मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पिलं गेली दूर दूर… ☆ सुश्री सुमन किराणे ☆

सुश्री सुमन किराणे

? कवितेचा उत्सव ?

☆ पिलं गेली दूर दूर… ☆ सुश्री सुमन किराणे ☆

पिलं इवली इवली

घरट्यात झाडावर

आणि घरट्याचा सारा

भार  दोन  फांद्यावर

        पर्ण नक्षीच्या पदरी

        मिळे जीवाना उबारा

        झुलवितो झुल्यामध्ये

        ममतेचा मंद वारा

पाजवूनी गोड रस

भार वाहिला मायेनं

कुशी हिरव्या फांद्यांच्या

जीव वाढती जोमानं

        पंख फुटता सुंदर

        फांद्या लागती हसाया

        पिला वाढविण्यासाठी

        किती झिजविली काया

येता बळ पंखामध्ये

सारी निघाली उडून

आणि बिचारं घरटं

कसं झालं सुनं सुनं

        फांद्या वाकल्यात आता

        एक मेकांचा आधार

        शोधे बारीक नजर

        पिलं गेली दूर-दूर

 

© सुश्री सुमन किराणे

पत्ता – मु.पो. हेर्ले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर.

मोबा.9850092676

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बा द श हा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🙏 बा द श हा ! 🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

सुंदर निळे हसरे डोळे

केस कुरळे रुपेरी डोईवर,

सडसडीत शरीर बांधा

तेज आगळे मुखावर !

 

हाती पडता निर्जीव तारा

काढी त्यातून स्वर्गीय सूर,

वाद्य साथीचे काश्मीरचे

जगभर केले अजरामर !

 

हरपला बादशहा संतूरचा

रसिक मुकती ब्रम्हानंदाला,

जागवून जुन्या आठवणी

सूर जादुई तारेचा थंडावला !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

११-०५-२०२२

ठाणे.

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #109 – माझी आई…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 109 – माझी आई…! ☆

माझ्यासाठी किती राबते माझी आई

जगण्याचे मज धडे शिकवते माझी आई

तिची कविता मला कधी ही जमली नाही

अक्षरांची ही ओळख बनते माझी आई…

 

अंधाराचा उजेड बनते माझी आई

दु:खाला ही सुखात ठेवे माझी आई

कित्तेक आले वादळ वारे हरली नाही

सूर्या चा ही प्रकाश बनते माझी आई…

 

देवा समान मला भासते माझी आई

स्वप्नांना ही पंख लावते माझी आई

किती लिहते किती पुसते आयुष्याला

परिस्थिती ला सहज हरवते माझी आई…

 

ठेच लागता धावत येते माझी आई

जखमेवरची हळवी फुंकर माझी आई

तिच्या मनाचे दुःख कुणाला दिसले नाही

सहजच हसते कधी न रडते माझी आई…

 

अथांग सागर अथांग ममता माझी आई

मंदिरातली आहे समई माझी आई

माझी आई मज अजूनही कळली नाही

रोज नव्याने मला भेटते माझी आई…

 

© सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उत्कट…. भाग -१ ☆ श्री अजित देशमुख ☆

? विविधा ?

☆ उत्कट…. भाग -१ ☆ श्री अजित देशमुख ☆

भावनातिरेक आणि अश्रुपात या ठरलेल्या समीकरणाची प्रचिती पोलिस अधिका-याला जेवढी येते तेवढी क्वचितच कोणाच्या अनुभवाला येत असेल. सहन होण्यापलीकडील दुःख आणि मन कोळपून टाकणाऱ्या दु:खाची  परिस्थिती बदलण्याबद्दलची अनिश्चितता यामुळे अशी व्यक्ती क्षणाक्षणाला हतबल होत जाते .

मुळात ” पोलीस” या संस्थेभोवतीचे प्रवाद , समज आणि संशयाची वलये सर्वसामान्यांच्या मनावर गोंदवल्यासारखी घट्ट असतात. पोलिसातील एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या गुणांबाबत कौतुक करतानाही ”पोलिसात असूनसुद्धा ” हे पालुपद चिकटतं ,  यात सर्व काही आलं .

तक्रार घेऊन आलेली व्यक्ती ही आपले दुःख कमी व्हावे या उद्देशाने  शेवटचा उपाय म्हणून पोलिसांकडे येते . तिची एकमेव अपेक्षा त्याच्या दुःखाच्या समस्येचे तात्काळ निवारण व्हावे अशी असते. पोलीस अधिकारी मात्र तक्रारीच्या स्वरूपाचा  आढावा घेत घेत त्या तक्रारीनुरुप करावयाच्या कायदेशीर प्रक्रियेची मनात जुळवाजुळव करत असतो. त्या त्या प्रत्येक तक्रारीमागील घटनांचे कारण, त्यामुळे होणाऱ्या  परिणामांचे , त्यावर कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे , नवीन तक्रारीचे स्वरूप   हातातील काम बाजूला ठेवण्या इतपत तातडी निर्माण करणारे असले, तर वरिष्ठांना तात्काळ कल्पना देण्याबाबत असे एक ना  अनेक विचार त्याच्या मनात  गर्दी करून असतात . याचा परिणाम म्हणून कि काय एखादा डॉक्टर जसा पेशंट तपासताना विचलित होत नाही तसाच पोलीस अधिकारी तक्रारी हाताळताना भावनाविवश होत नाही . मात्र यामुळे होते असे की तक्रारदाराच्या मनातील पोलिसाबद्दलची ‘रुक्ष ‘ अशी प्रतिमा अधिक गडद होते . आपली तक्रार आवश्यक तेवढ्या गांभीर्याने घेतली जात नाही असा गैरसमज होऊन वाढलेली तक्रारदाराची  हतबलता  त्याच्या देहबोलीतून स्पष्ट दिसत असते.

मात्र पोलिस अशाही प्रसंगाचे साक्षी होतात ज्यामध्ये दु:खाश्रूंची जागा थोड्याच अवधीत आनंदाश्रू घेतात.

मुंबईतील गर्दी हा “मुंबई शहर” याविषयामधील  एक अटळ मुद्दा आहे. दक्षिण मुंबईतील व्यापारी भागात तर दिवसा चालता येणं मुश्किल होते इतकी गर्दी असते. अशा भागात दिवसा वाहनांचे किरकोळ अपघात सतत घडत असतात.  मजेची बाब अशी की रविवारी त्याच रस्त्यावर “तरुण मुले क्रिकेट खेळून दंगा करत आहेत” अशा तक्रारीही पोलिसांकडे येतात. गर्दी आली की त्या अनुषंगाने येणाऱ्या गुन्ह्यांचे आणि घटनांचे प्रकारही आलेच. पाकिटमारी, बॅग खेचून पळुन जाणे, कपडयावर घाण टाकून  धुण्यासाठी मदत करावयाच्या बहाण्याने बाजूला नेणे आणि बॅग खाली ठेवून आपल्या शर्टावरची घाण धुण्यात दंग असलेल्या मालकाला घाणी बरोबरच आपली बॅगही नाहीशी झाल्याचा दृष्टांत होणे हे नित्याचेच.

अशा गर्दीचे कार्यक्षेत्र असलेल्या पोलिस ठाण्यामधे, एखादी स्त्री कपड्याचे भान न ठेवता  घाईघाईने पायऱ्या चढत , रडून दमेलेले डोळे शोधक नजरेने फिरवत पोलिस ठाण्यात प्रवेश करते तेव्हा समजावे, हीचे मूल गर्दीत हरवले आहे.

“साहेब माझा मुलगा हरवला आहे हो !” असं बोलून मागोमाग मोठयाने हंबरडा .

हरवलेल्या मुलाचे वडील बरोबर असले तर बाहेर टॅक्सीचे पैसे देऊन मागोमाग पोलीस ठाण्यात येतात. तेही काळजीत असतात परंतू पुरुष असल्यामुळे त्यांचे डोळे वाहात नसतात. बाळाच्या विचाराने आईचे लक्ष कशातच नसते.  तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर काळजी पसरलेली आणि मनात येणाऱ्या नाही नाही त्या शक्याशक्यतांच्या विचारांमुळे तिच्या डोळ्यातून सतत अश्रूंचा पूर लोटत असतो . ड्युटी ऑफिसरने बसायची खूण केली आणि बाळाचे वडील खुर्चीत बसले तरी आई खुर्चीत बसत नाही.

गर्दीत हात सुटून हरवलेली अशी मुले सर्व साधारणपणे अडीच ते चार वर्षाची असतात.

नित्याचा प्रकार असल्याने , ड्युटी ऑफिसर हरवलेल्या मुलाच्या वयाची , त्याच्या अंगावर असलेल्या कपड्यांची आणि शरीरावरील ओळखीच्या खुणांची तोंडी चौकशी करता करता हातातील लिखाण पुर्ण करत असतो. मुलाच्या आईवडीलांसाठी परिसर सरावाचा नसल्याने नेमक्या

कोणत्या जागेवरून मुलगा हरवला हे त्याना नीट सांगता येत नाही .मग एखादया मोठया दुकानाच्या खुणेवरून वगैरे त्या जागेचा अंदाज येतो.      

बाळाची आई रडत रडत “एक मिनिटांसाठी  घोटाळा झाला हो” हे वारंवार उच्चारत मुलाचा हात सोडल्याबद्दल स्वतःला दोष देत  असते.

एक छोटेसे टिपण करून त्याची  “लहान मुले  हरवल्याबाबतच्या” रजिस्टर मधे आणि पोलिस स्टेशन डायरी मधे नोंद करून, ड्युटी ऑफिसर पोलिस कंट्रोल रूमला घटना कळवतो.

त्याचप्रमाणे आपल्या पोलिस ठाणे हद्दीतील संबंधित क्षेत्रात गस्तीवर असलेल्या बीट मार्शलना वायरलेस मेसेजने अलर्ट करतो…

क्रमशः…

© श्री अजित देशमुख  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आकार… ☆ सुश्री स्वप्ना मुळे ☆

? जीवनरंग ❤️

☆ आकार… ☆ सुश्री स्वप्ना मुळे ☆ 

(पुस्तक दिन 💐)

गार वारं सुटलं तसं तिने वाऱ्याने वाजणार खिडकीचं तावदान बंद केलं,.. गॅसकडे वळताना गॅलरीच्या दारात ठेवलेली तुळशीची पान तोडली आणि चिंब पाऊस आल्यावर जसे नियम असल्यासारखे दोघे चहा घ्यायचेच तसा चहा देखील टाकला पण एकटीचाच,.. तो गेल्यानंतर आलेला हा पहिला पावसाळा तसा तिला जड जाणारा होता पण गेलेलं माणूस परत येत नाही हे दुःख पचवत ती सावरत होती स्वतःला.. चहा उकळला तसा त्याचा गंध एक वेगळाच उत्साह तिला देऊन गेला,.. तिने तो कपात घेतला आणि गॅलरीत झाडांच्या मध्ये ठेवलेल्या छोट्याश्या खुर्चीत ती जाऊन बसली,.. लग्ननंतर एकत्र घालवलेले पंचवीस पावसाळे आणि आता हा एकटेपणाचा पहिला पाऊस आठवणींनीची सर घेऊन येणारा,.. काय असतं संसार म्हणजे,..? ” एक माणूस जवळून सतत वाचायचा असतो.” असं अविनाश म्हणायचा ते काही खोटं नाही,..वाचन हा प्रांतच त्याचा आवडीचा,.. पहिला पाऊस आणि हातात ओली झालेली पुस्तकं आपलं पहिलं मोठं भांडण ते त्या पहिल्या पावसातलं,.. एवढा पाऊस असताना कशाला आणली पुस्तकं??ह्यावर त्याच शांत उत्तर,”आज दोन तारीख माझं ठरलेलं आहे पगार झाला की दुसऱ्या दिवशी पुस्तकं घ्यायचं एक तरी,..”त्याचा ऊन,पाऊस ,थंडी ह्याच्याशी संबंध नाही हे दर महिन्यांच गणित,..अग विचारांचा पाऊस पडायला हवा ना मनात त्यासाठी वेगवेगळ वाचन हवं,.. मला तरी वाटतं माणसाने अन्न, वस्त्र,निवारा आणि वाचन अश्या गरजा समजून घ्याव्या,..अविच्या ह्या गोष्टीशी आपलं कधीच एकमत नव्हतं,..तो नेहमी म्हणायचा,”अग मैत्री कर माझ्या पुस्तकांशी ती जगायला शिकवतात.”तेंव्हा आपण कधी ऐकलं नाही आणि आज त्या पुस्तकांनी जगवल,..अविचा झालेला अपघात,मग झालेले दवाखाना बिल आणि नंतर थांबलेली पैश्याची आवक,..काय करावं? हा केवढा मोठा प्रश्न समोर असताना पुस्तकं मदतीला आली,..अविला नोकरी लागल्या पासून तीस वर्षात जमा झालेली तीनशे साठ पुस्तकं वाचली नाही तरी मदतीला आली,.. घरपोच लायब्ररी किती छान कल्पना शेजारच्या वसु आजीने डोक्यात घातली आपल्या म्हणाल्या होत्या,”अग त्याने आपल्या कष्टाच्या पैश्याने ते पुस्तकं घेतले होते ना मग ती फुकट वाटून टाकू नकोस ठराविक महिना कर आणि घरोघर दे लोकांना पुस्तक माझ्या सारख्या अनेक जणांना लायब्ररीत जाणं होत नाही मग आम्हाला अल्पदरात घरपोच आली पुस्तक तर बरच आहे,..”

आजीच्या कल्पनेने सुरू झालेला व्यवसाय सहा महिन्यात किती बहरला,..तीनशेसाठ चे पाचशे पुस्तकं झाले,..आपणही वाचायला लागलो,जगायला शिकलो आणि दुःखही विसरायला शिकलो पण कधी तरी हा पाऊस येतोच आठवणींची सर घेऊन,..तिने हलकेच डोळे मिटले तेवढ्यात फोन आला,..तिने फोन उचलला,..”बोला.” ह्यावर पलीकडून आवाज आला,..”माझ्या पाच वर्षाच्या मुलीला कॅन्सर झाला हो, मला माझं मन खम्बीर राहिल असं काहितरी वाचायचं आहे..असं पुस्तक आहे का लायब्ररीत,..?” तिला मनाला उभारी देणारी अनेक पुस्तकं डोळ्यासमोर आली,..ती लगेच म्हणाली,”हो आहेत मी आणून देते पाऊस थांबला की,..”तिने फोन ठेवला,..आपल्या सारखीच पण वेगवेगळ्या आकाराची दुःख घेऊन माणसं जगत असतात आपल्यला उगाच वाटतं सगळ्यात मोठा आकार माझ्या दुःखाचा पण आपल्याकडे तर लोकांची दुःख कमी करणारे पुस्तकं आहेत हे किती छान असा विचार करत तिने भरभर पुस्तक चाळायला सुरुवात केली,..समोर त्याचा मोठा फोटो होता तिच्याकडे बघणारा,.. बाहेर पावसाने जोर धरला होता,..ती मात्र निश्चल झाली होती,..विचारांचा पाऊस पडणाऱ्या पुस्तकांना शोधण्यात,…स्वतःच्या दुःखाचा आकार आणखी लहान आहे हे मनात म्हणत.

©️ स्वप्ना मुळे (मायी)

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ घर…! ☆ सुश्री माधुरी परांजपे ☆

? मनमंजुषेतून ?

☆ घर…! ☆ सुश्री माधुरी परांजपे ☆

मी घर बांधतो घरासारखं

आणि

हा पक्षी माझ्याच घरात घर बांधतोय त्याच्या मनासारखं

 

मी विचारलं त्याला , “बाबारे, ना तुझ्या नावाचा सात बारा,

न तुझ्या नावाचं मुखत्यार पत्र!”

 

तर म्हणतो कसा,

 

“अरे सोपं असतं का कुणाच्या घरात जागा करणं

आणि कुणाच्या मनात घर करणं”

 

माझं घर तर काड्यांचं आहे.

तुझं घर माडीचं आहे!

 

नात्यांची घट्ट वीण, विणत गेली नाही, तर

माडीचं घरसुद्धा काडीमोलाचं असतं!

 

मला नेहमी वाटायचं माझ्यामुळेच त्या पक्ष्यांचं घर झालं.

आता वाटतंय.

त्याच्यामुळेच माझं विचारांचं प्लास्टर पक्क झालं.

 

आता त्याचा चिवचिवाट माझ्यासाठी पसायदान असते.

तो डोळे झाकून घरट्यात बसला, की

समाधिस्त आणि समृद्ध वाटतो.

 

त्या पक्षाने शिकवलं मला…

 

एका घराची दोन घरं होण्यापेक्षा

घरात घर करुन राहाणं

आणि

दुसऱ्याच्या

मनात घर करुन राहाणं कधीही चांगलं…….

 

संग्रहिका – सुश्री माधुरी परांजपे

बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

मो ९४२११२५३५७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य#131 ☆ नदियों में न पानी है… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का चौकीदार”  महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है एक भावप्रवण रचना “नदियों में न पानी है…”)

☆  तन्मय साहित्य # 131 ☆

☆ नदियों में न पानी है… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

(नदी श्रृंखला की 6वीं प्रस्तुति)

नदियों में न पानी है

पूलों की जुबानी है

अपनी पीड़ाएँ ले कर चली

सिंधु प्रिय को सुनानी है।

 

सिर्फ देना है जिसका धरम

तौल पैमाना कोई नहीं

कौन है देखने वाला ये

कब से नदिया ये सोई नहीं,

 

खोज में अनवरत चल रही

राह दुर्गम अजानी है

पूलों की जुबानी है….।

 

चाँद से सौम्य शीतल हुई

सूर्य के ताप की साधिका

स्वर लहर बाँसुरी कृष्ण की

प्रेम रस में पगी राधिका,

 

साक्ष्य शुचिता के तटबंध ये

दिव्यता की कहानी है

पूलों की जुबानी है….।

 

फर्क मन में कभी न किया

कौन छोटा, बड़ा कौन है

हो के समदर्शिता भाव से

खुद ही बँटती रही मौन ये,

 

भेद पानी सिखाता नहीं

सीख सुंदर सुहानी है

पूलों की जुबानी है….।

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

अलीगढ़/भोपाल   

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ माँ – तीन कालजयी कविताएं ☆ श्री हरभगवान चावला ☆

श्री हरभगवान चावला

(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री हरभगवान चावला जी की अब तक पांच कविता संग्रह प्रकाशित। कई स्तरीय पत्र पत्रिकाओं  में रचनाएँ प्रकाशित। कथादेश द्वारा लघुकथा एवं कहानी के लिए पुरस्कृत । हरियाणा साहित्य अकादमी द्वारा श्रेष्ठ कृति सम्मान। प्राचार्य पद से सेवानिवृत्ति के पश्चात स्वतंत्र लेखन।) 

आज प्रस्तुत है माँ पर आपकी तीन कालजयी कविताएं।)

☆ माँ – तीन कालजयी कविताएं ☆ श्री हरभगवान चावला ☆

[1]  

शहर में जब भी दंगा होता है

माँ बौरा जाती है

कर्फ्यू लगता है तो पथरा जाती है माँ

ऐसे समय में माँ अक्सर

सन् सैंतालीस की बातें करती है

सन् सैंतालीस ने माँ से छीने थे

उसके माँ-बाप और भाई

वह हर बार पूछती है एक सवाल

क्यों बनता है शहर श्मशान

क्यों हैवान हो जाते हैं इन्सान

कुछ क्यों नहीं करते हुक्मरान

दंगे में मौत की ख़बरें जब

पर लगाकर पहुँचती हैं माँ के पास

तो पूरा घर ख़ामोश हो जाता है

सिर्फ़ माँ बोलती है

‘तू सब का राखनहार है रब

हिन्दू को रख, मुसलमान को रख

दुनिया को रख, इन्सान को रख

तब घर में एक रब होता है

एक माँ होती है

और होता है सन् सैंतालीस।

 

[2]

माँ ने देखा है

जब मज़हब के नाम पर बँटता है मुल्क

तो ख़ून सच होता है या जुनून

जब मज़हब इन्सान से बड़ा होता है

मौत का विजय अभियान शुरू होता है

त्रस्त प्रजा घर छोड़कर भागती है

मौत के साम्राज्य से दूर

प्रजा जब मौत की ज़द से बाहर आती है

तो हिसाब लगाती है

किसका कौन मरा?

कौन खोया?

माँ ने देखा है

कि उजड़ने के बाद

बसने की प्रक्रिया में

जब अजनबियों को अपना बनाना होता है

तो भूल जानी होती है अपनी पहचान

अपने दोस्त

भूल जाने होते हैं अपने गीत

अपनी ज़ुबान

माँ ने महसूस किया है

कि जब किसी उजड़ी हुई औरत का

पहला बच्चा जन्म लेते ही मर जाता है

तो कैसे आँखें बन जाती हैं

उद्गम रावी और चनाब का

माँ ने महसूस किया है

उस ज़हर का असर

जो घुल गया था प्रजा के रक्त में

अब माँ का एक घर है

और माँ देख रही है

एक बार फिर वही ज़हर

भर्राई माँ के सीने में

संभावना बनकर फैल रहा है

फिर वही भयावह इतिहास।

 

[3]

माँ ने भेजीं चीज़ें कितनी

कटोरी भर मक्खन

साड़ी के टुकड़े में बँधा

सरसों का साग

थैला भर गोलिया बेर

बहू के लिए काले मोतियों की

हरिद्वारी माला

मोमजामे में रखी अरहर की दाल

उसी में एक चिट्ठी

पड़ोस की लड़की की लिखी हुई

चिट्ठी में लिखा है बहुत कुछ-

‘माँ और बापू ठीक हैं

पड़ोस में सब कुशल मंगल है

गणपत के यहाँ लड़की हुई है

किशन की माँ चल बसी है

ख़ूब बारिश हुई है

गाय ले ली है

दूध बिना मुश्किल थी’

चिट्ठी में लिखा है और भी बहुत कुछ

पर वह स्याही से नहीं लिखा।

©  हरभगवान चावला

सम्पर्क –  406, सेक्टर-20, हुडा,  सिरसा- 125055 (हरियाणा) फोन : 9354545440
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – लाँग वॉक ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि – लघुकथा – लाँग वॉक ??

तुम्हारा लाँग वॉक मार डालेगा मुझे…रुको..!.. इतना तेज़ मत चलो… मैं इतना नहीं चल सकती…दम लगने लगता है…हम कभी साथ नहीं चल सकते…, उसने कहा था। वह रुक गया। आगे जाकर राहें ही जुदा हो गईं।

बरसों बाद एक मोड़ पर मिले।…क्या करती हो आजकल?… लाँग वॉक करती हूँ, कई- कई घंटे… साथ वॉक करें कल? …नहीं मेरा वॉक बहुत कम हो गया है। मैं इतना नहीं चल सकता…दम लगने लगता है… हम कभी साथ नहीं चल सकते…, उसने फीकी हँसी के साथ कहा। राहें फिर जुदा हो गईं।

© संजय भारद्वाज

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कथा कहानी # 31 – आत्मलोचन – भाग – 1 ☆ श्री अरुण श्रीवास्तव ☆

श्री अरुण श्रीवास्तव

(श्री अरुण श्रीवास्तव जी भारतीय स्टेट बैंक से वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी हैं। बैंक की सेवाओं में अक्सर हमें सार्वजनिक एवं कार्यालयीन जीवन में कई लोगों से  मिलना  जुलना होता है। ऐसे में कोई संवेदनशील साहित्यकार ही उन चरित्रों को लेखनी से साकार कर सकता है। श्री अरुण श्रीवास्तव जी ने संभवतः अपने जीवन में ऐसे कई चरित्रों में से कुछ पात्र अपनी साहित्यिक रचनाओं में चुने होंगे। उन्होंने ऐसे ही कुछ पात्रों के इर्द गिर्द अपनी कथाओं का ताना बाना बुना है। आज से प्रस्तुत है आपके कांकेर पदस्थापना के दौरान प्राप्त अनुभवों एवं परिकल्पना  में उपजे पात्र पर आधारित श्रृंखला “आत्मलोचन “।)   

☆ कथा कहानी # 31 – आत्मलोचन– भाग – 1 ☆ श्री अरुण श्रीवास्तव 

आत्मलोचन ने अंबानी – अदानी परिवार में मुँह में सोने का चम्मच दबाये हुये जन्म नहीं लिया था, बल्कि एक अत्यंत साधारण परिवार में जन्मजात कवच कुंडल जड़ित गरीबी के साथ धरती पर अवतरित हुये थे. बड़ी मुश्किल से मां बाप ने संतान का मुख देखा था तो इस दुर्लभ संतान का उपहार पाकर ईश्वर का वो सिर्फ आभार ही प्रगट कर सकते थे.

आत्मलोचन शिक्षा के प्रारंभिक काल से ही मेधावी छात्र निकले और उनके मुँह में सोने का चम्मच तो नहीं था पर इरादों में TMT के सरिया जैसी मजबूती जरूर थी. पता नहीं कब, पर बहुत जल्द उनको ये समझ आ गया था कि इस गरीबी को इस तरह से उतार फेंकना है कि उनके जीवन भर फिर कभी गरीबी से सामना करने की नौबत न आये. और इसका सिर्फ एक ही रास्ता था कि पूरा ध्यान पढ़ाई पर केंद्रित करके सबसे बेहतर परिणाम हासिल किये जायें.

 ऐसा हुआ भी, धीरे धीरे उनकी निष्ठा, श्रम और इंटेलीजेंस से वो सारे इम्तिहान नंबर वन की पोजीशन से पास करते गये पर ये सफलता सिर्फ एकेडमिक थी. उनका स्वभाव दिन-ब-दिन कठोर और निर्मोही होता गया और निरंतर बढ़ते मेडल और पुरस्कार उनके मित्रों की संख्या भी कम करते गये. शायद उन्हें इनकी जरूरत भी महसूस नहीं हुई क्योंकि ये सब भी परिवार की आनुवांशिक गरीबी के शिकार थे और आत्मलोचन अपने जीवन से न केवल गरीबी हटाना चाहते थे, बल्कि वो सारे लोग वो सारी यादें भी, जो उन्हें गरीबी की याद दिलाती हों, हमेशा के लिये त्यागना चाहते थे. इतना ही नहीं बल्कि गरीबरथ पर यात्रा करने या गरीबी रेखा से संबंधित चैप्टर उनकी किताबों से और जेहन से गायब थे.

फिल्म एक फूल दो माली के “गीत गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा” पर उनका बिल्कुल भी विश्वास नहीं था और वो उसे अनसुना करने का पूरा प्रयास करते थे. गरीबी को मात देने की ये लड़ाई उन्होंने अपने TMT सरिया जैसे मज़बूत इरादों से आखिर जीत ही ली जब उन्होंने देश की सबसे कठिन, सबसे ज्यादा स्पर्धा वाली UPSC की परीक्षा भी प्राइम प्लेसमेंट के साथ क्लियर की और प्रशिक्षण के लिये लालबहादुर शास्त्री नेशनल एकेडमी ऑफ एडमिनिस्ट्रेशन मसूरी प्रस्थान किया.

गरीबी की आखिरी निशानी उनके शिक्षक मां-बाप थे जो उनके सपनों की उड़ान के सहभागी थे और फ्लाइट के टेकऑफ करने का इंतज़ार कर रहे थे. सामान्यतः IAS होने से बेहतर और प्रतिष्ठित सफलता का मापदंड भारतीय समाज़ में आज भी दूसरा नहीं है. तो अतीत की गरीबी के जन्मजात कवच कुंडल को अपनी काया और अपने मन मस्तिष्क से पूरी तरह त्यागकर “आत्मलोचन” ने अपने सुनहरे भविष्य की ओर अपने मज़बूत इरादों के साथ उड़ान भरी.

क्रमशः…

© अरुण श्रीवास्तव

संपर्क – 301,अमृत अपार्टमेंट, नर्मदा रोड जबलपुर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares