हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य#115 – कविता – हर हर महादेव ☆ श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’ ☆

श्रीमती  सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’

(संस्कारधानी जबलपुर की श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’ जी की लघुकथाओं, कविता /गीत का अपना संसार है। साप्ताहिक स्तम्भ – श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य  शृंखला में आज प्रस्तुत है  महाशिवरात्रि पर्व पर आधारित एक भावप्रवण कविता “*हर हर महादेव *”। ) 

☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी  का साहित्य # 115 ☆

? हर हर महादेव ?

?महाशिवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं ?

 

सदियों से चली आई, महाशिवरात्रि की रीत।

जन्मों-जन्मों याद करें, शिव पार्वती संग प्रीत।

 

शिव शंकर का ब्याह रचानें, मचा हुआ है शोर।

धूनी रमाए बैठे भोले, चले किसी का न जोर।।

 

 नंदी अब सोच रहे, दिखे ना कोई छोर।

 कहां उठाऊं भोले को, रात बड़ी घनघोर ।।

 

कठिन परीक्षा की घड़ी,  बसंत छाया चहु ओर।

कोयल कूके डाली डाली,  आमों में आया बौर।।

 

 भांग धतूरे की खुशबू, कामदेव का शोर।

ध्यान से जागे शिव शंभू, नाच उठा मन मोर।।

 

हृदय पटल झूम उठा,  प्रीत ने लिया हिलोर।

मंद मंद मुस्काए शंकर, झूम उठे गण चहूं ओर।।

 

जटा जूट लहराए शंभू, अंग भभूति रम डाला।

भाल चंद्रमा सोह रहा, गले में सर्पों की माला।।

 

दूल्हा बन गए अधिपति, इंद्र देव गण मुस्काय।

अपने अपने गणों को लेकर, संग संग चल चले आए।।

 

देख रूप अवघड दानी का,  गौरा जी मुस्काई।

मैं तो हूं सब रुप  की दासी,  पर कैसे हो सेवकाई।।

 

 रुप भयंकर त्यागों स्वामी,  करो सब पर उपकारी।

 हाथ जोड़ करूं मैं विनती, रूप धरो मनुहारी।।

 

 सजा रूप बना दूल्हे का, सुखो की रात्रि छाई।

 शिव पार्वती विवाह रचाने,  महाशिवरात्रि आई।।

 

स्याम गौर सुंदर छवि,  सभी नयन छलकाए ।

कभी दिखे शिव शंकर शंभू,  कभी गौरी दिख जाए।।

 

आंख मिचौली खेलते प्रभु, मन को बहुत भर माए।

समा गई आधे अंग गौरा, अर्धनारीश्वर कहलाए।।

 

करें जो श्रद्धा से पूजन,  इक्छित वर को पाए।

धन भंडार भरे घर में, प्रीत पर आंच न आए।।

? हर हर महादेव ?

© श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’

जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 13 (41-45)॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

॥ श्री रघुवंशम् ॥

॥ महाकवि कालिदास कृत श्री रघुवंशम् महाकाव्य का हिंदी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग #13 (41 – 45) ॥ ☆

सर्गः-13

और सुतीक्ष्ण मुनि कर रहे जो चरित्र उद्यात।

पंच-अग्नि तप-साधना सूर्य ताप के साथ।।41।।

 

इंद्र सशंकित हो उठे देख तदोबल ध्यान।

पर न अपसरा कर सकीं पथ से विमुख निदान।।42।।

 

वाम भुजा ऊँची उठा जय माला को धार।

अन्य जो खुजलाती हिरण करती मम सत्कार।।43।।

 

मौन मुनी ने सिर हिला कर प्रणाम स्वीकार।

हटा दृष्टि मम यान से रवि को रहे निहार।।44।।

 

यह आश्रम शरभंग का तपः पूत स्थान।

जिनने समिधा बनाये अपने तन मन प्राण।।45।।

 

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १ मार्च – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆  १ मार्च -संपादकीय -सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

गौरी देशपांडे

गौरी देशपांडे (11.02.1942 – 1.3.2003)

महर्षी कर्वे यांची नात, दिनकर व इरावती कर्वे यांची कन्या व र. धों. कर्वे यांची पुतणी गौरी देशपांडे. त्यामुळे धीटपणा, सुधारकता, वैचारिक स्वातंत्र्य या गोष्टी त्यांच्या रक्तातच होत्या.

त्यांनी इंग्लिशमध्ये एमए व नंतर पीएचडी केलं.

फर्ग्युसन कॉलेजमध्ये नंतर पुणे विद्यापीठात त्या इंग्लिशच्या प्रोफेसर होत्या.

कथा, कादंबऱ्या, कविता, ललित व ललितेतर लेखन, भाषांतर(मराठीतून इंग्रजी व इंग्रजीतून मराठी), संशोधन वगैरे बहुतेक सर्वच साहित्यप्रकार त्यांनी सक्षमतेने हाताळले.

त्यांच्या लेखनात मुक्त विचारांचं प्रतिबिंब दिसतं. ते स्त्रीवादापलीकडे जाऊन स्वातंत्र्य वादी, व्यक्तीवादी होतं. वेगवेगळ्या पातळीवरचं प्रेम, त्याच्या मर्यादा, त्यासाठी मोजावी लागणारी किंमत ह्याबद्दलचे विचार त्यांच्या लेखनात दिसतात. लेखणीच्या धीटपणामुळे त्यांच्यावर ‘बंडखोर लेखिका’ हा शिक्का बसला.

पुस्तके :

‘एकेक पान गळावया’, ‘तेरूओ आणि काही दूरपर्यंत’, ‘दुस्तर हा घाट आणि थांग’, ‘उत्खनन’,  ‘विंचुर्णीचे धडे’ वगैरे मराठी पुस्तके.

‘बिटवीन बर्थ्स’, ‘लॉस्ट लव्ह’, ‘बियॉंड द स्लॉटरहाऊस’ वगैरे इंग्रजी पुस्तके.

‘अरेबियन नाईट्स’ चे दहा खंड वगैरे पुस्तकांचा इंग्रजीतून मराठीत अनुवाद.

सुनीता देशपांडे यांच्या ‘आहे मनोहर तरी’चा ‘-अँड पाईन फॉर व्हॉट इज नॉट ‘, तसेच अविनाश धर्माधिकारींच्या ‘अस्वस्थ दशकाची डायरी’चा ‘डायरी ऑफ अ डिकेड ऑफ ऍगनी’ वगैरे मराठीतून इंग्रजीत अनुवाद.

गौरी देशपांडे यांच्या स्मृतिदिनी त्यांना सादर अभिवादन.????

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ, कऱ्हाड. शताब्दी दैनंदिनी. इंटरनेट.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चवचाल शेंग ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

⭐ चवचाल शेंग ! ? ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

चवचाल ‘चवळीची’ शेंग

पडे ‘पडवळाच्या’ प्रेमात

उडवू म्हणे लग्नाचा बार

मंडईच्या हिरव्या मांडवात

 

ऐकून बोलणे ‘चवळीचे’

लागे ‘पडवळ’ हसायला

लग्न झाले ‘डाळिंबीशी’

तप लोटली संसाराला

 

हिरमुसली चवळीची शेंग

भिडे लाल भोपळ्याला,

लग्न करशील माझ्याशी

नेईन परदेशी हनिमूनला

 

छान तुझे प्रोपोजल, पण

उशीर केलास विचारायला

उगा कशा लाऊ गालबोट

गवारी सोबतच्या लग्नाला

 

बावचळली चवळीची शेंग

काय करावे तिला सुचेना

आता कांद्या बटाट्या विना

आधार तिला कुणाचा ना

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

संपर्क – (सिंगापूर) +6594708959, मो – 9892561086, ई-मेल – [email protected]

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 127 ☆ राजा राणीचा संसार ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 127 ?

☆ राजा राणीचा संसार ☆

राजा राणीचा संसार, हवी कशाला भाकर

वीस मिनिटात येतो, आता पिझ्झा दारावर

 

राजा राणीचा संसार, हवे स्वतःचेच घर

येता जाता रस्त्यावर, माझे असावे माहेर

 

राजा राणीचा संसार, नको नंदा नको दिर

सासू सासरे देखील, गावी असावेत दूर

 

राजा राणीचा संसार, नाही मला हात चार

घरकाम करताना, लावेल तो हातभार

 

राजा राणीचा संसार, खोट्या पावसाचा जोर

शाॕवरच्या खाली नाचो, माझ्या मनातला मोर

 

राजा राणीचा संसार, नको घामाची ह्या धार

लावू एसी घरामध्ये, उन्हाळा ना सोसणार

 

राजा राणीचा संसार, का मी खावी चिंचा बोरं ?

एवढ्यात नको आहे, खरंतर मला पोरं

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सामान्यातील असामान्यत्व ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

 

?विविधा ?

☆ सामान्यातील असामान्यत्व ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

काल मी कृष्णा काकांकडं गेले होते. काका काकू बाहेर जाण्याची तयारी करत होते. त्यांची लगबग बघून मी न राहवून चौकशी केलीच. काका काकू चिनूच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनाथाश्रमात मुलांना लाडू वाटायला चालले होते.

नोकरी च्या निमित्तानं परदेशी राहणाऱ्या नातवाचा वाढदिवस साजरा करण्याची ही कल्पनाच किती अभिनव आहे, नाही का ? आमच्या काका काकूंनी मुलगा जवळ नसताना सुद्धा वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला. कितीतरी जणांच्या चेहऱ्यावर तो परावर्तित झालेला बघितला!

पुण्यातील एक सद्गृहस्थ आपल्या मुलाच्या निधनाचं दु:ख विसरून अनेक अनाथ मुलांना आपलं घर देतात, त्यांना आश्रय देतात. अशी माणसं मला सामान्य असूनही असामान्य वाटतात. या देवदूतांना प्रसिध्दी नको असते. हारतुरे नको असतात. पेपर मध्ये फोटो किंवा बातमी नको असते. त्यांना फक्त आनंद वाटायचा असतो. समाधान पेरायचं असते. स्वतः बरोबर आजूबाजूला सुख पसरवायचं असतं. प्रसिध्दी, पैसा, अहंकार मोठेपणा त्यांच्या आजूबाजूला फिरकतही नाहीत. या सगळ्या पलिकडं ते पोचलेले असतात. म्हणूनच इतरांपेक्षा वेगळे दिसतात.

असामान्य होण्यासाठी मोठं कार्यच करायला पाहिजे असं नसतं हं. मोठेपण अंगी बाणवायला यातना ही सोसाव्या लागतात. ती असामान्य व्यक्तिमत्वं लाभलेली माणसं तुमच्या आमच्यासारखी असूनही वेगळी असतात.ते सगळ्यांना शक्य नसतं. परंतु छोट्या छोट्या गोष्टीतून आपण कुणालातरी मदत करु शकतो. कुणाला तरी हसवू शकतो, उदास मनाला आनंद देऊ शकतो. बघा हं. अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत. आपल्या बहुतेकांच्या घरी खूपसा खाऊ असतो, नको असलेले जास्तीचे कपडे असतात. हेल्थ कॉन्शस असलेले आपण इतका खाऊ संपवू शकत नाही. काकूंच्या प्रमाणं मुद्दाम करुन नाही जमणार कदाचित, पण असा जास्तीचा खाऊ ; ताजा, चांगला असतानाच गरजूंना का वाटू नये बरं? जसं खाण्याच्या पदार्थांचं, तसंच कपड्यांचं! आजकाल कपाटात मावत नाहीत एवढे कपडे असतात नं बहुतेकांच्या जवळ! ते जुने होण्यापूर्वी, फाटण्यापूर्वी दिले गरजूंना तर? अगदी सुधा मूर्तीं इतका साधेपणा नाही जमला तरी , त्यांचं थोडंसं अनुकरण करायला काय हरकत आहे? बघा बरं, अशा वागण्यानं कसं समाधान मिळतं ते. आनंद, समाधान, या भावना संसर्गजन्य आहेत. त्या परावर्तीत होतात. आणि त्या परावर्तनाचा एक सूक्ष्मसा किरण आपल्याला होता आलं पाहिजे.

आनंदाचे डोही आनंद तरंग. अंतर्मनात जेंव्हा असा आनंद भरलेला असतो, मनाचा डोह आनंद गान गात असतो तेंव्हा अगदी सहजपणं आनंद तरंग उठत असतात. त्यांचा भवताल ही आनंदानं डोलत राहतो.

निर्व्याज समाधान मिळवण्यासाठी पैसे खर्च लागत नाहीत. असं सिद्ध करणारे अनेक सामान्य लोक या जगात आहेत. एक भांडी घासणाऱ्या बाई आपल्या झोपडीवजा घरात दहा बारा अनाथ मुलांच संगोपन करतात. त्यांच्या शिक्षणासाठी धडपडतात. त्यांना एकवेळेला पोटभर खाऊपिऊ घालतात.मग ती साधी चटणी भाकरी का असेना. एवढा उदात्तपणा राजेशाही बंगल्यात राहणाऱ्या श्रीमंतांच्या कडंही नसतो.अशी अनेक उदाहरणे आहेत जी सहजपणे समाजकार्य करतात. उजव्या हाताने केलेली मदत डाव्या हाताला कळूही न देता अविरतपणे घेतला वसा सुरू ठेवतात. या सर्वांना माझे दंडवत. साने गुरूजींच्या या धर्माचे आचरण करण्याचा निदान एक लहानसा का होईना प्रयत्न अवश्य करुया. . . . . .

जगी जे दीन पद दलीत

जगी जे हीन अतीपतीत

तया जाऊन ऊठवावे

जगाला प्रेम अर्पावे

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कचरेवाल्याची मुलगी – भाग 3 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ कचरेवाल्याची मुलगी – भाग 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

दुपारी २.३० वाजता दारावरची बेल वाजली. रामूकाकानी दरवाजा उघडला. रवीने तिला आत बोलाविले. सोफ्यावर  बसवले. रामूकाकानी पाण्याचा ग्लास भरून आणून तिच्या हातात न देता पुढे असलेल्या टेबलावर ठेवला. रवीच्या निदर्शनात ते आले तसे रवीने पुढे होऊन तो पाण्याचा ग्लास पुन्हा उचलला आणि तिच्या हातात दिला. तिच्या चेहऱ्यावर जराशी स्मितरेषा झळकली. तिच्या समोरच्या सोफ्यावर रवी बसला. ती आजूबाजूला बघून घर निरखत होती.

“बोला साहेब काय विचारायचे आहे ? ” तिनेच बोलायला सुरवात केली. रवीने तिला पहिले तिचे नाव विचारले. ती काही न बोलता काही वेळ रवीकडे बघत राहिली.

 रवीने परत विचारले, ” काय झाले ? ” तिच्या डोळ्यात पाणी आले होते. तिने एक आवंढा गिळून बोलायला सुरवात केली. ” साहेब मी आता काहीच दिवस माझे वडील आजारी आहेत म्हणून कचरा न्यायला येते पण माझे वडील गेले पंचवीस वर्षे ह्या भागातला  कचरा गोळा करतात पण त्यांनाही आज पर्यंत कोणी त्यांचे नाव विचारले नाही. आम्हा लोकांना जे कचरा गोळा करतात त्यांना कचरेवाला किंवा कचरेवाली हीच नाव असतात. कितीही पाऊस असला  किंवा आणखी काही  असले तरी आम्ही काम करतोच. आम्हाला सुटी नाहीच. कुठलाही सण असला तरी तो  घरी साजरा करायच्या आधी आम्ही दुसऱ्यांच्या घरचा कचरा गोळा करत असतो॰ तरीही कोणीही आम्हांला नावाने ओळखत  नाहीत. तुम्ही पहिले आहात, माझे काम माहिती असूनही माझे नाव विचारले. तर माझे नाव चिन्नू मुन्ना वाल्मिकी. आमची पूर्ण जमात ह्याच कामामध्ये आहे. आमच्या आधीच्या पिढ्यांनीही हेच काम केले आहे. कोणीतरी  हे काम केलेच पाहिजे ते काम आमची जमात करत असते आणि ते ही अविरत पिढ्यान पिढ्या.”  रवीला तिच्या बोलण्यातले तथ्य जानावाले.

पुढचा अर्धा तास रवी आणि तिचे बोलणे चालले होते. तिच्या बोलण्यातून तिचा स्वतः वरचा आत्मविश्वास दिसत होता. लहानपणापासून रात्री झोपतांना मोकळे आकाश बघत आलेल्या चिन्नूला आकाशाचे विलक्षण आकर्षण होते आणि त्यामुळेच कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या चिन्नूला अवकाश शास्त्रज्ञ व्हायचे आहे. पुढच्या वर्षीपासून तिला कचरा व्यवस्थापन डिप्लोमा कोर्स ही चालू करायचा आहे. रवी तर सगळे चिन्नूचे विचार आणि तिची बोलायची पद्धत ऐकून खुश झाला होता. त्याने रामुकाकांना सांगून चिन्नूसाठी जेवायला वाढायला सांगितले पण चिन्नूने त्याला नकार देऊन म्हंटले, ” साहेब नका वागू असे. नंतर तुमच्या घरच्यांना कळले की एक कचरेवाली तुमच्या घरात येऊन जेऊन गेली तर खूप अनर्थ होईल. माझ्या वडिलांचे नुसते तुमच्या घरचे नाही तर तुमच्या संपूर्ण सोसायटीचे काम जाईल. तेंव्हा प्लिज असे काही करू नका. आम्ही तुमच्या सगळ्यांपासून खूप लांब आहोत ते बरे आहोत. कृपया आम्हाला जवळ आणण्याचा प्रयत्न करू नका. मला आणि तुम्हांला, आपल्या दोघांनाही त्याचा खूप त्रास होईल.”

चिन्नू जे सांगत होती ते बरोबर होते. रवीच्या मगाशीच निदर्शनात आले होते की चिन्नूला घरात घेतली तेंव्हा रामूकाकांना ते आवडले नव्हते. रवीने काहीतरी वेगळे केले अशा नजरेने त्यांनी बघितले होते. रवीने पुढची काही मिनिट्स तिला स्वतःची ओळख करून देऊन त्याच्या शिक्षणाबद्दल सांगितले आणि तिचा मोबाईल नंबर घेऊन तिला स्वतःचा मोबाइल नंबर दिला.

पुढे एक आठवडा त्यांचे दिवसातून चार ते पाच वेळेला फोनवरून बोलणे होत होते. तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ती  रवीला आवडायला लागली होती. तिच्या ध्येयपूर्ती करण्यासाठी चाललेल्या वाटचालीत रवीला तिला मदत कराविशी वाटत होती आणि खूप विचारांती एकदा रवीने तिला भेटून एका कॉफी रेस्टारंट मध्ये कॉफी प्यायला नेले. प्रथम कॉफीला नकार देणारी चिन्नू रवीच्या अती आग्रहामुळे तयार झाली. हॉटेल मध्ये बसल्यावर चिन्नूनेच सुरवात केली, “साहेब, काय झाले, माझ्या प्रेमात वगैरे पडला नाहीत ना! तसे असेल तर स्वतःला सावरा.” तिच्या ह्या बोलण्याने रवीने डायरेक्ट विषयाला हात घातला, ” चिन्नू, खूप विचार करून मी तुला विचारतोय, तुला प्रपोज करतोय, मला तू पहिल्यावेळी बघितल्या क्षणीच आवडली होतीस आणि गेले काही दिवस तुझ्याशी बोलून मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. माझ्याशी लग्न करशील का ? “

रवीचे बोलणे ऐकून चिन्नू जरा जास्तच सिरिअस झाली. एकटक रवीकडे बघून तिने संथ लयीत बोलायला सुरवात केली,  “साहेब जरा स्वतःला सावरा. तुम्ही नुकतेच अमेरिकेत शिकून आला आहात. तुमच्या समोर तुमचा तयार फॅमिली बिझनेस आहे. तुमच्या घरचे तुमची तुम्ही त्यांच्या बिझनेसला सामील होण्याची वाट बघत आहेत आणि तुम्हाला हे विपरीत काय सुचतंय. साहेब आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही जिला आत्ता प्रपोज करत आहात, तीची ओळख सगळ्यांसाठी कचरेवाल्याची मुलगी अशी आहे. त्यामुळे उगाच नको त्या भानगडीत पडू नका. चक्रव्यूह भेदायला शिरायच्या आधीच जरा स्वतःला आवरा. स्वतःचा अभिमन्यू होऊ देऊ नका.  मी काही तुमच्या प्रेमाचा स्विकार करू शकत नाही.

क्रमश:….

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन यात्रा ☆ आत्मसंवाद…भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? जीवन यात्रा ?

☆ आत्मसंवाद…भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

मी – का ग, आज गप्पगप्पशी आहेस आणि जरा गंभीर दिसतियस.

उज्ज्वला – मी? नाही बाई!

मी – खरं म्हणजे तू खुशीत असायला हवस. नुकतीच तुझी २ पुस्तके प्रकाशित झालीत. ‘कृष्णस्पर्श ‘ रिप्रिंट झालय आणि एवढ्यातच आणखीही २ पुस्तके येणार आहेत. 

उज्ज्वला – तशी खुशीतच आहे मी. पाचा उत्तराची कहाणी हे माझ्या स्वत:च्या कथांचं पुस्तक आलय. आनुवादीत नव्हे. दुसरं मात्र अनुवादीत आहे. प्रातींनिधिक पंजाबी लघुकथा. अरिहंत प्रकाशनाने ही छापलीत.

मी –आणि येणार्याल पुस्तकात तुझ्या टोरॅंटोच्या मैत्रिणीचा पुस्तक आहे. तू पण खूश. ती पण खूश.

उज्ज्वला- होय. हंसा दीप तिचं नाव. या चार-पाच वर्षातलीच तिची नि माझी ओळख. तीही ई-मेल, फोनद्वारेच आणि मुख्य म्हणजे लेखनातून पण ती माझी अगदी सख्खी मैत्रीण झालीय. तिच्या कथांचा अनुवाद ‘आणि शेवटी तात्पर्य’ म्हणून येतोय. छान, खुसखुशीत आणि वास्तववादी कथा आहेत तिच्या. माझ्यापेक्षा तीच जास्त उत्सुक आणि अधीर झाली आहे पुस्तक बघायला.

मी  – मला वाटतं , नवदुर्गा काढतेय हे पुस्तक.

उज्ज्वला-  बरोबर आहे. याबरोबरच गौतम राजऋषी यांच्या कथांचा ‘हिरव्या हास्याचा कोलाज’ हेही पुस्तक येतय. अगदी वेगळ्या प्रकारचं पुस्तक आहे हे. लेखक स्वत: मिल्ट्रीमध्ये कर्नल आहेत. युद्धाचा अनुभव घेतलेले आहेत. त्यांचं पोस्टिंग बव्हंशी काश्मीर घाटी, पीरपंजालची पहाडी,  संरक्षण रेषेच्या जवळपासची ठाणी इ. ठिकाणी झालय. तिथलं वातावरण, तिथल्या सैनिकांचं आणि लोकांचं जीवन आणि मानसिकताही, या पार्श्वभूमीवरच्या त्यांच्या कथा आहेत. अगदी वेगळ्या प्रकारच्या कथा आहेत. या पुस्तकाचं खूप चांगलं स्वागत होईल असं मला वाटतं.

मी –मग असं असताना तू इतकी गंभीर का?

उज्ज्वला – सहज मनात येतय, आपल्या लेखनप्रवासाचा मागोवा घ्यावा. खरं म्हणजे लेखिका व्हायचं मी काही लहानपणापासून ठरवलं नव्हतं. 

मी – पण मला वाटतं, तू लहानपणापासून म्हणजे शाळेत असल्यापासून कविता करतेस.  उज्ज्वला- हो. पण माझी पहिली कविता मात्र फुकटच गेली. म्हणजे गंमतच झाली तिच्याबाबतीत.

मी – काय झालं ग?

उज्ज्वला – अग, मी ८ वीत होते तेव्हा गोवा मुक्तिसंग्रामाचा लढा जोरात चालू होता. त्यातले एक मुख्य सेनानी हेमंत सोमण. एकदा शाळेत बातमी आली, हेमंत सोमणांनी तिरंगा फडकावला आणि पोर्तुगीजांनी त्यांना गोळी मारली. त्यांचा बळी गेला. बातमी ऐकली आणि मी उत्स्फूर्तपणे लिहिलं,

‘हेमंत सोमणांनी गोव्यात झेंडा रोविला

तडतडा तडकले पोर्तुगीज झेंडा त्यांनी पाहिला ‘

इथून मग त्यांच्या बलिदानाशी कविता येऊन थांबली. दुसर्याी दिवशी बातमी आली, की हेमंत सोमणांना गोळी नाही मारली. पकडून तुरुंगात टाकलं. मग माझ्या कवितेला काहीच अर्थ उरला नाही. अर्थात माझी कविता फुकट गेली याचं मात्र मला मुळीच वाईट वाटलं नाही. हेमंत सोमण वाचले, हे महत्वाचं.

मी- आणखीही काही कविता तू लिहिल्या होत्यास ना शाळेत?  

उज्ज्वला – चार-पाच वेळा काही तरी चाल मनात सुचली, ती गुणगुणताना त्यावर शब्द सुचत गेले.

मी- आठवते तुला त्यातलं काही?

उज्ज्वला- दोन ओळीच आठवताहेत. एक चाल गुणगुणताना  लिहिलं होतं,

‘ संध्यारजनी आली आली

     गाई – वासरे घरा परतली.’  बाकी काही आठवत नाही. म्हणजे ते सगळं तितकं महत्वाचं नव्हतंच.

मी – कॉलेजला गेल्यावर तुझ्या कविता लेखनाला बहार आला होता, नाही का?

उज्ज्वला- बहार वगैरे असा नाही पण कविता करणार्याा आणि मुख्य म्हणजे कवितेवर प्रेम    करणार्या– मैत्रिणी मिळाल्या. हिने काल कविता लिहिली, आपण का नाही? आशा इरिशिरीने कविता लिहिल्या तेव्हा. त्यात हौसेचा, अनुकरणाचा भाग जास्त होता. मौलिकता कमीच. तो काळ रोमॅंटिक होता. प्रेम या कल्पनेवरच प्रेम होतं तेव्हा. त्यामुळे प्रेमावर त्याहीपेक्षा वियोगावर कविता जास्त लिहिल्या गेल्या. काव्यबहरातला बराचसा बहर या स्वरूपाचा होता. त्यात उत्स्फूर्तता अशी फारशी नसायची. फार गंभीरपणे आम्ही तिकडे बघतही नव्हतो.

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ संगीताचा विकास – भाग-१  ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ ☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? सूर संगत ?

☆ संगीताचा विकास – भाग-१  ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

संगीत म्हणजे नेमके काय?

त्याचे उत्तर असे की निबद्ध गायन किंवा वादन. तालात बांधलेली स्वररचना.राग,स्वर

आणि शब्द कोणत्या एका तालात बद्ध करून त्या तालाच्या खंडाप्रमाणे सम,इतर टाळ्या,काल किंवा खाली या आवर्तनात स्वररचना किंवा गीत रचना चपखलपणे बसविणे म्हणजे संगीत.

पाण्याची खळखळ,वार्‍याची फडफड,समुद्राची गाज,पक्षांचा कलरव,कोकिळेचे कूजन,भ्रमराचे गुंजन हे जर शांतपणे ऐकले तर असे लक्षात येते की या सर्वांमध्ये एकप्रकारचा नाद,ताल,लय आहे,निबद्धता आहे.

भारतीय संगीताची परंपरा फार मोठी आणि प्राचीन आहे.नादयुक्त हुंकार ते सप्तस्वर असा संगीतातील स्वरांचाः विकासक्रम आहे.त्यामागे दीर्घ कालखंडाची परंपरा आहे जी  चार कालखंडातून दिसून येते.

१) वैदिक काल~इसवी सन पूर्व ५ ते ६ हजार पासून १हजार पर्यंत.

पंचमहाभूतांना देवता मानून त्यांची स्तुती व प्रार्थना करणार्‍या  ऋचांचे गायन ऋषीमुनी करीत असत.ऋग्वेद,यजूर्वेद,सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांपैकी सामवेदाशी वेदकालीन संगीत संबंधीत आहे. सा म्हणजे ऋचा आणि अम् म्हणजे ऋचांचे स्वरबद्ध गेय स्वरूप.सामवेदात गायनाची एक निश्चित पद्धति तयार केली गेली आणि तीन स्वरांचे गायन सप्तसुरांपर्यंत विकसित झाले. यज्ञयागादि प्रसंगी जे गायन होत असे तेच तत्कालीन संगीत होते,ज्याला गंधर्वगान असे म्हटले जात होते.

२) प्राचीन काल~ ईसवी सन पूर्व १००० ते ई.स.८०० पर्यंत. ह्याला जातिगायनाचा कालखंड असेही समजतात.धृवा गायनही प्रचलीत होते.पुढे त्याचेच परिवर्तीत स्वरूप धृवपद किंवा धृपद गीत गायन अशी ओळख झाली.हा प्रकार भरतपूर्व काळापासून प्रचारात होता.जातिगायनाचे बदललेले स्वरूप हेच रागगायन होय.भरतमुनींच्या नाट्यशास्त्रांत ह्या जातिगायनाचा किंवा राग गायनाचा उल्लेख सांपडतो.

पुढील भागात आपण मध्ययुगीन कालखंडातील संगीत बघू.

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares