और ईमानदारी की ताकत के आगे कोई नहीं टिक सकता। सत्य भले ही कुछ समय के लिए बेबस दिखे किंतु सत्य अड़िग और चमकदार होता है तभी तो सत्यम शिवम सुंदरम से आगे कुछ भी नहीं होता है।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ – Wanderer… – ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.)

We present his awesome poem ~ Wanderer… ~We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji, who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages for sharing this classic poem.  

☆ ~Wanderer…  ~?

Neither any fear of not meeting,

nor any pains of parting away…

No more tête-à-tête ever again,

no more fresh promises to be made…

Just an endless journey ensued

wandering around elatedly…

Life kept on passing just like that

gathering treasures of experiences..!

~ Pravin Raghuvanshi

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares