मराठी साहित्य – जीवनरंग ☆ चित्रकार… भाग-१ – लेखक : श्री शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ चित्रकार… भाग-१ – लेखक : श्री शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर 

एखाद्या चौथीच्या प्राथमिक वर्गात असलेल्या मुलाकडून अस काही ऐकणे तुम्हाला नवल वाटेल पण हो करतो मी जास्ती विचार… माझी आज्जी पण नेहमी म्हणते “पुष्कर लहान आहे पण एखाद्या मोठ्या व्यक्ती पेक्षा जास्त समज त्याच्यात आहे” आता ह्याला वरदान म्हणावे की श्राप??….. श्रापच…. अवेळी आलेली गोष्ट तशी धोकादायकच…. मग ते अवेळी आलेलं प्रौढत्व का असेना….. असो….. ह्या सगळ्या दुनियादारी गप्पा तुमच्या सोबत ह्यासाठी मारतोय कारण हे जग सोडण्याचा मी निर्णय घेतला आहे….. कारण??….. मी स्कॉलर ITP परीक्षेत जिल्ह्यात 9 वा आलो म्हणून?? अजिबात नाही….. कारणे खूपशी आहेत…. ती सुद्धा माझ्यासोबत घेऊन जाईन….. माझ्याबद्दल विचाराल तर अभ्यासापेक्षा इतर गोष्टीत रमणारा मी आहे… मी रोज पेपर वाचतो… तो पेपर तिथल्या मोठ्यांच्या गोष्टी….. पण पेपर मधल्या न समजणाऱ्या गोष्टी शेजारच्या काकांना विचारतो ते सगळं समजावून सांगतात मला…. त्यात किनी बातम्या येतात बघा “मानसिक त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या”….. आता मी युवक तर नाही….. शाळकरी मुलगा आहे…. पण खरं सांगू का लहान मुले सुद्धा विचार करतात…. त्यांना सुद्धा मानसिक त्रास येतो ह्याचा विचार कदाचित पालक करत नसतील पण ते खरे आहे… लहानमुले म्हणजे मातीचा गोळा… मातीचा गोळा…. त्यांना आकार देण्यासाठी एवढं बदड बदड बदडलं जातं की हे मडकं तुटू शकतं ह्याचा कुणी विचारच करत नाही… लहान मुलांना पण मन असत… त्यांच्या सुद्धा मनावर परिणाम होत असतो.. कोण करणार विचार??… बरं.. ते सगळं जाऊ द्या.. कुठे होतो आपण….. हा तर ITP स्कॉलर परीक्षेत माझा 9 वा नंबर आला…. बाकी हा सगळा नंबर्सचा खेळ माझ्या डोक्या बाहेरचा आहे…… इथे फक्त 1 ह्या नंबरलाच मानाचे स्थान आहे….. कारण मागच्या वेळी ITP परीक्षेत मी 4 नंबर वर होतो तरीही बाबांचा मार खाल्ला आणि आता ह्या वर्षी तर थोडा जास्तच….. पप्पा आणि मी शाळेत गेलो निकाल हातात आला आणि तिथेच लक्षात आलं की घरी गेल्यावर फुल्ल धुलाई होणार आहे आणि तसच झालं… पप्पांनी अगदी हात दुःखेपर्यंत मला धोपटून काढलं….. साहजिक मार खाताना ओरडायच नाही हा एक कायदा आमच्या घरी होता त्यामुळे हुंदके देत सगळा मार खाऊन घेतला….. मम्मी कोपऱ्यात उभी राहून बघत होती….. दिवस सगळा रडण्यात गेला…. रात्री पप्पा आले काहीवेळ त्यांनी मोबाईल बघितला आणि परत येऊन धोपटून काढलं…… नक्कीच त्यांनी बाजूच्या प्रतीकच्या वडिलांचे स्टेटस बघितले असेल….. प्रतीक 3 रा आला होता….. बाकी माझ्या पप्पांना स्टेटसचे जाम वेड आहे….. पण आपल्या मुलाचा प्रथम 3 क्रमांकात येणाचे स्वप्न मी काही पूर्ण करू शकलो नाही त्यामुळे ते एक दुःख त्यांच्या मनात सलत असावं परिणामी माझी बारीकसारीक गोष्टीसाठी होणारी धुलाई, शिव्या देणे हे सगळं चालूच असायचं….. पण पप्पांच्या मारापेक्षा जर कोणती गोष्ट मला जास्त वेदना देते ती म्हणजे मम्मीचा अबोला….. माझा रिझल्ट लागला की माझी पप्पांच्या कडून येथेच्छ धुलाई होणार हे मला माहित होतं आणि त्याची जराही भीती वाटायची नाही कारण मार खाऊन खाऊन मी पुरता धीट झालो होतो पण मम्मीचा अबोला??….. तो मात्र अगदी आत मनापर्यंत वेदना द्यायचा…. वास्तविक मी प्रथम 3 क्रमांकात नाही आलो तर आई अबोला धरेल कित्येक दिवस बोलणार नाही ह्या विचाराने मी अभ्यास करायचो….. माराचं काही विशेष वाटत नव्हतंच….. पण काय करू?? अभ्यासात माझं मनच लागत नाही….. मला चित्रे काढायला खूप आवडतात….. मला आजूबाजूचा निसर्ग रेखाटायला जाम आवडतो…. शाळेत देखील माझं लक्ष बाजूच्या बगीच्यात असत….. म्हणून तर वर्गातल्या मुलांशी भांडून मी खिडकी कडेची जागा घेतली….. बगीच्यातले पक्षी, खारुताई, फुलझाडे सगळं काही मला आनंदित करून सोडत…. ती फुले, खारुताई वैगेरे मी वहीच्या मागच्या बाजूला रेखाटायचो… माझ्या चित्रकलेच्या मॅडमांना माझी चित्रे खूप आवडायची…. त्यांनी पप्पाना किती वेळा सांगितलं की ह्याची चित्रे खूप चांगली आहेत ह्याला चित्रकलेची आवड आहे तर चित्रकलेच्या क्लासला घाला….. पण त्या दिवशी घरी आल्यानंतर मात्र पप्पांनी माझी सगळी चित्रे जाळून टाकली…… परत तीच धुलाई….. त्यांनी दमच भरला…. “परत चित्र काढताना दिसलास तर तंगड मोडीन”…….. म्हणून तर वहीच्या मागे पेन्सिलने चित्र काढून खोडून घरी जात होतो….. खर सांगू का….. माझं मन नाही लागत अभ्यासात…… मला चित्रे काढायला आवडतात….. शाळेतली मुले जेव्हा एकत्र जमून अभ्यासाच्या चर्चा करतात तेव्हा खूप वेगळं वेगळं वाटत.. कमीपणाचा भाव येतो…. म्हणून तर मी एकटा राहण्याचा प्रयत्न करतो…… आजूबाजूचा निसर्ग पशु पक्षी माझे मित्र बनले आहेत….. आता मला समजून घेणारं कुणीच नाही एवढंच काय तर माझे आई वडील सुद्धा मला समजून घेत नाहीत…. कधी कधी अस वाटत की त्यांनी मला एका मिशन साठी जन्माला घातलं आहे….. मिशन कलेक्टर….. मला ते झालंच पाहिजे असं ते सतत बोलतात….. ते त्यांचं स्वप्न आहे म्हणे पण मग माझ्या स्वप्नांचे काय??…… मला जगप्रसिद्ध चित्रकार व्हायचं आहे…… ज्याचा ह्या वास्तविक जगाशी काहीही संबंध नसेल तो आपल्याच काल्पनिक जगात हरवून वेगवेगळ्या रंगानी चित्र रंगवत जाईल….. पण असो…. आजकल मुलांच्या स्वप्नांना कुठे किंमत आहे म्हणा…… पालकांनी शाळेत अभ्यासात एवढं गुंतवून टाकलं आहे की आधीच्या पिढी सारखं फिरावं, खेळावं, पोहवं हे सगळं आमच्यासाठी स्वप्नवत आहे.. आमच्या उन्हाळी सुट्या सुद्धा क्लासेस आणि स्कॉलर परिक्षमध्येच जातात…. उन्हाळ्याच्या सुट्टीत देखील आमच्या कडून एखादा पेपर किंवा पुढच्या वर्षीची तयारी ते क्लासेस सुरूच असत….. पालकांच्या स्वार्थात आमच्या स्वप्नांचा बळी जातोय ह्याचा विचार कोण करणार आहे??…… मी तरी त्या दप्तराचे आणि घरच्यांच्या स्वप्नांचे ओझे वाहून अक्षरशः थकून गेलो आहे….. खरंच

अजून दुसरी गोष्ट सांगायची झाली तर सगळेच लोक माझ्या विरुद्ध किंवा माझ्यावर ओरडणारे नाहीत बरं….. काही लोकांना माझे जाम कौतुक देखील आहे…. आता तिला “लोक” ह्या कॅटेगरी मध्ये गणले जाऊ शकत नाही… ती फक्त जाणवते तिचा आकार नेहमी बदलत असतो एखाद्या कंपना सारखा तिचा घोगरा आवाज समजण्यासाठी थोडे कष्ट पडतात पण ठीक आहे ना…… अशी ती जरी जिवंत नसली तरी माझ्या आयुष्यात जेवढी जिवंत माणसे आली त्यांच्यापेक्षा ह्या कमला काकूंनी मला खूप प्रेम दिलं आहे….. इतरांच्या दृष्टीने जरी त्या भूत वैगेरे असल्या तरी माझ्या दृष्टीने एक प्रेमळ मायेची ऊब देणारी स्त्रीच आहे…

– क्रमशः भाग पहिला 

☆☆☆☆☆

लेखक:- श्री शशांक सुर्वे

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऋतु गाभुळताना… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

? मनमंजुषेतून ?

☆ ऋतु गाभुळताना… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆ 

झोपता झोपता दूरदर्शन बातमी देतं..

मान्सून एक जूनपर्यंत केरळ मध्ये दाखल होणार..

मार्च, एप्रिल… २४तास एसी, कुलर, पंख्याला आचवलेलं शरीर.. पहाटे पहाटे पायाशी असलेलं पातळ, चादर, बेडशीट साखरझोपेत कधीतरी अंगावर ओढून घेतं…

… तेव्हा खुशाल समजावं ऋतु गाभुळतोय.

 

ऐटीत झाडावरुन मोहित करणारे बहावा, पलाश, गुलमोहोर…

 वार्‍याच्या खोडसाळपणाने पायाशी पायघड्या पसरवू लागतात. झाडावरचं कैऱ्यांचं गोकुळ रिकामं होऊन गेलेलं, एखादा झाडावरच पिकलेला आंबा, खाली पडून केशर कोय सांडतो. जांभुळ, करवंदाचा काळा, जांभळा रंग जमिनी रंगवू लागतो…

… तेव्हा खुशाल समजावं ऋतु गाभुळतोय.

 

आई-आजीची लोणच्या, साखरंब्याची घाई, कोठीत धान्यं भरुन जागेवर ठेवायची लगबग, गच्ची-गॅलरीत निवांत पहुडलेली चीजवस्तू आडोश्याच्या जागी हलवायची बाबा-आजोबांची गडबड…

… तेव्हा खुशाल समजावं ऋतु गाभुळतोय.

 

ताटातला आमरस सर्रासपणे गोडच लागतो..

साखरेची गोडी त्याला आता नकोशी होते. उरलेल्या पापड, कुर्डया आता हवाबंद डब्यात जाऊन बसतात. डाळ, पन्हं, आईस्क्रीम, सरबतं, सवयीची होत जातात. माठातल्या पाण्यात एखादी भर आताशी कमीच पडते.

… तेव्हा खुशाल समजावं ऋतु गाभुळतोय.

 

दुर्वास ऋषींच्या आविर्भावात आग ओकणारा रवी..

काळ्या पांढऱ्या ढगांशी सलगी करु पाहतो, मेघनभात अडकलेली किरणं सोडवता सोडवता… असाच दमुन जातो. भास्कराचा धाक कमी झाल्याचं पाहुन वारा ही उधळतो. गच्ची, दोरीवरच्या कपडे, गाद्यांवर आता लक्ष ठेवावं लागतं..

… तेव्हा खुशाल समजावं ऋतु गाभुळतोय.

 

निरभ्र वाटणारं आकाश,

क्षणात आभाळ होऊन जातं,

ऊन सावलीच्या खेळात चराचर सावळं होतं.

वीज गडगडाटानं रसपोळीनं सुस्तावलेली दुपार..

धावपळीची होते.

झाडांवरच्या पक्ष्यांची किलबिल, किलबिल न राहता,

नव्या स्थलांतराची भाषा बोलू लागते..

उफाळत्या जमिनीत नांगर फिरू लागतात,

मोगऱ्याचे ताटवे विरळ होऊ लागतात,

मृदगंधाचे वास श्वासात विसावून जातात..

… खुशाल समजावं तेव्हा ऋतु गाभुळतोय.

 

उंबऱ्यावर आलेल्या त्या वर्षेला भेटण्यासाठी 

देहमनाने आपणही आतुरतो….

… तेव्हा अगदी खुशाल समजावं…

…. ऋतु गाभुळतोय… 

 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.        

मो. – 9561582372, 8806955070.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे  श्लोक आणि REBT… – भाग-१ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे  श्लोक आणि REBT… – भाग-१ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

मन म्हणजे काय ? ‘मन’ कसे असते ? ते खरंच असते का ? ते असते तर नक्की कुठे असते ? मनाचे कार्य काय असते ? मनुष्याला मनाचा नक्की काय उपयोग होतो ? मन इंद्रिय आहे की नाही ? असे अनेक प्रश्न मन हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनात येऊ शकतात. सामान्य मनुष्यापासून संतांपर्यंत, अरसिकांपासून रसिकांपर्यंत, बद्धापासून सिद्धापर्यंत प्रत्येकजण आपापल्या परीने मनाचा अभ्यास करतो आहे. पण यातील प्रत्येकाला मनाचा थांगपत्ता लागला आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. अनेक संत, कवी, लेखक, तत्त्ववेत्ते, अभ्यासू वक्ते आदींनी ‘मना’वरील आपले विचार विविध प्रकारे शब्दबद्ध केले आहेत. आपल्याला हत्ती आणि चार आंधळे यांची गोष्ट ज्ञात आहे. त्यातील प्रत्येक आंधळा त्याच्या मतीगतीनुसार हत्तीचे वर्णन करतो. त्याचप्रमाणे इथेही प्रत्येकाने आपापल्या परीने मनाचे वर्णन केले आहे. त्याच्या त्याच्या परीने ते योग्य असेलही पण म्हणून ते पूर्ण आहे असे आपण नाही मानू शकत. ज्याप्रमाणे भगवंताचे पूर्णपणे वर्णन करणे कोणालाही शक्य झालेले नाही तसेच मनाचे देखील असावे. कारण गीतेमध्ये भगवंत श्रीकृष्ण म्हणतात की मीच ‘मन’ आहे.

सर्व प्राणिमात्रांत भगवंताने मनुष्याला ‘मन’ आणि ‘व्यक्त होण्याची कला’ विशेषत्वाने प्रदान केली आहे. एका अर्थाने मनुष्याचे मन हेच मनुष्याचे प्रेरणास्त्रोत आणि त्याचवेळी शक्तीस्रोत देखील आहे.

“मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयो:”

मनुष्याचे मनच त्याच्याकडून सर्व काही करवून घेत असते आणि त्याचे बरेवाईट परिणाम मात्र शरीराला भोगावे लागतात. सर्व संतांनी मनाचा अभ्यास केलेला आहे. पण श्री समर्थांनी मनाचा केलेला अभ्यास अधिक सुस्पष्ट, सखोल आणि सूत्रबद्ध आहे असेच म्हणावे लागते. याला एकमेव कारण म्हणजे  समर्थांनी लिहीलेले मनाचे श्लोक !!  मनाचे श्लोक लिहिण्याआधी देखील समर्थांनी करुणाष्टकात मनाचे वर्णन पुढील प्रमाणे केले आहे.

‘अचपळ मन माझे नावरे आवरीता।’ 

 ‘चपळपण मनाचे मोडीता मोडवेना।’

मनाच्या श्लोकांइतके मनाचे  सूत्रबद्ध आणि वस्तुनिष्ठ विवेचन खचितच कोणत्या अन्य ग्रंथात केले गेले असावे. म्हणून मनाचे श्लोक’ हा प्राचीन आणि आधुनिक मानसशास्त्राचा संदर्भग्रंथ ( handbook ) ठरावा. मानवाने प्रगती केली ती प्रामुख्याने भौतिकस्तरावरील आहे. मनुष्याच्या अंतरंगात बदल करणे तर दूर पण मनुष्याच्या अंतरंगाची  वस्तूनिष्ठपणे मांडणी करणे किंवा त्याचा सर्वांगीण अभ्यास करणे हे सुद्धा मनुष्याला पुर्णपणे शक्य झालेले नाही. मनाच्या श्लोकांची निर्मितीकथा तशी रंजक आहे. ती आपल्याला ज्ञात देखील असेल. पण ते एक निम्मित झाले असावे असे वाटते. समर्थांसारखा विवेकी संतमहात्मा कोणतीही गोष्ट प्रतिक्रियात्मक करेल हे काही मनाला पटण्यासारखे नाही.

मनाचा विषय आहे तर ‘मन’ म्हणजे काय हे आपण थोडक्यात बघूया. जरी मन मनालाही उमजत नसले तरीही मन म्हणजे एक सुजाणीव आहे असे आपण म्हणू शकतो. ज्यातून मानवी व्यक्तित्व प्रतिबिंबित होईल अशी जाणीव. मन म्हणजे व्यक्तित्वाचा सुघटित आकार आचारणात आणणे. कांद्याचा पापुद्रा काढता काढता कांदा संपतो. त्याचे ‘कांदेपण’ डोळ्यांतील पाण्यातून जाणवते. तसेच मनाच्या पापद्र्यांतून सर्वात शेवटी जी विशुद्ध निराकार जाणीव उरते, त्याला मन असे  म्हणता येईल. ह्या काही मोजक्या व्याख्या आहेत. प्रतिभावंत लेखक ‘मन’ आणखी विविध प्रकारे मांडू शकतात.

मन ह्या विषयावर किंवा त्याच्या अभ्यासावर काही तज्ञांचे मतभेद असतील किंवा नसतीलही पण एक गोष्ट मात्र सर्व संतमहंतांनी आणि आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी एकमुखाने मान्य केली आहे ती म्हणजे जर मनुष्याला खरे सुख प्राप्त करायचे असेल तर त्याचा मुख्य रस्ता हा त्याच्या मनातूनच जातो. अर्थात मन प्रसन्न केल्याशिवाय मनुष्य सुखी समाधानी होऊ शकत नाही. मग ज्येष्ठ कवी भारतरत्न श्री. अटलबिहारी वाजपेयी सहज म्हणून जातात.

“रण जिंकून नाही जिंकता येत मन।

मन जिंकल्याशिवाय नाही जिंकता येत रण।।”

(*वरील अवतरण अनुवादित आहे)

मनुष्याला कोणतेही सुख प्राप्त करायचे असेल, जीवन आनंदात जगायचे असेल त्याने प्रथम मन राजी करणे, मनाला जिंकणे अपरिहार्य ठरते. मनाला सोडून कोणतीही गोष्ट करणे शक्य नाही. आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज देखील म्हणतात,

“मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण।”.

‘मन’ हा शब्द संतांनी फक्त मनुष्यापुरता संकुचित ठेवलेला नाही. मानवीमन, समाजमन, राष्ट्रमन असे विविध आयाम त्यांनी या मनास जोडले. भारतीय संतांनी मनाची व्यक्तिशः जडणघडण करण्याचा प्रयत्न तर केलाच पण समाजमन कसे खंबीर होईल आणि पर्यायाने राष्ट्र बलवान कसे होईल याकडेही त्यांनी लक्ष वेधले आणि त्याप्रमाणे समाजाकडून कृती देखील करवून घेतली. ज्यांच्या मनाची ‘माती’ झाली आहे अशा लोकांच्या मने  चैतन्याने भारुन, त्यांच्यात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवून त्यांच्याकडून गौरवशाली कार्य करवून एका अर्थाने इतिहास घडविण्याचा चमत्कार अनेक संतांनी आणि राजेमहाराजांनी केल्याचे वर्णन इतिहासात आहे. शालिवाहनाने ‘माती’तून  सैनिक उभे केल्याचे वर्णन आहे. छत्रपतींनी सामान्य मावळ्यांमधून कर्तव्यनिष्ठ आणि स्वाभिमानी स्वराज्यसेवक निर्माण केले. ही दोन्ही उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत.

समर्थांनी विपुल साहित्य लिहून ठेवले आहे. पण समर्थांची ‘प्रस्थानत्रयी’ म्हणून ज्याचा गौरव केला जातो त्या तीन ग्रंथांमध्ये ‘मनाचे श्लोक’, ‘दासबोध’ आणि ‘आत्माराम’ यांचा समावेश आहे. माझ्या अल्पमतीप्रमाणे समर्थांच्या अध्यात्माच्या शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर प्राथमिक शाळेचा अभ्यासक्रम म्हणून ‘मनाचे श्लोकच’ असतील यात बिलकुल संदेह नसावा. श्री. सद्गुरु गोंदवलेकर महाराज, श्री सदगुरु श्रीधरस्वामी आणि अनेक समकालीन संतांनी मनाच्या श्लोकांचा यथोचित गौरव केला आहे. आदरणीय विनोबाजी तर मनाच्या श्लोकांना ‘सोन्याची तिजोरी’ असे म्हणतात. ह्यातील कौतुकाचा आणि श्रद्धेचा भाग सोडला आणि आचरण सूत्रे म्हणून जरी ह्या मनाच्या श्लोकांकडे पाहिले तरी मनुष्याच्या अंतरंगात आणि बहिरंगात बदल करण्याचे सामर्थ्य यामध्ये निश्चित आहे.

एकूण मनाचे श्लोक २०५ आहेत. शेवटचा आणि पहिला मंगलाचरणाचा श्लोक सोडला तर उरलेल्या २०३ श्लोकांत समर्थांनी फक्त मनाला उपदेश केला आहे. तसं पाहिलं तर मनाचे श्लोकाचे मर्म पहिल्याच श्लोकात सांगून संपले आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही असे मला वाटते.

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।

मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा।

नमू शारदा मूळ चत्वार वाचा।

गमू पंथ आनंत या राघवाचा।।१।।

वरील श्लोकाच्या शेवटच्या ओळीतच सर्व पुढील श्लोकांचे सार आले आहे. अनंत राघवाच्या मार्गावर चालणे याचा अर्थ ‘मनुष्यत्वाकडून देवत्वा’कडे प्रवास सुरु करणे असाच आहे. पण मानवी मनाचे अनेक कंगोरे साधकांना समजावेत म्हणून समर्थांनी या श्लोकांचा विस्तार केलेला असावा असे म्हणायला जागा आहे. उपलब्ध संतसाहित्यातील वर्णनाप्रमाणे मनुष्याचा जीवनप्रवास ‘मनुष्यत्व ते पशुत्व’ (राक्षसत्व) किंवा ‘मनुष्यत्व ते देवत्व’ असा होत असतो. मनुष्य जन्माचे मुख्य उद्दिष्ट हे जीवाला परमात्म्याची भेट घडवून देण्यातच आहे असे सर्व संत सांगतात. पण मनुष्य स्वभावतः स्खलनशील प्राणी आहे. म्हणून मनुष्याला जर देवत्वाकडे न्यायचे असेल तर विशेष प्रयत्न करावे लागतात. आणि त्यासाठी एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे मानवी मनाला शिकवण देणे. एकदा का मन कह्यात आले की जगातील कोणतीही गोष्ट मनुष्याला असाध्य नाही.

ज्याप्रमाणे भारतीय संतांनी, तत्ववेत्त्यांनी मानवी मनाचा अभ्यास केला तसा पाश्चात्य चिंतकांनी देखील मानवी मनाच्या एकूणच पसाऱ्याचा अभ्यास केला. यामध्ये सिगमंड फ्रॉइड आणि अल्बर्ट एलिस या प्रमुख मानसशास्त्रज्ञांचा उल्लेख करावा लागेल. सध्या जगभर प्रचलित असलेली मान्यताप्राप्त मानसोपचार पद्धती म्हणून  विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र पद्धती ( Rational Emotive Behavioral Therapy ) प्रसिद्ध आहे. आयुष्य हे एक मर्यादित घटनांची मालिका असते. घटना घडत असतात आणि त्या घडतच राहणार. पण सामान्य मनुष्य घडणाऱ्या छोट्यामोठ्या घटनांना समस्येचं लेबल चिकटवून टाकतो. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्येक घटनेला समस्या मानणं हीच खरी आणि मूळ समस्या आहे. आपल्या आयुष्यात घटना घडू लागल्यावर आपल्याला वाटते की त्या घटनेतच समस्या आहे. परंतु समस्येचं वास्तव्य आपल्याच डोक्यात असते. या मूळ गोष्टीपासून मात्र सर्व अनभिज्ञ असतात. म्हणून घडणाऱ्या घटनेकडे बघताना आपण आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित केले तर आपण त्या घटनेकडे  तटस्थपणे बघू शकू.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ थोडा अंधार हवा आहे … – लेखक : योगिया ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ थोडा अंधार हवा आहे … – लेखक : योगिया ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

हल्ली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर तो म्हणजे कधी अंधारच होत नाही. सगळीकडे इन्व्हर्टर असतात आणि अगदीच नसले तरी लोकं दुसऱ्या सेकंदाला मोबाईलचा लाईट लावतात आणि अंधार घालवतात. त्यामुळे दुसऱ्या क्षणी तुम्हाला तुमच्या पुढचं, आजूबाजूचं दिसू लागत. पण तिथेच खरा प्रॉब्लेम आहे.

मला आठवतं आहे, आमच्या लहानपणी इन्व्हर्टर, मोबाईल नव्हते. मेणबत्त्या, कंदील हे ऑप्शन होते. पण कधी रात्री लाईट गेले तर दुसऱ्या सेकंदाला आजीचा आवाज यायचा. “कोणीही जागचे हलू नका. आहे त्या जागेवर बसून आपापले डोळे २ मिनिटे घट्ट बंद करा आणि आम्ही डोळे घट्ट मिटायचो. मग २ मिनिटांनी आजीचा आवाज यायचा.. आता हळूहळू  डोळे उघडा आणि आपोआप अंधारात दिसू लागेल. आणि खरंच मगास पेक्षा आता थोडं दिसू लागलं असायचं. मला अजूनही याचं अप्रूप आहे. मुळात अंधारात असताना डोळे का मिटायचे, त्याने काय होणार पण डोळे मिटून उघडले की दिसू लागायचं हे खरं. मला वाटतं की जुन्या पिढीला हीच सवय होती कि अंधारात असलो की अजून घट्ट डोळे मिटून आत डोकावायचे. स्वतःचे डोह धुंडाळायचे. आपल्या जाणिवा, नेणिवाचे झरे मोकळे करायचे आणि मग वाटा स्पष्ट होतं असाव्यात / दिसत असाव्यात. आणि आपणच शोधलेली आपली वाट असेल तर मग ती सुकर होते, त्याचं ओझं होत नाही आणि त्या वाटेवरचा प्रवास समाधान देणारा असतो.

माझ्या आजोबांचा पण लाईट गेले की एक आवडता डायलॉग होता. “अंधारात रस्ता दिसतो आणि उजेडात फक्त खड्डे दिसतात.. दिवे येई पर्यंत तुमचे रस्ते शोधा”.. लहानपणी मला हा विनोद वाटायचा पण हल्ली आजोबा आठवतात, त्यांचं वाक्य आठवतं आणि आता कुठे त्याचा अर्थ ५० वर्षांनी थोडाफार कळतो. स्वतःच्या तरुणपणी परिसस्थितीच्या अंधारात त्यांनी कष्ट सोसले, वार लावून जेवले, शिकले, नोकरी केली, आपला रस्ता शोधला. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुलांना इंजिनिअर केलं, त्याची फळं आम्ही उपभोगतोय. कधी नव्हे तर परवा खूप वेळ लाईट गेले, इन्व्हर्टर बंद पडला तर किती चिडचिड. डेटाचा स्पीड थोडा कमी झाला आणि लॅग आला तर त्रागा. पिझ्झा अर्ध्यातासात डिलिव्हर नाही झाला तर फ्री ची मागणी. उजेडात फक्त  खड्डे दिसतात हेच खरं.

पण हल्ली अंधारच होत नाही. मुळात अंधारच माहित नाही. आजूबाजूला सारखा लाईट असतो पण तो एनलायटन करू शकत नाही आणि डोळेच कघी न मिटल्यामुळे आत डोकावायची वेळच येत नाही. इन्व्हर्टर / मोबाईल च्या लाईट ने आजूबाजूचं दिसतं आणि फक्त आजूबाजूचं दिसलं तर फक्त स्पर्धा वाढते, पण वाट काही सापडत नाही. वाट सापडायची असेल तर आत डोकावता आलं पाहिजे. आपापले डोह धुंडाळता आले पाहिजेत. अंधारात तळाशी पोहोचणं सोपं होतं असावं. म्हणून अधून मधून थोडा मिट्ट अंधार हवा आहे.

लेखक : योगिया 

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ठराव / आखाडा – चित्र एक काव्ये दोन ☆ सुश्री नीलांबरी शिर्के आणि श्री आशिष बिवलकर ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ठराव / आखाडा – चित्र एक काव्ये दोन ☆ सुश्री नीलांबरी शिर्के आणि श्री आशिष बिवलकर 

सुश्री नीलांबरी शिर्के

(१) ठराव 

कधी भुंकायचं  !

किती भुंकायचं  !

आताच ठरवून

 लक्षात ठेवायचं  

 नंतर आपापला

 एरिया सांभाळायचं 

 भुंकून भागलं नाही

तर चावे घेत सुटायचं 

 किती सज्जन असो    

समोर लक्ष ठेवायचं

विरोधी आपला नसतो

आपण फक्त भुंकायचं 

 पोटाला तर मिळतंच

 काळजी का करायची

 संधी मिळाली की मात्र

 तुंबडी आपली भरायची

 आपल्या अस्तित्वाची

  भुंकणं ही खूण आहे

  पांगलो तरी जागे राहू

  चौकस नजर हवी आहे

   खाऊ त्याची चाकरी करू

    म्हण जुनी झाली आहे

   रंगानं, अंगानं वेगवेगळे

   तरी काम आपलं एकच आहे

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

श्री आशिष बिवलकर

(२) आखाडा

गल्लीबोळातले जमलेत श्वान,

म्हणे एकत्र येऊन सर्व भुंकू |

आज नाही उद्या,

सिंहाशी आपण नक्कीच जिंकू |

*

सिंह फोडेल डरकाळी,

जराही विचलित नाही व्हायचे |

भुंकण्यापलीकडे आपण,

काहीच नाही करायचे |

*

आपले भुंकणे ऐकून,

इतर प्राणीही देतील साथ |

जंगलाच्या राजाला,

मारतील जोरात लाथ |

*

आपण एकत्र भुंकतो आहोत ,

येईल सहानुभूतीची लाट |

शेपटीवाले करतील मतदान,

लावतील सिंहाची वाट |

*

संख्याबळाच्या जीवावर,

आपल्यास मिळेल राजाचे पद |

सहा सहा महिने एकेकाने,

वापरून घ्यायचा सत्तेचा कद |

*

श्वानसभेचे जाणावे तात्पर्य एक,

अंगी कर्तृत्व जरी असले गल्लीचे |

एकत्र येऊन आज सगळे,

मनी बांधत आहेत आखाडे दिल्लीचे |

© श्री आशिष बिवलकर

बदलापूर 

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 194 – कथा क्रम (स्वगत)… ☆ स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

स्व. डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र”

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं  आपका भावप्रवण कविता – कथा क्रम (स्वगत)।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 194 – कथा क्रम (स्वगत)✍

(नारी, नदी या पाषाणी हो माधवी (कथा काव्य) से )

‘मेरा जन्म सफल हुआ

मैं धन्य हुआ

कृतार्थ हुआ कि आपने

मुझे

इस योग्य समझा।

किन्तु

ग्लानि में डूबा

मैं हतमागा

क्या कहूँ

कैसे कहूँ

कि अब

मेरा वैभव क्षीण हो गया है।

अब नहीं रहा मैं

वैसा सम्पत्तिवान्

जैसा पहले था।

श्यामकर्ण अश्व भी नहीं है

मेरी अश्व शाला में

और

उन्हें क्रय करने योग्य

धन भी नहीं है

राजकोष में।

किन्तु

‘याचक को निराश कर

कलंकित नहीं होने दूंगा

अपना कुल गौरव ।

निष्फल नहीं रहेगी

आपकी याचना ।

फलवती होगी इच्छा।

ऐसी वस्तु दूंगा

जिससे होगा।

 क्रमशः आगे —

© डॉ राजकुमार “सुमित्र” 

साभार : डॉ भावना शुक्ल 

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 194 – “रूपवती जैसे अखनूर की…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत रूपवती जैसे अखनूर की...)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 194 ☆।। अभिनव गीत ।। ☆

☆ “रूपवती जैसे अखनूर की...” ☆ श्री राघवेंद्र तिवारी

कहने को हिलगी है

एक अदद टहनी खजूर की ।

डोरी पर क्लिप लगी सूख रही

कुर्ती ज्यों डायना कुजूर की ॥

 

तपी रेत नीचे, धूप चढ़ी –

आसमान में ।

बदल गई गढ़ी जैसे

चौड़े मकान मे ।

 

मुर्गी की कलगी है

रक्तवर्ण अग्निरेख दूर की ।

या जैसे आरक्ता आँखों से

झाँक रही भावना हुजूर की ॥

 

लम्बग्रीव तना, पीठ –

जैसे घडियाल की ।

छायातक नहीं मिली

जिसकी पड़ताल की ।

 

शापग्रस्त मुलगी है

रूपवती जैसे अखनूर की ।

नजरों से बची रही  कब से वह

भाग्यवश  बेटी मजूर की ॥

©  श्री राघवेन्द्र तिवारी

26 – 11 – 2023

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – मैं और मेरी चुप्पी ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि –  मैं और मेरी चुप्पी’??

(लघु कविता संग्रह – चुप्पियाँ से)

युग-यगांतर से रच रहा हूँ

बस यही एक महाकाव्य,

जाने क्या है कि

सर्ग समाप्त ही

नहीं होते! 

© संजय भारद्वाज  

(रात 11:31 बजे)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ 💥 श्री हनुमान साधना सम्पन्न हुई। अगली साधना की जानकारी आपको शीघ्र ही दी जाएगी। 💥 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १६ – “औघड़ स्वाभाव वाले प्यारे भगवती प्रसाद पाठक” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

श्री जय प्रकाश पाण्डेय

(श्री जयप्रकाश पाण्डेय जी की पहचान भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी के अतिरिक्त एक वरिष्ठ साहित्यकार की है। वे साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। उनके  व्यंग्य रचनाओं पर स्व. हरीशंकर परसाईं जी के साहित्य का असर देखने को मिलता है। परसाईं जी का सानिध्य उनके जीवन के अविस्मरणीय अनमोल क्षणों में से हैं, जिन्हें उन्होने अपने हृदय एवं साहित्य में  सँजो रखा है।

ई-अभिव्यक्ति में प्रत्येक सोमवार प्रस्तुत है एक नया साप्ताहिक स्तम्भ कहाँ गए वे लोग के अंतर्गत इतिहास में गुम हो गई विशिष्ट विभूतियों के बारे में अविस्मरणीय एवं ऐतिहासिक जानकारियाँ । इस कड़ी में आज प्रस्तुत है हिंदी – उर्दू के नामचीन वरिष्ठ साहित्यकार  – “औघड़ स्वाभाव वाले प्यारे भगवती प्रसाद पाठक”)

आप गत अंकों में प्रकाशित विभूतियों की जानकारियों के बारे में निम्न लिंक पर क्लिक कर पढ़ सकते हैं –

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १ ☆ कहाँ गए वे लोग – “पंडित भवानी प्रसाद तिवारी” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # २ ☆ डॉ. राजकुमार तिवारी ‘सुमित्र’ ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ३ ☆ यादों में सुमित्र जी ☆ श्री यशोवर्धन पाठक ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ४ ☆ गुरुभक्त: कालीबाई ☆ सुश्री बसन्ती पवांर ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ५ ☆ व्यंग्यकार श्रीबाल पाण्डेय ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ६ ☆ “जन संत : विद्यासागर” ☆ श्री अभिमन्यु जैन ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ७ ☆ “स्व गणेश प्रसाद नायक” – लेखक – श्री मनोहर नायक ☆ प्रस्तुति  – श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ८ ☆ “बुंदेली की पाठशाला- डॉ. पूरनचंद श्रीवास्तव” ☆ डॉ.वंदना पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ९ ☆ “आदर्श पत्रकार व चिंतक थे अजित वर्मा” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # ११ – “स्व. रामानुज लाल श्रीवास्तव उर्फ़ ऊँट बिलहरीवी” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १२ ☆ डॉ. रामदयाल कोष्टा “श्रीकांत” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १३ ☆ स्वतंत्रता संग्राम सेनानी, लोकप्रिय नेता – नाट्य शिल्पी सेठ गोविन्द दास ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १४ ☆ “गुंजन” के संस्थापक ओंकार श्रीवास्तव “संत” ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १५ ☆ स्वतंत्रता संग्राम सेनानी, कविवर – पंडित गोविंद प्रसाद तिवारी ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

☆ कहाँ गए वे लोग # १६ ☆

औघड़ स्वाभाव वाले प्यारे भगवती प्रसाद पाठक☆ श्री जय प्रकाश पाण्डेय

(09.06.2024 को 53वीं पुण्यतिथि पर विशेष)

इतना जप-तप सभी निरर्थक,

तन्मय एक प्रणाम बहुत है।

तुम तैंतीस कोटि देवों को मानो,

मुझको  मेरा  राम बहुत है।

भगवान राम के प्रति अटूट आस्था और विश्वास की परिचायक इन पंक्तियों के रचयिता  स्वर्गीय श्री भगवती प्रसाद पाठक की 09.06.2024 को 53वीं पुण्यतिथि है। संस्कारधानी के ख्यातिलब्ध साहित्यकार, पत्रकार और शिक्षाविद श्री पाठक को विधाता ने यद्यपि मात्र 51 वर्षों की अल्पायु प्रदान की थी परन्तु इतने संक्षिप्त जीवन काल में ही उन्होंने साहित्य, पत्रकारिता और शिक्षा के क्षेत्र में जो महत्वपूर्ण योगदान किया वह स्तुत्य और वंदनीय है। श्री पाठक को संस्कारधानी के मूर्धन्य कवि स्व श्री केशव प्रसाद पाठक के सानिध्य में साहित्य साधना का सौभाग्य मिला था इसलिए उनकी रचनाओं में भी श्री केशव प्रसाद पाठक की छाप स्पष्ट दिखाई देती है। श्री केशव प्रसाद पाठक के व्यक्तित्व एवं कृतित्व पर केंद्रित अपने एक बहुचर्चित व्याख्यान में  श्री पाठक ने कवि श्रेष्ठ श्री केशव पाठक के लिए ‘मीटर का मास्टर’ विशेषण का प्रयोग करते हुए कहा था कि श्री केशव पाठक की अनेक कविताएं  पूर्ण गीत  (परफेक्ट राइम)  की श्रेणी में रखे जा सकते हैं जिसमें किसी पंक्ति में प्रयुक्त शब्दों का स्थानांतरण कर देने के पश्चात् भी उसकी गति भंग नहीं होती है। स्व. श्री भगवती प्रसाद पाठक का वह  व्याख्यान इतना चर्चित हुआ कि कालान्तर में पड़ाव प्रकाशन, भोपाल ने उसे “केशव पाठक की काव्य कला” शीर्षक से एक पुस्तक के रूप में भी प्रकाशित किया था।

आज जब मैं अपने इस आलेख में स्व.श्री भगवती प्रसाद पाठक  के अनुपम और आदर्श व्यक्तित्व एवं कृतित्व की अनूठी विशेषताओं की विवेचना कर रहा हूं तो मुझे ऐसा प्रतीत होता है कि इस आलेख में सन् साठ के दशक में श्री पाठक द्वारा प्रकाशित और संपादित ‘साप्ताहिक सही बात ‘ का उल्लेख किए बिना मेरा यह आलेख अधूरा ही रहेगा। इसमें दो राय नहीं हो सकती कि यह समाचार पत्र थोड़े से ही समय में प्रदेश में हिंदी पत्रकारिता के इतिहास में मील का पत्थर के रूप में विशिष्ट पहचान बनाने में सफल हुआ। अपने आप में संपूर्ण इस समाचारपत्र के हर अंक में श्री पाठक ने पत्र के शीर्षक की मर्यादा का सदैव ध्यान रखा। ‘यथा नाम तथा गुण’ की पहचान ने सही बात समाचारपत्र को अल्प काल में ही प्रदेश भर में चर्चित अखबार बना देने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। श्री पाठक ने कालांतर में संस्कारधानी के कुछ और समाचार-पत्रों में वरिष्ठ संपादकीय सहयोगी के रूप में सेवाएं प्रदान कीं।

स्व.श्री पाठक हिंदी, संस्कृत, अंग्रेजी और उर्दू साहित्य के उद्भट विद्वान थे। मराठी और बंगला भाषा पर उनकी अच्छी पकड़ थी। अपने धाराप्रवाह व्याख्यानों से प्रबुद्ध श्रोतावर्ग को मंत्रमुग्ध कर लेने की अद्भुत क्षमता श्री पाठक के अंदर मौजूद थी। नोबेल पुरस्कार विजेता गुरुदेव रवीन्द्रनाथ टैगोर की जिन प्रसिद्ध कविताओं का श्री पाठक ने  हिंदी में अनुवाद किया उसे साहित्य जगत में अत्यधिक सराहा गया। गहन अध्येता, चिंतक और विचारक श्री पाठक  संस्कारधानी के प्रतिष्ठित शिक्षाविद थे। उन्होंने  एक अनुशासनप्रिय अध्यापक और प्राचार्य के रूप में छात्रों के चरित्र निर्माण पर विशेष जोर दिया। उनके पढ़ाए हुए छात्र आज भी श्रद्धा पूर्वक उनका स्मरण करते हैं। श्री पाठक द्वारा लिखित संस्कृत भाषा की जिन पाठ्य पुस्तकों ने शिक्षा जगत में विशेष लोकप्रियता हासिल की जिनमें’ देववाणी दीपक’ का नाम प्रमुखता से लिया जाता है। विचारक श्री पाठक ने अनेक साहित्यिक प्रतियोगिताओं में निर्णायक की भूमिका का निर्वाह भी किया। नवोदित रचनाकारों को  अपने लेखन में अधिकाधिक निखार लाने के लिए  उन्होंने हमेशा प्रोत्साहित किया और मार्गदर्शन प्रदान किया। पाठक जी का जीवन संघर्षपूर्ण रहा और हमेशा ही चुनौतियों से जूझने में बीता। लेकिन उन्होंने कभी भी अपने सिद्धांतों से समझौता नहीं किया और अपने इन्हीं मूल्यों को पोषित करते रहने की दृढ़ता के कारण उन्हें बड़ी कीमतें भी चुकाना पड़ीं। वे ऐसे निर्मल-व्यक्ति के रूप में जिए, जिनमें किसी से दुश्मनी, कड़वाहट, या बदला लेने की भावना नहीं थी। वे देश-प्रदेश के बुद्धिजीवियों, लेखकों, कलाविदों और राजनेताओं के निरंतर संपर्क में रहे। सभी क्षेत्रों में उन्हें उच्च प्रतिष्ठा प्राप्त रही।

त्याग, सेवा और समर्पण की त्रिवेणी श्री पाठक के लिए जीवन भर रामचरितमानस की पंक्तियां “परहित सरिस धर्म नहिं भाई, पर पीड़ा नहिं सम अधमाई” आदर्श बनीं रहीं और वे सहृदयता और संवेदनशीलता के पर्याय बने रहे। आधी रात को भी किसी भी जरूरत मंद व्यक्ति की सहायता के लिए रहने वाले श्री पाठक के  द्वार से कभी कोई खाली हाथ नहीं गया। अहंकार और आडंबर से कोसों दूर, सहज सरल व्यक्तित्व के धनी श्री पाठक का अनुकरणीय  जीवन  ‘ नेकी कर दरिया में डाल ‘  कहावत का उत्कृष्ट उदाहरण है। जबलपुर के श्रीजानकी रमण महाविद्यालय के संस्थापक प्राचार्य पं. हरिकृष्ण त्रिपाठी के इस कथन से मैं पूर्णतः सहमत हूं कि ” जो लोग स्वर्गीय पाठक जी के संपर्क में रहे हैं वे इसकी पुष्टि कर सकते हैं कि उनका व्यक्तित्व और जीवन दर्शन जितना बहिरंग में दिखता है उससे अधिक व्यापक कैनवास में चित्रित किए जाने योग्य था।”

© जय प्रकाश पाण्डेय

416 – एच, जय नगर, आई बी एम आफिस के पास जबलपुर – 482002  मोबाइल 9977318765

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Weekly Column ☆ Witful Warmth#7 – The Celebrity Slapstick: A Tale of Adulation and Absurdity ☆ Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’ ☆

Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’

Dr. Suresh Kumar Mishra, known for his wit and wisdom, is a prolific writer, renowned satirist, children’s literature author, and poet. He has undertaken the monumental task of writing, editing, and coordinating a total of 55 books for the Telangana government at the primary school, college, and university levels. His editorial endeavors also include online editions of works by Acharya Ramchandra Shukla.

As a celebrated satirist, Dr. Suresh Kumar Mishra has carved a niche for himself, with over eight million viewers, readers, and listeners tuning in to his literary musings on the demise of a teacher on the Sahitya AajTak channel. His contributions have earned him prestigious accolades such as the Telangana Hindi Academy’s Shreshtha Navyuva Rachnakaar Samman in 2021, presented by the honorable Chief Minister of Telangana, Mr. Chandrashekhar Rao. He has also been honored with the Vyangya Yatra Ravindranath Tyagi Stairway Award and the Sahitya Srijan Samman, alongside recognition from Prime Minister Narendra Modi and various other esteemed institutions.

Dr. Suresh Kumar Mishra’s journey is not merely one of literary accomplishments but also a testament to his unwavering dedication, creativity, and profound impact on society. His story inspires us to strive for excellence, to use our talents for the betterment of others, and to leave an indelible mark on the world. Today we present his satire The Celebrity Slapstick: A Tale of Adulation and Absurdity

☆ Witful Warmth # 7 ☆

☆ Satire ☆ The Celebrity Slapstick: A Tale of Adulation and Absurdity ☆ Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’

n the dusty bylanes of a rural Indian village, nestled amidst the swaying fields of wheat and the vibrant hues of saris drying in the sun, there lived a man named Raju. Raju, a fervent devotee of the silver screen, worshipped the celluloid gods with a zeal bordering on fanaticism. His humble hut, adorned with torn posters of Bollywood stars, served as a shrine to his unwavering adulation.

One scorching afternoon, as Raju wandered through the bustling marketplace, he stumbled upon a peculiar sight. A crowd had gathered around a rather bewildered figure, who, as it turned out, was none other than the esteemed actor, Rajesh Khanna. Raju’s heart skipped a beat, for here stood before him one of the demigods of his adoration.

Driven by an inexplicable impulse, Raju raised his hand and delivered a resounding slap across Rajesh Khanna’s bemused face. The villagers gasped in astonishment, their eyes widening in disbelief at the audacity of Raju’s act.

But instead of anger or indignation, Rajesh Khanna merely blinked in surprise, his expression a curious mix of shock and amusement. “Well, I must say, that was quite unexpected,” he remarked, rubbing his cheek with exaggerated theatrics. “I suppose you could call it a unique form of admiration.”

Raju, utterly dumbfounded by the actor’s unexpected response, stood rooted to the spot, his cheeks flushed with embarrassment. As he slunk away from the scene, he couldn’t help but wonder at the absurdity of his actions.

Word of the incident spread like wildfire through the village, becoming the talk of the town within moments. Some viewed Raju as a daring rebel, defying societal norms in his bold expression of admiration. Others dismissed him as a mere lunatic, his actions serving as a cautionary tale of the perils of unchecked obsession.

Meanwhile, Rajesh Khanna, ever the consummate performer, seized upon the incident as fodder for his own brand of theatrical charm. Embracing his newfound status as the unwitting recipient of Raju’s impromptu homage, he regaled audiences with exaggerated tales of the infamous slap heard ’round the village.

Yet, beneath the veneer of comedy and spectacle, a deeper undercurrent of existential reflection began to emerge. For Raju, the slap had served as a catalyst for introspection, forcing him to confront the emptiness that lurked beneath his idolatry of celebrity. In his relentless pursuit of stardom, he had lost sight of the simple joys and pleasures of village life, his own identity eclipsed by the larger-than-life personas he worshipped from afar.

As the days turned into weeks, Raju retreated further into solitude, grappling with the profound disillusionment that had taken hold of his soul. The tattered posters that once adorned his walls now seemed to mock him with their hollow promises of fulfillment. In the silence of his solitary existence, he pondered the nature of fame and its corrosive effect on the human spirit.

Meanwhile, Rajesh Khanna continued to revel in the adulation of the villagers, his star burning ever brighter in the sky of rural acclaim. Yet, for all his outward success, he too found himself haunted by a sense of existential malaise. Beneath the facade of cinematic charm lay a profound emptiness, a nagging awareness of the transient nature of fame and the fleeting nature of human connection.

And so, in the quiet moments of their respective contemplations, Raju and Rajesh found themselves united by a common thread of existential longing. In a world where the lines between reality and illusion blurred with every passing moment, they sought solace in the shared absurdity of their human condition.

For in the end, perhaps, it was only through the lens of satire that they could truly glimpse the tragicomic spectacle of life itself. And in that shared moment of absurdity, they found a fleeting glimpse of redemption amidst the chaos of the world.

© Dr. Suresh Kumar Mishra ‘Uratript’

Contact : Mo. +91 73 8657 8657, Email : [email protected]

≈ Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares