मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वेंकीचा सल्ला— भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ वेंकीचा सल्ला— भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

(एका वाटणीच्या संदर्भात एक पंच म्हणून गेलो होतो आणि भरीस भर म्हणून ह्याच दरम्यान माझा ‘सल्ला’ मागण्यासाठी तू हे पत्र लिहालंस. नाही तर अस्मादिकांस कोण विचारतो? असो.) – इथून पुढे 

पहिल्यांदाच खुलासा करतो, पत्रातील हा मजकूर म्हणजे एखाद्या पोक्त व्यक्तीचा सल्ला वगैरे आहे असा गैरसमज करून घेऊ नकोस. माझा सल्ला फक्त मित्रत्वाचा सल्ला असेल. साप्ताहिकांतून व्यावसायिक दृष्ट्या चटपटीत वाटणारा ‘वहिनींचा सल्ला’ वा ‘ताईंचा सल्ला’ नव्हे हे लक्षात ठेव. केवळ तुझ्यासाठी म्हणून हा पत्र प्रपंच. 

खरं सांगायचं झालं तर, संसाराचा गाडा सुरळीत चालवण्याचा रामबाण उपाय अजूनपर्यंत तरी कुणालाही सापडलेला नाही. प्रत्येक माणसाच्या हाताचे ठसे जसे वेगळे असतात तसा प्रत्येकाचा संसारही वेगळा असतो. अमुक एखाद्याचा संसार सुरळीत चालेल की रखडत राहील हे कधीच सांगता येत नाही. 

कॅलिडोस्कोपमध्ये एखादा काचेचा तुकडा टाकून हलवला तर आतील रंग आणि नक्षीकाम बदलत जातात. माणसांची व्यक्तिमत्वे देखील कॅलिडोस्कोप मधील काचेच्या तुकड्यांसारखे प्रत्येक भूमिकेनुसार रंग बदलत जातात. 

ऑफिसात खडूस म्हणून ख्याति असलेला पुरूष घरात बायको आणि मुलांशी फार प्रेमाने वागतो. आई बाबांची लाडकी, भावाची प्रेमळ बहीण आणि सगळ्याच नात्यांत प्रिय असणारी स्त्री, नवर्‍याची पत्नी म्हणून आदर्श असेलच असे नाही. बाहेर मनमिळावू असलेला पुरूष घरात आदर्श पति असेलच असे नाही. कारण माणूस हा यंत्र नाही. त्यामुळे तो कधी कसे वागेल हे सांगता येत नाही. 

पत्नी किंवा पती ही एक व्यक्ति आहे. तिला आणि त्याला स्वतंत्र भावभावना, आवडीनिवडी, अपेक्षा  असतात बहुतेक लोक हेच विसरतात आणि दोघांमधला ‘स्व’ जागृत झाला की, विसंवाद सुरू होतो. सूर जुळले तर मैफल जशी रंगत जाते, तसंच संसारातही सूर जुळावे लागतात. 

ज्या जोडीदारांत समंजसपणा असतो त्यांच्यात वाद कमी प्रमाणात होतात. पण कधीच भांडण किंवा एकमेकात मतभेद झालेले नाहीत, असे जोडपे या भूमंडलावर सापडणे अवघड आहे हे मात्र नक्की. दोन भिन्न वातावरणात वाढलेल्या व्यक्ती एकत्र आल्या की, प्रत्येक गोष्टीत फरक असणारच. संसार ही एक तडजोड असते. कधी त्याला तर कधी तिला थोडंफार बदलावेच लागते.

यशस्वी वैवाहिक जीवन हे योग्य जोडीदारावर अवलंबून नसून आपण स्वत: चांगला जोडीदार असणं किंवा होण्याचा प्रयत्न करणे यावरही संसाराची यशस्विता असते. लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हणतात पण स्वर्ग काही कुणी पाहिलेला नसतो. तो इथेच निर्माण करायचा असतो. हाती आलेला डाव नीट मांडला तर कोणत्याही प्रकारचं लग्न यशस्वी होऊ शकते. मात्र ही आनंद टाळी एका हाताने वाजत नाही.

आज सौ. वहिनी देखील नोकरी करतात. घर आणि नोकरी ही दोन्ही अवधानं सांभाळताना त्यांची किती त्रेधातिरपिट उडत असेल याचा कधी विचार केलायस का? नाही, अर्थात ती तुझी वृत्ती नाही. तुलाही परिस्थितीनुसार थोडं बदलायला हवं. लग्नाआधी तुला प्रत्येक गोष्टीत स्वतःच निर्णय घ्यायची सवय असेल. पण लग्नानंतर मी म्हणेन तीच पूर्व दिशा असं म्हणणार्‍या जोडीदारासोबत कुणाचंच पटत नाही. एकमेकांचं म्हणणं शांतपणे ऐकून निर्णय घेणं तर गरजेचं आहे. तुमची मतं कुठं जुळत नाहीत त्यावर दोघं मिळून चर्चा करा. त्यामुळे कदाचित आपली ताठर भूमिका लवचिक होण्याची शक्यताही असते. 

तुम्ही बोलायला कशी सुरुवात करता त्यावर त्याचा शेवट अवलंबून असतो. उद्धटपणे बोलण्याने समस्येतून तोडगा निघण्याची शक्यताच नसते. कित्येकदा पती-पत्नीतील वादाचं कारण इतकं क्षुल्लक असतं की त्यावर त्यांनी शांतपणे विचार केला की आपण विनाकारण ह्या गोष्टींसाठी भांडत बसलो हे त्यांच्या लक्षात येते.   

जिथे आई-वडीलांमध्ये वैचारिक सामंजस्य असते त्या घरातील मुले मनाने निकोप असतात. पती-पत्नीच्या संबंधातील ताणतणावाचे पडसाद मुलांवर पडतातच. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणं ही तुझीदेखील जबाबदारी आहे. काचेच्या वस्तूंना तडा जाऊ नये म्हणून ‘ग्लास, हॅंडल विथ केअर’ अशी सूचना असते, तसंच कुटुंबातील आनंद टिकवून ठेवण्यासाठी दोघांनीही काळजी घ्यायला हवी.

कुणाच्या सल्ल्याने कुठलेही संसार तरत नसतात. आपला मार्ग आपणच काढावा. या पत्र वाचनाच्या शिक्षेनंतर यापुढे तरी ‘वेंकीचा सल्ला’ टाळशील अशी अपेक्षा करून रजा घेतो. पत्रोत्तराची वाट पाहतो. 

चार ओळीत या पत्राचं उत्तर आलं. ‘आम्ही उभयता तुमचे आभारी आहोत. यापुढे ह्या विषयावर तुमच्या सल्ल्याची आवश्यकता भासणार नाही ह्याची खात्री देतो. सहकुटुंब नागपूरला या. तुमचे स्वागत करायला आम्हाला आवडेल.’ 

त्यानंतर मात्र माझा सल्ला कुणी मागितला नाही. मागितले असते तर याच पत्राची छायांकन प्रत पाठवून दिली असती.  

मागच्या वर्षी वसंता सहकुटुंब दक्षिण भारत सहलीला चालला होता. आधीच कळवल्याने बेंगलूरू स्टेशनवर त्यांची भेट घेतली. अर्ध्या तासाच्या भेटीत त्या उभयतांना काय बोलू अन काय नको असं झालं होतं. मी सहज विचारलं, ‘वसंता प्रमोशनसाठी प्रयत्नच केला नाहीस वाटतं.’ 

त्यावर वसंता म्हणाला, ‘हे बघ वेंकी, माणसाला काय हवं असतं रे? आम्ही दोघेही कमावतो. वसुधासारखी समंजस जोडीदार मिळाली. चांगल्या मार्कांनी पास होणारी मुलं आहेत, स्वत:चं असं एक छोटेसे घर आणि महत्वाचे म्हणजे माझ्या आईवडिलांचं कृपाछत्र माझ्या डोक्यावर आहे ह्यातच मी समाधानी आहे.’ 

तितक्यात गाडीने शिट्टी दिली. एवढ्या प्रवासाच्या दगदगीत देखील वहिनींच्या चेहर्‍यावर एक असीम तृप्ती दिसत होती. वसंताचे आई वडील नातवांशी गप्पा मारण्यात मश्गुल होते. गाडीने गती घेतली. थोड्याच वेळेत वसंताचा हेलकावणारा हात माझ्या नजरेआड झाला. त्यानंतर आमची भेट झाली नाही. परंतु वसंता व्हॉट्सअपच्या सौजन्याने, मला कित्येक  उपदेशपर संदेश नियमितपणे पाठवत असतो.

– समाप्त –

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पिवळं विमान…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “पिवळं विमान…” ☆ श्री मंगेश मधुकर 

अपघातामुळे सक्तीची विश्रांती घ्यावी लागली.प्रचंड बोर झालेलो पण नाईलाज.मित्राचा फोन आला “काय रे,काय उद्योग करून घेतला.”

“विशेष नाही.छोटासा अक्सीडेंट झाला”

“काही सीरियस नाही ना”

“अं हं,मुका मार जास्त लागलाय.”

“नक्की काय झालं.” 

“पिवळ्या विमानानं धावती भेट घेतली.”

“कुठल्या विमानानं??”

“पिवळ्या.रोज सकाळी लेकीला शाळेत सोडायला जातोस तेव्हा पाहिलं असशीलच की….”

“कशाला डोक्याची मंडई करतोस.नीट सांग नाहीतर फोन ठेवतो”मित्र वैतागला.

“अरे स्कूल व्हॅनची धडक बसली”

“असं स्पष्ट बोल की,उगीच विमान वगैरे कशाला??”

“बस,व्हॅन,रिक्षा रस्त्यावर सकाळी विमानाच्या स्पीडनं तर पळतात.” 

“हो रे,कशाही गाड्या चालवतात.भीतीच वाटते.खरंच रस्त्यावरची विमानच.काहीतरी करायला पाहिजे.”

“एक कल्पना आहे.तुझी मदत पाहिजे”

“नक्की!!काय करायचे ते बोल.”

“व्हिडिओ शूट करायचयं.कुठं,कधी,कसं ते सांगतो.आपल्या भागातील प्रसिद्ध शाळेच्या प्रिन्सिपलची अपॉईटमेंट मिळालीय.सोबत येतोस का”

“डन,काळजी हे”मित्राने फोन ठेवला.ठरल्याप्रमाणं प्रिन्सिपलांना भेटलो.उपक्रमाची माहिती दिली.त्यांनीसुद्धा लगेचच  सहकार्य करण्याची तयारी दाखवली आणि कार्यक्रम ठरला. 

रविवारी सकाळी शाळेच्या हॉलमध्ये प्रिन्सिपल,शिक्षक,पालक प्रतिनिधी आणि सुमारे पंचवीस स्कूल बस,व्हॅन,रिक्षाचे ड्रायव्हर जमले होते.नक्की कसला कार्यक्रम आहे याविषयी सर्वांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती.“पिवळं विमान” व्हाटसप ग्रुपमध्ये ऍड केल्याचं प्रत्येकाच्या मोबाईलवर नोटिफिकेशन आल्यावर आपसात चर्चा सुरू झाल्या.तितक्यात प्रिन्सिपल मॅडमनी बोलायला सुरवात केली.“आज सुट्टी असूनही आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल खूप खूप आभार.एका चांगल्या कारणासाठी ग्रुप तयार केलाय.कृपया कोणीही ग्रुपमधून बाहेर पडू नये.आज इथं का जमलोय,काय करायचं सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.जास्त वेळ घेणार नाही.”प्रिन्सिपल मॅडमनी थोडक्यात प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सूत्र माझ्याकडं दिली.वॉकरच्या आधारानं उभं राहत बोलायला सुरवात केली. “पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद!!नवीन ग्रुपवर शॉर्ट व्हिडिओज पाठवलेत ते आधी पहा.नंतर बोलू” व्हिडिओ बघितल्यावर चूळबुळ सुरू झाली. 

“हे काय आहे”वैतागलेल्या एकानं विचारलं.

“आपल्याच शाळेच्या गाड्यांचे गेल्या आठ दिवसातले व्हीडिओज.” माझ्या उत्तरावर एकदम गदारोळ सुरू झाला. काही ड्रायव्हर तावातावानं,ओरडून बोलायला लागले. 

“आम्ही आमचं काम प्रामाणिक पणे करतो आहोत.उगीच चुकीची माहिती पसरवू नका.”

“बदनामी करण्यासाठी बोलावलंयं का?तसं असेल तर आम्ही पण गप्प बसणार नाही.”

“सगळी पोरं सेफ आहेत.तरी सुद्धा असले विडिओ कशाला दाखवता”

“रस्ता म्हटल्यावर किरकोळ गोष्टी होणारच.आम्ही व्यवस्थितच गाड्या चालवतो.”

“पोटच्या पोरांइतकीच गाडीतल्या मुलांची काळजी घेतो.”

“उगीच शाळेच्या आणि पालकांच्या मनात काहीबाही भरून देऊ नका”

“तुम्ही कोण कुठले.शाळेशी काय संबंध” चिडलेले ड्रायव्हर संतापून बोलत होते.प्रिन्सिपल मॅडमनी विंनती केल्यावर सगळे शांत झाले.मी पुन्हा बोलायला सुरवात केली“सर्वप्रथम एक गोष्ट क्लियर करतो की इथं कोणाला दोष देण्यासाठी किवा जाब विचारण्यासाठी हा कार्यक्रम नाहीये.”

“मग हे व्हिडिओ कशासाठी?.मुलांची काळजी घेतो.त्यांचे लाड करतो ते दिसलं नाही का?”एकाच्या बोलण्यावर बाकीच्यांनी ‘बरोबरयं’ म्हणत माना डोलावल्या. 

“तुमच्याविषयी तक्रार नाही परंतु हे व्हिडिओज सुद्धा वस्तुस्थिती आहे.”

“आधी तुम्ही कोण ते सांगा.”

“पंधरा दिवसांपूर्वी सकाळी स्कूल व्हॅननं मला उडवलं. नशीब बलवत्तर म्हणून पायावर निभावलं.”

“रस्त्यावर अपघात होणारच.नेहमी दोष ड्रायव्हरचा नसतो”

“शंभर टक्के मान्य.माझ्या केसमध्ये ड्रायव्हर खूप घाईत,मोबाइलवर बोलत गाडी चालवत होता.”

“मग त्याच्यावर कारवाई करायची.”

“पण त्यानं मूळ प्रश्न सुटणार नाहीये.”

“एकानं चूक केली म्हणून सगळे वाईट नसतात.”

“रोज रिस्क घेऊन ओव्हरटेक करता,गरज नसताना कट मारता,रॉंग साइडनं गाडी घुसवता,गाडी सोबत फोनही चालूच असतो.हे खूप धोक्याचं आहे.आतापर्यंत काही गंभीर घटना झाली नाही परंतु यापुढे कधीच होणार नाही ही खात्री नाही.त्यात गाडीत लहान मुलं असतात.बेफाम गाडी चालवून त्यांच्यासमोर काय आदर्श ठेवत आहोत.याचा जरा विचार करा.सर्वांना विनंती आहे की विनाकारण जीव धोक्यात घालू  नका.” 

“पुढे काय होईल याची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही.” 

“करेक्ट पण काळजी घेणं तर आपल्या हातात आहे.वेळ गाठण्याससाठी म्हणून मन मानेल तशी गाडी चालवणं बरोबर नाही.स्वतःबरोबर  अनेक पालकांचा काळजाचा तुकडा तुमच्यासोबत असतो त्याचाही जीव पणाला लावता.” बोलण्याचा परिणाम तात्काळ दिसला.हॉलमध्ये चिडिचूप शांतता पसरली.

“माफ करा.साहेब.तुमचं बोलणं ऐकून डोळे उघडले.”एकजण हात जोडत म्हणाला. 

“तुम्ही माफी मागावी म्हणून नाही तर बेदरकारपणे सुसाट वेगानं जाणाऱ्या गाड्या पाहून पोटात गोळा येतो.तसंही आता घराबाहेर पडलं की जीव मुठीत घेऊनच फिरावं लागतं.हे अनेकांचं मत आहे.मला ठेच लागल्यावर लक्षात आलं की नुसती चडफड करण्यापेक्षा तुमच्याशी एकदा संवाद साधावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला.कोणावरही टीका करण्याचा हेतू नाही.कृपया गैरसमज करून घेऊ नये, ही नम्र विनंती आणि मनपूर्वक धन्यवाद!!”

“साहेब,आजपासून आम्ही काळजी घेऊ.हा ग्रुप आता आम्ही चालवू.आमच्या गाड्यांना तुम्ही दिलेलं “पिवळं विमान” नाव भारीयं.आता गाडीचा स्पीड वाढला की हे नाव नक्की आठवेल आणि आपसूकच कंट्रोल होईल.”ड्रायव्हरच्या दिलखुलास बोलण्यावर ‘हो, हो’ म्हणत सगळे मोठ्यानं हसले.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अमीन सयानी — ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ अमीन सयानी — ☆ श्री प्रसाद जोग ☆

अमीन सयानी

नुकतीच अमीन सयानी यांचं वयाच्या ९१ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्याने निधन झाल्याची बातमी आली आणि बिनाका गीतमालाचे दिवस आठवले.

अमीन सयानी यांचा ‘बहनों और भाईयों ’ हा आवाज रेडिओमधून आला की दर बुधवारी लोक सरसावून बसायचे ,कारण बिनाका गीतमाला सुरु व्हायची. कोणताही कार्यक्रम असुदे , तो रंगतदार व्हायला पाहिजे तर त्याचा निवेदक देखील तसाच हुशार, अभ्यासपूर्ण असला पाहिजे म्हणजे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत जातोच जातो.

एके काळी याच अमीन सयानीनी ‘आवाजकी दुनियाके दोस्तो’ अशी स्नेहपूर्ण साद घालून रसिकांच्या मनावर आणि हृदयावर ‘बिनाका गीतमाला’ या प्रचंड लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वर्ष राज्य गाजवलं होत. तोच लाघवी, आर्जवी आवाज अजूनही मंत्रमुग्ध करतो.गेली कित्येक वर्ष मा.अमीन सयानी हे पडद्यामागे राहूनच श्रोत्यांचं मनोरंजन करत होते.

नभोवाणीवरील निवेदकांच्या बाबतीत जेव्हा चर्चा सुरू होते तेव्हा एका नावापुढे सर्वजण नतमस्तक होतात तो आवाज असतो अमीन सयानीचा. “जी हाँऽऽ प्यारे बहेनों और भाईयों, तो अब अगली पायदानपर पेश होने जा रहा है…” असा आवाज ऐकला, की आजही तो काळ सर्रकन डोळ्यांपुढे चमकून जातो. थोडीथोडकी नाही तब्बल ४२ वर्षे त्यांनी ‘बिनाका गीतमाला’चे प्रसारण केले.

आकाशवाणीच्या इतिहासातील हा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ठरला. या माध्यमातून भारतीय सिनेमाला घराघरापर्यंत पोचवण्यात अमीन सयानींचा फार मोठा सहभाग होता . त्यांनी रेडीओवर अनेक प्रायोजित कार्यक्रम केले. त्या काळातील सर्वच कार्यक्रम ‘लाजवाब’ होते. एस. कुमार का फिल्मी मुकदमा, सॅरीडॉन के साथी, शालीमार सुपरलॅक जोडी, बोर्नव्हिटा क्वीज कॉन्टेस्ट, मराठा दरबार की महकती बाते, रिको मुस्कुराहटे.

जाहिरात आणि विपणन या शब्दांची जादू समाजापर्यंत पोचायच्या कितीतरी वर्षे अगोदर अमीन सयानी यांनी ती आयडिया यशस्वी करून दाखवली होती. १९५२ सालापासून रेडिओ सिलोनवर त्यांचा ‘बिनाका गीतमाला’ हा कार्यक्रम सुरू झाला. आजच्या पिढीला कदाचित खोटे वाटेल पण प्रत्येक बुधवारी रात्री ८ वाजता रस्ते निर्मनुष्य असायचे. सारा देश त्यावेळी फक्त आणि फक्त बिनाका ऐकत असायचा. श्रोत्यांशी मनापासून साधलेला संवाद, सोपी-सुलभ भाषाशैली, उत्कंठा वाढवणारे रसाळ निवेदन आणि सोबतीला सिनेमाच्या अस्सल सुवर्णकाळातील गाणी! रसिकांचे या स्वराशी नाते जुळले ते कायमचेच.

साठच्या दशकात एकदा ‘बिनाका’ सादर करताना एका पित्याने त्यांना पाठवलेले पत्र त्यांनी वाचून दाखवले. त्या पित्याचा एकुलता एक मुलगा काही कारणाने रुसून घर सोडून गेला होता. आईवडील खूप दु:खात होते. त्या काळात संपर्काची माध्यमे अतिशय कमी होती. त्या कुटुंबाला ‘बिनाका’ ऐकायची भारी आवड होती. त्या पित्याने अमीनभाईंना विनंती केली, की जगाच्या पाठीवर माझा मुलगा कुठेही असला तरी बिनाका ऐकल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही या कार्यक्रमातून त्याला घरी परतण्याचा सल्ला द्या. तो जरूर तुमचे ऐकेल. अमीन सयानी यांनी ते पत्र वाचून दाखवले. आणि काय आश्चर्य! महिन्याभरात त्या पित्याचे पत्र आले, मुलगा सुखरूप परत घरी आल्याचे.

त्या वेळेस तर गाणी ऐकण्याची साधने कमी होती . गाणी ऐकायची तर सिनेमाला जाऊन बसायचं नाही तर रेडिओ सिलोन ऐकायचा, कारण केंद्रीय माहिती व नभोवाणी खात्याचे मंत्री डॉक्टर बी. व्ही. केसकर यांनी ऑल इंडिया रेडिओवर सिनेसंगीत वाजवण्यास बंदी घातली होती. त्याचाच फायदा सिलोनला मिळाला.’’हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात बिनाका गीतमाला ‘माइलस्टोन’च्या रूपाने उभी आहे आणि अमीन सयानी त्याचे अविभाज्य घटक. ३ डिसेंबर १९५२ ला बिनाका गीतमाला सुरु झाली आणि चित्रपटसंगीताची थक्क करून सोडणारी अफाट लोकप्रियता जगासमोर आली.

मा.अमीन सयानी  सांगत असायचे  ‘‘त्या वेळेस ‘हिट परेड’ नावाचा इंग्लिश कार्यक्रम रेडिओ सिलोनवर होत असे. सहज एक कल्पना निघाली, हाच कार्यक्रम हिंदीतून पेश केला तर! एक प्रयोग म्हणून गीतमाला सुरू झाली. सात-आठ गाणी वाजवायची त्यांची क्रमवारी बदलून, लोकप्रियतेनुसार त्यांना नंबर देऊन ऐकणाऱ्यांनी जॅकपॉट जिंकायचा. त्या वेळेस टपाल, पत्रं एवढं एकच माध्यम होतं. रेडिओ सिलोनच्या अधिकाऱ्यांनी चाळीस ते पन्नास पत्रांची अपेक्षा ठेवत यंत्रणा सज्ज केली होती. प्रत्यक्षात नऊ हजार पत्रं आली. हा धक्का जोरदार होता आणि पहिलं वर्ष संपता संपता पत्रांचा आकडा प्रत्येक आठवडय़ाला साठ हजारांपर्यंत पोहोचला.’’

बिनाका गीतमालाचा इतिहास मा.अमीन सायानी यांना पाठ होता . शंकर जयकिशन, नौशादपासून मदनमोहन पर्यंत आणि सचिनदेव बर्मन पासून राहुलदेव बर्मन पर्यंत त्यांच्यापाशी आठवणींचा खजिना होता.  

याच संगीतकारांच्या अमर्याद कर्तृत्वाच्या छायेत मा.अमीन सायानी यांचे व्यक्तिमत्व फुलले होते.

याच संगीतकारांच्या अमर्याद कर्तृत्वाच्या छायेत मा.अमीन सायानी यांचे व्यक्तिमत्व फुलले होते.

 जुन्या काळात तुमचे आमचे सर्वांचे आयुष्य आनंदी करणाऱ्या अमीन सयानी यांना विनम्र अभिवादन.

© श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जात… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ जात… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

जातीचं काय घेऊन बसलात राव .. अरे जात म्हणजे काय ? 

माहित तरी आहे का..?

अरे कपडे शिवणारा शिंपी, !

तेल काढणारा तेली, !

केस कापणारा न्हावी.!

लाकूड तोडणारा सुतार.!

दूध टाकणारा गवळी.!

गावोगावी भटकणारा बंजारा.!

पुजा-अर्चा, पौरोहित्य करणारा ब्राह्मण.!

वृक्ष लावणारा माळी.!

आणि लढाई लढणारा क्षत्रिय.!

*

आलं का काही डोस्क्यात..?

आरं काम म्हणजे जात.

आता भांडत बसण्यापेक्षा जाती बदला.

आता इंजीनीयर ही नवी जात .

कॉम्प्यूटर, केमिकल ही पोटजात.

“सी. ए” ही पोटजात,

“एम. बी. ए” ही नवी जात.

*

बदला की राव कवाचं तेच धरुन बसलात!

घरीच दाढी करता नवं? 

मग काय न्हावी का?

बुटाला पालीश करता नव्हं?

मग काय चांभार का?

गैलरी टेरेस वर झाडे लावता ना !

मग माळी का?

घरच्या घरीच पुजा-अर्चा करता नव्ह?..,,मग ब्राम्हण का ?

दूध टाकणारा मुलगा गवळी का?

*

आरं बायकोच्या धाकानं का हुईना संडास साफ करता नव्हं?

*

आता अजून बोलाया लावू नका !

आरं कोण मोठा कोण छोटा? 

ह्याला बी दोन हात त्याला बी दोनच नव्हं?

ह्यालाबी खायला लागतं आणि त्याला पण?

*

आरं कामानं मोठं व्हा जातीनं न्हाय!

आरं तुम्ही ह्या जातीत जन्माला आला, 

हा काय तुमचा पराक्रम हाय व्हय?

मंग कशाला उगीचच बोंभाटा करता राव ?

*

सगळ्याला आता काम हाय!

सगळ्याला शिक्षण हाय!

शिकायचं कामं करायचे!

पोट भरायचे!

की हे नसते उद्योग करायचे!

*

*एक नवीन विचारधारा ! 

कवी – अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आकाशाशी जडले नाते… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आकाशाशी जडले नाते?  सुश्री वर्षा बालगोपाल 

पद न वाजवता गूपचूप येऊन का

नभ सख्याने ठरवले डोळे झाकायचे?

पद गात होती धरा सखी तन्मयतेने

भाळला आणी विसरला जे करायचे॥

*

लहर आली त्याला ठरवले होते जणू

खोडी काढून तिची थोडे उचकवायचे

लहर प्रितीची आली, पहातच राहिले

मुग्ध होऊन  विसरले भान जगताचे॥

*

कर घेतले करात नकळत नभाने

शपथेने म्हणे जन्मांतरी ना  सोडायचे

कर माझ्याशी लग्न वदे धरा प्रेमे मग

आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #220 – कविता – ☆ दो मुक्तक -चाह शहद की है तो… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का चौकीदार”   महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है  दो मुक्तक -चाह शहद की है तो…” ।)

☆ तन्मय साहित्य  #219 ☆

☆ दो मुक्तक -चाह शहद की है तो… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

चाह शहद की है तो,

मधुमक्खियाँ पालना होगा

मधुर रहे संबंध

व्यर्थ संवाद टालना होगा

शीत घाम बरसात

निभाना होगा हर मौसम को,

है गुलाब की चाह

कंटकों को संभालना होगा।

*

चाह शहद की है तो,

मधुमक्खीयाँ जरूरी है

बिना कष्ट अनुभूति

सुखों की चाह अधूरी है

बीच कंटकों के

गुलाब आभा बिखराता है,

पाना है निष्कर्ष

बात चीत बहुत जरुरी है।

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश के नवगीत # 44 ☆ एक गीत वसंत… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

श्री जय प्रकाश श्रीवास्तव

(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी  के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ  “जय  प्रकाश के नवगीत ”  के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं।  आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “एक गीत वसंत…” ।

✍ जय प्रकाश के नवगीत # 43 ☆  एक गीत वसंत… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव

पीत वसन हुई धरा

और मौसम हल्दिया

किसने आकर गाल पर

रँग वसंती मल दिया।

 

आम बौराया फिरे

गंध महुए से चुए

वन के कारोबार सारे

टेसू-सेमल के हुए

 

बैठ कोयल डाल पर

गा रही पिया-पिया।

 

स्नेह हरियाली लिए

खेत आँचल पसारे

पहन स्वर्णिम बालियाँ

रूप धरती सँवारे

 

बाँध सपने आँख से

प्रीति ने मन छू लिया।

 

तान बैठा चँदोबा

मस्तियों की ले गुलाल

आ गया मनचला फागुन

बाँटते सुख के रुमाल

 

बहकी-बहकी हवा ने

गंध से मुँह धो लिया ।

***

© श्री जय प्रकाश श्रीवास्तव

सम्पर्क : आई.सी. 5, सैनिक सोसायटी शक्ति नगर, जबलपुर, (म.प्र.)

मो.07869193927,

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – विपथ ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – विपथ ? ?

चलो शुरू करें

वहीं से यात्रा;

जहाँ तुमने

छोड़ दिया था साथ,

ख़बरदार!

इस मुगालते में

मत रहना कि

मैं टूट गया हूँ

तुम्हारे विश्वासघात से

और फिर हिस्सा बन जाऊँगा

तुम्हारे उस ‘यूज एण्ड थ्रो’ का,

मैं तो बस ,

एक और

अवसर देना चाहता हूँ तुम्हें;

ताकि तुम

किसी गंतव्य तक तो पहुँचो,

मेरा क्या है,

मैं तो शाश्वत चल रहा हूँ;

पर स्मरण रखना,

साथ छोड़ने वाले

कभी यात्रा पूरी नहीं कर पाए;

स्वाभाविक है कि वे

कभी पथिक भी नहीं कहलाए!

© संजय भारद्वाज  

(रात्रि 9: 45 बजे, 3 जून 2016)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 🕉️ मार्गशीर्ष साधना सम्पन्न हुई। अगली साधना की सूचना हम शीघ्र करेंगे। 🕉️ 💥

नुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ लघुकथा – “एक दूसरे गधे की आत्मकथा” ☆ डॉ कुंवर प्रेमिल ☆

डॉ कुंवर प्रेमिल

(संस्कारधानी जबलपुर के वरिष्ठतम साहित्यकार डॉ कुंवर प्रेमिल जी को  विगत 50 वर्षों से लघुकथा, कहानी, व्यंग्य में सतत लेखन का अनुभव हैं। क्षितिज लघुकथा रत्न सम्मान 2023 से सम्मानित। अब तक 450 से अधिक लघुकथाएं रचित एवं बारह पुस्तकें प्रकाशित। 2009 से प्रतिनिधि लघुकथाएं  (वार्षिक)  का  सम्पादन  एवं ककुभ पत्रिका का प्रकाशन और सम्पादन। आपने लघु कथा को लेकर कई  प्रयोग किये हैं।  आपकी लघुकथा ‘पूर्वाभ्यास’ को उत्तर महाराष्ट्र विश्वविद्यालय, जलगांव के द्वितीय वर्ष स्नातक पाठ्यक्रम सत्र 2019-20 में शामिल किया गया है। वरिष्ठतम  साहित्यकारों  की पीढ़ी ने  उम्र के इस पड़ाव पर आने तक जीवन की कई  सामाजिक समस्याओं से स्वयं की पीढ़ी  एवं आने वाली पीढ़ियों को बचाकर वर्तमान तक का लम्बा सफर तय किया है, जो कदाचित उनकी रचनाओं में झलकता है। हम लोग इस पीढ़ी का आशीर्वाद पाकर कृतज्ञ हैं। आज प्रस्तुत हैआपकी  एक विचारणीय लघुकथा –एक दूसरे गधे की आत्मकथा“.)

☆ लघुकथा – एक दूसरे गधे की आत्मकथा ☆ डॉ कुंवर प्रेमिल

सुप्रसिद्ध कहानीकार कृष्णचंदर जी ने लिखी थी एक गधे की आत्मकथा। गधा हीरो बन गया था। कहानीकार ने गधे के व्यक्तित्व एवं कृतित्व को आदमी से जोड़कर गधा विशेष बना दिया था।

गधे अमूमन गुरुजी की क्लास में पाए जाते हैं। बाप अपनी संतानों को गधे से संबोधित करते हैं। गधे आगे की सीढ़ी नहीं चढ़ पाए।

‘तुम तो गधे हो’ का तकिया कलाम सुनकर गधा मुस्कुरा कर आगे बढ़े जाता है।

एक दिन सुबह सुबह सब्जी भाजी लेने गया तो वहां गधे जी का जलवा देखने मिला। एक बड़ी सी भीड़ गधे साहब को घेरकर खड़ी थी। गधे साहब शान से भीड़ में गोल गोल घूम रहे थे।

गधे वाले ने गधे से पूछा सबसे बड़ा गधा कौन?

गधे ने दो तीन चक्कर लगाये और अपने मालिक के सामने खड़ा हो गया।

भीड़ तालियां बजा कर हंसने लगी। गधा भी मुस्कुरा रहा था।

गधे वाले ने पूछा-मोटा आदमी कौन?

गधे ने चक्कर लगाए और एक आदमी के सामने आकर खडा हो गया। आदमी जरूर सबसे मोटा था।

भीड ने तालियां बजा दी।

गधे वाले ने सबसे दुबला पतला कौन, सबसे कंजूस कौन पूछा जो गधे ने उन्हें भी  ढूंढ निकाला।

जमकर तालियां बजती रहीं।

अब गधे वाले ने पूछा – अपनी बीबी से पिटता कौन?

अजीब दृश्य था। भीड़ तितर बितर हो गई। लोग भाग खड़े हुए। पता नहीं किसके सामने आकर गधा खड़ा हो जाए और बड़े बेआबरु होकर तेरे कूचे से निकले हम वाली स्थिति बन जाए। मैं भी पतली गली से निकल गया।

कृष्णचंद्रर जी को क्या पता था कि इतने वर्षो बाद गधे के वंश में कोई ऐसा गधा पैदा होगा जो आदमी के कान काट लेगा।

मैंने बकाया गधे साहब के हाथ जोड़े और सब्जी भाजी लेने चला गया।

उस दिन की सुबह गधे के नाम थी। सुप्रभातम।

❤️

© डॉ कुँवर प्रेमिल

संपादक प्रतिनिधि लघुकथाएं

संपर्क – एम आई जी -8, विजय नगर, जबलपुर – 482 002 मध्यप्रदेश मोबाइल 9301822782

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ ग़मज़दा बोलिये हैं किस ग़म से… ☆ श्री अरुण कुमार दुबे ☆

श्री अरुण कुमार दुबे

(वरिष्ठ साहित्यकार श्री अरुण कुमार दुबे जी, उप पुलिस अधीक्षक पद से मध्य प्रदेश पुलिस विभाग से सेवा निवृत्त हुए हैं । संक्षिप्त परिचय ->> शिक्षा – एम. एस .सी. प्राणी शास्त्र। साहित्य – काव्य विधा गीत, ग़ज़ल, छंद लेखन में विशेष अभिरुचि। आज प्रस्तुत है, आपकी एक भाव प्रवण रचना “ग़मज़दा बोलिये हैं किस ग़म से“)

✍ ग़मज़दा बोलिये हैं किस ग़म से… ☆ श्री अरुण कुमार दुबे 

बेरुखी आप क्यों दिखाते हैं

खुद न  आते न ही बुलाते हैं

 *

एक वादा नहीं किया पूरा

आप मिस खूब पर बनाते हैं

 *

ग़मज़दा बोलिये हैं किस ग़म से

बेवज़ह इतना मुस्कराते हैं

 *

हाथ अपना भी दोसती को बढ़ा

सिलसिला हम ही हम चलाते हैं

 *

नाम उनका कभी नहीं मिटता

जो लहू देश को बहाते हैं

 *

रब्त जो प्यार का नहीं हमसे

रात भर रोज़ क्यों जगाते हैं

 *

रिज़्क़ दे ज़ीस्त में जो इंसा को

इल्म ऐसा नहीं सिखाते हैं

 *

अब चुनावों में जीत हो उनकी

दाम का जोर जो लगाते हैं

 *

ए अरुण इल्म बह्र का न हमें

शाइरी करते गुनगुनाते हैं

© श्री अरुण कुमार दुबे

सम्पर्क : 5, सिविल लाइन्स सागर मध्य प्रदेश

सिरThanks मोबाइल : 9425172009 Email : arunkdubeynidhi@gmail. com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares