मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त : पादाकुलक)

विजेत वाजत ढगात गाजत

नाचत नाचत पाउस आला

भिरभिर भिरभिर वारा ओला

गंध मातिचा उधळत आला !

 

टपटप टपटप थेंब टपोरे

झरझर झरझर कौलारांवर

ढोल नि ताशा बडवत येती

धडधड  धारा अन् पत्र्यांवर !

 

चिंब तरुंवर चिंब पाखरे

फडफड फडफड पंख पसरती

निथळत निथळत दुजा पाखरां

पुन्हा एकदा चिंब भिजवती !

 

पहिलावहिला पाउस उत्कट

सहस्र हस्ते धरेस कवळी

अशा बरसती धो धो धारा

जन्मांतरिचे वणवे विझती !

 

सूंसूं सूंसूं सुसाट वारा

रानोरानी पानोपानी

रुद्रविणांच्या छेडित तारा

करीत गुंजन दरीदरितुनी !

 

खळखळ खळखळ झरे वाहती

वाहत वाहत वाटा जाती

जलथल जलथल जिकडे तिकडे

चराचरा ये अपार भरती !

 

गल्लोगल्ली पोरेसोरे

भिजती न्हाती ब्रह्मानंदी

नाचत थुइथुइ मोर वनीचे

जणु स्वच्छंदी छंदीफंदी !

 

भिजल्या भेगा भग्न भुईच्या

बळिराजाही सुखी होवु  दे

नष्टचर्य हे संपो , बाप्पा

दिवस सुगीचे पुन्हा येवु दे !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काही कविता… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ काही कविता… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

गरगरणारा पतंग

विसावला झाडाच्या फांदीत..

दुखावलेल बाळ जणू आईच्या कुशीत…

           ***

 

उगमापाशी पाणी

हसत पळतय खळखळून…

त्याला काय माहित पुढे काय ठेवलंय वाढून..

          ***

 

उजाड माळरानावर

पाहिलं एका गवतफुलाला….

तेवढाच विसावा रखरखत्या डोळ्याला..

         ***

 

डेरेदार वृक्ष

दिवसा किती वाटतो सुंदर…

तोच तीन्हीसांजेनंतर वाटतो भयंकर…

         ***

 

घर उघडत नाही खिडकी

सहन करुनही वाऱ्या.. पावसाचे वार…

जणू माझ्या बंद मनाचे दार…

          ***

 

दमलेलं पाखरू

क्षणभर फांदीवर विसावलं….

उडून जाताना त्यानं वळुन नाही पाहिलं ….

          ***

 

तळ्यातलं आकाश अन् डोक्यावरचं

यातला फरक पक्ष्याला कळतो….

तो हवेतच झेपावतो….

          ***

 

वेलीला मांडव काय

अन् झाड काय…

काटेरी कुंपणावरही कसा तरारून चढलाय…

         ***

 

बाळाला झोपवून

ओसरीवर आले…

तर ‘मनी’चे पिल्लू पायाशी घोटाळले…

          ***

 

कुहुकते कोकीळा

म्हणून खिडकी उघडली…

गच्च मोहरलेली बाग दिसली…..

      ***

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तारा…भाग – 9 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

? विविधा ?

☆ तारा…भाग – 9 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

सती साध्वी ताराचा करुण विलाप ऐकुन आणि तिचा मरणांतीक उपोषणाचा निश्चय पाहून हनुमान पुढे आले. ताराची योग्यता हनुमान जाणून होते. ते ताराला समजावत म्हणाले, “देवी, जन्म मरण प्रत्येकालाच आहे. त्यासाठी शोक करणे कितपत योग्य आहे? आपण तर विदुषी आहात ! जन्म मृत्युची परंपरा जाणता ! वालीराजांचा जीवनाचा अवधी संपल्यामुळे त्यांना वीरगती प्राप्त झाली. आपण महासती, महाविद्वान आहात, आपणाला मी काही सांगणे म्हणजे सूर्याला काजवा दाखवण्यासारखे आहे. आपण ज्ञानसंपन्न विदुषी, विवेकी, विचारी, धीरगंभीर, शांत मनस्विनी आहात.”

” कुमार अंगदच्या भविष्याचा विचार करुन आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करावे. अंगद आणि सुग्रीव दोघेही दुःखी आहेत. त्यांचे सांत्वन आपल्याशिवाय कोण करणार? कोण आधार देणार त्यांना? आता या राज्याची स्वामिनी आपणच आहात. कुमार अंगदची  आणि सर्व वानरांची माता होऊन, आपले दुःख, शोक, बाजूला ठेवून खंबीरपणे उभे राहून वानरांचे हे राज्य आपल्याला सांभाळायचे आहे , मार्गदर्शन करायचे आहे. वालीराजांच्या पारलौकिक कार्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते आटोपल्यावर  कुमार अंगदला राजसिंहासनावर बसवावे.”

त्यावर तारा म्हणाली, ” मला आता कशाचाही मोह नाही. या सर्व ऐहिक सुखाची विरक्ती आलेली आहे. अंगदसाठी काय करायचे ते, त्याचे काका सुग्रीव पाहण्यास समर्थ आहे. पुत्रमोहात अडकण्यापेक्षा पतीधर्मानुसार त्यांच्यासोबत सती जाणे हेच मी माझे कर्तव्य समजते.”

यावेळेपर्यंत वालीला किंचित शुध्द आली. ही शुध्द त्याची शेवटचीच शुध्द होती. श्वास घ्यायला त्रास होत असतांना खोल आवाजात मोठ्या प्रयत्नपूर्वक तो सुग्रीवशी बोलू लागला. ” माझ्या अंतिम समयी जेव्हा मी यमलोकी महानिर्वाणाला निघालो तेव्हा याक्षणी माझेकडून घडलेले पातक, अविचार, अत्याचार सर्व आठवून माझाच मला धिक्कार वाटत आहे. सुग्रीवा ! तुझे माझ्यावर असलेले अपार प्रेम मी कधी समजून घेतलेच नाही. तुझ्याबद्दल विनाकारण गैरसमजाने आकस ठेवून वैर केले. तुला देशोधडीला लावले. आपण प्रेमाने राहिलो असतो तर अश्या दुर्घट प्रसंगाला सामोरे जावे लागले नसते. परंतु आता तर पश्चातापालाही अवधी उरला  नाही.”

 “अंगदला स्वतःचा पुत्र समजून त्याचा सांभाळ कर ! तो तेजस्वी, पराक्रमी, शूर आहे. सुषेन वानरराजाची कन्या तारा, हिच्याजवळ अशी आंतरिक शक्ती आहे की, भविष्यात घडणार्‍या चांगल्या वाईट घटनांची सूचना तिला आधीच मिळते. निसर्गामधे व मानवी जीवनात अनेक उत्पात होतात. त्याबाबत तिने दिलेला कोणताही सल्ला हितकारक ठरतो, जो मी कधीच ऐकला नाही, त्याचे फळ माझ्या रुपाने तुझ्यासमोर आहे. ताराने दिलेला, केलेला उपदेश आणि सल्ला कोणताही किंतु, संशय मनांत न ठेवता ऐक आणि प्रत्येक कार्य तिच्या सम्मतीनेच कर !”

वालीचे बोलणे तारा ऐकत होती आणि ओक्साबोक्शी रडत होती. वालीने अंगदला जवळ घेतले.  त्याचा हात हातात घेऊन म्हणाला, ” श्रीरामाचे कार्य देवकार्य समजून त्यांना मदत कर…”

 ताराकडे पहातच वालीचे प्राणोत्क्रमण झाले. एक बलशाली तारा निखळला !

क्रमशः…

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रारंभ – भाग-3 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ प्रारंभ – भाग-3 ☆ श्री आनंदहरी

आत्याबाईना दारात पाहून रंजनाचे बाबा चमकलेच. त्यांनी दार उघडताच आत्याबाईंनी विचारले,

” रंजना ?”

” वरच्या खोलीत आहे. “

” येकलीच कशापायी वर बसलीय ? खाली बोलवा.”

” यायलाच तयार नाही.”

” थांबा वाईच, मीच आणत्ये “

आत्याबाई वर गेल्या. रंजना एकटीच खोलीत रडत बसली होती.

” कशापाय रडतीस गं ? “

” आत्याबाई ss!”

रंजनाला जास्तच रडू फुटलं.

” समदं ठावं हाय मला.. तू काय चुकी केली हायेस काय ? “

रंजनाने नकारार्थी मान हलवली.

” मग अशी त्वांड दडवून घरात कशापाय बसायचं ? अगं, गुन्हेगार करून सवरूनबी काय न केल्यागत माना वर करून फिरत्यात आन आपुन काय बी न करता असे कशापाय लपायचं गं? चल. उठ. भायेर चल. “

” अहो पण..”

” का ? लोकं काय म्हंतीली याचं भ्या वाटतंय वी ?  आगं, येवडी शिकल्याली हाईस.. आन तुला मी अडान्यानं सांगायचं व्हय ? चल.”

” पण..? “

” आता उठतीस का ? “

आत्याबाईच्या आवाजाला धार आली तशी रंजना उठली. आत्याबाई तिला घेऊन खाली आल्या.

” वैनी, वाईच च्या ठेवा.. समदयास्नीच. आन तू गं.. तू वाईच त्वांड धून ये जा. “

रंजना तोंड धुवायला गेली, रंजनाची आई चहा ठेवायला गेली तसा आत्याबाईंनी मुद्यालाच हात घातला.

” दादा, पावनं काय म्हंत्यात ? “

अचानक आलेल्या या प्रश्नाने रंजनाचे बाबा काहीसे गडबडलेच. ते पाहून आत्याबाईंनी विचारले,

” तुमी गेलावता न्हवं पोरीला घेऊन ? “

” होय. “

” मग ? “

” ते म्हणाले, पोरगा म्हणतोय की त्याला पोरगी पसंतच नाही . खूप समजावले त्याला पण ऐकतच नाही. “

” आत्ता पसंत न्हाय म्हंतुय.. आगुदर त्याच्या डोळ्याला कावीळ झालीवती का डोळं फुटलंवतं त्येंचं.., मुडदा बशिवला त्येचा.. लगीन झाल्याव पोरगी पसंत न्हाय म्हंतुय ती..”

” आत्याबाई, अहो, आपली पोरीची बाजू.. जास्त काही बोलता येत नाही. “

” पोरीची बाजू ? पोरगं काय आबाळात्नं पडत न्हाय ? त्ये बी आईच्या पोटात्नंच येतंय न्हवका ? दादा , तुमी शिकल्याली मान्संबी आसं बोलाय लागल्याव कसं हुयाचं ? “

” काय करता आत्याबाई, समाजातील पद्धतच आहे तशी..”

” अवो, चुकीचं हाय ती बदलायचं का त्येंच्या परमानं आपुनबी चालायचं  ? “

” आत्याबाई, आपली पोरीची पडती बाजू.. “

” दादा, पोरीची बाजू पडतीबी नसती आन नडतीबी नसती.. ही ध्येनात ठेवा..”

” तुमचं सगळे खरे आहे आत्याबाई.. पण नवऱ्याने टाकलेल्या बाईला सरळ जगता येते का समाजात ? पुढचे आयुष्य कुणाच्या आधारावर काढायचे तिने ? “

रंजनाची आई म्हणाली तशा आत्याबाई काहीशा चिडल्याच पण स्वतःला सावरत म्हणाल्या,

” नवऱ्याने टाकलेली ? वैनीसाब, काय बोलतायसा काय ? बाई म्हंजी काय एकांदी वस्तू हाय व्हय, नगं वाटल्याव टाकाय आन पायजे आसंल तवा सांभाळाय ?  आपुन बायकांनीच आसं म्हणल्याव कसं हुयाचं ? वैनी जमाना बदल्याला हाय.. आता पोरी शिकत्यात, पायाव हुभ्याबी राहत्यात.. नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून कामे करत्यात , पैकं मिळीवत्यात.. तरीबी तसंच ? त्ये काय न्हाय वैनी.. आपुन बायकांनीच ह्ये समदं बदलाय पायजेल. “

तेवढ्यात रंजना आवरून येत असल्याचे दिसले तसे दादा गप्प झाले..

” दादा, चार रोज जाऊदेत.. पुन्यानदा जाऊ.. मी येते संगं… आपली चुकी न्हाय न्हवं…? आज्याबात नमायचंबी न्हाय आन रडायचंबी न्हाय. पार कंडकाच पाडून याचा…”

” अहो पण आत्याबाई..?”

” न्हाय दादा,  दिस बी बदलल्यात आन कायदाबी

.. आपली पोर काय वाटंव पडल्याली न्हाय.. मुडदा काल लगीन करतुय आन आज पोरगी पास न्हाय म्हंतुय…”

” बरं जाऊया, तुम्ही म्हणाल तेंव्हा…”

‘आत्याबाईंच्या समोर भल्याभल्यांचं काही चालत नाही तिथं आपलं काय चालणार ?’ असा विचार मनात येऊन दादांनी होकार दिला. 

आत्याबाई स्वतःशीच हसल्या आणि ‘ चल गं रंजना ..’ म्हणत रंजनाला घेऊन बाहेर पडल्या.

” तू येवडी शिकल्याली असूनबी घरात रडत बसलीस व्हय गं ? “

रंजना काहीच बोलली नाही.

” आगं, आसं गप ऱ्हावून न्हाय भागायचं.. ‘आरं’ ला ‘ का रं ‘ कराय पायजेल. “

” आत्याबाई, आता लग्न झालंय.. आता काय करणार ?”

” आगं, बाईच्या डोईवर चार अक्षदा पडल्या म्हंजी समदं झालं आसं असतं व्हय गं ?  लगीच गोठयातल्या जनावरावानी ती दावणीला न्हाय बांधली जात.. आगं, ती माणूस हाय जनावर न्हवं..  आन परपंचा ह्यो दोगांचा असतो, येकल्या बाईचा न्हवं. “

” अहो पण आत्याबाई, नवरा नांदवत नाही म्हणल्यावर बाईला समाज काय किंमत देतो ? समाजाचे जाऊ दे, तिच्या घरात तिला काय किंमत असते ? “

रंजनाच्या मनातली स्वतःच्या भविष्याची काळजी तिच्या शब्दात आणि चेहऱ्यावर दिसत होती.

” रंजे, कंच्या युगात हायस तू..? तुमच्यासारख्या पोरी आसं बोलाय लागल्याव रागच येतो बग.. आगं, शिकल्या-सवरलेल्या पोरी तुमी.. पर शिकून तुमचा काय बी उपेग न्हाय बघ. “

” अहो पण आत्याबाई.. “

” आमी आडाणी पर तू शिकल्याली हायस न्हवं ? आगं, म्होरं जायचं आसतंय पर  चपलीत खडा आला, नायतर काटा घुसून टोचाय लागला तर कुठंवर सोसत चालायचं गं  ? लगीच टोचत्याला खडा-काटा काढून टाकून पुढं जाण्यातच शानपना असतो. “

” आत्याबाई , लोक काय म्हणतील ? “

” लोक? आगं, ती बोलणारच.. बोलणाऱ्याचं काय त्वांड धरता येतंय वी ? आन तसंबी ती दुतोंडी सापावानी असत्यात.. कसंबी वागलं तरी बोलत्यातच.. दोनी बाजून वाजणाऱ्या डमरुवानी.. बाईच्या जातीला तर लईच सोसायला लागतंय बोलणं.. आगं, सीतामाई सुटली न्हाय त्यातनं ततं आपलं काय गं ? ..  आगं, ही लोकं तर नांदणारनीला पळ म्हंत्यात आन पळणारनीला नांद म्हणीत अस्त्यात.. पर कुणाचं कंचं बोलणं कुठंवर मनाव घ्याचं, आयकायचं ही तर आपल्याच हातात आस्तंय न्हवं ? रंजे, टोचती येसन नाकात ठेवण्यात कसला आलाय गं शानपना ?”

आत्याबाई बोलत होत्या.. त्यांचा शब्द न् शब्द रंजनाला पटत होता..  पण जे मनाला पटते तसे थोडेच वागता येते, जगता येते ?

क्रमशः …

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गाद्या घालणे… अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

? वाचताना वेचलेले ?

🍃 गाद्या घालणे… अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

पूर्वी रात्रीची जेवणं आठ साडेआठ च्या सुमारास होत असत.साडेनऊ पर्यंत दिवे मालवून रेडिओवरची श्रुतिका ऐकत किंवा कधी रात्री दहाची आकाशवाणी संगीतसभा ऐकत लोक झोपेच्या आधीन होत.तत्पूर्वी गाद्या घालणे हे नित्य काम करावे लागे.तेंव्हा घरात एक किंवा दोन पलंग असत.खर म्हणजे  लोखंडी ,उभ्या आडव्या पट्ट्या असलेलली एकच कॉट असे.२/३ खोल्यांच्या लहान घरात जागाही नसे आणि प्रत्येकाने कॉटवर झोपण्याची चैन करण्याची पद्धतही नव्हती.सिंगल बेड,डबल बेड,सोफा कम् बेड,बंक बेड चा तो जमाना नव्हता.त्यामुळे घरातील ती एक कॉट वडिलांसाठी राखीव असे.ते घरात नसतील तेंव्हा दुपारी पडायला वगैरे इतरांना ती मिळे.त्यामुळे रात्री घरातील इतर सर्वांनी खाली गाद्या घालून झोपायचं हे ओघानेच आले.

घरात भिंतीला टेकवून ३/४ गाद्यांच्या वळकट्या एकावर एक रचून ठेवलेल्या असत.त्यावर एखादी सतरंजी किंवा चादर घातलेली असे ज्यायोगे गादीतला क्वचित् उसवून बाहेर आलेला कापूस दिसू नये.गाद्या घालण्यापूर्वी पुन्हा एकदा झाडून घ्यायचे.पूर्वी दोन वेळा केर काढायची पद्धत होतीच. फक्त दिवेलागणीला केर काढायचा नाही असा नियम होता.कारण ती वेळ घरात लक्ष्मी येण्याची वेळ.केर काढल्यावर सतरंज्या अंथरायच्या आणि त्यावर गाद्या पसरायच्या.गाद्या घालायचं काम सामान्यपणे घरातली पुरुषमंडळी करत आणि लहान मुले त्यांना आवडीने मदत करत.गादीवरची चादर काढून त्या चादरीने गादी जोरजोरात झटकायची. ढेकणांचाही बंदोबस्त करावा लागे..मग त्यावर हळुवारपणे चादर पसरायची.चादरीची एका बाजुची दोन टोके एकाने पकडायची आणि दुसरी दोन टोके दुस-याने पकडून हळुहळु चादर खाली आणून गादीवर अंथरायची.त्यावेळी चादरीत हवा भरुन मोठा फुगा होत असे.मग गादीवर रांगत रांगत चादरीच्या चारही बाजू ताणून ,निगुतीने गादीखाली दुमडून टाकायच्या.एकही सुरकुती तिथे असता कामा नये यावर वडिलांचा कटाक्ष असे.हे सगळं करताना घरातलं लहान मूल वडिलांच्या पाठीवर घोडा घोडा खेळत असे.घोड्यावरुन गादीवर रपेट मारली जात असे.मुलं कोलांट्या उड्या मारत  .हा खेळ रोज चाले.म्हणून गादी घालणे हे मुलांनाही  काम वाटत नसे तर उलट त्यांच्या मौजेचा भाग वाटे.शेवटी डोक्यापाशी उशा आणि पायापाशी पांघरायची चादर ठेवली की हे काम पूर्ण होत असे.गादीवर अंथरायची ‘बेडशीट ‘च असे अस काही नाही.आईची किंवा आजीची जुनी मऊ नऊवार साडीसुद्धा पांघरायला असे.हे सगळं झालं की वडिलांच्या पाठीवर पाय देणे असा एक कार्यक्रम असे.भिंतीचा आधार घेऊन आम्ही वडिलांच्या पाठीवर पाय देऊन त्यांची पाठ रोज रगडून देत असू.आईच्या वाट्याला कधीच हे कौतुक आले नाही.पण तरी ती मात्र न चुकता रोज झोपायच्या वेळी आमच्या तळपायाला साजूक तूप लावून देत असे, थंडीत पायांच्या भेगा कोकम तेलाने बुजवत असे,उन्हाळ्यात वर्तमानपत्राच्या घडीने  झोप येईपर्यंत वारं घालत असे…सगळं निरपेक्ष …शेवटी आई ती आईच.

आपण सर्व ह्या अनुभवाचा  आनंद आज ही आठवणीत साठवलेला असेलच !!

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ इथे ओशाळला शेक्सपिअर… ☆ श्री सुरेश नावडकर ☆

श्री सुरेश नावडकर
? इंद्रधनुष्य ?

☆ इथे ओशाळला शेक्सपिअर…☆ श्री सुरेश नावडकर ☆

शेक्सपिअर म्हणतो, ‘ नावात काय आहे? ‘– तर नावातच खूप काही आहे.. कसं? ते बघाच… जगातील कोणत्याही देशांपेक्षा, आडनावांची विविधता फक्त भारतातच आहे.. त्यातूनही महाराष्ट्रात तर, या बाबतीत आडनावांनी कहरच केलेला आहे…

आडनावांची विविधता ही अनेक प्रकारांमध्ये विभागलेली आहे.

रंगावरुन प्रचलित असलेली आडनावं.. काळे, गोरे, पांढरे, सावळे, भुरे, हिरवे, तांबडे, पिवळे, करडे, जांभळे, तपकीरे, इत्यादी. यामध्ये अनेकदा आडनावाच्या विरुद्ध ती व्यक्ती असते.. उदा. काळे आडनावाच्या बाई, गोऱ्यापान असतात.. तर गोरे आडनावाचे सद्गृहस्थ, कोळशाशीही स्पर्धा करणारे दिसतात..

धातूंची आडनावंही, बरीच आहेत.. जसे तांबे, पितळे, लोखंडे, कासे, चांदेकर, पुणतांबेकर, इत्यादी. काही खनिजांवर आधारित असतात..  रत्नपारखी, हिरे, पोवळे, लसुणे, गारगोटे, इ.

काही आडनावे, चेहऱ्यावरील अवयवांशी जोडलेली असतात.. जसे डोळे, काने, दुतोंडे, केसकर, टकले, माने, दाते, बोबडे, तिरळे, डोळस, अंधे, डोईफोडे, इ. 

आडनावं, व्यवसायावरुनही चालत आलेली आहेत.. जसे सोनार, सराफ, चांदिवले, वकील, सुतार, पारधी, वैद्य, चिटणीस, दिवाण, भगत, गुरव, लोहार, इ. काही पिढ्यांसाठी त्यांचा तो व्यवसाय असेलही, नंतर मात्र सोनाराचं, कापडाचं दुकान असतं किंवा लोहाराचा टेलरींगचा व्यवसाय असतो..

भाजीपाल्यांवरुनची आडनावं फारच गंमतीशीर असतात.. जसे भोपळे, दुधे, कारले, पडवळ, भेंडे, गवारे, रताळे, मुळे, तोंडले, केळकर, आंबेकर, फणसे, गाजरे, ढोबळे, राजगिरे, अंबाडे, नारळे, काकडे, इ. यातील भोपळे हे सडपातळ असू शकतात.. व कार्लेकर, मिठ्ठास बोलणारे असतात..

प्राणीमात्रांवरुन पडलेली आडनावं मजेशीर असतात.. उदा. मांजरेकर, उंदरे, वाघ, चितळे, सांबारे, मोरे, बिबटे, कोल्हे, कावळे, घारे, वाघमारे, मुंगसे, लांडगे, गरुड, ससे, बकरे, म्हशीलकर, पोळ, इ. जशी आडनावं, तशी ही माणसं असतीलच याची खात्री नसते.. म्हणजे ससे हे धीट असू शकतात, तर वाघ, डरकाळी फोडणे विसरुन मितभाषी झालेले असतात..

काही गंमतीशीर, प्रकृती बिघडल्याची आडनावं पहायला मिळतात.. जसे पादरे, हगवणे, पोटफोडे, पोटे, उचके, लिडबिडे, काणे, शेंबडे, लाळे, खोकले, उकिडवे, हगे, चिपडे, ढोमे, फेंदरे, इ. यांना आपलं आडनाव सांगतानाही, संकोच वाटतो…

काही आडनावं ही, गावातील कार्यपद्धतीवर असतात.. जसे पाटील, नगरकर, कुलकर्णी, मास्तर, सरपंच, सरंजामे, इनामदार, सुभेदार, हवालदार, भालकर, मोहिते, पवार, ठाकूर, ठाकरे, देशपांडे, मेश्राम, इ.  अशा नावांना, मान असतो..

चलनावर देखील आडनावं असतात, जसे पगारे, रोकडे, सहस्त्रभोजने, लाखे, कोटस्थाने, तिजोरे, हजारे, फुकटे, पावले, सोळशे, तनखीवाले, इ. यांच्या नावातच ‘नगद नारायण’ असल्यामुळे, यांची ‘चलती’ असते..

आवाज दर्शवणारीही आडनावं असतात.. जसे बोंबले, कोकले, घुमे, बडबडे, बोबडे, मुके, हर्षे, खिंकाळे, गोंधळे, तावडे, आकांत, घोगरे, इ. 

गाव व शहरावरुन पडलेली आडनावं.. शेगांवकर, किर्लोस्कर, चिपळूणकर, कराडे, गोवेकर, सासवडकर, जिंतीकर, उसगांवकर, धारवाडकर, सोलापूरकर, मुरुडकर, पावसकर, नाशिककर, नागपुरे, मालवणकर, पुणेकर, दादरकर, वसईकर, इ. यांनी आपलं गाव सोडून पन्नास वर्षे झाली तरी आडनावाची नाळ तुटलेली नसते..

काही आडनावं चवदार, टेस्टी असतात.. जसं गोडे, आंबट, कडू, दहिवळे, ताकवले, श्रीखंडे, चक्के, कडबोळे, करंजे, पुरी, हलवाई, झणकर, हिंगमिरे, आवळे, बोरे, चिंचोरे, डाळिंबे, इ. ही नावं घेतली तरी त्यांच्या अनुभवाची चव आठवते..

आडनावांचा हा धांडोळा, थोडक्यात आटोपता घेतो.. कारण याला अंत नाही.. एवढी विविधता असूनही, काही आडनावे ही अविस्मरणीय अशीच आहेत.. कारण त्या व्यक्तींचं योगदान मोलाचे आहे…

उदा. अत्रे, म्हटलं की प्रल्हाद केशव अत्रे, देशपांडे म्हटलं की, पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे, सावरकर म्हटलं की, विनायक दामोदर सावरकर, शेळके म्हटलं की, शांताबाई शेळके, घाणेकर म्हटलं की, काशिनाथ घाणेकर, दलाल म्हटलं की, दीनानाथ दलाल, पंडित म्हटलं की, एस. एम. पंडितच आठवतात… ही आडनावांतली जादू आहे.. त्या माणसांचं मोठेपण, त्या नावाला चिकटलेलं असतं… ते नाव तसंच तेजोमय राखण्यासाठी, त्याला जपावं लागतं.. नाहीतर ‘ नाव मोठं, लक्षण खोटं ‘ व्हायला वेळ लागत नाही…

हा लेख जर शेक्सपिअरने वाचला असता, तर नक्कीच तो ‘ ओशाळला ‘ असता… हे नक्की!!

© सुरेश नावडकर

११-६-२२

मोबाईल ९७३००३४२८४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – बालपण चित्रकाव्य ☆ – निरागस बालपण – ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

?️?  बालपण चित्रकाव्य  ?️?

 ? – निरागस बालपण –  ? ☆ सौ. जयश्री पाटील 

डाव रंगतो खेळाचा

अशा मोकळ्या मैदानी

आनंदाला नसते सीमा

सोबत मित्र-मैत्रिणी….१

गर्द सावलीत झाडांच्या

दंग होती सारे खेळत

सुदृढ आरोग्य बनते

अशा मोकळ्या हवेत….२

अटीतटीचा सामना

उत्कंठा आणि चुरस

सरावातूनच होते

कामगिरी मग सरस….३

निरागस बालपण

अल्लड आणि खेळकर

हार-जीत शिकविते

जगी जगण्याची रीत….४

चित्र साभार – सौ. जयश्री पाटील

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ ग़ज़ल ।। रिश्ते बहुत कीमती जिंदगी में… ।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस”☆

श्री एस के कपूर “श्री हंस”

(बहुमुखी प्रतिभा के धनी  श्री एस के कपूर “श्री हंस” जी भारतीय स्टेट बैंक से सेवा निवृत्त अधिकारी हैं। आप कई राष्ट्रीय पुरस्कारों से पुरस्कृत/अलंकृत हैं। साहित्य एवं सामाजिक सेवाओं में आपका विशेष योगदान हैं।  आप प्रत्येक शनिवार श्री एस के कपूर जी की रचना आत्मसात कर सकते हैं। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण ग़ज़ल  । रिश्ते बहुत कीमती जिंदगी में…)

☆ ग़ज़ल ।। रिश्ते बहुत कीमती जिंदगी में… ।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस”☆ 

[1]

हर गम का तू   इज़हार न   कर।

तू खुद को बस अखबार न  कर।।

[2]

रिश्ते बहुत   कीमती   जिंदगी में।

इनका कभी   तू  व्यापार न  कर।।

[3]

तेरेआसपास ही खुशियां    हज़ार।

तू खुशियों का   इंतिज़ार न    कर।।

[4]

महोब्बत नियामत   है  दुनिया   में।

नफ़रतों से  कभी  करार   न   कर।।

[5]

इस दुनिया के इन   तौर तरीकों में।

तू अपना बे  खबर घर बार न  कर।।

[6]

सबकी सुन    और   सबको  समझ।

नतीजों में खुद को   सरकार न कर।।

[7]

जीत हार हिस्सा किस्सा जिंदगी का।

मन से तो  कभी  खुद     हार न कर।।

[8]

कोशिश करना ही बस फ़र्ज़ है हमारा।

यूँ ही अपने जी   को    बेकरार न कर।।

[9]

इक  बुरी बला है   अहम   बहुत    ही।

यूँ गुस्से में    ही  तू ललकार     न कर।।

[10]

गरीब के घर मिलें गर मीठे बोल तुझको।

जाने को भी वहाँ तू कभी इंकार न कर।।

[11]

हंस प्रभु ने दी जिंदगी इक मकसद को।

जीते जी इस कर्ज़  को तू उधार न कर।।

© एस के कपूर “श्री हंस”

बरेली

ईमेल – Skkapoor5067@ gmail.com

मोब  – 9897071046, 8218685464

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ ‘विरोधाभास’… श्री संजय भरद्वाज (भावानुवाद) – ‘Paradox…’ ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. Presently, he is serving as Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad is involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.)

We present an English Version of Shri Sanjay Bhardwaj’s Hindi poem “विरोधाभास”  .  We extend our heartiest thanks to the learned author  Captain Pravin Raghuvanshi Ji (who is very well conversant with Hindi, Sanskrit,  English and Urdu languages) for this beautiful translation and his artwork.)

श्री संजय भारद्वाज जी की मूल रचना 

? विरोधाभास ??

सम्बंधों में खाई चोट का

दोष किसीको दूँ भी तो कैसे,

बटोरना उनका तंत्र रहा,

बाँटना मेरा मंत्र रहा,

पलड़े के एक ओर

दोनों साथ तुलते भी कैसे?

© संजय भारद्वाज

 English Version by – Captain Pravin Raghuvanshi
? Paradox ??

How can I blame anyone for

hurtful impairment in the relationship

Amassing was their way,

Sharing has been my mantra,

How can both be weighed together

on the same side of the pan?

~Pravin

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈  Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – ह्रास ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि –  ह्रास ??

इसने कहा,

उसके भीतर

कुछ कम हो रहा है,

उसने कहा,

उसके भीतर

कुछ कम हो रहा है,

सबने कहा,

सबके भीतर

कुछ कम हो रहा है,

हरेक को भीतर

कुछ कम होने का भास है,

मनुज! संभवत: यही

मनुष्यता का ह्रास है..!

© संजय भारद्वाज

14 जुलाई 2020, प्रात: 11:13 बजे

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares