मराठी साहित्य – विविधा ☆ “१ मे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “१ मे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

एक मे. हा दिवस प्रत्येक कामगारासाठी आणि प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्ती साठी खास आनंदाचा,सोनियाचा दिवस. कामगार दिनाबद्दल बोलायचं तर ह्या दिवशी कामगारांसाठी फायद्याची आणि फायदा होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कायद्याची रुपरेषा आखली गेली. आधी कामगार वर्गावर जी आपबिती होती नं ती नुसती कळूनही किंवा वाचूनही हळहळ वाटत होती.कामगारांचा आधी अक्षरशः कोणीही वाली नव्हता. पिळवणूक म्हणजे कशी असेल हे जेव्हा आम्ही लोकं आठ तास काम करुन माना टाकतो नं तेव्हा पूर्वी हा कामगार वर्ग पंधरा पंधरा तास नाँनस्टाँप काम करीत होता नं तेव्हा खरी जाणीव होते. आजच्या सुधारणांमुळे आम्ही काम करु त्या प्रमाणात, वाढत्या महागाई नुसार  आम्हाला त्या कामाचा मोबदला मिळतोयं पण खरचं पूर्वी जी वेठबिगारी होती नं ती फार भयानक होती हे आधीच्या कामगार मंडळींकडूनच समजतं आणि त्यांनी सहन केलेल्या आणि जिद्दीने तोंड दिलेल्या संकटाची कल्पना येते आणि तशी जाणीवही होते. बरं ह्या रुपरेषेत अनेक नानाविध मुद्द्यांमध्ये बदल फायदेशीर बदल करण्यात आले. ह्या मुद्द्यांमध्ये प्रामुख्याने बालकामगारांवर बंदी, महिला कामगारांच्या कामावर मर्यादा, तसेच रात्रीच्या व धोक्याच्या कामासाठी वेगळे नियम, कायद्याने साप्ताहिक सुट्टी, कामाचा मोबदला वस्तू रुपात न मिळता तो नगदी स्वरूपात मिळणे, समान काम तर समान वेतनं इत्यादी नियम अंतर्भूत केल्या गेलेत.भारतात कामगार दिनाची सुरवात 1 मे 1923 पासून झाली.

महाराष्ट्र दिन म्हंटला की ह्या बद्दलच्या आठवणींची सुरुवात शालेय जीवनापासून होते.

ह्या दिवशी शाळेत सकाळी झेंडावंदन व्हायचे. एक मे नंतर मग दोन तीन तारखेकडे निकाल लागून मग उन्हाळी सुट्ट्यांची सुरूवात व्हायची

1 मे ह्या दिवशी खास ऐकू येणारी गीतं म्हणजे श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचं”बहु असोत सुंदर संपन्न की महा,प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा”, आणि दुसरं गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी ह्यांच “प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा”.

अन्याय, पिळवणूक ह्यांची सुट्टी होऊन कामगारांना स्वावलंबनाने रोजीरोटी मिळवून देणारा हा कामगार दिवस व महाराष्ट्रातील जनतेला आपलं असं वेगळं अस्तित्व, जागा मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र दिन चिरायू होवो.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिवर्तन — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ परिवर्तन — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले

(अगदी साधेसुधे लोक दिसले ते. पण बोलायला चांगल्या होत्या तिच्या आई. म्हणाल्या, “ मी खरे सांगू का?”) इथून पुढे —-

“जरी आम्ही इतके वर्ष इकडे राहिलो, तरी आम्ही बेताच्या परिस्थितीतच रहातोय. यांना सतत भारतात, पैसे पाठवावे लागतात. आमच्या मुलाने लग्न झाल्याबरोबर वेगळे घर घेतले, आणि तो आमच्याशी अजिबात सम्पर्क ठेवत नाहीये. यांची एक अगदी साधी नोकरी आहे, आणि मीही बेबी-सिटिंगचे काम करते. इकडे राहणीमान खूपच महाग आहे हो. आमच्याकडून आपण खूप मानपान, आणि इतरही कसली अपेक्षा ठेवू नका प्लीज… म्हणजे आम्ही हे करूच शकणार नाही. एक दिवसाचा लग्नाचा खर्च करूआम्ही. . एक छोटे गळ्यातले तेवढे तिच्यासाठी करून ठेवले आहे मी. माझी मुलगी चांगली शिकलेली आहे, पगारही चांगला आहे तिला. आणि हे लग्न त्यांचे त्यांनीच ठरवलंय तर आपण एकमेकांच्या समजुतीने घेऊया. आम्ही तुमच्या तुलनेत खूप कमीच आहोत हे अगदीच मान्य आहे आम्हाला. “ 

गीता घरी आली. समीरला आईची नाराजी समजली. तो म्हणाला, “ कोणत्या काळात रहातेस आई? मोना आणि तिचे आईवडील खरोखर सज्जन आहेत. आणि आपल्याला काही कमी आहे का? मोना मिळवती मुलगी आहे. माझी आणि तिची वर्षभराची ओळख आहे. मला खात्री आहे, ती आणि मी नक्की सुखी राहू. मी सायलीशीही बोललोय परवा. तिलाही लग्नाला येता येणार नाहीये. पण तू मात्र ते करतील ते गोड मानून घे. मग भारतात गेलीस, की घे हवे ते. मी देईन की तुम्हाला भरपूर पैसे. ”. . . . समीर आपल्या आईला ओळखून होता.

ठरलेल्या दिवशी हिंदू टेम्पलमध्ये, अगदी साध्या पद्धतीने लग्न झाले. ना कोणते दिखाऊ समारंभ, ना मानपान. . . . . दोन तासात मंडळी घरी आलीसुद्धा. मोनाच्या आईवडिलांनी छान जेवण ठेवले होते. लग्नाला मोजकीच माणसे, ऑफिसचे मित्र, असे लोक होते. गीताने सगळे दागिने, भरजरी साडी मोनाला दिली. मोनाने हौसेने नेसली, आणि सगळे दागिनेही घातले. छान दिसत होती दोघांची जोडी.

राहून राहून गीताला मात्र वाटत होते, की काय हे लग्न. . . यापेक्षा गेट टुगेदर सुद्धा जास्त भपकेदार होते आपले. . . पण बोलणार कोण? आता आपल्या मैत्रिणी असले फोटो बघून काय म्हणतील? केवढे कौतुक सांगितले होते मी. . . . परदेशातले लग्न खूप सुंदर असते. . . यव आणि त्यव. . . . . आणि इथे २ तासात घरी. . . ना काही समारंभ, ना काही. . . एक साडी ठेवली माझ्या हातात ओटी भरून. . . आणि यांना साधासा कुर्ता आणि टी शर्ट. . . जाऊ द्या झालं.

दोन्ही मुलांनी आपल्या आपल्या लग्नात, मला न विचारता सगळे करून टाकले. वर दोन्हीही असले बेताचे व्याही मिळाले. . . अतिशय नाराज होती गीता. गीताने विचारले, “ कुठे जाणार नाही का हनिमूनला? “

मोना म्हणाली, “ ममा, जाऊ ना !पण तुम्ही आहात ना, तोपर्यंत नाही. ” 

मोना दुसऱ्या दिवशी पट्कन उठून कामाला लागली. गीताच्या लक्षात आले, ही मुलगी सराईतासारखी वावरतेय स्वयंपाकघरात, म्हणजे ही इथे येऊन, राहून गेली असणार.

मोना म्हणाली, “ ममा तुम्ही खरच आराम करा. मला समीरचे सगळे किचन ओळखीचे आहे. मी कितीतरी वेळा येऊन करूनही गेलेय त्याच्यासाठी स्वयंपाक. ”. . . . मोनाने खरोखरच तासाभरात उत्तम स्वयंपाक केला. म्हणाली, “ ममा, पोळ्या मात्र बाहेरून आणल्यात हं. त्या करायला येत नाहीत मला, आणि वेळही नसतो. ” 

गीता, रवी, समीर, सगळे अगदी मनापासून जेवले. रवीने मोनाची मनापासून स्तुती केली.

गीता म्हणाली, “ वावा !मोना, मस्त केलंस ग सगळं. आवडलं मला सगळं हं. आता समीरची काळजीच नाही मला. ” 

मोना रात्री गीता आणि रवीच्या रूम मध्ये आली. म्हणाली, “ ममा, मला माहीत आहे, तुम्ही नाराज आहात. आम्ही तुमच्या बरोबरीचे नाही, माझे मॉम डॅड गरीब आहेत. पण ते खरोखर चांगले आहेत. मला, माझ्या भावाला, किती कष्ट घेऊन शिकवलंय त्यांनी. पण भाऊ निघूनच गेला अमेरिकेला. आज मी एवढा पगार, माझ्या आईवडिलांनी दिलेल्या शिक्षणानेच तर मिळवतेय. तुम्हाला आणखी एक सांगणार आहे,. . त्या दोघांना काहीही मदत लागली तर मी करणार आहे. त्यांची सम्पूर्ण जबाबदारी मी घेईन. अर्थात ते दोघे इतके मानी आहेत, की कधीही माझ्यावर अवलंबून राहणारच नाहीत. समीरला होकार देताना, मी हे आधीच सांगितलं आहे. त्याची काहीही हरकत नाही, आणि तुमचीही नसावी. ममा, नाती पारदर्शक असावीत ना. मी त्यांच्याशी, आणि समीरचे आईवडील म्हणून तुमच्याशीही, कायमच आदरानेच वागेन. मला तुम्ही समजून घ्या. लग्नात दिलेले दागिने छान आहेत, पण असले इतके भारी दागिने मी कधी वापरू? ते लहान मंगळसूत्र मात्र ठेवून घेते. . आणि फक्त २ साड्या मला पुरे आहेत. बाकी प्लीज घेऊन जा. मला खरोखर कसलाच सोस नाही हो. फक्त तुमचे प्रेम आणि आशीर्वाद द्या. “ 

गीता थक्क झाली. तिला आपल्या मैत्रिणींच्या सुना मुली आठवल्या. ’ मला लग्नात हेच हवे हं आई, आणि सासूलाही एखादा भारी दागिना तुम्ही द्यायला हवात, ’ हे बजावणारी सोनलची मुलगी आठवली.

मुलीला हिऱ्याचे मंगळसूत्र घेतले नाही, म्हणून लग्नात तमाशा करणारी प्रीतीची विहीण आठवली.

कोमलने लग्नात नुसतेच गुलाबजाम काय केले, आणखी काही स्वीट नाही का, म्हणून नाके मुरडणारी लता आठवली.

या सगळ्या मैत्रिणी, त्यांच्या मुलीसुना, तिला आठवल्याच एकदम. इतके मोठे खर्च करूनसुद्धा, न टिकलेली लग्नंही गीताला आठवली. . . एकाच वर्षात पल्लवीची सूनबाई निघून गेली होती. . . वर्षाची अत्यंत लाडावलेली मुलगी, सासरी सासूसासरे आणि नवऱ्याशीही पटत नाही म्हणून परत आली होती.

— हा सगळा चित्रपट गीताच्या डोळ्यासमोरून सरकला.

परदेशी जन्मलेली, पण संस्कार भारतीय असलेल्या या मुलीबद्दल एकदम माया दाटून आली गीताच्या पोटात. किती खरी वाटते ही मुलगी !

गीता उठली, आणि तिने मोनाला पोटाशी धरले. म्हणाली, “ मोना, मला आता माझ्या समीरची मुळीच काळजी नाही ग. फार छान निवड आहे त्याची. माझाच चष्मा बदलायला झाला होता. . . काय आहे ना समीर मोना, मी सामान्य आयुष्य कधी जगलेच नाही. सतत समाजातल्या श्रीमंत आणि उथळ मैत्रिणींसाठीच जगत आले. पार्ट्या, भिशी, सतत फार्महाऊसवर जाऊन मजा करणे, हेच आमचे आयुष्य !! पण खरं सांगू, अलीकडे उबग यायला लागला होता ग या दिखाऊ जगण्याचा. आता मात्र मी त्या ग्रुपमध्ये फिरकणार सुद्धा नाही. मोना, समीर, छान आहेत तुमचे विचार. सायलीसुद्धा मला हेच सांगत होती जीव तोडून. पण तेव्हा नाही पटलं. “

गीताच्या डोळ्यात पाणी आलं. रवीने तिला जवळ घेतले, आणि म्हणाला, “ मीही हेच सांगून शेवटी नाद सोडून दिला. पण गीता, मुळात तू खूप सरळ आणि भाबडी आहेस. चल, आता कबूल कर, आपल्या घरात, बाहेरची दोन्ही मुले लाख मोलाची आली आहेत … जावई आणि सून. ” 

गीताने मान हलवली, आणि म्हणाली, “ हो रवी. कधीतरी येते अशी डोळे उघडणारी वेळ. आता भारतात गेले की सगळे ग्रुप सोडून देणार. मी msw आहे, हेही मी कित्येक वर्षे विसरूनच गेलेय रे रवी ! माझी मैत्रीण माया, मला केव्हाची अंध शाळेत काम करायला बोलावतेय. सारखी म्हणत असते, ‘ गीता, तुझा टॅलेंट वाया घालवत आहेस तू या दांभिक उथळ बायकांच्यात. एकदा येऊन बघ समाजातली दुःखे. . . विसरून गेली आहेस का ग. . आपण msw आहोत ते?’. . . तिकडे नक्की जाईन म्हणते. ” 

अचानक झालेले हे परिवर्तन बघून, रवि आणि समीरने एकमेकांना टाळ्या दिल्या, आणि डोळे पुसत मोनाने गीताला मिठी मारली.

अतिशय समाधानाने, भरल्या मनाने, आणि डोळ्यांनी, गीता आणि रवी भारतात परतले.

 – समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी सुट्टी… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

??

☆ माझी सुट्टी… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

खूप दिवसांपूर्वीची गोष्ट. दिवस कुठले, वर्षे लोटली. म्हणजे वीस – पंचवीस वर्षे सहज. आणि गोष्ट म्हणजे काय, तर हकीकत. त्यावेळी मी डी. एड. कॉलेज सांगलीमधे अध्यापन करत होते. मला शिकवायला आवडायचं आणि मुलींमध्ये रमायलाही. तेवढंच तरुण झाल्यासारखं वाटायचं. म्हणजे जॉब सटिस्फॅक्शन वगैरे म्हणतात न, ते होतं, पण तरीही दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीचे वेध लागायचेच. तेव्हा सुट्टी लागली, की मी यंव करीन अन् त्यव करीन असे मांडे मनात भाजत आणि खात रहायची. त्यातले काही मांडे असे —

पहाटे लवकर उठून व्यायाम आणि प्राणायाम करणे. सकाळी फिरायला जाणे. हे अगदी मस्टच, मी ठरवलं. सुट्टी असल्यामुळे सगळं आही आरामात आवरायचं, दुपारी पंख्याखाली अडवारायचं आणि मनसोक्त दिवाळी अंक किंवा पुस्तकं वाचायची. संध्याकाळी शेजारणी, सख्या- मैत्रिणी यांच्याकडे जाऊन गप्पांचे फड उठवणे, हाही आखलेला बेत असे. एरवी कॉलेजमधून घरी येताना नजरेच्या टप्प्यात जेवढ्या येतील, त्यांना ‘काय कसं काय?’ विचारणं आणि ‘ठीकय. ’ ऐकणं, या पलीकडे संवादाची मजल जात नसे.

 पहाटे उठण्यासाठी गजर लागे. आधी घड्याळाचा, नंतरच्या काळात मोबाईलचा. गजर झाला की मनात येई, लवकर उठणं नि नंतरची लगबग नेहमीचीच आहे मेली. आज आरामात पांघरूणात गुरफटून पडून राहण्याचं सुख अनुभवू या. उद्यापासून सुरुवात करू. पण तो उद्या कधी उजाडत नसे. तो ‘आज’ होऊनच उगवे. व्यायाम, प्राणायाम, पक्ष्यांची किलबिल हे सगळं राहूनच जायचं. नाही तरी किलबिल ऐकायला आता शहरात पक्षी राहिलेतच कुठे, मी मनाशी म्हणे. मला आणि मुलांना सुट्टी असे, पण यांना ऑफीस असल्यामुळे यांचा डबा साडे नऊला तयार असणं गरजेचं असे. त्यामुळे सकाळची कामाची धांदल नेहमीसाराखीच करावी लागे, सुट्टी असूनसुद्धा. माझ्याप्रमाणे मुलांनीही सुट्टीचे कार्यक्रम ठरवलेले असायचे. पोर्चमध्ये उभे राहून गप्पा, किंवा मोबाईलवर चॅटिंग, यू ट्यूबवरचे सिनेमे बघणे, घरात पसारे करणे, त्यांच्या सवडीने जेवायला येणे, आई घरात आहे, म्हंटल्यावर आईनेच जेवायला वाढणे, अपेक्षित. त्यातून बाहेर पडले की माझे लक्ष, कपड्यांनी, भांड्यांनी, पुस्तकांनी ओसंडून वहाणार्‍या कपाटांकडे जाई॰ दिवाळीसारखा महत्वाचा सण. घर स्वच्छ, नीटनेटकं नको, असं मला आणि मलाच फक्त वाटे. घरातल्या इतर कुणाला नाही. ही आवरा-सावर होईपर्यंत दिवाळीचे पदार्थ करायचीच वेळ येई. पणत्या, वाती, उटणं, नवा साबण किती म्हणून तयारी करावी लागायची. दिवाळीच्या दिवसात रोज एक नवीन पक्वान्न हवंच. ‘तुझं गोड नको बाई, काही तरी चमचमीत कर’, अशी मुलांची मागणी. मागणी तसा पुरवठा करायलाच हवा ना, शेवटी आपलीच मुलं. जेवणं- मागचं आवरणं. दुपारचे सहज तीन वाजून जात. मग एखादा दिवाळी अंक घेऊन फॅनखाली पडावं, तर डोळे मिटू मिटू होत. मासिकातील अक्षरे पुसट होत जात आणि मासिक हातातून कधी गळून पडे, कळतच नसे. नाही म्हणायला, संध्याकाळी शेजारणी, सख्या- मैत्रिणी यांच्याकडे जाऊन गप्पांचे फड उठवणे, हा आखलेला बेत बराचसा तडीला जाई.

 दिवाळी येई-जाई. कॉलेज पुन्हा सुरू होई. दिवस- महिने संपत. मार्च उगवे. पोर्शन शिकवून संपलेला असे आणि आता पुन्हा मोठ्या सुट्टीचे वेध लागत. आता मांडे मनात नाही, ताटात घेऊन खायचे, मी नक्की ठरवते. वाटतं, सुट्टीत कुठेतरी फिरून यावं. नवा प्रदेश पहावा. निसर्गाच्या सहवासात काही काळ घालवावा. ताजंतवान होऊन, नवी ऊर्जा घेऊन परत यावं आणि नव्या दमाने, नव्या उत्साहाने नेहमीच्या दिनचर्येला सुरुवात करावी. पण या महिन्यातल्या क्लासचे, परीक्षांचे मुलांचे वेळापत्रक, कधी कुणाचे आजारपण, घरातली, जवळच्या नात्यातील लग्ने या गोष्टी अ‍ॅडजेस्ट करता करता ट्रीपचं वेळापत्रक कोलमडून जाई. दिवाळी काय किंवा उन्हाळी सुट्टी काय, दरवर्षी थोड्या-फार फरकाने असंच काही-बाही होत राहिलं.

 दिवस- महिने- वर्षे सरत आली. माझ्यासाठी कॉलेजची शेवटची घंटा वाजण्याची वेळ आली. एकीकडे कासावीस होत असतानाच मी मनाला समजावू लागले,

 आता मला सुट्टी मिळणार मिळणार

 खूप खूप मज्जा मी करणार करणार.

 आता मला खरंच सुट्टी मिळाली आहे. आता आरामात उठायला हरकत नाही. आता साडे नऊच्या डब्याची घाई नाही. मुलांची जबाबदारी पण आता उरलेली नाही. ती आपापल्या नोकरीच्या गावी, आपआपल्या संसारात, मुलाबाळात रमली आहेत. सकाळी आता उशिरा, आरामात उठायचं. मी निश्चय करते. पण काय करू? जागच लवकार येते आणि एकदा जाग आल्यावर नुसतंच आंथरूणावर पडून रहावत नाही. पूर्वी पाहिलेली स्वप्ने आता आळोखे- पिळोखे देत जागी होऊ लागली.

 आता सकाळी जाग आल्यावर उहून फिरायला जायचं मी ठरवलं. उत्साहाने जिना उतरू लागले, तर गुढगे आणि कंबर म्हणाली, ‘बाई ग, आता आमचा छळ थांबव!’ कमरेला चुचकारत नवा महागडा कंबरपट्टा आणून तिला नटवलं. गुढग्यांवरही छान उबदार वेष्टण चढवलं. पण त्यांचं तोंड वाकडंच. ते काही बेटे सहकार्य करेनात. शेवटी डॉक्टरांशी बोलले. डॉक्टरांनी क्ष-किरण फोटो काढला. फोटो बघत ते म्हणाले, ‘ आता या गुढग्यांना निरोप द्या काकू! आता नवे गुढगे आणा!’ तसे केले. नवे गुढगे घेऊन आले पण चालताना, इतकंच काय, बसताना, झोपतानाही पायाला वेदना होऊ लागल्या. पुन्हा डॉक्टर. पुन्हा क्ष-किरण फोटो. डॉक्टर म्हणाले, ‘ पाठीच्या कण्याच्या चौथ्या – पाचव्या मणक्यांनी गळामिठी घातलीय, ती सोडवायला हवी. ती सोडवली. मग मात्र माझे पाय वेदनारहित झाले. हळू हळू फिरणं वगैरे जमू लागलं. पण डॉक्टरांनी बजावलं, ‘आता चालताना हातात काठी घ्या. ’ आणि एक लोढणं गळ्यात नव्हे हातात आलं.

 आता टी. व्ही. बाघायला वेळच वेळ होता. पण हळू हळू लक्षात येत गेलं, आपल्याला सिरियल्समधले संवाद नीट ऐकू येत नाहीयेत. टी. व्ही. च्या जरी जवळ बसलं, तरी फारसा उपयोग होत नाहीये. कानांकडे तशी तक्रार केली, तर ते म्हणाले, ‘आम्हाला गळामिठी घालायला एक सखा आण. त्याचे लाड-कोड पुरवले. पण त्यांचा हा सखा इतका नाठाळ निघाला, सगळा गलकाच ऐकवू लागला. नको ते आवाज मोठ्या प्रमाणात घुमवू लागला. हवे ते दडवून ठेवू लागला. थोडक्यात, हा कांनांचा सखा, असून अडचण अन नसून खोळंबा झाला. शेवटी मूकपट पाहून नाही का आपण आनंद घेत, तसाच टी. व्ही. बाघायचा, असं ठरवून टाकलं.

 आता वाचायला खूप वेळ होता. चांगली पुस्तकेही हाताशी होती. पण—-

इथेही पण आलाच. निवृत्तीपूर्वीच डोळ्यांवर डोळे चढवून झाले होते. ते साथही चांगली देत होते. पण बालहट्टाप्रमाणे त्याचे काही हट्ट पुरवावे लागायचे. बसून वाचायाचं. झोपून वाचायाचं नाही. तसं वाचलंच तर उताणं झोपायचं कुशीवर नाही. हे हट्ट पुरवल्यावर त्याची काही तक्रार नसायची. पण तो डोळयांवरचा डोळा जरी चांगलं काम करत असला, तरी मूळ डोळा अधून मधून म्हणायला लागला, ‘आता मी शिणलो. आता पुरे कर तुझं वाचन!’ मी नाहीच ऐकलं, तर तो सारखी उघड –मीट करत स्वत:ला मिटूनच घ्यायचा.

 तर असं हे माझं सुट्टीपुराण. . . . . जेव्हा दात होते, तेव्हा चणे नव्हते. आता भरपूर चणे आहेत, तर खायला दातच नाहीत.

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ || अनंत स्तोत्र || ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

|| अनंत स्तोत्र || ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

मार्ग दावी रे अनंता | आज येथे ऐसे अडता ||

अंधःकारी बुडून जाता | दिशा काही दिसेना ||१||

कोण आम्ही कोठुनि आलो | आज येथे ऐसे अडलो ||

काय फळाची आशा राहो | बूज ती राहीना ||२||

धरणीखाली बीज सापडे | जळे वेढुनि त्यास टाकिले ||

जगतासाठी जीवन दिधले | तुझियाचि कृपे ||३||

बघता बघता अंकुर आला | डोकावूनिया पाहू लागला ||

मार्ग आपुला शोधु लागला | सूर्यप्रकाशी ||४||

दिधले जीवन आदिपासुनी | ठेवुनि त्याची जाण ही मनी ||

घट्ट धरुनिया धरणी ठेवी | मुळीया रूपे ||५||

परोपकारी धरणीचा हा | वसा घेतला वृक्षलतांनी ||

फळे अर्पुनी जगतासाठी | कृतार्थही जाहले ||६||

दिशा दाविशी रे अनंता | तृणांकुरांना पशुपक्षांना ||

पोरकाच मग मानवचि का | चाचपडे अंधारी||७||

कळत असूनि असा राहिलो | वळता नचही ताठ राहिलो ||

स्वार्था धरुनी अंध जाहलो | असा या जगी ||८||

परमार्थाची आस लागली | मोहाची पण भूलचि पडली ||

मजविण दृष्टी आड जाहली | काही कळेना ||९||

धाव धाव रे भगवंता | कृपाळू होऊन अनंता |

सोडव यातुनिया निशिकांता | तेजा तव दावून ||१०||

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ॥ लकी आजोबा॥ ☆ प्रस्तुती – जुईली अमोल ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ ॥लकी आजोबा॥ ☆ प्रस्तुती – जुईली अमोल ☆

शाळा नाही,

दप्तर नाही

अभ्यास नाही,

परीक्षा नाही

पाढे नाही,

गृहपाठ नाही

आजोबा कसले 

लकी आहेत नाही॥१॥

ऑफीस नाही,

लँपटॉप नाही

रोजचा त्रासदायक 

प्रवास नाही

आई आजी सारखा 

स्वयंपाक नाही

आजोबा कसले 

लकी आहेत नाही॥२॥

सारखा फोन 

नाही तर पेपर

फार तर बँकेत 

एखादी चक्कर

कुठेही जा म्हटलं

की काढतात स्कूटर

आजोबा कसले 

लकी आहेत नाही॥३॥

मित्र जमवतात,

सहली काढतात

देश परदेश 

फिरुन पाहतात

येतांना आम्हांला 

गंमत आणतात

आजोबा कसले 

लकी आहेत नाही॥४॥

नमस्कार केला की 

काहीतरी पुटपुटतात

आपल्याला नेहमीच 

शाबासकी देतात

चष्मा स्वत: हरवतात 

अन् दुसऱ्यांना 

शोधायला लावतात

आजोबा कसले 

लकी आहेत नाही॥५॥

सर्व आजोबांना समर्पित….

संग्राहिका : जुईली अमोल

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 137 – जोड़ लिया है कैसा नाता… ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – जोड़ लिया है कैसा नाता…।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 137 – जोड़ लिया है कैसा नाता…  ✍

जोड़ लिया है कैसा जाता

इधर उधर जब हो जाती तो

जाने कैसा मन घबराता।

जनम जनम के प्यासे मन को

पनघट का आधार मिला

जिसे सदा दुत्कार मिली हो

उसको गहरा प्यार मिला

क्या जानूँ तुम किन जन्मों की

पत्नी, प्रेयसी या माता।

सुबह शाम या सोते जगते

नयनों में छवि उतराती

तुम जीवन की चटक चाँदनी

हो मेरी पुण्य प्रभाती।

शक्ति भक्ति आसक्ति तुम्हीं हो

नींद तुम्हीं तुम जगराता।

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 136 – “उलझ गई संध्या फिर…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है।  आज प्रस्तुत है  आपका एक अभिनव गीत  उलझ गई संध्या फिर)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 136 ☆।। अभिनव गीत ।। ☆

उलझ गई संध्या फिर ☆

खेत गुनगुनाते हैं सटे हुये

गैल के

टिप्पणियाँ व विचार

सुनते अप्रैल के

 

पलपल हैं बाँट रहे

सुषमा भिनसार से

फसल कटी, दिखे ठूँठ

बासी अखवार से

 

रोचक हैं सब पदान्त

मुस्काते छन्दों के

बजती हैं  घंटियाँ

गले बँधी बैल के

 

बहुत सरसराहट है हवा

की तरोताजा

भूल गये आज कहीं

यही गली महाराजा

 

समय के चितेरे कुछ

उड़े फड़फड़ा पाँखें

लौट नहीं पाया सच

उनकी खपरैल से

 

छाती में इंतजार का

छँटना तय लेकर

देहरी की ओट चमक

जाते हैं नथ बेसर

 

दुलहिने दिशाओं की

दबे छिपे बतियातीं

उलझ गई संध्या फिर

बालों में छैल के

 

©  श्री राघवेन्द्र तिवारी

29-04-2023

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – सूत्र ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – सूत्र ??

झूठ की नींव पर

सच की मीनार खड़ी नहीं होती,

छोटे मन से कोई यात्रा

कभी बड़ी नहीं होती..!

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ श्री हनुमान साधना 🕉️

अवधि – 6 अप्रैल 2023 से 19 मई 2023 तक।

💥 इस साधना में हनुमान चालीसा एवं संकटमोचन हनुमनाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें। आत्म-परिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी ⇒ प्रेम गली अति सांकरी… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “प्रेम गली अति सांकरी”।)  

? अभी अभी ⇒ प्रेम गली अति सांकरी? श्री प्रदीप शर्मा  ? 

क्या प्रेम का राजमार्ग भी होता है ! क्या हम ऐसा नहीं कर सकते,राजमार्ग पर प्रेम करें,और पतली गली से निकल जाएं।

दिल के बारे में खूब बढ़ा चढ़ाकर कहा जाता है,;

बंदा परवर, थाम लो जिगर

बन के प्यार फिर आया हूं।

खिदमत में, आपकी हुज़ूर

फिर वही दिल लाया हूं।।

प्रेम दिल से किया जाता है,या मन से,इसमें थोड़ी उलझन हो सकती है,मतांतर भी हो सकता है लेकिन दिल का क्या है,आज इसे दिया,कल उसे दिया। कभी टूट गया,कभी तोड़ा गया। हर बार इसे फिर जोड़ा गया। लेकिन मन में तो बस एक ही छवि बसी रहती है ;

तुम्हीं मेरे मंदिर तुम्हीं मेरी पूजा

तुम्हीं देवता हो, तुम्हीं देवता हो।।

हम आज दिल की नहीं,सिर्फ मन की बातें करेंगे। उस मन की बात,जिसमें सिर्फ प्रेम का वास है। मन से प्रेम,सड़कों पर नहीं होता, कुंज गलियों में ही होता है। अब यह भी क्या बात हुई ;

जिस गली में तेरा घर ना हो बालमा

उस गली से हमें तो गुजरना नहीं

मीराबाई को तो गलियन में गिरधारी ही नजर आते थे,इसलिए वह लाज के मारे छिप जाती थी। और जब दुनिया उनके और कृष्ण प्रेम के बीच आती थी तो वे निराश होकर कह उठती थी ;

गली तो चारों बंद हुई

मैं हरि से मिलने कैसे जाऊं।।

गोपियों का प्रेम भी अजीब था। उन्होंने अपने कन्हैया को मन में बसा लिया था और दिन रात बस कृष्ण की माला जपा करती थी। कृष्ण निष्ठुर थे,फिर भी गोपियों का हाल जानते थे। जो ज्ञान उन्होंने कालांतर में अर्जुन को दिया,वहीं ज्ञान गोपियों को देने के लिए अपने ज्ञानी मित्र उद्धव को गोपियों के पास बृज में भेज ही दिया।

ज्ञानी उद्धव गोपियों को ज्ञान की महिमा बता रहे हैं,कर्म की महत्ता गिना रहे हैं, और गोपियां एक ही बात पर अड़ी हुई हैं, उधो, मन न भए दस बीस। केवल   एक ही था,जो तुम्हारा श्याम सुंदर चुराकर ले गया। चोरी और सीना जोरी। और तुम हमें निर्गुण ब्रह्म का ज्ञान बांटने चले आए।

तुम्हें लाज नहीं आती।।

बेचारे उद्धव की हालत तो उद्धव ठाकरे से भी अधिक गई गुजरी हो गई। वे बेचारे निर्गुण ब्रह्म को टॉप गियर में ले जाएं,उसके पहले ही गोपियां उन पर चढ़ाई कर देती हैं। तुम्हारा ज्ञान का रास्ता हमारे पल्ले नहीं पड़ता। उद्धव ! क्या तुम इतना भी नहीं जानते कि प्रेम की गली इतनी संकरी होती है कि इसमें कोई दूसरा समा ही नहीं सकता। जहां कृष्ण के प्रति प्रेम है,वहां तुम कितने भी ज्ञान और वैराग्य के डंके बजाओ,तुम्हें no entry का बोर्ड ही लगा मिलेगा। निर्गुण ब्रह्म के लिए प्रवेश निषेध। यह गली अत्यधिक संकरी है। इसलिए अपना ज्ञान का टोकरा वापस ले जाओ,और श्री कृष्ण से जाकर कह दो ;

तुम हमें भूल भी जाओ

तो ये हक है तुमको

हमारी बात और है कृष्ण !

हमने तो बस तुमसे,

निष्काम प्रेम किया है।।

इस संसार में हम अपने प्रिय परिजनों को दिल से प्यार करते हैं। कोई भी छोटा बच्चा नजर आता है,उसे उठाकर सीने से लगा लेने का मन करता है। प्यार बांटने की चीज है। लेकिन यह भी सच है कि प्रेम की एक पतली गली भी है हमारे मन में,जिसमें केवल एक ही समा सकता है।  आपके मन में कौन है,आप जानें,हमने तो बस उस गली का नाम प्रेम गली रखा है।

वह एकांगी है और वह रास्ता केवल उस निर्गुण निराकार ब्रह्म के पास जाता है,जिसे गोपियां कृष्ण प्रेम कहती हैं। प्रेम में भेद बुद्धि नहीं रहती। जग में सुंदर हैं दो नाम चाहे कृष्ण कहो या राम।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – पुस्तक चर्चा ☆ “नासै रोग हरे सब पीरा” का बागेश्वर धाम संत पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री जी महाराज द्वारा लोकार्पित” ☆ ज्योतिषी पं. अनिल पाण्डेय ☆

💐 “नासै रोग हरे सब पीरा” का बागेश्वर धाम संत पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री जी महाराज द्वारा लोकार्पित” 💐 ज्योतिषी पं. अनिल कुमार पाण्डेय ☆

ज्योतिष के प्रकाण्ड विद्वान आसरा ज्योतिष के संस्थापक पं. अनिल कुमार पाण्डेय जी की सद्य प्रकाशित पुस्तक ‘नासै रोग हरे सब पीरा’ का बागेश्वर धाम संत पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री जी महाराज द्वारा दिनांक 28 अप्रैल 2023 को रात्रि 8 बजे सागर मध्य प्रदेश में एक भव्य कार्यक्रम में लोकार्पण हुआ।

ज्योतिषाचार्य पं अनिल कुमार पाण्डेय

पं.श्री अनिल पाण्डेय जी ने सर्वाधिक नवीन दृष्टि से विभिन्न ग्रंथो के संदर्भ तथा उद्धरण देते हुये गोस्वामी तुलसी रचित श्री हनुमान चालीसा के शब्द शब्द की समीचीन व्याख्या की है। संयोग से ई-अभिव्यक्ति द्वारा इस पुस्तक को श्रृंखलाबद्ध प्रकाशित किया गया था जिसे प्रबुद्ध पाठकों का भरपूर स्नेह व प्रतिसाद प्राप्त हुआ।  

ई-अभिव्यक्ति परिवार द्वारा ज्योतिषाचार्य पं अनिल कुमार पाण्डेय जी को  ‘नासै रोग हरे सब पीरा’ की सफलता के लिए मंगलकामनाएं 💐

“नासै रोग हरे सब पीरा” पर श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के विचार — 

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

☆ पुस्तक चर्चा ☆  कौन सो संकट मोर गरीब को जो तुमसे नहीं जात है टारो.. ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

रामचरित मानस के सुन्दर काण्ड के महा नायक भगवान हनुमान से गोस्वामी तुलसीदास कहलवाते हैं-

‘प्रात लेहि जो नाम हमारा-तेहि दिन ताहि न मिले अहारा’,

यह श्री हनुमत चरित्र में विनम्रता की पराकाष्ठा है. विश्व भर में जहां भी हिन्दू धर्म के मतावलंबी हैं, वे दिलों में भगवान श्री हनुमान जी को संकट मोचक के रूप में स्मरण करते विद्यमान बनाये रखते हैं. हमारी अवधारणा के अनुसार श्री हनुमान जी सदा जीवंत हैं. जहां कहीं श्री रामकथा होती है, भगवान हनुमान वहां पहुंच जाते हैं, एक भक्त की तरह. वे स्वयं अपनी भक्ति की जगह अपने आराध्य प्रभु श्रीराम और माता सीता की भक्ति करने वालों पर प्रसन्न हो जाते हैं. भगवान हनुमान अपने अनुयायियों का कोई अलग वर्ग नहीं बनाते, वरन वे अपने भक्तों सहित अपने स्वामी श्रीराम की भक्ति में निमग्न रहते हैं। स्वामी- सेवक की ऐसी अनूठी मिसाल विश्व साहित्य में अन्यत्र दुर्लभ है. गोस्वामी तुलसी दास, श्री हनुमत चरित्र के माध्यम से ‘स्वामी- ‘सेवक’ संबंधों की यह गहन मीमांसा कर, हमें निरभिमान, विनम्र सेवा भाव की शिक्षा देते हैं. हनुमत कृपा को निराभिमानी सच्चे भक्त हमेशा से अनुभव करते रहे हैं, यही कारण है कि जगह जगह विशाल, भव्य, महाकाय हनुमत मूर्तियों की स्थापना होती जा रही हैं और हनुमान भक्तों की संख्या निरंतर बढ़ती जा रही है.

भगवान विष्णु के ही कृष्णावतार में श्री कृष्ण ने गोवर्धन पर्वत अपनी अंगुली पर उठा लिया था, और ‘गिरिधारी’ नाम से हम भगवान का जप करते हैं किन्तु विनम्र सेवा भावी श्री हनुमंत चरित्र में हम पाते हैं कि भगवान राम के परम सेवक श्री हनुमान, शेषावतार श्री लक्ष्मण को शक्ति लगने पर उनके उपचार हेतु रात्रि के अल्प समय में संजीवनी पर्वत को न केवल धारण करते हैं वरन उसे उठाकर, उड़ाकर ले आते हैं किन्तु कोई उन्हें ‘गिरिधारी’ नहीं कहता. वे संकटमोचक के रूप में जाने जाते हैं. क्योंकि भगवान सबके संकट निवारण करते हैं किन्तु स्वयं भगवान पर आये संकट का निवारण करने का श्रेय श्री हनुमान जी को है.

भगवान हनुमान वीरता के पर्याय हैं। वे अकेले ही लंका में घुसकर रावण की सभा में अपनी प्रभुता स्थापित करने में सक्षम हैं. वे लंका दहन कर सकते हैं, वे अक्षय कुमार का भी क्षय अर्थात वध करते हैं.  वे सबके बड़े से बड़े संकट क्षण में दूर कर देते हैं किन्तु वे ही हनुमान जी स्वयं भगवान राम और मां भगवती जानकी के सम्मुख एक ऐसे भोले भाले वानर के रूप में प्रतिष्ठित होने में ही प्रसन्नता अनुभव करते हैं जो अपने सारे शरीर पर केवल इसलिये सिंदूर मल लेते हैं, क्योंकि मां जानकी भगवान राम के लिये अपनी मांग में सिंदूर भरती हैं. श्री हनुमान मोती की माला के हर मोती को तोड़कर देखना चाहते हैं कि उसमें भगवान राम, उनके स्वामी की छवि है या नहीं क्योंकि वे स्वयं तो ‘हृदय राखि कौशल पुर राजा के विनम्र भाव से ही ‘प्रबिसि नगर कीजै सब काजा’, करने में भरोसा रखते हैं.

गीता में भगवान यही तो उपदेश देते हैं तुम सब कुछ मुझे समर्पित कर तटस्थ भाव से कार्य करो फिर मैं तुम्हारे समस्त कार्य कर दूंगा. इस तरह ‘हनुमान चरित्र’, गीता ज्ञान को आत्मसात करने का सबसे बड़ा उदाहरण है. 

वीरता में ही नहीं, कूटनीति, मंत्रणा, सही सलाह और मार्गदर्शन देने में भी प्रभु श्री हनुमान का चरित्र अति विलक्षण है। सुग्रीव जब वर्षा ऋतु बीत जाने पर भी श्री राम की सीता जी की खोज में सहायता करने की बात भूल रहे थे, तब उसे हनुमान जी ही सही समय पर सही मित्रवत सलाह देते हैं और सुग्रीव भगवान श्री राम के साथ हो लेता है.  विभीषण को भगवान श्रीराम की शरणागति में लाने की कूटनीति और विभीषण को प्रेरणा हनुमंत चरित्र की विशेषता है.

श्री हनुमान सर्वमुखी प्रतिभा संपन्न हैं, क्योंकि उनके साथ स्वयं प्रभु श्रीराम हैं.  वे संजीवनी लाते हुये भरत से तार्किक संवाद करने की प्रतिभा रखते हैं. वे लंका की राजसभा में अकेले ही प्रभु श्री राम का नाम गुंजायमान करने का साहस, तर्क और प्रतिभा रखते हैं. लेकिन वे ही हनुमान जी अपने स्वामी श्री राम के सम्मुख जमीन पर आसन ग्रहण करते हैं.  वे प्रभु के सोते-जागते पल-पल उनके साथ  समर्पित सेवा भावना से सजग रहते हैं.

रामचरित मानस में वर्णित चरित्र के आधार पर  हनुमान जी की भगवान श्रीराम जी से भेंट तब हुई, जब प्रभु सीता माता की खोज में वन वन भटक रहे थे,  अपनी विनम्र सेवा एवं सर्वोन्मुखी प्रतिभा तथा वीरता से जल्दी ही हनुमान जी न केवल श्री राम के वरन मां सीता के भी अतिप्रिय बन गये और श्रीराम पंचायतन में प्रभु श्री राम के परिवार का हिस्सा ही बन गये. भगवान हनुमान के बिना श्रीराम चरित और चित्र अधूरा सा लगता है.

ज्योतिष के प्रकाण्ड विद्वान आसरा ज्योतिष के संस्थापक पं. अनिल पाण्डेय जी विद्युत मण्डल के सेवाकाल में मेरे वरिष्ठ रहे हैं. वे परम हनुमत भक्त हैं. मुझे स्मरण है कि जो भी उनसे किसी कार्यवश मिलता था तो वे पर्स में रखा जा सकने योग्य श्री हनुमान चालीसा उसे भेंट करते थे. उन्होने न जाने कितनी प्रतियां हनुमान चालीसा इस तरह बांटी हैं.  आज कोई हनुमान चालीसा की व्याख्या मैनेजमेंट के नये सिद्धांतो के अनुरूप कर रहा है तो कोई इसमें जीवन मंत्र ढ़ूंढ़ रहा है. किन्तु विश्व भ्रमण कर चुके, अपनी शासकीय सेवा में भांति भाति के व्यापक अनुभव कर चुके पं.श्री अनिल पाण्डेय ने एक सर्वाधिक नवीन दृष्टि से विभिन्न ग्रंथो के संदर्भ तथा उद्धरण देते हुये गोस्वामी तुलसी रचित श्री हनुमान चालीसा के शब्द शब्द की समीचीन व्याख्या की है, जो पुस्तकाकार प्रकाशित हो गई है, यह उन पर श्री हनुमत कृपा ही है. मेरी अनंत स्वस्ति कामनायें सदैव इस किताब के पाठको, प्रकाशक और लेखक पं अनिल पाण्डेय जी के साथ हैं.

ओम श्री हनुमते नमः.

पुस्तक चर्चा – श्री विवेक रंजन श्रीवास्तव

ए २३३, ओल्ड मीनाल रेजीडेंसी, भोपाल ४६२०२३

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares