मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘सोबत…’ – भाग – 1 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘सोबत…’ – भाग – 1 ☆ श्री आनंदहरी 

सारिका मॅडमना अपघात झाल्याचा फोन हॉस्पिटलमधून ऑफिसच्या फोनवर आला आणि ती बातमी एका क्षणात ऑफिसभर झाली. सगळ्यांनाच धक्का बसला. सारे ऑफिस त्यांना भेटायला, बघायला हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा काही वेळापूर्वीच मॅडमना तिथं आणलं होतं. त्यांना वेदना कमी  व्हाव्यात म्हणून पेनकिलर इंजेक्ट करण्यात आलं होतं.अजून तपासणी चालू असल्याचं समजलं. ‘ अपघात कसा झाला ?  किती लागलंय ? ‘ याची चौकशी ऑफिसमधल्या काही जणांनी केली .एकदोन जणं डॉक्टरना भेटून आले होते.मॅडमना स्ट्रेचर वरून एक्स-रे काढण्यासाठी नेत असताना धीर देऊन, ‘ काहीही लागलं सवरलं तर फोन करा आणि महत्वाचं म्हणजे कसलीही काळजी न करता लवकर बऱ्या व्हा.’ असे सांगून, सगळे निघून गेले

मॅडमनी सगळ्यांना पाहिलं पण त्यांच्यात दिगंत नव्हता. त्याही स्थितीत, ‘ दिगंत कसा नाही आला ?’ हा प्रश्न त्यांच्या मनात येऊन गेलाच.एक्स-रे काढून झाल्यावर त्यांना स्ट्रेचरवरूनच रुमकडे नेत असताना मध्येच एका सिस्टरने विचारलं ,

“ घरचं, नातेवाईक कुणी आलंय काय?”

त्या नकारार्थी मान हलवत असतानाच, त्यांच्या कानावर ‘ हो. मी आहे.’ असा आवाज आला. ‘ दिगंतss?’त्यांनी आश्चर्यानं स्वतःशीच पुटपुटत आवाजाच्या रोखाने पाहिलं. दिगंत त्यांच्याकडेच येत होता.त्यानं हसून त्यांच्याकडे पाहिलं. त्या त्याच्याकडे बघतच राहिल्या.

“ ओके. तुम्ही जरा सरांना भेटून या.”

सिस्टरने डॉक्टरांच्या केबिनकडे बोट दाखवत दिगंतला सांगितलं.

दिगंत मॅडमांचा हात हातात घेत,’ काळजी नका करू. मी आहे आता इथं.’ असे त्यांना म्हणून डॉक्टरांच्या केबिनकडे निघून गेला.

मॅडमना झालेला अपघात किती गंभीर आहे ते त्याला डॉक्टरना भेटल्यावरच समजलं आणि त्याला धक्काच बसला. मॅडमना पाहिलं त्यावेळी त्याला तेवढं काही जाणवलं नव्हतं पण वास्तव समोर आलं होतं. सम्पूर्ण परावलंबीत्व तेही वर्ष – दोन वर्षा चा काळ ?  जीवावरचे  पायावर निभावले होते हे खरं … पण असे? मनातून विचार जात नव्हते.

मॅडम महिनाभर हॉस्पिटलमध्ये होत्या. दिगंत चोवीस तास त्यांच्या सोबत होता. तीन दिवसानंतर जेव्हा मॅडमना सारे कळालं तेव्हा त्यांना बसलेल्या धक्क्यातून सावरायला,त्यांना धीर द्यायला तोच होता. त्यासाठीची त्यांची मानसिक तयारी त्यानेच करून घेतली होती.तेवढया काळात चार मेजर ऑपरेशन्स झाली होती.

मॅडमना एकदा वाटलं की घरी कळवावे… पण गेल्या दहा वर्षात धडधाकट असताना ज्यांनी साधं जिवन्त आहे का नाही याची चौकशीही केली नाही त्यांना काय आणि कशासाठी कळवायचं ? साऱ्या कटू आठवणींनी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. दिगंत तिथंच होता.

“ आज अचानक अवेळी पाऊस कसा काय आला बुवा ?”

“  कुठाय ?”

दिगंतच्या प्रश्नानं डोळ्यातलं पाणी पुसता पुसता खिडकीतून बाहेर बघत त्यांनी विचारलं.

“ हा काय इथं ?”

त्याचा रोख लक्षात येऊन मॅडम म्लान हसल्या.

“ तुम्ही ऑफिसला ….”

विचारावं कि नको असं वाटून मॅडमनी प्रश्न अर्ध्यातच सोडला.

“ जाणार ना. डिस्चार्ज होऊन घरी गेल्यावर.”

“ अहो, पण…. “

त्यांना बोलावं असं वाटलं पण तो त्याच्या निर्णयाशी ठाम आहे हे जाणवल्याने त्या काही बोलल्या नाहीत. नाही म्हणलं तरी त्यांना दिगंतचा खूप आधार वाटत होताच. तो नसता तर आपण एकट्या काय करू शकणार होतो ? हा प्रश्न अनेकदा त्यांच्या मनात यायचाच. आणि त्यावेळी दिगंत देवासारखा धावून आलाय असे त्यांना वाटायचं.

तो स्वतःबद्दल काहीच बोलायचं नाही पण इतर विषयांवर खूप बोलायचा, गप्पा मारायचा, इतका कि कधी कधी त्यांना प्रश्न पडायचा , ‘आपण ऑफिसमध्ये पाहतो तोच हा दिगंत आहे की दुसरं कुणी?’ पण त्याच्या असण्याने त्यांचा वेळ छान जायचा.

हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला. खरं म्हणायचं तर तात्पुरता डिस्चार्ज. पुन्हा काही ऑपरेशन्स होणार होती. त्यासाठी यावं लागणार होतं. व्हीलचेअर वरुन गाडीत आणि गाडीतून व्हीलचेअर वरून घरात असा प्रवास करून त्या घरात आल्या. या प्रवासात सोबत दिगंत होता पण पुढे काय? हा प्रश्न मॅडमना मनोमन सतावत होता. घरी आल्यावर दिगंतने त्यांना उचलून बेडवर ठेवलं तेव्हा त्यांना कसंतरीच झालं. दिगंतला ते न बोलताही जाणवलं.

“मॅडम, रिलॅक्स. काहीही विचार न करता आराम करायचा.मी आता दोघांसाठी चहा करतो छानपैकी. मला चांगला चहा करता येतो बरं का? “

तो हसून म्हणाला आणि कुणाला तरी फोन करून चहा करायला किचनमध्ये गेला. त्याने आणलेला चहा मॅडमना काहीसं बसतं करून दिला आणि नंतर शेजारी खुर्ची ओढून चहा पिऊ लागला तेवढ्यात एक पन्नाशीच्या बाई आल्या.

“ आलात? बरे झालं. मॅडम ,या निर्मलाताई. सकाळी सहा पासून संध्याकाळी सहा पर्यंत इथं असतील.दोन्ही वेळचा स्वयंपाक करतील आणि तुमचं स्पंजिंग वगैरे सगळं करतील. आता तुम्ही आराम करा. ताई हे पैसे ठेवा. घरात काय काय आहे ते ठाऊक नाही. काही हवं असेल तर ते आणा. मी आता संध्याकाळी येतो. मॅडम, मी येऊ का ? आता काहीही विचार न करता आराम करा.”

तो सगळी व्यवस्था लावून निघून गेला. मॅडम त्याच्याकडे पाहतच राहिल्या. तो निघून गेला आणि त्यांचं मन दिगंतचाच विचार करत बसले. खूप दिवसापूर्वी ऑफिसमध्ये असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली होती तो प्रसंग त्यांना आठवला.

क्रमशः… 

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆– आधुनिक गार्गी – मैत्रेयी… भाग -2 – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – आधुनिक गार्गी – मैत्रेयी… भाग-2 – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

कविश्रेष्ठ इंदिरा संत

विदुषी दुर्गाबाई भागवत

अभिजात संगीत आणि काव्याच्या अभ्यासात मला नेहमीच प्रोत्साहन देणार्‍या पितृतुल्य, गुरूतुल्य अशा नाशिकच्या बाबा दातार आणि परिवाराने माझ्या पहिल्यावहिल्या स्वतंत्र ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’ कॅसेटची आणि नंतर ‘रंग बावरा श्रावण’ अशा अनेक कॅसेट्सची निर्मिती केली. स्वतःच ‘शुभ्र फुलांची ज्वाला’ असलेल्या दुर्गाबाईंच्या पवित्र हस्ते या कॅसेटचं उद्घाटन झालं. योगायोग म्हणजे आणीबाणीच्या काळी, नाशिकमधले माझे ‘निमंत्रक’ म्हणून बाईंनी, दातार परिवाराचा उल्लेख केला. गंमत म्हणजे दिलखुलासपणे बोलताना त्या एवढ्या रंगून गेल्या की, त्यांनी दीक्षित मास्तरांनी शिकवलेल्या ‘ सुखवी बहु केदार जनमन…’ या केदार रागातल्या बंदिशीत, शुद्ध निषाद आणि कोमल निषाद एकमेकांवर रेललेले असताना किती सुंदर सुरावट होते, ती गाऊनही दाखवली. 

आदरणीय कुसुमाग्रजांच्या सांगण्यावरून, दातार कुटुंबियांनी, इंदिराबाईंच्या बेळगांवी, ‘रंग बावरा श्रावण’ – निवड कुसुमाग्रजांची– भाग १ या कॅसेट – सीडीचा सोहळा प्रचंड उत्साहाने, इंदिराबाईंच्याच शब्दांत ‘कुबेरालाही लाजवेल’ अशा थाटात संपन्न केला. त्यादिवशी अक्कांच्या वक्तव्याची सुरुवात ‘आज माझ्या आयुष्यातला सोन्याचा दिवस…’ अशी अत्यानंदाने झाली. या कार्यक्रमासाठी मुंबईहून बेळगांवला निघताना, अक्कांच्या सख्ख्या मैत्रिणीने, दुर्गाबाईंनी माझ्याजवळ इंदिराबाईंसाठी पत्रातून शुभेच्छा दिल्या… 

… “ लाडके इंदिरे, तुझा सोहळा शानदार होणार आहे आणि तो अनुपम व्हावा हीच माझी इच्छा आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद गौरवण्यापेक्षा हा खऱ्या रसिक चाहत्यांचा मेळावा, कितीतरी भव्य आणि तुझ्या काव्यावर लुब्ध असलेला आहे. मी शरीराने त्यात नसले तरी मनाने त्यात आहे बरं का !” अक्कांचे साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कुणाच्या तरी करंटेपणाने हुकले असले तरी, धीर देताना दुर्गाबाईंचे हे शब्द, थोरल्या बहिणीने पाठीवरून मायेचा हात फिरवल्यासारखे वाटतात आणि डोळ्यांत पाणी तरळते. मी बेळगांवहून परतताना माझ्या हाती दुर्गाबाईंसाठी पत्रोत्तर पाठवताना अक्का म्हणतात, “ मी पद्मजाला म्हटले, खरे म्हणजे साहित्यसृष्टीत दुर्गाबाईच माझा आधार आहेत. तो आधार त्यांच्या साहित्यावर आहे. तो नकळत मला कित्येक गोष्टी देतो. सूर्याचा प्रकाश किरणांतून आला तरी, तो जसा सर्व बाजूला एकदम फाकतो – तेजाळतो तसे तुमच्या बुद्धीचे आहे. तुमच्या प्रत्येक लेखनात हे दिसून येते.”

— अशाप्रकारे या ‘गार्गी – मैत्रेयी’च्या पत्रांचे पोस्टमन होण्याचे भाग्य मला लाभले !  

दुर्गा आणि इंदिरा ही देवीची दोन रूपंच ! एका दुर्गेने आणीबाणीच्या वेळी जो प्रखर दुर्गावतार धारण केला, त्याला तोड नाही. एकटं असूनही तिला कुणाचंही भय वाटत नसे. कुणालाही हार जाणे, शरण जाणे हे तिच्या स्वभावात नव्हतेच. शरीर जर्जर झाले, तरी अगदी मृत्यूलाही  त्यांच्या  ‘देहोपनिषदात’ त्या  ठणकावून सांगतात… 

‘आयुष्याची झाली रात, मनी पेटे अंतर्ज्योत

भय गेले मरणाचे, कोंब फुटले सुखाचे..।।

अवयवांचे बळ गेले, काय कुणाचे अडले

फुटले जीवनाला डोळे, सुखवेड त्यात लोळे… ।।

मरणा तुझ्या स्वागतास, आत्मा माझा आहे सज्ज

पायघडी देहाची ही घालूनी मी पाही वाट…

सुखवेडी  मी जाहले, ‘देहोपनिषद’ सिद्ध झाले…।।’

…. बाई गेल्यानंतरही त्यांच्या शांत, तेजस्वी चेहर्‍यावर ‘ देहोपनिषद सिद्ध झाले ’ हाच भाव होता.

इंदिराबाईंनी पती निधनानंतर अपार हाल सोसले, दुःख भोगलं. एकटेपणा जगतानाही, दैवाला दोष न देता, रडत न बसता, त्या ‘प्रारब्धाला’ही ठणकावून सांगतात….  

‘प्रारब्धा रे तुझे माझे, नाते अटीचे तटीचे,

हार जीत तोलण्याचे, पारध्याचे – सावजाचे.

जिद्द माझीही अशीच, नाही लवलेली मान,

जरी फाटला पदर, तुझे झेलते मी दान,

काळोखते भोवताली, जीव येतो उन्मळून,

तरी ओठातून नाही तुला शरण शरण….’

मला तर वाटतं, इंदिरा अक्कांची सात्त्विक, सोज्वळ कविता हा माझा ‘प्राण’ आहे, तर मला वेळोवेळी साहित्यतुषारात चिंब भिजवणाऱ्या आणि ‘देहोपनिषद’सारखा अपूर्व अभंग देऊन प्रथमच मला ‘संगीतकार’ म्हणून घडवणार्‍या दुर्गाबाईंचे दृढनिश्चयी, ओजस्वी विचार हा माझा ‘कणा’! दोघीही माझ्या जीवनातील  मोठे आधारस्तंभ ! त्यांची आठवण जरी झाली तरी त्याचा सुगंध, चंदनी अगरबत्तीसारखा कितीतरी वेळ माझ्या मनात दरवळत राहतो. दोघींच्या नितांत सुंदर लेखनाने, माझ्या आयुष्याला सुंदर वळण दिलं. गर्भरेशमी कवितेचा ‘ध्यास’ आणि ‘नाद’ दिला. सृजनाचा उत्कट आनंद घ्यायला आणि आयुष्य कसं जगावं, यातलं ‘अध्यात्म’ अनुभवायला शिकवलं… 

‘आत आपुल्या झरा झुळझुळे

निळा निळा स्वच्छंद,

जगणे म्हणजे उधळीत जाणे

हृदयातील आनंद !…’

— समाप्त —

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दिया जलाना कहाँ मना है?… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

दिया जलाना कहाँ मना है ?… ☆ श्री संभाजी बबन गायके 

—’हा अग्निदाहो न संभवे !‘ 

कफी तिचं नाव….तिच्या वडीलांचं त्या तिघांशी काही कारणांनी भांडण झालं होतं. ती अवघ्या तीन वर्षांची होती तेंव्हा. ते तिघे तिच्या घरापाशी आले….ती अंगणात खेळत होती आपल्या मैत्रिणींसोबत..होळीचा सण होता…रंगांची उधळण सुरू होती….या रंगांमध्ये अचानक रक्ताचा लाल भडक रंग मिसळला गेला….त्या तिघांपैकी कुणीतरी एकानं तिच्या चेह-यावर कसला तरी द्र्वपदार्थ फेकला आणि ते पळून गेले…अ‍ॅसिड होतं ते! एखाद्या सुंदर गुलाबपुष्पावर निखारे पडावेत तसं झालं क्षणार्धात. या नाजूक फुलावरच्या दोन नेत्रपाकळ्या जळून गेल्या. मुखकमल काळवंडून गेले होतेच. जीव मात्र बचावला. पण हे असं जिवंत राहणं किती वेदनादायी असतं हे ज्याचं जळतं त्यालाच कळतं! 

सामान्य दुकानदार असणा-या तिच्या बापानं कंबर कसली. भारतातल्या सर्व मोठ्या इस्पितळांत तिला उपचारांसाठी दाखल करताना त्याच्याजवळची होती नव्हती ती सर्व पुंजी समाप्त झाली. त्यानं मग तिला जिल्ह्याच्या गावी आणलं….पोटाची खळगी भरण्यासाठी तिथल्या न्यायालयात झाडू मारण्याचं काम स्विकारलं. न्यायालयाचं आवार साफ करणा-या या बापाला त्या न्यायालयात न्याय मात्र मिळू शकला नाही. पोलिसी यंत्रणांच्या मर्यादांमुळे आणि कायद्यातील नागमोडी पळवाटांमुळे तिचे दुश्मन दोनच वर्षांत तुरूंगाबाहेर आले…..ती मात्र अंधाराच्या कोठडीत जेरबंद होऊन खितपत पडली. जिंदगी थांबत नाही. या धावपळीत ती आठ वर्षांची झाली. तिला पहिलीच्या वर्गात  शाळेत दाखल केलं गेलं तिला पण अभ्यासाचं गणित काही जमेना. कारण ती बघू शकणा-या मुलांची शाळा होती. तोपर्यंत बापाचे वीस लाख खर्च झाले होते. कफी आठ वर्षांची झाली होती. राक्षसी दुनियेत काही देवदूतही लपून बसलेले आहेत….त्यांनी साहाय्य केले त्यांच्यापरीने. बापाने मग तिला मोठ्या शहरात आणलं. डोळ्यांविनाही तिचं काळीज जगण्याची आशा घट्ट धरून होतं! तिची स्मरणशक्ती पाहून तिला थेट सहावीच्या वर्गात दाखल केलं गेलं. लुई ब्रेलचे उपकार तिच्याही कामी आले….तिची बोटं शाबूत होती…हात जळाला होता तरी. तिची बोटं एखाद्या निष्णात संवादिनी वादकाच्या सराईत बोटांसारखी ब्रेल लिपीच्या कागदावर उठावाने उमटवलेल्या खडबडीत अक्षरांवरून भराभर फिरू लागली…बोटांतून स्पर्श शब्दरूप घेऊन मेंदूत विसावू लागले. तिथल्या अंधांसाठीच्या डोळस शाळेने सर्व सहकार्य केलं….अंधांनाही वापरता येऊ  शकेल असा संगणक उपलब्ध करून दिला. आधुनिक काळात उपलब्ध असलेली काही साधनं तिच्या मदतीला आली. सीबीएसईचा अभ्यासक्रम इतर अभ्यासक्रमांच्या तुलनेत काहीसा अवघड मानला जातो. भाषेचं ठीक  आहे, पण विज्ञान,गणितातल्या संकल्पना समजून घेणं किती जिकीरीचे झाले असेल कफीला! पण तिने हार मानली  नाही…दिवसरात्र अभ्यास केला….आईबाप, शिक्षक पाठीशी होते….तिचे गुणांचे शतक अवघ्या पाच टक्क्यांनी हुकले! ९५.०६ टक्के दहावी बोर्ड परीक्षेत! अवघे पाच टक्के मिळवले असते या पोरीने तरी ते शंभर टक्क्यांच्या तोडीचे  ठरले असते! 

‘ नैनं दहति पावक:’ अर्थात ‘ हा अग्निदाहो न संभवे ’ असं ज्ञानोबाराय म्हणून गेलेत….आत्मा अग्निने जाळला जाऊ शकत नाही…कफीचा अंतरात्मा अ‍ॅसिडनेही जाळला जाऊ शकला नाही. मी निरूपयोगी नाही, दृष्टी नसली तरी माझ्याकडे दृष्टीकोन आहे हे दाखवून देणा-या कफीने मिळवलेलं हे यश म्हणूनच अलौकिक ठरते. तिला आय.ए.एस. व्हायचं आहे भविष्यात. खरं तर ती आताच झाली आहे आय.ए.एस (I.A.S….I AM STRONG!). तिच्या मुख्याध्यापिका म्हणाल्या….माना की अंधेरा घना है…लेकीन दिया जलाना कहाँ मना है? कफी ! तू प्रज्वलीत केलेली ही ज्योत अनेकांच्या अंधा-या मनात उजेड प्रक्षेपित करेल….हे सूर्यप्रकाशाएवढं ठळक आहे. 

चला…कफीला शुभेच्छा,आशीर्वाद देऊयात…तिच्या चेह-यावर नसलेल्या डोळ्यांतील आशा आणखी पल्लवीत करुयात….तिच्यासाठी प्रार्थना करूयात ! तू देखणी आहेस कफी….लव यू कफी ! 💐

(दैनिक सकाळ,पुणे, इंटरनेटवरील बातम्या यांवर हे लिखाण बेतलेले आहे.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पिंपळ आणि आंबा…लेखक – श्री सतीश मोघे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ पिंपळ आणि आंबालेखक – श्री सतीश मोघे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

आपले दु:ख, तेवढ्या मोठ्या मात्रेचे नसतांना अचानक कुणीतरी मोठ्या मात्रेने सांत्वन करायला पुढे आले की, थोडे गोंधळायला होते. हे  सात्वंन झिडकारावे की त्यामागचा आपलेपणा पाहून नम्रपणे  स्वीकारावे ? अशा संभ्रमात पडायला होते खरे… बागेतल्या पिंपळाला असेच काहीसे त्यादिवशी झाले.

बागेतले आंब्याचे झाड त्याला सांगत होते, “बघवत नाही रे तुला पिंपळा.. शिशिर ऋतूने तुला अगदीच पर्णहीन, निस्तेज करून टाकलय. पण धीर धर. काही दिवसाच वसंत सुरू होईल आणि येईल पुन्हा पालवी…. होईल पुन्हा पूर्वीसारख रूप … होशील माझ्यासारखा…” 

शिशिरात पर्णहीन अवस्थेत नीरव शांततेतली आनंददायी ध्यानावस्था अनुभवणाऱ्या पिंपळाला यावर काय बोलावे, हे क्षणभर समजेना. अनेकदा दुसऱ्याचे सांत्वन करतांना त्याचा दुःखभार हलका करण्याच्या हेतुपेक्षा, आपण खूप सुखात आहोत याचा काकणभर का होईना अभिमान दाखविण्याचा हेतू सांत्वन करणाऱ्याच्या मुखावर झळकत असतो. पण हा हेतू दिसला तरी त्यावेळी तसे बोलता येत नाही, याची समज आणि उमज पिंपळाला होती.

मंद स्मित करून पिंपळ आब्यांला म्हणाला, “तुझ्या प्रेमळ शब्दांसाठी खूप आभार. पण एक सांगू.. मी अजिबात दु:खात नाही. सृष्टीने सहाही ऋतूत आपले प्रारब्ध आधीच लिहून ठेवले आहे. कोणत्या झाडाने केव्हा फुलावे, बहरावे, कोमजावे सगळे सगळे. आपल्या हातात फक्त मूळं आहेत आणि त्यांच्या व्दारे जमिनीतून जीवनरस घेणे आहे.हे एकदा उमगले की दुःखाचा लवलेश नाही”

“आपली मूळं आत सारखीच आहेत. फरक दिसतो, तो  फक्त बाहेर.. जमिनीवर… पाने, फळे, फुले, खोड, उंची यात फक्त फरक. विविधता आणि सौंदयासाठी केलेला… हे एकदा कळलं की, आहे त्यात आनंद.

सुखदुःखापलीकडील समाधानाचा, आनंदाचा अनुभव. आपल्या बाहयरूपातल्या बदलांकडे पहाण्याची एक वेगळीच दृष्टी येते… एक समाधानी अवस्था येते. जिथे कुणाशीही तुलना नाही, तक्रार नाही. ठेविले अनंते तैसेचि रहावे। चित्ती असो द्यावे समाधान।”

पिंपळाच्या या बोलण्याने आंब्याचे समाधान झाले नाही. त्याने पिंपळाला विचारले, “खरे खरे सांग! पर्णहीन झाल्याने तुझं रूप कुरूप झालय, पक्षी येईनासे झालेत, पानांची सळसळ नाही… याचे खरेच तुला दुःख नाही?”

धीरगंभीर आवाजात पिंपळ उत्तरला, ” नाही. अजिबात नाही. बाहेरच्या बदलणाऱ्या गोष्टींशी आपल्या सुखाला जोडून घ्यायचं आणि त्या गोष्टी बदलल्या की दुःखी व्हायचं, ही माणूसं करीत असलेली चूक आपण का करायची! माझं सद्‌भाग्य की, तथागताचा सहवास मला लाभला आणि पानं, फुलं, फळ 

यापलीकडे जाऊन कायम मूळाकडेच पाहण्याची खोड मला जागली. ‘घट्ट मूळ’ आणि ही ‘खोड’ असली की आनंदाला बाधा नाही. बाह्य बदलांकडे पाहण्याची दुष्टीच बदलून जाते”

“‘तू म्हणतोस पाने नाहीत त्याचं दुःख. पण खरं सांगू शिशिर ऋतू माझा ५-६ हजार पानांचा भार हलका करतो. ते २-३ महिने खुप हलकं हलकं वाटत! तू हे सुख नाही अनुभवू शकत.. पानांचा भार नाही. 

सळसळ नाही, पक्षांचे आवाज नाही. त्यामुळे ध्यान समाधीही दीर्घकाळ लावता येते. अधिक मूळाकडे जाऊन चैतन्याचा स्रोत देहभर भरून घेता येतो. वसंताला सामोरे जाण्याची ही पूर्व तयारी असते. म्हणूनच वसंत आला रे आला की अवघ्या सात दिवसात माझ्या देहभर पालवी फुललेली दिसते “

आंब्याला हळूहळू पिंपळाचे विचार पटत होते. पिंपळ पुढे बोलू लागला.” कुणाला आपण किती प्रिय आहोत, यावर आपण आपली प्रियता ठरवू नये. तुझाही मोहोर कधी जळतो.. कधी गळतो.. फळं नाही येत तेवढी… लोकं नाराज होतात..  फळांच्या अपेक्षेने प्रियता, जवळीकता असली की ती कधीतरी लोप पावते. पण फळाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष प्रेम केलं की प्रियता कायम रहाते. अशा निरपेक्ष प्रेम करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या प्रेमाची आठवण म्हणून त्यांच्या वहीत, पुस्तकात पिंपळपान कायमचं ठेवतात. शिशिरात देहावरची पाने गळाली तरी ती वह्या-पुस्तकातील पाने तशीच असतात. त्यांना बघून मी धन्य होत असतो.”

आपल्या फळाला बाजारात मोठा भाव / प्रसिध्दी आहे, अशा समजूतीत असणाऱ्या आंब्याला पिंपळ आपल्याहून जाणीवेने, विचाराने खूप मोठा आहे, हे एव्हाना जाणवले होते. पिंपळाप्रती आदरभाव, कौतुक व्यक्त करावं म्हणून आंबा पिंपळाकडे वळला तर काय? पिंपळ डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. पर्णहीन पिंपळाचं झाड आंब्याला त्याच्याहून सुंदर दिसलं..समाधानी जाणवलं…आणि  मूळाकडे जायची खोड लावून घेण्याचा निश्चय त्याने मनोमन केला.

लेखक – श्री सतीश मोघे

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – वटवृक्ष…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– वटवृक्ष…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

कुटुंबवत्सल वटवृक्ष,

पसरला दाट दुरवर !

घनदाट  छाया त्याची,

वाटसरूच्या शिरावर !

लहान मुले खेळती बागडती,

खेळे सुरपारंब्या मनसोक्त !

मोठ्यांना मोह न आवरे खेळाचा,

टांगाळून घेती आनंद होऊन मुक्त !

प्राणवायूचे संतुलन राखतो,

विषारी वायू  स्वतः शोषून !

सहवास त्याच्या सोबत असावा,

सांगती शास्त्र आपणा उद्देशून !

भूजल साठा करतो मुळाशी,

सोडतो बाष्प उन्हाळ्यात !

अक्षयवृक्ष म्हणती यास,

हिरवागार साऱ्या ऋतूकाळात !

सुहासिनी पूजती यास,

मागती  दीर्घायुष्य पतीचे !

जन्मोजन्मीची साथ मागे,

पूजन करती पतिव्रतेचे !

उपयोग याचे असती अनेक,

दूर करी दंतदुखी असो मधुमेह !

लेप याचा ठरे मोठा गुणकारी,

आयुर्वेदात महत्व नि:संदेह !..

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 142 – वशीकरण है तेरा… ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – वशीकरण है तेरा।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 143 – वशीकरण है तेरा…  ✍

वशीकरण है तेरा, शरणागत मन मेरा।

 

लम्बी गहरी मरूस्थली में

भटक भटक भरमाया

जाने किसकी पुण्यप्रभा से

हरित भूमि को पाया

आनत हूँ आश्चर्यचकित हूँ, किसने दिया बसेरा।

 

धूल धूसरिता रही ज़िन्दगी

एक रंग था काला

मुझको कुछ भी पता नहीं था

कैसा है उजियाला।

दिव्य ज्योति अम्बर से उतरी, नूतन दृश्य उकेरा।

 

महक उठा है मन में मधुवन

अद्भुत रास रचा है

वेणुगीत सा जीवन लगता

या फिर वेद ऋचा है।

संभव हुआ असंभव कैसे, निश्चय जादू तेरा।

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 142 – “हुआ उड़ानों में कपोत…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है।  आज प्रस्तुत है  आपका एक अभिनव गीत  “हुआ उड़ानों में कपोत)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 142 ☆।। अभिनव गीत ।। ☆

हुआ उड़ानों में कपोत ☆

निर्धनता व भूख दिखाती

जहा जुगलबंदी

उस घर का बूढ़ा मालिक

है अपना रमचंदी

 

मामूली है नहीं पाँच जन का

पालन पोषण

उसी गाँव में जहाँ चौधरी

करता हो शोषण

 

बना नसेनी एक अकेला

है पहाड चढ़ता

कमर हुई है दोहरी

कम न हो पायी दृढ़ता

 

कुचले हैं अरमान जहाँ-

उसके, अपनों ने भी

विवश थका हारा

समेटता है चिन्दी चिन्दी

 

हुआ उड़ानों में कपोत

सा सपनों से बाहर

पता नहीं वह कौन

दिलासा देगा जोआकर

 

इस हिसाब से डरी हुई

हैं घर की स्थितियाँ

क्या गरीब का सामं-

जस्य , रही क्या गतिविधियाँ

 

खोज रहा उल्लास

शिथिल पत्नी के माथे पर

सहमी सहमी लगी जहाँ

पर कुंकुम की बिन्दी

 

एक हाथ में ले अनाज

दूजे में व्यथा कथा

झुकी पीठ पर लाद चला

रमचंदी वही प्रथा

 

पिसवाना है इसे साव की

आटा चक्की पर

पत्नी खुश होगी भोजन की

बडी तरक्की पर

 

पढ़ा लिखा था नहीं

जान न पाया ‘शोषण की

सरल लिपी में लिखी गई

यह गहन कठिन हिन्दी

 

©  श्री राघवेन्द्र तिवारी

10-06-2023

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – अलार्म ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि –  अलार्म ??

बतियाने के लिए

अब बचा नहीं

किसीके पास समय,

यूँ ही अकारण

हँसने-हँसाने के लिए

अब बचा नहीं

किसीके पास समय,

बातों में अब

होती है मार्केटिंग,

प्रचार, प्रसार,

विस्तार, व्यापार,

आजीविका के लिए

व्यापार करना

प्राकृतिक धर्म होता है,

पर आदमी का

व्यापारी भर रह जाना

संकट का अलार्म होता है…!

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ आषाढ़ मास साधना- यह साधना आषाढ़ प्रतिपदा तदनुसार सोमवार 5 जून से आरम्भ होकर देवशयनी एकादशी गुरुवार 29 जून तक चलेगी। 🕉️

💥 इस साधना में इस बार इस मंत्र का जप करना है – 🕉️ ॐ नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णु प्रचोदयात्।।🕉️💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ व्यंग्य # 192 ☆ “तूफान और तूफान…” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

श्री जय प्रकाश पाण्डेय

(श्री जयप्रकाश पाण्डेय जी की पहचान भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी के अतिरिक्त एक वरिष्ठ साहित्यकार की है। वे साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। उनके  व्यंग्य रचनाओं पर स्व. हरीशंकर परसाईं जी के साहित्य का असर देखने को मिलता है। परसाईं जी का सानिध्य उनके जीवन के अविस्मरणीय अनमोल क्षणों में से हैं, जिन्हें उन्होने अपने हृदय एवं साहित्य में  सँजो रखा है। आज प्रस्तुत है आपका एक विचारणीय व्यंग्य – “तूफान और तूफान…”)

☆ व्यंग्य  — “तूफान और तूफान…” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय

मौसम विभाग ने चेतावनी दी, कि तेज हवाओं के साथ चक्रवती तूफान आने वाला है अतः सुरक्षित रहें और यथासंभव बाहर न निकलें। 

हम डर गए, हमने श्रीमती जी के कंधे में हाथ रखकर कहा – प्रिये ! निर्भय हो जाओ… 

श्रीमती ने हाथ में हाथ डालकर हमें समझाया – ‘प्लीज निर्भय हो जाओ ‘। डरने की कोई बात नहीं है तुम्हारी घरवाली तूफान की ऐसी – तैसी कर देगी वो अपने आप में बड़ा तूफान है। श्रीमती जी ने बताया कि इस संवत का राजा सूर्य है और मंत्री शनि… दोनों में पिता पुत्र का संबंध है लेकिन दोनों परस्पर विपरीत स्वाभाव के हैं दोनों में आपस में बनती नहीं है इसलिए बीच-बीच में मंत्री गण राजा को तूफान के बहाने तंग करते हैं दिल्ली तरफ एक प्रकार का तूफान खड़ा किया और कर्नाटक में दूसरे टाइप का तूफान खड़ा करवा दिया। 

तूफान आया, खूब तेज आया, दोनों जगह आया। हम बजरंगबली का चालीसा के साथ मन में ये गाना भी गाते रहे… 

‘तूफान को आना है, 

आकर चले जाना है, 

बादल है ये कुछ पल का, 

छाकर ढल जाना है “

तेज तूफान आया, पास के कई पेड़ गिर गए, टीन टप्पर उड़ गए, धूल भरी आंधी चली। श्रीमती को छूकर देखा वो सलामत थी.. उड़ी नहीं ।पिछले बार के तूफान में उड़ गईं थीं फिर पड़ोसी के यहां मिली थी, हालांकि इस बार के तूफान में कई महिलाएं तूफान में उड़ गईं थीं और पड़ोसियों के घर में आराम करती मिलीं। श्रीमती जी तूफान की तरह डटी रहीं और हमें ‘निर्भय हो जाओ “का पाठ पढ़ातीं रहीं। 

जब तूफान गुजर गया, शान्ति हो गई तो किचन और घर धूल धूसरित हो गया, सब जगह धूल ही धूल…

थोड़ी देर बाद रसोई में खटर पटर और बर्तनों की उठापटक से हम सतर्क हो गए…. श्रीमती की शुरू से काम करने की आदत रही नहीं। तूफान तो आकर चला गया पर घरवाली का भयंकर तूफान आने की चेतावनी बरतन पटकने से मिल रही है। स्थिति को भांपते हुए हम तुरंत किचन में गए…. मधुर स्वर में हमने पिक्चर और बाहर डिनर का प्रोग्राम बना लिया। थोड़ी देर में श्रीमती तैयार होने लगी, झुमके पहने, हीरे का हार पहना, दस बार साड़ी पहन पहनकर देखीं फिर दस बार बदलीं। तैयार होने में इतनी अदाएं फेंकीं कि हम और आईना शरमाने लगे फिर इधर पौरुष पिघल गया। तूफान शान्त हो गया। वह फिर रसोई की तरफ पैर पटकती चली गई। थोड़ी देर बाद आईने के सामने आकर फिर इतराने लगी, कहने लगी – तुम जैसे पिलपिले मर्दों के कारण तूफान आता है और यूं ही चला जाता है। मौसम विभाग भले डरावनी चेतावनी देता है कि भयानक तूफान आने वाला है पर आजकल का तूफान आता है तो फुस्स हो जाता है, जिंदगी साली तूफान बन गई है जिंदगी हमेशा खामोश सवालों से भरी पड़ी है जीवन जीना बड़ा नाजुक अहसास है। 

हमने आंधी स्टाइल में कहा – चलो भागवान ! देर हो रही है पिक्चर की टिकट नहीं मिलेगी। वहां से आवाज आई, बस जरा जोरदार सैंडिल पहन लूं। श्रीमती जी सजने के चक्कर में खामोंखां देर कर रही थी, घर के बाहर आटो आकर रुक गया, एक तूफान और आ गया, फूफा जी मय सामान के उतर रहे थे। हमें लगा हमारी तकदीर में तूफान ही तूफान लिखे हैं। आज दो तीन प्रकार के तूफान झेल चुके हैं थोड़ी देर बाद एक – दो तूफान और आने वाले हैं हमने अपने आप को समझाया “निर्भय हो जाओ”…. 

श्रीमती अपने फूफा की तो खूब बढ़ाई करती है पर हमारे फूफा की बहुत बुराई करती है कहती है तुम्हारा फूफा बदमाश, अनमना, चिड़चिड़ा, तुनकमिजाज है तीखी बयानबाजी करके तूफान खड़ा कर देता है, छोटी छोटी बात में मुंह फुलाके बहादुर शाह जफर बन जाता है। बिन बुलाए मेहमान बनके हमारे पिक्चर और डिनर के प्रोग्राम को तहस नहस कर दिया। 

तूफान का भय बढ़ता जा रहा है श्रीमती जी का पूरी तरह से बाहर के डिनर का मूड बन गया था और अचानक फूफा के आ जाने से प्रोग्राम की ऐसी-तैसी हो गई, ऐसे में श्रीमती जी के अंदर भीषण तूफान उठ चुका होगा, और किचन में अटेक करेगा, किचन के बर्तनों पर हमें दया आ रही है, नये कांच के डिनर सेट की चिंता ज्यादा खाये जा रही है। फूफा गुस्सेल स्वाभाव के हैं चेहरे के हावभाव से लग रहा है कि उनके अंदर भी भूख का तूफान उमड़ घुमड़ रहा है…

© जय प्रकाश पाण्डेय

416 – एच, जय नगर, आई बी एम आफिस के पास जबलपुर – 482002  मोबाइल 9977318765

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ घनश्याम जी के दोहे – “पहली बरसात” ☆ श्री घनश्याम अग्रवाल ☆

श्री घनश्याम अग्रवाल

 

☆ घनश्याम जी के दोहे – “पहली बरसात” ☆ श्री घनश्याम अग्रवाल

मौका अच्छा हाथ मेँ, सोच रहा है चोर।

सोया थानेदार है, और घटा घनघोर ॥

(चोरोँ को पहली बरसात मुबारक )

कुछ के तो छप्पर उडे, कुछ के बहे मकान।

तब जाकर उनकी बनी, कोठी आलीशान ॥

(महाचोरोँ को भी पहली बरसात मुबारक)

चालाकी का फायदा, उठा रहें हैं आज ।

दुगुने दामों बेचते, भीगा हुआ अनाज ।।

(जमाखोरों को पहली बरसात मुबारक)

बेबस हो लुटती रही, चीख गई बेकार ।
शोर बादलों का घना, टूटे बिजली तार ।।

(हरामखोरों को भी पहली बरसात मुबारक)

(मित्रो, रचना और रचनाकार का संबंध माँ और बच्चे सा होता है। बिना नाम के शेयर करने का पाप न करें।)

© श्री घनश्याम अग्रवाल

(हास्य-व्यंग्य कवि)

094228 60199

 ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares