मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ॥मनातला पाऊस॥ … श्री मयूरेश डंके ☆ प्रस्तुती – सौ.प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ ॥मनातला पाऊस॥ … श्री मयूरेश डंके ☆ प्रस्तुती – सौ.प्रभा हर्षे

काल रात्री १ वाजेपर्यंत हवेत गारवा होता, आभाळ गच्च भरलेलं, अगदी कुंद वातावरण होतं. पण, दीड वाजता जो पाऊस सुरू झाला, त्यानं पार दैनाच करून टाकली. रात्री दीड वाजल्यापासून रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर, दुकानाच्या पायऱ्यांवर, थोडक्यात म्हणजे जिथं जागा मिळेल तिथं, भर पावसात कुडकुडत बसून राहिलेले वारकरी मी पाहतोय. त्यांना झोपायलासुद्धा जागा उरली नाही. दिवसभर पायी चालून थकून गेलेली ती माणसं तशीच बसून राहिली होती. 

अंथरूण म्हणून एखादं प्लॅस्टिकचं इरलं, उशाला एखादी पिशवी किंवा बोचकं आणि पांघरायला साधी शाल.. त्या प्लॅस्टिकच्या कागदावर संपूर्ण शरीर कुठलं मावतंय? पण, जागा मिळेल तिथं, कसलीही तक्रार न करता माणसांनी पथाऱ्या टाकलेल्या.. डोकं आणि पाय एकाचवेळी झाकलेच जाऊ शकत नाहीत अशी ती शाल.. त्यामुळे, कित्येकांचे पायांचे तळवे आणि त्यांना पडलेल्या भेगा दिसत होत्या.

पहाटे साडेतीनच्या सुमारास भर पावसातच त्यांची आवरा-आवरीची लगबग सुरू झाली. ज्यांची साठी-पासष्ठी केव्हाच उलटून गेली आहे, अशी माणसं अशा वातावरणात रात्री साडेतीन वाजता रस्त्याच्या कडेला असलेल्या सार्वजनिक नळावर आंघोळ करतात, आणि तशीच थंडीनं गारठत पहाटे दर्शनाच्या रांगेत जाऊन उभी राहतात. त्यांच्या आर्थिक परिस्थितीविषयी आपण न बोललेलंच बरं. कारण, मी पाहिलेल्या अशा व्यक्तींपैकी काही जण पंचवीस-पंचवीस एकर शेतीचे मालक होते. त्यांच्या अंगावरची तुळशीची माळ म्हणजे सोन्याइतकीच मौल्यवान. त्यामुळे, ‘जे आहे ते भगवंताचंच आहे’ अशाच धारणेनं ही माणसं जगतात. (आपण स्वत:ला पांढरपेशे म्हणवून घेण्यातच धन्यता मानतो. मग त्या पेशाचे सगळे गुणावगुण चिकटतातच आपल्याला) पण, वारकरी होणं सोपं नाही, हे त्यांच्याकडं पाहिलं की, लगेच समजतं. 

वारी करणं ही गोष्टच निराळी आहे. अगदी वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं तर, वारी हे २५ दिवसांचं, ६०० तासांचं काऊन्सेलिंग सेशनच आहे. आणि, मानसशास्त्राचा पुस्तकी अभ्यास अजिबात नसलेले अनेकजण केवळ स्वसंवादातून, स्वत:करिता उत्तम वेळ देऊन, स्वत:चे व इतरांचे प्रश्न सोडवतात, हा अनेक अभ्यासकांचा अनुभव आहे.

कोणती गोष्ट मनाला लावून घ्यावी आणि कोणती गोष्ट फार विचार न करता सोडून द्यावी, हे या माणसांकडून खरोखर शिकण्यासारखं आहे. त्यांना महागड्या वस्तू, ब्रॅंडेड कपडे, प्राॅपर्टी, बॅंक बॅलन्स, खेळता पैसा, दागदागिने, परदेशी सहली यांतल्या एकाही गोष्टीत रस नसतो. दरवर्षी सगळा संसार महिन्याभरासाठी अन्य कुटुंबियांवर सोपवून माणसं निर्धास्तपणे वारीला येतात, म्हणजे त्यांची कुटुंबियांविषयीची मतं काय असतील याचा आपण विचार करायला हवा. “कुणी दिलाच दगा, तर माझा पांडुरंग बघून घेईल” असं अगदी बिनधास्त म्हणणं आपल्याला इतकं सहज जमेल का? 

काल रात्री एका काकांशी बोलत होतो. घराचा विषय निघाला. 

“आता पुतण्या म्हणाला, काका मी हीच जमीन कसणार. मला द्या. माझाही हक्क आहेच जमिनीवर. माझा वाटा मला द्या.” 

“मग?”

“माझा भाऊ होता तिथंच. पण तो काहीच बोलला नाही.”

“मग तुम्ही काय केलंत?”

“आता पुतण्याला नाही कसं म्हणायचं? अंगाखांद्यावर खेळवलेलं पोर. त्याचं मन कशाला मोडायचं? दिली जमीन.”

“मग आता?”

“उरलेली जमीन कमी कसाची आहे. पण, माझा पांडुरंग बघून घेईल सगळं. अहो, जमिनीपायी घर मोडलं तर हातात काय राहणार? त्यापेक्षा हे बरं.”

त्यांच्या घरात जे घडलं, तेच जर आपल्या घरात घडलं असतं तर मालमत्तेच्या वाटण्यांवरून किती रामायणं-महाभारतं झाली असती, असा विचार कदाचित माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असावा. पण, त्यांच्या चेहऱ्यावर दु:ख दिसत नव्हतं. 

“एखाद्या गोष्टीत गुंतलेला जीव अलगद काढून घेता आला पाहिजे” ते म्हणाले. 

मला काहीच सुचेना. मी अक्षरश: क्लिन बोल्ड झालो होतो. 

ते म्हणाले, “एखाद्या गोष्टीवरचा हक्क सहजपणे सोडून देता आला पाहिजे. आपल्याला तेच तर जमत नाही. म्हणूनच, प्रश्न आहे. तुमच्या पिढीला फार पुढं जायचंय, मोठं व्हायचंय, म्हणून तुम्ही दिवसरात्र पैसे कमावता. पण, बिल्डींगच्या १५ व्या मजल्यावरच्या घरात राहणाऱ्या माणसाला दारात आलेल्याला पाणी सुद्धा विचारावंसं वाटत नसेल तर, त्या पैशाचा काय उपयोग?”

“मग काय, पैसे कमवू नयेत का?”

“माझं तसं म्हणणं नाही. पण जीव माणसातच गुंतवला तर बरं असतं. पैशात गुंतवला तर माणसाला त्याच्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही.”

“पण माणसं फसवणार नाहीत कशावरून?” मी. 

“पण, ती फसवतीलच हे कशावरून?”

मी पुन्हा सपशेल आडवा. 

“अरे, तुमच्या वयाच्या पोरांचं इथंच चुकतं. तुम्ही भावाला भाऊ मानत नाही, बहिणीला बहीण मानत नाही, आईवडीलांच्या मनाचा विचार करत नाही. तुम्ही कुणाचाच विचार केला नाहीत तर उद्या तुम्हाला तरी कोण विचारील? तुम्ही सगळ्या गोष्टीत फायदा-नुकसान बघत बसता. म्हणून तुम्हाला माणूस बघितला की आधी त्याचा संशयच येतो. मग कशाला राहतंय तुमचं मन स्वच्छ?”

शाळेतच न गेलेल्या त्या माणसाकडे इतकी वैचारिक सुस्पष्टता असेल, असं मला वाटलंच नव्हतं. 

“राजगिऱ्याचा लाडू खाणार का?” त्यांनी विचारलं. 

मी विचारात पडलो. रात्रीचे साडेतीन वाजून गेले होते, पोटात भूक तर उसळ्या मारत होती. पण एकदम हो कसं म्हणायचं, म्हणून मी नको म्हटलं. 

“हे बघा देवा. पुन्हा आहेच तुमच्या मनात संशय.” ते म्हणाले. “तुम्हाला वाटणारच, हा कोण कुठला माणूस आहे, हे ठाऊक नसताना याच्याकडून असं काही कसं काय घ्यायचं? आणि तेही रस्त्यावर बसून?” 

“तसं नाही हो.” मी म्हणालो खरा. पण खरोखरच माझ्या मनात तीच शंका आली होती. 

“यामुळेच माणसं कायम अस्वस्थ असतात. ती त्यांच्या मनातलं खरं काय ते सांगतच नाहीत. सगळा लपवालपवीचा कारभार..!”

आता यावर काय बोलणार? लाडू घेतला. लाडू खाऊन त्यांच्याचकडच्या बाटलीतलं पाणी प्यायलो. 

“चला माऊली, निघू का आता? पाऊस कमी झालाय.” मी म्हटलं. 

“थांबा देवा.” काका म्हणाले. पिशवी उघडली, आतून एक तुळशीची माळ काढली, माझ्या गळ्यात घातली. “देवा, पांडुरंगाला सोडू नका, तो तुम्हाला सोडणार नाही. पण त्याला तुमच्या इच्छा पूर्ण करण्याच्या कामाला लावू नका. माऊलींनी सुद्धा तसं कधी केलेलं नाही, स्वत:करता काही मागितलं नाही, हे विसरू नका. मोठं होण्याच्या इतकंही मागं लागू नका की, आपल्या माणसानं मारलेली हाक तुम्हाला ऐकू येणार नाही. तुम्ही माझ्या नातवाच्या वयाचे म्हणून बोललो, राग मानू नका..”

… त्या काकांना नमस्कार करून निघालो. बाहेरचा पाऊस थांबलाय, पण मनातला मात्र सुरू झालाय.. आता तो थांबणं कठीण आहे !

— समाप्त — 

लेखक : श्री मयुरेश डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे

प्रस्तुती : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “इच्छामरण…” – भाग-१ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “इच्छामरण…” – भाग-१ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

अतिशय उद्विग्न मनानेच मी खोलीतून बाहेर पडले. नेहेमीच लक्ष वेधून घेणा-या बाहेरील बागेकडे आज मात्र माझे अजिबात लक्ष गेले नाही. माझे मनच मुळी था-यावर नव्हते. जन्म-मृत्यूच्या सीमारेषेवर, तळ्यात की मळ्यात हे न कळण्याच्या टप्प्यावर येऊन थबकलेली माझी आई आत खोलीत निपचित पडली होती. एरवी खुट्ट झाले तरी जागी होणारी आई, आज व्हेंटिलेटरच्या धकधक आवाजातही अगदी शांत झोपली होती. आणि हे पाहून माझ्या मनाला एक अनामिक हुरहूर लागली होती. चालू असलेला कृत्रिम श्वासोच्छवास सोडला तर तिची इतर गात्रे अगदी म्लान, जीवच उरला नसल्यासारखी होऊन गेली होती. आणि ते पाहून आम्ही सर्वजण हरवल्यासारखे, हतबल होऊन, एकमेकांकडे पहात बसण्याखेरीज काहीच करू शकत नव्हतो. अगदी काही क्षणांसाठी व्हेंटिलेटर काढला तरी श्वासासाठी होणारी आईची असह्य तडफड आम्हाला अत्यंत बेचैन करत होती. आणि कालपासून दोन-तीन वेळा हा प्रयोग झाल्यावर मग डॉक्टरांनीच आमच्यासमोर तो मन हेलावून टाकणारा विचार मांडला होता. व्हेंटिलेटर काढून टाकून,आईचा शेवटचा नैसर्गिक श्वास कोणता असेल ते पहात बसण्याचा….  तिच्या मरणाची वाट पहात बसण्यासारखेच होते हे.

याच विचाराने उद्विग्न होऊन मी खोलीबाहेर आले होते. जरा वेळाने नकळतच या उद्विग्नतेची जागा विचारांनी घेतली. आईची दिवसेंदिवस खालावणारी प्रकृती, त्यावर अगदी प्रामाणिकपणे केले जाणारे पण अजिबात उपयोगी पडत नसलेले अद्ययावत, दीर्घ उपचार, एकामागोमाग एक शिथिल होत गेलेले जवळजवळ सगळेच अवयव, आणि आता हा शेवटचा उपचार – कृत्रिम श्वासोच्छवास. हा सगळा प्रवास अशा शेवटच्या पायरीवर येऊन एखाद्या कोड्यासारखा थांबला होता. ते कोडे सोडविणा-या एका चुटकीचीच जणू वाट पहात, आणि ही चुटकी वाजवण्याचे अत्यंत क्लेशदायी, मनात अपराधीपणाची भावना कायमसाठी रुजवू शकणारे काम डॉक्टरांनी अगदी निर्विकारपणे आमच्यावर सोपवले होते. काय निर्णय घेणार होतो आम्ही? आपल्या जन्मदात्या आईचे आयुष्य जाणीवपूर्वक संपवून टाकण्याचा असा क्रूर निर्णय घेऊ शकणार होतो का आम्ही? काहीच सुचत नव्हते.

विचार करता करता नाण्याची दुसरी बाजू लख्ख दिसायला लागली. इतर सर्व अवयव निकामी झाले तरी श्वास चालू असेपर्यंत आईचे अंतर्मन नक्कीच जागे असणार. मग अतिशय कष्टाने, स्वावलंबनाने आणि उमेदीने घडवलेले, सजवलेले आपले मनस्वी आयुष्य, असे विकलांगी, परावलंबी, जाणीव-नेणिवेवर हिंदकाळतांना पाहून तिच्या स्वाभिमानी मनाला किती अतोनात यातना होत असतील, या विचाराने मी एकदम अस्वस्थ झाले आणि जराशी सावरून बसले. तिच्या शारिरीक यातना अगदी तज्ञ डॉक्टरही दूर करू शकत नाहीत हे जरी खरे असले, तरी तिच्या मनाला होणा-या असह्य यातना तर आम्हीच थांबवू शकलो असतो ना… व्हेंटिलेटर काढून टाकून? हा विचार मनात आला आणि मी केवढ्यांदा तरी दचकले. 

…. पण मग वीस दिवसांपूर्वी, जेव्हा ती थोडे बोलू शकत होती, तेव्हाचे तिचे काकुळतीचे बोलणे आठवले. अगदी सहन करण्यापलिकडच्या त्या वेदनांमधून आम्ही तिला सोडवावे, असे ती अगदी आपणहून, मनापासून सारखं सांगत होती. ‘ आजपर्यंत तिने कधीच कोणाकडे काही मागितलेले नाही. तर आता तिचे हे पहिले आणि शेवटचेच मागणे आम्ही मान्य करावे. गांगरून न जाता नीट चौफेर विचार करावा व नाही म्हणू नये. दुखण्याच्या मरणयातनांपेक्षा प्रत्यक्ष मरणंच सुसह्य आहे तेव्हा आता आम्ही तिला जाणिवपूर्वक मरू द्यावं.’… असे आमच्यापैकी प्रत्येकाला ती सांगत होती. तेव्हा ऐकायलाही नकोशा वाटणा-या या बोलण्यावर, आता मात्र विचार करावा असे वाटू लागले. आज तिच्या स्पर्शातूनही तिची ही मरणेच्छा माझ्या मनाला स्पर्शून जात होती. माझ्याही नकळत मी मनाशी काही निश्चय केला आणि मन घट्ट करून सर्वांसमोर अशा इच्छामरणाचा विषय काढण्याचे ठरविले.

‘आईला या यातनांमधून सोडव देवा ’ या प्रार्थनेचा ‘ तिला आता मरण दे ’ असा थेट अर्थ लावायला साहजिकच सगळे घाबरत होते, पण हळूहळू सगळेच बोलते झाले. इच्छामरण काही अटींवर मान्य करावे, इथपासून ते इच्छामरणास अजिबात मान्यता नको, या टोकापर्यंत मतं मांडता मांडता, आपण आपल्या आईबद्दल बोलतो आहोत हा विचारही जरा वेळ नकळतच बाजूला झाला.

एका भावाचे असे म्हणणे होते की …  ‘‘इच्छामरण’ ही संकल्पना मरणासन्न, जराजर्जर माणसाच्या संदर्भात खरोखरच विचार करण्यासारखी आहे. ज्यांची अवस्था ‘ मरण येईना म्हणून जिते हे, जगण्याला ना अर्थ दुजा ’ अशी आहे, त्यांना त्यांच्या मरणप्राय यातनांसह जबरदस्तीने जगवत ठेवणे हे खरे तर विचार करण्याजोगे पाप आहे. वाट्टेल तितके प्रयत्न करूनही हा माणूस त्याच्या दुखण्यातून पूर्ववत् बरा होऊ शकत नाही, इतकेच नव्हे तर कमीतकमी स्वावलंबनही यापुढे शक्य नाही, याची डॉक्टर वारंवार खात्रीपूर्वक सूचना देत असतील आणि ती व्यक्तीही स्वत:ला या यातनांतून सोडवावे अशी अगदी मनापासून, कळकळीची विनंती करत असेल, तर अशावेळी आणखी काही तज्ञ डॉक्टरांचे त्याच्या तब्येतीविषयी, बरे होण्याच्या शक्यतेविषयी मत घेऊन, त्यानुसार त्या आजारी व्यक्तीच्या विनंतीला त्याच्या नातलगांनी, स्वत:च्या मनाविरुध्द पण त्रयस्थ प्रामाणिकपणे विचार करायला खरोखरच काही हरकत नाही. काही धर्मांमध्ये वयोवृद्ध पण अगदी धडधाकट माणसेसुध्दा, संथारा व्रतासारख्या व्रताद्वारा अगदी जाणीवपूर्वक, विचारपूर्वक, संयमाने व शांतपणे, अधिकृतपणे आपले आयुष्य धर्मसंमत मार्गाने संपवू शकतात.’ 

‘ स्वातंत्रवीर सावरकरांसारख्या अतिशय निधड्या छातीच्या ध्येयवेड्या माणसानेही … ‘ प्रायोपवेशन ‘ करून स्वतःहून आपले आयुष्य संपवले होते– नाही  का ? आत्ता खरं तर मला संत ज्ञानेश्वर आणि इतर काही संतही आठवताहेत, ज्यांनी आपले जीवनकार्य संपले हे जाणून जिवंत समाधी घेण्याचा मार्ग स्वीकारला होता, आणि अतिशय शांत आणि स्थिर मनाने ते हा इहलोक सोडून गेले होते. अर्थात हे सगळे संत आपल्यापेक्षा, आपल्याला विचारही करता येणार नाही आणि अजिबात गाठताच येणार नाही अशा फारच उच्च आध्यात्मिक पातळीवर पोहोचलेले होते हे मान्यच करायला हवे. ‘देहाबद्दल वाटणाऱ्या अहंकाराशी लढून, त्याचा पूर्ण नि:पात करून, कार्यकारण उपाधीवर विजय मिळवून जो आत्मरूप झाला आहे, त्याला मिळणारी एक फार महान पदवी म्हणजे संतत्व‘ असे म्हटले जाते.  असामान्य आणि ईश्वरासदृश असणाऱ्या अशा दुर्मिळ आणि अपवादात्मक देवमाणसांशी आपल्यासारख्या सामान्य माणसांनी मनातल्या मनातही तुलना करणे हे खरं तर पापच आहे. तेव्हा या इच्छामरणाच्या संदर्भात त्यांचा विचारही आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या मनात येणे अतिशय चुकीचे आहे. आत्ता इथे, आपल्या या अशा समस्येसंदर्भात त्यांची आठवण यावी हेही खरोखरच पाप आहे. फार मोठी चूक करत होतो मी–आणि त्यासाठी त्या सगळ्या थोर पुरुषश्रेष्ठांची अगदी मनापासून क्षमा मागतो मी ताई …. ‘ 

क्रमशः भाग पहिला

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ऋग्वेदाच्या काठाकाठाने चालताना…” – लेखिका – सुश्री केतकी कानिटकर ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “ऋग्वेदाच्या काठाकाठाने चालताना…” – लेखिका – सुश्री केतकी कानिटकर ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

“वैदिक जीवन”   

गायत्री मंत्र हा ऋग्वेदाचा साक्षात आत्मा अथवा कणा असल्याने तो आत्मसाक्षात्कार, आत्मशोध, स्व अनुभूती यांना परमेश्वराहूनही अधिक प्राधान्य देतो. डोळे उघडून प्रश्न विचारण्यास बाध्य करतो. यमनियमात बांधत नाही तर विचार करण्यास मुक्त करतो. हा निव्वळ धर्म नाही तर एक संयुक्तिक जीवनपद्धती व योग्यायोग्यतेची अचूक कारणमीमांसा आहे. स्वतःला जाणण्याकडे त्याचा कल अधिक आहे. सखोल अशा आत्मचिंतनावर ऋग्वेदाचा अधिक भर आहे. बाह्य जगताचा अभ्यास हा दुय्यम आहे. वैदिक शास्त्रांमध्ये; मग ते गणित असो वा विज्ञान, आतून बाहेर असा तत्त्वज्ञानाचाही प्रवास झाला आहे व अभ्यासाला उपासनेचे महत्त्व आले आहे. या अर्थाने ऋग्वेद हा तेजस्वी कर्मयोगी आहे. “आत्मा हा सचेतन जीवित तत्व आहे. तो शरीर धारण करतो व कालांतराने शरीर सोडून निघून जातो”, ही संकल्पना मूलतः ऋग्वेदाची आहे. ‘दशयंत्र’ या सूक्तात ‘यंत्र’ हा शब्दप्रयोग ‘इंद्रिय’ या अर्थाने केला आहे. पाच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये अशी दहा इंद्रिये म्हणजे ‘दशयंत्र’ होय. 

ऋग्वेद हा जगातील सर्वप्राचीन ग्रंथराज इतक्या विस्तृत काळात लिहिला गेला की सुक्तांची भाषा, संस्कृतिक व धार्मिक परिस्थिती, वैदिक जीवन ते आताच्या हिंदू धर्मापर्यंतचा प्रवास यातून मानवी समाजाच्या उत्क्रांतीच्या पायऱ्या अधिकाधिक सुस्पष्ट होत जातात. अत्यंत कृतज्ञतेने प्रेरित होऊन झालेला सश्रद्ध प्रवास प्रश्न व शंकांवर येऊन थांबतो; ते अस्य वामीय तत्त्वज्ञान सूक्त, ऋग्वेदाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून आत्मीयतेने स्वीकारलं जातं. नेम भार्गव ऋषी  सुरवातीला सर्वेसर्वा असणाऱ्या इंद्राच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह करतात. ते म्हणतात, “असाक्षात्कारी अशा इंद्राची आम्ही का म्हणून स्तुती करावी? कोण हा इन्द्र, कशावरून तो सत्य आहे?” यावर सखोलपणे विचार होऊ लागला आणि आपण बघतो की वेदकालातच इंद्र ही देवता संपुष्टात आली. “हे असंच का आहे व हे सारं कुणी निर्माण केलं?”  यासारख्या सर्व प्रश्नांची उत्तरं एकटी इंद्र ही देवता होऊ शकत नाही, हे लक्षात आलं. मग “इंद्राला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ तरी का करावा, यज्ञ करण्यामध्ये काही अर्थ आहे का नाही? ” अशीही शंका उत्पन्न होऊ लागली. ‘कण्व’ हे ऋग्वेदात गुप्त अग्नीचे प्रतीक मानले जातात. वास्तविक यज्ञयाग हा ऋग्वेदाचा गाभा..! ईशपूजा, एकत्रीकरण व दान ही समाजाभिमुख जगण्याची कला म्हणजे यज्ञ. त्या काळाची धार्मिक व सामाजिक संस्था म्हणजेच यज्ञसंस्था. यज्ञसंस्थेचा परिघ असा विस्तारला असल्याकारणाने ती काळानुसार टिकली. कालांतराने विचारात किती बदल होतात आणि वैदिक संस्कृती किती वैचारिक स्वातंत्र्य व समृद्धी प्रदान करू शकते याचे हे कळस उदाहरण आहे. 

जेव्हा सगुणत्व सुटत नाही, तेव्हा “सृष्टीची उत्पत्ती परमेश्वराने केली की इतर कारणांमुळे ती झाली असावी, ” असा संशय व्यक्त झाला आहे. “अनेकत्व सर्व मिथ्या आहे विविध देवता या निव्वळ कल्पना असून एकाच उत्पादकतत्वाच्या विकृती आहेत.” ही काहीशी  निरिश्वरवादाकडे व नास्तिकवादाकडे झुकणारी वृत्ती अस्य वामीय तत्त्वज्ञान सूक्तात प्रकट केली आहे. (कदाचित म्हणूनच जैन धर्म हा नास्तिकवादावर आधारित असून सुद्धा त्यात उच्च कोटीची भूतदया व विश्वाप्रती संवेदनशीलता आपल्याला दिसते.) त्यातून निर्माण झालेली नासदीय सूक्तासारखी विचारांना चालना देणारी सुंदर अशी अभिव्यक्ती. आपल्यालाही उमगत जातं की, “मी कोण? माझ्या असण्याचा उद्देश काय?” इथपासून ते “हे विश्व कुणी निर्माण केलं?” मग ईश्वर म्हणा, वा निसर्गातील एकतत्व; या संकल्पनेला एका निर्गुण निराकार अशा तत्त्वात आकारणं, हा सारा आपल्या व्यक्तिगत व सामाजिक विकासाचा टप्पा बनत जातो. आपली आकलनकक्षा विस्तारत जाते, तसतसा आपल्याबरोबर आपला धर्म देखील विस्तारत जातो. प्रत्येक आत्म्याचे स्वतःचे असे संचित असते त्याप्रमाणे प्रत्येक आत्म्याचा ध्येय व मुक्तीपर्यंत पोहोचण्याचा मार्गही निराळा असतोच. 

(एकप्रकारे हा व्यक्तित्ववादाचा पायंडा आहे.) साहजिकपणे कुणाबद्दल कुठलेही सरधोपट विधान करणे हे मूलतः चुकीचे आहे, याचा विचार या प्राचीन ग्रंथांतही केला आहे. प्रत्येकाचा स्वधर्म हा त्याच्या स्थान व परिस्थितीप्रमाणे बदलत जातो. तो कुठल्याही चौकटीत बांधता येत नाही, हे आपल्याला टप्प्याटप्प्याने उमगत जातं. सुरुवातीला आपण धर्मावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत गेलो असलो तरी नंतर मात्र तोच आपल्याला चिंतनास प्रवृत्त करत जातो. आपल्यातील स्वतंत्र गुणवैशिष्ट्यांचा तो आदर करतो. आणि कदाचित म्हणूनच भारतीय संस्कृतीचे मूलाधार असलेले ग्रंथ, वेद हे अपौरुषेय मानले आहेत. ईश्वर हा वेदांचा प्रवक्ता आहे, कर्ता नव्हे. वेदांचे प्रामाण्य हे सामाजिक संमतीने स्थिरावत गेले आहे. वेद हे एका सिद्ध जीवन पद्धतीचे प्रतिबिंब बनत गेले व लोकमान्य परंपरा म्हणून स्थिरावले. वैदिक धर्म अद्वैतापासून ते नास्तिकवादापर्यंत प्रत्येकाच्या स्वभावधर्माप्रमाणे आपल्यात सहजतेने  सामावून घेतो. आपल्या आकलनाच्या कित्येक पुढे जाऊन तो आपल्याला असीम ज्ञान, उद्देश्य व सकारात्मकता प्रदान करत जातो. आपल्या चार पावलं पुढे राहून आपल्याला मार्गदर्शन करत आपल्याबरोबर उत्तरोत्तर प्रवास व प्रगती करत जाणं हे हिंदू धर्माचं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे आणि म्हणूनच तो कालासमवेत टिकणारा आहे. Change is the only permanence.. हे आपल्या कित्येक आधी ह्याला ठाऊक आहे. आनंदाची, सुख समाधानाची व्याख्या व्यापक करणारा आहे. मला नाही वाटत की जगातील इतर कुठलाही धर्म स्वतःवर, धर्माचा जो आधारभूत त्या ईश्वरावर, यम नियम, त्यातल्या परंपरांवर, त्यावरील विश्वासावर, वर्षानुवर्षे निरीक्षणाने, लोकमताने सिद्ध झालेल्या विश्लेषणांवर, त्यावरच्या न दिसणाऱ्या श्रद्धांवर इतके प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य देत असेल. याचा अर्थ सरळ आहे. प्रत्येकाला मुळातून विचार करण्यास बाध्य करावे असे या धर्माला वाटत असेल. मानवाने ईश्वराला शोधून काढून त्याच्यावर सर्वतोपरी आपला भार टाकण्यापेक्षा त्याने आत्मशोध घेणे महत्त्वाचे वाटत असेल. स्वतःत रमणाऱ्या, आत्मचिंतन करणाऱ्या माणसाला इतर काही शिकवण्याची क्वचितच गरज भासत असेल. वेद हे अपौरुषेय आहेत, हे ही त्या मागचं एक कारण असू शकतं. याही अर्थाने ईश्वर हा मानवी मनाचा प्रवक्ता आहे, कर्ता नव्हेच. 

 निरनिराळ्या देवता – मान्यता – श्रद्धा या सामाजिक एकीकरणाच्या दृष्टीने अद्वैतवादाच्या एकखांबी तंबूखाली येऊन विसावतात. त्याची सश्रद्ध अनुभूती आपल्याला अक्षर पुरुषसूक्तात येते. 

 गणपती ही देवता ऋग्वेदकालात होती की नव्हती याबद्दलही बरेच वाद आहेत. ऋग्वेदातील आठव्या मंडळातील ८१ व्या सूक्तात गणपतीच्या बाह्यरुपाचे  वर्णन आहे. सुरुवातीला इंद्र हे सर्वनाम (श्रेष्ठ) या अर्थाने आढळते. यात म्हटले आहे की रिद्धी – सिद्धी आणि बुद्धी यांचा अधिपती तो गणपती. इंद्राचा डावा – उजवा हात ही गणपतीची डावी किंवा उजवी सोंड असा निर्देश आहे. 

 सुभाषितं ही आपल्याला ऋग्वेदाची अमूल्य अशी देण आहे. प्रथम ओळीत एखादे मूल्य अथवा सत्य मांडणे व दुसऱ्या ओळीत त्याचे उदाहरण देणे,अशी बहुतेक सुभाषितांची रचना असते. सुभाषितं ही व्यवहारी शहाणपणा व ज्ञानाचा आदर्श परिपाठ आहेत. संस्कृत भाषेतील सुभाषितं ही प्राचीन साहित्याचा मनोरंजक व मार्गदर्शक विभाग आहे

 आत्मानुभव सूक्त हे देखील असीम शांतता मिळवून देणारे आहे. स्वतःला जाणणे म्हणजेच आत्मानुभव. प्रत्येक सजीव व निर्जीवात एक जागृत असे आत्मतत्त्व असते. त्या अमर आत्मतत्त्वाचा अनुभव घेणे म्हणजेच आत्मानुभव. सृष्टीची उत्पत्ती, परमेश्वराचे स्वरूप आणि सामर्थ्य, सृष्टीचे मूल, आत्मा, चैतन्य आणि अचेतन सृष्टीतील गूढ तत्वांचे विवेचन या सूक्तात आढळते. 

 महामृत्युंजय म्हणजे त्र्यंबकेश्वर. तीन दिवस उपवास करून दुधात भिजवलेल्या भाताच्या शताहुती शिवास वाहतात. महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली असून याला रुद्रमंत्र व मृत संजीवनी मंत्र असेही म्हणतात. त्र्यंबकम मंत्र हा शिवाचे त्रिनेत्र दर्शवतो. महामृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणे. त्यामुळे दीर्घायुष्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. 

 दानव, असुर, पिशाच,यक्ष, राक्षस या सर्वांचा मिळून एक राक्षससंघ वैदिक काळात मानला जात होता. वैदिक साहित्यात ‘रक्षस्’ शब्द आलेला असून त्यापासून राक्षस हा शब्द आला. राक्षस ही मायावी, अद्भुत, कपटी, मांसभक्षक, जादूटोणा करणारी, ज्ञानी लोकांचा व यज्ञयागांचा द्वेष करणारी जमात म्हणून ओळखली जाते. राक्षस हे दिवसा निष्क्रिय तर रात्री क्रियाशील असतात. पुलस्त्यापासून राक्षस उत्पन्न झाले. ब्रह्मदेवाने भूतलावरील जलाच्या रक्षणार्थ राक्षसांना निर्मिले अशा कथाही आहेत. कश्यपानंतर ब्रह्मधनेपासून ब्रह्मराक्षस वंश प्रवर्तित झाला असे म्हटले आहे. पुढे आर्य व राक्षस या दोन संस्कृतींचा समन्वय होत गेल्याचे निदर्शनास येते. आर्य व राक्षस यांच्या चालीरीती व सामाजिक व्यवहार यात साम्य तसेच भिन्नताही होती. राक्षसांचा वंश मातेवरून चालत असे. पळवून आणलेल्या स्त्रियांशी विवाह करण्याची प्रथा राक्षसांत होती. त्यावरून मनुस्मृतीत राक्षस विवाहाचा संदर्भ आला असावा. त्यांचे विवाह अग्नीच्या साक्षीनेच होत. कदाचित राक्षस ही आर्यांचीच एक शाखा असावी जी कालांतराने दक्षिण भारतात स्थिरावली व तिने आपले वैभवशाली राज्य व संस्कृती निर्माण केली. (रावण व त्याची लंका) निरनिराळ्या प्रचंड वास्तूंशी राक्षसांचा संबंध जोडलेला दिसतो. हेमाडपंथी देवालयांसाठी ज्या अतिप्रचंड शीलांचा वापर होतो त्यावरून हे काम राक्षसांनी केले असावे, अशी समजूत होती. ऋग्वेदात मृत्यू देवता निऋऀत्ती ही राक्षस मानली जाते. ऋग्वेदातही तंत्रविद्या, भानामती,जारणमारण यासंबंधी अभिचार सूक्ते आहेत. ह्या  वाममार्गालाच अभिचार योग असेही म्हणतात. (याचाही प्रभाव बुद्ध धर्मावर प्रकटपणे दिसून येतो.) ऋग्वेदकाल ते आजपर्यंतच्या काळात राक्षस जमात देखील किती उत्क्रांत होत गेली ते आपण बघतोच आहे. मुख्य म्हणजे त्यात जात-पात, वंश-वर्णभेद असा कसलाही दावा नाही. 

सत्व रज तम हे गुण व त्यांची प्रतिकात्मक रूपं ही आपल्याला प्राचीन ग्रंथांमध्येही दिसून येतात. प्रत्येक व्यक्ती ही त्रिगुणात्मक असते. त्या गुणांचे नियमन व त्यांना  व्यक्तिगत व जीवनोपयोगी तत्त्वांत परावर्तित कसे करावे, हे ही भगवद्गीतेसारखे महान ग्रंथ सांगतात. उपनिषदांसारखे ग्रंथ जीवन मृत्यु विषयक संकल्पना, गुंतागुंतीची उकल सोप्या शब्दात सांगतात. वैदिक कालापासून चालत आलेलं हे चिंतन एखाद्या सावलीसारखं इतकं आपल्या मागोमाग, अन हातात हात घालून चालत आलेलं असतं, की आज नाही तर एक दिवस आपण अपूर्णातून पूर्ण व शून्यातून शून्य हे ध्येय गाठू शकू, इतपत आपणही धडपडत राहतो, सश्रद्ध होऊन जातो. 

आपल्यालाही उमगत जातं की, One that had granted us the Bliss of Ignorance, also acquires the Power to grant us the Strength to bear the Complete Knowledge…making us humble enough to believe that, “I know, that I do not know anything; yet not Insignificant in any way..”

ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते। 

पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।। 

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। 

लेखिका : सुश्री केतकी कानिटकर 

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बडी बेंच (Buddy Bench)… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ बडी बेंच (Buddy Bench)… लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

माझ्या घराजवळ पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा आहे. त्या शाळेच्या पटांगणावर मी कधी कधी चालायला जाते. त्या पटांगणात निरागसतेच्या लहरी पसरलेल्या असतात, म्हणून की काय कोण जाणे, पण तिथे गेल्यावर अगदी प्रसन्न वाटतं.

काल त्या शाळेच्या पटांगणात एक बेंच दिसला. त्यावरचा मजकूर बघून माझे पाय थबकले.  “Buddy Bench” असे शब्द लिहिले होते. त्याच्या खाली अजून दोन ओळी होत्या. हा काय प्रकार आहे असा विचार करत मी उभी असताना एक नऊ वर्षाची, पोनिटेल उडवत पळणारी चुणचुणीत मुलगी दिसली.

मी तिला विचारलं, “ हा नवा आहे का ग बेंच?”

ती  म्हणाली, “ नाही. ‘बडी बेंच’ नवा नाही. मागच्या बाजूला होता तो फक्त पुढे आणलाय.”

‘बडी बेंच’?माझी उत्सुकता वाढली. buddy म्हणजे मित्र पण buddy bench म्हणजे नक्की काय असावं?

माझा प्रश्नार्थक चेहरा बघून ती म्हणाली, “आम्हाला जर कधी एकटं वाटत असेल, वाईट वाटत असेल, कुणी खेळायला घेत नसेल ना, तर मधल्या सुट्टीत या बेंचवर जाऊन बसायचं. मग इतर मुलांना समजतं आणि कुणीतरी येतं बोलायला, खेळात घ्यायला, मैत्री करायला आणि मग एकदम बरं वाटतं,” तिनं उलगडा केला.

“अगबाई! हो का?” मी चकित होऊन म्हणाले.  किती सुरेख कल्पना आहे!  केवढाली ओझी असतात या लहान जिवांच्या पाठीवर. अभ्यास, परीक्षा, रुसवे, फुगवे,एकटेपणा आणि त्या चिमुकल्या जगातले इतर अनेक ताण-तणाव!

“पण कुणी आलंच नाही बोलायला तर?” आयुष्यातल्या अनुभवाने मला विचारण्यास भाग पाडले.

तिनं आश्चर्याने माझ्याकडे बघत कपाळावरच्या बटा उलट्या हाताने मागे केल्या व ती म्हणाली, “का नाही येणार?एकजण तरी येतंच. कारण त्यासाठीच तर आहे ना हा बेंच.” या बाईला इतके साधे कसे कळत नाही, असा भाव तिच्या चेहऱ्यावर होता.

एकटं वाटणं, वाईट वाटणं, राग येणं या नैसर्गिक भावना आहेत. त्या भोळ्याभाबड्या जगातसुद्धा काळज्या असतात. अपेक्षांचं ओझं असतं. एखाद्याला खेळात न घेणं असतं. एखादीला नावं ठेवणं असतं. आई-बाबांकडून रागवून घेणं असतं. आणि त्यावर Buddy Bench हा एक सोपा पर्याय आहे. मला कौतुक वाटलं. 

“किती छान माहिती सांगितलीस ग! तू कधी बसली आहेस बडी बेंचवर?” माझ्या तोंडून गेलंच.

“होऽऽऽ. नवी होते तेव्हा खूप वेळा. त्यानंतर कित्तीऽऽ मैत्रिणी मिळाल्या.” तिच्या मोकळेपणाने मोहित होऊन मी पुढे चालू लागले.

मनात येत राहिलं…फक्त लहान मुलांसाठीच बडी बेंच का? मोठ्यांसाठी का नाही? ऑफिसमधे,डॉक्टरकडे,वकिलाकडे, कॉलेजमधे, परीक्षा गृहात, लग्नाच्या कार्यालयात असे ठिकठिकाणी बडी बेंच ठेवले तर? त्यामुळे अनेक दबलेल्या भावना बाहेर पडून माणसांचं आरोग्य सुधारेल का? जगातील एकटेपणा कमी होईल का? काहीवेळा त्रयस्थापुढे मोकळं होणं सोपं असतं. नाहीतरी थेरपिस्टशी बोलणे आणि काय असते?

कदाचित एखाद्या नव्या आवाजाशी,समदुःखी असणाऱ्याशी, चार पावसाळे जास्त बघितलेल्या व्यक्तीबरोबर मैत्रीचा नवा रेशमी धागा निर्माण होईल. त्यामुळे जड झालेले ओझे थोडेसे हलके होईल. नाही का?

त्या बेंचवर खाली दोन ओळी लिहिल्या होत्या..

चल..बसू, बोलू, गप्पा मारू, विचारू एकमेका काही प्रश्न

उदात्त हेतू  मनी  ठेवूनी होऊ buddy, यार, सखा, मित्र!

लेखिका : सुश्री ज्योती रानडे

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ काठी आणि करंगळी… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– काठी आणि करंगळी – ? ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

ठसा उमटवित पाऊले चालली

अनुभवी काठी मुठीत ठाकली

          सान काया कुंतल कुरळे

          बाल्य अल्लड अबोध झबले

 

  वस्रं धवल वार्धक्य ल्याले 

  झुलते शैशव  झालरवाले

       थकल्या हाती करंगुली इवली

       किती विश्वासे तिजला धरली

 

    हरले वय गात्रेही थकली

    झेलून गाठी पाठी वाकली 

           आजीच्या अनुभवांची बोली

            कथते ती सुरकुत्यांची जाळी

 

सायीसम कर तो सानुला

थोरलेपणा होई हो धाकुला

          कसली थरथर, नसेच काहूर 

          बीज पल्लविता नच हुरहूर 

 

 छोटी आशा स्वप्नील नयनी

 तरल भावना अनवर वदनी 

         भविष्यातले षड्ज उद्याचे

         काठी स्वरे पंचम पाचूचे 

चित्र साभार –सौ. दीपा नारायण पुजारी

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी, फोन.नं. ९६६५६६९१४८

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #191 – कविता – कैसे उस पर करें भरोसा… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का चौकीदार”   महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता  “कैसे उस पर करें भरोसा)

☆  तन्मय साहित्य  #191 ☆

☆ कैसे उस पर करें भरोसा☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

उसने जब-तब झूठ परोसा

कैसे उस पर, करें भरोसा।

 

ठुकरा कर वह छोड़ गया है

स्नेहिल धागे तोड़ गया है

देख पराई घी चुपड़ी वह

रिश्तों से मुँह मोड़ गया है,

 

अपने मुँह का कौर खिलाकर

जिसे जतन से पाला-पोसा

कैसे उस पर करें भरोसा…..

 

मिली न सुविधा अपने क्रम में

मृगमरीचिकाओं के भ्रम में

झंडा-झोला छोड़-छाड़ कर

चला गया दूजे आश्रम में,

 

खीर मलाई, इधर डकारे

ऊपर से जी भर कर कोसा

कैसे उस पर करें भरोसा…..

 

कल तक जो थे शत्रु पराये

उनसे ही अब हाथ मिलाये

व्यथित,चकित,संभ्रमित समर्थक

पर इनको नहीं लज्जा आये,

 

स्वारथ के खातिर दलबदलू

पहनें टोपी, कभी अँगोछा

कैसे उस पर करें भरोसा……

 

लोक-तंत्र के हैं ये प्रहरी

चलते रहें साजिशें गहरी

आँख-कान से अंधे-बहरे,

मीठे बोल, असर है जहरी,

 

स्वाद कसैला होता, इनके

बारे में जब-जब भी सोचा

कैसे उस पर, करें भरोसा।।

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश के नवगीत # 16 ☆ अधिक वर्षा का गीत… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

श्री जय प्रकाश श्रीवास्तव

(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी  के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ  “जय  प्रकाश के नवगीत ”  के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं।  आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “अधिक वर्षा का गीत।)

✍ जय प्रकाश के नवगीत # 16 ☆  अधिक वर्षा का गीत… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव

नदी उड़ेले कितना पानी,

प्यास नहीं बुझती सागर की।।

 

मेंड़ उठाये खेत खड़े हैं,

डूब गई हैं फ़सलें सारी।

हाथ धरे कलुआ बैठा है,

कहाँ जाए बरखा है भारी।

 

बचा खुचा भी दाँव लगा है,

ख़बर नहीं मिलती बाहर की।।

 

सभी दिशाएँ पानी पानी,

शहर गाँव के रस्ते टूटे।

राहत की आशा में सारे,

भाग लिए बैठे हैं फूटे।

 

ढोर बछेरू बँधे थान से,

धार नहीं टूटी छप्पर की।।

 

घेर-घेर कर पानी मारे,

घुमड़-घुमड़ कर बरसें बदरा।

रह-रह बिजुरी चमक डराती,

नदिया नाले बने हैं खतरा।

 

बाँध हो रहे बेक़ाबू हैं,

सुध-बुध खो बैठे हैं घर की।।

***

© श्री जय प्रकाश श्रीवास्तव

सम्पर्क : आई.सी. 5, सैनिक सोसायटी शक्ति नगर, जबलपुर, (म.प्र.)

मो.07869193927,

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – एकाकार ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – लघुकथा – एकाकार ??

‘मैं मृत्यु हूँ। तुम मेरी प्रतीक्षा का विराम हो। मैं तुम्हारी होना चाहती हूँ पर तुम्हें मरता नहीं देख सकती..,’ जीवन के प्रति मोहित मृत्यु ने कहा।

‘मैं जीवन हूँ। तुम ही मेरा अंतिम विश्राम हो। तुम्हारी इच्छा पूरी करूँगा क्योंकि मैं तुम्हें हारा हुआ नहीं देख सकता..’, मृत्यु के प्रति आकर्षित जीवन ने उत्तर दिया।

समय ने देखा जीवन का मृत होना, समय ने देखा मृत्यु का जी उठना, समय ने देखा एकाकार का साकार होना।

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ महादेव साधना- यह साधना मंगलवार दि. 4 जुलाई आरम्भ होकर रक्षाबंधन तदनुसार बुधवार 30 अगस्त तक चलेगी 🕉️

💥 इस साधना में इस बार इस मंत्र का जप करना है – 🕉️ ॐ नमः शिवाय 🕉️ साथ ही गोस्वामी तुलसीदास रचित रुद्राष्टकम् का पाठ  🕉️💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 103 ⇒ इमोजी-लॉजी… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “इमोजी-लॉजी।)  

? अभी अभी # 103 ⇒ इमोजी-लॉजी? श्री प्रदीप शर्मा  ? 

बचपन में बायोलॉजी-जूओलॉजी, और सोशियोलॉजी से काम पड़ा, तो समझ में आया कि ये सब विज्ञान हैं। फोटोग्राफी, और वीडियोग्राफी अगर शौकिया और पेशेवर विधा है तो स्टेनोग्राफी एक इल्मी विधा !

शॉर्ट हैंड में मेरा हाथ हमेशा तंग रहा क्योंकि संकेतों की भाषा समझना आज भी मेरे बूते में नहीं। लिपि के बारे में आज भी मेरा ज्ञान क, ख, ग और a, b, c के आगे नहीं जाता। जब उर्दू लिपि को देखता हूँ तो सर चकरा जाता है। स्कूल में भी मेरी ग्राफ की कॉपी हमेशा खाली ही रहती थी। आजकल महँगाई का ग्राफ कुछ कुछ समझ में आने लगा है, लेकिन ECG का ग्राफ और इमोजी के संकेत आज भी मेरी समझ से बाहर है।।

कहते हैं, समझदार को इशारा काफी होता है। लेकिन कोई इतना बुद्धू हो कि इशारा ही न समझे, तो कैसे हो प्यार ? कॉलेज में एक कन्या ने इशारा किया, मैं तो न समझ पाया, मेरे साथ वाला दोस्त समझ गया। दोनों करीब हो गए, प्यार हो गया, शादी हो गई। आज दोनों मुझको इशारे से चिढ़ाते हैं।

आजकल समझदार के लिए इशारे और संकेतों का ज़माना है। ड्राइविंग लाइसेंस के लिए भी यातायात के कुछ संकेत होते हैं, स्कूल के लिए यूनिफॉर्म में एक बच्चा दिखा दिया जाता है, तो साइलेंस जोन के लिए एक हॉर्न को क्रॉस कर दिया जाता है। इसी तरह दायें/बाएँ मुड़ना, पार्किंग और एकांगी मार्ग के भी संकेतक होते हैं। और भी हैं, सब जानते होंगे, पालन भी करते ही होंगे।।

लिपि और सांकेतिक भाषा का भी एक विज्ञान है। मूक बधिर केवल हाथ के इशारों और हाव-भाव से अगर संवाद स्थापित कर लेते हैं, तो दृष्टि-बाधित के लिए

ब्रेल लिपि का उपयोग किया जाता है। हमारी भाषा में भी पूर्ण विराम, अर्ध-विराम, विस्मयादिबोधक और प्रश्नवाचक चिन्ह होते हैं, जो भाषा को एक अर्थ प्रदान करते हैं।

इमोजी मेरे लिए एक सुविधा नहीं दुविधा है ! शब्दों के अर्थ जानने के लिए तो शब्दकोश उपलब्ध हैं, अब ये इमोजी की भाषा कौन समझाए। गलत इमोजी गया,

और अपनी इमेज खराब। जिसको जो कहना हो, शुद्ध हिंदी में लिख दो। जिसको करना है वह lol करता रहे। फिल्में देखकर तो omg समझ में आया, सोच सकते हैं मामला कितना नाज़ुक है।।

कभी इमोजी में ढेर सारे फूल आ जाते हैं, तो कभी लाल पीले चेहरे ! एक थैंक यू देता अँगूठा बड़ा प्यारा लगता है। कितने

गुस्सा होते इमोजियों को मैंने अनदेखा किया होगा, कितनों की भावना को मैं पढ़ नहीं पाया हूँगा, इन सभी इमोजियों से क्षमा-याचना। जो भेज रहे हैं, वे भी मनमौजी ही हैं। सब कुछ समझ ही लेते हैं।

इमोजी की बढ़ती लोकप्रियता देखकर कहीं इसे सांकेतिक-भाषा-विज्ञान का अंश न मान लिया जाए ! हो सकता है भविष्य में इमोजी-लॉजी में डिप्लोमा और डिग्रियाँ भी प्रदान की जाने लगे। जो कभी होते थे फैल होते थे, एम ए सोशियोलॉजी में, अब शान से इमोजी-लॉजी में एम ए कर पाएँगे।।

सोचता हूँ किसी इमोजी एक्सपर्ट

से इस बार कुछ समय के लिए इमोजी-की ट्यूशन ले ही लूँ।

कब तक इन इमोजियों से मुँह छुपाता फिरूँगा।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ असर यूँ मुहब्बत दिखाई हमारी… ☆ श्री अरुण कुमार दुबे ☆

श्री अरुण कुमार दुबे

(वरिष्ठ साहित्यकार श्री अरुण कुमार दुबे जी, उप पुलिस अधीक्षक पद से मध्य प्रदेश पुलिस विभाग से सेवा निवृत्त हुए हैं । संक्षिप्त परिचय ->> शिक्षा – एम. एस .सी. प्राणी शास्त्र। साहित्य – काव्य विधा गीत, ग़ज़ल, छंद लेखन में विशेष अभिरुचि। आज प्रस्तुत है, आपकी एक भाव प्रवण रचना “असर यूँ मुहब्बत दिखाई हमारी“)

✍ असर यूँ मुहब्बत दिखाई हमारी… ☆ श्री अरुण कुमार दुबे 

नजर में जिगर में बसा तू ही तू है

रहे दूर पर सामने हूबहू है

अलावा तेरे ख्याल आता न दिल में

मुझे रात दिन तेरी ही आरजू है

असर यूँ मुहब्बत दिखाई हमारी

सभी की ज़ुबाँ पर यहाँ कू-ब-कू है

शबाब आप पर खूब आया है ऐसा

लगी होड़ पाने यहाँ चार सू है

तग़ाफ़ुल में ये बात भी दिल में रखना

नहीं रब्त की हो सकेगी रफू है

सताइश नहीं ये हकीक़त है जाँना

नहीं दूसरा आपसा माहरू है

ये कैसी अदावत अरुण भाइयों में

अगर एक जैसा जो इनका लहू है

© श्री अरुण कुमार दुबे

सम्पर्क : 5, सिविल लाइन्स सागर मध्य प्रदेश

मोबाइल : 9425172009 Email : arunkdubeynidhi@gmail. com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares