मराठी साहित्य – विविधा ☆ १५ ऑगस्ट – स्वातंत्र्यदिन  ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

१५ ऑगस्ट – स्वातंत्र्यदिन ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव

माझ्या प्रिय देशबंधूंनो आणि भगिनींनो,

आपणा सर्वांना ७६ व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप शुभेच्छा! 🙏🇮🇳💐

आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याला १५ ऑगस्ट २०२३ ला ७६ वर्षे पूर्ण झालीत, म्हणून आपला देश ७६ वर्षांचा तरुण झाला असे म्हणावे लागेल. पारतंत्र्याच्या बेड्या, जाच आणि अत्याचार अनुभवणारे आणि स्वातंत्र्यलढ्यात हिरीरीने प्राणपणाला लावून लढणारे तरुण स्वातंत्र्यसैनिक आता नव्वदी आणि शतकाच्या मध्ये असतील.  हे मोजके प्रत्यक्षदर्शी सोडले तर बहुसंख्य लोकांना हेच माहिती नाही की आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत, त्याकरता अगणित स्वातंत्र्यसैनिकांचे रक्त सांडलेले आहे. त्यातील मोजकी नावे अर्थातच नेत्यांची, बहुतेक तर अनामिकच राहिले, त्यांच्याकरता मला महान कवी कुसुमाग्रजांचे शब्द आठवतात:

अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त

स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात!

या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यातील ‘सोहळा’ अन्य कुठल्याही सोहळ्यापेक्षा वेगळा का आणि कसा आहे? आपल्या तेव्हाच्या पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १५ ऑगस्ट १९४७ च्या शून्य प्रहरी  तिरंगा फडकावला. त्यांचे जगप्रसिद्ध भाषण सगळीकडे उपलब्ध आहेच, पण त्यातील एक वाक्य मला नेहमीच भावते, नेहरूजी म्हणाले होते, “आज रात्री १२ वाजता जेव्हा संपूर्ण जग झोपले आहे, त्यावेळी भारत स्वतंत्र जीवनाची नवी सुरुवात करेल.” सुरुवातीची कांही वर्षे या नवोन्मेषात प्रगतीचा आलेख उंच उंच चढत गेला. मात्र ही चढती भाजणी लवकरच स्थिरावली. स्वातंत्र्याने सर्व समस्यांचे निराकरण होईल, या आशावादावर अवलंबून राहणे कठीणच होते. नवीन सुनेला घरची जबाबदारी मिळेपर्यंत खूपच उत्सुकता असते. ‘मला राज्य मिळू दे, मग मी काय करते ते बघाच’ हे कधी मनात तर कधी ओठावर आणून सांगणारी सून जबाबदारीचे भान आल्यावर लवकरच सासूसारखी केव्हा वागायला लागते, ते तिचे तिलाच कळत नाही! नंतर हे राजकर्त्यांना देखील कळायला लागले.

मंडळी, आपण जेव्हा आपल्या स्वातंत्र्याविषयी इतके जागरूक असतो तेव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्याची पायमल्ली करतो आहे का? हे भान असणे महत्वाचे नाही का? एक रोजचेच उदाहरण! रस्त्याच्या कडेला ‘फुटपाथ’ नामक छोटीशी मार्गिका असते, तिला चांगले रंगवून वगैरे ठेवल्याने ती पायदळ चालणाऱ्यांना चांगलीच ठसठशीत दिसत असते. मात्र गर्दीच्या वेळी याच फुटपाथवरून शिताफीने स्कूटर, मोटारसायकल इत्यादी वाहनांनी ती व्यापलेली असते. बिच्चाऱ्या कारवाल्यांसाठी ती अंमळ अरुंद असते! आता पायिकांनी कुठे अन कसे चालायचे याचे धडे कोणी द्यावे? थोडक्यात काय, ‘माझे स्वातंत्र्य तर माझे आहेच अन तुझे बी माझेच’ असा कारभार आहे! मला संविधानाने अधिकार दिलाय, तसा तो इतरांना देखील दिलाय, हे समाजभान अन राष्ट्र्भान कसे येईल याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा!

आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतांना त्याची ‘इव्हेंट’ का होते? ध्वनिक्षेपक ठराविक राष्ट्र्भक्तीने भारलेली गाणी प्रसारित करीत असतो. कधी लहान मुले ‘पाठ करून “आजादी”  विषयी त्यांच्या वयाला डोईजड होतील अशी शाळा शाळांमधून भाषणे देत असतात. त्यांच्या स्मरणशक्तीचे आणि शिक्षक व पालकांच्या मेहनतीचे खूप कौतिक करावे हे अगदी स्वाभाविक! पण या निष्पाप मुलांना त्या टाळ्याखाऊ भाषणाचा संपूर्ण अर्थ समजावून सांगणे हे संबंधित वडिलधाऱ्यांचे कर्तव्य असावे! म्हणजे ही पोपटपंची न राहता खरीखुरी देशभक्ती होईल. कोण जाणो अशातूनच एखादा मुलगा व मुलगी देशसेवेचे व्रत घेऊन सैन्यात भरती होण्याचे स्वप्न बघेल!     

शेवटी असे वाटते की, ‘या देशाने मला काय दिले?’ असा प्रश्न ज्यांना वारंवार सतावतो त्यांनी ‘मी देशाला काय देतोय?’ या एकाच प्रश्नाचे अत्यंत प्रामाणिकपणे स्वतःलाच उत्तर द्यावे! आपल्या मुलाला शिक्षण देताना पालक त्यावर केवळ ५ ते १० टक्के खर्च करतात, उर्वरित खर्चाचा भार समाज उचलतो. हे आपल्या देशाचे अनामिक नागरिक आपल्या या प्रगतीचा किती वाटा उचलत आहेत, हे ध्यानात आले तर या स्वातंत्र्याचे मोल आपल्याला कांही अंशी कळेल!   

या शुभ प्रसंगी सर्वांचे पुन्हा एकदा खूप अभिनंदन,

धन्यवाद! 🙏🇮🇳💐

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

दिनांक १५ ऑगस्ट २०२3

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सृजनानंद… ☆ सौ.मंजुषा आफळे

सौ.मंजुषा आफळे

🌳 विविधा 🌳

सृजनानंद… ☆ सौ. मंजुषा आफळे ☆

प्रत्येक मनुष्य प्राण्यांमध्ये एक चित्रकार दडला आहे. परमेश्वराने बहाल केलेल्या आयुष्य रुपी कॅनव्हास वर तो आपले कर्तुत्व रेखाटतो. परिस्थितीनुसार त्याला जी शिकवण संस्कार शक्ती बुद्धी मिळते त्याचा तो ब्रश प्रमाणे वापर करतो. निसर्गतः त्याच्याकडे विविध रंग उपलब्ध आहेत. ते म्हणजे त्याचे सकारात्मक विचार,’ आचार आणि उच्चार. त्याने, फक्त सुंदर रंगांची योग्य निवड करून ते कल्पकतेने चित्रात भरायचे असतात. म्हणजे सृजनानंद निर्मिती तयार होते. पण स्वकर्तुत्वाने अशी कलाकृती निर्माण करताना त्याला प्रथम दुःख विरह संकटे यातना यातून पार पडावेच लागते. म्हणूनच  सर्व रंग मिसळून तयार होणारी काळी चौकट चित्राला शोभून दिसते. चित्राला सुरक्षित ठेवते आणि चित्राचे सौंदर्य वाढवते.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – ‘हॅंडल वुईथ केअर…’ – भाग – 2 ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ कथा – ‘हॅंडल वुईथ केअर…’ – भाग – 2 ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र – “सावू.. तू?.. तू इथे कशी?” कपाळावरचा घाम रुमालाने टिपत त्यांनी विचारलं. त्यांच्या थकून गेलेला निस्तेज चेहरा क्षणात उजळला.)

“मुद्दाम तुम्हाला भेटायलाच आलेय.”

” हो..पण असं अचानक?”

” तुम्हाला भेटावं असं तीव्रतेने वाटलं, आले. कसे आहात तुम्ही?”

“कसा वाटतोय?”

“खरं सांगू? तुम्ही खूप थकलायत आण्णा”. तिचा आवाज भरून आला. तेवढ्यात समोरून बस येताना दिसली न् मग सविता काही बोललीच नाही. बसमधे सगळेच गावचे. ओळखीचे. सगळ्यांसमोर मोकळेपणाने बोलणं तिला प्रशस्त वाटेना.बसमधून उतरल्यानंतर मात्र ती घुटमळत उभी राहिली.)

“आण्णा,आपण…आपण लगेच घरी नको जायला.”

“का गं?”

“वाटेत शाळेजवळच्या देवळात थोडावेळ बसू.मग घरी जाऊ. मला तुमच्याशी  थोडं बोलायचंय.”

“अगं बोल ना.घरी जाता जाता बोल. घरी गेल्यानंतर निवांत बोल.”

“नाही…नको”

“लांबचा प्रवास करून आलीयस.ऐक माझं.आधी घरी चल.हात पाय धू. विश्रांती घे.मग बोल.घाई काय आहे एवढी?”

सविताला पुढे कांही बोलताच येईना.

तिला असं अचानक दारात पाहून तिच्या वहिनीलाही आश्चर्य वाटलं.

“सविताताई ,हे काय? असं अचानक?” बोलता बोलता तिच्या हातातली बॅग घ्यायला वहिनी पुढे झाली आणि बॅगेऐवजी सविताच्या हातातल्या त्या दोन जड पिशव्या पाहून चपापली.तिच्या कपाळावर उमटलेली सूक्ष्मशी आठी आणि आण्णांकडे पहातानाची तिच्या नजरेतली नाराजी सविताच्या नजरेतून सुटली नाही. सविताने त्या दोन जड पिशव्या तिच्या पुढे केल्या.मग मात्र वहिनीने त्या हसतमुखाने घेतल्या.

“आधी कळवलं असतंत तर मोटारसायकल घेऊन हे आले असते ना हो मिरजस्टॅंडवर तुम्हाला घ्यायला ” तिच्या बोलण्यात सहजपणा होता पण  सविताला तो सहजपणे स्वीकारता येईना.

” मुद्दामच नाही कळवलं. अचानक रजा मिळाली.आले. आण्णांना भेटावसं वाटलं म्हणून रजा घेतलीय” वहिनीकडे रोखून पहात ती म्हणाली .चहापाणी आवरलं तसं ती उठली .

“वहिनी, थोडं देवळापर्यंत जाऊन पाय मोकळे करून येते.”

” बरं या”.    

“चला आण्णा..”                                                                                                                                                                             

“आण्णा..?..ते कशाला..?”  वहिनी आश्चर्याने म्हणाली.

” का बरं?त्यांना का नाही न्यायचं?” सविताने चिडून विचारलं.तिच्या आवाजातला तारस्वर वहिनीला अनोळखीच होता. ती चपापली.कानकोंडी झाल्यासारखी चुळबुळत राहिली.    

“तसं नाही सविताताई..”

“मग कसं?”आता गप्प बसायचं नाही हे सविताने ठरवूनच टाकलं होतं.पण वहिनी वरमली.

” तुम्ही जा त्याना घेऊन,पण अंधार व्हायच्या आत परत या “

सविता रागाने तिच्याकडे पहात राहिली.फट् म्हणताच ब्रह्महत्या होणार पण त्याला आता तिचा नाईलाज होता.

“आण्णांना हल्ली डोळ्यांना कमी दिसतं.मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचंय.म्हणून म्हटलं.फार अंधार करू नका.”

“आण्णाs?”त्यांच्याकडे पहात सविताने आश्चर्याने विचारले. ते मानेनेच ‘हो’ म्हणाले.  आणि खाली मान घालून त्यांनी चप्पल पायात सरकवली. ते पाहून वहिनी क्षणभर घुटमळली. मग न बोलता आत निघून गेली.

देऊळ येईपर्यंत आण्णा गप्पच होते आणि सविताही.

“मला आधी का कळवलं नाहीत?आॅपरेशनचं?”

“त्याचं काय अगं? अजून कधी करायचं तेही ठरलं नाहीय.डॉक्टर करा म्हणाले की लगेच करायचं. आणि हल्ली मोतीबिंदूचं ऑपरेशन पूर्वीसारखं अवघड नसतं अगं.तू उगाच काळजी करतेस.”

” आण्णा, तुम्ही रोज घरी काय काय कामं करता?” तिने मुद्द्यालाच हात घातला.

“मी..मी काम असं नाही गं…”

” काहीच करत नाही?”        

“तसं म्हणजे… करतो आपलं मला जमेल ते..जमेल तसं..”

“कां?”तिने तीव्र शब्दात विचारलं.

“कां म्हणजे? बसून काय करायचं?” त्यांच्या घशात आवंढाच आला एकदम.ते गप्प बसले.

“तुम्हाला घरकामाची सवयही नाही न् आवडही नाही हे ठाऊक आहे मला.वहिनीला जमत नसेल तर चार बायका ठेव म्हणावं कामाला.तिने तुम्हाला कामं का लावायची?”

“तुला..सारंग बोललेत का हे सगळं?”

“त्याने कशाला सांगायला हवं?आज मीही स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलंच आहे की.दहा किलोच्या साखरेच्या जड पिशव्या तुम्ही का वहायच्या?तेही या वयात?वहिनी नोकरीसाठी रोज मिरजेला जा-ये करते.गॅरेजच्या कामासाठी दादाही मिरजेला जात असतोच ना?एक दिवसाआड का होईना दादाचा मोटारसायकलवरून एखादातरी हेलपाटा असतोच की. मग ही कामं त्या दोघांनी का नाही करायची? मी आज वहिनीशी स्पष्टपणे बोलणारच आहे ह्या विषयावर..”

“ए..वेडी आहेस का तू?तू..तू तिला यातलं कांहीही बोलायचं नाहीss”

“का नाही बोलायचं ?दादाशी तरी मी बोलणारच.त्याला चांगली खडसावून विचारणार”

क्रमश:… 

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘शब्दभेट… कृतज्ञतेची’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

??

☆ ‘शब्दभेट… कृतज्ञतेची‘ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

तसं बघायला गेलं तर मी कोणी फार महान व्यक्ती वगैरे नाही की मी स्वतःच्या आयुष्याबद्दल लिहावं आणि लोकांनी ते कौतुकानं वाचावं. पण शहापूरसारख्या आदिवासी भागात जगण्यासाठी रोजची तारेवरची कसरत करत, मी LIC सारख्या नामांकित वित्तीय संस्थेतून मॅनेजर पदावरून निवृत्त होणं, हे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप मोठं यश आहे. 

माझ्या या यशात वाटेकरी असलेल्या माझ्या कुटुंबियांइतकाच अनेक जणांचा हातभार, सहकार्य या प्रवासात लाभलं. कोणतेही नातेसंबंध नसताना, निःस्वार्थ वृत्तीने मदत करणारी अनेक माणसं भेटली, या साऱ्यांविषयी मनात नेहमीच कृतज्ञतेची भावना आहे आणि आजीवन राहील. आणि ती व्यक्त करण्यासाठीच हा लेखनप्रपंच ! 

तर अशाच एका व्यक्तीबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. ती व्यक्ती म्हणजे शीलामामी ! शीला शिवराम लेले. ही वर्षाची, म्हणजे माझ्या मैत्रिणीची मामी बरं का ! राजामामा, मामी त्यांची दोन मुलं-स्वाती – सचिन आणि वर्षाचे आजी-आजोबा अशी सहा माणसं या कुटुंबात होती. आधी हे भिवंडीला राहायचे, नंतर ठाण्यात, नौपाड्यात आले. बहुतेक मामाचं मुंबईत ऑफिस आणि मुलांच्या शिक्षणाची सोय म्हणून आले असावेत. मामीचं घर तसं लहानच, म्हणजे स्वैपाकघर आणि बाहेर एक खोली. तिथेच लागून जिना होता. 

रानडे म्हणजे शीलामामीचं माहेर ! या रानड्यांच्या घरातच वरच्या मजल्यावर लेले कुटुंब राहात होतं. स्वैपाकघराला लागून आणखी एक खोली होती ती रानड्यांच्या वापरात होती. त्यांच्या बाहेरच्या बंदिस्त व्हरांड्यातून वरती यायला दुसरा जिना होता. स्वैपाकघरातच एका सेटीवर वर्षाचे आजोबा झोपलेले असायचे. त्यांचं वय नव्वदच्या आसपास असेल. त्यांचं सगळं बिछान्यावरच करावं लागायचं. शीलामामीच करायची सगळं, तेही विनातक्रार ! बाहेरच्या खोलीत सेटीवर वर्षाची आजी, त्याही पंच्याऐंशीच्या आसपास ! जेमतेम स्वतःचं स्वतः आवरायच्या. त्यांची तब्येतही नरम-गरम असायची. 

सकाळी मामाचा डबा, मुलांची शाळा आणि बाकी सगळं घरकाम, मामी हसतमुखाने करायची. शिवाय इतर कलाकुसरीची कामंही हौसेने चालू असायची. रूखवताच्या वस्तू, मोत्यांची महिरप इत्यादि… 

तर या घराशी माझा संबंध आला तो १९८१ पासून. शहापूरच्या ग. वि. खाडे विद्यालयातून एस. एस. सी. झाल्यावर आम्ही दोघींनी अकरावीला मुलुंड काॅलेज ऑफ काॅमर्सला प्रवेश घेतला. अकरावी – बारावी आमची काॅलेजची वेळ दुपारी १.४५ ते ५.४५. शहापूरहून बसने आसनगाव ला यायचं आणि मग ११ वाजताची गाडी पकडून काॅलेजला जायचं. गाडी १२.३५ ला मुलुंडला आणि १२.४० ला आम्ही काॅलेजमध्ये पोचायचे. मग  एक तास बहुतेक लेडीजरूममध्ये डबा खाऊन आणि नंतर बसून काढायचो.  म्हणून मग अधून-मधून आम्ही दोघी मामीकडे जायला लागलो. 

मुलुंडच्या अलीकडचे स्टेशन ठाणे आणि स्टेशनपासून शाॅर्टकटनी दहा मिनिटात मामीच्या घरी ! अर्धा तास तिथे बसून परत ठाणे स्टेशन आणि काॅलेजला ! मामी नेहमीच हसतमुखाने स्वागत करायची. वडी, लाडू, शंकरपाळे, बिस्किट काहीतरी खाऊ नेहमीच हातावर ठेवायची. घरून आणलेली डब्यातली पोळीभाजी खायला बसलो तर नंतर गरम-गरम वरण-भात खायला लावायची. चाचणी परीक्षा असो की वार्षिक, आम्ही दोघी कायम मामीकडे राहायला जायचो. 

शहापूर – आसनगावहून मुंबईकडे जायला, त्यावेळी अगदी मोजक्या गाड्या होत्या. एक गाडी गेली की तीन तासांचा विराम. एकदा बस लेट झाल्याने आमची सकाळची गाडी चुकली आणि त्यामुळे प्रिलिमचा पेपर देता आला नाही. त्यावेळी इतर वाहनांनी रस्त्यामार्गे जाणं अवघडच होतं आणि शिवाय खिशालाही परवडलं नसतं. त्यामुळे परीक्षेच्या आदल्या दिवशी आम्ही दोघी ठाण्यात दाखल व्हायचो. स्वैपाकघराला लागून असलेली वैद्यांची खोली मग परीक्षा संपेपर्यंत आम्हाला दिलेली असायची. आणि त्याबद्दल रानडे कुटुंबियांनीही कधी नापसंती व्यक्त केल्याचं मी ऐकलं/अनुभवलं नाही.

रात्री जागून अभ्यास असो, पहाटे लवकर उठून करायचा असो, मामी सेवेला तत्पर असायची. चहा-खाणं, जेवण आपुलकीनं हातात आणून द्यायची. आणि याबाबतीत वर्षात आणि माझ्यात कधीच कोणताच भेदभाव नसायचा हं ! वर्षा तिच्या सख्ख्या नणंदेची मुलगी, तिची भाची, तिचं कोडकौतुक केलं तर एकवेळ समजण्यासारखं आहे. पण मी त्या भाचीची मैत्रीण, तरीही माझेही अगदी तस्सेच लाड केले जायचे. कुठले ऋणानुबंध असतात हो हे ! खालच्या रानडेआजी देखील काहीतरी गोडधोड मुद्दाम आणून द्यायच्या आम्हाला. वर्षाची आई आणि मामी, या नणंद-भावजयीचं नातं हा तर एका स्वतंत्र लेखाचा विषय व्हावा ! इतकं समजूतदारपणाचं, आपुलकीचं नातं खरंच दुर्मिळ आहे. 

आम्ही एस. वाय. बी. काॅमला असतानाच वर्षाचं लग्न झालं. वर्षाच्या लग्नाच्या आधीच तिची आई अंथरुणाला खिळली. कित्येक महिने हाॅस्पिटलमध्येच होती. लग्नालाही उपस्थित राहू शकली नाही. पण मामा-मामींनी खंबीरपणे उभं राहून सगळं व्यवस्थित पार पाडलं. लग्नानंतर थोड्याच दिवसात वर्षाचे बाबा अचानक गेले. पुढे काही दिवसांनी आईही गेली. वर्षाचं माहेरपण, बाळंतपण हे देखील मामींनीच केलं, आणि तेही अगदी पोटच्या लेकीप्रमाणे, हे मी स्वतः बघितलं आहे. 

काॅलेज संपलं. नोकरी, लग्न, संसार या व्यापात मीही गुरफटले. मामीही मुलांचे संसार, नातवंडं यात रमलेली. त्यामुळे वारंवार भेट काही होत नाही. वर्षाकडेच तिची विचारपूस करते. पण मागच्या वर्षी आमची वर्षाकडे भेट झाली. माझा कवितासंग्रह अलवार तिला भेट दिला. तिच्या डोळ्यातलं कौतुक आणि गळामिठी, न बोलता खूप खूप देऊन गेली.

आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. पण मातृवत निःस्वार्थ प्रेमाचा वर्षाव करणारी मामी मला कायमच वंदनीय आहे. 

अधिक मासानिमित्त या आगळ्यावेगळ्या प्रेममूर्तीला साक्षात दंडवत. आणि ही शब्दभेट- —- कृतज्ञतेची ! 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आपला तिरंगा 🇮🇳 आपला अभिमान” … ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “आपला तिरंगा 🇮🇳 आपला अभिमान” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

आपल्या देशात दोन प्रमुख राष्ट्रीय दिन साजरे केले जातात. 

१) भारतीय स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट. 

२) भारतीय प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी.

या दोन्ही दिवशी आपण झेंडावंदन करतो. उंच आकाशात झेंडा फडकवून त्याकडे पाहत असताना आपला ऊर अभिमानाने भरून येतो. परंतु या दोन दिवशी झेंडा फडकविण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे हे किती जणांना माहिती आहे ?

१५ ऑगस्ट रोजी झेंडा फडकवण्याच्या पद्धतीला ध्वजारोहण असे म्हणतात.

इंग्लिशमध्ये फ्लॅग हॉईस्टिंग (Flag Hoisting) असे म्हणतात, परंतु अनेक जण त्याचा उच्चार फ्लॅग होस्टिंग असा करतात. त्या दोन्हीही शब्दांच्या उच्चारामुळे अर्थात जमीन अस्मानाचा फरक पडतो. फ्लॅग हॉईस्टिंग म्हणजे ध्वजारोहण.

आता याला ‘ध्वजारोहण‘ का म्हणतात हे पाहू. १५ ऑगस्ट रोजी आपला देश स्वतंत्र झाला. म्हणजे आधी तो पारतंत्र्यात होता. त्यामुळे त्या दिवशी झेंडा हा ध्वजस्तंभाच्या मध्यभागी अथवा मध्याच्या खाली फोल्ड करून ठेवलेला असतो. १५ ऑगस्टच्या सकाळी तो झेंडा खालून वरच्या टोकापर्यंत चढविला जातो आणि त्यानंतर तो फडकविला जातो. याचा अर्थ असा आहे की आधी हा झेंडा आकाशात नव्हताच आपण पारतंत्र्यात होतो. स्वातंत्र्य मिळाल्यामुळे प्रत्यक्ष आकाशामध्ये असलेला ब्रिटिशांचा झेंडा खाली उतरवून आपला झेंडा वरती चढविला गेला आणि आपल्या झेंड्याचा मान सर्वोच्च झाला. 

२६ जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन, म्हणजे आपला देश स्वतंत्र होताच. फक्त तो प्रजासत्ताक झाला. त्यामुळे या दिवशी झेंडा आधीच ध्वजस्तंभाच्या वरच्या टोकाला घडीबंद करून चढवलेला असतो. फक्त खालून दोरी ओढून तो आकाशात फडकविला जातो. आपला तिरंगा हा आपल्या देशात सर्वोच्च मानाचा झेंडा असून प्रजेमधील प्रत्येकाला त्याकडे अभिमानाने मान उंच करून पाहता यावे म्हणून तो वरती टोकावर असलेला झेंडा फक्त फडकावला जातो. त्याला इंग्लिश मध्ये फ्लॅग अनफरलिंग (Flag Unfurling) असे म्हणतात.

आणखी एक फरक म्हणजे, १५ ऑगस्टला पंतप्रधान ध्वजारोहण करतात, तर २६ जानेवारीला फक्त दोरी ओढून राष्ट्रपती तो फडकवतात. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, तेव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच नव्हते हे याचे कारण असावे. 

१५ ऑगस्टला ‘ लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते, तर २६ जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर … राजपथावर झेंडा फडकावला जातो, हा आणखी एक फरक. 

दोन्ही दिवशी ध्वजस्तंभावर झेंडा फडकवण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धतीतला फरक प्रत्येक भारतीयाने जाणून घेणे आणि समजून घेणे आवश्यक आहे. जय हिंद ! 

स्वातंत्र्य दिनाचा विजय असो !!

भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो !!!

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मैत्री…” – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “मैत्री…” – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर  ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

किती छोटा शब्द आहे ‘मैत्री’

पण महत्वाचा, अनुभवल्याशिवाय न समजणारा

 ‘मी’ आणि’ तू’ यांचा मिळून बनतो शब्द ‘मैत्र’

हे मैत्र ज्यांच्यात असतं, ती भावना म्हणजे ‘मैत्री’

 सर्व भेदांना छेदून जाते ती ‘मैत्री’

एकमेकांबद्दल वाटणारा विश्वास म्हणजे ‘मैत्री’ कोणतीही गोष्ट करताना झालेली आठवण म्हणजे ‘मैत्री’

दोन आत्म्यांना जोडणारे, तरीही मुक्त असणारे बंधन म्हणजे ‘मैत्री’

असे बंधन जे स्थळ, काळ, वेळ, स्त्री, पुरूष सर्वांच्या पलिकडचे..

बंध असूनही बंधनात न ठेवणारे…

सर्व नाती जपूनही नात्यांच्या पलिकडचे…. कोणतेच नाते नसूनही सर्व नाती जपणारे-

कोणतीही गोष्ट हक्काने केव्हाही शेअर करावीशी वाटणे म्हणजे ‘मैत्री’

एकमेकांना समजून घेते, समजावते ती ‘मैत्री’ कोणतीही गोष्ट लपवावीशी वाटत नाही ती ‘मैत्री’

षडरिपुंच्या पलीकडे जाऊन आदर करते ती ‘मैत्री’

एकमेकांच्या उणिवांसहित केलेला स्वीकार म्हणजे ‘मैत्री’

मनातले न सांगताच समजून घेते ती ‘मैत्री’

एकमेकांचा आदर करते आणि हक्कही गाजवते ती ‘मैत्री’

नशीबवान माणसांनाच लाभते अशी ‘मैत्री’

खरंच किती छोटा शब्द आहे ‘मैत्री’

लेखिका – सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

© सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – मनामनात तिरंगा…🇮🇳– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– मनामनात तिरंगा…🇮🇳– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

हृदयात देशप्रेम मोठे,

छोटा भासे गगनचा गाभारा !

मनामनात तिरंगा,

घरा-घरात राष्ट्रध्वज उभारा !

घर नाही तिरंगा लावू कुठे?

हा खुजा प्रश्न बाजूला  सारा !

एक देश एक राष्ट्रध्वज,

हीच आमची  आहे विचारधारा !

© श्री आशिष  बिवलकर

15 ऑगस्ट 2023

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # 16 – दे रहे शत्रु को दावत… ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे।  आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – दे रहे शत्रु को दावत।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 16 – दे रहे शत्रु को दावत… ☆ आचार्य भगवत दुबे ✍

सीमा पर दिन-रात डटे

सैनिक कर रहे हिफाजत

उनसे बढ़कर नहीं हमारी

सेवा, भक्ति, इबादत

 

वे उपेक्षा के शिकार

हो रहे आज बलिदानी

जिनने हँसकर मातृ-भूमि पर

दी अपनी कुर्बानी

ऐसे खेल न खेलो

जिनसे होने लगे बगावत

 

विपदा में जो आर्तनाद

करते थे पड़े चरण में

अभयदान देकर तब

हमने रक्खा उन्हें शरण में

वे कृतघ्न अपने विरुद्ध

दे रहे शत्रु को दावत

 

इतना ओछापन चरित्र का

हुए स्वार्थ में अंधे

तस्कर जमाखोर करते हैं

सारे कुत्सित धंधे

जीवन रक्षक औषधियों में

करने लगे मिलावट

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – आज़ादी मुबारक 🇮🇳 ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

पुनर्पाठ-

? संजय दृष्टि – आज़ादी मुबारक 🇮🇳 ??

घटना 15 अगस्त 2016 की है। मेरा दफ़्तर जिस इलाके में है, वहाँ वर्षों से सोमवार की साप्ताहिक छुट्टी का चलन है। दुकानें, अन्य व्यापारिक प्रतिष्ठान, यों कहिए कमोबेश सारा बाज़ार सोमवार को बंद रहता है। मार्केट के साफ-सफाई वाले कर्मचारियों की भी साप्ताहिक छुट्टी इसी दिन रहती है।

15 अगस्त को सोमवार था। स्वाभाविक था कि सारे छुट्टीबाजों के लिए डबल धमाका था। लॉन्ग वीकेंड वालों के लिए तो यह मुँह माँगी मुराद थी।

किसी काम से 15 अगस्त की सुबह अपने दफ्तर पहुँचा। हमारे कॉम्प्लेक्स का दृश्य देखकर सुखद अनुभूति हुई। रविवार के आफ्टर इफेक्ट्स झेलने वाला हमारा कॉम्प्लेक्स कामवाली बाई की अनुपस्थिति के चलते अमूमन सोमवार को अस्वच्छ रहता है है। आज दृश्य सोमवारीय नहीं था। पूरे कॉम्प्लेक्स में झाड़ू-पोछा हो रखा था। दीवारें भी स्वच्छ ! पूरे वातावरण में एक अलग अनुभूति, अलग खुशबू।

पता चला कि कॉम्प्लेक्स में सफाई का काम करनेवाली सीताम्मा, सुबह जल्दी आकर पूरे परिसर को झाड़-बुहार गई है। लगभग दो किलोमीटर पैदल चलकर काम करने आनेवाली इस निरक्षर लिए 15 अगस्त किसी तीज-त्योहार से बढ़कर था। तीज-त्योहार पर तो बख्शीस की आशा भी रहती है, पर यहाँ तो बिना किसी अपेक्षा के अपने काम को राष्ट्रीय कर्तव्य मानकर अपनी साप्ताहिक छुट्टी छोड़ देनेवाली इस सच्ची नागरिक के प्रति गर्व का भाव जगा। छुट्टी मनाते सारे बंद ऑफिसों पर एक दृष्टि डाली तो लगा कि हम तो धार्मिक और राष्ट्रीय त्योहार केवल पढ़ते-पढ़ाते रहे, स्वाधीनता दिवस को राष्ट्रीय त्योहार, वास्तव में सीताम्मा ने ही समझा।

आज़ादी मुबारक सीताम्मा, तुम्हें और तुम्हारे जैसे असंख्य कर्मनिष्ठ भारतीयों को!

सभी मित्रों को, भारत के हम सब नागरिकों को देश के स्वाधीनता दिवस की वर्षगांठ पर हार्दिक बधाई और शुभकामनाएँ। 🙏🏻🇮🇳🙏🏻🇮🇳🙏🏻

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ महादेव साधना- यह साधना मंगलवार दि. 4 जुलाई आरम्भ होकर रक्षाबंधन तदनुसार बुधवार 30 अगस्त तक चलेगी 🕉️

💥 इस साधना में इस बार इस मंत्र का जप करना है – 🕉️ ॐ नमः शिवाय 🕉️ साथ ही गोस्वामी तुलसीदास रचित रुद्राष्टकम् का पाठ  🕉️💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 93 – सजल  – अपनी सुसंस्कृति को हमने… ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है “सजल  – अपनी सुसंस्कृति को हमने…। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 93 – सजल  – अपनी सुसंस्कृति को हमने… ☆

अपनी सुसंस्कृति को हमने,

अपने हाथों तापा।

बुरे काम का बुरा नतीजा,

ईश्वर ने घर-नापा।।

 

ऊँचाई पर चढ़े शिखर में,

जिनको हमने देखा,

भटके राही उन बेटों के

हुए अकेले पापा।

 

बनी हवेली रही काँपती,

काम न कोई आया।

विकट घड़ी जब खड़ा सामने,

यम ने मारा लापा।

 

जोड़-तोड़ कर जिएँ सभी जन

यही जगत ने भाँपा।।

जीवन जीना सरल है भैया,

सबसे कठिन बुढ़ापा।

 

तन पर छाईं झुर्री देखो,

सिर में आई सफेदी ।

तन-मन हाँफ रहा है कबसे,

दिल ने खोया आपा।

 

जिन पर था विश्वास उन्हीं ने,

घात लगा धकियाया।

देख प्रगति की सीढ़ी चढ़ते,

अखबारों ने छापा।

 

समय बदलते देर लगे ना

देख रहे हैं कबसे

सच्चाई पर अगर चले तो

बँधे सिरों पर सापा।

 ©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares