☆ जे दिव्य दाहक म्हणूनी असावयाचे… ☆ श्री अरविंद लिमये ☆
प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ,रंग,भाव असतात.तसेच परस्पर भिन्न अर्थ असणारे पण वरवर एकच भासणारे अपवादात्मक शब्दही असतात.
‘वसा’ हा अशा अपवादात्मक शब्दांपैकीच एक. अक्षरे तीच.शब्दही तेच.पण अर्थ मात्र भिन्न. व्रत,नेमधर्म या अर्थाचा असतो तो ‘ वसा ‘ हा एक शब्द आणि स्निग्ध पदार्थ या अर्थाचाही ‘वसा’ हाच दुसरा शब्द.दोघांमधली अक्षरे तीच म्हणून चेहरामोहराही सारखा तरी DNA पूर्णत: वेगळा. स्निग्ध पदार्थ म्हंटले की तेल,लोणी,तूप,वंगण,मेण या सारखे पदार्थ चटकन् नजरेसमोर येतात पण या अर्थाने ‘वसा’ शब्दाकडे पाहिले की असा एखादा विशिष्ट पदार्थ नजरेसमोर मात्र येणार नाही.’मेदयुक्त पदार्थ’ या व्यापक अर्थाच्या वसा या शब्दात अशा सर्वच स्निग्ध पदार्थांचा समावेश होत असला तरी त्या अर्थाने वसा हा शब्द फारसा प्रचारात मात्र आढळून येत नाही.
वसा हा शब्द व्रत या अर्थाने मात्र सर्रास वापरला जातो.निदान वरवर तरी व्रत आणि वसा हे दोन्ही शब्द समानार्थी वाटतात आणि कांही अंशी ते तसे आहेतही. व्रत आणि वसा या दोन्ही शब्दांचा समान अर्थ म्हणजे ‘नेम’ !’नेम’ हा शब्द मला तरी ‘नियम’ या शब्दाचा बोलीभाषेत रूढ झालेला अपभ्रंश असावा असेच वाटते. कारण व्रत आणि वसा या दोन्ही शब्दांना ‘नियम’ या शब्दात असणारा नियमितपणाच अपेक्षित आहे हे लक्षात घ्यायला हवे.’नेम’ या शब्दाचे मात्र लक्ष्य, उद्दिष्ट ,रोख,शरसंधान असे व्रत किंवा वसाशी काही देणेघेणे नसणारेही अर्थ आहेत. त्यामुळे स्वतः साठी एखादा ‘नेम’ म्हणजेच ‘नियम’ ठरवून घेणे आणि तो सातत्याने पाळणे हेच व्रत किंवा वसा दोन्हींनाही अपेक्षित आहे.
व्रत या शब्दाचे संकल्प, उपवास हे अर्थ वसा या शब्दालाही अभिप्रेत आहेत.तथापी व्रत हे सदाचरण, ईशसेवा, भक्ती, आराधना यास पूरक असेच असते.पण वसा या शब्दाचा अवकाश यापेक्षा अधिक आहे. व्रत आणि वसा या दोन्हीमध्येही अध्यात्मिक उन्नतीसाठी स्वीकारलेले नेमधर्म गृहीत आहेतच पण वसा या शब्दात त्याहीपेक्षा अधिक व्यापक अर्थ सामावलेला आहे.
या व्यापक अर्थाला स्वतःचे जन्मभराचे उद्दिष्ट ठामपणे ठरवून स्वीकारलेला आचारधर्म अपेक्षित असतो.
कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडात अडकून न पडता दीनदुबळ्यांची,वंचितांची सेवा करण्यासाठी, सामाजिक उन्नतीचा ध्यास घेत अनिष्ट प्रथा ,रूढी ,परंपरा यातल्या तथ्यहीन गोष्टी कालबाह्य ठरवून समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी, राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन तन-मन-धनाने स्वतःचे आयुष्य राष्ट्राला अर्पण करून
राष्ट्रहिताला वाहून घेत ज्या थोर स्त्री-पुरुष महात्म्यांनी स्वतःची उभी आयुष्ये वेचलेली आहेत, स्वतःच्या स्वास्थ्याचा, सर्वसुखांचा त्याग करून, असह्य हालअपेष्टा सहन करुन आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे त्या त्या प्रत्येकाने अतिशय निष्ठेने तरीही डोळसपणे स्वीकारलेला जीवन मार्ग हा त्यांच्यासाठी त्यांनी घेतलेला आयुष्यभरासाठीचा ‘वसा’च होता ! यातील ‘डोळसपणे’ या शब्दाचा नेमका अर्थ समजून घ्यायला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे खालील प्रसिद्ध काव्य उचित ठरेल ! की घेतले न हे व्रत अंधतेने
लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग
माने
जे दिव्य दाहक म्हणुनी असावयाचे
बुध्दयाची वाण धरिले करी हे सतीचे!
‘एखादे दिव्य कार्य दाहक हे असणारच. त्याचे चटके बसणारच. पण सतीचे वाण घ्यावे तसे आम्ही स्वखुशीने हे स्वीकारलेले आहे. अंधतेने नव्हे !’
स्वातंत्र्यवीरांची या काव्यामधे व्यक्त झालेली निष्ठा आणि निर्धार ‘वसा’ या शब्दाचा पैस किती अमर्याद आहे याची यथोचित जाणिव करुन देणारा आहे !!
बैंकेतील पाच शून्यांच्या आधी काही दोन आकडी संख्याही जमा झालेली असते. एका निवांत क्षणी, त्याला कॉलेजचे ते जुने दिवस आठवतात. आजूबाजूला कोणी नाही अशी वेळ साधून तो तिला म्हणतो, “अग, ये जरा अशी समोर, बस माझ्या जवळ. पुन्हा एकदा हातात हात घालून गप्पा मारू. कुठे तरी फिरायला जाऊ.”
ती जरा विचित्र नजरेनेच त्याच्याकडे बघून म्हणते, ” कुठल्या वयात काहीही सुचत तुम्हाला! जरा मुलगा मोठा झाला आहे त्याचे तरी भान ठेवा. ढीगभर काम पडलीयेत मला आणि तुम्हाला गप्पा सुचतायत. चला व्हा बाजूला.”
मग येते पंचेचाळीशी, त्याच्या आणि तिच्या डोळ्यावर चश्मा चढलेला असतो. एक दोन सुरुकुत्या डोकावत असतात. दोघांच्याही केसांनी आपला काळा रंग सोडून द्यायला सुरवात केलेली असते. मुलाने आता शाळेमधून कॉलेजसारख्या मोठ्या आणि वेगळ्या दुनियेत प्रवेश केलेला असतो. त्याच्या गरजा वाढत जातात. बैंकेतील सहा शून्यापर्यंत गेलेली शिल्लक वाढत न जाता कमी होत जाते. ती स्वतःचा वेळ मैत्रिणींबरोबर किटी पार्टी किंवा भजनी मंडळात घालवत असते. त्याचे वीकेंडच्या बैठकीचे कार्यक्रम सुरुच असतात. तरीही तो आणि ती, त्याची आई लवकर गेल्याने खचलेल्या म्हातार्याा वडिलांची काळजी घेत असतात. त्याच्या म्हातार्याआ वडिलांना त्याचा आणि तिचा एक मानसिक आधार कायम असतो. एकाचवेळी मागच्या पिढीला आणि पुढच्या पिढीला सांभाळण्याचे एक अतिशय कठीण असे काम तो आणि ती सहजतेने करत असतात.
कॉलेज मधून बाहेर पडून मोठे झालेले बाळ आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करते. त्याला पंख फुटलेले असतात, आणि एक दिवस ते त्याच्या आणि तिच्या बँकेतले सगळे शून्य वापरून दूर परदेशी उडून जातो.
आता त्याच्या केसांनी, काळ्या रंगाची आणि काही ठिकाणी डोक्याची साथ सोडलेली असते. आता तिलाही केसांना काळा रंग लावायचा कंटाळा आलेला असतो.
काही काळाने त्याच्या म्हातार्या झालेल्या वडिलांनी त्याला आणि तिला, म्हातारा- म्हातारी बनवून त्यांची साथ सोडून सुखाची झोप घेतलेली असते.
आता तो तिला म्हातारी म्हणू लागतो, कारण स्वतःही तो म्हातारा झालेला असतो. साठीची वाटचाल सुरु झालेली असते.
प्रॉव्हिडन्ट फंडामुळे बैंकेत आता परत काही शून्य जमा झालेली असतात. एव्हाना त्याचे बैठकीचं प्रोग्रॅम कमी झालेले असतात आणि डॉक्टरांच्या भेटी वाढून औषध, गोळ्या यांच्या वेळा ठरतात.
बाळ मोठे झाल्यावर लागेल म्हणून घेतलेले मोठे घर अंगावर येऊ लागते. बाळ कधीतरी परत येईल ह्याची वाट बघण्यात तो आणि ती आणखी म्हातारे होतात.
आणि तो एक दिवस येतो. संध्याकाळची वेळ असते. म्हातारा झोपाळ्यावर मंद झोके घेत आपल्याच गत आयुष्याचा विचार करत बसलेला असतो. म्हातारी तिन्ही सांजेचा दिवा लावत असते. म्हातारा लांबून तिच्यात झालेले बदल न्याहाळीत असतो आणि तेवढ्यात फोन वाजतो. तो लगबगीने उठून फोन घेतो, फोनवरून मुलगा बोलत असतो. तो आपला फोन स्पीकरवर टाकतो. त्याचा आवाज ऐकून म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाच्या स्मितरेषा उमटतात. मुलगा आपल्या लग्नाची बातमी देतो आणि त्याचा आणि तिचा, तो तिच्या बरोबर परदेशीच रहाणार असल्याचे सांगतो.
८० च्या दशकातील ही गोष्ट आहे. एका मध्यमवयीन दाढीवाल्याने, आदिवासी वस्तीमध्ये टाकून दिलेल्या धातूंच्या मूर्तींमधून, एक मूर्ती उचलून आपल्या पिशवीत टाकली. तो मूर्ती पिशवीत टाकत असताना एका आदिवासी स्त्रीने त्याला पाहिले व ती गोष्ट तिने आपल्या म्होरक्याला सांगितली. सर्व आदिवासींनी, चोरीची शिक्षा म्हणून त्या माणसाला पकडून बांधून ठेवले. त्यांच्या रिवाजानुसार त्याला रात्री बळी देण्याचे ठरले. रात्री आदिवासींचा नाच व पूजा सुरु झाली. सुदैवाने त्या दिवशी त्यांचा मुखिया हजर नसल्यामुळे बळी देण्याचे, दुसऱ्या दिवसावर ढकलले गेले. दुसरे दिवशी मुखिया आला. त्याला त्या माणसाची भाषा कळत होती. त्या माणसाने मुखियाला, आपण सरकारी माणूस असून आदिवासींमध्ये राहून, काम करतो हे पटवून दिले, तेव्हा कुठे त्याची त्या चोरीच्या शिक्षेतून सुटका झाली.. हा माणूस म्हणजेच, आदिवासींच्या ‘वारली कले’ची संपूर्ण जगाला ओळख करुन देणारा.. चित्रकार, भास्कर कुलकर्णी!!
कलेसाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे अनेक कलाकार होऊन गेले. मात्र भास्कर कुलकर्णी या चित्रकाराने आपले आयुष्य आदिवासींच्या सहवासात काढून, त्यांच्या पारंपरिक ‘वारली कले’ला जगमान्यता मिळवून दिली. आजच्या पिढीला त्यांनी या कलेसाठी केलेले योगदान माहीत नाही… ही खरंच, या कलाकाराची शोकांतिका आहे..
भास्कर कुलकर्णी यांचा जन्म मुंबईत, मालाड येथे १४ सप्टेंबर १९३० साली झाला. शालेय शिक्षणानंतर त्यांनी जे जे स्कूल आॅफ आर्ट मध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांचे सोबत चित्रकार बाबुराव सडवेलकर, तय्यब मेहता असे नामवंत कलाकार होते. जे जे नंतर त्यांनी, जे वाॅल्टर थाॅम्सन या जाहिरात संस्थेत, बोधचित्रकार म्हणून नोकरी केली. त्यानंतर काही काळ, ‘ओ अॅण्ड एम’ या जाहिरात संस्थेत काम केले. भास्कर कुलकर्णी यांची संशोधनात्मक वृत्ती, ग्रामीण कलेचा अभ्यास हे गुण हेरुन श्रीमती पुप्पुल जयकर यांनी, त्यांना ‘विव्हर सर्व्हिस सेंटर’ मध्ये कामाला घेतले. श्रीमती जयकर, ह्या लोककलेच्या गाढ्या अभ्यासक तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्नेही होत्या. आदिवासी कलेचा शोध घेऊन त्या कलेला वृद्धिंगत करण्याचे काम त्यांनी भास्कर कुलकर्णी यांचेवर सोपविले..
सहाजिकच ही नोकरी करताना भास्कर यांचा आदिवासींशी जवळून संपर्क आला. त्या भटक्या जमातीमध्ये मुक्तपणे वावरण्याचा योग आला. वारली कलेबरोबरच आदिवासींची रहाणी, जीवनमान यांचा त्यांनी अभ्यास केला. इथेच त्यांच्या जीवनात मोठं परिवर्तन झाले..
आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत इंदिरा गांधी सरकारचा पराभव झाला. पुप्पुल जयकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. परिणामी कुलकर्णी यांनाही त्रास होऊ लागला. त्यांनी आपला जमलेला भविष्य निर्वाह निधी घेऊन, संस्था सोडली. नोकरी सोडल्यानंतर ते डहाणू जवळील, गंजाड या वारली लोकांच्या पाड्यावर येऊन राहिले. तेथे एक लहानसे घर बांधले. गावात पाण्याची टंचाई होती. कुलकर्णी यांनी पाण्यासाठी विहीर खोदण्यास सुरुवात केली.. विहीर जसजशी खोल जाऊ लागली, तसे त्यांच्या फंडाचे पैसे संपू लागले. शेवटी विहीरीला पाणी काही लागलेच नाही. कुलकर्णी आता कफल्लक झाले. ते पूर्णपणे आदिवासी झाले. अविवाहित व फकिरी जीवन असल्याने त्यांच्या गरजाही फारशा नव्हत्या.. वारली लोकांकडून बांबू-कामठ्यांच्या आकर्षक वस्तू, चित्रे काढून घेणे व त्यांची मुंबईला विक्री करुन त्यांना पैसे मिळवून देणे, यातच त्यांचे दिवस जाऊ लागले. त्यांपैकी जिव्या सोम्या मशे याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. मात्र त्या कार्यक्रमाचे, सरकारने साधे निमंत्रणही कुलकर्णींना दिले नाही..
हळूहळू या कलेचे व्यापारीकरण होऊ लागले. गावातील पुढाऱ्यांकडून कुलकर्णींना त्रास होऊ लागला. ज्याच्या जागेवर कुलकर्णी यांनी घर बांधले होते त्याला फितवून, त्यांना ते घर सोडायला लावले. ज्या लोकांसाठी कुलकर्णींनी आपले सर्वस्व पणाला लावले होते त्यांनीच, त्यांना निराधार व पोरके केले. शेवटी कुलकर्णी यांनी ते गांव सोडले.. तरीदेखील त्यांच्या मनात वारली कलेविषयीचा आदर, हा तिळमात्रही कमी झालेला नव्हता..
मग कुलकर्णी सावंतवाडीला गेले. तिथे लाकडी खेळण्यांना वेगळे स्वरुप देण्याचे त्यांनी काम केले. नंतर ते गोव्याला गेले. एकटेपणा व वैफल्यग्रस्त जीवनामुळे त्यांना, दारुचे व्यसन लागले. काही काळानंतर ते तामीळनाडूमध्ये गेले. तेथील कुंभार वस्तीच्या खेड्यात राहून, ‘इंडिया फेस्टिव्हल’ या लंडनमध्ये होणाऱ्या प्रदर्शनासाठी कारागीरांना प्रशिक्षण दिले.
त्यांची नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा होती. मात्र जीवनाच्या उत्तरार्धात समाजाकडून मिळणाऱ्या उपेक्षेमुळे ते खचले होते. मद्यपान वाढत होते, प्रकृती ढासळत होती.. आपला मृत्यू बिहारमधील दरभंगा, येथेच व्हावा अशी त्यांची इच्छा होती. २४ एप्रिल १९८३ रोजी, वयाच्या अवघ्या त्रेपन्नाव्या वर्षी, दरभंगा येथील एका रुग्णालयात या भास्कराचा ‘अस्त’ झाला…
भास्कर कुलकर्णी यांनी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या दिडशेहून अधिक रोजनिशी लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये सर्व विषयांवर सविस्तर लिहिलेले आहे. ते असामान्य व्यक्तिमत्त्वाचे चित्रकार व संवेदनशील लेखक होते. त्यांच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी दरभंग्यात त्यांचे मंदिर उभारले.. आणि एका कलासक्त जीवनाची, आख्यायिका होऊनराहिली…
हा लेख वाचल्यानंतर जेव्हा कधी आपणास एखादं वारली चित्र दिसेल, त्याक्षणी चित्रकार भास्कर कुलकर्णी यांची नक्कीच आठवण होईल…
लग्न होऊन, नीरा कोकणात गेली,तेव्हा तिला परके किंवा वेगळे काहीच वाटले नाही. कोकणातल्याच खेडची मुलगी आता गुहागरला गेली, हाच काय तो बदल.
तेच आयुष्य,तेच कुळागर,तेच माड आणि तेच आंबे.
खरं तर नीराला मनापासून शहरी नवरा हवा होता. तिच्या मावश्या,आत्या राहायच्या ना पुण्यामुंबईकडे.
पण तिकडची मुले कुठली कोकणातल्या मुलींना हो म्हणायला.
नीरा आपली पायरी ओळखून होती. वडिलांची बेताची परिस्थिती, आणखी दोघी बहिणी लग्नाच्या.
कोणीतरी हे स्थळ सुचवले,आणि योग जुळून आले म्हणायचे— साधेसुधे घर ,बेताचीच परिस्थिती,
अशी नीरा गुहागरला सासरी गेली.
तिच्या सासूबाई अतिशय कष्टाळू होत्या. निरनिराळे छोटे मोठे उद्योग करून चार पैसे गाठीला लावायच्या.
नीराचा चुणचुणीतपणा केव्हाच हेरला त्यांनी.
नव्या नवलाईचे दिवस सरले, आणि हळूहळू नीराच्या लक्षात काहीकाही गोष्टी येऊ लागल्या. सासूबाई कर्तृत्वाच्या,तर सासरे एकदम विरुद्ध. काय जे आंबे फणस,शेतातले धान्य विकले जाईल, त्यावरच गुजारा.
नीराने नवऱ्याचेही गुण बघितले. व्यसन बिसन नव्हते,पण आळशीच एकूण. नोकरी करता का असे तिने सुचवून बघितलेही. पण याला कोण देणार नोकरी आणि कसली. नुसते बसण्याची सवय,आणि आयुष्यात ध्येय लागते,हेच ठाऊक नाही.
नीरा हळूहळू रुळायला लागली. मुलगा झाल्यावर, त्याला वाढवण्यात काही दिवस गेले.
पण तिला असेच निष्क्रिय आयुष्य नव्हते काढायचे. सुदैवाने त्यांची जागा मोक्याच्या जागी आणि मोठीही होती.
नीराने सासूबाईंना विश्वासात घेतले. म्हणाली,” सासूबाई,मागे एवढी मोठी जागा रिकामी आहे, आपण सध्या 3 खोल्या बांधूया का? थोडा खर्च होईल, पण आपल्याला उत्पन्न सुरू होईल. आपण जरा शहरी लोकांना लागतात,तशा सोईच्या खोल्या बांधूया. तुम्ही बाबांची परवानगी घ्याल का ?”
सासूबाई भीतभीत म्हणाल्या,” हो, पण बांधकामाला पैसे? “
नीरा म्हणाली,” आपण बँकेचे कर्ज काढूया.”
सासूबाई सासरे तयार झाले. नीराने नवऱ्याला स्पष्ट सांगितले,“ हे बघा,हे जे आम्ही करतोय, त्यात तुम्हीही
सहभागी व्हा. नुसती बघ्याची भूमिका घेऊ नका. मी सांगेन ,ते तुम्हाला करावे लागेल.”
कुरकुर करत का होईना,तयार झाला तो.
समुद्रकिनारीच त्यांचे घर होते, तिथे टुमदार 3 खोल्या तयार झाल्या, अगदी शहरी सोयी सुविधा सकट.
नीरा एकदा पुण्याला मावशीकडे जाऊन आली. तिला आपले हे नवीन फार्महाऊस दाखवायला घेऊन आली.
मावशीला ते अतिशय आवडले. तिने आणखीही काही छान सूचना केल्या. त्या फार्म हाऊससमोर झोपाळे बसले.
रंगीत खुर्च्या आल्या.
“ मावशी,होईल ना ग हे नीट.कर्ज फेडू शकू ना आम्ही?”
“ नीरे,वेडे,बघ तू. जागा पुरायची नाही बघ तुम्हाला. कष्ट करणाऱ्याला लक्ष्मी प्रसन्न का होणार नाही ग?
मला आता ती कार्ड्स दे. मीही देते ओळखी पाळखीत.”
पहिला ग्रुप,मावशीच्या ओळखीतूनच आला.नीराने त्यांची अतिशय सुंदर सरबराई केली—खास कोकणी नाश्ता, मोदक, सोलकढी– पाहुणे खुश होऊनच गेले. ही पहिली कमाई बघून सासूबाईंना गहिवरून आले.
नीराने आता हाताखाली दोन बायका ठेवल्या.सासू सुनांना आता दिवसाचे चोवीस तास पुरेनात. नीराचा माधव आळस झटकून कामाला भिडला. बाहेरची खरेदी,नोकरवर्गावर लक्ष ठेवणे, आलेल्या पाहुण्यांची नीट व्यवस्था बघणे
त्याने अंगावर घेतले. नीराच्या घरगुती फार्म हाऊसची आपोआपच प्रसिद्धी होऊ लागली. नीराने बँकेचे कर्ज लवकरच फेडले. मॅनेजर म्हणाले,” नीराताई, आणखी कर्ज घ्या आणि खोल्या वाढवा. आणखी करा तुमचे farmhouse मोठे सुसज्ज. बँक देईल की कर्ज. आम्हाला असे चोख गिऱ्हाईक हवेच असते. “
नीराने सासू सासऱ्यांना विचारून आणखी खोल्या वाढवल्या, पण त्याला शहरी रूप नाही येऊ दिले.
नीराने आपल्या मुलाला मुंबईला, हॉटेल management साठी पाठवले. लवकरच, तो ते शिक्षण पूर्ण करून
आपल्या आईवडील आजीच्या मदतीसाठी येईल–आणखी नवनवीन कल्पना घेऊन.
मागच्याच महिन्यात नीराच्या फार्महाउसला भेट दिली आम्ही.
अतिशय सुंदर केलेय तिने सगळे. तिच्या सासूबाईची माझी थोडी ओळख होती. माझ्याजवळ येऊन बसल्या आणि
कौतुकाने म्हणाल्या,” काय हो कर्तृत्वाची सून माझी!! हे आम्हाला नव्हते सुचले, आणि सुचले असते, तरी धैर्य नसते झाले हो. बघा कसे नंदनवन फुलवलेय आमच्या सुनेने. अहोरात्र कष्टत असते हो पोर. आणि ,आमच्या मुलालाही बघा कसा छान कामाला लावलाय. तेही गोड बोलून. मला धन्य वाटते हो, आमच्या नुसत्या पडीक जमिनीचा असा सोन्याचा घास आम्हाला मिळाला. सगळे श्रेय नीराला जाते. कधी अंगाला सोने नव्हते लागले, पण बघा, नीराने दिवाळीत मला कशा पाटल्या बांगड्या केल्यात.”
थोडी सवड मिळताच, नीरा आम्हाला तिच्या बागेत घेऊन गेली. म्हणाली, “ माझा मुलगा हॉटेल management करून येईल 2 वर्षात. मग आमचा कॅनिंग फॅक्टरी सुरू करायचा विचार आहे. शिवाय इथे मासळी भरपूर मिळते.
कोल्ड storage करायचाही विचार करतोय तो. म्हणजे एक्स्पोर्ट बिझिनेस सुरू करता येईल.”—-
या साध्या सरळ, खेड्याबाहेरचे जग न बघितलेल्या मुलीची ही गरुड झेप बघून थक्क झालो आम्ही. तिच्या पाठीवर शाबासकीची थाप तर दिलीच, पण सासूबाईंचेही कौतुक केल्याशिवाय राहवेना आम्हाला. सासूबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
एक साधीसुधी मुलगी,आपल्या जिद्दीने, श्रमांनी, हे वैभव उभे करू शकली, याचे आम्हा सर्वांना अतिशय कौतुक वाटले.
“ साहसे श्री प्रतिवसति ।। “ ही उक्ती नीराने आपल्या जिद्दीने खरी करून दाखवली होती .
☆ चला आसाम मेघालयाला… भाग – 5 ☆ सौ राधिका भांडारकर ☆
आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.
आता परत गुवाहाटीकडे. आमच्या प्रवासाची जिथून सुरुवात झाली त्याच ठिकाणी परत जायचे. गुवाहाटी म्हणजे गोहत्ती. गोहत्तीचे चे प्राचीन नाव, प्रागज्योतिषपूर असे आहे.आसाम राज्यातील आणि ईशान्य भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे हे शहर. हे आसामच्या मध्य पश्चिम भागात,ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिण काठावर वसले आहे..प्राग्ज्योतिषपूर या नावाने प्रचलित असलेले गुवाहटी, हे,ऐतिहासिक कामरूप राज्य तंत्राची राजधानी होती. आता दिसपूर ही.आसामची राजधानी आहे.काझीरंगा ते गुवाहाटी हे जवळजवळ १९३ किलोमीटरचे अंतर आहे. गुवाहाटी कडे जाणारा हा रस्ता अतिशय रमणीय होता. वातावरण पावसाळी होते. आकाश ढगाळलेले होते. चहाचे लांबचलांब मळे दुतर्फा होते. केळी सुपारी होत्याच.बटाट्याचीही शेती दिसली. वाटेत, चहा, नारळाचे पाणी,किरकोळ खरेदी अशी मौजमजा करत प्रवास चालला होता. गाडीत ड्रायव्हरने आसामी गाणी लावली होती. काहीशी भजनी चाल वाटत होती. काही शब्दही कळत होते. थोडीशी बंगाली पद्धतीची शब्दरचना वाटत होती. आवाजही चांगला होता. गाणी ऐकताना मन रमले.
आजचे विशेष आकर्षण होते ते ब्रह्मपुत्रा नदीतील क्रूझ. आणि रोपवे सफारी. मात्र गुवाहाटीला पोहोचल्यावर मुसळधार पावसाने सारीच त्रेधातिरपीट उडवली. रोपवे सफारी रद्द करावी लागली. मात्र आमच्या टूर सहायकाने दुसर्या दिवशी जाऊ असे आश्वासन दिले.म्हणून बरे वाटले.
1. ब्रह्मपुत्रा 2.आसामी कलकुसर 3. आसामी जेवण
ब्रह्मपुत्रेचं दर्शन आत्मानंदी होतं! आशिया मधली ही एक प्रमुख नदी आहे. तिबेट, चीन, भारत,आणि बांगलादेश मधून ही वाहते. बांगलादेशामध्ये तिला जमुना या नावाने ओळखले जाते. गंगेच्या त्रिभुज प्रदेशात येऊन ब्रह्मपुत्रा बंगालच्या उपसागरास मिळते. ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणून ब्रह्मपुत्रा.काही ठिकाणी तिचा ब्रह्मपुत्र असा पुलिंगीही ऊच्चार करतात. आसाम राज्यातील बहुतेक मोठी शहरे ब्रह्मपुत्रेच्या काठावर वसलेली आहेत.नद्यांना आपण देवता का मानतो? अनुभूतीतून ते जाणवायला लागतं. संथ वाहणाऱ्या या महाकाय सरितेच दर्शन खरोखरच स्वर्गीय आनंद देणार होतं! तिच्या पात्राकडे बघता बघता नकळतच हात जुळले.निसर्गातल्या अज्ञात शक्तीला केलेलं ते नमन होतं!गंगा,गोदावरी,इंद्रायणी जणू सार्यांचं एकरुप पहात आहोत असं वाटलं.वात्सल्यरुपी माऊलीसारखीच मला ती भासली. पावसाळ्यात मात्र ती रौद्र रुपात एखाद्या देवीसारखीच भासत असावी.
अल्फ्रेस्को ग्रँड हे आमच्या बोटीचं नांव.तीन मजली बोट होती. यामधून केलेला विहार अतिशय आनंददायी होता. बोटीवरच जलपान झाले. आणि सारेच पर्यटक नाचगाण्यात रमून गेले. नदीमध्ये अनेक लहान मोठी बेटे, झाडाझुडपात दडलेली आहेत. तिथे मंदिरेही आहेत. मावळतीच्या वेळचे आकाशातले गुलाबी रंग आणि किरणांचे, संथ पाण्यातले प्रतिबिंब पाहता पाहता माझे मन हरखून गेले. ती नौका सफर अविस्मरणीय होती!!क्षणभर वाटलं या जलौघात सामावून जावं!!
गुवाहाटी हे तसं मोठं गजबजलेले शहर आहे. आसाम मधील मोठे, शैक्षणिक, सांस्कृतिक, आणि व्यापारी क्षेत्र आहे. येथे सरकारी कार्यालये, विधानसभा, उच्च न्यायालयाच्या इमारती आहेत. इथल्या नेहरु स्टेडियमवर क्रिकेट व फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय सामने होतात. मात्र इथल्या रस्त्यांचा विकास झालेला वाटला नाही. रस्ते अरुंद आणि वर्दळ प्रचंड. पण ट्रॅफिक रूल्स पाळण्याची शिस्त असल्यामुळे गोंधळ जाणवला नाही.
आमच्या हॉटेलचं नाव मला आवडलं. घर ३६५.
या! आपलं स्वागत आहे! वर्षभर घर आपलेच आहे! अशा अर्थाचं हे नाव वाटलं. रूम लहान असली तरी सर्व सुविधा संपन्न होती. रात्रीचे जेवणही छान होते. आता हळूहळू मोहरीच्या तेलातलं आसामी चवीचं जेवण आवडू लागलं होतं.रात्री झोपताना मात्र डोळ्यासमोर येत होती ती विशाल ब्रह्मपुत्रा!
(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी हिन्दी, दूर शिक्षा,पत्रकारिता व जनसंचार, मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘जहाँ दरक कर गिरा समय भी’ ( 2014) कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है एक भावप्रवण अभिनवगीत – “कमर-कमर अंधियारा……”।)
(Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. Presently, he is serving as Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad is involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.)
We present an English Version of Shri Sanjay Bhardwaj’s Hindi poem “विचारणीय”. We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji (who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages) for this beautiful translation and his artwork.)
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
संजय दृष्टि – भाषा
नवजात का रुदन;
जगत की पहली भाषा,
अबोध की खिलखिलाहट;
जगत का पहला महाकाव्य,
शिशु का अंगुली पकड़ना;
जगत का पहला अनहद नाद,
संतान का माँ को पुकारना;
जगत का पहला मधुर निनाद,
प्रसूत होती स्त्री, केवल
एक शिशु को नहीं जनती,
अभिव्यक्ति की संभावनाओं के
महाकोश को जन्म देती है,
संभवतः यही कारण है;
भाषा स्त्रीलिंग होती है..!
अपनी भाषा में अभिव्यक्त होना अपने अस्तित्व को चैतन्य रखना है।….आपका दिन चैतन्य रहे।
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆