हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 51 ⇒ माखी और गुड़… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “माखी और गुड़”।)  

? अभी अभी # 51 ⇒ माखी और गुड़? श्री प्रदीप शर्मा  ? 

गुड़ और मक्खी का साथ बहुत पुराना है, बस यह मानिए, जब से हमने हमारे गुरुकुल में पोथी बांचना शुरू किया, तब से ही इस गूंगे के गुड़ और ढाई आखर की मक्खी का प्रेम, हम देखते चले आ रहे हैं। इन्हें आपस में लाने का यह पवित्र कार्य संत कबीरदास जी ने कुछ इस तरह से किया ;

माखी गुड़ में गड़ी रहै

पंख रह्यौ लिपटाय ;

हाथ मलै और सिर धुने

लालच बुरी बलाय।

हमारे कबीर साहब के दोहों में उलटबासी होती थी, और उनकी सीख, साखी कहलाती थी। सुनो भाई साधो, उनका तकिया कलाम था! भाई, सिर्फ सुनो ही नहीं, उसको साधो भी, जीवन में, अमल में भी लाओ। ।

गुड़ मीठा है, इसमें गुड़ का कोई दोष नहीं, मक्खी को भी मीठा पसंद है और हमें भी! मीठा किसे पसंद नहीं। तो क्या इसमें मक्खी के पंख का दोष है। अगर उसके पंख नहीं होते, तो शायद वह भी चींटियों की तरह, गुड़ का पहाड़ अपने मजदूरों की सहायता से अपने घर में ले जाती। ।

ईश्वर ने प्राणियों के पंख उड़ने के लिए बनाए हैं, लेकिन कबीर साहब कब गलत कहते हैं, लालच बुरी बलाय। मक्खी का क्या है, उसे गुड़ और गोबर में कहां भेद करना आता है। वह तो उल्टे, जहां बैठती है, वहीं अंडे दे देती है। नाली से उड़कर आएगी और हलवाई के थाल पर बैठ जाएगी। बर्फी का सब रस, गुड़ गोबर हुआ कि नहीं।

कबीर साहब की सीख हमें तब समझ में नहीं आई, तो अब क्या आएगी। हमारे भी पंख हैं, अरमानों के, हमारे भी सपने हैं, पैसे का भी लोभ है और जमीन जायदाद औलाद का भी।

मत कहिए लालच, उसे कुछ और नाम दे दीजिए। ।

लालच से मीठा कोई गुड़ नहीं। हमसे तो मीठा ही कंट्रोल नहीं होता, बिना पंख के, केवल हमारी रसना ही हमें यहां वहां उलझाती रहती है, ललचाती रहती है। यह तो इतनी चतुर है कि मीठा बोलकर भी जहर घोलने में माहिर है।

माखी ही हमारे लिए कबीर की साखी है। भगवान दत्तात्रेय ने इसीलिए कीट, पतंगों तक को अपना गुरु माना। कबीर साहब के शब्द ही इसीलिए गुरु ग्रंथ साहब के सबद बन प्रकट हुए हैं। संत का सत्संग ना सही, सबद ही काफी है। अपने जीवन से लालच को मक्खी की तरह निकाल फेंके। शब्दों का लालच तो देखिए, प्रकट होने से बाज नहीं आ रहे। हम नहीं सुधरेंगे। ।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ इंद्रधनुष #169 ☆ “संतोष के दोहे…” ☆ श्री संतोष नेमा “संतोष” ☆

श्री संतोष नेमा “संतोष”

(आदरणीय श्री संतोष नेमा जी  कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप  कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं. “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है – “संतोष के दोहे ”. आप श्री संतोष नेमा जी  की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)

☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # 169 ☆

☆ “संतोष के दोहे …☆ श्री संतोष नेमा ☆

(विधा:-  कुंडलिया छंद,  विधान:-1 दोहा (13-11) 2 रोला (11-13))

गरमी में जो रख रहे, पशु-पक्षी का ध्यान

रखें सकोरा जल सहित, धन्य वही इंसान। 

धन्य वही इंसान, समझते जो पर पीड़ा

रख ओरों का मान, बनो मत बिच्छू कीड़ा।

कहते कवि “संतोष”, बनें हम सच्चे धरमी

खोजें खुद में दोष, रखें शांत मन गरमी। 

© संतोष  कुमार नेमा “संतोष”

सर्वाधिकार सुरक्षित

आलोकनगर, जबलपुर (म. प्र.) मो 9300101799

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ माटी कहे कुम्हार से… ☆ सुश्री रुचिता तुषार नीमा ☆

सुश्री रुचिता तुषार नीमा

☆ कविता ☆ माटी कहे कुम्हार से…   ☆ सुश्री रुचिता तुषार नीमा ☆

मैं भी माटी का बना हुआ

तू भी माटी से बना हुआ

 

मैं भट्टी की आंच में पका हुआ

तू जीवन संघर्ष से तपा हुआ

 

मैं प्यासे की प्यास बुझाता हुआ

तू अपनों की आस लगाता हुआ

 

मैं भी इंसानों की प्रतिक्षा में

तू भी उनकी राह तकता हुआ

 

मैं हर रंग, रूप और आकार में

तू अनुभव के स्वरूप साकार में

 

बस तुझमें मुझमें इतना अंतर

मैं चोट लगी तो टूट जाऊंगा

तू चोट लेकर और पक जाएगा।।।।

 

© सुश्री रुचिता तुषार नीमा

इंदौर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – सौ अंजली दिलीप गोखले आणि श्री दीपक तांबोळी – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ अंजली दिलीप गोखले

💐 अ भि नं द न 💐

आपल्या समूहातील प्रतिभावंत लेखिका सौ अंजली दिलीप गोखले यांना त्यांच्या “ भवसागरी तराया  या कथा संग्रहासाठी “ मासिक सारांश साहित्य पुरस्कार – २०२३ “ हा नामांकित पुरस्कार प्राप्त झालं आहे.

त्याबद्दल सुश्री अंजली गोखले यांचे आपल्या सर्वांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन, आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.💐 

पुरस्कार-प्राप्त कथासंग्रह 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्री दीपक तांबोळी

💐 अ भि नं द न 💐

आपल्या समूहात नव्यानेच सामील झालेले प्रसिद्ध लेखक श्री दीपक तांबोळी यांनाही, त्यांच्या अशी माणसं अशा गोष्टी“ या कथासंग्रहासाठी “मासिक सारांश साहित्य पुरस्कार – २०२३“ हा नामांकित पुरस्कार प्राप्त झाला आहे.

या पुरस्काराबद्दल श्री. दीपक तांबोळी यांचे आपल्या समूहातर्फे मनःपूर्वक अभिनंदन, आणि साहित्यक्षेत्रातील पुढील अशाच यशस्वी वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.💐

यापुढे त्यांचे दर्जेदार लेखन आपल्याला नेहेमीच वाचायला मिळेल याची खात्री आहे.

पुरस्कारप्राप्त कथासंग्रह

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ धनाचे  श्लोक ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

😅 🤠 धनाचे  श्लोक ! 😎 😅 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

(सध्याच्या जगात बोकाळलेल्या, “माझं काय?” अशी मनोवृत्ती झालेल्या जनांसाठी धन जोडण्याचे, आणखी काही जगनमान्य आणि सोपे उपाय !)

सदा सर्वदा योग धनाचा घडावा रे

त्या कारणे खिसा मानवा भरावा रे

 

उपेक्षु नको तू येणाऱ्या संधी रे

आलेल्या संधीचे सोने कर तू रे

 

जुगार लॉटरी नको खेळू तू रे

लॉटरी सेंटर चालवावया घे रे

 

खेळणारे सारे विकती घरे दारे

चालका घरी लक्ष्मी पाणी भरे

 

नवा सोपा धंदा तुज सांगतो रे

भाई गल्लीतला तू आता बन रे

 

मग उघडतील राजकारणाची दारे

देवून खोटी वचने निवडून ये रे

 

राजकारण म्हणजे कुबेर कुरणे

तेथे तुवा आहे मनसोक्त चरणे

 

हो यथावकाश शिक्षणसम्राट रे

सात पिढ्यांची मग सोय होय रे

 

दुजा सोपा धंदा तुज सांगतो रे

होऊन बुवा छान मठ बांध तू रे

 

आता स्वर्ग सुखं पायी लोळती रे

नाही पडणार कसली ददात रे

 

‘दामदासे’ रचिली ही रचना रे

एखादा नुस्का यातला वापर रे

 

धन मिळतां नको विसरू या दामदासा रे

मज पोचव मला माझा हिस्सा रे

 

 धनकवी दामदास !

 

© प्रमोद वामन वर्तक

११-०२-२०२३

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #176 ☆ सरस्वती स्तवन… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 176 – विजय साहित्य ?

☆ सरस्वती स्तवन… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

मयुरवाहिनी,पद्ममालिनी, देवी शारदा नमो नमो

हंस वाहिनी, विद्यावती तू, भुवनेश्वरी नमो नमो.  ||धृ.||

शास्त्ररूपीणी,त्रिकालज्ञायै, चंद्रवदनी तीव्रा भामा

सुरवन्दिता,सुरपुजिता, पद्मनिलया, विद्या सौम्या

विन्धयवासिनी सौदामिनी तू,पद्मलोचना नमो नमो  ||१.||

महाकारायै,पुस्तक धृता, विमला विश्वा वरप्रदा

महोत्सहायै,महाबलायै, दिव्यांगा, वैष्णवी,श्रीप्रदा

सौदामिनी तू,सुवासिनी तू,कामरूपायै नमो नमो ||२.||

सावित्री,सुरसा,गोमती तू, महामायायै रमा परा

शिवानुजायै, सीता सुरसा, शुभदा कांता, चित्रांबरा

विशालाक्षी तू,त्रिकालज्ञायै,धुम्रलोचनी नमो नमो ||३.||

गोविंदा, गोमती,नीलभुजा, शिवानुजायै, महाश्रया

श्वेतसनायै, सुधामुर्ती तू, कला संपदा, सुराश्रया

जटिला,चण्डिका,पद्माक्षी तू,ज्ञानरूपायै नमो नमो ||४.||

शिवात्मकायै,सरस्वती तू, चतुरानन कलाधारा

निरंजना तू,महाभद्रायै,वीणावादिनी, स्वरधारा

साहित्यकलेची,स्वरदेवी, सृजनप्रिया नमो नमो||५.||

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शांत झोप आनंदी मन… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ शांत झोप आनंदी मन… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

हे वाचूनच छान वाटते.काही जण म्हणतील की आनंदी मन असेल तर शांत झोप लागेल.आणि काहींचे म्हणणे असेल शांत झोप लागली तर मन आनंदी होईल.थोडक्यात या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत.

प्रथम आपण शांत झोप लागण्या साठी काय करायचे ते बघू.

यात काही भौतिक ( शारीरिक व्याधी व बाह्य ) व काही मानसिक कारणे असतात.

बाह्य कारणे आपणच निर्माण करतो. त्या साठी पुढील उपाय करावेत.

१) झोपण्या पूर्वी किमान ३ तास आधी जेवावे.

२) जेवल्यावर शतपावली  करावी

३) झोपण्या पूर्वी २ तास टीव्ही,मोबाईल अशी साधने दूर ठेवावीत.

४) झोपण्या पूर्वी १ तास आधी एखादे पुस्तक वाचावे/नामस्मरण करावे/ मंद संगीत ऐकावे.

 मानसिक कारणे

🔹 भूतकाळातील कटू आठवणी

🔹 आपल्या चुका

🔹 ईर्षा, राग, वाईट विचार, हतबलता, जबाबदाऱ्या

हे सगळे विचार झोपताना येतात आणि झोप येत नाही.

या साठी पुढील गोष्टी करता येतील.

शांत झोप येण्यासाठी हे करू शकतो.

१) सकाळी मेडिटेशन करणे.

२) दिवसात आवश्यक तेव्हा व्हाईट लाईट घेणे.

३) दीर्घ श्वसन करायचे.

झोपताना म्हणायचे, मी एक महान, पवित्र आत्मा आहे. मला शांत व गाढ झोप लागली आहे. या मुळे मनाला तशी आज्ञा मिळते.

४) असे डोळ्या समोर आणायचे, माझ्या हृदयातून शांती व प्रेमाची किरणे बाहेर पडून ती मेंदूत जात आहेत. आणि तिथे खूप शांती अनुभवत आहे.

हे केल्यामुळे

शांत झोप लागते

कमी वेळेत झोप पूर्ण होते.

सकाळी गजर न लावता जाग येते.

उत्साही व प्रसन्न वाटते.

♦️ या मुळे दिवसाची सुरवात प्रसन्न चित्ताने व आनंदाने होते.

या उपयामुळे जो आपला मूळ विषय आहे, शांत झोप आनंदी मन साध्य करू शकतो.

धन्यवाद!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अखेरची इच्छा … भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

☆ अखेरची इच्छा … भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले

(किती अल्प संतुष्ट आहे ग हं विशाल. नुसता स्वभाव चांगला असून काय उपयोग? महत्वाकांक्षा नको का काही ?” ) इथून पुढे —-

“ बरं वैदेही, ते जाऊ दे आता. किती पैसे लागतील ते सांग मला. मी चेक देते तेवढ्या रकमेचा “ .वैदेही आणि ऋचाला रडू आलं. आपल्याला वाटलं तशी आजी कठोर आणि आपमतलबी नाही हे ऋचाला समजलं. “ किती व्यवहारी आहे आपली आई ! तिचं ऐकलं असतं तर आपणही ताई माई सारखे पैसा गाठीला लावून राहिलो असतो.”   वैदेहीला ऋचाचं लग्न केवळ आईच्या मदतीमुळे  चांगलं करता आलं. ऋचाला छान नेकलेस,  व्याह्यांचे मानपान, सगळं हौसेने करता आलं. 

ऋचा सासरी जाताना आजी सांगायला विसरली नाही, “ ऋचा, बाईला आपली आयडेंटिटी जपता आली पाहिजे बरं ! तुझी नोकरी तू काहीही झालं तरी सोडू नकोस. तुझ्या आईची फरपट कायम लक्षात ठेव. इतकी गुणी आणि हुशार माझी वैदेही, पण बघ ना, एक चुकीचा निर्णय आणि जन्मभर पश्चाताप आला बघ नशिबाला. माझा जीव तुटतो तिच्यासाठी ! तुझ्या दोन्ही मावश्या पण लबाड आहेत बरं का ग! जपूनच अस हो त्यांच्यापासून !”

ऋचा हसली आणि आजीला मिठी मारून म्हणाली,”आज्जी, कित्ती ग हुशार होतीस तू ! अशीच आहेस का ग पहिल्यापासून?” आजी हसली आणि म्हणाली, “नको  का अशीच मी ऋचा? तुझे आजोबा भोळे सांब ! मी खमकी होते म्हणून नीट संसार केला बरं ! अग, संसाराला बाई चतुर धोरणी हुशार  लागते बाळा! कायम लक्षात ठेव !अग पैसा असेल तरच सगळं खरं बरं ! नाहीतर सगळे गुण मातीमोल होतात. कायम लक्षात ठेवा. आणि ए रोहित ठोंब्या,तू सुद्धा !” रोहितने आजीला उंच उचलले आणि गरगर फिरवले. “ अरे हे काय मेल्या, मरेन ना मी !”– “ छे ग आजी,अजून मी डॉक्टर कुठे झालोय? मी डॉक्टर झालो की मग मरायचं ! आत्ता नाही !” – “ बाई गं वैदेही,अफाट आहे बरं पोरगं तुझं.”  आजी खुदुखुदु हसत आत गेली.  

ऋचा सासरी गेली आणि वैदेहीला घर सुनंसुनं झालं. आईला म्हणाली, “आई यावेळी नको ना जाऊ माईकडे ! थांब माझ्याजवळ ! मला माहीत आहे, तिकडे तुझी आबाळच होते, पण तू बोलत नाहीस.  दोघींकडे सुना मुलं नातवंडे असा धबडगा असतो. मला समजतं ग ! माझी जागा मोठी असती तर मी कायम तुला संभाळले असते बघ !”  आई उदास झाली.  म्हणाली, “चालायचंच वैदेही ! त्यानाही करू दे जरा आईची सेवा !तरी मी तुझ्याचकडे राहते जास्त, आणि ते पथ्यावरच पडलंय त्यांच्या ! यावेळी राहीन बाळा, पण दरवेळी नको आग्रह करू हं !” दोघींचे डोळे भरून आले. आजी खूप थकली आणि मग मात्र ती जास्त जास्त वैदेहीकडे राहू लागली. ताई माई लहर लागली तर फिरकत,, नाही तर येतही नसत. रोहित सुंदर मार्क मिळवून डॉक्टर झाला आणि त्याला हवी तशी सर्जरीला ऍडमिशन मिळाली  आजीला अतिशय आनंद झाला.आजी म्हणाली,” रोहित, माझं एक काम करशील? आपल्या नगरकर वकिलांचा मुलगा वकील झालाय ना? त्याला बोलावून आण.उद्याच.” रोहितने वकिलांना बोलावून आणले. आतल्या खोलीत बराच वेळ चर्चा चालली होती, पण ती कोणीच ऐकली नाही. दुसऱ्या दिवशी नगरकर वकील गाडी घेऊन आले आणि आजींचे मृत्युपत्र रजिस्टर झाले सुद्धा ! आजींना फार समाधान झाले. ” रोहित, मला वचन दे.तू वैदेहीला नीट संभाळशील. कधीही अंतर देणार नाहीस “ .. .” नाही ग आजी, मी असं कसं करेन? मी आईला कायम संभाळणारच ! आणि तुला सुद्धा ! माझं लग्न नाही का बघणार तू?” रोहित लाजला. “ अरे लबाडा ! आत्ता सांगतोस होय? ये बघू घेऊन तिला उद्या !” 

दुसऱ्याच दिवशी रुचिराला घेऊन रोहित घरी आला. “आजी, ही बघ तुझी नातसून ! अगदी ढ आहे, काहीही येत नाही स्वयंपाक ! नुसतीच आहे डॉक्टर ! तूच शिकव हं हिला सगळं ! “ रुचिरा हसत होती. “आजी, मला सगळं येतं हो !काहीही सांगतो हा गाढव !”— “आजी, सर्जन नवऱ्याला गाढव म्हणत का ग तुमच्या वेळी?” सगळे हसण्यात सामील झाले.

वैदेहीला,आजीला ही गोड रुचिरा अतिशय आवडली. त्याच रात्री, काहीही हासभास नसताना आजी झोपेतच गेल्या. रोहितला अतिशय वाईट वाटले. त्याची आजी म्हणजे तर त्याची जिवाभावाची मैत्रीण– ती  गेली ! पण सगळ्यानी समजूत घातली, “अरे किती जगायचे रे त्यांनी ! चौऱ्याण्णव हे काय कमी झालं का वय? सगळं बघितलं त्यांनी !अगदी नातसून सुद्धा !आणखी काय हवं रोहित? झोपेत किती छान शांत मृत्यू आला त्यांना !” 

दिवस कार्य झाल्यावर नगरकर वकील आले. “ सगळ्याना बोलावून घ्या,आजीचं मृत्युपत्र वाचायचं आहे तुमच्या समोर ! “— ‘आईनं  मृत्युपत्र केलं होतं? आम्हाला नाही बोलली काही कधी !’ ताई माई म्हणाल्या. अतुलही अमेरिकेतून आला होता.

नगरकर वकीलानी सगळ्यांसमोर मृत्युपत्र उघडले. मृत्यूपूर्वी आठच दिवस आजीने रजिस्टर्ड मृत्युपत्र केले होते. आजींनी त्यात लिहिले होते,— “ माझा  जुना वाडा रोहितला द्यावा. तिथे त्याने हॉस्पिटल काढावे. हवे तर पाडून नवीन  हवी तशी इमारत  बांधावी.  आमच्या वास्तूचा असा  सदुपयोग दुसरा कशाने होणार?  माझ्या ताई माईना मी माझ्या फिक्स डिपॉझिट रिसीट निम्म्या निम्म्या देऊ इच्छिते. माझा दुसरा फ्लॅट वैदेहीला देण्यात यावा. माझे दागिने अतुलला मिळावेत. तसाही त्याला पैशाचा, घराचा उपयोग नाही. आणि माझी सगळ्यात जास्त सेवा वैदेहीने निरपेक्षपणे केली आहे, म्हणून तिला माझा फ्लॅट मी देतेय. बाकी माझे आशीर्वाद तर कायम तुम्हाला आहेतच. विल वाचून संपले. .सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले. अतुल म्हणाला,  “ हे काय असलं विल ! मी एकुलता एक मुलगा !माझा हक्कच आहे दोन्ही घरांवर !” ताईमाई म्हणाल्या, “ हे काय आईचं वागणं !आम्ही काही कमी नाही केलं आईचं ! या रोहितला सगळा वाडा ! आणि वैदेहीला फ्लॅट पण ! आम्हाला हे मान्य नाही.”

नगरकर हसायला लागले. तुमच्या मान्य-अमान्यचा प्रश्नच येत नाही. आजींनी हे सगळं ओळखून रजिस्टर विल केलंय. त्यात कोणालाच बदल करता येणार नाहीत. तुम्हालाही पुष्कळ पैसे मिळाले आहेत. आजींच्या एफ डी मला माहीत आहेत किती रकमेच्या आहेत ते ! अतुलराव, उगीच वाकड्यात शिरू नका. किती वेळा आलात हो गेल्या पाच वर्षात आईकडे बघायला, भेटायला ? कधी तिला अमेरिकेला चल, असं तरी म्हणालात का ? मिळालंय तेही खूप आहे. कमी नाहीये. आजी हुशारच होत्या. मला जास्त तोंड उघडायला लावूच नका. मी, माझे  बाबा असल्यापासून तुमच्या घरी येतोय. तुमच्या वडिलांचे वकील होते माझे बाबा.  मी ओळखतो सर्व मंडळींना ! आजींनी फार विचारपूर्वक छान, आणि कोणत्याही कायदेशीर त्रुटी न ठेवता विल केलंय. तुम्हाला माहीत नसणार म्हणून सांगतो, त्यांनी लिव्हिंग विल पण केलेय. म्हणजे, त्यांना वेळ आलीच तर कोणत्याही कृत्रिम उपायांनी जगवू नये, व्हेंटिलेटरवर अजिबात ठेवू नये असे ! नेत्रदान करावे. ते तर आपल्या रोहितने केलेच म्हणा ! किती हुशार होत्या आजी बघा. त्यांच्या अंतिम इच्छेला मान देणं तुमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. कोणालाही काहीही कमी मिळालं नाही आणि असलं तर ज्याने त्याने त्यांनी असं का केलं ते समजून  घ्यावे ! माझी जबाबदारी सम्पली.” — नगरकर वकील निघून गेले.  

चेहरे पाडून ताईमाई आणि अतुल, तिथून चहासुद्धा न घेता निघून गेले. पैसा माणसात वाकडेपणा आणतो हे वैदेहीला पुन्हा एकदा समजले. तिला अतिशय वाईट वाटले. रोहित म्हणाला,”आई, तू का वाईट वाटून घेतेस? आजीला माणसांची  चांगलीच पारख होती. आला वाईटपणा तर येऊ देत. तू शांत रहा आणि आजीच्या इच्छेला आपण मान देऊया.  तू  किंवा मी, काहीही मागायला गेलो नव्हतो आजीकडे ग !  आपल्याला  तिचे विल माहीत तरी होते का? नाही ना? मग बस झाले.” रोहितने आईची समजूत घातली आणि तो रुचिराला फोन करायला वळला.

– समाप्त – 

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवत्व… लेखिका – सुश्री रश्मी लाहोटी ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? मनमंजुषेतून ?

☆ देवत्व… लेखिका – सुश्री रश्मी लाहोटी ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे ☆

“पाळी नाही आली.”

“लघवी तपासली का?”

“नाही.”

“झोप टेबलवर.”

तपासणी झाली. नवऱ्याला आत बोलवायला सांगितलं. दहा बारा महिन्याचं बाळ अगदी काळजीपूर्वक सांभाळत तो आत आला. 

खूपदा दिसणारं हे चित्र. कुटुंबनियोजनाची काळजी घेण्यात अजूनही बरीच जनता उदासीन असते. काही हजार मोजले की मोकळं ! हा सोप्पा पण चुकीचा समज.

“अडीच महिने झालेत.”

“हो, पाडायचं.”

“आधी काळजी घ्यायची की मग.”

“ ….”

“आधीचं काय?”

“मोठा मुलगा पाच वर्षांचा, अन् ही मुलगी दहा महिन्यांची !”

“ॲापरेशन करून टाकायचं असतं… किमान लवकर तरी यायचं, मोठा गर्भ पाडायचा म्हणजे तिला त्रास होणारच की !”

“आम्हाला ठेवायचंच होतं, म्हणून इतकं लांबलं.”

“इतकं लहान बाळ असून ठेवायचं होतं?” आता आईच्या कडेवर विसावलेल्या गुटगुटीत मुलीकडे पहात विचारलं.

“हे भावाचं आहे. भाऊ चार महिन्यांपूर्वी ॲक्सिडेंटमधे गेला. त्याची बायको दोन महिन्यापूर्वी बाळाला टाकून गेली, त्यामुळे हे आता आमचंच. म्हणून आता तिसरं नको.”  नवरा बाळाच्या केसात हात फिरवत म्हणाला.

“हिला मंजूर आहे का?” बायकोकडे पहात विचारलं.

“हिनेच सुचवलंय…” नवरा तिच्याकडे कौतुकाने पहात म्हणाला.

“आताचा भावनेच्या भरात केलेला विचार कायम राहील का नंतरही?” सर्वसाधारण प्रश्न आणि शंका!

“विचार बदलू नये अन् बारकीवर अन्याय होऊ नये म्हणूनच हे पाडायचं अन् लगेच ॲापरेशन करायचंय. कारण तीन तीन लेकरं पोसण्याइतकी ऐपत नाही आमची.” तिचं पोरीचा गालगुच्चा घेत ठाम उत्तर !

आपल्या आजूबाजूलाच कितीतरी अगदी साधीसुधी दिसणारी, पण खूप मोठ्या उंचीवरची माणसं आपल्याला पहायला मिळतात ! देव फक्त मंदिरातच विराजमान असतो असं थोडंच आहे !! देवत्व असं कितीतरी लोकांच्या मनात आणि वागणुकीतही दिसतं कधीकधी आणि आपल्या मनाचं मोरपीस करतं !!!

लेखिका : सुश्री रश्मी लाहोटी

प्रस्तुती : मेघ:शाम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २५ : ऋचा १ ते ७ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २५ : ऋचा १ ते ७ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

मण्डल १ – सूक्त २५ (वरुणसूक्त) – ऋचा १ ते ७

ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : देवता – वरुण 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील पंचविसाव्या  सूक्तात शुनःशेप आजीगर्ती  या ऋषींनी वरुण देवतेला आवाहन केलेले  असल्याने हे वरुणसूक्त म्हणून ज्ञात आहे.  आज मी आपल्यासाठी वरुण देवतेला उद्देशून रचलेल्या पहिल्या सात ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे. 

मराठी भावानुवाद ::

यच् चि॒द्धि ते॒ विशो॑ यथा॒ प्र दे॑व वरुण व्र॒तम् । मि॒नी॒मसि॒ द्यवि॑द्यवि ॥ १ ॥

वरूण राजा तुमची प्रजा अज्ञानी आम्ही

तुमची आज्ञा आम्हा अज्ञा उमगत ना काही

अवधानाने उल्लंघन झाले अमुच्या आचरणे

विशाल हृदयी क्षमा करोनी हृदयाशी घेणे ||१|| 

मा नो॑ व॒धाय॑ ह॒त्नवे॑ जिहीळा॒नस्य॑ रीरधः । मा हृ॑णा॒नस्य॑ म॒न्यवे॑ ॥ २ ॥

आज्ञेच्या अवमानासाठी  देहान्त शासन 

कोप करोनी आम्हावरती नका करू ताडण 

झाला आज्ञाभंग तरी तो केला ना बुद्ध्या 

नका देऊ हो बळी अमुचा तीव्र अपुल्या क्रोधा ||२|| 

वि मृ॑ळी॒काय॑ ते॒ मनो॑ र॒थीरश्वं॒ न संदि॑तम् । गी॒र्भिर्व॑रुण सीमहि ॥ ३ ॥

वेसण घालूनिया वारूला योद्धा बांधून ठेवी

स्तोत्रे तशीच अमुची वेसण मना जखडूनि ठेवी

सुखा मागण्या तुमच्या ठायी बद्ध आम्ही होतो

तव चरणांवर अर्पण करुनी श्रद्धा  निरुद्ध करतो ||३||

परा॒ हि मे॒ विम॑न्यवः॒ पत॑न्ति॒ वस्य॑इष्टये । वयो॒ न व॑स॒तीरुप॑ ॥ ४ ॥

द्विजगण अवघे घेत भरारी अपुल्या कोटराते

मनोरथांची कल्पना तशी तुम्हाकडे पळते

तुमच्या चरणी आर्त प्रार्थना आलो घेऊनिया  

सुखलाभाच्या वर्षावाचे दिव्य दान मागण्या ||४||

क॒दा क्ष॑त्र॒श्रियं॒ नर॒मा वरु॑णं करामहे । मृ॒ळी॒कायो॑रु॒चक्ष॑सम् ॥ ५ ॥

चंडपराक्रम अलंकार हा तुमचा वरूणदेवा

प्रसन्न होऊन अमुच्यावरती यज्ञी झडकरी धावा

तुष्ट होऊनीया भक्तीने आम्हाला वर द्यावा

जीवनात अमुच्या वर्षाव सुखतृप्तीचा व्हावा ||५||

तदित्स॑मा॒नमा॑शाते॒ वेन॑न्ता॒ न प्र यु॑च्छतः । धृ॒तव्र॑ताय दा॒शुषे॑ ॥ ६ ॥

उभय देवता अती दयाळू स्वीकारून घेती

समसमान वाटुनिया अमुच्या हविर्भागा घेती

आज्ञाधारक यजमानावर प्रसन्न ते होती

वरदायी होती, तयाला निराश ना करिती ||६||

वेदा॒ यः वी॒नां प॒दम॒न्तरि॑क्षेण॒ पत॑ताम् । वेद॑ ना॒वः स॑मु॒द्रियः॑ ॥ ७ ॥

मुक्त विहंगत व्योमातुनिया द्विजगण अगणित

मार्ग तयांचा कसा जातसे  हे जाणुनि आहेत  

निवास यांचा सागरावरी सदैव नि शाश्वत

तारु तरंगत कैसे जात ज्ञात यांसि वाट ||७||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे.. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)  

https://youtu.be/YfxdaAdbE_8https://youtu.be/YfxdaAdbE_8

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 25 Rucha 1-7

 

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares