हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कथा-कहानी # 102 ☆ बुंदेलखंड की कहानियाँ # 13 – पंडित केरी पोंथियाँ… ☆ श्री अरुण कुमार डनायक ☆

श्री अरुण कुमार डनायक

(श्री अरुण कुमार डनायक जी  महात्मा गांधी जी के विचारों केअध्येता हैं. आप का जन्म दमोह जिले के हटा में 15 फरवरी 1958 को हुआ. सागर  विश्वविद्यालय से रसायन शास्त्र में स्नातकोत्तर की उपाधि प्राप्त करने के उपरान्त वे भारतीय स्टेट बैंक में 1980 में भर्ती हुए. बैंक की सेवा से सहायक महाप्रबंधक के पद से सेवानिवृति पश्चात वे  सामाजिक सरोकारों से जुड़ गए और अनेक रचनात्मक गतिविधियों से संलग्न है. गांधी के विचारों के अध्येता श्री अरुण डनायक जी वर्तमान में गांधी दर्शन को जन जन तक पहुँचाने के  लिए कभी नर्मदा यात्रा पर निकल पड़ते हैं तो कभी विद्यालयों में छात्रों के बीच पहुँच जाते है.

श्री अरुण डनायक जी ने बुंदेलखंड की पृष्ठभूमि पर कई कहानियों की रचना की हैं। इन कहानियों में आप बुंदेलखंड की कहावतें और लोकोक्तियों की झलक ही नहीं अपितु, वहां के रहन-सहन से भी रूबरू हो सकेंगे। आप प्रत्येक सप्ताह बुधवार को साप्ताहिक स्तम्भ बुंदेलखंड की कहानियाँ आत्मसात कर सकेंगे।)

बुंदेलखंड कृषि प्रधान क्षेत्र रहा है। यहां के निवासियों का प्रमुख व्यवसाय कृषि कार्य ही रहा है। यह कृषि वर्षा आधारित रही है। पथरीली जमीन, सिंचाई के न्यूनतम साधन, फसल की बुवाई से लेकर उसके पकनें तक प्रकृति की मेहरबानी का आश्रय ऊबड़ खाबड़ वन प्रांतर, जंगली जानवरों व पशु-पक्षियों से फसल को बचाना बहुत मेहनत के काम रहे हैं। और इन्ही कठिनाइयों से उपजी बुन्देली कहावतें और लोकोक्तियाँ। भले चाहे कृषि के मशीनीकरण और रासायनिक खाद के प्रचुर प्रयोग ने कृषि के सदियों पुराने स्वरूप में कुछ बदलाव किए हैं पर आज भी अनुभव-जन्य बुन्देली कृषि कहावतें उपयोगी हैं और कृषकों को खेती किसानी करते रहने की प्रेरणा देती रहती हैं। तो ऐसी ही कुछ कृषि आधारित कहावतों और लोकोक्तियों का एक सुंदर गुलदस्ता है यह कहानी, आप भी आनंद लीजिए।

☆ कथा-कहानी # 102 – बुंदेलखंड की कहानियाँ – 13 – पंडित केरी पोंथियाँ… ☆ श्री अरुण कुमार डनायक

अथ श्री पाण्डे कथा (3)

पंडित केरी पोंथियाँ, ज्यों तीतुर कौ ज्ञान।

औरण सगुण बतात हैं, अपनौ फंद न जान॥

शाब्दिक अर्थ:-  पंडित जी अपनी पोथियों के साथ प्राय: तोता या तीतर पक्षी को साथ लेकर सड़क के किनारे बैठे बैठे लोगों का भविष्य फल बताते हैं। उनकी पोंथियाँ में ज्ञान तीतर के ज्ञान जैसा ही होता है जो दूसरों का सगुन तो बता देता हैं पर पंडित जी अपना स्वयं का  भविष्य नहीं जान पाते और ज़िंदगी सड़क के किनारे बैठे बैठे काट देते हैं।

रामायण पाण्डे के दिन बहुरे। हिरदेपुर गाँव दमोह से कोई 3-4 मील दूर था और बाँसा, जो कोपरा नदी के तट पर बसा है,  से भी नजदीक ही था। काली मिट्टी के खेत में उपज अच्छी हो जाती थी। मंदिर से लगी खेती को रामायण पाण्डे अधिया बटाई पर किसी भी काश्तकार को दे देते और गेंहू, ज्वार, मूंग और तिलहन की इतनी उपज तो हो ही जाती कि भगवान का दोनों समय का भोग लग जाता और उसी भोग से पंडित जी के परिवार का भरण पोषण हो जाता। रामायण ज्यादा लालची न थे अत: खेती की उपज बढ़ाने के कोई अन्य उपाय उन्होने कभी सोचे ही नहीं। बटाईदार जितना दे जाते खुशी खुशी भगवान का प्रसाद समझ मंदिर से लगी कोठरी में रखवा लेते। जब कभी किसान दूध और दही भी भगवान को चढ़ा जाते वह भी रामायण पाण्डे और उनके परिवार के काम आ जाता। पर पंडिताइन को इतने से संतोष न था और उनकी ताने बाजी चलती रहती। पंडिताइन हमेशा रामायण से कहती

‘दूसरन खों तो पुथन्ना पढ़ पढ़ खूब ज्ञान देत हो अपने बारे में भी कच्छु सोचो।‘

रामायण ऐसे अवसर पर चुप रह जाना ही पसंद करते और सिर्फ इतना कहते ‘अरी भागवान संतोष रख, भोले की कृपा से अच्छे दिन आए हैं।‘ पर पंडिताइन भी कहाँ मानती दो चार बातें और सुना देती और जब रामायण के तर्कों के आगे उनकी न चलती तो बिसुरते हुये कह उठती

‘सजीवन के भविष की तो सोचो तुमाए तरीका से तो  चल गई गिरस्ती और हो गओ मोड़ा को बियाव।‘

हार थक रामायण यह कहावत कह चुप हो जाते

“माखी गुड माँ गड़ी रहे पंख रहे लिपटाय हाथ मले अरु सिर धुने कहे लालच बुरी बलाय।‘

क्रमश:…

©  श्री अरुण कुमार डनायक

42, रायल पाम, ग्रीन हाइट्स, त्रिलंगा, भोपाल- 39

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 15 (11-15)॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

॥ श्री रघुवंशम् ॥

॥ महाकवि कालिदास कृत श्री रघुवंशम् महाकाव्य का हिंदी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग #15 (11 – 15) ॥ ☆

रघुवंश सर्ग : -15

पड़ा मार्ग में बाल्मीकि ऋषिवर का आवास।

मृगमय आश्रम में किया शत्रुध्न ने निशि वास।।11।।

 

किया मुनी वाल्मीकि ने शत्रुधं का सम्मान।

तपबल अर्जित श्रेष्ठ दे पीठ-शयन व पान।।12।।

 

उसी रात्री में सिया ने जाये दो सुकुमार।

कोष-दण्ड युत धरणि के जो उज्ज्वल उपहार।।13।।

 

रामपुत्र का जन्म सुन शत्रुध्न हुये प्रसन्न।

प्रातः मुनि से मिल करी यात्रा रथ-सम्पन्न।।14।।

               

लवणासुर, कुम्मनिसी-पुत्र महत् बलवान।

रहता था मधुपध्न में जो था नगर समान।।15अ।।

 

पहुँचे जब शत्रुध्न वह आया ले उपहार।

वन जीवों की राशि का करने को आहार।।15ब।।

 

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 125 ☆ गझल… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 125 ?

☆ गझल… ☆

तुझे स्वप्न जागेपणी खास आहे

 जुना ध्यास या प्रेम पर्वास आहे

 

कधी शाम म्हणते कधी कृष्ण कान्हा

तुझे नाव माझा जणू श्वास आहे

 

फुलाला कसे काय नाकारते मी ?

अरे काळजाशी तुझा वास आहे

 

जरी  मी न राधा नसे गोपिकाही

तरी रंगलेला इथे रास आहे

 

मला लाज लज्जा मुळी आज नाही

सुगंधी सुखाचाच सहवास आहे

 

कुण्या कारणाने अशी धीट झाले

तुझा  संग  साक्षात मधुमास आहे

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वर वेगळेच होते… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वर वेगळेच होते… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆ 

बदलून आरसे कितीदा मी पाहिले स्वत:ला.

स्वरुप ते तरीही प्रतिबिंब वेगळे होते.

 

ऋतू बदलले क्रमाने तो वृक्ष तोच होता.

पक्षांच्या थव्यांचा मुक्काम वेगळा होता.

 

डोईवरी प्राक्तनाचे आकाश एक जरीही.

अतर्क्य  गूढ आकलनाचे रंग वेगळे होते.

 

कित्येक जन्ममृत्यू आयुष्यचक्र ठरले.

अंदाज जगण्याचे निराळे वेगवेगळेच उरले.

 

हे मानले जरीही अंतिम तत्व एक.

प्रत्येक प्रार्थनांचे स्वर वेगळेच होते

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ इमोजी… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ इमोजी  🤔 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

काही  दिवसांपूर्वी मेघालयातल्या whistling village विषयी ऐकलं. या  Kongthong village मध्ये एकमेकांना बोलवायला शिट्ट्यांचा वापर करतात. इथं संवाद साधायला शब्द वापरले जात नाहीत. शिट्टी घालून संवाद साधला जातो. किती छान! बोलण्यासाठी जवळपास असणं गरजेचं नाही. काही अंतरावरुन देखील; आधुनिक तंत्रज्ञान न वापरता संपर्क साधता येतो.. . . . पण हो याकरिता शिट्टी घालता यायला हवी हं.

माणसाला बोलायला आवडतं. वेगवेगळ्या विषयांवर बोलता येणं ही एक कला आहे. ही कला तुम्हाला बहुश्रृत बनवते. समाजप्रिय बनवते. गप्पा मारणारी माणसं साळढाळ असतात. सहजपणानं कोणत्याही प्रकारच्या लोकांमध्ये मिसळून जातात. मनातलं सगळं सांगून टाकलं की कसं मोकळं मोकळं वाटतं. आपल्याला भावना, विचार व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात.मनातलं सगळं बकबक करुन सांगितल्या शिवाय चैनही पडत नाही आपल्याला. नुसत्या शिट्टीतून या माणसांना राग, लोभ, प्रेम कसं बरं व्यक्त करता येत असेल.शब्दाविना एकमेकांना समजून घेणं ही कला मात्र या लोकांना साधली असेल.  योग्य शब्द शोधून बोलायचा प्रयत्न केला तरी गैरसमज होऊ शकतात. Whistling village मध्ये अशा गैरसमजांना थाराच मिळत नसेल. दुधारी हत्यारासारखे शब्दच न वापरल्यानं हे व्हिलेज खऱ्या अर्थानं स्वर्ग तर ठरत नसावं?

आजकाल आपण न बोलता ही खूप बोलतो. मोबाईलवर येणाऱ्या मेसेजेस ना उत्तर देताना शब्द वापरायचे टाळतो. इमोजी. . . स्मायलीज पाठवून रिस्पाॅन्स देतो. या स्मायलीज आहेतही खूप गोडुल्या. सर्व भाव भावना व्यक्त करण्यास समर्थ आहेत. राग, द्वेष, आनंद अशा मनतरंगा बरोबर त्या थंडी, उष्णता, पाऊस असे हवेतील बदलही त्या दाखवतात. न शिंकता सर्दी – खोकल्याची वर्दी देतात. शाब्बासकी, सहमती, नाराजी,इ. सांगतात. केक, बूके, फूलं पाठवून स्पेशल डेज देखील आपण लांबूनच साजरे करु शकतो. स्टीकर्स पाठवून जास्त आपुलकी दाखवू शकतो. GIF द्वारा गंमतीदार, हलके-फुलके संदेश पाठवू शकतो. नुसते हसरे ईमोजी सुध्दा किती प्रकारचे आहेत. फक्त हसरा चेहरा पाठवून खुषी व्यक्त करता येते. हसरा चेहरा, हसरे डोळे आणि गुलाबी गाल आनंदाबरोबर किंचित लाजरा भाव

व्यक्त करतात. डोक्यावर गोलाकार मुकुट मिरवणारा इमोजी एखाद्या विषयी असलेला अभिमान सांगतो.

हे सगळे चेहरे न बोलता खूप काही बोलतात. कमी वेळात योग्य भावना सांगणारं हे अनोखं तंत्रज्ञान आज जास्तीत जास्त वापरलं जातं. आपल्याजवळ सांगण्यासारखं खूप असतं. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या आकलनक्षमतेनुसार आलेल्या अनुभवांची अभिव्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे करता येते. भोवताली घडणाऱ्या घटनांचा अर्थही स्वतः च्या क्षमतेनुसार, संवेदनशीलतेनुसार लावता येतो. त्यासाठी कथा, कविता, कादंबरी असे साहित्य प्रकार हाताळले जातात. काळ बदलला. भावविश्व उलगडून दाखवणारी नवीन साधनं आली. नवीन पिढीची व्यक्त होण्याची साधनं बदलली. भाषा बदलली. सुपरफास्ट जमान्यात सुपरफास्ट पध्दतीनं व्यक्त होता आलं पाहिजे. त्यासाठी भाषेची गरज राहिली नाही. इमोजी हे काम अधिक सुलभ आणि सुपरडुपर फास्ट करतात. शब्दातून सांगितल्या जाणाऱ्या अर्थापेक्षा ही चित्रलिपी वेगवेगळे अर्थ प्रतीत करु शकते. जो हवा तो अर्थ घ्यावा. भाषेची अडचण नाही. भाषा येत नसल्याचा न्युनगंड नाही. कमी वेळात जास्त तसंच योग्य विचार मांडता येतो. पाल्हाळ न लावता मुद्दा सांगता येतो. लिहिणाऱ्याचा आणि वाचणाऱ्याचा दोघांचाही वेळ वाचतो. आता हे शब्दाविना व्यक्त होणाऱ्या पिढीचं जग झालंय.

म्हणजे आपण पुन्हा भाषा नव्हती त्या काळात चाललो आहोत की काय? . . आपण पुन्हा इमोजीतून. . . चित्रलिपीतून . . . भाषेचा शोध लागण्याच्या आधीच्या काळात जाऊन पोहोचणार आहोत की काय?

 

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कोसी- सतलज एक्सप्रेस -भाग-5 – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी ☆ अनुवाद – सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ कोसी- सतलज एक्सप्रेस -भाग-5 (भावानुवाद) – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(कथासूत्र : तो माणूस जबरदस्तीने बिरोजाचा हात पकडून त्यात पैसे कोंबतो…….)

बिरोजाच्या मुठीत साडेचार हजाराच्या करकरीत नोटा आहेत. प्रत्येक नोटेवर अशोकाच्या स्तंभाखाली, राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हसऱ्या चेहऱ्याशेजारी छापलंय -‘सत्यमेव जयते.’

‘बोलव तिला पटकन. गाडी सुटतेय.’ तो  माणूस बिरोजाला ढकलतो.

पण माधोला तो माणूस अजिबात आवडलेला नाही. तो सगळं काही बघतोय. त्याच्या नजरेत संशय आहे. तो बहिणीला म्हणतो, ‘तायडे, हा माणूस बाला रोज काय सांगत असतो?’ त्याच्या आवाजात चीड आहे.

मुरलीच्या भुवयाही वर चढल्या आहेत. ‘माय त्या दिवशी या माणसाला शिव्या घालत होती. ऐकलंस ना तू?’त्याचीही मती कुंठित झाली आहे. काय चाललं आहे, हे त्याला समजतच नाही.

कोसी सतलज एक्सप्रेसची शिट्टी वाजते. अचानक तो माणूस धावत त्यांच्याकडे येतो. जनकदुलारीचं मनगट घट्ट धरतो आणि तो तिला फरफटत फलाटावरून नेतो.

जनकदुलारी आक्रोश करू लागते,’बा, बा!बघा. हा मला फरफटत नेतोय.कुठे नेतोय तो मला? आणि का? तुम्ही काहीच काय करत नाही बा?’

‘बेबी, माझ्याबरोबर चल. तू तिथे राणीसारखं राज्य करशील. सगळं तुझ्या ताब्यात असेल. रोज तुला चारीठाव जेवण मिळेल. अगदी पोटभर. आणि मी तुझ्या बापाला आधीच पैसे दिले आहेत.’

देव जाणे कुठून, त्याचे दोन साथीदार उगवतात आणि तिच्याभोवती कोंडाळं करतात. कोणालाही ती दिसत नाही. तसंही काय चाललंय, याची कोणालाच पर्वा नसते.

जनकदुलारी आक्रोश करते आहे.

ती सुटकेचा प्रयत्न करते आहे. ती वडिलांना बिलगायला जाते;  पण ते व्यर्थ जातं. तिला धावत वडिलांकडे जायचं आहे; पण ती जाऊ शकत नाही.

फलाटावर दोन पोलीस उभे होते. अगदी थोड्या वेळापूर्वीपर्यंत ते लाठ्या उगारत होते आणि सगळ्यांच्या अंगावर वसावसा ओरडत होते,’चला. चालायला लागा. गोंगाट करू नका.’ पण आता तेही हवेत विरून गेले आहेत, असं वाटतं.

जनकदुलारीचं कर्कश रडणं-ओरडणं फलाटावरच्या भयानक कोलाहलात बुडून गेलं आहे.

गाडी सुरू होते. तो माणूस तिला फरफटवतोच आहे. उडी मारून तो गाडीत चढतो. तिलाही वर ओढतो.

तिचे दोन्ही भाऊ आपल्या छोट्याश्या हातांनी निकराने वडिलांना हलवत आहेत,’बा, तो बदमाश तिला घेऊन जातोय.’

गाडी सुरू झाली आहे….. हळूहळू वेग घेते आहे……

बिरोजा त्या डब्याकडे धावतो…. आत शिरायला बघतो, पण…..

तो माणूस दारातच उभा आहे. तो बिरोजाच्या तोंडावर ठोसा मारतो,’उतर खाली. मी पैसे टिकवलेत तुझ्या हातावर. चालायला लाग, भिकारड्या!’

‘जनकू, बबडे!ये गं. खाली उतर, बाळा.’ बिरोजा धावत्या गाडीतून फलाटावर पडतो.

‘बा! तायडे, जाऊ नकोस तू.’मुरली आणि माधो गाडीच्या मागून धावत आहेत. त्यांचा आक्रोश चालू आहे. ते गाडीत चढू पाहत आहेत.

पण त्यांच्या मानाने कोसी सतलज एक्सप्रेस खूपच वेगात धावत आहे.

आणि ते दोघे भाऊ गाडी पकडू शकत नाहीत.

समाप्त

 मूळ इंग्रजी कथा – ‘कोसी- सतलज एक्सप्रेस’ मूळ लेखक – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी 

अनुवाद : सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नजमा – भाग -3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ? मनमंजुषेतून ?

☆ न ज मा – भाग – 3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

मैने राखी नही बांधी। हमारे मे ऐसा कुछ रहता नही ना. मी एकदा नजमाला म्हटलं, “नजमा, अगं रोज अंघोळ करून यावं. म्हणजे बरं वाटतं. ती काही बोलली नाही. नंतर सांगायला लागली. “भाभी तुम्हे  नळ छोडे  बराबर पाणी मिलता है। हमे बाहर से, कतार मे  ठहरनेके बगैर  पाणी नही मिलता। पकाना, भांडे, कपडे धोना, साफसफाई, सब के लिए बाहर से पानी  लाना पडता है। बरोबर है ना ?” मलाच डोळे उघडल्यासारखं झालं .घरात जागोजागी नळ असल्याने तिची परिस्थिती कधी लक्षातच आली नाही. फुकट उपदेश करायला काय जातंय, असंच मला वाटायला लागलं.

आता तिची अभ्यासाची गोडी वाढायला लागली होती .शाळेतून आली की, पुन्हा ” शिकवा ” म्हणून दप्तर उघडायची. परीक्षा आणि रिझल्ट ही झाला .नजमाचा  पहिला नंबर आला. शाळेत खूप कौतुक झालं. नाचत नाचत बातमी सांगायला प्रथम माझ्याकडे  आली.आणि    “भाभी, मुझे पहिला नंबर मिला। तुम्हारी वजहसे मिला। मलाही तिच्या इतकाच आनंद झाला. रोज ती जाताना मी तिला सांगायची,” नजमा “म्हणजे “चमकता तारा “तशीच मोठी हो, आणि चमकता तारा होऊन दाखव.

एकदा गणपती उत्सव होता. नजमाचा  धाकटा भाऊ सलीम मित्रांबरोबर, घरात न सांगता, पुण्याला मजा करायला गेला. घरच्यांनी दोन दिवस सगळीकडे शोध घेतला. पण सापडले नाहीत. शेवटी चैन करून पैसे संपले.आणि घरी परत आले. गणपतीचा दिवस होता तो. गणपती बरोबर तो घरी आला, अशा एका भावनेने एक नारळ, उदबत्ती, फुल, आणि केळी अशी सामुग्री घेऊन, नजमा घरी आली. तिच्या  भक्तीभावाचं मला आश्चर्य वाटलं.

दिवाळी जवळ आली. तिचा दिवाळीचा उत्साह दांडगा होता.  “दिवालीमे क्या क्या करेंगे भाभी? मै भी मदद करुंगी। अस तिच पालुपद सुरू होतं. दिवाळी म्हणून तिच्यासाठी, एका नवीन सुंदरशा साडीचा, फ्रील  फ्रॉक मी स्वतः तिला शिवला. मी शिवण  शिवत  असताना, तिचं निरीक्षण असायचं. ‘मला पण शिकवा’ म्हणायची. तिला केसाच्या  पिना,  रिबिनी, बांगड्या, मेहंदी बरच काही आणलं. मला मुलगी नसल्याने मीही मुलीची हौस भागवून घेत होते. दिवाळीत खुष होती ती. आवडेल ते मागून घेऊन फराळ केलान. “हमारे में दिवाली नही रहती, ऐसा सब कुछ नही बनाते।” नजमा आवडीने खात असताना पाहून मलाही समाधान झालं. ज्याला मिळत नाही त्यालाच द्यावं, असं माझं एक तत्त्व होतं. भाऊबीजेच्या दिवशीही तिने दोघा भैयांना ओवाळलन. तिला ओवाळणीत रस नव्हता. भाऊ-बहिणीच्या नातेसंबंधात रस होता. एक दिवस अचानक काय झालं कोणास ठाऊक! नजमा  कामाला यायची बंद झाली. आणि तिची आई रूकसाना यायला लागली. पुन्हा पुन्हा विचारलं, नजमाला कुणी काही बोललं का? कुणी रागावलं का? खोदून खोदून विचारलं, तेव्हा रुकसाना ने सांगायला सुरुवात केली .”मुझे गलत समजू नको भाभी। नजमा बडी हो गई है। मै तो दिन भर काम को जाती हूँ। घर मे उसको अकेली रखना कठिन है । एक  सग्गेमेका लडका है । दारू नही पीता। सेंट्रींग का काम करता है। कमाई भी अच्छी है ।आज नही तो कल, शादी करनी है ।मेरे सर का बोज कम हो गया। नजमा 18 साल की नई है, तो शादी करना कानून के खिलाफ है।  बाहर जा के उसकी शादी की। मला मात्र मनोमन वाटत होतं, नजमा– चमकता तारा, ढग आले तरी तेवढ्यापुरता पुसट झाला तरी तो तारा पुन्हा चमकणारच.

नाजमा आज जबाबदार स्त्री झाली होती. माझं शिवण बघत असताना तिला शिवणाची आवड निर्माण झालेलीच होती. तिने शिवणाचा कोर्स केला. बाहेरच शिवण घेता घेता वाढायला लागलं. महिला उद्योजक, मधून कर्ज घेऊन, दोन  शिलाई मशीन घेतलींन. हाताखाली दोन मुली घेतल्यान. आणि उत्तम चाललं होतं .आणि हे सगळं करत असताना तिने मुलांच्या अभ्यासाकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिलं नाही. भरपूर कष्ट घेत होती बिचारी.

नजमाचे कष्ट आज फळाला आले. मुलगी सायरा  पहिली आली. मुली बरोबर तिचा आनंद गगनात मावत नव्हता. ते ऐकून मलाही खूप खूप आनंद झाला. आम्हा तिघिंच्याही आनंदाचं, समाधानाच मूल्य वेगवेगळं होतं. आज तेच पेढे घेऊन ती आली होती .डोळ्यात आनंदाश्रू चमकत होते .आता ती जबाबदारी स्त्री झाली होती. ती मला पुन्हा पुन्हा सांगत होती, “तुम्हारे कारण मैने यहअच्छा दिन देखा है। मै सदा के लिये तुम्हारी तरक्की मे एहसानमंद हूँ।  सायरा की यश का हिस्सा तुम्हारा भी है।”  तिच्या यशाचे श्रेय ती मलाही देत होती. नजमाला अभ्यासाची गोडी आणि शिक्षणाचे महत्त्व मी पटवलं, आणि तिनं ते मनावर घेऊन सायनाला शिकवलंन. असं तिचं म्हणणं ऐकून, मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटायला लागलं.

आज नजमाची  मुलगी सायरा चमकली. उद्या मुलगाहि चमकेल. मुलांना प्रकाश देणारा तारा –नजमा!! नाव सार्थ करणारी ठरली. जो स्वयंप्रकाशी असतो, तोच दुसर्याला प्रकाश देऊ शकतो. नजमाने तेच केल.      

समाप्त.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक क्रमांक २० – भाग ३ – कंबोडियातील अद्वितीय शिल्पवैभव ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २० – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कंबोडियातील अद्वितीय शिल्पवैभव ✈️

सियाम रीपहून आम्ही कंबोडियाची राजधानी नामपेन्ह इथे आलो. तिथले ‘रॉयल पॅलेस’ एका स्वच्छ, भव्य बागेत आहे. हरतऱ्हेची झाडे व अनेक रंगांची फुले फुलली होती. नागचाफा ( कैलासपती ) म्हणजे कॅननबॉलचा महाप्रचंड वृक्ष होता. त्याला बुंध्यापासून गोल फळे लगडली होती. कमळासारख्या गुलाबी मोठ्या पाकळ्या असलेल्या या फुलात मधोमध छोटी शंकराची पिंडी व त्यावर पिवळट केसरांचा नागाचा फणा असतो. एक मंद मादक सुवास सगळीकडे दरवळत होता. राजवाड्याचे भव्य खांब अप्सरांच्या शिल्पांनी तोललेले  आहेत. राजवाड्याची उतरती छपरे हिरव्या, निळ्या, सोनेरी रंगाची आहेत. आवारात वेगवेगळे स्तूप आहेत. हे स्तूप म्हणजे राजघराण्यातील व्यक्तींचा मृत्यू झाल्यावर त्यांचे दागिने, कपडे, रक्षा ठेवण्याची जागा आहे. राजाची रक्षा सोन्याच्या कमलपात्रात ठेवली आहे.

सिल्व्हर पॅगोडा पाहिला. पॅगोडाच्या आतील संपूर्ण जमीन  चांदीची आहे. एक किलो १२५ ग्रॅम वजनाची एक लादी अशा ५३२९ चांदीच्या लाद्या इथे बसविण्यात आल्या आहेत. या साऱ्या लाद्या फ्रान्समध्ये बनविल्या आहेत. प्रवाशांना त्यातील एक लादी काढून दाखविण्याची सोय केली आहे. या पॅगोडामध्ये सोने, रत्ने वापरून केलेला बुद्धाचा घडीव पुतळा आहे. त्याच्या कपाळावर आठ कॅरेटचा हिरा जडविलेला आहे. त्याच्या मुकुटावर व अंगावर मिळून २०८६ रत्ने बसविलेली आहेत अशी माहिती गाईडने दिली. या रत्नजडित बुद्धाच्या मागे थोड्या उंचीवर संपूर्ण एमरेल्डचा (Emerald ) पोपटासारख्या रंगाचा पण पारदर्शक असा बुद्धाचा पुतळा आहे. त्याच्या मागे जाऊन पाहिले की आरपार पोपटी उजेड दिसतो.

म्युझियममध्ये होडीच्या आकाराचे मोठे तंतुवाद्य होते. कंबोडियामध्ये उत्तम प्रतीचा पांढरा व हिरवट मार्बल मिळतो. तो वापरून हत्तीचे, बुद्धाचे पुतळे बनविले आहेत. सॅण्डस्टोन मधील स्कंद म्हणजे कार्तिकेयाची मूर्ती आहे. सहाव्या शतकातील शंख, चक्र, गदा, पद्मधारी श्री विष्णूची मूर्ती आहे. ब्रह्मा-विष्णू-महेश, शिवलिंग, सिंह, गरुड, वाली-सुग्रीव यांच्या मूर्ती आहेत. अर्धनारीनटेश्वराची ब्रांझमधील मूर्ती आहे. नागाच्या वेटोळ्यावर बसलेल्या बुद्धाला काही लोकं काडीला लावलेला मोगरा व लाल फूल वाहत होते.उदबत्यांचे जुडगे लावीत होते. तीन-चार हजार वर्षांपूर्वीची शस्त्रास्त्रे, वाद्ये, दागिने,सिल्कची वस्त्रे विणण्याचे माग, राजाचा व धर्मोपदेशकाचा ब्राँझचा पुतळा अशा असंख्य गोष्टी तिथे आहेत.

मानवतेला काळीमा फासणारा एक काळाकुट्ट काळ कंबोडियाने अनुभवला आहे. क्रूरकर्मा पॉल पॉट या हुकूमशहाने त्याच्या चार वर्षांच्या कारकिर्दीत ( १९७६ ते १९७९) वीस लाख लोकांना यमसदनास पाठविले. हे सर्व लोक त्याच्याच धर्म- वंशाचे होते. बुद्धीवादी सामान्य नागरिक म्हणजे शिक्षक, प्राध्यापक, लेखक, पत्रकार, संपादक, डॉक्टर, वकील अशा लोकांचा पहिला बळी गेला. पॉल पॉटने हिटलरसारखे कॉन्संस्ट्रेशन कॅ॑पस् उभारले होते. महाविद्यालये , शाळा बंद होत्या. निरपराध लोकांना तिथे आणून हालहाल करुन मारण्यात आले. आम्हाला एका शाळेतील असा कॅम्प दाखविण्यात आला. गाईड बरोबर फिरताना, तिथले फोटो, कवट्या बघताना अश्रू आवरत नाहीत. गाईडचे नातेवाईकही या छळाला बळी पडले होते. एखादा माणूस असा राक्षसासारखा क्रूरकर्मा होऊ शकतो यावर विश्वास बसत नव्हता. पण हा चाळीस -बेचाळीस वर्षांपूर्वीचा सत्य इतिहास आहे. क्रूरतेची परिसीमा गाठलेला, माणुसकी हरवलेला!

कंबोडियन लोक साधे, गरीब व कष्टाळू आहेत. आपल्या परंपरा, धर्म आणि रूढी जपणारे आहेत. एप्रिल महिन्यात त्यांचे नवीन वर्ष सुरू होते. नोव्हेंबर मधील पौर्णिमेला बोन ओम थोक नावाचा सण साजरा करण्याची प्रथा बाराव्या शतकापासून आहे. त्यावेळी नद्यांमध्ये बोटीच्या स्पर्धा होतात. फटाके वाजविले जातात.  केळीच्या पानातून अन्नाचा भोग (नैवेद्य ) दाखविला जातो. आता कंबोडियातील बहुतांश लोकांनी बुद्ध धर्म स्वीकारलेला आहे. त्यामुळे बुद्ध पौर्णिमा ही विशेष प्रकारे साजरी होते. मे ते ऑक्टोबर हा तिथला पावसाळ्याचा ऋतू आहे. त्यामुळे नोव्हेंबर ते साधारण फेब्रुवारी मध्यापर्यंत कंबोडियाला जाण्यासाठी योग्य काळ आहे. त्यानंतर मात्र चांगलाच उन्हाळा असतो.

कंबोडियात परंपरेप्रमाणे क्रामा म्हणजे एक प्रकारचे छोटे उपरणे वापरण्याची पद्धत आहे. आम्हालाही एकेक क्रामा भेट म्हणून देण्यात आला. उन्हापासून संरक्षण करायला, लहान बाळाला गुंडाळून घ्यायला, झाडावर चढण्यासाठी अशा अनेक प्रकारे त्याचा वापर केला जातो.

अनेक शतके पिचत पडलेल्या कंबोडियाच्या राजवटीने गेली दहा वर्षे आपली दारे जगासाठी उघडली आहेत. या दहा वर्षात पर्यटनाच्या दृष्टीने अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. भारतीय प्रवासी कमी असले तरी युरोप व इतर प्रवाशांचा चांगला ओघ असतो. आम्ही राजधानी नामपेन्ह  इथे भारतीय उच्चायुक्तांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्या राहण्याची व कार्यालयाची जागा एकाच छोट्या बंगल्यात होती. त्यांनी कंबोडियाबद्दल थोडी माहिती दिली.रबर,टिंबर, तयार कपडे यामध्ये कंबोडियाची निर्यात वाढत आहे तर औषधे, प्रक्रिया केलेले अन्न, पेट्रोल व पेट्रोलियम उत्पादने चीन, तैवान, थायलंड, सिंगापूर येथून आयात केली जातात. व्यापार व इतर व्यवहार अमेरिकन डॉलरमध्ये होतात. कंबोडिया भारताकडून औषधे, वाहनांचे सुटे भाग, मशिनरी, कॉस्मेटिक्स आयात करतो. पण अजूनही गुंतवणुकीला भरपूर वाव आहे. सिंगापूर, चीन, कुवेत, कोरिया,कतार यांनी बांधकाम व्यवसायात व शेतकी उत्पन्नात चांगली गुंतवणूक केली आहे. खाण उद्योग, वीज निर्मिती, रस्तेबांधणी तेल व गॅस संशोधन यामध्ये गुंतवणुकीला भरपूर वाव आहे.चीनने नेहेमीप्रमाणे मुसंडी मारली आहे. दोन मोठ्या सरकारी इमारती ‘फुकट’ बांधून देऊन उत्तरेकडील सोन्याच्या खाणीचे कंत्राट मिळविले आहे. उदासीनता झटकून भारतानेसुद्धा येथील संधीचा फायदा घेतला पाहिजे.

सांस्कृतिक आणि अध्यात्मिक समृद्धी असलेल्या या देशाला आपले पूर्ववैभव प्राप्त करता येईल अशी आशा करुया.

भाग – ३ व कंबोडिया समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 27 – सजल – युग बदले पर कभी न बदले… ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है दोहाश्रित सजल “युग बदले पर कभी न बदले… । आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 27 – सजल – युग बदले पर कभी न बदले… 

समांत- आदा

पदांत- अपदांत

मात्राभार- 30

 

कट्टरता का ओढ़ लबादा।

खुद तो बने हुए हैं दादा ।।

 

दूर रहें पढ़ने-लिखने से, 

खुद को कहते हैं शहजादा।

 

नारी को समझे हैं दासी,

सारा अपना बोझा लादा।

 

कट्टरता जग का है दुश्मन,

मानवता का हुआ बुरादा।

 

युग बदले पर कभी न बदले,

तोड़ी हैं सारी मर्यादा।

 

छद्म वेश धरकर हैं चलते,

लड़ने को होते आमादा।

 

काट पतंगें सद्भावों की

रिपु दल का है बुरा इरादा।

 

मानवता कहती है जग में

रक्त बहे न करो यह वादा ।

 

लहू एक रंग हर प्राणी में ,

फिर क्यों होता धर्म तकादा ।

 

बड़े धुरंधर क्यों बनते हो,

मानव-धर्म ही* सीधा-सादा।

 

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

30 अगस्त 2021

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)-  482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – यात्रा-वृत्तांत ☆ काशी चली किंगस्टन! – भाग – 13 ☆ डॉ अमिताभ शंकर राय चौधरी ☆

डॉ अमिताभ शंकर राय चौधरी

(डॉ अमिताभ शंकर राय चौधरी जी एक संवेदनशील एवं सुप्रसिद्ध साहित्यकार के अतिरिक्त वरिष्ठ चिकित्सक  के रूप में समाज को अपनी सेवाओं दे रहे हैं। अब तक आपकी चार पुस्तकें (दो  हिंदी  तथा एक अंग्रेजी और एक बांग्ला भाषा में ) प्रकाशित हो चुकी हैं।  आपकी रचनाओं का अंग्रेजी, उड़िया, मराठी और गुजराती  भाषाओं में अनुवाद हो  चुकाहै। आप कथाबिंब ‘ द्वारा ‘कमलेश्वर स्मृति कथा पुरस्कार (2013, 2017 और 2019) से पुरस्कृत हैं एवं महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा द्वारा “हिंदी सेवी सम्मान “ से सम्मानित हैं।

 ☆ यात्रा-वृत्तांत ☆ धारावाहिक उपन्यास – काशी चली किंगस्टन! – भाग – 13 ☆ डॉ अमिताभ शंकर राय चौधरी

(हमें  प्रसन्नता है कि हम आदरणीय डॉ अमिताभ शंकर राय चौधरी जी के अत्यंत रोचक यात्रा-वृत्तांत – “काशी चली किंगस्टन !” को धारावाहिक उपन्यास के रूप में अपने प्रबुद्ध पाठकों के साथ साझा करने का प्रयास कर रहे हैं। कृपया आत्मसात कीजिये।)

बेटी का घर   

झूम के मकान के सामने यानी सड़क के उस पार एक मकान की छत की मरम्मत हो रही है। यहाँ यही रिवाज है कि पतझड़ के पहले ऐसे काम करवा लो। ताकि बर्फबारी होने पर कोई दिक्कत न हो। यहाँ तो नवंबर से ही बर्फबारी शुरू हो जाती है। फरवरी तक तो ठोस बर्फ। सॉलिड। ब्रह्मा, विष्णु और महेश की तरह पानी की भी तीन अवस्थाएँ हैं – ठोस, द्रव और गैस। बर्फ, पानी और भाप। क्यों, ठीक कहा है न ?

चार आदमी छत पर काम कर रहे हैं। लकड़ी के शीट के ऊपर कुछ प्लास्टिक मेटिरियल के आयताकार ट्रेनुमा लगा है। एक आदमी मशीन से उन्हें काट रहा है। दो तीन किसिम के ब्रशनुमा झाड़ू है। हेलमेट पहने एक आदमी कचड़ों को इकठ्ठा कर रहा है। नीचे उनकी गाड़ी खड़ी है। उसके पीछे कबाड़ ढोने की ट्राली में सब फेंका जा रहा है। वाह! सड़क को बपौती समझ कर गंदा करने का कोई कार्यक्रम नहीं। हमारी काशी में तो जब लोग अपना मकान बनाते हैं, तो राहगीरों की कोई परवाह नहीं। छत से ईंट पत्थर गिरे तो तुम जानो। आखिर खोपड़ी तो तुम्हारी ही न है, बबुआ?

और ऐसे प्राइवेट काम में हेलमेट का प्रयोग ? जनाब, वहाँ शिव की नगरी में आजकल डी.एल.डब्ल्यू. के पास जाने कौन सा हवाई पुल का निर्माण हो रहा है। किसी भी मजदूर के माथे पर हेलमेट नहीं। कुछ ऐसा ही दृश्य तो कॉमनवेल्थ गेम्स के समय राजधानी में रहा। अगर कोई इंसान खंभे गिरने से दब कर मर जाता है तो पैसा है न मुआवजा देने के लिए। पब्लिक मनी है पैतृक खजाना, भले मौत का आए परवाना। फिर फिकर नट।

झूम के बरामदे से सामने ऑन्टारिओ लेक के किनारे अद्भुत बिहंगम दृश्य दीखता है। सामने है केवाईसी – नो योर कस्टमर नहीं- किंग्सटन याक्ट क्लब। उसके सामने झील के किनारे कतार से कई झंडे ऊँचे आसमान में लहर रहे हैं। ये कनाडा एवं उसके स्टेटस के पताका हैं – न्यू फाउंडलैंड, न्यू ब्रुनस्विक, नोवा स्कोटिया और प्रिंस एडवार्ड आइलैंड आदि। मानस के हंस की तरह सैकड़ों की तादाद में सफेद नाव। सारे प्राइवेट। दो चार मोटर बोट भी। पानी से घिरा उनका ऑफिस – एक सुंदर सफेद कॉटेजनुमा मकान। उसके सामने चेन्ज रूम या बाथरूम वगैरह भी हैं। इधर घास के गलीचे पर मँडराती तितलिओं की तरह बच्चे खेल रहे हैं। आजकल यहाँ के स्कूलों में छुट्टी जो चल रही है। दो चार की टोली में दिनभर युवक युवतियां आते रहते हैं। वे अपने नाव पर पाल फहरा कर झील में निकल जाते हैं। पतवार से खेने वाली छोटी छोटी कैनो नौका भी चलती रहती हैं। हजार द्वीपों के सफर में ले जाने वाले क्रुजर जहाज भी दूर से दीखते हैं। 

वहीं दूर लहरों के बीच सैकड़ों सफेद नाव सफेद पाल लगाकर तैर रही हैं। मानो सारे सफेद राजहंस तैर कर ही मानसरोवर पहुँच जायेंगे।

केवल नदी में ही नहीं, क्लब के यार्ड में भी पचासों नाव खड़ी हैं। तीन पहिये की ट्राली में लादकर उन्हें पानी में छलकाया जाता है। यहाँ की जिन्दगी बहती धारा की तरह है। छल छल बहती जाये रे!

आचार्य हजारी प्रसाद द्विवेदी के बारे में लिखते हुए विश्वनाथ त्रिपाठी ने कहा है कि आचार्य जब कश्मीर गये हुए थे, तो वहाँ की ललनाओं को देख कर उन्हें कुमारसंभव की पार्वती याद आ गयीं। अगर यहाँ की इन नौकाओं को खेती अप्सराओं के वे देखते तो क्या कहते ? – अरे भाई, ये मत्स्यगंधाये किन पराशरों को अपने जाल में फाँसने के लिए ऑन्टारिओ झील की लहरों पर ऐसे निकल आयी हैं?

हमलोग तो रूप के उपासक हैं ही। उधौ मन नाहीं दस बीस, एक हु तो सो गयो स्याम संग, को आराधै ईश? क्या इसीलिए बुतपरस्ती का विरोध करने पैगंबर मुहम्मद साहब ने काबा के कुएँ में वहाँ की प्राचीन अरबी मूर्तियों को फेंक दिया था ? हम लोग तो साकार सगुन देवता के चक्कर में कृष्ण की बांसुरी और रासलीला में ही मस्त हुए रहते हैं। गीता की वाणी को तो भूल ही जाते हैं। वैसे और लोग भी नबी की बातों को कहाँ याद रखते हैं? वरना इतना मार काट क्यों होता ?

दोपहर बाद फिर निकल पड़ा था। बैग में तूलि, वाटर कलर आदि और हाथ में वाटर कलर पेपर। एक मेपल के पेड़ को बना रहा था। ढलती दोपहर में उसकी पत्तियों की छाया किस तरह जमीं पर फैलती रहती है। कई गिलहरियाँ यहाँँ से वहाँ फुदक रही थीं। उधर एक गार्बेज कैन है, पेड़ के तने पर चढ़ कर वे सब उसमें भी ताक झॉक कर रही हैं,‘किचम किच्। कुछ मिला बंधु ?’ यहाँ की गिलहरियाँ सब काली होती हैं। हमारे यहाँ की तरह धारीदार नहीं। क्यों न हो ? आखिर यहाँ तो राम लक्ष्मण आये नहीं न थे। कहा तो यही जाता है कि लंका जाने के लिए सेतु बंधन करते समय जब वहाँ रामेश्वरम् की गिलहरियाँ भी कूद कूद कर छोटे मोटे कंकड़ या टहनियों को पुल के पत्थरों के बीच लगा रहे थे, तो श्रीराम ने अपने हाथों से उनकी पीठों को सहला दिया था। तो तब से उनकी पीठ पर वे धारियाँ या रघुवर की उँगलिओं के निशान बन गये हैं। पर हैं सब तन्दुरुस्त। झबड़ेदार पूँछ की शोभा ही कुछ अलग है। बिलकुल चामर या चँवर की तरह।

 मैं सीटी पार्क में बैठ कर चित्रकारी कर रहा था तो एक बगल में आकर पिछले पैरों पर खड़ी हो गयी। किच किच। शायद पूछ रही थी,‘क्यों विदेशी, कुछ खाना वाना लाये हो साथ में?’

यहाँ के खरगोश उस हिसाब से कुछ छोटे और भूरे हैं। वे भी इन मैदानों में दौड़ते रहते हैं।

और एक जीव के बारे में न बताना उनकी प्रतिष्ठा के खिलाफ होगा। वो हैं फ्लैट के बरामदे से लटकती मकड़ियाँ। आप सुबह उनके जाल को साफ कीजिए और देखिए शाम तक उनका पुनराविर्भाव। रुपाई वैक्यूम क्लीनर लेकर उनके पीछे पीछे दौड़ता रहता है। अगर कोई सीलिंग से लटकती नजर आ जाये तो उसका खैर नहीं। ‘अरे देखो देखो कहाँ लैंड कर रही है।’ बस शिकारी दौड़ा शिकार के पीछे,‘झूम, वो कुर्सी यहाँ लाओ। उस पर चढ़ कर मैं उसकी खबर लेता हूँ।’ आखेट।

एपार्टमेंट के मेन गेट के पास एक स्टैंड पर साप्ताहिक अखबार रखे होते हैं। चाहिए तो ले जाइये। किंग्सटन हेरिटेज (23.7.15) में निकला था कि आसपास के इलाके में खतरनाक पार्सनिप घास जैसी वनस्पति पैदा हो रही हैं। खास कर पूर्वी ऑन्टारियो में। उसको छूने से त्वचा में जलन और खुजली होती है। अतः उससे बचकर रहें।

अंग्रेजी के स्टे (ठहरना) और वैकेशन(छुट्टी) को मिलाकर आजकल (सन 2008 से) एक नये शब्द की ईजाद हुई है – स्टेकेशन। यानी कहीं रहते हुए छुट्टी के दिन गुजारो। हमारे यहाँ की टूरिज्म इंडस्ट्री में शायद इसी को होम स्टे का नाम दिया गया है। जो भी हो। अखबारों में तरह तरह की खबरें …..

झूम के लॉन्ड्री रूम में या यहाँ के मॉल में ऐसी पत्रिकायें पड़ी रहती हैं…क्लोजर, हैल्लो, इन टच, यू एस विकली, पिपुल आदि। लॉन्ड्री रूम में तो रैक पर किताबें भी करीने से रक्खी हुई हैं।

ऐसे बाहर खाने पर यहाँ एक आदमी के दो मील और एक नाश्ता यानी ढाई वक्त के भोजन और दो एक कॉफी या चाय पर करीब तीस डॉलर खर्च होते हैं। पति पत्नी हैं तो कमसे कम साठ। यानी हमारे देश के हिसाब से सिर्फ पेट पूजन में नित्य तीन हजार ! बाकी नहाना, धोना (झूम एपार्टमेंट की वाशिंग मशीन चलाने बेसमेंट में जाती है तो धुलाई के दो एवं सुखाई यानी ड्रायर के दो – उसे कुल चार डॉलर खर्च करना पड़ता है।),ओढ़ना, रहना, सोना…… तो उनके लिए ?

अब कुछ वहाँ के मिष्ठान्न के बारे में। मिष्ठान्न मितरे जना। मिठाई तो भाई मिल बाँट के ही खानी चाहिए। पहले तो यहाँ पर हमारे यहाँ की मिठाई मिलती ही न थीं। मगर अब किंग्सटन में भी आप उनके स्वाद से महरूम नहीं रहते। रुपाई ने दूसरे दिन ही किसी सुपर मार्केट से रसमलाई और गुलाब जामुन ले आया था। भाई, सच कबूल कर लेना चाहिए। रसमलाई सचमुच मजेदार थी। बनारस में अच्छी अच्छी दुकानों की रसमलाई भी चीनी डालकर खानी पड़ती है। मानो सभी केवल डायबेटीज के मरीजों के लिए ही बनाई गई हों। फिर एक दिन बेटी ने किसी दुकान का मिल्क केक भी खिलाया। बखान कैसे मैं करूँ, मन में हर्ष अपार/ खाकर मिठाई ऐसी मस्त हुआ संसार !

© डॉ. अमिताभ शंकर राय चौधरी 

संपर्क:  सी, 26/35-40. रामकटोरा, वाराणसी . 221001. मो. (0) 9455168359, (0) 9140214489 दूरभाष- (0542) 2204504.

ईमेल: [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares