मराठी साहित्य – विविधा ☆ ‘ओटी आईची…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

?विविधा ?

☆ ‘ओटी आईची…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

आजपासून अधिक महिन्याची सुरूवात! गेला आठवडाभर वाॅटसपवर याविषयी वेगवेगळे लेख आणि माहिती वाचतेय. अधिक महिन्यात काय काय करावं, म्हणजे कोणती व्रतवैकल्ये करावी, पोथ्या-पुराण वाचावी, जावयाला ३३ जाळीदार वस्तूंचं वाण द्यावं इ.इ. त्याचबरोबर फक्त अधिक महिन्यात लेकीनं आईची ओटी भरावी, आईला साडी घ्यावी, असंही वाचलं. अन् मन विचाराच्या भोवऱ्यात गरगरायला लागलं.

अशी साडी वगैरे देऊन अधिक महिन्यात तुझीओटी भरण्याचा एखादाच प्रसंग मी अनुभवला असणार. कारण ठळकपणे असं फारसं आठवत नाहीये.  माझ्या लग्नानंतर जेमतेम ६ वर्षांनीच तू देवाघरी गेलीस.

माझा याप्रकारे कृतज्ञता व्यक्त करण्याला अजिबात आक्षेप नाही. पण खरंच का अश्या ओटी भरण्यानेच फक्त आईबद्दल कृतज्ञता व्यक्त होते. आणि माझ्या मनाने ठामपणे याचं उत्तर *नाही * असं दिलं.

लग्नापूर्वी तर तुझ्यासोबतच राहात होते. पण संसारात पडल्यावर क्षणोक्षणी तुझी आठवण येतच राहिली. *लेकरासंगे वागताना थोडी थोडी समजत जातेस * असं सहजपणे लिहून गेले माझ्या कवितेत ते उगाच नाही. तू आपल्या वागण्यातून रूजवलेले संस्कार, नक्कीच माझं आयुष्य सुंदर करत गेले आणि आजही करत आहेत.

अगदी लहान वयात तू लावलेली वाचनाची सवय, आयुष्यातील अनेक अवघड परीक्षा यशस्वीपणे पास होण्यासाठी नकळत कारणीभूत ठरली. कारण आलेल्या प्रसंगाला खंबीरपणे तोंड देण्यासाठी विचार करण्याची कुवत आणि वैचारिक बैठक त्यातूनच तयार झाली. तुझं स्वतःचं उदाहरण तर नेहमीच माझ्या डोळ्यांसमोर असतं.

मराठी आणि हिंदी भाषांवरील तुझं प्रभुत्व, शुद्धलेखनाचा आग्रह, यामुळेच माझ्या लेखनात सहसा शुद्धलेखनाची चूक आढळत नाही. याआणि जी काही कमतरता राहते, तो नक्कीच माझा आळशीपणा किंवा अज्ञान. पण या  गोष्टींसाठी प्रशंसा होते तेव्हा तेव्हा तुझ्या आठवणीने नेहमीच डोळे भरून येतात. 🥲😢

परिस्थितीनं नववीतच शिक्षण सोडायला लागलं तरी आपल्या अखंड आणि अफाट वाचनामुळे तू मिळवलेलं ज्ञान आणि वैचारिक समृद्धी, ही अनेक शैक्षणिक पदव्या मिळवलेल्या व्यक्तींपेक्षाही कितीतरी उच्च दर्जाची होती, हे मला पदोपदी जाणवतं. म्हणूनच अगदी लहान वयात आमच्या हाती श्रीमान योगी, स्वामी, झेप, मृत्युंजय यासारखी पुस्तकं होती.  चौथीला स्काॅलरशिप मिळाल्यावर तू घेऊन दिलेलं साने गुरुजींचं, चित्रा आणि चारू, हे पुस्तक उदात्त प्रेम आणि मैत्री कशी असते, असावी हे नकळत शिकवणारं!

स्वतःसाठी पुरेसं नसतानाही, त्यातलंच दुसऱ्याला देऊन मदत करण्याची तुझी सह्रदयता, माणुसकी या गोष्टी मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. मग ती साधी वाटीभर आमटी, कामवाल्या राधाबाईंसाठी मुद्दाम काढून ठेवण्याची गोष्ट असो की आणखी काही!

आम्हां पाचही मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण देऊन ताठ मानेनं, स्वाभिमानानं जगायला शिकवताना, बाबा आणि तू, दोघांनी  सोसलेल्या अडचणी आणि केलेल्या त्यागाला तोडच नाही. त्या ऋणातून उतराई होणं या जन्मी तरी जमेल असं वाटत नाही ग! 🙏

असे संस्कार घडवणारी आई लाभणं हे आमचं महद्भाग्य! असे कितीतरी प्रसंग आणि आठवणी! कोणीतरी म्हटल्याप्रमाणे *आकाशाचा केला कागद, समुद्राची केली शाई, तरी लिहून होणार नाही,आई तुझी थोरवी!  पण  माझी ही शब्दरूपी ओटी तुला समाधान देईल, असा मला विश्वास आहे.

आणि हो हे वाचून, सगळ्या मुलामुलींना शब्दांत व्यक्त करता आलं नाही तरी, आपापल्या आईची  आठवण काढून ते तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतील याची मला खात्री वाटते. ज्यांच्या नशिबी अजून मातृसौख्य आहे, ते भाग्यवान या निमित्ताने पुन्हा एकदा आईच्या कुशीत शिरण्याचा सुखद अनुभव घेतील. तिची प्रेमानं, आपुलकीनं चौकशी करतील आणि काळजीही घेतील. बाकीचे तिचे स्मरण करून, तिच्या संस्कारांचा वसा चालू ठेवतील, तर ही ओटी सुफळ संपूर्ण होईल.

© सुश्री प्रणिता खंडकर

दि. १८/०७/२०२३

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अल्लड… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ अल्लड… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

हर्षा बाहेरुन आली तेव्हा शेजारच्या अंगणात लहान मुली पत्ते खेळत बसल्या होत्या.ते बघून हर्षा लगोलग तिकडे गेली.

“काय गं मुलींनो काय खेळताय?”

“बदाम सात”एकजण उत्तरली.

“मी खेळू तुमच्यासोबत?’’

एक मोठी बाई लहान मुलींसोबत खेळणार या विचाराने त्या मुली एकमेकींकडे पाहून खुदखुदू हसल्या.पण नाही कसं म्हणायचं या विचाराने त्यातलीच एक म्हणाली,

“हो.खेळा ना”

बऱ्याच दिवसांनी पत्ते खेळायला मिळताहेत याचा हर्षाला खुप आनंद झाला. ती मग त्यांच्याजवळ मांडी घालून बसली.आपल्या पाच वर्षाच्या मुलीला,केतकीलाही तिने जवळ बसवलं.छोट्या मिहिरला मांडीवर घेतलं.

“द्या मी पत्ते पिसते” मुलींकडचे पत्ते घेऊन तिने ते पिसले आणि सर्वांना वाटले. खेळण्यात ती इतकी रंगून गेली की त्यात एक तास कसा निघून गेला तिला कळलंच नाही.मध्येच एका मुलीने पत्ते टाकतांना बदमाशी केलेली हर्षाच्या लक्षात आली तेव्हा ती रागावून म्हणाली.

“ए असं नाही चालायचं हं.असा रडीचा डाव नाही खेळायचा”

तिचा आवाज ऐकून तिची आई बाहेर आली.

“अगंबाई ,हर्षू तू इथे बसलीयेस?मला वाटलं तू मैत्रिणीकडून अजून आलीच नाहीस आणि या लहान मुलींसोबत काय खेळत बसलीयेस?”

आईच्या हाकेने ती भानावर आली.

” हो आई.येतेच.बस फक्त एक डाव.”

“अगं तू भाजी करणार होतीस ना?की मी करु?बारा वाजून गेलेत.मुलांना भुका लागल्या असतील.”

” हो आई मला भुक लागलीये”

केतकी म्हणाली तशी मोठ्या अनिच्छेने ती पत्ते खाली ठेवून उठली

” मुलींनो संध्याकाळी आपण परत खेळू बरं का!”

मुलींनी माना डोलावल्या.हर्षा मुलांना घेऊन घरात गेली.

” हर्षू लहान मुलींसोबत खेळायचं तुझं वय आहे का?अगं दोन मुलांची आई ना तू?”

निर्मलाबाई म्हणाल्या तशी ती संकोचली. काय उत्तर द्यावं तिला कळेना.मग किचनमध्ये वळता वळता म्हणाली,

“अगं बऱ्याच दिवसात पत्तेच खेळले नव्हते म्हणून बसले.आणि काय बिघडलं गं लहान मुलींसोबत खेळले तर?”

निर्मलाबाई आपल्या त्या तीस वर्षाच्या निरागस चेहऱ्याच्या मुलीकडे पाहून हसल्या.”खरोखर या पोरीचं बालपण अजून संपलेलंच नाहिये अजून “त्यांच्या मनात आलं.

“काही बिघडत नाही. पण बाहेरच्यांनी बघितलं तर काय म्हणतील?”

” म्हणू दे काय म्हणायचं ते”

हर्षा थोडी चिडूनच म्हणाली.मग तिने भाजी करायला घेतली.पंधरावीस मिनिटात भाजी करुन तिने सर्वांना वाढलं.

” व्वा छान केलीयेस गं भाजी” भाजीची चव घेतल्याबरोबर निर्मलाबाई म्हणाल्या.हर्षाने स्मित केलं पण मघाशी आई जे बोलली त्याने तिचं मन नाराज झालं होतं.तिच्या सासूबाईही तिला नेहमी हेच म्हणायच्या.”अगं हर्षू हा बालिशपणा सोड आता .तू आता दोन मुलांची आई झालीयेस” दोन वर्षांपूर्वी त्या वारल्या तेव्हाच हर्षाच्या अल्लडपणावरुनचे त्यांचे टोमणे बंद झाले.आणि आज आईने त्यावरुन तिचे कान उपटले होते.

“आज तुझ्या मैत्रिणी येणार आहेत ना तुला भेटायला?त्यांना काय करायचं खायला?” अचानक आठवण येऊन निर्मलाबाईंनी विचारलं.

“शिरा आणि भजी करेन मी. तू बस त्यांच्या सोबत गप्पा मारत”

ती रागावलीये हे निर्मलाबाईंनी ओळखलं. पण तिचं रागावणंसुध्दा तिच्या निरागस चेहऱ्यावर मोठं गोड वाटत होतं. मनाशीच हसून त्या उठल्या. जेवणाचं टेबल आणि किचनमधला पसारा भराभरा आवरुन हर्षा बेडरुममध्ये गेली. तिची मुलं हाँलमध्ये कार्टून सिरीयल बघत बसली.

बेडवर पडल्यापडल्या हर्षाच्या मनात विचार आला. ‘खरंच का आपण बालिश आहोत? लहान मुलांच्या दुनियेत आपण रमतो. त्यांच्यासारखं आपल्याला हुंदडायला आवडतं,मस्त्या करायला आवडतं. खेळायला आवडतं. फुलं,फुलपाखरं,रंगबिरंगी पक्षी बघून आपण वेडे होतो.जगात सर्वत्र आनंदच भरलाय असं आपल्याला वाटत रहातं.आपण सहसा कुणावर रागवत नाही. रागावलो तरी पटकन विसरतो. म्हणून आपण सर्वांना बालिश वाटतो?’

तिला आपले काँलेजचे दिवस आठवले.फुलपाखरासारखी ती बागडायची.सगळ्यांशी ती हसून बोलायची.सगळ्यांशी तिची मैत्री होती.मुलांशी तर जास्तच.तिच्या मैत्रिणी तिला नेहमी टोकत “हर्षू मुलांबरोबर इतकी मोकळेपणाने वागत नको जाऊ.ते तुझ्या हसण्याचा वेगळा अर्थ काढतात”

पण तिने त्यांचा सल्ला कधीच मानला नाही. तिचा सुंदर पण निरागस,बालिश चेहरा आणि त्यावरच खट्याळ हसू पाहून अनेक तरुण तिच्या प्रेमात पडायचे.तिच्या प्रेमाची मागणी करणाऱ्या अनेक चिठ्ठ्या, अनेक मेसेज तिला मोबाईलवर यायचे.पण ती सगळ्यांकडे दुर्लक्ष करायची.त्यांना ती इतक्या गोड शब्दात नकार द्यायची की तिच्याबद्दल कुणालाच आकस रहात नसे.बरेच जण तिची बेबी म्हणून हेटाळणी करायचे.काँलेजच्या गँदरींगमध्येही तिला “बेबी”नावाने बरेच फिशपाँड पडायचे. पण तिला त्याचा कधी राग आला नाही.

“आई गं मी भातुकली खेळू?”

केतकीच्या प्रश्नाने ती भानावर आली

“का गं टिव्ही बघून कंटाळा आला वाटतं?”

” हो.खेळू का?”

“खेळ.पण तुझ्याकडे सगळं सामान कुठंय?”

” ती शेजारची उत्तरा आलीये सामान घेऊन”

“मग ठिक आहे.जा खेळा”

“आई तू येतेस मांडून द्यायला?”

ते ऐकून हर्षाला एकदम उत्साह वाटू लागला.प्रफुल्लित चेहऱ्याने ती म्हणाली.

” हो.चल चल.आपण हाँलमध्येच बसू”

मग हाँलच्या एका कोपऱ्यात ती मुलींना घेऊन बसली.तीन वर्षाचा मिहिरही तिथे लुडबुड करायला लागला.हर्षा मग त्या भातुकलीच्या खेळात अशी हरवून गेली की तिला जगाचा विसर पडला. 

चार वाजले आणि हाँलचा दरवाजा उघडला.तिच्या मैत्रिणी भराभर आत आल्या.हर्षाला उठून तयार व्हायला त्यांनी वेळच दिला नाही.

“अगंबाई, हर्षू अजून तू भातुकली खेळतेस?”

एक मैत्रीण म्हणाली तशा सगळ्याच जोरात हसल्या.

“नाही गं ,या मुलींना व्यवस्थित मांडून देत होते”

हर्षाने सारवासारव केली खरी पण मैत्रीणींना ते खरं वाटलं नाही हे तिच्याही ध्यानात आलं

“अगं आता तुझा स्वतःचा संसार आहे आणि तू खेळण्यातला संसार काय मांडून बसलीयेस?”

एका मैत्रिणीने परत आगाऊपणा केलाच.ते ऐकून केतकीला  काय वाटलं कुणास ठाऊक ती उत्तराला म्हणाली

“उत्तरा आपण उद्या खेळू हं”

उत्तरालाही ते पटलं.तिने पटापट सगळं सामान पिशवीत जमा केलं आणि निघून गेली.हर्षा आत जाऊन मेत्रिणींसाठी पाणी घेऊन आली.

“ए काही म्हणा आपली हर्षू अजून काहीsss बदलली नाही. अजूनही तशीच बालीश वाटतेय बघा” एक मैत्रिण म्हणाली

” हो खरंच.अगदी अकरावी बारावीतली अवखळ मुलगी वाटतेय”

“तिची फिगर तर बघ.अगदी चवळीची शेंग वाटतेय.नाहीतर आपण पहा .सगळ्याजणी भोपळे झालोत”

सगळ्याजणी फिदीफिदी हसल्या.

“हो पण वयानुसार थोडं मँच्युअर्ड दिसायलाच पाहिजे ना! नाहीतर ही हर्षू.वाटते का दोन मुलांची आई आहे म्हणून?आठवतं?आपल्या काँलेजची मुलं तिला बेबी म्हणायची.ती बेबी अजून बेबीच दिसतेय “

परत एकदा सर्वजणी हसल्या.  

हर्षाला खुप अवघडल्यासारखं झालं. त्या तारीफ करताहेत की टोमणे मारताहेत हे तिच्या लक्षात आलं नाही.

गप्पा सुरु झाल्या तसं हर्षाच्या लक्षात आलं की तिच्या मैत्रिणी पुर्णपणे संसारी झाल्याहेत.सासू,सासरे,नणंदा,नवरा आणि मुलं याव्यतिरिक्त त्यांचे विषय पुढे सरकत नव्हते.दोन वर्षांपूर्वी हर्षाच्या सासूबाई वारल्या.मुलांचा सांभाळ व्यवस्थित व्हावा म्हणून तिने स्वतः नोकरी सोडली आणि तीही पूर्ण वेळ संसारी बाई झाली असली तरी तिचं मन मात्र अनेक विषयावर गुंतत रहायचं.तिला इंटरेस्ट नव्हता अशी एकही गोष्ट नव्हती.तिला संगीत आवडायचं.विशेषतः सध्याच्या तरुण पीढिचं संगीत तिला खूपच आवडायचं. तिला पिक्चर बघायला आवडायचे, टिव्हीवरच्या कार्टून सिरीयल्स तर ती तिच्या मुलांसोबत आवडीने पहायची.तिला भटकायला आवडायचं. लहानमुलांचे तर सगळेच खेळ आवडायचे. असं मैत्रीणींसारखं तिचं आयुष्य एकसुरी कधीच नव्हतं.

क्रमश: – भाग 1… 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्थूलपणाची ऐशी की तैशी… ☆ श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? मनमंजुषेतून ?

☆ स्थूलपणाची ऐशी की तैशी… ☆ श्री मेघ:श्याम सोनावणे

एक काळ होता जेव्हा म्हणत असत की ‘पैसा गेला – काही नाही गेलं, तब्बेत गेली – काही तरी गेलं, चारित्र्य गेलं – सर्व काही गेलं’ (money lost- nothing lost, health lost- something lost, charector lost – everything lost).

आता परिस्थिती बदलली आहे. कोरोना नंतरच्या काळात तर ती प्रकर्षाने जाणवू लागली आहे व वरील सुभाषितामध्ये ही बदल झाला असून ‘वर्तणूक गेली- काही तरी गेलं, तब्बेत गेली तर सर्व काही गेलं’ अशी आता परिस्थिती आहे.

तुमच्याकडे पैसा असेल, वर्तणूक ही चांगली असेल पण तुमची प्रकृती (तब्बेत/हेल्थ) चांगली नसेल तर त्या पैशाचा, वर्तणूकीचा तुम्हाला काहीच फायदा नाही. तुमची प्रकृती खराब झाली तर तुमच्या चांगल्या वर्तणुकीमुळे तुमचा वशिला लागेल, चांगल्या दवाखान्यात तुम्हाला दाखल ही करता येईल, तेथील महागडा खर्च ही तुम्ही पेलू शकाल, पण तुमच्या शरीरावर होणाऱ्या औषधांच्या माऱ्याचे दुष्परिणाम ही तुम्हाला भोगावे लागतील. कोरोना काळात रेमिडीसीयर सारख्या औषधांनी अनेकांचा जीव वाचला पण त्यांच्या दुष्परिणामांनी त्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली‌ हे सर्वश्रुत आहेच. 

आजकाल आपलं खाणंपिणं ही असुरक्षित झालं आहे. उत्पन्न जास्त व्हावे यासाठी औषधांच्या फवारणी व रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतात उत्पादन होणारे धान्य हे सदृढ शरीरासाठी पोषक राहीले नाही व त्याने वेगवेगळ्या आजारांना निमंत्रणच दिले जात आहे. विशेष म्हणजे ते उत्पादन करणारे शेतकरी ही हेच अन्न खातात व त्यांच्यावर ही विपरीत परिणाम होतातच. खाद्यतेलांमधील भेसळ, फळे लवकर पिकावीत म्हणून त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या रासायनिक प्रक्रियांमुळे फळे ही स्वस्थ शरीरासाठी सुरक्षित राहीले नाहीत. दूध वगैरे इतर पेय, बहुतेकांच्या आवडीची आईस्क्रीम, चॉकलेट्स ही यापासून सुटलेले नाहीत, त्यामुळे आपल्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्वच घटकांपासून आपल्या शरीरस्वास्थ्याला हानी पोहोचत आहे. त्यात जनसामान्यांप्रति असलेल्या नैतिकतेचा अभाव सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यास कारणीभूत होत आहे. 

जगण्यासाठी अन्नधान्य आवश्यक आहे म्हणून ते टाळता तर येणार नाही. सतत बाहेरचे, भोजनालयांतील अन्न, फास्ट फूड, पिझ्झा बर्गर सारखे स्वस्थ शरीरासाठी तेवढे आवश्यक नसलेले अन्न/पदार्थ खाऊन लहानांपासून मोठ्यांपर्यंतची शरीरे कमकुवत व जाड, बेढब होत आहेत. अकाली मृत्यू चे प्रमाणही वाढत आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने कर्करोग व इतर साथीच्या रोग व विविध व्याधींचा प्रादुर्भाव वाढत आहे. परवा सामायिक केलेल्या लेखाप्रमाणे डॉ. नितू मांडके, डॉ. गौरव गांधींसारखे कमी वयात हृदयविकाराच्या झटक्याने दगावणाऱ्यांची संख्याही वाढत आहे व त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांची परिस्थिती व भविष्य अंधारात आहे. घरातील सदस्य व वयस्कांच्या प्रकृतीच्या तक्रारींमुळे घरातील आर्थिक स्थिती ही बिघडत आहे.      माणूस पैसा कमावण्यासाठी आयुष्यभर धावतो व तब्बेत खराब करून घेतो आणि मग मेहनतीने कमावलेला पैसा तब्बेत ठिक करण्यावर घालवतो. 

या सर्वांवर मात करण्यासाठी आपण आपल्या प्रकृतीची शक्यतो काळजी घेणे, तब्येत सांभाळणे, शरीर सुदृढ व रोगमुक्त कसे राहील याविषयी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी सतत प्रयत्नशील राहणे एवढेच आपल्या हाती आहे.

व्याधींचे अस्तित्व नाही असे घर शोधून ही सापडणार नाही. माझे ही खानपानावर नियंत्रण नसल्याने माझे ही वजन वाढत होते. आनुवंशिकतेमुळे उंची कमी व वजन ९६ किलो झाल्यामुळे माझे दोन्ही पायांचे गुडघे खराब झाले होते. चालणे अशक्य व खूपच त्रासदायक झाल्याने १६ ऑक्टोबर २०१८ रोजी माझ्या दोन्ही गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करून गुडघेबदल (जॉइंट रिप्लेस) करुन स्टील चे पार्ट बसवण्यात आले. एका पायाला पंचवीस व दुसऱ्या पायाला सत्तावीस टाके घालण्यात आले होते. त्यांचे एक्स रे चे फोटो व गुडघ्यांवर झालेल्या शस्त्रक्रियेचे वण माझ्या स्टेटस ला ठेवलेल्या फोटोत दिसतात. 

माझेही वय आता साठ आहे. उंची १५५ से. मी. त्यानूसार माझे वजन ५५ ते ६० किलो असायला हवे पण ते वाढत ९६ चे ९८ झाले. मी दररोज सकाळी सहा व सायंकाळी सहा कि. मी. असे बारा किलोमीटर चालत होतो. यामुळे वजन वाढत नव्हते, पण कमी ही होत नव्हते. पाऊस, थंडी व कंटाळा ने यात खंड पडत असे. वजन कमी करण्यासाठी मी मध-निंबू, उपाशी राहणे, पंधरा दिवस अन्न न घेता फक्त रस (ज्यूस) पिऊन राहणे, असे इतरही बरेच प्रयत्न करून पाहिले पण वजन काही कमी होत नव्हते. कंटाळून चालणे ही बंद झाले होते. शेवटी मी दैवावर हवाला ठेवून दिवस कंठत होतो. शरीर अजुन स्थूल झाले होते. (स्टेटस ला ठेवलेल्या फोटोत बघून कल्पना करू शकता). चालतांना मला धाप लागत होती व जीना चढाउतरायला त्रास होत होता. पोटाचा घेर वाढल्याने मला उभे राहिले तर माझे पाय दिसत नव्हते‌.  मोजे- बुट (सॉक्स- शूज) घालायला खूपच त्रास होई. मोजे घालतांना पोट दाबले जावून गळ्यापर्यंत येत असे‌.  सर्वच कपडे मला घट्ट होत असत. स्थूलपणा ची लाज वाटून कामाव्यतिरिक्त मी बाहेर जाणे टाळत होतो. घरातच राहिल्याने हळूहळू नैराश्य मला घेरायला लागले होते. दररोज सकारात्मक कथा लोकांना पाठवायचो पण मन निराश व्हायला लागले होते. 

आधी आमच्या शेजारी राहणाऱ्या एका मित्राची पत्नी, वय वर्षे तीस, पण ती ही स्थूल होती. माझे बघून तिने ही वजन करायचे सर्व प्रयत्न करून झाले होते पण त्यांनाही फरक पडला नव्हता. नंतर ते दूर रहायला गेले. त्यांनंतर त्यांना वजन कमी करण्याच्या खात्रीलायक प्रकाराविषयी माहीत झाले व त्यांनी ते अंमलात आणले. स्वतः अनुभवून मित्राचे दोन महिन्यांत दहा व पत्नी चे सहा महिन्यांत पंचवीस किलो वजन कमी झाल्यावर ती दोघे आमच्याकडे आली. मी त्यांना बघून आश्चर्यचकित झालो. 

जेवण बंद न करता, आहार नियंत्रण करून सकस आहाराच्या मदतीने व घरातल्या घरात नियमित व्यायाम करुन कमी दिवसांत वजन घटवण्याच्या या पद्धतीविषयी त्यांनी मला माहिती दिली. भविष्यात आजारी पडून त्रास, मनःस्ताप भोगण्यापेक्षा शरीर स्वस्थ, निरोगी करून व्याधीमुक्त जीवन जगण्याचा आनंद देणारा हा सहज साध्य असलेला व्यायाम प्रकार मला उत्तम वाटला व त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही पद्धत अवलंबली.

आहार नियंत्रण, सकाळ व संध्याकाळ असे दोन वेळा व्यायाम व दोन वेळा सकस संतुलित आहाराच्या मदतीने सुरुवातीच्या काही दिवसांतच मला खूप हलके वाटू लागले व उत्साह वाढून पहिल्या महिन्यात माझे आठ किलो वजन कमी झाले. दूसऱ्या महिन्यात सात, तिसऱ्या महिन्यात पाच व पुढील पंधरा दिवसांत तीन असे साडेतीन महिन्यांत एकूण तेवीस किलो वजन कमी झाले. पोटाचा घेर अगदीच कमी झाला (स्टेटस ला असलेल्या फोटोत बघू शकता) व स्वतःला खूप उत्साही, स्वस्थ व हलकं वाटू लागले. माझे सर्वच कपडे आता ढिले होऊ लागले. माझ्यातील झालेला हा बदल बघून माझे इतर मित्रही अचंबित झाले व त्यांनीही ही पद्धत अवलंबली आणि घरातल्या घरात राहून वजन घटवायला त्यांनी सुरुवात केली आहे.

हे फक्त वजन घटवण्यास उपयोगी नसून ज्यांचे वजन कमी आहे व त्यामुळे त्यांना त्रास किंवा चेष्टा, उपेक्षेला सामोरं जावं लागतं, त्यांना ही यातून फरक पडतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सकारात्मक भावना वाढीस लागते.

या सोप्या व्यायामांमुळे थायराईड, ॲसिडिटी, अपचन, मायग्रेन, महिलांमधील पी. सी ओ. डी. चा त्रास ही कमी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. बऱ्याच स्त्रियांना स्थूलपणामुळे संतती होण्यास अडचण  येते. त्यांचे वजन कमी झाल्यामुळे हा अडसर निघून संतती झाल्याचीही उदाहरणे आहेत. 

बरेचसे आजार हे वाढलेल्या पोटामुळे होतात. अपचन, वात, गॅस, ॲसिडिटी, मायग्रेन, बद्धकोष्ठता, हातापायाला मुंग्या येणे, अंग दुखी, वाढत्या वजनामुळे कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी हे आजार ‘एकावर एक फ्री’ सारखे आपल्या जीवनात प्रवेशात. स्थूलपणामुळे हृदयावरही ताण येतो. रक्ताभिसरण सुरळीत होत नाही. मांडी वाळून बसणे शक्य होत नाही. प्रवास ही नकोसा होतो. 

आपल्या नेहमीच्या दिनचर्येला बाधा न येता दिवसातला आपला एखादा तास घेणाऱ्या या व्यायामाने येणाऱ्या घामामुळे त्वचा निरोगी होते व त्वचेला तजेला येतो तसेच शरीरातील टाकाऊ, विषारी द्रव्ये घामाद्वारे मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने किडनी वरील ताण ही कमी होतो व एकप्रकारे अनायासेच डायलेसिस ची प्रक्रिया पार पडत असल्याने भविष्यात किडनीचे विकार होणे ही टळते.

आपले शरीर असंख्य कोषिका (सेल्स) नी बनलेले असल्याने या विविध व्यायामांमुळे मेटॅबोलिजम वाढल्याने हे सेल्स मजबूत होतात, शरीराचे स्नायूही मजबूत होतात, परिणामी शरीर सुदृढ व निरोगी बनते. 

आपल्यापैकी प्रत्येकाला आज ना उद्या या समस्या व सत्याला सामोरे जावे लागणार आहेच. वजन कमी करणे वाटते तितके सोपे नाहीच पण दृढ निश्चय, मनापासून प्रयत्न, या विषयावरील तज्ञांचे नियमित योग्य मार्गदर्शन व सातत्य ठेवल्याने हे वाटते तितके अवघड ही नाही हे मला उमजले व मी ते करुन दाखवले आणि अजूनही करीत आहे. 

व्यायाम शाळेत ही जाऊन व्यायाम करणे हे ॲलोपॅथी सारखे आहे. कदाचित तुम्ही वजन कमी करू शकता पण व्यायाम बंद केल्यावर साईड इफेक्ट सारखं पुन्हा पहिल्यापेक्षा जास्त वजन वाढू लागते. 

योग करून शरीर स्वस्थ ठेवू शकता पण ते होमिओपॅथी सारखे आहे. फरक पडण्यास खूप कालावधी लागतो. त्यापेक्षा हजारो इच्छुक लोकांप्रमाणे मी अवलंबीत असलेल्या या पद्धतीमुळे लवकर व दीर्घकाळ फरक पडणार असेल तर ते चांगले नाही का? 

आपल्याला जे काही फुकट मिळते त्याचा फक्त आनंद असतो पण त्याची कदर मात्र रहात नाही. लाखमोलाचं हे शरीर ही आपणास फुकट मिळालं आहे. त्यांची काळजी घेण्याऐवजी वाटेल ते खाऊन, पिऊन त्याच्यावर अत्याचार करतो व मग त्रास होऊ लागल्यावर रुग्णालयात पैसे घालवतो. दरमहा असे गोळ्या औषधांवर किती खर्च होतात त्याचा हिशोब केला तर हळूहळू जाणारा हा आकडा मोठा होतो. 

तुमची जर खरंच मनापासून वजन कमी किंवा जास्त करायची व कोणत्याही स्वास्थ्यविपरित परिस्थितीला सामोरे जाण्यास सक्षम असे आपले शरीर स्वस्थ, सुदृढ व निरोगी असावे अशी तीव्र आंतरिक इच्छा असेल तर आणि तरच या विषयावर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. आपले वजन खात्रीने कमी होईल याची ‘ आधी केले, मग सांगितले ‘ या उक्तीप्रमाणे मी ग्वाही देतो.

आपणास स्वास्थ्यपुर्ण सुखी समाधानी आयुष्य लाभो यासाठी भरभरून शुभेच्छा. चला तर मग या सुंदर जीवनाला ‘फॅट टू फिट’ असे वळण देऊन अजून सुंदर बनवूया.

© श्री मेघ:श्याम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘मिसाईल मॅन’ ए.पी.जे.अब्दुल कलाम ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

‘मिसाईल मॅन’ ए.पी.जे.अब्दुल कलाम ☆ श्री राजीव गजानन पुजारी

आज २७ जुलै – आपले माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा स्मृतिदिन.  

… “यशस्वी होण्याचा माझा निर्धार पुरेसा मजबूत असेल तर अपयश कधीही माझ्या आड येणार नाही” – असा आत्मविश्वास बाळगणारे आणि तो खरा करून दाखवणारे कलामसर, म्हणजे ही मोलाची शिकवण जणू संपूर्ण देशालाच देणारे एक अद्वितीय व्यक्तिमत्व. 

ए.पी.जे. अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म तत्कालीन मद्रास इलाख्यातील रामेश्वरम येथे १५ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव अवूल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम होते. त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलाब्दिन होते, जे  एक नावाडी असून इमाम म्हणून देखील ते काम बघत. त्यांच्या आईचे नाव आशीअम्मा होते. त्या एक गृहिणी होत्या. कलाम यांना चार भाऊ व एक बहीण होते. सर्व भावंडांमध्ये कलाम हे शेंडेफळ होते.

कलामांचे पूर्वज श्रीमंत व्यापारी होते, पण कालौघात त्या कुटुंबावर कठीण परिस्थिती आली होती. अब्दुल कलाम लहानपणी वृत्तपत्रे विकून कुटुंबाच्या माफक उत्पन्नात भर घालायचे हे आवर्जून सांगण्यासारखे आहे. 

कलाम यांनी रामनाथपुरम् येथे शालेय शिक्षण घेतले आणि सेंट जोसेफ कॉलेज तिरुचिरापल्ली येथून भौतिकशास्त्राची पदवी संपादन केली. १९५५ मध्ये ते एरोस्पेस अभियांत्रिकी करण्यासाठी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये गेले. फायटर पायलट होण्याचे त्यांचे स्वप्न पात्रता फेरीत अगदी काही गुणांनी भंग पावले. ते नवव्या क्रमांकावर होते. पण आय.ए.एफ. कडे फक्त आठ जागाच उपलब्ध होत्या. त्यानंतर त्यांना संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या(DRDO) एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट मध्ये शास्त्रज्ञ म्हणून नोकरी मिळाली. त्यांनी प्रख्यात शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या हाताखाली काम केले. 

१९६९ मध्ये कलाम यांची बदली भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रो मध्ये करण्यात आली. इस्रोमध्ये ते एस.एल.व्ही. या उपग्रह प्रक्षेपण वाहनाचे प्रकल्प संचालक होते. एस एल व्ही प्रक्षेपकाने १९८० मध्ये रोहिणी उपग्रह यशस्वीरित्या पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित केला. एस एल व्ही हा भारताचा पहिला प्रक्षेपक होता. कलाम यांनी ध्रुवीय प्रक्षेपण वाहन (PSLV) विकसित करण्यासाठीही काम केले. एसएलव्ही तंत्रज्ञानातून बॅलॅस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करण्यासाठीच्या प्रोजेक्ट व्हॅलीअंट आणि प्रोजेक्ट डेव्हिल या दोन प्रकल्पांचे ते संचालक देखील होते. त्यांच्या संशोधन आणि नेतृत्वगुणांमुळे त्यांना प्रगत क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे संचालकपद मिळाले. आर्. वेंकटरमन संरक्षण मंत्री असताना कलाम यांची क्षेपणास्त्रांचा ताफा विकसित करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. ‘ बेलास्टिक ‘क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानामुळे, तेव्हापासूनच त्यांना ‘मिसाईल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाऊ  लागले होते.

१९९२ ते १९९९ पर्यंत कलाम हे पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार आणि डीआरडीओ चे सचिव होते. पोखरण-२ चाचण्यांदरम्यान कलाम हे मुख्य प्रकल्प समन्वयक होते. याच काळात कलाम भारतातील  आघाडीचे शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले.

२००२ मध्ये अब्दुल कलाम यांची भारताची ११ वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली. भारताचे राष्ट्रपती बनणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. २००७ पर्यंतचा राष्ट्रपती म्हणून त्यांचा कार्यकाळ देशासाठी महत्त्वाचा ठरला. लोकांमध्ये, विशेषतः शाळकरी मुलांमध्ये ते फार लोकप्रिय ठरले, इतके की त्यांना ‘पीपल्स प्रेसिडेंट’ म्हटले जाऊ लागले. त्यांनी देशाच्या अनेक भागांना भेटी दिल्या. त्यांची भाषणे, त्यात असणाऱ्या प्रेरणादायी विचारांमुळे लोकप्रिय ठरली. राष्ट्रपतीपदासाठी दुसऱ्यांदा उमेदवारी मिळावी म्हणून लोकांचा दबाव  असतांनाही त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रपतीपदानंतर कलाम आय.आय.एम.- अहमदाबाद, आय.आय.एम.-शिलॉंग, आय.आय.एम.- इंदूर,  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर, अण्णा विद्यापीठ, आदींमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर बनले.

२७ जुलै २०१५ रोजी आय.आय.एम.- शिलॉंग येथे व्याख्यान देत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मूळ गावी, रामेश्वरम् येथे पूर्ण शासकीय इतमामाने आणि अतिशय सन्मानाने त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. 

अब्दुल कलाम हे त्यांच्या सचोटी व प्रामाणिकपणासाठी ओळखले जात. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी काही पुस्तके व लॅपटॉप व्यतिरिक्त कोणतीही वैयक्तिक संपत्ती मागे सोडली नाही. ते विविध धर्माच्या शिकवणुकींचे जाणकार होते, आणि आंतरधर्मीय संवादाचे प्रतीक होते हे आवर्जून नमूद करायलाच हवे. 

त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यात:

  • India-2020:A vision for the new  Millennium
  • Wings of fire
  • Ignited minds- Unleashing the power within India
  • A manifesto for change: A sequel to India 2020
  • Transcendence: My spiritual experiences with Pramukh swamiji

  — आदि पुस्तकांचा समावेश होतो.

तसेच त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यामध्ये :

  • पद्मभूषण -१९८१
  • पद्मविभुषण – १९९०
  • भारतरत्न – १९९७
  • वीर सावरकर पुरस्कार – १९९८
  • रॉयल सोसायटी, इंग्लंड यांचेकडून दिला जाणारा किंग चार्ल्सII पदक – २००७
  • इडिनबर्ग युनिव्हर्सिटी, इंग्लंड यांचेकडून डॉक्टर ऑफ सायन्स – २०१४

  —– आदि पुरस्कारांचा समावेश होतो.

आजच्या त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना अतिशय आदरपूर्वक प्रणाम. 

© श्री राजीव गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उतराई… ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆  उतराई… ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित

एक गृहस्थ लहानपणी अतिशय गरीब होते.पुढे जीवनात ते अतिशय यशस्वी झाले. श्री गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनाला आले असता ते म्हणाले, ” महाराज, माझ्या अपेक्षेबाहेर माझी जी भरभराट झाली, ती माझी कर्तबगारी नाही. भगवंताच्या कृपेनेच ती झाली, यात शंका नाही. आता काय केल्याने मी त्याचा उतराई होईन?” हा प्रश्न ऐकून श्रीमहाराज प्रसन्न झाले व त्यांना म्हणाले, “आपल्यावर ज्याने उपकार केले, त्याच्याजवळ जी वस्तू नाही, ती त्याला देणे म्हणजेच खऱ्या अर्थाने उतराई होणे होय. जी वस्तू त्याच्यापाशी आहे तीच त्याला देण्यात फारसे स्वारस्य नाही. सर्व दृश्य वस्तूंची मालकी मूळ भगवंताचीच असल्याने दृश्य वस्तू  त्याला देणे म्हणजेच त्याचेच त्याला दिल्यासारखे आहे. त्याच्यापाशी नाही अशी एकच वस्तू आहे, ती म्हणजे त्याला स्वतःचे स्वतःवर प्रेम करता येत नाही. आपण त्याच्यावर मनापासून प्रेम केले म्हणजे त्याच्यापाशी नसलेली वस्तू त्याला दिल्यासारखे होते. भगवंतावर मनापासून प्रेम करणे शक्य होण्यासाठी त्याला शरण जावे. शरणांगती साधण्यास, मी कोणीही नाही ही भावना निर्माण झाली पाहिजे. ती नामस्मरणाने निर्माण होते. म्हणून मनापासून नाम घेण्याचा अभ्यास करावा”.

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हसरे कुटुंब ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

?️?  चित्रकाव्य  ?️?

? हसरे कुटुंब ! ? श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

चेहरा घेऊन मानवाचा

फुले अनवट फुलली,

किमया भारी निसर्गाची

आज म्या डोळा पाहिली !

गाल गोबरे गोल फुगले

नाकी तोंडी रंग लाल,

दोन डोळे भेदक काळे

शोभे अंगी झगा धवल !

वाटे जणू एका रांगेत  

उभी राहिली मुले गोड,

साथ देती आई बाबा

नसे प्रेमा त्यांच्या तोड !

नसे प्रेमा त्यांच्या तोड !

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #192 – कविता – मौन मन का मीत… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का चौकीदार”   महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता  मौन मन का मीत)

☆ तन्मय साहित्य  #192 ☆

☆ मौन मन का मीत…. ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

ओशो को पढ़ते हुए मौन पर एक छंद सृजित हुआ, प्रतिक्रियार्थ प्रस्तुत है…

बिना कहे, जो सब कह जाए वही मौन है

निर्विचार, चिंतक हो जाए वही मौन है

अन्तर शुन्याकाश, व्याप्त चेतनानुभूति

निष्प्रह मन, खुशियाँ पहुँचाये वही मौन है।

 – तन्मय

उपरोक्त मुक्तक के संदर्भ में एक रचना “मौन मन का मीत…” जो पूर्व में विपश्यना के 10 दिवसीय मौन साधना शिविर करने के बाद लिखी थी, मन हो रहा है आपसे साझा करने का, प्रतिक्रियार्थ प्रस्तुत है –

☆ मौन मन का मीत…. ☆

मौन मन का मीत

मौन परम सखा है

स्वाद, मधुरस मौन का

हमने चखा है।

 

अब अकेले ही मगन हैं

शून्यता, जैसे गगन है

मुस्कुराती है, उदासी

चाहतों के, शुष्क वन है

जो मिले एकांत क्षण

उसमें स्वयं को ही जपा है, मौन…

 

कौन है, किसकी प्रतीक्षा

कर रहे, खुद की समीक्षा

हर घड़ी, हर पल निरंतर

चल रही, अपनी परीक्षा

पढ़ रहे हैं, स्वयं को

अंतःकरण में जो छपा है, मौन…

 

हैं, वही सब चाँद तारे

हैं, वही प्रियजन हमारे

और हम भी तो वही हैं

आवरण, कैसे उतारें

बाँटने को व्यग्र हम

जो, गाँठ में बाँधे रखा है, मौन…

 

मौन, सरगम गुनगुनाये

मौन, प्रज्ञा को जगाये

मौन, प्रकृति से मुखर हो

प्रणव मय गुंजन सुनाये

मौन की तेजस्विता से

मुदित हो तन मन तपा है।

स्वाद मधुरस मौन का

हमने चखा है।।

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – लघुकथा ☆ दरियादिली ☆ डॉ कुंवर प्रेमिल ☆

डॉ कुंवर प्रेमिल

(संस्कारधानी जबलपुर के वरिष्ठतम साहित्यकार डॉ कुंवर प्रेमिल जी को  विगत 50 वर्षों से लघुकथा, कहानी, व्यंग्य में सतत लेखन का अनुभव हैं। अब तक 450 से अधिक लघुकथाएं रचित एवं बारह पुस्तकें प्रकाशित। 2009 से प्रतिनिधि लघुकथाएं (वार्षिक) का सम्पादन एवं ककुभ पत्रिका का प्रकाशन और सम्पादन। आपने लघु कथा को लेकर कई  प्रयोग किये हैं।  आपकी लघुकथा ‘पूर्वाभ्यास’ को उत्तर महाराष्ट्र विश्वविद्यालय, जलगांव के द्वितीय वर्ष स्नातक पाठ्यक्रम सत्र 2019-20 में शामिल किया गया है। वरिष्ठतम  साहित्यकारों  की पीढ़ी ने  उम्र के इस पड़ाव पर आने तक जीवन की कई  सामाजिक समस्याओं से स्वयं की पीढ़ी  एवं आने वाली पीढ़ियों को बचाकर वर्तमान तक का लम्बा सफर तय किया है, जो कदाचित उनकी रचनाओं में झलकता है। हम लोग इस पीढ़ी का आशीर्वाद पाकर कृतज्ञ हैं।आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय लघुकथा “दरियादिली “.)

☆ लघुकथा – दरियादिली ☆ डॉ कुंवर प्रेमिल

एक महिला प्रतिदिन बिना नागा पार्क में प्रवेश करती। वहां मुंदी अधमुंदी आंखों से लेटे हुए कुत्तों में जाग पड़ जाती।

उस महिला के पीछे कम से कम एक दर्जन कुत्तों की फौज होती। वह रोटी के छोटे-छोटे टुकड़े फेंकती जाती और कुत्ता समूह उनको चट करता जाता।

एक छोटा सा पिल्ला तो उस महिला की टांगों के बीच फंसा फंसा चलता। बड़े कुत्तों के कारण उसे रोटी मिल ही नहीं पाती थी। जब कभी महिला का ध्यान उस तरफ जाता तो वह झुक कर उसके मुंह में एक दो टुकड़े डाल देती।

कुत्ता समूह खुश था। बैठे ठाले रोज उनकी दीवाली थी। दर्शक महिला की दरियादिली की डटकर प्रशंसा करते।

एक दिन उस महिला की पड़ोसन यह दृश्य देखकर बोली -‘देखो तो इस धन्ना सेठी को, खुद के सास ससुर तो वृद्ध आश्रम में पल रहे हैं और यह कुत्तों को रोटी खिलाकर पुण्य लूट रही है।’

वह महिला इन सब बातों से बेपरवाह थी। उल्टे उसने कुत्तों की रोटी की व्यवस्था के लिए एक रोटी बनाने वाली बाई  भी  रख ली थी।

🔥 🔥 🔥

© डॉ कुँवर प्रेमिल

संपादक प्रतिनिधि लघुकथाएं

संपर्क – एम आई जी -8, विजय नगर, जबलपुर – 482 002 मध्यप्रदेश मोबाइल 9301822782

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – प्रवाह ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – लघुकथा – प्रवाह ??

वह बहती रही, वह कहता रहा।

…जानता हूँ, सारा दोष मेरा है। तुम तो समाहित होना चाहती थी मुझमें पर अहंकार ने चारों ओर से घेर रखा था मुझे।

…तुम प्रतीक्षा करती रही, मैं प्रतीक्षा कराता रहा।

… समय बीत चला। फिर कंठ सूखने लगे। रार बढ़ने लगी, धरती में दरार पड़ने लगी।

… मेरा अहंकार अड़ा रहा। तुम्हारी ममता, धैर्य पर भारी पड़ी।

…अंततः तुम चल पड़ी। चलते-चलते कुछ दौड़ने लगी। फिर बहने लगी। तुम्हारा अस्तित्व विस्तार पाता गया।

… अब तृप्ति आकंठ डूबने लगी है। रार ने प्यार के हाथ बढ़ाए हैं। दरारों में अंकुर उग आए हैं।

… अब तुम हो, तुम्हारा प्रवाह है। तुम्हारे तट हैं, तट पर बस्तियाँ हैं।

… लौट आओ, मैं फिर जीना चाहता हूँ पुराने दिन।

… अब तुम बह रही हो, मैं प्रतीक्षा कर रहा हूँ।

…और प्रतीक्षा नहीं होती मुझसे। लौट आओ।

… सुनो, नदी को दो में से एक चुनना होता है, बहना या सूखना। लौटना उसकी नियति नहीं।

वह बहती रही।

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ महादेव साधना- यह साधना मंगलवार दि. 4 जुलाई आरम्भ होकर रक्षाबंधन तदनुसार बुधवार 30 अगस्त तक चलेगी 🕉️

💥 इस साधना में इस बार इस मंत्र का जप करना है – 🕉️ ॐ नमः शिवाय 🕉️ साथ ही गोस्वामी तुलसीदास रचित रुद्राष्टकम् का पाठ  🕉️💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश के नवगीत # 17 ☆ राम को वनवास… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

श्री जय प्रकाश श्रीवास्तव

(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी  के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ  “जय  प्रकाश के नवगीत ”  के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं।  आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “राम को वनवास।)

✍ जय प्रकाश के नवगीत # 17 ☆  राम को वनवास… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव

ज़रूरत है फिर मिले,

राम को वनवास।

 

सरक आया जंगलों तक

शहर का जंगल,

हो रहे हैं सुबाहू

मारीच के दंगल,

 

ताड़का से गगनचुंबी,

बन गये आवास।

 

नदी बहरी हो गई है

मूक हैं झरने,

ज़हर पीकर हवाएँ भी

लगी हैं डसने,

 

हवन होती आस्थाएँ,

छल रहा विश्वास।

 

कहाँ विश्वामित्र हैं

कहाँ हैं गौतम,

अहल्या सी प्रजा सारी

पड़ी है बेदम,

 

कब उठेगा परस पाकर

मृत पड़ा उल्लास।

***

© श्री जय प्रकाश श्रीवास्तव

सम्पर्क : आई.सी. 5, सैनिक सोसायटी शक्ति नगर, जबलपुर, (म.प्र.)

मो.07869193927,

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares