हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सलिल प्रवाह # 178 ☆ दोहा सलिला ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ ☆

आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि।  संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताह रविवार को  “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है दोहा सलिला।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 178 ☆

☆ दोहा सलिला ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ ☆

तज कर वाद-विवाद कर, आँसू का अनुवाद.

राग-विराग भुला “सलिल”, सुख पा कर अनुराग.

.

भट का शौर्य न हारता, नागर धरता धीर.

हरि से हारे आपदा, बौनी होती पीर.

.

प्राची से आ अरुणिमा, देती है संदेश.

हो निरोग ले तूलिका, रच कुछ नया विशेष.

.

साँस पटरियों पर रही, जीवन-गाड़ी दौड़.

ईधन आस न कम पड़े, प्यास-प्रयास ने छोड़.

.

इसको भारी जिलहरी, भक्ति कर रहा नित्य.

उसे रुची है तिलहरी, लिखता सत्य अनित्य.

.

यह प्रशांत तर्रार वह, माया खेले मौन.

अजय रमेश रमा सहित, वर्ना पूछे कौन?

.

सत्या निष्ठा सिंह सदृश, भूली आत्म प्रताप.

स्वार्थ न वर सर्वार्थ तज, मिले आप से आप.

.

नेह नर्मदा में नहा, कलकल करें निनाद.

किलकिल करे नहीं लहर, रहे सदा आबाद.

©  आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

२८.११.२०१७

संपर्क: विश्ववाणी हिंदी संस्थान, ४०१ विजय अपार्टमेंट, नेपियर टाउन, जबलपुर ४८२००१,

चलभाष: ९४२५१८३२४४  ईमेल: [email protected]

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – सुश्री अरुणा मुल्हेरकर – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री अरुणा मुल्हेरकर

💐अ भि नं द न 💐

शब्दसेतू साहित्य मंच, पुणे यांनी मराठी भाषा गौरव  दिनानिमित्त आयोजित केलेल्या काव्यस्पर्धेत वृत्तबद्ध या प्रकारात, आपल्या समुहातील ज्येष्ठ  साहित्यिका   सुश्री अरुणा मुल्हेरकर यांना उत्कृष्ट  काव्य लेखन पुरस्कार  प्राप्त  झाला आहे.

💐 ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे सुश्री अरुणा मुल्हेरकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 💐

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अमृतवाणी… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ अमृतवाणी… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

(दिंडी वृत्त. मात्रा ९ + १०)

(मायमराठी काव्य स्पर्धेतील उत्कृष्ट वृत्तबद्ध  काव्य पुरस्कार  प्राप्त  कविता)

मधुर भाषा ही मराठीच महान

किती सांगू का धरावा अभिमान

*

उगम भाषेचा संस्कृतात दिसतो

शब्द अपभ्रंशी प्राकृतात असतो

*

ज्ञानदेवांनी कथियले गीतेस

ज्ञान दिधले ते सामान्य जनतेस

*

नामदेवांची वाणी अभंगात

वीण भक्तीची भजन कीर्तनात

*

संत काव्यासह पंत काव्य थोर

बाज रचनेचा करी भावविभोर

*

शाहिरांचे हो ऐकुनी पवाडे

स्फूर्ति संचरली उघडली कवाडे

*

लावणीचे ते रूप मनोहारी

साज शब्दांचा घाव मना भारी

*

श्लेश अनुप्रासे यमक अलंकारे

रूप खुलते हो तिचे बहू न्यारे

*

पिढी आता का बदलली विचारे

स्वैर झाले रे शब्द शब्द सारे

*

मुक्त वावरती नको छंद मात्रा

नको नियमांचा जाच कसा गात्रा

*

पानिपत स्वामी अन् ययाती अमर

ना गणती मुळी सारस्वता अक्षर

*

नाट्यसंपद ही रंगभुमी अमुची

गाजलेली ती गंधर्व कुळीची

*

मराठी बोली वळणे तिला फार

कधी मोरांबा मिरचीचा अचार

*

जपा जनहो हा मराठीच बाणा

नको परभाषा मराठीच जाणा

*

गौरवाचा दिन आज मराठीचा

वाढदिन करुया शिरवाडकरांचा

(टीप~चौथ्या कडव्यात,दुसर्‍या ओळीत एका मात्रेची सूट घेतली आहे)

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सुरक्षा सप्ताह ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ मराठी चित्रपटांचा ‘दादा ‘ ☆ सौ कल्याणी केळकर बापट

14 मार्च !  विनोदी चित्रपटांतील बेताज बादशाह दादा कोंडके ह्यांचा स्मृतिदिन.

चित्रपट हे बहुतांश लोकांना आवडत असले तरी त्यामध्ये आवडीनिवडी ह्या भिन्न असतात. काहींना भावनाप्रधान चित्रपट आवडतात तर काहींना वास्तविकता असलेले. काहींना शांत संथ चित्रपट आवडतात तर काहींना दे दणादण हाणामारीचे, काहीं कथेला जास्त महत्त्व देतात  तर काहीं गाणे संगीत ह्यांना. तसचं काही लोक कलाकार बघून चित्रपट बघतात तर काही दिग्दर्शक बघून.

मात्र सगळ्यांना आवडतं असलेले चित्रपट कोणते तर एकमताने उत्तर येईल विनोदी चित्रपट. एकतर ह्या चित्रपटांनी मनावरचा ताण नाहीसा होतो,समजून घ्यायला फारशी बुद्धी वापरावी लागत नाही. अर्थातच विनोदी चित्रपटांमध्येही खूप विवीधता आढळते विनोद हा वेगवेगळ्या रसांनी दर्शविता येतो.

14 मार्च  ही   तारीख तर जणू नियतीने आपल्या कला साहित्य ह्या क्षेत्रावर चांगला घाला घालण्यासाठीच जणू राखीव ठेवली असावी. आजच्या तारखेला ज्ञानपीठ  पुरस्कार प्राप्त विंदा करंदीकर, मराठी गझलचे बादशहा सुरेश भट व वेगळ्या धर्तीच्या विनोदी चित्रपटाचे बादशहा दादा कोंडके ह्यांचा स्मृतीदिन.

दादा कोंडके हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. दादा म्हंटले की डोळ्यासमोर येते ती त्यांची लांब नाडा लोंबणारी हापपँन्ट,बंडीवजा ढगळा शर्ट, ती बावळट हसरी मुद्रा. आणि हाच अभिनय आणि वेषभूषा कठीण असूनही बाजी मात्र मारुन जायची. पांढरपेशा वर्गाला दादांच्या जरा अश्लीलते कडे झुकणा-या विनोदांनी त्यांच्या सिनेमांपासून दूरच ठेवले. पण खास आवडीवाल्या प्रेक्षकांनी त्यांना जे डोक्यावर उचलून घेतले त्यानेच त्यांची कारकीर्द यशस्वी करवली. द्विअर्थी विनोदाकडे झुकणारे संवाद, चित्रपटातल्या तारिकेशी पडद्यावरची नको तितकी घसट व ह्या सर्वामुळे सतत सेन्सॉर बोर्डाशी उडणारे खटके ह्यांनी त्यांच्या चित्रपटांना सतत निगेटिव्ह प्रसिद्धी मिळत राहिली.अर्थातच त्यांच्या खास  प्रेक्षकांना ह्या सर्वाशी काहीच देणे घेणे नव्हते. दादांचा प्रेक्षक वर्ग ठरलेला होता.

दूरदर्शन अस्तित्वात नसलेल्या काळात – दिवसभर घाम गाळून विरंगुळ्याच्या चार क्षणांसाठी सिनेमागृहात  शिट्या वाजवत खास चवीने चित्रपट बघत ,त्यावर  चर्चा करणारा वर्ग हा त्यांच्या चित्रपटांचा ‘मायबाप’ होता.

८ ऑगस्ट १९३२ ला जन्मलेल्या दादा कोंडकेंचे खरे नांव कृष्णा कोंडके होते. बॅंड पथकातून सुरुवात करून हळूहळू वगनाट्ये, नाटके ह्यांनी सुरुवात केलेल्या दादांचे चित्रपट जीवन मेहनतीने साकारले गेले. नाटकांच्या निमित्ताने केलेल्या राज्यभराच्या दौऱ्यांनी दादांना सर्वसामान्यांसाठी करमणुकीचे महत्त्व व कोसा-कोसांवर बदलत जाणारी रसिकता कळली व हेच पुढे त्यांच्या यशाचे गमक सिद्ध झाले.मिलमजुराच्या घरात जन्मलेले मूल ते दादांच चित्रपट क्षेत्रातील योगदान हा प्रवास थक्क करणारा होता.

कलेची सेवा बॅंड पथकाच्या मार्फत करणाऱ्या दादांनी मग ‘सेवा दलात’ प्रवेश केला. तेथून सांस्कृतिक कार्यक्रम व नंतर नाटके असा त्यांचा प्रवास सुरू झाला. दादा कोंडके यांनी ’दादा कोंडके आणि पार्टी’’ नावाचे एक कला पथकही काढले. प्रख्यात लेखक वसंत सबनिसांशी ते ह्याच संदर्भातून जोडले गेले. स्वतःची नाटक कंपनी उघडून त्यांनी वसंत सबनिसांना नाटकासाठी लेखन करावयास विनंती केली. तोवर वसंत सबनिसांना त्यांच्या “खणखणपूरचा राजा” ह्या नाटकातल्या भूमिकेने प्रभावित केलेलेच होते. हसरे व खेळकर व्यक्तिमत्त्व लाभलेल्या दादा कोंडकेंसाठी सबनिसांनी मदतीचा हात पुढे केला. सबनिसांनी लिहिलेल्या “विच्छा माझी पुरी करा” ह्या नाटकाने दादांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले. १५०० च्या वर प्रयोग झालेल्या ह्या नाटकामुळे दादांना भालजींच्या चित्रपटात काम करण्याची संधी प्राप्त झाली. आशा भोसले ‘विच्छा माझी पुरी करा ह्या नाटकाचा ‘  मुंबईतला एकही प्रयोग सोडीत नसत. त्यांनीच दादांना भालजींकडे पाठवले. दादांचे शब्दोच्चार एके ५६ रायफलमधून सुटणाऱ्या गोळ्यांसारखे सुसाट असायचे, पण नेमक्या ठिकाणी द्विअर्थी शब्द वापरून मग जरासा पॉज घेतल्याने प्रेक्षक अख्खे थिएटर (मग ते नाटकाचे असो की सिनेमाचे) डोक्यावर घ्यायचे.

…१९६९ साली भालजी पेंढारकरांच्या “तांबडी माती” ह्या चित्रपटातून पदार्पण केलेल्या दादांनी मग मागे वळून बघितले नाही. तांबडी माती पाठोपाठ आलेल्या “सोंगाड्या ” ने दादांचे आयुष्य बदलून टाकले. ‘सोंगाड्या’ ही त्यांची प्रथम निर्मिती. वसंत सबनिसांनी लिहिलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुळकर्णींनी केले होते. बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट ठरलेल्या ह्या चित्रपटानंतर एकामागोमाग एक हिट चित्रपटांची लाईन लावून दिली. स्वतःच्या “कामाक्षी प्रॉडक्शन” ह्या चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे १६ चित्रपट प्रकाशित करणाऱ्या दादांनी ४ हिंदी व १ गुजराती चित्रपट प्रदर्शित केले.

त्यांचे गाजलेले चित्रपट पुढीलप्रमाणे ,एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा,  पांडू हवालदार,  तुमचं आमचं जमलं,  राम राम गंगाराम, बोटं लावीन तेथे गुदगुल्या,  ह्योच नवरा पाहिजे, आली अंगावर,  मुका घ्या मुका, पळवा पळवी, येऊ का घरात व सासरचे धोतर. हे चित्रपट त्यांच्या कामाक्षी प्रॉडक्शन ने प्रकाशित केले.

…एखाद्याला आपलं मानलं की मग पूर्ण विश्वास त्याच्यावर कसा टाकावा हे दादांकडून शिकावे.त्यामुळेच कामाक्षी प्रॉडक्शनची टीम वर्षानुवर्षे कायम राहिली.त्यात उषा चव्हाण ही अभिनेत्री, राम लक्ष्मण ह्यांचे संगीत, महेंद्र कपूर व उषा मंगेशकर – पार्श्वगायनासाठी तर ‘बाळ मोहिते’ प्रमुख दिग्दर्शन साहाय्यक ही माणसं वर्षोनुवर्षे जुळल्या गेली होती.

लागोपाठ ९ मराठी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी आठवड्यांचे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ त्यांनी केले.

त्यांचे हिंदी चित्रपट पुढीलप्रमाणे, तेरे मेरे बीच में ; अंधेरी रात में दिया तेरे हात में , खोल दे मेरी जुबान , आगे की सोच .

सोंगाड्या चित्रपटात त्यांनी नाम्याची भूमिका केली व तीच त्यांच्या जीवनाचा ‘टर्निंग पॉंईंट’ ठरला. नाम्या कलावतीच्या तमाशाला जातो व त्याला तमाशाची चटक लागते हे त्याच्या ‘आये’ ला आवडत नाही. ती त्याला घराबाहेर काढते व तो कलावतीच्या आश्रयाला जातो व तेथे तो तमाशात नावांरूपाला येतो असे हे कथानक आहे. ह्या भोळ्या ‘नाम्या’ ने दादांना एका रात्रीत यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले.

१९७२ साली ‘एकटा जीव सदाशिव’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा बोलबाला इतका झाला होता, की खुद्द राज कपूरने ऋषीकपूर ला  लॉंच करताना चित्रपटाची तारीख पुढे ढकलली, आणि ‘बॉबी’ पाच महिने उशिरा प्रदर्शित झाला. असे म्हणतात की बॉबी प्रदर्शित करताना राज कपूरला सिनेमागृहांना ‘एकटा जीव सदाशिव’ उतरवण्याची विनंती करायला लागली होती. बॉबी गाजलाच, पण त्यामागोमाग आलेल्या ‘आंधळा मारतो डोळा’ने लाईम-लाईट पुन्हा दादा कोंडकेंवर आणला.

१९७५ मध्ये पांडू हवालदारच्या रुपात दादा पुन्हा पडद्यावर आले. ‘पांडू हवालदार’मध्ये दादांनी ‘अशोक सराफ’ या उमद्या कलावंताला संधी दिली. यातूनच दादांची दूरदृष्टी दिसून येते.

परत एकदा करंदीकर, सुरेश भट व दादा कोंडके  ह्या कला,साहित्य क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी करणा-या ह्या कोहिनूर हि-यांना विनम्र आदरांजली.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆सुंदर माझं घर – भाग-2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ सुंदर माझं घर – भाग-2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(होईल ग सगळं मस्त सोनाली.हुशार माणसाला काहीही अवघड नाही.आपण आधी वरच्या खोल्यांपासून करत येऊ सगळं नीट.’) – इथून पुढे — 

त्या शनिवारी सोनालीला सुट्टीच होती.

उमाने तिला दोन्ही बेडरूम्स कशा नीट आवरायच्या तेदाखवले.दर आठवड्याला दोन्ही बेडरूमच्या बेडशीट्स बदलल्या गेल्या पाहिजे हे सांगितलं.मुलांना वर बोलावलं आणि उमा म्हणाली,रोहन राही,तुमच्या रूम मध्ये अशी टॉईज पसरायची नाहीत.

आपलं खेळून झालं की छान आवरून त्या मोठ्या बास्केटमध्ये ठेवायची.ही बघा ममाने कित्ती सुंदर बास्केट आणलीय तुमच्यासाठी काल.’रोहन राही नी सगळा खेळ बास्केट मध्ये नीट ठेवला.शहाणी ग माझी बाळं ती!म्हणून उमाने दोघांना कवटाळले. शाबास.उमा म्हणाली,ही बघा मी तुम्हाला पिगी बँक   आणलीय पुण्याहून.तुम्ही नीट रूम आवरली आणि उठल्यावर पांघरूण नीट घडी करून ठेवलं की मग वीक एंडला ममा  तुम्हाला  बक्षीस म्हणूंन डॉलर्स देणार आहे.ते या पिगी  बँकेत टाकायचे हं. मग खूप साठले ना की तुमच्या आवडीची पुस्तकं घ्यायची हं.’मुलं खूषच झाली.

उमाने त्या पिगी मध्ये पहिले दोन दोन डॉलर्स टाकले.किती खूष झाली मुलं. सोनाली हे कौतुकाने बघत होती’.आई, हे मला कसं ग सुचलं नाही?किती छान दिसायला लागल्या ग सगळ्या रूम्स. सोनाली,यात अवघड काहीही नाही ग.वेळच्या वेळी कामं नीट केली नाहीत की ती साठत राहतात आणि मग कंटाळा येतो.आता तू दर शनिवारी रूम्स पटकन आवरून ठेवशील.चल खाली.उद्या रविवारी वॉशिंग मशीन लावायचं ठरवून टाक. म्हणजे कपडे साठणार नाहीत.तुला खूप काम पडतं मान्य आहे मला.पण इथे सोयीही खूप आहेत ना. दोघी खालच्या मजल्यावर आल्या.आज इतकं पुरे.उद्या बाकीचे आवरूया.’सुनील उमाकडे कौतुकाने बघत होता.’उमा वावा,किती हळुवारपणे सोनालीला तिच्या चुका दाखवून दिल्यास ग.मुळात ती आळशी नाहीये पण सवयच नाही ना शिस्तीची.आता बघ ती मस्त ठेवेल स्वतःचे घर’. दुसऱ्या दिवशी उमाने सोनालीला  किचन आवरायला मदत केली.दोन तासांच्या मेहनती नंतर किचन एकदम लखलखू लागलं.मग सोनालीने आईच्या मार्गदर्शनाखाली साधी खिचडी कढी केली,तीही किती आवडीने खाल्ली मुलांनी.आजी मला पांढरी आमटी घाल असं राही म्हणाली तेव्हा हसूच लोटलं सगळ्यांना. सोन्या, ती कढी आहे बरं का.आता ममा नेहमी करेल हं तुमच्यासाठी! सोनाली रात्री आईजवळ बसली आणि म्हणाली,आई,किती साध्या सोप्या गोष्टी असतात ग.पण मी कधी लक्षच दिलं नाही.थँक्स आई,या एका महिन्यात तू मला खूप काही शिकवलंस.’सोनाली,तू खूप सरळ आणि भाबडी पण आहेस बाळा.अग परवा आपण तुझ्याच सोसायटीतल्या कुमुदकडे गेलो नव्हतो का?तिच्या सासूबाई सांगत होत्या, आमच्याकडे महिन्यातून दोनदा मेक्सिकन मेड येते सगळं क्लीन करायला.ती  व्हॅक्यूम करते, फर्निचर पुसते, बेडशीट्स बदलते.तू का नाही बोलवत तशी मेड?म्हणजे बाकीचं काम हलकं नाही का होणार तुझं?इतका पैसा मिळवता दोघेही, तर करा की खर्च स्वतःच्या स्वास्थ्यासाठी.’सोनालीने पुढच्या आठवड्यातच डायना म्हणून मेड ला बोलावलं.तिने दर आठवड्याला यायचं कबूल केलं.सोनालीला फार आनंद झाला.हे मला कसं ग सुचलं नाही आई?

या मैत्रिणी तरी बघ,लबाड!कोणीही मला बोलल्या नाहीत की  आमच्याकडे मेड येते.डायना सांगत होती  मी या या घरी दर पंधरा दिवसांनी जाते.सगळ्या माझ्याच तर मैत्रिणी आहेत.दुष्ट कुठल्या.’उमा हसली म्हणाली ते जाऊ दे.तू तिला आणखी थोडा पगार दे आणि बाकीचीही कामे करशील का विचार.करेल की ती.कपड्याच्या घड्या करायच्या, लॉन्ड्री लावायची. हेही उमाचे गणित बरोबर ठरले.डायना हो म्हणाली आणि सोनालीचे बरेच काम कमी झाले. सोनालीचं घर आता खरोखर मस्त दिसायला लागलं. सहा महिन्यांनी एकदा राजीव येऊन गेला.अरे वा.एकदम चकाचक घर? मस्त सोनाली.’सोनाली म्हणाली ही माझ्या आईची जादू आहे.

राजीव,योजकस्तत्र दुर्लभ:बघ. मला नीट ऑर्गनायझेशन जमत नव्हतं ते आईने आखून दिलं बघ.आता आपल्याकडे डायना पण येते दर आठवड्याला मला मदत करायला.उमा म्हणाली राजीव ,तुम्हीही मदत केली पाहिजे घरात बरं का.केवढी मोठी मोठी घरं तुमची.मग सगळ्यांनी नको का हातभार लावायला? तुम्हीही सगळ्यांनी आपले कपडे दर रविवारीच इस्त्री करून ठेवलेत की आठवडाभर बघावे लागणार नाही.  राजीवला हे अगदी पटलेच. त्या आठवडाभर   सोनालीने मस्त स्वयंपाक केला आणि दुसऱ्या दिवशी पुरेल अशा भाज्याही करून ठेवल्या.पुढच्या महिन्यात मुलं डे केअर ला जाणार होती.त्यांचे टिफिनही तिने  आठवडाभर आधी प्लॅन केल्याप्रमाणे तयारी करून ठेवले. उमाला आपल्या कर्तबगार लेकीचा अतिशय अभिमान वाटला. हुशार तर ती होतीच पण तिला फक्त नीट दिशा देण्याचं काम उमाने केलं. सुनील दोन महिन्याने निघून गेला.उमा आणखी दोन महिने राहिली.आता सोनाली तरबेज झाली सुंदर माझं घर ठेवण्यात.उमा जायच्या आदल्या आठवड्यात सोनालीने तिच्या मैत्रिणींना चहाला बोलावलं. सम्पूर्ण घराचा कायापालट बघून त्या थक्कच झाल्या .दडपे पोहे, बटाटेवडे,चटणी आणि गुलाबजाम हा मेनू बघून तर त्या आश्चर्यचकित झाल्या.’हे सगळं माझ्या सोनालीने केलंय हं. मी यातलं काहीही केलं नाहीये. बघा बर छान झालंय का!उमा म्हणाली.फक्त गुलाबजाम मात्र पटेलकडचे हं !उमा हसून म्हणाली. सगळ्यांनी ताव मारला   आणि त्यातली खुशी म्हणाली’काकी मला पण असा चार्ट करून द्या ना हो प्लीज ! मीही वाईट ठेवते घर अगदी.सोनालीचं मस्त घर बघून मला हेवाच वाटू लागलाय हो तिचा.माझी सासू खूप बोलली मला.म्हणाली शी!किती पसारा हा खुशी!काही वळण लावलं नाही का तुझ्या आईनं. पण दोन मुलं आणि नोकरी सांभाळून नाही हो जमत मला.काकी,मलाही करा ना मदत प्लीज!’सगळ्या हसायला लागल्या. उमा म्हणाली खुशी,आता सोनाली कडूनच घे धडे .मी चालले ग इंडिया ला पुढच्या आठवड्यात.सगळ्या मैत्रिणी गेल्यावर सोनालीने आईला मिठी मारली.आई,किती ग गुणी आणि हुशार आहेस ग तू.याच सगळ्या भवान्या  मला नावे ठेवायच्या. सोनाली आळशी आहे,काही येत नाही तिला.घर म्हणजे नेहमी पसरलेले! सोनालीचं घर म्हणजे अस्ताव्यस्त. माझी चेष्टा करायच्या पण कधी मार्ग नाही कोणी सुचवला की सांगितलं नाही की मेड येते आमच्याकडे.कशी असतात ना आई माणसं?मीच मूर्ख जाते धावून धावून यांच्याच मदतीला! आज बघ. गप्प बसल्या.शिवाय तू मला कित्ती वर्षांनी हातात ब्रश दिलास आणि ही पेंटिंग्ज करायला लावलीस ग!मी विसरूनच गेले  होते माझं  ड्रॉईंग उत्तम आहे ते.कित्ती शोभा आली सगळ्याखोल्याना माझी स्वतः केलेली सुंदर पेंटिंग्ज लावली म्हणून.’सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं.उमाने तिचे डोळे पुसले.अग वेडे,तू मुळात खूप हुशार आणि  सिन्सीअर तर आहेसच.म्हणून तर तू हे केलंस.आणि मुख्य म्हणजे स्वतःकडे कमीपणा घेऊन शिकलीस, चुका मान्य केल्यास. हा गुण मोठाच आहे तुझा.अशीच मस्त रहा सुखात!’

उमा भारतात परत आली.

मराठी मंडळाच्या सुंदर माझं घर मधलं पहिलं बक्षिस यंदा सोनाली ला मिळालं आणि उत्कृष्ट पेंटिंग्ज काढल्याबद्दल ट्रॉफी पण. अभिमानाने ते व्हिडिओ वर आईला दाखवताना शेजारी  उभ्याअसलेल्या  राजीवच्याही डोळ्यात आपल्या हुशार बायकोबद्दलचा अभिमान चमकत होता. सासूबाई,ही ट्रॉफी खरं तर तुमचीच आहे बरं का!हसून राजीव म्हणाला आणि सोनालीने हसत त्याला दुजोरा दिला.

– समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बदलते रंग रूप केसांचे ! ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ बदलते रंग रूप केसांचे ! ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

केस विंचरताना छोटे झालेले, काहीसे पांढरे आणि थोडे कुरळे केस विंचरताना मनात आलं की, हेच का ते आपले लांब सडक केस! त्यांची आता रया गेली आहे! विचार करता करता केसांचा जीवनातील बदल माझ्या डोळ्यासमोर येत गेला….

बाळ जन्माला आलं की त्याला बघायला येणारे लोक त्याचा रंग,नाक, डोळे याबरोबरच त्याच्या जावळावर चर्चा करीत असतात.

एखाद्या बाळाला खूप जावळ असते तर एखादे बाळ एकदम टकलू असते! मग त्यावरून ते कोणाच्या वळणावर गेलं आहे, यावर बायका चवी चवीने बोलत असतात. त्यातून ती मुलगी असेल तर बघायलाच नको. तिची आजी तिच्या लांब सडक होणाऱ्या केसांची वेणी घालण्याची स्वप्ने बघू लागते. साधारण पन्नास-साठ वर्षांपूर्वी लांब सडक केस हे सौंदर्याचे लक्षण मानले जाई. अंबाडा, खोपा यातून बाहेर येऊन स्त्रिया लांब सडक वेणी कडे वळल्या होत्या तो काळ! अजूनही दक्षिणेत लांब सडक केसांचे महत्त्व जास्त दिसते आणि त्या केसावर कायमच गजरा आणि फुले माळली जातात.

माझ्या लहानपणी आई आणि आजी दोघी बेळगाव, रत्नागिरी भागात राहिलेल्या असल्याने केसांचे कौतुक फार! दर रविवारी सकाळी केसांना तेल चोपडले जाई. पाटावर बसायचं, चार बोटं तेलाची जमिनीवर टेकवायची आणि केसांनाच काय पण हात पाय, पाठ, तेल लावून चोळून घ्यायचं! तेव्हा ते नको वाटायचं, पण सक्तीचंच असे. नंतर बंब भर पाणी तापवलेले असे. गवला कचरा (सुगंधी वनस्पती) घालून केलेली शिकेकाई  आमच्याकडे भरपूर असे. मग काय अभ्यंग स्नानाचा थाट!

कोकणात पावसाच्या दिवसात केस वाळायचे नाहीत म्हणून आई तव्यावर थोडे निखारे टाकून त्यात धूप घालायची, त्यावर एक टोपले पालथे घालून मंद आचेवर केस सुकवून द्यायची.तेव्हा त्याचा असा काही सुगंध घरभर दरवळायचा की बस! अजून ते सुगंधी दिवस आठवतात!

ओले केस वाळवण्यासाठी त्याची बट वेणी घालून दुपारपर्यंत केस वाळले की  आई केसांच्या कधी दोन तर कधी चार वेण्या घालून द्यायची. घरातल्या फुलांचा गजरा माळला की, इतर कोणत्याही वेशभूषाची गरज लागायची नाही. आम्हा सर्व मैत्रिणीचे केस लांब सडक होते, पण देशावर आल्यावर हे सर्व बदलले. कोकणात पाणी आणि हवा लांब केसाला पोषक आहे, तसेच जे लोक मासे खातात त्यांचे केस तर विशेष तुकतुकीत असतात! असे हे लांब केस मिरवीत माझे कॉलेज शिक्षण संपले.

लग्नात लांब केसांची वेणी घालून उभी राहिले. मुलीचे लांब केस ही जणू लग्नातली एक अटच वाटत असे त्याकाळी! पुढे बाळंतपणात केसांची लांबी आणि जाडी थोडी कमी झाली. आणि केसांचे प्रेम ही कमी झाले .चाळीशी च्या आसपास केसांचे शेंडे कमी केले की केस वाढतात असा समज होता आणि नाहीच वाढले तर आणखी थोडे कापून “पोनि टेल” वर येतात, तसंच माझं झालं! केसात रुपेरी चांदी दिसू लागल्यावर इतक्यात पांढरे केस दिसायला नको म्हणून वेगवेगळे डाय आणि मेहंदी लावली. त्याचा परिणाम म्हणून केस आणखीनच  कमी होऊ लागले. माझे मोठे दीर म्हणायचे,

“Once you dye, you have to dye, until you die..!”

तसं केसांचे आरोग्य राखणे महत्त्वाचे आहे. केसाचा अनुवंशिक गुण हाही महत्त्वाचा आहे .काहींचे केस मुळातच दाट असतात तर काहींचे मुळातच विरळ असतात. माझ्या परिचयातील कोकणातील एक आजी साठीच्या होत्या, पण त्यांचे केस पांढरे शुभ्र झाले तरी लांब सडक होते, तर दुसऱ्या आजी  85 वर्षाच्या होत्या, तरी केस लांब आणि काळेभोर होते. एकंदरीत कोकणातील स्त्रियांचे केस खास असत!

अलीकडे प्रदूषण, हवेतील रखरखीत पणा, तेल न लावणे यामुळे केसांची वाढ कमी झाली आहे असे वाटते. केसांची निगा राखायला वेळ मिळत नाही आणि आधुनिकतेच्या नावाखाली केस कापणे ओघानेच होत आहे. अर्थात कापलेले केस ही मेंटेन करावे लागतात. नाहीतर आमच्या आईच्या भाषेत डोक्याचा अगदी “शिपतर”(टोपले )झालंय असं म्हटलं जाई! अगदी जन्मापासून केसांमध्ये असा हळूहळू बदल होत जातो. वयाबरोबर केसांची रया जाते.

नकळत आरशात बघताना  किती उन्हाळे- पावसाळे या केसांनी पाहिले हे जाणवते आणि नुसत्या उन्हा पावसानेच नाही तर अनुभवाने हे पांढरे झालेले केस विचारांची परिपक्वता दाखवत डोक्यावर शिल्लक आहेत असे उगीचच वाटते! असो, कालाय तस्मै  नमः! केसासारख्या छोट्याशा नाजूक विषयावर सुद्धा त्याच्या बदलत्या रंग रूपाचं वर्णन हे असं करावसं  वाटले !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तात्या गेले… – लेखक : आचार्य अत्रे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ तात्या गेले… – लेखक : आचार्य अत्रे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

(स्वातंत्र्यवीरांच्या चोपन्नाव्या पुण्यतिथीनिमित्त ) 

अखेर आज तात्या गेले ; आमचे तात्या सावरकर गेले ! मृत्यूशी जवळ जवळ ऐंशी दिवस प्राणपणाने झुंज देतां देतां शेवटी तात्या कामास आले. मृत्यूची अन तात्यांची झुंज गेली साठ वर्षे चाललेली होती. दहा साली तात्यांनी आपले मृत्यूपत्र लिहिले, तेव्हां त्यांनी स्पष्टच सांगितले की ,

                                 की, घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने

                                 लब्ध प्रकाश इतिहास – निसर्ग माने,

                                 जे दिव्य, दाहक म्हणून असावयाचे,

                                 बुध्याची वाण धरिले करी  हे सतीचे !

तात्या सावरकर कोण आहेत हे पुष्कळांना माहीत नाही. तात्या हे कवि आहेत, कादंबरीकार आहेत, नाटककार आहेत, लघुकथाकार आहेत. निबंधकार आहेत. मराठी प्रमाणे इंग्रजी भाषा त्यांच्या पायाचे तीर्थ घेते. त्यांच्या लेखनाचे एकंदर आठ खंड असून त्यांची साडेपांच हजार पाने होतात. मराठी भाषेत विपुल लेखन करणारे पुष्कळ लेखक होऊन गेले आहेत. हरि नारायण आपटे, विठ्ठल सीताराम गुर्जर, नाथ माधव इत्यादी. पण तात्या सावरकरांएवढे प्रचंड लेखन करणारा एकही लेखक मराठी भाषेत आजपर्यंत होऊन गेलेला नाही. तात्यांची गम्मत ही कीं ते नुसते क्रांतीकारक नव्हते,ते केवळ कवी आणि कादंबरीकार नव्हते . ते निबंधकार आणि नाटककार नव्हते. ते भारतीय इतिहासांतील एक चमत्कार होते. इंग्रजांनी हा देश जिंकून निःशस्त्र केल्यानंतर पौरुष्याची नि पराक्रमाची राखरांगोळी झाली. ती राख पुन्हा पेटवून तिच्यातून स्वातंत्र्य प्रीतीचा आणि देशभक्तीचा अंगार ज्यांनी बाहेर भडकविला , त्या ज्वलजहाल क्रांतिकारकांचे वीर सावरकर हे नि:संशय कुल पुरुष आहेत. भारतीय शौर्याचा आणि पराक्रमाचा तेजस्वी वारसा घेऊन सावरकर जन्माला आले.इतिहासाच्या धगधगत्या कुंडामधून त्यांचा पिंड आणि प्रद्न्य तावून सुलाखून निघाली.

सत्तावनच्या स्वातंत्र्यसमराची धग देशातून नष्ट झालेली नव्हती. किंबहूना वासुदेव बळवंत फडक्यांच्या आत्मयज्ञाच्या वातावरणामध्येच सावरकरांचा जन्म झाला. चाफेकर बंधूनी दोन जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांचे क्रांतिदेवतेच्या चरणी बलिदान केले. त्यांच्या प्राणज्योतीने चेतविलेलें यज्ञकूंड भडकवीत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे असा सावरकरांना साक्षात्कार झाला. घरातल्या अष्टभुज्या देवीपुढे त्यांनी शपथ घेतली कीं, ” देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी मरता मरता मरतो झुंजेन !” वयाच्या चौदाव्या वर्षी मृत्यूला आव्हान देण्याची प्रतिज्ञा सावरकरांनी केली, आणि ती विलक्षण रीतीने खरी करून दाखविली. सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने जाण्याची केवळ प्रतिज्ञा करूनच सावरकर स्वस्थ बसले नाहीत तर त्यासाठी त्यांनी क्रांतिकारकांच्या गुप्तमंडळाची  स्थापना करून श्री शिवजयंतीच्या आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने क्रांतिकारकांची त्यांनी संघटना निर्माण केली. अग्निरसाच्या कारंज्याप्रमाणे स्वातंत्र्याची pज्वलज्जहाल काव्ये सावरकरांच्या अलौकिक प्रतिभेमधून उचंबळू लागली. स्वातंत्र्यलक्षुमीला ‘ अधिरुधिराचे स्नान घातल्यावाचून ती प्रसन्न होणार नाही ह्या मंत्राची जाहीर दीक्षा देशातील तरुणांना देऊन सशस्त्र क्रांतीची मुहूर्तमेढ सावरकरांनी ह्या शतकाच्या प्रारंभी रोवली ही गोष्ट महाराष्ट्र विसरू शकत नाही ! सात सालच्या अखेरीपासून देशांत बाॅम्बचे आणि पिस्तूलाचे आवाज ऐकू यावयाला लागले. बाॅम्बचे पहीले दोन बळी आठ सालच्या प्रारंभी खुदिराम बोस ह्या अठरा वर्ष्यांच्या क्रांतिकारक तरूणाने मुझफरपूर येथे घेऊन सशस्त्र क्रांतीचा मुहूर्त केला. सत्तावनी क्रांतीयुद्धात अमर झालेल्या हुतात्म्यांची शपथ घालून सावरकरांनी भारतामधल्या क्रांतीकारकांना त्यावेळी बजावले की , ‘ १० मे १८५७ रोजी सुरु झालेला संग्राम अद्याप संपलेला नाही. सौंदर्य संपन्न भारताच्या डोक्यावर विजयाचा देदीपयमान मुगुट जेव्हां चढेल, तेंव्हाच हा स्वातंत्र्य संग्राम संपेल. ! ‘ अश्या रीतीने वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी सावरकर हे भारतातल्या सशस्त्र क्रांतीचे सूत्रधार बनले. आठ सालच्या जुलै महिन्यात लोकमान्य टिळकांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यानंतर विलायतेमधील भारत मंत्र्यांचे सहाय्यक सर कर्झन वायली ह्यांना एका मेजवानीच्या प्रसंगी मदनलाल धिंग्रा ह्या पंचवीस वर्षांच्या तरुणाने गोळ्या घालून ठार केले. नाशिकचे कलेक्टर जॅक्सन ह्यांना भर नाटक गृहांत अनंत कान्हेरे नि त्याचे दोन सहकारी ह्यांनी गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर लंडनमध्ये आपले क्रांतिकार्य निर्वेधपणे करणे सावरकरांना शक्यंच नव्हते.

अडीच  महिन्यानंतर त्यांना पकडून ‘ मोरिया ‘ बोटीतून स्वदेशी पाठविण्यात आले असताना त्यांनी मार्सेल्स बंदरात एका पहाटे पोलिसांचा पहारा चुकवून बोटींमधून समुद्रांत उडी मारली. ही उडी म्हणजे वीर सावरकरांच्या पराक्रमाचा सुवर्ण कळसच होय. ही त्यांची उडी त्रीखंडात गाजली. त्यानंतर ब्रिटिश सरकारने सावरकरांवर खटला भरून त्यांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या. त्यावेळी सावरकर अवघे अठ्ठावीस वर्षांचे होते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देणारे सावरकर हे पहिले क्रांतिकारक होते. म्हणूनच ‘ भारतीय क्रांतिकारकांचे मुकुटमणी ‘ असे त्यांना म्हटले जाते. क्रांतिकारक सावरकरांचे अवतारकार्य येथे समाप्त झाले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर सावरकर युरोपमध्ये मोकळे असते, तर ” आझाद हिंद “चा झेंडा त्यांनी सुभाषबाबूंच्या आधी तेथे फडकविला असता ह्यात काय संशय ? म्हणून आम्ही म्हणतो की भारताच्या सशस्त्र क्रांतीचा सावरकर हे ‘ पाया ‘ आणि सुभाषचंद्र हे ‘ कळस ‘ आहेत ! भारतात गेल्या दीडशे वर्षात अनेक क्रांतिकारक होऊन गेले. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा क्रांतिकारक आजपर्यंत केवळ भारतातंच नव्हें , पण जगात झालेला नाही. वीर सावरकरांनी हजारो पाने लिहिली. उत्कृष्ट लिहिली. तुरुंगामध्ये दहा हजार ओळी तोंडपाठ करून एका आचाऱ्याच्या मार्फत त्या भारतात पाठवल्या.

मानवी जीवनात असा एकही विषय नाही, ज्यावर सावरकरांनी लिहिलेले नाही. त्र्याऐंशी वर्षांचे जीवन ते जगले. त्यांना आता जीवनांत रस म्हणून राहिला नाही. आत्मार्पण करण्याचे विचार त्यांच्या मनांत येऊ लागले. आजपर्यंत महापुरुषांनी आणि साधुसंतांनी जे केले त्याच मार्गाने जाण्याचा त्यांनी निर्धार केला. कुमारील भट्टाने अग्निदिव्य केले. आद्य शंकराचार्यांनी गुहाप्रवेश केला. वैष्णवाचार्य गौरांग प्रभूंनी जगन्नाथपुरीच्या शामल सागरांत ‘ हे कृष्ण, हे श्याम ‘ असा आक्रोश करीत प्रवेश करून जलसमाधी घेतली. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदीला समाधी घेतली. समर्थ रामदासांनी शिवरायांच्या मृत्यूनंतर अन्नत्याग करून रामनामाच्या गजरात आत्मार्पण केले. एकनाथांनी गंगेमध्ये समाधी घेतली.

तुकोबा  ‘ आम्ही जातो आमच्या गावा ! आमुचा रामराम घ्यावा ! ‘ असे म्हणत वैकूंठाला गेले. त्याच प्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनी प्रायोपवेशन करून आत्मार्पंण करविण्याचे ठरविले. कारण, त्यांना ह्या आयुष्यांत इतिकर्तव्य म्हणून कांहीच उरले नाही.

                                 धन्यो ऽ हम । धन्यो ऽ हम ।

                                 कर्तव्यं मे न विद्यते किंचीत

                                 धन्यो ऽ हम । धन्यो ऽ हम ।

                                 प्राप्तव्यम सर्वमद्य संपन्नम

लेखक :   आचार्य अत्रे.

दैनिक मराठा : दिनांक २७ मार्च १९६६.

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ टिंकूकाका आणि काकू – लेखक : डॉ. श्यामराव महाजन ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ टिंकूकाका आणि काकू – लेखक : डॉ. श्यामराव महाजन ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

“बाहेर घाटपांडे आले आहेत,” कंपाउंडरने वर्दी दिली.

घाटपांडे म्हणजे शेजारच्या बिल्डिंगमधलं वृद्ध कपल.

गेली 10-12वर्षे त्यांची दोन्ही मुलं आपल्या बायकामुलांसह अमेरिकेत राहतात.

इथे प्रशस्त घरी म्हातारा म्हातारी दोघेच. अधूनमधून दोघेही तिकडे जाऊन येतात, Skype वर रोज गप्पाही होतात.

पण म्हाता-यांचा जीव मुलांना मिठीत घेण्यासाठी, नातवंडांना मांडीवर घेऊन चिऊकाऊचे घास भरवण्यासाठी तहानलेला असतो.

मग डोकेदुखी, चिडचिड, छातीत धडधड, चक्कर असे नसलेले आजार घेऊन दवाखान्यात यांची नियमाने भेट असते.

पण दोन तीन महिन्यात त्यांची फेरी झाली नव्हती. दार उघडून दोघेही आत आले अन् मी तोंड वासून पाहतच राहिलो. अंगभर पदर घेऊन चापूनचोपून साडी नेसण्या-या काकू आज चक्क ट्रँकपँट आणि टी शर्ट मधे! काकाही तसेच.

“तोंड मिटा डॉक्टर, मी तुमची घाटपांडे काकूच आहे. डायरेक्ट जॉगिंग करून येतोय म्हणून हा ड्रेस.”

“वा! व्यायाम सुरू केला वाटतं ? “

गेले कितीतरी दिवस ‘Morning walk ला जात जा, नाना नानी पार्क मध्ये जा’, म्हणून मी यांच्या मागे लागलो होतो आता यांनी मनावर घेतलेलं दिसतंय. दोघांच्याही चेह-यावर, डोळ्यांमधे तजेला दिसत होता. फरक निश्चित होता.

“नाना नानी पार्क चांगलंच मानवलेलं दिसतंय तुम्हाला.” मी म्हटलं

“कसलं नाना नानी पार्क? जेमतेम आठ दिवस गेलो आम्ही तिथं. आता शेजारच्या मैदानात जातो आम्ही morning walk साठी.

तिथेच हा ‘टिंकू’ धडपडला. पायाला खरचटलंय थोडं , काही injection वगैरे लागतंय का बघा जरा.”

“कुठे आहे टिंकू?” मी विचारलं.

कुणीतरी गुदगुल्या करीत असल्यासारखे घाटपांडे हसायला लागले.

“आजकाल ही मला टिंकू च म्हणते. माझं शाळेपासूनचं टोपणनाव! “

या वेळी माझे वासलेले तोंड बंद करायला मला बरेच परिश्रम पडले. त्र्यंबकराव घाटपांडेंना काकूनी कधी नावानेसुद्धा हाक मारली नसेल अन् आज एकदम टिंकू?

“याला गेली चाळीस वर्षे मी अहो, अहो ऐकलंत का? म्हणून हाक मारायची. याचचं उत्तर एकतर गुरकावणं किंवा खेकसणं ! वाघ म्हणाले तरी खातो, वाघोबा म्हणाले तरी खातो. मग सरळ एक दिवस याला टिंकू म्हणायला लागले.”

“मलाही मस्त वाटतं , पुन्हा शाळेत गेल्या सारखं! “

काकांच्या जखमेवर मलमपट्टी करता करता मी विचारलं “पण नाना नानी पार्क का बंद केलंत? “

“वाटलं होतं, तिथे सारे समवयस्क भेटतील, छान गप्पागोष्टी, हास्यविनोद, आध्यात्मिक चर्चा होतील. पण कसचं काय! माझं दुःख तुझ्यापेक्षा कसं जास्त आहे, हे सांगण्याची चढाओढ असते तिथे. आपली दुःख कुरवाळत बसण्यातच त्यांना आनंद असतो. तिथून निघाल्यावर जास्तीच depress झाल्यासारखं वाटायचं.. “

“हो ना, “काकू म्हणाल्या, “म्हणून एक दिवस तिकडे जायचं बंद केलं . संध्याकाळी हे जॉगिंगचे कपडे आणले आणि सकाळपासून शेजारच्या मैदानात जायला लागलो morning walk साठी. तिथे तरुणाईचा नुसता बगिचा फुललेला असतो. सुरवातीला साडीऐवजी हा ड्रेस घालायला जरा अवघड वाटलं , पण आता सवय झाली. “

“आणि तिथं फिरण्यात, त्या पोरांशी गप्पा मारण्यात 2-3तास कसे गेले कळतच नाही. “

तरुण पोरांशी 2-3तास गप्पा! हे जरा आश्चर्यकारकच वाटलं. घरोघरी तरुण पोरं वृद्धांशी कशी वागतात, बोलतात हे मी पाहतोच आहे.     म्हाता-यांजवळ बसून गप्पा मारायला कुणाकडे वेळही नसतो आणि कुणी उत्सुकही नसतो.

“पण ती पोरं बरी गप्पा मारतात तुमच्याशी? “

“अहो हा मोबाईल! “

“म्हणजे? “

“हा स्मार्ट फोन म्हणजे आजकाल प्रत्येकाचा जिवाभावाचा अन् आवडता दोस्त आहे. आणि आमच्याकडे तर मुलांनी पाठवलेला latest फोन आहे. आम्हाला येतं तरी गेल्या दोन महिन्यांत 15-20जणांकडून selfie काढायला, what’s app वर मेसेज पाठवायला शिकलो आम्ही. मग ती पोरंही उत्साहाने मदत करतात. त्यातूनच ओळख होते. “

मोबाईलचा हा उपयोग माझ्यासाठी नवीनच होता.

“त्यांच्या पळण्याचं , स्टँमिनाचं , sports shoesचं कौतुक करतो. पोर खूश असतात. “

“आणि हो, आम्ही दोघांनीही एक पथ्य पाळलंय, त्यांची एखादी गोष्ट आवडली नाही तरी नाकं मुरडायची नाहीत, नावं ठेवायची नाहीत आणि विचारल्याशिवाय कुणालाही सल्ला द्यायचा नाही. “

“वा! छान! “मी आपलं काही तरी बोलायचं म्हणून बोललो. “पण या मुलांशी गप्पा तरी काय मारता? “

“काहीही. पण विशेषतः आमच्या वेळचं कॉलेज, फुटबॉल, क्रिकेट गाणी. रोज त्या serials सोडून Sports Channels बघतो. “

“अजूनही ही कधीकधी धोनीला गोलकीपर म्हणते किंवा मेस्सीला off side ऐवजी run out म्हणते. पण पोरं तेही enjoy करतात.”

“या पोरांना नवीन गाण्यांबरोबर आपल्या वेळची जुनी गाणीदेखील तेवढीच आवडतात. “

“आता आमचा 10-12जणांचा W.A.चा ग्रुपही झाला आहे. पोर नवीन नवीन vdo गाणी, jokes पाठवत असतात. मजा येते. “

“गेल्या आठवड्यात हिच्या वाढदिवसाला पोरं केक घेऊन आली होती! अंताक्षरी, दमशिराज, जेवण, मस्त मजा आली! “

“हो, आणि दुस-या दिवशी यांच्या बहिणीचा फोनही आला, ‘काय चाललय तुझं? या वयात मुलांबरोबर पार्ट्या करणं शोभतं का तुला? आपल्या वयाचा तरी विचार करायचा!’ पण मी चक्क दुर्लक्ष केलं . आता स्वतःला आनंद मिळवण्यासाठी आणखी कुठल्या वयाची वाट बघायची? टिंकूचाही मला पूर्ण support आहे. “

“हो ना! आता हे फिरणं, गप्पागोष्टी, देवपूजा, मेडिटेशन, sports, whats app या मधे वेळ कसा गेला समजतच नाही. रात्री शांत झोप लागते. आमच्या B.P.च्या गोळी खेरीज गेल्या दोन महिन्यात दुसरी गोळीही घ्यावी लागली नाही. इतके दिवस आम्ही दुस-यांना बदलण्याचा प्रयत्न करत होतो. पण या वयात स्वतःला बदलण्याची, जीवनात आनंद मिळवण्याची बुद्धी दिली, म्हणून मी देवाचा अत्यंत आभारी आहे. “

काही क्षण मी दोघांकडे नुसताच पहात राहिलो अन् मग न रहावून दवाखान्यातल्या सर्व पेशंट समोर मी टिंकूकाका आणि काकूना पायाला हात लावून नमस्कार केला.

लेखक :डॉ. श्यामराज महाजन

प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “निसर्गाचे लेणे…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “निसर्गाचे लेणे– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

देखण्या  फुलांनी

किती हे फुलावे ?

झाडाचे सौंदर्य 

किती वर्धीत व्हावे !

*

जणू अंथरे सृष्टी

मखमाली पाती 

विखुरले तयावर

शुभ्र धवल मोती

*

जवळ जाऊ पहाता

दरवळे सुगंध

केवळ पहाताच

दृष्टी सुखात धुंद

*

निरपेक्ष देत जाणे

निसर्गाचेच  लेणे

अवलंबून  आहे

शिकणे न शिकणे

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संस्मरण – मेरी यादों में जालंधर – भाग-9 – पुराने चावलों जैसे महकते दोस्त… ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ संस्मरण – मेरी यादों में जालंधर – भाग-9 – पुराने चावलों जैसे महकते दोस्त… ☆ श्री कमलेश भारतीय ☆

(प्रत्येक शनिवार प्रस्तुत है – साप्ताहिक स्तम्भ – “मेरी यादों में जालंधर”)

आज फिर जालंधर की सुनहरी, कुछ ह़सातीं, कुछ रुलातीं यादों की ओर‌ एक बार फिर! अपनी पीढ़ी के रचनाकारों को मैं बराबर याद कर‌ रहा हूँ और वे सब अब पुराने चावलों जैसे महकते हैं! वैसे तो मैने प्रसिद्ध उपन्यासकार व जालंधर दूरदर्शन के समाचार संपादक रहे जगदीश चंद्र वैद जी का उल्लेख पहले  कर चुका हूँ और उनसे मिले प्रोत्साहन को भूला नहीं ! वे पंजाब के ग्रामीण अंचल‌ पर उपन्यास ‘धरती धन न अफ्ना’ लिखकर प्रसिद्धि के शिखर को छूने में उसी तरह सफल रहे जैसे अपने समय के लोकप्रिय लेखक मुंशी प्रेमचंद अपने उपन्यास ‘गोदान’ के लिए ऐसे प्रसिद्ध हुए कि उनकी जैसी ऊंचाई तक पहुंचना किसी लेखक के बूते की बात नही थी लेकिन ‘ धरती धन न अपना’ भी बहुत सी भाषाओं में अनुवादित हुआ! आज उनकी बेसाख्ता याद इसलिए आई कि क्या उनकी तरह आज पंजाब में कोई उपन्यास लिख रहा है? जी हां,हैं न मेरी पीढ़ी के, मेरे सहयात्री डाॅ  विनोद शाही! वे पटियाला रहते थे, फिर हिंदी प्राध्यापक के रूप में काफी समय जालंधर और होशियारपुर रहे और कई वर्ष जालंधर में रहने के बाद‌ आजकल‌ गुरुग्राम में अपने बेटे के पास शिफ्ट हो गये हैं यानी वे भी मेरी तरह हरियाणवी रंग में रग गये हैं! उपन्यासों की चर्चा चली तो बता दूँ कि डाॅ विनोद शाही ने दो उपन्यासों- ईश्वर का बीज और निर्बीज की रचना की है! वैसे कथा लेखन में निरंतर सक्रिय हैं और इनके चार‌ कथा संग्रह भी हैं, जिनमें ‘श्रवण कुमार की खोपड़ी’ बहुचर्चित रही और अभी इन वर्षों में ‘हंस’ में प्रकाशित कहानी ‘बाघा वाॅर्डर’ मेरी प्रिय कहानियों में शामिल हैं! आजकल ज्यादा चर्चा इनके आलोचना क्षेत्र में है रही है और कम से कम पच्चीस आलोचना पुस्तकें हिंदी साहित्य को दे चुके हैं! बहुआयामी लेखन और बहुआयामी व्यक्तित्व के स्वामी शाही को अनेक सम्मान मिले हैं। हाल ही में चंडीगढ़ में इन्हें ‘आधार सम्मान’ से सम्मानित किया गया! मुझे इस मित्र की एक नसीहत नही भूलती, जब मेरे प्रथम लघुकथा संग्रह-मस्तराम ज़िदाबाद पर जालंधर में आयोजित विचार चर्चा में कहा कि कमलेश की लघुकथाएं बहुत शानदार हैं लेकिन ये अंत में पौराणिक कथाओं की तरह ज्ञान बांटते की तरह कोई शिक्षा देने की मोमबत्ती क्यों जला देते हैं! ऐसे ही सच्चे दोस्त और आलोचक होने चाहिएं  । यही दुआ के साथ आगे बढ़ता हूँ! वे निश्चय ही आलोचना में और ऊंचा मुकाम बनायेंगे!

एक और‌‌ भी हैं न ऐसे हमारे मित्र डाॅ अजय शर्मा ! जो मूलत: तो एक डाॅक्टर हैं लेकिन साहित्य के कीड़े ने ऐसा काटा कि डाॅक्टर पीछे निशानी जैसा रह गया और वे उपन्यास लेखन में कदम दर कदम बढ़ते ही गये! शुरुआत हुई चेहरा और परछाईं से और फिर‌ आया बसरा की गलियां जो बहुचर्चित रहा । इसके बाद तो फिर दे दनादन ‘नौ दिशाएं’, ‘कागद कलम ना लिखणहार’  विभिन्न विश्वविद्यालयों में पांच कक्षाओं में शामिल !

इनके उपन्यासों पर अब तक 29 एम फिल’.सात पीएचडी विभिन्न विश्वविद्यालयों से हो चुकी हैं! है न रिकॉर्ड? इनके अतिरिक्त .छह नाटक एक कहानी संग्रह पंजाबी में! इनके लेखन के आधार पर अब तक इन्हें पुरस्कार शिरोमणि पुरस्कार और केंद्रीय हिंदी निदेशालय से मिले अनेक सम्मान शामिल हैं ।

इतना याद दिला दूँ कि तरसेम गुजराल के उपन्यास ‘ जलता हुआ गुलाब’ को वाणी प्रकाश की ओर से पुरस्कृत किया गया! जिसका चयन अपने समय के प्रसिद्ध आलोचक डाॅ नामवर सिंह ने किया था! इस तरह जालंधर में उपन्यास लेखन की परंपरा को मेरे मित्र बाखूबी आगे बढ़ा रहे हैं! डाॅ अजय शर्मा ने अमर उजाला, दैनिक जागरण और‌ दैनिक सबेरा में पत्रकारिता भी की!

कभी प्रसिद्ध आलोचनक व पंजाब विश्विद्यालय, चंडीगढ़ के हिंदी विभाग के अध्यक्ष डाॅ इंद्रनाथ मदान ने कहा था कि यदि हिंदी साहित्य में से पंजाब के लेखकों का योगदान निकाल‌ दिया जाये तो यह आधा ही रह जायेगा! यानी आधा हिंदी साहित्य में लेखन पंजाब के लेखकों ने किया है ! हमारे मित्र धर्मपाल साहिल भी उपन्यास लेखन में पीछे नहीं! उन्हें भी केंद्रीय हिंदी निदेशालय से उपन्यास पर सम्मान मिल चुका है!

शायद आज के लिए इतना ही काफी!

पुराने चावलों जैसी खुशबू जैसे दोस्तों की बातें आगे भी जारी रहेंगी।

क्रमशः…. 

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares