☆ विचार–पुष्प – भाग 19 – विवेक दे ! वैराग्य दे ! ज्ञान दे ! ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
आईची अवस्था, आजूबाजूच्या लोकांची वागण्याची रीत, पितृछत्राचं दु:ख या सगळ्यांमुळे नरेंद्र अंतर्मुख झाला. गरीब आणि दु:खी लोकांचं आक्रंदन भगवंतांना दिसत नाही की काय? नुसता कमरेवर हात ठेऊन, ही निष्ठुर दानवी लीला तो निर्विकारपणे बघतोय? त्याच्या हृदयाला पाझर फुटत नाही? नरेंद्रचा ईश्वरावरचा विश्वासच उडू लागला होता.
आपल्या मित्रांनाही तो हे कधी कधी बोलून दाखवे. त्यावरून त्यांचाही समज दृढ झाला की नरेंद्र आता नास्तिक झालाय. तसच त्याच्या बद्दल शिष्यवृंदांमध्ये आणखी अपप्रचार होऊन तो रामकृष्णांपर्यंत पोहचे. त्यांचा तर नरेंद्रवर पूर्ण विश्वास होताच. खात्री होती. नरेन्द्रबद्दल असे काहीही ऐकून न घेता त्यांनाच ते दटावत असत. पण हेच तर आपली परीक्षा घेत नसतील ना? अशी शंका नरेन्द्रनाथांना आली खरी.
घरगुती कारणांमुळे नरेंद्र दक्षिणेश्वरला श्रीरामकृष्णांकडे जाऊ शकत नव्हते. रामकृष्ण त्यांच्या शिष्यांकरवी नरेंद्रला भेटायला येण्याचे निरोप देत. पण नाही. मनात त्रागा होताच. ईश्वराचा मनातून राग आला होता. पण प्रेमळ अशा रामकृष्णांची आपल्या हृदयातली मूर्ती ते काही केल्या पुसू शकले नव्हते. त्यांच्या बरोबर आलेल्या आतापर्यंतच्या आध्यात्मिक अनुभवामुळे त्यांनी कल्पिलेली नास्तिकता दूर होऊ लागली होती. एका क्षणी त्यांना स्वत:चेच आश्चर्य वाटले की मी हे काय करतोय? त्यांना जाणीव झाली आपल्या अस्तित्वाची.
‘केवळ पैसा मिळवून, कुटुंबाचं अटीतटीने पोषण करत आयुष्य कंठीत राहायचं? आणि एक दिवस मरून जायचं? नाही, नाही माझा जन्म यासाठी झाला नाही. माझ्या जीवनाचं उद्दीष्ट महान आहे. अखंड सच्चिदानंदाचा लाभच माझे लक्ष्य आहे’. असे मनाशी ठरवून, नरेन्द्रनाथांनी कुणालाही नकळत एक दिवस घरादारचा त्याग करण्याचा दिवस निश्चित केला.
गृहत्याग करण्यापूर्वी एकदा गुरूंना वंदन करून मग कायमचा निरोप घ्यायचा असं ठरवलं. त्याच दिवशी गुरु कलकत्त्यात आपल्या एका भक्ताकडे आले आहेत हे कळल्याने नरेंद्रनाथ त्याच्याकडे गेले. तर श्रीरामकृष्णांनी त्यांनाच आग्रह करून दक्षिणेश्वरला नेले. रात्रभर गुरुशिष्यांमध्ये अद्भुत असा संवाद घडत राहिला.
अत्यंत करुण नेत्रांनी श्री रामकृष्ण नरेंद्रनाथांकडे बघून म्हणले, बेटा, कामिनी-कांचनचा त्याग केल्याखेरीज काहीही व्हायचे नाही. श्रीरामकृष्णांना भीती होती की न जाणो हा संसारात गुरफटून बसेल. त्यांनी नरेंद्रनाथांना एका बाजूला नेऊन परोपरीने सांत्वन केलं. सांगीतलं की, माझा देह असेपर्यंत तुला या जगात राहावे लागेल. आणि विशिष्ट कार्यासाठीच हा देह तू धारण केला आहे, याचं रहस्य ते सांगत होते.
दुसर्या दिवशी सकाळी नरेंद्रनाथ दक्षिणेश्वरहून घरी आले. मनावरचं एक मोठं ओझं कमी झाल्यासारखं वाटत होतं. आता, रामकृष्ण त्यांचे आदर्श, गुरु, पिता आणि सर्वस्व झाले होते. नातेवाईकांनी कटकारस्थान करुन त्यांच्या विरोधात केलेली केस हाणून पाडण्यासाठी त्यांनी कंबर कसली. ‘अन्याय, असत्यापुढे काहीही झालं तरी मान झुकविणार नाही’. हा त्यांचा बाणा होता. नामांकित बॅरिस्टर उमेशचंद्र बंडोपाध्याय यांनी नरेंद्रनाथ यांच्याकडून केस लढवली.
कोर्टात लोकांना नरेन्द्रनाथांचे प्रसंगावधान,चारित्र्याची दृढता आणि सद्गुण्णांची चुणूक दिसलीच. पण विरोधी पक्षाचे वकील, उलट तपासणीत नरेंद्रनाथांची निर्भयपणे, स्पष्ट, धीरगंभीर, उत्तरे ऐकून आश्चर्य चकित झाले. न्यायमूर्तिंनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन, शेवटी नरेन्द्रनाथ यांच्या बाजूने निकाल दिला. नरेन्द्रनाथ हे ऐकताच धावतच घरी आले आणि आईला म्हणाले, “आई घर बचावले”. त्याक्षणीच, भुवनेश्वरी देवींनी अत्यानंदाने विजयी पुत्राला हृदयाशी धरले. दोघांचा आनंद गगनात मावेना.
दिवसांमागून दिवस जात होते. पण आता आर्थिक दृष्टीने काहीतरी सोय व्हायला हवी होती. श्रीरामकृष्णांच्या कृपेने यावर काही तरी उपाय नक्की निघेल असे वाटून, नरेन्द्रनाथ ताबडतोब दक्षिणेश्वरास गेले. नरेंद्रनाथांना बघून रामकृष्ण आनंदित झाले. नरेंद्रनाथांनी म्हटले, “ महाराज माझ्या आईच्या आणि भावंडांच्या दोन घासांची कशीतरी तरतूद होईल असे तुम्ही आपल्या जगन्मातेजवळ धरणे धरावे. माझ्यासाठी”.
श्री रामकृष्णांनी उत्तर दिले, “काय सांगू रे? मी आईला असे चुकूनही कधी काही मागितलेले नाही. तरीपण तुम्हा लोकांची काहीतरी सोय व्हावी म्हणून आईची विनवणी केली होती. पण काय करू? तू तर आईला मानत नाहीस. म्हणून तीही तुझ्याबद्दलच्या सांगण्याकडे लक्षच देत नाही”. कट्टर निराकारवादी नरेंद्रची साकारावर तीळमात्र निष्ठा नव्हती. म्हणून ते गप्प राहिले. बोलायला जागाच नव्हती आणि आईच्या कृपेखेरीज काहीही घडणार नाही असे ठाम मत गुरूंचे होते.
ते एक प्रकारे नरेंद्रनाथांची परीक्षाच घेत होते. शेवटी ते म्हणाले, “बरं, आज मंगळवार आहे. मी सांगतो तुला, आज रात्री कालीमंदिरात जाऊन, आईला प्रणाम करून तू जे मागशील ते आई तुला देईल”. आणि विश्वास असो की नसो श्रीरामकृष्णांची ‘दगडी’ जगन्माता आहे तरी कशी हे एकदा पाहिलंच पाहिजे, म्हणून नरेंद्रनाथ काली मातेच्या देवालयात भारल्यासारखे गेले. आज श्रीरामकृष्णांच्या कृपेने त्यांच्या सांसारिक दु:ख दारिद्रयाचा अंत होणार या उत्कंठेने त्यांना भरून आले होते.
ते गेले तिथे त्यांना दिसले की, जगदंबेच्या रूपाने मंदिर प्रकाशित झाले आहे. दगडी मूर्ती नव्हे, ‘मृण्मय आधारी चिन्मयी जगन्माता’ वर आणि अभय देणारे कर वर करून, असीम अनुकंपापुर्ण, स्नेहमय मंदस्मित करीत आहे. ते पाहून नरेन्द्रनाथ सर्वकाही पार विसरून गेले. फक्त भक्ताप्रमाणे प्रार्थना करू लागले. “ आई विवेक दे, वैराग्य दे, ज्ञान दे. भक्ती दे. आई जेणेकरून तुझ्याच कृपेने तुला सर्वदा पाहू शकेन असं कर”.
नरेंद्र परत आले तसे रामकृष्णांनी विचारले काय रे काय मागितलंस? तेंव्हा कुठे त्याच्या लक्षात आलं की अरेच्च्या खरच की हे काय करून बसलो मी? मागायचं ते राहूनच गेलं की. गुरूंच्या आदेशानुसार पुन्हा गेले. पुन्हा तेच. दोनतीन वेळा जाऊनही काहीच मागितले नाही . नरेंद्रनाथांना सारं लक्षात आलं. गुरु म्हणाले, ज्या अर्थी तू मागू शकला नाहीस त्याअर्थी तुझ्या कपाळी ऐहिक सुख नाही. तरी पण तुम्हाला अन्नवस्त्राची ददात पडणार नाही. नरेंद्रनाथ आश्वस्त झाले. त्यांना कुठे हवे होते ऐहिक सुख? पण त्या दिवसापासून नरेंद्रनाथांच्या जीवनातल्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली.
(मागील भागात आपण पाहिले – या घरात आपला नवरा आणि आपण अश्रित आहोत, याची जाणीव तिला घरी आल्या आल्या दोन दिवसातच झाली होती. आता इथून पुढे)
एक दिवस गावाकडून निरोप आला, सुनुमामीचे वडील अत्यावस्थआहेत. ती गावी जायला निघाली. आण्णा सदाला म्हणाले, ‘तूही जा.’
‘मी जाऊन काय करणार?’
‘जे तिथे जाऊन करावं लागेल, ते करायचं.’
सुनुमामीने पिशवी भरली. रोजच्या नेसायच्या दोन साड्या, सदामामानं अरेबियन नाईट्सचं पुस्तक पिशवीत टाकलं. सुनुमामीचे वडील तिच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. तिला बघण्यासाठी, भेटण्यासाठीच जणू त्यांनी आपल्या कुडीत प्राण राखून ठेवले होते. सुनु आली. त्यांनी तिच्या डोक्यावरून, अंगावरून हात फिरवला. सुनु त्यांना थोपटत राहिली. हळूहळू त्यांचा श्वास कमी होत होत एका क्षणी थांबला. सुनुच्या डोळ्यातून जसा पाऊस सांडला. पण थोड्या वेळाने तिने स्वत:ला सावरले. शेजारी-पाजारी आधीपासूनच जमले होते. त्यांनी पुढची व्यवस्था केली.
सुनुने स्वत:च वडलांना अग्नी दिला. मामा मात्र त्याचा कशाशीच संबंध नसल्यासारखा बसून होता. दुसर्या: दिवशी घरी निघून गेला. सुनुमामी सगळे दिवस वगैरे यथासांग करून घरी परत आली. त्या पूर्वी तलाठ्याकडे जाऊन घर, जमिनीला आपलं नाव लावून आली. एका शेतकर्या.ला आपली जमीन अर्धुलीनं करायला देऊन आली.
दिवस सरत होते. एक दिवस माझी मुलगी मंजू म्हणाली, ‘आई, सुनुमामीच्या साड्या किती विरल्यात बघ.’ माझ्याही लक्षात आलंच होतं आणि दोन घरात नेसायच्या बर्या साड्या काढून ठेवाव्या असं म्हणत होते. एव्हाना कापणीचा हंगाम आला होता. सुनुमामी म्हणाली, ‘चार दिवस गावाकडे जाऊन येते.’ तिच्या शेतात ज्वारीची मळणी चालू होती. आपल्या देखरेखीखाली तिने निम्मी ज्वारी घरात टाकायला लावली. एक पोतंभर ज्वारी भरून बाजूला ठेवली. गावात गुर्हाहळं लागली होती. गूळ करणं चालू होतं. एकाला ज्वारी देऊन बदल्यात गुळाची ढेप आणली. एकाला ज्वारी देऊन बदल्यात शेंगांचं पोतं घेतलं. बाकीची ज्वारी जयराम वाण्याला विकली. त्यातून स्वत:साठी दोन फिक्या रंगाच्या नाजुक फुलांचे डिझाईन असलेल्या वायल घेतल्या. दोन पोलकी शिवून घेतली. दोन परकर आणले. मामासाठी दोन पायजमे, कुडते, एक टेरिलीनची पॅंट बुशशर्ट घेतला. गाडी केली आणि सगळं घेऊन घरी आली. शेंगा, गूळ पाहून पोरं खूश. मामाने कपडे पुन्हा पुन्हा पारखून बघितले. ‘हं! बरय कापड!’ तो उद्गारला.
असेच आणखी काही दिवस गेले आणि तिच्या लक्षात आलं, आपल्याला काही तरी होतय. एक नवा जीव तिच्या पोटात अंकुरत होता. ती खुशालली. घरात बाया-बापड्यांची मात्र बडबड सुरु झाली. ‘ आता हीचं बाळंतपण, सेवा-सुश्रुषा, खाणारी तोंडं दोनाच्या ऐवजी तीन होणार…’
एक दिवस तिने सांगून टाकलं, मी माझ्या गावी जाऊन माझा संसार मांडते.’ घरातल्यांना हुश्श्य झालं. सुंठीवाचून खोकला जातोय. जाऊ दे. तिने आपलं सामान गोळा केलं. गाठोडं बांधलं. पिशवी भरली आणि निघाली. घरचे मामाला म्हणाले, ‘तू पण नीघ.’
‘पण मी तिथे जाऊन काय करू? ना पाणी ना वीज.’ मामा कटकटला.
‘असं आहे. दिवस गेलेली बाई. पहिलटकरीण. एकटी गेली, तर लोकात तरी बरं दिसेल का?’ मामाला मग निघावंच लागलं. घराला चिकटलेलं बांडगूळ असं अचानक दूर करता आलं.
नंतर अधून मधून गावाकडच्या काही बातम्या येऊ लागल्या. तिने छप्पर नीट बांधून त्यावर कोहळ्या, भोपळ्याचे वेल चढवलेत. दोडके, शेंगा, दुधे लावलेत. रेताड जमिनीत तूर आणि हरभरा लावलाय. निगुतीनं खाणं-पिणं होत असल्याने मामाची कांती आणखीनच उजळलीय.
गजरा का माळावा ? त्याचा आरोग्याशी कसा संबंध आहे ? याची छान माहिती जरूर वाचा.
स्त्री चे आरोग्य सांभाळतो गजरा—
गजरा हा “old fashioned” आहे म्हणे. आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या जुन्या, चांगल्या गोष्टी पण टाळू लागलो आहोत का ?…
गजरा हा शब्द उच्चारला तरी कसं आल्हाददायक वाटतं. सोळा शृंगारामध्ये गजऱ्याचा समावेश आहे. गोवा, कर्नाटकातील ९०% स्त्रिया आजही रोज गजरा माळल्याशिवाय नोकरीला जात नाहीत.
‘गजरा – सौंदर्य’ या दोहोंमधील संबंध सर्वश्रुत आहेच. सध्या तीव्र उन्हाळा सुरु आहे. पण निसर्गात पाहिलं तर मोगरा, चाफा, बकुळी यांना बहर आला आहे. काळजी आहे निसर्गाला आपली. या सर्वात जास्त सुगंध पसरविणाऱ्या फुलांची योजना उन्हाळ्यातच केली गेली आहे हे लक्षात येतय का ?
आयुर्वेदाच्या दृष्टीने ही सर्व फुले शीत गुणाची आहेत. म्हणजे उष्णतेची तीव्रता कमी करायला याचा आपण उपयोग करायलाच हवा. सोपा उपाय म्हणजे गजरा माळणे. केसातल्या गजऱ्याचा तो मंद वास दिवसभर तजेला देत रहातो. मन शांत करतो. अर्थातच फक्त उन्हाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतूत त्या त्या वेळी येणाऱ्या फुलांचा गजरा महिलांनी माळावाच.
स्त्री शरीर हे मुख्यतः उष्ण धर्माचे मानले जाते. दोन भुवयांमध्ये आतील बाजूस असलेल्या ‘pituitary gland’ च्या अधिपत्याखाली स्त्री शरीरात विविध स्त्राव वहात असतात. त्यावरच स्त्रीचे आरोग्य अवलंबून असते. गजरा, किंवा फुलांचा वास नाकाद्वारे आपण जेव्हा घेतो, त्यावेळी शिरोभागातील पित्त शमन होते, शिवाय ग्रंथीचे कार्य व्यवस्थित रहाण्यास मदत होते. परिणामी स्त्रियांच्या आरोग्यामधील संतुलन रहाण्यास मदत होते..
मनोरोगात तर फुलांना खूप महत्व आहे. स्त्रियांमध्ये दर महिन्याला होणाऱ्या संप्रेरकांच्या चढ उतारामुळे होणाऱ्या चिडचिडीमध्ये गजरा घातला तर नक्कीच फायदा होतो. शिवाय गजरा करायच्या पध्दती पाहिल्या तर त्या पण “concentration”, “moto development” करणाऱ्याच आहेत. परदेशातील बाक थेरपी, अरोमा थेरपी या काय आहेत ?- फुलांच्या वर आधारित चिकित्साच आहेत.
पण कसंय… घर की मुर्गी….
भरगच्च पैसे देऊन पाश्च्यात्यांप्रमाणे अरोमा थेरपी घेऊ, पण भारतीय पद्धतीप्रमाणे गजरा माळून घेतल्यावर “old fashioned” म्हणवून घेण्यात लाज का वाटून घ्यावी ? 🌹
संग्राहिका – सुश्री स्नेहलता गाडगीळ
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मला भेटली फुटपाथवरच… भीक मागत…! वय वर्षे 70 च्या आसपास… दिसायला काळीसावळी आणि अंगावर अक्षरशः अर्धा इंचाची घाण…
तीन फुटांच्या अंतरावर गेलो तरी विचित्र, अतिशय घाणेरडा एक वास येतो…
अंगावर नाही म्हणायला एक मळकी साडी… (मळकी हा शब्द खूप थिटा आहे)
याला साडी का म्हणावं ? हाच मुळात प्रश्न आहे… अक्षरशः पाच साडेपाच फुटाचं हे कापड ती अंगावर गुंडाळते… जे झाकायला जावं तेच उघडं पडतं… आणि दुर्दैव असं की तिला ते कळत नाही… जाणवत नाही… कारण डोळ्याच्या कसल्याशा प्राॕब्लेममुळे तिला काही दिसतच नाही…!
एकूण अवस्था अशी, की या आज्जीजवळ कुणी जावुच नये… तिच्याजवळ कुणी बसूच नये…! तरीही मी जातो, बसतो तिच्याजवळ .. याचं कारण तिचं लाघवी बोलणं…
हिच्या गोबऱ्या गालातुन एक एक शब्द असा बाहेर पडतो, जसा शंकराच्या पिंडीवर टांगलेल्या अभिषेकपात्रातुन थेंब थेंब अभिषेक व्हावा, त्या पिंडीवर …! अतिशय शुद्ध आणि सात्त्विक !
भीक मागतांना म्हणते… “बाळा तुला जमलं काही तर मला दे, स्वतःला अडचणीत टाकून मला काही देवु नकोस… आधी तू घे, प्रसन्न हो, त्यातून काही उरलं आणि तुला जर मला द्यावंसं वाटलं तरच दे… अन्यथा नको !”
गोळ्या मागतांना म्हणते, “डाॕक्टरसाहेब, मला देणं शक्य असेल तरच गोळ्या द्या. अहो माझ्यापेक्षा जास्त त्रास असणारे खूप आहेत अजून, त्यांना आधी द्या… मी काय, करेन थोडं सहन… !”
दुस-याचा विचार करण्याच्या तिच्या या वृत्तीमुळे मी हिच्याकडं आपसुकच ओढला गेलो होतो…
तिच्याजवळ बसलं की, तिचं बोलणं ऐकता ऐकता बोलण्यातूनच सुगंध इतका घमघमायला लागतो की अंगावरुन येणाऱ्या घाण वासाची जाणिवच होत नाही आपल्याला…
शेजारी बसलं की विचारते, “मी एक श्लोक म्हणू … ?” आणि आपल्या उत्तराची वाट न पाहता, ही “विश्वप्रार्थना” म्हणायला सुरुवात करते… “सर्वांना चांगली बुद्धी दे… आरोग्य दे…..आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहु दे…!”
या विश्वात ज्याच्याकडे सर्व काही आहे, तो स्वतःला अजून काही तरी मिळू दे म्हणून “लाचार” होतोय… आणि सर्वस्व गमावून बसलेली ही आज्जी ‘दुसऱ्याला सुखात ठेव’ म्हणून “प्रार्थना” करत्येय…!
स्वतःसाठी मागणं ही झाली लाचारी, आणि दुस-यासाठी मागणं ही झाली प्रार्थना… दोन्हीतला फरक मला या आज्जीमुळेच समजला…!
ही आज्जी, एका मॕनेजरची बायको. भरपूर श्रीमंती आणि खानदानी संस्कार. रास्ता पेठेत यांचा जुना बंगला होता. सगळं काही होतं, पण घरात कुणी चिमुकलं नव्हतं. दोन वेळा पोटातच बाळ गेलं. मरता मरता वाचली. तिसऱ्या वेळी डाॕक्टरांनी सांगितलं, “आता तुम्हाला बाळ होणे नाही. दत्तक घ्या.”
मधल्या काळात यजमान गेले. इतके दिवस “दूर” असलेले सगळे नातेवाईक “जवळ” आले. आठवतील ती नाती सांगून घराची वीट न् वीट घेऊन गेले.
सगळी “नाती” बरोबर येताना “पोती” घेऊन आली होती. या पोत्यांतुन सर्वस्व वाहून नेलं हिचं… हिच्याच डोळ्यांदेखत…
असलेली सगळी “नाती” हिंदकाळत “गोती” खात गेली, आणि वाड्याची ही खानदानी मालकीण आता फुटपाथची राणी म्हणून जगत्येय, गेली १५ वर्षे… विश्वप्रार्थना गात… ‘सर्वांना सुखी ठेव’ म्हणत…! आपल्या अंगावर धड कापड नसतांनाही गात असते… ‘सर्वांना ऐश्वर्यात ठेव…!’ सगळ्यांनी लुबाडून घेतलं तरी आर्त प्रार्थना करते…. ‘सर्वांचं भलं कर…कल्याण कर….’
ऐकणारा “तो” तिचं ऐकतोय की नाही माहित नाही… तरीही गोबऱ्या गालांतुन हसत, वर बघत विश्वासानं म्हणत असते ‘आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहु दे…!’
मी एकदा चाचरत हिला म्हटलं, “मावशी तू मनानं इतकी सुंदर आहेस पण इतकी अस्वच्छ का राहतेस?”
ती म्हटली, “अस्वच्छ …? मी कुठंय अस्वच्छ …???”
“अगं हा वास…?” मी आवंढा गिळत, नजर चोरत बोललो….
ती म्हटली, “हा वास घाणेरडा वाटतो का रे बाळा तुला ? लहान आहेस तू बाळा अजुन…. अरे रस्त्यावर या घाणेरड्या वासानंच माझ्या, रक्षण केलंय माझं… !” ती हसत बोलली…!!!
“म्हणजे…?”
कानाजवळ येऊन बोलली, “तुला माहीत आहे ? कापूर पेटवला की आजुबाजुला किडे येत नाहीत… मच्छरची अगरबत्ती पेटवली की मच्छर आसपास येऊन चावत नाहीत…
ही घाण नाही बाळा, हे माझं कापूर आहे… माझी अगरबत्ती आहे… या कापरामुळंच आणि अगरबत्तीमुळं समाजातले किडे आणि डास माझ्या वाऱ्यालाही येत नाहीत…”
(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय डॉ कुन्दन सिंह परिहार जी का साहित्य विशेषकर व्यंग्य एवं लघुकथाएं ई-अभिव्यक्ति के माध्यम से काफी पढ़ी एवं सराही जाती रही हैं। हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहते हैं। डॉ कुंदन सिंह परिहार जी की रचनाओं के पात्र हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं। उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है समसामयिक विषय पर आधारित आपका एक अतिसुन्दर विचारणीय व्यंग्य ‘एक धार्मिक जुलूस’। इस अतिसुन्दर व्यंग्य रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार # 142 ☆
☆ व्यंग्य – एक धार्मिक जुलूस ☆
धार्मिक जुलूस निकलने को है। सूचनाएँ स्थानीय अखबारों में निकल चुकी हैं। जुलूस के नेताओं की अपीलें भी निकल चुकी हैं कि सब लोग सहयोग देकर धर्म को पुख़्ता करें और शांति बनाए रखें। धार्मिक जुलूसों के वक्त शांति बनाए रखने की अपील ज़रूरी होती है क्योंकि धर्म की शांति से पटरी बैठती नहीं। हमेशा शांति-भंग का ख़तरा रहता है। जुलूस के नेताओं में भी ज़्यादातर वे हैं जिन्हें जुलूसों और और तेज़-तर्रार वक्तव्यों को छोड़कर सच्चे अर्थों में धर्म से कुछ लेना-देना कम ही होता है। अब लोग धार्मिक कम हैं, धर्म के ठेकेदार ज्यादा हैं।
जुलूस को लेकर पूरे प्रशासन की जान हलक में है। महीना भर पहले से बैठकें हो रही हैं। धर्म के ठेकेदारों को बुलाकर मशवरा लिया जा रहा है कि भैया, ऐसा करो कि काम शांति से निपट जाए। धार्मिक नेताओं के भाव ऊँचे हैं। जुलूस किस रास्ते से जाए, इसे लेकर मान- मनौव्वल हो रहा है। ठेकेदार और उनके छुटभैये ज़िद करते हैं, ‘नहीं साहब, जुलूस तो उसी रास्ते से निकलेगा,चाहे कुछ भी हो जाए।’ बात यह है कि जुलूस निकालने वालों का काम जुलूस निकालना है। अमन बनाये रखने का ठेका प्रशासन का है। जुलूस तो ज़रूर निकलेगा, लेकिन अगर कोई गड़बड़ी हो जाए तो उचक कर प्रशासन की गर्दन थाम लो। फिर इंक्वायरी हो और फिर अंत में कोई बेचारा गरीब कांस्टेबल बलि का बकरा बना कर लाइन अटैच कर दिया जाए।
प्रशासन सब काम छोड़कर जुलूस की फिक्र में लगा है। बाकी सब काम बन्द। कोई आला अफसर अभी नहीं मिलेगा क्योंकि साहब अभी जुलूस वाली मीटिंग में हैं। जिसको कोई काम कराना हो वह जुलूस निकल जाने तक रुके, चाहे काम जीवन-मरण का ही क्यों ना हो। जुलूस निकलने तक ज़िंदा रह सकते हो तो ठीक है, नहीं तो हरि इच्छा। ज़िले के सब हिस्सों से पुलिस की टुकड़ियाँ बुलायी जा रही हैं क्योंकि धार्मिक जुलूस निकलना है। जहाँ पुलिस कम हो गयी है वहाँ तथाकथित असामाजिक तत्वों के हौसले कुछ ऊँचे हुए हैं और शांतिप्रिय भद्र लोगों के हौसले गिरे हैं, क्योंकि भद्र लोगों की भद्रता पुलिस के भरोसे ही कायम है।
शहर में असामाजिक तत्वों की धरपकड़ हो रही है ताकि जुलूस शांति से निकल जाए। जो समझदार असामाजिक तत्व हैं वे पहले ही रिश्तेदारों के यहाँ चले गये हैं क्योंकि हर धार्मिक जुलूस के समय उन्हें सरकार की मेहमानदारी कबूल करनी पड़ती है। वैसे असामाजिक तत्वों में सिर्फ ऐरे-ग़ैरे-नत्थू-ख़ैरे ही आते हैं जिनका कोई माई-बाप नहीं होता। जिनके पास माल है या जिनका कोई धर्मपिता होता है वे असामाजिक तत्वों की फ़ेहरिस्त में नहीं आते।
पुलिस और प्रशासन जुलूस के पूरे रास्ते का निरीक्षण करते हैं। कहाँ-कहाँ फोर्स लगायी जाए, कहां निरीक्षण-मीनारें बनें, कहां एस.पी. साहब बैठें और कहाँ डी.आई.जी. साहब। रिज़र्व फोर्स कहाँ रहे, जो गड़बड़ी होते ही दौड़ पड़े। अश्रुगैस का पर्याप्त प्रबंध रहे।
जुलूस निकल रहा है। पुलिस अफसर जैसे उन्माद में हैं। कोई भी इधर-उधर दौड़ता- भागता दिखता है कि लाठी भाँजते दौड़ते हैं। जनता उत्सव के मूड में है, लेकिन प्रशासन के प्राण चोटी में हैं।
जुलूस एक-एक इंच सरक रहा है और प्रशासन को एक-एक इंच सफलता मिल रही है। तनाव एक-एक इंच घट रहा है। कंट्रोल रूम को एक-एक क्षण की सूचना मिल रही है। जुलूस के लोग धर्मोन्माद में झूम रहे हैं, गा रहे हैं और प्रशासन असली धर्मपरायण की तरह राम और ख़ुदा को याद कर रहा है।
अंततः जुलूस ख़त्म हो गया है। लोग आखिरी जय-जयकारों के बाद बिखरने लगे हैं। जुलूस के नेताओं के चेहरे गौरवमंडित हैं। जब आखिरी जत्था भी चला जाता है तो प्रशासन ईश्वर को धन्यवाद देता है।
फिर प्रशासन के लोग एक दूसरे को बधाइयाँ देते हैं। ‘बधाई सर, सब ठीक-ठाक निपट गया।’ प्रदेश की राजधानी को प्रसन्नता भरे संदेश जाते हैं कि जुलूस शांतिपूर्वक निपट गया। राजधानी में भी बड़े लोग ठंडी साँस लेते हैं। अफसर घर लौट कर यूनिफॉर्म उतारते हुए तनावग्रस्त पत्नी को सूचना देते हैं कि सब काम ठीक से निपट गया,और पत्नी छत की तरफ आँखें उठाकर साड़ी का पल्लू आँखों से लगाती है।कारण यह है कि जुलूस अफसर को लाइन अटैच से लेकर सस्पेंड तक करा सकता है। इसलिए सही- सलामत घर लौटना भारी सुखकर होता है।
जुलूस ख़त्म हो गया है। अब बेचारे छोटे असामाजिक तत्व इस प्रतीक्षा में हैं कि हुकुम जारी हो तो वे सरकारी मेहमानख़ाने से बाहर आयें और अगले जुलूस तक खुली हवा का सेवन करें।
Anonymous Litterateur of Social Media # 94 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 94)
Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.
Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc. Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi. He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper. The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.
In his naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Award and C-in-C Commendation.
Captain Pravin Raghuvanshi is also an IIM Ahmedabad alumnus.
His latest quest involves social media, which is filled with rich anonymous literature of nameless writers, shared on different platforms, like, WhatsApp / Facebook / Twitter / Your quotes / Instagram etc. in Hindi and Urdu, he has taken the mantle of translating them as a mission for the enjoyment of the global readers. Enjoy some of the Urdu poetry couplets as translated by him.
हम ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए आदरणीय कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी के “कविता पाठ” का लिंक साझा कर रहे हैं। कृपया आत्मसात करें।