मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोगराच तो शेवटी… लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? जीवनरंग ?

☆ मोगराच तो शेवटी… लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे ☆

“काय गं …!!! कालच तुला खडसावून सांगितले, की बंगल्याच्या भिंतीला पण स्पर्श करायचा नाही… तरी तू आज परत आलीस फुलं मागण्यासाठी…???”

ती कळकट मळकट फ्रॉक घातलेली ८-९ वर्षांची मुलगी अत्यंत  केविलवाणा चेहरा करून करुणेच्या स्वरात आवाजात कापरं भरत बोलली  “….. ताय वंजळभरच पायजेती, द्या की व. तुमच्या झाडाला हायती बी फुलं म्हणून मागत्या. इथं कुठंच येवढी फूलं नायत, फकस्त तुमच्याच बंगल्यात हायत.” …. ती आठ नऊ वर्षांची मुलगी काकुळतीला येऊन अनघाला तिच्या बंगल्यातील मोगऱ्याची फुले मागत होती.

“नाही म्हणून सांगितले ना. निघ इथून…” असं म्हणून अनघा बंगल्यात गेली. ‘कुठून कुठून येतात फुलं मागायला. काय फुकट येतात का.’ असं एकटीच बडबडत होती

तेवढ्यात तिचा नवरा राघव आला. “काय झालं, कोणाला बडबडतेस ? इथे तर कोणीच दिसत नाही ?”

“अहो गेले आठ दिवस झाले, एक मुलगी मोगऱ्याची फुलं मागायला येतेय. देवाला पाहिजेत म्हणे. एवढीच हौस आहे तर घ्यायची ना विकत.”

राघव – “अनघा !!! अगं ती फुलं तर मागतेय. द्यायचीस ना. तसंही मोगरा किती लगडलाय फुलांनी.”

अनघा अभिमानाने म्हणाली – “हो, फुलं खूप लागली आहेत, पण त्याच्या मागे माझे किती कष्ट आहेत. अख्ख्या गल्लीत कुणाच्याच बंगल्यात झाडाला एवढी फुलं नाहीत, फक्त माझ्या दारात. आणि खूप निगा राखावी लागते झाडांची, फुकट नाहीत येत. खत, वेळेत कटिंग, पाणी, आणि तुम्हाला माहिती आहे ना मी रोज पूजा करताना देवाला भरपूर फुलं वाहते. सगळ्या देवांच्या फोटोंना ताजे हार घातल्याशिवाय पूजा केल्याचं समाधान नाही मिळत मला.”

राघव – “अगं एक फूल वाहिलं तरी देवाला पुरेसं असतं. दिलीस चार फुलं त्या मुलीला तर जाणार आहेत देवाच्याच पायाशी. तू वाहिली काय अन् त्या छोट्या मुलीने. देव तर एकच आहे.”

अनघा – “ओ तुमचं लॉजिक तुमच्या जवळ ठेवा. माझे कष्ट आहेत त्यामागे.”

“अनघा – एक सांगू !!!! असं दारातून रिकाम्या हाताने पाठवू नये कुणाला आणि काय फुलं तर मागतेय ना .. तिने कुठे तुला जेवण किंवा पैसे मागितले. आपल्याकडे आहे त्यातलं थोडं द्यायला मनही तेवढं मोठं असावं लागतं. अनघा !!!! तुला समजवायचं काम केलंय, ऐकायचं का नाही ते तूच ठरव.”

अनघा – “बरं !!! उद्या आली मागायला तर देईन चार फुलं, तेही तुम्ही सांगता म्हणून..”

राघव – “बरं.  पण जरा प्रेमाने दे. रागे नको भरू त्या छोट्या मुलीला.”

अनघा – “हं !”

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी दारात ती मुलगी उभीच. राग आलेला, पण राघवसाठी देते. ” ये मुली, थांब तिथंच, देते फुलं.” छोट्या पिशवीत पंधरा वीस फुलं तोडून टाकली. तिच्याजवळ जात म्हटलं ..

” उद्यापासून यायचं नाही फुलं मागायला !!!!!”

ती मुलगी — अडखळत अडखळत–  ” ताय, ते आठ दिस फुलं पायजेती. देशीला का ? “

अनघा – “आठ दिवस रोज !! कशाला ??”

” ते कोपऱ्यावर महादेवाचं देऊळ हाय बघा, तिथं द्याला मायला पायजे व्हती.” तिची नजर खाली पायाकडं, चेहऱ्यावर निर्विकार भाव. ती बोलली. आवाज खूप लाघवी, हळू. ” माय देवाला बोलली हाय ‘आठ दिस ताजी फुलं पायाशी घालीन’.”

अनघा – (मनात )- ‘म्हणजे नवस’. तिला जोरात ओरडत…  ” देवाला अर्पण करायला मागून फुलं… घे जा ना विकत, देवळाच्या बाहेर मिळतात पाच दहा रुपयांत.”

मुलीचा चेहरा खाडकन उतरला, “ताय ….ते… पैसं रोज…… एवढं..”

अनघा – ” कळलं !! नाहीयेत ना पैसे. बोलताच कशाला गं मग असं देवाला. आपल्या कुवतीनुसार बोलावं.”

ती काहीच न बोलता फुलांची पिशवी घेऊन खाली मान घालून निघून गेली.

अनघाला मात्र आपण जरा जास्तच बोललो ह्याची सल मनाला लागली. उद्या येईल का ? नाही येणार बहुतेक. किती बोललो, ते ही फुलांसाठी. आज ताजी असणारी फुलं नाही तोडली तर उद्या सुकून कोमेजून तर जाणार आहेत. तिनं खिडकीतून बाहेर पाहिलं, मोगराही थोडा नाराजच दिसला. ‘जावू दे, उद्याचं उद्या पाहू’ असं म्हणत ती कामाला लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी दारात ही बया उभीच. अनघाला मनात हुश्श वाटलं, ‘आली बाई आज परत….’

“ताय…….” तिने हाक मारली.

अनघा – “हो आले, देते फुलं. कुठं राहतेस गं ?”

ती – “गावाच्या बाहेर पडकी साळा हाय, तिथ.”

अनघा- “घरात कोण कोण आहे ??

ती – ” माय, बा, मोठी बहण, दोन भाव. आज्जी बी हाय पण ती लाम गावी असत्या.”

अनघा – “बरं बरं. घे फुलं आणि निघ.”

ती – “जी ताय.”

आठ दिवस न चुकता ती मुलगी फुलं न्यायला येत होती. आपण खूप मोठं काम करतोय, दानधर्म वगैरे… अनघाच्या चेहऱ्यावर किंचितशी अभिमानाची लकेर उमटली. स्वतःशी हसत अनघा म्हणत होती – 

‘रोज फुकट फुलं दिली, देवही नकळत आपल्यावर खूष असणारच. मी फुलं दिली म्हणून तिच्या आईचा नवस पूर्ण झालाय, नाहीतर तिला विकत फुलं घेणं शक्यच नव्हतं ‘ —

एकटीच बोलत होती इतक्यात राघव तिथे आला. “काय एकट्याच गालात हसताय .”

अनघा – ” काही नाही रे राघव, ती मुलगी फुलं न्यायला आठ दिवस न चुकता येतं होती, पण आता ह्या दहा बारा दिवसात कुठे आलीच नाही.”

राघव – “अगं आता कशाला येईल, तिला आठच दिवस फुलं हवी होती ना ! तसंही तुला तिचं फुलं मागणं आवडतं नव्हतं.”

अनघा – “अरे पण एकदा परत येवून आभार तरी मानायचे तिने माझे. लोकं केलेले उपकार असे विसरतात, म्हणून कुणाला काही देवू नये. तू सांगितलेलं ना म्हणून न चिडचिड करता फुलं दिली आठ दिवस. रोज ….”

राघव हसला. 

अनघा – “काय झालं ??”

राघव – “काही नाही.”

तेवढ्यात बाहेरून हाक आली–  “….ताय व ताय….!”

हा तर त्या मुलीचा आवाज. दोघंही बाहेर आली तर दारात ती मुलगी उभी.

अनघा – ” काय आज पण फुलं पाहिजेत का ? आधीच सांगते, नाही देणार. आज फुलं थोडी कमीच लागली आहेत. मला देवपूजेला पाहिजेत.”

ती – “…फुलं नको ताय ……ते…. हे….. हे….”  हातात मळकट फडकं होतं, आणि  त्यात काहीतरी गुंडाळलेले.

अनघा – “काय…. .ते….. हे……”

ती – ” ताय !!!! ते मोठी बहण बाळतपणाला आल्या. ‘ यवस्थित  बाळ हु दे ‘ म्हणून माय नवस बोलल्याली माहदेवाला. तुम्ही फुलं दिली, आयचा नवस पुरा झाला. परवा दिशी मुलगा झाला बहयणीला. यवस्थित हाय सगळं. माझा बा दगड फोडतो आणि मुरत्या बनीवतो. ताय, बा नं हे बनीवलं हाय तुमच्यासाठी. ‘तुमचं उपकार जन्मभर नाय इसरणार’ –बा बोललाय आसं… अन् माय म्हणली ‘ कुणाचबी काय फुकट घेव नी. आपल्या परीनं परत द्याव.’ म्हणून हे…. घ्या……”

अनघाने ते मळकट फडकं हातात घेतलं. उघडून पाहिलं. अतिशय सुरेख, सुंदर, रेखीव अशी, दगडापासून घडवलेली विठ्ठल रखुमाईची मूर्ती. किती तेजस्वी, आनंदी, सात्विक आहेत दोन्हीही मूर्ती. अनघा आनंदून गेली.

अनघा – त्या मुलीला म्हणाली,  “अगं ऐक !!!”

पण ती मुलगी नव्हती तिथं. पटकन मूर्ती देवून निघूनही गेली. अनघाचे आभाराचे दोन शब्द ऐकायलाही नाही थांबली ती. 

अनघाचे डोळे पाण्याने डबडबले आपण किती खुजे, संकुचित… एका क्षणात खूप लहान ठरलो हिच्यापुढे. सारा गर्व, अभिमान एका झटक्यात गळून पडला…… एखाद्याची कुवत ठरवणारे आपण कोण, का हिने न बोलता आपल्याला आपली कुवत दाखवली……  

मोगऱ्याचा सुगंध साऱ्या अंगणात दरवळला. आज तो रोजच्यापेक्षा जास्त टवटवीत बहरलेला वाटला……

आपण पण अहंकाराला गंगेत अर्पण करावं … मग बघा संसाराचा मोगरा पण कसा बहरतो ते….. !!!

लेखक – अनामिक

प्रस्तुती : मेघ:शाम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “एकसष्ट दिव्यांच्या प्रकाशात !!!” — एका पत्नीचे मनोगत – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? मनमंजुषेतून ?

☆ “एकसष्ट दिव्यांच्या प्रकाशात !!!” — एका पत्नीचे मनोगत – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके 

त्याची एकसष्टी जवळ आलीये आणि मी त्यादिवशी काहीतरी करू शकते, याचा त्याला अंदाज होताच. हल्ली सरप्राईज देण्याची नाहीतरी पद्धतच पडून गेली आहे. परंतू याला काही सरप्राईज द्यायचं म्हणजे महाकठीण. तो सेवानिवृत्त होण्याआधी ठीक होतं. सतत खात्याच्या कामात गर्क. अंगावर सरकारी आणि अधिकाराची वर्दी होती पण त्याचा रुबाब दिसायचा तो प्रशिक्षक म्हणून. त्यामुळे पायाला भिंगरी बांधलेली असायची त्याच्या. मी ही माझ्या नोकरीत असल्याने दोन डोळे शेजारी पण भेट नाही संसारी अशातली गत होती. पण आता मात्र असं नव्हतं. आणि मला त्याला त्याच्या एकसष्टीचं सरप्राईज द्यायचंच होतं. पण हा सतत जेथे जातो तेथे तू माझा सांगातीच्या चालीवर सोबत. कदाचित इतक्या वर्षांची भरपाई करण्याचा त्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असावा.

याची एकसष्टी म्हणजे एक आंतरराष्ट्रीय कट शिजवण्यासारखी भानगड. आंतरराष्ट्रीय यासाठी की चिरंजीव आणि सूनबाई दूर तिकडे परदेशात. घरातल्या एकाला तरी माझ्या मनसुब्याची कल्पना असावी म्हणून आधी सूनबाईला कारस्थानात सहभागी करून घेणे आले. कारण तिच्याकडे सून आणि लेक अशा दुहेरी भूमिका आहेत. आम्हांला मुलगी नाही म्हणून सुनेलाच मुलगी मानायचं याचं खूप आधीपासून ठरलेलं होतंच. आणि इतक्या वर्षांत सूनबाई आमच्या लेकीच्या भुमिकेत अगदी फिट्ट बसल्यात. पण ही लेक आणि आमचा लेक या दोघांनाही त्यांच्या कामामुळे इथे येणे अशक्य होतं. त्यामुळे सर्व नियोजन करण्याची जबाबदारी माझ्याच खांद्यांवर येउन पडली. शहरात कार्यक्रम करण्यातला सर्वांत मोठा टप्पा म्हणजे कार्यालय मिळवणे. शिवाय ते जवळचे,सोईचे आणि परवडणारेही असावे लागते. शिवाय तारीख विशिष्ट असल्याने इतर कार्यक्रमांसारखी कार्यालयाची उपलब्ध तारीख बघून दिवस ठरवणे चालणारे नव्हते. कार्यालय बघायला म्हणून घराबाहेर निघाले तर साहेब सोबत यायला तत्परतेने तयार झाले. काहीतरी कारण सांगून मी एकटीच बाहेर पडले!

याचा मित्रपरिवार अनेक ठिकाणी विखुरलेला. त्यामुळे त्यांचेशी संपर्क साधणे जिकीरीचे होतेच. शिवाय ती मंडळी याच्या सतत संपर्कात असतात. त्या सर्वांना याची जन्मतारीख तोंडपाठ आहे कारण ही तारीखच लक्षात राहिल अशी आहे. पण यातील कोणी फितुर झाला तर गडबड होणार, हे नक्की!

मुळात असा कार्यक्रम करणे हे त्याच्या बुज-या स्वभावात बसेल की नाही,ही मोठीच शंका होती. कारण जबाबदारी आणि रुबाबाचा सरकारी रंगाचा गणवेश असूनही साहेबांनी तो कधी मिरवला नाही कामाव्यतिरिक्त. प्रामाणिकपणा, तत्वनिष्ठा आणि अंगभूत सौजन्यशीलतेच्या हल्ली दुर्गुण भासणा-या गुणांमुळे तो प्रसिद्धीपासून आणि लाभांपासून चार हात दूरच राहिलेला माणूस. तीस पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत फक्त एकदाच प्रमोशन मिळाले त्याला यावरूनच सर्व काही लक्षात यावे खरे तर. पण त्याची त्याला कधी ना खंत ना खेद. लहानपणी म्हणजे तो चौथीला असताना त्याच्या बाबांनी त्याच्याकडून भगवद गीता तोंडपाठ करून घेतलेली होती. पुढे त्यातील काही श्लोकांचं त्याला विस्मरण झाले थोडेसे. मात्र ‘कर्मण्ये वाधिकारस्ते’ तो विसरला नाही. जे काम मिळाले ते जीव ओतून करावे हा एक अर्थ त्याला उमगला होता. त्यामुळे त्याला मानणारा मोठा मित्रपरिवार त्याने जमवून ठेवला होता. त्यामुळे कार्यक्रमाला बोलवायचे तरी कुणाकुणाला असा सवाल उभा राहिला. पाचशे दोनशे दीडशे वरून गाडी सव्वाशेवर स्थिर केली. पाच पंचवीस इकडे तिकडे होतातच.

अगदी मुलीच्या लग्नाची आमंत्रणे करावीत अशी यादी तयार केली लपून छपून. कारण काहींचे संपर्क क्रमांक माझ्यापेक्षा त्यालाच जास्त ठाउक असतात. पण काहीतरी कारण सांगून,त्याच्या फेसबुकमध्ये घुसखोरी करून ते क्रमांक मी मिळवले….त्या सर्वांना कार्यक्रमाला यायचेच होते. पण इतक्या लांबून कार्यक्रमाच्या आधी एक दिवस इथे येणा-या मित्रांनी चुकून इथल्या त्यांच्या कॉमन मित्रांकडे भंडाफोड न केला म्हणजे मिळवली!

जावयाचा कार्यक्रम आणि त्याच्या माहेरच्या म्हणजे माझ्या सासरकडील लोकांना नाही कळवलं तर कसं जमेल? त्यात हा त्यांचा अतिशय लाडका जावई. जावई कम लेक. म्हणजे जावई कमी आणि लेकच जास्त. माझ्या माहेरच्या आणि सासरच्या पैकी एकाला जरी वगळलं तर अवघड झाले असते…भावनिकदृष्ट्या! जितकी सेवा त्याने त्याच्या वडिलांची केली तितकीच काळजी माझ्या घरच्यांचीही घेतली आजवर. अहो, नोकरी मुंबईत आणि घर पुण्यात. त्याच्या वडिलांच्या पायांना रोज तेल लावून मालिश करून द्यायचा याचा शिरस्ता. बाबांची मालिश करून देणं वैद्यकीयदृष्ट्या अत्यावश्यक तर होतेच. एखादा पगारी माणूस नेमून हे काम खरे तर त्याला करून घेता आले असते…. पण मुलाचे कर्तव्य म्हणून तो हे काम न कंटाळता करत असे. त्यामुळे साहेब भल्या पहाटे रेल्वेने मुंबापुरीला प्रयाण करायचे आणि रात्री उशीरा पुण्यात परतायचे…असा क्रम थोडाथोडका नव्हे…कित्येक वर्षे चालला. याला भक्त पुंडलीक म्हणावं की श्रावण बाळ असा प्रश्न पडायचा.

माझ्या नणंदेचे म्हणजे याच्या बहिणीचे यजमान अकाली निवर्तले तेंव्हा याने मला ठामपणे सांगितले…दीदीची आणि तिच्या कुटुंबाची जबाबदारी आता आपली! आणि त्याने ती आजवर निभावली आहे. कार्यक्रमात दीदीच्या पोरींना म्हणजे भाच्यांना आणि भावाच्या मुलींना सहभागी न करून घेउन कसे भागणार? या भाऊरायाच्या सोहळ्याला बहिण आणि मामाश्रीच्या कार्यक्रमाला भाच्या, आणि पुतण्या तर हव्यातच. म्हणून मग सव्वाशेची निमंत्रण यादी दिडशेच्या घरात सहजच गेली. शिवाय गाणे शिकलेल्या भाचीबाई सूत्रसंचालनासाठी सूत्रे हाती घेण्यास उत्सुक होत्याच. त्यामुळे दीप-प्रज्वलन,स्वागत गीत, प्रार्थना,आभारासह सूत्रसंचलन इत्यादीचा प्रश्न परस्पर मिटला. फ्लेक्स,आमंत्रण पत्रिका, फुलांची सजावट,केक, एकसष्ट दिवे,जेवणाचा मेन्यू फोटोग्राफर,फुलांच्या पायघड्या,रंगमंच इत्यादी शेकडो बाबी पटापट फायनल झाल्या….त्याची माझ्यावर नजर होतीच… काही तरी डाव सुरू आहे हे ओळखायला त्याला वेळ नाही लागला. पण निश्चित डाव काय हे मात्र मी गुलदस्त्यातच ठेवू शकले.

– क्रमशः भाग पहिला 

शब्दांकन व प्रस्तुती : श्री संभाजी बबन गायके.

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जगद्गुरू आद्य श्री शंकराचार्य  – भाग – २ … ☆ सौ. यशश्री वि. तावसे ☆

सौ. यशश्री वि. तावसे

? इंद्रधनुष्य ?

☆ जगद्गुरू आद्य श्री शंकराचार्य  – भाग – २ … ☆ सौ. यशश्री वि. तावसे ☆

(गावातील लोकांना जेव्हा सुखाचार्यांकडून सत्य समजले,  की ते  तीन ब्राह्मण, तर, साक्षात् ब्रह्मा, महेश व परशुराम होते. त्यावेळी गावातील लोकांना आचार्यांचा अधिकार समजला.) इथून पुढे —-

ज्या काशीमध्ये महर्षी व्यासांनी आचार्यांना आशीर्वाद दिला होता त्याच काशी पासून आचार्यांनी प्रस्थानत्रयीवर प्रवचने सुरू केली.  ही प्रवचनें ऐकून , काशीच्या विद्वानांची  मने तृप्त होऊ लागली.  आचार्य, खूप सोप्या भाषेत, तसेच सामान्य मनुष्यालाही, सहज समजेल अशी भावपूर्ण स्तोत्रे रचू लागले.  आचार्यांनी वैदिक सनातन संस्कृतीचे पुनरुज्जीवन केले.  यात अआध्यात्मिक दृष्ट्या जीवन जगण्याचा मार्ग दाखवला होता. त्यात भक्ती मार्ग,  ज्ञानमार्ग, योग मार्ग इत्यादींचा समावेश होता.  

एक अतिवृद्ध,  जरा जर्जर  व्यक्ती,  पहाटेच्या वेळी ओट्यावर बसून डु व कृं असे क्षीण स्वरात उच्चारण करीत,  पाठ करीत होती.  आचार्यांना त्या वृद्धाची दया आली. क्षणाचाही विलंब न लावता आचार्यांनी,

भजगोविंदं भज गोविंदम

भज गोविंदम मूढमते – हे स्तोत्र रचले.

त्या वृद्धाला, तो, व्याकरणाचा पाठ थांबवायला लावला व हरिनामाचा गजर करण्याचा उपदेश दिला.

बाबा रे, हे .. तुझे व्याकरण पाठ करणे काही तुला सद्गती देणार नाही. तुझ्यावर आता मृत्यू केव्हा झडप घालील, हे माहिती नाही अशा प्रकारे झटून हा व्याकरण पाठ करण्याऐवजी, तू भगवन्- नामस्मरण कर. त्यामुळे तुला सद्गती तरी प्राप्त होईल.  

आनंदित होऊन त्याने आचार्यांना विचारले,  आपण केलेल्या उपदेशाच्या स्तोत्राचे नाव काय बरे?  

तेव्हा त्याच्या तोंडाचे बोळके झालेले पाहून,  आचार्य हसत हसत म्हणाले, चर्पटपंजरी चर्पट म्हणजे खमंग. पंजरी म्हणजे कुटून बारीक केलेले खाद्य. 

अशा प्रकारे, आचार्य, सामान्य मनुष्यांना भक्ती मार्ग दाखवत होते,  तर विद्वानांना ब्रह्मसूत्राच्या भाष्याने प्रभावित करून परमार्थी बनवत होते. वास्तविक पाहता हे स्तोत्र आपल्यालाही कसे लागू आहे याचा विचार करून आपणही गेयम गीता नाम सहस्त्रम हा आचार्यांचा उपदेश आचरणात आणलाच पाहिजे. 

प्रयागमध्ये,  त्याकाळी वैदिक परंपरेमध्ये अनेक पंथ निर्माण झाले होते. उदाहरणार्थ जैन, बौद्ध, मांत्रिक, तांत्रिक, कर्मठ, भैरव, शैव, वैष्णव इत्यादी.  त्या त्या पंथाच्या संस्थापकांनी घालून दिलेले तारतम्य लोप पावलेले होते. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करताना सहिष्णुतेऐवजी कर्मठपणावरच भर दिला जात होता.  जो तो आपल्या पंथाचा अभिमान उराशी बाळगून इतर पंथांना, कनिष्ठ समजत होता. सहकाराची जागा द्वेष, मत्सर व स्वार्थ यांनी जी घेतली होती,  तेच आचार्यांना नाहिसे करायचे होते. आचार्यांनी  शिकवलेल्या धार्मिक सहिष्णुतेमुळे, समाजात एकजूट होऊ लागली. त्यामुळे जैन, बौद्ध, शैव व वैष्णव इत्यादी विविध पंथातील लोकांनी आचार्यांना आपले गुरु मानले.  कारण आचार्य आपले मत कोणावरही लादत नसत.  तर समोर असलेल्या व्यक्तीचे मत-परिवर्तन करीत असत.  घराघरातील वाद नष्ट होऊन एकोपा नांदावा म्हणून आचार्यांनी पंचायतन पूजेची संकल्पना,  भक्ति मार्गातील लोकांना सांगितली.  ती अत्यंत यशस्वी झाली. कारण त्यामुळे भ्रातृभाव वाढत गेला.  अद्वैत तत्त्वज्ञानातील  अति- सूक्ष्म तत्त्वे सुद्धा आचार्यांनी सुलभ पद्धतीने स्पष्ट केल्यामुळे ज्ञानमार्गाचे कट्टर पुरस्कर्ते सुद्धा, आचार्यांना सत्पुरुष मानत.  कारण त्यांच्या प्रवचनांमुळे त्यांना शांती मिळत असे.  केवळ नाम संकीर्तनाने अध्यात्म कसे साध्य होऊ शकते,  ते सामान्य माणसाला समजावून सांगू लागले.   त्यामुळे अगणित लोक त्यांची दीक्षा घेऊ लागले.  जैन व बौद्ध पंथातील लोक सुद्धा त्यांना गुरुस्थानी मानू लागले.  जसे सोन्याचा कोणताही दागिना वितळवला की त्याचे निखळ सोनेच होते.  त्याप्रमाणे जीवाचे जीव-पण लोपले,  की,  तो भगवत स्वरूपच होतो.  त्यालाच अद्वैत म्हणतात.  आचार्यांची अशी शिकवण होती की,  आपले वेगळेपण विसरून भगवंतांशी एकरूप होणे म्हणजेच अद्वैत.  

आचार्यांची विजय पताका चारी दिशांना फडकू लागली. प्रभाकरा सारख्या  श्रीवल्ली येथील सुविख्यात मीमांसकानेही,  आचार्यांचे शिष्यत्व पत्करले.  त्यामुळे सर्वसामान्यच काय,  पण वेदांतीही आचार्यांकडे येऊन,  त्यांना आपले मोक्षगुरू मानून,  दीक्षा घेऊ लागले.  प्रयागच्या सर्व परिसरात आचार्यांचा जयघोष, आकाशात घुमू लागला.  घरोघरी आचार्यांच्या प्रतिमा स्थापन होऊन,  त्यांनी रचलेली विविध स्तोत्रे भक्ती भावाने गायली जाऊ लागली.  वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन झाले.  अनेक बुद्धपंथीय,  वेद प्रमाण मानून,  आचार्य जे सांगतात ते प्रमाण मानू लागले.  

कौशांबी नावाच्या गावात आचार्यांनी मृत बालकाला जिवंत केले. देवीची स्तुती गायली,  त्यामुळे हे बालक जिवंत झाले. 

भट्टपाद नावाच्या, मंडन मिश्रांच्या गुरूंनी आचार्याने सांगितले की तू महिष्मती नगरीत जा. तिथे माझा मेव्हणा मंडन मिश्र आहे.  त्याला वादात हरवून घे.  म्हणजे तू सर्वत्र विजयी होशील व धर्म स्थापना होईल.  महिष्मती नगरीत मंडन मिश्रांचे खूप मोठे प्रस्थ होते.  त्यांच्या अनेक पाठशाळा होत्या. पोपटांचे असंख्य पिंजरे होते.  ते पोपट सदा तत्त्व चर्चा करायचे. आचार्य सर्व शिष्यांसहित मंडन मिश्रांचे घरासमोर आले. मंडन मिश्रांचे वडिलांचे वर्षश्राद्ध असल्याने  कोणालाही आत सोडायचे नाही अशी रक्षकांना आज्ञा होती. आचार्यांनी आपल्या सर्व शिष्यांना भिक्षाटनासाठी गावात पाठवून दिले. आचार्य स्वतः योग मार्गाने मंडन मिश्रांच्या घरात,  ब्राह्मणांच्या पंक्तीत जाऊन बसले. मंडन मिश्रांना संन्याशांबद्दल राग असल्याने,  त्यांनी आचार्यांबरोबर खूप वाद घातला.  शेवटी आचार्यांनी त्यांना सांगितले, की तुमचे गुरु कुमारीलभट्टपाद यांचे सांगण्यावरून मी येथे आलो आहे.  ते आता या जगात नाहीत. ते ऐकून मंडन मिश्रांना फार वाईट वाटले. झाल्या गोष्टीबद्दल त्यांनी क्षमा मागितली. व चर्चा म्हणजेच वाद विवाद करण्याची तयारी दाखवली.  निर्णय, हा .. मंडन मिश्रांची पत्नी भारतीदेवी यांनी करावा असे ठरले.  भारती देवी अत्यंत विद्वान व वेदज्ञ होत्या.  धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषांच्या त्या अधिकारी होत्या.  पण वाद विवाद करण्यात प्रत्यक्ष आपला पती व दुसरीकडे मानसपुत्र शंकर आहे, त्यामुळे त्या स्तब्ध होत्या.  मंडन ने स्वतः अनुमती दिली व भारती देवींनी त्या पदाचा स्वीकार केला. वादविवाद ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. भारती देवींनी दोन हार आणले.  दोघांच्या गळ्यात घातले.  ज्यांच्या गळ्यातील हार प्रथम सुकेल,  तो हरला असे समजावे असे ठरले.  एक, दोन, तीन, चार असे वीस दिवस सलग चर्चासत्र चालूच होते.  आचार्य बोलत होते.  मंडन मिश्रा हे ऐकता ऐकता अंतर्मुख झाले.  त्यांची जवळजवळ समाधीच लागली.  संपूर्ण शरीरभर, उष्णता निर्माण होऊ लागली.  शरीरातील पापांना तेथे राहणे असह्य होऊ लागले. श्वासाची उष्णता वाढून,   हळुहळू संपूर्ण माळ कोमेजू लागली.  मंडन एकदम शांत झाले. भारती देवी पुढे आल्या व म्हणाल्या की जरी माझ्या पतीची माळ कोमेजली असली,  तरी चर्चा मी पुढे चालवणार आहे. आचार्य जोपर्यंत माझ्या प्रश्नांना समर्थक उत्तर देणार नाहीत, तोपर्यंत माझे पती संन्यास घेणार नाहीत. भारती देवी म्हणाल्या की आचार्य,  या सर्व चर्चेत आपण फक्त तीनच पुरुषार्थ विचारात घेतले.  चौथा पुरुषार्थ काम राहिला आहे. मला याबाबत चर्चा करायची आहे.  आचार्य म्हणाले,  माते तू म्हणते तसेच घडेल.  मी नवव्या वर्षी संन्यास घेतला आहे.  त्यामुळे काम या पुरुषार्थाशी माझा दूरान्वयानेही संबंध आला नाही.  मला सहा महिन्यांचा कालावधी द्या. मी सहा महिन्यांचे आत कधीही येईन. 

– क्रमशः भाग दुसरा. 

(संदर्भ ग्रंथ…. “जगद्गुरु श्रीमद् आद्य शंकराचार्य “ – लेखक… श्री.अविनाश महादेव नगरकर.)

© सौ. यशश्री वि. तावसे

पुणे

दूरभाष क्र.  9552906006

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “विचारमोती…” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “विचारमोती…”   ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

जी गोष्ट मनात आहे,

 ती बोलण्याची हिम्मत ठेवा,

आणि…

जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे,

ती समजून घेण्याची क्षमता ठेवा.

 

चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून,

उदास राहण्यापेक्षा,

अनोळखी लोकात राहून,

आनंदी राहिलेलं कधीही चांगलं.

 

परिस्थितीप्रमाणे

बदलणारी माणसे, सांभाळण्यापेक्षा,

परिस्थिती “बदलविणारी” माणसे सांभाळा.

आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही.

 

माणूस कोणत्याही वस्तूला, फक्त दोनच वेळा महत्व देत असतो.

एक तर ती मिळायच्या अगोदर, किंवा ती गमावल्याच्या नंतर.

 

कोणी तुमचा सन्मान करो, अथवा ना करो,

तुम्ही तुमचे कर्तव्य करत, चांगले काम करत रहा.

नेहमी लक्षात ठेवा…

करोडो लोक झोपेत असतात,

म्हणून सूर्य आपला विचार

कधीही बदलत नाही.

सूर्योदय हा होतोच…

 

बुद्धी सगळ्यांकडे असते,

पण तुम्ही चलाखी करता की, इमानदारी,

हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असतं…

चलाखी चार दिवस चमकते,

आणि इमानदारी,

आयुष्यभर…

 

दुसऱ्याच्या मनात, निर्माण केलेली निर्मळ व स्वच्छ जागा

हीच खरी सर्वात महाग,

व अनमोल जागा…

कारण…

तिचा भाव तर करता येत नाहीच,

पण एकदा जर का ती गमावली,

तर पुन्हा…

प्रस्थापित करता येत नाही…!!

 

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ व्हाय नाॅट आय?… सुश्री वृंदा भार्गवे ☆ परिचय – सौ. अक्षता गणेश जोशी ☆

सौ. अक्षता गणेश जोशी

(सौ. अक्षता गणेश जोशी आपलं ई-अभिव्यक्तीवर हार्दिक स्वागत)

अल्प परिचय

शिक्षण – बी. ए. (इतिहास) आवड – वाचनाची आवड आहे… ऐतिहासिक वाचन आवडते… वाचलेल्या पुस्तकावर अभिप्राय लेखनचा प्रयत्न करते…

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ व्हाय नाॅट आय?… सुश्री वृंदा भार्गवे ☆ परिचय – सौ. अक्षता गणेश जोशी ☆

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव – व्हाय नॉट आय?

लेखिका – वृंदा भार्गवे.

पृष्ठ संख्या – २५२

अमेय प्रकाशन

मूल्य – २५०₹

जन्मतः माणसाला सुदृढ, निरोगी,धडधाकट आयुष्य मिळणे म्हणजे दैवी देणगीच म्हणावी लागेल. ती टिकवणे आपल्याच हातात आहे असे जरी आपल्याला वाटत असले तरी एखादी व्यक्ती त्याला अपवाद असू शकते. वयाच्या सातव्या वर्षी डॉक्टरांच्या एका चुकीमुळे पाणीदार डोळ्याच्या देखण्या देवू ची (देवकी) दृष्टी गेली.याचा परिणाम त्वचा,दात, केस,वर्ण या सगळ्यावर झाला.एवढं सगळं होऊन ही तिने आणि तिच्या आईने जिद्द सोडली नाही…

सत्य घटनेवर आधारित असणारी ही आहे “उजेडयात्रा”… कादंबरी,कथा,अनुभव कथन कशात ती बसू शकेल याची कल्पना नाही. ही संघर्ष आणि जिद्दीची प्रेरणादायी कथा आहे हे मात्र नक्की!!

“अंधारावर उजेड कोरणाऱ्या मायलेकीची कहाणी…”

लेखिकेने अतिशय सुरेख शब्दात घडलेल्या घटनांचे वर्णन केले आहे. घटना डोळ्यासमोर उभ्या राहतात. डोळ्यांत पाणी तरळते…देव सुद्धा एखाद्याची किती परीक्षा घेत असतो…की मागच्या जन्मी चे पाप-पुण्या चा तर्क वितर्क आपण जोखत असतो… देवू च्या यातना सोसण्याला परिसीमा नाहीच…पण त्याहीपेक्षा तिचे स्वावलंबी होणे जास्त मनाला वेधून जाते…

तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन जातीबाह्य विवाह केला.दोन्ही बाजूंनी तसा विरोधच…सासरे आणि नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे एम.ए. करून इतिहासात बी.एड.केले. नवरा पुढे एम.फिल.कर असे म्हणत होता पण तिने शिक्षण थांबवून शिक्षकीपेशा स्वीकारला…

पंधरा वर्षाच्या संसारात दोन मुली मोठी रेणू 10 वर्षांची आणि धाकटी देवू (देवकी)साडेतीन वर्षांची.

काही तासापूर्वी तिच्याशी बोलत असणारा तिचा नवरा ज्याचे पोट थोडे दुखत असल्याचे निमित्त होऊन अकस्मातच गेला…ती आणि तिच्या मुली एकदमच बिचाऱ्या झाल्या. तिची शाळेतील नोकरी होती तरीही…

नवरा गेल्या नंतर सासरी होणारी मानसिक कुचंबणा,निराशेचे वातावरण तिला तिच्या मुलीचे भविष्य घडवण्यासाठी नको होते म्हणून मुलींना घेऊन ती माहेरी आली. बहिणीचे लग्न झाले होते, भावांनीही वेगळे संसार थाटले होते.लहानपणी भावा-बहिणींमधले प्रेम, परस्परांसाठी जीव तुटणे ही ओढ कोठे तरी हरवली आहे असे जाणवले…तिच कमतरता आई वडिलांच्या नजरेत जाणवली… सर्वार्थाने ती एकटी पडली होती. सगळीकडून तिला व्यवहारिकतेचे अनुभव येऊ लागले.तिने लक्षात ठेवले ते माणसाचे तत्वज्ञान… माणस जपायला पाहिजेत पण माणस वेगळी आणि नातलग वेगळे हे समजलेच नाही…

आपल्याला सगळे झिडकारत आहेत असे वाटू लागले.विरंगुळा काय तो दोन मुलींचा.रेणू अगदी नवऱ्यावर देखणी शांत,खळीदार हसणं… बाबा गेल्यावर उदास-गप्प गप्प रहायची, आता आपले हक्काचे नाही याची समज तिला लवकर आलेली.रेणूचा धाकटी म्हणजे देवू वर विलक्षण जीव. देऊ चे डोळे म्हणजे तिचा अँसेट… अतिशय बोलके,मोठाले डोळे, काळ्याभोर पापण्या प्रचंड मोठया,आकाशीसर पाश्र्वभूमीवर काळ्या रंगाची बुब्बुळ… दोघीना रंगाचे भारी वेड…

तिला स्वतःला आर्टिस्ट व्हायचे होत पण एक वेगळंच आयुष्य तिच्या वाट्याला आलेलं…पण दोन्ही मुलीना मात्र त्यांच्या आवडीने जगू द्यायचे अस ठरवलेलं पण हे स्वप्न नियतीने पुन्हा उध्वस्त केलेले… ९ ऑक्टोबर १९९३ ला देवू ला अचानक सर्दी खोकला  झाला. त्यातच ताप  आला.अंगावर काढण्यापेक्षा बालरोगतज्ज्ञ यांच्या कडे घेऊन गेली.

त्या रस्त्याने त्या दवाखान्यात जात नव्हती तर ती तिच्या गोंडस,सुंदर पाणीदार डोळ्याच्या मुलीच्या आयुष्याची शोकांतिका लिहायला चालली होती.

औषध घेऊन ही ताप कमी येत नव्हता.घसा लालसर झाला शरीरावर ही डाग दिसू लागले,एक डोळा लाल झाला. पुन्हा डॉक्टरानी तेच औषध सुरू ठेवा असे सांगितले. तापाचे प्रमाण पुन्हा कमी जास्त होत गेले.पण डोळे मात्र लाल, त्यातून येणारा पांढरा स्त्राव,पूर्ण शरीरावर भयंकर रँश.वरचा ओठ पूर्णपणे सुजलेला…एका विचित्र संकटाची चाहूल तर नाही ना…

रक्ताची तपासणी करून आणून द्या मगच समजेल… तोपर्यंत सेपट्रन हे औषध चालू ठेवा…हे औषध अगदी ओळखीचे झालं होत. तपासणी मध्ये मलेरिया झाले एवढंच समजले. डॉक्टरानी ताबडतोब अँडमिट करायला सांगितले. 26 तारखेला डॉक्टरांनी देवू चा नवाच आजार जाहीर केला.”STEVENS JOHNSON SYNDROME”  तिला तर समजलेच नाही. काळजी करू नका.ट्रीटमेंट बदलू असे डॉक्टर म्हटत. देवू च्या सर्वांगावर पडलेले लाल डाग आता काळ्या डागात परावर्तित झालेले.”ममा, रोज नवा फुगा तयार होतो बघ…”ती फोडाला फुगा म्हणायची… आता तिच्या डोळ्यांकडे पाहवत नव्हते.ऍडमिट केल्यापासून सलायन,अनेकदा ब्लड काढण्यासाठी सुया टोचल्या जायच्या.पण देवू एकदाही रडली नाही. हे सगळं सहन करण्याच्या पलीकडे होते.देवू साठी आणि देवू च्या आईसाठी… या सगळ्यात तिला तिच्या धाकट्या दिराची मदत झाली.वेगवेगळे डॉक्टर यायचे ते सांगतात ते ऐकायचे त्यांच्या दृष्टीने तिची वेगळी केस असायची… अगदी हैद्राबादला मध्ये तिला दाखवले एक तर डोळ्यात आलेला कोरडेपणा आणि गेलेली दृष्टी… प्रत्येकाची वेगळी औषधे आणि त्यांचे चार्जेस….

(देवू च्या सुरुवातीच्या आयुष्यात जे वेदनादायी प्रसंग आले ते मला लिहणे सुद्धा त्रासाचे झाले जे याही पेक्षा तिने कोणावरही राग,दोष न देता सहन केले…खरच काय म्हणावे तिच्या सहनशक्तीला…)

या काळात तिला नवऱ्याची प्रकर्षाने उणीव भासली कारण तो फार्मासिस्ट होता…त्याच्या मुळे तिच्या देवू वरचे संकट तरी टळले असते… पण ती आठवण सुद्धा व्यक्त करायला सवड नव्हती….या दिवसात तिच्या सोबत तिचे आई वडील असूनही नव्हते आणि नसूनही होते.तिच्या मात्र सारख्या दवाखान्याच्या चकरा असायच्या.देवू कोणतेही आढे वेढे न घेता जायची.ज्यावेळी तिला कधीच दिसणार नाही हे कळाले तेव्हा निरागस मुलीने आईची समजूत घातली आणि तिलाच धीर दिला,”ममा तू रडतेस, मी चालेन हं… पण मला आता गाड्या दिसणार नाहीत… मी त्रास देणार नाही, शहण्यासारखी वागेन…तू मला काठी आणून दे.”  या सगळ्यात तिचा धाकटा दीर आणि धाकटा भाऊ यांची साथ मिळाली.आणखी बऱ्याच लोकांचे सहकार्य मिळाले ते सहानभूती म्हणून नाही तर देवू आणि तिच्या आईची जिद्द बघून…काळकर काका फ्रान्सहून येताना देवू साठी प्रिझर्व्हेटिव्ह फ्री टीअर ड्रॉप्स च्या ट्यूब आणल्या(डोळ्यातला ओलावा कायम टिकून ठेवण्यासाठी) एकही पैसा घेतला नाही, वावीकर बाईनी ब्रेल किट च हातात सोपवलं,देवू ला ब्रेल शिकवायची…

माणूसवेडी देवू कोणी आले की तिला प्रचंड आनंद व्हयचा.स्पर्शा चे ज्ञान तिला आता चांगले अवगत झाले होते.घरातल्या घरात ती सहज वावरू लागली… गप्प राहणाऱ्यातली मुळीच नव्हती ती.देवू ला आईच्या शाळेतच घातले. आई तिला पुस्तक मोठ्या ने वाचून दाखवत असत.एकक शब्द आणि त्याचा अर्थ…तिचे मार्क नेहमी छान असायचे…तिची हुशारी बघून इतर मुलांमध्ये न्यूनगंड येईल म्हणून तिचे प्रत्येक विषयातले मार्क कमी केले. हे कळल्यावर देवू च्या आईला खूप वाईट वाटले.पण त्या काही बोलू शकल्या नाहीत…पण काही शिक्षक असे ही होते की तिला योग्य मार्गदर्शन करत तिच्यावर त्यांचा जीव होता कारण ती हुशार आणि बुद्धीमान म्हणून नव्हे,तर तिला प्रत्येक गोष्ट आत्मसात करण्याची मनस्वी ओढ होती. असे चांगले वाईट अनुभव आले तरी त्या दोघी पुन्हा नव्याने सज्ज होत…तिच्या रेणू दि ची ही साथ खूप मोलाची होती.

देवू सातवीच्या वार्षिक परीक्षेत चारी तुकड्या मधून पहिली आली. सेमी इंग्लिश मिडीयम च्या वर्गासाठी निवडलेल्या मुलांच्या यादीत तिचा पहिला क्रमांक होता.तिची स्मरण शक्ती अफलातून होती.स्वतःचे वेळापत्रक स्वतः आखून त्याप्रमाणे पूर्तता झाली पाहिजे हा तिचा कटाक्ष असे.दहावी ला तिला 86% मार्क मिळाले. देवू च्या यशात नँब ने प्रचंड सहाय्य केले.तिथल्या लोकांनाही देवू चे वेगळे जाणवले असावे.फोन केल्यावर,”बोला देवू ची आई”काय हवं नको ते विचारायचे. दक्षिणेतल्या अंदमान सफरीसाठी महाराष्ट्र राज्यातून काही अपंग विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली त्यात देवू चा ही समावेश होता.ती व्यवस्थित जाऊन आली ही…

देवू ने आर्ट्स ला ऍडमिशन घेतले. इकॉनॉमिक्स हा विषय तिला खूप आवडतो.शाळेतल्या प्रमाणे तिला कॉलेजमध्ये मैत्रिणी ही खूप छान मिळात गेल्या… “10 वी 12 वी त पहिलं येणं नाही ग एवढं क्रेडीटेबल… मला माणसांसाठी, त्यांच्या सुखासाठी काहीतरी करायचंय,त्यासाठी भरपूर शिकू दे ग मला’असे ती म्हणयची. देवूला संशोधनात रस आहे… जे तिला करावेसे वाटते त्याची पूर्तता झाली असे लेखिकेने दाखविले आहे…

या सगळ्या यशात देवू ला तिला आई, बहीण आणखी खूप जणांची साथ लाभली असली तरी तिची अभ्यासू वृत्ती, जिद्द, स्वतः चे विचार मांडण्याचे धाडस,सगळ्याच गोष्टीत शिस्तबद्धता…या तिच्या गुणांचे योगदान खूप महत्वाचे आहे…

हे प्रेरणादायी पुस्तक वाचनीय आहे.

धन्यवाद!!

संवादिनी – सौ. अक्षता जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # 03 – निरर्थक सब संधान  हुए… ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे।  आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – निरर्थक सब संधान  हुए।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 03 – निरर्थक सब संधान  हुए… ☆ आचार्य भगवत दुबे ✍

लक्ष्य न कोई सधा

निरर्थक सब संधान हुए

 

योजनाएँ तो बनीं

किन्तु विपरीत दिशाएँ थीं

भ्रूणांकुर के पहले ही

पनपीं शंकाएँ थीं

ऊषा की बेला में

दिनकर के अवसान हुए

 

उड़ने से पहले कट जाती

डोर पतंगों की

भुनसारे से खबरें आतीं

हिंसा, दंगों की

पलने से पहले ही

सपने लहूलुहान हुए

 

बच्चों के मुख से गायब है

अरुणारी लाली

नागफनी के आतंकों से

सहमी शेफाली

क्रूरताओं के रोज

चाटुकारी जयगान हुए

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 79 – जीवन के हैं रंग निराले… ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है  एक भावप्रवण  रचना “जीवन के हैं रंग निराले…। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 79 – जीवन के हैं रंग निराले…

जीवन के हैं रंग निराले।

कहीं अँधेरे कहीं उजाले।।

 

घूम रहा कोई कारों में,

कहीं पगों में पड़ते छाले।

 

रहता कोई है महलों में,

किस्मत में लटके हैं ताले

 

प्रजातंत्र भी अजब खेल है,

जन्म कुंडली कौन खँगाले।

 

नेताओं की फसल उगी है,

सब सत्ता के हैं मतवाले।

 

कहने को समाज की सेवा,

दरवाजे पर कुत्ते पाले।

 

गंगोत्री से बहती गंगा,

राहों में मिल जाते नाले।

 

 ©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – भ्रम ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – भ्रम ??

तो तुम देख चुके

शब्दों में छिपा

मेरा आकार,

और मैं नादान,

निराकार होने का

भ्रम पाले बैठा था…!

(कवितासंग्रह ‘यों ही’ से)

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ श्री हनुमान साधना 🕉️

अवधि – 6 अप्रैल 2023 से 19 मई 2023 तक।

💥 इस साधना में हनुमान चालीसा एवं संकटमोचन हनुमनाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें। आत्म-परिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ यात्रा संस्मरण – यायावर जगत # 08 ☆ गुरुद्वारों की मेरी अद्भुत यात्रा – भाग ४ पौंटा साहब  ☆ सुश्री ऋता सिंह ☆

सुश्री ऋता सिंह

(सुप्रतिष्ठित साहित्यकार सुश्री ऋता सिंह जी द्वारा ई- अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए अपने यात्रा संस्मरणों पर आधारित आलेख श्रृंखला को स्नेह प्रतिसाद के लिए आभार। आप प्रत्येक मंगलवार, साप्ताहिक स्तम्भ -यायावर जगत के अंतर्गत सुश्री ऋता सिंह जी की यात्राओं के शिक्षाप्रद एवं रोचक संस्मरण  आत्मसात कर सकेंगे। इस श्रृंखला में आज प्रस्तुत है आपका यात्रा संस्मरण – मेरी डायरी के पन्ने से…गुरुद्वारों की मेरी अद्भुत यात्रा… का भाग चार – )

☆ साप्ताहिक स्तम्भ –यात्रा संस्मरण – यायावर जगत # 08 ☆  

? मेरी डायरी के पन्ने से… गुरुद्वारों की मेरी अद्भुत यात्रा – भाग ४ – पौंटा साहब  ?

(वर्ष 1994)

अपने जीवन के कुछ वर्ष चंडीगढ़ शहर में रहने को मिले। यह हमारे परिवार के लिए सौभाग्य की बात थी क्योंकि यह न केवल एक सुंदर,सजा हुआ शहर है बल्कि हमें कंपनी की ओर से कई प्रकार की सुविधाएँ भी उपलब्ध थीं।

बर्फ पड़ने की खबर मिलते ही हम सपरिवार ड्राइवर को साथ लेकर शिमला के लिए निकल पड़ते थे। चूँकि हिमाचल की सड़कें पहाड़ी हैं हम जैसे लोगों के लिए वहाँ गाड़ी चला पाना संभव ही नहीं होता। कई होटल भी हैं तो रहने की भी अच्छी व्यवस्था हमेशा ही होती रही। संभवतः यही कारण है कि हिमाचल का अधिकांश दर्शननीय स्थान देखने का हमें सौभाग्य मिला।

अब स्पिति हमारे बकेटलिस्ट में है!

हम सभी को श्वेतिमा से लगाव है अतः श्वेत बर्फ से ढकी चोटियाँ हमें मानो पुकारती थीं और हम अवसर मिलते ही रवाना हो जाते थे।

चंडीगढ़ के निवासी ऐसे ट्रिप को अक्सर शिवालिक ट्रिप नाम देते हैं क्योंकि यह शिवालिक रेंज के अंतर्गत पड़ता है।

शिमला, कसौली, कुफ्री,चैल, तत्तापानी कालका,सोलन, परवानु आदि सभी स्थानों के दर्शन का भरपूर हमने आनंद लिया।

इस वर्ष हम कुल्लू मनाली के लिए रवाना हुए। चंडीगढ़ से 120 कि.मी. की दूरी पर डिस्ट्रिक्ट सिरमौर है। यहाँ एक प्रसिद्ध गुरुद्वारा है जिसका नाम है पौंटासाहब। हमने सबसे पहले यहीं अपना पहला पड़ाव डाला। यद्यपि दूरी 120 किलोमीटर की ही थी पर फरवरी के महीने में अभी भी कड़ाके की ठंडी थी, सुबह ओस और धुँध के कारण गाड़ी शीघ्रता से आगे नहीं बढ़ पा रही थी। रास्ते भी घुमावदार थे। अँधेरा भी जल्दी ही हो जाने के कारण हमने उस रात वहीं रुकने का मन बनाया।

पौंटा साहब का असली नाम था पाँव टिका। गुरु गोविन्द सिंह जी एक समय इस स्थान पर अपने घोड़े पर सवार होकर अपनी सेना के साथ यहाँ उतरे थे। उन दिनों वे सिक्ख धर्म का प्रचार कर रहे थे। मुगलों द्वारा भारी मात्रा में धर्म परिवर्तन ने ज़ोर भी पकड़ रखा था। ऐसे समय अपने देशवासियों को एकत्रित करना और समाज की सुरक्षा के लिए तैयार रहना उस समय के देशवासियों की बड़ी ज़िम्मेदारी थी। गुरु गोविंद सिंह जी जो सिक्ख सम्प्रदाय के दसवें गुरु थे, इस तरह घूम-घूमकर लोगों को जागरूक करने और सिक्ख धर्म का प्रचार करने निकलते थे।

गुरु गोविंद सिंह जी कहीं भी अधिक समय तक नहीं रुकते थे। पर इस स्थान पर वे चार वर्ष से अधिक समय तक रुके रहे। जिस कारण इस स्थान को पाँव टिका कहा गया। अर्थात गुरु के पाँव अधिक समय तक टिक गए। इसका रूप बदला और यह पौंटिका कहलाया। फिर समय के चलते इसका नामकरण हुआ और यह पौंटासाहब कहलाया।

उन दिनों सिरमौर के राजा मेदिनी प्रकाश थे। वे सिक्ख समुदाय के साथ एक मित्रता का हाथ बढ़ाना चाहते थे। उन्होंने ही गुरुगोविंद सिंह जी को सिरमौर में आने का आमंत्रण दिया था।

गुरुगोविंद सिंह के साथ उनकी बड़ी फौज भी हमेशा साथ चलती थी। सभी के रहने के लिए एक उत्तम स्थान आवश्यक था। राजा मेदिनी प्रकाश ने विशाल स्थान घेरकर एक सुरक्षित किले की तरह इस स्थान का निर्माण कराया, साथ ही भीतर एक विशाल गुरुद्वारा भी बनवाया। यमुना के तट पर बसा यह गुरुद्वारा आज जग प्रसिद्ध है।

यह स्थान न केवल सिक्ख सम्प्रदाय का धार्मिक स्थल है बल्कि इस स्थान का ऐतिहासिक महत्त्व भी है। यहीं पर लंबे अंतराल तक रहते हुए गुरु गोविन्द सिंह जी ने दशम ग्रंथ की रचना की थी। उनका पुत्र अजीत सिंह का जन्म भी यहीं हुआ था।

यहाँ सोने की एक पालकी है जिसे भक्तों ने गुरुद्वारे को उपहार स्वरूप में दिया था।

गुरुद्वारे के भीतर दो मुख्य स्थान हैं जिन्हें तलब असथान और दस्तर असथान कहते हैं। असथान का अर्थ है स्थान। तलब असथान में कार्यकर्ताओं को तनख्वाह बाँटी जाती थी। दस्तर असथान में पगड़ी बाँधने की रस्म अदा की जाती थी।

गुरुद्वारे के पास ही माता यमुना का मंदिर स्थापित है। यहाँ एक बड़ा हॉल है जहाँ कवि सम्मेलन आयोजित किया जाता था। इसी स्थान पर गुरु गोविंद सिंह जी के रहते हुए कविता लेखन की स्पर्धा का आयोजन भी किया जाता था। यहाँ एक संग्रहालय भी है जिसमें कई पुरातन वस्तुएँ रखी गई हैं। गुरुगोविंद सिंह जी की कलम भी यहाँ देख सकते हैं। उनके द्वारा उपयोग में लाई गई कई वस्तुएँ यहाँ देखने को मिलेंगी।

 यहाँ बड़ी संख्या में न केवल सिक्ख आते हैं बल्कि अन्य पर्यटक भी दर्शन के लिए आते रहते हैं। यहाँ आकर एक बात बहुत स्पष्ट समझ में आती है कि ईश्वर एक है, एक ओंकार। बड़ी मात्रा में लंगर की यहाँ सदा व्यवस्था रहती है। सब प्रकार के लोग,सब जाति के,वर्ग के लोग एक साथ बैठकर लंगर में प्रसाद का आनंद लेते हैं। यहाँ दिन भर बड़ी संख्या में लोगों की भीड़ रहती है।

यमुना के तट पर होने के कारण प्रकृति का सुंदर दृश्य सब तरफ देखने को मिलता है।

आज इस शहर में कई प्रकार के उद्योग प्रारंभ किए गए हैं। रहने के लिए कई बजेट होटल भी उपलब्ध है।

पौंटासाहब कुल्लू से 360 किमी की दूरी पर है। रास्ते में अगर आप रुकते हुए ढाबों के भोजन का आनंद लेते चलें तो दर्शन करने के लिए भी पर्यटक यहाँ रुकते जाते हैं। रास्ते में आपको शॉल बनने के छोटे- छोटे कुटीर उद्योग करते लोग मिल जाएँगे।

यहाँ के लोगों का स्वभाव मिलनसार है। वे पर्यटकों की अच्छी देखभाल और आतिथ्य करते हैं। उनका स्वभाव भी सरल ही होता है। आपको यहाँ अधिकतर लोग रास्ते के किनारे उकड़ूँ बैठकर बतियाते दिखाई देंगे। सभी फुर्सत में दिखते हैं। शहरों – सी भागदौड़ यहाँ नहीं दिखती। इनके छोटे- बड़े पत्थर के घर आकर्षक दिखाई देते हैं। हर घर में खूब लकड़ियाँ स्टॉक करके रखी जाती हैं। इसका उपयोग ईंधन के रूप में होता है। ठंडी का मौसम लंबे समय तक चलने के कारण वे लकड़ियाँ जमा करते रहते हैं।

यहाँ के लोग भात तो खाते ही हैं साथ में कमलगट्टे का यहाँ प्रचुर मात्रा में उपयोग होता है। आप जैसे – जैसे गाँवों की पतली सड़को से गुजरेंगे आपको हींग के पौधों की खेती दिखाई देगी। जो हाल ही में प्रारंभ की गई है।

पौंटासाहब का दर्शन करके हम रोहतांग पास तक पहुँचे। वहाँ एक खास बात देखने को मिली कि ऊपर चलने से पहले ही वे पर्यटकों के हाथ में कपड़े की थैली पकड़ाते हैं ताकि उनके पर्यावरण की रक्षा हो सके और कचरा न फेंके जाएँ। यह एक बहुत बड़ी बात थी जो समय से बहुत पहले ही देखने को मिली। यह सतर्कता अभी चंडीगढ़ में भी नहीं थी।

हमारे परिवार का यह सौभाग्य ही रहा कि हमें दूसरी बार पौंटासाहब गुरुद्वारे का दर्शन करने का अवसर मिला। इस बार हम देहरादून से वहाँ पहुँचे थे। देहरादून से पौंटासाहब पचास कि.मी की दूरी पर स्थित है।

यह नानक साहब की असीम कृपा है कि हमें भारत के मुख्य गुरुद्वारों के दर्शन का सौभाग्य मिलता ही रहा है।

वाहे गुरु, वाहे गुरु बोल खालसा

तेरा हीरा जन्म अनमोल खालसा

© सुश्री ऋता सिंह

फोन नं 9822188517

ईमेल आई डी – ritanani [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 41 ⇒ बहारों, मेरा जीवन भी संवारो… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “बहारों, मेरा जीवन भी संवारो”।)  

? अभी अभी # 41 ⇒ बहारों, मेरा जीवन भी संवारो? श्री प्रदीप शर्मा  ? 

जब हमारे अंदर खुशी होती है, तो जिंदगी में मानो बहार ही आ जाती है। और अगर हमारा मन उदास हो, तो खिला गुलाब भी हमें आकर्षित नहीं कर पाता। क्या जैसा अंदर होता है, वैसा ही हमें बाहर भी प्रतीत होता है। क्या आप जानते हैं, बहार कैसी होती है।

कौन इंसान नहीं चाहता, वह हमेशा खुश रहे, उसकी ज़िंदगी में बहार आए। जो हमारे मन को प्रसन्न रखे, क्या वही बहार है। क्या हमारे अंदर ही बहार है, या बहार सिर्फ बाहर ही बाहर है, और हमारे अंदर सिर्फ सुनसान बियाबान है। ।

जब मौसम अंगड़ाई लेता है, हमारा मन मयूर भी नाच उठता है। गर्मी, बारिश और ठंड के पश्चात् ही तो वसंत का आगमन होता है। अमराई में आम बौरा जाते हैं, केसर की क्यारियां महकने लगती हैं। प्रकृति दुल्हन की तरह सजने लगती है। और जब यही अनुभूति हमारे अंदर भी प्रवेश कर जाती है, तो हमारे जीवन में भी बहार का आगमन हो जाता है।

तुम जो आये जिन्दगी में, बात बन गई। एक बार जब बात बन जाती है तो ऐसा लगता है मानो जीवन में बहार चली आई हो।

हमारा मन बहारों से बात करने लग जाता है। प्रकृति आपकी सखी, सहेली, महबूबा, प्रेयसी और न जाने क्या क्या बन जाती है। हम प्रकृति से कैसी कैसी उम्मीदें लगा बैठते हैं।

आने से उसके आए बहार, जाने से उसके जाए बहार। ।

किसी होटल में आप अधिकार से यह तो कह सकते हैं कि वेटर, एक कप चाय लाओ। लेकिन जब आप जब कभी रोमांटिक मूड में यह फरमाइश करते हो कि बहारों फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, तो बड़ी हंसी आती है।

आप चाहते हो कि हवाएं आपके लिए रागिनी गाये।

लगता है, बहार को आपने खरीद लिया है।

क्या बहार के बिना हमारा काम नहीं चल सकता।

प्रकृति हमारे सुख दुख की साथी है। वह हमारे साथ उठती है, हमारे साथ ही सोती है। हम हमेशा उससे अपना सुख दुख बांटते हैं। सुबह की ठंडी हवा हमें सुख देती है, सूरज की रोशनी ही तो हमारे लिए विटामिन डी है। हमने कई सुहानी शामें और रंगीन रातें इस प्रकृति के साये में ही तो गुजारी हैं। बहार है तो हम हैं, हम हैं तो बहार है। ।

ये बहारें ही हमें भूले बिसरे पल और अतीत की यादों में ले जाती हैं। छुप गया कोई रे, , दूर से पुकार के। दर्द अनोखे हाय, दे गया प्यार के। ऐसी स्थिति में बहार ही हमारा आलंबन होती है। क्या भरोसा कब कोई प्यार से पाला हुआ पौधा फिर जी उठे, जिंदगी में फिर से बहार आ जाए।

भले ही हमारे माता पिता ने हमें जन्म दिया हो, लेकिन अगर वास्तव में देखा जाए तो हम इस प्रकृति की गोद में ही तो पलकर बड़े हुए हैं। इसी मिट्टी में, हमारा जन्म हुआ है, इस मिट्टी में हम खेले हैं और इसी मिट्टी में हमें मिल जाना है। हमारे सारे उत्सव और त्योहार प्रकृति से ही तो जुड़े हैं। होली हो, दीपावली हो अथवा सक्रांति का पर्व, चांद, सूरज, नदी पहाड़, पत्र पुष्प और फल बिना सभी अनुष्ठान अधूरे हैं। बागों में अगर बहार है, तो हमारी ज़िंदगी में भी बहार है। प्रकृति ही तो हमारी वत्सला मां है।

नमस्ते सदा वत्सले मातृभूमि।।

    ♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares