मराठी साहित्य – विविधा ☆ “डॉक्टर काका सांभाळा !” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

 🌸 विविधा 🌸

☆ “डॉक्टर काका सांभाळा !” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

लहानपणी डॉक्टर हा आमच्या कुटुंबाचाच एक भाग असायचा. सहसा त्याला फॅमिली डॉक्टर म्हटलं जायचं. आमच्या कोणत्याही दुखण्या खुपण्यावर तेच उपचार करायचे.  फारसे स्पेश्यालिस्ट त्यावेळी नसायचे अन त्याची फार मोठी गरज भासल्याच कांही आठवत नाही. ऑपरेशन वगैरे साठी साधारणपणे जिल्ह्याच्या गावी जावे लागत असे. तरीही फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्यानेच ते चालत असे. फॅमिली डॉक्टर म्हणजे काका मामाच !  आम्ही त्यांना डॉक्टरकाकाच म्हणायचो. डॉक्टरना मारणे तर दूरच पण सगळे डॉक्टरकाकांच्या नजरेच्या धाकात असायचे. डॉक्टरांचा सूरही नेहमी आश्वासक, चेहरा हसरा, वाणी मधुर, कधी कधी आम्हा मुलांना दटावणारी सुद्धा !  पण हे खूपच छान कौटुंबिक संबंधांचं नातं असायचं. अगदी आम्हाला मुलं होई पर्यंतच्या वेळेपर्यंत हे असं चांगल्या कौटुंबिक संबंधांचं वर्तुळ होतं. डॉक्टरांच्या प्रामाणिकपणाविषयी संशय नव्हता. कांही वाईट घडल्यास डॉक्टरांना नव्हे दैवाला दोष दिला जायचा.

असे छान दिवस चालले होते. आम्ही मोठे झालो आमचे मित्रही डॉक्टर झाले. आणि एके दिवशी आमच्या डॉक्टर मित्राकडून ती बातमी समजली. कोर्टाच्या एका निकालाने वैद्यकीय सेवा ही ग्राहक संरक्षण कायद्याखाली आणली.  खरं म्हणजे तिथंच या सर्व संबंधाची फाटाफूट झाली असावी.  कौटुंबिक नाती कायदेशीर झाली. विश्वास जाऊन कायदा आला.. समजुतदारपणा जाऊन कोर्ट कचे-या आल्या. आपली ट्रीटमेंट बरोबर होती हे कायद्याने सिद्ध करण्याची जबाबदारी डॉक्टरांवर आली. त्यासाठी कायदेशीर रेकॉर्ड्स आली. मग ऑपरेशन पूर्व तपासणी ऑपरेशन नंतर  तपासणी, ट्रीटमेंट रेकॉर्ड वगैरे सर्व सर्व आवश्यक ठरू लागलं. त्यासाठी स्टाफ, रुग्णालयांची अद्ययावत कार्यालये,, असिस्टंट्स, लॅबोरेटरीज वेगवेगळ्या टेस्ट्स, अद्यायावत यंत्रसामुग्री, मल्टीस्पेशालिटी  हॉस्पिटल्स, कोट्यावधीची यंत्रसामुग्री आणि उपकरणांसाठी आवश्यक म्हणून वातानुकूलन यंत्रणा, या सर्वांचा देखभाल खर्च आणि त्या साऱ्यांसाठी लागणारा प्रचंड पैसा. वाढती महागाई व वाढलेले स्टॅंडर्ड ऑफ लिविंग  या सर्वाना आवश्यक असणाऱ्या प्रचंड पगार व मानधनाच्या रकमा. एक एक वाढतच गेले. आणि शेवटी या सर्व रकमांची भरपाई करण्याची जबाबदारी पेशंटवर !

एवढ्या प्रचंड रकमा भरताना पेशंट सुद्धा मग त्या पैशातून पंचतारांकित सुविधा मागू लागले. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून यांना आकर्षित करण्यासाठी मार्केटींग यंत्रणा, कमिशन्स. एवढ्या मोठ्या रकमा भरताना घडून येणारे कटू प्रसंग. मग आधी पैसे भरा, डिपॉझिट भरा, मगच ऍडमिट असा ट्रेंड सुरु झाला.  पेशंट साठी वापरल्या गेलेल्या मटेरियलच्या  हिशोबात सुरुवातीला योग्य वाटणाऱ्या हॉस्पिटलना सुद्धा आकार वाढल्यावर स्टाफवर  कंट्रोल ठेवता येईनासा झाला. मग स्टाफ कडून होणारे गैर प्रकार, कधी कधी डॉक्टर सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करू लागले कारण प्रशिक्षित स्टाफ दुर्मिळ काय करणार ?  त्यातूनच नव्या नव्या प्रकारचे रोग आणि लोकसंख्या वाढीच्या विस्फोटामुळे वाढणारी पेशंटची संख्या. हा वाढीचा फुगा फुगतोच आहे. या सर्वात डॉक्टरांचा दोष कुठे ?  पण जबाबदारी मात्र डॉक्टरांवर !  व्यवसाय वाढला कि गैरप्रकार वाढतात.  जसं सरकारचा व्यवसाय सर्वात मोठा म्हणून त्यात गैरप्रकार सर्वात जास्त कारण कंट्रोल ठेवणे अवघड.  नंतर काही खासगी हॉस्पिटलची अवस्थाही सरकारी हॉस्पिटलसारखी झाली पण पैसे मात्र सरकारी हॉस्पिटल पेक्षा प्रचंड जास्त. या दुष्टचक्राची व्याप्ती मात्र वाढता वाढता वाढे भेदिलें आरोग्यमंडळा अशी होत गेली.

आता या सर्वांचेच दुष्परिणाम दिसू लागलेत. व्यापारी आणि ग्राहक हा नाते संबंध सतत लुटणारा आणि लुटला जाणारा असेच समीकरण फार पूर्वीपासून मनावर ठसवले गेले आहेच, त्यात डॉक्टर व पेशंट या नातेसंबंधांची भर  पडली. डॉक्टरांचे अनुभव जसे खरे तसेच पेशन्टचेही अनुभव खोटे नव्हते. यातूनच वाढती आहे दरी.

डॉ अरुण लिमयेचें  ‘क्लोरोफॉर्म ‘ वाचले आणि आम्हीच तोंडात बोटे घातली  हे असं असतं ?  खरं  तर त्याच वेळेला सरकार व डॉक्टर्स यांनी अशा गैरप्रकारांना कसा आळा घालता येईल ? याचा विचार केला असता तर आज चाळीस वर्षानंतर वेगळेच चित्र दिसले असते. दुर्दैवाने तसे घडले नाही.  त्यातून डॉक्टर हॉस्पिटल्स यांचे गैरप्रकार कमी न होता वाढतच गेले.  समाजातील दोन घटकांमधील दरी वाढतच गेली.

समाज मनातील संशयाच्या भुताने आज उग्र रूप धारण केले आहे. कायदा व कोर्ट हे कोणत्याही गोष्टीचं समाधानकारक उत्तर असू शकत नाही. कायद्याला भावना नसतात पण माणसांना असतात. कोर्टामध्ये  निर्णय मिळतो न्यायाबद्दल खात्री देता येत नाही. समोर आलेले पुरावे व त्याचा अन्वयार्थ लावण्यामागची तार्किकता यात माणसामाणसात फरक असतो. एका कोर्टाने फाशी दिलेला माणूस दुसंं-या कोर्टात निर्दोष सुटू शकतो. खरं काय ? न्याय कोणता ?  आपण सर्वसामान्य  माणसं ! आपण नातेसंबंध सुधारू शकलो तरच यातून उत्तर मिळू शकेल.  आमच्या लहानपणीची डॉक्टरशी असलेल्या नातेसंबंधांची व कौटुंबिक संबंधांची पुनर्स्थापना होऊ शकेल का ? आमची नातवंडे नव्या डॉक्टरांच्या अंगाखांद्यावर डॉक्टरकाका म्हणून खेळू शकतील का ?  आज तरी भविष्य धूसर दिसतंय !

डॉक्टर काका सांभाळा  स्वतःला !!!

©  श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संध्याछाया… भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

☆ संध्याछाया… भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले

कोणता तरी अगदी फालतू सिनेमा  टीव्हीवर लागला होता. निरर्थकपणे चॅनल बदलताना  सुधाचं लक्ष कशातच नव्हतं. उगीचच चाळा म्हणून ती  रिमोटची बटणे दाबत होती. मनात दुसरेच विचार घोळत होते..आज चार वाजता तिचा पुतण्या, त्याची बायको मुलं सगळे रहायला  येणार होते चार दिवस. सुधाला हल्ली हे सगळे नकोसे वाटायचे. 

तो लहान मुलांचा दंगा, तो पसारा, ते लोक गेले की आवरताना जीव  दमून जायचा तिचा.  पुन्हा जास्त स्वयंपाक, काही गोष्टी बाहेरून आणा, गोडधोड करा ! त्यात मदत कोणाचीही नाही,आणि येणारी मंदारची बायको तर आळशी आणि काहीच कामाची नाही !

आताशा सुधाला  ही उठबस होतच नसे. पण विश्वासला हे लोक येणार म्हटले की अगदी उत्साह यायचा आणि न झेपणारी शंभर कामे तो करायला धावायचा.. सुधाला हे अजिबात  पसंत  पडायचे नाही. आधीच एक तर ती संथ,थंड, होती. तिला उरक म्हणून नव्हता आणि मूलच न झाल्याने संसारात त्यासाठी कुठलीच तडजोड तिला कधी करावीच नाही लागली. तिचा नवरा  विश्वास आणि दीर विकास, दोघेच भाऊ. विकास आणि विश्वास मध्ये वयाचे अंतर खूप होते. सासूबाईंना खूप उशिरा झाला विकास– त्यांची अगदी चाळीशी उलटून गेल्यावर.  त्यामुळे कदाचित, त्यांचे विकासवर जास्तच प्रेम. विकास आणि त्याची बायको सविता मात्र आईजवळ राहिले कायम, ती असेपर्यंत ! सुधाचं सासूबाईंशी कधी  पटलं नाही आणि ती वेगळी राहू लागली. सासूबाईंचा रागच होता जरा सुधावर !  सविता मात्र सासूबाईंशी पटवून घेई. ती लाडकी होतीच सासूबाईंची !लाडक्या लेकाची बायको म्हणून !  विकासचं आईवर अतिशय प्रेम होतं आणि तो कधीही वेगळा राहिला नसता, म्हणूनही असेल कदाचित !

सुधाने मूल होण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण कोणातच दोष नसूनही तिला कधी दिवस गेलेच नाहीत. त्यामुळे तिचा आधीच घुमा,आतल्या गाठीचा असलेला स्वभाव आणखीच कडवट झाला. सुरवातीची सगळी हौस अशीच विरून गेली. तरीही विश्वास चांगल्या पोस्टवर होता, म्हणून ते दोघे अनेक परदेश प्रवास करून, खूप जग हिंडून आले होते. तेही विश्वासचीच हौस म्हणून ! सुधाला ती तरी कुठे हौस होती? परत आल्यावर  कोणी विचारलं असतं ना, तर आपण काय बघितलं हेही तिला नसतं सांगता आलं ! केवळ विश्वासचा आग्रह म्हणूनच तिने ते परदेश प्रवासही केले, तेही निरुत्साहानं ! सुधाचा एकूणच निरुत्साही   चेहरा, कशातच नसलेला उत्साह, तिला माणसे  जमवायला मारक ठरे. तिला मैत्रिणीही फार नव्हत्या आणि हिने कधी बाहेर पडून, चार लोकांत मिसळून, नोकरीही केली नाही.  वडिलोपार्जित वाडा होता,

त्याचा अर्धा भाग विश्वासला, अर्धा भाग विकासला अशी वाटणी आईवडील असतानाच झाली होती. आपल्या वाट्याला आलेल्या भागात विश्वासने दोन मजले बांधले होते, त्यालाही झाली तीस पस्तीस वर्ष. कोणासाठी आता परत नवीन बांधायचे आणि ठेवायचे? बिल्डर यायचे,त्यांना विश्वास परतवून लावायचा !.त्या जुन्या गढी सारख्या एकाकी, उदास घरात आणखीच  खिन्न वाटायचे, संध्याकाळ झाली की.  

विकासची बायको सविता, मुलगा  वागायला ठीक ठीक  होते. मुलगा मंदार  इंजिनीअर झाला आणि त्याने लग्नही केले. अचानक एक दिवस, मुंबईहून कारने परत येत असताना विकासला ऍक्सिडेंट झाला आणि विकास जागच्याजागी गेलाच. तरुण, फक्त पन्नाशीच उलटलेला मुलगा असा अचानक गेलेला बघून, आईवडिलांनी हायच खाल्ली. विकासचा मुलगा मंदार नुकताच  नोकरीला लागला होता. त्याची बायको गृहिणी आणि आईही घरातच असायची . वडिलांनी  काही फार पैसे मागे ठेवले नव्हते . या जुन्या वाड्यात रहायला नको म्हणून विकास केव्हाच बाहेर फ्लॅट घेऊन रहात होता तेवढीच काय ती त्याची कमाई. सगळा भार मंदारच्या खांद्यावर येऊन पडला. मंदार फारसा कर्तबगार तर नव्हताच. त्याची नोकरीही बेताची, बायकोही अगदी सामान्य कुटुंबातली आणि साधी बीकॉम, आणि कसलीही जिद्द नसलेलीच ! आजपर्यंत आई वडिलांनी  मंदारला एकुलता एक म्हणूनच वाढवले, जमेल तितके कौतुक केले, माफक लाड पुरवले इतकेच. कसाबसा डिप्लोमा करून त्याला जॉब मिळाला इतकंच. सगळ्या बाजूने अशी संकटे आली असताना, त्याचा विश्वासकाका नेहमी त्याच्या पाठीशी उभा असायचा. पण मंदार कधीही मोकळेपणाने त्याच्याशी बोलला नाही, की कधी त्याला सल्ले विचारले नाहीत त्याने. त्याचा वाड्यातील भागही तसाच ठेवला त्याने. त्याला तो विकताही येईना. असा अर्धाच भाग बिल्डर कसे घेणार? ते म्हणत, सम्पूर्ण वाडा द्या म्हणजे आम्हाला नीट बांधता येईल, तुम्हालाही आम्ही फ्लॅट्स, वर पैसेही देऊ. पण विश्वास त्याला कधीही  तयार नव्हता. त्याला हे  मान्यच नसायचे. त्या जुन्या, कोणीही नसलेल्या वाड्यात दोघेच नवरा बायको रहाताना बघून लोकांना आश्चर्यच वाटे. आणखी आणखीच तो वाडा जुनाट होत चालला. विश्वासचं मात्र मंदारवर निरपेक्ष प्रेम होतं. तो त्यांच्या घरी राहायला जायचा, त्यांना बोलावायचा. विश्वासची नोकरी चांगली होती,आणि काटकसरीची  राहणी असल्याने विश्वास पैसे बाळगून होता.  पुन्हा मुलं बाळं नसल्याने खर्च तरी कुठे होते? निरनिराळे छंद, वाचन, यात विश्वास स्वतःला रमवत असे. सुधाला कधी तेही जमले नाही.   सतत  घरात बसून बसून एकलकोंडी झाली होती सुधा. शिवाय  मूल नसल्याचे शल्य कायम होतेच. लोक काय म्हणतील, या भीतीने ती कधी कोणाच्या डोहाळजेवण,  बारसं अशा साध्यासुध्या समारंभालाही जायची नाही. कधी गावी माहेरी गेली, तर भाऊ भावजय म्हणत , “ ताई, कशा राहता बाई त्या गढी सारख्या वाड्यात तुम्ही? रात्री भीति नाही का हो वाटत? किती एकाकी आणि जुनं घर झालंय ते. भावजीना म्हण की, टाका विकून आणि बिल्डर देत असेल तर छान फ्लॅट तरी घ्या ! काय ताई ! बरोबरच्या लोकांची घरं बघ आणि तुमचा किल्ला बघ.जुना पुराणा ! “

सुधा भावाला म्हणाली, “अरे मी सांगून थकले बाबा. माझ्या नशिबी हेच जुनाट घर दिसतंय कायम. जाऊ दे ना. मग आमच्यात भांडणे  होतात आणि पुन्हा त्यातून निष्पन्न काहीही होत नाही. इथेच होणार आमचा शेवट. मला तर त्यात काही नवीन आणावं, कधी हौसेने सजवावे असं सुद्धा वाटत नाही. किती केलं तरी जुनाट ते जुनाटच. आणि नंतर तरी कोणाला द्यायचंय ते? जाऊ दे ना ! आप मेला जग बुडाला.”  विश्वासला मात्र मंदारची अतिशय मनापासून ओढ आणि माया होतीच. त्यांना तो प्रेमाने आपल्या घरी रहायला बोलावी, बाहेरून चांगले पदार्थ मागवी, त्यांच्या लहान मुलांशी खेळण्यात रमून जाई.

–क्रमशः भाग पहिला

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ॥ दळिता कांडिता॥ ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

सुश्री विनिता तेलंग

? मनमंजुषेतून ?

☆ ॥ दळिता कांडिता॥ ☆ सुश्री विनिता तेलंग

(॥ विठ्ठलनामाचा रे टाहो ॥)

‘विठ्ठल आवडी प्रेमभावो, विठ्ठल नामाचा रे टाहो ‘ असं म्हणणार्‍या नामदेवांनी आणि त्यांच्या बरोबर सर्वच संतांनी विठुरायाला अभंग ,भारुडं ,विरहिणी, गवळणी आरत्या ,भूपाळ्या असे अनेक शब्दालंकार घातले .. पण पहाटेच्या अंधारात विठुरायाच्या अंगावर आपल्या जीवनानुभवांची रंगीबेरंगी ठिगळं लावलेली मायेची वाकळ पांघरली, ती महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या घरोघरच्या मालनींनी ! 

त्यांनी गायलेल्या जात्यावरच्या ओव्यांतून त्यांच्या साध्यासुध्या जगण्याचे सारे रंग दिसून येतात .

लग्न होऊन अजाणत्या वयात आईचा पदर नि बापाची मायेची पाखर याला अंतरलेली ही सासुरवाशीण .पहाट फुटायच्या आधी ही उठायची .कुटुंबाच्या मुखात घास घालणारं जातं हा तिचा देवच ! त्या देवापुढं मिणमिणता दिवा लावून हिची श्रमसाधना सुरु व्हायची .घासामागून घास जात्याच्या मुखात सारल्यावर जात्यातून पीठ झरावं तशा तिच्या मुखातून ओव्या झरु लागायच्या.

तिच्या मनाच्या बारीक सारीक दुखापती ,तिला असलेली माहेराची ओढ ,कंथाचं (पतीचं),दिराचं, लेकरांचं कवतिक ,तिच्या गावचं निसर्गवैभव, सूर्य चंद्र नदी पाखरं अशा तिच्या सार्‍या निसर्गदेवतांचं वर्णन ,असं सारं त्या ओव्यांमधे ती सहज गुंफायची .अंगावर लपेटलेला पदर कमरेशी घट्ट खोचून, ओचा आवरून ,एक पाय लांब पसरून ती  जात्याशी बसायची ..जात्याचा नि त्या बरोबर फिरणार्‍या  हातातल्या काकणांचा नाद आणि तिचं पुढं झुकून त्या लयीशी एकरूप होणं ..तीच लय पकडून दळदार शब्दफुलं तिच्या मुखी यायची . एकामागून एक तिच्या सहजसुंदर स्वरात त्यांना ओवताना तयार व्हायच्या त्या ओव्या ! महदंबा, जनाबाई यांच्या आोव्यांवर श्रेयाचा टिळा लागला .पण महाराष्ट्रातल्या आदिमायांनी पिढ्यानपिढ्या जे ओव्यांचं पीक काढलं ते अनामच राहिलं .त्या काळातल्या स्त्रीजीवनाचं प्रातिनिधिक रूप ओव्यांमधे बंद झालं .कुरुंदाच्या दगडाचं जातं हा त्यांच्या भावविश्वाचा,त्यांच्या साहित्यिक जाणिवांचा साक्षीदार .प्रगती गिरण्या घेऊन आली तसा तो साक्षीदारही मूक झाला .पण महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातल्या घराघरांमधे पिढ्यानपिढ्या ज्याच्या नावाची आळवणी झाली तो मालनींचा पिता- भ्राता- सखा विठुराया मात्र अजूनही त्या मायेच्या गोधडीची ऊब विसरला नसेल ! 

ओव्यांमधे विठ्ठल ,पंढरी ,वारी याला फार जिव्हाळ्याचं स्थान आहे .इंदिरा संतांनी दीर्घकाळ, परिश्रमपूर्वक  ओव्या गोळा केल्या व त्याच्या भावानुसार गाथाही बांधल्या. महाराष्ट्राचा एक अमूल्य ठेवा त्यांच्यामुळं जिवंत राहिला .मालनींच्या नि विठ्ठलाच्या अनेकपदरी नात्याचं सुरेख वर्णन इंदिराबाई करतात ..

“भाऊ ,बाप, दैवत ,प्रियकर अशा सर्व नात्यांच्या पाकळ्या नि त्याच्या गाभ्यात मैतरभाव असलेल्या फुलाचे , अशा स्नेहाच्या अविष्काराचे नाव ‘सखा ‘ . पांडुरंगाला वाहिलेले हे फूल मालनींच्या हृदयात परिमळत असते .याच्या परिमळात सर्व जिव्हाळे एकवटून दरवळत असतात !” 

पंढरी हे मालनींचं माहेर .बाप विठ्ठल ,आई रखुमाई , पुंडलीक भाऊ नि चंद्रभागा भावजय ! 

जीवाला वाटईतंऽ   

पंढरीला जावं ऽ जावं ऽ ऽ

आईबापा भेटू यावं 

कुंडलिकालाऽ लूटावं ऽ ऽ

त्यांना जशी माहेराची ओढ तशी तिकडं विठुरायालाही यांच्या भेटीची आस .मग तो पुंडलीकाला मुराळी पाठवतो ..

पांडुरंगऽ पीता ऽ    

रुकमीन माझी बया ऽ ऽ 

आखाडवारीला गऽ  

कुंडलीक ऽ आला ऽ नेया ऽ ऽ

तो तिची येण्याची सोय करतो .रोज घरी कष्टणार्‍या मालनीला दिंडीत आयतं खायला मिळेल असं पहातो .

पंढरीला जाते ऽ             

कशाचं ऽ पीठऽ कूऽटऽऽ

न्याहारी काल्याला गं ऽ      

देव खजिन्याचा ऊठं ऽ ऽ 

पण कुणी एक मालन अगदी अंथरुणाला खिळलीय .ती मुळीही हलू शकत नाहीय , पण त्याच्या भेटीची तळमळ काही कमी होत नाहीये ! तिला कोण नेणार ? मग ती त्यालाच हक्कानं साकडं घालते.

“ बाबारे, मला काही येववत नाही पण तुला पाहिल्याबिगर मी डोळे मिटायची नाही .मग तूच ये कसा !” आणि तो तिचा भावसखा तिच्याकरता गरुडावरुन येतो .तिच्या मनात चांदणं पसरतं .आणि विठूच्या अंगच्या कस्तुरीगंधानं या भाबड्या मालनीचं जिणं गंधाळून जातं ! 

माझ्या जीवाला जडभारी ऽ  

कूनाला घालू वझ्झ्ं ऽ ऽ

इट्टला देवा माझ्या ऽ            

तातडीनं ऽ येनं ऽ तूझं ऽ ऽ

जीवाला जडभारी ऽ           

उभी मीऽ खांबाआड ऽ ऽ 

इटूबा ऽ देवाजीऽलाऽ         

विनवीते अवघऽडऽ

जीवाला माझ्या जड ऽ     

न्हायी कूनाला माया येतऽ ऽ

सावळ्या पांडुरंगाऽ         

यावं गरुडासहीतऽऽ

आला गंऽ धावतऽ     

माझा पंढरीचा हरीऽ ऽ

चंद्रावाचून ऽ गऽ       

उजेड पडला माझ्या घरीऽ ऽ

कस्तूरीचा ऽ वासऽ    

माझ्या अंगाला ऽ कूठूला ऽ ऽ

इट्टल सावळा गऽ      

मला भेटूईनऽ गेला ऽ ऽ 

या मालनीचा हेवा वाटतो .तिच्या अंगाच्या तुळशी कस्तुरीच्या दरवळात मन गुरफटून रहातं .वाटतं पळभर तरी तिचा निर्मळ ,निर्हेतुक, निर्व्याज भाव आपल्या व्यवहारी मनात उजळावा .ते सख्यत्वाचं फूल आपल्याही मनात कधीतरी उमलावं ! 

© सुश्री विनिता तेलंग

सांगली. 

मो ९८९०९२८४११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चक्रीवादळे आणि भाषा – लेखक – श्री प्रदीप देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ चक्रीवादळे आणि भाषा – लेखक – श्री प्रदीप देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

गेली काही वर्षे आपल्याकडेही वादळांना नावे देण्याचा आणि त्यांच्या ‘प्रवासा’चे निरीक्षण करण्याचा प्रघात पडला आहे. 

सध्या ‘बिपरजॉय’ या नावाचे वादळ अरबी समुद्रात तयार होऊन पश्चिम किनाऱ्यापाशी कच्छच्या दिशेने कूच करीत आहे.

याच्या ‘प्रवासा’चे वार्तांकन टेलिव्हिजनवरील वृत्तांमध्ये लक्षणीय मात्रेत होत आहे.

त्यामुळे  ‘बिपरजॉय’ हा शब्द वारंवार कानी पडला.

वृत्तनिवेदकांसाठी हा शब्द नेहमीचा नसल्याने प्रत्येकाने / प्रत्येकीने आपापल्या पद्धतीने त्याचे उच्चारण केले – 

काहींनी त्याचा उच्चार ‘बीपर जॉय’ असा केला. त्यामुळेच की काय त्या नावाकडे लक्ष वेधले गेले.

चक्रीवादळाच्या नावात ‘जाॅय’ कसा काय? असा प्रश्नही पडला.

जरा लक्ष देऊन चक्रीवादळाचे वृत्त ऐकले, तेव्हा समजले की या नावाचे मूळ ‘बंगाली’ आहे. 

मग मात्र ‘ट्यूबलाईट’ पेटली आणि उलगडा झाला !  नाव समर्पक कसे तेही पटले !

तेच तुम्हांलाही सांगण्यासाठी हा प्रपंच.

या शब्दाचा प्रवास ‘संस्कृत –> बंगाली –> रोमन लिपी –> ‘बीपर जॉय असा झाला आहे.

या प्रवासात, मूळ शब्दातून जो अर्थ सहज समजू शकतो तो झाकला गेला, आणि ‘जॉय’ अवतरला ! 

मूळ संस्कृत शब्द आहे – विपर्यय !

बंगालीत ‘वि’चा ‘बि’ झाला.  

‘पाणिनि’ने म्हटलेच आहे – 

‘बवयोः अभेदः । 

(ब आणि व यांत भेद नाही. )

आणि शब्दाच्या शेवटी असलेल्या दोन ‘य’ पैकी पहिल्या ‘य’चा ‘ज’ आणि बंगाली धाटणीप्रमाणे ‘जॉ’ झाला.

अशा तऱ्हेने ‘विपर्यय’चा उच्चार ‘बीपर जॉय’ होऊन त्याचा अर्थविपर्यासही झाला !

‘विपर्यय’ शब्दाचे गीर्वाणलघुकोशात (रचयिते कै. ज.वि.ओक) जे अर्थ दिले आहेत, त्यांतील बरेच ‘चक्रीवादळास’ लागू पडणारे आहेत – जसे 

विरुद्ध, अडथळा, आपत्ती,प्रलयंकाळ…

हा विपर्यय शब्द किती प्राचीन आहे ? 

हा शब्द पतंजलिच्या ‘योगसूत्रां’तही येतो. 

विपर्ययोमिथ्याज्ञानम् अतद्रूपप्रतिष्ठितम् । (१-८)

म्हणजे हा अडीच हजार वर्षे तरी जुना आहे ! 

 

लेखक –  श्री प्रदीप देशपांडे

नाशिक

संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २८ (सोमसूक्त) : ऋचा १ ते ९ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २८ (सोमसूक्त) : ऋचा १ ते ९ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २८ (सोमसूक्त) – ऋचा १ ते ९

ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : देवता – १-४ इंद्र; ५-६ उलूखल; ७-८ उलूखल व मुसळ; ९ प्रजापति

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील अठ्ठाविसाव्या  सूक्तात शुनःशेप आजीगर्ती  या ऋषींनी विविध  देवतांना  आवाहन केलेले  असले तरी  हे मुख्यतः  सोमवल्लीला उद्देशून आहे. या सोमवल्लीपासूनच सोमरसाची निर्मिती केली जाते. हे सूक्त सोमसूक्त म्हणून ज्ञात आहे. आज मी आपल्यासाठी हे संपूर्ण सूक्त आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.

मराठी भावानुवाद ::

यत्र॒ ग्रावा॑ पृ॒थुबु॑ध्न ऊ॒र्ध्वः भव॑ति॒ सोत॑वे ।
उ॒लूख॑लसुताना॒मवेद्वि॑न्द्र जल्गुलः ॥ १ ॥

 उखळामध्ये सोमवल्लीवर खलूनिया शक्तीने

जड विशालश्या वरवंट्याने रगडूनी जोराने

अर्पिण्यास तव केले सिद्ध सोमरसा भक्तीने

त्या स्वीकारी देवेंद्रा मोदाने प्रसन्नतेने ||१||

यत्र॒ द्वावि॑व ज॒घना॑धिषव॒ण्या कृ॒ता ।
उ॒लूख॑लसुताना॒मवेद्वि॑न्द्र जल्गुलः ॥ २ ॥

जघनद्वयासम संनिध असती पाषाणाच्या तळी

सोमरसाला निर्मियले आम्ही त्यातुनी उखळी

उत्सुक होऊनिया शचिनाथा सोमरसा स्वीकारी

शिरावरी अमुच्या देवेंद्रा कृपाछत्र तू धरी ||२||

यत्र॒ नार्य॑पच्य॒वमु॑पच्य॒वं च॒ शिक्ष॑ते ।
उ॒लूख॑लसुताना॒मवेद्वि॑न्द्र जल्गुलः ॥ ३ ॥

 पुढे नि मागे हलवूनिया करा घुसळणे शिक्षा

नारीला मिळते या योगे कौशल्याची दीक्षा

उखळातुनिया प्राप्त होतसे पवित्र सोमरस

स्वीकारुनि त्या देवेंद्रा हे धन्य करी आम्हास ||३||

यत्र॒ मन्थां॑ विब॒ध्नते॑ र॒श्मीन्यमि॑त॒वा इ॑व ।
उ॒लूख॑लसुताना॒मवेद्वि॑न्द्र जल्गुलः ॥ ४ ॥

 कासऱ्यांनी बांधीयले रविला बंधन घालाया

सोमवल्लीला घुसळून उखळी सोमरसा काढाया

उखळातुनिया प्राप्त होतसे पवित्र सोमरस

स्वीकारुनी त्या देवेंद्रा हे धन्य करी आम्हास ||४||

यच्चि॒द्धि त्वं गृ॒हेगृ॑ह॒ उलू॑खलक यु॒ज्यसे॑ ।
इ॒ह द्यु॒मत्त॑मं वद॒ जय॑तामिव दुन्दु॒भिः ॥ ५ ॥

 सोमरसाच्या निर्मितीस्तव वापर तव उखळा

घरोघरी घुसळती सोमवल्ली तुझ्यात उखळा

करी गर्जना विजयदुंदुभीसम रे तू उखळा

सोमरसा तू देशी आम्हा गर्व तुझा उखळा ||५||

उ॒त स्म॑ ते वनस्पते॒ वातो॒ वि वा॒त्यग्र॒मित् ।
अथो॒ इंद्रा॑य॒ पात॑वे सु॒नु सोम॑मुलूखल ॥ ६ ॥

 मरूत शीतल मंद वाहतो येथे वनस्पते

देई आम्हाला विपूल उत्तमशा सोमरसाते

सोमपान होईल तयाने देवराज इंद्राचे

प्रसन्न होउनिया कल्याण करील तो अमुचे ||६||

आ॒य॒जी वा॑ज॒सात॑मा॒ ता ह्यु१च्चा वि॑जर्भृ॒तः ।
हरी॑ इ॒वान्धां॑सि॒ बप्स॑ता ॥ ७ ॥

 चर्वण करताना गवताचे अश्व करीती ध्वनी

रव करती ही उभय साधने सकलांच्या कानी

तया कारणे आम्हा होतो सामर्थ्याचा लाभ

यज्ञामध्ये त्यांचा आहे अतीव श्रेष्ठ आब ||७||

ता नो॑ अ॒द्य व॑नस्पती ऋ॒ष्वावृ॒ष्वेभिः॑ सो॒तृभिः॑ ।
इंद्रा॑य॒ मधु॑मत्सुतम् ॥ ८ ॥

काष्ठांच्या हे साधनद्वयी श्रेष्ठ तुम्ही हो किती

ऋत्विज कौशल्याने  करिती सोमाची निर्मिती

मधूर सोमरसाला अर्पू बलशाली  इंद्राला

प्रसन्न व्हावे त्याने आम्हा प्रसाद द्यायला ||८||

उच्छि॒ष्टं च॒म्वोर्भर॒ सोमं॑ प॒वित्र॒ आ सृ॑ज ।
नि धे॑हि॒ गोरधि॑ त्व॒चि ॥ ९ ॥

 भूमीवरती सांडियलेला भरा हो सोमरस

त्यासी भरुनीया ठेवावे सज्ज दोन चमस

पवित्र दर्भातुनिया घेई त्यासी गाळून

चर्मावरती वृषभाच्या देई त्या ठेवून ||९||

(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.) 

https://youtu.be/p79BQ7tsfg4

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 28

Rugved Mandal 1 Sukta 28

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “फक्त एवढेच करा…” ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “फक्त एवढेच करा…”  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  

तुम्ही एकही झाड लावू नका, झाडे आपोआप उगवतात…

तुम्ही फक्त तोडू नका !

 

तुम्ही कोणत्याही नदीला स्वच्छ करू नका, ती प्रवाही आहे, ती स्वतः स्वच्छच असते…

तुम्ही फक्त तिच्यात घाण टाकू नका !

 

तुम्ही शांतता प्रस्थापित करण्याच्या नादी लागू नका, सर्व शांतच आहे…

तुही फक्त द्वेष पसरवू नका !

 

तुम्ही प्राणी वाचवायचा प्रयत्न करण्याची गरज नाही…

तुम्ही फक्त त्यांना मारू नका, जंगले जाळू किंवा तोडू नका !

 

तुम्ही माणसांचे व्यवस्थापन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू नका…

तुम्ही फक्त स्वतःच व्यवस्थित रहा !

 

खूप सोप्या आहेत या गोष्टी, तुम्ही उगाचच त्या करायला घेता… 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ प्रतिमेच्या पलिकडले : तू छूपी है कहाँ… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ प्रतिमेच्या पलिकडले : तू छूपी है कहाँ… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

.. आजच्या विज्ञानाच्या चमत्काराने जग इतके जवळ आलयं.. टाचणी पॅरीसला आयफेल टाॅवर वरून खाली पडली तर त्याचा आवाज इथं लालबाग परळ च्या तेजुकाया मॅन्शन च्या अकरा नंबरच्या खोलीत असलेल्या टि. व्ही. त ऐकू येतो.. आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच हे असे कसे काय बुवा?.. अहो त्याचं काय आहे दिवसरात्र त्या अकरा नंबरच्या खोलीतला तो टि. व्ही चालूच असतो.. चौविस तास ढॅंण ढॅंण ढॅंण…तरूणाई करियर घडवायला आपल्या स्वप्नांची पूर्तता करायला जेष्ठांचा आर्शिवाद घेऊन घर सोडून गेलेली असते.. त्यांचीच छोट्या छोट्या प्रतिमा युवावस्थेत करिअर कोणतं नि कसं घडवावे याचा शोध घेण्यासाठी दिवसाचे चोविस तासापेक्षा जास्त वेळ घराबाहेरच असते, केअर टेकर जेष्ठांना लोणकढी थापा वर थापा मारून.. मग घरात जागं राहते त्या जेष्ठांची एकल तर कधी असलीच तर दुकल..कर्तव्याची इतिकर्तव्यता झालेली असते.. भविष्याकडे धुसर नजरेने पाहत भूतकाळातील कडू गोड आठवणींचा रिटेलिकास्ट मनाच्या पडद्यावर बघत बसणे हाच एकमेव उदयोग वर्तमानकाळात करत बसतात.. ना बोलायला कुणी घरी ,ना चालायला कुणी दारी.. अवतीभवतीची समवयस्क बऱ्यापैकी विकेट टाकून गेलेली .नाही तर गावाला पळालेली, एखादं दुसरे असलं तरी आजारालाच दत्तक घेऊन एक कॉट अडवून बसलेली.. मग अश्या परिस्थितीत हातपाय हलते नि तोंड व्यवस्थित चालते, थोडक्यात सर्व ठिकठाक, असणारे या जेष्ठांना घरात वाली कोण असणार.?.तरुणाईच्या पैश्याच्या पावसाने घराचे नंदनवन फुलते .. सगळ्या बाजारातल्या आधुनिक उपकरणांनी जागा जागा व्यापून गेलेली असते..घंटो का काम चुटकीमें . कामाचा डोंगर निपटणारे. पण तेच त्या तरुणाईच्या मनाच्या कोपऱ्यात एक इंचभर जागा त्यांना मिळू नये..साधी प्रेमाने केलेली विचारपूस किती मनाला आधार देऊन जाते… मनाला हवी असलेली प्रेमाची ऊब,नि आपुलकीची भुक मात्र हे नंदनवन भागवू शकत नाही..असंख्य चॅनेल्स ने खचाखच भरलेला तो टि. व्ही. आणि त्या सारखी उपकरणं, रंगीबेरंगी विविध शंख शिंपल्यासारखे ,समुद्ररूपी कार्यक्रमांच्या लाटावर लाटा आदळत असतात.. तो अखंड बडबडत नि दाखवत सुटतो.. पण कान बहिरे असल्याने ऐकून मात्र घेत नाही.. आणि जेष्ठांना तो जे जे दाखवेल ,ऐकवेल ते ते बघण्या शिवाय पर्याय नाही..त्या समोर बसून चार उलटे नि सहा सुलटे टाके घालून वुलनचा स्वेटर विणायला घेतला तर तो कधी पुरा होणार नसतो..कारण त्याच्या उबेचीच गरज नसतेच मुळी पण वेळ घालवायचा तो एक चाळा असतो त्यांचा..रिमोट हाती असून चालत नाही ना.. टि. व्ही. काही काळ बंद झाला तर.. अख्खी चाळ गोळा होईल ना !अरे अकरा नंबरचा आवाज बंद झाला!.. म्हणजे काही तरी गडबड झाली आहे..त्याने होणारी सतत दाराची उघडझाप आणि त्यांच्या प्रश्नांला उत्तरे देण्याची दमछाक.. इतकचं काय आपली म्हणणारी नातीगोती आपल्यालावरच रागवणार, का देताय आम्हाला उगीच मनस्ताप?. आहे कुठे सगळ्याला दयायला उत्तर आपल्याकडे!.. नाही नाही आता उत्तरचं नसतात त्यांच्या कडे.. असतो फक्त एकच प्रश्न सतत मनात घोळत.. अरे देवा! मला तू येथून कधी…. ? तू छूपी है कहाॅ म्हणत… 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संवाद # 122 ☆ लघुकथा – सिहरन ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

डॉ. ऋचा शर्मा

(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में  अवश्य मिली है  किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में  प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है  स्त्री विमर्श आधारित एक विचारणीय लघुकथा ‘सिहरन’। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद  # 122 ☆

☆ लघुकथा – सिहरन ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

‘आशा! तेरा कस्टमर आया है।‘

‘बिटिया ! तू यहीं बैठ, मैं अभी आई काम करके।‘

‘जल्दी आना। ‘

थोड़ी देर बाद फिर आवाज –‘आशा! नीचे आ जल्दी।‘

‘बिटिया! तू थोड़ी देर खेल ले, मैं बस अभी आई।‘

‘हूँ —।‘

‘बिटिया! तू खाना खा ले, तब तक मैं नीचे जाकर आती हूँ।‘

‘अच्छा ‘– उसने सिर हिला दिया।

दिन भर में आशा को संबोधित करती ऐसी ही आवाज ना जाने कितनी बार आती और आशा सात – आठ साल की बिटिया को बहलाकर नीचे चली जाती।

ऐसा ही एक पल –‘बिटिया! ध्यान से पढ़ाई करती रहना, मैं बस अभी आई काम करके।‘

 “अम्माँ ! अकेले कितना काम करोगी? थक जाओगी तुम, रुको ना, मैं भी चलती हूँ तेरे साथ। तुम कहती हो ना, कि मैं बड़ी हो गई हूँ? “

आशा लड़खड़ाकर सीढ़ी पर बैठ गई।

©डॉ. ऋचा शर्मा

प्रोफेसर एवं अध्यक्ष – हिंदी विभाग, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर. – 414001

संपर्क – 122/1 अ, सुखकर्ता कॉलोनी, (रेलवे ब्रिज के पास) कायनेटिक चौक, अहमदनगर (महा.) – 414005

e-mail – [email protected]  मोबाईल – 09370288414.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ व्यंग्य से सीखें और सिखाएँ # 157 ☆ मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं।  आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना “मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः…। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 157 ☆

☆ मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः

मन ही मानव के बंधन और मोक्ष का कारण है। ये पंक्तियाँ जब सत्संग में सुनी तो बरबस आगे की चर्चा को मन आतुर हो उठा, सही कहा गया है कि मौसम के अनुसार रंग रूप बदलने की क्षमता केवल गिरगिट में ही नहीं महत्वाकांक्षी व्यक्तियों में भी पायी जाती है। ये आवश्यकता अनुसार परिवर्तन करते जाते हैं। अपनी गोटी किसी भी तरह जीत की ओर ले जानी है। इस समय सावन का महीना है। बारिश गर्मी की तपन को दूर करती है साथ ही साथ सूखे हुए वृक्ष व झाड़ियों में प्राण भर देती है। जीवंत हरियाली इसी की देन है। ग्रीष्म और शीत के बीच सेतु का कार्य ये बूंदे बखूबी कर रहीं हैं। जून, जुलाई, अगस्त, सितंबर ये चार माह धरती की प्यास को बुझा कर पूरे वर्ष भर का पानी एकत्र कर लेते हैं। शायद यही कारण है कि चौमासे में सारे कार्य तो बंद हो जाते हैं पर तीज त्योहार बहुत मनाये जाते हैं। मन है कि मानता नहीं वो अपनी चाहत को पाने हेतु कभी भी जोड़- तोड़ करने से नहीं चूकता।

समय के साथ -साथ प्रकृति ने भी अपने स्वरूप को बदलते हुए बारिश को कहीं बहुत अधिक तो कहीं बहुत कम कर दिया है। और ये अब केवल तीन महीनों में सिमट कर रह गयी है। वर्षा का चक्र भी अपनी बूंदों को सुरक्षित रखने की कोशिश करने लगा है।

चौमासे का अस्तित्व संकट में दिखना कहीं न कहीं संकेत है कि अगर वर्षा का मान नहीं रखा तो जल्दी ही बूंदों की संख्या कम होगी जिससे जीवन की गति अनछुई नहीं रह सकती।

मेरा तेरा के चक्कर में व्यक्ति इस तरह उलझा हुआ है कि क्या- क्या न बटोर ले, ये समझ ही नहीं पा रहा और लगा हुआ है लालच की जद्दोजहद में।

क्या आपने कभी गौर किया कि जिस चीज पर आपकी आसक्ति सबसे ज्यादा होती है वही चली जाती है, बात साफ है कि लगाव ही दुःख का कारण होता है इसलिए ईश्वर अपने भक्तों को वो नहीं देना चाहते जो उनके मोक्ष में बाधक बनें।

अतः हर स्थितियों में समभाव रखते हुए प्रसन्नता पूर्वक जिएँ और जीने दें।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – अभिमन्यु ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – अभिमन्यु ??

मेरे इर्द-गिर्द

कुटिलता का चक्रव्यूह

आजीवन खड़ा रहा,

सच और हौसले

की तलवार लिए

मैं द्वार बेधता रहा,

कितने द्वार बाकी

कितने खोल चुका

क्या पता….,

जीतूँगा या

खेत रहूँगा

क्या पता….,

पर इतना

निश्चित है;

जब तक

मेरा श्वास रहेगा,

अभिमन्यु ;

मेरे भीतर वास करेगा..!

© संजय भारद्वाज 

अपराह्न 3:23 बजे, 13.9.2018

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ महादेव साधना- यह साधना मंगलवार दि. 4 जुलाई आरम्भ होकर रक्षाबंधन तदनुसार बुधवार 30 अगस्त तक चलेगी 🕉️

💥 इस साधना में इस बार इस मंत्र का जप करना है – 🕉️ ॐ नमः शिवाय 🕉️ साथ ही गोस्वामी तुलसीदास रचित रुद्राष्टकम् का पाठ  🕉️💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares