मराठी साहित्य – जीवनरंग ☆ EQ, दूधवाला आणि फ्री पिझ्झा…भाग -2 ☆ योगिया ☆

? जीवनरंग ❤️

☆ EQ,  दूधवाला आणि फ्री पिझ्झा…भाग -2 ☆ योगिया

EQ (Emotional Quotient), दूधवाला आणि फ्री पिझ्झा

पिझ्झा खाताना आजोबा आम्हाला सांगत होते कि “आज तुमची आजी असती ना तर तिने त्याला आज ठेवूनच घेतला असता. फार जीव लावायची सगळ्यांना.” फार इमोशनल झाले होते आजोबा. सांगत होते कि “त्यांच्याकडे एक अप्पा दूध घालायला यायचे. जवळच्या गावातून पहाटे ५.३० – ६.०० ला निघायचे. बरोबर ७. २० ते ७. ३० च्या दरम्यान आमच्याकडे यायचे. कित्त्येक वर्षे येत होते. कधी खाडा नाही. आजारपण नाही. ऊन -पाऊस नाही. वेळ ठरलेली. एकदा मात्र त्यांना यायला उशीर झाला ८.३० वाजले. तुझ्या आजीची चलबिचल सुरु. कशात तिचं लक्ष लागेना. सारखा एकच घोष “अप्पाला कधी उशीर होत नाही आज काय झालं?” ९ वाजले. मग तिने दारामागे अप्पासाठी भांड पालथं घातलं (पूर्वी अशी पद्धत होती कि कोणाला उशीर झाला, आपण कोणाची वाट पहात असू तर त्याच्या नावाने दारामागे भांड पालथं घालायचं). १० वाजत आले. मला ऑफिस ला जायचे होते. मला म्हणाली अप्पा आल्याशिवाय ऑफिस ला जायचं  नाही. जा त्याला बघून या. मग मी एका दिशेला. तुझ्या बाबाला आईने पिटाळलं कि बाकी ज्यांच्याकडे अप्पा दूध टाकतो त्या सगळ्यांकडे जाऊन ये”

“शेवटी ११.०० ला अप्पा आला. त्याची गाडी खराब झाली होती. शिक्षा म्हणून मग त्या दिवशी अप्पा ला आपल्याकडे जेवावं लागलं. तिने नाही अप्पाला अजून १ लिटर दूध फ्री मागितलं. अप्पा पण तिला खरवस , भूईमूगाच्या शेंगा , शेवग्याच्या शेंगा , कणस असं काय काय द्यायचा. त्याचा हिशोब नसायचा.”

उन्हाळ्यात पोस्टमन साठी पन्ह करून ठेवायची..बिचारा इतक्या उन्हात पत्र वाटत फिरतो म्हणून.

कामवाल्या बाईंना रोज ओरडायची, भांडी स्वच्छ निघत नाहीत म्हणून. २ तरी परत धुवायला लावायची पण त्यांचं काम झालं कि त्यांना रोज १ ग्लास भर दूध. वर म्हणायची ताकद नसेल तर कशी निघणार भांडी म्हणून दूध देते तुला. कामवाल्या बाईंनी पण कधी कटकट केली नाही. पाहुणे -रावळे झाले कि  जास्तीची भांडी पडायची. पण म्हणून खाडा नाही केला त्यांनी.

तिने या सगळ्याकडे कधी सर्व्हिस म्हणून नाही पाहिलं. आमच्यावेळी एकूणच जगण्याला SLA ‘s, KPI’s, KRA’s, Goals, Targets चिकटली नव्हती रे. आम्ही  नाती मात्र जोडली होती.  तुम्ही सगळ्याला पेनल्टी किंवा रिवॉर्ड लावून सर्व्हिस मिळवता आणि सुखी होता.  आम्ही संवेदना जाणून सर्व्हिस मिळवायचो आणि समाधानी राहायचो.  अरे मी काय बडबड करत बसलोय. तुझ्या आजीची आठवण झाली इतकंच.  असो. चला पिझ्झा संपवा आणि मग तुमची काय ती कंप्लेंट लाँच करा. “

“मग केली का?”

“नाही बाबा.. यापुढे कधीच कोणाला उशीर झाला तर कंप्लेंट  नाही करणार आणि फ्री पिझ्झा पण नाही मागणार, नो वन ड्स इट पर्पसली.. मला तर वाईट वाटतंय कि आपल्याला वेळेत पिझ्झा पोहोचवण्याचा नादातच तो घसरून पडला असेल” – छोटे चिरंजीव म्हणाले.

दादुने विचारलं ” तुमचं लेक्चर कसं होतं”

बायको उठता उठता म्हणाली  “तुम्ही आज जे शिकलाय त्यापुढे काहीच नाही…जा झोपा आता”

– योगिया

०१ जून २०२२

([email protected] / ९८८१९०२२५२)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आंतरराष्ट्रीय योगा दिन – भाग – 1 ☆ डॉ मनीषा आणि डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आंतरराष्ट्रीय योगा दिन – भाग – 1 ☆ डॉ मनीषा आणि डॉ अभिजीत सोनवणे

नमस्कार.  मी डॉक्टर मनीषा अभिजीत सोनवणे…. 

रस्त्यावर नाईलाजाने भीक मागणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाचा आम्ही प्रयत्न करत आहोत…. Doctor for Beggars म्हणून…. 

दरवर्षी आम्ही आमच्या भीक मागणाऱ्या लोकांसमवेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतच असतो…. 

यावेळीही आम्हाला प्रश्न विचारला, यंदा भीक मागणाऱ्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार का ? 

होय …. नक्कीच करणार आणि आमच्या भीक मागणाऱ्या लोकांच्या समवेतच तो साजरा करणार…. 

यावर्षीची आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे “Yoga for Humanity”—-

हल्लीच्या महागाईच्या काळात ह्युमॅनिटी…. “माणुसकी” सुद्धा खूप महाग झाली आहे. 

तुम्ही ज्यांना भिकारी म्हणता ते असतात तरी कोण…? आपल्याकडे युज अँड थ्रो ची पद्धत आहे…. म्हणजे एखाद्या गोष्टीचा वापर करून झाला की ती फेकून द्यायची…. मुलं बाळं, सुना नातवंडं, हे सुद्धा आपल्या आई बापाचा, आजी आजोबाचा ‘Use’ करून झाला की त्यांना ‘Throw करतात… ` It’s a new fashion….Yoooo !!! `

आई बापाला कुष्ठरोग, टीबी यासारखे रोग झाले की, हे रोग आमच्या ‘Kids’ ना होवू नयेत यासाठी सध्याचे  जागरूक Mom and Dad आपल्या आई बाप आणि आजी-आजोबांना रस्त्यावर फेकून देतात— अक्षरशः तुटलेल्या चपलेगत…. 

आणि मग जगण्यासाठी या आई बाप आणि आजी-आजोबांना नाईलाजाने भीक मागावी लागते… 

अशा नाईलाजाने भीक मागणाऱ्या…लोकांनी टाकलेल्या आईबाबांसाठी आम्ही आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहोत…पोरांनी टाकून दिलेल्या …. तुटलेल्या या चपला “पादुका” म्हणून आम्ही डोक्यावर घेणार आहोत…. 

`योग` हा शब्द मूळ संस्कृतातील  “ युज “ या धातूपासून तयार झाला आहे. आणि याचा अर्थ “जोडणे….” 

येणारा हा आंतरराष्ट्रीय दिन भीक मागणाऱ्या लोकांसमवेत साजरा करून, गावकरी आणि भिक्षेकरी ही समाजातली iदोन टोकं जोडण्याचा प्रयत्न  आम्ही यानिमित्ताने करणार आहोत…. 

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने…” आई बाबा तुम्ही आम्हाला हवे आहात..” हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत…. 

चितेवर जाण्याआधी त्यांच्यात चेतना निर्माण करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करणार आहोत…. 

नळ दुरुस्त करणारा कारागीर कितीही कुशल असला तरीसुद्धा डोळ्यातलं पाणी थांबवायला आपल्या माणसाचीच  गरज असते…. 

 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने…. “युज अँड थ्रो” केलेल्या या आई-बाबांचा हात हातात घेऊन…..  त्यांचं “आपलं माणूस” होण्याचा यानिमित्ताने प्रयत्न करणार आहोत….. 

Yoga for humanity…. ! 

ह्युमॅनिटी चा अर्थ जर “ माणुसकी “ असा असेल तर त्यातला एक अंश आम्ही जगण्याचा प्रयत्न करणार आहोत…. 

21 तारखेला शनिवारवाड्याशेजारील फुटपाथवर आम्ही हा सोहळा सकाळी ११ वाजता आयोजित करत आहोत…. 

आमच्या या सोहळ्यामध्ये कसलाही डामडौल नसेल …येथे कोणी सेलिब्रिटी नसतील…

इथे फक्त असतील समाजाने फेकलेले…थकलेले ….आयुष्याच्या अंताला लागलेले आई आणि बाप !

आमच्या या सोहळ्यात आपणही सहभागी झालात तर त्यांना आणि आम्हाला नक्कीच आनंद होईल…. 

या निमित्ताने आपण उद्या  गोरगरिबांना शिधा देत आहोत…. !!! 

या शिध्याने त्यांचं ८ दिवसच पोट भरेल…. पण आम्ही मात्र कायमचे तृप्त होवू….! 

निसर्गाची किमयाच अशी की ….घेऊन मिळतो तो “आनंद” आणि देऊन मिळतं ते “समाधान“…! 

—क्रमशः भाग पहिला 

© डॉ मनीषा आणि डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पेडगावचे शहाणे… ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

 ☆ पेडगावचे शहाणे… ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

बऱ्याच वेळा आपण पेडगावचे शहाणे किंवा वेड पांघरून पेडगावला जाणे. असे वाक्प्रचार वापरतो. पण असा कधी विचार केला आहे का ? की पेडगावच का ?  दुसरे कुठले गाव का नाही ? पाहू या तर मग :-            

६ जून १६७४ला शिवराज्याभिषेक संपन्न झाला. ह्या अद्वितीय सोहळ्यासाठी एकूण साधारण १ कोटी रुपये खर्च आला. हा खर्च राजांनी मुघलांकडून कसा वसूल केला ? त्याची ही गमतीशीर हकीकत आणि गनिमी काव्याचे एक उत्कृष्ट उदाहरण :-        

अहमदनगर जिल्ह्यात ‘पेडगाव’ नावाचं एक गाव आहे. तिथे बहादूरखान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा महामुजोर सुभेदार होता. आपल्या शिवाजी महाराजांना अशी खबर मिळाली की २०० उच्च प्रतीचे अरबी घोडे आणि साधारण १ कोटी रुपये (तेव्हा होन ही मुद्रा होती, रुपये नव्हते) बहादुरगडावर आले आहेत. आणि तिच्या रक्षणासाठी मोठी फौजही तैनात आहे. ही सगळी मालमत्ता लवकरच दिल्लीस रवाना होणार आहे. आता महाराजांनी आज्ञा दिली की २००० चं सैन्य बहादुरगडावर चढाई करेल आणि ही सर्व लूट लुटून आणेल (बलाढ्य ऐवज आणि ते २०० उमदा अरबी घोडे). 

कोणास ठाऊक कशी पण खानाला ही बातमी समजली , तेव्हा तो माजोरडा चेष्टेने हसत  म्हणाला, ” सिर्फ २००० मराठा मावळे ! उनके लिये तो किलेके दरवाजे खोल दो. अंदर आतेही खदेड देंगे,काट देंगे.”

तारीख १६ जुलै १६७४, पेडगावच्या त्या बहादूरगडातून मुघल सैन्याला दूरवर धूळ उडताना दिसली. घोडदौड येत आहे हे त्यांच्या लक्षात आले.  धोक्याच्या तुताऱ्या वाजल्या आणि गडावर आधीच तयार असलेली खानाची प्रचंड सेना सज्ज झाली. त्यांनी किल्ल्याचे दरवाजेही उघडले. जसे गाफील मावळे जवळ आले, तसा लगेच खानाच्या सेनापतीने चढाईचा हुकूम दिला. अनपेक्षितपणे झालेल्या या प्रतिकाराने सगळे २००० मावळे बिथरले आणि जीव वाचवायला ते मागे फिरले. पण त्यांचे घोडे जोरच पकडत नव्हते. मात्र खानाची संपूर्ण फौज जशी जवळ येऊ लागली–खूप जवळ आली– तशी त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून घोड्यांनी वेग पकडला आणि मावळ्यांनी पाठ दाखवून मागे धूम ठोकली. बहादूरखान स्वतः त्यांच्या समाचारासाठी मुघल सैन्याच्या पुढे होता. अनेक कोस ही घोडदौड चालत राहिली.  कारण मावळ्यांच्या घोडदौडीतली भीती बहादूरखानास चेव आणीत होती. शेवटी मावळे पार पसार झाले, संपूर्ण २०००ची फौज वाचली खरी, पण आपले शिवबा हरले रे !

खानाच्या फौजेत  एकच जल्लोष झाला. शिवाजीच्या फौजेला हरवून पळायला लावणे हे काही छोटे काम नाहीच.` शिवबांची फौज हरली, पळ काढला ! ` ही जीत औरंगजेबास कळल्यावर आपल्याला केवढे इनाम मिळेल ? ह्या आनंदात बहादूरखान छाती फुगवून घोड्यावरून डौलत डौलत परतत होता. तितक्यात सगळं सैन्य एकदम शांत झालं आणि डोळे विस्फारून दूरवर असलेल्या बहादूरगडाकडे बघू लागलं. धुराचे मोठ मोठे लोट किल्ल्यातून बाहेर पडताना दिसत होते. खानाने भीतीने आवंढा गिळत किल्लेदाराला विचारलं, “अगर हम सब यहाँ हैं, तो किलेपर कौन है?”  “कोई नही जहापन्हा. आपकाही हुकुम था की सबने मिलकर शिवाजी के उन २००० मावलों पर चढ़ाई करनी है “. आता किल्लेदार, सेनापती, आणि स्वतः खानाचे धाबे दणाणले. कारण काय आक्रित झालं असणार ह्याचा त्यांना अंदाज  आला.  आणि त्याच सोबत छत्रपती शिवाजीराजे ही काय चीज आहे हे ही ध्यानात आलं. आणि त्यांची भीती खरी ठरली. एक घोडेस्वार दौडत आला, आणि , “हुज़ूर, गज़ब हो गया, हम सब लुट गए, बर्बाद हो गए. आप सब वहां २०००  मराठाओं के पीछे दौड़े, और यहाँ किलेपर ७००० मराठाओंने हमला करके  सब लूट लेके चले गए हुज़ूर !”.                            

अशा प्रकारे  राज्याभिषेकाचा खर्च एक कोटीही वसूल, शिवाय २०० उच्चप्रतीचे अरबी घोडे छत्रपतींच्या ताफ्यात— आणि हे सगळ नाट्य घडलं एकही मावळा न गमावता, रक्ताचा एक थेंबही न सांडता.                       

आता लक्षात आलं का ? की हे सगळं नाट्य घडलं कुठे, तर पेडगावला. खानाला वेड बनवलं ते त्या पेडगावात. आणि म्हणून,

 पेडगावचे शहाणे

 आणि                             

वेड पांघरून पेडगावला जाणे

हे दोन वाक्प्रचार मराठी भाषेला लाभले.

 

छत्रपति शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

 

माहिती संग्राहक : माधव केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गोड गोडूला ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? 😍 गोड गोडूला ! 💓 ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆ 

न कळत्या वया मधे

धरून पुस्तक हाती

मन लावून शोधतो

जणू जगाची उत्पत्ती

पाहून ही एकाग्रता

चक्रावली मम मती

वाचाल तर वाचाल

हेच त्रिवार सत्य अंती

आदर्श गोड गोडुल्याचा

आजच्या पिढीने घ्यावा

चांगल्या पुस्तकात मिळे

तुम्हां ज्ञानामृताचा ठेवा

छायाचित्र – सुशील नलावडे, पनवेल.

© प्रमोद वामन वर्तक

१४-०६-२०२२

ठाणे.

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आतिश का तरकश #146 – ग़ज़ल-32 – “मुहब्बत अगर हो भी जाए…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी  ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं ।प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकशआज प्रस्तुत है आपकी ग़ज़ल “मुहब्बत अगर हो भी जाए…”)

? ग़ज़ल # 32 – “मुहब्बत अगर हो भी जाए…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ?

मुहब्बत से लबालब भरा किसी का भी हो दिल

नफ़रत का भी मकाँ है किसी का भी हो दिल।

 

मुहब्बत अगर हो भी जाए किसी को किसी से,

मुहब्बत का भ्रम टूटेगा किसी का भी हो दिल।

 

ग़ुलाब की तरह मुहब्बत काटों संग खिलती है,

वियोग ख़ार सा चुभता किसी का भी हो दिल।

 

कौंपल पंखुडियाँ मुरझा जाती नज़रों की तपिश से,

नफ़रत के ख़ार खिलते हो किसी का भी हो दिल।

 

आना-जाना क़ायदा है इस कायनात का ‘आतिश’

टूटता मुहब्बत में एक बार किसी का भी हो दिल,

© श्री सुरेश पटवा ‘आतिश’

भोपाल, मध्य प्रदेश

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ मुक्तक – ।। पिता का  हाथ, अंधेरे में उजाले का साथ है ।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस”☆

श्री एस के कपूर “श्री हंस”

(बहुमुखी प्रतिभा के धनी  श्री एस के कपूर “श्री हंस” जी भारतीय स्टेट बैंक से सेवा निवृत्त अधिकारी हैं। आप कई राष्ट्रीय पुरस्कारों से पुरस्कृत/अलंकृत हैं। साहित्य एवं सामाजिक सेवाओं में आपका विशेष योगदान हैं। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण रचना ।पिता का  हाथ, अंधेरे में उजाले का साथ है)

☆ मुक्तक – ।। पिता का  हाथ, अंधेरे में उजाले का साथ है ।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस”☆ 

[1]

माँ स्नेह का    स्पर्श     तो

पिता धूप में      छाया   है।

माँ घर करती     देखभाल

तो पिता  धन     लाया   है।।

माँ बाप  के       आजीवन

ऋणी हैं    हम  सब      ही।

इनसे ही   प्राप्त   हुई   हम

सब को           काया     है।।

[2]

माँ ममता    की मूरत    तो

जैसे पिता        साया     है।

माँ से सबने     ही     बहुत

प्यार दुलार        पाया.   है।।

जीवन में      आती        है

जब   भी            कठिनाई।

पिता ने   साथी.  बन   कर

हाथ       बढ़ाया            है।।

[3]

माँ बाप ने   ऊँगली  पकड़

चलना          सिखाया   है।

बड़ा कर के          लिखना

पढ़ना            बताया     है।।

पिता से ही        जाना    है

कैसे   बनना          मजबूत।

बाजार से     खिलौने     तो

पिता     ही       लाया     है।।

[4]

माँ खुला   आंगन         तो

पिता     जैसे       छत    है।

जमाने से        बचने    की

हर सीख    का     खत   है।।

हम हैं संसार में          बस

माँ बाप     की      बदौलत।

माता पिता से    ही मिलता

संस्कारों का     तत्व       है।।

[5]

माता पिता ही      समझाते

अपने पराये   का       अंतर।

हमें बड़ा करने को     करते

वह दोनों    ही     हर  जंतर।।

पिता का हाथ    लगता    यूँ

जैसे अंधेरे      में     उजाला।

माता पिता की     सेवा    ही

जैसे   हर    पूजन  मंतर   है।।

© एस के कपूर “श्री हंस”

बरेली

ईमेल – Skkapoor5067@ gmail.com

मोब  – 9897071046, 8218685464

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – राष्ट्रीय एकात्मता में लोक की भूमिका – भाग – 16 ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि – राष्ट्रीय एकात्मता में लोक की भूमिका – भाग – 16 ??

लोकसंस्कृति, सृष्टि को युग्मराग मानती है। सृष्टि, प्रकृति और पुरुष के युग्म का परिणाम है। स्त्री प्रकृति है। स्त्री एकात्मता की दूत है। मायके से ससुराल आती है, माँ से, मायके से स्वाभाविक रूप से एकात्म होती है। इसी एकात्म भाव से ससुराल से एकरूप हो जाती है। स्त्रियाँ केवल समझती नहीं अपितु माँ बनकर विस्तार करती हैं एकात्मता का। लोक में वस्तुओं के विनिमय की पद्धति का विकास महिलाओं ने बहुतायत से किया। आवश्यकता पड़ने पर पुरुषों से छिपकर ही सही, कथित निचले वर्ग  या विजातीय स्त्रियों के साथ लेन-देन किया। त्योहारों में मिठाई के आदान-प्रदान में विधर्मियों के साथ व्यवहार की वर्जना को स्त्रियों ने सूखे अनाज के बल पर कुंद किया। तर्क यह कि अनाज, धरती की उपज है और धरती तो सबके लिए समान है। यह अद्वैत दृष्टि, यह एकात्मता अनन्य है।

मनुष्य विकारों से मुक्त नहीं हो सकता। स्वाभाविक है कि लोक भी इसका अपवाद नहीं हो सकता लेकिन वह गाँठ नहीं बांधता। किसी कारण से किसी से द्वेष हो भी गया तो उसकी नींव पक्की होने से पहले विरोधी से होली पर गले मिल लेता है, दिवाली पर धोक देने चला जाता है। जैन दर्शन का क्षमापना पर्व भी इसी लोकसंस्कृति का एक गरिमापूर्ण अध्याय है।

लोक और प्रकृति में समरसता है, एकात्म है। लोक ‘क्षिति, जल, पावक, गगन, सरीरा, पंचतत्व से बना सरीरा’ के अनुसार इन्हीं तत्वों को सृष्टि के विराट में देखता है। सूक्ष्म को विराट में देखना, आत्मा को परमात्मा का अंश मानना, एकात्मता की इससे बेहतर कोई परिभाषा हो सकती है क्या?

क्रमशः…

© संजय भारद्वाज

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ लघुकथा – अहम की भेंट ☆ डॉ कामना तिवारी श्रीवास्तव ‘कौस्तुभ’ ☆

डॉ कामना तिवारी श्रीवास्तव ‘कौस्तुभ’

(आज  प्रस्तुत है  डॉ कामना कौस्तुभ जी की एक विचारणीय लघुकथा अहम की भेंट) 

 ☆ कथा कहानी ☆ लघुकथा – अहम की भेंट ☆ डॉ कामना तिवारी श्रीवास्तव ‘कौस्तुभ’ ☆ 

धूमधाम से मुंबई से मैट्रिक पास लड़की को ब्याह कर लाए। कुछ दिनों बाद निशा ने कहा आप लोगों ने तो कहा था कि पढ़ने देंगे। तब अजय ने डांट कर कहा – “कोई जरूरत नहीं पढ़ने लिखने की। घर गृहस्ती संभालो और उसके बाद मारपीट गाली-गलौज के माहौल में एक के बाद एक तीन लड़कियों को जन्म दिया। अजय के तेज स्वभाव ने कभी भी उसे गृहस्ती के या लड़कियों के पढ़ाई लिखाई और भविष्य के निर्णयों में बोलने का अधिकार नहीं दिया। तीनों लड़कियों को बिना ज्यादा पढ़ाई के शादी कर जहां-तहां पटक दिया गया।

 यहां तक कि अजय का बिजनेस कैसे चलता है इसकी जानकारी भी कभी निशा को नहीं दी। अचानक अजय को एक के बाद एक दो हार्ट अटैक आए और 2 दिन के बाद ही हार्ट फेल हो गया। तेरहवीं के बाद निशा ने सोचा कि जीवन तो चलाना ही होगा। उसने अजय  की अलमारी छान मारी पर कहीं कोई हिसाब किताब, लिखा पढ़ी, किस से कितना पैसा लेना है कोई भी जानकारी नहीं मिली ना ही बैंक अकाउंट में कोई पैसा, न हीं खुद का मकान। बेटियां भी आत्मनिर्भर नहीं थी। तो ना तो उनसे और ना ही उनके ससुराल से कोई सहारा मिला।  2 महीने से छोटी-मोटी नौकरी भटकने के बाद भी कहीं से कोई जवाब नहीं मिला।

एक बार फिर एक नारी का जीवन एक पुरुष के अहम् की भेंट चढ़ गया।

© डॉ कामना तिवारी श्रीवास्तव ‘कौस्तुभ’

मो 9479774486

जबलपुर मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ काव्य धारा # 87 ☆ गजल – ’’पीड़ा का भारी बोझ…” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी  द्वारा रचित एक भावप्रवण  ग़ज़ल  “पीड़ा का भारी बोझ …”। हमारे प्रबुद्ध पाठक गण  प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी  काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे। ) 

☆ काव्य धारा 87 ☆ गजल – पीड़ा का भारी बोझ …  ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

चोटों पै चोट दिल पै कई खाये हुये है।

दुख-दर्दो को मुस्कानों में बहलाये हुये हैं।।

 

जब से है होश सबके लिये खपता रहा मैं

पर जिनको किया सब, वही बल खाये हुये हैं।।

 

करता रहा हर हाल मुश्किलों का सामना

पर जाने कि क्यों लोग मुँह फुलाये हुये हैं।।

 

गम खाके अपनी चोट किसी से न कह सका

हम मन को कल के मोह में भरमाये हुये हैं।।

 

लगता है अकेले कहीं पै बैठ के रोयें

किससे कहें कि कितने गम उठाये हुये हैं।।

 

औरों से शिकायत नहीं अपनों से गिला है

जो मन पै परत मैल की चिपकाये हुये हैं।।

 

दिल पूछता है मुझसे कि कोई गल्ती कहाँ है ?

धीरज धरे पर उसको हम समझाये हुये हैं।।

 

देखा है इस दुनियाँ में कई करके भी भलाई

अनजानों से बदनामी ही तो पाये हुये हैं।।

 

करके भी सही औरों को हम खुश न कर सके

पीड़ा का भारी बोझ ये उठाये हुये हैं।।

 

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ 

ए २३३ , ओल्ड मीनाल रेजीडेंसी  भोपाल ४६२०२३

मो. 9425484452

[email protected]

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ आशीष का कथा संसार # 95 – अभागा राजा और भाग्यशाली दास ☆ श्री आशीष कुमार ☆

श्री आशीष कुमार

(युवा साहित्यकार श्री आशीष कुमार ने जीवन में  साहित्यिक यात्रा के साथ एक लंबी रहस्यमयी यात्रा तय की है। उन्होंने भारतीय दर्शन से परे हिंदू दर्शन, विज्ञान और भौतिक क्षेत्रों से परे सफलता की खोज और उस पर गहन शोध किया है। 

अस्सी-नब्बे के दशक तक जन्मी पीढ़ी दादा-दादी और नाना-नानी की कहानियां सुन कर बड़ी हुई हैं। इसके बाद की पीढ़ी में भी कुछ सौभाग्यशाली हैं जिन्हें उन कहानियों को बचपन से  सुनने का अवसर मिला है। वास्तव में वे कहानियां हमें और हमारी पीढ़ियों को विरासत में मिली हैं। आशीष का कथा संसार ऐसी ही कहानियों का संग्रह है। उनके ही शब्दों में – “कुछ कहानियां मेरी अपनी रचनाएं है एवम कुछ वो है जिन्हें मैं अपने बड़ों से  बचपन से सुनता आया हूं और उन्हें अपने शब्दो मे लिखा (अर्थात उनका मूल रचियता मैं नहीं हूँ।”)

☆ कथा कहानी ☆ आशीष का कथा संसार #95 🌻 अभागा राजा और भाग्यशाली दास 🌻 ☆ श्री आशीष कुमार

एक बार एक गुरुदेव अपने शिष्य को अहंकार के ऊपर एक शिक्षाप्रद कहानी सुना रहे थे।

एक विशाल नदी जो कि सदाबहार थी उसके दोनो तरफ दो सुन्दर नगर बसे हुये थे! नदी के उस पार महान और विशाल देव मन्दिर बना हुआ था! नदी के इधर एक राजा था। राजा को बड़ा अहंकार था । वह कुछ भी करता तो अहंकार का प्रदर्शन करता। वहाँ एक दास भी था, बहुत ही विनम्र और सज्जन!

एक बार राजा और दास दोनो नदी के वहाँ गये राजा ने उस पार बने देव मंदिर को देखने की इच्छा व्यक्त की दो नावें थी रात का समय था एक नाव मे राजा सवार हुआ और दूजे मे दास सवार हुआ। दोनो नाव के बीच मे बड़ी दूरी थी!

राजा रात भर चप्पू चलाता रहा पर नदी के उस पार न पहुँच पाया सूर्योदय हो गया तो राजा ने देखा की दास नदी के उसपार से इधर आ रहा है! दास आया और देव मन्दिर का गुणगान करने लगा तो राजा ने कहा की तुम रात भर मन्दिर मे थे! दास ने कहा की हाँ और राजाजी क्या मनोहर देव प्रतिमा थी पर आप क्यों नही आये!

अरे मैंने तो रात भर चप्पू चलाया पर …..

गुरुदेव ने शिष्य से पुछा वत्स बताओ की राजा रातभर चप्पू चलाता रहा पर फिर भी उस पार न पहुँचा? ऐसा क्यों हुआ? जब की उस पार पहुँचने मे एक घंटे का समय ही बहुत है!

शिष्य – हॆ नाथ मैं तो आपका अबोध सेवक हुं मैं क्या जानु आप ही बताने की कृपा करे देव!

ऋषिवर – हॆ वत्स राजा ने चप्पू तो रातभर चलाया पर उसने खूंटे से बँधी रस्सी को नही खोला!

और इसी तरह लोग जिन्दगी भर चप्पू चलाते रहते है पर जब तक अहंकार के खूंटे को उखाड़कर नही फेकेंगे आसक्ति की रस्सी को नही काटेंगे तब तक नाव देव मंदिर तक नही पहुंचेगी!

हॆ वत्स जब तक जीव स्वयं को सामने रखेगा तब तक उसका भला नही हो पायेगा! ये न कहो की ये मैने किया ये न कहो की ये मेरा है ये कहो की जो कुछ भी है वो सद्गुरु और समर्थ सत्ता का है मेरा कुछ भी नही है जो कुछ भी है सब उसी का है!

स्वयं को सामने मत रखो समर्थ सत्ता को सामने रखो! और समर्थ सत्ता या तो सद्गुरु है या फिर इष्टदेव है , यदि नारायण के दरबार मे राजा बनकर रहोगे तो काम नही चलेगा वहाँ तो दास बनकर रहोगे तभी कोई मतलब है!

जो अहंकार से ग्रसित है वो राजा बनकर चलता है और जो दास बनकर चलता है वो सदा लाभ मे ही रहता है!

इसलिये नारायण के दरबार मे राजा नही दास बनकर चलना!

© आशीष कुमार 

नई दिल्ली

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares