मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ओढा… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

? जीवनरंग ?

☆ ओढा… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) 

ओढ्याची आपली नित्याची चुळबूळ चालू होती आणि म्हणूनच नदीची चिडचिड चालू होती. काठावरल्या वाढत्या इमारती आणि घटती शेती, त्यात पडणारा राडारोडा आणि आकसत चालेले अंग, अशी रोजची तक्रार ओढा नदीपाशी मांडत होता.

नदी बिचारी काय सांगणार? “अरे लेका तू निदान जिवंत तरी आहेस. माझे बाकीचे कित्येक ओढे तर मरून गेले.”  नदीने असे सांगितल्यावर मात्र ओढा थोडा वरमला. एवढे गेले, आपण अजून जिवंत आहोत या समाधानानेच त्याला हुरूप मिळाला.

त्यांचा हा संवाद चालूच होता की पावसाळा ऋतू आला. पावसाचे टपोरे थेंब अंगावर पडू लागले तसे दोघे खूष झाले. पाहता पाहता सरी वाढू लागल्या. ओढ्याचे वाढते पाणी नदीला धक्का मारू पाहू लागले. नदी चिडली,-   

“इतक्यात शेफारू नकोस हो. फार खळखळाट नको उगाच.”

ओढ्याचे मात्र वेगळेच चाललेले होते. आपल्या वाढत्या पाण्याने काठावरच्या लोकांची वाढणारी चिंता त्याला आनंद देत होती. थोडे पाणी काठाबाहेर आले की लोकांची उडणारी त्रेधातिरपीट पाहून तो खदखदून हसत होता, आणि आणखी जोमाने उसळत नदीस येऊन मिसळत होता. वर वर जरी नदी रागे भरत होती, चिडत होती तरी आतून मात्र त्याच्या या बाललीला पाहून सुखावत होती.

पावसाचा महिना दीड महिना पुढे सरकला, पण त्याने काही फार जोर धरला नाही. ‘आता आपण पुन्हा आटणार का? आपले पात्र आणखीनच आकसणार का?’ याची चिंता ओढ्याला सतावू लागली. नदीला हे दिसत होते पण तिच्या समोरचे प्रश्न याहून काही वेगळे नव्हते.

इतक्यात एके दिवशी भल्या पहाटेच पावसाच्या सरी सुरू झाल्या. एक नाही दोन नाही तीन नाही , चांगला  आठवडाभर पाऊस कोसळत होता. आता जिथे नदीचेच पात्र वेगाने वाढू लागले तिथे ओढ्याची काय कथा. नदीला जागा मिळेल तशी ती वाट काढत होती. ओढ्याला सामावून घेणे आता तिला अशक्य होऊ लागले, तशी ती त्याला मागे रेटू लागली.

इतक्यात धरणातून पाणी सोडणार याची चाहूल तिला लागली. आता आपले काय होणार, आपल्या भरवश्यावर आपल्या काठावर विसावलेल्या गावांचे काय होणार, वाटेत येणाऱ्या शहराचे काय होणार……  तिला सगळे कळत होते पण वळायला जागाच उरली नव्हती. धरणातून पाणी सोडू लागले तशी नदी उधाणली. आता ती कोणाचेच ऐकायला तयार नव्हती. वाट मिळेल तशी पसरत होती, वाटेत येईल ते उखडून टाकत होती.

तिचे असे हे रौद्ररूप पाहण्याची संधी ओढ्याला क्वचितच यायची. इकडे त्याचेही पाणी वाढत होते. कितीही जोर दिला तरी नदी त्याला दाद देत नव्हती, त्याचे पाणी सामावून घेत नव्हती. ओढ्याचे पाणी मागे हटू लागले तसे ते आजूबाजूच्या घरांमध्ये, इमारतींमध्ये घुसू लागले. रस्ते तर त्याने कधीच व्यापले होते, आता पुलांचीही काही खैर नव्हती. जीव मुठीत धरून काठावरचे लोक घर सोडत होते. जे जमेल ते सोबत नेत होते, जे उरले ते ओढा वाहून नेत होता.

पण यावेळी मात्र त्याला खूप दुःख होत होते. आपले पाणी नदी स्वीकारत नाही आणि आपण या वाड्या –  वस्त्यांमध्ये घुसत आहोत, याचा त्याला राग येत होता. काठावरल्या ज्या घरांचे संसार उभे राहताना ओढ्याने पाहिले होते, त्यांनाच आज खाली कोसळताना तो पाहात होता. हे सारे त्याला असह्य होत होते. पण करणार काय बिचारा? पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता. आणि त्याशिवाय त्याची किंवा नदीची पाणी पातळी कमी होणार नव्हती.

शेवटी पाऊस दमलाच. परमेश्वराने साऱ्यांच्याच प्रार्थना ऐकल्या बहुधा. आताशी धरणातून पाणी सोडणे बंद झाले. तशी नदी आधी संथ आणि मग शांत झाली. तिने ओढ्याला जवळ घेत चुचकारले, ” दमलास का रे? “, प्रेमाने विचारले. तो मात्र झाल्या विध्वंसाने आतून बाहेरून हादरून गेला होता. तो सावरला असला तरी त्याचा काठ अजून सावरला नव्हता. त्याची ओळखीची माणसे अद्याप परतली नव्हती. जी परतली होती त्यात ओळखीची सापडत नव्हती. या साऱ्याचा दोषी कोण याचे उत्तर त्याला सापडत नव्हते.

नदी मात्र यावेळी शांत होती. तिने जे पाहिले, सोसले, ते तिने ओढ्याला सांगितले असते, तर तो आणखीनच दुःखी झाला असता. म्हणूनच ती ओढ्याला कुशीत घेऊन शांत वहात राहिली.

पावसाळा सरला आणि हळूहळू ओढा पुन्हा आकसला. त्याला त्याच्या आकसण्याचे फारसे दुःख नव्हते. 

पण आजूबाजूची माणसे काहीच शिकली नाहीत याचे वाईट मात्र नक्कीच वाटत होते.

लेखक : म. ना. दे. (होरापंडीत मयुरेश देशपांडे)

C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७

+९१ ८९७५३ १२०५९  https://www.facebook.com/majhyaoli/

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवा तू करतोस ते योग्यच आहे… सौ.शुभांगी देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ देवा तू करतोस ते योग्यच आहे… सौ.शुभांगी देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

आज फ्रीज उघडला तर काय काय त्यात भरलेले. महालक्ष्मी साठी केलेले पुरण ,ओल्या नारळाचे उरलेले सारण, परवा बाप्पांच्या विसर्जनासाठी केलेली वाटली डाळ, असे बरेच उरलेले ठेवलेले.

बाप्पा आले पण येताना काही आणले नाही,अगदी दहा दिवस लागणार माहित असूनही, कपडे नाही,औषधे नाही,अंथरायला नाही, पांघरायला नाही, छत्री,रेनकोट ,अगदी साधा रुमालही नाही.

त्यांना माहीत होत खाली भौतिक सुखाचा सतत विचार करणाऱ्यांनी त्यांची चोख व्यवस्था केली आहे. नसती केली तरी बाप्पा कोणत्याही परिस्थितीत अगदी आनंदात आहेतच.

ते जातांना माझ्याच मनाची घालमेल, की शिदोरी द्यायची बाप्पांना. पुन्हा २१ मोदक केले, डाळ केली. नैवेद्याच्या वाटीत नैवेद्य ठेवला. तेवढाही नेला नाही. पण आले तेव्हा जसे आनंदी होते, प्रसन्न होते, तसेच जातांना होते. डोळ्यातून आशिर्वादाची,समाधानाची झलक दिसत होती.

महालक्ष्मी येण्याआधी तेच झाले. किती ती तयारी. घराची स्वच्छता,आरास करण्यासाठी बाजाराच्या चकरा. महालक्ष्मीसाठी साड्या घेतांना मला आवडल्या म्हणून बाजूला काढलेल्या अजून दोन तीन साड्या. तिच्यासाठी म्हणून दोन आणल्या खऱ्या, पण त्यातही एक मला होतीच….. मग फुलोरा, पुरण, त्या १६ भाज्या,चटण्या, कोशिंबिरी.

आधीच्या खूप पसाऱ्यातून, आधीच्या  कुळाचारातून ,रीतीरीवाजातून, माझ्या मनाच्या घालमेलीनंतर मीच कमी कमी केलेले ,थोडे सुटसुटीत होईल असे पदार्थ, नैवेद्य, त्यात माझा ओतलेला सुगरणपणा……. हे सगळं सगळं करून खूप थकायला झाले. पण त्या महालक्ष्मी आणि त्यांच्या बाळांनी जाताना काहीही नेले नाही, त्या पिटुकल्यांनी जाताना आई जवळ काहीही हट्ट केला नाही. त्याही जाताना भरभरून आशीर्वाद देऊन गेल्या….. कुंकवाच्या करंड्यात मला भासतील असे दोन चिमटीच्या खुणा ठेवून गेल्या. दोन्ही सणांनी खूप खूप आनंद दिला. 

पण आता हा उरलेला मागचा पसारा बघता सहज मनात विचार आला, मला जर कोणी दहा दिवसात किंवा तीनच दिवसात सगळं पटापट आवरून आता चला, बास आता इथले वास्तव्य ,असे जर म्हणाले तर माझे कसे आवरेल?

…… बापरे! हा विचार नुसता मनात आला आणि सर्व ब्रम्हांडच आले डोळ्यासमोर….. 

नुसते थोडा वेळ बाहेर जायचे म्हंटले तरी पाऊस येईल का?—कपडे बाहेर आहेत का?—अन्न झाकलेय का?—

मी बाहेर गेल्यावर गॅसवाला येईल का?—मोबाईल घेतलाय का?——बापरे बाप किती विचार डोक्यात.

साधे  एक दिवस गावाला जायचे म्हंटले तर  मी १० साड्या पलंगभर पसरवून ठेवते. कोणत्या दोन घ्याव्यात ह्यावर माझेच माझे एकमत होत नाही. काही साड्या जाड,जड, फुगणाऱ्या, काही चुरगळणाऱ्या, काही ओल्या झाल्या तर खराब होतील का? असे ढीगभर विचार डोक्यात—-

——मग कायमचे जायचे असेल, त्यात बरोबर काहीच न्यायचे नाही ,आणि दोन, तीन, फारतर दहा दिवसात सगळाच पसारा आवरायचं म्हंटले तर कसे होणार?

परवा त्या सायरस मिस्त्री नावाच्या टाटा कंपनीच्या मोठ्या व्यक्तीला अपघात झाला. केवढा पसारा,केवढे साम्राज्य असेल त्यांचे? किती कोटींची गुंतवणूक, किती कोटींची उलाढाल…  कसं आणि कोणी आवरायचं हे सगळं. त्यांनी जे ठरवले असेल ते तसेच राहिले की मनात….. 

खूप वेळा एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं.

मग कधी कधी वाटते की ह्या पॉलिसीज, इन्शुरन्स, ही संपत्ती, हे खोऱ्याने चोरून लपवून ठेवलेले पैसे, काळे धन, लॉकर्स, शेती, जमिनी, कारखाने, नाव, पद, प्रतिष्ठा, इगो,ह्या सगळ्या सगळ्याला खरंच काय अर्थ आहे?—-

—-तरी माणूस धावतोच आहे, धावतोच आहे ,तोंडाला फेस येईपर्यंत पळतोच आहे ,खोटी खोटी स्वप्न बघतोच आहे, झगमगाटी दुनियेमध्ये रमतोच आहे. कसलाच भरवसा नाही तरी तीन तीन महिन्यांचे रिचार्ज मारतोच आहे.

गाड्या ,फ्लॅट,बुक करतोच आहे—-

—- का ? कशासाठी?

दरवर्षी येणाऱ्या आणि बुद्धीची देवता असणाऱ्या बाप्पाकडून काहीच शिकत नाही. उलट त्या बाप्पांनाच पुन्हा पुन्हा ह्या येण्याजण्याच्या फेऱ्यात अडकवतोय—-

“ गणपती बाप्पा मोरया — पुढच्या वर्षी लवकर या.” –

बाप्पा ही येतात तेही काहीच न घेता, जाताना काहीच न नेता. आणतात फक्त आनंद..देतात फक्त आनंद.

आपणच अडकलो आहोत ह्या चक्रव्यूहात— अडकण्याचे सगळे मार्ग आपण माहित करून घेतलेत. बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला नकोय.

ह्या जीवाचे तंतर काही समजत नाही—

आला सास गेला सास, जिवा तुझं रे तंतर..

अरे जगणं मरण एका सासाच अंतर!

देव कुठे? देव कुठे,आभायाच्या आरपार!

देव कुठे, देव कुठे तुझ्या बुबाया मधी र !

हा आपल्याच बुबुळामधील देव, आपल्याच बुबुळामधील आपल्या प्रेमाचा माणूस, आपल्याला शेवटपर्यंत दिसत नाही.

देव येतात ,देव जातात, आशीर्वाद देतात ,आनंद देतात. प्रत्येक वर्षी तेच ते सांगण्यासाठी येतात. पण तरीही आपल्याला काहीही समजत नाही. देवांच्याकडून, निसर्गाकडून आपल्याला काही शिकवण घ्यायचीच नाही. ते दोघेही नुसते देतच असतात. कसलीच अपेक्षा न ठेवता– पण मुळात आपल्याला समजूनच घ्यायचे नाही.

आपण तर आपल्या आईवडिलांच्याकडून ,आणि आईवडील मुलांच्या कडून अपेक्षा ठेवतात.

एक साडी कुणाला दिली तर तिने चार डबे घासून द्यावे अशीही आपली अपेक्षा असतेच.

गणपती बाप्पा तू बुध्दीची देवता.

लहानपणी रोज आई म्हणून घ्यायची ते आजही आठवतंय— ‘ की देवा मला चांगली बुध्दी दे.’—आता कुणी  हे असे मागणे फारसे  मागताना दिसतच नाही.

मागण्या पण काळानुरूप बदलल्या आहेत. गणपतीकडे तरी तेच मागायचे लोक.

तो येताना बुद्धी आणत असेल वाटायला सोबत… पण कुणी मागितली तर ?

असो. माणसाच्या ह्या सगळ्या वागण्यामुळे त्याने काही प्यादी अजून त्याच्या हातात ठेवली आहेत.

त्याला माहित आहे की ह्या आधाशी माणसाला नेण्याची पूर्व कल्पना दिली, तर काय काय बांधून वर नेईल हा.

तो सगळा विचार करूनच त्याची गणितं संपली की तो काहीच विचारत नाही.–बोलावणे आले की नेतोच.

नाहीतर हा माणसाचा जमवलेला पसारा तीन दिवसात, दहा दिवसात काय, तर कधीच न आवरता येणारा आहे.

तो फक्त ह्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होतो.  बाकी काही नाही.

देवा तू करतोस ते योग्यच आहे.

लेखिका : सौ.शुभांगी देशपांडे

संग्राहिका: सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ प्रामाणिकपणा रक्तातच असावा लागतो… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ प्रामाणिकपणा रक्तातच असावा लागतो… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

दोनशे रुपयांची उधारी देण्यासाठी केनियाचा खासदार तीस वर्षांनी छत्रपती संभाजी महाराज नगरमधे  येतो…!!

एकीकडे कोट्यवधी रुपये बुडवून परदेशात पळून गेलेल्या उद्योगपतींची उदाहरणं समोर असताना, परदेशात स्थायिक असलेली व्यक्ती तीस वर्षापूर्वीची अवघ्या काहीशे रुपयांची उधारी फेडायला भारतात येऊ शकते का? 

या प्रश्नाचं उत्तर कोणीही नकारार्थी देईल. 

मात्र औरंगाबादेतील काशिनाथ गवळी यांची दोनशे रुपयांची उधारी फेडण्यासाठी केनियाचा रहिवासी तब्बल तीस वर्षांनी भारतात आला. ही गोष्ट आहे केनियाचा खासदार रिचर्ड टोंगी याची.. 

सध्या केनियाचे रहिवासी असलेले रिचर्ड शिक्षणासाठी औरंगाबादेत होते. त्यावेळी परिस्थिती जेमतेम. खायची अडचण असताना एका माणसानं मदत केली. त्याची त्यावेळची दोनशे रुपयांची उधारी फेडण्यासाठी रिचर्ड तब्बल ३० वर्षांनी परत आले. तब्बल तीस वर्षानंतर झालेली ही भेट या परदेशी पाहुण्यासाठी आणि औरंगाबादेतील काशिनाथ गवळी यांच्यासाठी फारच आगळीवेगळी होती. अगदी सगळ्यांच्याच डोळ्यात या भेटीने अश्रू तरळले आणि प्रामाणिकपणाची एक वेगळी जाणीव या भेटीतून औरंगाबादच्या गवळी कुटुंबीयांना झाली. खासदार रिचर्ड टोंगी आता केनियाच्या संरक्षण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समितीचे उपाध्यक्षही आहेत. रिचर्ड यांचं शिक्षण औरंगाबादेत झालं होतं. मौलाना आझाद कॉलेजमधून त्यांनी व्यवस्थापनाची पदवी घेतली. त्यावेळी ते औरंगाबादेत एकटे रहायचे. खाण्याची-राहण्याची सगळीच अडचण. कॉलेजच्या बाजूलाच असलेल्या वानखेडेनगरमध्ये काशिनाथ गवळी यांचं किराणाचं दुकानं होतं. अनेक परदेशी मुलं त्यावेळी तिथं यायची. रिचर्डही त्यापैकीच एक. रिचर्डना  काशिनाथकाकांनी मदत केली आणि त्यांना रहायला घर मिळालं. इतकंच नाही, तर खाण्यापिण्याच्या वस्तूही ते काशिनाथकाकांच्या दुकानातूनच घ्यायचे. १९८९ मध्ये त्यांनी औरंगाबाद सोडलं त्यावेळी काशिनाथकाकांकडे 200 रुपयांची उधारी बाकी राहिली होती. रिचर्ड मायदेशी परतले. तिकडे राजकारणात जाऊन त्यांनी मोठं पदही मिळवलं, मात्र भारताची आठवण त्यांना कायम यायची. त्यात खास करुन काशिनाथकाका यांनी केलेली मदत आणि त्यांच्या 200 रुपये उधारीची जाणीव त्यांना होती. गेली 30 वर्ष त्यांना भारतात यायला जमलं नाही, 

मात्र काही दिवसांपूर्वी केनिया सरकारच्या एका शिष्टमंडळासोबत रिचर्ड भारतात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर त्यांची पावलं आपसूकच औरंगाबादकडे वळली आणि त्यांनी शोध घेतला तो काशिनाथकाकांचा. तब्बल दोन दिवस त्यांनी काकांना शोधलं आणि अखेर त्यांची भेट झाली. ही भेट रिचर्डसाठी जणू डोळ्यात पाणी आणणारी ठरली. काकांना पाहून ते रडायला लागले. खरंतरं काकांच्या नीटसं लक्षातही नव्हतं. मात्र रिचर्डने ओळख दिली आणि काकांना सगळं आठवलं. ही भेट म्हणजे अनेक वर्षांची प्रतीक्षा फळाला आल्याचं रिचर्डने सांगितलं. आणि पैसै परत करण्याचा प्रामाणिकपणा सुद्धा भारतानेच शिकवला असल्याचंही ते आवर्जून सांगतात. 

“ काकांनी त्यावेळी मदत केली, त्यांचे फार उपकार माझ्यावर आहेत, अनेक वर्ष त्यांच्या कर्जाची परतफेड कशी करु, हे सुचत नव्हतं. मात्र यावेळी भारतात आलो आणि थेट त्यांचं घरचं गाठलं. त्यांना भेटून आनंद झाला, पैसे परत करणं हा प्रामाणिकपणा आहे, असं लोक म्हणतात, मात्र हे मी या देशातच शिकलोय याचा अभिमान आहे, अशा शब्दात रिचर्डने आपल्या भावना व्यक्त केल्या.” 

‘ अनेक वर्ष रिचर्ड गवळी कुटुंबाबद्दल सांगत होते, मात्र भेट काही शक्य होत नव्हती. अखेर यावेळी ती झाली, याचा रिचर्डना आनंद आहेच, मात्र मलाही अभिमान असल्याचं’  रिचर्डची पत्नी मिशेल टोंगी यांनी सांगितलं. “काशिनाथकाकांचा उल्लेख त्याने बरेच वेळा केला होता, मात्र आज भेट झाल्याचा आनंद वाटला.’  नवऱ्याच्या प्रामाणिकपणाचा निश्चितच अभिमान असल्याचं मिशेल म्हणतात.

काशिनाथ गवळी यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या आनंदात टोंगी दाम्पत्याचं स्वागत केलं. मराठमोठ्या पद्धतीनं टॉवेल-टोपी आणि साडी देऊन त्यांनी दोघांचा सत्कार केला. रिचर्डने त्यांच्या घरी जेवणही केलं. अजूनही काशिनाथरावांचं प्रेम कायम असल्याची भावना रिचर्डने व्यक्त केली. त्यांनी काशिनाथकाकांना केनियाला येण्याचं आमंत्रणही दिलं आहे.

प्रामाणिकपणा कोणी कोणाला शिकवू शकत नाही, तो रक्तातच असावा लागतो, हेच खरं. 

लेखक : अज्ञात

संग्राहिका – माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ परतीचा फराळ… अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

? वाचताना वेचलेले ?

🍃 परतीचा फराळ… अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

परतीचा पाऊस असतो तसा परतीचा फराळही असतो.आठवणी देऊन जाणारा आणि जाताजाता हुरहूर लावणारा …!

घराघरात कुशल गृहीणी आता डब्यांची अदलाबदल करुन संपुर्ण घराला कन्फ्युज करायला सुरुवात करतात.मोठ्या डब्यांमधला फराळ लहान डब्यात शिफ्ट होतो. निवडणुका संपल्यावर नेतेमंडळी दिसत नाहीत तसा कालपर्यंत समोर असलेला फराळ आता शोधावा लागतो.

ओल्या नारळाच्या करंज्या एखाद्या सौंदर्यसाम्राज्ञीने आलिशान कारमधे बसून नीट दर्शनही न देता वेगानं निघून जावं तशा केल्या आणि संपल्या सुध्दा अशा गायब होतात.

चकलीच्या डब्यावर सगळयांचाच डोळा असतो पण शेवटची चकली खाताना होणारा आनंद प्रचंड असतो ती खाल्ल्यावर डबा घासायला न टाकता झाकण लावून तो तसाच ठेवणा-याला फसवणे आणि अपेक्षाभंग करणे या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी असं माझं मत आहे.

पाहुण्यांसाठी मागच्या रांगेत लाडवाचा डबा लपवला जातो कारण लहानपणापासून दिवाळी झाल्यानंतर महत्वाचे फराळाचे पदार्थ संपल्याचे कळताच येणारे पाहुणे हा एक खास वर्ग आहे हे पटलंय.

प्रत्येक फराळाच्या पदार्थाची एक एक्सपायरी डेट असते ती गृहीणींना अचूक माहीती असते ईतके दिवस विचारावे लागणारे चकलीच्या डब्यासारखे मौल्यवान डबे सहज उपलब्ध होत समोर दिसू लागले की भोळीभाबडी जनता उगाच आनंदून जाते पण त्यामागे एक्सपायरी डेटचं राजकारण असतं.

डब्यात तळाला गेलेल्या शंकरपाळयांचा डबा चहा केल्यावर मुद्दाम समोर ठेवला जातो कारण त्याचीही एक्सपायरी डेट जवळ येत असते.

जास्त मीठ मसाला तळाशी असलेला दाणे संपत चाललेला चिवडा कांदा- टाॅमेटो -कोथिंबीरीचा मेकअप करुन समोर येतो. मिसळीचा बेत आखला जातो.

शेव हा प्रकार कधी संपवावा लागत नाही तो संपतो पोहे उपमा करुन त्यावर सजावटीसाठी वापरली जात ती संपते.

असा हा ‘परतीचा फराळ’ दिवाळीच्या आठवणींचा… रिकाम्या कुपीतल्या अत्तराच्या सुगंधासारखा…जिभेवर रेंगाळणा-या चवीचा… जाताजाता पुढच्या वर्षी पुन्हा एकत्र धमाल  करु म्हणत एकमेकांचा निरोप घेत डब्यातून बाहेर पडणारा… गृहिणीला केल्याचं समाधान- कौतुक देणारा…आणि शेवटी शेवटी संपत जाताना आणखी चविष्ट होत जाणारा … परतीचा फराळ

हो आणि एक राहीलंच घरोघरी ताटं यायची घरोघरी ताटं जायची.

त्यात घरोघरच्या चकल्या कडबोळ्या काही कडक काही तिखट काही खुसखुशीत तर काही वातड पण सगळ्यांना मुक्ती मिळायची ताकाच्या झणझणीत कढीत समाधी मिळायची. एक वेगळीच सबगोलंकारी चव यायची जठराग्नीची तृप्ती व्हायची.

काही फुकट जाण्याचा विषयच नसायचा.

अन्नब्रह्माची किंमत असायची

🙏

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बोगनवेल ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? बोगनवेल ! ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆ 

असे दुनिया रंगीत माझी

दुरून जणू कागदी वाटे,

नसे मज कुठला सुवास

फुलांपेक्षा अंगभर काटे !

शोभा वाढवी कुंपणाची

राखण गुराढोरांपासून,

नको जवळीक माझ्याशी

काटे काढतील सोलून !

दिसती पाकळ्या शोभून

माझ्या एखाद्या हारात,

वाढे सुंदरता कुणा घरची

कमान करता गवाक्षात !

नको मज जादा निगराणी

वाढीस पुरे थोडसं पाणी,

जरी नसले फुलांची राणी

नयन सुखावती रंग झणी !

© प्रमोद वामन वर्तक

ठाणे.

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ लघुकथा – “आज के संजय…” ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

श्री कमलेश भारतीय जी की यह लघुकथा आप एएनवी न्यूज चैनल पर सुश्री मिष्ठी राणा की आवाज में इस लिंक पर क्लिक कर देख-सुन सकते हैं 👉  लघुकथा – “आज के संजय…”

☆ कथा – कहानी   ☆ लघुकथा – “आज के संजय…” ☆ श्री कमलेश भारतीय  

सूर्य अस्ताचल की ओर बढ़ रहा है । महाभारत के युद्ध की दोनों सेनायें अपने अपने शिविरों में लौट रही हैं । रथों के घोड़े हिनहिना रहे है । कौन आज युद्ध में वीरगति पा गये और कौन कल तक बचे हुए हैं । संजय यह आंखों देखा हाल धृतराष्ट्र को सुना रहे हैं । महाराज व्यथित होकर दिन भर का हाल सुन रहे हैं । गांधारी भी पास ही बैठी हैं ।

वह एक युग था । तब संजय जन्मांध धृतराष्ट्र को युद्ध का हाल बताने के लिए मिली दिव्य शक्ति से सब वर्णन करते थे । कहा जा सकता है कि उस युग के पत्रकार थे संजय ।
अब युग बदल गया । इन दिनों चुनाव की महाभारत है । महाभारत अठारह दिन चली थी लेकिन यह चुनाव प्रचार की महाभारत पूरे इक्कीस दिन चलती है । यहां किसी एक संजय को दिव्य शक्ति नहीं दी जाती । यहां तो सैंकड़ों संजय हैं जो ‘वीडियो’ नाम की दिव्य शक्ति लेकर आये हैं और कुछ भी वायरल कर देने की शक्ति रखते हैं ! मनचाहा वीडियो बना कर सारा आंखों देखा हाल सुनाने में जुटे हैं । संजय तो एक राष्ट्रीय पत्रकार था और राष्ट्र की सेवा में जुटा था । निष्पक्ष ! निरपेक्ष ! ये आज के युग के संजय तो निष्पक्ष और निरपेक्ष नहीं । इन्हें तो रोटी रोटी कमानी है, अपनी गृहस्थी चलानी है । मनभावन शौक पूरे करने हैं । खाना पीना है और वह दिखाना है जो सामने वाला चाहता है लेकिन इसकी एक निश्चित कीमत है ! जो चुकाये वह पा मनचाहा पा ले ! नहीं चुकाये तो हश्र भुगते !

ये कैसे संजय हैं ?

ये कलियुग के महाभारत के संजय हैं ! जो अंधे लोगों को युद्ध का हाल नहीं सुनाते बल्कि ऐसा हाल सुनाते हैं कि आंखों वालों को ही अंधा बना रहे हैं ! आप इन्हें पहचानते हैं

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आतिश का तरकश #164 – 50 – “ज़िंदगी इसी तरह से निभती है जनाब…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी  ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं ।प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकशआज प्रस्तुत है आपकी ग़ज़ल “ज़िंदगी इसी तरह से निभती है जनाब …”)

? ग़ज़ल # 50 – “ज़िंदगी इसी तरह से निभती है जनाब …” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ?

मान करना ज़रूरी बाँह पकड़ने को सब तैयार,

पाक होना ज़रूरी है साथ चलने को सब तैयार।

हाथ हाथों में हर वक्त रहे मुमकिन नहीं होता,

थाह दिल की लो साथ धड़कने को सब तैयार।

आसमान के तारे तोड़ लाने की क़समें बेवजह,

प्यार पाने की हो नीयत निभने को सब तैयार।

नौबत हाथापाई की ना पाए कभी नौकझोंक में,

गरम ठंडा सहना आता हो हंसने को सब तैयार।

ज़िंदगी इसी तरह से निभती है जनाब आजकल,

राह आसान ‘आतिश’, साथ चलने को सब तैयार।

© श्री सुरेश पटवा ‘आतिश’

भोपाल, मध्य प्रदेश

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – दिगंबर ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ मार्गशीष साधना🌻

बुधवार 9 नवम्बर से मार्गशीष साधना आरम्भ होगी। इसका साधना मंत्र होगा-

ॐ नमो भगवते वासुदेवाय

आपसे विनम्र अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

? संजय दृष्टि – दिगंबर ??

रुधिर से भी

तीव्र फूटती है

अंतर्वेदना की धार,

इस धार में छुपा

दिगंबर संसार…!

© संजय भारद्वाज

प्रात: 10.26 बजे, 26.10.2020

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ “श्री हंस” साहित्य # 41 ☆ मुक्तक ।। हम मशीन बन कर नहीं, इंसान बन कर रहें ।।☆ श्री एस के कपूर “श्री हंस”☆

श्री एस के कपूर “श्री हंस”

(बहुमुखी प्रतिभा के धनी  श्री एस के कपूर “श्री हंस” जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त अधिकारी हैं। आप कई राष्ट्रीय पुरस्कारों से पुरस्कृत/अलंकृत हैं। साहित्य एवं सामाजिक सेवाओं में आपका विशेष योगदान हैं।  आप प्रत्येक शनिवार श्री एस के कपूर जी की रचना आत्मसात कर सकते हैं। आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण मुक्तक ।।हम मशीन बन कर नहीं, इंसान बन कर रहें।।)

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ “श्री हंस” साहित्य # 41 ☆

☆ मुक्तक  ☆ ।।हम मशीन बन कर नहीं, इंसान  बन कर रहें।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस” ☆ 

[1]

नए दौर में भी तुम,  दया साथ  रखो।

जमाना नया है पर,  हया साथ  रखो।।

हमें चमक ही  नहीं,  रोशनी  चाहिए।

बिना खोए पुराना तुम,नया साथ रखो।।

 [2]

पुरातन संस्कृति का, कभी हरण ना हो।

गलत प्रथा आदर्शों ,  का चलन ना हो।।

बहुमूल्य हैं पुरातन , संस्कार आज भी।

कदापि नारी सम्मान,  का क्षरण ना हो।।

[3]

संवेदना अवमूल्यन, पशुता की निशानी है।

हमें भावनाओं की पूंजी, नहीं मिटानी है।।

विश्वगुरु भारत महान, का अतीत रखें हम।

आधुनिकता दौड़ में, दौलत नहीं लुटानी है।।

[4]

हमाराआदरआशीर्वाद ही, हमाराअर्थ तंत्र है।

हमारा स्नेह प्रेम सरोकार, ही हमारा यंत्र है।।

हम मशीन नहीं बस ,  मानव बन कर रहें।

वसुधैव कुटुंबकम् भाव, ही हमारा गुरुमंत्र है।।

© एस के कपूर “श्री हंस”

बरेली

ईमेल – Skkapoor5067@ gmail.com

मोब  – 9897071046, 8218685464

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ काव्य धारा # 107 ☆ गीत – “गुजरा जमाना…”☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध

(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी  द्वारा रचित एक गीत – “गुजरा जमाना…” । हमारे प्रबुद्ध पाठकगण  प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी  काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे।) 

☆ काव्य धारा #107 ☆  गीत – “गुजरा जमाना…” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

अचानक जब कभी गुजरा जमाना याद आता है

तो नजरों में कई बरसों का नक्शा घूम जाता है।

 

वे बचपन की शरारत से भरी ना समझी की बातें

नदी के तीर पै जा-गा बिताई चादनी राते

सड़क, स्कूल, साथी, बाग औ’ मैदान खेलों के

वतन के वास्ते मर-मिटने का मंजर दिखाता है।।1।।

 

हरेक को अपनी पिछली जिंदगी से प्यार होता है

बदल जाता है सब लेकिन वही संसार होता है

दबी रह जाती है यादें झमेलों और मेलो की

नया सूरज निकल नई रोशनी नित बाँट जाता है।।2।।

 

बदलता रहता है जीवन नही कोई एक सा रहता

नदी का पानी भी हर दिन नया होकर के ही बहता

मगर बदलाव जो भी होते हैं अच्छे नही लगते

बनावट का नये युग से वै बढ़ता जाता नाता है।।3।।

 

भले भी हो मगर बदलाव लोगों को नहीं भाते

पुराने दिनों के सपने भला किसको नहीं आते

नये युग से कोई भी जल्दी समरस हो नहीं पाता

पुरानी यादों में मन ये हमेशा डूब जाता है।।4।।         

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

ए २३३ , ओल्ड मीनाल रेजीडेंसी  भोपाल ४६२०२३

मो. 9425484452

[email protected]

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares